✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 12/30/2016 - 23:50  ·  लेख
लेख
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

१९९१ ची कारवाई

१९९१ च्या कारवाईची पार्श्वभूमी १. सन १९८५ पासून भारताला परकीय चलनाची चणचण जाणवू लागली होती. १९९१ मध्ये भारताकडे केवळ तीनेक आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन होते. आयएमएफने केवळ $२.२ बिलियन इतके कर्जही (आज भारताकडे $३५० बिलियन पेक्षा जास्त परकीय चलनाची गंगाजळी आहे) ६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. २. त्यानंतर, पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग या जोडगोळीने, भारताची अर्थव्यवस्था इन्स्पेक्टरराज मधून मुक्त करून उदार बनविण्याचा एक धाडसी प्रकल्प अमलात आणला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची जी भरभराट झाली तो नजिकचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. १९९१ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. भारताची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. नाहीतर देशाला अत्यावश्यक वस्तूंची (उदा. खनिज तेल, उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल, जीवनावश्यक औषधे, इ) आयात करणे तर सोडाच पण आपल्या कर्जांवरचे व्याजही देणे शक्य नव्हते. २. सोने गहाण ठेवून पैसे जुळवणे ही केवळ काही महिन्यांपुरते तगून राहण्यासाठीची तरतूद होती. ती आणीबाणीची परिस्थिती ताब्यात आल्यावर, देशाची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी क्रांतिकारी बदल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते न केल्यास देशाचे दिवाळे वाजणे अपरिहार्य होते. ३. अश्या परिस्थितीत, "राव यांची राजकीय इच्छाशक्ती व प्रशाकिय निर्णय घेण्याची धमक" आणि "सिंग यांचा अर्थशास्त्रातील अनुभव व कसब" यांच्या संगमाने बनविलेल्या कारवायांमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणून तिची वाटचाल योग्य दिशेने चालू केली. ती इतकी की, काँग्रेस पुढची निवडणूक हरल्यानंतर सत्तेत आलेल्या नवीन सरकारला त्या वाटचालीचा वेग आणि दिशा चालू ठेवणेच भाग पडले. ३. तेव्हाचे पंतप्रधान त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या पायरीवर होते. वयोमानामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे त्यांना पुढच्या निवडणूकीतल्या विजय/पराजयाची तितकीशी फिकीर ठेवण्याची गरज नव्हती. त्याविरुद्ध, क्रांतीकारी कारवाई करून देशाची अर्थव्यवस्था सुधारल्यास इतिहासात आपले नाव कोरण्याची त्यांना संधी होती. ४. तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची पार्श्वभूमी सरकारी बाबू व अर्थतज्ज्ञ म्हणून होती, म्हणजेच राजकारणी नव्हती. त्यामुळे, त्यांना तर पुढच्या निवडणूकीची चिंता करण्याचे कारणच नव्हते. कारवाई यशस्वी झाले तर जगात नाव होईल, नाही झाली तर आपले अर्थशास्त्रातले सल्लागाराचे अथवा शिक्षणाचे काम चालू करता येईल, अशी त्यांची स्थिती होती. ५. थोडक्यात, क्रांतीकारी पावले उचलणे भारताला खूप फायद्याचे ठरले हे नि:संशय. मात्र, ते करण्यापेक्षा इतर काही चांगला पर्याय तेव्हा आस्तित्वात नव्हता. तसेच, भविष्याची काळजी करण्याची गरज नसल्याने, कारवाईच्या परिणामाला सामोरे जाणे राव व सिंग यांना सोपे होते. ६. असे असले तरी, या कारवाईच्या वेळेसही सरकारवर अनेक अर्थतज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली होती ! ७. राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते.

