मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

विकास ·

हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत.
स्थानिक संस्कृतीस तुच्छ मानणे आणि नाझीवादाचा हा असा जोडलेला संबंध हास्यास्पद आहे. गुर्मी आणि माज ह्यात कसला असतो हो गुणात्मक भेद? कुणाला पैशाची मस्ती असते कुणाला सत्तेची कुणाला दोन्हीची तर कुणी जन्मजात मग्रुर असतो म्हणून हे सगळे काय हिटलर/नाझीवादासी जोडलेले असतात काय? हिटलर सारख्या नराधमांची पूजा करणे त्यांना उघडपणे हिरो मानणारे आजही आहेत. आणि ते इथले बुद्धीवादी आहेत की तथाकथीत राडेबाज हे तुम्हालाही चांगलेच माहित आहे. तेव्हा गुणात्मक संबंध कुठे लावायचा ते तुम्हीच ठरवा. एकिकडे हिटलरची प्रशंसा आणि दुसरीकडे बिका काकांनी लिहिलेल्या लेखावर नरसंहारावर आसवे ढाळणे ह्यात किती पराकोटीची विसंगती भरलेली आहे हे दिसून न येणे ह्याला काय म्हणावे विकास राव?

नंदन 14/11/2009 - 04:19
लेख.
ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी?
अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. त्यांचे बालपण ज्या फिलाडेल्फिया शहरात गेले, तिथे दुसर्‍या महायुद्धात पॅरिसचा पाडाव झाल्यावर झालेल्या जल्लोषाचे वर्णनही त्यांनी केले आहे. (पहिल्या महायुद्धातही जर्मन वंशाचे नागरिक अमेरिकेन लोकसंख्येच्या १/६ असल्याने अमेरिका युद्धात ल्युसिटानिया जहाज बुडेपर्यंत उतरली नाही असाही एक प्रवाद आहे.). अगदी न्यू यॉर्क टाईम्ससारख्या ज्यूंच्या मालकीच्या प्रकाशनसंस्थेनेही नाझींचे अन्याय पुरेशा प्रभावीपणे लोकांसमोर मांडले नाहीत असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे महत्त्व नजरेत भरावे.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.
-- सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विकास 15/11/2009 - 07:51
धन्यवाद... अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. चॉम्स्कीची पुस्तके वाचली आहेत आणि आवडतातही. त्याची मते कधी कधी टोकाची वाटू शकतात पण माहीतीपूर्ण असतात. तत्कालीन अमेरिकन ज्यू द्वेषाबद्दल मी देखील ऐकले आहे आणि खरे असूही शकेल. पळून आलेल्या ज्यूंचे एक जहाज पण त्यांनी परत बेकायदेशीर म्हणत काही विचार न करता पाठवल्याचे ऐकलेले आहे, पण वाचलेले नाही... त्यांच्या भांडणाची पाळेमुळे त्यांच्या पायातपाय असलेल्या धार्मिक इतिहासात आहेत असे वाटते. पण तो एक वेगळाच विषय आहे. :)

धनंजय 14/11/2009 - 05:08
स्मारकाची चांगली ओळख करून दिलेली आहे. मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे. किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. समाजातातील प्रत्येक मनुष्य विचारवंत असतो, आणि प्रत्येक मनुष्य कृतिशील असतो. "काही लोक कृतिशील नसतात" (खारीचा वाटा उचलत नाहीत, पण इतरांचे चुकल्याचे सांगतात) ही कल्पना दयाळू असली तरी उपेक्षामूलक आहे, असे मला वाटते. तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे. नीमलर यांचे वाक्य स्वतःचे परखड परीक्षण करणारे आहे - माणूस म्हणून, "विचारवंत" म्हणून नव्हे. पण ते अगदी अगदी प्रामाणिक आहे. त्यांचे आदले वर्तन ते म्हणतात तसे होते, त्यांचे वरील वाक्य केवळ काव्य नाही. साक्सेनहाउसेन येथील कॉन्संट्रेशन कँप म्यूझियममध्ये त्यांची आदली मते वाचायला मिळाली - पण पूर्ण तपशील आठवत नाही - नात्सी काळात हॉलंड किंवा डेनमार्कमध्ये त्यांनी भाषण दिले "तुम्ही लोक ही स्पष्ट गोष्ट समजून घेत नाहीत की ज्यू लोक हे हीन चारित्र्याचे आहेत, हा तुमचा दोष आहे. जर्मनीमध्ये हे सत्य आम्ही मान्य करतो..." वगैरे. असे कित्येक लोकांचे मत होते, आणि युद्धानंतरही ते बदलले नाही. युद्धाची शोकांतिका बघून नीमलर यांचे मत बदलले, आपली चूक कबूल करण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये होते, हे मला विशेष प्रशंसनीय वाटते.

In reply to by धनंजय

अडाणि 14/11/2009 - 06:35
लेख छान आहे पण त्यातील निश्कर्षाशी सहमत नाही. आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. विचारवंत (जे एसी केबीन मधे बसून लेख लिहितात) ते एक वेळ जेवले तर काही फरक पडत नाही, परंतू हा सर्व सल्ला पण लांबून दिलेलाच दिसतोय. जे कुणी परवाच्या पुण्यातील तोडफोडीचे समर्थन करत आहेत त्यातील एकालाही तोशीस झालेली दिसत नाही (निदान इथल्या कुठल्याही प्रतिक्रियेतून मला समजले नाही) मिपा वर येवून लांब लांब प्रतिसाद, लेख व कविता टंकून , "उंटा वरून शेळ्या हाकण्या पलीकडे" काय होतेय ?
स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते.
आपल्या कडे दोन्ही बाजूंनी हेच चालू नाहीये का? हिंसाचार आणि दहशीतीद्वारे चालू केलेले काम तुम्हाला तुमच्या संपुर्ण उद्दिष्टापर्यंत कधीच पोचवू शकत नाही, हा निष्कर्श हिटलरच्या उदाहरणावरून जास्त संयुक्तीक वाटतो. - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

कौंतेय 15/11/2009 - 02:40
सहमत आहे! लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. मूळात मनसेने मराठीच्या मुद्यावर स्थापना केलेलली असली तरी मराठीच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी कोणती विधायक कामे आजपर्यंत केली ह्याची यादी द्यावी. मराठी भाषा तिचा होत असलेला र्‍हास/विकास आणि परंप्रांतियांचे महाराष्ट्रात येणारे लोंढे आणि त्यामुळे वाढत असलेली गुंडगिरी ह्या दोन भिन्न मुद्यांची बेमालूम सरमिसळ मनसेने 'मराठी' ह्या लेबल खाली केलेली आहे आणि मराठी-अस्मितेच्या नावाखाली झुंडशाहीच्या मार्गाने आपला कार्यभाग साधून घेत आहे. उत्तरप्रदेशातुन आलेल्यांची गुंडगीरी कमी करणे ह्याचा मुंबईला फायदा निश्चितच आहे पण ह्यातून 'मराठी भाषेचा' काय फायदा होतो? मुंबईतील मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्ग/उच्च वर्ग हा मराठी-गुजराथी-सिंधी-पंजाबी-तमिळ अश्या विविध भाषिकांनी बनलेला आहे आणि त्यामुळे ही गुंडगिरी बंद झाल्याने त्या सर्वांचाच फायदा होतो आणि तसे होत असेल तर ते चांगलेच आहे, पण त्यातुन मराठी माणासाला 'एक्स्क्लुजीवली' असे काय मिळते? विधानसभेत झालेला गोंधळही मराठीच्या तरफदारीपेक्षा उत्तर प्रदेशीय अबूला धडा शिकवण्याच्या हेतुनेच घातलेला आहे. मराठी हाच जर मुद्दा होता तर मराठीतून शपथ न घेणार्‍या प्रत्येक आमदाराच्या शपथविधीला विरोध करायला हवा होता. पण तसे झाले नाही. अबू हा काय लायकीचा माणूस आहे सर्वांना माहित असले तरी तो जनतेने निवडून आणलेला आमदार आहे. त्याला सभागृहात मारहाण करणे हा निश्चितच सभागृहाचा अपमान आहे. (अबूला मारल्याचे दु:ख नाही पण हे चालवून घेतले तर उद्या कुणीही कुणालाही उठून झोडपू लागेल ज्यामुळे जनतेने निवडलेले प्रतिनिधी, विधानसभा ह्या गोष्टींना काहीच अर्थ राहणार नाही. आपला मुद्दा पटवून घेत नसतील तर समोरच्याला हाणा. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावेल) अशी घटना (कारण कोणतेही असो) पुन्हा सभागृहात घडणे हे (आधीच अशक्त असलेल्य) लोकशीहीला अतिशय मारक आहे आणि त्यामूळे प्रिवेंटीव्ह मेजर म्हणून जरब बसवण्यासाठी ह्या आमदारांना निलंबीत केले म्हणून रस्त्यावर येऊन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे हे तर कुठल्याच दृष्टिकोनातुन समर्थनीय नाही. सरकारचा निषेध नोंदवायची ही कुठली पद्धत? फोडलेल्या बसेस ह्याकाही कुणा आमदाराच्या मालकीच्या नव्हत्या. त्या जनतेच्या मालकीच्या होत्या. ह्याचा विसर कसा काय पडू शकतो? -कौंतेय

In reply to by धनंजय

विकास 15/11/2009 - 08:59
हा प्रतिसाद मी धनंजय, अडाणि आणि कौंतेय अशा सर्वांच्या प्रतिसादाला एकत्रीत देत आहे कारण त्यात काही समान मुद्दे आहेत. धनंजय म्हणतातः मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे. किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे....तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे. नीमलर यांचे वाक्य केवळ विचारवंतांस आहे असे माझे म्हणणे नव्हते आणि तसे मी म्हणले देखील नाही. ते वाक्य आठवायचे तात्कालीक कारण हे मूळ लेखात म्हणल्याप्रमाणे कलंत्रींचे लेखन आणि त्यात त्यांची दिसलेली प्रामाणिक चीड. मात्र अबू आझमी ह्यांच्या बद्दल आज जरी चीड आली असली तरी मराठीबद्दलचे तुच्छ भाव हे काही आझमींनीच आणलेले नाहीत, ते आधीपासून होतेच. पण त्यावर कधी आपण सामुहीकरीत्या इतरांचा, इतर भावनांचा/भाषांचा अपमान न करता, कधी स्पष्ट मुद्दा मांडला होता का? "तथाकथीत विचारवंत" म्हणजे "खोटे विचारवंत" नाही तर "अप्रामाणिक विचारवंत". जे काही तत्वज्ञान असेल ते निवडून (सिलेक्टीव्हली) वापरणे आणि म्हणून अप्रामाणिक अथवा भोंदूगिरी करणारे विचारवंत असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती विचार करते म्हणून स्वतःपुरती विचारी आहे असे म्हणता येईल पण याचा अर्थ ती विचारवंत असते असे नाही. विचारवंत म्हणजे जो समाजाला काही अंशी दिशा देतो असा. नीमलर ह्यांनी स्वत:च्या विचारातील खोट जाणून घेऊन ती मान्य करून जर वरील ओळी लिहील्या असल्या तर ते प्रामाणिक विचार्वंतच ठरतात. तुम्हाला विचारवंतात प्रामाणिक आणि तथाकथीत/अप्रामाणिक/खोटा विचारवंत असे उपप्रकार मान्य नसले तरी मी जेंव्हा टिका करतो तेंव्हा ती सरसकट सर्वच विचारवंतांवर, अगदी माझ्या विचारधारांच्या विरोधात असलेल्यांच्यावर नसते, जेंव्हा ते प्रामाणिक आणि स्वाध्यायी असतात तेंव्हा, इतकेच म्हणू इच्छितो. असो. आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. - अडाणी आणि लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. - कौंतेय सर्वप्रथम मी मनसेने केलेल्या दंग्याची अथवा इतर कधिही कुठल्याच हिंसेचे समर्थन केलेले नाही. (हे एक उ.दा.) मनसे आणि विधानसभेच्या संदर्भात देखील माझी मते त्यांच्या समर्थनार्थ नाहीत. त्यांना शिक्षा झाली तरी हरकत नाही. मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही. सर्वांना समान कायदा लागू व्हावा असे माझे मत आहे आणि प्रसिद्धीमाध्यमे आणि त्यातील विचारवंतांनी देखील एकास एक आणि एकास एक न्याय देताना विचार करायला हवा. म्हणूनच आधी मी हा धागा तयार केला होता. बसेसची मोडतोड पण याच प्रकारात मोडते. असे वर्तन अगदी पूर्ण अमान्य आणि तशी करणार्‍यांना योग्य शिक्षापण केली पाहीजे. पण त्याच बरोबर आपण या विषयावर बोलताना नकळत अतिरंजीत बोलत नाहीना, अफवांनाच वस्तुस्थिती समजत नाहीना, याचा पण विचार व्हावा असे वाटते. ४२च्या चळवळीत शेवटी गांधीजींनी पण "करा अथवा मरा" असे म्हणले कारण त्यांच्यापण सहनशक्तीचा एका अर्थी अंत झाला असे म्हणता येईल. तीच अवस्था फ्रेंच राज्यक्रांती आणि बोल्शेव्हिकांच्या संदर्भात म्हणता येईल...सामान्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला तर काय होते हे लोकलमधे पाकीटमार हातात आल्यावर जे काही सर्वच करतात त्यात जसे समजते तसेच विधानसभेतपण समजू शकते. जेंव्हा एकास एक आणि एकास एक असे न्याय देणे सातत्याने चालते, तेंव्हा सुरवातीस गुडीगुडी करत आपण मधे पडत नाही, पण त्याचे आपल्याला त्रास भोगावे लागतात...सर्व समाज भरडला जातो. कधी धर्माच्या नावाखाली तर कधी भाषेच्या तर कधी जातींच्या... माझा मुद्दा या संदर्भात आहे.

In reply to by विकास

अडाणि 15/11/2009 - 09:41
विकासजी, मि तुमचे इतर ठिकाणी लिहिलेले मत वाचले होते आणि तुम्ही 'भावनेच्या आहारी' न जाता मत प्रदर्शन करता म्हणूनच मि तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया दिली.
आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही.
हा भाग तुम्हाला निर्देशून नव्हता, ईतर प्रतिक्रिया आणि लेखातून चर्चेचा जो सूर दिसला त्या अनुशंगाने लिहिले होते. अवांतर - तुम्ही चालु केलेला दुसरा धागा ही मला पटला नव्हता, कारण ईतर ठीकाणी हाणामारी / गोंधळ होत असेल तरी तो आपला आदर्श असू नये. त्या लेखा वरील प्रतिक्रिये वरून तरी असे दिसले नाही. - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

चिरोटा 15/11/2009 - 11:17
मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही
सहमत.अबु आझमी मुजोर आहे हे मान्य.त्याने मराठीत शपथ घ्यायला काहीच हरकत नव्हती. आज Times ला त्याने मुलाखत दिली आहे."मी कुठलीही घटनाबाह्य कृती करत नसताना मला विरोध का?विधानसभा अध्यक्षांनी मला मराठीत शपथ घ्यायची सुचना केली असती तर हरकत नव्हती" असे म्हंटले आहे. राज ठाकरे ह्यांनी मराठीत शपथ घ्यायच्या वादात कर्नाटकात एका आमदाराला कन्नड येत नाही म्हणून वगळले हा संदर्भ दिला होता. इकडे दोन वृत्तपत्रांनी(Times of India आणि एक कन्नड वृत्तपत्र) अशी घटना कधीही न घडल्याचे सांगितले आहे.. भेंडी P = NP

Nile 14/11/2009 - 06:19
एका चांगल्या स्मारकाची सुरेख ओळख करुन दिल्याबद्दल विकास यांचे आभार.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते.
ह्या वाक्याशी सहमत आहे, आणि असे मी नुकतेच एका प्रतिसादात म्हणले ही आहे. पण याचा एक मोठा तोटा असा आहे की अश्याप्रकारे हिंसा करुन लक्ष खेचण्याचा प्रयत्न ही होउ शकतो आणि असे होत आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. (उदा. कुणा नेत्याच्या पुतळ्याची विटंबना इ.)
पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.
खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (सध्याचा कुठलाही वाद घ्या) आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. प्रामाणीक उदाहरण द्यायचं झालं तर अणुबॉम्ब, ग्लोबल वॉर्मींग इ. विषयांवरही नावजलेल्या शास्त्रज्ञ मंडळीमध्ये वाद होताच (आणि आहे). प्रत्येकाने आपले मुद्दे मांडण साहजिक आहे. पण हे करताना (पब्लीक फोरम्स वरती) प्रत्येकाने संयम बाळगणही महत्त्वाचं आहे. वास्तवीक धनंजय, मुक्तसुनीत, विकास आणि इतर अनेक मंडळी (काही लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर) 'स्वत:च काही जळत नसतानाही' अश्या वादात सहभागी होतात याचं मला आश्वर्य वाटतं आणि त्याच बरोबर कौतुकही. जनक्षोभाची पर्वा न करता आपलं मत परखडपणे मांडणं हे अश्या वेळेस मुग गिळुन गप्प बसण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ.

In reply to by Nile

विकास 15/11/2009 - 09:13
खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (असेच काहीसे सुनीलचे देखील मत आहे) यातील दुसर्‍या मुद्याशी सहमत आहे. पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते. म्हणजे आपण ज्या समाजाला नावे ठेवत आहोत त्यांच्या जडणघडणीत काही आपुलकीने वाटा उचलत आहोत का? पद्धती अनेक असू शकतात - स्थलकालसापेक्षही असतील पण त्यात काही तरी सकारात्मक असेल तरच मग नंतर तुम्ही सांगितलेल्या चुका ऐकायला समाज तयार राहणार. आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. बुद्धीवादी खरे ठरले नाहीत म्हणून ते तथाकथीत ठरत नाहीत तर ते जेंव्हा प्रामाणिक नसतात तेंव्हा ठरतात. तेच इतरत्र. म्हणजे (कोणाला उद्देशून नाही, असेच उदाहरण!) इतरांना "साधी रहाणी उच्च विचारसरणी" आचरायला सांगणार पण स्वत: सर्वसुखात लोळ्णार...

In reply to by विकास

Nile 17/11/2009 - 10:23
पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते
खरंय. ह्यावर आम्ही फक्त लिंकनचे वाक्य quote करतो: "He has a right to criticize, who has a heart to help." :)

अजय भागवत 14/11/2009 - 08:35
धनंजय आणि विकास ह्यांचे लेख आवडले. स्मारकं खऱ्या अर्थाने ज्या संदेशासाठी पुढील पिढीला "अनुभवता (सं’वेदना’)" यावीत म्हणून योजली जातात त्याचे उदाहरण म्हणून निश्चितच ह्या स्मारकांचा उल्लेख करता येईल. विकास ह्यांच्या "तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते...." ह्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत. मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. (पाणी उष्णतेवर ठेवताक्षणी जसे उकळत नाही, तसेच.) त्यामुळे प्रत्येक घटना ’तात्कालिक’ पारड्यात टाकू नये असे मला तरी वाटते. त्या घटनेच्या मुळ कारणांवर चर्चा होणे अधिक श्रेयस्कर असावी- जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर.

In reply to by अजय भागवत

विकास 15/11/2009 - 11:16
मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. .... जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर. थोडक्यात आणि योग्य प्रतिसाद. धब्यवाद!

सुनील 14/11/2009 - 15:28
चांगला लेख. तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते कालातीत सत्य. स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते अंशतः सहमत. वर Nile यांनी म्ह्टल्याप्रमाणे, "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवणे, हे खारीचा वाटा उचलण्यासारखेच आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 14/11/2009 - 15:57
लेख आवडला.. पटवून घ्यायचा पयत्न करतोय पण
हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे.
या वाक्यामुळे तो पूर्णत: पटला असे म्हणता येत नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे.
खरच अस आहे? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक 14/11/2009 - 16:48
हिंसा ही लक्षवेधी नक्कीच ठरते. पण आत्ताच्या माध्यमे बोकाळलेल्या काळात, त्या घटनेचे माध्यमांकडून प्रसारण कसे होते यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. माध्यमांचे संचालकत्व कोणाकडे आहे हेही महत्त्वाचे ठरते. सद्य परिस्थितीत तर 'भिंगातून जाळलेल्या कागदासारखे' फक्त हिंसेतल्या जाळावरच ते केंद्रिभूत होताना दिसते आहे.* त्यामुळे त्या हिंसेमागच्या मागण्यांमधली आर्तता त्या मागण्या ज्या केंद्रिय सत्तेसंदर्भात आहेत, तिथपर्यंत नीटपणे पोहेचत नाहीत. तिथे फक्त त्यातली हिंसाच दिसते. अशा वेळी या मागण्या त्या केंद्रिय सत्तेकडे पोहोचविण्यासाठी बुद्धिवादी गटाने सक्रिय भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. सध्या मराठीच्या बाबतीत असा एक गट अशी भूमिका पार पाडत असल्याचे ऐकिवात आहे. पण पुन्हा ते सक्रिय राजकारणात नसल्याने त्यांच्या प्रयत्नांवर आणि विस्तारावरही मर्यादा पडतात, असे दिसते. ( ग्रंथालीच्या रूची अंकात यासंदर्भात नेहमी माहिती येत असते.) मनसेसारख्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालेल्या पक्षाने आता कायदे मंडळात हे काम प्रभावीपणे पार पाडणे अपेक्षित आहे. तिथे अबू आझमीला मारल्याने त्यातली हिंसाच पुढे आली, मराठीचा आग्रह का यामागची भावना कुठेच आली नाही. त्यामुळे लोकशाहीला कलंकापासून अनेक शेलक्या विशेषणांना सामोरे जावे लागले. * इथल्या हिंदीभाषक वृत्तपत्रात राज ठाकरेंचे एकूण आंदोलन आणि त्या सगळ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन भयानक आहे. याविषयावर मी या आधीही लिहिले आहे, पण ताज्या प्रकरणाच्या अनुषंगाने मागील घटनांचीच वृत्तपत्रांमध्ये जास्त तीव्रतेने उजळणी झाल्याचेच दिसले. अबू आझमी हा थर्डक्लास माणूस आहे, पण त्याला मारल्यानंतरही 'हिंदीपर हमला', पासून काय काय हेडिंग होती ते पाहून संताप येत होता. या प्रश्नातून महाराष्ट्रात जनमत मराठीच्या बाजूने तयार होत असले तरीही दिल्लीदरबारी ज्यांची तड लागू शकतील असे मराठीच्या संदर्भातील प्रश्न मात्र जाणीवपूर्वक बाजूला सारले जातात ते केवळ आंदोलनात असलेल्या हिंसेमुळे. निर्णयाचे अधिकार हाती असलेले दिल्लीश्वर या आंदोलनामागे फक्त मनसे आहे अशी समजूत करून घेऊन वाहिन्या, वृत्तपत्रे जे काही सांगतात त्या वृत्तावर, विश्लेषणावर विश्वास ठेवून काहीही करत नाहीत. मुंबईत परप्रांतीयांना राज ठाकरेंचा विरोध एवढेच आणि त्यासाठी होणारी हिंसा एवढेच दाखविले जाते. विरोध का त्याची तार्किक कारणमीमांसा केली जात नाही. त्याची कारण निर्णय घेणार्‍या जमातीपर्यंत पोहोचत नाहीत. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 14/11/2009 - 17:40
पर्ल हार्बर च्या घटनेनंतर चर्चिल असे काहीसे म्हटल्याचे स्मरते (चूभूद्याघ्या) - आता अमेरिका युद्धात उतरण्याची निश्चिंती झाली, दोस्तराष्ट्रांचे बळ वाढले. ९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते. First they went for Moscow, and I did extend the support; Then they continued to blast Kashmir, and I preferred to talk about human rights; Then they blasted Delhi, Mumbai and Hyderabad, and I did not blink an eye; When they came for New York, and only since then I have got a bit crazy; Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it.

