ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
15 Apr 2025 - 4:42 pm
गाभा: 

आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
Bichukale

https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichuk...

प्रतिक्रिया

रात्रीचे चांदणे's picture

23 Apr 2025 - 7:15 pm | रात्रीचे चांदणे

कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.

वामन देशमुख's picture

23 Apr 2025 - 7:27 pm | वामन देशमुख

कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.

अहो त्यांनी आधीच सांगायला सुरु केलंय. अर्थात ते हिंदू नाहीतच, केवळ हिंदू नावाची आयडी घेऊन इथे वावरतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Apr 2025 - 7:28 pm | चंद्रसूर्यकुमार

काश्मीरमध्ये पोट भरण्यासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. तिथे सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंची शेती आणि गालिचे तसेच अनंतनाग-श्रीनगर मार्गावर क्रिकेटच्या बॅट बनविणे हे इतर मुख्य उद्योग आहेत. त्यात किती लोकांची पोटे भरतात याची कल्पना नाही. पण बहुतांश लोक पर्यटनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत हे नक्की. कालच्या घटनेमुळे काश्मीरात पर्यटनावर परीणाम होणारच आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या पोटावर पाय येणार आहे. जो काही आक्रोश दिसत आहे तो त्यामुळे आहे. पर्यटकांनी काश्मीरला जाणे बंद केले तर ते लोक भीकेला लागतील. ते त्यांना समजले आहे म्हणून तो आक्रोश आहे असे मला तरी वाटते. त्यावर फार विश्वास ठेवायची गरज नाही. जर का खरोखरच ते लोक इतके माणुसकीचे आणि सद्गुणांचे पुतळे असते तर मुळात काश्मीरी पंडितांना तिथून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागलेच नसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2025 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसं करायचं आता ? काश्मिर पर्यटन कायमचं भारत सरकारने बंद करावे म्हणता काय ? =))

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

26 Apr 2025 - 12:12 pm | रात्रीचे चांदणे

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील. मी कायमच मोदी सरकार विरुद्ध भूमिका मांडत असतो असं सांगितलं असत तरी त्यांनी मारलंच असत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 12:49 pm | अमरेंद्र बाहुबली

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.
+१
आपली सुरक्षा अमित शहा, अजित डोभाल, मोदी अश्या लोकांच्या हातात आहे हे लक्षात आले की काश्मीरकडे जाणारी पावले आपोआप थबकतील!

रात्रीचे चांदणे's picture

26 Apr 2025 - 1:02 pm | रात्रीचे चांदणे

मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. नाहीतर ग्राहमंत्र्यांनीच सांगितलं होत फाटत होती म्हणून.
तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही पाहिजे. आपल्या पैसे आपल्या विरुद्ध वापरत असतील. ते दहश्तवादी मारले गेले तर परत जणांज्याला गर्दी करतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 1:09 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. छान विनोद! सगळी इभ्रत गेली तरीही अजीन फेल गेलेल्या लोकांच्या आरत्या ओवाळणे चालूच आहे.

आग्या१९९०'s picture

26 Apr 2025 - 1:36 pm | आग्या१९९०

तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही
सरळ सांगा ना, ३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही म्हणून. आणि अनेक वर्ष तेथे पर्यटन नव्हते म्हणून त्यांचे खायचे हाल झाले आणि खंगून मेले असे काही झाले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 1:40 pm | अमरेंद्र बाहुबली

३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही
कारण ह्यांचे लक्ष फक्त फोडाफोडी , तोड्यापण्या, सेटलमेंट, इडी सोडून पक्ष भरती, विदेशात पर्यटन, अदाणीसाठी डील करणे, पक्ष फोडणे, गद्दार शोधणे, पैसे चारून आमदार फोडणे, हिंदी लादणे ह्यावरच आहे. देशाची सुरक्षा वगैरे पाहणे असल्या फायदा नसलेल्या गोष्टीत कशाला मोदी शहा लक्ष घालतील?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2025 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कश्मीरी हातात दगड घेऊन भारत सरकारचा विरोध करीत होते आता नव्या पिढीला भारत हा आपला वाटतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून कन्याकुमारी पासून पर्यटक आता काश्मीर मधे येतो तेव्हा गेल्या काही वर्षात पर्यटन रोजगार हा वाढलेला दिसतो आत्ता त्यांच्या मनात आपण आणि भारतातील सर्व एकच आहोत असे ते काश्मिरी म्हणत आहेत, तेही भावनिक होत आहेत अशा वेळी म्हणे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते असे म्हणत आहे अशी विकृती आता माध्यमातून पसरवली जात आहे, याचाच दुसरा अर्थ असा आहे की जम्मू काश्मीर हा यांचा राजकीय धंदा आहे, दूसरे काहीही नाही, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 1:10 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

रात्रीचे चांदणे's picture

26 Apr 2025 - 1:19 pm | रात्रीचे चांदणे

थोडा वेळ राजकीय धंद्या साठी विरोध होते हे खरं मानलं तरीही आपला जीव धोक्यात घालून कशाला काश्मिरात जायला पाहिजे? ५ तर काश्मिरीच दहशतवादी होते म्हणून सांगत आहेत. म्हणजे मारणारे तिथलेच स्थानिक होते. गोव्यातले टॅक्सी वाले लुटतात म्हणून social मीडिया वर ban गोवा म्हणून ट्रेंड चालू होता. हिथे तर थेट जीव जायचीच भीती. बाकी ज्याला जायचंय त्यांनी कलमा पाठ करून जायला हरकत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

खरे तर जोरजोरात गायत्री मंत्रा म्हटला तरी कुणी हू का चू करायला नको, पण कुचकामी लोकांच्या हातात देश असल्याने अतिरेकी येऊन गोळ्या मारून निघूनही जातात.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2025 - 1:24 pm | श्रीगुरुजी

मुर्खांच्या नादी लागू नका.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2025 - 2:55 pm | मुक्त विहारि

लोचट माणसाच्या विचारांना तर अजिबात थारा देऊ नये....

सुबोध खरे's picture

23 Apr 2025 - 7:25 pm | सुबोध खरे

जर तुम्ही या घटनेत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींबद्दल विचारले,
किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल,
भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रॉ (संशोधन आणि विश्लेषण विंग),
आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे,
असे प्रश्न उपस्थित केले, तर तुम्हाला देशद्रोही ठरवणार.

आपण उंदीर मारण्याचा विभागात असलो तरी आपल्याला एक मत देण्याचा हक्क आहे म्हणजे आपण कुणालाही काहीही विचारायला मोकळे झालो.

