प्रकटन
शशक- निवडणूक २
आधीचा भाग शशक- निवडणूक
आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो.
कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल.
आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी?
कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो.
आबा - काय भाव आहे यावेळी?
कार्यकर्ता- ५०० रुपये.
वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)
नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला.
संदर्भ असा -
'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे. त्याचा ट्रेलर इथे आहे :
या ट्रेलरच्या निमित्ताने २०२१/२२ साली घडलेली जर्मनीतली तशीच घटना वर आली.
ही मूळ केस काय आहे हे या मूळ पिटिशन मधून कळेल.
थोडक्यात झाले असे -
कॅलेंडर
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे.
दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात. त्यात तारखांबरोबरच विविध सण, उत्सव,तिथ्या, आणि सर्व धर्मीयांना उपयुक्त माहिती असते.
दिनदर्शिका ही अतिशय उपयुक्त वस्तू तर आहेच पण त्याचबरोबर ती अतिशय इंटरेस्टिंग आणि मनोरंजक वस्तू आहे.
नर्मदे हर , /;/ .
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे.
शशक--दरोडा
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत?
शंभर अदाणी हवे आहेत…
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग !
विहीर
"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे."
मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे.
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल.
(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
- चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन..