Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निलरंजन on Sat, 02/22/2014 - 15:37
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
  • 23667 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Sat, 02/22/2014 - 15:48

Permalink

मी पैला मी पैला

पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली,
तरी त्यांचे पाशवीपण सरायला काही तयार नाही. बाकी सहमत आहेच. पण
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
आमच्या मते ते अंदाजे १०,१०१ वर्षांनंतर स्थापन होईल. बाकी जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत.

Submitted by सस्नेह on Sat, 02/22/2014 - 15:59

Permalink

खरंच येणार असेल तर अजून कशाची

खरंच येणार असेल तर अजून कशाची वाट पाहत आहे कोण जाणे !

Submitted by कवितानागेश on Sat, 02/22/2014 - 16:00

Permalink

अजून वेळ आहे ना?

अजून वेळ आहे ना? चला, हवा तितका पाशवीपणा करुन घेउ. ;)

Submitted by अजया on Sat, 02/22/2014 - 22:33

In reply to अजून वेळ आहे ना? by कवितानागेश

Permalink

आओ कुछ पाशवी करते है

आओ कुछ पाशवी करते है ;)

Submitted by निलरंजन on Sat, 02/22/2014 - 16:05

Permalink

नक्कीच तुम्हाला कल्कीच्या

नक्कीच तुम्हाला कल्कीच्या हातून मोक्षप्राप्तीची ईच्छा दिसतेय

Submitted by कवितानागेश on Sat, 02/22/2014 - 16:13

In reply to नक्कीच तुम्हाला कल्कीच्या by निलरंजन

Permalink

अर्थातच!

अर्थातच! =)) विरोधी भक्तीच जास्त तीव्र असते. माहित नाही का?

Submitted by बॅटमॅन on Sat, 02/22/2014 - 16:41

In reply to अर्थातच! by कवितानागेश

Permalink

त्यात परत कल्की कोचलीन असेल

त्यात परत कल्की कोचलीन असेल तर तिच्यापुढे लीन होण्याची मजा औरच!

Submitted by प्रचेतस on Sat, 02/22/2014 - 16:47

In reply to त्यात परत कल्की कोचलीन असेल by बॅटमॅन

Permalink

ईईईईईईईईइ तुला आवडते ती?

ईईईईईईईईइ तुला आवडते ती? =))

Submitted by सूड on Sat, 02/22/2014 - 17:09

In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस

Permalink

>>ईईईईईईईईइ

>>ईईईईईईईईइ तुला आवडते ती? काय वाईट आहे त्या बिचारीत?

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/24/2014 - 00:26

In reply to >>ईईईईईईईईइ by सूड

Permalink

+१

हा ना राव. चांगली तर आहे.
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/24/2014 - 01:42

In reply to +१ by बॅटमॅन

Permalink

हां ना राव. चांगली आहे बिचारी

हां ना राव. चांगली आहे बिचारी. मला मिपावर आले की तिचीच आठवण येते. माझा एक लै चांगला मित्र सेम तिच्यासारखा दिसतो अन हसतो. ;-)

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/24/2014 - 01:59

In reply to हां ना राव. चांगली आहे बिचारी by अभ्या..

Permalink

खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी

खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी अन कल्की हे भैणभौ आहेत ;)

Submitted by आदूबाळ on Mon, 02/24/2014 - 02:09

In reply to खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी by बॅटमॅन

Permalink

आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा

आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा चुलतभाऊ आहे.

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/24/2014 - 12:38

In reply to आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा by आदूबाळ

Permalink

अगदी अगदी

अगदी अगदी ;)

Submitted by अमोल मेंढे on Sat, 02/22/2014 - 17:41

In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस

Permalink

मला पण

अहो त्यांनाच काय...मलापण आवडते ती

Submitted by खटपट्या on Sat, 02/22/2014 - 22:55

In reply to मला पण by अमोल मेंढे

Permalink

मलापण !!!

मलापण !!!

