गाभा:
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-...
दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.
प्रतिक्रिया
12 Apr 2021 - 9:56 am | मुक्त विहारि
ह्या आंदोलनात सहभागी न्हवते
12 Apr 2021 - 10:03 am | मुक्त विहारि
महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ...
https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-patients-get-oxygen-in-c...
काय बोलावं ते सुचेना...
12 Apr 2021 - 12:00 pm | Bhakti
एका वृद्धाचा १२-१६ तास बेड न मिळाल्याने फुटपाथवर मृत्यू..
12 Apr 2021 - 10:09 am | मुक्त विहारि
महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ...
https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-patients-get-oxygen-in-c...
काय बोलावं ते सुचेना...
12 Apr 2021 - 10:11 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/thousands-of-devotees-gather-i...
आपण कधी सुधारणार?
12 Apr 2021 - 12:08 pm | Bhakti
महाराष्ट्राकडून इतर राज्यांनी धडा घ्यावा..दूर्लक्ष केल्यास संपूर्ण भारताचा महाराष्ट्र होऊ शकतो.
सगळ्या जगाला वाटलं होतं की, भारतासारख्या भरमसाठ लोकसंख्या ,गरीबी , निरक्षरता ,भ्रष्टाचार असलेल्या देशाचं काय होईल? आणि ते खरं ठरतेय...
कोण गाफिल राहिलं खरच कोडे आहे.
12 Apr 2021 - 12:22 pm | मुक्त विहारि
आपली जनता स्वैराचारच करणार, हे माहिती असायला हवे होते ...
गोव्यात जर करोना रोखल्या गेला असेल तर, इतर राज्यांत का नाही रोखल्या गेला?
अजून एक निरीक्षण नोंदवतो, कोकणांत प्रादुर्भाव का झाला नाही? विदर्भातच कसा काय झाला?
आपापल्या राज्यांत करोना वाढता कामा नये, ही जबाबदारी त्या त्या राज्य सरकारचीच असायला हवी ...
12 Apr 2021 - 10:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर
काहीतरी चुकतय हे मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी नाही. ह्याउलट "लसीत राजकारण नको" असे म्हणणारे सेना नेते राजकारण करू पाहत आहेत हे दुर्दैवी.
12 Apr 2021 - 10:50 am | मुक्त विहारि
1. दिपाली चव्हाणच्या बाबतीत, अक्षम्य दिरंगाई झाली, एक जीव हकनाक बळी पडला..
2. वाझे यांच्या बाबतीत पण हाच अनुभव आपल्या सगळ्यांना आला..
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, ही नीति किती काळ चालू ठेवणार?
लाॅकडाऊन करण्याची वेळ, गोव्यावर आलेली नाही, पण महाराष्ट्रावर का आली?
चुकी जनतेची 5% आणि राज्य सरकारची 95% आहे...
गर्दीची ठिकाणे, सर्वसामान्य माणसांसाठी ओपन केली तर, तिसर्या लाटे मुळे, अजून वाईट परिस्थिति निर्माण होणार...
12 Apr 2021 - 11:04 am | श्रीगुरुजी
महाराष्ट्रात राज्य सरकारचे अस्तित्व कोठे जाणवित नाही. सर्व सत्ताधारी ओरबाडून खाण्यात गर्क आहेत. मुख्यमंत्री एक वर्षाहून अधिक काळ घरात लपून बसले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे व दुसरे वर्षही वाया जाणार असे स्पष्ट दिसत आहे.
वडीलांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याची फार भयंकर किंमत महाराष्ट्रातील जनता चुकवित आहे.
12 Apr 2021 - 11:06 am | विजुभाऊ
वडिलांना वचन दिले होते हे तरी किती खरे आहे कोण जाणे. ( एकटे राऊतच जाणतात)
12 Apr 2021 - 11:05 am | रात्रीचे चांदणे
लसीच्या तुटवड्याच खापर केंद्रा वर फोडलं, पण ऑक्सिजन आणि rendemivir इंजेकशन चा तुटवडा च खापर पण केंद्रा वर आणि गुजरात वर फोडण्यात येत आहे.
रुग्ण संख्या वाढली म्हणून ह्या गोष्टींचा तुटवडा असू शकतो पण प्रत्येक गोष्टीला केंद्राला जबाबदार धरण्यात येत आहे.
12 Apr 2021 - 11:02 am | विजुभाऊ
सेना अजूनही महाराष्ट्र हा फक्त वांद्रे , ठाणे , सेनाभवन या पुरताच आहे असे समजते.
त्यांना प्रशासकीय जाणीव आहे असे कधीच जाणवत नाही.
ज्यांना हे जाणीच होती त्यांना सेनेने दूर लोटले. त्याची फळे म्हणजे राउतांसारखे बाष्कळ भांडके बाहुले सेनेत वरचढ झाले .
कोणावर टीका करताना अर्वाच्य भाषेत बोलणे हा स्थायीभाव झालाय. आपल्या पायाखाली काय जळतय तेच माहीत नसते त्यांना
12 Apr 2021 - 11:58 am | अमरेंद्र बाहुबली
सर्व जबाबदारी राज्य सरकारची. केंद्र फक्त टॅक्स ओरबाडण्यासाठी आहे. तसेच महापालिकेत भाजपची सत्ता असेल तर कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी पालिकेची नसते. असेच वरील सर्व प्रतिसादातून जाणवतेय. केंद्राने लसी रोखल्या किंवा जीएसटी रोखला तरी राज्यच जबाबदार. १०५ घरी बसवल्याची खदखद कोरोना आडून प्रतिसादरूपाने पुर्ण करण्याची चढाओढ लागल्याचे दिसतंय. प्रधानसेवकाला देश संकटात असताना निवडणूका महत्वाच्या आहेत. जनता मरो. पण आपण फक्त राज्य सरकारच्या नावाने बोंबलूया. काहीही झाले तरी राज्य सरकार अतिशय ऊत्तम काम करत आह. भाजपची लक्तरे दोनजिल्ह्यातील पुरपरीस्थीती वेळी वेशीवर टांगली गेली. त्यामुळे पवारांच्या कृपेने आणी राज्यातील जनतेच्या नशिबाने पुन्हा भाजपे सत्तेत आले नाहीत. नाहीतर आता राज्यातील नेते बंगाल निवडणूकीत प्रचार करत असते. (कोल्हापूर वेळी मते मागत फिरत होते तसे) भाजपच्या दृष्टीने जनतेपेक्शा नेहमी निवडणूका महत्वाच्या राहील्यात. त्यामुळे १०५ घरी बसणे हे महाराष्ट्रावर राऊत/पवारांचे झालेले ऊपकारच. मागच्या धाग्यात राजेश ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे काहींना चर्चे पेक्शा भाजपचा प्रचार करण्यातच जास्त रस आहे.
12 Apr 2021 - 12:03 pm | मुक्त विहारि
उदाहरणे दिलीत तर उत्तम...
12 Apr 2021 - 12:05 pm | मुक्त विहारि
दिपाली चव्हाणच्या बाबतीत झालेली अक्षम्य दिरंगाई, खूप उदाहरणे आहेत, नाही का?
12 Apr 2021 - 12:22 pm | अमरेंद्र बाहुबली
डोळे ऊघडे ठेवले तर सर्व दिसतं. पण फक्त राज्याच्या नावाने छाती बडवायची असेल तर काहीच दिसनार नाही.
12 Apr 2021 - 1:08 pm | मुक्त विहारि
उदाहरणे तर द्या...
12 Apr 2021 - 1:58 pm | बिटाकाका
असं होय. पंढरपूर ला जाऊन या एकदा मग कळेल निवडणुकांची चिंता कुणाला आहे ते. आता लागुदया निवडणुका पालिकांच्या मग बघू कुणाला देशाच्या संकटाचं काय पडलंय ते.
12 Apr 2021 - 12:03 pm | मुक्त विहारि
उदाहरणे दिलीत तर उत्तम...
12 Apr 2021 - 12:26 pm | Rajesh188
महाराष्ट्र मधून एक रुपया पण tax केंद्र सरकार नी घेवू नये.
महाराष्ट्र la इतर देशांशी करार करण्याची पूर्ण मोकळीक असावी.
कोणतेच केंद्रीय हस्तक्षेप महाराष्ट्रात बिलकुल नको. पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही.
