इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.
इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात.
ashutoshjog@yahoo.com
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.
इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !
निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.
ashutoshjog@yahoo.com
एखादे इन्जेक्शन अथवा मेंदूत बसवण्याची चीप मिळू शकेल का ? सात अब्ज लोकांना व्यवहार्य इंग्रजी येण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी ! चांगला व्यवसाय उभारण्याच्ची नामी संधी आहे !
इंग्रज नसते तरीही इंग्रजी भारतीयांनी शिकलीच असती....त्यात इंग्रजांचे उपकार वगैरे नाहीये....त्यांनी त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून आपल्याकडे फेकलेला शिळ्या भाकरीचा तुकडा होता तो
असतानाही किती भारत अन चीन मध्ये इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या ह्यावर एकदा काही मिळाले तर वाचा. आज आपला सर्विस सेक्टर फोफावला आहे तो जगातील सर्वात मोठ्या इंग्रजी बोलणाऱ्या लोकसंख्येमुळे. अर्थात इंग्रजांनी त्यांची सोय म्हणून भाषा इथे रुजवली हे सोळाआणे सच असलं तरी ते आपल्या चांगलंच पथ्यावर पडलं आहे इतकं मानायची दिलदारी असायला हरकत नाही. बहुभाषिक देशात जिथे हिंदी चालत नाही (थापून चालुही नये) तिथे इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे (आपल्यासारख्या मोठ्या राज्यात जाणवत नसलं तरी) पूर्वोत्तर भारतात जिथे प्रसंगी ३० ३० किलोमीटरला राज्य, भाषा, संस्कृती बदलून जाते तिथे इंग्रजीने बरीच मदत केलीये.
ते सगळं सोडा वाटल्यास, आजही रोजची ताजी लुसलुशीत भाकरी कमवायला आपण सगळेच हापिसात जाऊन तोच इंग्रजांचा फेकलेला शिळा तुकडा चघळतोय का नाही?
टीप :- धाग्यात असलेल्या 'व्हाईट मॅन बर्डन थेअरीशी' मी अजिबात सहमत नाहीये, किंबहुना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असलेच पाहिजे हे माझं आग्रही मत आहे पण म्हणून इंग्रजी जशी बोडक्यावर बसवून घेऊ नये तशी तिची अवहेलना सुद्धा करू नये, भारत 'melting pot of cultures' आहे इतकं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं तरी पुरे!.
@जेम्स वांड,
.... इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे.....
इंग्रजी भाषेअभावी ओरिसाच्या लोकांनी केरळी बांधवांशी किंचा महाराष्ट्रीय जनतेने तामिळ लोकांशी कसा आणि किती सहजतेने संवाद साधला असता असा एक विचार करून पाहतोय :-)
मी स्वतः चीन्यांबरोबर काम केले आहे त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे :)
इंग्रजीमुळे झालेले आणि होणारे दोन्ही प्रकारचे फायदेही माहीत आहेत आणि त्या बाबतीत सहमती आहेच्च :)
माझा मुद्दा असा होता कि
इंग्रजांनी भारतीयांच्या भल्यासाठी आपल्याला इंग्रजी शिकवली असा समज धागा वाचल्यावर होउ शकतो....त्यामुळे धागा जरा चुकीच्या वळणाने गेलाय...इंग्रजांनी जे केले ते फक्त आणि फक्त त्यांच्या भल्यासाठी.....भारतीयांचा इंग्रजीमुळे झालेला फायदा हा फक्त आपल्या प्रयत्नांमुळे झालाय
आणि जरी इंग्रजांनी इंग्रजी नसती शिकवली तर कदाचित आज जितका प्रसार झालाय तितका नसता झाला पण त्या दिशेने नक्कीच गेलो असतो कारण "ज्याला इंग्रजी येते तो जगात कुठेही (पक्षी अमेरिकेत्/पाश्चात्य देशांत) पैसे छापायला / सेटल व्हायला जाउ शकतो" हे ताडले असते....उदाहरणच द्यायचे झाले तर पंजाबी लोक अगदी "शेती" करायला सुद्धा कॅनडात गेलेत (इथे करु शकत नव्हते? पंजाबात पाणी सगळ्यात जास्त आहे अख्ख्या भारतात)
आणि चीनमध्ये लोकशाही नाही त्यामुळे तिथे सरकारने इंग्रजी शाळांचा प्रसारच होउ दिला नव्हता...कारण लोक इंग्रजी शिकले तर बाहेरच्या जगात काय चालते ते लोकांना इंटरनेटमुळे समजेल आणि कदाचित सरकारी एकाधिकारशाही संपेल अशी सरकारी धारणा आहे...जर चीनमध्येसुद्धा इंग्रजी शिकवायला अगदी ३०-४० वर्षांपूर्वी सुरुवात झाली असती तर आज चीन जगाचा आयटी हब असता (आणि हे एक दिवस होणार आहे....चीनी लोक दिड-दमड्यांत कामे करतील कारण सरकार जे सांगेल ते निमूटपणे करावेच लागते)
इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे (आपल्यासारख्या मोठ्या राज्यात जाणवत नसलं तरी) पूर्वोत्तर भारतात जिथे प्रसंगी ३० ३० किलोमीटरला राज्य, भाषा, संस्कृती बदलून जाते तिथे इंग्रजीने बरीच मदत केलीये.