२०१६ ची कारवाई

२०१६ ची कारवाईची पार्श्वभूमी १. कारवाईच्या अगोदरच्या १० ते १२ वर्षांपासून रु १००० (३९%) आणि रु ५०० च्या (४५%) नोटांमधील चलनाचे प्रमाण वाढत राहून एकूण चलनाच्या ८४% इतके धोकादायक स्तरापर्यंत वाढले होते. ही परिस्थिती तशीच चिघळत राहिली असती तर भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरण (क्रॅश) झाली असती. २. "भ्रष्टाचारमुक्त भारत" या घोषणेवर विश्वास ठेवून २०१४ मध्ये जनतेने भाजपा आणि विशेषतः मोदींना बहुमत मिळवून दिले होते. विरोधी पक्ष त्यासंबंधात मोदींना सतत टोमणे मारत होते. अर्थातच, विरोधी पक्षांचे टोमणे हे क्रांतीकारी कारवाईचे कारण होऊ शकत नाही. तरीही, पत कायम ठेवण्यासाठी आपली घोषणा खरी करणारी काहीतरी कारवाई करणे मोदींना भाग होते. ३. १२८ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात केवळ १% लोक कर भरतात. करचुकवेगिरी अभिमानाची गोष्ट समजणार्‍या ग्रीक लोकांनाही शरम वाटायला लावेल अशीच ही वस्तुस्थिती आहे. २०१६ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. विरोधी पक्षांच्या मोदीविरोधी कारवाया चालू असूनही व बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतरही, मोदींच्या व्यक्तीगत राजकीय भांडवलाला फारसा धक्का लागलेला नव्हता. किंबहुना, पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर त्यात लक्षणीय वाढच झाली होती. २. भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहता, कोणतेही क्रांतीकारी पाऊल न उचलता एखादी सावध लोकाभिमुख कारवाई केली तरीही चालण्यासारखे होते. त्यामुळे, कोणताही मोठा धोका पत्करण्याची मोदींना तत्वतः आवश्यकता नव्हती. ३. या कारवाईमुळे जनक्षोभ होऊन जनता रस्त्यावर आली असती तर मोदी आणि भाजपला मोठा राजकीय धोका झाला असता. हा धोका, मोदींचे पंतप्रधानपद जाण्यात आणि/किंवा पुढच्या स्थानिक संस्थास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकांत भाजपाचा धुव्वा उडण्यात झाला असता. म्हणजेच, निश्चलनीकरण्याच्या कारवाईमागे मोदींचा स्वतःचा किंवा त्यांच्या पक्षाचा, भाजपाचा, स्वार्थ साधणार नव्हता. किंबहुना, तसा धोका घ्यावा अशी जबरदस्तीही त्यांच्यावर नव्हती. ४. आपले हितसंबंध राखण्यासाठी विरोधक काही म्हणत/म्हणणार असले तरी, वरची परिस्थिती पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी केलेली निश्चलनीकरणाची धाडसी कारवाई करताना मोदींनी देशहित समोर ठेवून स्वतःसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी पत्करलेला धोका आहे. थोडक्यात, हा निर्णय राजकीय नसून देशहितासाठी उचललेले पाऊल होते. ५. जनतेने या कारवाईचे स्वागत करून, त्यामुळे होणार्‍या त्रासाला कोणतेही अकांडतांडव न करता सहन केले आहे. त्यासंबंधातले विरोधकांचे अंदाज आणि चिथावण्या त्यांच्या पुरत्याच सीमित राहिलेल्या आहेत. ही गोष्ट कारवाईच्या समर्थकांएवढीच तिच्या विरोधकांनाही गोंधळून टाकणारी होती ! याबाबतीत, भारतीय जनतेने सुजाणतेचे जे प्रदर्शन केले आहे ते वादातीतरीत्या स्पृहणीय ठरले आहे.

निष्कर्ष

मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही. "हमाम मे सांब नंगे है" अशीच सर्व पक्षांची अवस्था आहे. लोकशाहीतही खंबीर नेतृत्वाचा सिंहाचा वाटा असतो हे सत्य बर्‍याचदा विसरले जाते. म्हणूनच, लोकशाही देशाच्या मोठ्या यशासाठी एखाद्या नेत्याचेच नाव घेतले जाते आणि एखाद्या मोठ्या निर्णयामुळे मिळालेल्या अपयशाचा स्वीकार करून त्या नेत्याला राजिनामा द्यावा लागतो. अमुक देशाच्या शंभर-दोनशे निर्वाचित नेत्यांनी एकत्रितपणे अमुक एक क्रांतीकारी गोष्ट केली असे होत नाही; पण त्यांची मोट बांधून, त्यांना देशाच्या फायद्याच्या दिशेने यशस्वीपणे ओढून नेणार्‍या नेत्यालाच ते श्रेय सकारणरीत्या दिले जाते. तसे श्रेय मोदींना द्यायला हरकत नाही असे मला वाटते. तसे नसते तर, भारताचा पूर्वानुभव पाहता, मोदींच्या खंबीर नेतृत्वाविना, "इतना साल उन्होने खाया, अब हम खायेंगे तो क्या बुरा है।" या मानसिकतेने भाजप वागला नसताच, असे म्हणणे कठीण आहे. सद्याची खुर्ची राखणे आणि पुढच्या निवडणूकीत विजय मिळवणे हे जगभरच्या राजकारण्यांच्या दृष्टीने सर्वोच्च मुद्दे असतात. त्यामुळे, स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीर नेता मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यातही, कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता मिळणे ही तर एक अशक्यरित्या दुर्मिळ गोष्ट आहे. मोदीच्या रूपात ही अशक्य दुर्मिळ गोष्ट भारताला लाभली आहे. त्यात अजून भर म्हणून, आपला तत्कालिक स्वार्थ बाजूला करून, किंबहुना तोशीस सोसूनही, अश्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याचे सुजाणपण भारतीय जनतेने दाखविले आहे. ०८ नोव्हेंबरपूर्वी भारतीय जनता अशी वागेल असे कोणी सांगितले असते तर त्याबाबत माझ्या मनात संशय असता. निश्चलनीकरणाच्या कारवाईमुळे उघड झालेली ही भारतीय जनतेची प्रगल्भ मानसिकता एक भारतीय म्हणून मला नक्कीच अभिमानास्पद वाटते. तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत. याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
तंत्र
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
32397 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

