मिपावरील अतीरूंद काथ्या - मुख्यत्वे जिलब्या - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:त गुंफलेले निव्वळ ट्यार्प्यार्थी टाइमपाशे रेचक(?)
कोणाच्याच जिलब्यांबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या टाईमपासचा मार्ग असू शकतो.
माझ्या मते या अर्ध्या भोकाच्या जिलब्या मिपाला मानसिकदृष्ट्या असहिष्णू करण्याचे काम करत आहेत; समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.
रोजास किमान एक अशा वर्षानुवर्षे(डू आय डी मोजल्यास) तेच ते आंबलेले पीठ घोळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. ताजे पीठ घेऊन मोजक्या पण गुणवान वेढ्यात स्वादिष्ट जिलब्या असे असायला हवे. पण त्याऐवजी खवय्यांना आंबीलचे व्यसन लावण्याचे आणि बद्धकोष्ठ बनवण्याचे काम केले जाते या न पचणाऱ्या अतीरूंद काथ्यांमुळे.
तेव्हा किमान शंभर प्रतिसाद हे जंत-रीक वा स्वार्थीक कारण असो की इतर काही, हे स्वत:मधे गुरफटलेले लेखकच या गुंत्याला जबाबदार आहेत यात शंका नाही.
एरवी कोणत्याच जिलब्या कमी दर्जाच्या नसतात. पण हे लेंड्याघोळू धागीक (खरे तर धागीक म्हणायला हे नालायक - लेंड्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. लेंड्या-गीक्स – लेंड्या घोळणारे गीक्स).
चर्चा-मंचनाच्या नावाखाली सतत आपलेच किंवा दुसऱ्यां खरकट्या पानातून उचललेले न पचणारे खडे, शिळ्या पीठाचे बोंडले, तेचतेचपन्हे, अतीचीतेलकटपणा, अबरटचरबट इनो-द या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच मंचनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा तळण केले असते का? त्यामुळे असे नरड्यात कोंबले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे.
स्वादिष्ट जिलब्या दिल्या तर कोणाला नको आहेत? मिपावर चरण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी त्यां जिलब्या खाल्ल्या काय आणि न खाल्ल्या काय, काय फरक पडतो?
कोणी म्हणेल, की टाकल्याटाकल्या न खाण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुनिग्रही आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिल्या तरी ओठ बंद करू शकतील. मात्र येथे बहुसंख्य खवय्ये तेवढे निग्रही नसतात. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधील खवय्यांच्या अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा शिळ्या जिलब्या खादाडांना मठ्ठा पिलवतात, स्वत:ची पचनशक्ती गमवायला भाग पाडतात, जिलब्या पाडणाऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांची खाज जिरावी म्हणून जिलब्यांच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक मिपाचे गुन्हेगारच आहेत.
जे मनापासून घोळले ते टाकले.
शीर्षकातील रेचक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना रेचक म्हणावे तरी कसे यासाठी आहे.
आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....टाकणारे टाकतात, खाणारे खातात, माझे काय जाते, जिभेचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल टीवीवर डिबेट पहा, तुला कोणी थांबवलेले आहे.....यात रेचकाचा दोष नसतो, कां तर ते तुमच्या पोटात जसा दबाव असेल तसे काम करत असते ..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहाण्यास आवडेल.
प्रतिक्रिया
22 Nov 2015 - 5:52 pm | अत्रुप्त आत्मा
22 Nov 2015 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काथ्याकुटात प्रतिसादाच्या जिल्ब्या पडाव्यात असा काही 'माल' नाही. देव, धर्म, विज्ञान,अस्मिता, अभिमान, श्लील, अश्लील, भाषा यावर बोचरी टीका नाही त्यामुळे प्रतिसाद येणार नाहीत. आले तरी दबे पाव येतील आणि श्वास सोडल्याप्रमाणे निघूनही जातील. [रेचक]
किमान अरुण कोलटकरांची ''प्यांट भी निकालना पडेगा क्या '' ही कविता तरी रसग्रहणाला घ्यायची होती. म्हणजे कवितेचं शीर्षक अश्लील वाटतं पण ती कविता किती साधी भोळी आहे ते तुम्हाला सांगता तरी आलं असतं... ! :)
-दिलीप बिरुटे
[अरुण आणि कोलटकरांचा पंखा :)]
22 Nov 2015 - 7:23 pm | मारवा
बिरुटे सरांनी भारी कवितेचा रेफरन्स दिलाय.
