बातम्यांचे विषारी गुलाबजाम
देणारे कोण आणि खाणारे कोण???
निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला!
अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!..
चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात..
पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!....
इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ??
जरा इतिहासात मागे जाऊयात ...
ही गोष्ट आहे १८९८ साल ची..
अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ...
आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..!
मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??...
तर त्याचे दोन आयाम आहेत
पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!)
आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा...
( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!)
साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल..
आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट
२) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर
( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!)
ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!!
( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!)
आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात..
वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.."
ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला ..
त्यात तो पत्रकार म्हणतो की
," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !"
त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!"
केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!!
आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!!
त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण!
ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते...
"आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? "
"अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला"
"आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!"
आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली..
पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!!
नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची!
हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला.
आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली..
कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या..
नमुना काही असा असायचा बघा...
"हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. "
(New York World, 21 February 1897
and New York Journal, 22 February 1897)
झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!...
आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा
third time is the charm!!!
म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !!
आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली..
पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय..
" remember the maine !! to hell with the spain!!"
" $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!"
" punishment to spain for the USS maine!!"
अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!...
या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली...
पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते...
पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...!
स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...??
त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!"
या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि
एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!!
आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !!
पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे...
त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!!
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे...
- शैलेश भोसले
टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक
प्रतिक्रिया
14 Oct 2020 - 5:59 pm | शा वि कु
लेख फार आवडला. माहितीपूर्ण, रोचक आणि गरजेचा.
14 Oct 2020 - 6:11 pm | शा वि कु
मी इथे वाचले की "फोटू दया, युद्ध देतो" या टेलेग्रॅम्स खऱ्या नव्हेत, तेव्हा वावड्या असू शकतात. (तरी या वृत्तपत्रांचा सहभाग होताच.)
14 Oct 2020 - 11:44 pm | एस.बी
शा वि कु जी..
सदर टेलिग्रामस चा संदर्भ मला पीत पत्रकारिता आणि त्याबद्दल चा इतिहास इंटरनेट वरती शोधाशोध करताना मिळाला होता..त्यामुळे मी तो ह्या लेखात वापरला आहे. आता त्या तार संदेश बद्दल सत्य असत्य काय असेल त्याबाबत अजून शोधाशोध करायला वाव आहे हे मान्य!
17 Oct 2020 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतोय. सध्याच्या काळाता आपल्याकडील गोदीमिडियाचा सर्व प्रभाव पाहता,
माध्यांचा भविष्यातला प्रवास कसा असेल ते पाहणे रोचक ठरणार आहे.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2020 - 6:56 pm | गामा पैलवान
चांगली माहिती आहे. लेखकास धन्यवाद!
अशाच एका वृत्तपत्रास हाताशी धरून फिडेल कॅस्ट्रोने आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे रेटली होती. त्या वृत्तपत्रहस्तकाचं नाव हर्बर्ट मॅथ्यूज.
-गा.पै.
14 Oct 2020 - 11:45 pm | एस.बी
त्या वृत्तपत्र आणि फिडेल कॅस्ट्रो बाबत वाचन करण्यासारखे साहित्य दुवे मिळावेत अशी विनंती गा पै जी
15 Oct 2020 - 4:29 am | निनाद
फिडेल कॅस्ट्रोने जशी आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे लोटली, तशीच क्रांती आजही कम्युनिस्ट पार्टीला भारतात करायची आहे हे विसरू नका.
स्टलिन किंवा कॅस्ट्रो यांनी साम्यवादी राजवट आल्या आल्या आपल्या विरोधकांना गोळ्या घालून ठार केले होते. व्हिएत्नाम मध्ये पण कम्युनिस्ट सत्ता आल्याबरोबर सर्व
साम्यवाद विरोधक त्वरित मारले गेले. म्हणजे अक्षरशः भिंतीलगत उभे करून गोळ्या घालतात हे लोक. तेव्हा कोणतीही ह्युमन राईट्स वाली संघटना काहीच म्हणत नाही.
हाँगकोंग मधून लोकशाहीवादी लोक अचानक गायब होतात ते पण असेच असावेत असा संशय आहेच.
14 Oct 2020 - 7:02 pm | उपयोजक
चांगला लेख!
14 Oct 2020 - 11:46 pm | एस.बी
धन्यवाद!!
14 Oct 2020 - 7:29 pm | Rajesh188
पण त्या लेख मधून आपण काही शिकल पाहिजे.
जगात अनेक देशातील उदाहरणे आहेत.
ज्यांनी खूप छान प्रगती केली आणि ह्या असल्या घाणेरड्या मीडिया मुळे,एकमेकात द्वेष पसरवून त्या वर पोळी भाजनाऱ्या राजकारण्यांना मुळे. त्या देशांची अर्थ व्यवस्था,सामाजिक शांतता धुळीस मिळाली अन्न अन्न दशा झाली.
त्या मधील एक ठळक उदाहरण व्हेनेझुएला देशाचं.
एक वेळ हा देश जगात श्रीमंत होता सर्व जनता सुखात आणि वैभवात होती.
आज त्यांना 2 वेळ चे अन्न मिळत नाही.
आपल्या देशात पण तेच चाललं आहे.
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती.
पण देशातील जनतेत द्वेष निर्माण केला गेला त्याचा परिणाम दोन्ही देशाला बसला.
जातीय द्वेष,धार्मिक द्वेष,आक्रमक राष्ट्रीयत्व हे सर्व घातक आहे.
विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर जो आता प्रगतिशील भारत आहे तो भारत जगातील गरीब देशात गणला जाईल.
तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.
14 Oct 2020 - 10:56 pm | अर्धवटराव
म्हणजे कसं ?
संसदेवर हल्ला झाला (त्यात डायरेक्ट पाकिस्तानचा हात नव्हता वगैरे मुद्दे कामाचे नाहित) तर ति सरकारी पातळीवर दुश्मनी ठरवुन सरकारने कारवाई करायची.
कसाबने मुंबईवर हल्ला केला (त्यातही पाकिस्तानी सरकारचा हात नव्हताच.. असं म्हणतात) तर तो सरकारी पातळीवर हल्ला नसल्यामुळे लोकांनी फार काहि सिरियसली घ्यायचं नाहि.. असा काहि फरक करायचा का?
हे असले प्रकार फार बालिश कॅटॅगरीत मोडतात हे खरं आहे. पण मग ऑर्गनाइझ्ड आणि समंजस पद्धतीने जनतेने कसे वागावे याबद्द्ल कोण पुढाकार घेतोय ?
उन्माद वाईटच. पण मग युद्ध एकदम दाराशी आलं कि जागं व्हायचं का ? कि बर्याच मान्यवरांनी मागे दिला तसा चिनी आक्रमणाला उद्धारकर्ते समजुन पाठिंबा द्यायचा?
14 Oct 2020 - 9:37 pm | वीणा३
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे. म्हणजे भारतात मोदी ना मूळ मत असेल तर काँग्रेस, शिवसेना इ पक्षाच्या बाजू सुद्धा ऐकायला हव्यात. माझ्या मताच्या विरुद्ध काहीच ऐकणार नाही, असं करण्यापेक्षा "मी सगळ्याच बाजू ऐकून मत ठरवेन" हे जास्त बरोबर होईल.
<<अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या>>
हे चॅनेल्स लोक कसे बघतात तेच कळत नाही. मरे कुठल्या बाजूने आहात, रोज घरात फुकटचा आरडा ओरडा आणून आपल्या घराचं तापमान वाढवून मनःशांती का घालवायची :(
17 Oct 2020 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याकडे दोनहजार चौदानंतर हे प्रमाण खूप वाढले, विरोधातलं काहीही ऐकून घ्यायचं नाही, विरोधात असेल ते सर्व व्यवस्थेतून काढून टाकायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, एबीपी न्युज मधील पुण्यप्रसून बाजपेयीचा राजीनामा आणि त्या सर्व घटना. प्राइम टाइम मधील कार्यक्रमात मा. मोदीसेठ यांच्या एका बातमीचा भंडाफोड केला त्यांना नौकरी गमवावी लागली. मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात सरकार विरोधीतलं सत्य समोर आणले आणि प्राइम टाइममधील कार्यक्रम बंद झाला. सवीस्तर व्हीडीयो निवांत बघा. सध्याचं सरकार आपल्यावर खोटं कसे लादल्या जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे. जरुर पाहावे. माध्यंमांचा भारतीय प्रवास कसा होतोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावे.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2020 - 10:10 pm | दुर्गविहारी
मस्त लेख ! आपल्या देशात सध्या मीडियाचा जो धुडगूस चालू आहे तो फार काही वेगळा नाही.
14 Oct 2020 - 11:47 pm | एस.बी
धन्यवाद!! पण आपली अंतिम अवस्था वरच्या उदाहरण प्रमाणे होऊ नये एवढीच इच्छा!!!
17 Oct 2020 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत....! गोदी मिडियाकडून काय अपेक्षा करणार ? मूळ प्रश्नांकडून आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचा उत्तम प्रयोग सुरु असतो. आपण करोनाशी झुंजत असतांना माध्यमं आपल्याला सुशांतसींगच्या आत्महत्त्याभोवती फिरवत राहीले, लावला टीव्ही के सर्वच वाहिन्यांवर तेच. अपवाद होत्याच. रवीशकुमारचं प्राइम टाइम सध्या एकमेव वाहिनी जी घटनांच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेत असते. सुशांतसींग-कंगना रावत चालवले, भारत-चीन, आता भारत पाकिस्तान वगैरे चालू ठेवतील. रोजगार, बेकारी, हे तर आता सरकारचे प्रश्नच राहीलेले नाही. महागाई, लोकांच्या प्रश्नांवर माध्यमं बोलत नाहीत. आपण कंटाळून टीव्ही बंद करावा अशा प्रकारे तुम्हाला बातम्यांपासूनही दूर ठेवल्या जातंय. चालायचंच...!
-दिलीप बिरुटे
14 Oct 2020 - 10:19 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक लेख !
या युद्धाबद्द्ल नविन माहिती कळाली !
दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ अशी मराठीत म्हण आहे पण लाभासाठी भांडणे लावणारे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाणारी जमात !
अगतिकता वाईट असते !
14 Oct 2020 - 11:40 pm | एस.बी
धन्यवाद सर्वांचे !! तसं बघायला गेलं तर हा लेख थोडा घाबरत घाबरत टाकला होता...कारण हाच लेख मी माझ्या फेबु भिंतीवर पोस्ट केलाच होता पण तिकडून काय फक्त अंगठे मिळाले..सकारात्मक किंवा नकारात्मक असे काहीच प्रतिसाद मिळाला नाहीत..मग म्हणले खरे जाणकार आणि अनुभवी मंडळींचा समूह म्हणजे मिपा..तिथे पाठवून बघू!!पुन्हा एकदा आभार !!
15 Oct 2020 - 2:29 am | गामा पैलवान
एस.बी.,
तुम्ही मिपावर लेख प्रकाशित करायचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे. बिनधास्त लिहा इथे. आंतरराष्ट्रीय विषयांवर मराठीतनं व्यक्त व्हावंसं वाटणं ही मराठीची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर होऊ द्या.
धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2020 - 4:23 am | निनाद
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात?
छुपा साम्यवाद म्हणतात तो असाच पसरवला जात असावा का?
हेच गुलाबजाम साम्यवादी होते आणि असतात तेव्हा मात्र सगळे गुळण्या धरून बसतात हे पण नोंदवलेच पाहिजे.
सध्या द हिंदु सारखे साम्यवादी पेपर चालवत असलेला चीनी प्रपोगंडा हे पण विषारी गुलाबजामच आहेत. जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही.
रशियन केजीबी ने नोवोस्टी या संस्थे मार्फत संपुर्ण भारतीय मिडिया आपल्या ताब्यात ठेवला होता. प्रमुख पत्रकार आणि संपादक सुद्धा रशियन पे रोल वर होते असे म्हणतात. तेव्हा सुद्धा विषारी गुलाबजामच दिले जात होते. आपले परराष्ट्र खाते सुद्धा रशिया चालवत होते अशी शंका तेव्हा व्यक्त होत असे. हा इतिहास विसरता येण्यासारखा नाही. जे काय वाईट होत असे ते सर्व सीआयए करते असे धड्धडीत छापुन आणले जात असे. खाली मित्रोखिन आर्काव्हज दुवा दिला आहे.
या भयंकर षडयंत्राची माहिती मुळातून वाचण्यासारखी आहे.
अधिक माहिती:
https://www.cia.gov/library/readingroom/docs/CIA-RDP86T00586R00040049000...
https://mitrokhinarchiveii.blogspot.com/
15 Oct 2020 - 6:42 am | एस.बी
निनाद जी
सध्या तरी मी छुपा किंवा जाहीर असा कुठल्याच इजम चा नाही आहे..
विकृत व्यापारी हा शब्द मी केवळ त्या लेखातील २ वर्तमानपत्र समूह साठी वापरला होता. आणि सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या.
पण ह्यात कोणत्या एक विशेष विचारधारेचा उदो उदो करायचा आहे आणि दुसऱ्या विचारधारेचे प्रतिमा हनन करावयाचे आहे असे बिलकुल नाही..