हे सर्व पाहिले मान्य करा .
केंद्राची काडी ची पण ह्या राज्याला लागणार नाही.
केंद्रीय सरकार च्या असंख्य चुका मुळे देशाची अवस्था गंभीर झाली आहे.
राज्य सरकार उत्तम काम करत आहे.
पण bjp राज्याला अडचणीत आणण्याचे उद्योग केंद्र करत आहे
12 Apr 2021 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
जनता हे पाहत आहे. पुढील निवडणूकीत जनता धडा शिकवेलच.
दुटप्पीपणासाठी निधी केंद्राला जाब राज्याला. अशी नवी म्हण पडलीय.१०५ निवडूण दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होत असेल.
12 Apr 2021 - 12:42 pm | रात्रीचे चांदणे
१०५ निवडूण दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होत असेल. <<<
105 निवडून दिल्या बद्दल नक्कीच पश्चाताप होत आहे, 144 दिले असते तर बरं झालं असतं.
12 Apr 2021 - 1:14 pm | मुक्त विहारि
+1
12 Apr 2021 - 1:10 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
12 Apr 2021 - 2:14 pm | चौकस२१२
केंद्रात काँग्रेस चा सरकार असता तर हेच बोलला अस्तरात का?
महाराष्ट्र la इतर देशांशी करार करण्याची पूर्ण मोकळीक असावी.
कोणतेच केंद्रीय हस्तक्षेप महाराष्ट्रात बिलकुल नको. पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही.
या दोन विधानावरून तुम्हाला देश हि कल्पना नकोशी वाटायला लागली असे दिसतेय...हा देशद्रोहच आहे // मग हिंमत असले तर जाहीर रित्या हीच विधाने करा ...
12 Apr 2021 - 2:38 pm | Rajesh188
केंद्रीय सत्तेचा वापर करून राज्याची अडवणूक करायची आणि राज्य संकटात आले की बघा राज्य सरकार कसे कुचकामी आहे अशी टीका करायची ही वृत्ती दिसून आल्या मुळेच तसे मत मी व्यक्त केले आहे.
इथे देशद्रोह चा काय संबंध
12 Apr 2021 - 8:57 pm | अमर विश्वास
जबरदस्त हसलो .. असेच लिहीत जा
13 Apr 2021 - 6:19 am | दिगोचि
पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही.>>> तो त्यांचा धंदा आहे. त्यावर सरकार आता बंदी आणणार का? हे सरकार मंन्त्रांचे बंगले दुरुस्त करायला जवळजवळ 4000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ती रक्कम लस खरेदी करायला वापरावी. प्रत्येक वेळी जबाबदारी केंद्रावर ढकलू नये.
12 Apr 2021 - 12:46 pm | Vichar Manus
योगीं च्या उत्तर प्रदेश मध्ये कोविद लस देण्याऐवजी 2 महिलांना रेबीज ची लस दिली, यात योगीं चा दोष नाही तसेच महाराष्टातील प्रत्येक प्रॉब्लेम ला उद्धवच जवाबदार नाहीयेत
12 Apr 2021 - 1:54 pm | बिटाकाका
बरोबर, लसीऐवजी सॅनिटायझर पाजलं त्याला तरी कुणी कुठे जबाबदार होतं.
https://www.livemint.com/news/india/12-children-in-maharashtra-given-san...
12 Apr 2021 - 12:53 pm | Rajesh188
निवडणूकीत BJP ला हरवत होती ती उगाच नाही.हा पक्ष लोकांचे भले करू शकणार नाही ह्याची पूर्ण खात्री लोकांना होती.
आता मंदिराच्या भावनिक प्रश्नात अडकून लोकांनी ह्यांना मतदान केले .
पण परत अशी चूक लोक करणार नाहीत.
चांगलाच फटका लोकांना बसला आहे.
12 Apr 2021 - 1:11 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
12 Apr 2021 - 1:00 pm | Rajesh188
तर फडणवीस फक्त फक्त बोलायला पोपट कार्य ०.कसलेच सामाजिक भान नाही,विकासाची दृष्टी नाही,फक्त बोल bachhan.
दुसरे चंपा त्यांच्या स्वतःच्या मतदार संघात तरी त्यांनी विकासाची काम केली आहेत का .
त्या मानाने आताच्या तिनी पक्षात उत्तम प्रशासनिक अनुभव असलेली लोक आहेत.
सामाजिक भान असलेली लोक आहेत.
लोकांच्या अडचणी काय आहेत ह्या समजण्याची कुवत असणारी लोक आहेत..
BJP मध्ये एक पण चांगला नेता नाही.
सर्व उधारी वर घेतलेले पळपुटे च जास्त आहेत.
12 Apr 2021 - 1:11 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
12 Apr 2021 - 1:27 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
12 Apr 2021 - 1:30 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप मधील चांगले नेते संपवले गेले अथवा निवडणूकीत त्यांचे तिकीट कापले गेले. आता ऊरलेत बाहेरून आलेले ज्यांना जनाधार नाही. पुढील निवडणूकीत मोठाप्रमाणात घरवापसी होऊन अनेक नेते सेना, राकाॅ, काॅग्रेस मध्ये जातील. भाजपच पानिपत अटळ आहे.
12 Apr 2021 - 5:12 pm | मुक्त विहारि
ह्या राजवटीने केलेली चांगली कामे काही सांगीतलीच नाहीत ...
13 Apr 2021 - 11:42 am | प्रसाद_१९८२
ह्या राजवटीने केलेली चांगली कामे काही सांगीतलीच नाहीत ...
--
ते सांगतील तेंव्हा सांगतील, मी काही कामे सांगतो.
-
या सरकारचे सर्वात पहिले चांगले काम म्हणजे,
१. भाजपा सरकारने सुरु केलेली कामे व योजनांना, टक्केवारी मिळवण्यासाठी स्थगिती देणे.
२. मेट्रोला स्थगिती
३. जलशिवार योजनेला स्थगिती.
४. मंत्र्यासाठी नविन गाड्या विकत घेणे
५. राज्यपालांवर टिका करुन वर त्यांच्याच कोट्यातील आमदारकी घेणे.
६. स्वत:ची लायकी काय आहे हे न ओळखत, चीन व पाकिस्तान मुद्द्यावर केंद्राला सल्ले देणे.
७. कारण नसताना, कंगना रानौतचा बंगला पाडणे.
८. खंडणी उखळण्यासाठी पोलीसांमार्फत अनिल अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे.
९. संपूर्ण करोना काळात एकादा ही राज्यातील जनतेत न जाता फेसबुक लाईव्ह मधून लोकांना वायफळ सल्ले देणे.
१० संपूर्ण करोना काळात जनता उपाशी मरत असताना केंद्रासरकारने सर्वसामन्य जनतेसाठी दिलेला तांदुळ परस्पर विकून टाकणे.
११. हॉटेल व बार मालकांकडून महिना शंभर कोटीची वसुली करणे.
इत्यादी लोकउपयोगी कामे या सरकारने सत्तेत आल्यावर केली आहेत, याशिवाय आणखी भरिव कामगिरी महावसुली अघाडीची असेल तर इतरांनी सांगावे.
13 Apr 2021 - 12:05 pm | मुक्त विहारि
दिपाली चव्हाणच्या बाबतीत झालेली अक्षम्य दिरंगाई, हे पण आहेच
जाताजाता,
सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, एका हिंदू माणसाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली, हे पण आहेच ....
अर्थात आपण कितीही लिंक्स दिल्या तरी, 20% जनता त्या स्वीकारणार नाहीच...
13 Apr 2021 - 12:11 pm | बापूसाहेब
अजून काही..
12. स्वतः च्या हट्टापायी कोरिया मधुन पेंग्विन आणून त्यावर कोट्यवधी रुपये उधळणे. एका पेंग्विन चा नाहक मृत्य. यामुळे जनतेला काय फायदा झाला ते शेणे तील लोकांनी सांगावे.
13. जनतेच्या माथ्यावर वाढीव वीजबिल मारणे आणि न भरल्यास दंड आणी वीज कट करण्याची धमकी.
14. मंत्री व आमदार यांच्यासाठी घरांचे रेनोवेशन करणे.