आजही रोजची ताजी लुसलुशीत भाकरी कमवायला आपण सगळेच हापिसात जाऊन तोच इंग्रजांचा फेकलेला शिळा तुकडा चघळतोय का नाही?
जपान आपल्यापेक्षाही साजूक तूप लावलेल्या पोळीचा आहार घेतो. त्याला बरं नाही लागत इंग्रजीचा तुकडा?
------------------------
भारत (आणि बहुतेक पाकिस्तान) सोडून अन्य एकही देश संबंध नसलेल्या भाषेतून चालत नाही. (अपवाद - अफ्रिकेतले फ्रेंचमधून चालणारे देश).
महाराष्ट्रातले (मद्रासी प्रांत तर सोडाच) लोक जितकी उत्तम हिंदी बोलू शकत नाहीत वा बोलत नाहीत त्यापेक्षा अधिक उत्तम हिंदी अरुणाचल प्रदेशचे लोक बोलतात. प्रत्येक डोंगराआड वेगळी भाषा असते. पण समाईक भाषा हिंदी आहे. हेच सर्वत्र आहे.
इंग्रजी (मिशनर्यांनी बायबल वाचायला शिकवलेल्या पोराडगी सोडून) आणि उच्चशिक्षितांना सोडून कोण्णाला येत नाही. येत असली तरी ती कोणी वापरत नाही.
=====================
तामिळ नाडू या एकाच राज्यात इंग्रजी हिंदीपेक्षा उपयोगाची आहे. अर्थात हे ही असं ७० वर्षांपूर्वी नव्हतं. सातत्याचा "उत्तर भारतीय ब्राह्मणांचा द्वेष" (हिंदी ही त्यांची भाषा म्हणे), त्याला राजाश्रय, म्हणून इथे हिंदी एक पादान खाली आहे.
============================
भारतातून इंग्रजीला उद्या विसर्जित करता येईल. अर्थात न्यूनगंड प्रचंड असल्यामुळे हे "मानसिक रित्या" असंभव आहे.
विंग्रज लोकं त्यांच्या देशातल्या इतिहासाच्या अभ्यास क्रमात, विंग्रजांनी इतर देशावर किती अत्याचार केलेतं त्यांच कस शोषन केल हे का शिकवतं नाहीत
------श्री शशी थरुर.
साहेबाला इंग्लंडात त्यांच्या आमंत्रणाने जाऊन, तिथेच, त्यांच्याच भाषेत 'तुम्ही आम्हाला इतकं लुटलंय, आम्हाला 1 पौंड नुकसानभरपाई पाह्यजे' असं खडसावलंय.
आता किंडल वर ऍन एरा ऑफ डार्कनेस वाचतोय. "An Era of Darkness: The British Empire in India" by Shashi Tharoor.
विंग्रज लोकं त्यांच्या देशातल्या इतिहासाच्या अभ्यास क्रमात, विंग्रजांनी इतर देशावर किती अत्याचार केलेतं त्यांच कस शोषन केल हे का शिकवतं नाहीत
------श्री शशी थरुर.
