रजनिकांत खाल्या मि़ठाला जागला

शरुबाबा's picture
शरुबाबा in काथ्याकूट
5 Apr 2008 - 12:45 pm
गाभा: 

रजनिकांत खाल्या मि़ठाला जागला

एक बातमि - दुवा -http://www.saamana.com/

प्रतिक्रिया

अगदी खरे शरुबाबा!
किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................?
पण महाराष्ट्राच्या मिठाला जाग नाहि हेच खर्!................अगदी महाराजांच्या काळापासुन हेच अनुभवतो आहोत............!
कवि कलश यांच्या सारखे फारच कमी असतिल दुसर्‍या प्रांतातुन आलेले ज्यांनी संभाजी राजांना मॄत्युच्या महाद्वारापर्यंत साथ दिली .............
रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे.
"अनामिका"

विसोबा खेचर's picture

5 Apr 2008 - 4:20 pm | विसोबा खेचर

रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे.

सहमत आहे....

तात्या.

छोटा डॉन's picture

8 Apr 2008 - 11:35 pm | छोटा डॉन

रजनीकांतने त्याच्या कर्मभूमीचे पांग फेडणे स्वाभावीक आहे...
कारण तो एक सच्चा मराठी माणूस आहे. मराठी माणूस खाल्ल्या मिठाशी कधीही बेईमानी करत नाही ,[ काही असंन्माननीय अपवाद आहेत]

आणि समजा त्याने तसे केले नसते तर समस्त "तामिळी जनता" आपल्या लुंग्या सावरून त्याचा निषेध करायला धावली असती.
इथून पुढे त्याचा एक सिनेमा थेटरात आला नसता. त्याच्या घरादाराची राखरांगोळी केली असती त्या तमिळींनी ....
कारण, तमिळ हे "काही ठरावीक मराठी" माणसासारखे "ढोंगी प्रांतनिरपेक्ष नाहीत ....
त्यांना त्यांच्या मातॄभूमीविषयी अतिशय उत्कट प्रेम आहे आणि ते त्यासाठी अख्ख्या देशाला अंगावर घ्यायला सदैव तयार असतील...

आपल्यासारखे नाटकी " मुंबई ही सर्वांची आहे, प्रत्येकाला पाहिजे तसे जगण्याचा हक्क आहे" वगैरे वल्गना करणार नाहीत ...
आपणच नसत्या उपर्‍यांचे कौतूक करून ठेवतो व ती लोकं वेळ आली की "एकतर गप्प बसून मज्जा बघतात वा पळून जातात "....
आपण काय करतो तर "मराठी हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचे व राज ठाकरेचे पाय ओढण्यात" धन्यता मानतो
[ वर टिका ज्यांच्याबद्दल टिका केली ती मराठी जनता सर्वसामान्य नसून काही खास किडकी जमात आहे व ती कोण हे सुज्ञास सांगणे न लगे ......]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ऐश्वर्या राय's picture

7 Apr 2008 - 12:24 am | ऐश्वर्या राय

एक छोटासा फरक नजरेआड करत आहात आपण सारे. रजनी तमिळ सिनेमात काम करतो. बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत.

मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे. मुंबईला आधी मुंबई स्वतः म्हणा आणि मग इतरांनी बॉम्बे म्हटले तर आ़क्षेप घेण्याचे कर्तव्य पार पाडा. नाहीतर आहेच, बॉम्बे, पूना, चेन्नई, बंगळूरू...

मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी,
ऐश

इनोबा म्हणे's picture

7 Apr 2008 - 12:45 am | इनोबा म्हणे

बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही.
अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या)

हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत.
माफ करा हं,आम्हाला वाटले होते की मुंबई महाराष्ट्रातच आहे. :)

मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे
आपल्याकडून ही हिच अपेक्षा आहे.

कट्टर मराठी-महाराष्ट्रवादी
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

व्यंकट's picture

7 Apr 2008 - 9:08 am | व्यंकट

>>>बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही.
>>>अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या)

:)

व्यंकट

पान्डू हवालदार's picture

5 Apr 2008 - 3:38 pm | पान्डू हवालदार

"सुपर स्टार ला देखिल खुजे करुन टाकले " .... जय महाराष्ट्र ...

इनोबा म्हणे's picture

5 Apr 2008 - 3:57 pm | इनोबा म्हणे

अमिताभ यातून काही शिकेल असे वाटत नाही. किती झाले तरी तो पडला 'जिसकी लाठी उसकी भैस' पद्धतीचे राजकारण खेळणार्‍या उत्तर प्रदेशातला.