15. कोणीही टीका केल्यास त्यावर महाराष्ट्र द्रोही असा शिक्का मारणे.
16. अजान स्पर्धा भरवणे.
17. लोकडाऊन दरम्यान कोणत्याही बाबतीत सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना दिलासा न देणे.
18. पोलिस आणि इतर लोकांकडून जबरदस्ती हप्ता वसुली करणे.
19. प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकार जबाबदार धरणे. कोरोना केसेस कमी झाल्यानंतर उभी केलेली सर्व आरोग्य व्यवस्था गुंडाळून हप्ता वसुली सुरू करने.. जणू काही कोरोना संपला याच आविर्भावात सर्व गोष्टींना परवानगी देऊन तिथून वरकमाई मिळवण्यासाठी धडपड करने.
20. मास्क च्या कारणावरून सामान्य जनतेकडून कोट्यवधी रुपये वसुल करणे. अगदी चार चाकी गाडीत एकटा माणूस असला तरी त्यांच्याकडून हप्ता वसुल करणे. पण मंत्री, आमदार सर्व विनामास्क फिरतात सभा घेतात त्याच ठिकाणी कितीतरी पोलिस उभे असून पण षंढ उभे असतात.
13 Apr 2021 - 12:25 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
13 Apr 2021 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्व थापा आहेत. पुरावे घेऊन कोर्टात न जाता फक्त आरोप करणे हेच भाजप समर्थकाना जमते.
13 Apr 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि
ते वाझे यांनी जे पत्र लिहिले, ती पण थापच आहे का?
परमबीरसिंग यांनी पण असेच आरोप केले आहेत नाही का?
----------
13 Apr 2021 - 6:01 pm | प्रसाद_१९८२
आम्ही लिहिल्यात त्या थापा.
मात्र तुम्ही, गेल्या वर्षे दिडवर्षात केलेली चार बरी काम लिहा, या 'महा वसुली आघाडीची'
13 Apr 2021 - 6:15 pm | श्रीगुरुजी
वारंवार विचारून सुद्धा महा वसुली आघाडी सरकार समर्थकांना या सरकारने १६-१७ महिन्यात केलेले एकही काम (चांगले काम तर लांबच राहिलं) सांगता येत नाही. मुळात मुख्यमंत्रीच १३ महिने घराबाहेर पडले नाही. घराबाहेर पडले नाही तर काम कोठून करणार? हे सरकार उत्तम काम करीत आहे एवढेच पालुपद सुरू आहे. महाराष्ट्राचे १७ महिने पूर्ण वाया गेले आहेत. अर्थात ही घाण सत्तेवर यायला भाजपच कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही.
13 Apr 2021 - 7:44 pm | अमरेंद्र बाहुबली
मुख्यमंत्री समजदार आहेत. गर्दी जमवून कोरोना नियमांचा भंग करू नये हे त्यांना एक जबाबदार वागरीक म्हणून कळते. विरोधकांना कळत नाही म्हणून ते सत्ते त येण्याच्या लायकीचे नाहीत.
14 Apr 2021 - 1:12 am | Rajesh188
त्याच सेनेच्या गळ्यात गळा घालून bjp नी केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगली आहे तेव्हा सेना म्हणजे चांगला पक्ष होता .
आता ह्यांना हाकलून दिले त्याला एक वर्ष झाले तेव्हा पासून सेना ह्यांना फालतू पक्ष वाटायला लागली
सत्ता मिळवण्यासाठी मुफ्ती बरोबर पण ह्यांनी युती केली होती..
त्या bjp नी नीतिमत्ता विषयी एक शब्द पण बोलू नये
राष्ट्रवादी chya एका इशाऱ्यावर सर्व वैचारिक मतभेद विसरून फडणवीस सकाळी पाच ला बाशिंग बांधून गेले होते
आणि आता हे शहाणपण शिकवत आहेत.
14 Apr 2021 - 1:38 am | अमरेंद्र बाहुबली
+१
सत्तेसाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवनारा पक्श म्हणजे भाजप. जनतेला भूलथापा देऊन जनतेचीच फसवणूक करण्यापर्यंत ह्या पक्शाची मजल जाते. सेनेने सत्ता ताब्यात घेतली ते ऊत्तमच.
14 Apr 2021 - 9:35 am | सॅगी
ज्या काँग्रेसला शिव्या घालण्यात बाळासाहेबांनी उभी हयात घालवली त्यांचेच सुपुत्र त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळे घालून सत्तेची चोरी करतात आणि त्यांचे गुलाम इतरांना नीतिमत्ता शिकवतात तेव्हा मौज वाटते. :)
14 Apr 2021 - 9:59 am | श्रीगुरुजी
हे भाजपलाही लागू आहे. हे अजित पवारांना चक्की पिसायला तुरूंंगात पाठविणार होते. पण सत्तेसाठी क्लीन चिट देऊन युती केली. शिवसेना नेते यांना दिवसाचे २४ तास अर्वाच्य शिवीगाळ करून प्रत्येक निर्णयावर टीका करायचे व प्रत्येक निर्णयात अडवणूक करायचे. पण हे मातोश्रीवर जाऊन लाळघोटेपणा करायचे आणि उद्धव ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य करून व नंतर युतीसाठी गळ्यात पडून पक्षाचे नुकसान करून ठेवले.
14 Apr 2021 - 10:18 am | सॅगी
ही आततायीपणे केलेली चूकच होती. आणि शिवसेनेला अवास्तव महत्त्व देणे ही देखील चूकच होती.
केंद्रात बिन महत्त्वाचे मंत्रिपद देऊन मोदींनी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली होती, पण तसेच काहीसे करण्यात महाराष्ट्र भाजपा कमी पडली. यापुढे असे होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी.
14 Apr 2021 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली
आता त्याची गरज पडणार नाही. सेनेने विरोधी पक्शात बसवून भाजपला जागा दाखवून दिलीय. :)
14 Apr 2021 - 3:09 pm | सॅगी
परफेक्ट कार्यक्रम होईल तेव्हा सेनेला दिसेलच त्यांची जागा. :)
.
.
.
आणि नाहीतर मतदार आहेतच सेनेचा "परफेक्ट कार्यक्रम" करायला.. :D
14 Apr 2021 - 6:09 pm | अमरेंद्र बाहुबली
वाट बघा. :) सध्या तरी जनता भाजपचाच परफेक्ट कार्यक्रम करतेय प्रत्येक निवडणूकीत.
14 Apr 2021 - 6:12 pm | सॅगी
हाहाहा...बघा बघा...स्वप्ने बघा... :)
14 Apr 2021 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही बघा. परफेक्ट कार्यक्रम व्हायचे :) चाणक्याचीलचाकक्यनिती पवारांनी दिड दिवसात भघडी पाडल्यावर पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेला गेले नाहीत ते : )
14 Apr 2021 - 6:23 pm | सॅगी
त्याच सो कॉल्ड "चाणक्यांना" अजुन स्वतःच्या राज्यात कधी एक हाती सत्ता मिळवता आली नाही...आणि म्हणे डोहाळे लागलेत पंतप्रधान पदाचे.. :)
बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी...
14 Apr 2021 - 6:37 pm | अमरेंद्र बाहुबली
सलाम ठोकला. की ठोकवून घेतला हे त्यांनाच माहीत. आजवरचा अनूभव पाहता मातोश्रीवर जाऊन सलाम ठोकणे ते पवारांना पहाटे सलाम ठोकणे, हे पाहून कुणी कुणाला ठोकला असेल हे लक्शात येईल.
14 Apr 2021 - 6:43 pm | सॅगी
तरी ठोकायला तरी कशाला गेले हेही त्यांनाच माहीत...
बहुतेक अहमदाबादच्या चाणक्यांकडुन पदरात काही पडते का हे पहायला गेले असावेत... :)
14 Apr 2021 - 6:57 pm | अमरेंद्र बाहुबली
ख्या ख्या ख्या. फार विनोदी तुम्ही.
14 Apr 2021 - 9:38 pm | सॅगी
ख्या ख्या ख्या...उत्तरे संपलेली दिसतात बहुदा... :)
14 Apr 2021 - 7:01 pm | श्रीगुरुजी
बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी...
त्याआधी १९ ऑक्टोबर २०१४ ला स्वत:हून मोदी-शहांना सलाम ठोकला होता. नंतर २९ ऑक्टोबर २०१९ ला दिल्लीत जाऊन पुन्हा मोदी-शहांना सलाम ठोकला होता. पण दोन्ही वेळा हकालपट्टी झाली. १९९९ मध्ये आव आणून सोनिया गांधींच्या विरोधात गेले होते. पण ५ महिन्यातच सोनिया गांधींंना सलाम ठोकून घालीन लोटांगण वंदीन चरण करावे लागले होते.
14 Apr 2021 - 7:05 pm | सॅगी
"घालीन लोटांगण वंदीन चरण"
तेव्हापासुन आजतागायत सुरुच आहे...
14 Apr 2021 - 7:05 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याना एका नेत्याने गुरू मानले होते म्हणे. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात चालू लागलो. :)
14 Apr 2021 - 7:11 pm | सॅगी
"घालीन लोटांगण..." ची वेळ स्वतःवर कशी ओढवून घेऊ नये हे ते नेते नक्कीच शिकले असतील :)
14 Apr 2021 - 7:38 pm | श्रीगुरुजी
तो उपहास होता. पण काही जणांना उपहासही समजत नाही.
14 Apr 2021 - 7:44 pm | अमरेंद्र बाहुबली
खीक्क. स्वमनाची समजूत घालत का?
14 Apr 2021 - 2:38 pm | शाम भागवत
क्लीन चीट दिली म्हणजे नक्की काय केलं?
🤣
प्रकरण तर हायकोर्टात आहे.
हायकोर्टानी अजित पवारांना निर्दोष मुक्त केलं का?
अजून ६०० पैकी ३०० प्रकरणांच्या चौकशीला सुध्दा सुरवात झालेली नाही.
त्याचा तपास तर हायकोर्टाने सांगितल्यावरच सुरू होणार आहे.
सगळंच हायकोर्टाच्या हातात आहे.
असो.
.
.
.
.
फडणवीस नको म्हणून काहीही हं गुरूजी.
कृहघ्या.
आपण सर्व जण जे काही लिहित आहोत ते वाचून नक्कीच मोदी भाजपचे मुम ठरवणार नाही आहेत.
🤣
14 Apr 2021 - 3:03 pm | श्रीगुरुजी
फडणवीस हवे म्हणून काहीही हं शामराव.
उच्च न्यायालय स्वतः तपास करीत नाही. तपाससंस्था जे पुरावे पुढे आणते त्यावर न्यायालय निर्णय देते.
अजित पवारांवरील आरोपात तथ्य नाही व त्यामुळे प्रकरण बंद करावे, असा अहवाल तपाससंस्थेनेच (परमवीर सिंह हेच तपास अधिकारी होते) उच्च न्यायालयाला दिला. तपासयंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर नाचते हे उघड गुपित आहे. तपासयंत्रणा गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहमंत्री फडणवीस आणि हा अहवाल दिला तो २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवारांबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केल्याच्या दुसऱ्या दिवशी! काय जबरदस्त योगायोग आणि टायमिंग आहे!
ते सरकार टिकले असते तर पुढील काळात उर्वरीत प्रकरणातही क्लीन चिट दिली असती. कारण एकच, ते म्हणजे महाराष्ट्राचे हित!
भाजपला बहुमत मिळाले किंवा बहुमताच्या जवळ पोहोचले तर भाजपचा मुख्यमंत्री होईल व तो कोण हे मोदी ठरवतील. पण भाजपला किती जागा जिंकून द्यायच्या ते जनता ठरविणार. ते मोदी ठरवू शकत नाहीत. अन्यथा ऑक्टोबर २०१९ मध्येच फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असते. पण हाय रे दैवा! नतद्रष्ट जनतेने कमी जागा देऊन महाराष्ट्राचे अहित केले.
14 Apr 2021 - 3:19 pm | शाम भागवत
मी सचिवांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सही केली असं मंत्री म्हणू शकतो. असंच अजित पवार म्हणाले. त्यांचे हे म्हणणे कोर्टाला सादर करण्यात आले. अर्थात चौकशीच्या संदर्भातील अहवाल कोर्टाला सादर करण्याचे काम पोलीसांचे असते. ते काम पोलिसांनी केले.
ताबडतोब राष्ट्रवादी वगैरेंनी फडणवीसांनी क्लीन चीट दिली अशी आवई उठवली.
तपास बंद करावा वगैरे तुम्ही कुठे वाचले.
असो.
योग्य वेळी सर्व बाहेर येईलच म्हणा. तोपर्यंत थांबतो.
14 Apr 2021 - 3:27 pm | श्रीगुरुजी
आणि हे सर्व फडणवीसांनी पवारांच्या बरोबर सरकार स्थापन केल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी झाले. जबरदस्त योगायोग आणि टायमिंग! म्हणे हे पोलिसांनी केले. पोलिस गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहखाते फडणवीसांकडे आणि पोलिस हे करायला बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ च्या मुहुर्ताची वाट पहात थांबले होते!
बाकी तपास बंद करावा हा अहवाल कोणी दिला याचा स्वत:च स्वतंत्र शोध घ्यावा.
14 Apr 2021 - 4:08 pm | बिटाकाका
याच विषयावर मागच्या एक धाग्यात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. क्लीन चिट दिली आहे हे त्यांना मानायचे'च' आहे भले मग पुरावा कुठलाही नसो. कोणत्या ९ केसेस बंद झाल्या, त्या का बंद झाल्या, एसीबी काय म्हणाली त्यावर हे सगळं यथास्थित चर्वण झालं आहे. गोल पोस्ट चेंज करण्यापलिकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही, आपल्या दाव्याचे पुरावे तर अजिबात मिळणार नाहीत. तुम्ही थांबलात तसे मीही थांबलो मागच्या वेळी.
14 Apr 2021 - 5:04 pm | शाम भागवत
बिटाकाका,
मी गुरूजींच्या पोस्टचा उपयोग फक्त दुसरी बाजू पुढे आणण्यासाठी केला. बाकी काही नाही. त्यांनी त्यांची बाजू अगोदर मांडलेलीच आहे. मुख्य म्हणजे लोकं जे काय समजायचे ते बरोबर समजून घेतात. मिपावरील लोकं तर जबरदस्त हुषार आहेत.
😁
14 Apr 2021 - 6:06 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
13 Apr 2021 - 5:32 pm | Rajesh188
मोदी पासून अमित शाह पर्यंत सर्वांनी लाखो ची गर्दी जमा केली आणि सभा घेतल्या.
महाराष्ट्रात तर असे घडले नाही.
गाडी मध्ये 1 व्यक्ती असेल तरी मास्क वापरला पाहिजे अशी who ची guideline आहे.
सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नाहीत त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात काहीच गैर नाही .
लाईट बिल सर्रास सर्वांचे जास्त आलेले नाही काही ठराविक लोकांचेच जास्त आहे ते बदलून मिळेल
आणि असे प्रकार देशातील सर्व राज्यातील वीज महामंडळ करतात.
CORONA काळात कर्ज वसूल न करण्याची घोषणा केंद्र सरकार नी केली होती पण सर्रास कर्ज वसूल केली गेली.
Corona काळातील व्याज माफ करण्याचे वाचन दिले होते पण ते पाळले नाही.
महाराष्ट्र सरकार corona काळात कोणाचीच वीज बिल भरले नाही म्हणून खंडित केली नाही
मध्ये corona कमी झाला होता तेव्हा जे नेहमीचेच बुडवे आहेत त्यांच्या कडून वसुली चालू केली होती.
आणि त्या मध्ये काही गैर नाही.
मला देशातील एक राज्य दाखवा जिथे पोलिस लाच घेत नाहीत ,हफ्ते घेत नाहीत .
नंतर राज्याला बदनाम करा.
फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा सुद्धा वसुली चालू च होती.ती निरंतर चालू आहे.
13 Apr 2021 - 7:43 pm | अमरेंद्र बाहुबली
+१.
भाजप समर्थकानी आधी चतूर प्रदेश मधील गुन्हेगारी वसूली ह्यावर बोलावे.
13 Apr 2021 - 7:49 pm | सॅगी
म्हणजे तिकडे हे चालतं म्हणून इथेही त्याचे समर्थन करणार का?