Submitted by वेताळ on Fri, 02/28/2014 - 10:03

In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस

Permalink

कल्की कोचलिनने..तिच्या

पहिल्या पिक्चर मध्ये अभय देओल बरोबर एकदम झक्कास काम केले आहे. ति हिरोबरोबर बोलत असताना तिच्या चेहर्‍यावर कॅमेरा आल्यावर हमखास किस करावा लागणार असे तिचा चेहर्‍यावर कायम भाव असतो अन ते खरे हि असते.
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 02/28/2014 - 15:51

In reply to कल्की कोचलिनने..तिच्या by वेताळ

Permalink

पैलं सगळेच छान वाटते...

पण हिच जोडी जेंव्हा ZNMD मधे किस करु लागली तेंव्हा लस्ट टोटल मिसेंग होता..! एक्स्ट्रीम मेचॅनिकल किस.

Submitted by तिमा on Sat, 02/22/2014 - 16:32

Permalink

स्पष्टीकरण

कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल वरील वाक्यांचा अर्थ कळला नाही. कलियुग आत सुवर्णयुग येईल म्हणजे कलियुगाच्या आंतच सुवर्णयुग येईल असे म्हणायचे आहे का ? चालेल जे कलियुग सुवर्णयुग नंतर याचा काय अर्थ? म्हणजे सुवर्णयुगानंतर पुन्हा कलियुग येणार आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे. जाताजाता:- ह्या धाग्यावर तर २०२५ सालीच असेंडिंग कलियुग संपेल असे लिहिले आहे. त्यानंतर असेंडिंग द्वापारयुग चालू होणार म्हणे. खरे खोटे तो कल्कीच जाणे. http://www.grahamhancock.com/forum/DMisraB6.php काही म्हणा, माझ्या स्वाक्षरीने इतके लोक प्रभावित होतील हे माहित नव्हते.
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 02/22/2014 - 16:36

Permalink

आँ...!

नास्ट्रोडम्स ? येवडा मनावर घेतला ? LoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoL

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/25/2014 - 09:49

In reply to आँ...! by आत्मशून्य

Permalink

येवडा

येवडा ? "र" राहिला का ह्यात ?

Submitted by अनुप ढेरे on Sat, 02/22/2014 - 16:45

Permalink

अरविंद केजरिवाल आहे बहुदा

अरविंद केजरिवाल आहे बहुदा कल्की. पंतप्रधान झाला की शपथग्रहणाच्या वेळेला गौप्यस्फोट करणार आहे तो.

Submitted by तिमा on Sat, 02/22/2014 - 16:55

In reply to अरविंद केजरिवाल आहे बहुदा by अनुप ढेरे

Permalink

त्यानंतर

तो आपले नांव 'अरे विन कल्कीवाल' असे लावणार आहे.

Submitted by विकास on Sat, 02/22/2014 - 17:49

In reply to अरविंद केजरिवाल आहे बहुदा by अनुप ढेरे

Permalink

मला वाटते

राहूल गांधी जास्त योग्य ठरतील.

Submitted by निलरंजन on Sat, 02/22/2014 - 16:45

Permalink

कल्कीच्या जन्मानंतर पाशवी

कल्कीच्या जन्मानंतर पाशवी लोकांचा नाश होईल आणि त्यानंतर सुवर्ण युग असेल आणि पुन्हा उलट गिनती सुरू होईन म्हणजे परत सत्य| कृत| ञेता| द्वापार युगांचा खेळ सुरूच राहिल

Submitted by प्रचेतस on Sat, 02/22/2014 - 16:56

In reply to कल्कीच्या जन्मानंतर पाशवी by निलरंजन

Permalink

उलट गिनती सुलट लिहिलेली आणि

उलट गिनती सुलट लिहिलेली आणि त्यात सत्य आणि कृत असे उल्लेख पाहून=))

Submitted by इरसाल on Sat, 02/22/2014 - 16:54

Permalink

वोक्के

कल्की हसी मुक्कालात के लिए आआआआआआआज रात के लिए हम्तुम खुदा हो जाते है अच्छा चलो खो जाते है !

Submitted by वेताळ on Sat, 02/22/2014 - 17:01

Permalink

अजुन मागे आहात

ऑफिशियली सुवर्णयुग चालु झाले आहे.

Submitted by जेपी on Sat, 02/22/2014 - 17:11

Permalink

बर झाल तुमी हा विषया घेतला .

बर झाल तुमी हा विषया घेतला . नायतर पुर्वीचे अवतारावर लयी जंगी चर्च्या झाल्यात बगु याच काय होताय .