सारांश.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/31/2016 - 00:02 नवीन
मा. मोदी या देशाचे तारणहार आहेत, आपण सर्वांनी त्यांच्या सर्व निर्णयांना कोणताही विरोध न करता सर्वांनी पाठींबा दिलाच पाहिजे, म्हणजे आपला देश विकासाच्या सर्वच पायर्‍या एकेक करुन चढेल. बरोबर ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिनशर्त शरणागती आय मिन सहमती.

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 00:07 नवीन
बिनशर्त शरणागती आय मिन सहमती.... हेल मोग्याम्बो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळे उघडे ठेवून, आपापल्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 00:09 नवीन
डोळे उघडे ठेवून, आपापल्या सदसदविवेक बुद्धीवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवून, देशाचे (म्हणजे पर्यायाने आपलेच) भले समोर ठेवून विचार करावा, इतकेच म्हणणे आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास समर्थ आहातच, तो तुम्हीच घ्यायचा आहे, दुसरा कोणी घेऊ शकणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोटबंदी कारवाईसंबंधी मला

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 01:14 नवीन
नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही. मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत. तुम्ही त्यांच्या पंगतीत बसाल असे वाटले नव्हते, त्यामुळे जरासे आश्चर्यच वाटले ! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्दे आणि तर्क यांच्या

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 09:06 नवीन
मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण ------------ धिस इज ऑसम , म्हंजी समथिंग 'मी माझ्याच फेवरेट हाय' सांगायचा प्रकार वाटतो नी हा!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

याचा अर्थ...

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 12:16 नवीन
याचा अर्थ... "माझे मुद्दे मला माहीत असलेल्या सत्यावर आणि शक्य असलेल्या तर्कांवर आधारीत लिहिले आहेत, तुम्हाला शक्य असल्यास ते तुम्ही समोर आणलेल्या नवीन सत्यांनी आणि केलेल्या तर्कांनी खोडा." ... असा होतो. यालाच दुसर्‍या शब्दांत, सत्य शोधण्याची सभ्य आणि शास्त्रीय पद्धत समजले जाते. व्हॉट इज डीस फेदरवेट साहेब, हे अज्याबात हेवी वेट नसलेली ऑर्डिनरिलि अ‍ॅक्सेप्टेड थिंग तुमच्यासारख्या क्नॉलेजिएब्ल वजन्दार मान्साला अंडस्ट्यांड झाले नाय ह्ये लैच सर्प्रायजिंग हाय ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

मोदीभक्त

गॅरी ट्रुमन
Sun, 01/01/2017 - 12:19 नवीन
नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.
छ्या. एकदा तरी तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिलेत ना तर तुमच्या नावावर मोदीभक्त हे बिरूद चिकटले. मग तुम्ही काहीही करा ते जाणे नाही. रच्याकने, एक गोष्ट लिहितो. इथली आणि तिथली काही आजीमाजी मंडळी लई डेंजर आहेत. अशी मंडळी फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर मिसळपाव आणि इतर ठिकाणच्या 'मोदीभक्तांवर' भरपूर गॉसिप करतात. काही लोकांचा इथे दिसणारा सोज्वळ चेहरा किती खोटा आणि ढोंगी आहे हे समजले की खरोखरच धक्का बसेल. असो. (बोकोबांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे एक हत्ती असलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फेसबुकवरील एका बंदिस्त

संदीप डांगे
Sun, 01/01/2017 - 13:25 नवीन
फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर >> कोणता हो हा गृप? आम्हालाही कळवा, काय एकएकटे मनोरंजन बघता, आम्हालाही आनंद घेऊ देत जरा.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मोदीभक्त त्यांना एकीकडे

नितिन थत्ते
Mon, 01/02/2017 - 14:21 नवीन
मोदीभक्त त्यांना एकीकडे फेसबुकवर ब्लॉक करतात. आणि दुसरीकडे सिक्रेट ग्रुपवर काय चालते याची माहितीसुद्धा ठेवतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

परम पूजनीय राजयोगी श्री

साहना
Sat, 12/31/2016 - 02:28 नवीन
परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय देशाला शिस्त येणार आणि विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर देशाला वेगाने मार्गक्रमण करता येणार नाही. कष्ट करून कर रुपी पैसे सरकारी तिजोरीत भरणे स्वतंत्र भारतातील प्रत्येक स्वतंत्र नागरिकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य करण्यात कसूर करणाऱ्या नागरिकाला देशद्रोही समजून कैदेत टाकले गेले पाहिजे. परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांना विरोध करणारे लोक देशद्रोही असून देश सुपरपावर बनण्यास अडथळा आणत आहेत. असे हे करंटे लोक मॅकोलेपुत्र असून राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायम, इस्लामिक अतिरेकी, ख्रिस्ती मिशनरी, ममता बॅनर्जी, KGB, ISI, CIA, Communist इत्यादीचे हस्तक/समर्थक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

आजानुकर्ण
Sat, 12/31/2016 - 03:04 नवीन
प्राडॉंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

.