आणि हिंदू पेपर म्हणाल तर तो फक्त लोकसेवा आयोगाच्या परीक्षे मधल्या मार्क पुरता वापरात आहे!( माझ्याबाबत बोलले तर!! )
15 Oct 2020 - 9:01 am | निनाद
मग तसे लेखनातून मला वाटले नाही. अगदी छुपे लिबरल्स जसे लिहितात त्या पद्धतीचा लेख वाटला म्हणून तसे स्पष्ट लिहिले. पीत पत्रकारिता ही फार जुनी आहे. अनेक वर्षे भारतात चाललीच आहे. सुमार केतकर ते गिरिष चोरबाजार काय लिहितात हे हे पाहा. त्यांचा कोणताही लेख काढला तर त्यातल्या सगळ्या पिवळ्या छटा स्पष्ट दिसतात.
15 Oct 2020 - 7:56 am | चौकस२१२
जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही.
सहमत .. पण झोपलेल्याला उठवता येते , झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही तसे ..
सत्ताधारी पक्षातील अति टोकाच्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध झाला पाहिजे पण तो करताना इंग्रजीत म्हणतात तसे " चेरी पिकिंग " करतात काही पत्रकार / लेखक ..
अंगावर यायला लागला कि अळी मिळी गुप चिळी! मग सगळ्या मेणबत्या कपाटात बंद
अजूनही गुजराथत दंग्यांचा विषय निघाला कि सुरवात का झाली ते मात्र सोयीस्कर रित्या विसरायचे लुटन च्या दिल्ली ग्यांग मध्ये हेच शिकवले जाते ..
15 Oct 2020 - 9:50 am | सुबोध खरे
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे.
हे वाक्य मलाही खटकलं.
लेखकाची वृत्ती डावी कडे झुकणारी असावी असे वाटून गेलं.
बाकी लेख ठीक आहे.
15 Oct 2020 - 9:57 am | निनाद
शेवटी साम्यवादी आणि छुपे लिबरल्स हेच तर करत राहतात.
सामान्य माणसाला सारखे सांगत रहायचे:
देश चांगला चाललेला नाही.
लोकशाही सिसिटिम्स बरोबर नाही,
समाज चांगला नाही,
माध्यमे चांगली नाहीत
कुणावरच विश्वास ठेऊ नका...
डिस र्मेशन चे कँपेन करून सामान्य माणसाला भंडावून टाकायचे आणि एक वैचारिक गोंधळ तयार करायचा. कोणतीही राष्ट्रवादी राष्ट्रहिताची संवेदना तयार होऊ द्यायची नाही. पण तेच उघडे पडले की 'मला असे म्हणायचेच नव्हते असा कांगावा करायचा.
ही फार जुनी मोडस ऑपरंडी आहे या इको सिस्टिमची.
17 Oct 2020 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्याची परिस्थिती पाहता, लोकांनी या बाजूने सतत लिहिले पाहिजे. म्हणजे, लोकांना नेमकं काय सुरु आहे, ते लक्षात आले पाहिजे.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2020 - 7:34 am | चौकस२१२
लेख रोचक आहे या बद्दल शंका नाही आणि एका जुन्या "बातमी युद्धची" माहिती मिळाली ..
क्युबा हे अमेरिकेच्या उंबरठयावर घुसलेली डोकेदुखी आहे पूर्वीपासून ... त्याबद्दल अजून माहिती मिळाली
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
पण आपली हि शेवटची ओळ वाचली आणि खेदाने असे म्हणावेसे वाटते कि याचा रोख तोच आहे जो सकाळ सारख्या माध्यमातून श्र्रीअम पवारांसारखे थथाकथित "स्वतंत्र" पत्रकार करतात जो रतीब घालतात तोच ...
काह्ही करा पण अधून मधून हे छापून आणा "भारतात कशी एकाधिकारशाही चालू आहे बातमी देण्याचे स्वत्रंत नाही राहिले .. वैगरे ..."
आपण खालील गोष्टीत जर केल्यात तर मग खरंच म्हणता येईल कि लेखक दोन्ही बाजू विचार करून लिहितो
- निनाद यांनी पुढे दाखवले तसे समाजवादी / कम्युनिस्ट राज्यकारणांनी भांडवलशानसारखेच जे काही चुकीचे जगात केले ते हि उघडकीला येउद्यात त्यावर लिहा
- भारतात जर खरंच "बातम्यांचे विषारी गुलाबजाम वाटले जात" असतील तर ते काय फक्त एकच बाजू वाटते? शेखर गुप्ता, सरदेसाई बरखा इत्यादी ग्यांग काय समतोल पणाचे अमृत वाटत असतात का? अधःपाव अधःपाव प्रत्येकी !
- संपूर्ण लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून आलेल्या आपल्याला ना पटणाऱ्या सरकारचे वाभाडे काढणाऱ्यांनी आणीबाणी लादणारी "भारतमाता आणि तिचे सुपुत्र पिढ्यान पिढ्या चालतातात ! तेवहा नवहते गुलाबजाम वाटले जात ?
उगाच काहीतरी एकांगी
15 Oct 2020 - 7:52 am | शा वि कु
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये, कम्युनिझम निष्पाप आहे असा कोणताही दावा केला नाहीये, किंबहुना कोणत्याच एका विचारधारेवर टिका केली नाही. अशा वेळेस कम्युनिष्ठांचे नाव काढणे ही शुद्ध व्हॉटअबाउटरी आहे (असे माझे मत.)
15 Oct 2020 - 8:00 am | चौकस२१२
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये,
नाही? मग सध्या असे गुलाबजाम कोण वाटतंय ? हे तरी स्पष्ट कर्ववे , टीव्ही ला ना घाबरता! लेखकाने
ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं ?
सरळ म्हणा ना न संघ परिवार प्रणित विकलेली माध्यमे विषारी गुलाबजाम वाटत आहेत किंवा निदान साम्यवादी राजवटीतील २ उद्धरणे द्यावी "ब्यालंस" म्हणून ! काय ?
15 Oct 2020 - 8:17 am | शा वि कु
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. लेखकाने नाव नाही लिहिले हा त्यांचा मोठेपणा आहे. कॉन्सर्व्हेटिव्ह विचारांचा पत्रकार वेड्यासारखा वागतो आहे असे म्हणल्याने माणूस कम्युनिस्ट होत नसतो.
संघ प्रणित वैगेरे तुमचा मुद्दा आहे, तुम्हाला त्यावर लिहिण्यासारखे वाटत असेल तर लिहु शकता, आणि त्या लेखात या लेखाचा दुवा देऊ शकता.
ब्यालॅन्स चा आग्रह केल्यापेक्षा ज्यावर लिहिले जावे असे वाटत आहे त्यावर आपण लिहावे. इतरांना ह्यावर का नाही लिहिलं आणि त्यावर का नाही लिहिलं विचारणं म्हणजेच व्हॉट अबौट्री.
15 Oct 2020 - 9:06 am | निनाद
अर्णब गोस्वामी तसे करत असेल तर गेली वीस वर्षे नाराजदीप वाटत होता ते काय निराळ्या प्रकारचे विषारी गुलाबजाम होते का?
पहिल्यांदाच या लिबरल्स ना तडाखा मिळाला आहे. त्यांना जश्यास तशी उत्तरे मिळायला लागली आहेत. नाराजदीप आणि त्याची गँग जे खोटे आणि विषारी गुलाबजाम निर्वेध पणे वाटत होते. युट्युबमुळे त्यातले विष उघड करून दाखवले जाऊ लागले आहे. म्हणून तर यांना हे सगळे बंद व्हायला हवे आहे. त्यांची ईको सिस्टिम ढासळायला लागली आहे. म्हणून तर हे विविध मार्गांनी गळे काढत आहेत.
15 Oct 2020 - 9:32 am | शा वि कु
तुम्ही परवाच व्हॉट आबाऊटरी कम्युनिस्ट कावा आहे असे म्हणत होता, तर तुमचा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे असे समजतो. इथे राजदीप आणि बरखा वैगेरे मला विचारून तुम्ही तेच करत आहात. माझी या लोकांबद्दल काय मते आहेत तुम्हाला माहित नाहीयेत, आणि अर्णब गोस्वामी बद्दल बोलायचे असेल तर यांचा निषेध करूनच बोलावे लागेल असे मी मानत नाही. मी अर्णब गोस्वामीला शिव्या घालत असलो, आणि राजदिपचे हायपोथॅटिकली समर्थन करत असतो तरी माझे अर्णब बद्दलचे म्हणणे निराधार होत नाही. अ वाईट आहे म्हणल्यावर ब क ड बद्दल बोलणे यालाच व्हॉट अबौट्री म्हणतात.
(गरज नसली तरीही- तुमची राजदीप बरखा इत्यादी मते बव्हँशी मान्य आहेत. पण मी एखादा शिक्का मारला कि वैचारिक जबाबदारी संपत नाही अश्या मताचा आहे. एखादा माणूस संघी किंवा कम्युनिस्ट असण्याने त्याचे म्हणणे आपसूक चूक किंवा बरोबर होत नाही. त्यामुळे कम्युनिस्ट माणसाची आणि संघी माणसाची हि कम्युनिस्ट किंवा संघी आयडेंटिटी आउट ऑफ कंटेक्सट वर आणू नये, अशा मताचा मी आहे. म्हणजेच, अर्णब असो वा राजदीप. त्यांचे प्रत्येक म्हणणे चूक किंवा बरोबर नसते.)
राजदीप बरखा इत्यादी तुमच्या मते विषारी गुलाबजाम वाटत आहेत, तर हे असे वागणे कोणत्याही सुविचारी माणसाला पटणार नाही.
पण तुम्ही हा लेख केवळ अर्णबच्या गटावर आहे असे समजले. म्हणजेच इतरत्र वाईट गोष्टी दिसत असून लेखक त्यावर बोलत नाही, म्हणजेच लेखक कम्युनिस्ट प्रोपौगंडयांशी सहमत आहे असा तर्क तुम्ही लढवला. जे माझ्या मते अयोग्य आहे. लिबरल, कम्युनिस्ट असे लेबल तुमच्या दृष्टीने "वाईट, मूर्ख, दुष्ट, देशद्रोही" यांच्या समानच आहेत असे वाटले (चुभुद्याघ्या.) आणि ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले.
हा लेख तुम्ही उल्लेखलेल्या "वैट्ट, दुष्ट" पत्रकारांवर आहे असे समजण्याचे तुमच्याकडे पुरेपूर स्वातंत्र्य होते.
15 Oct 2020 - 9:39 am | निनाद
तुम्ही अर्णब गोस्वामी चे नाव घेतले म्हणून मी इतर नावे घेतली. मला सोईस्कर असेल तेव्हा माझा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे आणि राहील.
असा तर्क तुम्ही लढवला. मी सरळ सरळ प्रश्न केला आहे की छुपा साम्यवाद असाच पसरवला जातो का?
मी काय आणि कसा विचार करावा याचे स्वातंत्र्य तरी मला असावे.
15 Oct 2020 - 9:52 am | शा वि कु
तुम्ही हवा तसा विचार करा.
तुम्हाला सोयीस्कर असेल तेव्हा विरोध आहे-
ओकेच. हेच तर मी म्हणत होतो.
वैचारिक स्वातंत्र लेखकाला पण आहे. त्याच्या लेखाला तुम्ही डबकं म्हणत असाल तर ह्या त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचे तुमचे दुर्लक्ष झाले असावे , म्हणूनच मी आठवण करून द्यावी म्हणलं.
(गामा पैलवान यांनी तुमचाच मुद्दा संयतपणे आणि योग्य प्रकारे मांडला आहे असे मला वाटले. त्यासाठी व्हॉट आबाऊटरी करण्याची गरज त्यांना वाटली नाही.)
15 Oct 2020 - 9:45 am | निनाद
ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले.
तुम्ही आनंदाने काय वाईट वाटायचे ते वाईट वाटून घ्या. माझा त्याला आक्षेप नाही! तो तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण अमक्या तमक्याला ढमका फलाणा असे बोलला म्हणून तुम्हाला वाईट वाटले - याची मात्र मौज वाटली.
आता लेखकाने चिखलाच्या डबक्याचा विषय काढला तर चार शिंतोडे येणारच.
त्याने आज आज बेत काय करावा असा विषय घेतला असता तर आज आंबे मिळाले असते! अपना अपना चॉइस है!
15 Oct 2020 - 12:13 pm | चौकस२१२
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. = खरे असले तरी एकांगी लिहिणे
अर्णव आणि राजदीप बरखा हे सगळेच थोडयाफार फरकाने विषारी गुलाबजाम वाटत आहेत = दोन्ही बाजू मांडणे
सध्याची खास करून अर्बन नक्षल लोकांची आवडती पद्धत
- आव आणायचा " सद्य परिस्थितीवर लिहितो म्हणून आणि टीका मात्र एकाच अंगाने करायची
- धर्मावरून राजकारण नको म्हणायचं आणि धर्मावर बेतलेले आरक्षण पुढे करायचे
- भारतातही सगळे अवघड प्रश्न जणू गेल्या सात वर्षात निर्माण झाले असा कांगावा करायचा
- भारतात अल्पसंख्यांक अगदी केवीलवानाय परिस्थितीत आहेत असा जगभर प्रचार करायचा
= सगळा ढोंगीपणा
15 Oct 2020 - 1:13 pm | शा वि कु
अर्णब गोस्वामी बद्दल बोलताना राजदिपचे नाव घेण्याची सक्ती अमान्य.
15 Oct 2020 - 1:30 pm | चौकस२१२
काहो?
निपक्षपणे बघणार लिहणार ना TUMHI?
मग दोघांवर बोला...
15 Oct 2020 - 1:57 pm | शा वि कु
मला हवा त्याबर बोलीन मी, निष्पक्ष असो वा नसो. तुम्ही उलटतपासणी घेण्याचे काय कारण ? राजदीपवर मत दिल्यावरच अर्णव वर मत व्यक्त करायची जबरदस्ती काय लॉजिकवर करत आहात ?
15 Oct 2020 - 9:14 am | एस.बी
प्रिय चौकस जी..
मी माझ्या लेखात अर्णब चा उल्लेख विशेष केला नाही किंवा इतर कोणत्याही कोणाचे नाव घेऊन हे पहा किती चांगलं वार्तांकन करतात आणि नाहीतर (तुम्ही म्हणता तसं संघाची माध्यम ) हे पहा किती वाईट वार्तांकन करतात अशी गटबाजी करणारी तुलना मुद्दाम केली नाही..
या उलट लेखा मध्ये दोन माध्यमांची स्पर्धा जी की त्यांच्या वैयक्तिक उद्देशाने प्रेरित झाली होती त्याच्या दावणीला कशी जनता सरसकट बांधली गेली आणि शासनाला पण मग कृत्रिमरीत्या निर्मित जनप्रक्षोभाला शांत करण्यासाठी कसे युद्धजन्य परिस्थिती मध्ये जावे लागले हे सांगणे एवढंच अपेक्षित होते..
त्याच मुळे मी माध्यमांची ही काही हातघाई सुरू आहे त्यात नाव घेऊन एकाची बाजू घेणे टाळले..पण आपण सोयीस्करपणे माझा लेख म्हणजे फक्त आणि फक्त एका व्यक्ती, किंवा पक्षा चा विरोधात आहे असा समजून वाचलात
माझा हेतू माध्यमांना वाईट ठरवणं हा बिलकुल नसून त्यांच्या स्पर्धेला बळी जाणाऱ्या नागरिकांनी गटबाजी करून एकमेकात हेवेदावे करणे,आणि वादविवाद करणे...एकमेकावर दोषारोप करणे की तू अमुक अमुक गटाचा आहेस म्हणून असे बोलतोस असे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष बनून आपल्या नागरिकत्वाची निष्पक्ष परिक्षकाची भूमिका सोडण्याबाबत व्यक्त होणे एवढाच आहे .
आता ह्या स्पर्धेचा परिणाम नाहीतर अजून काय म्हणायचं ..??
की तुम्ही सरळ सरळ मला संघ माध्यम विरोधी, अर्णब विरोधी लिखाण करणारे ठरवून मोकळे झालात आणि इतरांची नावे का नाही घेतलीत याचा जाब विचारू लागले!!
15 Oct 2020 - 10:18 am | चौकस२१२
एस.बी
अहो मग करा ना तुलना.. अर्णव येडे पण करत आहे तर बोला तसे.. मोकळे आहात बोलायला .. पण त्याचा बरोबर द quint/ वागले वैगरे किती एकांगी गरळ ओकतात हे हि लिहा
"सद्य परिस्थिती" वर लिहिताय ना मग दोन्ही बाजू मांडा .. एवढेच म्हणणे होते
आपण पोटतिडकीने लिहिले आहेत हे कळतंय .. पण जर समतोल नसेल तर मग विकले गेलेल्या माध्यमात आणि आपलय सारख्या प्रांजळ पणे लिहिणाऱ्या लेखात फरक तो काय ?
विषाचे गुलाब जाम/ देशभक्तीची अफू / माध्यमाची गळचेपी वगैरे जणू आज जन्माला आले असे भासवणारे लेख आले तर प्रतिक्रिया पण तशीच येणार ना ?
असो
खुलासा( अर्णव जे गुराढोरांवर ओरडावे तसा ओरडतो हे लांशांदस्पद आहे आणि त्यामानाने शेखर गुप्ता सारखे जास्त शोभनाराय पद्धतीने आपलं मुद्दा मांडतात हे मला हि मान्य आहे )
17 Oct 2020 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, येथील दोनचार आयडी भक्तांकडे दुर्लक्ष करुन लिहित राहा तुम्ही. मिपाच्या भाषेत फाट्यावर मारणे म्हणतात. हे गोदीभक्त चांगलं काहीही लिहू देत नाही.
लेखन आवडले लिहिते राहा शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
15 Oct 2020 - 9:23 am | एस.बी
आता हेच बघा सदर लेखाचा विषय काय होता..
माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच ...
पण आता लेखावर चर्चेचे स्वरूप काय होत आहे बघा
१) लेखक फक्त अर्णव विरोधी का लीहतो?
२) ह्यात इतर माध्यमाची नावे का नाहीत?
३) या पूर्वी असे प्रकार घडले तेंव्हा का नाही बोललात?
४) लेखक एका विशिष्ट समूहाचा द्वेष करणारे आहेत का??
थोड्याच वेळात ह्या चर्चेत
१) राहुल
२) शेठ
३) पप्पू
४) जमाई सरकार
५) ७० वर्षे
६) ५६ इंच
असे शब्द पुन्हा पुन्हा आढळू लागले तर मला आश्चर्य बिलकुल वाटणार नाही!!!
15 Oct 2020 - 9:49 am | निनाद
माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच याच्याशी सुसंगत प्रतिसाद दिला आहे. नोव्होस्टी ने भारतीय शासन आणि नागरिकांवर प्रभाव कसा पाडला याचे उदाहरण दिले आहे.
15 Oct 2020 - 9:28 am | मराठी_माणूस
जो पर्यंत सामान्य माणसाला स्वत: चे हीत कशात आहे ते समजत नाही तो पर्यंत असेच चालेल.
(उदा: एका अभिनेत्याचे आत्महत्या प्रकरण. सध्याचे महत्वाचे मुद्दे सोडुन लोक हे प्रकरण चघळत बसलेत)
15 Oct 2020 - 9:35 am | सुबोध खरे
दूरदर्शनवर काय आरडा ओरडा चालू आहे किंवा कोणति आत्महत्या चघळली जात आहे
याचे सामान्य माणसाला फार काही पडलेले असते असे वाटत नाही.
बाकी महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणतेच सरकार काही करत नाही
सामान्य माणसाला आपले रोजचे जीवन कोण जास्त सुसह्य करेल त्याला मत देणे एवढे सोडून काही फरक पडत नाही.
15 Oct 2020 - 9:48 am | मराठी_माणूस
त्या चर्चा सामान्य माणुसच अहीमहीकेने करताना दिसतो
15 Oct 2020 - 9:58 am | सुबोध खरे
त्या चर्चा सामान्य माणूस च्यूईंग गम सारख्या चघळतो आणि स्वाद संपला कि थुंकून टाकतो.
सुशांत राजपूत झाला, कंगना राणावतचा बंगला पाडून झाला हाथरस झालं, आता आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्री यातील खडा जंगी झाली,
अर्णब गोस्वामी वि. परमबीर सिंघ झालं.
यानंतर आरे ची मेट्रो कारशेड झाली. जलयुक्त शिवार झालं.
आता अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारं नुकसान आणि बळीराजा हे नित्य नियमाने येणारं यशस्वी च्युईंग गम घेतलं जाईल चघळायला.
यातल्या एका तरी प्रकरणाची तड लावली गेली आहे का?
च्युईंग गमचं पाकीट आणून च्युईंग गम चघळत राहायचं स्वाद संपला कि थुकून टाकायचं.
आणि पाकीट संपलं कि नवीन आणायचं
15 Oct 2020 - 11:04 am | एस.बी
एकदम मान्य सुबोध जी!!
सामान्य माणसाला रोजची भाकरीची लढाई करायची असते ...
त्या मुळे चुईंग गम चघळून पोट भरत नाही हे सत्य उमगले की चुईंग गम फेकून पुन्हा भाकरीचा पाठलाग सुरू होतो दरवेळी!!
15 Oct 2020 - 10:20 am | वामन देशमुख
मूळ घटनेतील माध्यमांची नावे लेखकाने स्पष्टपणे उल्लेखिली आहेत.
पण या घटनेचा सध्याच्या भारताशी संबंध लावताना -
या घटनेतील / घटनाक्रमातील माध्यमांची नावे उल्लेखण्यास - लेखक विसरला आहे / अनावधानाने राहून गेले आहे/ प्रयोजन नव्हते / टाळले आहे / सोयीस्कर बगल दिली आहे / अजून कोणत्या कारणाने नावे आलेली नाहीत.
हरकत नाही.
आता एका प्रतिसादात धागा लेखकाने, विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या माध्यमांची नावे स्पष्टपणे उल्लेखावित.
तसेच सध्या म्हणजे किती काळापासून हेही स्पष्ट करावे.
वाद संपुष्टात आणण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, नाही का?
सकारात्मक + माहितीपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला
15 Oct 2020 - 11:01 am | एस.बी
वामन जी
मी त्या अमेरिकन माध्यमाची नावे स्पष्ट पणे घेतली कारण त्यांच्या कृती आणि स्पर्धा यांचा अंतिम परिणाम युद्ध मध्ये झाल्याने त्यांचावर आपण थेट संबंध जोडून चर्चा करू शकतो
या उलट भारतीय संबंधात बोलताना सदर प्रक्रिया जवळपास सारख्याच प्रमाणात सुरू आहे एवढंच मला म्हणायचं आहे..आणि भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे कारण ती प्रक्रिया अजून गतिमान आहे तर अशा परिस्थितीत उगाच ह्याची त्याची नावे मांडून हे चांगले आणि ते वाईट असा न्याय निवाडा करणे मला योग्य वाटले नाही म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही.
15 Oct 2020 - 12:20 pm | चौकस२१२
"भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे"
असं म्हणता पण अवॉर्ड वापसी ग्यांग तर म्हणतेय फार परिणाम झालाय// वाट लागलीय.. खास करून हि मंडळी जेव्हा भारताबाहेरील माध्यमांना मुलाखती देतात ना तेवहा "भारतात काय अराजक " माजलाय असंच दाखवतात ...
जाऊदे ...भारतातील पत्रकारितेतील फार थोडे अपवाद सोडले तर सुमार दर्जाची आहे असेच खेदाने म्हणावे लागते ... एकावेळी ८ जण "पॅनल " वर घेऊन काय आरडा ओरडा चालू असतो... हे राम...
एस बी क्षमा करा परंतु आपण प्रश्नाला बगल देताय...
15 Oct 2020 - 12:56 pm | एस.बी
अहो वामन जी
अवॉर्ड वापसी वाट्टेल ते म्हणते ..आणि सरकार च समर्थन करणारे गट पण वाट्टेल ते बोलून आपलाच ढोल बडवत बसतात...
अवॉर्ड वापसी गॅंग आपल्याला सोयीस्कर असा प्रक्रियेचा अर्थ लावून भारतीय पत्रकारितेवर नामउल्लेख करून दोषारोप करत असतील ...पण माझ्या मते पत्रकारिता हे एक असे क्षेत्र आहे की ज्याच काम नजर ठेवणे आहे दृष्टिकोन पुरवणे नाही. ह्या सीमारेषा पुसट होऊन जी अंधाधुंद माजत आहे त्यावर बोलायचे म्हणून लेखात सरसकट सर्वांचा उल्लेख माध्यमे असा केला !पण आता सुरुवातीला कोणी मला अर्णब बद्दल जोडून जाब विचारू पाहिले तर आता तुम्ही अवॉर्ड वापसी सोबत माझा बादरायण संबंध जोडता आहात!!!
15 Oct 2020 - 10:43 am | चौकटराजा
ज्याचा फायदा होत आहे तो वर्ग म्हणतो देश चांगला चालला आहे ! हा वर्ग कोण आहे हे इथे लिहायची गरज नाही ! ज्याचे त्याच्या अपेक्षेपेक्षा वाईट चालले आहे तो म्हणतो हा देश वाईट चालला आहे . आपला देशाच्या प्रगतीत व्यक्तिगत फायदा काय हे प्रथम पाहिले जाते .ते आयडीयोलोजी वगरे सब झूठ नसते पण त्याला ऐकूण महत्व कमी !
15 Oct 2020 - 11:06 am | टर्मीनेटर
प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला आवडत असल्याने लेखातील माहिती ह्यापूर्वीच माझ्या वाचनात आलेली असली तरी हा लेख आवडला! लेखात आपण स्पॅनिश-अमेरिकी युद्धाचे एकच उदाहरण दिल्याने तो थोडा त्रोटक वाटला असेही नमूद करतो.
जानेवारी ते डिसेंबर २०१७ ह्या काळात लोकसत्ता मध्ये श्री. रवी आमले ह्यांचे प्रचारभान नावाचे सदर येत असे, त्यात अशा अनेक गोष्टींची रोचक माहिती त्यांनी दिली आहे. त्या लेखांचे संकलन करून ‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.
वरती एका प्रतिसादात आपण लिहिले आहे कि,
त्यामुळे ह्या विषयात रस असलेल्या आपल्या सारख्या लेखक आणि इतर वाचकांना वरील माहिती उपयोगी पडू शकेल असे वाटल्याने ती दिली आहे. अर्थात तटस्थपणे रवी आमले ह्यांचे लेखन वाचताना त्यांच्यावर असलेला लोकसत्ता दैनिकाच्या अजेंड्याचा दबाव स्पष्टपणे जाणवत असला तरी ते सदर खूप माहितीपूर्ण आहे!
धन्यवाद.
15 Oct 2020 - 11:25 am | एस.बी
आभारी आहे आपला..लवकर च पुस्तक ऑर्डर करेल
15 Oct 2020 - 11:32 am | टर्मीनेटर
पुस्तक ऑर्डर करायचे की नाही ते 'प्रचारभान' हे सदर ऑनलाइन वाचून मग ठरवू शकता 😀
सर्व लेख येथे उपलब्ध आहेत
15 Oct 2020 - 11:15 am | Rajesh188
भारतीय लोकांना पाकिस्तानी जनतेचा भयंकर राग येतो आणि पाकिस्तानी पण भारतीय नागरिकांचा तीव्र द्वेष करतात.
हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली.
उच्च जाती आणि कनिष्ठ जाती एकमेकांविषयी चांगला विचार च करू शकत नाहीत म्हणून आमच्याच जातीचा लोकप्रतिनिधी असावा ,अधिकारी असावा
ही मानसिकता कधी निर्माण झाली.
चांगल्या सवयी सोडून लोक फास्ट फूड च्या नादाला का लागली.
दुसरा गट आपल्यावर अन्याय करतोय ही मानसिकता कशी निर्माण झाली.
ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे.
मध्याम स्वतः अजेंडा तयार करतात .का
तर ह्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे.
लबाड,ढोंगी,दृष्ट विचाराची लोक अजेंडा तयार करून मीडिया मार्फत लोकांमध्ये राबवतात आणि हा अजेंडा हा वाईट हेतू नीच पसरवला जातो.
त्या मुळे अर्णव ,आणि बरखा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ह्या मध्ये हा चांगला हा वाईट असा कोणी नाही .
दोघे ही वाईटच आहेत.त्यांच्या मुळे कोणत्याच समाजाचे भले होणार नाही,देशाचे भले होणार नाही.
मुळात अजेंडा हा वाईट घडावे ,नुकसान व्हावे म्हणूनच चालवला जातो.
विषेरी झाडाला फळ ही विषारी च येणार.
15 Oct 2020 - 12:39 pm | चौकस२१२
हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली.
ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे.
अजिबात असहमत ...या दोन धर्मांमध्ये असलेली तेढ हि केवळ राजकारणी किंवा माध्यम यांचयामुळे असे ढकलून मूळ प्रश्न लपविला जातो
- विविध देशातील मुस्लमानन बरोबर वेळ घालवल्यानंतर १-२ गोष्टी लक्षात आल्या त्यावरून लिहितोय ( यात मी नोकरी हि मुसलमानांकडे केलीय आणि माझा भाडेकरू हि मुसलमान होता )
१) धर्म आणि देश हा प्रश्न आला कि जेवढया सहजतेने बरेच हिंदू "देश आधी" असे म्हण्याला तयार असतात तेवढे कितीतरी मुसलमान नसतात किंवा टाळतात
२) जेथे राहतो तिथे खाणे पिणे यात समरसून जाताना हिंदूंना फारशी अडचण येत नाही , मुसलमानांना येताना दिसते आणि याला कारण फक्त धर्म
३) इस्लाम फोफावला तो आक्रमकतेने ,, ख्रिस्ती धर्म हि फोफावला पण आज भारतीय हिंदूंचायत आणि मुसलमानातच का जास्त भांडणे ? त्यामानाने हिंदू आणि ख्रिस्ती लोकान्चायत कमी दिसतात का? हिंदू जर हलकट असतील तर आधी ख्रिस्ती मग बुद्ध आणि मग पारशी यांना वाटेला लावतील ना ? झालाय तसं? फारसा नाही ना!
कारण हे इतर धर्म इस्लाम एवढे आंधळे वागताना दिसत नाहीत म्हणून
४) वरील प्रश्न थोडयाफार फरकाने इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये पण दिसतात ( मियांमार ) त्यामुळे एकटे हिंदूच मुस्ल्माननचं विषयी मनात अढी धरून आहेत हे विधान खोटे पडते
५) जगभरचे ओझे वाहने ( इराकी मुसलमान भाडेकरू मला सांगायला लागला कि भारतात मुसलमानाची वाईट परिस्थिती वैगरे मी त्याला म्हणाला अरे भारतात कितीतरी इराकी बसतील तेवढे मुसलमान आहेत ,, आला सध्याचा सरकार आणि झाला का त्यांचा ऑश्वित्झ कॅम्प ? " किंवा भारतातील मुसलमान जयने माझेकडून घर खरेदी केले त्याची मखलाशी कि इसिस कसे तसे वाईट नाही ...! ( काही वर्षांपूर्वी)
तेव्हा हा गुलाबी चष्मा जरा बाजूला ठेवावा.. आणि बघावे अवती भवती... त्यासाठी चड्डीवाला संघी होण्याची काहीच जरुरी नाही
मूळ प्रश्न हाच आहे कि कोणत्याही मुसलमानाला विचार कि धर्म आधी कि देश/ लोकशाही?
.. मेख तिथेच आहे , इंग्रजीत म्हणतात तसे "मिलियन डॉलर QUESTION "
15 Oct 2020 - 3:11 pm | बाप्पू
प्रत्येक वाक्याशी सहमत.
पण असं काही प्रॅक्टिकल बोललं कि लगेच आपण कसे दुष्ट, असहिष्णू आणि चड्डीवाले म्हणून हिणवणतात..
15 Oct 2020 - 11:10 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
मी या संदेशाशी पूर्णपणे सहमत आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2020 - 4:34 pm | Rajesh188
समाजातील विविध घटकांनी एकमेकाला दोषी ठरवून एकमेकाच्या विरूद्ध विचार व्यक्त करायची काही गरज नाही.
देश हित,राज्य हित आणि आपले स्वतःचे हित अबाधित ठेवायचे असेल तर कोणत्याच उन्माद निर्माण करणाऱ्या,द्वेष निर्माण करणाऱ्या प्रचाराला सामान्य लोकांनी बळी पडू नये.
बळी पडला तर अशा गोष्टींचा शेवट शेवटी सामान्य लोकांचा बळी जाण्यातच होतो.
जगात अनेक जिवंत उदाहरणे अस्तित्वात असताना परत आपण त्याच चुका करत असू तर भवितव्य नक्कीच अवघड आहे.
15 Oct 2020 - 5:28 pm | चौकस२१२
राजेश भाऊ मी अनुभवातून बोललो .. अजून पण उद्धरणे या समाजाची मी आधी दिली आहेत ... ती हवे तर खोदून काढा किंवा तुमची उद्धरे द्या
अजून एक उद्धरण आहहेत आणि मी आधी हि दिली आहेत ( अफगाणी मुसलमानाने माझे शाकाहारी जेवण पण नाकारणे , सांगलीतलंय तरुण मुसलमानाचे अचानक कडवे धार्मिक बनणं इत्यादी )
माझा भाडेकरू हेंद्राबादी मुसलमान आणि त्याची बायको
येथे बरेचदा प्रत्यक्ष भाडेकरूला भेटावे सुद्धा लागत नाही महिनोन महिने तरी काही कारणाने एकदा भेटलो .. त्याने चहा विचारला आणि सोबत खजूर खाणार का म्हणून विचारले.. म्हणले हो चालेल .. समोर आले ते लांबुडकाय गुलाबजाम / किंवा बिस्कीट सारखे... छान होते पण मला कळले नाही कि याला तो खजूर का म्हणतोय...
मी धूर्तपणे विचारून त्याच्याकडून काढून घेतले
अरबस्तानातील खजूर चांगले + आपण मुसलमान + म्हणून जणू आपण बनवणाऱ्या मिठाईला अरबस्तानाची आठवण म्हणून खजूर नाव!
हे म्हणजे कसे झाले माहिती का , पाकिस्तानी लोक स्वतःला उगाचच अरबी वंशाचे समजतात ( हे मी म्हणत नाही अनेक विद्यमान मुस्लिम सुद्धा हि टीका करतात ताहीर गोरा यांचे भाष्य पहा )
म्हणजे काय तर वहाबी इस्लाम कसा नसानसात पसरेल याचे हे उदाहरण...
उगाच आपलं सगळं कस आलबेल आहे असे समजू नका .. अब्राहमीक धर्मांचा सरळ जग भर प्रसाराचा कार्यक्रम आहे . त्यात भरकटलेला समाजवादी+ कम्युनिस्ट खात घालायला . आपण वेन्धले पण करून आपण नाहीसे होऊ एकदिवस ... मग बस तुम्ही आपल्या
अहो धर्मांध पणा कोणालाच नकोय हो .. प्रत्येक हिंदू काही संघी नाही कि त्याला हिंदुराष्ट्र्र हि नकोय पण या चापलुसी चा आता जाम कंटाळा आणि उबग आलाय ..मग ती चहा ची जाहिरात असो नाहीतर बोटचेपी धोरणे असोत ... एकवेळ ओवेसी परवडला त्याच्याशी दोन हात तरी करता येतात पण कान्हया नको . एकवेळ काँग्रेस परवडली पण हे शॅम्पेन पिट सामाजिक न्याय बोलणारे भडभुंजे समाजवादी नकोत ( अरुंधती रॉय, प्रयाग राज इत्यादी )
15 Oct 2020 - 6:45 pm | Rajesh188
असे समजले तरी .
जो धर्म देशापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ मानतो,त्याची निष्ठा देशाशी नसून धर्माशी आहेत.
पर धर्मीय लोकांना नष्ट करणे ही त्या धर्माची शिकवण आहे .
हे सर्व च्या सर्व खरे आहे असे मानले .
तरी त्या धर्माच्या लोकाचा द्वेष करून,त्यांच्या वर मीडिया मधून टीका करून,त्यांना मारझोड करून हा प्रश्न सुटेल का.
तर नाही.
त्या साठी देशातील वातावरण शांत हवे,आर्थिक विकास सर्व स्तरावर हवा.
मीडिया नी फक्त बातम्याच द्याव्यात न्यायाधीश बनू नये.
उत्तम दर्जाचे सरकार ,आणि सर्वोत्तम प्रशासन देशात स्थापित झाले की तुम्ही म्हणता त्या वर आरामात नियंत्रण ठेवता येईल.
त्यांना कायद्या नी राहण्यास भाग पाडता येईल.
त्यांच्याच समाजातील लोक मदतीचा हात पुढे करतील.
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
16 Oct 2020 - 5:47 am | चौकस२१२
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
हो बरोबर अहो कोणाला वेळ आहे द्वेष करण्यात...आणि इच्छा
पण हि नाराजी का आहे हे तपासून पाहण्याचा मोकळे पण तरी दाखवा हो.. हिंदूंना साहिशुनतेचा सल्ला देण्या पेक्षा
संघ गेला खड्यात , भाजप गेलं खड्यात, मी गाय खाणारा, देवळात फारसा ना जाणारा केवळ जन्माने हिंदू आहे तरी मला या मुसलमानांच्या असल्या वागण्याचा प्रथम कंटाळा मग उबग आणि मग राग येतो ते का? कधी विचार केलाय तुमच्यासारख्यांनी आणि हे सर्व आधी लिहिल्याप्रमाणे जगातील भारतासह २ /३ देशातील वर्तणूक पाहून मग लिहीत आहे तेव्हा मुद्य्यांचा बोला .. उगा लोकांनी शांत राहावे भडकू नये वैग्रे गप्पा खूप झाल्या ..
आणि जातीबद्दल बोलताय तर हे हि लक्षात ठेवा कि इसिस ( विचाराने) नाग्या तलवारी घेऊन आल्यावर तो काय हे बघणार आहे कि तुम्ही जोशी कि पाटील कि कांबळे ? तुम्ही आम्ही काफीरच ... जगाच्या अंतापर्यंत
16 Oct 2020 - 3:37 pm | शाम भागवत
✓
धृविकरण कसे होते याचा उत्तम नमूना.
हेच काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्टांना अजून समजलेले नाही. भाजपाला विरोध करण्याची तीच जुनी पध्दत अवलंबणे अजूनही चालू आहे. यातून भाजप दिवसेंदिवस बळकटच होत चालला आहे.
ज्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही अशी लोकं भाजपाकडे वळवण्यात या लोकांचा मोठा हात आहे. मुख्य म्हणजे अशा नव्या लोकांना संघी / भक्त म्हणून हिणवल्यामुळे तर ही नवीन लोकं जाम चिडतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकंपण (जी नेहमी राजकारणापासून चार हात लांब राहतात) भाजपकडे वळायला लागतात.
पण काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्ट अजूनही आपले जुने व बोथट झालेले हत्यार बदलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाला जोरदार विरोध केल्याचे मानसिक समाधान मिळते. मते मिळत नाहीत असे दिसून येतंय.
मतदान टक्केवारीच्या अभ्यासात तरत्या मतदारांना खूप महत्व दिले जाते. हे तरते मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे ढकलले जात आहेत. त्यांनाही "काँग्रेस + समाजवादी + पुरोगामी + कम्युनिस्ट" यांना कोणताही पर्याय न मिळाल्याने भाजपाला मत देण्याशिवाय पर्याय राहात नाही.
असो. चालायचेच. इश्वरेच्छा बलियसी.
😀
15 Oct 2020 - 6:46 pm | बाप्पू
मुस्लिम ब्रॉदरहूड या संकल्पनेत सर्व गोष्टींची उत्तरे दडलीयेत. जिथे राहतोय त्यापेक्षा इतर इस्लामिक जगात काय चालल्ये त्याकडे बारीक लक्ष.
उदा. स्वातंत्र्य पूर्व काळात गांधीजींनी दिलेल्या खलिफा आंदोलनास दिलेला पाठिंबा आठवा.
प्रश्न होता तुर्कस्थान मधला आणि इथले मुस्लिम लोकं ( ज्यांना त्या सगळ्याने काहीही फरक पडणार नव्हता ) पेटून उठली होती.. आणि गांधीजी सारख्या सेकुलर ( ठो.. ) माणसाने मुस्लिम लोकांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा किंवा त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून खिलाफत आंदोलन दिलेला पाठिंबा..
इस्राईल चा द्वेष भारतीय मुस्लिमांनी करण्याचे काय कारण?? इस्राईल भारतासाठी नेहमीच भरोश्याचा मित्र राहिला आहे मग इस्राईल चे नाव घेतल्यावर भारतीय मुस्लिमांना शिसारी येण्याचे कारण काय?
रोहिंग्या मुस्लिमांना भारतात अवैध रित्या ठेवून घ्या म्हणण्याची प्रवृत्ती.
इथले खाऊन, मोठे होऊन, ISIS साठी लढण्यासाठी इराक कडे जाणे.
काय च्या काय लॉजिक.
अश्या प्रकारचे conflicts फक्त इस्लाम मानणाऱ्या लोकांमध्येच होतात. हेच लोकं माय पेक्षा मावशी आणि शेजारीण यांची जास्त काळजी करताना दिसतात. त्यामध्ये अशिक्षित, सुशिक्षित, श्रीमंत, गरीब असं काहीच नाहीये.. अपवाद आहेत पण फारच कमी आहेत.
ह्या गोष्टी बरेचसे लोकं दुर्लक्ष करतात का तर म्हणे हे सगळे नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी चालवलेल्या गोष्टी आहेत. पण हे इतके सोपे नाही. थोडा जनसंपर्क वाढवा. गुळगुळीत आणि गोड गोड वाक्यांनी टाळ्या मिळतात, वस्तुस्थिती झाकली जात नसते.
15 Oct 2020 - 7:27 pm | Rajesh188
आणि कसले हिंदू मुस्लिम,दलित,ब्राह्मण करत बसलाय.
देशाची अर्थ व्यवस्था गाळात गेली आहे
प्रशासन काय लायकीचे आहे ते सांगण्याची गरज नाही.
न्याय व्यवस्था चा दर्जा खालावत चालला आहे तिथे न्याय मिळेल ह्याची खात्री नाही.
न्यायाधीश पण पण कायद्या ला फाट्यावर मारून स्वतःची मत वापरून न्यायदान करत आहेत.
जगातील सर्वात जास्त गरीब भारतात राहतात.
ही स्थिती पाहिली सुधारणे गरजेचे आहे.
हिंदू ,मुस्लिम,दलित,अमका ह्या असल्या फालतू गोष्टीत ताकत वाया घालवण्यात काही अर्थ नाही.
15 Oct 2020 - 7:56 pm | बाप्पू
अराजक?? बाप रे??
ते आणि कधीपासून माजलेय? गेल्या 4-5 वर्ष्यापासून का??
बाकी प्रश्नाला आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांना छान बगल देता तुम्ही..
बॉडी मध्ये कँसर डेव्हलोप होत असताना सर्दी खोकला आणि डोकेदुखी कडे लक्ष देण्यासारखं झाले..
कँसर चा पहिल्यांदा काही डायरेक्ट त्रास होत नाही त्यामुळे त्याच्यासमोर इतर दुखणी मोठी मानून त्यांच्यात गुंग होऊन जाणे सोपे आहे.. पण नंतर पुढच्या स्टेज ला गेल्यावर कँसर एकतर अवयव तरी घेऊन जातो किंवा संपूर्ण शरीर (जीव )
असो चालुद्या..
15 Oct 2020 - 8:42 pm | Rajesh188
एकच धर्म असलेली राष्ट्र फक्त उन्माद मुळे बुडाली.
त्याचे सर्वात ठळक उदाहरण पाकिस्तान.
मुस्लिम राष्ट्र आज त्यांची काय अवस्था आहे.
उर्दू भाषिक मुस्लिम,हिंदी भाषिक मुस्लिम, बांगला भाषिक मुस्लिम ह्या उन्माद मध्ये देशोधडीला लागले .
आफ्रिकेतील अनेक राष्ट्र एक धर्मीय आहेत .
बुडाली ती लोकांची अवस्था खराब आहे.
केनिया ,येमेन ETC.
UAE मुस्लिम राष्ट्र पण धर्म घरात ठेवला आज श्रीमंत आहेत.
Abhganisthan एक धर्मीय मुस्लिम राष्ट्र आहे काय आहे त्यांची अवस्था.
भारताने ह्या मार्गाने जावू नये.
फक्त राज्य घटनेणी सांगितल्या प्रमाणे तंतोतंत राज्य कारभार करावा.
आणि फक्त प्रगती करावी.
कायद्याचे च राज्य असावे.
15 Oct 2020 - 9:22 pm | बाप्पू
पूर्ण घासून गुळगुळीत झालेलं आणि अभ्यास न करता केलेलं वाक्य..
अमेरिका, चीन, रशिया, ओमान, सौदी, इस्राईल, जपान, कोरिया, इंग्लंड ही राष्ट्रे पण एकधर्मीय च आहेत. वरवर सेकुलर असली तरीही एकाच धर्माचे अधिपत्य आहे.. पण तरीही विकसित आहेत.
16 Oct 2020 - 7:27 am | आनन्दा
जरा बदलू का?
कट्टर मुस्लिम राष्ट्रे बुडाली आहेत. आणि याचे कारण पण सांगू? माझ्यामते त्याचे मुख्य कारण लोकसंख्या विस्फोट आणि साधनसामग्री ची उपलब्धता, आणि सोबत लष्करी भ्रष्टयाचार हे आहे.
उद्या हिंदू की कितीही कट्टर झाला घरी तो स्वसंरक्षणासाठी होणार, त्यामुळे राष्ट्र बुडायची काळजी नको.. मी तर म्हणतो भीती वाटतेय ना, मग ते सिव्हिल वॉर एकदा होऊनच जाऊदे.. तसेही मारेल मारेल म्हणून भीतीने जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं परवडेल आता.
अवांतर- वयाच्या 17व्या वर्षापर्यंत मी पण निधर्मांध होतो, पण कॉलेजमध्ये वर्गातल्या मुसलमान मुलांनी माझे डोळे उघडले. त्यानंतर मी हिंदुत्ववादी आणि संघी झालो..
16 Oct 2020 - 7:35 am | Gk
काय उजेड पडला ?
16 Oct 2020 - 9:55 am | सुबोध खरे
तुमच्या डोक्यात अंधार आहे, त्याचं काय करायचं?
हजारो वर्षे बाह्य आक्रमणे का झाली? कारण हिंदू भारत समृद्ध होता.
16 Oct 2020 - 1:04 pm | Gk
10000 वर्षे हिंदू राष्ट्र होते , आमचे खापर पणजोबा संपन्न होते तर आमचे रक्षण करणे हे त्यावेळच्या हिंदू राज्यकर्त्यांचे कर्तव्य होते , ते त्यांना नाही जमले तर मी काय बाबराला दोष देत फिरायचे ?
16 Oct 2020 - 1:32 pm | सॅगी
आक्रमण केले ते केले, वर हिंदुंच्या कत्तली केल्या, प्रार्थनास्थळे पाडली, जबरदस्ती धर्मांतर घडवले, तर दोष नाही द्यायचा तर काय गझला गायच्या त्यांच्या नावाच्या?
16 Oct 2020 - 1:47 pm | Gk
त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?
16 Oct 2020 - 1:52 pm | सॅगी
कोणी अडवलंय??
16 Oct 2020 - 6:34 pm | अर्धवटराव
त्याच्या आधि मुख्यत्वे राजे/सैन्य लेव्हलला कापाकापी व्हायची. सामान्य जनतेला फार काहि त्रास व्हायचा नाहि.
16 Oct 2020 - 6:44 pm | Gk
युद्धाचे दुसपरिणाम तर जनतेवरही होणारच की , तसेही राजाकडे चौकीदार होणे ह्यापलीकडे धडधाकट पोरांना दुसरा कोणता जॉब होता ? दोन चार दुकानदार , 12 बलुतेदार आणि दोन चार शेतकरी
उरलेले सगळे अशी ना तशी राजाचीच चाकरी करत होते .
15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवा
16 Oct 2020 - 6:57 pm | अर्धवटराव
युद्धानंतर जनसामान्यांच्या मुंडक्यांचे मिनार उभारणे, सैन्याने धर्माज्ञेने जनतेची लुटालुट करणे, ग्रंथालयं/विद्यापिठं उद्धस्त करणे, धार्मीक स्थळांचा / कलाकृतींचा विध्वंस करणे... असले प्रकार फारसे नव्हते... अपवादाने होतही असतील. असु द्या. तसंही हा भाग समजुन घेण्याचा नसुन समजुन घेतेलेले पण मान्य न करण्याचा आहे.
बरोबर. आणि तो १० मार्कांचा इतिहास कम्युनीस्ट मंडळींनीच शिकवावा, असाही नियम करायला हवा.
16 Oct 2020 - 11:13 am | बाप्पू
सांगतो ना..
अफगाणिस्तान गेला, ब्रम्हदेश गेला, तिबेट गेला, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, काश्मीर गेले.. आणि आता जी चिटोरी राहिल्ये त्याला देखील आम्ही भारत म्हणतो.. हिंदुराष्ट्र नव्हे..
हाच उजेड पडला. आमच्या आजवरच्या सहिष्णू पणाचा नेमका हाच उजेड पडला.
आजही फेक्युलर पणाचा चष्मा इथे अनेक लोकं लावून बसल्येत.. असच चालू राहील तर अजुन काही शे वर्षांनी जेवढा तुकडा राहिलाय तेवढाही राहणार नाही.
इस्लामिक लोकांनी भारत सोडावा, किंवा त्यांना हाकलावे असे मला मुळीच म्हणायचं नाही. पण समोर एका विशिष्ट वर्गात नालायक आणि कृतघ्न प्रवृत्ती वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फेक्युलॅरिज्म चा चष्मा लावून निवांत बसणे मला पटत नाही. जे चूक आहे ते आहे ते बोलण्यात कसली लाज..
16 Oct 2020 - 1:51 pm | Gk
मुसलमानांनी अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश नेले
नेपाळ , भूतान , तिबेट , ब्रह्मदेश , श्रीलंका , थायलंड , इंडोनेशिया , मालदीव हे तुकडे तुमचे तुम्हीच पाडून घेतलेत.
16 Oct 2020 - 5:43 pm | Rajesh188
ते जपलच पाहिजे आपले अस्तित्वच हिंदू धर्माशी निगडित आहे .
हिंदू धर्म वाचला तरच आपण वाचू.
मग त्या साठी हिंदू सर्व क्षेत्रात बलवान झाला पाहिजे.
पण तसे घडत आहे का राजकीय पक्ष तसा प्रयत्न करत आहेत का.
मीडिया तसा प्रयत्न करत आहे का.
तर नाही असे दुःख नी म्हणवसे वाटते.
हिंदू ना हात धयाचे सोडून त्यांचे खच्चीकरण कोण पर धर्मीय करत नाहीत.
शेतकरी,कामगार,गरीब वर्ग हे हिंदू नाहीत का.
मग त्यांच्या गरिबी विरूद्ध लढणे हे धर्म बलवान करण्याचा मार्ग नाही का.
फक्त त्यांची डोकी भडकावून दंगलीत किन
15 Oct 2020 - 10:43 pm | Gk
खलिफा आंदोलनास मुसलमानानि पाठिंबा दिला किंवा कुठेतरी चर्चने दुसऱ्या देशातील ख्रिषणास मदत केली तर तुम्हाला का वाईट वाटते ?
तुम्हाला वाईट वाटते कारण तुम्ही जगात एकटेच आहात , दुसरी हिंदू राष्ट्रे जगात नाहीत.
16 Oct 2020 - 11:23 am | बाप्पू
कोण म्हणाले कि जगात इतरत्र हिंदू लोकं नाहीत?? हा संस्काराचा फरक आहे,
हिंदू लोकं जिथे जातात तिथे समरस होऊन जातात. त्या मातीशी एकनिष्ठ राहतात. मन एकीकडे आणि शरीर एकीकडे असे नाही. नेपाळ मध्ये हिंदू आहेत पण तिथले नेमके राजकारण, राज्यकर्ते, राहणीमान, अडचणी याबाबत भारतीय हिंदू कधी टेन्शन घेत नाही. पण भारतात राहणारा अर्धशिक्षित मुसलमान सौदी, ओमान, इराक , इराण, पॅलेस्टिन इ इ बद्दल जास्त विचार करत बसतो. प्रसंगी तिकडच्या जातभाईंच्या हितासाठी मातृभूमी वरील संकटे, प्रश्न आणि जबाबदाऱ्या यांना बगल देतो. आपण इथे उपरे आहोत आपले मूळ कुठेतरी वाळवंटात निर्माण झालेल्या संस्कृतीत आहे हे अगदी लहान सहन गोष्टीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. ( इडेन्टिटी क्रायसिस ). या असल्या थिल्लरपणामुळंच खिलाफत चळवळ उभी राहिली ज्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काही एक संबंध नव्हता. त्यामुळे महात्मा ( :D ) गांधींनी फक्त आपला फेक्युलर पणा दाखवण्याच्या नादात मुस्लिमांना याबाबत समर्थन दिले..