चांगले आहे.. :)
13 Apr 2021 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली
आरो लागलेत. ते कोर्टात सिध्द झालेले नाहीत. दोन चार भाजप समर्थकानी वसूली चाललीय असं सांगीतलं म्हणून गुन्हा सिध्द झाला असं होत नाही. त्यासाठी न्यायालय आहे. वसुली चाललीय तर ती कोर्टात सिध्द होईल, नसेल तर नाही. अर्थात सरकारवर बिनबूडाचे आरोप करन्यात भाजपवाल्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्यांची सत्ता होता तेव्हा किती नेते जेल मध्ये गेले हेयावरून भाजप्यांच्या विश्वासार्हता समजेल. ऊलट अनेक नेते भाजप मध्ये येऊन पावन झाले. त्यामुळे भाजपचे आरोप ही निव्वळ थापेबाजी असते हे राज्यातील जनतेला कळलेय. आणी हे कळल्यानेच जनता भाजपच्या आरोपांना सिरीयस घेत नाही.
13 Apr 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि
उगाच पोकळ बुडबुडे सोडू नका
13 Apr 2021 - 8:14 pm | सॅगी
तर तुम्हीही तेच करताय की...
मग,
आणि तुमचे आरोप म्हणजे राजा हरिश्र्चंद्राचा न्याय म्हणायचे का?
13 Apr 2021 - 8:25 pm | मुक्त विहारि
मग काय करणार?
शाब्दिक बुडबुडे सोडत बसायचे....
13 Apr 2021 - 8:07 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
12 Apr 2021 - 4:16 pm | स्वलिखित
आणि आपल्याला कि बोर्डाचे , एवढंच काय तो फरक ,
पवारांच्या खेळीपुढे फडणवीस टिकले नाहीत एवढाच काय तो कमीपणा , नाहीतर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , मागचे पाच वर्ष विसरलात काय , बरं तसं म्हणावे तर दुधाची वाटी पण समोर नाही ( असे मी गृहीत धरतो)
भाजपचे वय काँग्रेस च्या वयाचे निम्म्याने सुद्धा नाही , त्या मानाने काम बरेच उत्तम आहे , भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न ,
निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी ,
केंद्राने जी एस टी घेऊ नये म्हणे ----- अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही ,
विस्तार भयास्तव नाहीतर इकडून तिकडे गेले वारे ( आणि ते दरवेळी जातेच) होऊ नये म्हणून थांबतो
12 Apr 2021 - 4:48 pm | अमरेंद्र बाहुबली
तर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , >>> असहमत. फडणवीसाचा कारभार आजपर्यंतचा सर्वात खराब कारभार होता. ऊध्दव अतिशष ऊत्तृयेट प्रशासन चालवत आहेत.
भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न ,
निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी ,>>>>
राममंदीराच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय तो पुरावे पाहून. भाजपचा तिथे काहीहा संबंध नाही. अफवा पसरवण्याचो काम भाजप समर्थक करत असतात.
अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा >>> भ्रष्टाचार आहे तर पुरावे गोळा करून कोर्टात जावे. खोटे आरोप करून काहीच मिळत नाही. हवेत लाथा. केंद्राने जीएसटी अडवून निच राजकारण सुरू केलंय हे जनता पाहतेय.
12 Apr 2021 - 5:12 pm | मुक्त विहारि
काही उदाहरणे तरी द्या ....
13 Apr 2021 - 6:24 am | दिगोचि
आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही >>> सहमत. मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यात व खंडणी गोळा करण्यात वेळ घालवत आहेत ते थांबवले तर कोरोंनाकडे लक्स यायला जमेल यांना.
13 Apr 2021 - 6:44 am | मुक्त विहारि
ते आपले बेगडी हिंदुत्व आणि भोंदू मराठीपण जपण्यातच दंग आहेत...
हिंदुहृदय सम्राट पण जनाब झाले आणि केम छो वरलीचे पोस्टर्स लागले...
हिंदूंची कत्तल करणारा, टिपू सुलतान, ह्याचे गोडवे गाणारा, राहुल गांधी, हाच ह्यांचा नेता झाला आहे...
13 Apr 2021 - 5:35 pm | Rajesh188
ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत.
त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे.
13 Apr 2021 - 5:50 pm | श्रीगुरुजी
उत्तम राज्य कारभाराचे किमान एक उदाहरण द्यावे.
13 Apr 2021 - 5:56 pm | मुक्त विहारि
गोल गोल राणी....
13 Apr 2021 - 5:54 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत...
गोल गोल राणी ......
13 Apr 2021 - 6:38 pm | Rajesh188
अमित शाह,योगी ह्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत.अनेक bjp नेत्यावर खुनाचे,दंगल मजवण्याचे गुन्हे आहेत.
सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे.
परत तेच तेच प्रश्न विचारू नका.
नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल.
13 Apr 2021 - 7:00 pm | श्रीगुरुजी
हे सर्व गुन्हे खोटे होते हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे.
नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल.
काढा उकरून. स्वत:ला कणभरही माहिती नाही हे कायमच दिसले आहे.
ठाकरे सरकार अत्यंत उत्तम काम करीत आहे हे नुसते पालुपद सुरू आहे. परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.
13 Apr 2021 - 7:08 pm | प्रसाद_१९८२
परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.
--
जनतेसाठी केले असेल एकादे काम, तर सांगतील ना. फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. जनतेची काय पडलेय या भ्रष्टवादींना.
आज साडे आठला परत येणार आहे फेसबुकवर लाईव्ह, बिन कामाची बकबक ऐकायला तयार राहावे जनतेने.
13 Apr 2021 - 7:11 pm | मुक्त विहारि
निवृत्त नौसेनिकाला पण सोडत नाहीत...
14 Apr 2021 - 10:49 am | इरसाल
फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात.
मी नाय ज्जा !!!!!
प्रसादभावा गणित कच्च आहे आपल. ते १०० कोटी फकस्त हुंबैतले हायेत. बाकीचा म्हाराष्ट्रातले पण मोजा. (प्रति जिल्हा १०० कोटी तर ३६ जिल्हे गुणिले १०० कोटी = ३६०० कोटी प्रतिमहिना)
13 Apr 2021 - 7:09 pm | मुक्त विहारि
मग तर नक्कीच काढा....
सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे.
हो का?
मग त्या मारहाण करणार्या पोलीसांना का निलंबित केले?
---------
पळपुटेपणा सोडा आणि थापा मारणे, पण सोडा ....
13 Apr 2021 - 7:48 pm | अमरेंद्र बाहुबली
मुविकाकांच्य् मॅसेज कडे संपुर्ण दुर्लक्श करा आजिबात रिप्लाय द्यायची गरज नाही.
13 Apr 2021 - 8:01 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण पळपुटे निघालात
13 Apr 2021 - 7:14 pm | प्रसाद_१९८२
ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत.
त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे.
--
बस कर पगले ! अब रुलायेगा क्या ?
तुही सच्चा 'वडापाव' सैनिक है. :))
13 Apr 2021 - 7:27 pm | चंद्रसूर्यकुमार
आणि गंमत म्हणजे काहीही झाले तरी आपल्या पक्षाचे किंवा नेत्याचे अमुक एक चुकले याविषयी चकार शब्द यांच्या (आणि आप समर्थकांच्या) तोंडातून बाहेर कधी पडायचा नाही. आणि हेच लोक इतरांना 'भक्त' वगैरे सर्टिफिकिटे वाटत फिरत असतात.
13 Apr 2021 - 9:17 pm | बिटाकाका
आधी असल्या लोकांचं हसू यायचं आता तेही येत नाही. हास्यास्पद च्या पलीकडे काही असतं तिकडे पोहोचले आहेत. कधीही तथ्यांवर आधारित न बोलणे, स्वतःचा बायस लाळघोटेपणाच्या पलीकडे पोहोचलेला असताना दुसऱ्याला अंधभक्त वगैरे संबोधणे, कोर्टात नाचक्की झालेली असतानाही अजून आरोप आहेत असं एक बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाने निर्णय दिलेले असतानाही दोषी धरणे, टिपीकल आहे हे सगळं. कधी कधी वाटतं सगळ्यात चांगला मार्ग दुर्लक्ष करणे आहे पण खोटी माहिती रेटून पुढे ढकलणे चालू असते म्हणून केव्हातरी उत्तर द्यावेच वाटते.
