गाभा:
या नाटकाचा काल ठाण्यात पुन्हा एक प्रयोग हाउस फुल झाला . नथुराम या व्यक्ती रेखे बद्दल समाजात २ मतप्रवाह आहेत . काही गांधी प्रेमी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे . मिसळपाव प्रेमीना या बद्दल की वाटते जाणून घेण्यास उत्सुक .
================================
सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 12:22 pm | माझीही शॅम्पेन
शिळ्या कढिला नव्याने उत :) चालू द्या
4 Feb 2011 - 12:27 pm | मृगनयनी
नथुराम गोडसे म्हटलं.. की आठवतात.. "शरद पोन्क्षे"!....माय फेव्हरेट अॅक्टर! :)
त्यान्चा "परशुराम किल्लेदार"पण लई भारी आहे! ;)
__________________
असो... लेट कम टू द पॉईन्ट...
"नथुराम गोडसे" ही अशी एक व्यक्तीरेखा आहे... ज्याला गान्धीजींन्च्या काही मूल्-तत्वांबद्दल आत्यंतिक आदर आहे..
पण गान्धींचे काही मिळमिळित तत्वे... उदाहरणार्थः नको इतका अहिन्सावाद.... वगैरे.... गोष्टी साहजिकच तरूण आणि उसळत्या रक्ताला चीड आणणार्या आहेत... आणि त्यातूनच गांधींची हत्या घडली असावी... हा माझा प्राथमिक अन्दाज आहे...
लेट सी... या लेखावर अजून काही प्रतिक्रिया आल्याच... तर त्या अनुषंगाने चित्र अजून स्पष्ट होईल! :)
________________
शरद पोंक्षेंबद्दल व्यक्तिगत : "नथुराम गोडसे" हे नाटक जेव्हा प्रथम रन्गभूमीवर आले..तेव्हा सगळ्या "कॉन्ग्रेस्-वाल्यां"नी त्याचा प्रचंड निषेध नोन्दवल... अर्थातच.. ते नाटक न बघता.... सभा वगैरे घेतल्या... नाटक बन्द पाडण्यासाठी हिन्सक मार्ग ही अवलम्बला... अशाच एका सभेला मुम्बईला त्यांनी नथुराम्'चा रोल प्ले करणार्या शरद पोंक्षेंनाही बोलावले... बरीच भाषणबाजी वगैरे झाली... सभेच्या मध्यभागी एका खुर्चीवर हार घातलेला गान्धीजीन्चा फोटोही होता... कॉन्ग्रेस्वाल्यांनी बरीच टीका करून नथुराम्'ला यथेच्छ लाखोली वाहिली... गान्धीजी त्यान्चे परमदैवत असल्याचे वगैरे सान्गून सेन्टीमेन्टल भाषणे ठोकली...
झालं... सभा सम्पली.... सगळे आपापल्या घरी गेले... तेव्हा पुन्हा शरद पोन्क्षे.. त्या रिकाम्या मैदानात गेले... कारण त्या दिवशी रात्री त्यांचा "शो" होता.. तेव्हा मैदानात एक रिकामी खुर्ची दिसली.. त्यांनी जवळ जाऊन पाहिले.. तर त्याच खुर्चीच्या खाली गांधीजींचा फोटो.. धुळीत पडलेला होता.... तासाभरापूर्वी... ज्यांन्च्या नावाने राजकारण करून कॉन्ग्रेसवाल्यांनी शरदजींना दम भरला होता.... त्याच गांन्धीजीन्चे आता कोणालाच काहीच सोयसुतक नव्हते....
शरदजींनी तो फोटो.. उचलला.. खिशातल्या रूमालाने पुसला ..आणि आपल्या रुमवरती नेला....व आपल्या पेटीमध्ये व्यवस्थित ठेवून दिला....
एकदा अशीच एकदा मुलाखत देताना ते म्हणाले, की "जरी मी नथुरामचा रोल करतोय तरी गान्धीजींबद्दल मला खूप आदर आहे.. पण तो आदर कॉन्ग्रेसवाल्यांसारखा बेगडी नक्कीच नाही...गांधीजींचा फोटो मी ज्या बॅगेत ठेवला होता... तीच बॅग मी नथुराम'चा प्रयोग करताना वापरायचो.. आजही गांधीजींचा फोटो नथुराम गोडसेंच्या पेटीमध्ये अत्यंत सुरक्षित आहे!" :)
4 Feb 2011 - 12:33 pm | अमोल केळकर
प्रतिसाद आवडला :)
अमोल
4 Feb 2011 - 2:02 pm | स्वानन्द
मस्त प्रतीसाद!
4 Feb 2011 - 2:46 pm | नितिन थत्ते
या सगळ्यात शरद पोंक्षांचा काय संबंध? शरद पोंक्षे सज्जन, गांधीप्रेमी वगैरे असले म्हणून त्यांनी रंगवलेला नथुराम समर्थनीय होतो का?
निळूभाऊंनी सामना मध्ये हिंदुराव धोंडेपाटलाची भूमिका केली. ते स्वतः अगदी सज्जन होते. म्हणून हिंदुराव धोंडेपाटील ही व्यक्तिरेखा (आणि ती सरंजामी प्रवृत्ती) समर्थनीय होत नाही.
4 Feb 2011 - 3:56 pm | मृगनयनी
नितीन'जी... मला शरद पोन्क्षेंची नाही.. तर गांधींचा बेगडी उदोउदो... करणार्या कॉन्ग्रेस्'ची चीप मेन्टॅलिटी दाखवायची होती...