हो सर मुंबईत हजामांची अशीही सर्व्हीस असते का हो खरच
म्हणजे मला माहीत नाही ती कविता वाचल्यावर पहील्यांदाच कळल.
बाकी एन्ड लयच भारी
जगावर सांगितलेला हक्क वा वा अस काहीतरी घ्याव राव दमदार
सर्वात भारी वल्ली वही मात्र
22 Nov 2015 - 7:30 pm | मारवा
त्या कवितेचा एन्ड बघा सुचला साधा भोळा
फुलावर सांगितलेला हक्क
काट्यावर देखील शाबित झालेला नसतो
काय म्हणता ?
22 Nov 2015 - 7:39 pm | जव्हेरगंज
लिंक वगैरे द्या की त्या कवितेची!! किंवा इथं पेस्टवा तरी!!!
22 Nov 2015 - 7:42 pm | मारवा
थोडी प्रक्षोभक आहे देण्यासारखी नाही.
22 Nov 2015 - 8:09 pm | जव्हेरगंज
मग व्यनि काय कामाचा!! द्या धाडुन!!!
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
निवडक
http://phuphata.blogspot.com
22 Nov 2015 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता रसग्रहणाला. अरुण कोलटकरांच्या कविता आणि विडंबन असं मिपावर केल्याचं आठवतं
जरा वेळ मिळाला की घेऊ कविता आस्वादाला.....
-दिलीप बिरुटे
22 Nov 2015 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगं आई गं ! भारी सुचलाय शेवट :)
-दिलीप बिरुटे
22 Nov 2015 - 6:27 pm | कंजूस
अशी कशी झाली दैना?
दमामि गेलं कुठं?
22 Nov 2015 - 6:32 pm | विवेकपटाईत
आमच्या कार्यालयाच्या खाली मदर डेरीची दुकान आहे, दुपारी जेवण झाल्यावर १० रुपयात अर्धा किलो (मठ्ठा) मिलतो. पिल्यावर छान वाटते. पण जलेबी खाण्यासाठी हनुमान मंदिरा (सीपी) पर्यंत जावे लागते. रोज जमणे शक्य नाही. बाकी संध्याकाळी घरी आल्यावर मिपावर जलेब्या पाहून, डोळे तृप्त करून घेतो. असो.
22 Nov 2015 - 6:41 pm | जव्हेरगंज
लय भारी बेअरींग पकडलय तुम्ही!!!
तुमचे सगळे प्रतिसाद आवडीने वाचतो!!!
22 Nov 2015 - 7:27 pm | मारवा
मदर डेअरी त मिष्टी पण फार मस्त भेटत ना
आहाहा काय गोड आठवणींचा काटा सरसरुन आला.
22 Nov 2015 - 10:43 pm | मांत्रिक
त्याला मिष्टी दोही म्हणतात. बोंगाॅली पदार्थ आहे.
22 Nov 2015 - 6:59 pm | अरुण मनोहर
आपण स्वत: देखील इथे जिलब्या पाडत बसण्यापेक्षा हा प्रोब्लेम सोडविण्यासाठी काय anti -रेचक घेता येईल वगैरे उपायांचे चर्वित चरण इथे उपेक्षित आहे. ज्याना जीलब्याच पाडून इथेही गोंधळ घालायचा असेल त्याच्या प्रतिसादाला उत्तर मिळणार नाही.
22 Nov 2015 - 7:01 pm | अरुण मनोहर
अपेक्षित च्या ऐवजी उपेक्षित म्हणण्याची fashion बिहार मधून उचलल्यामुळे माझ्या आधीच्या प्रतिसादाने सुद्न्य वाचक मला उपेक्षित ठेवणार नाही असे आशितो.