In reply to by एकलव्य

सहज 14/11/2009 - 17:47
९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते. +१

In reply to by एकलव्य

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही! एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच! अदिती

In reply to by एकलव्य

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही! एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by एकलव्य

विकास 15/11/2009 - 11:21
First they went for Moscow, and I did extend the support; ................. Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it. एकदम चपखल आणि आवडले. ९/११ नंतर ज्या देशांना दहशतवादांना सामोरे जावे लागले अशा देशांमधील अनेकांना कुठेतरी "आता अमेरिकेस कळेल" असेच मनोमन वाटले होते हे वाचताना/चर्चिताना लक्षात आले होते. ज्याच जळतं त्यालाच कळतं हे या अर्थीपण चपखल होते.

पॅपिलॉन 14/11/2009 - 19:23
http://www.misalpav.com/node/7448 फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

In reply to by विकास

पॅपिलॉन 16/11/2009 - 07:04
धन्यवाद. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

विकासजी. अगदी धनंजयांनी लिहिलेल्या लेखासारखाच मनाला भावतो पण या सर्व उदात्त गोष्टींचा संबंध सध्या सुरु असलेल्या गोष्टीशी लावावा का? अन लावला तर कसा..... सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की माझा संबंध मनसे शी नाही. त्या पक्षाचा अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी नाही. खर्‍या अर्थाने अपॉलिटिकल रहाण्याचा माझा प्रयत्न असतो. हिंसाचाराचे मी सरसकट समर्थन करत नाही. पण मला वाटते प्रत्येकवेळी हिंसाचार होतो तेव्हा त्याचा निषेध करण्याआधी तो का होतो याची मीमांसा करणे आवश्यक आहे. अन आत्ता माझा प्रयत्न सध्या जे वातावरण आहे ते का निर्माण झाले आहे त्याची थोडक्यात मीमांसा करण्याचाच आहे. मी विधानसभेतील शपथ प्रकरण आणि त्यापुर्वी नोकरभरती संदर्भात मनसेनं उपस्थित केलेल्या मुद्यांना पाठिबा देतो अन गेल्या आठवड्यात रस्त्यावर जी आंदोलनं झाली त्याबाबत धादांत खोटी, अतिरंजित दिशाभुल करणारी माहिती देऊन ती केवळ दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान इत्यादीच होती असे जे प्रयत्न केले गेले त्याचा निषेध करतो. (प्रत्यक्षात तेव्हा वस्तुस्तिथी काय होती हे मी याआधीच अन्यत्र प्रतिसादात लिहिले आहे. अन ते लिहीण्याचा संपुर्ण अधिकार मला आहे कारण त्या प्रकारात माझा जागरुक स्थानिक मतदार अन प्रामाणिक करदाता या नात्याने हक्कच आहे. किंबहुना ते माझे कर्तव्यच आहे. माझ्याकडे रेशनकार्ड गॅसकार्ड तर आहेच पण माझे नाव खडकवासला मतदार यादीतही आहे अन मी स्वतः मतदानही केलेले आहे. मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.) इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे. एक उपरी भाषा, ती राष्ट्रभाषा आहे असे भासवुन, घटनाबाह्य मार्गांनी लादली जात आहे अन तिला विरोध म्हणजे देशद्रोह असे वातावरण निर्माण केले जात आहे. राज्याच्या व्यवहारात हिंदी अथवा इंग्रजी भाषेचा वापर न होता स्थानिक भाषेचाच वापर व्हावा या मागणीत काहीच गैर अथवा अन्याय्य अथवा बेकायदा नाही. पण या सरळ साध्या मागणीला जवळपास चाळीस दशके विरोध होतोय अन त्याचे एकमेव कारण म्हणजे असे झाले तर हिंदीभाषिक व येथील काही प्रस्थापितांचे वर्चस्व संपेल हेच आहे. महाराष्ट्रामधे बहुसंख्य लोकांना हिंदी येते ती तोडकीमोडकी - बॉलीवुडचे सिनेमे बनवताना वापरतात ती. शासनव्यवहाराकरता वापरतात ती हिंदी ही नव्हे अन ती हिंदी एक टक्का मराठीभाषिकांनाही येत नाही हा माझा अनुभव आहे. जवळपास तसेव इंग्रजीबाबतही आहे. हे लक्षात घेतले तर राज्याशासनाचा सर्व कारभार मराठीतच व्हावा या मागणीत काहीच गैर नाही - किंबहुना तसे न होणे म्हणजे येथिल स्थानिक जनतेवर होणारा अन्याय आहे. विधीमंडळात, न्यायालयात, सरकारी कार्यालयात जे काम सुरु आहे त्याची पुर्ण माहिती स्थानिक जनतेला मिळणे हा तिचा हक्क आहे अन त्यासाठीच स्थानिक भाषा वापरणे अत्यावश्यक आहे. आजही न्यायालयांमधे बव्हंशी इंग्रजी भाषा वापरली जाते अन त्यामुळे बर्‍याचशा लोकांना न्यायालयात काय सुरु आहे हेच कळत नाही. सध्या विधीमंडळात जरी बव्हंशी मराठी वापरली जात असली तरी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची वाढती संख्या लक्षात घेता अन त्यांचा त्यांच्या भाषेबद्दलचा आग्रह लक्षात घेता सध्या जे सुरु आहे त्याला वेगळे परिमाण प्राप्त होते. थोडक्यात आता महाराष्ट्रातच मराठी जनतेला अभय मिळणे गरजेचे आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता मला वाटते की इथे प्रश्न मराठी माणसांची आक्रमकता नसुन त्यांच्यावर उपर्‍या भाषेकडुन अन ती बोलणार्‍यांकडुन होणारे आक्रमण, त्यांची अगतिकता असा आहे. अन अश्या अगतीक माणसाने अस्तित्वाच्या लढाईसाठी जर आक्रमक मार्ग स्वीकारला अन्यायाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढले तर त्यात काहीही गैर नाही, जरी महाराष्ट्रात गेली चाळिस वर्षे अखंडित जमावबंदीचे आदेश असले अन रस्त्यांवर कोणतेही आंदोलन करणे, अगदी पाच जणांनी एकत्र येणे गुन्हा असला तरीही. गेले काही दिवस इथं `प्रामाणिक करदाते', `स्वयंघोषित जागरुक नागरीक' अन तथाकथित `विचारवंत' जनतेनं केलेल्या आंदोलनांचा तारस्वरानं धिक्कार करीत आहेत. जनतेनं अश्या परिस्थितीत काय करणं अपेक्षित आहे याचा खुलासाही त्यांनी करावा ही विनंती. सध्या तरी पक्का राडेबाज अन कृतिशील अविचारवंत पुनेरी

In reply to by प्रसन्न केसकर

अवलिया 15/11/2009 - 18:52
अतिशय योग्य प्रतिसाद. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

In reply to by प्रसन्न केसकर

कौंतेय 15/11/2009 - 22:46
मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे
माफ करा, तुमचा आमदार केवळ मराठीचा मुद्दा लावुन धरला म्हणून निलंबीत झालेला नाही. सभागृहासारख्या ठीकाणी मारहाण केल्याने निलंबीत झाला आहे. एखाद्या मुरब्बी पत्रकारा सारखे तुम्ही इथे फॅक्ट ट्वीस्ट केलेली आहे. मराठीचा मुद्दा लावुन धरण्यास कुणीही बंदी घातलेली नाही. पण अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. तेव्हा केवळ मराठीचा मुद्दा लावून धरल्याने आमदार निलंबीत झाले असा प्रचार करू नका.
अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.)
महाराष्ट्रात पूर्वी कधी कोणत्या आमदाराने सभागृहात दुसर्‍या आमदाराला मारहाण केली आणि त्यावर ह्यापेक्षा कमी कडक शिक्षा झाली हे दाखवुन द्या.
इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे.
खरंच का? ज्यू लोकांचा जर्मनित झालेला अनन्वित छळ आणि मराठी माणूस ह्यांची अतिशयोक्ती म्हणूनही तुलना करणे तुम्हाला सूज्ञपणाचे वाटते का? - कौंतेय

In reply to by कौंतेय

करणे मला सुज्ञपणाची वाटते म्हणुनच मी ती केली आहे. तुम्हाला ती तशी वाटत नसेल तर तुमचे ते स्वातंत्र मी हिरावुन घेत नाही. अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. हो क्का? कुठले सभागृहाचे अन लोकशाहीचे पावित्र्य हो? आमदारांना वेगवेगळ्या पक्षांनी पळवुन नेऊन डांबले होते (२००२ मधे) तेव्हा, वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा, जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं. काय शिक्षा झाल्या होत्या हो तेव्हा? तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. म्हणुन त्यानं चप्पल दाखवायची, त्याच्या पोरानं सभागृहातच आमदारांना धमक्या द्यायच्या असंच ना? काय कारवाई केलीये हो त्यांच्यावर. का त्यानं आमच्यामुळं पावित्र भंगलेल्या सभागृहाची शुद्धी झाली? उगीचच फार माहिती असल्याचा आव आणुन कै च्या कै प्रतिपादन करु नका राव. ग्रो अप!

In reply to by प्रसन्न केसकर

विकास 19/11/2009 - 01:42
जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं. जांबुवतंरावांचे उदाहरण बरोबरच आहे. मला वाटते राजदंड वसंतदादांनी पळवला होता. नवलकरांनी सभागृहात रीव्हॉल्व्हर आणले तेंव्हा त्यात सभागृहाचे नियम तोडले का ते माहीत नाही तसेच त्यांचा उद्देश नियमभंद/अपमान करणे वगैरे नव्हता, तर सभागृहाची सुरक्षाव्यवस्था किती ढिली आहे हे दाखवण्याचा होता असे वाचल्याचे आठवते. वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा, या संदर्भात माझ्याच एका चर्चेचा दुवा देत आहे...

चतुरंग 15/11/2009 - 22:21
चांगला आहे. पण काही विचार अजिबातच पटले नाहीत उदा. आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे. कंदहारप्रकरणी सोडलेला अतिरेकी हा ९/११ च्या अतिरेक्यांना मदत करत राहीला... जगातला दहशतवाद बोकाळण्यास अमेरिकेइतका हातभार त्यांच्याही नकळत क्वचितच कुणी लावला असेल हे एक कटु सत्य आहे. 'एका तेलियाने' हे पुस्तक मी मध्यंतरी वाचले त्यात अमेरिकन राजकारण्यांनी ज्या पद्धतीने तातडीचे उपाय त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर काढायचा प्रयत्न केला त्यात सीआयए च्या इतर देशातल्या कारवाया असोत, दुसर्‍या देशात बंड घडवून सत्ता उलथवणे, दुसर्‍या देशांविरुद्ध दहशतवादी पोसणे, त्यांना शस्त्रे आणि पैसा पुरवणे आणि वेळ येताच त्यांचा काटा काढणे इ. सर्व उद्योग वर्षानुवर्षे केले, जगाच्या वेगवेगळ्या भागात युद्धे घडवून आणली अजूनही करताहेत. ह्या सगळ्यांचा दहशतवादाशी फार जवळचा संबंध आहे. त्यामानाने भारत दहशतवाद वाढायला कितपत कारणीभूत ठरला असेल ह्याची मला शंका वाटते! चतुरंग

हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत.
स्थानिक संस्कृतीस तुच्छ मानणे आणि नाझीवादाचा हा असा जोडलेला संबंध हास्यास्पद आहे. गुर्मी आणि माज ह्यात कसला असतो हो गुणात्मक भेद? कुणाला पैशाची मस्ती असते कुणाला सत्तेची कुणाला दोन्हीची तर कुणी जन्मजात मग्रुर असतो म्हणून हे सगळे काय हिटलर/नाझीवादासी जोडलेले असतात काय? हिटलर सारख्या नराधमांची पूजा करणे त्यांना उघडपणे हिरो मानणारे आजही आहेत. आणि ते इथले बुद्धीवादी आहेत की तथाकथीत राडेबाज हे तुम्हालाही चांगलेच माहित आहे. तेव्हा गुणात्मक संबंध कुठे लावायचा ते तुम्हीच ठरवा. एकिकडे हिटलरची प्रशंसा आणि दुसरीकडे बिका काकांनी लिहिलेल्या लेखावर नरसंहारावर आसवे ढाळणे ह्यात किती पराकोटीची विसंगती भरलेली आहे हे दिसून न येणे ह्याला काय म्हणावे विकास राव?

नंदन 14/11/2009 - 04:19
लेख.
ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी?
अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. त्यांचे बालपण ज्या फिलाडेल्फिया शहरात गेले, तिथे दुसर्‍या महायुद्धात पॅरिसचा पाडाव झाल्यावर झालेल्या जल्लोषाचे वर्णनही त्यांनी केले आहे. (पहिल्या महायुद्धातही जर्मन वंशाचे नागरिक अमेरिकेन लोकसंख्येच्या १/६ असल्याने अमेरिका युद्धात ल्युसिटानिया जहाज बुडेपर्यंत उतरली नाही असाही एक प्रवाद आहे.). अगदी न्यू यॉर्क टाईम्ससारख्या ज्यूंच्या मालकीच्या प्रकाशनसंस्थेनेही नाझींचे अन्याय पुरेशा प्रभावीपणे लोकांसमोर मांडले नाहीत असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे महत्त्व नजरेत भरावे.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.
-- सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विकास 15/11/2009 - 07:51
धन्यवाद... अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. चॉम्स्कीची पुस्तके वाचली आहेत आणि आवडतातही. त्याची मते कधी कधी टोकाची वाटू शकतात पण माहीतीपूर्ण असतात. तत्कालीन अमेरिकन ज्यू द्वेषाबद्दल मी देखील ऐकले आहे आणि खरे असूही शकेल. पळून आलेल्या ज्यूंचे एक जहाज पण त्यांनी परत बेकायदेशीर म्हणत काही विचार न करता पाठवल्याचे ऐकलेले आहे, पण वाचलेले नाही... त्यांच्या भांडणाची पाळेमुळे त्यांच्या पायातपाय असलेल्या धार्मिक इतिहासात आहेत असे वाटते. पण तो एक वेगळाच विषय आहे. :)

धनंजय 14/11/2009 - 05:08
स्मारकाची चांगली ओळख करून दिलेली आहे. मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे. किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. समाजातातील प्रत्येक मनुष्य विचारवंत असतो, आणि प्रत्येक मनुष्य कृतिशील असतो. "काही लोक कृतिशील नसतात" (खारीचा वाटा उचलत नाहीत, पण इतरांचे चुकल्याचे सांगतात) ही कल्पना दयाळू असली तरी उपेक्षामूलक आहे, असे मला वाटते. तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे. नीमलर यांचे वाक्य स्वतःचे परखड परीक्षण करणारे आहे - माणूस म्हणून, "विचारवंत" म्हणून नव्हे. पण ते अगदी अगदी प्रामाणिक आहे. त्यांचे आदले वर्तन ते म्हणतात तसे होते, त्यांचे वरील वाक्य केवळ काव्य नाही. साक्सेनहाउसेन येथील कॉन्संट्रेशन कँप म्यूझियममध्ये त्यांची आदली मते वाचायला मिळाली - पण पूर्ण तपशील आठवत नाही - नात्सी काळात हॉलंड किंवा डेनमार्कमध्ये त्यांनी भाषण दिले "तुम्ही लोक ही स्पष्ट गोष्ट समजून घेत नाहीत की ज्यू लोक हे हीन चारित्र्याचे आहेत, हा तुमचा दोष आहे. जर्मनीमध्ये हे सत्य आम्ही मान्य करतो..." वगैरे. असे कित्येक लोकांचे मत होते, आणि युद्धानंतरही ते बदलले नाही. युद्धाची शोकांतिका बघून नीमलर यांचे मत बदलले, आपली चूक कबूल करण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये होते, हे मला विशेष प्रशंसनीय वाटते.

In reply to by धनंजय

अडाणि 14/11/2009 - 06:35
लेख छान आहे पण त्यातील निश्कर्षाशी सहमत नाही. आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. विचारवंत (जे एसी केबीन मधे बसून लेख लिहितात) ते एक वेळ जेवले तर काही फरक पडत नाही, परंतू हा सर्व सल्ला पण लांबून दिलेलाच दिसतोय. जे कुणी परवाच्या पुण्यातील तोडफोडीचे समर्थन करत आहेत त्यातील एकालाही तोशीस झालेली दिसत नाही (निदान इथल्या कुठल्याही प्रतिक्रियेतून मला समजले नाही) मिपा वर येवून लांब लांब प्रतिसाद, लेख व कविता टंकून , "उंटा वरून शेळ्या हाकण्या पलीकडे" काय होतेय ?
स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते.
आपल्या कडे दोन्ही बाजूंनी हेच चालू नाहीये का? हिंसाचार आणि दहशीतीद्वारे चालू केलेले काम तुम्हाला तुमच्या संपुर्ण उद्दिष्टापर्यंत कधीच पोचवू शकत नाही, हा निष्कर्श हिटलरच्या उदाहरणावरून जास्त संयुक्तीक वाटतो. - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

कौंतेय 15/11/2009 - 02:40
सहमत आहे! लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. मूळात मनसेने मराठीच्या मुद्यावर स्थापना केलेलली असली तरी मराठीच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी कोणती विधायक कामे आजपर्यंत केली ह्याची यादी द्यावी. मराठी भाषा तिचा होत असलेला र्‍हास/विकास आणि परंप्रांतियांचे महाराष्ट्रात येणारे लोंढे आणि त्यामुळे वाढत असलेली गुंडगिरी ह्या दोन भिन्न मुद्यांची बेमालूम सरमिसळ मनसेने 'मराठी' ह्या लेबल खाली केलेली आहे आणि मराठी-अस्मितेच्या नावाखाली झुंडशाहीच्या मार्गाने आपला कार्यभाग साधून घेत आहे. उत्तरप्रदेशातुन आलेल्यांची गुंडगीरी कमी करणे ह्याचा मुंबईला फायदा निश्चितच आहे पण ह्यातून 'मराठी भाषेचा' काय फायदा होतो? मुंबईतील मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्ग/उच्च वर्ग हा मराठी-गुजराथी-सिंधी-पंजाबी-तमिळ अश्या विविध भाषिकांनी बनलेला आहे आणि त्यामुळे ही गुंडगिरी बंद झाल्याने त्या सर्वांचाच फायदा होतो आणि तसे होत असेल तर ते चांगलेच आहे, पण त्यातुन मराठी माणासाला 'एक्स्क्लुजीवली' असे काय मिळते? विधानसभेत झालेला गोंधळही मराठीच्या तरफदारीपेक्षा उत्तर प्रदेशीय अबूला धडा शिकवण्याच्या हेतुनेच घातलेला आहे. मराठी हाच जर मुद्दा होता तर मराठीतून शपथ न घेणार्‍या प्रत्येक आमदाराच्या शपथविधीला विरोध करायला हवा होता. पण तसे झाले नाही. अबू हा काय लायकीचा माणूस आहे सर्वांना माहित असले तरी तो जनतेने निवडून आणलेला आमदार आहे. त्याला सभागृहात मारहाण करणे हा निश्चितच सभागृहाचा अपमान आहे. (अबूला मारल्याचे दु:ख नाही पण हे चालवून घेतले तर उद्या कुणीही कुणालाही उठून झोडपू लागेल ज्यामुळे जनतेने निवडलेले प्रतिनिधी, विधानसभा ह्या गोष्टींना काहीच अर्थ राहणार नाही. आपला मुद्दा पटवून घेत नसतील तर समोरच्याला हाणा. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावेल) अशी घटना (कारण कोणतेही असो) पुन्हा सभागृहात घडणे हे (आधीच अशक्त असलेल्य) लोकशीहीला अतिशय मारक आहे आणि त्यामूळे प्रिवेंटीव्ह मेजर म्हणून जरब बसवण्यासाठी ह्या आमदारांना निलंबीत केले म्हणून रस्त्यावर येऊन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे हे तर कुठल्याच दृष्टिकोनातुन समर्थनीय नाही. सरकारचा निषेध नोंदवायची ही कुठली पद्धत? फोडलेल्या बसेस ह्याकाही कुणा आमदाराच्या मालकीच्या नव्हत्या. त्या जनतेच्या मालकीच्या होत्या. ह्याचा विसर कसा काय पडू शकतो? -कौंतेय

In reply to by धनंजय

विकास 15/11/2009 - 08:59
हा प्रतिसाद मी धनंजय, अडाणि आणि कौंतेय अशा सर्वांच्या प्रतिसादाला एकत्रीत देत आहे कारण त्यात काही समान मुद्दे आहेत. धनंजय म्हणतातः मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे. किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे....तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे. नीमलर यांचे वाक्य केवळ विचारवंतांस आहे असे माझे म्हणणे नव्हते आणि तसे मी म्हणले देखील नाही. ते वाक्य आठवायचे तात्कालीक कारण हे मूळ लेखात म्हणल्याप्रमाणे कलंत्रींचे लेखन आणि त्यात त्यांची दिसलेली प्रामाणिक चीड. मात्र अबू आझमी ह्यांच्या बद्दल आज जरी चीड आली असली तरी मराठीबद्दलचे तुच्छ भाव हे काही आझमींनीच आणलेले नाहीत, ते आधीपासून होतेच. पण त्यावर कधी आपण सामुहीकरीत्या इतरांचा, इतर भावनांचा/भाषांचा अपमान न करता, कधी स्पष्ट मुद्दा मांडला होता का? "तथाकथीत विचारवंत" म्हणजे "खोटे विचारवंत" नाही तर "अप्रामाणिक विचारवंत". जे काही तत्वज्ञान असेल ते निवडून (सिलेक्टीव्हली) वापरणे आणि म्हणून अप्रामाणिक अथवा भोंदूगिरी करणारे विचारवंत असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती विचार करते म्हणून स्वतःपुरती विचारी आहे असे म्हणता येईल पण याचा अर्थ ती विचारवंत असते असे नाही. विचारवंत म्हणजे जो समाजाला काही अंशी दिशा देतो असा. नीमलर ह्यांनी स्वत:च्या विचारातील खोट जाणून घेऊन ती मान्य करून जर वरील ओळी लिहील्या असल्या तर ते प्रामाणिक विचार्वंतच ठरतात. तुम्हाला विचारवंतात प्रामाणिक आणि तथाकथीत/अप्रामाणिक/खोटा विचारवंत असे उपप्रकार मान्य नसले तरी मी जेंव्हा टिका करतो तेंव्हा ती सरसकट सर्वच विचारवंतांवर, अगदी माझ्या विचारधारांच्या विरोधात असलेल्यांच्यावर नसते, जेंव्हा ते प्रामाणिक आणि स्वाध्यायी असतात तेंव्हा, इतकेच म्हणू इच्छितो. असो. आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. - अडाणी आणि लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. - कौंतेय सर्वप्रथम मी मनसेने केलेल्या दंग्याची अथवा इतर कधिही कुठल्याच हिंसेचे समर्थन केलेले नाही. (हे एक उ.दा.) मनसे आणि विधानसभेच्या संदर्भात देखील माझी मते त्यांच्या समर्थनार्थ नाहीत. त्यांना शिक्षा झाली तरी हरकत नाही. मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही. सर्वांना समान कायदा लागू व्हावा असे माझे मत आहे आणि प्रसिद्धीमाध्यमे आणि त्यातील विचारवंतांनी देखील एकास एक आणि एकास एक न्याय देताना विचार करायला हवा. म्हणूनच आधी मी हा धागा तयार केला होता. बसेसची मोडतोड पण याच प्रकारात मोडते. असे वर्तन अगदी पूर्ण अमान्य आणि तशी करणार्‍यांना योग्य शिक्षापण केली पाहीजे. पण त्याच बरोबर आपण या विषयावर बोलताना नकळत अतिरंजीत बोलत नाहीना, अफवांनाच वस्तुस्थिती समजत नाहीना, याचा पण विचार व्हावा असे वाटते. ४२च्या चळवळीत शेवटी गांधीजींनी पण "करा अथवा मरा" असे म्हणले कारण त्यांच्यापण सहनशक्तीचा एका अर्थी अंत झाला असे म्हणता येईल. तीच अवस्था फ्रेंच राज्यक्रांती आणि बोल्शेव्हिकांच्या संदर्भात म्हणता येईल...सामान्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला तर काय होते हे लोकलमधे पाकीटमार हातात आल्यावर जे काही सर्वच करतात त्यात जसे समजते तसेच विधानसभेतपण समजू शकते. जेंव्हा एकास एक आणि एकास एक असे न्याय देणे सातत्याने चालते, तेंव्हा सुरवातीस गुडीगुडी करत आपण मधे पडत नाही, पण त्याचे आपल्याला त्रास भोगावे लागतात...सर्व समाज भरडला जातो. कधी धर्माच्या नावाखाली तर कधी भाषेच्या तर कधी जातींच्या... माझा मुद्दा या संदर्भात आहे.

