कल्पकतेची ऐशीतैशी
कल्पकतेची ऐशीतैशी
===========
सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.
तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"
या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.
आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.
कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सेम इनपुट = > सेम आउटपुट
लाख टके की बात, प्रगो.
हाहहा! खतरनाक आंद्रे!
या धाग्यावर मी आता अधिक
अभिव्यक्तीचा पोपट एकदा
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती
शेवटच्या घटका मोजत असलेल्या
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी
ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी
(No subject)
अमरेंद्रची कल्पकता आवडली.
सहमत. काही वेळा घरातल्या
पितळ उघडे पडल्याने
सत्यं वदन् यदि नरः, न खलु
कुटुंबातील बऱ्याच जणांचा
रणछोडदासच निघून गेल्याने धाग्याचा पोपट मेलाय आता.
जबाबदार टिका कशी करावी?
पियुष गोयल राजकारणी असले तरी
मी आणखी बरीच सोवळ्या
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी. अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही
मी आज्जीला सांभाळतो पण एखादा
काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स”
काय ठरलं मग शेवटी?
"उजवी बुरशी"
एकंदरीत भारतातील परिस्तिथी
भारत सरकारचा भर ए आय तयार
युयुत्सु सर ती उजवी बुरशी
“मनुवादी बुरशी”
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहेआणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
"कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या
ज्या लोकांचा ऊर किरकोळ
आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं
असं कसं? गटारातून गॅस नळीने
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक
मुद्दा कल्पकते बद्दलचा आहे.
नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतातबाडिस. धागाकर्ता शेणाची टोपली कल्पकतेच्या फडक्याखाली झाकून घेऊन आला. परंतु टोपलीतल्या शेणाने स्वत:चेच तोंड माखले गेल्यानंतर "मी आता परत येथे लिहिणार नाही" असे सांगून पळ काढला. परंतु पुन्हा एकदा एक नवीन शेणाची टोपली घेऊन परत आला आणि पुन्हा एकदा शेणाने तोंड माखून घेतले. परंतु तरीही अक्कल आली नाही.कोण म्हणतो भारतात कल्पकता
कल्पकता आणि भारतीय संस्कृती