शिवराज्याभिषेकदिन.....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in काथ्याकूट
2 Jun 2016 - 4:11 pm
गाभा: 

येत्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला अर्थातच १८ जुन दरवर्षीप्रमाणे स्वराज्य राजधानी किल्ले श्री रायगडावर श्रीशिवराज्याभिषेकदिन साजरा होणार आहे. त्यासाठी मी हि जाणार आहे. तर आपल्या मिपाकरांपैकी कोणी येणार आहेत काय? असल्यास भेटता येइल, यासाठी हा लेखन प्रपंच.......

प्रतिक्रिया

मला गर्दी सहन होत नसल्याने मी येणार नै.

महासंग्राम's picture

2 Jun 2016 - 4:52 pm | महासंग्राम

हेच म्हणतो मी

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Jun 2016 - 7:53 pm | स्वच्छंदी_मनोज

हेच म्हणतो मी.
रायगड गर्दीविना, म्हणजे अगदीच चुकार ५-१० लोक गडावर, असा बघीतला असल्याने भयंकर गर्दीच्या जत्रेला जाववत नाही, तस्मात आमचा पास.

तुम्ही जा आणी आम्हाला फोटो शेअर करा.

वेल्लाभट's picture

3 Jun 2016 - 6:06 pm | वेल्लाभट

मलाही असं वाटतं, पण तो जो माहोल तयार होत असेल, जो ऐकलाय, फोटोतून पाहिलाय, तो विनागर्दीचा मिळायचाच नाही. त्यामुळे एकदा ते वातावरण अनुभवायला का होईना, जायचंय राज्याभिषेकाला.

रमेश भिडे's picture

3 Jun 2016 - 6:53 pm | रमेश भिडे

'सहन न होण्या'कडे कंपू चे लक्ष गेलेलं दिसत नाही.
नेमकं काय होतं ओ गर्दी सहन होत नाही म्हणजे ? ;)

रोहन अजय संसारे's picture

2 Jun 2016 - 4:50 pm | रोहन अजय संसारे

मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन

अनिरुद्ध प्रभू's picture

3 Jun 2016 - 9:40 am | अनिरुद्ध प्रभू

कुणीतरी येत आहे......रोहनराव भेटु आपण....

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2016 - 9:42 am | डॉ सुहास म्हात्रे

जाऊन आल्यावर इथे तुमच्या अनुभवावर लेख आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका !

मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका ! >> गडाचे फोटो.

अनिरुद्ध प्रभू's picture

3 Jun 2016 - 10:10 am | अनिरुद्ध प्रभू

जरुर लेख लिहीन.....गडाच्या फोटोंसह.......

गडाचे फोटो हे महत्त्वाचं!!

नमकिन's picture

4 Jun 2016 - 8:56 am | नमकिन

योग येतोय.
या वर्षी माझ्या छकुलीसोबत जायचा विचार आहे.
बघू या भेट झाली तर, आम्ही नीलमकडे थांबतो गडावर.

अनिरुद्ध प्रभू's picture

4 Jun 2016 - 9:18 am | अनिरुद्ध प्रभू

अवश्य भेटु आपण...

नमकिन's picture

20 Jun 2016 - 5:04 pm | नमकिन

निर्विघ्न पार पडला .
पावसानेही काही व्यत्यय आणला नाहीं. सहकुटुंब अनुभव घेतला. मुलीचे (४ वर्ष) ९ वारी, फेटा या पेहरावात सर्व शिवभक्तांनी आवर्जुन छायाचित्र घेतली , इतके की शेवटी तिला कडेवर घेऊन फिरावे लागले.
पुढील वर्ष महत्त्वाचे जसे ५०० कोटी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यावर परिस्थिति अजुन सुधारेल.
समितीच्या कार्यकर्ता यांचे अनंत आभार!