In reply to by विकास

अडाणि 15/11/2009 - 09:41
विकासजी, मि तुमचे इतर ठिकाणी लिहिलेले मत वाचले होते आणि तुम्ही 'भावनेच्या आहारी' न जाता मत प्रदर्शन करता म्हणूनच मि तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया दिली.
आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही.
हा भाग तुम्हाला निर्देशून नव्हता, ईतर प्रतिक्रिया आणि लेखातून चर्चेचा जो सूर दिसला त्या अनुशंगाने लिहिले होते. अवांतर - तुम्ही चालु केलेला दुसरा धागा ही मला पटला नव्हता, कारण ईतर ठीकाणी हाणामारी / गोंधळ होत असेल तरी तो आपला आदर्श असू नये. त्या लेखा वरील प्रतिक्रिये वरून तरी असे दिसले नाही. - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

चिरोटा 15/11/2009 - 11:17
मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही
सहमत.अबु आझमी मुजोर आहे हे मान्य.त्याने मराठीत शपथ घ्यायला काहीच हरकत नव्हती. आज Times ला त्याने मुलाखत दिली आहे."मी कुठलीही घटनाबाह्य कृती करत नसताना मला विरोध का?विधानसभा अध्यक्षांनी मला मराठीत शपथ घ्यायची सुचना केली असती तर हरकत नव्हती" असे म्हंटले आहे. राज ठाकरे ह्यांनी मराठीत शपथ घ्यायच्या वादात कर्नाटकात एका आमदाराला कन्नड येत नाही म्हणून वगळले हा संदर्भ दिला होता. इकडे दोन वृत्तपत्रांनी(Times of India आणि एक कन्नड वृत्तपत्र) अशी घटना कधीही न घडल्याचे सांगितले आहे.. भेंडी P = NP

Nile 14/11/2009 - 06:19
एका चांगल्या स्मारकाची सुरेख ओळख करुन दिल्याबद्दल विकास यांचे आभार.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते.
ह्या वाक्याशी सहमत आहे, आणि असे मी नुकतेच एका प्रतिसादात म्हणले ही आहे. पण याचा एक मोठा तोटा असा आहे की अश्याप्रकारे हिंसा करुन लक्ष खेचण्याचा प्रयत्न ही होउ शकतो आणि असे होत आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. (उदा. कुणा नेत्याच्या पुतळ्याची विटंबना इ.)
पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.
खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (सध्याचा कुठलाही वाद घ्या) आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. प्रामाणीक उदाहरण द्यायचं झालं तर अणुबॉम्ब, ग्लोबल वॉर्मींग इ. विषयांवरही नावजलेल्या शास्त्रज्ञ मंडळीमध्ये वाद होताच (आणि आहे). प्रत्येकाने आपले मुद्दे मांडण साहजिक आहे. पण हे करताना (पब्लीक फोरम्स वरती) प्रत्येकाने संयम बाळगणही महत्त्वाचं आहे. वास्तवीक धनंजय, मुक्तसुनीत, विकास आणि इतर अनेक मंडळी (काही लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर) 'स्वत:च काही जळत नसतानाही' अश्या वादात सहभागी होतात याचं मला आश्वर्य वाटतं आणि त्याच बरोबर कौतुकही. जनक्षोभाची पर्वा न करता आपलं मत परखडपणे मांडणं हे अश्या वेळेस मुग गिळुन गप्प बसण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ.

In reply to by Nile

विकास 15/11/2009 - 09:13
खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (असेच काहीसे सुनीलचे देखील मत आहे) यातील दुसर्‍या मुद्याशी सहमत आहे. पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते. म्हणजे आपण ज्या समाजाला नावे ठेवत आहोत त्यांच्या जडणघडणीत काही आपुलकीने वाटा उचलत आहोत का? पद्धती अनेक असू शकतात - स्थलकालसापेक्षही असतील पण त्यात काही तरी सकारात्मक असेल तरच मग नंतर तुम्ही सांगितलेल्या चुका ऐकायला समाज तयार राहणार. आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. बुद्धीवादी खरे ठरले नाहीत म्हणून ते तथाकथीत ठरत नाहीत तर ते जेंव्हा प्रामाणिक नसतात तेंव्हा ठरतात. तेच इतरत्र. म्हणजे (कोणाला उद्देशून नाही, असेच उदाहरण!) इतरांना "साधी रहाणी उच्च विचारसरणी" आचरायला सांगणार पण स्वत: सर्वसुखात लोळ्णार...

In reply to by विकास

Nile 17/11/2009 - 10:23
पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते
खरंय. ह्यावर आम्ही फक्त लिंकनचे वाक्य quote करतो: "He has a right to criticize, who has a heart to help." :)

अजय भागवत 14/11/2009 - 08:35
धनंजय आणि विकास ह्यांचे लेख आवडले. स्मारकं खऱ्या अर्थाने ज्या संदेशासाठी पुढील पिढीला "अनुभवता (सं’वेदना’)" यावीत म्हणून योजली जातात त्याचे उदाहरण म्हणून निश्चितच ह्या स्मारकांचा उल्लेख करता येईल. विकास ह्यांच्या "तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते...." ह्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत. मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. (पाणी उष्णतेवर ठेवताक्षणी जसे उकळत नाही, तसेच.) त्यामुळे प्रत्येक घटना ’तात्कालिक’ पारड्यात टाकू नये असे मला तरी वाटते. त्या घटनेच्या मुळ कारणांवर चर्चा होणे अधिक श्रेयस्कर असावी- जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर.

In reply to by अजय भागवत

विकास 15/11/2009 - 11:16
मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. .... जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर. थोडक्यात आणि योग्य प्रतिसाद. धब्यवाद!

सुनील 14/11/2009 - 15:28
चांगला लेख. तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते कालातीत सत्य. स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते अंशतः सहमत. वर Nile यांनी म्ह्टल्याप्रमाणे, "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवणे, हे खारीचा वाटा उचलण्यासारखेच आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 14/11/2009 - 15:57
लेख आवडला.. पटवून घ्यायचा पयत्न करतोय पण
हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे.
या वाक्यामुळे तो पूर्णत: पटला असे म्हणता येत नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे.
खरच अस आहे? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक 14/11/2009 - 16:48
हिंसा ही लक्षवेधी नक्कीच ठरते. पण आत्ताच्या माध्यमे बोकाळलेल्या काळात, त्या घटनेचे माध्यमांकडून प्रसारण कसे होते यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. माध्यमांचे संचालकत्व कोणाकडे आहे हेही महत्त्वाचे ठरते. सद्य परिस्थितीत तर 'भिंगातून जाळलेल्या कागदासारखे' फक्त हिंसेतल्या जाळावरच ते केंद्रिभूत होताना दिसते आहे.* त्यामुळे त्या हिंसेमागच्या मागण्यांमधली आर्तता त्या मागण्या ज्या केंद्रिय सत्तेसंदर्भात आहेत, तिथपर्यंत नीटपणे पोहेचत नाहीत. तिथे फक्त त्यातली हिंसाच दिसते. अशा वेळी या मागण्या त्या केंद्रिय सत्तेकडे पोहोचविण्यासाठी बुद्धिवादी गटाने सक्रिय भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. सध्या मराठीच्या बाबतीत असा एक गट अशी भूमिका पार पाडत असल्याचे ऐकिवात आहे. पण पुन्हा ते सक्रिय राजकारणात नसल्याने त्यांच्या प्रयत्नांवर आणि विस्तारावरही मर्यादा पडतात, असे दिसते. ( ग्रंथालीच्या रूची अंकात यासंदर्भात नेहमी माहिती येत असते.) मनसेसारख्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालेल्या पक्षाने आता कायदे मंडळात हे काम प्रभावीपणे पार पाडणे अपेक्षित आहे. तिथे अबू आझमीला मारल्याने त्यातली हिंसाच पुढे आली, मराठीचा आग्रह का यामागची भावना कुठेच आली नाही. त्यामुळे लोकशाहीला कलंकापासून अनेक शेलक्या विशेषणांना सामोरे जावे लागले. * इथल्या हिंदीभाषक वृत्तपत्रात राज ठाकरेंचे एकूण आंदोलन आणि त्या सगळ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन भयानक आहे. याविषयावर मी या आधीही लिहिले आहे, पण ताज्या प्रकरणाच्या अनुषंगाने मागील घटनांचीच वृत्तपत्रांमध्ये जास्त तीव्रतेने उजळणी झाल्याचेच दिसले. अबू आझमी हा थर्डक्लास माणूस आहे, पण त्याला मारल्यानंतरही 'हिंदीपर हमला', पासून काय काय हेडिंग होती ते पाहून संताप येत होता. या प्रश्नातून महाराष्ट्रात जनमत मराठीच्या बाजूने तयार होत असले तरीही दिल्लीदरबारी ज्यांची तड लागू शकतील असे मराठीच्या संदर्भातील प्रश्न मात्र जाणीवपूर्वक बाजूला सारले जातात ते केवळ आंदोलनात असलेल्या हिंसेमुळे. निर्णयाचे अधिकार हाती असलेले दिल्लीश्वर या आंदोलनामागे फक्त मनसे आहे अशी समजूत करून घेऊन वाहिन्या, वृत्तपत्रे जे काही सांगतात त्या वृत्तावर, विश्लेषणावर विश्वास ठेवून काहीही करत नाहीत. मुंबईत परप्रांतीयांना राज ठाकरेंचा विरोध एवढेच आणि त्यासाठी होणारी हिंसा एवढेच दाखविले जाते. विरोध का त्याची तार्किक कारणमीमांसा केली जात नाही. त्याची कारण निर्णय घेणार्‍या जमातीपर्यंत पोहोचत नाहीत. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 14/11/2009 - 17:40
पर्ल हार्बर च्या घटनेनंतर चर्चिल असे काहीसे म्हटल्याचे स्मरते (चूभूद्याघ्या) - आता अमेरिका युद्धात उतरण्याची निश्चिंती झाली, दोस्तराष्ट्रांचे बळ वाढले. ९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते. First they went for Moscow, and I did extend the support; Then they continued to blast Kashmir, and I preferred to talk about human rights; Then they blasted Delhi, Mumbai and Hyderabad, and I did not blink an eye; When they came for New York, and only since then I have got a bit crazy; Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it.

In reply to by एकलव्य

सहज 14/11/2009 - 17:47
९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते. +१

In reply to by एकलव्य

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही! एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच! अदिती

In reply to by एकलव्य

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही! एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by एकलव्य

विकास 15/11/2009 - 11:21
First they went for Moscow, and I did extend the support; ................. Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it. एकदम चपखल आणि आवडले. ९/११ नंतर ज्या देशांना दहशतवादांना सामोरे जावे लागले अशा देशांमधील अनेकांना कुठेतरी "आता अमेरिकेस कळेल" असेच मनोमन वाटले होते हे वाचताना/चर्चिताना लक्षात आले होते. ज्याच जळतं त्यालाच कळतं हे या अर्थीपण चपखल होते.

पॅपिलॉन 14/11/2009 - 19:23
http://www.misalpav.com/node/7448 फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

In reply to by विकास

पॅपिलॉन 16/11/2009 - 07:04
धन्यवाद. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

विकासजी. अगदी धनंजयांनी लिहिलेल्या लेखासारखाच मनाला भावतो पण या सर्व उदात्त गोष्टींचा संबंध सध्या सुरु असलेल्या गोष्टीशी लावावा का? अन लावला तर कसा..... सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की माझा संबंध मनसे शी नाही. त्या पक्षाचा अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी नाही. खर्‍या अर्थाने अपॉलिटिकल रहाण्याचा माझा प्रयत्न असतो. हिंसाचाराचे मी सरसकट समर्थन करत नाही. पण मला वाटते प्रत्येकवेळी हिंसाचार होतो तेव्हा त्याचा निषेध करण्याआधी तो का होतो याची मीमांसा करणे आवश्यक आहे. अन आत्ता माझा प्रयत्न सध्या जे वातावरण आहे ते का निर्माण झाले आहे त्याची थोडक्यात मीमांसा करण्याचाच आहे. मी विधानसभेतील शपथ प्रकरण आणि त्यापुर्वी नोकरभरती संदर्भात मनसेनं उपस्थित केलेल्या मुद्यांना पाठिबा देतो अन गेल्या आठवड्यात रस्त्यावर जी आंदोलनं झाली त्याबाबत धादांत खोटी, अतिरंजित दिशाभुल करणारी माहिती देऊन ती केवळ दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान इत्यादीच होती असे जे प्रयत्न केले गेले त्याचा निषेध करतो. (प्रत्यक्षात तेव्हा वस्तुस्तिथी काय होती हे मी याआधीच अन्यत्र प्रतिसादात लिहिले आहे. अन ते लिहीण्याचा संपुर्ण अधिकार मला आहे कारण त्या प्रकारात माझा जागरुक स्थानिक मतदार अन प्रामाणिक करदाता या नात्याने हक्कच आहे. किंबहुना ते माझे कर्तव्यच आहे. माझ्याकडे रेशनकार्ड गॅसकार्ड तर आहेच पण माझे नाव खडकवासला मतदार यादीतही आहे अन मी स्वतः मतदानही केलेले आहे. मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.) इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे. एक उपरी भाषा, ती राष्ट्रभाषा आहे असे भासवुन, घटनाबाह्य मार्गांनी लादली जात आहे अन तिला विरोध म्हणजे देशद्रोह असे वातावरण निर्माण केले जात आहे. राज्याच्या व्यवहारात हिंदी अथवा इंग्रजी भाषेचा वापर न होता स्थानिक भाषेचाच वापर व्हावा या मागणीत काहीच गैर अथवा अन्याय्य अथवा बेकायदा नाही. पण या सरळ साध्या मागणीला जवळपास चाळीस दशके विरोध होतोय अन त्याचे एकमेव कारण म्हणजे असे झाले तर हिंदीभाषिक व येथील काही प्रस्थापितांचे वर्चस्व संपेल हेच आहे. महाराष्ट्रामधे बहुसंख्य लोकांना हिंदी येते ती तोडकीमोडकी - बॉलीवुडचे सिनेमे बनवताना वापरतात ती. शासनव्यवहाराकरता वापरतात ती हिंदी ही नव्हे अन ती हिंदी एक टक्का मराठीभाषिकांनाही येत नाही हा माझा अनुभव आहे. जवळपास तसेव इंग्रजीबाबतही आहे. हे लक्षात घेतले तर राज्याशासनाचा सर्व कारभार मराठीतच व्हावा या मागणीत काहीच गैर नाही - किंबहुना तसे न होणे म्हणजे येथिल स्थानिक जनतेवर होणारा अन्याय आहे. विधीमंडळात, न्यायालयात, सरकारी कार्यालयात जे काम सुरु आहे त्याची पुर्ण माहिती स्थानिक जनतेला मिळणे हा तिचा हक्क आहे अन त्यासाठीच स्थानिक भाषा वापरणे अत्यावश्यक आहे. आजही न्यायालयांमधे बव्हंशी इंग्रजी भाषा वापरली जाते अन त्यामुळे बर्‍याचशा लोकांना न्यायालयात काय सुरु आहे हेच कळत नाही. सध्या विधीमंडळात जरी बव्हंशी मराठी वापरली जात असली तरी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची वाढती संख्या लक्षात घेता अन त्यांचा त्यांच्या भाषेबद्दलचा आग्रह लक्षात घेता सध्या जे सुरु आहे त्याला वेगळे परिमाण प्राप्त होते. थोडक्यात आता महाराष्ट्रातच मराठी जनतेला अभय मिळणे गरजेचे आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता मला वाटते की इथे प्रश्न मराठी माणसांची आक्रमकता नसुन त्यांच्यावर उपर्‍या भाषेकडुन अन ती बोलणार्‍यांकडुन होणारे आक्रमण, त्यांची अगतिकता असा आहे. अन अश्या अगतीक माणसाने अस्तित्वाच्या लढाईसाठी जर आक्रमक मार्ग स्वीकारला अन्यायाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढले तर त्यात काहीही गैर नाही, जरी महाराष्ट्रात गेली चाळिस वर्षे अखंडित जमावबंदीचे आदेश असले अन रस्त्यांवर कोणतेही आंदोलन करणे, अगदी पाच जणांनी एकत्र येणे गुन्हा असला तरीही. गेले काही दिवस इथं `प्रामाणिक करदाते', `स्वयंघोषित जागरुक नागरीक' अन तथाकथित `विचारवंत' जनतेनं केलेल्या आंदोलनांचा तारस्वरानं धिक्कार करीत आहेत. जनतेनं अश्या परिस्थितीत काय करणं अपेक्षित आहे याचा खुलासाही त्यांनी करावा ही विनंती. सध्या तरी पक्का राडेबाज अन कृतिशील अविचारवंत पुनेरी

In reply to by प्रसन्न केसकर

अवलिया 15/11/2009 - 18:52
अतिशय योग्य प्रतिसाद. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

In reply to by प्रसन्न केसकर

कौंतेय 15/11/2009 - 22:46
मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे
माफ करा, तुमचा आमदार केवळ मराठीचा मुद्दा लावुन धरला म्हणून निलंबीत झालेला नाही. सभागृहासारख्या ठीकाणी मारहाण केल्याने निलंबीत झाला आहे. एखाद्या मुरब्बी पत्रकारा सारखे तुम्ही इथे फॅक्ट ट्वीस्ट केलेली आहे. मराठीचा मुद्दा लावुन धरण्यास कुणीही बंदी घातलेली नाही. पण अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. तेव्हा केवळ मराठीचा मुद्दा लावून धरल्याने आमदार निलंबीत झाले असा प्रचार करू नका.
अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.)
महाराष्ट्रात पूर्वी कधी कोणत्या आमदाराने सभागृहात दुसर्‍या आमदाराला मारहाण केली आणि त्यावर ह्यापेक्षा कमी कडक शिक्षा झाली हे दाखवुन द्या.
इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे.
खरंच का? ज्यू लोकांचा जर्मनित झालेला अनन्वित छळ आणि मराठी माणूस ह्यांची अतिशयोक्ती म्हणूनही तुलना करणे तुम्हाला सूज्ञपणाचे वाटते का? - कौंतेय

In reply to by कौंतेय

करणे मला सुज्ञपणाची वाटते म्हणुनच मी ती केली आहे. तुम्हाला ती तशी वाटत नसेल तर तुमचे ते स्वातंत्र मी हिरावुन घेत नाही. अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. हो क्का? कुठले सभागृहाचे अन लोकशाहीचे पावित्र्य हो? आमदारांना वेगवेगळ्या पक्षांनी पळवुन नेऊन डांबले होते (२००२ मधे) तेव्हा, वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा, जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं. काय शिक्षा झाल्या होत्या हो तेव्हा? तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. म्हणुन त्यानं चप्पल दाखवायची, त्याच्या पोरानं सभागृहातच आमदारांना धमक्या द्यायच्या असंच ना? काय कारवाई केलीये हो त्यांच्यावर. का त्यानं आमच्यामुळं पावित्र भंगलेल्या सभागृहाची शुद्धी झाली? उगीचच फार माहिती असल्याचा आव आणुन कै च्या कै प्रतिपादन करु नका राव. ग्रो अप!

In reply to by प्रसन्न केसकर

विकास 19/11/2009 - 01:42
जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं. जांबुवतंरावांचे उदाहरण बरोबरच आहे. मला वाटते राजदंड वसंतदादांनी पळवला होता. नवलकरांनी सभागृहात रीव्हॉल्व्हर आणले तेंव्हा त्यात सभागृहाचे नियम तोडले का ते माहीत नाही तसेच त्यांचा उद्देश नियमभंद/अपमान करणे वगैरे नव्हता, तर सभागृहाची सुरक्षाव्यवस्था किती ढिली आहे हे दाखवण्याचा होता असे वाचल्याचे आठवते. वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा, या संदर्भात माझ्याच एका चर्चेचा दुवा देत आहे...

