भारतीय समाजात लोकप्रतिनीधी हा आता समाज कारणापेक्षा व्यवसाय या गटात मोडायला लागला आहे.
यात चुकीचे आहे असे नाही. मात्र आपले लोप्रतिनीधी हे नोकरी असावी तद्वत पेन्शन घेतात. यातही गैर वाटू नये.
मात्र एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. या लोकप्रतिनीधी सेवाशर्तीचे काहीच नियम अटी लागू नाहीत. उदा : निवृत्तीचे वय किमान शिक्षण आर्थीक निकष , उत्पन्न गट वगैरे.
बाकी लोकप्रतिनीधी सोडले तर तर बहुतेक सर्व वेतन भोगी पदांना हे नियम लागू आहेत. लश्करप्रमूख ( सेना प्रमूख) , सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश या सर्व पदांना हे नियम लागू आहेत. इतकेच काय पण राष्ट्रपतीपदाला देखील दोन च वेळा होता येईल अशी अट आहे.
लोकप्रतिनीधी हे जर नजतेचे सेवक म्हणवत असतील तर त्यांना काही नियम लागू असावेत असे वाटते. त्या नियमांमुळे भारतीय राजकारणात एकदम अचानक क्रांती घडेल असे नाही. पण बदलांस सुरवात होईल हे नक्की. उदा : नव्या विचारांना वाव मिळेल, तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, जातीपातीच्या संकुचीत विचारातून राजकारन बाहेर येईल इत्यादी.
माझ्या मते काही नियम असे असू शकतात.
१) लोकप्रतिनीधीला कोणत्याही निवडणुकांसाठी ( जिंको अथवा हरो) फक्त दोनच वेळेस उभे रहता येईल.
२) एखादे पद मिळाले तर त्याच्या कार्यकालाचे ऑडीट जनतेस जाहीर करावे लागेल.
३) एकच निवृत्ती वेतन चालू राहू शकेल.
४) वयाच्या सत्तरी नंतर कोणत्याच निवडणूकीसाठी उभे रहाता येणार नाही
५) एकापेक्षा जास्त जागांवरुन निवडणूक लढवता येणार नाही.
६ ) युती / पक्ष हे निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाला साम्गावे लागेल. आणि निवडून आल्यानंतर किमान एक वर्ष त्यात बदल करता येणार नाही.
तुम्हाला काय वाटतय या नियमांमुळे काय बदल घडतील राजकारणात
वाचने
13068
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व मुद्दे पट्ले, पण जर
त्या साठी राज्य घटनेत बदल करावा लागेल का?
मग पक्षांतर बंदी हे ही तसेच
In reply to त्या साठी राज्य घटनेत बदल करावा लागेल का? by Rajesh188
लोकसभेत निवडून जाणारे
In reply to मग पक्षांतर बंदी हे ही तसेच by विजुभाऊ
निवडणूक पूर्व केलेली युती
In reply to त्या साठी राज्य घटनेत बदल करावा लागेल का? by Rajesh188
हे माझे मत आहे बाकी लोकांना चुकीचं वाटू शकतं
In reply to निवडणूक पूर्व केलेली युती by बाप्पू
सेना ही भूमिपुत्र च्या
In reply to हे माझे मत आहे बाकी लोकांना चुकीचं वाटू शकतं by Rajesh188
मान्य
In reply to सेना ही भूमिपुत्र च्या by बाप्पू
काँग्रेस मुक्त भारत झाला
In reply to मान्य by Rajesh188
सेना ही भूमिपुत्र च्या
In reply to हे माझे मत आहे बाकी लोकांना चुकीचं वाटू शकतं by Rajesh188
सेना ही भूमिपुत्र च्या हक्कासाठी लढणारी संघटना आहेहसून हसून पोट दुखलं.मतदान सोडून लोकप्रतिनिधी निवड
जसे की??
In reply to मतदान सोडून लोकप्रतिनिधी निवड by NiluMP
सोप्पय. सगळ्यांनी
In reply to जसे की?? by बाप्पू
कोणीही IPS अधिकारी शकत नाही.
In reply to जसे की?? by बाप्पू
तुम्हाला जे वाटते
विषय कट कशाला.
In reply to तुम्हाला जे वाटते by उपयोजक
राजकारण्यांच्या
In reply to विषय कट कशाला. by विजुभाऊ
मांजराच्या गळ्यांत घंटा कोण
अतिशय चुकीची संकल्पना आहे.
In reply to मांजराच्या गळ्यांत घंटा कोण by साहना
@साहना
In reply to मांजराच्या गळ्यांत घंटा कोण by साहना
खयाली पुलावांत काहीही मसाले
In reply to @साहना by उपयोजक
व्यवहारीक काही तरी बोला
In reply to खयाली पुलावांत काहीही मसाले by साहना
तुम्हाला मदतीची गरज आहे !
In reply to व्यवहारीक काही तरी बोला by Rajesh188
अजुन थोडा शब्दाचा अपवय होवू ध्या
In reply to तुम्हाला मदतीची गरज आहे ! by साहना
भारतात कोणतेही काम करण्याची पद्धत
In reply to तुम्हाला मदतीची गरज आहे ! by साहना
नोकरशाही जागेवर आणायची असेल तर
थोडक्यात सांगायचे तर तुकाराम
In reply to नोकरशाही जागेवर आणायची असेल तर by Rajesh188
तुकाराम मुंढें हा सलणारा आणि
In reply to थोडक्यात सांगायचे तर तुकाराम by पिनाक
हीच गोष्ट आमदार खासदारांचा
पक्षभेद
.