संजय क्षीरसागर
Sat, 12/31/2016 - 00:32 नवीन
डोळे उघडता समोरी | दोन गुरुजी | आमुचा विवेक तो | देशद्रोही ||
  • Log in or register to post comments

सोने

आनंदयात्री
Sat, 12/31/2016 - 00:50 नवीन
>>६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. हे सोने नंतर भारतात परत आणले गेले का?
  • Log in or register to post comments

हो. मागील काही वर्षां पासून

साहना
Sat, 12/31/2016 - 02:45 नवीन
हो. मागील काही वर्षां पासून शेकडो टन सोने भारताने (RBI) IMF इत्यादी कडून विकत घेतले आहे. सध्या RBI जगांतील सर्व सेंट्रल बॅंक्स मध्ये सोने गंगाजळीच्या बाबतीत ११ नंबर वर आहे. सध्या RBI कडे कागदावर ५५० टन सोने आहे. बँक ऑफ इंग्लंड कडील कर्ज फेडले गेले तरी ते ४७ टॅन सोने परत विमानाने भारतांत आणले गेले नाही. ते सोने भारताच्या नावावर अजून इंग्लंड मध्येच आहे. सरकार आणि सोने ह्यांचा संबंध थोडा विचित्र असतो आणि सरकारी आकड्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. बहुतेक वेळा सरकार आपले सोने गुपचूप मार्केट मध्ये विकून मोकळे होते. म्हणजे कागदोपत्री सोन्याची गंगाजळी कमी न दाखवता सोने डोमेस्टिक मार्केट मध्ये विकले तर सोन्याचे आयात दार कमी होतात. थोडक्यांत have your cake and eat it too असा हा प्रकार आहे. अमेरिकेत फोर्ट नॉक्स मध्ये म्हणे हजारो टन सोने ठेवले आहे पण मी तिथे गेले असता काडीचीही सुरक्षा व्यवस्था दिसली नाही. चौकशी करता समजले कि फोर्ट नॉक्स आणि तेथील सोने फक्त कागदोपत्री आहे. अमेरिकन सरकारने हे सोने कदाचित आधीच विकून संपवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

धन्यवाद

आनंदयात्री
Sun, 01/01/2017 - 22:03 नवीन
या माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

लेखनप्रकार

आजानुकर्ण
Sat, 12/31/2016 - 03:04 नवीन
लेखनप्रकारमध्ये विमोदी सॉरी विनोदी हवे होते काय? मजेशीर खुसखुशीत लेख वाचून बहार आली.
  • Log in or register to post comments

मला मोहरा, अर्जुन या

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 09:17 नवीन
मला मोहरा, अर्जुन या चित्रपटांच्या कहाण्या का आठवल्या हा लेख वाचून काय माहित?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 09:59 नवीन
म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक प्रतिक्रियाच जास्त दिसण्याची शक्यता दिसतेय. मुद्दे व्यवस्थित समजले तरी उपरोधीकतेला शस्त्र म्हणून वापरणे बऱ्याच लोकांची आवड असते. तुमच्या दुसऱ्या धाग्यावरील तथ्यांवर आधारित आऊटकमच्या पोस्ट अशाच "फाट्यावर" मारण्यात आलया! असो, जनता सुजाण होतेय हळूहळू! सगळी ज्या दिवशी होईल तो सुदिन, म्हणजे कोणतेच पक्ष जनतेच्या डोक्यावर मिरे वाटू शकणार नाहीत!
  • Log in or register to post comments

हे समदे विकटीम गेम कशापायी

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 10:54 नवीन
हे समदे विकटीम गेम कशापायी फ्रेंड??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

असं का? अच्छा याला विकटिम गेम

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 11:14 नवीन
असं का? अच्छा याला विकटिम गेम म्हणतात का? वरचे प्रतिसाद तर वाचा! मला वाटले मी त्या प्रतिसादांबद्दल बोलतोय. सरांनी काही मुद्दे मांडले आहेत, पटले नाहीत तर सरळ हे पटले नाहीत म्हणून खोडून काढावेत, ते जास्त योग्य नाही का फेदरवेट साहेब? त्यांचं लिखाण कसं विनोदी आहे, ते त्यांचेच फेव्हरेट वगैरे कसे आहेत हे सिद्ध करून काय उपयोग? म्हणजे मिपाच्या भाषेतला "जिलबी" लेख तर नक्कीच नाहीये हा! बाकी, ठुमाला मी शांगने मंजी काजव्याने सुरव्यापुडी छमकणे! तस्मात माझ्या या व वरच्या दोन्ही प्रतिसादांना फाट्यावर मारलंत तर माझी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