चतुरंग 15/11/2009 - 22:21
चांगला आहे. पण काही विचार अजिबातच पटले नाहीत उदा. आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे. कंदहारप्रकरणी सोडलेला अतिरेकी हा ९/११ च्या अतिरेक्यांना मदत करत राहीला... जगातला दहशतवाद बोकाळण्यास अमेरिकेइतका हातभार त्यांच्याही नकळत क्वचितच कुणी लावला असेल हे एक कटु सत्य आहे. 'एका तेलियाने' हे पुस्तक मी मध्यंतरी वाचले त्यात अमेरिकन राजकारण्यांनी ज्या पद्धतीने तातडीचे उपाय त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर काढायचा प्रयत्न केला त्यात सीआयए च्या इतर देशातल्या कारवाया असोत, दुसर्‍या देशात बंड घडवून सत्ता उलथवणे, दुसर्‍या देशांविरुद्ध दहशतवादी पोसणे, त्यांना शस्त्रे आणि पैसा पुरवणे आणि वेळ येताच त्यांचा काटा काढणे इ. सर्व उद्योग वर्षानुवर्षे केले, जगाच्या वेगवेगळ्या भागात युद्धे घडवून आणली अजूनही करताहेत. ह्या सगळ्यांचा दहशतवादाशी फार जवळचा संबंध आहे. त्यामानाने भारत दहशतवाद वाढायला कितपत कारणीभूत ठरला असेल ह्याची मला शंका वाटते! चतुरंग
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.

उचललेस तू मीठ मुठभर

भोचक ·

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
अगदी अगदी ! ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! ©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by विनायक प्रभू

भोचक 13/11/2009 - 18:48
खलिल जिब्रानविषयी वाचत होतो नि त्याचे एक वचन सापडले. निश्चितपणे मिठात एक पावित्र्य आहे, कारण त्याचे अस्तित्व अश्रूतही आहे नि समुद्रातही ! -खलिल जिब्रान (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 12/11/2009 - 22:30
साधारण ३महिन्यांपूर्वी मी दांडीयात्रेच्या दरम्यान त्याकाळी विविध पत्रकारांनी केलेले लिखाण वाचले आणि एका केवढ्या मोठ्या रोमांचकारी (आणि शिकविणार्‍याही) इतिहासाकडे वरवर पाहिले होते याची जाणीव झाली. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही? नक्कीच! एकलव्य

In reply to by प्रशान्त पुरकर

घाबरू नका. माझा हृदय परीवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. उदाहरणार्थः ते कलंत्रीकाका बघा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

श्री भोचक, एका चांगल्या लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. देशाला स्वातंत्र्य कशामुळे मिळाले यावर विचार होत राहतील पण गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग त्यानंतर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनीही यशस्वीपणे अवलंबिला यावरून या आंदोलनाची परिणामकारकता लक्षात यावी.

कलंत्री 12/11/2009 - 21:22
या सत्यग्रहाचे वेगळेच असे अंग आहे. गांधींनी महिलाना स्वातंत्र्य लढयात भाग घ्यायला नेहमीच उद्यूक्त केले, पण या आंदोलनासाठी त्यांनी मात्र स्त्रींयाना दुरच ठेवले. तेंव्हा सरोजिनी नायडूंनी असा पवित्रा घेतला की तुम्ही यात भाग घेण्यासाठी जर आम्हाला परवानंगी दिली नाही तर प्रथम तुमच्याविरुद्ध आमचा सत्याग्रह सुरु होईल आणि शेवटी त्यांना परवानंगी मिळाली.

jaypal 12/11/2009 - 21:36
प.रा. जी "कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!" ज्ञानदेवा रचीला पाया तुका झालासी कळस. (म्हणुन केवळ तुका स्रेष्ठ ठरत नाही की निव्वळ ज्ञानदेव) सर्वच महान होते. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास 12/11/2009 - 22:52
अंबरीश मिश्रांचे "गंगेमधे गगन निवळले" अशा काहीशा नावाचे एक गांधीजींवर चांगले पुस्तक आहे, त्यात हे सर्व तसेच एकंदरीतच गांधीजींचे भारतातील राजकीय जीवन हे "श्रद्धावंता"च्या नजरेतून उर्धृत केलेले आहे. त्यातील एकंदरीत सूर (अथवा पुस्तकाचे/लेखकाचे अनुमान) असे आहे की गांधीजींनी काँग्रेसला आवडो - नआवडो स्वतःच्या विचारांतून चळवळ चालू केली. त्याला येणारी समाजमान्यता लक्षात घेता काँग्रेसला त्यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. बाकी वर पराने म्हणल्याशी काही अंशी सहमत. तरी देखील "दे दी हमे आझादी बीना..." पेक्षा गदीमांचे "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" थोडे अतिशयोक्तीपर असले तरी मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही. ------------------------------------------- बाकी टिळकांच्या दिशेने चालू झालेली स्वदेशी जीचा वापर सावरकरांनी विद्यार्थी दशेत केला ज्याचा परीणाम पण विसरता कामा नये. टिळक पर्भृतींनी चालू केलेल्या फर्ग्यूसन मधून त्यामुळे सावरकरांना निलंबीत व्हावे लागले, ते केले कोणी तर रँग्लर परांजप्यांनी! असो. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की त्यातूनच पुढे गांधीजींच्या खादीस स्वदेशी म्हणून मान्यता मिळवणे सोपे झाले. स्वदेशीच्या माध्यमातून टिळकांनी चालू केलेली चळवळ हे केवळ ज्यांना जमू शकेल अशांच्याच हातातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनही राहीले नाही आणि त्यात असलेली गर्भित/प्रकट आर्थिक नाकेबंदी हा ब्रिटीशांच्या धंदेवाईक वृत्तीस आणि पर्यायाने साम्राज्यास दिलेले पहीले उत्तर होते. टिळकांना यामुळे स्वातंत्र्य तात्काळ मिळेल असे वाटले नव्हते, किंबहूना स्वतःच्या जिवंतपणी स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना कधीच वाटत नव्हते. ते फक्त स्वातंत्र्यचळवळीसाठी पुढील सर्व सामाजीक पिढीस तयार करायचा त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. (त्यांच्या भाषेत ते फक्त चळवळीचा श्रीगणेशा करत होते). या स्वदेशीचाच पुढचा भाग, मीठ सत्याग्रह होता. पैशावरून पुन्हा एकदा नाकेबंदी करून, गांधीजींनी योग्य अशीच आर्थिक कारणावरून दांडी यात्रेत नाकेबंदी घडवून आणली...१९२० सालला म्हणूनच टिळकयुगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात असे म्हणले जाते. आर्थिक कारणांप्रमाणेच, १९४६ साली प्रत्यक्षात झालेले नावीक दलाचे बंड जे आता कधीपण होऊ शकेल अशी भिती ब्रिटीशांमधे उत्पन्न झाली ते म्हणजे मुख्य सावरकर आणि तसेच त्या विचारांच्या इतर नेतृत्वाचा असलेला सैनिकीकरणास पाठींबा हे पण कारण होते. असे सर्व म्हणण्यात गांधीजींचे महत्व आणि नेतॄत्व गूण कमी होत नाहीत पण त्यावर दाखवली जाणारी एकांगी श्रद्धामात्र रहात नाही आणि योग्य त्या ठिकाणी आदर आणि "क्रेडीट" पण दाखवले जाते.

In reply to by विकास

मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.
असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.>>> प्रत्येक गोष्टीतुन स्वतःला सोयिस्कर तो अर्थ काढणे कुणी तुमच्याकडुन शिकावे. असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. >>> बापुंचे ठिक आहे, पण मग "दे दी हमे आझादी....." सारखी गाणी काय दर्शवतात? गांधीजींना कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. त्यांचं महत्व शिरसावंद्यच आहे, पण गांधीजींचा महिमा गाताना इतरांच्या देशभक्तीकडे, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होवू नये एवढीच अपेक्षा. भगतसिंग प्रभुतींचे प्राणार्पण, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या हाल अपेष्टा, सुभाषबाबूंनी केलेले महत्प्रयास, टिळक, चाफेकरादी देशभक्तांचे कार्य, बंगालमधील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी अर्पण केलेले प्राण हे सगळे व्यर्थ आहे का? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधीजींचे नाव ऐकताच त्यांना झोंबलेल्या मिरच्या पाहून तुम्हाला मीरच्या झोंबल्या हे पाहून मौज वाटली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by विकास

भोचक 13/11/2009 - 11:29
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकासजी, अंबरिश मिश्र यांचे जे पुस्तक आहे, ते 'गंगेत गगन वितळले' या नावाचे आहे. त्यात गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला. त्यांनी काय काय 'प्रयोग' केले ते त्यात दिले आहेत. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते. बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे. थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले. मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले. पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे. दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! ) या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

चिरोटा 13/11/2009 - 12:18
आईनस्टाईनने एका पत्रात म्हंटले आहे- Mahatma Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion.We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come. गांधी हत्येनंतर आईन्स्टाईन यानी म्हंटले होते- Generations to come, it may be, will scarce believe that such a one as this, ever in flesh and blood walked upon this earth. भेंडी P = NP

In reply to by गणपा

प्रतिसाद भयंकर आवडला... माझ्याच मनातलं बोललात.... त्यांच्या सर्व चुकाबिका आणि राजकारण मान्य करूनही प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतेच...

In reply to by भोचक

यशोधरा 13/11/2009 - 13:24
भोचक, आपला लेख उत्तम आहे, तसाच, तुम्ही लिहिलेला प्रतिसादही. फक्त, "पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले.. " ह्या ऐवजी, ज्यांनी गांधींची तत्वे मान्य केली, त्यांना बरोबर घेतले, असे वाटते. नाहीतर सुभाषबाबू, स्वा. सावरकर यासारख्या व्यक्तींना जर का आपल्या लोकप्रियतेचा फायदा जर त्यांनी करुन दिला असता, तर कदाचित आज भारताचे चित्र वेगळे असू शकले असते...

In reply to by भोचक

विकास 13/11/2009 - 20:41
भोचकराव, पुस्तकाचे नाव दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम कुठल्याही ऐतिहासीक नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे, त्याचे विचार पटोत अथवा न पटोत. विचार करा नुसत्या एका संकेतस्थळावर स्वतःचे विचार इतरांपर्यंत पोचवायला अवघड जाते, पटवणे तर फारच लांब! तिथे स्वतःच्या बाजूने लोकांना वळवून समाजमन बदलण्याची ताकद असते आणि ती देखील स्वतःच्यापश्चात टिकते तिथे तुम्ही-आम्ही कोण! :) थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, ...ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. प्रामाणिकपणे, माझ्या नजरेतील, वरील सर्व मान्य असूनही यातील कुठल्याही गोष्टींमुळे गांधीजींबद्दलचा आदर कमी होत नाही फक्त तो डोळस राहतो. केवळ निष्क्रीय माणूसच बिनचूक असू शकतो असे वाटते... वास्तवीक पहाता हे माझेच नाही तर इतर अनेकांचे, जे स्वतःला गांधी-विरोधक समजतात, त्यांचे त्यांच्या नकळत असेच म्हणणे असू शकते असे वाटते. थोडक्यात गांधीजींना होणारा विरोध हा त्या व्यक्तीपेक्षा गांधीवादाला आहे, ज्यात स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणणार्‍यांनी निव्वळ ढोंगबाजी आणि स्वाध्यायशून्यता आणत जनसामान्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कधी कधी वाटते की स्वातंत्र्योत्तर नेहरूंनंतर जर शास्त्री अधिक काळासाठी पंतप्रधान म्हणून राहून देशास नेतृत्व देऊ शकले असते तर कदाचीत गांधीजींची इतकी टवाळी झाली नसती....अर्थात तीच अवस्था हिंदूत्ववाद्यांची आणि तशाच इतर चांगल्या विचारधारांची आहे. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. या बाबतीतपण माझे त्याच पद्धतीत म्हणणे मात्र उलट स्वरूपातही आहे. म्हणजे, गांधीवादाला उदात्त करण्यासाठी सावरकर आणि हिंदूत्ववादास झोडपले जाते. बरं गांधीवादाचा वापर तरी समाज घडवायला झाला आहे का? तर तसेही दिसत नाही तो निव्वळ त्याची समाजमनासाठी अफूची गोळी करून स्वतःच्या स्वार्थाचे घोडे पुढे दामटवायला झाला आहे. आपल्या वरील लेखात देखील (आपण, अथवा अंबरीश मिश्रांनी) जरी नेताजी, सावरकर, भगतसिंग आदींना नावे ठेवली नसली तरी त्यांचा उल्लेख करत नकळत गांधीजींची थोरवी वाढवायचा प्रयत्न झाला आहे आणि लगेच शेवट येतो की, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता. मला खात्री आहे की आपण हे मुद्दामून केले नाहीत, पण ती आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला-समाजाला) सवयच लागलेली आहे. इथे सर्व खटकते आणि म्हणूनच पुढचे उत्तर हे गांधेतर नेत्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर मूळ लेखातील खटकलेली बाब आणि त्यातील अर्धाच दिसणारा इतिहास पूर्ण दाखवण्यासाठी देणे भाग पडते. जर लेखात गांधीजीच असते तर माझ्या उत्तरातही केवळ गांधीजीच दिसले असते. कृपया यातील काही व्यक्तिगत नाही अथवा मूळ लेखावर वरचा मुद्दा सोडल्यास टिका अथवा आक्षेपही नाही ह्याची खात्री असावी. धन्यवाद

In reply to by विकास

भोचक 14/11/2009 - 11:43
"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.
विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

फारएन्ड 13/11/2009 - 06:06
चांगला लेख आहे. आवडला. त्या 'उचललेस तू..' या ओळी कोठेतरी वाचल्यासारख्या वाटतात. कदाचित शाळेच्या पुस्तकात. त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?

In reply to by फारएन्ड

विकास 13/11/2009 - 08:51
त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे? मला वाटते ती कविता वगैरे नाही आहे, केवळ त्या एका घटनेवरून सुचलेल्या त्या ओळी आहेत. त्या पाठ्यपुस्तकात आपल्याला होत्या.

सुनील 13/11/2009 - 10:22
ह्या ऐतिहासिक घटनेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हर्षद आनंदी 13/11/2009 - 12:33
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती? देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!! अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!! जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्‍या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम! कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते. गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता "it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे. वा काय महात्मा आहे?

हर्शल यान्च्याशी सहमत्....कदाचित दुसर्‍या महायुधात एन्ग्रजान्चे कम्बरडे मोडले नसते तर त्यनि अपल्याला एवढे सहजासहजि स्वन्त्रत्र केले नसते....फक्त गन्धिन्मुळे मि़ळाले हे खरच पट्त नाहि...

ऋषिकेश 13/11/2009 - 13:46
लेख उत्तम आहे.. खूप आवडला काहि प्रतिसादांमधे अपेक्षेप्रमाणे (प्रथेप्रमाणे) काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटली :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

In reply to by ऋषिकेश

काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटल>>> गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ. कारण गांधीजींना त्यांच्या चुका उघडपणे दाखवुन देणारे आणि गांधीजींमुळेच भारतीय राजकारणातुन वाळीत टाकले गेलेले असे हे महापुरुष आहेत सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

ऋषिकेश 13/11/2009 - 18:19
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ.
हे माझ्यासाठी नवीन आहे. असो. माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

भोचकभाऊ, लेख आणि प्रतिसाद तुमच्या किर्तीला जागणारे, माहीतीपूर्ण आणि अभ्यासू! मी गांधींचं, त्यांच्याबद्दल साहित्य वाचलं तर त्याचा दोष तुम्हालाही! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भोचक 13/11/2009 - 15:47
अदिती , या दोषाचा धनी व्हायला नक्की आवडेल. समंजसरावांचा प्रतिसादही त्यांच्या नावाला साजेसा. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

समंजस 13/11/2009 - 15:17
गांधींजींना आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागे जाउन, मिठ सत्याग्रह यशस्वी केल्या बद्दल गांधींजी आणि त्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. ती एक मोठी आणि फार महत्त्वाची घटना होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात करोडो लोकांचा सहभाग होता. जेव्हढ्यांनी नेत्रुत्व केले, ते सर्वच महान होते. त्या सर्वच लोकांनी आपले वैयक्तीक आयुष्य ह्या कार्यात घालवलं (आजचे करोडपती नेते सत्ते करता भांडताना बघून वाटतं की बरं झालं, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांना भविष्य माहित नव्हतं) सर्वांचा मार्ग एकच नव्हता, मात्र उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळवीणे. आणि तेच जास्त महत्वाचे होते. गांधीजींचे सर्वच विचार हे पटो ना पटो, त्यांचे स्वातंत्र्य चळवळतील योगदान महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य चळवळ ही क्रिकेट च्या सामन्या सारखी नव्हती की, त्यात कोणाचे योगदान किती हे मोजता येईल किंवा कोण सामनावीर हे ठरवता येईल तसेच लढाईत कोण मृत्युमुखी पडला, कोण वाचला या वरून, शुरपणा ठरत नसतो तर जिंकलो की हरलो हे महत्त्वाचे (व्यक्तीगत मत) करोडो लोकांना जागे करणे, घराबाहेर काढणे, मागे यायला लावणे, प्रंसगी लाठ्या खायला लावणे(ते सुद्धा भारता सारख्या देशात जिथे कृतीशून्य, संवेदना बोथट झालेल्या, आपला स्वार्थ आधी बघण्यार्‍या लोकांचा भरणा जास्त आहे) त्यांना विश्वास देणे की स्वातंत्र्य हे मिळणारच. ही माझ्या दृष्टीने एक अशक्यप्राय गोष्ट जी गांधीजींनी प्रत्यक्ष केली. त्यांच्या ह्या नेत्रुत्व गुणाला माझा सलाम (ह्याच बाबतीत मनावर प्रभाव टाकणारा दुसरा नेता म्हणजे हिटलर. त्याचे एकूण कार्य मला न पटो, पण त्याच्या ह्या लोकांना प्रभावीत करण्यार्‍या गुणा मुळे तरी मी त्याला सलाम करतो.)

सुवर्णा 13/11/2009 - 16:07
गांधीजीकडे असलेले नेतॄत्वगुण आणि त्यांना मिळालेला भारतीय जनतेचा पाठिंबा हे खरेच कौतुकास्पद आहे, आणि त्यांनी अध्यात्म, भारतीय संस्कॄती-परंपरा वगैरे यांचा केलेला अभ्यास हेसुध्दा.. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांना त्यांच्यातल्या षडरिपूंवर त्यांना पूर्णपणे मात नाही करता आली आणि इथेच त्यांच्यातला महात्मा हरला.. असो.. शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

टारझन 13/11/2009 - 16:16
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =)) आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !! (आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)

In reply to by टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवरा रे ह्याला !! टार्‍या लेका तु आजकाल अनआवरेबल झाला आहेस बघ. तुझा रतिसाद... आपल प्रतिसाद वाचुन गलित गात्र झालो एकदम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

सुवर्णा 13/11/2009 - 16:55
मी तर फक्त तुलना केली होती.. तुमचा प्रतिसाद बघितला.. आता काय बोलनार!! =)) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

टारझन 13/11/2009 - 16:10
भोचक आणि प्रतिसादकर्ते (खासकरून पर्‍या आणि हर्षद) , खुलाश्याबद्दल धन्यवाद !!! -- टोचक

नितीनमहाजन 13/11/2009 - 16:56
ब्रिटिशांच्या जुलुमामुळे व त्रासामुळे सर्वच भारतीय जनता त्रासलेली होती. सामान्य जनता मनातून याचा विरोध कसा करावा याचा विचार करीत होती. सामान्य माणसाला सशत्र क्रांतीचा पर्याय नक्कीच आकर्षक वाटत होता कारण त्यातून ब्रिटिश सत्तेविरुध्द ताबडतोब व थेट हल्ला करता येतो हे दिसत होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता, धैर्य व शारिरीक तयारी सर्वांजवळ नव्हती. मला काहिही करून या जुलुमाचा विरोध करायचा आहे, पण तो कसा करायचा हे समजत नाही अशा द्विधा मनस्थितीत ही पारतंत्र्यातील जनता वावरत होती. या सर्वांना गांधीजींनी योग्य मार्ग दाखविला तो म्हणजे अहिंसेने व सविनय कायदेभंग. सामान्य माणसाच्या हातात फक्त त्याचा देह आणी त्याचे मन असले तरी तो या अहिंसात्मक प्रतिकाराद्वारे आपला विरोध दाखवू शकतो हे गांधीजींनी जाणले. या अतीशय परिणामकारक अशा शस्त्राने सारा भारत देश नक्की पेटून उठेल याची त्यांना खात्री होती. जेव्हा सामान्य माणसाचा सहभाग एखाद्या चळवळीत होतो तेव्हा ती फोफावायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामान्य माणूस विचार करायला लागतो की अरे माझ्या शेजार्‍याला जर हे जमते जर मला का नाही जमणार? मग प्रत्यक्ष सहभागानंतर तो सामान्य माणूसही अभिमानाने म्हणू शकला की मी ब्रिटिश सत्तेला विरोध केला, माझाही या स्वातंत्रलढ्यात खारीचा का होईना पण वाटा आहे. आणि येथेच गांधीजी व सशस्त्र क्रांतीकारक यांच्यात फरक होतो. सशस्त्र क्रांतीकारकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सामान्य माणसामध्ये स्फुल्लिंग जागवण्याचे काम करणे फार अवघड होते. मला येथे गांधीजी, सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची तुलना करायची नाही पण स्वातंत्रलढ्यामध्ये सामान्य जनतेला सहभागी करुन घेण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले हे मात्र नक्की. मला स्वतःला सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान याला जगात तोड नाही. सावरकरांची बोटीतील उडी, अंदमानमधील काळेपाणी यासारखे दुसरे उदाहरण जगात नाही. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्य्क्ष ब्रिटिश सेनेलाच आपल्याबाजूला वळवले हेही उदाहरण जगात एकमेवाद्वितीयच. पण एक सामान्य माणूस यापैकी काय करू शकतो. तुम्ही स्वतःला विचारून पहा की यापैकी आपण कशात सामिल झालो असतो. ज्याप्रमाणे आपल्या संतांनी संसारात राहून देवभक्ती करायला शिकवले ससेच गांधीजींनी पारतंत्र्यातील गांजलेल्या सामान्य माणसाला देशभक्ती करायला शिकवली असे मी म्हणतो. मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवर बोट ठेवले व दाखवून दिले की पहा हे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या जमिनीवर तयार केलेले मीठ आपल्यालाच अधिक रक्क्म देऊन खरेदी करायला लावत आहेत. तुम्हीच विचार करा हे योग्य आहे का? जर अयोग्य वाटत असेल तर चला माझ्याबरोबर विरोध करायला. का नाही सामान्य माणूस पेटून उठणार सांगा? बाकी चर्चा उत्तम चालली आहे. नितीन

मनीषा 15/11/2009 - 11:05
गांधीजी .. म्हणलं की मला पु.लं च्या अंतु बर्व्याचे तत्वज्ञान आठवते ... " --- माणूस असेल मोठा , पण आम्ही त्यांचा मोठेपणा कुठ्ल्या खाती नोंदवावा ? ---- रोज तुपाशी खाणर्‍या उपाशी माणसाचे कौतुक .. इथे निम्मे कोकण उपाशी " आणि " ---इंग्रज गेला तो कंटाळून , लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही म्हणुन फुंकले दिवाळे " गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली . तोपर्यंत मुठभर विचारवंतच फक्त ब्रिटीश सत्तेशी झगडत होते . पण 'गांधींजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले-----' हे विधान अतिशय विपरर्यस्त आहे .