शरद पोन्क्षे... हे एक माध्यम आहेत.... :)
4 Feb 2011 - 8:11 pm | विकास
माझी अशी थिअरी आहे की हे केवळ सक्रीय काँग्रेसजन करतात असे नाही. तर ते अगदी जे गांधींनाच श्रेष्ठ समजतात आणि क्रांतीकारक आणि त्यांच्या चाहत्यांची थट्टा करतात, ते गांधी पुण्यतिथीस स्वतः त्यांची आठवण करणारे लिहीतही नाही आणि तशा चालू असलेल्या गंभीर चर्चेत देखील सहभागी होत नाहीत. कारण, "अशा गांधीवाद्यांना गांधीजी किंवा गांधीवादाची आठवण क्रांतीकारक स्वातंत्र्यसैनिक आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते." :-)
तेंव्हा पोंक्षे हे वास्तव आणि चपखल असले तरी त्यामानाने फार लांबचे उदाहरण आहे... ;)
बाकी मूळ चर्चेबाबतः कुठल्याही कलाकृतीवर बंदी घालण्याच्या मी विरोधात आहे. पण, "मी नथुराम बोलतोय.." हे नाटक ऐतिहासीक घटनेस धरून नाही असे ज्येष्ठ विचारवंत य.दी. फडके यांचे मत आहे. (‘Mee Nathuram’ distorts history, complains scholar) . त्यामुळे त्याच्यातील भ्रष्टकरण काढून केवळ जे काही नथुरामने पुस्तकात म्हणले ते सांगितले तर एकेरी का होईन, पण किमान त्या ऐतिहासीक दृष्ट्या काही अंशी खरे ठरेल..
असो.
4 Feb 2011 - 9:35 pm | नितिन थत्ते
(स्कोअर सेटलिंग फक्त उपक्रमावरच चालते असे वाटत होते).
माझ्या लेखाचा संदर्भ असल्याने या प्रतिसादाला उत्तर देत आहे.
>>तर ते अगदी जे गांधींनाच श्रेष्ठ समजतात आणि क्रांतीकारक आणि त्यांच्या चाहत्यांची थट्टा करतात,
गांधींना मानणार्यांपैकी कोणीही, कधीही मिसळपाववर क्रांतिकारकांची थट्टा केल्याचे स्मरत नाही. मी देखील कधी केलेली नाही. त्यांच्या मार्गाच्या परिणामकारकतेविषयी किंवा अनुकरणीयतेविषयीच चर्चा होते.
गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने या आपण सुरू केलेल्या चर्चेत भाग घेण्यास वेळ झाला नाही. :( परंतु इजिप्तमधल्या घटनांचा आणि तेथील सैन्याने सरकारशी पुकारलेल्या असहकाराच्या संदर्भात गांधींच्या तत्त्वाबाबत लेख लिहिण्याचा विचार अजूनही आहे. वेळ मिळाला की लिहीन.
4 Feb 2011 - 10:18 pm | विकास
(स्कोअर सेटलिंग फक्त उपक्रमावरच चालते असे वाटत होते).
तसा काही नाही आणि उपक्रमाला/उपक्रमींना मधे आणायचीही गरज नाही. जे दिसले ते त्या संदर्भात लिहीले इतकेच. बरं तुम्ही थोडेच काही अनसेटल केले होते जे सेटल करायची गरज भासावी? :-)
गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने या आपण सुरू केलेल्या चर्चेत भाग घेण्यास वेळ झाला नाही.
अच्छा! :-) मुद्दा चर्चेत सहभागी होण्याचाच नसून चर्चा चालू करण्याचा पण होताच... शिवाय (वेळ झाला नाही) असेच जर इतरांच्या बाबतीत झाले असे समजण्याऐवजी नवीन थिअरी शोधायची घाई कशाला करायची? असो.
4 Feb 2011 - 10:29 pm | नितिन थत्ते
थिअरी शोधायची घाई केली नव्हती. माझी जुनी थिअरी आहे. त्या थिअरीच्या धाग्यावर येथील स्नेही सदस्यांशी खरड झाल्याचे लिहिले होतेच.
शिवाय या प्रतिसादात देखील त्या थिअरीची झलक दाखवली होती.
4 Feb 2011 - 3:58 pm | भडकमकर मास्तर
पोंक्षे काम भारी करतातच पण गोष्ट छान तिखटमीठ लावलेली वाटते... स्वतः पोंक्षेंनी सांगितलेली दिसते...
4 Feb 2011 - 7:03 pm | कानडाऊ योगेशु
नरसिंह रावांच्या काळात टिव्हीवर लकी अलीची (काँग्रसचा प्रचार करणारी) गाणी लागत असत.त्यात असाच एक प्रसंग होता.फक्त गांधींच्या जागी गांधी टोपी होती.
4 Feb 2011 - 12:29 pm | टारझन
पु. ले. शु.
- मेकुड्कर
4 Feb 2011 - 1:07 pm | नितिन थत्ते
>>विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे .
हॅ हॅ हॅ. रोचक वाक्य. :)
प्रत्येक को.ब्रा. नथुरामप्रेमी नसतो पण प्रत्येक नथुराम प्रेमी को.ब्रा. असतो.
4 Feb 2011 - 1:11 pm | llपुण्याचे पेशवेll
असहमत. मी नथुरामप्रेमी आणि कोब्रा नसलेला मनुष्य आहे.
4 Feb 2011 - 1:16 pm | टारझन
पुपेंशी सहमत :) मी टु
प्रत्येक ***** आतंकवादी नसतो .. पण प्रत्येक आतंकवादी ***** असतो
4 Feb 2011 - 1:24 pm | नितिन थत्ते
अपेक्षितच होता हा प्रतिसाद.
टार्याच्या खालच्या प्रतिसादात ***** जागी जो शब्द अपेक्षित असतो त्यात न बसणारे अतिरेकी दाखवता येतातच.
