पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत "मी, माझे, मला"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
7 Oct 2008 - 10:27 pm
गाभा: 

आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत."मी,माझं,मला" एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांना सहज विचारलं,
"सध्या कसला विषय डोक्यात घोळतोय?"
माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले,
"आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया."
मनात म्हणालो,
"कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला"
आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला,
कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले,
"ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर्य-विसडम- आलेला नाही त्यावेळी मी माझा मार्ग उघडा करून ज्याना ते आहे त्यांच्याकडून शिकाण्याचं ठरवलं.मला मीच आणखी एका प्रयत्नात टाकण्याचा चान्स दिला.

एखाद्दाला श्रद्धा असते ह्या विचारा बद्दल माझ्या मनात नेहमीच संभ्रम असायचा. माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ एक तर मी कुठल्याही घटनेच्या निश्चीततेबद्दल मन खंबीर ठेवतो. नाही तर तितकीच ती निश्चीतता असंभवनीय ही असावी ह्या ही समजूतीवर भर देऊन राहतो. अशा ह्या दोन्ही विचाराच्या कात्रीत माझं मन मी द्विधा करून घेतलं आहे.

कधी कधी माझं मलाच समजूत घालून घेण्याच्या माझ्यात असलेल्या क्षमतेमुळे ह्या सिद्ध न होवू शकणार्‍या घटना काहीशा मानसिक धीर देणार्‍या ठरायच्या. परंतु ही सोय तात्पुरतीच असायची.जगात सुखापेक्षा दुःखंच जास्त असतात ही एक विचारस्रणी आणि जे काय घडतंय ते अर्थशून्य,जरूरी शिवाय आणि शुन्यकिमतीचं असतं ही दुसरी विचारसरणी ह्या दोन विचारसरणी मधे तारतम्य आणणं म्हणजे ही एक दोर्‍यावरची कसरतच होईल असं मला वाटतं.

एका टोका पासून दुसर्‍या टोकापर्यंत विचार करायला गेल्यावर व्यवहारी जगात वावरताना ह्यातला फरक जास्त उठून वर यायचा कधी कधी अंतःकरणापासून जवळ वाटणार्‍या आध्यात्माची ओढ असायची आणि कधी कधी अलीकडे दिसणार्‍या त्या छंदीफंदी रात्रीच्या क्लबातल्या संगीताच्या धमाल वातावरणाची ओढ असायची.

श्रद्धा जोपासण्याचा मी आटोटोकाट प्रयत्न केला पण म्हणताना "श्रद्धे वर श्रद्धा" ठेवणं, तसं व्हायचं. सत्य शोधून काढणं कठीण व्हायचं.छोटी छोटी सुंदर आनंदीत करणारी देवाची स्तुती करणारी कवनं हळू हळू वैतागी आणि दुःखी वातावरणात विरून जायची.

मला एक धक्का दायक शोध लागला की आध्यात्म काय आहे हे समजून घेताना मला आलेल्या अडचणी आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधीत नव्हत्या तर त्या माझ्याच आपमतलबी वृत्तीं मुळे होत्या.माझ्या जवळच्याना जे मी दुखवलं आणि दुःख दिलं ते मी माझ्या मतलबी राहण्याच्या स्टाईलमुळे झालं.

अनुभव हाच उत्तम शिक्षक आहे ह्याचा पडताळा मला माझ्याच कर्माचे भोग उपभोगून मिळाला. काहीना अनुभवातून मार्ग दिसतो, मला मात्र हे सहज शिकायला मिळालं नाही. मला कठीण मार्गातून हे शिकायला मिळालं. काही वर्ष मी मलाच हरूवून बसलो होतो. ऐहिक सुखं म्हणजे आनंदीआनंद असं वाटायचं. पण जर का ह्या वातावरणाकडे पश्चातापी दृष्टीने पाहिलं नाही तर त्याची परिणीती एकाकीपणा आणि नैराश्यामधे होऊन ते एक दुष्ट चक्रच व्हायचं.

एकतर आपल्यात बदलाव करावा किंवा मरून जावं अशा पराकोटीच्या स्थितीला माझी मनस्थिती आली.मुलतः मी माझं मनच गमावून बसलो.माझ्या लक्षात आलं की ज्याला मी पूर्वी फूकाचे बोल समजत होतो ते बोल प्रत्यक्षात सत्यच सांगत होते.
"कुणाकडून घेण्यापेक्षा कुणाला तरी द्दावं"
असं कुणी तरी म्हटलंय.पण आता माझ्या लक्षात आलंय की अश्या गोष्टीवर श्रद्धेने न पाहता अनुभव म्हणून पाहणं जास्त संयुक्तिक ठरेल.
हा मार्ग मी तंतोतंत पाळतो असं नाही पण मनापासून सांगू शकतो की भारतीय कवयित्री-तत्वज्ञानी शांतीदेवीच्या उक्ति प्रमाणे
"जगात भरलेला सर्व आनंद दुसर्‍याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे."

माझे हे दोस्त,श्रीयुत."मी,माझे,मला" स्वतःला काय वाटत असतं ह्याचं आख्यान भिडभाड न ठेवता दुसर्‍याला सांगण्यात आनंद घेतात.
बाहेर बराचसा काळोख झाला होता.मीच त्याना म्हणालो,
"आपण पुन्हा कधीतरी बोलूया."
ते कबूल झाल्याचं पाहून सुटकेचा निश्वास टाकून मी त्यांचा निरोप घेतला.
आमचा भिडस्त स्वभाव आम्हाला असा नडतो.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

मृदुला's picture

8 Oct 2008 - 1:00 am | मृदुला

समजायला कठीण गेले.

"जगात भरलेला सर्व आनंद दुसर्‍याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे."

हा नेहमीचा परोपकाराचा धडा आहे. हे लेखाचे सार असेल तर हकनाक क्लिष्टता आली आहे असे मला वाटते.

याचा प्रतिवाद केलेला लिहिले असते तर मजा आली असती.
शिवाय उपरोक्त सार मला(तरी) पटले नाही. रा. न.

रामपुरी's picture

10 Oct 2008 - 9:29 am | रामपुरी

समजायला कठीण गेले.
तुम्ही मिसळपाव वर छापलेली प्रत्येक ओळ वाचता असे दिसते. आम्ही लेखक बघून ठरवतो. या लेखाच्या प्रतिसाद संख्येवरुन लक्षात आलं नाही का तुमच्या?
अवांतरः आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय (तेही चुकुन पान उघडले म्हणून) :) (ह. घ्या.)

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 11:26 am | श्रीकृष्ण सामंत

रामपुरीजी,
खरं आहे आपलं म्हणणं.लेखक बघून ठरविल्यामुळे,माझ्या ह्या लेखाची आतापर्यंत १४० वाचने झाली आहेत.माझ्या सारखा लेखक आपल्या मर्जीत न आल्याने मी कदाचीत लेख लिहायला अपूरा पडत असेन.लेखक म्हणून आपल्या मर्जीत येण्यासाठी आणि आपण माझे लेख वाचावेत म्हणून मी जास्त प्रतिक्रिया येतील असे लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन.
"सरशी तिथे पारशी" ही म्हण आठवली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com