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 11:20
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली
अच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 12:30
अनुभूती कसली? त्यांना स्वतंत्र्य म्हणजे काय हेच माहित नव्हते ... भारतातील ६०% ते ७०% जनता शेती आणि शेती संबधीत व्यवसाय करणारी ... ब्रिटीशांच्या आधी जमिनदार , वतनदार त्यांना लुटत होते. आपले हक्क काय आहेत, आपल्यावर अन्याय होतो आहे त्याचा प्रतिकार करायला हवा आणि तो आपण करु शकतो ह्याची जाणिव नक्कीच गांधीजींच्या आंदोलनामुळे झाली

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 12:47
इंग्रजांनी एवढं गुपचूप राज्य केलं आपल्यावर ? तरीच ते एवढे दिवस राज्य करू शकले.. थँक्स टू गांधी !! ते नसते तर आजही आपल्याला कळले नसते की आपल्यावर नक्की कोण राज्य करतोय ते !! मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..

In reply to by टारझन

श्री. टारझन, सुधा मूर्ती यांनी 'वाईज अँड अदरवाईज'मधे लिहिलं आहे की उदीशा*च्या जंगलांमधे त्यांना असेही म्हातारे भेटले होते ज्यांना राणीचंच राज्य सुरू आहे असं वाटत होतं. अदिती *उदीशा किंवा उडीसा किंवा ओरिसा, माझा प्रचंड गोंधळ झाला आहे या नावाबद्दल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 15/11/2009 - 13:43
श्रीमती अदिती, श्री टारझन, हे कुमार टारझन आहेत. त्यामुळे त्यांना सदर संदर्भ देऊन उगाच त्यांच्या डोक्यात कीडे करण्यापेक्षा, आपले संदर्भासहित स्पष्टिकरण एक वेगळा लेख म्हणून प्रकाशित करावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते नाव आहे, ओडिशा. (ओड्र विशय - ओडिविशा - ओडिशा). ओडिया लोकांना`श' नीट म्हणता येत नाही. ते "स'" म्हणतात. आणि इथे ड ला र करतात. म्हणून ओरिसा. सुधा मूर्तींचा अनुभव खराच. मला २००९ मध्ये असे तरूण लोक (म्हातारे सोडा) ओरिसामध्ये भेटले आहेत ज्यांना खरंच माहीत नाही राज्य कोण करतं. असो. विषयांतर नको. पण कमालीचे दारिद्र्य आणि घोर अज्ञान जो कुणी जवळून पाहील त्याला गांधीजी आपोआप नीट समजतील. कसलेही वाद घालण्याची त्याची इच्छा होणार नाही. आळश्यांचा राजा

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 13:32
समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ... ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं . (तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्‍यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. ) मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता .. आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..

विसोबा खेचर 15/11/2009 - 11:59
मोहनदास गांधींची नसती कवतिकं चालू द्या भोचकराव!
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...! सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज! असो.. आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :) धन्यवाद.. तात्या.

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
अगदी अगदी ! ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! ©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by विनायक प्रभू

भोचक 13/11/2009 - 18:48
खलिल जिब्रानविषयी वाचत होतो नि त्याचे एक वचन सापडले. निश्चितपणे मिठात एक पावित्र्य आहे, कारण त्याचे अस्तित्व अश्रूतही आहे नि समुद्रातही ! -खलिल जिब्रान (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 12/11/2009 - 22:30
साधारण ३महिन्यांपूर्वी मी दांडीयात्रेच्या दरम्यान त्याकाळी विविध पत्रकारांनी केलेले लिखाण वाचले आणि एका केवढ्या मोठ्या रोमांचकारी (आणि शिकविणार्‍याही) इतिहासाकडे वरवर पाहिले होते याची जाणीव झाली. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही? नक्कीच! एकलव्य

In reply to by प्रशान्त पुरकर

घाबरू नका. माझा हृदय परीवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. उदाहरणार्थः ते कलंत्रीकाका बघा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

श्री भोचक, एका चांगल्या लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. देशाला स्वातंत्र्य कशामुळे मिळाले यावर विचार होत राहतील पण गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग त्यानंतर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनीही यशस्वीपणे अवलंबिला यावरून या आंदोलनाची परिणामकारकता लक्षात यावी.

कलंत्री 12/11/2009 - 21:22
या सत्यग्रहाचे वेगळेच असे अंग आहे. गांधींनी महिलाना स्वातंत्र्य लढयात भाग घ्यायला नेहमीच उद्यूक्त केले, पण या आंदोलनासाठी त्यांनी मात्र स्त्रींयाना दुरच ठेवले. तेंव्हा सरोजिनी नायडूंनी असा पवित्रा घेतला की तुम्ही यात भाग घेण्यासाठी जर आम्हाला परवानंगी दिली नाही तर प्रथम तुमच्याविरुद्ध आमचा सत्याग्रह सुरु होईल आणि शेवटी त्यांना परवानंगी मिळाली.

jaypal 12/11/2009 - 21:36
प.रा. जी "कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!" ज्ञानदेवा रचीला पाया तुका झालासी कळस. (म्हणुन केवळ तुका स्रेष्ठ ठरत नाही की निव्वळ ज्ञानदेव) सर्वच महान होते. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास 12/11/2009 - 22:52
अंबरीश मिश्रांचे "गंगेमधे गगन निवळले" अशा काहीशा नावाचे एक गांधीजींवर चांगले पुस्तक आहे, त्यात हे सर्व तसेच एकंदरीतच गांधीजींचे भारतातील राजकीय जीवन हे "श्रद्धावंता"च्या नजरेतून उर्धृत केलेले आहे. त्यातील एकंदरीत सूर (अथवा पुस्तकाचे/लेखकाचे अनुमान) असे आहे की गांधीजींनी काँग्रेसला आवडो - नआवडो स्वतःच्या विचारांतून चळवळ चालू केली. त्याला येणारी समाजमान्यता लक्षात घेता काँग्रेसला त्यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. बाकी वर पराने म्हणल्याशी काही अंशी सहमत. तरी देखील "दे दी हमे आझादी बीना..." पेक्षा गदीमांचे "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" थोडे अतिशयोक्तीपर असले तरी मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही. ------------------------------------------- बाकी टिळकांच्या दिशेने चालू झालेली स्वदेशी जीचा वापर सावरकरांनी विद्यार्थी दशेत केला ज्याचा परीणाम पण विसरता कामा नये. टिळक पर्भृतींनी चालू केलेल्या फर्ग्यूसन मधून त्यामुळे सावरकरांना निलंबीत व्हावे लागले, ते केले कोणी तर रँग्लर परांजप्यांनी! असो. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की त्यातूनच पुढे गांधीजींच्या खादीस स्वदेशी म्हणून मान्यता मिळवणे सोपे झाले. स्वदेशीच्या माध्यमातून टिळकांनी चालू केलेली चळवळ हे केवळ ज्यांना जमू शकेल अशांच्याच हातातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनही राहीले नाही आणि त्यात असलेली गर्भित/प्रकट आर्थिक नाकेबंदी हा ब्रिटीशांच्या धंदेवाईक वृत्तीस आणि पर्यायाने साम्राज्यास दिलेले पहीले उत्तर होते. टिळकांना यामुळे स्वातंत्र्य तात्काळ मिळेल असे वाटले नव्हते, किंबहूना स्वतःच्या जिवंतपणी स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना कधीच वाटत नव्हते. ते फक्त स्वातंत्र्यचळवळीसाठी पुढील सर्व सामाजीक पिढीस तयार करायचा त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. (त्यांच्या भाषेत ते फक्त चळवळीचा श्रीगणेशा करत होते). या स्वदेशीचाच पुढचा भाग, मीठ सत्याग्रह होता. पैशावरून पुन्हा एकदा नाकेबंदी करून, गांधीजींनी योग्य अशीच आर्थिक कारणावरून दांडी यात्रेत नाकेबंदी घडवून आणली...१९२० सालला म्हणूनच टिळकयुगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात असे म्हणले जाते. आर्थिक कारणांप्रमाणेच, १९४६ साली प्रत्यक्षात झालेले नावीक दलाचे बंड जे आता कधीपण होऊ शकेल अशी भिती ब्रिटीशांमधे उत्पन्न झाली ते म्हणजे मुख्य सावरकर आणि तसेच त्या विचारांच्या इतर नेतृत्वाचा असलेला सैनिकीकरणास पाठींबा हे पण कारण होते. असे सर्व म्हणण्यात गांधीजींचे महत्व आणि नेतॄत्व गूण कमी होत नाहीत पण त्यावर दाखवली जाणारी एकांगी श्रद्धामात्र रहात नाही आणि योग्य त्या ठिकाणी आदर आणि "क्रेडीट" पण दाखवले जाते.

In reply to by विकास

मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.
असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.>>> प्रत्येक गोष्टीतुन स्वतःला सोयिस्कर तो अर्थ काढणे कुणी तुमच्याकडुन शिकावे. असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. >>> बापुंचे ठिक आहे, पण मग "दे दी हमे आझादी....." सारखी गाणी काय दर्शवतात? गांधीजींना कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. त्यांचं महत्व शिरसावंद्यच आहे, पण गांधीजींचा महिमा गाताना इतरांच्या देशभक्तीकडे, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होवू नये एवढीच अपेक्षा. भगतसिंग प्रभुतींचे प्राणार्पण, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या हाल अपेष्टा, सुभाषबाबूंनी केलेले महत्प्रयास, टिळक, चाफेकरादी देशभक्तांचे कार्य, बंगालमधील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी अर्पण केलेले प्राण हे सगळे व्यर्थ आहे का? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधीजींचे नाव ऐकताच त्यांना झोंबलेल्या मिरच्या पाहून तुम्हाला मीरच्या झोंबल्या हे पाहून मौज वाटली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by विकास

भोचक 13/11/2009 - 11:29
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकासजी, अंबरिश मिश्र यांचे जे पुस्तक आहे, ते 'गंगेत गगन वितळले' या नावाचे आहे. त्यात गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला. त्यांनी काय काय 'प्रयोग' केले ते त्यात दिले आहेत. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते. बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे. थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले. मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले. पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे. दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! ) या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

चिरोटा 13/11/2009 - 12:18
आईनस्टाईनने एका पत्रात म्हंटले आहे- Mahatma Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion.We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come. गांधी हत्येनंतर आईन्स्टाईन यानी म्हंटले होते- Generations to come, it may be, will scarce believe that such a one as this, ever in flesh and blood walked upon this earth. भेंडी P = NP

In reply to by गणपा

प्रतिसाद भयंकर आवडला... माझ्याच मनातलं बोललात.... त्यांच्या सर्व चुकाबिका आणि राजकारण मान्य करूनही प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतेच...

In reply to by भोचक

यशोधरा 13/11/2009 - 13:24
भोचक, आपला लेख उत्तम आहे, तसाच, तुम्ही लिहिलेला प्रतिसादही. फक्त, "पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले.. " ह्या ऐवजी, ज्यांनी गांधींची तत्वे मान्य केली, त्यांना बरोबर घेतले, असे वाटते. नाहीतर सुभाषबाबू, स्वा. सावरकर यासारख्या व्यक्तींना जर का आपल्या लोकप्रियतेचा फायदा जर त्यांनी करुन दिला असता, तर कदाचित आज भारताचे चित्र वेगळे असू शकले असते...

In reply to by भोचक

विकास 13/11/2009 - 20:41
भोचकराव, पुस्तकाचे नाव दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम कुठल्याही ऐतिहासीक नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे, त्याचे विचार पटोत अथवा न पटोत. विचार करा नुसत्या एका संकेतस्थळावर स्वतःचे विचार इतरांपर्यंत पोचवायला अवघड जाते, पटवणे तर फारच लांब! तिथे स्वतःच्या बाजूने लोकांना वळवून समाजमन बदलण्याची ताकद असते आणि ती देखील स्वतःच्यापश्चात टिकते तिथे तुम्ही-आम्ही कोण! :) थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, ...ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. प्रामाणिकपणे, माझ्या नजरेतील, वरील सर्व मान्य असूनही यातील कुठल्याही गोष्टींमुळे गांधीजींबद्दलचा आदर कमी होत नाही फक्त तो डोळस राहतो. केवळ निष्क्रीय माणूसच बिनचूक असू शकतो असे वाटते... वास्तवीक पहाता हे माझेच नाही तर इतर अनेकांचे, जे स्वतःला गांधी-विरोधक समजतात, त्यांचे त्यांच्या नकळत असेच म्हणणे असू शकते असे वाटते. थोडक्यात गांधीजींना होणारा विरोध हा त्या व्यक्तीपेक्षा गांधीवादाला आहे, ज्यात स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणणार्‍यांनी निव्वळ ढोंगबाजी आणि स्वाध्यायशून्यता आणत जनसामान्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कधी कधी वाटते की स्वातंत्र्योत्तर नेहरूंनंतर जर शास्त्री अधिक काळासाठी पंतप्रधान म्हणून राहून देशास नेतृत्व देऊ शकले असते तर कदाचीत गांधीजींची इतकी टवाळी झाली नसती....अर्थात तीच अवस्था हिंदूत्ववाद्यांची आणि तशाच इतर चांगल्या विचारधारांची आहे. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. या बाबतीतपण माझे त्याच पद्धतीत म्हणणे मात्र उलट स्वरूपातही आहे. म्हणजे, गांधीवादाला उदात्त करण्यासाठी सावरकर आणि हिंदूत्ववादास झोडपले जाते. बरं गांधीवादाचा वापर तरी समाज घडवायला झाला आहे का? तर तसेही दिसत नाही तो निव्वळ त्याची समाजमनासाठी अफूची गोळी करून स्वतःच्या स्वार्थाचे घोडे पुढे दामटवायला झाला आहे. आपल्या वरील लेखात देखील (आपण, अथवा अंबरीश मिश्रांनी) जरी नेताजी, सावरकर, भगतसिंग आदींना नावे ठेवली नसली तरी त्यांचा उल्लेख करत नकळत गांधीजींची थोरवी वाढवायचा प्रयत्न झाला आहे आणि लगेच शेवट येतो की, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता. मला खात्री आहे की आपण हे मुद्दामून केले नाहीत, पण ती आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला-समाजाला) सवयच लागलेली आहे. इथे सर्व खटकते आणि म्हणूनच पुढचे उत्तर हे गांधेतर नेत्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर मूळ लेखातील खटकलेली बाब आणि त्यातील अर्धाच दिसणारा इतिहास पूर्ण दाखवण्यासाठी देणे भाग पडते. जर लेखात गांधीजीच असते तर माझ्या उत्तरातही केवळ गांधीजीच दिसले असते. कृपया यातील काही व्यक्तिगत नाही अथवा मूळ लेखावर वरचा मुद्दा सोडल्यास टिका अथवा आक्षेपही नाही ह्याची खात्री असावी. धन्यवाद

In reply to by विकास

भोचक 14/11/2009 - 11:43
"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.
विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

फारएन्ड 13/11/2009 - 06:06
चांगला लेख आहे. आवडला. त्या 'उचललेस तू..' या ओळी कोठेतरी वाचल्यासारख्या वाटतात. कदाचित शाळेच्या पुस्तकात. त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?

In reply to by फारएन्ड

विकास 13/11/2009 - 08:51
त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे? मला वाटते ती कविता वगैरे नाही आहे, केवळ त्या एका घटनेवरून सुचलेल्या त्या ओळी आहेत. त्या पाठ्यपुस्तकात आपल्याला होत्या.

सुनील 13/11/2009 - 10:22
ह्या ऐतिहासिक घटनेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हर्षद आनंदी 13/11/2009 - 12:33
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती? देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!! अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!! जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्‍या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम! कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते. गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता "it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे. वा काय महात्मा आहे?

हर्शल यान्च्याशी सहमत्....कदाचित दुसर्‍या महायुधात एन्ग्रजान्चे कम्बरडे मोडले नसते तर त्यनि अपल्याला एवढे सहजासहजि स्वन्त्रत्र केले नसते....फक्त गन्धिन्मुळे मि़ळाले हे खरच पट्त नाहि...

ऋषिकेश 13/11/2009 - 13:46
लेख उत्तम आहे.. खूप आवडला काहि प्रतिसादांमधे अपेक्षेप्रमाणे (प्रथेप्रमाणे) काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटली :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

In reply to by ऋषिकेश

काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटल>>> गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ. कारण गांधीजींना त्यांच्या चुका उघडपणे दाखवुन देणारे आणि गांधीजींमुळेच भारतीय राजकारणातुन वाळीत टाकले गेलेले असे हे महापुरुष आहेत सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

ऋषिकेश 13/11/2009 - 18:19
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ.
हे माझ्यासाठी नवीन आहे. असो. माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

भोचकभाऊ, लेख आणि प्रतिसाद तुमच्या किर्तीला जागणारे, माहीतीपूर्ण आणि अभ्यासू! मी गांधींचं, त्यांच्याबद्दल साहित्य वाचलं तर त्याचा दोष तुम्हालाही! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भोचक 13/11/2009 - 15:47
अदिती , या दोषाचा धनी व्हायला नक्की आवडेल. समंजसरावांचा प्रतिसादही त्यांच्या नावाला साजेसा. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

समंजस 13/11/2009 - 15:17
गांधींजींना आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागे जाउन, मिठ सत्याग्रह यशस्वी केल्या बद्दल गांधींजी आणि त्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. ती एक मोठी आणि फार महत्त्वाची घटना होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात करोडो लोकांचा सहभाग होता. जेव्हढ्यांनी नेत्रुत्व केले, ते सर्वच महान होते. त्या सर्वच लोकांनी आपले वैयक्तीक आयुष्य ह्या कार्यात घालवलं (आजचे करोडपती नेते सत्ते करता भांडताना बघून वाटतं की बरं झालं, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांना भविष्य माहित नव्हतं) सर्वांचा मार्ग एकच नव्हता, मात्र उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळवीणे. आणि तेच जास्त महत्वाचे होते. गांधीजींचे सर्वच विचार हे पटो ना पटो, त्यांचे स्वातंत्र्य चळवळतील योगदान महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य चळवळ ही क्रिकेट च्या सामन्या सारखी नव्हती की, त्यात कोणाचे योगदान किती हे मोजता येईल किंवा कोण सामनावीर हे ठरवता येईल तसेच लढाईत कोण मृत्युमुखी पडला, कोण वाचला या वरून, शुरपणा ठरत नसतो तर जिंकलो की हरलो हे महत्त्वाचे (व्यक्तीगत मत) करोडो लोकांना जागे करणे, घराबाहेर काढणे, मागे यायला लावणे, प्रंसगी लाठ्या खायला लावणे(ते सुद्धा भारता सारख्या देशात जिथे कृतीशून्य, संवेदना बोथट झालेल्या, आपला स्वार्थ आधी बघण्यार्‍या लोकांचा भरणा जास्त आहे) त्यांना विश्वास देणे की स्वातंत्र्य हे मिळणारच. ही माझ्या दृष्टीने एक अशक्यप्राय गोष्ट जी गांधीजींनी प्रत्यक्ष केली. त्यांच्या ह्या नेत्रुत्व गुणाला माझा सलाम (ह्याच बाबतीत मनावर प्रभाव टाकणारा दुसरा नेता म्हणजे हिटलर. त्याचे एकूण कार्य मला न पटो, पण त्याच्या ह्या लोकांना प्रभावीत करण्यार्‍या गुणा मुळे तरी मी त्याला सलाम करतो.)

सुवर्णा 13/11/2009 - 16:07
गांधीजीकडे असलेले नेतॄत्वगुण आणि त्यांना मिळालेला भारतीय जनतेचा पाठिंबा हे खरेच कौतुकास्पद आहे, आणि त्यांनी अध्यात्म, भारतीय संस्कॄती-परंपरा वगैरे यांचा केलेला अभ्यास हेसुध्दा.. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांना त्यांच्यातल्या षडरिपूंवर त्यांना पूर्णपणे मात नाही करता आली आणि इथेच त्यांच्यातला महात्मा हरला.. असो.. शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

टारझन 13/11/2009 - 16:16
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =)) आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !! (आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)

In reply to by टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवरा रे ह्याला !! टार्‍या लेका तु आजकाल अनआवरेबल झाला आहेस बघ. तुझा रतिसाद... आपल प्रतिसाद वाचुन गलित गात्र झालो एकदम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

सुवर्णा 13/11/2009 - 16:55
मी तर फक्त तुलना केली होती.. तुमचा प्रतिसाद बघितला.. आता काय बोलनार!! =)) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

टारझन 13/11/2009 - 16:10
भोचक आणि प्रतिसादकर्ते (खासकरून पर्‍या आणि हर्षद) , खुलाश्याबद्दल धन्यवाद !!! -- टोचक

नितीनमहाजन 13/11/2009 - 16:56
ब्रिटिशांच्या जुलुमामुळे व त्रासामुळे सर्वच भारतीय जनता त्रासलेली होती. सामान्य जनता मनातून याचा विरोध कसा करावा याचा विचार करीत होती. सामान्य माणसाला सशत्र क्रांतीचा पर्याय नक्कीच आकर्षक वाटत होता कारण त्यातून ब्रिटिश सत्तेविरुध्द ताबडतोब व थेट हल्ला करता येतो हे दिसत होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता, धैर्य व शारिरीक तयारी सर्वांजवळ नव्हती. मला काहिही करून या जुलुमाचा विरोध करायचा आहे, पण तो कसा करायचा हे समजत नाही अशा द्विधा मनस्थितीत ही पारतंत्र्यातील जनता वावरत होती. या सर्वांना गांधीजींनी योग्य मार्ग दाखविला तो म्हणजे अहिंसेने व सविनय कायदेभंग. सामान्य माणसाच्या हातात फक्त त्याचा देह आणी त्याचे मन असले तरी तो या अहिंसात्मक प्रतिकाराद्वारे आपला विरोध दाखवू शकतो हे गांधीजींनी जाणले. या अतीशय परिणामकारक अशा शस्त्राने सारा भारत देश नक्की पेटून उठेल याची त्यांना खात्री होती. जेव्हा सामान्य माणसाचा सहभाग एखाद्या चळवळीत होतो तेव्हा ती फोफावायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामान्य माणूस विचार करायला लागतो की अरे माझ्या शेजार्‍याला जर हे जमते जर मला का नाही जमणार? मग प्रत्यक्ष सहभागानंतर तो सामान्य माणूसही अभिमानाने म्हणू शकला की मी ब्रिटिश सत्तेला विरोध केला, माझाही या स्वातंत्रलढ्यात खारीचा का होईना पण वाटा आहे. आणि येथेच गांधीजी व सशस्त्र क्रांतीकारक यांच्यात फरक होतो. सशस्त्र क्रांतीकारकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सामान्य माणसामध्ये स्फुल्लिंग जागवण्याचे काम करणे फार अवघड होते. मला येथे गांधीजी, सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची तुलना करायची नाही पण स्वातंत्रलढ्यामध्ये सामान्य जनतेला सहभागी करुन घेण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले हे मात्र नक्की. मला स्वतःला सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान याला जगात तोड नाही. सावरकरांची बोटीतील उडी, अंदमानमधील काळेपाणी यासारखे दुसरे उदाहरण जगात नाही. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्य्क्ष ब्रिटिश सेनेलाच आपल्याबाजूला वळवले हेही उदाहरण जगात एकमेवाद्वितीयच. पण एक सामान्य माणूस यापैकी काय करू शकतो. तुम्ही स्वतःला विचारून पहा की यापैकी आपण कशात सामिल झालो असतो. ज्याप्रमाणे आपल्या संतांनी संसारात राहून देवभक्ती करायला शिकवले ससेच गांधीजींनी पारतंत्र्यातील गांजलेल्या सामान्य माणसाला देशभक्ती करायला शिकवली असे मी म्हणतो. मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवर बोट ठेवले व दाखवून दिले की पहा हे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या जमिनीवर तयार केलेले मीठ आपल्यालाच अधिक रक्क्म देऊन खरेदी करायला लावत आहेत. तुम्हीच विचार करा हे योग्य आहे का? जर अयोग्य वाटत असेल तर चला माझ्याबरोबर विरोध करायला. का नाही सामान्य माणूस पेटून उठणार सांगा? बाकी चर्चा उत्तम चालली आहे. नितीन

मनीषा 15/11/2009 - 11:05
गांधीजी .. म्हणलं की मला पु.लं च्या अंतु बर्व्याचे तत्वज्ञान आठवते ... " --- माणूस असेल मोठा , पण आम्ही त्यांचा मोठेपणा कुठ्ल्या खाती नोंदवावा ? ---- रोज तुपाशी खाणर्‍या उपाशी माणसाचे कौतुक .. इथे निम्मे कोकण उपाशी " आणि " ---इंग्रज गेला तो कंटाळून , लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही म्हणुन फुंकले दिवाळे " गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली . तोपर्यंत मुठभर विचारवंतच फक्त ब्रिटीश सत्तेशी झगडत होते . पण 'गांधींजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले-----' हे विधान अतिशय विपरर्यस्त आहे .