त्याला सामंतर्य दाखवण्यासाठीच माझ्या प्रतिसादातले वाक्य होते.
4 Feb 2011 - 1:59 pm | स्वानन्द
अरे वा... म्हणजे तुम्ही भलतेच पोचलेले दिसता की! टार्या असं काही लिहील असं तुम्हाला स्वप्न पडलं आणी तुम्ही त्यातलं सामंतर्य दाखवण्यासाठी आधीच असं वाक्य लिहिलं. नाहीतर एरवी तुम्ही जातीयवादी नाहीच!
4 Feb 2011 - 2:10 pm | नितिन थत्ते
>>म्हणजे तुम्ही भलतेच पोचलेले दिसता की! टार्या असं काही लिहील असं तुम्हाला स्वप्न पडलं
आँ. माझा प्रतिसाद १३:२४ भा प्र वेळेचा आहे आणि टार्याचा त्याच्या आधीचा १३:१६चा.
4 Feb 2011 - 3:27 pm | स्वानन्द
पण तुम्हाला जे सामंतर्य वगैरे दाखवाय्चे होते ते वाक्य तर तुम्ही १३:०७ च्या प्रतीसादात दिलेले दिसते आहे. १३:२४ चा प्रतीसाद तर तुम्ही स्पष्टीकरणासाठी खर्च केलेला दिसतो आहे.
4 Feb 2011 - 2:04 pm | मृगनयनी
त्याला सामंतर्य दाखवण्यासाठीच माझ्या प्रतिसादातले वाक्य होते.
नितीन'जी सामंतर्य - मराठी भाषेतील समांतर'ला एक जुळे भावंड दिल्याबद्दल आपले अभिनन्दन! ;)
4 Feb 2011 - 2:14 pm | नितिन थत्ते
>>सामंतर्य - मराठी भाषेतील समांतर'ला एक जुळे भावंड दिल्याबद्दल आपले अभिनन्दन!
सामंतर्य हा शव्द धनंजय यांच्याकडून शिकलो. माझा शोध नाही. धनंजय यांनी तो वापरला असल्याने तो चुकीचा असणार नाही असे वाटते. (त्यांनी वापरलेला शब्द एक्झॅक्टली हाच नसेल सुद्धा... पहायला लागेल).
5 Feb 2011 - 11:22 pm | पंगा
योग्य शब्द 'सामांतर्य' असा असावा, 'सामंतर्य' असा नव्हे (स्वभाषा आत्मविश्वासाने वापरणार्याच्या अधिकारास अनुसरूनसुद्धा), असे सुचवावेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
4 Feb 2011 - 2:10 pm | वारकरि रशियात
शरद पोंक्षे एक गुणी अभिनेते आहेत.
बाकी कालचा खेळ उद्या पुन्हा
बाकी थत्तेकाकांच्या प्रतिसादात 'धनंजय'(यांचे सामंतर्य) दिसले !
4 Feb 2011 - 1:46 pm | मालोजीराव
मी पण !
...१९४८ साली गांधीजी गेले, पण त्यांचा मृत्यू ५ वर्ष आधी किंवा ५वर्ष नंतर झाला असता तर त्याचे भारतावर (चांगले,वाईट)काय परिणाम झाले असते,हे तज्ञांकडून जाणून घ्यायला आवडेल.
4 Feb 2011 - 2:30 pm | चिप्लुन्कर
मी टु..............
4 Feb 2011 - 6:55 pm | लॉरी टांगटूंगकर
वाचुन मजा वाटलि
4 Feb 2011 - 2:01 pm | जोशी 'ले'
असहमत......मी कोब्रा नाही, पण नथुराम प्रेमि आहे
नथुराम प्रेमि स्रर्व भारतात आहेत महाराष्ट्रातील एका प्रांततील / एका जतिचे काय घेउन बसलात?
5 Feb 2011 - 8:47 am | अप्पा जोगळेकर
हे धडधडीत जातीयवादी विधान आहे. याचा निषेध केला पाहिजे.
5 Feb 2011 - 10:15 am | विकास
हे धडधडीत जातीयवादी विधान आहे. याचा निषेध केला पाहिजे.
सहमत.
5 Feb 2011 - 10:52 am | नितिन थत्ते
सहमत आहे.
माझा प्रतिसाद संपादित करून को.ब्रा. ऐवजी *.*. असे करावे.
4 Feb 2011 - 1:10 pm | मराठी_माणूस
विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे.
हे नथुराम ला ही करता आले असते.
4 Feb 2011 - 2:28 pm | गणपा
देअर यु गो...
मराठी माणसाशी १००% सहमत.
आवांतर :मी नथुरामचा द्वेश करीत नाही आणि गांधीजींचा समर्थक ही नाही.
4 Feb 2011 - 2:36 pm | टारझन
बहुतेक गांधीकाका हाताबाहेर निघुन गेले असावेत. नथुराम त्यांचा वैचारिक विरोध करत राहिले असते तर पाकिस्तान विभाजन अनुमती , ५५ कोटी , नेहरुला प्रधाणमंत्री इत्यादी निर्णयांपाठोपाठ अजुन एकेक निर्णय घेतले गेले असते. असे नथुरामांना वाटले असावे. त्यापेक्षा गांधी काकांचा वध केल्या गेल्या असावा.
अधिक प्रकाश जाणकार टाकतीलंच :)
-
4 Feb 2011 - 2:47 pm | llपुण्याचे पेशवेll
बरोबर आधी दंगे कण्ट्रोलमधे आणू आणि मग प्रेमाणे समजावू असं काहीतरी अपेक्षित असेल.