Submitted by निलरंजन on Sat, 02/22/2014 - 17:24

Permalink

असे म्हणतात की कल्कीचा जन्म

असे म्हणतात की कल्कीचा जन्म दक्षिण भारतातला असेल त्यांच्या कडे पांढरा अश्व असेल जो उडण्याची क्षमता ठेवेल असे ही सांगितले जाते की युगानयुगे जिवंत असलेले हनुमान त्यांच्या कामात मदत करतील आणि शेवटी जीवन त्यागतील

Submitted by वेताळ on Sat, 02/22/2014 - 17:36

Permalink

खुपच सुंदर्......पण त्रोटक माहीती

पाढंरा उडणारा घोडा पाळणारे दक्षिण भारतात दोनच लोक आहेत १.विजयमल्ल्या २.श्रीनिवासन बघु ह्यातले कल्की कोण होतात ते.

Submitted by निलरंजन on Sat, 02/22/2014 - 17:53

In reply to खुपच सुंदर्......पण त्रोटक माहीती by वेताळ

Permalink

त्या दोन नालायकांचे नाव

त्या दोन नालायकांचे नाव सुद्धा घेऊ नका दोघे अप्पलपोटी स्वार्थी देवा चा कणभरहि लवलेश नाहीये त्यांच्या कडे आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते उत्काती मधे ते नामशेष झाले त हरकत नाही हा संशोधनाचा विषय असेल

Submitted by शैलेन्द्र on Sat, 02/22/2014 - 23:38

In reply to त्या दोन नालायकांचे नाव by निलरंजन

Permalink

आणि बाय द वे हयाआधी उडणारे

आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते उत्काती मधे ते नामशेष झाले त
पण त्यांना घोडे म्हणायचे का?

Submitted by प्रचेतस on Sat, 02/22/2014 - 23:42

In reply to आणि बाय द वे हयाआधी उडणारे by शैलेन्द्र

Permalink

हे पहा ते पंखवाले उडणार घोडे

हे पहा ते पंखवाले उडणार घोडे-पेगॅसस =)) Image removed.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 02/23/2014 - 23:29

In reply to हे पहा ते पंखवाले उडणार घोडे by प्रचेतस

Permalink

हे तर काहीच नाही !

हे तर काहीच नाही ! ३०० वर्षांपूर्वीपर्यंत मादागास्करमध्ये हत्ती-पक्षी (एलेफंट बर्ड्स) होते. फ्रेंच वसाहतवद्यांनी त्यांना शिकार करून नामशेष केले. आता मिळालेल्या त्यांच्या अंड्यांच्या अवशेषातून डि एन ए वेगळा करून त्यांना परत जिवीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत !

Submitted by प्रचेतस on Mon, 02/24/2014 - 20:58

In reply to हे तर काहीच नाही ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

रोचक दुवा आहे.

रोचक दुवा आहे.

Submitted by वेताळ on Sat, 02/22/2014 - 17:37

Permalink

उडणारा घोडा ह्याचा अर्थ

हवेत सैर करणारा घोडा असे घ्यावे.

Submitted by वेताळ on Sat, 02/22/2014 - 17:56

Permalink

नक्कीच आमचे परमभाग्य की आम्ही सुवर्णकाळात

चक्क जिवंत आहोत. परत एकदा उडणारे घोडे म्हनजे युनीकॉर्न आम्हाला बघायला ( हॅरी प्लॉटर नंतर) मिळतील.
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Sat, 02/22/2014 - 18:13

Permalink

(१२) अत्त - वर्ग :