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 11:20
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली
अच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 12:30
अनुभूती कसली? त्यांना स्वतंत्र्य म्हणजे काय हेच माहित नव्हते ... भारतातील ६०% ते ७०% जनता शेती आणि शेती संबधीत व्यवसाय करणारी ... ब्रिटीशांच्या आधी जमिनदार , वतनदार त्यांना लुटत होते. आपले हक्क काय आहेत, आपल्यावर अन्याय होतो आहे त्याचा प्रतिकार करायला हवा आणि तो आपण करु शकतो ह्याची जाणिव नक्कीच गांधीजींच्या आंदोलनामुळे झाली

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 12:47
इंग्रजांनी एवढं गुपचूप राज्य केलं आपल्यावर ? तरीच ते एवढे दिवस राज्य करू शकले.. थँक्स टू गांधी !! ते नसते तर आजही आपल्याला कळले नसते की आपल्यावर नक्की कोण राज्य करतोय ते !! मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..

In reply to by टारझन

श्री. टारझन, सुधा मूर्ती यांनी 'वाईज अँड अदरवाईज'मधे लिहिलं आहे की उदीशा*च्या जंगलांमधे त्यांना असेही म्हातारे भेटले होते ज्यांना राणीचंच राज्य सुरू आहे असं वाटत होतं. अदिती *उदीशा किंवा उडीसा किंवा ओरिसा, माझा प्रचंड गोंधळ झाला आहे या नावाबद्दल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 15/11/2009 - 13:43
श्रीमती अदिती, श्री टारझन, हे कुमार टारझन आहेत. त्यामुळे त्यांना सदर संदर्भ देऊन उगाच त्यांच्या डोक्यात कीडे करण्यापेक्षा, आपले संदर्भासहित स्पष्टिकरण एक वेगळा लेख म्हणून प्रकाशित करावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते नाव आहे, ओडिशा. (ओड्र विशय - ओडिविशा - ओडिशा). ओडिया लोकांना`श' नीट म्हणता येत नाही. ते "स'" म्हणतात. आणि इथे ड ला र करतात. म्हणून ओरिसा. सुधा मूर्तींचा अनुभव खराच. मला २००९ मध्ये असे तरूण लोक (म्हातारे सोडा) ओरिसामध्ये भेटले आहेत ज्यांना खरंच माहीत नाही राज्य कोण करतं. असो. विषयांतर नको. पण कमालीचे दारिद्र्य आणि घोर अज्ञान जो कुणी जवळून पाहील त्याला गांधीजी आपोआप नीट समजतील. कसलेही वाद घालण्याची त्याची इच्छा होणार नाही. आळश्यांचा राजा

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 13:32
समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ... ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं . (तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्‍यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. ) मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता .. आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..

विसोबा खेचर 15/11/2009 - 11:59
मोहनदास गांधींची नसती कवतिकं चालू द्या भोचकराव!
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...! सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज! असो.. आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :) धन्यवाद.. तात्या.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

विसुनाना ·

सन्जोप राव 11/11/2009 - 17:54
उत्तम रसग्रहण / समीक्षण किंवा जे काही आहे ते. प्रायोगिक नाटक/ चित्रपटांविषयी मनात असलेला गंड दूर होण्यास अशा लेखनाची मदत होईल असे वाटते. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विंजिनेर 11/11/2009 - 18:05
एका नाटकाची चांगली ओळख (पडद्यापुढची+मागची)करून दिल्याबद्दल धन्यवाद..

मनिष 11/11/2009 - 18:12
मी पाहिले आणि मला खरच कळले नाही ते नाटक. व्यक्तिरेखा कळल्या, पण त्या अनुषंगाने काय म्हणायचे आहे ते नाही कळले. आता तुम्चा लेख जरा निवांत आणि काळजीपुर्वक वाचतो आणि समजावून घेतो.

या नाटकाचे नाव कधीमधी एखाद्या नाट्यविषयक चर्चेदरम्यान ऐकले अथवा तत्सम लेखात वाचले होते. बरेच वेळा. बहुतेक वेळा हे उल्लेख अतिव आदरानेच असत. आळेकरांविषयीही खूप ऐकले आहे. नाटकाच्या नावामुळे आणि इतके ऐकल्यामुळे / वाचल्यामुळे प्रचंड उत्सुकता होती नाटकाबद्दल. अर्थात हे नाटक पहिल्यांदा आले तेव्हा मी खूपच लहान असल्याने तेव्हा बघणे शक्यच नव्हते. आज हे नाटक नक्की काय आहे याबद्दल नुसतेच कळले नाही तर त्यानाटकाबद्दल काही अभिरूचीसंपन्न मतही वाचायला मिळाले. विसुनाना, धन्यवाद!!! बिपिन कार्यकर्ते

धनंजय 11/11/2009 - 19:32
नाट्यओळख आवडली. हे नाटक मी १९९२-१९९३मध्ये बघितले होते, आणि नाटकाची संहिता मिळाली तर हवी आहे.

प्रदीप 11/11/2009 - 19:48
आवडला, धन्यवाद. हे नाटक प्रथम रंगभूमिवर आले तेव्हा पाहिल्याचे आठवते आहे. पण तुम्ही येथे दर्शवलेले अनेक संदर्भ तेव्हा लक्षात आले नाहीत. त्यावेळी हे संगीत मराठी नाटकांची पॅरोडी असल्याचे जाणवले होते. मूळच्याच संचात हे नाटक इतक्या वर्षांनीही सादर केले जात आहे, आणि ते तुम्ही पाहू, अनुभवू शकलात, ही आनंदाची बाब होय!

श्री विसुनाना, नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. हे नाटक पाहीलेले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. जावडेकर-बावडेकर जोडगोळीवरून न्युयॉर्करमध्ये वाचलेली सलमान रश्दींची 'इन द साउथ' ही कथा आठवली. (कथेत आणि नाटकात फारसे साम्य नसावे.) धनंजय, अ‍ॅमेझॉनवर या नाटकाचा शांता गोखले यांनी केलेला इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे.

सन्जोप राव 11/11/2009 - 17:54
उत्तम रसग्रहण / समीक्षण किंवा जे काही आहे ते. प्रायोगिक नाटक/ चित्रपटांविषयी मनात असलेला गंड दूर होण्यास अशा लेखनाची मदत होईल असे वाटते. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विंजिनेर 11/11/2009 - 18:05
एका नाटकाची चांगली ओळख (पडद्यापुढची+मागची)करून दिल्याबद्दल धन्यवाद..

मनिष 11/11/2009 - 18:12
मी पाहिले आणि मला खरच कळले नाही ते नाटक. व्यक्तिरेखा कळल्या, पण त्या अनुषंगाने काय म्हणायचे आहे ते नाही कळले. आता तुम्चा लेख जरा निवांत आणि काळजीपुर्वक वाचतो आणि समजावून घेतो.

या नाटकाचे नाव कधीमधी एखाद्या नाट्यविषयक चर्चेदरम्यान ऐकले अथवा तत्सम लेखात वाचले होते. बरेच वेळा. बहुतेक वेळा हे उल्लेख अतिव आदरानेच असत. आळेकरांविषयीही खूप ऐकले आहे. नाटकाच्या नावामुळे आणि इतके ऐकल्यामुळे / वाचल्यामुळे प्रचंड उत्सुकता होती नाटकाबद्दल. अर्थात हे नाटक पहिल्यांदा आले तेव्हा मी खूपच लहान असल्याने तेव्हा बघणे शक्यच नव्हते. आज हे नाटक नक्की काय आहे याबद्दल नुसतेच कळले नाही तर त्यानाटकाबद्दल काही अभिरूचीसंपन्न मतही वाचायला मिळाले. विसुनाना, धन्यवाद!!! बिपिन कार्यकर्ते

धनंजय 11/11/2009 - 19:32
नाट्यओळख आवडली. हे नाटक मी १९९२-१९९३मध्ये बघितले होते, आणि नाटकाची संहिता मिळाली तर हवी आहे.

प्रदीप 11/11/2009 - 19:48
आवडला, धन्यवाद. हे नाटक प्रथम रंगभूमिवर आले तेव्हा पाहिल्याचे आठवते आहे. पण तुम्ही येथे दर्शवलेले अनेक संदर्भ तेव्हा लक्षात आले नाहीत. त्यावेळी हे संगीत मराठी नाटकांची पॅरोडी असल्याचे जाणवले होते. मूळच्याच संचात हे नाटक इतक्या वर्षांनीही सादर केले जात आहे, आणि ते तुम्ही पाहू, अनुभवू शकलात, ही आनंदाची बाब होय!

श्री विसुनाना, नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. हे नाटक पाहीलेले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. जावडेकर-बावडेकर जोडगोळीवरून न्युयॉर्करमध्ये वाचलेली सलमान रश्दींची 'इन द साउथ' ही कथा आठवली. (कथेत आणि नाटकात फारसे साम्य नसावे.) धनंजय, अ‍ॅमेझॉनवर या नाटकाचा शांता गोखले यांनी केलेला इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला. त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) - प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

अजुन कच्चाच आहे ·

टारझन 10/11/2009 - 18:08
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन
आगागागागा !! अंमळ नजरचुकीनं वेगळंच वाचलं .... आणि प्रदर्शनी डोळ्यासमोर आली =)) आणि अंमळ खपलोच !! असो ... प्रदर्शनाला आमच्या शुभेच्छा !! -- (पॉटरी प्रेमी) टॅरी पॉट्टीकर

सूहास 10/11/2009 - 19:59
बेस्ट लक ...येण जमणार नाही... झाल्यावर फोतु टाक.. सू हा स...

पाषाणभेद 11/11/2009 - 10:43
आरे अजून कच्चाच आहे भाऊ, त्ये सगळ्ये मडके अजून कच्चे चे का भाजलेले हायेत? आँ? त्या अबू वानी? आँ? जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

टारझन 10/11/2009 - 18:08
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन
आगागागागा !! अंमळ नजरचुकीनं वेगळंच वाचलं .... आणि प्रदर्शनी डोळ्यासमोर आली =)) आणि अंमळ खपलोच !! असो ... प्रदर्शनाला आमच्या शुभेच्छा !! -- (पॉटरी प्रेमी) टॅरी पॉट्टीकर

सूहास 10/11/2009 - 19:59
बेस्ट लक ...येण जमणार नाही... झाल्यावर फोतु टाक.. सू हा स...

पाषाणभेद 11/11/2009 - 10:43
आरे अजून कच्चाच आहे भाऊ, त्ये सगळ्ये मडके अजून कच्चे चे का भाजलेले हायेत? आँ? त्या अबू वानी? आँ? जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन आमंत्रण पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी.

द लायन किंग

परिकथेतील राजकुमार ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 10/11/2009 - 10:39
जबरा रे पर्‍या लेका !! लॉयनकिंग्वा चा आपण लै मोठा फॅन !! तसेच सिंबाश्रीचा मित्र !! हकुना मटाटा तर लैच्च भारी !! - (प्युंबा) टारझन

अवलिया 09/11/2009 - 14:18
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परा!!! लेका काय सुंदर रे... हा चित्रपट बघायचा राहूनच गेलाय. आता बघेनच... लेकराबाळासोबत. चित्रंही काय मस्त आहेत. वा!!! मजा आली. सगळ्यात जास्त आवडलेले चित्र म्हणजे लायन किंग आणि त्याचा छावा कड्याच्या टोकावर पाठमोरे बसलेले आहेत आणि सुर्योदय होत आहे... क्लास!!! बिपिन कार्यकर्ते

अवलिया 09/11/2009 - 14:19
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

Nile 09/11/2009 - 14:24
आता पर्यंत हिंडुन आलेल्या जंगलांपैकी हे सर्वात बेस्ट! -राजहंस. ;)

परा बघावच लागणार बे हे जंगल.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

मस्त कलंदर 09/11/2009 - 15:30
खरंच बघावंसं वाटतंय हे जंगल!!!! बाकी.. बिकांनी उल्लेखलेला तो फोटोही मस्तच!!!!! (अजूनही टॉम अँड जेरी बघताना कुणाच्याही हाकेला ओ न देणारी) मस्त कलंदर.. :D नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

ज्ञानेश... 09/11/2009 - 15:34
अप्रतिम आहे लायन किंग. याची कथा थोडीशी 'मादागास्कर पार्ट २' शी मिळतीजुळती आहे. तोपण एक धमाल चित्रपट होता. "Great Power Comes With Great Responsibilities"

गणपा 09/11/2009 - 16:21
हे अ‍ॅनिमेशन चित्रपट, यावर आमचा भारी जीव. एका हुन एक सरस अ‍ॅनिमेशन २D आणि ३D गेल्या १-२ दशकात आले. एकही सोडला नाही. मग तो अगदी लायन किंग (भाग १ -भाग २ आणि भाग १ १/२) पासुन ते परवा पर्यंतच्या Cloudy with a Chance of Meatballs. टॉय स्टोरी १-२-३, मॉन्स्टर्स इंक., निमो,हॉर्टन हिअर्स हु, रॅट्यॅटुई, आईस एज १-२-३, बोल्ट,मीट द रॉबिनसन्स , ओव्हर द एज, मादागास्कर १ -२, द इक्रेडीबल्स, वॉली, ओपन सिझन १-२ न संपणारी यादी आहे आवडलेल्या अ‍ॅनिमेशनपटांची....

विंजिनेर 09/11/2009 - 16:35
नितांत सुंदर, अ‍ॅस्कर विजेते, सर्वात जास्त हिट अशी अनेक बिरूदे मिरवणारं अ‍ॅनिमेशन. एल्टन जॉनची सगळीच गाणी मस्त. डिस्नेच्या 'रेनेसांस कालखंडातील' एक अवस्मरणीय अ‍ॅनिमेशन (ब्युटी अँड द बीस्ट, बाम्बी, आणि शेवटी मुलान). लायन किंगच्या 'प्रेरणे'बद्दल खूप गदारोळ झाला होता. कायदेशीर मुस्कटदाबी केल्याचे आरोपसुद्धा झाले होते. अधिक माहिती विकीवर मिळेल

प्रभो 10/11/2009 - 06:55
परा‍ मस्त आहे रे पिक्चर... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

लवंगी 10/11/2009 - 08:00
खूप आवडता चित्रपट.. अजुनही मध्येच २-३ महिन्यातून एखाद्या शनीवारी मी आणी माझा सिंबा आवडीने हा चित्रपट पहात बसतो.. हकूना मटाटा लागल की अगदि गळा फाडून दोघे गाणं म्हणतो.. :)

मदनबाण 10/11/2009 - 10:19
राजकुमारा मस्त लिहले आहेस आणि फोटोचा वापर तर सुंदरच... :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 10/11/2009 - 10:39
जबरा रे पर्‍या लेका !! लॉयनकिंग्वा चा आपण लै मोठा फॅन !! तसेच सिंबाश्रीचा मित्र !! हकुना मटाटा तर लैच्च भारी !! - (प्युंबा) टारझन

अवलिया 09/11/2009 - 14:18
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परा!!! लेका काय सुंदर रे... हा चित्रपट बघायचा राहूनच गेलाय. आता बघेनच... लेकराबाळासोबत. चित्रंही काय मस्त आहेत. वा!!! मजा आली. सगळ्यात जास्त आवडलेले चित्र म्हणजे लायन किंग आणि त्याचा छावा कड्याच्या टोकावर पाठमोरे बसलेले आहेत आणि सुर्योदय होत आहे... क्लास!!! बिपिन कार्यकर्ते

अवलिया 09/11/2009 - 14:19
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

Nile 09/11/2009 - 14:24
आता पर्यंत हिंडुन आलेल्या जंगलांपैकी हे सर्वात बेस्ट! -राजहंस. ;)

परा बघावच लागणार बे हे जंगल.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

मस्त कलंदर 09/11/2009 - 15:30
खरंच बघावंसं वाटतंय हे जंगल!!!! बाकी.. बिकांनी उल्लेखलेला तो फोटोही मस्तच!!!!! (अजूनही टॉम अँड जेरी बघताना कुणाच्याही हाकेला ओ न देणारी) मस्त कलंदर.. :D नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

ज्ञानेश... 09/11/2009 - 15:34
अप्रतिम आहे लायन किंग. याची कथा थोडीशी 'मादागास्कर पार्ट २' शी मिळतीजुळती आहे. तोपण एक धमाल चित्रपट होता. "Great Power Comes With Great Responsibilities"

गणपा 09/11/2009 - 16:21
हे अ‍ॅनिमेशन चित्रपट, यावर आमचा भारी जीव. एका हुन एक सरस अ‍ॅनिमेशन २D आणि ३D गेल्या १-२ दशकात आले. एकही सोडला नाही. मग तो अगदी लायन किंग (भाग १ -भाग २ आणि भाग १ १/२) पासुन ते परवा पर्यंतच्या Cloudy with a Chance of Meatballs. टॉय स्टोरी १-२-३, मॉन्स्टर्स इंक., निमो,हॉर्टन हिअर्स हु, रॅट्यॅटुई, आईस एज १-२-३, बोल्ट,मीट द रॉबिनसन्स , ओव्हर द एज, मादागास्कर १ -२, द इक्रेडीबल्स, वॉली, ओपन सिझन १-२ न संपणारी यादी आहे आवडलेल्या अ‍ॅनिमेशनपटांची....

विंजिनेर 09/11/2009 - 16:35
नितांत सुंदर, अ‍ॅस्कर विजेते, सर्वात जास्त हिट अशी अनेक बिरूदे मिरवणारं अ‍ॅनिमेशन. एल्टन जॉनची सगळीच गाणी मस्त. डिस्नेच्या 'रेनेसांस कालखंडातील' एक अवस्मरणीय अ‍ॅनिमेशन (ब्युटी अँड द बीस्ट, बाम्बी, आणि शेवटी मुलान). लायन किंगच्या 'प्रेरणे'बद्दल खूप गदारोळ झाला होता. कायदेशीर मुस्कटदाबी केल्याचे आरोपसुद्धा झाले होते. अधिक माहिती विकीवर मिळेल

प्रभो 10/11/2009 - 06:55
परा‍ मस्त आहे रे पिक्चर... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

लवंगी 10/11/2009 - 08:00
खूप आवडता चित्रपट.. अजुनही मध्येच २-३ महिन्यातून एखाद्या शनीवारी मी आणी माझा सिंबा आवडीने हा चित्रपट पहात बसतो.. हकूना मटाटा लागल की अगदि गळा फाडून दोघे गाणं म्हणतो.. :)

मदनबाण 10/11/2009 - 10:19
राजकुमारा मस्त लिहले आहेस आणि फोटोचा वापर तर सुंदरच... :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो. लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता. खरतर ह्या अ‍ॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस.

फॉर हिअर ऑर टू गो!!.. पुस्तक परिक्षण

प्राजु ·

एकलव्य 04/11/2009 - 08:08
धावता आढावा आवडला प्राजुताई! "काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." फ़ॉर हिअर ऑर टू गो!! म्हणजे अमेरिकेत राहायचे का भारतात परतायचे (हा म्हटला तर दुखरा आणि म्हटला तर स्वतःची समजूत किंवा फसवणूक करणारा) प्रश्न लेखिकेने मांडला आहे की काय असे वाटले. मराठी एकलव्य

छोटा डॉन 04/11/2009 - 08:15
सुरेख ओळख ...!!१ पुस्तक परिचय आवडला, पुस्तक नक्की वाचेन मिळेल तिकडे.
अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
:) मस्त, हा परिच्छेद आवडला. अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ... असो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

दशानन 04/11/2009 - 08:22
असेच म्हणतो, प्राजु तै. मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by दशानन

प्रभो 04/11/2009 - 09:51
असेच म्हणतो, प्राजु तै. मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

असेच म्हणतो, हे पुस्तक नक्की वाचणार. आपला, (वाचक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by प्रशांत उदय मनोहर

गणपा 04/11/2009 - 13:17
प्राजु ताई छान परिक्षण केलयस. एक चांगलं पुस्तक नजरेस आणुनदिल्या बद्दल आभार.

In reply to by छोटा डॉन

अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ... हेच म्हणते. चुचु

In reply to by छोटा डॉन

शक्तिमान 07/11/2009 - 03:35
अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...
थोड्या फार प्रमाणात ही सर्व ठिकाणे अमेरिकेशीच संबंधित आहेत..