4 Feb 2011 - 3:20 pm | नितिन थत्ते
>>बहुतेक गांधीकाका हाताबाहेर निघुन गेले असावेत. नथुराम त्यांचा वैचारिक विरोध करत राहिले असते तर पाकिस्तान विभाजन अनुमती , ५५ कोटी , नेहरुला प्रधाणमंत्री इत्यादी निर्णयांपाठोपाठ अजुन एकेक निर्णय घेतले गेले असते. असे नथुरामांना वाटले असावे. त्यापेक्षा गांधी काकांचा वध केल्या गेल्या असावा.
ही काही कारणे गोपाळ गोडसे यांनी क्लेम केली आहेत.
५५ कोटींचा गांधींनी उपोषण केल्यामुळे द्यायला लागले ही गोष्ट खोटी असल्याचे या धाग्यावर दाखवून दिले आहे.
फाळणीला संमती देण्याचे काम काँग्रेसमधून सर्वप्रथम सरदार पटेल यांनी केले.
Vallabhbhai Patel was one of the first Congress leaders to accept the partition of India as a solution to the rising Muslim separatist movement led by Muhammad Ali Jinnah. He had been outraged by Jinnah's Direct Action campaign, which had provoked communal violence across India and by the viceroy's vetoes of his home department's plans to stop the violence on the grounds of constitutionality. Patel severely criticised the viceroy's induction of League ministers into the government, and the revalidation of the grouping scheme by the British without Congress approval. Although further outraged at the League's boycott of the assembly and non-acceptance of the plan of 16 May despite entering government, he was also aware that Jinnah did enjoy popular support amongst Muslims, and that an open conflict between him and the nationalists could degenerate into a Hindu-Muslim civil war of disastrous consequences. The continuation of a divided and weak central government would in Patel's mind, result in the wider fragmentation of India by encouraging more than 600 princely states towards independence.[42] Between the months of December 1946 and January 1947, Patel worked with civil servant V. P. Menon on the latter's suggestion for a separate dominion of Pakistan created out of Muslim-majority provinces. ( http://en.wikipedia.org/wiki/Vallabhbhai_Patel )
असो.
नाटकावर बंदी घालण्याची मागणी चुकीचीच आहे. नाहीतरी ती एक काल्पनिक कलाकृती आहे असे याच संस्थळावर म्हटले गेले आहे.
4 Feb 2011 - 3:09 pm | चिप्लुन्कर
अवांतर :-
माझे आजोबा म्हणत असत गांधीजीनी देशाला ३ हानिकारक गोष्टी देल्या.
१) खादी - जी राजकारणी लोक घालतात. अर्थ - खा - आधी .
२) खाकी- जी पोलीस/ सरकारी कर्मचारी घालतात. अर्थ- खा - कि
३) गांधी टोपी - जी घालून हे सगळे आपल्याला टोप्या घालतात .
4 Feb 2011 - 3:26 pm | गणपा
खादी एक वेळ ठिक आहे समजु,
पण गांधींनी खाकी चा प्रचार/प्रसार कधी कुठे केला ते वाचायला आवडेल.
तेच गांधी टोपी बद्दल.. मी तरी मोहनदास करमचंद गांधींचा गांधी टोपी घातलेला फटु पण पाहिला नाहीये.
4 Feb 2011 - 3:57 pm | पैसा
१९२० सालचा फोटो असल्याचं वेबसाईटवर म्हटलं आहे.
फोटो श्रेय
श्री. राहुल शर्मा
http://blogscoolpics.blogspot.com/2010/10/mahatma-gandhi-mohandas-karamc...
4 Feb 2011 - 4:00 pm | गणपा
धन्यवाद.
खाकी बद्दल पण भर टाका पैसा तै. :)
4 Feb 2011 - 4:32 pm | पैसा
"खाकी" हा शब्द पश्तुनी भाषेतील "खाक" या शब्दावरून आला आहे असं म्हणतात. खाक म्हणजे माती. अर्थातच खाकी म्हणजे "मातकट".
इंग्रज सैन्यात शूर पठाण लोकांची एक तुकडी १८४७ साली बनविण्यात आली. तिचं नाव "कॉर्प्स ऑफ गाईड". या तुकडीने सर्वप्रथम खाकी कपड्याचा गणवेष वापरला असा उल्लेख सापडला.
अर्थातच खाकी ही महात्मा गांधी यांची देणगी नसावी!
4 Feb 2011 - 6:00 pm | नन्दादीप
>>इंग्रज सैन्यात शूर पठाण लोकांची एक तुकडी १८४७ साली बनविण्यात आली. तिचं नाव "कॉर्प्स ऑफ गाईड". या तुकडीने सर्वप्रथम खाकी कपड्याचा गणवेष वापरला असा उल्लेख सापडला. >>
कुठे???
लगेच त्यांचे आभार मानून टाका बरे का....जाला वरून असेल तर ती लिंक टाक, पुस्तक/व्यक्ती असेल तर संदर्भ द्या....नाही काय आहे, आज काल फॅशन निघालीये अस करण्याची...नायतर लोक रागावतात म्हणे...
4 Feb 2011 - 11:55 pm | पैसा
जालावरून साभार!
http://www.progressiveislam.org/pashtun_first_wear_khaki_uniforms
आभार मानायची आठवण करून दिल्याबद्दल नंदादीपचे आभार!
:)
5 Feb 2011 - 7:11 pm | पंगा
"कॉर्प्स" नाही हो!
इंग्रजीत "कॉर्प्स" असा उच्चार होऊ शकणारा एकच शब्द, तो म्हणजे Corpse. अर्थः मुडदा.
"पथदर्शकाचा मुडदा" असे या तुकडीचे नाव होते काय?