16 Oct 2020 - 1:02 pm | Gk
कायच्या काय
खिलाफतला पाठिंबा दिला म्हणजे इथे कुणाचा खून केला की काय ?
मीही तेच लिहिले की बाहेर तुमचे फारसे कुणी नाही , दुसरे हिंदू राष्ट्र नाही , त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कुणाशी देणे घेणे नाही
मुस्लिम , ख्रिश्चन जगात 30 व 35 % आहेत , त्यामुळे इंटर एक्शन होणे स्वाभाविक आहे
देशद्रोही इंटर एक्शन असतील तर ते देशाचे गृह , संरक्षण खाते , मोदी , शहा घेतात बघून
आणि ती खिलाफत , तो खलिफा , गांधी सगळे कधीच वर निघून गेलेत
16 Oct 2020 - 7:05 pm | सुबोध खरे
इतिहासात अतिरिक्त गुण ( grace marks) देऊन पास केलंय का तुम्हाला?
खिलाफत आणि मोपल्यांचं बंड वाचलं नाही का?
https://www.oocities.org/hindoo_humanist/mopla.html
https://www.rediff.com/news/2003/may/09rajeev.htm
16 Oct 2020 - 8:59 pm | Gk
https://www.news18.com/news/india/yogi-govt-allocates-rs-479-crore-for-m...
योगीजिनी मदर्शयाना 500 कोटी दिले , 2020-21 साठी
हे काय इतिहासाचे होनररी स्टुडंट होते वाटतं
17 Oct 2020 - 11:29 am | सुबोध खरे
a provision of Rs 459 crore was made for modernisation of Arabic-Persian madrasas.
ते अलिफ बे ते से करण्यासाठी नव्हे तर आधुनिक शिक्षणासाठी दिले आहेत.
दिले तरी नाराज, नाही दिले तरी नाराज
रडक्या लोकांचे आयुष्य च रडारड करण्यात्त जातंय
16 Oct 2020 - 3:53 am | निनाद
हे ऐका - सबव्हर्जन कसे केले जाते त्याचे व्यवस्थित विवेचन
व्हिडियो मोठा आहे पण कोणत्याही मिडियाच्या अभ्यासकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
15 Oct 2020 - 4:54 pm | कपिलमुनी
पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय.
आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणार
डु आय डी ने प्रतिसाद देणे चालू केले आहे.
@एस.बी-- हाही अनुभव घेउन बघा , बाकी लेख आवडला .
15 Oct 2020 - 5:31 pm | चौकस२१२
झोबले? छे उलट .. तुमच्यासारख्या विचारसरणीचा भंपक पणा दाखवून दिला.. एवढेच
हा आता बसा तुम्ही ओरडत गॅंग अप वगैरे
15 Oct 2020 - 9:52 pm | कपिलमुनी
निनाद कि चौकस२१२ ?
ह भंपाक , दांभिक पणा झाला कि मग बोलू , तोवर तुमची पातळी नाही, या आता !
16 Oct 2020 - 3:26 am | निनाद
मला बोलावलेत?
मी काय दांभिकपणा केला आहे?
मी तर संदर्भासहीत दुवे दिले आहेत. अर्थात ते वाचले नसावेत असे वाटते. मित्रोखिन प्रकरण वाचले असते असते मेमुना बेगम (केजीबी कोड नेम वानो) यांना नोटांच्या सुटकेसेस कश्या पोहोचवल्या जात आणि तेव्हा मिडिया कसा विकला गेलेला होता ते ही कळेल.
डिस-इन्फॉर्मेशन वापरून भारतीय जनतेला मूर्ख बनवले याणी वर्षानुवर्षे. हा भंपकपणा होता. आता त्याचे बुरखे फाटले म्हणून रडारड आहे.
आज लिबरलांनी काहीहे खोटेपणा केला की तो उघडा पाडणारे लोक युट्युबर आहेत. आणि एक नाही अनेक आहेत.
शाम शर्मा शो पाहा
15 Oct 2020 - 6:20 pm | बाप्पू
.
कपिलमुनी तुमच्या प्रतिसादाकडे पाहून असं वाटतेय कि हे सगळं गेल्या काही वर्षात सुरु झालेय..
परंतु हे लक्षात घ्या हे वर्षानुवर्षे चालू आहे, आणि लेखकाने त्या सगळ्यांच्या बाबत हा लेख लिहिलाय. ... लेखकाने कुठेही अमुक एक व्यक्ती, विचारसरणी यांना टार्गेट केलेलं नाहीये.
खरं सांगायचं तर हे वर्षानुवर्षे चालू आहे मग सत्ता कोणाचीही असो. आपल्या मुलाच्या खोड्या आपल्याला लवकर दिसणार नाहीत त्यासाठी तटस्थ विचार करायला हवा.
भक्त म्हणजे कोण? कोणाचे भक्त? स्पष्ट बोला कि.
सध्या भक्त म्हणल्यावर भाजपेयी किंवा मोदी समर्थक असे समजले जाते.
मग तुम्हालाही तो अर्थ अपेक्षित असेल तर सर्व नॉन भाजपेयी लोकं हे अत्यंत निष्पक्ष तटस्थ, चिखलफेक न करणारे, आणि मेन म्हणजे पेड पत्रकारितेला समर्थन न करणारे आहेत किंवा होते असं म्हणायचंय का??
बिगर bjp सरकार मध्ये सर्व पत्रकारिता आदर्श रित्या चालू होती असं म्हणायचं आहे का??
15 Oct 2020 - 6:57 pm | कपिलमुनी
दुखण काय आहे ?
मि किंवा लेखात कोणीही कसलेहि नाव घेतले नाही .
उगाच उडणारा बाण .........
धन्यवाद
16 Oct 2020 - 3:28 am | निनाद
एकेटिके
पाहा
चांगली उतरवतात हे लोक.
15 Oct 2020 - 9:06 pm | Rajesh188
हिंदू चे भले आणि रक्षण हिंदुत्व वादी पक्ष bjp करेल असा कोणाचा भ्रम असेल तर तो पहिला डोक्यातून काढून टाका.
हिंदू ना आर्थिक बाबतीत कमजोर हिंदुत्व वादी म्हणणारे उद्योगपती आणि त्यांची लाडकी bjp च करत आहे.
हिंदू चे आर्थिक शोषण हिंदू च करत आहेत
कमजोर हिंदू वर अन्याय ,अत्याचार हिंदू च करत आहेत.
शेतकऱ्यांच,,कामगारांचं शोषण मुस्लिम करत नाहीत हिंदू च करत आहेत.
राज सत्तेच्या जोरावर.
हे सत्य नाकारणे मला तरी शक्य नाहीं
15 Oct 2020 - 9:25 pm | बाप्पू
कोण म्हणतेय कि हिंदू चें रक्षण BJP करेल म्हणून?? गेले हजारो वर्षे BJP होती का?? तोदेखील इतर राजकीय पक्षासारखा पक्ष आहे.. त्यामुळे नो कामनेट्स..!!
प्रश्न मानसिकतेचा आहे. समोर दिसणारे सत्य एक नाकारणे आणि फेक्युलरज्म चा चष्मा लावून निवांत बसणे हे षंढ आहे.
निदान सर्वांनी खरे बोलायचे धाडस दाखवले तरी खूप आहे..
16 Oct 2020 - 12:07 pm | चौकस२१२
प्रश्न मानसिकतेचा आहे
+१०० बाप्पू पण ज्यांनी दुर्लक्ष करायचे ठरवलेच आहे त्यांना कितीही सांगून काय उपयोग...
त्यांना हे हि समजत नाही कि भाजपला आता समर्थन देणारा किंवा संधी देऊया असे म्हणणारा प्रत्येक जण काही मनुवादी संघी असावं लागत नाही
उद्या काँग्रेस ने चांगले काम केले तर त्यानं हि हि मत जाऊ शकतात .. सहज
राजेश आणि एस बी सारख्यांना मी किती तरी उद्धरण दिली तरी त्यांना माझ्य सारखेच मुस्लिम द्वेष्टी वाटतात काय बोलायचे !
असो आपण आत्ता एक "टोळीतील" झालो असे इतर म्हणतील !
16 Oct 2020 - 3:29 am | निनाद
भाऊ तोरसेकर पाहा
15 Oct 2020 - 9:45 pm | Gk
https://www.loksatta.com/desh-videsh-news/former-lok-sabha-speaker-meira...
माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुक जवळ आलेली असताना, हा प्रकार घडल्याचं समोर आल्याने काँग्रेस देखील यावरून आक्रमक झाली आहे. शिवाय, मीरा कुमार यांनी स्वतः या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
15 Oct 2020 - 10:50 pm | Rajesh188
कोणतेच पक्ष सत्तेवर नकोत लोकांच्या भावनेशी खेळून त्यांचे शोषण करणे हाच ह्या पक्षांचे उद्दिष्ट आहे.
धार्मिक ,जातीय भावना भडकाून सत्ता मिळवणे हाच हेतू आहे..
लोकांचे भले करणे ,देशाची उन्नती करणे हा हेतू त्यांचा नक्कीच नाही
15 Oct 2020 - 11:24 pm | Rajesh188
त्या पक्षांनी हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबुत बनवावे.
पण तसे घडत नाहीं
म्हणजे हे हिंदू चे कैवारी ढोंगी आहेत.
भारतात हिंदू बहुसंख्य आहे .भारत हा हिंदूचा एकमेव देश आहे मग ह्या देशातील भ्रष्टाचार,नष्ट करणे हे हिंदुत्व वादी पक्षाचे काम आहे .
पण ते हे काम करत नाहीत.
भारत हा हिंदू चा एकमेव देश आहे मग ह्या देशातील गरिबी,अन्याय पूर्ण पने नष्ट करण्याचे काम हिंदुत्व वादी पक्ष करत नाहीत.
मग ते नक्की करतात काय.
तर हिंदू नाच कमजोर करण्याचे काम हे कथित हिंदू वादी पक्ष करत आहेत.
16 Oct 2020 - 1:00 am | गामा पैलवान
निनाद,
लेखात असं कुठेही म्हंटल्याचं दिसून येत नाही. हा लेख छुपा लिबरल असल्याचं तुम्हाला का वाटतं, यामागील कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.
बाकी, लेखकास 'विकृत व्यापारी वृत्ती' म्हणजे 'विधिनिषेध न बाळगता दिसेल त्याचा व्यापार करायची वृत्ती' अभिप्रेत असावी.
आ.न.,
-गा.पै.
16 Oct 2020 - 1:16 am | अर्धवटराव
16 Oct 2020 - 1:18 am | अर्धवटराव
तसं वाटत नाहि. किंबहुना भारतीय जनतेला चिनी आव्हान फार उशीराने दिसायला लागले आहे.
16 Oct 2020 - 7:36 am | आनन्दा
सहमत आहे.
गांपै थोडं विस्कटून सांगतो -
1. यांनी उदाहरण घेतले ते अमेरिकेतील, म्हणजे लिबरल देश.. भारतासारखाच.
2. संदर्भ होता तो युद्ध पेटवण्याचा
3. शेवट देताना उदाहरण दिले ते भारतीय राजकारणात विष पसरवणाऱ्यांचे, म्हणजे आक्रमक पत्रकारिता करणाऱ्यांचे.. त्यात पण शब्द आहे सध्या.. म्हणजे पूर्वी असे चालू नव्हते.
आता,
जतक, ndtv वगैरे प्रस्थापित चॅनेल्स आहेत, आणि त्यांची भाषा पण कायम मवाळ असते, युद्ध नको, परवडणारे नाही वगैरे.
मग आक्रमक पत्रकारिता कोण करतोय?
मिळालं उत्तर?
16 Oct 2020 - 3:50 am | निनाद
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... असे लेखकाचेच वाक्य आहे माझे नाही. ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण
डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते.
त्यांना अभ्यासच करायचा असेल तर त्यांनी सोवियेत डिसिन्फॉर्मेशन कँपेन चा केला पाहिजे. कारण ते खरे डिसेप्शन होते आणि आजही चाललेले आहे.
कुणाला या विषयात रस असेल तर सोवियेत मधून पळालेला नोवोस्टी या प्रोपोगंडा संस्थेचा एक एजंट Yuri Alexandrovich Bezmenov (किंवा थॉमस शुमन) युरी बेझ्मेनोव्ह याच्या मुलाखतीचा केला पाहिजे होता. ही एक तास एकवीस मिनिटांची मुलाखत शांतपणे ऐका.
यामध्ये युरी व्यवस्थित समजावून देतो की लिबरलांचे कार्य कसे चालते. हे किती अवाढव्य मशिनरी यासाठी चालवतात. अगदी विद्यापिठा पासून ते वाहिन्यांपर्यंत यांचीच लोकं भरली जातात. बाकी आवाज दाबून टाकला जातो.