ते जाऊच द्या, इंग्रज लोक आहेतच चालू. आपण नीच होतो हा इतिहास न शिकवण्याइतका नीचपणा आजही त्यांचेकडे आहे.
पण ज्या देशांवर अत्याचार झाले त्यांचं काय?
त्यांनी तरी नीट इतिहास शिकवावा.
पण ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारासमोर एकही अजून भयानक अत्याचार दाखवायचाच नाही या नितीतत्त्वानं भारतातही तो इतिहास शिकवला जात नाही.
तर आपण फ्रेंच भाषेतच संवाद साधला असता आणि तीच भाषा जागतीक केली असती.
जगातली १७% जनता भारतात राहते + २.६३% पाकिस्तान आणि + २.१८% बांगलादेश + श्रीलंका ०.२७% म्हणजे जवळपास २२%
(खूद्द इंग्रजांची लोकसंख्या १%हूनही कमी आहे.फ्रान्स बाबतीत पण १%पेक्षा कमीच.)
असो,
इंग्रजांची भलामण करायचीच असेल तर खालील पण मूद्दे आहेतच.
१. रेल्वे आणली (सैन्याच्या हालचाली साठी हा स्वार्थाचा मूद्दा सोडून द्या.)
२. टपाल खाते (सैन्याच्या हालचालीसाठीच.ह्याचा खर्च पण आम जनतेच्याच माथी होता.)
असो,
जोगांचं अन तुमचं मृत्यू शडाष्टक असल्याचं जाणवतं, उगाच प्रश्न विचाराल अन जोगांनी फाटा दाखवला की तुमचे ते बाबा कोहणहकहर का कोणचे ते घेऊन याल :D
(कृपया हलके घेणे)
जोगांचं अन तुमचं मृत्यू शडाष्टक असल्याचं जाणवतं...
ज्याचे त्याचे चष्मे.
मी कुठलाही लेख कुणी लिहिले आहे? हे न बघता , काय लिहिले आहे? त्याप्रमाणेच प्रतिसाद देतो.
अर्थातच, आपल्या सारख्या मान्यवरांच्या बरोबर वाद घालायची माझी इच्छा नाही. कारण, एकतर आपण माझ्या पेक्षा "मिपावर" जास्त जूने आहात, असे जाणवते आणि दुसरे म्हणजे आपल्या विचारात "पुणेरी पणा" जाणवतो.
टोकाचा व्यक्ती द्वेष आणि टोकाची व्यक्ती पूजा ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी हानिकारकच.आणि तो तुमच्या बाबतीतही नाही.पण ह्यापुढे मात्र तो तसा राहीलच ह्याची तुमच्या बाबतीत तरी खात्री नाही.एखाद्या प्रतिसादामुळे हेवनवासी होण्यापेक्षा, आपल्या सारख्या मान्यवरांशी वाद न घालणेच उत्तम.
आपण, योग्य तो बोध घ्याल, अशी आशा अजिबात नाही.त्यामुळे तुम्ही प्रतिसाद दिलात, तरी मी आपल्याला उत्तर देणार नाही.
टपाल , रेल्वे जनतेला वापरायची बंदी होती का ?
सरकारी दणकट इमारती , कवायती सैन्य , रस्ते , धरणे , वर्तमानपत्रे , लोकशाही , मेडिकल कॉलेज , हस्पिटल , शेअर मार्केट , रिजर्व ब्यान्क. इन्शुरन्स , ..... जाताना २२५ कोटी गंगाजळी ( त्यातली शेजार्याची वाटणी ७५ कोटी )
इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?
इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?
गजानना !!!! कागलकर असुन सुद्धा तुला हा प्रश्न विचारावा वाटला?
पाय बरा झाला का ? जागो जागि घसरगुंड्या हाईत जर्रा दमान ...