बाकी ज्या सामनाने राज ठाकरेंच्या आंदोलनाला 'राजकीय स्टंट' म्हणून हिणवले,आता त्यांनी स्वतःच अमिताभला 'टार्गेट' का केले हे कळत नाही.

या संदर्भात पत्रकारांनी अमिताभला छेडले असता,त्याने उत्तर देणे टाळले.
हा विडीओ इथे पाहता येईल.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मदनबाण's picture

5 Apr 2008 - 4:39 pm | मदनबाण

किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................?
हा फरक फक्त अमिताभच सांगु शकेल.....

(रजनिकांत च्या गॉगल घालण्याच्या स्टाईलवर फिदा)
मदनबाण

देवदत्त's picture

5 Apr 2008 - 11:16 pm | देवदत्त

रजनीकांत बद्दल मला जास्त काही माहीत नाही त्यामुळे काही म्हणणे नाही.

प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला.
आजही पत्रकारांना उत्तर दिले ते मला बरोबरच वाटले. पत्रकार करतातच तसे. जर विचारणार्‍या माणसाला माहीत नाही पूर्ण तर का उगाच कोणाला छेडायचे?

तसेच, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे, मराठी कलाकार कितीवेळा पुढे येतो हे ही पाहणे गरजेचे आहे.

आणखी एक, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे "पळपुटेपणा करणार्‍या सुपरस्टार अमिताभसह अनेक बड्या कलाकारांच्या पार्श्वभूमीवर" ह्या वाक्यातून अमिताभवर टीका केल्याचे स्पष्ट दिसले.मग नंतर शिवसेना म्हणते की आम्ही अमिताभ बद्दल काही नाही म्हणालो, हे नाही पटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2008 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला.
बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 12:06 pm | धमाल मुलगा

हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही.
जियो! ह्याला म्हणतात वाक्य!
सहमत आहे. आठवा स॑युक्त महाराष्ट्र चळवळ, मु॑बई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घातलेला घाट, आणि अजुनही त्याच ध्येयाशी पोचण्याचे हल्लीचे प्रयत्न.

असो, शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीका॑त, माणूस मुळचा मराठी, त्यामुळे इमान, व्यवसाय आणि आपल्या कर्मभूमीबद्दल जपण्याची नैतिकता इ.इ. गोष्टी रक्तातून आल्या असाव्यात.
शि॑दे, होळकर नाहीत का मराठी असुनही स्वतः मध्यप्रदेशाच्या बाजूने असतात. कारण वरचेच.

प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला.

देवदत्तराव, इथेच तर पाणी मुरत॑य. "बघा बघा, मी काही बोलत नाहीय्ये पण तुम्हीच माझ्यावर राळ उडवतात...(मी जे करतोय कि॑वा करत नाहीय्ये त्याबद्दल सोडून द्या!) " अस॑ झे॑गट आहे ते.

बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते.

सर, आपल्या विधानाशी मी सहमत आणि असहमतही.
नक्कीच बच्चन हे व्यक्तिमत्व मोठ॑ आहे. दुमत नसाव॑. पण त्याच्या स॑पत्तीमुळे हा धूराळा उडावा अस॑ मला नाही वाटत. तस॑ असत॑ तर बजाज, फिरोदिया, गोदरेज, टाटा ह्या 'परप्रा॑तिया॑च्या', किमानपक्षी अमराठी धनाढ्या॑चाबाबतीतही हेच घडल॑ नसत॑ का?

माझ॑ म्हणण॑ फक्त एकच आहे, जिथे धूर निघतो, तिथे नक्कीच आग असते. टाळी एका हाताने कशी वाजेल?

असो, महाराष्ट्र, मराठी माणूस, बच्चन ह्या विषया॑वर इतकी चर्चा घडलेली आहे की नवीन मा॑डण्यासारखा मुद्दाच उरलेला नाहीय्ये. ज्या॑ना ते पटत॑य ते त्या प्रतिक्रिया॑च॑ समर्थनच करतील. ज्या॑ना नाही पटल॑ ते विरोध करतील.

पण माझी एक विन॑ती आहे, आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही कदाचित.

आनंदयात्री's picture

8 Apr 2008 - 11:55 am | आनंदयात्री

आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही

पटले भो .. बाकींच्याना पण पटावे !

शरुबाबा's picture

8 Apr 2008 - 3:19 pm | शरुबाबा

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार...
शरुबाबा