बढिया है !

जरा सबुरीने आपल्या डोक्यातील द्वेष भावना बाजूला ठेवून विचार करा आणि मग प्रश्न विचारा.

पार्श्वभूमी काय? काय कारण झाले असेल?

आजतागायत अमरनाथ यात्रा सोडली तर सहजासहजी पर्यटकांवर हल्ला होत नव्हता मग आताच असा का झाला याचा विचार करा?

उचलला कळफलक आणि बडवला असे भुजबळांसारखे करू नका.

जगभरात एक हल्ला होतो तेंव्हा असे ९९ हल्ले परतवले किंवा थांबवलेले असतात. गुप्तचर यंत्रणांना अपयश का आले असेल याचे विश्लेषण करू द्या.

कर्करोगाचा इलाज करताना १०० % लोक बरे होणारच हे गृहीत धरून एखादा दुर्दैवाने दगावला कि लगेच डॉक्टरची अक्कल आणि अनुभव काढून त्याने लोभीपणासाठीच रुग्णाला मारला असे आरोप करणाऱ्या अतिशहाण्यात आणि तुमच्या फार फरक दिसत नाही

कपिलमुनी's picture

23 Apr 2025 - 11:54 pm | कपिलमुनी

ती लिंक बघा, तुमच्याच साहेबांनी प्रश्न विचारले आहेत.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2025 - 11:49 pm | श्रीगुरुजी

केवळ आठवड्यापूर्वी विवाह करून काश्मीरला मधुचंद्रासाठी आलेल्या या तरूण निष्पाप मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या निष्पाप पतीला क्रूर डुकरांनी गोळ्या घालून ठार मारले. पतीच्या मृतदेहाशेजारी बसून अश्रू ढाळणाऱ्या या दुर्दैवी निष्पाप मुलीचे प्रकाशचित्र पाहून मनात कालवाकालव झाली आणि नि:शब्द झालो.

प्रभू श्रीरामांनी हा आघात सोसण्याचे धैर्य या निष्पाप तरूणीला व तिच्या आणि तिच्या पतीच्या कुटुंबियांना द्यावे व त्याला विनाकारण ठार मारणाऱ्या या क्रूर डुकरांचा नाश करावा अशी प्रार्थना करतो.

या विश्वातील सर्वांनाच सद्बुद्धी मिळो ही सदिच्छा.

दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व किंवा गटाशी जोडले जाऊ शकत नाही, जोडूही नये

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 12:01 am | श्रीगुरुजी

दहशतवाद्यांना धर्म, राष्ट्रीयत्व इ. सर्व काही असते. विनाकारण त्याकडे डोळेझाक करून फक्त स्वत:चीच फसवणूक होते.

कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसेच वस्तुस्थिती कितीही नाकारली तरीही वस्तुस्थितीचे परीणाम भोगावेच लागतात.

कपिलमुनी's picture

24 Apr 2025 - 1:35 am | कपिलमुनी


दहशतवादाला धर्माशी जोडणे अयोग्य; अमित शहा यांचे प्रतिपादन

आपले गृहमंत्री ही भूमिका २०२२ पासून मांडत आहेत.
म्हणजे गुरुजींच्या म्हणण्यानुसार ते स्वतःची आणि आपली फसवणूक करत आहेत.

रात्रीचे चांदणे's picture

24 Apr 2025 - 1:02 am | रात्रीचे चांदणे

काश्मिरात दहशतवाद्यांनी नाव विचारलं असताना नाहीतर कलमा का काय म्हणायला सांगितलं असत म्हणजे समजलं असतं दहशतवादाला कोणता धर्म असतो ते.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 6:51 am | श्रीगुरुजी

तुम्ही सत्य नाकारू शकता, पण सत्याचे परीणाम टाळू शकत नाही.

अमित शाहंचे सोयिस्कर शब्द उचलून नाचणाऱ्यांसाठी त्यांचे अजून काही विचार -

- The BJP doesn't believe in vote-bank politics. We believe India is above everything.

- BJP has never done politics on religion, and no one should do it. It is against the spirit of our Constitution.

- Millions of infiltrators have entered our country and are eating the country like termites. Should we not uproot them?

- Kejriwal's only mantra is to tell lies and talk forcefully and repeatedly, but Delhi cannot develop with telling lies.

- Those who carry out anti-national activities should be put in jail.

आशा आहे की अमित शाहंचे हे विचार सुद्धा मान्य असतील.

कपिलमुनी's picture

24 Apr 2025 - 6:55 am | कपिलमुनी

BJP has never done politics on religion, and no one should do it.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:21 am | श्रीगुरुजी

अमित शाहच म्हटलेत असं. मग विश्वास ठेवलाच पाहिजे. नाही का?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:23 am | श्रीगुरुजी

वादळ येत आहे हे स्पष्ट दिसत असूनही शहामृग वाळूत डोके खुपसून बसतो. तसंच आजवर, अगदी या क्षणापर्यंत, ढोंगी निधर्मांध वागताहेत.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:40 am | श्रीगुरुजी

- १२ मार्च १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी मुंबईत दुपारी बरोबर नमाज पढण्याच्या वेळेत बॉम्बस्फोट होईल अशी वेळ लावून १२ बॉम्बस्फोट केले ज्यात सुमारे ३०० जण ठार झाले ज्यात बहुतांशी हिंदू होते.

- १४ ऑगस्ट १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी किश्तवाडमध्ये बसमधील १७ हिंदूंना वेगळे काढून ठार मारले.

- १ जानेवारी २०२३ या दिवशी राजौरी भागात आधारपत्र तपासून ७ हिंदूंना ठार मारले.

- ५ जानेवारी १९९६ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी १६ हिंदूंना ठार मारले.

- १९ जून १९९८ डोडा: हिंदू लग्नसोहळ्यात ३ नवरदेवांसहीत २९ हिंदूंची हत्या

- २००२: हिंदूंच्या अक्षरधाम मंदिरात ३२ हिंदूंची हत्या

- २३ जानेवारी १९९८: वंदहामा गावात २९ काश्मिरी पंडीत ठार मारले.

- २७ जुलै १९९८: श्रवण गावात २० हिंदूंची हत्या

- १ ऑगस्ट २०००: २९ अमरनाथ यात्रेकरूंना ठार मारले

- २३ मार्च २००३: २४ काश्मिरी पंडीत मारले.