**************
शेवटी काय भक्ती ही स्वतःच्या इच्छेने केलेली असते, पण गुलामगिरी मात्र मजबुरी मधून येते. त्यामुळे गुलाम होण्यापेक्षा भक्त होणे केव्हाही चांगले.
13 Apr 2021 - 7:46 pm | अमरेंद्र बाहुबली
+१. शिवाय ऊत्तम मंत्रामंडळ आहे. पुरात दात दाखवत सेल्फ्या घेणारे सत्तेत नाहीत हे पवारांच्या कृपेने राज्यावर झालेले ऊपकार आहेत.
13 Apr 2021 - 8:02 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण पळपुटे निघालात
13 Apr 2021 - 8:17 pm | श्रीगुरुजी
छगन भुजबळ - भ्रष्टाचारामुळे २ वर्षे तुरूंगवास, सध्या जामिनावर बाहेर
नबाब मलिक - शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे मुर्दाडांचे नेते आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. पूर्वी भ्रष्टाचारामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते.
धनंजय मुंडे - दुसऱ्या महिलेबरोबर संबंध, बलात्काराचे आरोप
संजय राठोड - दुसऱ्या महिलेबरोबरील संबधातून महिलेची आत्महत्या, मंत्रीपद सोडावे लागले.
अनिल देशमुख - खंडणीच्या आरोपांमुळे मंत्रीपद सोडावे लागले.
हसन मुश्रीफ - २६/११ चा हल्ला संघाने केल्याचे खोटे आरोप केले.
बच्चू कडू - सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याने एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा, सध्या जामिनावर बाहेर.
उद्धव ठाकरे - शून्य निर्णयक्षमता, १३ महिने घरातून बाहेर पडले नाहीत.
वर्षा गायकवाड - सर्व परीक्षा सातत्याने पुढे ढकलणे एवढेच निर्णय घेतले, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण वर्ष वाया गेले.
आव्हाड - टीकाकारांना घरी पकडून आणून बेदम मारहाण केली.
__________
ऊत्तम मंत्रामंडळ !
13 Apr 2021 - 8:23 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद ...
13 Apr 2021 - 8:29 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यातील बहुतांश आरोप आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर निघालो नाहीत ही खुपच चांगली गोष्टय. दो गज की दुरी रखे असं टीवीवर सांगून बंगालात लाखोंच्या सभा घेणार्यांमधले ते नाहीत ह्या बद्दल राज्यातील जनतेला गर्व वाटतो. कृतीतून सिध्द करनार्यातील आहेत.
आणी वराल काही ऊद्या भाजपात आले की पावन होतील. ठाकरेंनी युती साठी हात पुढे केला की तेच कर्तृत्वशुन्याचे कर्तृत्ववान होतील : )
सर्व सत्ते भोवती फिरतं. भाजपाला जनतेशी नाहीतर सत्ते शी घेणेदेणे असते. त्यामुळे विरोधात बसवले पवारांनी तेच योग्य केले. राज्यात जनहिताचे सरकार आहे म्हणून ऊत्तम सुविधा मिळताहेत. नाहीतर कोल्हापुर चा पुर ऊदाहरणासाठी आहेच.
13 Apr 2021 - 8:58 pm | मुक्त विहारि
शाब्दिक बुडबुडे
13 Apr 2021 - 8:32 pm | सॅगी
उत्तम कामे आहेत..
बाकी महामहीम मुख्यमंत्र्यांच्या नावासमोर अजुन एक काम लिहायचे राहिले....
"गोल गोल बोलबच्चन देणारे फेबु लाईव्ह करणे आणि सभागॄहात दसरा मेळाव्याचे भाषण वाचणे."
13 Apr 2021 - 8:52 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रधानसेवक हवं.
13 Apr 2021 - 9:00 pm | मुक्त विहारि
राज्य सरकारने केलेली जनहिताची कामे सांगीतलीत तर फारच उत्तम...
उगाच, शाब्दिक बुडबुडे सोडत बसू नका...
13 Apr 2021 - 9:14 pm | सॅगी
प्रधानसेवक कधीही दसरा मेळावा वगैरे घेत नाही हो...ते माननीय महामहीम उद्धवरावांचेच काम...
13 Apr 2021 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याना मेळावा घेण्यासाठी वेळ,काळ,स्थळ,सण कसलंही बंधन नसतं. मित्रो.....
13 Apr 2021 - 9:19 pm | सॅगी
मित्रो नाही हो....बंधुभगीनींनो....
13 Apr 2021 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली
अगदी डोंगर, दर्या, बोगदे ह्यांनाही हात हलवून अभिवादन करतात तें
13 Apr 2021 - 9:27 pm | सॅगी
निदान तेवढे तरी फिरतात ते...इथे तर....
13 Apr 2021 - 9:58 pm | मुक्त विहारि
तुम्ही ह्या सरकारने केलेल्या कामाची यादी कधी देणार आहात?
13 Apr 2021 - 10:24 pm | श्रीगुरुजी
जरा कळ काढा. एकदोन कामे तर करू देत. ती केली की लगेच यादी देणार.
12 Apr 2021 - 1:15 pm | Rajesh188
केंद्रीय उद्योगपती धार्जिणे सरकार शेती व्यवसाय चे संघटित उद्योगात रूपांतर करण्याचे प्रयत्न करत आहे .म्हणजे एक हाती शेती व्यवसाय वर सत्ता गाजवता येईल आणि गोरगरीब शेतकऱ्यांना गुलाम ,नोकर बनवता येईल.
हा उध्येश
आणि एकहाती सत्ता निर्माण झाली की मध्यम वर्गीय,नोकरदार ह्यांना कधी ही कसे ही पिळून काढता येईल.
येईल त्यांना अनुभव काही वर्षातच.
12 Apr 2021 - 1:22 pm | मुक्त विहारि
तुम्ही पळपुटेपणा करता...
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
12 Apr 2021 - 1:21 pm | मदनबाण
Mumbai: mid-day investigation jolts BMC into action, probe ordered against fliers who escaped quarantine
--------------------------------------------------------------------------------------------
Blame game ensues after Mid-Day finds BMC officials at Mumbai airport took bribes from international passengers to allow escape from mandatory quarantine
आपल्या महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या अनेक कारणां पैकी एक !
खा साल्यांनो पैसे खा, लोकांचे आयुष्य खा... :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- Sunny
12 Apr 2021 - 1:25 pm | मुक्त विहारि
राज्य सरकार उत्तम काम करत आहे ...
12 Apr 2021 - 1:39 pm | सॅगी
१०० कोटी मिळण्याचा एक मार्ग बंद झाला...आता इतर मार्ग शोधायला नको का?
12 Apr 2021 - 2:02 pm | सौंदाळा
आता पावसाळ्याआधी नालेसफाईचे टेंडर निघतील ना BMC चे.
लाखो रुपयांचे टेंडर. एक दोन ठिकाणचे नाले सफाई करतानाचे आणि महापौर वगैरे अधिकारी पहाणी करतानाचे फोटो पण येतील. आणि मग आहेच नेमीची येतो पावसाळा आणि नाले गटारे तुडुंब.
13 Apr 2021 - 6:45 am | दिगोचि
सहमत. पण फक्त लाखो रुपयांचे टेंडर? अहो शेकडो कोटींचे बोला. कारण राज्यातील अनेक शहरामधे हाच प्रोंब्लेम आहे. शिवाय अनेक ठिकाणी मलमुत्र विसर्जन सेवा पण चान्गली नाही तिकडे पण लक्षद्यायला हवे. यासाठी सरकारकडे पैसे नाहीत फक्त मन्त्र्यान्चे बन्गले दुरुस्त करायला आहेत.
12 Apr 2021 - 3:36 pm | बबन ताम्बे
पुण्यात सकाळ पासून ससून मध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला. ऍडमिट होण्यासाठी रांग पण खाटा उपलब्ध नाहीत. रोज रुग्ण वाढत आहेत.