(१२) अत्त - वर्ग : उत्तना व कतं पापं अत्तना संकिलिस्सति । अत्तना अकतं पाप अत्तना व विसुत्र्झाति । सुद्धि असुद्धी पच्चतं नात्र्यमत्र्य विसोधये ।। अर्थ : आपण केलेले अकुशल कर्मच (पाप) आपल्याला मलीन करते व अकुशल कर्म (पाप कर्म) न करणे, कुशल कर्म करणे आपल्याला शुद्ध करते. अशा तऱ्हेने मानवाची शुद्धी - अशुद्धी स्वत:वरच अवलंबून आहे. विवेचन : तथागत बुद्ध आपल्या कोणत्याच संदेशात 'कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका' असे सांगत नाहीत. उलट केलेल्या कर्मास निच्छितच तुंम्ही स्वत: पात्र आहात. बुद्धाच्या शिकवणीचा सार विचारात घेतल्यास निष्क्रिय व आळसावलेला मानव हा एखाद्या भंगारात पडलेल्या इंजिनसारखा भूमीला ओझे वाटतो. परंतु कर्म कसे असावे, त्याबाबत मात्र बुद्धाने समर्पकता मांडली आहे. कर्म हे कुशल कर्म (सत्कर्म) असावे. ज्याने तुमची उन्नती होईल. इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. स्वत:चा उत्कर्ष बुद्धाला मुळीच नको नव्हता परंतु आपल्या उत्कर्षाने इतरांचे अकल्याण, नुकसान मात्र झालेले नसावे. तुमच्या कर्माने जेंव्हा इतरांना शून्यवत सुद्धा हानी पोहचत नसते, तेंव्हा तुमचे कर्म शुद्ध व योग्य असे पात्र ठरते. या प्रकारे तुमचे कर्म घडत नसेल तर पापास लायक ठरते. असे पाप झाले तर ईश्वरवादी धर्म हे पाप धुवून काढण्यासाठी शुद्धता प्राप्त करून घेण्यासाठी अग्नी, होम करतात. असे होम करून पापाचे डाग किती धुतले जातात हे ईश्वरवाद्यांनाच माहित. परंतु बुद्ध मात्र अशाप्रकारचा कोणताही शुद्धतेचा उपाय सुचवत नाहीत. बुद्ध म्हणतात एकदा झालेले अकुशल कर्म (पाप कर्म) पुन्हा केव्हाही न करणे हेच खरे प्रायश्चित ठरावे. परंतु ही वेळ मानवावर यावी तरी का ? असा बुद्धाच्या शिकवणीतून अर्थ निघतो. त्याचा विचार केल्यास मन अशुद्ध विचारांशी वश होत गेल्यास मानवावर अशी वेळ येवून ठेपते. त्यामुळे मन व मनातील विचार नेहमी शुद्ध ठेवावे आणि हे आपल्या अगदी आवाक्यात असते, असे तथागत बुद्धाचे मत आहे. थोडक्यात मानव स्वत:ला स्वत:च घडवू शकतो. आपणच स्वत: स्वत:चे कुंभार आहोत दुसरा कुणीही नाही. बाही तुमची मर्जी ..... (बुध्द हा अवतार होता असा विनोदी विचार मांडणे आणि संपादकानी त्याकडे दुर्लक्ष करणे , दरवेळी त्याला दुजोरा देणे हे वा त्यावर गप्प बसणे हे संस्थळ व निर्दयी संपादक प्रगल्भ झाल्याचे लक्षण का मानु नये ?? )

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/25/2014 - 09:56

In reply to (१२) अत्त - वर्ग : by सुहास..

Permalink

वाद

तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा ) फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ???
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 02/25/2014 - 20:07

In reply to वाद by प्रसाद गोडबोले

Permalink

तुमच्याशी एकदा बौध्द

तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा ) >> तुम्हाला संवाद असे म्हणायचे असावे. फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ??? >> तुम्ही स्विकाराल ? जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ? (अवतार मानता ना ? )

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/25/2014 - 20:33

In reply to तुमच्याशी एकदा बौध्द by सुहास..

Permalink

नक्कीच

वाद म्हणजे संवादच म्हणायचे होते ..
जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?
हो मी आत्ताही बुध्दाला हात जोडतोच ... आणि त्याचे तत्त्वज्ञान पटले तर का नाही स्विकारणार ? हां , फक्त एक आहे की बुध्द धर्मात जातिव्यवस्था नव्हती म्हणुन बुध्द धर्म ग्रेट असे काही मुद्दे मांडणार असाल तर चर्चा नको . चर्चेला खालील तत्त्व ठेवुयात
आपण ज्ञान , तत्त्वज्ञान, कर्म , आत्मा , परमात्मा , तर्क , जीव शिव , मुर्तीपुजा वगैरे तात्विक मुद्दे आणि वैदिक आणि बौध्द मतातील फरक आणि त्यातील कोणते लॉजिक बिनतोड असेल तो धर्म ग्रेट
चालेल ?