२९ व्या मिनिटाला भारताविषयी पण व्यवस्थित बोलला आहे तो या मुलखतीत.
४२ व्या मिनिटाला तो हे लोक असे खोटे का लिहितात यावर पण बोलतो.
अर्थात अभ्यास करण्यासाठी सगळी मुलाखत जरूर ऐकली पाहिजे.
अभ्यास करायचा नसेल तरी जनमत कसे फिरवले जाते यासाठी ही मुलाखत ऐकली पाहिजे.
सब व्हर्जन नावाची ही पद्धती आहे. प्रत्येक लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणार्याने, पत्रकाराने ही पद्धती अभ्यासली पाहिजे. आपण याचा बळी तर नाही ना हे पाहून घेतले पाहिजे.
गामा जी खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.
16 Oct 2020 - 9:48 am | एस.बी
प्रिय निनाद जी , आणि इतर सर्व ज्यांना असं वाटत की
मला हा लेख अर्णव आणि तत्सम व्यक्तींच्या विरोधात लिहायचा होता..
पुन्हा एकदा लेख वाचा..तुम्हाला कुठेही कोणाची ही नावे ( भारतीय व्यक्तींची ) घेतलेली दिसणार नाहीत कारण
जसं मला अर्णाब बद्दल द्वेष नाही आहे तसेच मला रविष आणि राजदीप बद्दल प्रेम पण नाही .
पण झालं काय आहे ... हे निनाद आणि इतर तत्सम प्रतिसाद देणारी मंडळी म्हणजे मला तरी असे दरोडेखोर वाटतात ना. भारंभार चाचण्या करून शेवटी पेशंट चा मनात ," तुला ना भला मोठ्ठा " आजार झाला आहे ! आणि मग त्यावर अस्तित्वात नसलेल्या आजारावर उपचार करून बरे केल्याचा ढोल बडवायला मोकळे...
जरुरी आहे का ?? प्रत्येक नागरिकाने अर्णाब नाहीतर राजदीप अशा गटात सामील झालेच पाहिजे का??
मी जेंव्हा लेखाची शेवटी म्हणतो की अशा अनेक कढई तुमच्या आजूबाजूला दिसतात...तेंव्हा तुम्ही ते अर्णव ला का लावुन घेता?? लढाई नेहमी दोन गटात होते ना?? मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना??? कढई हा संदर्भ हर्श्ट आणि पुलित्झर या दोघांना उद्देशून वापरला आहे मग तोच संदर्भ भारताला जोडताना तुम्ही हे का लक्ष देऊन वाचत नाही की
मी अनेक कढई असा अनेकवचनी शब्द वापरला आहे ..
मला फक्त अर्णब अभिप्रेत असता तर मी अशीच एक विषारी कढई तापत आहे असा एकवचनी उल्लेख नसता का केला...
असो
चोराच्या मनात चांदणे
ह्या नुसार तुम्ही तुमच्या पूर्वग्रदूषित नजरेने लेख वाचला आणि स्वतः एका कंपुमध्ये समविष्ट असल्याने साहजिकच तुम्हाला समोरची व्यक्ती एकतर आपल्या कळपातील असेल नाहीतर आपली शत्रू कळपातील असेल
ह्या दोन दृष्टिकोन घेऊनच तुम्ही जगाचं परीक्षण करायला निघालात तर अवघड आहे निनाद!!!कळपात नसलेला म्हणजे आपला विरोधी अशी गैरसमजूत सोडून द्या
जग म्हणजे काही दोन बाजूचे नाणे नाही की त्याला फक्त छापा आणि काटाच असेल ....
16 Oct 2020 - 10:45 am | चौकस२१२
मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना?
एस बी
हे आधीच लिहिलं असतात ना तर पुढे चर्चा झालीच नसती... तुमचं एका वाक्याने सगळं घोळ झालं असे २-३ जण म्हणत आहेत ते ध्यान्यात घ्या
माझा मूळ प्रतिसाद वाचा कृपया... आपण एक वेगळी माहिती दिली आहेत त्याबद्दल आपले कौतुकच आहे पण सध्या ज्या "येन केन भाजपला खाली दाखवा हा रतीब " घातला जातो ( श्रीराम पवार सकाळ, निखिल वागले ) त्यातील एक वाटला आपलं लेख त्या एका वाक्यामुळे...
एकतर मी तरी अर्णव बद्दल मुळात बोललोच नाही एक खुलासा अर्णब च्या ऍक्ट्रेटले पण पेक्षा रवीश कुमार चे सादरीकरण खूपच चांगलं आहे (त्याचे विचार जरी पटत नसले तरी )..हे जाहीर करतो म्हणजे मग तुम्ही हि मला अर्णब च्या टोळीतील ठरवणार नाही !
16 Oct 2020 - 11:44 am | एस.बी
चौकस जी..
मुळात मला भाजपा, अर्नब यांच्या बद्दल किंचितही द्वेष नाही...त्यांचं काम ते करत आहेत...
भाजप शक्तिशाली राजकारण करतो आणि करायलाच हवं शेवटी जनमत ने समर्थन दिलेला पक्ष आहे आणि सनदशीर मार्गाने करत आहे ..
आणि अर्णब जे काही करतोय तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे...त्याला ही चॅनल चालवायचा आहे...
पण माझा रोख त्यांच्या मुळे नागरिक आपल्या स्वतः मध्ये पराकोटीचे बदल करून घेऊन गटबाजी करत मित्रपरिवार कार्यालयीन सहकारी यांच्यात द्वेष आणि विखार पूर्ण चर्चा करत आपले दैनंदिन संबंध निष्कारण रित्या बिघडवून टाकत आहेत आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या मित्रांमध्ये ह्या असल्या प्रकारामुळे फूट पडताना पाहिली आहे मी...
भाजपा आणि अर्णब किंवा इतर पत्रकार रविष येऊन तुम्हाला तुमच्या रोजच्या अडचणीत मदत करायला येणार आहेत त्या पेक्षा कैक पटीने लवकर तुमचे सहकारी आणि मित्र आणि नातेवाईक तुम्हाला आधार आणि मदत देऊ करतील ..
मग ह्यांच्या उच्च दर्जाच्या भांडणामध्ये असा दुसऱ्यांचा बळी जातो आहे अशी भावना माझी झाल्याने मी लेखन केले ..
पण आता त्यात पण सुतावरून स्वर्ग गाठायचा उद्योग सुरू आहे त्याच वाईट वाटत!
16 Oct 2020 - 12:19 pm | चौकस२१२
एस.बी
परत सांगतो आपला मूळ लेख लिहिण्याचा आणि ते क्युबा चे उद्धरण वैगरे वाचनीयच होते ... त्या एका वाक्याने लोकांना का असे वाटले याचा जरा तरी विचार करा!
16 Oct 2020 - 12:38 pm | एस.बी
इथून पुढे सहज म्हणून शब्द सुटणार नाही याची खात्री करेलच आणि इतर सर्वांनी नव्या सामग्रीचा अभ्यास नक्कीच करेल...रशियन पद्धती, नोवोस्तो ,वगैरे वगैरे!!
16 Oct 2020 - 12:25 pm | चौकस२१२
नागरिकांचायत भांडणे होत आहेत हे काही केवळ माध्यमांमुळे नाही तर लोकांनाही काहि गोष्टी समजून आल्यात पूर्वी जे कॉंम्ग्रेस्स एकमेव आणि गांधी एकमेवव ( महात्मा आणि नेहरू - गांधी) यावर काह्ही बोलणे म्हणजे देश द्रोह समजला जायचंच.. त्यावर आत जनता , आणि काही माध्यमे अरे ला कारे करीत आहेत ...
महात्मांचा काय चुकलं असं म्हण्यायची हिंमत आणि मोकळीक होती पूर्वी? हळू हळू मिळाली त्यात जगभर चा इसिस चा धुडघूस + नवीन माध्यमे यामुळे एकूणच संवाद आणि वाद वाढला..
फक्त अर्णव किंवा रवीश मुले आपण वाद घालतो असं म्हणून चालणार नाही
16 Oct 2020 - 5:55 pm | Gk
महात्म्याला वाईट म्हणायची मोकळीक नव्हती ?
त्यांना तर साक्षात गोळी घालून ठारच केले की , अजून किती मोकळीक हवी आहे ?
16 Oct 2020 - 11:50 pm | दुर्गविहारी
शतशः सहमत ! गेले कित्येक वर्ष याचाच अनुभव घेतो आहे.मोदी,भाजपविरुध्द एक टिकेचा शब्द उच्चारा,लगेच तुम्ही देशद्रोही,कॉंग्रेसी,गुलाम्,रुग्ण झालात म्हणून समजा.या असल्या घाणेरड्या वातावरणामुळे इतर विषयावर ना लिहायची इच्छा होते ना कोणत्या चर्चेत भाग घेउन मत व्यक्त करायची.असो. गप्प बसणे हेच हिताचे.
17 Oct 2020 - 6:35 pm | बाप्पू
आम्ही देखील गेले काही वर्षे याचाच प्रत्यय घेत आहोत.
जरा कुठे देश्प्रेमाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, नेहरू गांधीं यांच्या चुकीच्या आणि एकतर्फी धोरणाबद्दल, तुष्टीकरणाच्या राजनीतीबद्दल बोलले कि लगेच आम्हाला भक्त, भाजपेयी, संघी, चड्डीवाले, Rss वाले , उजवे इ विशेषणे लावून आमचा उद्धार केला जातो.
हे देखील बोला कि...
16 Oct 2020 - 8:46 am | Gk
तनिष्क प्रकरणाबद्दल अडवाणींचे अभिनंदन,
ह्यांच्या रथयात्रेने मंदिर होईल न होईल , पण सामाजिक शांततेला हे राम म्हणायला लावण्याचा हेतू मात्र साध्य झाला आहे
16 Oct 2020 - 9:40 am | वामन देशमुख
मला एक गुलाबजाम सापडला -
तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव
आता तो विषारी आहे की नाही ते धागालेखक सांगतीलच.
रच्याक -
आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं.
16 Oct 2020 - 11:49 am | एस.बी
प्रिय वामन जी ....माझ्या अगोदर तुम्हीच उत्तर दिले तुमच्या प्रश्नाचे...
खोटी बातमी दिली आणि मग सारवासारव
म्हणजे बातमी मुळातच खोटी होती हे तुम्ही सांगितले ना !! मग झाले प्रत्येक खोटी बातमी हा नक्कीच एक विषारी गुलाबजाम आहे!!!
खोट्या बातम्या देणारा कोणी ही असो ...त्याचा गुलाबजाम हा विषारीच!! मग तो कोणीही असो...
16 Oct 2020 - 1:58 pm | मदनबाण
तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव
तनिष्कचा संदर्भ आला म्हणुन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pani Da Rang (Video Song) | Vicky Donor | Ayushmann Khurrana & Yami Gautam
16 Oct 2020 - 12:46 pm | एस.बी
पहिल्यांदाच मिपा वर लिहले आणि एवढं सगळं नवनवीन समजून येईल असं बिलकुल वाटलं नव्हतं...
वाटलं की थोड्या फार प्रतिक्रिया येतील आणि थोड्या फार suggestion येतील बास्स...
पण झालेली चर्चा खरेच नवनवीन गोष्टींचा उलगडा करणारी आहे..
त्याबद्दल सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद!!
आणि कालपासून हे गुलाबजाम गुलाबजाम होतंय ना त्याची एक गंमत
लॉक डाऊन मध्ये कमावलेलं वजन उतरावं म्हणून डाएट वरती आहे हो..
त्यामुळे लेख लिहताना गुलाबजाम ची जाम क्रेविंग होत होती म्हणून डोक्यातून विचार काढून टाकायला विषारी गुलाबजाम अशी संज्ञा वापरली...
पण ह्या प्रतिसाद मध्ये अनेकवेळा गुलाबजाम शब्द बघून आज लंच मध्ये नक्कीच १ वाटी तरी खाणार...मरो ते डायट तिकडे!!!....
16 Oct 2020 - 12:53 pm | Rajesh188
भारताला आता कशाची गरज आहे, लोकांची मानसिकता आता कोणत्या प्रकारची असायला हवी.
आता गरज आहे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची.
त्या साठी उत्तम जलद प्रशासन आणि सर्व राज्यात,सर्व स्तरांत विकासाची गंगा नेण्याची.
मीडिया नी फक्त ह्याच विषयात स्वतः ला वाहून घ्यावे.
लोकांची मानसिकता बनवण्यात मीडिया ची मोठी भूमिका असते.
आणि हे शक्य नसेल तर सरळ मीडिया आणि समाज मध्यामवर कडक बंधन घालावीत.
चीन सारख्या देशात पण मीडिया वर बंधन आहेत.
Media वर बंदी म्हणजे शांती ची हमी.
हिंदू मुस्लिम सोडा भारतात हिंदू हिंदू मध्येच संघर्ष आता होत आहे आणि पुढे तीव्र होईल .
तो फक्त रोजगार साठी,आर्थिक प्राप्ती साठी.
त्या वरच लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे.
16 Oct 2020 - 1:00 pm | Rajesh188
जगात हिंदू चा एक आर्थिक,लष्करी ,ताकत प्रचंड असलेला देश असावा असे तुम्हाला का वाटत नाही.