उलटपक्षी, आपल्याला अपेक्षित शब्द Corps असा आहे. (शेवटी e नाही याची कृपया नोंद घ्यावी.) उच्चारी: "कोर".
(शिवाय, त्या तुकडीच्या नावातील "गाइड्स" अनेकवचनी आहेत - "गाइड" नसून, "गाइड्स" - हा आणखी एक मुद्दा.)
तेव्हा, कृपया "कोर ऑफ गाइड्स" म्हणा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो.
5 Feb 2011 - 10:36 pm | पैसा
अवांतर दुरुस्तीसाठी धन्यवाद! आतापर्यंत या शब्दाचा उच्चार कधीही न ऐकल्यामुळे नकळत हातून सायबाच्या भाषेचा "मुडदा" पडला याची नाही म्हटलं तरी जरा मौज वाटली. याचं कारण म्हणजे core या शब्दाचा उच्चार कोर असा आहे हे माहित होतं. पण 'corps' चा उच्चारही 'कोर' आहे ही मला नवीन माहिती आहे. जरूर लक्षात ठेवीन.
आणखी अवांतरः 'विकि' वर शोधता या शब्दाचे मूळ 'corpus' हा Latin शब्द आहे. आणि त्याचा अर्थ 'body' असा सापडला. आणि विंग्रजीत अश्या अनावश्यक अक्षरांच्या शेपट्या लावायची पद्धत का असावी असा एक विचार डोक्यात येऊन गेला.
5 Feb 2011 - 10:53 pm | पंगा
(शाळेत असताना वगैरे) NCCबद्दल कधी ऐकले नाहीत वाटते?
असो. एक विनोद आठवतो.
आमचे सरदारजी सैन्यात असतात. आणि सैन्याबद्दल त्यांना प्रचंड अभिमान असतो. इतका, की त्यांच्या मुलांची नावे पण 'सुभेदारसिंह', 'मेजरसिंह' अशी ठेवलेली असतात.
तर ड्यू कोर्समध्ये त्यांची पत्नी पुन्हा एकदा गरोदर राहते. तिच्या बाळंतपणासाठी रीतसर रजा घेऊन सुट्टीवर जायला निघण्यापूर्वी बरोबरच्या सैनिकांचा निरोप घ्यायला जातात, तेव्हा सहज चौकशी होते.
"काय सरदारजी, या वेळी मुलाचे नाव काय ठेवणार?"
"हम्म्म्म्म्... 'सुभेदार' झाला, 'मेजर' झाला. यावेळी थेट 'जर्नैलसिंह' ठेवेन म्हणतो."
"आणि समजा यावेळी मुलगी झाली तर?"
"हरकत नाही. तिचे नाव 'आर्मर्ड कौर' ठेवू की, त्यात काय?"
4 Feb 2011 - 3:46 pm | भडकमकर मास्तर
मला हे नाटक अति ष्टाईलबाज आणि टाळ्याकाढू बटबटीत संवादांनी भरलेले वाटले..... साउथच्या सिनेमातला हीरो कसा असतो, तसे पेश केले आहे.... इन्स्पेक्टर तर त्याच्या इतका भजनी लागलेला मला पाहवला नाही.. नक्की तसेच होते का, खरे खोटे माहित नाही...
घरी आल्यावर प्रचंड भारावलेल्या चुलतकाकांशी तासभर वादविवाद केल्याचे आठवते.( माझा पवित्रा "तुमचे सगळे खरे असेल, पण या घटनेमुळे गांधीजी अधिक मोठे झाले" ..)
4 Feb 2011 - 4:06 pm | मी_ओंकार
मास्तरांशी सहमत. वर सांगितलेला किस्सा शरद पोंक्षेंनीच सांगितला आहे. त्यांच्या 'नथुराम ते देवराम' या कार्यक्रमात ते हा किस्सा सांगतात.
- ओंकार.
4 Feb 2011 - 4:16 pm | नारयन लेले
आसे वाटणे म्हणजे काविळ झालेल्या ला सगळे पिवळे दिसते त्यातलाच प्रकार.
बाकि गान्धि नावावर जगणारे आजुन आहेत.
विनित
4 Feb 2011 - 4:31 pm | नितिन थत्ते
>>काविळ झालेल्या ला सगळे पिवळे दिसते त्यातलाच प्रकार.
तसेच ***** वाक्याविषयी म्हणायचे आहे.
4 Feb 2011 - 5:08 pm | टारझन
त्या ***** च्या वाक्या मधे प्रत्येक ***** आतंकवादी नसतो , हे पण म्हंटलंय .. त्या कडे पण काणाडोळा केला काहो ?
:)
4 Feb 2011 - 5:54 pm | नितिन थत्ते
ही ही ही.
त्या नारयन लेले यांणीपन काणाडॉळा केला ना....
5 Feb 2011 - 9:30 am | llपुण्याचे पेशवेll
पण **** टाकले की गोष्टीची व्याप्ती एकदम वाढते.
(वाढीव) पेशवे
5 Feb 2011 - 10:12 am | विकास
त्या नारयन लेले यांणीपन काणाडॉळा केला ना....
मी चुकून हे वाक्य "त्या नारायण राणे यांणीपन काणाडॉळा केला ना...." असे वाचले आणि एकदम (कळफलकरूपी) लेखणीने प्रहार झाल्यासारखे वाटले! ;)
6 Feb 2011 - 1:00 am | पंगा
काविळीचा काविळीने मुकाबला... हम्म्म्म्... बाय एनी चान्स, आपला होमेपदीवर विश्वास वगैरे आहे का हो? (सहजच विचारले.)
4 Feb 2011 - 6:22 pm | निखिल देशपांडे
हे राम!!!