सन, किटी व्हेळा लेखक कवा

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 11:43 नवीन
सन, किटी व्हेळा लेखक कवा त्यांचे लॅकीज , मुड्डे अमान्य करून गप बसले हुते टे बी एकदा एनलाईज करा ही रिक्वेस्ट हाय माजी. ट्यांनी केलेले पर्सनल अटॅक टूमी इग्नोर करू शकत नाय, केल्यास अनफॉरच्युनेट असल, सी एज अ प्रोव्हरब गोज, एज यु सो, सो शाल यु रीप. नाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हे पहा, पुराणिकबुवांनी पुराण

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 12:16 नवीन
हे पहा, पुराणिकबुवांनी पुराण सांगत जावे, ऐकायला कोणी आहे की नाही हे पाहू नये! मुद्दे मांडणाऱ्यांना प्रतिवाद पटले तरच ते बरोबर असं तर काही नाहीये ना? आमच्यासारख्या सामान्य वाचकांसाठी खोडले मुद्दे तर चांगलेच आहे की! बाकी पर्सनल अटॅकचं म्हणाल तर त्यावर मी पामर काय बोलणार? कोणीच करू नये एवढीच इच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

सहमत !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 12:47 नवीन
सहमत ! म्हणुनच मी वरच्या एका प्रतिसादात खालीलप्रमाणे लिहिले आहे की... ...नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.

मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत...
मला जे पटले त्याची मी इथे कारणपरंपरेसह लेखी नोंद केली आहे. ते बरोबर ठरते की चूक हे येता काळ ठरवेलच. ते बरोबर ठरेल असा माझा विश्वास आहे आणि तसे होण्याने मला आनंदच होईल, ते चूक ठरले तर माझ्या तर्कात चूक झाली हे मान्य करायला मला अजिबात कुचमुचल्यासारखे होणार नाही. कारण, या दोन्ही बाबींना माझ्या ज्ञानसंपादनातला एक धडा समजून मी पुढे जात राहीन. ज्यांना माझी मते पटत नाहीत त्यांना आपली तथ्ये व तर्क समोर ठेवून माझे तर्क व मते खोडायची आणि स्वतःचे तर्क व मते नोंदवायची पुरेपूर मुक्त संधी आहे. तसे करणे सभ्यता आणि समतोल विचारांना धरून केलेला प्रतिवाद होईल व तो नेहमीच स्वागतार्ह असेल. कोणत्याही कारणाने (स्वतःजवळ सबळ मुद्दे/तर्क नसल्याने, केवळ खोडसाळ स्वभाव किंवा इतर कोणत्या ज्ञात/अज्ञात कारणाने) असे न करता, केवळ मुद्दा भरकटवणे किंवा उपरोधिक प्रतिसाद टाकण्याने माझ्या लेखातल्या मजकूराचा अर्थ बदलणार नाही, तो तसाच राहणार आहे. किंबहुना माझे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद, इथेच या खुल्या संस्थळावर सर्वांना वाचायला उपलब्ध राहणार आहे. माझी पत माझे लिखाण ठरवेल, इतरांची पत त्यांचे लिखाण ठरवेल. पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

यस सर

चौकटराजा
Sat, 12/31/2016 - 15:42 नवीन
मोदींच्या या कृत्याचे मोल काळच ठरवेल. आता कुठे जरा जरा लोक नरसिंह रावांची महति मान्य करायला लागलेत.( कदाचित त्यावेळीही त्यांची ती कृति अपरिहार्य अशीच असेल आता जशी मोदींची आहे तशी. ) आंबेडकर कुठे १९४५ च्या दरम्यान इतके महान होते.? आता ते एक उत्तम अर्थ शास्त्री होते असे लोक म्हणायला लागलेयत. तेंव्हा सबूरी हाच यावरील उपाय आहे.माझ्या मते इन्दिराजीनी राष्ट्रीकृत करून बॅन्का खेड्यात नेल्या, रावानी उदार धोरण स्वीकरले, राजीवनी संगणक स्वीकारला व मोदीनी कार्डाला जवळ केले या सार्‍याच बाबी काळाच्या ओघातही लोकाना लक्षात ठेवाव्या लागतीलच. एखादे मूल जन्मतः च रडले नाही म्हणजे आयुष्यातून बाद झाले असा काही नियम सरसकट होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक्काकाका -