- ३० एप्रिल २००६: बसंतगड व डोडा: २९ हिंदूंची हत्या

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 9:24 am | अमरेंद्र बाहुबली

हे काश्मिरी पंडित ज्यू लोकांसारखी एखादी संघटना उभी करून लढत का नाहीत?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी

D

कॉंग्रेसी याला जोड्याने का मारत नाहीत?

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2025 - 9:47 am | चंद्रसूर्यकुमार

कसे मारतील आणि काँग्रेसमधील कोण त्याला जोड्याने मारणार? काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना? रॉबर्ट वाड्रा ते बोलला. काँग्रेसमधील इतर लोक जे बोलले नाहीत त्यांना पण तसेच वाटत असणार याची अगदी पूर्ण खात्री आहे. मग कोण ते करणार आणि कसे?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 10:09 am | श्रीगुरुजी

राष्ट्रमातेच्या राष्ट्रकन्येचा राष्ट्रवर.

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 9:49 am | आग्या१९९०

तुम्ही मारा की. स्वतःचे जोडे ठेवायचे राखून, दुसऱ्याचे घ्यायचे माखवून.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 11:52 am | श्रीगुरुजी

मी काही कॉंग्रेसी नाही.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 12:09 pm | मुक्त विहारि

आणि

आपण दोघेही काँग्रेसी होणार पण नाही...

सुक्या's picture

24 Apr 2025 - 9:56 am | सुक्या

आदीमातेचे जावई आहेत ते. त्यांना कोण मारणार?
कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा.

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 10:07 am | आग्या१९९०

कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा.
नुपूर शर्माची हकालपट्टी करणाऱ्या पक्षाने ती खरं की खोटं बोलली म्हणून पक्षाचे प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली होती? की त्या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत?

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 9:52 am | आग्या१९९०

काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना?
आज सर्वपक्षीय बैठक आहे, त्यावेळी काँग्रेसची अधिकृत भूमिका कळेल. कशाला घाई करता?

सुक्या's picture

24 Apr 2025 - 9:57 am | सुक्या

खिक्क!!
ते माहीती आहे ना ... खायचे दात दाखवायचे दात ...

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2025 - 10:02 am | चंद्रसूर्यकुमार

सुक्या, कशाला असल्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांचे महत्व वाढवत आहात?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 10:07 am | श्रीगुरुजी

सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका व बाहेर आल्यावर एकदम विरूद्ध भूमिका हे कॉंग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण माहिती नाही का?

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 10:02 am | आग्या१९९०

हे काश्मिरी पंडित ज्यू लोकांसारखी एखादी संघटना उभी करून लढत का नाहीत?
कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 11:04 am | मुक्त विहारि

काश्मीरमधून पळून आले तरी...?
---

त्यांना तिथून जबरदस्तीने काढले..

---

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 11:11 am | आग्या१९९०

आता सगळे व्यवस्थित आहे ना? जा त्यांना जबरदस्तीने काश्मिरात ढकलायला. जातात का बघा?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 11:53 am | श्रीगुरुजी

परती सुरू झाली आहे. वर लिंक दिली होती.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 12:10 pm | मुक्त विहारि

त्यांना आपले म्हणा...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली

कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय?
अच्छा! असे आहे होय, सर्व सुविधा मिळताहेत वरून सहानुभूतीपण. मज्जा आहे. म्हणूनच परत जात नाहीत, आले लक्षात.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली

पाकिस्तानात हल्लकल्लोळ माजला असावा का? ह्या कारवाईने?

https://www.ndtv.com/india-news/pakistan-governments-x-account-suspended...

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 12:58 pm | आग्या१९९०

नक्कीच! टिकटॉकवर भारतात बंदी केल्यावर चीनच्या अर्थव्यवस्थेने डोळेच मिटले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 5:44 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे! परदेशात असे काही घडले तर तिथले गृहमंत्री, पंतप्रधान राजीनामा देतात, भारतात नीतिमत्ता नावाचा प्रकार आहे की नाही?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 6:33 pm | मुक्त विहारि

तुमचा वरील प्रतिसाद वाचून, तुमची "कीव" वाटते...

तुमचे विदुषकी प्रतिसाद वाचून निदान करमणूक तरी होत होती.

पण आता तुमच्या मानसिकतेची कीव वाटते.

असो...

आनंद आहे....

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 6:38 pm | श्रीगुरुजी

काहीतरी काय. इतके अभ्यासपूर्ण, विद्वत्ताप्रचुर, माहितीपूर्ण प्रतिसाद इतर कोणी देतात का?

११ सप्टेंबरनंतर धाकट्या बुशनी राजीनामा दिला होता. २६/११ नंतर मनमोहन सिंगांनी राजीनामा दिला होता. १२ मार्चनंतर शरद पवारांनी राजीनामा दिला होता. विलासराव देशमुखांनी तर अनेकदा राजीनामा दिला होता.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 6:51 pm | मुक्त विहारि

व्यक्ती द्वेष इतका अंगात भिनला आहे की त्यांची बौद्धिक वाटचाल आता "जयचंदी" होत आहे....

"लवकर बरे व्हा." असेही म्हणता येत नाही ....

"नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे..." हीच त्यांची मानसिकता...

महाभारत आणि रामायण न वाचल्याचे परिणाम आहेत...

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 6:57 pm | श्रीगुरुजी

बौद्धिक वाटचालीसाठी थोडी तरी बुद्धी असावी लागते. कशातलंच काहीच समजत नाही. मग सर्व काही समजत असल्याचा आव आणून वारंवार हसू होतंय हे कसे समजणार?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 6:59 pm | मुक्त विहारि

ते पण आहेच म्हणा...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 7:02 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
२६/११ नंतरच्या राजीनाम्यांची बातमी रूमही वाचायला हवी होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 6:56 pm | अमरेंद्र बाहुबली

https://www.france24.com/en/20081130-indias-home-minister-national-secur...
२००८ हल्ल्यानंतर नीतिमत्ता असलेल्या शिवराजसिंह पाटील आणी रहस्त्रीय सुरक्षा सल्लागार m k narayanan ह्यांनी राजीनामे टेकवले होते, आज अमित शहा आणी अजित डोव्हाल हे राजीनामे टेकवतील का?
देशाची अब्रू जेवढी घालवायची तेवढी घालवून झाली आहे, आता तरी ज्या दोघांनी राजीनामे देऊन देशाची उरली सुरली इभ्रत वाचू द्यावी.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:04 pm | श्रीगुरुजी

मुंबईत २००६ मध्ये अनेक लोकलमध्ये बॉंबस्फोट होऊन २०० नागरिक गेले होते. तेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री रा. रा. पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, पंतप्रधान सोनिया गांधी, नामधारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्काळ राजीनामा दिला होता आणि या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:08 pm | मुक्त विहारि

अद्याप त्यांनी , रामायण आणि महाभारत पण वाचलेले नाही...

"कौटिल्याचे अर्थशास्त्र" तर त्यांनी हातात पण घेतले नसेल...

या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते.

असे मनमोहन सिंह स्वतः म्हणाले होते ? काही संदर्भ असेल तर कृपया द्यावा.
असे जर म्हणाले असतील ते खरोखर तर अवघड आहे बाबा फार किमान त्यांच्या कडून तरी इतक्या टोकाच्या पक्षपाती भेदभावा ची अपेक्षा नाही.
कृपया तुम्ही काही पुरावा दिला तर तपासता येईल.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2025 - 1:56 pm | श्रीगुरुजी

९ डिसेंबर २००६ या सोनिया गांधींच्या ६० व्या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी एका भाषणात मनमोहन सिंगांनी खालील प्रवचन दिले होते.

The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources.

Manmohan Sing's complete speech

मारवा's picture

26 Apr 2025 - 2:37 pm | मारवा

तुम्ही दिलेल्या भाषणाचे text वाचले. भाषणाची एक क्लिप ही सापडली.

एकूण हा प्रकार अतीशय खेदजनक आणि धक्कादायक असा आहे.
लोकशाही च्या कुठल्याच तत्वात हा भेदभाव आणि पक्षात बसू शकत नाही. ही उघड उघड लांगुलचालन किंवा vote bank politics आहे.

थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या.
अवघड आहे
एकूण असो

आग्या१९९०'s picture

26 Apr 2025 - 2:52 pm | आग्या१९९०

थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या.
त्यावर press release करून खुलासा केला आहे. अर्थात हे तुम्हाला मान्य व्हायलाच हवे असा आग्रह नाही.
https://archivepmo.nic.in/drmanmohansingh/press-details.php?nodeid=516

मनमोहन सिंग यांनी
1

यात particularly Muslim minority हा जो उल्लेख केलेला आहे त्याचे शुन्य स्पष्टीकरण दिलेले आहे त्यावर दांभिक मौन बाळगलेले आहे. हे माहीत असूनही की आक्षेप नेमका त्यावर आहे. त्यानंतर त्यावर शून्य प्रतिक्रिया देऊन इतर बोलणे याला केविलवाणी सारवा सारव नाहीतर काय म्हणणार ,?

2

यात अजून गंभीर बाब अशी आहे की इतर वर्ग जो ते म्हणतं आहेत. म्हणजे sc st childern women या सर्वांच्याही वर particularly Muslim. minority ते निःसंदिग्ध पणे ठेवत आहेत. सध्या विदा ने म्हणजे किमान जरीं धरले तरी एकूण मुस्लिम संख्या व एकूण इतर minority संख्या तरी किती मोठा फरक आहे.

3
किमान मनमोहन सिंग असे विधान करू शकतात असे मला तरी प्रथम दर्शनी वाटले नव्हते. यातील जे minority नाहीत बहुसंख्य आहेत त्यातील नुसत्या आर्थिक मागास यांचा जरी किमान आकडा लक्षात घेतला तरी. त्यांचे हे विधान किती पक्षपाती किती भेदभावपूर्ण किती लांगूलचालन करणारे आहे हे उघड आहे.
आणि हे समोर आलेले सत्य आहे आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत.

लोकशाही म्हणवणाऱ्या देशात इतका पक्षपात इतका भेदभाव
एकूण आनंदच आहे.
असो

आग्या१९९०'s picture

26 Apr 2025 - 3:39 pm | आग्या१९९०

It will be seen from the above that the Prime Minister's reference to "first claim on resources" refers to all the "priority" areas listed above, including programmes for the upliftment of SCs, STs, OBCs, women and children and minorities.
अजून किती स्पष्ट पाहिजे.
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे. ५ मे च्या भीती भर त्यात .

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 3:42 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे.
अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2025 - 5:30 pm | श्रीगुरुजी

आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत.

मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत.

न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते.

असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2025 - 3:13 pm | श्रीगुरुजी

अतिशय पक्षपाती माणूस होता. हे वक्तव्य काय, सच्चर आयोग काय . . . सैन्यातले सुद्धा मुस्लिम मोजायला निघाले होते. तेव्हा सैन्यप्रमुखांनीच फटकारले होते.

सध्या पप्पू जाईल तेथे तुमच्यात किती इतर मागासवर्गीय आहेत, तुमच्यात किती मागासवर्गीय आहेत असे अत्यंत प्रक्षोभक प्रश्न विचारून जातीयवाद भडकविण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनमोहन सिंग मुस्लिम मोजत होते. बरं सच्चर आयोगाने मुस्लिमांची आकडेवारी गोळा केली म्हणे आणि ते अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहेत असा दावा करून त्यावर उपाय काय सांगितला तर त्यांना राखीव जागा द्या. म्हणजे जर हलाखीच्या स्थितीत असतील तर त्यामागील कारणे शोधून (पोरांचे लेंढार, शिक्षणाकडे संपूर्ण दुर्लक्ष इ.) ती कारणे नष्ट करणे यावर अवाक्षर नाही. एखादे मूल अंगाने भरत नसेल तर इतरांच्या ताटातले काढून त्या पोराला दुप्पट खायला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे. पोराची वैद्यकीय तपासणी करून मधुमेह, क्षयासारखा एखादा आजार आहे का हे शोधून त्यावर उपाययोजना केली तर पोरगं अंगाने भरू शकतं. हे काही न करता दुप्पट खायला दिलं तरी पोर खंगतच जाणार कारण जखम पायाला आणि मलमपट्टी डोक्याला आशी यांची अवस्था. यांना मुस्लिमांचे तर सोडाच, पण फक्त स्वतः व गांधी घराणे सोडून कोणाचंच भलं करायचं नव्हतं. म्हणून तर मुस्लिमांना राखीव जागा असा चाटूगिरीचा उपाय शोधला होता.

पप्पू हेच करतोय. जात्याधारीत जनगणना, राखीव जागा वाढविणे यातून कोणाचेही भले होणार नाही. याला मागासवर्गीयांविषयी एवढा कळवळा कसता आपली वायनाडची जागा बहिणीऐवजी एखाद्या मागासवर्गीयाला दिली असती.

मनमोहन सिंगांनी मुस्लिमांचा साधनसंपत्तीवर प्रथम हक्क आहे हे उघड उघड बोलून दाखविलं. नंतर प्रकरण अंगाशी आल्यावर केविलवाणी सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला..

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:06 pm | मुक्त विहारि

बाळा, जरा अजुन खोदकाम कर... एकांगी शोधू नकोस...

थोडे रामायण आणि महाभारत पण वाचत जा....

असो,

आनंद आहे...

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:25 pm | श्रीगुरुजी

सामना नामक टॉयलेट पेपर वाचून पुढील कामासाठी वापरणाऱ्यांना जगातील इतर कोणतीही पुस्तके वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:30 pm | मुक्त विहारि

आनंद आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 8:22 pm | अमरेंद्र बाहुबली

त्याच सामनाकारांच्या पाया पडून आपला आवडता पक्ष महाराष्ट्रात मोठा झालाय!

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 8:26 pm | मुक्त विहारि

कमी वाचन आणि व्यक्ती द्वेष, अंगात भिनले की, तुमचे असे
विनोदी प्रतिसाद येणारच....

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:38 pm | श्रीगुरुजी

याच्यामुळे कागलकरची उणीव जाणवत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 8:42 pm | अमरेंद्र बाहुबली

कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता, अनेक अंधभक्त मैदान सोडून धोतर सावरत पळत सुटायचे. मी कुठेच नाही. :)

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:47 pm | श्रीगुरुजी

कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल आणि परीपूर्ण होता.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 9:26 pm | मुक्त विहारि

एकाचे सतराशे साठ डू आय डी....

आणि

एकाला हाकलून दिले तरी परत आले....

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 6:56 pm | आग्या१९९०

दहशदवाद्यांना फक्त गैरमुस्लीमांना मारायचे होते. त्यांना भारतातील मुस्लिमांना हिंदूंपासून वेगळे पाडायचे होते. देशातील सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी लोकसभेत मुस्लिम खासदारांना अश्लील भाषेत बोलताना साऱ्या जगाने बघितले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हसत होते. ह्याच दुखावलेल्या मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर आश्चर्य वाटायला नको. कोणी कितीही नाकारले तरी दहशतवाद्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक ध्रुवीकरण धोरणाचा फायदा घेतला हे सत्य आहे. आता कितीही सौगात ए अमुक तमूक रेवड्या वाटल्या तरी फायदा होणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 6:57 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ भाजपेयींमुळे देशभक्त मुस्लिमांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते!

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:00 pm | श्रीगुरुजी

मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . .

दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 7:08 pm | आग्या१९९०

हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?
सौगात ए रेवडी चालू आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:23 pm | श्रीगुरुजी

रेवड्या मिळाल्याने अभिनंदन! आता पार्टी पाहिजे.

आग्या१९९०'s picture

24 Apr 2025 - 7:28 pm | आग्या१९९०

पार्टी सौगात ए रेवडी वाटणाऱ्याकडून घ्या, तुम्हाला नाराज करणार नाही तो. १० सतरंज्या अधिक उचलायचे बळ मिळेल तुम्हाला.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:42 pm | श्रीगुरुजी

ज्याला रेवड्या मिळाल्या त्याच्याकडूनच पार्टी हवी. द्या पार्टी.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

जबरजस्त!
कंदहारला जातीने जाऊन अतिरेकी सोडून येणारे सौगात ए रेवड्या नाहीतर आणखी काय वाटणार?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:31 pm | मुक्त विहारि

आता तर तुमची कीव पण वाटत नाही...

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Apr 2025 - 7:37 pm | चंद्रसूर्यकुमार

कीवही वाटत नसेल तर संबंधित सदस्य प्रतिसाद देण्यायोग्य का वाटतो? अगदी राहवले नाही तर कधीतरी प्रतिसाद देण्यापासून रोखता येणार नाही हे मान्य. पण दरवेळेस अशा सदस्याला प्रतिसाद देऊन त्याची दखल का घ्यायची? त्याचे महत्व का वाढवायचे?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 8:02 pm | मुक्त विहारि

पण....

अद्याप तरी काही आशा आहे...

ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत...

वाचन कमी आणि व्यक्ती द्वेष, हे त्यांचे दोन दोष आहेत..

ज्या क्षणी त्यांना हे पटेल त्या दिवशी त्यांचे, चिंतन आणि मनन सुरू होईल आणि त्यांची वैचारिक प्रगल्भता पण वाढेल...

तूम्ही, सुबोध खरे, कर्नल तपस्वी, गुरुजी, पटाईत ही काही सर्व सामान्य माणसे नाहीत, हेच त्यांना समजत नाही.

अद्याप त्यांनी, रणजीत चितळे यांचे लेख पण वाचले नाहीत की त्यांनी दिलेली शपथ पण वाचली नाही..

कधी कधी असे वाटते की, रामदास, सर्वसाक्षी, रणजीत चितळे, डॉक्टर म्हात्रे, इथे येत नाहीत, तेच उत्तम आहे...

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 8:37 pm | श्रीगुरुजी

ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत...

उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली

बऱ्याच दिवसानी कागलकरांची कुणीतरी आठवण काढली! कोरोनात दिवसरात्र त्यांनी रुग्णांची सेवा केली होती. श्रीगुरुजी, सुबोध खरे वगैरेंचे ते चांगले मित्र होते, हे तिघे आपापल्या घरी ग्लास रिकामे करून (दुधाचे) टायपायला बसले की निबंधच्या निबंध लिहिले जात. मिपापाखराना चर्चेची आयती मेजवानी मिळे! कागलकर फार लवकर गेले! कागलकाराना श्रद्धांजली!

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 9:27 pm | मुक्त विहारि

उच्च शिक्षण घेतलेली माणसे आहेत..

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 11:42 pm | श्रीगुरुजी

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शिउबाठा नामक दुर्गंधीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता म्हणे. घराबाहेर बातमीदारांसमोर वाटेल ते बरळता येतं. मालक लंडनची थंड हवा खातोय. बैठकीत मोदी-शाहंनी यांच्याकडे नुसतं बघितलं असतं तरी फाटली असती हे ओळखूनच लपून बसले असावे. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांना कमोडमध्ये टाकून फ्लश का केलं हे पुन्हा एकदा लक्षात आलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 12:17 am | अमरेंद्र बाहुबली

योग्य केले, दुर्लक्ष करून “असल्या” लोकाना महत्व दिले नाही. मोदी म्हणजे काय इंदिरा आहे का त्यांच्या बैठकीला जायला? उद्धव ठाकरेंबद्दल आदर अधिक वाढला, अश्या इन्स्पिरेशनल बातम्या टाकत जा गुरुजी धन्यवाद.

ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम भागात दौरा करत आहेत. म्हणुन येता येणार नाही असे त्यांनी कळवले आहे. वर्क फ्रोम होम आहे का असे विचारत होते.
कुठला दुर्गम भाग आहे काय माहीत जिथे वर्क फ्रोम होम करता येते पण दिल्ली ला जाता येत नाही.
असो. ब्याद नव्हती तेच बरे झाले.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 8:49 am | मुक्त विहारि

ते, पाच वेळा अजान ऐकायला गेले असतील...

मध्यंतरी त्यांचा पक्ष अजान स्पर्धा भरवणार होता.

वरील प्रतिसाद, सुक्या ह्यानाच आहे...

अर्थात्, लोचट माणसाचा काही भरवसा नाही.....

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 9:10 am | श्रीगुरुजी

उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड हवा खातोय. राऊत, सावंत इ. ची मोदी-शाहंसमोर जाण्याच्या नुसत्या कल्पनेने तंतरली. मुंबईत घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करायला अक्कल लागत नाही. पण सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी किंवा शाहंनी चष्म्यातून नुसती नजर टाकली असती, तर बसल्या जागी यांची चपि झाली असती. म्हणून तर जाण्याचे धैर्य झाले नाही.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 10:09 am | मुक्त विहारि

Farming From Home

एकनाथ शिंदे काश्मिरात तळ ठोकून बसलेले आहेत. जी काही जमेलं ती मदत करत आहेत. त्या मदतीने किमान काही लोकांचा तरी त्रास वेदना कमी होत आहे. हे लंडन मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत या पार्श्वभूमीवर महत्वाचे आहे. यावरून शिंदे हे खरोखर तळागाळातील कार्यकर्ते होते हे त्यांच्या पुढाकार घेऊन केलेल्या कृतीने दिसून येते. हा approach महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे किमान अशा संकटाच्या प्रसंगी तरी सर्वपक्षीय बैठकीला हजर रहावयास पाहिजे होते. ओवेसी व राहुल गांधीच्या मध्येतरी तेवढी परिपक्वता दिसून येते. या.प्रसंगावरून उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड का ढिली झाली त्याचा काही.प्रमाणात उलगडा होत आहे. त्या सत्तेच्या काळातही बहुधा शिंदे सारखे कार्यकर्तेच ground ला काम करत असावीत. शेवटी meritocracy wins !

आग्या१९९०'s picture

26 Apr 2025 - 4:11 pm | आग्या१९९०

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत
दौरा अर्धवट सोडून काश्मीरला न जाता बिहारला विमानांचे खेळ बघायला गेले असते. लंडनला आहे तेच बरे आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 9:28 pm | अमरेंद्र बाहुबली

एकनाथ शिंदेना खरच तळमळ असले तर सुरक्षेत अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारायला लागून अमित शहा मी अजित डोभाल ह्यांचा राजीनामा मागायला हवा! शिंदे हे करतील का?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 10:34 am | अमरेंद्र बाहुबली

ठाकरेंनी बैठकीला आपल्या खासदाराना उपस्थित न राहायला सांगून भाजप आणी सरकारला आपली लायकी दाखवून दिली ह्यामुळे मीपावरील अनेक ठाकरेद्वेष्ट्यांचा जळफळाट झाला आहे! :) मज्जा येतेय! :)

आग्या१९९०'s picture

25 Apr 2025 - 10:47 am | आग्या१९९०

माकड म्हणते राजा भिकारी माझी टोपी पळवली, राजा रागाने टोपी फेकून देतो , माकड म्हणते राजा घाबरला माझी टोपी फेकली. कशाशी कशाचा संबंध नाही, उगाच कोणी अंगावर घेऊ नका. येथील फालतुगिरीला हातभार लावला इतकेच.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:09 am | अमरेंद्र बाहुबली

+१

सौंदाळा's picture

25 Apr 2025 - 10:50 am | सौंदाळा

बैसरनची 'ती' जागा दरवर्षी जूनपासून पर्यटकांसाठी खुली होते. पण यंदा एप्रिलमधेच झाली. पोलिस, लष्कराला याची माहिती नव्हती.
यावरुन हे नक्की आहे की कोणी स्थानिक माणसांनीच अतिरेक्यांशी हातमिळवणी करुन पर्यटकांना जाणूनबुजून मरणाच्या दारात ढकलले.
पोलीस, तपास यंत्रणांचे हे अक्षम्य अपयश आहेच.
हल्ल्यात सामील असणार्‍या देशांतर्गत आणि पाकीस्तानातील सूत्रधारांना लवकरात लवकर मृत्युदंड मिळाला पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:10 am | अमरेंद्र बाहुबली

पुलवामाचे सत्य ज्याप्रकारे बाहेर आले त्याच प्रमाणे ह्याचेही येईल!

पहलगाम च्या घटनेत सरकारचे अपयश निश्चितच आहे आणि उघड आहे. यासाठी सरकारला जब विचारणे देखील अगदी योग्यच आहे.
पण ही घटना म्हणजे सरकारने जणू मुद्दाम घडवून आणली असे म्हणणे याला काहीही अर्थ नाही बेस नाही पुरावा नाही.
त्याचप्रमाणे 370 हटवून देखील इतक्या दीर्घकाळ हिंसाचार नियंत्रणात ठेवला. पर्यटकांची वाढलेली विक्रमी संख्या हा त्यांनी व एकूण सर्व जनतेने काश्मिरच्या शांततेवर दाखवलेला विश्वासच होता. तसे नसते तर इतक्या विक्रमी संख्येने पर्यटक आले नसते. हे सरकारचे एक मोठे यश आहे.
याला पहलगाम च्या घटनेने निश्चित तडा गेला व तो कमावलेला विश्वास नक्कीच डगमगला. यावर सरकार कडून आता अपेक्षा ठेवण्यात जाब विचारण्यात काहीच गैर नाही.
पण म्हणून त्यांनी 22 एप्रिल पर्यंतची जी सकारात्मक परिस्थिती आणि सुरक्षित भावना निर्माण केली ज्याने इतके पर्यटक मुळात तिथे येऊ शकले. येऊ धजले त्याचे श्रेय नाकारण्यात अर्थ नाही.
आता सरकार समोर आव्हान पुन्हा विश्वास संपादन करणे हा आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 9:33 pm | अमरेंद्र बाहुबली