इथला कापुस विंग्लंड ला न्यायचा व तयार कपडे आणुन इथे विकायचे मोबदला सोन्यात रुपांतरीत करुन विंग्लंडला न्यायचा. या सगळ्या व्यवहारात सरकार तिजोरीत जमा झालेला टॅक्स च्या पैश्यातुन असले तंत्रज्ञान भारतात आणायचे पैसा पुन्हा विंग्लंडला शिवाय विंग्रज अधिका-यांचे गडगंज पगार. या रेल्वे रुळाचे जे जाळे विणले गेले त्यातील किती पैसा मोबदला म्हणुन मजुरांना मिळत होता, किती मजुर मेले, आहे का काही नोंद.
ह्यॅ !
ईंग्रजांचे उपकार म्हणजे त्यांनी ह्या देशावरील इस्लामी प्रभाव नाहीसा केला ! मराठ्यांनी दिल्ली काबिज केली पार अटकेपार झेंडे लावले पण ते इस्लामी प्रभाव नाहीसा करु शकले नव्हते . अगदी १८५७ पर्यंत बहदुरशहाची लाल करत बसले होते. हैदरला टिपुला वारंवार हरवुन देखील ते डोके वर काढत होते. इस्लामी प्रभाव नष्ट झाला तो इंग्रजांच्यामुळे ! शिवाय फाळणीचे श्रेय (कि पाप ) हे भारतात कोणाला द्याय्चे ह्यावर खुषाल वाद होवोत पण फाळणी झाली ती साहेबामुळेच ! फाळणी झाली नसती तर आज भारत काय असत ह्याचा विचारही करवत नाही !
इंग्रजांच्यामुळे हिंदुस्तान्वरील इस्लामी प्रभाव नष्ट झाला म्हणुन हिंदुत्वव्वादी विशेषकरुन उच्चवर्णीय खुष !
इंग्रजांच्यामुळे सतीप्रथा , जरठकुमारी विवाहसार्ख्या प्रथा बंद होवुन नवीन सुधारणांस वाव मिळाला म्हणुन स्त्रीया खुष !
इंग्रजांच्यामुळे बामणी पेशवाई बुडाली आणि सुधारर्णेस वाव निर्माण झाला म्हणुन दलित खुष !
इंग्रजांच्या मुळे स्वतंत्र देश मिळाला म्हणुन मुसलमान खुष !
इंग्रजांचे फार फार उपकार आहेत ह्या देशावर !
काही लोकं एका मनुष्याचं अपहरण करून त्याच्या पायात सोन्याचे साखळदंड लावून त्याला डांबून ठेवतात. पोलिसांची चाहूल लागल्याने चोर लोकं दूर पळतात. ते पाहून अपहृत माणूस तिथे पडलेल्या कानशीने सोन्याची साखळी तासतो आणि ती घेऊन पळ काढतो. मग बाजारात जाऊन साखळदंड मोडून पैसे उभे करतो. त्यावर व्यापार करून सुखी होतो. मग काही दिवसांनी त्या चोर लोकांना हा माणूस दिसतो. ते त्याच्याकडे सोन्याची भरपाई मागतात. तंटा राजाकडे जातो. राज्यात प्रजासत्ताक असते.
तर प्रश्न असा आहे की, राजा काय निकाल देईल?
-गा.पै.
मी महाराष्ट्रातला नवपालक आहे. माझ्या मुलीला कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकवायचं यावर मी खूप अभ्यास केला आणि खालील निष्कर्षापर्यंत पोहोचलो. बघा तुम्हाला पटतंय का...
- महाराष्ट्रातली ७५% मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात, १०% मुलं हिंदी, गुजराती, उर्दू, तेलुगू माध्यमात आणि राहिलेली १५-१८% मुलं इंग्रजी माध्यमात जातात. म्हणजे महाराष्ट्र आपल्या पुढच्या पिढ्यांना मातृभाषेतूनच आणि मराठीतूनच शिकवायला प्राधान्य देतो, त्यामुळे मराठी शाळा संपल्या, मराठी शाळा वाचवा, वगैरे खोटा प्रचार आहे. मराठी शाळा अगदी सुखरूप आहेत.
