भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.
फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं. आता खाली आज आणलेल्या भाजीचा मार्केटयार्ड मधला दर व कंसात लोकल भाजी बाजाराचा तेव्हढ्याच काँटिटी चा दर टाकलेला आहे. तो पहा.
गावरान कोथिंबीर 1गड्डी-₹5 (20 ते 30)
गावरान कडीपत्ता,मोठ्ठी गड्डी- ₹8(20)
लिंबू 15 नग- ₹10(30)
पालक 1गड्डी- ₹10(20)
शेपू 4गड्डी-₹40 (60 )
लालभोपळा दीडकिलो- ₹30(90 ते 120 )
दोडका 1किलो-₹40(80 ते 120)
शेवगा 1किलो-₹30(80 ते 100)
टोमॅटो 1किलो-₹20(40 ते 60)
फ्लॉवर मोठा गड्डा-₹30(80 ते 100)
आळू 5पानी-5 गड्डी-₹20(50)
वरील सर्व भाजी 223 रुपयात आली. 2वेळा केली तरी 10 दिवस पुरेल.
हीच सर्व भाजी आपल्या लोकल मार्केटमध्ये घ्यायची झाली तर 800 ते 1000 रुपये लागतात. शिवाय ताजेपणा व कोलिटी फारशी असण्याचा संभव नाही. उलट ती ताजी व उत्कृष्ट असेल तर त्यासाठी 10रु..पावशेराला 3 ते 5 रुपये अजून मागितले जातात,आणि वरून आपल्याला "तेच कसं योग्य आहे!" अशी समजही मिळते.
आमच्या लोकल भाजीवाल्यांचं एक रम्य धोरण आहे. ते मोअर सेल,मोअर प्रॉफिटच्या बरोब्बर उलट आहे. फेकून द्या पण विकू नका! किंवा सडवत सडवत विकत रहा,अस त्या धोरणाच मूलभूत गुपित आहे. त्याचं उत्तर या मार्केटयार्डच्या कुपीत आहे. बघा इचार करून!
(आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,लोकल भाजीवाल्यांचा आपल्याला करवून घ्यावा लागणारा मानसिक छळ थांबेल. शिवाय फळं फुलं देखील अशीच ताजी,उत्कृष्ट व स्वस्त मिळतात ती ही आणता येतील-मार्केटयार्ड, पुणे येथून.)
(आपणही आपल्या शहर/गावातल्या "मोठ्या बाजाराला" भेट देऊन पहा.)
आपलाच:-गुलटेकडी मार्केटयार्डातला:-पुणेरी आत्मा!
वरील सर्व भाजी 223 रुपयात आली. 2वेळा केली तरी 10 दिवस पुरेल.
हीच सर्व भाजी आपल्या लोकल मार्केटमध्ये घ्यायची झाली तर 800 ते 1000 रुपये लागतात. शिवाय ताजेपणा व कोलिटी फारशी असण्याचा संभव नाही. उलट ती ताजी व उत्कृष्ट असेल तर त्यासाठी 10रु..पावशेराला 3 ते 5 रुपये अजून मागितले जातात,आणि वरून आपल्याला "तेच कसं योग्य आहे!" अशी समजही मिळते.
आमच्या लोकल भाजीवाल्यांचं एक रम्य धोरण आहे. ते मोअर सेल,मोअर प्रॉफिटच्या बरोब्बर उलट आहे. फेकून द्या पण विकू नका! किंवा सडवत सडवत विकत रहा,अस त्या धोरणाच मूलभूत गुपित आहे. त्याचं उत्तर या मार्केटयार्डच्या कुपीत आहे. बघा इचार करून!
(आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,लोकल भाजीवाल्यांचा आपल्याला करवून घ्यावा लागणारा मानसिक छळ थांबेल. शिवाय फळं फुलं देखील अशीच ताजी,उत्कृष्ट व स्वस्त मिळतात ती ही आणता येतील-मार्केटयार्ड, पुणे येथून.)
(आपणही आपल्या शहर/गावातल्या "मोठ्या बाजाराला" भेट देऊन पहा.)
आपलाच:-गुलटेकडी मार्केटयार्डातला:-पुणेरी आत्मा!वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वस्त आणि मस्त!
मीठ खायचा सोडा समप्रमाणात
धन्यवाद.
भाज्या अगदी ताज्या.
वेगळ्याच विषयावरचा लेख आवडला
व्वा!!
मस्त !
हही हही ! खरं आहे.
चैन करा ....
भाजी मस्त फ्रेश दिसतेय.
2वेळा केली तरी 10 दिवस पुरेल.
(No subject)
१० दिवस पुरणारी भाजी ताजी
आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून
बिना सहकार-नही उद्धार!
चांगली माहिती आणि मस्त
@ते दोघे नेहरू चौकात --
सर्वेषाम् धन्यवादम्.
https://sevenmantras.com/
@८ ते ९.५ किलो ची बास्केट
गुलटेकडी मार्केटला चिंचवडहून
कं-ट्रोल
स्वस्तता महत्वाची की
(No subject)
ऑन
भाजी पाल्याचा घावुक बाजार
कशाला समजावून सांगितले?
अत्रुप्तजी आत्मा, तुम्ही
(No subject)
जमले
धन्यवाद
हम्मम्म... खरं आहे.