उद्या सर्व मुस्लिम राष्ट्र विरोधी गेली तरी त्यांच्या शी लढा देवू शकणार सक्षम देश भारत का नसावा.
हिंदुत्व वादी त्या साठी काय प्रयत्न करत आहेत.
सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट हिंदुत्व वादी पक्षाच्या काळातच झाली आहे.
16 Oct 2020 - 3:00 pm | आनन्दा
पूर्वापार भारतीय लोक आपला विकास आपण स्वतःच करत आले आहेत.
राजसत्तेकडून त्यांची अपेक्षा कायम फक्त आणि फक्त संरक्षण इतकीच राहिली आहे..
ते पण मिळत नसेल तत् मात्र कठीण असते. तेव्हा विकासाची चिंता तुम्हाला नको. विकास आपला आपण होईल.
अजून एक सांगतो - जीवावर बेतल्याशिवाय हिंदू कट्टरवादी गॉट नाही, हे पण लक्ष्यात ठेवा.
16 Oct 2020 - 5:53 pm | Gk
हे सगळे आम्हाला इथे का सांगताय ? आम्ही काय तुमच्यावर अटॅक करणार नाही
बॉर्डरवर जाऊन प्रयोग करा
16 Oct 2020 - 2:17 pm | श्वेता२४
नवीन माहिती कळाली.
16 Oct 2020 - 4:31 pm | शा वि कु
मुद्देसूद प्रत्युत्तरे देण्याची काहीएक गरज नाही. लिबरल आणि कम्युनिस्ट वैगेरे शिक्के मारून राडा केला की बास.
असो चालायचंच.
-(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी) शा वि कु.
16 Oct 2020 - 7:07 pm | सुबोध खरे
-(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी)
कम्युनिस्ट पण आहात का हो तुम्ही?
आपली एक शंका
उत्तर नाही दिलं तरी चालेल
17 Oct 2020 - 6:55 am | शा वि कु
नाही.
16 Oct 2020 - 7:26 pm | एस.बी
छुपा नसलेला लिबरल चा ऐवजी...लिबरल नसलेला बिरबल कसं वाटतं?
जमतंय का? .. जमल तर वाप्रा पुढच्या येळेला!!!
16 Oct 2020 - 7:28 pm | सॅगी
या यादी मध्ये संघी, भक्त वगैरे शब्द घालायचे विसरुन गेलात की काय? नाही, हे शिक्के मारुनही राडे केले जातात म्हटलं....
असो चालायचंच
17 Oct 2020 - 6:53 am | शा वि कु
हे पण अयोग्यच.
16 Oct 2020 - 6:52 pm | शा वि कु
याच विषयावर नोम चोम्सकीचे मॅन्युफॅक्चरिंग कंसेंट नावाचे शोधग्रंथ कम पुस्तक आहे. जालावर सहजगत्या उपलब्ध आहे.
इथे पुस्तकाचा सारांश उपलब्ध आहे.
16 Oct 2020 - 7:23 pm | एस.बी
शा.वी.कु जी...
लेख लिखाण करने से डर नही लगता साब....
शिक्का पडणे का डर लगता है !!!...
अन् इतके शिक्के मिलने के बाद अब गुलाबजाम से भी लगता है..
मंग वो इषारी रहेन दो या बिन इषारी!!!!
असो ह्यातून पण नोविस्टो, नॉम् चोस्की,रशियन मुलाखत, रवी अमले प्रचार भान, विकृत व्यापारी आणि काही विकृत व्यापारी या दोन शब्दसमुहाचा जमीन अस्मानाचा अर्थांतर फरक ..
अशा एक ना अनेक गोष्टी समजल्या...आणि
स्व: ची ओळख नव्याने प्राप्त झाली...
16 Oct 2020 - 7:49 pm | गामा पैलवान
निनाद,
तुमचा इथला संदेश वाचला. मला काय वाटलं ते सांगतो.
१.
मला वाटतं हा निष्कर्ष जरा घाईत काढला आहे. 'विकृत व्यापारी मनोवृत्ती' हिचा अर्थ 'सर्व व्यापारी विकृत असतात' असा होत नाही. निदान मला तरी तसं वाटलं नाही. मात्र तुम्हांस एक वाचक या नात्याने तसं वाटवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे.
२.
मला तरी या लेखात कसलीही मूर्खपणा ( = idiocy) दिसली नाही. अर्थात, हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे.
असो.
माझ्या मते लेख संतुलित आहे. लेखाच्या शेवटी जो परिच्छेद आहे त्यात विष आवरण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ती अपेक्षा लेखकाने वाचकांकडून केली आहे. ती लेखकाने स्वत:च पार पाडण्याचा आग्रह वाचकाने धरू नये, असं मला वाटतं. वाचकाने स्वत:ची बुद्धी व निरीक्षणशक्ती वापरून स्वत:च भारतीय गुलाबजाम जोखावेत.
गंमत म्हणजे ही जी लेखकाची अपेक्षा आहे, ती तुम्हीच पार पाडलेली आहे. मग झगडा कशासाठी? लेखक त्याला वाटतं ते सरळ शब्दांत लिहितोय. तुम्ही एक वाचक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडताय. मग बखेडा हवाच कशाला?
आ.न.,
-गा.पै.
16 Oct 2020 - 8:34 pm | अर्धवटराव
अवार्ड वापसी प्रकरण जोरात असताना अमीर खान ने त्याच्या बायकोचा किस्सा सांगितला, ति एकदा कधि म्हणाली होती कि देशात भिती वाटायला लागली आहे तेंव्हा स्थलांतर करावे काय... झालं... त्यावरुन अमीर खान ला अवार्ड वापसी गँगशी जोडल्या गेले..
आज लद्दाख प्रकरणी भारत-चीन सिरियसली आमने-सामने आहेत.. आपल्या जवनांचं रक्त सांडलय.. भारतीय माध्यमांमधे, खास करुन सोशल मिडीयावर, चीन विरोधातल्या संभावीत युद्धावर बरच चर्वीत चर्वण चाललं आहे.. आणि अशा वेळी लेखक इतिहासातल्या माध्यमप्रेरीत युद्धाचा संदर्भ देऊन आज देखील तसलीच रेसीपी बनवण्यात येत असल्याचं सांगतो... मग त्याचा संमंध भारत-चीन तणावाशी जोडला जाणे स्वाभावीक वाटते. लेखकाला तेच अभिप्रेत होतं कि नाहि कल्पना नाहि.
16 Oct 2020 - 9:00 pm | एस.बी
आता पर्यंत वाटत नव्हत!! पण आता वाटायला लागलं आहे!!
16 Oct 2020 - 11:58 pm | Gk
16 Oct 2020 - 11:59 pm | Gk
टाटा तनिष्क विषयावरून भाजपे पिसाळलेत , टाटांचे पूर्वज म्हणे इस्लामी आक्रमणापासून स्वतःचे व पारशी धर्माचे रक्षण करायला भारतात आले म्हणे .
----------
ह्याच टाटांच्या पारशी नातीने रत्तनबाई पेटिट हिने एका मुसलमानाशी लग्न केले आणि इस्लाम धर्मही स्वीकारला, तो मुस्लिम मनुष्य म्हणजे बेरिस्टर मोहम्मद अली जिना
त्यानंतर जिनाच्या मुसलमान मुलीने दिना जिना हिने एका पारशी मुलाशी लग्न केले , तो म्हणजे नेव्हिल वाडिया
मुंबई मधील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल , स्त्री रोग व लहान मुलांचे , ते ह्याच परिवाराचे आहे.
त्यामुळे धार्मिक ऐक्य म्हणजे काय हे जगाला शिकवायला टाटा जाहिरात कशाला काढतील ? त्यांच्या स्वतःच्या घरात इतकी अंतर धर्मीय नातीगोती आहेत , टाटा , जिना आणि वाडिया हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
टाटाकडून एक मुलगी जिना परिवारात गेली.
आणि जिनाकडून एक मुलगी वाडिया परिवारात गेली.
ह्याच गोतावळ्यात अजून दोन आडनावे नातेवाईक आहेत , भाभा परिवार - थोर अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा . मिस्त्री परिवार - पालोनजी शापूरजी.
https://en.m.wikipedia.org/wiki/Tata_Group
टाटा , पेटिट , वाडिया - भारतीय नागरिकत्व
जिना - पाकिस्तानी नागरिकत्व
दिना जिना - आधी ब्रिटिश मग अमेरिकन नागरिकत्व
शापुरजी - आयरिश नागरिकत्व
आणि ह्या भाजप्याना भारतीय जाहिरातीत हिंदू मुसलमान लगीन खपेना आणि हे विश्वगुरू होणारेत म्हणे !!
17 Oct 2020 - 12:57 am | गामा पैलवान
Gk,
तनिष्क एव्हढे जर आंतरधर्मीय विवाहप्रेमी असतील तर मुस्लिम घरात पारशी सून दाखवा म्हणावं.
लव्ह जिहाद म्हणजे काय हे आम्हांस चांगलं ठाऊक आहे.
आ.न.,
-गा.पै.
17 Oct 2020 - 7:28 am | शा वि कु
अगदी कम्युनिस्ट कॉम्रेड माणसाने हा लेख लिहिला तरीही केवळ तो कम्युनिस्ट आहे यावर बोंबाबोंब करून काही उपयोग नाही.
१)त्याने कम्युनिसमचे कुठले फसवे सिद्ध झालेले तत्व या पर्टीक्युलर लेखात गृहीतक म्हणून वापरले आहे का ?
२) कम्युनिस्ट क्रांती व्हावी अश्या उद्देशाचा काही संदेश या पर्टीक्युलर लेखात आहे का ?
हे (उदा.) टीकेचे व्हॅलीड ग्राउंड होऊ शकतात. केवळ "व्यक्ती कम्युनिस्ट आहे, तेव्हा मांडलेले सर्व काही खोटे " असे Ad Hominem अर्ग्युमेंट निरर्थक असते.
उद्योगपती अमुकतमुक अनैतिक गोष्ट करत आहेत, हा एक तथ्याचा दावा आहे. तथ्य कम्युनिस्ट किंवा भांडवलशाही नसते. त्यामुळे अश्या प्रकारचे तथ्य समोर आले तर निस्ते कॉमि कॉमि ओरडून काही उपयोग नाही.
इथे तर कम्युनिझमशी एक वाक्य ओढून ताणून नसलेला संबंध जोडला आहे आणि पुढचा सगळा डान्स त्याच्यावरच केला आहे.
असो चालायचंच.
17 Oct 2020 - 11:34 am | सुबोध खरे
छे छे
लेख कुणीही लिहावा हो.
मी तुम्ही कम्युनिस्ट आहात का हे विचारले लेखकाबद्दल किंवा लेखाबद्दल नव्हतं
बाकी -- कम्युनिस्टाने कोणताही लिहिला कि त्यात संघ द्वेष आपोआप येणारच.
उदा. सीताराम येचुरी याना पपई आणायला सांगितली कि ती केवळ "केशरी रंगाची" आहे म्हणून ते आणत नाहीत असे ऐकिवात आहे.
17 Oct 2020 - 12:17 pm | शा वि कु
तुम्हाला उद्देशून नाहीये.
(तुम्ही कम्युनिस्ट आहे का हे विचारणे खटकले तरीही. तुम्हाला उद्देशून नाहीच.)
17 Oct 2020 - 10:51 am | गोंधळी
Mumbai police arrests lawyer Vibhor Anand for "fake-theories-in-sushant-singh-rajput-disha-salian-death-cases"
https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/mumbai-polic...
सध्या तरी हिंदुस्तानात मागणी कमी होईल वि.गुलाबजामची असे वाटत नाही.
17 Oct 2020 - 11:00 am | शा वि कु
:)
बिग बॉस चा सेट जेलमध्ये लागायचा होता, झाले भलतेच.
17 Oct 2020 - 6:55 pm | मदनबाण
महेश भटच्या सडक दोन चा जसा नागरिकांनी मोठा बेंड बाजा वाजवुन टाकला, तीच स्थिती आपली होइल ही भिती अक्कीला सतावत होती... मग लक्ष्मी बॉम्ब चा ट्रेलर प्रकाशित करणे पण पुढे ढकलले गेले, नंतर हिंमत करुन त्यांनी ट्रेलर तर रिलिज केला पण आपली कशी वाजवली जाते आहे ते कळु नये म्हणुन लाईक डिसलाईकचा कांउंटच हाइड करुन हा ट्रेलर युट्युबवर प्रसारित झाला !
बादवे... बिग बॉस त्याच्या "भाई" होस्टनेच चालु झाला असला तरी या तथाकथित भाई ची भाईगिरी काही लोकांच्या बहिष्कारा समोर चालु शकलेली नाही.
जाता जाता :- विभोर आनंदला देखील पोलिसांनी उचलले आणि त्याच्या चॅनल वरील सर्व व्हिडियो आता डिलिट झाले आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Genda Phool | Garba Mix | Kamlesh Jadhav | Janny Dholi
19 Oct 2020 - 9:34 pm | कपिलमुनी
व्हिडीओ डिलीट करायला लागले कारण त्यात सत्यता काही नव्हती, पोलीसांनी अटक केली म्हणजे न्यायालयात त्याला सादर केले असणार, कायदेशीर प्रकिया आहे,
तुमच्या धाग्याचे काय झाले ? सीबीआय ने खुनी पकडले का ??