काहीबरेच अपवाद आहेत. उदा. प्रशासनाचा कसलाच अनुभव नसलेले आणि कोविड मध्ये बऱ्यापैकी राज्याला सांभाळणारे उद्धव ठाकरे, प्रशासनातून थेट चांगले अर्थमंत्री झालेले मनमोहनसिंह, परराष्ट्र सेवेतून थेट परराष्ट्र मंत्री झालेले जयशंकर, राज्य सांभाळण्याचा मोठा अनुभव घेऊन पहिल्या प्रयत्नात देश सांभाळणारे नरेंद्र मोदी, राज्य सांभाळण्याचा अनुभव असून पहिल्या खेपेत छाप न पाडता आलेले पंतप्रधान देवेगौडा, प्रशासनाचा दांडगा अनुभव असून छाप न पडलेले पंतप्रधान गुजराल इत्यादी. दोन्ही टोकाची उदाहरणे आहेत.) अर्थात सलग काही दशके मुख्यमंत्री पदी असूनसुद्धा राज्याला विकसित करू न शकलेले ज्योती बसू अशीही काही उदाहरणे आहेतच. ***** २) एखादे पद मिळाले तर त्याच्या कार्यकालाचे ऑडीट जनतेस जाहीर करावे लागेल. >> ऑडिट निरुपयोगी असतात. वरच्या लेव्हलला तर टाकाऊ असतात. ती विकत घेता येतात. SBI, महाराष्ट्र पंजाब बँक, यांची ऑडिट होत नसतील का? (आणि जनतेला घंटा काही कळत नाही. बहुसंख्य जनता मेंढरांसारखी असते. त्यांना बुद्धी आणि पोटपेक्षा भावनेच्या मुद्द्यांची जास्त काळजी असते. त्यामुळे कुणी जास्त साड्या, टिव्ही, मंगळसूत्रे, वाटली, जास्त मंदिरे, मशिदी, चर्च बांधले तो सांख्यिकी च्या जोरावर जास्त योग्य ठरेल.) ***** ३) एकच निवृत्ती वेतन चालू राहू शकेल. >> निवृत्ती वेतनाची तरतूद बहुधा नोकरीच्या कार्यकाळात मिळणाऱ्या वेतनातून केली जाते. म्हणजे, कर्मचारी नोकरी करत असताना च सरकार त्याच्या पेन्शन चे पैसे बाजूला काढत असते. ते पैसे वेतनातून कापले जातात असे नसले तरी त्याची तरतूद कार्यकाळात केलेली असते. आणि तो नोकरीच्या फायद्याचा भाग असतो. जर पुढारीपण हे नोकरी समकक्ष करायचे असेल तर हा फायदा काढणे अनुचित होईल. ***** ४) वयाच्या सत्तरी नंतर कोणत्याच निवडणूकीसाठी उभे रहाता येणार नाही >> अंशतः सहमत. खरं तर नियमापेक्षा लोकांनी सत्तर नंतर स्वतःहून राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी. पण तेवढ्या प्रगल्भतेची वाणवा असल्याने नियम केल्याशिवाय पर्याय नाही. (अवांतर : आमच्या नगरसेवकाने २०१२ च्या निवडणुकीला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून ओबीसी जागेवरून निवडणूक लढवली होती. तोच मराठा मोर्चात सहभागी देखील होता. आणि त्या नगरसेवकाचा उल्लेख, मराठा असल्याचं निदर्शक असल्याने, आडनाव पुढे पाटील लावल्याशिवाय होत नाही. तात्पर्य, हव्या तेवढ्या वयाचे दाखले मिळवणं अगदीच सोपे आहे.) ***** ५) एकापेक्षा जास्त जागांवरुन निवडणूक लढवता येणार नाही. >> सहमत. हे योग्य आहे की नाही माहिती नाही, मला सुद्धा पटत नाही. (परत एकदा नोकरीशी तुलना - नोकरी शोधताना उमेदवार दहा ठिकाणी अर्ज, चार पाच ठिकाणी मुलाखती आणि दोन ठिकाणी ऑफर घेऊन ठेवणे हे अगदी सामान्य आहे) ***** ६ ) युती / पक्ष हे निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाला साम्गावे लागेल. आणि निवडून आल्यानंतर किमान एक वर्ष त्यात बदल करता येणार नाही. >> पास. सगळे पक्ष थोड्याफार फरकाने एकसारखे असतात. त्यामुळे सेना - भाजप आणि काँग्रेस - रा काँ अशा निवडणुका लढवून भाजपा- राष्ट्रवादी अशा संसाराचा प्रयत्न केला जातो आणि सेना - राष्ट्रवादी - काँग्रेस असा संसार बघायला मिळतो. द्रमुक- अण्णा द्रमुक भेळ तिकडं खेळ नियमाप्रमाणे केंद्रात संसार करतात.राज्य घटना काय सांगते.
अगदीच असहमत. निवडणुका लढवायला