जगभर मंदीची लाट जोरदार वहात आहे.अजून वर्षभर तरी ती रहाणार असे आपले अर्थतज्ञ सांगत आहेत.सहाजीकच भारतालाही ती झळ पोचत आहेच.बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय बंद पडत आहेत.महागाई वाढत आहे.अशा सर्व गोष्टींचा परीणाम शेवटी माणसाच्या मनावर होणारच.मग तो कुठेतरी आधार शोधू लागणार.दान धर्म ,बाबा,बूवा ,महाराज यांच्या कडे ओढला जाणार.तिथे गेल्यावर काळजीतून आपली मुक्तता होईल अशी त्याची भाबडी आशा असणार...
हल्ली बाबा ,महाराज, प.पू. यांचे मोठे मोठे पोस्टर्स,बॅनर्स यांनी भरून गेलेले बस स्टॉप्स , भिंती अगदी सहज पहायला मिळतात.सत्संग, महाशिबिर ,दर्शन सोहळांनी शहरातली मैदानं भरलेली असतात.त्या शिबिरात तुम्ही गेलात तर तुम्हाला मनशांती मिळेल ,मोक्ष मिळेल ,पैसा मिळेल असं वाट्टेल ते सांगितलं जातं. मंदीचा अडचणीचा काळ हा तर अशा लोकांना फूल प्रोफ़िट चा असतो.जितक्या अडचणी जास्त तितके त्यांचे गिऱ्हाईक जास्त!आडला नारायण गाढवाचे पाय धरी याप्रमाणे अडलेली लोकं या गाढवांचे पाय धरतात. महाराष्ट्रातील कितीतरी बाबा बुवा महाराजांनी ज्ञानेश्वरीवर बक्कळ पैसे कमावले आहेत.ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पसायदानातही स्वत:चे नाव टाकले नाही पण हे so called महाराज आपले नाव खाली लावायला विसरत नाहीत.अगदी बडी बडी सुशिक्षित माणसेही त्यांच्या कडे अशी जातात यचं मला फ़ार आश्चर्य वाटतं.मग गावाकडची अशिक्षित लोकं जर एखाद्या भोंदू साधू कडे गेली तर त्यांना का नावं ठेवावीत??त्यांच्यात आणि तूमच्यात फरक काय??राजकारण्यांमध्ये अशा महाराजांच्या सत्काराची चढाओढ चालू असते.ते किती महान आहेत ,भगवान आहेत हे लोकांना पटवून पटवून संगीतलं जातं,TV channels वाले त्याला भरपूर प्रसिद्धी देतात.तो माणूस महाराज व्हायच्या आधीची history कोणिही तपासून पहात नाही.जर तपासून पाहिलं आणि काही झोल सापडला तर त्याचे आनूयायी ,चेले गोंधळ घालतात , बसेस फोडतात , बंद करतात.
१००००००००० लोकसंख्या असलेल्या भारतात किमार लाखावर बाबा बूवा असतील.सर्वात सोपा ,भरपूर पैसे ,प्रसिद्धी मिळतेच त्याचबरोबर पूढच्या ७ काय १४ पिढ्यांची सोय या धंद्यातून करता येते.सोबत दिमतीला free सेवक असतातच.
पण हे असच चालू रहाणार आहे का??भारत हा बाबा बूवा साधूंचाच देश असणारे का??
माझ्यामते तरी अशा भोंदूंना आपणच हाकलून लावलं पाहीजे.आपणच जर मनानी कणखर झालो,संकटाला सामोरं जाण्याची ताकद जर आपण आपल्यात निर्माण केली तर काय गरज आहे या बाबा,बूवांच्या कुबड्यांची??ज्ञानेश्वरी स्वत: वाचून स्वत: त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही का??आपण स्वत: कसं जगावं हे आपण art of living मधून शिकण्याइतपत आपण विचारहीन झालो आहोत का?? जगायचं कसं हे सूद्धा दूसऱ्यानी सांगावं??प.पू.ंचा आशिर्वाद घेतल्यानी व्यवसायाय प्रगती होणार आहे का??बालाजीला या वर्षी जर २ रूपये दिले तर पूढच्या वर्षी तो तूम्हाला ४ रूपये द्यायची ऐपत देतो असं म्हणतात.जर देवही अशी लाच घेत असेल तर त्याला देव का म्हणावं??मग सरकारी कचेऱ्यांमधे लाच आधिकृत केली तर?ह्यात देवाचा काहीही दोष नसून मनूष्य-प्रौऋत्तीचा आहे.मनोभावे एखद्यानी कही मगितलं तर त्याला ते मिळणार का त्यासाठी १०० ची नोटं दानपेटीत टाकावीचं लागणार??
स्वत:वर विश्वास ठेवणं हा या सर्वांवरचा जालीम उपाय आहे......तो असेल तर तोम्हीच तुमचे देव असाल..अर्थात हे शेवटी माझं मत आहे....आणि भारतात लोकशाही आहे... :)
प्रतिक्रिया
15 Jan 2009 - 9:41 pm | पाषाणभेद
एकदम सडेतोड लेख. फारच छान.
अशीच स्थिती भारतात असणार्या मंदिरांची (मस्जीद आदी सर्व) आहे. कितीतरी पैसा या ठिकाणी कुजतोय.
आणि भारतात लोकशाही आहे म्हणून आपण तो वापरात काढू शकत नाही.
"आपण स्वत: कसं जगावं हे आपण art of living मधून शिकण्याइतपत आपण विचारहीन झालो आहोत का?? जगायचं कसं हे सूद्धा दूसऱ्यानी सांगावं?"
खरयं. आणि लोकं या बुवांकडे जावूनसूध्धा त्यांच्या विचारात फरक पडत नाही.
-( बुवाबाजी च्या नादी न लागणारा सणकी )पाषाणभेद
15 Jan 2009 - 9:53 pm | लिखाळ
बाबा बुवा प्रकार पुरातन काळापासून आहेत. लोक अती व्यवहारी बनल्यामुळे देवाशी सुद्धा व्यावहारिक पातळीवरुनच संवाद साधत असतात. :)
काही केल्या तुझे मन पालटेना ।
दास म्हणे जन सावधान
असे रामदास पूर्वीच म्हणाले आहेत :)
मी नाही लाऊ शकत. त्यासाठी मला सोनोपंत दांडेकरांचे पाय धरावे लागतात.
आपल्या लेखाच्या शीर्षकाच्या पुढे सारथी असे लिहिले आहे. म्हणजे काय?
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.