असा काही विचार न करता आपण सुरक्षेत अपयशी ठरलो म्हणून २००८ साली शिवराजसिंह चौहान नी तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्यांनी राजीनामे दिले होते, ते पडला चिकटून बसले
नव्हते नी कुणाही काँग्रेसीने त्यांचे समर्थन केले नव्हते, आजकाल सरकार अपयशी ठरूनही मोदी शहांची काही लोक आरती ओवाळतात! नीतिमत्ता अशी औषधालाही शिल्लक राहिलेली नाही ना भाजपच्या नेत्यात ना समर्थकात!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:11 am | अमरेंद्र बाहुबली

काही म्हणा अभिजीत बिचकुलेंच्या नमनाने सुरू झालेला हा धागा १२-१५ दिवसातच २५० चा टप्पा क्रॉस करून गेला.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:52 am | अमरेंद्र बाहुबली

आज स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर भारतीय फौजा ४८ तासाच्या आत लाहोरात असत्या, फक्त बोलबच्चन न देता प्रत्यक्ष कृती केली असती! भारताला इंदिरा गांधींसारख्या कणखर नेत्यांची गरज आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 2:34 pm | श्रीगुरुजी

काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मोदींना झोडपायची आयतीच संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 4:30 pm | मुक्त विहारि

जसा पृथ्वीराज चव्हाण हरल्या नंतर, जयचंदला झाला असेल....

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 4:38 pm | मुक्त विहारि

"मोदी को बोलो..." असे अतिरेकी बोलले होते...

आता माझा तरी मोदींवर पूर्ण विश्वास आहे... की मोदी नक्कीच बदला घेतील....

संदर्भ.... कौटिल्याचे अर्थशास्त्र....

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 3:27 pm | अमरेंद्र बाहुबली

काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मुस्लिमद्वेशाची गरळ ओकायची तसेच संबंध नसताना ठाकरे पवारद्वेष करायची संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 4:34 pm | मुक्त विहारि
मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 4:53 pm | मुक्त विहारि

पहलगाम हमले में शामिल आतंकी आदिल का घर सुरक्षाबलों ने बम से उड़ाया, आसिफ का घर बुलडोजर से गिराया- VIDEO

https://www.aajtak.in/india/news/story/pahalgam-attack-security-forces-b...

अशा बातम्या मराठी भाषेत लगेच का येत नाहीत?

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 7:04 pm | मुक्त विहारि

भारतीय सेना का हल्ला बोल, मार गिराया लश्कर का बड़ा कमांडर; पहलगाम का बदला

https://www.livehindustan.com/national/let-top-commander-killed-in-encou...

-------

मोदी नक्कीच बदला घेणार.....

घोड़ा चालक ने खुद को 'पूरन सिंह' बताया, जांच में निकला मनीर हुसैन; वैष्णो देवी रूट पर 2 लोगों को पकड़ा गया

https://www.indiatv.in/jammu-and-kashmir/jammu-kashmir-two-men-posing-as...

-----

काय बोलावं ते सुचेना....

Pahalgam Attack: घोड़े वाले से पुलिस तक के मिले होने का संदेह, शुभम के परिजनों ने सीएम को दीं कई जानकारियां

https://www.amarujala.com/photo-gallery/uttar-pradesh/kanpur/pahalgam-at...

-----

एक तर बातमी छापील आहे आणि दुसरे म्हणजे, मराठी भाषेत ही बातमी मिळाली नाही...

https://www.lokmat.com/photos/national/big-revelation-lieutenant-vinay-n...

---

मोदी नक्कीच बदला घेणार....

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 5:02 pm | मुक्त विहारि

Pahalgam Terrorist Attack : पैशांचा लोभ पर्यटकांच्या जीवावर उठला, या दोघांनी आपल्याच देशाला दिला धोका

https://www.tv9marathi.com/national/pahalgam-terror-attack-all-party-mee...

-----

वरील बातमीत, पुरेशी माहिती दिली आहे..

-----

कश्‍मीर में आना है तो कलमा सीख लो, वर्ना… पाकिस्तानी दोस्त ने एक्ट्रेस को धमकाया, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप

"कलमा सीखों या अंजाम भुगतो... पाकिस्तानी दोस्त ने दी पायल घोष को चेतावनी, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप - News18 हिंदी" https://hindi.news18.com/amp/news/entertainment/bollywood-payal-ghosh-re...

----

पहलगाम हमले का निकला 'हमास कनेक्शन', इजरायल ने खोले कई राज; POK में लश्कर-ए-तैयबा से हुई थी सीक्रेट मीटिंग

https://www.jagran.com/world/other-hamas-connection-pahalgam-attack-isra...

-------

ह्याच हमासला "सेव्ह गाझा" म्हणून ह्याच देशातील माणसे पाठिंबा देत होती....

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 8:50 pm | मुक्त विहारि

कोडमध्ये बोलणारा, धर्म विचारणारा 'तो' संशयित खेचरवाला ताब्यात

https://marathi.indiatimes.com/india-news/pahalgam-tourist-alleges-pony-...

------

मोदी नक्कीच बदला घेणार....

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 5:11 pm | श्रीगुरुजी

D

मोदींना झोडपायची संधी मिळाली म्हणून काहीजणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 5:29 pm | मुक्त विहारि

महाभारत, न वाचल्याचे परिणाम आहेत .....

मध्य प्रदेश मधली आजचीच एक बातमी आहे...

धर्म परिवर्तन का डाल रहे दबाव ...

https://www.patrika.com/bhopal-news/woman-was-pressured-to-change-her-re...

आता हिची कुणी जात बघितली आहे का? जबरदस्तीने केलेले धर्म परिवर्तन ही पण एक प्रकारची हत्याच आहे, असे माझे मत....

आग्या१९९०'s picture

25 Apr 2025 - 7:20 pm | आग्या१९९०

आवरा स्वतःला! बाहेरची घाण इथे आणून हुंगत बसू नका. इथे कोणीही इतक्या खालच्या थराला गेले नाही. मिपा व्यवस्थापक लक्ष द्या अशा पोस्टकडे.

आणि

माहिती जर छापील स्वरूपातील असेल तर, काय हरकत आहे?

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 7:47 pm | श्रीगुरुजी

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही.

आग्या१९९०'s picture

25 Apr 2025 - 7:53 pm | आग्या१९९०

तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय.
मिपावर कोणी अशी टिप्पणी केली नसताना बाहेरची घाण इथे कशासाठी?

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 7:58 pm | श्रीगुरुजी

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही. मिपावर ही घाण कशासाठी असे त्यांनी विचारले नव्हते.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 8:27 pm | मुक्त विहारि

योग्य निरीक्षण...