दुसरीकडे राज्यकर्ते आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात दंग आहेत. यांना परिस्थिचे काही गांभीर्य आहे की नाही? पुणे आणि महाराष्ट्र सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर दिसतो आहे. वेळीच उपाय केले नाही तर कोरोना भयानक तांडव माजवेल अशी स्थिती आहे.
दुसरीकडे टी व्ही वर कुंभ मेळ्याची गर्दी दाखवताहेत. पंढरपूरच्या निवडणूक प्रचाराच्या सभा गर्दीत होताना दिसताहेत. बंगालमधल्या प्रचंड सभा टी व्ही वर पाहिल्या. ही पंढरपूरची पोट निवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुका निवडणूक आयोगाला पुढे ढकलता आल्या नसत्या का? की एव्हढी अक्कल त्यांनी खुंटीला टांगली आहे. बरं करोनाची एव्हढी परिस्थिती गम्भीर असताना पंतप्रधान, बीजेपी आणि इतर प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूकांबाबत काय भूमिका घेतली? त्यांनी का नाही पुढे ढकलण्याची विंनन्ती केली?
काय चाललंय काही कळत नाही.
12 Apr 2021 - 7:22 pm | चौथा कोनाडा
सहमत.
कुणाला गांभीर्य आहे असं दिसत नाही. जबाबदारी केंद्र अणि राज्य एकमेकांवर ढकलताहेत. राज्यात विरोधी पक्ष आहे म्हणुन केंद्र परिस्थितीचा फायदा घेतय की काय अशी शंका यायला लागली आहे.
स्थानिक पातळीवर खाबूगिरी, टक्केवारी, रिग हे प्रकार सुरुच आहेत. आमच्या इमारती समोरील फुटपाथवरील मागच्याच वर्षी बसवलेल्या आणि चांगल्या असणाऱ्या टाईल्स बदलायला घेतल्यात. अशी कित्येक बिनकामाची "विकासकामे" बिनबोभाट सुरू आहेत. जिथे रस्ते पुल हवेत (पिंचिंवाडी ग्रामीण भाग) ते वर्षानुवर्षे करत नाहीत. शहरी भाग खाबुगिरी करत चकचकीत होपलेस स्मार्ट करत आहेत.
या असल्या खाबूगिरीला कोण जाब विचारणार हाच प्रश्न आहे. इथे भाजपा सत्ताधारी झाल्यापासून कोणीच भ्रष्टाचाराच्याविरुद्ध आवाज उठवत नाही. बरेचसे काँगीवाले आता सत्ताधारी बनले आहेत. फक्त पक्ष बदलला. मंडळी तीच आहेत.
12 Apr 2021 - 9:08 pm | बबन ताम्बे
सगळीकडे नुसते राजकारण चाललेय. जनतेचे मात्र हाल होत आहेत.
12 Apr 2021 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालु घडामोडीतील मथळ्यातील. शेतक-यांच्या आंदोलनाची धग कमी होत आहे, ते सध्याचा करोनात्सव पाहता, टेंट रीकामे पडणे हे साहजिकच आहे, तरीही बातमीतील '' सध्या येथे ३०० -४०० आंदोलनकर्ते राहीले आहेत, त्यातील १०० शेतकरी आसपासच्या गावातील आहेत, जे येऊन जाऊन असतात'' ही गोष्ट चिवटपणाची साक्ष देणारी गोष्ट वाटली, शेतक-यांच्या लढावू बाण्याचं आपल्याला सुरुवातीपासून कौतुक वाटले आहे. आत्तापर्यंत दोन-तीनशे शेतक-यांना आपले प्राण गमवावे लागले, मात्र केंद्रसरकारला ते फार महत्वाचं वाटत नाही. पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटते, यातून सत्ताच केवळ किती आवश्यक आहे, आणि मोदी सरकार किती सत्तेचे भूकेले आहेत, तेही दिसून येते.
कुंभमेळ्याची गर्दी पाहिली (दुवा) सरकारने कितीही काहीही महत्वाचे असले तरी असे कुंभमेळे, जत्रा, उत्सव, बंद केले पाहिजेत. परवानगी देऊ नये. पण, मतांसाठी आपला एक गठ्ठा असलेल्या मतांच्या विरोधात निर्णय घेणे कठीण काम असते. सरकारच्या मर्यादा आपण समजू शकतो. मागच्या वेळी त्या तबलिकी जमातीला करोनाच्या प्रादुर्भावासाठी जवळ जवळ सर्वांनीच जवाबदार धरले होते, त्यांची गर्दी करणे हे चुकच होते. तेव्हा, एकेक हुडकून त्यांच्या संपर्कातल्यांना होम कोरंटाईन किंवा दवाखान्यात भरती केले होते, काहींवर कायदेशीर गुन्हे दाखले केले होते. कुंभमेळ्यातील सर्वच सहभागींना शोधणे आता महाकठीण काम दिसते. सुरुवातीलाच १३०० लोक करोनाग्रस्त आल्याचे बातमी म्हटल्या जात आहे, आता होणा-या प्रादुर्भांवाबद्दल कायदेशीर कार्यवाही सहभागींवर व्हायला हवी. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पुढे कमी करणे अवघडा वाटत आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित होत आहे असे एकूण बातम्यांवरुन दिसत आहे. महाराष्ट्रात ठोस अशा उपाययोजनांच्या बाबतीत सध्या काही नवीन दिसत नाही, लस दिलेल्यांचे प्रमाण वाढत असले तरी वाढत्या रुग्णांवर काही उपाय ना केंद्राला सुचवता आला ना महाराष्ट्राला नवे काही करता आले, आता लॉकडाऊन करुन या वाढत्या रुग्ण संखेला किती आळा बसेल हे काळ ठरवेल. सर्वपक्षीय बैठकीत मा.फडनवीस म्हणाले की, व्यापारी, रोजगार, मजुर यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था, जनभावना याचा आदर करुन निर्णय घ्यावा. मा. फडनवीस एक महाराष्ट्राचा चांगला नेता दुर्दैवाने सत्तेच्या मोहापोटी वाया चालला आहे, असे वाटते. मा.पंतप्रधानांनी मा.मुख्यमंत्र्यांना सध्या इतर गोष्टींकडे ( म्हणजे फडनवीसांकडे) दुर्लक्ष करुन कामावर फोकस करावे असे म्हटले आहे. मा.पंतप्रधानांनी साताठ महिने जे लॉकडाऊन देशावर लादले, हजारो मजुर पायी चालून, टेंपोत बसून, गुदमरुन मरण पावले, गरोदर स्त्रीयांना पायी प्रवास करावा लागला, तो केवळ आज रात आठ बजह से, कोणता आगा न पिछा पाहता, सब कुछ बंद रहेगा असे अचानक निर्णय घेतल्यानंतर झालेले आपण पाहिले आहे, तो निर्णय घेतल्यावर अन्नाची पॉकीटं आणि पैशाची पाकीटं काही हेलीकॉप्टरमधून मजुरांच्या घरांवर, गरजुंच्या घरावर टाकली नव्हती. सध्या पंधरा एक दिवस कळ काढणे सर्वांच्या हिताचे आहे, असे दिसते.
एक दिव्यभास्करची बातमी वाचनात आली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की ५००० रेमडिसीव्हिर इंजेक्शन भाजपाच्या प्रदेश अध्यक्षाकडे सापडले. एकीकडे सर्व जनता इंजेक्शनसाठी परेशान असतांना त्यांच्याकडे एवढा साठा कसा सापडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं '' उन्ही से पुछे'' त्यावर दिव्य भास्करने बातमीबरोबर प्रदेशाध्यक्षांचा मोठ्या अक्षरात हेडलाईन म्हणुन केवळ मोबाईल नंबर छापला, हे लै भारी वाटले.
