गाभा:
बहुचर्चित अयोध्येतील रामजन्मभूमी स्थानाबाबत पुढच्या महीन्यात सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.
अयोध्येतील ह्या पवित्र जागेवर राममंदीरच उभे राहावे अशी करोडो नागरिकांची इच्छा आहे. व त्यासाठी लढा हि दिला आहे..न्यायालय जनमताचा आदर राखेल ही अपेक्षा!
जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!!
प्रतिक्रिया
25 Aug 2010 - 10:15 am | शिल्पा ब
बरं मगं? आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे?
25 Aug 2010 - 10:30 am | विंजिनेर
ते सांगितलंय की कुलकर्णी सायबांनी - काथ्या कुटा :)
25 Aug 2010 - 10:38 am | गांधीवादी
कोणीही काहीही करू नका . हातावर हाथ धरून बसून राहा. गप्प. पाकड्यांना माहितीच आहे कि भारत काहीहीकरू शकत नाही. पाकड्यांनी पाकिस्तानमधील हिंद्न्च्या मंदिरांची किती वाट लावलि आहे
ते इथे बघा
http://www.chakranews.com/87-year-old-hindu-temple-facing-demolition-in-...
http://hinduexistence.wordpress.com/2010/04/07/1822/
http://www.expressindia.com/news/fullstory.php?newsid=69276
अशी हजारो उदाहरणे देता येतील
पण इथे एका तरी मस्जिदला हाथ लावा, बघ काय होता ते.
राम मंदिर झालाच पाहिजे, त्यांच्या नाकावर टिच्चून ते झालाच पाहिजे,
हे हिंदूंचा राज्य होते, आहे आणि राहणार
अवांतर ; चाणक्य एकदा म्हणाले होते कि जर माणसाला संपवायचा असेल तर त्याच इतिहास संपवा. माणूस आपोआप संपले.
आम्ही इतिहास संपून देणार नाही.
25 Aug 2010 - 11:01 am | मृत्युन्जय
मान्य की पाकड्यांनी हिंदु मंदिरांचा नाश केला आहे. पण बोलुनचालुन ते मुस्लीम राष्ट्र आहे. तुम्ही पण हिंदु राष्ट्र घोषित करा आणि घाला वाट्टेल तो गोंधळ. शेकडो वर्षे आपण जर मुग गिळुन गप्प बसलो आणि हिंदु मंदिरे पाडु दिली तर तो आपलाच दोष आहे. मुस्लिम तेव्हादेखील अल्पसंख्यांक होते. तरीही त्यांनी माज केलाच ना? खानाने जेव्हा तुळजापुर पंढरपुरची मुर्ती फोडली तेव्हा त्याच्या सैन्यामध्ये बहुसंख्य हिंदु सरदार होते. त्यांनी षंढपणे सगळा तमाशा पाहिला.
आता भारत एक निधर्मी राष्ट्र असताना हिंदुनी जर मशीदी तोडल्या तर गदारोळ होणारच. आता मुसलमानांनी मंदीरे तोडली तरी गदारोळ होइल. मला तरी वाटते की १९४७ ची जी काही स्थिती असेल (मंदीर - मशीद या बाबतीत) ती तशीच राहु देणे हेच योग्य.
25 Aug 2010 - 10:41 am | चिंतामणी
जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!!
(यावेळी गंगा उलटी वाहिली असे दिसत आहे.)
25 Aug 2010 - 12:52 pm | स्पंदना
मेरेको यहिच्च बोलनेका था।
'मला वाटल ती जागा पकिस्तानला देवुन त्यांच्या शुभ हस्ते मशिद बांधा म्हणुन लिहिल असणार.
25 Aug 2010 - 11:49 am | llपुण्याचे पेशवेll
जय श्रीराम ....
राममंदिर होईलच यात तिळमात्र शंका नाही. या हलकट भाजप वाल्यांनी साल्यांनी बाजार केला त्या रामाच्या मंदिराचा म्हणूनच निवडणूक हरले लेकाचे. असो.
मंदिर बांधायचे असते तर इतकी माणसं होती रातोरात बांधून झाले असते. मंदिर बांधून काढायचे आणि मग चालूदे केस कोर्टात वाट्टेल तितके दिवस. :) शिवाजी महाराजांसारखे वेगाने आणि गूपचूप गोष्टी उरकून टाकायच्या. त्या अफझलखानाच्या थडग्याबद्दलही आमचे तेच मत आहे.