बोका-ए-आझम
Sat, 12/31/2016 - 11:00 नवीन
An elephant took a bath in a river and was walking on the road. When it neared a bridge, it saw a pig fully soaked in mud coming from the opposite direction. The elephant quietly moved to one side, allowed the dirty pig to pass and then continued its onward journey. The unclean pig later spoke to its friends in arrogance, “See how big I am; even the elephant was afraid of me and moved to one side to let me pass”. On hearing this, some elephants questioned their friend, the reason for its action. Was it out of fear? The elephant smiled and replied, “I could have easily crushed the pig under my foot,but I was clean and the pig was very unclean. By crushing it, my foot will become dirty and I wanted to avoid it. Hence, I moved aside.” This story reveals : Realized souls will avoid contact with negativity not out of fear, but out of desire to keep away from impurity though they are strong enough to destroy the impurity. You need not react to every opinion, every comment, or every situation. Kick the drama and keep going ahead. Good Morning हे एक चांगलं forward सापडलं. आपण हत्तींच्या बाजूने आहोत. बाकीच्यांनी ठरवावं काय ते.
  • Log in or register to post comments

येह, कोनीबी क्रिटिसाईज केला

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 11:38 नवीन
येह, कोनीबी क्रिटिसाईज केला की तेनला डुक्कर म्हणणे इज वेरी इजी, आफ्टर ऑल इट्स मॅटर ऑफ अपब्रिंगिंग. गॉड ब्लेस यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

देशभक्ती चा डोस दिला

वरुण मोहिते
Sat, 12/31/2016 - 11:08 नवीन
कि प्रगल्भता सुजाणपणा सोशिकपणा आपोआप येतो. जागतिक इतिहासात अशी कित्येक उदाहरण आहेत . आमचे भारतीय तर पहिल्यापासून सुजाण सोशिक आहेत . त्यामुळेच अनेक लोक इथे राज्य करून गेले .
  • Log in or register to post comments

भारतीय....

चौकटराजा
Sat, 12/31/2016 - 12:21 नवीन
भारतीय लोक सोशिक नक्कीच आहेत. त्यानी गेले ७० वर्ष एकच धाडस दाखविले ते म्हणजे निराश होऊन भाजपाला सत्तेत आणले. भारतीय माणूस त्यागी मात्र नाही. त्याला साधे झेब्रा बेल्टवर गाडी उभी करण्याचेही मानसिक औदार्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

ह्या आधीही भाजप सत्तेत होता

वरुण मोहिते
Sat, 12/31/2016 - 12:57 नवीन
त्यामुळे ७० वर्षात धाडस वैगरे दाखवलं असं नाही आहे . अनेक उन्हाळे पावसाळे पहिले आहेत भारतीय राजकारणाने . ह्यावेळी मी सगळं बदलून देईन हा मुद्दा होता .मुद्दे नवीन नवीन येतच असतात . बाकी त्यागी आणि झेब्रा क्रॉसिंग हे समीकरण गैरलागू आहे त्यामुळे पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

त्याग नाही कसा.....

चौकटराजा
Sat, 12/31/2016 - 15:44 नवीन
माणस गाडी पुढे का दामटत असतो त्याला काहीतरी ( वेळ) वाचवायचा असतो म्हणूनच ! म्हणजे वेळेचा त्याग करायचीही त्याची इच्छा नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

स्पिकिंग ऑफ ड सो कॉल्ड कंपेरिझन बेस्ड बायस्ड रायटप

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 11:51 नवीन
नरसिंह राव (नॉट मनमोहन आय डोन्ट लाइक हिम मच बट टू हिम हिज ओन), जेच्यापाशी गमवायला काय नव्हता त्येनी liberalization आणला ह्यात इशेष काय नाय, ह्यो टर्कच अजब हाय, इफ यु हॅव टू दिसक्रेडित अ पर्सन त्याला इलाज नाय. इन्कमबांट सरकारचा उदो उदो करायला पास्ट सरकारच्या रॉंग दुइंगला फोकस करने तरीही एक पोलिटिकल व्ह्यू म्हणून acceptable होऊन जायेल, पर चांगल्या रिफॉर्म ला डीसक्रेडीट करने इज अ न्यू लो!.
  • Log in or register to post comments

गुड ! ह्येच्यामुळे एक

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 13:05 नवीन
गुड ! ह्येच्यामुळे एक म्हत्वाचे शेंटेन्स हायलम लिवायंच लेखात त्ये रिमेंबर झालं, बर्का फेदरवेटजी, ठ्यांकू वेरी मच... "राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." या नजरचूकीने राहिलेल्या महत्वाच्या मजकूराची लेखात भर टाकण्याची संपादकांना विनंती करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या

फेदरवेट साहेब
Sat, 12/31/2016 - 13:08 नवीन
राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." डिस्कस द सर्तनटी ऑफ अबव सेंटेन्सस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