राजकारण, समाजकारण, आणि विकासाच्या बाता या आणि इतर सर्वच गोष्टींच्या बाबतीत गुजरात म्हणजे देशाचा स्वर्ग असे आपल्या माथी मारल्या गेले आहे. कालच्या एका व्हीडीयोत सुरत, भावनगर, सुरत, अहमदाबाद, या ठिकाणीही करोनाचा हाहाकार माजलेला दिसत आहे, रुग्णांची हेळ्सांड होतांना दिसत आहे, सुविधांचा अभाव दिसत आहे, अशा वेळी महाराष्ट्रालाच बदनाम केले जाते त्याचं कारण केवळ राजकीयच आहे, असे वाटत आहे. देश म्हणून सर्वच राज्यांना समान सुविधा अशा कराल काळात दिला गेला पाहिजेज. लशीच्या असमान पुरवठ्याबद्दल उडालेलेला गदारोळ पाहता, मा. मोदीसरकार इथेही राजकारणच करतांना दिसत आहे, सध्या सर्वांचीच वेळ खराब आहे. सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याची जवाबदारी पालक म्हणून केंद्राची आहेआणि दुर्दैवाने लॉकडाऊन शिवाय आजही परिस्थिती फार बदललेली नाही असेच म्हणावे लागत आहे.
बाकी, आता दिवाबत्तीच्या महोत्सवानंतर घेऊन येत आहोत. 'लसोत्सव' कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा ते शिकायचं आपल्या आदरणीय पंतप्रधान यांच्याकडून. पण, गेल्यावर्षापासून करोनाची कंडीशन हाताबाहेर जात असल्यामुळे टीव्हीवर येऊन काही नवीन टास्क दिला नाही. टीव्हीवर प्यारे देशवासीयो, भाइयो और बहनो असे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले आहेत. :)
-दिलीप बिरुटे
12 Apr 2021 - 4:58 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
12 Apr 2021 - 5:14 pm | मुक्त विहारि
तुम्ही ह्या राजवटीने केलेली, चांगली कामे, काही सांगीतली नाहीत ...
12 Apr 2021 - 5:31 pm | Rajesh188
केंद्र सरकार महाराष्ट्र ची अडवणूक करत आहे.
प्रतेक कामात आडवा पाय घालत आहे.
ह्या सरकार ची काम काय विचारताय सातवे वर्ष सुरू झाले मोदी सरकार चे.
काय काम केले आहे .
कंपन्या विकणे, नोट बंदी सारखे उथळ निर्णय घेणे,बँका चे खासगीकरण करणे,शेती उद्योगाची वाट लावणे,धार्मिक भावना भडकवने,विरोध पक्षाची राज्य सरकार असतील तर cbi पासून सर्व केंद्रीय संस्थेचा वापर करून राज्य चालवणे मुश्किल करून ठेवणे.
सकाळी पाच लाच ह्यांचे राज्यपाल गुपचूप मुख्य मंत्री पदाची शपथ देत होते.
12 Apr 2021 - 5:55 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
पळपुटेपणा न करता, वरील प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात?
12 Apr 2021 - 6:05 pm | Rajesh188
तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत राज्य सरकार कोणालाच वाचवत नाही जसे केंद्र सरकार अर्णव ला वाचवत होते.
12 Apr 2021 - 6:08 pm | मुक्त विहारि
वरील प्रश्र्नांचे हे उत्तर नक्कीच नाही...
12 Apr 2021 - 8:20 pm | स्वलिखित
निम्मा महाराष्ट्र आणि निम्मा भारत रस्त्यावर हागायला बसायचा , तो बंद झालाय ,
तेच खूप झालं सात वर्षासाठी , सत्तरचा हिशोब एवढ्या एकाच कामावरून क्लिअर करतो ... अजून काही ,
12 Apr 2021 - 9:02 pm | Rajesh188
Bjp सरकार यायच्या अगोदर किती तरी संडास बांधण्यासाठी सरकार प्रोत्साहन आणि सबसिडी देत होते.
सार्वजनिक संडास मुतारी बांधण्यासाठी सरकार गावांना निधी देत होते.
मुंबई मध्ये किती वर्षा पासून सार्वजनिक संडास आहेत त्याची देखभाल पण सरकार च करते.
मोदी आल्यावर फक्त जाहिरात बाजी झाली काम झीरो.
पेयजल योजना पण खूप वर्षांपासून आहे
12 Apr 2021 - 10:24 pm | स्वलिखित
प्रोत्साहन दिले , सबसिडी दिली , निधी दिले
ह्यात फायनल गोल अचिव्हमेंट कुठे आहे ?? उलट आलेला निधी असा लुटला कि कीर्तनकार सुद्धा म्हणाले " कडबा तर सोडाच , ह्यांनी संडास खाल्ले "
पेयजल योजना जितकी झाली तितकी उत्तम झाली त्याबद्दल दुमत नाही ,
13 Apr 2021 - 6:46 am | मुक्त विहारि
पळपुटेपणा किती करणार?
12 Apr 2021 - 6:32 pm | श्रीगुरुजी
मागील १७-१७ महिन्यात एकही चांगले काम केलेले नाही (खरंतर कणभरही काम केलेले नाही). विद्यार्थ्यांची पूर्ण वाट लावून ठेवली आहे. जून २०२० मध्ये होणारी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया एप्रिल २०२१ मध्ये सुद्धा संपलेली नाही. आता १० वी आणि १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष वाया जाणार.
वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची फार भयंकर किंमत महाराष्ट्राला द्यावी लागत आहे. महाराष्ट्रात तातडीने लष्करी राजवट (ते शक्य नसेल तर राष्ट्रपती राजवट) लावणे अत्यावश्यक आहे.
12 Apr 2021 - 6:41 pm | मुक्त विहारि
ही पण केंद्राचीच जबाबदारी आहे, असे पण काही जणांना वाटू शकते...
12 Apr 2021 - 6:53 pm | Rajesh188
केंद्र स्वतःची जबाबदारी सांभाळा यायना ते काय ते काय राज्याची जबाबदारी घेणार.
केंद्रीय सरकार मध्ये एक तरी मंत्री उच्च गुणवत्तेच्या आहे का?.
कोणत्याच विषयात विशेष काहीच प्रावीण्य नसलेल्या लोकांचे केंद्रीय सरकार आहे..
ते स्वतःच, बावरलेले, आहे.
12 Apr 2021 - 7:06 pm | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत...
गोल गोल राणी
12 Apr 2021 - 6:49 pm | Rajesh188
परीक्षा घेणे ऑफ लाईन शक्य आहे का.
महाराष्ट्र मध्ये corona पसरायला bjp च जबाबदार आहे.
कधी मंदिरात प्रवेश द्यावा सर्व नियम मोडून म्हणून आंदोलन.
ऑफ लाईन परीक्षा घ्या हा अती advance सल्ला.
मुंबई एअरपोर्ट वर दुनिया भर ची लोक उतरवली .
चीन मध्ये corona कहर चालू होता तेव्हा पंतप्रधान झोपा काढत होते.
तात्काळ विदेशी वाहतूक बंद केली नाही.
CORONA बाधित देशात राहणारे प्रचंड प्रमाणात मुंबई आणि दिल्ली मध्ये उतरले आणि देशात त्या रोगाचा प्रसार झाला.
12 Apr 2021 - 6:55 pm | अमरेंद्र बाहुबली
पंतप्रधान आताही झोपाच काढत आहेत. जनता मेली तरी चालेल पण निवडणूका महत्वाच्या. एकंदरीत देश चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याचे परिणाम देश भोगतोय.
12 Apr 2021 - 7:00 pm | मुक्त विहारि
बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन आणायला हवे होते...
12 Apr 2021 - 8:16 pm | नावातकायआहे
ते येइल तेंव्हा येइल.... सध्या रताळ्यापासुन लस करायचा प्रयोग चालू आहे.
12 Apr 2021 - 7:05 pm | मुक्त विहारि
मग गोव्यात का प्रसार झाला नाही?
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत...
गोल गोल राणी.....
12 Apr 2021 - 7:36 pm | सॅगी
भलत्याच अपेक्षा ब्वॉ तुमच्या..अहो जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच गोल गोल बोलणे टाळू शकत नाहीत तिथे त्यांचे भक्तगण तरी सरळ कसे बोलणार?
लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही हे वाक्य आतापर्यंत अगणित वेळा बोलले असतील...पण ठोस निर्णयाच्या नावाने मात्र बोंब..
बहुदा कोणत्यातरी शुभ मुहुर्ताची वाट पाहत असावेत, ठोस निर्णय घेण्यासाठी.
पब्लिक आपले आहे गॅसवर...आता लॉकडाऊन होतोय की काय या विवंचनेत...
तरीही...
असेच बोलायचे...नाहीतर तुम्ही लगेच "महाराष्ट्रद्रोही" ठरता.. :)