४०-४५ वर्षांपृर्वी गेलेली काय आणि गेल्या १०-१५ वर्षांपूर्वी गेलेली काय.. सगळीजणं स्वखुशीनेच नविन वाटा चोखाळायला गेलेली ना? त्यांची का इतकी कवतिकं? ही असली नको त्यांचा नको तितका उदो उदो करणारी पुस्तकं इथल्या अमेरिका द्वेष्ट्यांच्या हातात कोलित देतात.

विंजिनेर 04/11/2009 - 08:41
चांगला आढावा.. बाकी,
पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
हे आजही तितकंच खरे आहे. आणि मायभुमी सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडणार्‍या प्रत्येक भारतीयाला लागू होतं (अमेरिका/इंग्लंड इ. आंग्लभाषिक देशांशिवाय युरोप/पूर्व आशिया इ. ठिकाणी तर अजूनच) जाता जाता: चांगल्या पुस्तक परि़क्षणाच्या धाग्याचा निवासी वि अनिवासी वादात सापडून विचका होउ नये ही माफक अपेक्षा..

सहज 04/11/2009 - 08:52
पुस्तक वाचले पाहीजे. फॉर हिअर ऑर टू गो!! हा प्रश्न आहे खरा. ह्यावर एक वेगळा धागा सुरु करावा का? :-) बहुतेक एका मिपाकरानी या वेलणकरबाईंची मुलाखत घेतली होती.

मिसळभोक्ता 04/11/2009 - 08:53
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. मिसळपावावरील मालकप्रणीत (आणि बिरूटे, नाना, वगैरे इतर "छोटे" सदस्य प्रतिपादित) अनिवासी भारतीयांविरुद्ध उघडलेल्या आघाडीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे. ह्याला धैर्य लागते. ते धैर्य दाखवल्याविषयी प्राजूताईंचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. इतर लोकांनी, त्यांचा धैर्याच्या बाबतीत कित्ता गिरवावा अशी विनंती करावीशी वाटते. अर्थात, ही विनंती अनिवासी भारतीयाने केली, तर ती फाट्यावर मारण्यात येईल, ह्याची खात्री तेवढीच अधीक वाटते. असो, ते झाल्यावर, मूळ पुस्तक आणि त्यातील व्यक्तिचित्रे ह्याविषयी थोडासा खेद व्यक्त करावासा वाटतो. आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे. बदल, जे सगळीकडे होतात, तसेच इथेही होत आहेत. ह्या बदलांविषयी अधिक लिहायला हवे. ४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही. असे माझे मत आहे, एनी वे. येथे बरेच काका आणि आजोबा "आमच्या वेळी असे नव्हते", "आम्हाला किती झगडावे लागले" असे वारंवार सांगताना मला भेटतात. आणि मी आमच्या झगड्यांची इथ्थंभूत यादी दिल्यावर गप्प बसतात. त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. ते आलेत त्यावेळी, स्वतःच्या आकांक्षा दडपून टाकणारी व्यक्ती इथल्या लोकांना दिसली. अम्ही आलोत, त्यावेळी, त्यांच्या पोटावर पाय येणार ह्याची त्यांना जाणीव झाली. एवढा मोठ्ठा फरक लेखिकेला दिसू नये, ह्याचा खेद होतो. बाकी पुस्तक बरे आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

विकास 04/11/2009 - 11:09
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. ...त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे. कौतुक वाटायचे कारण: एक अमेरिकेचे कौतुक असलेल्या पुस्तकाचे कौतुक आणि तेही ज्या "वेलणकर" नामक व्यक्तीने लिहीलेल्या! ;) असो. बाकी गंभीर प्रतिसाद सकाळी...

In reply to by मिसळभोक्ता

प्राजु 04/11/2009 - 19:53
आपण म्हणताहात ते खरे असेलही. पण.. ४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही. मी अशी तुलना कुठेच नाही केलेली. या पुस्तकात मला दिसले ते, मूळासकट उपटलेले रोपटे नव्या जमीनीत पुन्हा तग धरून राहिले आणि त्याचा वृक्ष झाला.. असे ज्यांच्याबद्दल म्हणावे अशी लोकं. काही १९४८ च्या गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर.. तर काही भष्टाचारला कंटाळलेली तर काही शिक्षणव्यवस्थेतल्या आरक्षणांना. जी जशी दिसली तशी रेखाटली गेलेली आहेत. कदाचित आपण म्हणता तशी मी पुस्तकाचा अभ्यास करण्यात कमी पडले असेन. मी एकाच बाजूने विचार केला असल्याची शक्यताही आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

In reply to by प्राजु

गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर..
गांधी वध ह्या शब्दयोजनेवर आक्षेप नोंदवत आहे. गांधी हत्या म्हंटले गेले पाहिजे.

In reply to by निमीत्त मात्र

प्राजु 04/11/2009 - 20:42
माफ करा... माझे शब्द मागे घेते. गांधी हत्येनंतर हेच योग्य आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

In reply to by मिसळभोक्ता

श्री मिसळभोक्ता यांच्याशी सहमत. अपर्णा वेलणकर या लोकमतच्या उपसंपादक असतांना मी त्यांना ओळखत असे. त्यांना अनिवासी भारतीयांविषयी कौतुकमिश्रित कुतुहल असल्याचे माहीत असल्याने या पुस्तकाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत असा माझा समज झाला आहे. (अपर्णा वेलणकर यांनी शोभा डे यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला होता व मूळच्याच टूकात पुस्तकाचा आणखी टूकार अनुवाद वाचवला गेला नव्हता, हे आठवते.) श्री मिसळभोक्ता म्हणतात त्याप्रमाणे 'बरेच काका आणि आजोबा' त्यांच्या धडपडींचे पुराण सुरू करतात. एखाद्या नवीन देशात येऊन तेथे स्थिरस्थावर होणे हा अनुभव जरी व्यक्तिगत समाधान देत असला तरी हा अनुभव एका वीराचे स्वगत म्हणून सांगणे हे इतरत्र 'काका-आजोबा' करतात त्याप्रमाणेच आहे. हे लोक आले तेव्हा सुशिक्षित होते, यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती तसेच स्पर्धेचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. थोडक्यात या लोकांच्या आर्थिक प्रगतीस मोठ्या प्रमाणात वाव होता. त्यांची व आजकाल येत असलेल्या भारतीयांची तुलना करणे योग्य नाही. आजकाल येणार्‍यांनी प्रवासवर्णनाचे क्षेत्र समृद्ध(?) केले आहे. (डिजिटल कॅमेर्‍याने तर या लिखाणाला फारच बरकत आणली.) कौशल्य नसतांना, इंग्रजी भाषेचा गंधही नसतांना, आफ्रिकेतून हाकलून दिलेले गुजराथी काका-आजोबा जेव्हा मॅटर ऑफ फॅक्टली आपले अनुभव सांगतात तेव्हा मराठी काका-आजोबांचे रिस्क अ‍ॅव्हर्स अनुभव फारच दुबळे वाटतात, प्रेरणा तर अजिबातच देत नाहीत. टीप: प्राजुतैंचे परीक्षण चांगले झाले आहे, त्यांच्या परीक्षणाबाबत वरील प्रतिसाद नाही. अवांतर: श्री मिसळभोक्ता यांनी पाच ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद लिहिल्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. (आधीही लिहिले असतील पण हा विशेष गंभीरपणाने लिहिला आहे, हे विशेष.)

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 05/11/2009 - 03:10
परीक्षण आवडले. आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे. हे बर्‍यापैकी सरसकट विधान आहे. पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे. पुस्तकामधे अनेक दोष असतील परंतु उपर्युक्त दोष त्यात नाही हे खचित. माझ्या दृष्टीने , पुस्तकातली पाल्हाळिक भाषा हा एक दोष आहे. अनेक मुद्दे जे सरळसोटपणे मांडता येतात त्यापायी काहीसे आख्यान लावल्यासारखे. (याची प्रचिती प्राजु यानी करून दिलेल्या पुस्तकाच्या ओळखीतल्या उतार्‍यामधे येते. आणि श्री. दिलीप चित्रे यांची प्रस्तावना याच दोषामधे अडकल्यासारखे मला वाटले. ) दुसरा दोषच म्हणायचा तर असे म्हणता येईल की हा जो दस्तावेज आहे त्याचे स्वरूप "अ‍ॅनेक्डोटल" (मराठी शब्द) आहे. अमेरिकेतल्या लायब्ररीमधे अशी शेकड्याने पुस्तके मिळतात की ज्यामधे (उदाहरणार्थ) वीस च्या दशकात बोटीने न्युयॉर्क ला आलेल्या लोकांच्या जीवनमानाचे , त्यांच्यातल्या शारिरीक बदलांचे स्टॅटिस्टीक्स मांडलेले असते. त्यातून काही मार्मिक व ठोस असे निष्कर्ष काढलेले दिसतात. हे सारे किचकट आहे पण दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने अनमोल. या पुस्तकाचे स्वरूप किस्सेवजा बनते. आकडेवारीचा मागमूस नाही. अर्थात लेखिकेचा तो उद्देश नसावा. पुस्तकाची जमेची बाजू ही, की त्यामधे अनेक पैलूंचा धांडोळा घेतला गेला आहे. यशाबरोबर अपेशाची नोंद घेतली गेली आहे. एकच एक दृष्टीकोन, पूर्वग्रहदूषित अनुमाने यांना टाळण्यात पुरेसे यश आलेले आहे. पुस्तक थोडे "रगेड" (मराठी शब्द) हवे होते असे मला वाटले इतपतच.

In reply to by मुक्तसुनीत

मिसळभोक्ता 05/11/2009 - 13:47
पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे श्री. सुनीत, माझे विधान पुन्हा एकदा वाचा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. (आणि नंतर विपर्यस्त, दिशाभूल असे शब्द वापरण्याविषयी पुन्हा एकदा विचार करा.) - निश्चय केळामात्रे

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 05/11/2009 - 18:32
प्रस्तुत पुस्तकात सर्वाना एकाच कॅटेगरीत टाकण्याबद्दल तुम्हाला जे वाटते त्याचे तुम्ही दाखले द्यावेत. पुस्तकाबद्दलच्या माझ्या आकलनानुसार , तुमचे विधान मला चुकीचे वाटले. मी तसे म्हणालो. तुम्ही तुमची बाजू सप्रमाण सिद्ध करा. मी आनंदाने मुद्दा मान्य करेन. - दर्शन हेळामात्रे.

In reply to by मुक्तसुनीत

श्री सुनीत, आनंदीबाई १८८३ मध्ये अमेरिकेत आल्या आणि १८८६ मध्ये भारतात परतल्या. पुस्तक वाचले नसल्याने आनंदीबाई व साठीच्या दशकात आलेल्या भारतीयांमध्ये काही समान सूत्र (अमेरिकेत येणे याखेरीज) लेखिकेने दाखवले आहे काय? याविषयी कृपया माहिती द्यावी.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

मुक्तसुनीत 05/11/2009 - 21:01
पुस्तकामधे आनंदीबाई जोशी, डॉ. केतकर यांचे उल्लेख आहेत. त्यांच्या सारख्या लोकांची अमेरिकायात्रा म्हणजे ज्ञानार्जनासाठी अज्ञात प्रदेशामधे , दळणवळणाची नि संप्रेषणाची साधने उपलब्ध नसताना केवळ हिमतीच्या जोरावर केलेले असामान्य प्रवास अशा अर्थाचे वर्णन लेखिका करते ; जे माझ्या मताने अगदी योग्य आहे. अमेरिकेची दारे महायुद्धानंतर किलकिली झाली नि साठीच्या दशकाच्या सुरवातीला तर ती सताड उघडली. याच घटनेच्या सुमाराला , भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला पंधराएक वर्षे उलटल्यानंतर, भारतातल्या नवीन वास्तवाबद्दल ज्यांचा भ्रमनिरास झाला ती पीढी अमेरिकेकडे वळली. "ब्रेन ड्रेन" हा शब्द १९६५ च्या सुमारास अस्तित्त्वात आला. तर , या पीढीमधे जे लोक इथे आले त्यांचा प्रवास , त्यांन्ची आयुष्ये, त्यांची यशापयशे , त्यांचे तिढे नि प्रश्न याबद्दल हे पुस्तक आहे. हा सगळा लेखाजोखा घटनाक्रमानुसार सविस्तर मांडला गेला आहे. भूमिका नीट विशद केली गेली आहे. नव्वदीच्या नि त्यानंतरच्या लोकांची ही स्टोरी नाही. तसा कुठे उल्लेखही नाही.

In reply to by मुक्तसुनीत

श्री सुनीत, तसे असल्यास धन्यवाद. श्री मिसळभोक्ता यांच्याकडून एकाच कॅटेगरीत कसे टाकले आहे याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

सुधीर काळे 04/11/2009 - 08:58
माझ्या सौ.ने हे पुस्तक वाचले आहे, मी अद्याप वाचायचे आहे. पण त्यातल्या "म्हातारपणी तिथं रहायचं कीं परत यायचं" या विषयाची चर्चा तिला खूप आवडली व "थेट उपयुक्त" वाटली. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

चित्रा 04/11/2009 - 10:10
पुस्तकाविषयी घरातल्यांकडून ऐकलेले आहे, पण आधी वाचावेसे वाटले नाही हे कबूल करते. एकतर अनिवासी भारतीय म्हणून अशा पुस्तकांमधील काही गोष्टी जरा अधिक भिडतात, काही तितक्याश्या रूचत नाहीत, यामुळे इच्छा झालेली नाही. पण प्राजूचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटते आहे. त्यामुळे पुस्तक परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद. तरी काही गोष्टी अपर्णा वेलणकरांना खरेच समजल्या आहेत का असे वाटले (त्यासाठी अर्थातच पुस्तक वाचावे लागेल) . जसे - "ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते." काम चांगलं असण्याशी (निदान सद्य परिस्थितीत) मोबदल्याचा संबंध फारसा लावू नये! (उदा. मागच्या वर्षी ज्यांना भरपूर कामाचे भरपूर मोबदले मिळत होते अशा गृहकर्ज आणि विम्याच्या कंपन्यांतील मोठ्या पदांवरचे लोक नक्की काय चांगले काम करीत होते? आणि किती वर्षे असे काम ते करीत होते? ) बाकी डॉनराव म्हणतात ते योग्य, की तुमच्या परिघाबाहेर पडल्यावरच (मग ती गल्ली असो, की गाव किंवा राज्य किंवा देश) तुमच्यातील शक्तींची तुम्हाला जाणीव होते. त्या शक्ती असतातच, त्या परदेश जागृत करतो एवढेच. परदेशात आल्यानंतर जाणवलेल्या अतिशय एकाकीपणापासून ते गलबल्यापर्यंतचा प्रवास हा खूप ठेचकाळत झालेला असू शकतो. (त्यातही नंतर मजा वाटते, पण त्याबद्दल अमेरिका अशी काही वेगळी काढण्याचे कारण नाही, हे स्थलांतरितांचे कुठेही गेले तरी प्रश्न असावेत). मिसळभोक्ता म्हणतात "४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही." बरोबर आहे, त्यांची एकास एक नग म्हणून (क्वालिटेटिव्ह) तुलना करू नये. पण येथे स्थलांतरित झालेल्या समूहात त्यांचेही स्थान आहे हे विसरू नये. त्यांची अमेरिकेत येण्याची आकांक्षा ही एकाच उद्देशाने प्रेरित झालेली नसली तरी ती किमान एकाच धगीची आहे हे मान्य करायला हरकत नाही. समूहाचा विचार करताना सगळ्या प्रकारच्या नगांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे मला वाटते.

सुनील 04/11/2009 - 10:24
चांगले परीक्षण. मिभो आणि चित्रा यांचे प्रतिसादही उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 04/11/2009 - 10:27
विषय रोचक आहे.. परिक्षणही नेटके आणि उत्सुकता वाढवणारे आहे. पुस्तक हातात पडलं तर वाचेनच.. आभार शेवटी अश्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने स्वतःच्या प्रायोरिटीजनुसार शोधावीत हे उत्तम ऋषिकेश ------------------

विजुभाऊ 04/11/2009 - 10:28
परदेशी जाणारे बहुतेक जण तेथे सर्व्हाईव्ह होण्याच्या धडपडीत असतात. मिळेल ते काम करायची त्यांची तयारी असते. मला कौतूक वातते ते कॅनडा / न्यूझीलंड येथे स्थाईक होणारांचे. नोकरीची कसलीही व्यवस्था नसताना ते तेथे जातात धडपड करतात आणि सुस्थितीत येतात. भारतात इतरत्र रहाणे आणि यूरोप अमेरीकेत रहाणे यात मुख्य फरकाहे तो रंगभेदाचा. भारतात या समस्येला आपल्याला फारसे तोंड द्यावे लागत नाही. रंगभेद समस्या अमेरीकेत नाहीच मुळी असेही नाही. इथून गेलेले लोक त्याला तोंड देत असतील तेथे जम बसवतात. हे कौतुकास्पद नाही का? परदेशी गेलेले लोक तेथे पैसे कमवायलाच गेलेले असतात. बर्‍यापैकी उत्तम जीवन जगायला गेलेले असतात. त्यांची धडपड यशस्वी होते याची असूया एतद्देशियानी का बाळगावी. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

ज्ञानेश... 04/11/2009 - 10:35
मला वाटते, लोकसत्ता 'चतुरंग' मधेही या पुस्तकाचे परीक्षण आले होते. वाचले पाहिजे एकदा! "Great Power Comes With Great Responsibilities"

पक्या 04/11/2009 - 12:51
पुस्तक ठीकठाक आहे. एवढे काही खास नाहिये. मागच्या पिढीतील किंवा आपल्या आजोबांच्या पिढीतील लोकांविषयी जास्त लिहीले आहे ...असे लोक की ते आता अमेरिकामध्ये व्यवस्थीत स्थिरस्थावर झाले आहेत. 'फॉर हिअर ऑर टू गो ?' हा प्रश्न सध्या आपल्या सारख्या पिढीतील लोकांना नेहमी भेडसावत असतो त्यां लोकांबद्द्ल, त्यांच्या झगडण्याबद्द्ल , त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्द्ल लेखिकेने खूपच कमी (किंबहुना नाहिच) लिहिले आहे. तरी बरंय, लेखिका या दशकातच अमेरिका हिंडली आणि लोकांचे अनुभव गोळा केले. तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही. पण ४०-४५ वर्षापूर्वी जे लोक अमेरिका मध्ये स्थलांतरीत झाले त्यांच्या अनुभवाविषयी , झगडण्याविषयी वाचायचे असेल तर अवश्य वाचावे.

In reply to by पक्या

>> तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक जे लोक साठच्या दशकात किंवा त्याच्या आसपास प्रामुख्याने अमेरिकेत आले त्या पिढीबद्दल आहे.

प्राजु तै एकदम छान ओळख करुन दिली आहेस ग. तुझे लेखन आधीच सुंदर आहे त्यात अजुन एका सुंदर लेखनाची ओळख करुन दिली आहेस म्हणजे अगदी दुधात साखर वगैरे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

अमोल केळकर 04/11/2009 - 13:34
मस्त पुस्तक आहे. ओळख करुन दइल्याबद्दल धन्यवाद अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पुस्तक परिक्षण चांगलं लिहिलं आहेस प्राजु. एकूण पुस्तक लिहिण्यासाठी अपर्णा वेलणकरांनी बरेच कष्ट घेऊन माहिती गोळा केली आहे. काही अपवादाचे भाग वगळता मलाही पुस्तक आवडलं. >> त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. एकदम बरोब्बर बोलालास मिभो ! 'फॉर हिअर्....'मधे आदराने उल्लेख केल्या गेलेल्या आमच्या एका स्नेहींनी मला एग्झॅक्टली हेच वाक्य सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "अरे, आमचे झगडे वेगळे होते. तुमचे झगडे वेगळे आहेत." --------- योगायोगाने मी 'फॉर हिअर्...'नंतर काही दिवसांत लगेच जे पुस्तक वाचायला घेतलं ते म्हणजे 'सामन्स ऑफ नर्मदा' (Salmons of Narmada). डॉ. भूषण केळकर ह्याने NRI व्यक्तींकडून मागवलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. फक्त फरक इतकाच की इथे NRI म्हणजे Nest Returned Indians ! जे अनिवासी भारतीय काही वर्षे भारताबाहेर राहिले आणि मग काही ना काही कारणाने कायमचे भारतात परतले त्यांनी स्वत:च्या अनुभवांबद्दल लिहिलेले हे लेख आहेत. माझ्या माहितीप्रमाणे भारतात हे पुस्तक सहज उपलब्ध असावं.

चतुरंग 04/11/2009 - 21:40
स्थलांतर आणि झगडा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्थलांतर कुठून कुठे होते त्यावर त्या झगड्याचा प्रकार आणि तीव्रता ठरते. शिवाय ते कुठल्या काळात झाले आहे ह्यावरही त्याचे मूल्यमापन करावे लागेल. वरती मिभो म्हणतात तसे ४०-४५ वर्षांपूर्वी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. संधी, स्पर्धा ह्यांची गणितं आजच्या काळापेक्षा वेगळी होती. गेल्या १५-२० वर्षात इकडे आलेल्या लोकांना चढत्या क्रमाने स्पर्धा, संधींची उपलब्धता, वीसा वगैरे तांत्रिक बाबींचे सतत बदलणारे नियम इ. ना तोंड द्यावे लागले असणार. सगळ्यांना एकाच पारड्यात मोजणे अयोग्य ठरेल. मानसिक पातळीवरचा झगडा तर अनिवार्यच असतो. एकूणच स्थलांतर ह्या विषयाबाबत वेलणकरबाई किती खोल पाण्यात आहेत आणि पुस्तकाचा एकूण वकूब कसा असेल ह्याबद्दल मी साशंक आहे, तरीही चाळून बघायला हरकत नाही. चतुरंग

मस्तानी 04/11/2009 - 22:11
पुस्तक कदाचित परिपूर्ण नसेलही पण मुळात 'अमेरिका म्हणजे काय बॉ, मज्जाच आहे तुमची' इतकाच विचार करू शकणाऱ्या लोकांना हे वाचून इतका तरी कळेल ना कि इथे आलं म्हणजे सगळं छानच असतं असं नाही. अमेरिकेत काही म्हणता काहीही 'कमी' नाही काही अडचणीच नाही असं विचार करणारे लोक आहेत अजूनही. तेव्हा अशा पुस्तकाचं स्वागतच व्हावं. "तुमचे झगडे वेगळे ... आमचे वेगळे होते " हेच खरं ! या पुस्तकात काय नाही यावर जी चर्चा चालू आहे त्यातूनच कदाचित ते नसलेलं असेल असं एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळेल कुणालातरी :) प्राजू ताई, हे पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं खरं पण अजून हाती आलं नाहीये ... बर झालं लिहिलंत याबद्दल ते ...