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/25/2014 - 20:41

In reply to नक्कीच by प्रसाद गोडबोले

Permalink

आणखी एक

जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?
ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? मला स्वतःला वैदिक मतातील वेदान्त आणि सांख्यमताचा अभ्यास करुन कळाले तेवढे मत मांडायला आवडेल
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 02/25/2014 - 23:01

In reply to आणखी एक by प्रसाद गोडबोले

Permalink

मी धम्मपद, बर्‍यापैकी जातककथा

मी धम्मपद, बर्‍यापैकी जातककथा वाचल्या आहेत. बुद्धाची शिकवण अवडली, पटली. पुढे योगायोगाने टिक न्हात हान या सध्या फ्रान्समध्ये वास्तव्य असलेल्या व्हिएतनामी बौद्ध भिक्खूने लिहिलेली रिकन्सिलिएशन - हीलिंग दी इनर चाईल्ड आणि अँगर ही दोन पुस्तके वाचली. लेखकाने पुस्तकांमध्ये जे काही लिहिलं आहे त्याला तो बौद्ध मानसशास्त्र (बुद्धीस्ट सायकॉलॉजी) म्हणतो. या दोन पुस्तकांनी अक्षरशः मनाचा तळ गाठला. जे काल परवापर्यंत केवळ "ईंटेलिजन्सच्या" पातळीवर होतं ते या पुस्तकांनी जाणिवेच्या पातळीवर आणलं.
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/27/2014 - 00:06

In reply to मी धम्मपद, बर्‍यापैकी जातककथा by धन्या

Permalink

येउदे एक लेख यावर ...!

बघू तरी माहिती ज्ञानात परावर्तित झाल्यावर माणुस कसा बनतो ते. एकदम बिंधास्त बनतो की झुंडिने शिकार करू लागतो ते.
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/27/2014 - 19:38

In reply to आणखी एक by प्रसाद गोडबोले

Permalink

ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ..

ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? >> माझा प्रश्न सरळ आहे , आणि शिंपल ही ......उगा वेटोळे कशाला ? तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाही .... @ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ... मग बोलणे खुंटले .....लेखन सीमा
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 02/27/2014 - 20:15

In reply to ह्याच्यावरुन आणखी एक आठवले .. by सुहास..

Permalink

@ धन्या ...तु तोच आहेस ना "

@ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ... मग बोलणे खुंटले .....लेखन सीमा
होय. मी तोच आहे. गौतमाला त्याच्या वडीलांनी जर सोशलाईज्ड केलं असतं तर तो तत्कालिन इतर राजकुमारांप्रमाणे युद्धविदयेत प्रविण झाला असता, राज्यकारभार कसा हाकावा हे शिकला असता आणि पुढे जाऊन सम्राट गौतम बनला असता. एक राजा म्हणून आयुष्य जगला असता. मात्र त्याच्या वडीलांनी त्याच्या भविष्याचा धसका घेऊन त्याला कुठल्याही दु:खाची जाणिव होणार नाही याची काळजी घेतली. मात्र जेव्हा दु:ख अचानकपणे समोर आले तेव्हा तो धक्का गौतम सहन करु शकला नाही. जगात दु:ख आहे याची त्याला पहिल्यांदा जाणिव झाली. त्याने दु:खाच्या कारणांचा शोध सुरु केला. आणि गौतमाचा गौतम बुद्ध झाले. त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. :)
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/27/2014 - 20:21

In reply to @ धन्या ...तु तोच आहेस ना " by धन्या

Permalink

त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ

त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. >> छान ..मतितार्थावरून आठवल ..कुठेतरी वाद घालत होतो ...मित्र मुस्लीम होता ..शेवटच वाक्यावर मला प्रतिवाद करता आला नाही .. : हनुमान पण आमचाच रे !! जस सलमान, सुलेमान, रेहमान ..तसंच हनुमान !! : संभ्रम

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/27/2014 - 22:54

In reply to ह्याच्यावरुन आणखी एक आठवले .. by सुहास..