22 Nov 2015 - 7:02 pm | मांत्रिक
बरेच जणांनी तुम्हाला काय म्हणायचंय हे नीट लक्षात न घेता अवांतर चालवलेले आहे. जो मुद्दा उपस्थित केलाय तो खरंच दमदार आहे. विशेषतः गेल्या २-३ दिवसांत झालेले स्पॅमिंग बघता!
22 Nov 2015 - 7:06 pm | अरुण मनोहर
चला, निदान एक तरी उपेक्षित प्रतिसाद आणि तो देखील enchanting मिळाला!
पण मांत्रिक बुवा, निदान तुम्ही तरी योग्य कानमंत्र द्याल अशी अशा होती. तुम्ही फक्त फुटाची गोळी देऊन आणखी वायुच तयार केला!
22 Nov 2015 - 7:11 pm | मांत्रिक
अरेच्चा काय चूक झाली कळलं नाही मला. आत्ता बाकी मोबल्यावर आहे. त्यामुळे टंकणे फारसे जमत नाही.
पण एका विशिष्ट आयडीने केलेले २-३ दिवसांतील धुराळी स्पॅमिंग बघून खरंच वैतागलो.
22 Nov 2015 - 7:15 pm | अरुण मनोहर
लाईक !
22 Nov 2015 - 8:03 pm | भंकस बाबा
प्रतिसाद देण्यापेक्षा त्याची खिल्ली उडवने योग्य ठरेल. गाढवासारखे मुद्दे मांडले आहेत. मुद्दे खोडायला गेले की पळून जातात. मग दुसरा धागा टाकून अजुन उबग आणत आहेत. मला वाटते यांचे लेखन साभार परत येत असणार तेच मिपावर रगडून देतात.
22 Nov 2015 - 9:51 pm | राजेश कुलकर्णी
एवढी मेहनत घ्यायची गरज नव्हती हो.
22 Nov 2015 - 9:56 pm | पैसा
ते पुलंचं विसरलात काय? शेजार्याच्या घरात मोठ्यांदा लावलेला रेडिओ आपल्यासाठीच लावलाय असे समजून आनंद घ्यावा वगैरे? हे सगळे लोकाना दंगा करायला मिळावा या उदात्त हेतूने हे जिल्बीवाले करत असतात असे समजले की त्यांचा त्रास वाटत नै!
22 Nov 2015 - 10:37 pm | सागरकदम
पिंगा बद्दल पण माझे हेच मत आहे
22 Nov 2015 - 10:48 pm | जॅक द रिपर
भाई, अनकुथ म्हणजे काय?
कुंथण्याचेही श्रम न घेता जो कुठेही घाण करतो तो अनकुथ! - इति पुलं!
खाणार्यांची पर्वा न करता जो जिलब्या, शेव, चकल्या, कडबोळी, पापड, कुरडया पाडत जातो, ज्यातले कंटेंट अळवाच्या फतफत्यासारखे आणि चव शेपूच्या पचपचीत भाजीसारखी, तोच खरा हलवाई!
कोणीतरी त्याच्या घरावर तुळशीपत्रं ठेवा रे!
22 Nov 2015 - 10:56 pm | विशाल कुलकर्णी
हायला हे भारी आहे. आत्ता बघितलं.
मंडळी जिलब्या आमालाबी लै आवडत्यात. त्यामुळे जिल्बीवर उपाय शोधन्याच्या कल्पणेचा झायिर निशेद !
जिल्बीप्रेमी विशल्या
22 Nov 2015 - 10:59 pm | अभ्या..
विशाल ही घे स्पे. मिपाजिल्बी.

23 Nov 2015 - 8:20 am | नाखु
वात्रट आहे हे माहीती होतं.....
पण तो आमच्या सारखाच वाया गेलेला आहे हे पाहून डोळे पानावले.
मूळ लेखात काही पिसें का सोडली आहेत सोलायला...
निरागस नाखु
22 Nov 2015 - 11:21 pm | अजया
:)
23 Nov 2015 - 4:08 am | अरुण मनोहर
अरे ते टा.कु. च्या पुष्प - कुंडीत टाकण्या ऐवजी इथे मुद्दाम कचरा कुंडी दिलीय, तेथे टाका ना?
लोक पण काय नै ! कळतच नाई !