4 Feb 2011 - 6:25 pm | टारझन
गेले का गेले ?
4 Feb 2011 - 6:35 pm | अवलिया
>>>हे राम!!!
गांधीजींनी खरोखर "हे राम ! " असे शब्द मरतांना उच्चारले होते का?
4 Feb 2011 - 6:51 pm | गणपा
यावर पण मागे एकदा मिपावरच काथ्याकुट (हाणामारी) झाला होता असे स्मरते.
जिज्ञासुंनी थोडी उचका-उचकी करावी.
मी दिली असती लिंक शोधुन पण मग लोक मला टोमणे मारतात. ;)
4 Feb 2011 - 6:57 pm | निखिल देशपांडे
गांधीजींनी खरोखर "हे राम ! " असे शब्द मरतांना उच्चारले होते का?
त्याचा इथे काय संबंध...
ती धागा वाचुन माझ्या मनातली प्रतिक्रिया आहे मी टाकली..
तसेही अशा काथ्याकुटाच्या निमित्त्याने का होईना आम्हाला राम नाम घ्यायची संधी मिळते इतकाच तो काय काथ्याकुटाचा फायदा.
4 Feb 2011 - 6:59 pm | अवलिया
ती धागा वाचुन माझ्या मनातली प्रतिक्रिया आहे मी टाकली..
सहमत आहे. आणि तुमचे हे राम वाचून आमच्या मनात जी प्रतिक्रिया आली ती आम्ही टाकली.
त्यानिमित्ताने वाचणारे दोनदा राम वाचतील... तेवढंच देवाचं नाव.
5 Feb 2011 - 9:32 am | llपुण्याचे पेशवेll
तेवढंच देवाचं नाव
हे राम.. नान्या मला आता कळलं लोकं तुला आध्यात्मिक गुरु वैग्रे का म्हणतात ते.
4 Feb 2011 - 7:17 pm | वेताळ
असाच कळवळा कसाब बद्दल दिसला असता तर मन शांत झाले असते.
4 Feb 2011 - 7:17 pm | नरेशकुमार
गांधी / नथुराम
कर्ण दानवीर होता कि नव्हता ?
देव आहे कि नाही ? वगेरे वगेरे
हे प्रश्न एक दिवस सगळ्यांना पुरुन उरतील.
4 Feb 2011 - 7:17 pm | विजुभाऊ
नथुरामचे कर्तृत्व काय तर एका म्हातार्या माणसाला त्याच्या पाया पडायच्या निमित्ताने गोळी झाडून खून करणे.
हे कृत्य अत्यंत भेक्कड होते. त्या कृत्याचा उदोदो कशासाठी करायचा.
गांधीनी मरताना हे राम म्हंटले काय किंवा नुसते एखादा अस्फूट उद्गार उच्चारला असेल याच्यावर वाद कशासाठी.
त्याने काय साध्य होनार आहे. गांधी हट्टी होते हे खरेच. पण त्यानी जे इतराना जमले नाही ते जमवून दाखवले.
त्यानी देशातील सर्वसामान्य माणसाला देशसेवे साठी प्रवृत्त केले . सर्वसामान्य माणसाला देशसेवेचा एक मध्यममार्ग दाखवला. इतरांची देशनिष्ठा तेवढीच सच्ची होती जेवढी गांधींची होती.
गांधींचे अनुकरण देशातील खेड्यापाड्यातील लोकानी देखील केले.
अहिंसा हे शस्त्र गांधीनी वापरले आणि व्यक्तीच्या नव्हे तर प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभारला.
ब्रीटीश शासन गेले तरी भारताचे राजकारणात इंग्लंड सोबत संबन्ध चाम्गले राहिले. त्याचा फाय्दा भारताला जागतीक राजकारणात झाला. सत्ता सनदशीर मार्गाने सर्वसामान्यांच्या हातात आली आणि देशात अराजक माजले नाही.
याबात कोणाचेच दुमत नसावे.
5 Feb 2011 - 3:04 am | अर्धवटराव
+१
गांधींची गरज स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हढी होती त्यापेक्षा जास्त स्वातंत्रोत्तर काळात होती. इतक्या प्रचंड आत्मबलाचा मनुष्य नुकत्याच जन्मलेल्या भारतीय लोकशाहीस खुपच उपकारक ठरला असता.
अर्धवटराव
5 Feb 2011 - 9:16 am | चिगो
>>गांधी हट्टी होते हे खरेच. पण त्यानी जे इतराना जमले नाही ते जमवून दाखवले.
त्यानी देशातील सर्वसामान्य माणसाला देशसेवे साठी प्रवृत्त केले . सर्वसामान्य माणसाला देशसेवेचा एक मध्यममार्ग दाखवला. <<
हेच म्हणतो.
गांधीजींच्या आधी स्वातंत्रलढा हा तितका जनव्यापी नव्हता, जेवढा त्यांनी केला.. त्यांच्या "गाँव चलो"च्या नार्याने शेतकर्यांना आणि गावकर्यांना आकृष्ट केले, "रामराज्य"च्या संकल्पनेने हिंदुंना लढ्यात ओढले,
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले, "स्त्री-समानते"च्या विचारांनी स्त्रिया लढ्यात सामिल झाल्या. "स्वदेशी" च्या घोषाने व्यापारी वर्ग त्यांच्याकडे आणि लढ्यात ओढला गेला....
गांधीजी राजकारणी होते आणि मुत्सद्दी पण. ही हॅड हिज ओन शेअर ऑफ फेल्युअर्स.. पण "ग्रेट" होते हे पण नक्कीच..