- दै. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार इंग्रजी शाळांमध्ये शिकवणारे ५०% शिक्षक डी. एड. पण नाहीत - https://goo.gl/iZVGPq
- इंग्रजी शाळांना अनुदान मिळत नाही, परिणामी शिक्षकभरती नियमाने होत नाही, शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत नाही, तिथल्या शिक्षकांना सरकारतर्फे कसलंही प्रशिक्षण मिळत नाही, ना या शाळांची तपासणी होते. पूर्ण भारतात सीबीएसई बोर्डाच्या २० हजार शाळा पण नाहीत. मग सीबीएसईच्या नावे माझ्या इतर नवपालकबांधवांना फसवणारे लोक कोण आहेत? त्यांच्यावर सरकार कडक आणि धडक कारवाई का करत नाही? सरकारचं आणि या लुटारू फेक इंग्रजी शाळांचं काही साटंलोटं आहे का?
- मला वाटायचं सीबीएसई म्हणजे पूर्ण देशात एकच अभ्यासक्रम असेल, पण इतर राज्यातील मित्रांकडे चौकशी केल्यावर समजलं, सीबीएसई साठी काही ठिकाणी NCERT ची पुस्तके तर काही ठिकाणी २००-२०० रुपयांची IB बोर्डाची पुस्तके वापरली जातात, म्हणजे कुणाला कशाचाही धरबंद नाही..कसलीही तपासणी होत नाही. शाळेला जे वाटेल ते शाळा करते.
~~~~~~~~~~
असो, मातृभाषेतून शिक्षण, पहिलीपासून इंग्रजी, राज्य-जिल्हा-तालुकास्तरीय अनेक कला-क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग अशा अनेक सुविधा मला मराठी माध्यमाच्या शाळेत मिळतात, ज्या इंग्रजी माध्यमात मिळत नाहीत! इतकंच काय तर साधं विद्यार्थ्यांनी मराठी बोललं तरी काही भुरटे, पालकांकडून २०-२० रु. दंड वसूल करतात.
मग अशा हास्यास्पद इंग्रजी शाळांमध्ये आणि अर्धवट शिकलेल्या शिक्षकांच्या हाताखाली मी माझ्या मुलीला अजिबात शिकवणार नाही. तुम्हीपण आजच योग्य निर्णय घ्या..
१. माझी दोन्ही मुले सेमी इंग्लीश मध्ये शिकली. पण दोन्ही मुलांचा शैक्षणिक कल वेगवेगळा असल्याने एक इंजिनियर झाला. तर दुसर्याने १२वी नंतर शिक्षण सोडले.दुसरा मुलगा फ्रेंच शिकत आहे.दुसरा मुलगा ह्या वर्षी पासून फ्रेंच भाषेचे क्लास घ्यायला सुरुवात करत आहे.
२. माझ्या भावाचा मुलगा सी.बी.एस.सी. माध्यमातून शिकला. पुढे B.I.T.S. (Goa), मधून इंजिनियर झाला आणि मग अमेरिकेत MS करायला गेला. तर त्याचीच मुलगी CBSC चा अभ्यास झेपत नसल्याने, ९वी नंतर, SSC बोर्डातून दहावी करत आहे.
माझ्या माहितीतली काही उदाहरणे बघीतली तर, भाषा हे माध्यम महत्वाचे नसते तर, शैक्षणिक कल बघून, ते शिक्षण देणारे उत्तम शिक्षक शोधले तर, शैक्षणिक यश आणि व्यावहारिक यश नक्कीच मिळू शकते, असा माझा मर्यादित अनुभव आहे.
कोरियन जपानीस किंवा चिनी लोकांना विशेष विंग्रजी येत नाही पण आपण विंग्रजी समजून सुद्धा दळिद्री का आहोत ?
विंग्रजांना विंग्रजी साठी उपकार दाखवणे म्हणजे एखाद्या बलात्कार पीडित महिलेने लैगिक सुखासाठी बलात्कारी नराधमाचे उपकार मानण्यासारखे होय.