Permalink

कारण सोप्पं आहे

तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाही
कारण बुध्द अवतार असला तरी त्याचे तत्त्वज्ञान मुळातच खंडीत आहे .... तर्कशुध्द नाही ...हे कुमारिलभट्ट ह्यांनी मीमांसेच्या आधारे आणि श्रीमदाद्यशंकाराचार्यांनी वेदांताच्या आधारे सातव्या शतकाच सप्रमाण सिध्द केले आहे !! "एकेहाती दन्तु | जो स्वभावता खंडीतु | तो बौध्दमत संकेतु | वर्तिकांचा ||" श्लोक क्र. बारा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला असे माऊलींनीही म्हणुन ठेवले आहे ... अवांतर : आपले मःपुर्वक आभार ! आपण खरेच वाद संवाद करुयात , निव्वळ प्रतिसाद द्यायचा साठी आज कित्येक दिवसांनी ज्ञानेश्वरी उघडली ... चर्चा सुरु झाल्यावर खरेच अजुन अभ्यास होईल . जय जय रामकृष्णहरी !!
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/27/2014 - 23:41

In reply to कारण सोप्पं आहे by प्रसाद गोडबोले

Permalink

हसायला देखील आले नाही त्या

हसायला देखील आले नाही त्या श्लोकामुळे ..कुमारभट्टील काय आणि शकराचार्याच्या कालखंडाची पार वाट लावलीत ( तुम्ही शंका राचार्य लिहीले आहे, चुकीचे वाचले त्याबद्दल आम्ही स्वता ला माफ केले ! ) मग माउलींचा संदर्भ काय ?? अहो माझ्या सारख्या कालगणनेतच निराधारी असलेल्या माणसाला किमान मराठी दिनी आणि शिवशंकराची ' महाशिवरात्री दत्ताच्या गुरुवारी कशी आली याचाच घोळ समजेना ..त्यात तुम्ही असे महा-अवघड प्रतिसाद ताकल्यावर कसे व्हायचे आमचे . तुम्ही जिंकलात .....धन्यवाद ...पण जाता जाता ........ १३) लोक - वर्ग : अन्धभुतो अय लोको तानुकेत्य विपस्सात । सकुन्तो जाल मुत्तो व अप्पो सग्गाय गच्छामि ।।। अर्थ : हे जग आंधळे आहे. हे थोडेच लोक पाहू शकतात आणि जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे स्वर्गाला घिरट्या घालतात. विवेचन : स्वर्ग म्हणजे ईश्वरवादी धर्मातील देवांचे राजमहालांचे ठिकाण नव्हे. तर बुद्ध धम्मात स्वर्गाचा अर्थ विकारी विचारांचा खालसा असा लागतो. जिथे व्यथा विवंचना लोभ मोह माया अशा असंख्य विकारी विचारांपासून मुक्तता असते ती अवस्था. अशा अवस्थेला सद्विचारी माणूस पोहचू शकतो. असो . परंतु जग डोळस आहे. अंध व अंधकाराच्या काटेरी कुंपणात खितपत पडलेले आहे. तिथे आपली सुद्धा जागा आहेच. ज्याप्रमाणे व्यक्ती त्याच्या अनेक प्रकृती असतात त्या प्रमाणे जे दिसते तसे असतेच असे नसते. परंतु हे पारखून पहाण्यासाठी आपल्याकडे बुद्धी असते ही बुद्धी आपल्यासारखी इतरांनाही असतेच असते. अगदी आपण ज्याला मूर्ख म्हणतो त्या मुर्खाला मूर्ख होण्याइतपत बुद्धी असते ते नाकारता येत नाही. तिच्या वापराच्या पद्धतीवरून इतर व आपण यात नेमका फरक पडतो. ज्याला आपण दूरदृष्टी असे म्हणतो. परंतु दूरदृष्टीत सुद्धा योग्यता अयोग्यता म्हणजेच सत्यता असत्यता येतेच येते. जो बुद्धीचा वापर सत्यविचारातून करत असतो. तोच मानव विश्वातील अंधकाराला थेटपणे ओळखू शकतो व तो या काटेरी कुंपणातून स्वत: भरारी घेतो. परंतु इतरांना सुद्धा तो बळ पाठी ठेवून जातो. जो सदाचार आणि सद्विचारांशी इमान राखतो. त्याचे जीवन प्रफुल्लीत होते....... वाश्या ....शेवटी वाश्याच !!

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com