कंपू-बाजी आहे....

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 6:58 pm | मुक्त विहारि

भारत के एक्शन से पाकिस्तानी सेना में खौफ, प्राइवेट एयरक्राफ्ट से विदेश भागा आर्मी चीफ असीम मुनीर का परिवार

https://www.abplive.com/news/world/pahalgam-terror-attack-pakistan-army-...

-----

उगाच नाही, त्या मुस्लिम धर्मीय आतंकवाद्यांनी, मोदींचे नाव घेऊन हिंदू धर्माच्या लोकांवर गोळ्या झाडल्या.....

मोदी नक्कीच बदला घेणार....

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 9:34 pm | अमरेंद्र बाहुबली

अमित शहा नी अजित डोभाल असे लोक पदांवर आहेत तो पर्यंत काश्मीर पर्यटकांसाठी सुरक्षित नाही. हे दोघे जो पर्यंत राजीनामा देत नाही किंवा पदांवरून जात नाही तो पर्यंत काश्मीर वगैरे ठिकाणी जाऊ नये, लोकांनी फिरायला जायच्या आधी देश कशा लोकांच्या हातात आहे ते पाहावे मग आपला जीव तळहातावर घेऊन जायचे असल्यास काश्मिरात जावे.

रात्रीचे चांदणे's picture

25 Apr 2025 - 10:05 pm | रात्रीचे चांदणे

महाराष्टात तर मोदी, शहा आणि दोवालांच्या जोडीला फडणवीस आहेत. म्हणजे अजूनच अवघड. बंगलात जावा, ममता आहे तिकडे. मुझफदारबाद मध्ये सुरक्षित वाटेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 10:18 pm | अमरेंद्र बाहुबली

नागपूर?

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 10:33 pm | मुक्त विहारि

योग्य प्रतिसाद...

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 10:19 pm | श्रीगुरुजी

D

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 10:37 pm | मुक्त विहारि

जाता जाता....

१९९२ मधल्या मुंबई बॉम्ब स्फोट वेळी हेच मुख्यमंत्री होते ....

अतिशय खोटारडा माणुस आहे हा. कित्येक वेळा खोटेपणा उघडकीला येऊनही सवय काही जात नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:26 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदींचे गुरु आहेत ते!

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2025 - 11:30 pm | श्रीगुरुजी

मी आणि माझे कुटुंब.

स्वतः, सुसु व सुनेत्रा पवार खासदार, रोहित पवार व अजित पवार, आमदार, पार्थ पवार व युगेंद्र पवार निवडणुकीत उमेदवार होते पण पडले.

खासदार मीच, मुंबई मराठी ग्रंथालयाचा अध्यक्ष मीच, रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, मराठा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मीच, कबड्डी संघटनेचा अध्यक्ष मीच, मैदानी खेळ संघटनेचा अध्यक्ष मीच, सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातला नसता तर आज मीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असतो, साहित्य संमेलनाचा उद्घाटक दरवर्षी मीच, शिल्लक राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच, २०२६ मध्ये मी पुन्हा राज्यसभेत खासदार होणार . . .

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:35 pm | अमरेंद्र बाहुबली

आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा मुलगा व मंत्री शोभा फडणवीस ह्यांचा पुतण्या मुख्यमंत्री आहे, जय शहा, राजनाथसिंहचा मुलगा, रावसाहेब दानवें कुटुंब, राणे कुटंबीय असे अनेक भाजपेयी कुटुंबाच्या कुटुंब पदे उभोगताहेत पण डोळ्यात कोण खुपतात? पवार :)

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 11:38 pm | मुक्त विहारि

सगळी पदे घ्या...

पण, धर्म बघून गोळया घातल्या, हे सत्य पण लोकांना सांगा...

घरच्या स्त्रियांना सोडले, पण ते विधवा करून... हे पण सत्य सांगा...

अतिशय हुषार माणूस आहे, पण अर्ध-सत्य तरी बोलू नका... आता माहितीचा स्रोत चहू बाजूंनी येतो. खोटे लगेच पकडल्या जाते...

सुक्या's picture

26 Apr 2025 - 12:14 am | सुक्या

अगदी अगदी . .
जिथे मलीदा तिथे हे. वरुन सांगताय काय हे तर "फक्त पुरुषांना हात लावला" गोळ्या घालुन मारणे हे हात लावण्याईतके साधे आहे? आजकाल तर ह्यांची कीव पण येत नाही.
सोयिस्कर बाता करुन वेळ मारुन नेणे हे पुर्वी शक्य होते. तेव्हा बातमीदार / वर्तमानपत्रे हाती होती. आता ते शक्य नाही. परंतु हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.

वामन देशमुख's picture

26 Apr 2025 - 5:18 am | वामन देशमुख

...हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.

न झालेला १३वा बॉम्बस्फोट करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?

नाही... माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आणि धोरणी व्यक्तिमत्व आहे.

भारतीय आणि त्यातूनही विशेषतः हिंदू जनतेची मानसिकता, नेता निवडी कडे असते. त्यामुळे , ही जनता एक तर व्यक्तीद्वेष तरी करते किँवा व्यक्तीपूजा आणि एकदा का चार लोकांनी तुम्हाला नेता म्हणून स्वीकारले की इतर जनतेला पण असेच वाटायला लागते आणि मग कुणी इतिहास शोधत बसत नाही.

तुम्ही जर, "तो मी नव्हेच." हे सत्य घटनेवर आधारित नाटक बघितले असेल तर तुम्हाला पण ते पटेल.... चार आण्याची कोथिंबीर आणायला लोकं घासाघीस करतील पण एखाद्या बोलबच्चन व्यक्तीच्या मागे, मेंदू गहाण ठेवून जातील.

मोदीद्वेषाला, पर्यायी म्हणून, जे अनेक लोकं प्रयत्न करत आहेत, त्यांच्यात हे अजून एक...

वसंत पाटील, यांच्या प्रकरणापासून शरद पवार हीच खेळी खेळत आहेत.

जेंव्हा जेंव्हा, व्यक्ती द्वेष वाढतो, तेंव्हा तेंव्हा, त्या पोकळीत माननीय शरद पवार हे नाव आघाडीवर असते.

बाबा साहेब भोसले हे अजून एक उदाहरण...

थोडक्यात, १९७७ ते २०२५ पर्यंत, माननीय शरद पवार, हीच खेळी खेळत आहेत पण त्यांचे शिलेदार हा इतिहास लक्षांत घेत नाहीत...