देअर इज नो सर्टन्टी इन धीस

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 13:32 नवीन
देअर इज नो सर्टन्टी इन धीस वर्ल्ड, ओन्ली प्रोबेबिलिटी ! आणि प्रोबॅबिलिटी वरच्या पहिल्या वाक्यात तिच्या कारणासह आहेच ! फेदरवेट साहेब, टुम्च्या विरोधाच्या फ्लोमदी वाहत जात टुमी व्हेअर व्हेअर चल्लाय टिक्डे लुकावे असे सजेस्ट्तो. टुमी इनोदी भाषेत लिव्हत असला तरी टुमच्या टर्कबुद्धिबद्दल आम्च्या मनात असलेला मान टुमी का कमी करू र्‍हाय्ले ब्रे? अर्थात टसे क्रराय्ला आमी कोण आडव्नार टुमाला म्हणा ? =)) असो, या धाग्यावर फार विनोद करण्याचा माझा मानस नाही. त्यामुळे, यापुढे महत्वाचा मुद्दा नसल्यास प्रतिसाद न देण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे. याचा अर्थ, माझ्याकडे मुद्दे/तर्क नाहीत असे नसून, तो मुद्दा प्रतिसादयोग्य नाही* असे मी समजले आहे असे तुम्ही समजावे. काय ?! :) ====== * : याला मिपाभाषेत फाट्यावर मारणे असे म्हणतात :) ;) मिपाभाषेतच हघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 12:35 नवीन
जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे प्रदर्शन वगैरे ज्या गोष्टी चघळल्या जात आहेत त्याचा एक मोठा पैलू सरळ इग्नोर मारला जात आहे. आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते. असे उभे राहणे भारताने अनेकवेळा बघितले आहे. त्यात काहीच नवीन नाही. बाळ ठाकरे, जेपी, राज ठाकरेपासून अण्णा हजारे पर्यंत, हार्दिक पटेल पासून मूकमोर्चा पर्यंत.. कधी लुंगीवाले, कधी भैय्ये, कधी राजकारणी, कधी ब्राह्मण, कधी भ्रष्ट सत्ताधारी, प्रत्येकदा कोणीतरी शत्रू कल्पून लोकांना एकत्र केले गेले, समर्थन मिळवले गेलेच. मुळात जनता समर्थनात उभी आहे हे अर्धसत्य फार खुबीने पसरवले जात आहे. इथे आपल्यात लपून असलेले 'अज्ञात काळेपैसेवाले' हेच आपले शत्रू आहेत, त्यांचा नायनाट करायला होईल तो त्रास सहन करायचा आहे ही सिंगल लाईन आयडिया मोदी आणि कंपू जनतेच्या गळी उतरवायला यशस्वी झालेत. किंबहुना कोणाला विचार करायला वेळ, दिशा, माहिती उपलब्धच झालेली नाही. ८ नोव्हेंबरपासून आजपर्यंत फक्त गोंधळाचीच स्थिती आहे. खुद्द जेटली संसदेत म्हणतात, आम्हाला काळापैसा किती असावा ह्याचा ना ८ नोव्हेंबरपूर्वी अंदाज होता न आता आहे. सरकारचे नियम बदलणे एकवेळ सोडा पण नॅरेटीव बदलत जात आहेत. कोणत्या उद्दिष्टांसाठी ही नोटबंदी केली त्याबद्दल आजही कोणतेही स्पष्ट अधिकृत खुलासे सरकारकडून, आरबीआयकडून आलेले नाहीत. जे जे कथित उद्दिष्टे प्रसारित केलीत ती फोल ठरत आहेत. किंवा त्यावर नोटबंदीने काही परिणाम होईल अशी परिस्थिती भविष्यातही दिसत नाही. जे काही छापे बिपे धाडी चालू आहेत ते नोटाबंदीशिवाय शक्य होत्याच. तरीही जनता सरकारसोबत, मोदींसोबत का 'दिसते' आहे? जनता सहन करते आहे ते फक्त एवढ्यासाठीच कि तिला वाटते, कुठेतरी कोण्या काळ्यापैशावाल्याची वाट लागली आहे. इथे खुद्द पंतप्रधानासारखा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेला माणूस म्हणतो की विरोधक हे पाकिस्तान्यांसारखे आहेत, काळ्यापैशावाल्यांची मदत करत आहेत. जनता विचार करते, आपण शूरवीर सैनिकांप्रमाणे कुणाशीतरी लढतो आहोत, काहीतरी बदल घडवत आहोत. गोंधळ उडवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. ह्यात बावरलेल्या सामान्य जनतेला जबरदस्ती सरकारची समर्थक आहे असे बळेच म्हणवून घेतलं जात आहे. सगळ्यांना सगळा काळ मूर्ख बनवता येत नाही. हे भाजप्यांनाही उत्तम कळलेले आहे, म्हणून पहिल्यापासून हेतूंच्या प्रामाणिकपणाचा जप सुरु आहे. म्हणजे उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे. समर्थकांनी काही समजून घ्यावे, मान्य करावे ह्याची आम्हाला तरी काही गरज वाटत नाही. ज्याचीत्याची मर्जी. आम्हाला तर सर्कस बघून फार मजा येते आहे. ही सर्कस अशीच चालू राहो. फुकट मनोरंजन बरे आहे.
  • Log in or register to post comments

सहमत.