5 Feb 2011 - 11:38 am | अप्पा जोगळेकर
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले,
त्यांना मुस्लिमांनी आपले मानले हे विधान वादग्रस्त आहे. किंबहुना हे साफ चुकीचे विधान आहे. गांधींजींनी खिलाफतच्या निमित्ताने संपूर्ण मुस्लिम समाजाला खेचून मूळ राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण मुसलमान समाज इतका (आजच्याइतकाच) नाकर्ता आणि नादान होता की त्यांनी या हाकेला ओ दिली नाही. ३७ का ४० साली ज्या निवडणुका झाल्या त्यांचे रिझल्ट ही वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने मुस्लिम्बहुल भागात म्हणजे आजच्या पाकिस्तानात मजबूत मार खाल्ला आणि मुस्लिम लीग मात्र दणकून जिंकली. गांधीजींवर मुस्लिम अनुनयाचा आरोप होत असला तरी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचे ९०% पेक्षाही जास्त अनुयायी हिंदू समाजाचे होते. भारतामध्ये हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे भारतीयांचा नेता आणि हिंदूंचा नेता असा फरक करता येत नाही. ज्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचा आरोप झाला तो नेता हा बहुसंख्य हिंदूंचा नेता होता ही बाब सूचक आहे
5 Feb 2011 - 12:07 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
5 Feb 2011 - 1:45 pm | चिगो
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले,
त्यांना मुस्लिमांनी आपले मानले हे विधान वादग्रस्त आहे. किंबहुना हे साफ चुकीचे विधान आहे.<<
मी हे बोललो कारण की त्यावेळी मुस्लिम नेत्यांनी खिलाफतचे नेतृत्व गांधीजींनाच दिले होते. माझ्या माहितीप्रमाणे जिन्नांच्या काँग्रेसमध्ये येण्यामागे गांधीजींचे नेतृत्व बर्याच अंशी कारणीभूत होते. (जाणकारांनी प्रकाश टाकावा) नंतरच्या राजकीय घडामोडींने जो बदल घडला तो भाग वेगळा...
5 Feb 2011 - 4:23 pm | सुनील
राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने मुस्लिम्बहुल भागात म्हणजे आजच्या पाकिस्तानात मजबूत मार खाल्ला आणि मुस्लिम लीग मात्र दणकून जिंकली
हे खरे नाही.
१९३७ च्या निवडणूकीत मुस्लिम्-बहुल पंजाब आणि बंगालात अनुक्रमे युनियनिस्ट पार्टी (सर फझल-इ-हुसेन) आणि कृषक प्रजा पार्टी (फझलुल हक) यांचे सरकार आले होते. मुस्लिम लीगचे नव्हे.
तसेच सरहद्द प्रांतातदेखिल काँग्रेसचे खान अब्दुल गफार खान यांचे सरकार निवडून आले होते.
5 Feb 2011 - 5:46 pm | अप्पा जोगळेकर
नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. कदाचित मी सन देण्यात चूक करतो आहे.
4 Feb 2011 - 7:29 pm | वेताळ
शिवाय दुसरे कोणतेच काम उरले नाही असे दिसते.
4 Feb 2011 - 8:24 pm | मुक्तसुनीत
विस्कळित स्वरूपात लिहिलेल्या धाग्याच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा जमेल तसा घेतलेला परामर्ष :
१. प्रस्तुत धागा : शिळ्या कढीला नवा ऊत.
२. "नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक बटबटीत आहे. कंटाळवाणे बटबटीत. ज्यात नुसती बोंबाबोंब भाषणबाजी आहे. विचार करणार्या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही - यात काय हाती लागेल असा प्रश्न पडतो.
३. सर्व अमुक प्रकारचे लोक तमुक असतातच असे नाही पण तमुक मात्र अमुक असतात या प्रकारच्या विधानांमधे द्वेष स्मगल करून आणलेला असतो; आव मात्र संतुलित विधाने केल्याचा असतो.
थोडक्यांत असे की , गांधीविरोध, नथुरामप्रेम, हिंदुत्ववाद, काँग्रेसविरोध या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी मांडायच्या असतील तर काही नीट विधाने करावीत, काय असतील ती आर्ग्युमेंट्स मांडावीत. आपल्या स्वतःच्याच अजेंड्याला थोडा तरी आदर हवा असेल तर विस्कळित, "इनोदी" , सनसनीखेज़ विधाने करायच्या ऐवजी आपल्या विचारांचा व्यूह मांडावा.
5 Feb 2011 - 9:40 pm | रमताराम
मुसु तुम्ही अनिल बर्वेंचे 'थँक्यू मि. ग्लाड' वाचले/पाहिले असेलच. 'नथुराम' वाचून/पाहून मला त्या नाटकाची आठवण का झाली कुणास ठाउक. :)
बाकी गांधी वि नथुराम या लढाईबद्दल म्या अज्ञ पामराने काय बोलावे. पुन्हा एकवार झालेल्या रणधुमाळीत एकही नवा मुद्दा मिळाला नाही हे मात्र खरे. एकुण ही लढाईदेखील शाकाहार/मांसाहार, देव आहे/नाही या वादांप्रमाणेच 'सनातन' ठरणार असे दिसते.
-(विराम)
5 Feb 2011 - 10:31 pm | पंगा
"(प्रत्येक हिंदुद्वेष्टा हा विचारवंत नसतो, पण) प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो" या (सुप्रसिद्ध) प्रेमाइसास ग्राह्य धरता, आपल्या वरील वाक्यात कोठेतरी काँट्राडिक्षण इन टर्म्स होत आहे असे वाटत नाही काय?
तपासून पाहू.