26 Aug 2010 - 9:35 am | गांधीवादी
>>शिवाजी महाराजांसारखे वेगाने आणि गूपचूप गोष्टी उरकून टाकायच्या. त्या अफझलखानाच्या थडग्याबद्दलही आमचे तेच मत आहे.
आमची तयारी आहे. सोबतीला ८-१० मावळे देखील आहेत, कधी करायचा प्लान ?
माझा लयी डोळा त्या औरंगजेबच्या कबरीवर आहे. बोला काय म्हणता ?
एकदा करून मोकळा व्हायचा मग चालूदे केस कोर्टात वाट्टेल तितके दिवस.
(मनसे, सेना आहेच आपल्यामागे)
अवांतर :
तसेच औरंगाबाद चे नाव बदलून संभाजी नगर कसे वाटते ?
त्या मेल्या नालायक औरंगजेबाचे नाव त्या गावाला कशाला पाहिजे.
इथल्या विमानतळाचा वापर खास फक्त. त्या अल्प संख्यांकन साठी त्यांच्या धार्मिक स्थळी जाण्यास होतो. खास त्यांच्यासाठी विमानतळ आहे तिथे. AIR INDIA तोट्यात का आहे माहिती आहे का ? 'त्यांना' भरगच्च सवलत दिली जाते, विमान प्रवासात .
हिंदूंचे असे चोचले कुठे ?
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/6106999.cms
25 Aug 2010 - 1:16 pm | अनाम
काड्या सारणे काही कमी होत नाही....
२-४ वाक्यांचा चर्चा प्रस्ताव टाकुन लेखक महाशय गायब होणार.. आणि मग झाडावर चढुन गंमत बघत बसणार.
25 Aug 2010 - 2:25 pm | Pain
लेखक आणि अमोल तुळजकर ही एकच व्यक्ती आहे का ?
नसेल तर एकाने दुसर्याचा धागा इथे/मुक्तपीठवर डकवला आहे.
25 Aug 2010 - 2:29 pm | llपुण्याचे पेशवेll
कदाचित एका संघटनेचे कार्यकर्ते असतील. :)
25 Aug 2010 - 2:30 pm | चिंतामणी
(यावेळी गंगा उलटी वाहिली असे दिसत आहे.)
म्हणजे यावेळी मुपि वरून मिपावर विषय आला आहे.
26 Aug 2010 - 9:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
त्या धाग्याचा दुवा द्या कि राव.
26 Aug 2010 - 10:05 am | विजुभाऊ
तो विषय विश्व हिंदु परीषदेच्या पोतडीतून राष्ट्रीय म्हणवणार्या एका संघटनेने एका तथाकथीत राजकीय पक्षाच्या हातात दिला. त्या पक्षाला त्या प्रश्नामुळे पुनरुज्जीवन मिळाले खरे. पण त्या पक्षाला प्रश्न सोडवण्यापेक्षा तो तसाच ठेवणे महत्वाचे वातत होते. जनतेला खेळवत ठेवले की जनता आपोआप आअपल्याला निवडून देईल असे त्या पक्षाचे म्हणणे. उजव्या हिंदूवादी धोरणांपासून गांधीवादी समाजवाद ते जिन्नांचे गोडवे गण्यापर्यन्त त्या पक्षाच्या नेत्यानी अनेक कोलांट्याउड्या घेतल्या. भारतीय जनता हे विसरली नाही, पक्षाच्या नावात भारत आणि जनता असलेतरी या पक्षाच्या नेत्याना भारताच्या आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीच घेणेदेणे उरलेले नाहिय्ये.
त्या जागेवर काहीहे बांधले तरी ती जागा वादग्रस्तच रहाणार आहे.
इथे कोणीतरी कारणनसताना बादरायण संबन्ध जोडून विचारलेले नसतानासुद्धा अफझलखानाच्या थडग्याबद्दलही मत दिले आहेआहे. अफझलखानाच्या थडग्याला शिवाजीमहाराजानी काही रक्कम दिवाबत्तीसाठी लावून दिली होती. अर्थात तो मुद्दा गौण आहे.
धाग्यात नमूद केलेल्या त्या जागेवर मंदीर मशीद असे काहिही न बांधता एखादे हॉस्पिटल स्टेडियम अथवा शाळा बांधावी.
अवांतरः हरिवंशरायजींच्या काही ओळी आठवल्या.
ये मंदीर मस्जीद बैर बढाते
मेल कराती है मधुशाला