अभिजीत अवलिया
Sat, 12/31/2016 - 12:50 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुमच्या वरच्या संपूर्ण

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 13:24 नवीन
तुमच्या वरच्या संपूर्ण प्रतिसादाचा अर्थ "जनता उल्लू है, बस उस्को उल्लू बनानेवाला चाहिये" असा काढला तर तुमची काही हरकत असेल का? बाकी, गोंधळ आहे तो या योजनेच्या (आणि पर्यायाने मोदींच्या) विरोधकांच्या मनात! नेमका कशाला विरोध करायचा? मग काय, शेवटी जनतेला मूर्ख ठरवायचं आणि योजनेच्या समर्थकांना भाजपचे समर्थक (भाजपे) ठरवायचं! सोप्पं आहे! मुळात या योजनेचे अपयश कितीही आदळआपट केली तरी लगेच सिद्ध करणं शक्य नाहीये हे उघड असताना कशी फेल गेली हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करायचाच कशाला? मग तो करण्यासाठी शेवटी माझ्यासारखे योजनेचे समर्थक मूर्ख ठरवायचे! डांगेजी, खेदाने नमुद करतो, अजिबात पटले नाही हो! काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच्या आंदोलनांची आताच्या जनतेच्या प्रतिक्रोयेशी तुलना म्हणजे थोडक्यात सगळी जनता हि "कार्यकर्ता" ह्या प्रकारात मोडण्यासारखे आहे. थोडासा धीर आवश्यक आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कोणाला खेद वाटतो की आनंद याची

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 13:54 नवीन
कोणाला खेद वाटतो की आनंद याची काळजी करायला मी लिहित नाही. कोणाला न्यायाधिश बनायची हौस असेल तर ज्याचीत्याची मर्जी.. सानु की? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 14:05 नवीन
ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे राहुद्या हो बाजूला (ते वाचक ठरवतीलंच)! धिर धरायला हवा कि नको यावर तुमचं मत सांगा. नाहीतरी एवीतेवी जनता मूर्खात निघालीच आहे तर कमीत कमी वायफळ का होईना पण चर्चा करू, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

समर्थकांनी कितपत धीर धरलाय ते

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 14:11 नवीन
समर्थकांनी कितपत धीर धरलाय ते बघतोच आहोत... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

काय बोलणार?:):)

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 14:54 नवीन
काय बोलणार?:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काहीतरी चर्चेबद्दल बोलत होते

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 15:09 नवीन
काहीतरी चर्चेबद्दल बोलत होते तुम्ही..? काय झालं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

अपयश सिद्ध करायला धिर धरायला

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/31/2016 - 15:30 नवीन
अपयश सिद्ध करायला धिर धरायला पाहिजे की नाही हे सांगायचा धिर दाखवलात कि होईलच कि चर्चा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

इन अदर सेन्स, विरोधकांनी गप्प

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 15:36 नवीन
इन अदर सेन्स, विरोधकांनी गप्प बसा! नथिन्ग न्यू! ;-) यश सिद्ध करायची घाई झालेल्यांना काय सल्ला आहे तुमचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

तो आदर सेन्स कसा काय लावला

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 01/01/2017 - 10:29 नवीन
तो आदर सेन्स कसा काय लावला बुआ? काहीच्या काही (बहुतेक विक्टिम कार्ड)! एक साधा प्रश्न विचारला मी कि डेटाच्या आधारावर अपयश सिद्ध करायला धिर धरायला हवा कि नाही किंवा यश सिद्ध करणाऱ्यांचे आकडे खोडून काढावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फुलप्रूफ प्लॅन

ट्रेड मार्क
Tue, 01/03/2017 - 20:48 नवीन
तो फुलप्रूफ प्लॅन देणार होतात तुम्ही, त्याचं काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नोटबंदीची सरकारमान्य गरज,

संदीप डांगे
Tue, 01/03/2017 - 20:56 नवीन
नोटबंदीची सरकारमान्य गरज, कारणे सांगा, हेतू सांगा, उद्दिष्टे सांगा! देतो प्लॅन, त्यात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

"तुम्ही सुरुवातीला या योजनेचं

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/04/2017 - 10:47 नवीन
"तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं?" हे पण कळालं तर मग नेमक्या मुद्द्यांवर चर्चा करून डोंगरभर प्रतिसादांपैकी नेमके कुठले प्रतिसाद फुसके झाले हे ठरवता येईल, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

=)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/31/2016 - 14:12 नवीन
=)) =)) सोप्पय. जनता आपल्या बाजूने वागली की ती हुश्शार असते, विपरित वागली की मूर्ख असते ??? !!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

=)) =))

संदीप डांगे
Sat, 12/31/2016 - 14:48 नवीन
=)) =)) ७० वर्षाची घाण साचते आहे आणि तरीही त्याच त्या लोकांना निवडून देणारी जनता हुश्शार की मूर्ख? करा हिशोब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा