'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही.
म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात
….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात.
मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात.
मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो.
जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो.
त्यांच्यातले हितगुज अत्तर होते.
एके दिवशी, फांदीवर कळी उमलते.
त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात.
मग, कळीचे फूल होते.
वाऱ्यावर डुलते.
आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते.
फांद्या जमिनीकडे पहात राहतात.
किती असोशी!
फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.
छान
अप्रतिम!
अहा...
अप्रतिम कविता
तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेसहे खास आवडलेदर्जेदार , सुंदर,
In reply to दर्जेदार , सुंदर, by गवि
+१
In reply to दर्जेदार , सुंदर, by गवि
असेच म्हणेन
In reply to दर्जेदार , सुंदर, by गवि
+१
:(
मस्त
सर्व रसिक वाचकांचे आभार.