उदाहरण थोडे टोकाचे वाटले तरी भारतीय लोक आधीपासून जगांत व्यापारासाठी येत जात होते. भारतीय लोक ३-४ भाषा सहज अवगत करतात. समाज इंग्रजी महत्वाची ठरली असती तर ती शिकून घेण्यासाठी त्यांना गुलामगिरीची गरज नव्हती. आज सुद्धा भारतात फ्रेंच, जर्मन, जपानी, ग्रीक भाषा शिकणारे अनेक लोक आहेत. (मी स्वतः जपानी भाषा शिकले आहे)
इंग्रजी भाषेला अवाजवी महत्व अश्या साठी दिले जाते कीजे आम्ही बहुतेक भारतीय अजून सुद्धा फार खालच्या दर्जाच्या कामांत गुंतलो आहोत त्यामुळे तथाकथित विदेशी क्लायंट ची थुंकी झेलण्यासाठी "विंग्रजी पाहिजे" असा दबाव भारतातील कर्मचाऱ्यावर आणला जातो.
ह्या उलट अँड्रू ng ह्या चिनी कॉम्पुटर सायंटिस्ट चे उदाहरण पहा. त्याला जेमतेम इंग्रजीच येते. तरी सुद्धा आधी गुगल आणि नंतर बैदुने भरमसाठ पैसे देऊन त्याला नोकरी दिली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील बहुतेक जपानी, चिनी, कोरियन लोकांना फक्त जुजबी इंग्रजीच येते म्हणून कधी त्यांना नोकरी मिळायला त्रास होत नाही.
इंग्रजी भाषा जरूर शिकावी आणि अगदी ब्रिटिश साहेबाला सुद्दा त्यात मागे टाकावे पण हे "उपकार केले हो" अश्या प्रकारची भाषा वापरणे म्हणजे आमच्या पूर्वजांचा अपमान करणे होय.
सहमत,
विंग्रजांनी जे इन्फ्रस्ट्रक्चर निर्माण केले ते करतांना भारतीय मजुरांन वर खुप अत्याचार करुन काम करुन घेतले. जसे आज चिन मधील लेबर बाबत बोलले जाते.
विंग्रजांचे उपकार मानने म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलीदान दिले -सर्वस्व त्यागले त्यांना एक प्रकरे चुक ठरवण्या सारखे आहे.
>>आज सुद्धा भारतात फ्रेंच, जर्मन, जपानी, ग्रीक भाषा शिकणारे अनेक लोक आहेत. (मी स्वतः जपानी भाषा शिकले आहे)
ह्या विषयी अधिक माहिती देउ शकाल का? (नविन भाषा शिकावी म्हणतो. जमल्यास जपानी. पण फारच अवघड आहे असे ऐकले आहे. :-( )
प्रतिक्रिया
हे बघा, ठरवा
चांगला व्यवसाय उभारण्याच्ची नामी संधी !
इंग्रज नसते तरीही इंग्रजी
लोकसंख्या एकसारखी (जवळपास)
@जेम्स वांड,
मी स्वतः चीन्यांबरोबर काम
@ ट का,
इतक्या लवकर सहमती?? हे मिपा
इंग्रज त्राते वगैरे होते
इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता
आजही रोजची ताजी लुसलुशीत
पूर्वोत्तर भारतात
"वरदान" ? जोखड म्हणा, जे आपण
असे केले तर आपल्यासारखे करंटे
कसे केले तर ?
इंग्रजीचा दुस्वास समजू शकतो
कोणाला ?
विंग्रज
आपन फ्यान हावोत शशीचा..
आपन फ्यान हावोत शशीचा...
मी पन
प्लस १
विंग्रज लोकं त्यांच्या
सध्या
इंग्रजांच्या जागी फ्रेंच किंवा फ्रेंच लोकांचे राज्य असते...
जाऊ द्या हो
@जेम्स वांड......
बरोबर
...
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
इथले आकडी मिशीवाले , वाघावर
गजानना !!!! कागलकर असुन सुद्धा तुला हा प्रश्न विचारावा वाटला?
शुद्ध व्यापार
चिनी माकांकडुन
ह्यॅ !
+
व्हिक्टोरिया राणी सरकार की जय
सोन्याच्या साखळदंडाची गोष्ट
. . .
मी महाराष्ट्रातला नवपालक आहे.
माझे अनुभव आणि माझ्या भावाचे अनुभव सांगतो.
सेमी इंग्रजी हे वेगळे माध्यम
कोरियन जपानीस किंवा चिनी
काय बोललात
सहमतं
अवा॑तर आहे पण,
पुण्यात असाल तर आपल्या एक
आभारी आहे!