प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो. ----------------------------------------------------- (१)
म्हणजेच, हिंदुत्वद्वेष्टा नसलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. ----- (२)
आता 'हिंदुत्ववादी माणसा'ची नेमकी व्याख्या खात्रीशीरपणे सांगू शकणार नाही (आणि सुदैवाने पुढील आर्ग्युमेंट करण्यापूर्वी तशी व्याख्या केलीच पाहिजे असे कोणतेही बंधन निदान या संकेतस्थळावर तरी अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही), परंतु 'हिंदुत्ववादी माणूस' म्हणवून घेण्यासाठी 'हिंदुत्वद्वेष नसणे' एवढे किमान क्वालिफिकेषण बाळगूण असणे अपेक्षित असावे, अशी अटकळ आहे. ------------------------------------------------------------- (३)
त्यापुढे, 'विचारवंत' या शब्दाच्याही नेमक्या व्याख्येबद्दल खात्री नाही (डिस्क्लेमर वरीलप्रमाणेच), परंतु 'विचार करणारा कोणताही माणूस' हा 'विचारवंत' ठरावा, असे मानण्यास जागा आहे. ------------------------------------------------------ (४)
म्हणजेच, वरील (२) आणि (३) यांस अनुसरून,
हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. -------------------------- (५)
(कारण 'हिंदुत्ववादी असणारी माणसे' हा वरील (३) ला अनुसरून 'हिंदुत्वद्वेष्टी नसलेल्या माणसां'चा उपसंच आहे.)
याचाच अर्थ, वरील (५) आणि (४) यांस अनुसरून,
हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा 'विचार करणारा माणूस' असू शकत नाही. ----------- (६)
वरील (६) ला अनुसरून, आपल्या विधानातील 'विचार करणार्या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही' या भागात एक प्रचंड काँट्राडिक्षण इन टर्म्स आहे, असे सुचवावेसे वाटते.
क्यूईडी. अर्थात, क्वाइट ईज़िली डन!
डिस्क्लेमर:
आपल्या विधानात 'विचार करणार्या कुठल्याही माणसा'ऐवजी 'विचार करू शकणार्या कुठल्याही माणसा'चा उल्लेख असता, तर वरील सर्व विवेचन हे गैरलागू ठरते! (मात्र, त्या परिस्थितीत आमच्या दिवंगत आत्याबाईंना आम्ही मोठ्या प्रेमाने "काकाऽऽऽऽऽऽऽ" अशी हाकही मारली असती, हेही तितकेच खरे!)
तसेही, हिंदुत्ववादी माणसे ही विचार करू शकतात अथवा नाही, याबाबत कोणतेच भाष्य करू इच्छीत नाही. मात्र, शक्य असो वा नसो, करत नाहीत अशी आजवर केवळ शंका बाळगून होतो. त्या शंकेचे आज (सिद्धतेसहित) खात्रीत पर्यवसान झाले, आणि तेही एका स्वयंघोषित हिंदुत्ववाद्याच्याच गृहीतकाच्या आधारावर, याबद्दल परमसंतोष होतो.
4 Feb 2011 - 8:45 pm | jaydip.kulkarni
नथुराम चे कृत्य नक्कीच समर्थनीय नाही पण गांधींचा अति उदो उदो पण नकोसा वाटतो , वास्तविक कोन्ग्रेस फक्त गांधी या नावाचा उपयोजित ब्रांड म्हणून वापर करते ....
5 Feb 2011 - 6:56 pm | पंगा
हे तर बहुधा गांधींच्या हयातीतच (शेवटीशेवटी) सुरू झाले असावे. पण यात गांधींचा काय दोष?
5 Feb 2011 - 7:31 pm | वेताळ
व भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले हा त्याचा दोष आहे असे चिप्लुन्कराना वाटते.
4 Feb 2011 - 10:32 pm | सुनील
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला येता कामा नये. समोरील व्यक्तीचे मत (नाटक, चित्रपट, भाषण, लेख वा कलाकृती) पटत नसेल तर ते व्यक्त करण्याचे सनदशीर मार्गच चोखाळले पाहिजेत. झुंडशाही, हुल्लडबाजीला अजिबात स्थान असता कामा नये. कुणीही कायदा हाती घेणे योग्य नाही.
सदर नाटक बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राडेबाजीचा केलेला उपयोग निषेधार्हच आहे.
अर्थातच, जे ह्या नाटकाला लागू होते तेच तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, जेम्स लेन आणि एम एफ हुसेन यांच्या बाबतही लागू होते. त्यांच्या विरोधात झालेली झुंडशाहीदेखिल तितकीच निषेधार्ह होती/आहे.
4 Feb 2011 - 10:55 pm | प्रियाली
या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते.
यावर १०१% सहमती.
5 Feb 2011 - 12:17 am | Nile
या वाक्याशी फारशी सहमती नाही. टक्केवारी असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच (१००%च) असु शकते. ;-)
5 Feb 2011 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll
या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते
+२
सहमत आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील मर्यादित स्वरूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते आणि जास्त पूर्वग्रह आणि हट्टीपणाच असतो. असे आमचे वैयक्तिक मत आहे.
काही लोक पेन उचलून अभिव्यक्ती सादर करतात, काही लोक दगड उचलून. शेवटी दोन्ही गोष्टींमधे विवेकाचा अभाव असणे हे सांमतर्य जाणवतं.
5 Feb 2011 - 2:44 am | शहराजाद
अगदी सहमत.
आणि ते चालू राहिले म्हणून तरी काय होणार आहे? मुळात ते नाटक अतिशय बटबटीत बोजड आहे. कंटाळवाणे कॄत्रिम संवाद आणि सुमार पटकथा. विरोधकांनी ते बंद पाडण्याची मोहीम उभारली तर तेवढीच पब्लिशिटी जास्त होईल.