विकास 05/11/2009 - 00:54
सर्वप्रथम प्राजूचा लेख आणि पुस्तक परीक्षण नेहमीप्रमाणेच आवडले. पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल. पुस्तक वाचले नसताना त्यावर टिका करणे हे मला पटत नाही म्हणुन खालील स्फूट विचार हे या विषयाशी संबंधीत आहेत इतकेच समजावे. :-) फॉर हीअर टू गो प्रमाणेच त्याच्या बरेच आधी शोभा चित्रे यांचे "गोठलेल्या वाटा" हे पुस्तक भारतातच असताना वाचनात आले होते. त्यातील सूर हा अनिवासी भारतीयाचा होता हा एक मुख्य फरक. पण "टू गो" चे "हीअर" कसे आणि कधी झाले हे समजले नाही असे त्या लेखिकेचे म्हणणे होते. अमेरिकेसंदर्भात अनेक मराठी लेखकांनी लिहीले आहे. त्यात पुल असतील तसेच वपू पण आहेत ज्यांना खड्डे विरहीत रस्ते पाहून अस्वस्थता आली (आणि बर्फानंतर असे वपूंनी कुठे पाहीले हे खड्ड्यातून गाडी चालवताना आम्हाला अस्वस्थता येते ;) ). अनिल अवचटांच्या अमेरिका पुस्तकातील अमेरिका वाचल्यास अमेरिका म्हणजे शिक्षाच वाटेल. वर संदीपने सांगितलेले सामन्स ऑफ नर्मदा वाचलेले नाही पण तसेच त्याचे मराठी पुस्तक वाचले आहे. पण तो वेगळा विषय होईल म्हणून "टेम्प्टेशन" टाळतो. :) तरी थोडक्यात भारताप्रमाणेच ह्यातील प्रत्येकच लेखन हे एका हत्तीचे सात आंधळ्यांनी केलेले वर्णन वाटते. असो. असे जेंव्हा विषय येतात तेंव्हा खेड्यातून शहरात रहायला आलेल्या माणसाच्या मनातील (कोरडी?) व्यथा दाखवणारी बा.सी. मर्ढेकरांची "किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो" ही कविता आठवते. या कवितेच्या नायकाला एकीकडे बालपणचे मोकळे रान, नदीमधे डुंबणे वगैरेने गावाची ओढ लागलेली असते. पण आता सवय गेल्याने "आज अंतरात भिती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी" असे म्हणत शेवटी तो, "बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पार्‍याचा, बरी तोतर्‍या नळाची शिरी धार मुखी ऋचा" असे म्हणत परत कामाला लागतो... थोडक्यात माणूस लहानपणी घडत असताना जे काही अनुभवतो ते जसजसे कामानिमित्ताने अथवा इतर कशाने दुरावते तेंव्हा ह्याच अवस्थेतून जातो. मग कोणी मुंबईत राहून "आमच्या कोकणातील देवगड मधे..." सांगतो तर कोणी बॉस्टनमधे येऊन, "आमच्या भारतात..." सांगतो :-) म्हणलं तर यात गैर काहीच नाही. उद्या आमच्या मुलांनी आमच्यामुळे अथवा स्वतःच्या इच्छेने भारतात आली तर त्यांना अमेरिका, बॉस्टन, ह्युस्टन, बे एरीया वगैरे जे काही "मिस" होईल ते त्यांच्या बालपणातील आठवणीमुळे असेल (तसे ही झालेले पाहीले आहे - पहीली पिढी अमेरिकेत आणि दुसरी पिढी कामाने आणि नंतर आवडल्याने भारतात!). मग अशा पुस्तकांची वर प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे गरज नाहीच आहे का? मला तसे वाटत नाही. कुणाचे उदात्तीकरण होऊ नये या बद्दल मी सहमत आहे पण म्हणून त्यांच्या कथाच येऊ नयेत याच्याशी नाही. किंबहूना मी आत्ताच्या ज्येष्ठ नागरीकांना (घरापासून) सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचे अनुभव लिहून काढा. अनुभव हे काही केवळ प्रसिद्ध व्यक्तीसच आलेले नसतात. ते प्रत्येकालाच येत असतात. मधे येथेच, चतुरंग ने सावरकरांबद्दल (त्याला भेटलेल्याआजोबांबद्दल) लिहीले अथवा स्वातीदिनेश ने तिच्या सासर्‍यांकडून लिहून घेतले तसेच काहीसे... ------------------ बाकी मिभोच्या तेव्हांचे आणि आत्ताचे संदर्भात: भारतीय लोंढे (आडनाव नाही!) येण्याच्या सुरवातीच्या काळात अमेरिका ही तसे मर्यादीत भारतीयांपुरतेच स्थलांतराचे स्थान होती. परीणामी अमेरिकेचे सामान्य भारतीयांना अप्रूपही होते आणि तसे अप्रूप वाढवत ठेवणार्‍यांची सगळेच नसले तरी संख्या देखील होती. कालांतराने, विशेष करून ऐंशीच्या शेवटाला आवक वाढत गेली आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीस तर काय भारतीयांचे माथेरान-महाबळेश्वरला जाण्याप्रमाणे अमेरिकेत अथवा इतर प्रगत, प्रगतशील देशात जाणे वाढले. सर्वच घरोघरी अमेरिकेत गेलेला नसला तरी जवळचा कोणीतरी (२, ३ डिग्री सेपरेशनमधेच) कोणीतरी नक्कीच दिसू लागला. थोडक्यात अमेरिकेचे अप्रूप राहीले नाही. शिवाय झगागाटाशिवाय बाकीच्या वास्तवाचे पण दर्शन होऊ लागले. जाता जात अजून एक ("बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स...," च्या संदर्भात) : दिडदोन वर्षांपूर्वी मॅनहॅटनच्या एका रेस्टॉरंटमधे एका विशेष कार्यक्रमात एक एकदम उमदा दिसणारा तरूण (२५+) मुलगा भेटला. आम्ही गप्पा मारत होतो. एकीकडे व्यवस्थित बोलत होता तर दुसरीकडे अंगभूत माज दिसत होता. स्वतःची भारतातील श्रीमंती सांगत होता. पण स्वतःच्या नावापेक्षा अधिक (आडनावपण) सांगायचे टाळत होता. नंतर टोकल्यावर कळले की मोठ्या राजकारण्यांच्या जवळचा होताच पण आजोबा हे नको त्या काळ्या अध्यायात देशामधे प्रसिद्ध झालेले असल्याने लपवालपवी चालली होती. पण सर्व माज दाखवत असताना देखील शेवटी तुमच्या-आमच्यासारखे व्हिसाच्या लाईनीतच उभे रहावे लागले आणि इथे न्यूयॉर्कमधे नेटवर्कींगने का होईना पण जॉब शोधत बसावे लागले होते...

परीक्षण वाचून "हे पुस्तक वाचलं पाहिजे!" अशी इच्छा निर्माण झाली.... मला वाटतं यातच या परीक्षणाचे यश आहे....

फारएन्ड 05/11/2009 - 06:40
चांगले लिहीले आहे हे परीक्षण, आवडले. मला पुस्तक ही वाचनीय वाटले.

विसोबा खेचर 07/11/2009 - 09:11
उलट आय एम प्राऊड अमेरिकन एण्ड आय रिस्पेक्ट माय इंडीयन रूट्स" असं स्वच्छ सांगणारी कॉन्फ़िडंट वाटली."
अरे वा, छानच! :) तात्या.

एकलव्य 04/11/2009 - 08:08
धावता आढावा आवडला प्राजुताई! "काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." फ़ॉर हिअर ऑर टू गो!! म्हणजे अमेरिकेत राहायचे का भारतात परतायचे (हा म्हटला तर दुखरा आणि म्हटला तर स्वतःची समजूत किंवा फसवणूक करणारा) प्रश्न लेखिकेने मांडला आहे की काय असे वाटले. मराठी एकलव्य

छोटा डॉन 04/11/2009 - 08:15
सुरेख ओळख ...!!१ पुस्तक परिचय आवडला, पुस्तक नक्की वाचेन मिळेल तिकडे.
अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
:) मस्त, हा परिच्छेद आवडला. अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ... असो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

दशानन 04/11/2009 - 08:22
असेच म्हणतो, प्राजु तै. मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by दशानन

प्रभो 04/11/2009 - 09:51
असेच म्हणतो, प्राजु तै. मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

असेच म्हणतो, हे पुस्तक नक्की वाचणार. आपला, (वाचक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by प्रशांत उदय मनोहर

गणपा 04/11/2009 - 13:17
प्राजु ताई छान परिक्षण केलयस. एक चांगलं पुस्तक नजरेस आणुनदिल्या बद्दल आभार.

In reply to by छोटा डॉन

अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ... हेच म्हणते. चुचु

In reply to by छोटा डॉन

शक्तिमान 07/11/2009 - 03:35
अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...
थोड्या फार प्रमाणात ही सर्व ठिकाणे अमेरिकेशीच संबंधित आहेत..

४०-४५ वर्षांपृर्वी गेलेली काय आणि गेल्या १०-१५ वर्षांपूर्वी गेलेली काय.. सगळीजणं स्वखुशीनेच नविन वाटा चोखाळायला गेलेली ना? त्यांची का इतकी कवतिकं? ही असली नको त्यांचा नको तितका उदो उदो करणारी पुस्तकं इथल्या अमेरिका द्वेष्ट्यांच्या हातात कोलित देतात.

विंजिनेर 04/11/2009 - 08:41
चांगला आढावा.. बाकी,
पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
हे आजही तितकंच खरे आहे. आणि मायभुमी सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडणार्‍या प्रत्येक भारतीयाला लागू होतं (अमेरिका/इंग्लंड इ. आंग्लभाषिक देशांशिवाय युरोप/पूर्व आशिया इ. ठिकाणी तर अजूनच) जाता जाता: चांगल्या पुस्तक परि़क्षणाच्या धाग्याचा निवासी वि अनिवासी वादात सापडून विचका होउ नये ही माफक अपेक्षा..

सहज 04/11/2009 - 08:52
पुस्तक वाचले पाहीजे. फॉर हिअर ऑर टू गो!! हा प्रश्न आहे खरा. ह्यावर एक वेगळा धागा सुरु करावा का? :-) बहुतेक एका मिपाकरानी या वेलणकरबाईंची मुलाखत घेतली होती.

मिसळभोक्ता 04/11/2009 - 08:53
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. मिसळपावावरील मालकप्रणीत (आणि बिरूटे, नाना, वगैरे इतर "छोटे" सदस्य प्रतिपादित) अनिवासी भारतीयांविरुद्ध उघडलेल्या आघाडीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे. ह्याला धैर्य लागते. ते धैर्य दाखवल्याविषयी प्राजूताईंचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. इतर लोकांनी, त्यांचा धैर्याच्या बाबतीत कित्ता गिरवावा अशी विनंती करावीशी वाटते. अर्थात, ही विनंती अनिवासी भारतीयाने केली, तर ती फाट्यावर मारण्यात येईल, ह्याची खात्री तेवढीच अधीक वाटते. असो, ते झाल्यावर, मूळ पुस्तक आणि त्यातील व्यक्तिचित्रे ह्याविषयी थोडासा खेद व्यक्त करावासा वाटतो. आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे. बदल, जे सगळीकडे होतात, तसेच इथेही होत आहेत. ह्या बदलांविषयी अधिक लिहायला हवे. ४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही. असे माझे मत आहे, एनी वे. येथे बरेच काका आणि आजोबा "आमच्या वेळी असे नव्हते", "आम्हाला किती झगडावे लागले" असे वारंवार सांगताना मला भेटतात. आणि मी आमच्या झगड्यांची इथ्थंभूत यादी दिल्यावर गप्प बसतात. त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. ते आलेत त्यावेळी, स्वतःच्या आकांक्षा दडपून टाकणारी व्यक्ती इथल्या लोकांना दिसली. अम्ही आलोत, त्यावेळी, त्यांच्या पोटावर पाय येणार ह्याची त्यांना जाणीव झाली. एवढा मोठ्ठा फरक लेखिकेला दिसू नये, ह्याचा खेद होतो. बाकी पुस्तक बरे आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

विकास 04/11/2009 - 11:09
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. ...त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे. कौतुक वाटायचे कारण: एक अमेरिकेचे कौतुक असलेल्या पुस्तकाचे कौतुक आणि तेही ज्या "वेलणकर" नामक व्यक्तीने लिहीलेल्या! ;) असो. बाकी गंभीर प्रतिसाद सकाळी...

In reply to by मिसळभोक्ता

प्राजु 04/11/2009 - 19:53
आपण म्हणताहात ते खरे असेलही. पण.. ४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही. मी अशी तुलना कुठेच नाही केलेली. या पुस्तकात मला दिसले ते, मूळासकट उपटलेले रोपटे नव्या जमीनीत पुन्हा तग धरून राहिले आणि त्याचा वृक्ष झाला.. असे ज्यांच्याबद्दल म्हणावे अशी लोकं. काही १९४८ च्या गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर.. तर काही भष्टाचारला कंटाळलेली तर काही शिक्षणव्यवस्थेतल्या आरक्षणांना. जी जशी दिसली तशी रेखाटली गेलेली आहेत. कदाचित आपण म्हणता तशी मी पुस्तकाचा अभ्यास करण्यात कमी पडले असेन. मी एकाच बाजूने विचार केला असल्याची शक्यताही आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

In reply to by प्राजु

गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर..
गांधी वध ह्या शब्दयोजनेवर आक्षेप नोंदवत आहे. गांधी हत्या म्हंटले गेले पाहिजे.

In reply to by निमीत्त मात्र

प्राजु 04/11/2009 - 20:42
माफ करा... माझे शब्द मागे घेते. गांधी हत्येनंतर हेच योग्य आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

In reply to by मिसळभोक्ता

श्री मिसळभोक्ता यांच्याशी सहमत. अपर्णा वेलणकर या लोकमतच्या उपसंपादक असतांना मी त्यांना ओळखत असे. त्यांना अनिवासी भारतीयांविषयी कौतुकमिश्रित कुतुहल असल्याचे माहीत असल्याने या पुस्तकाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत असा माझा समज झाला आहे. (अपर्णा वेलणकर यांनी शोभा डे यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला होता व मूळच्याच टूकात पुस्तकाचा आणखी टूकार अनुवाद वाचवला गेला नव्हता, हे आठवते.) श्री मिसळभोक्ता म्हणतात त्याप्रमाणे 'बरेच काका आणि आजोबा' त्यांच्या धडपडींचे पुराण सुरू करतात. एखाद्या नवीन देशात येऊन तेथे स्थिरस्थावर होणे हा अनुभव जरी व्यक्तिगत समाधान देत असला तरी हा अनुभव एका वीराचे स्वगत म्हणून सांगणे हे इतरत्र 'काका-आजोबा' करतात त्याप्रमाणेच आहे. हे लोक आले तेव्हा सुशिक्षित होते, यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती तसेच स्पर्धेचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. थोडक्यात या लोकांच्या आर्थिक प्रगतीस मोठ्या प्रमाणात वाव होता. त्यांची व आजकाल येत असलेल्या भारतीयांची तुलना करणे योग्य नाही. आजकाल येणार्‍यांनी प्रवासवर्णनाचे क्षेत्र समृद्ध(?) केले आहे. (डिजिटल कॅमेर्‍याने तर या लिखाणाला फारच बरकत आणली.) कौशल्य नसतांना, इंग्रजी भाषेचा गंधही नसतांना, आफ्रिकेतून हाकलून दिलेले गुजराथी काका-आजोबा जेव्हा मॅटर ऑफ फॅक्टली आपले अनुभव सांगतात तेव्हा मराठी काका-आजोबांचे रिस्क अ‍ॅव्हर्स अनुभव फारच दुबळे वाटतात, प्रेरणा तर अजिबातच देत नाहीत. टीप: प्राजुतैंचे परीक्षण चांगले झाले आहे, त्यांच्या परीक्षणाबाबत वरील प्रतिसाद नाही. अवांतर: श्री मिसळभोक्ता यांनी पाच ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद लिहिल्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. (आधीही लिहिले असतील पण हा विशेष गंभीरपणाने लिहिला आहे, हे विशेष.)

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 05/11/2009 - 03:10
परीक्षण आवडले. आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे. हे बर्‍यापैकी सरसकट विधान आहे. पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे. पुस्तकामधे अनेक दोष असतील परंतु उपर्युक्त दोष त्यात नाही हे खचित. माझ्या दृष्टीने , पुस्तकातली पाल्हाळिक भाषा हा एक दोष आहे. अनेक मुद्दे जे सरळसोटपणे मांडता येतात त्यापायी काहीसे आख्यान लावल्यासारखे. (याची प्रचिती प्राजु यानी करून दिलेल्या पुस्तकाच्या ओळखीतल्या उतार्‍यामधे येते. आणि श्री. दिलीप चित्रे यांची प्रस्तावना याच दोषामधे अडकल्यासारखे मला वाटले. ) दुसरा दोषच म्हणायचा तर असे म्हणता येईल की हा जो दस्तावेज आहे त्याचे स्वरूप "अ‍ॅनेक्डोटल" (मराठी शब्द) आहे. अमेरिकेतल्या लायब्ररीमधे अशी शेकड्याने पुस्तके मिळतात की ज्यामधे (उदाहरणार्थ) वीस च्या दशकात बोटीने न्युयॉर्क ला आलेल्या लोकांच्या जीवनमानाचे , त्यांच्यातल्या शारिरीक बदलांचे स्टॅटिस्टीक्स मांडलेले असते. त्यातून काही मार्मिक व ठोस असे निष्कर्ष काढलेले दिसतात. हे सारे किचकट आहे पण दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने अनमोल. या पुस्तकाचे स्वरूप किस्सेवजा बनते. आकडेवारीचा मागमूस नाही. अर्थात लेखिकेचा तो उद्देश नसावा. पुस्तकाची जमेची बाजू ही, की त्यामधे अनेक पैलूंचा धांडोळा घेतला गेला आहे. यशाबरोबर अपेशाची नोंद घेतली गेली आहे. एकच एक दृष्टीकोन, पूर्वग्रहदूषित अनुमाने यांना टाळण्यात पुरेसे यश आलेले आहे. पुस्तक थोडे "रगेड" (मराठी शब्द) हवे होते असे मला वाटले इतपतच.

In reply to by मुक्तसुनीत

मिसळभोक्ता 05/11/2009 - 13:47
पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे श्री. सुनीत, माझे विधान पुन्हा एकदा वाचा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. (आणि नंतर विपर्यस्त, दिशाभूल असे शब्द वापरण्याविषयी पुन्हा एकदा विचार करा.) - निश्चय केळामात्रे

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 05/11/2009 - 18:32
प्रस्तुत पुस्तकात सर्वाना एकाच कॅटेगरीत टाकण्याबद्दल तुम्हाला जे वाटते त्याचे तुम्ही दाखले द्यावेत. पुस्तकाबद्दलच्या माझ्या आकलनानुसार , तुमचे विधान मला चुकीचे वाटले. मी तसे म्हणालो. तुम्ही तुमची बाजू सप्रमाण सिद्ध करा. मी आनंदाने मुद्दा मान्य करेन. - दर्शन हेळामात्रे.

In reply to by मुक्तसुनीत

श्री सुनीत, आनंदीबाई १८८३ मध्ये अमेरिकेत आल्या आणि १८८६ मध्ये भारतात परतल्या. पुस्तक वाचले नसल्याने आनंदीबाई व साठीच्या दशकात आलेल्या भारतीयांमध्ये काही समान सूत्र (अमेरिकेत येणे याखेरीज) लेखिकेने दाखवले आहे काय? याविषयी कृपया माहिती द्यावी.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

मुक्तसुनीत 05/11/2009 - 21:01
पुस्तकामधे आनंदीबाई जोशी, डॉ. केतकर यांचे उल्लेख आहेत. त्यांच्या सारख्या लोकांची अमेरिकायात्रा म्हणजे ज्ञानार्जनासाठी अज्ञात प्रदेशामधे , दळणवळणाची नि संप्रेषणाची साधने उपलब्ध नसताना केवळ हिमतीच्या जोरावर केलेले असामान्य प्रवास अशा अर्थाचे वर्णन लेखिका करते ; जे माझ्या मताने अगदी योग्य आहे. अमेरिकेची दारे महायुद्धानंतर किलकिली झाली नि साठीच्या दशकाच्या सुरवातीला तर ती सताड उघडली. याच घटनेच्या सुमाराला , भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला पंधराएक वर्षे उलटल्यानंतर, भारतातल्या नवीन वास्तवाबद्दल ज्यांचा भ्रमनिरास झाला ती पीढी अमेरिकेकडे वळली. "ब्रेन ड्रेन" हा शब्द १९६५ च्या सुमारास अस्तित्त्वात आला. तर , या पीढीमधे जे लोक इथे आले त्यांचा प्रवास , त्यांन्ची आयुष्ये, त्यांची यशापयशे , त्यांचे तिढे नि प्रश्न याबद्दल हे पुस्तक आहे. हा सगळा लेखाजोखा घटनाक्रमानुसार सविस्तर मांडला गेला आहे. भूमिका नीट विशद केली गेली आहे. नव्वदीच्या नि त्यानंतरच्या लोकांची ही स्टोरी नाही. तसा कुठे उल्लेखही नाही.

In reply to by मुक्तसुनीत

श्री सुनीत, तसे असल्यास धन्यवाद. श्री मिसळभोक्ता यांच्याकडून एकाच कॅटेगरीत कसे टाकले आहे याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

सुधीर काळे 04/11/2009 - 08:58
माझ्या सौ.ने हे पुस्तक वाचले आहे, मी अद्याप वाचायचे आहे. पण त्यातल्या "म्हातारपणी तिथं रहायचं कीं परत यायचं" या विषयाची चर्चा तिला खूप आवडली व "थेट उपयुक्त" वाटली. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

चित्रा 04/11/2009 - 10:10
पुस्तकाविषयी घरातल्यांकडून ऐकलेले आहे, पण आधी वाचावेसे वाटले नाही हे कबूल करते. एकतर अनिवासी भारतीय म्हणून अशा पुस्तकांमधील काही गोष्टी जरा अधिक भिडतात, काही तितक्याश्या रूचत नाहीत, यामुळे इच्छा झालेली नाही. पण प्राजूचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटते आहे. त्यामुळे पुस्तक परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद. तरी काही गोष्टी अपर्णा वेलणकरांना खरेच समजल्या आहेत का असे वाटले (त्यासाठी अर्थातच पुस्तक वाचावे लागेल) . जसे - "ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते." काम चांगलं असण्याशी (निदान सद्य परिस्थितीत) मोबदल्याचा संबंध फारसा लावू नये! (उदा. मागच्या वर्षी ज्यांना भरपूर कामाचे भरपूर मोबदले मिळत होते अशा गृहकर्ज आणि विम्याच्या कंपन्यांतील मोठ्या पदांवरचे लोक नक्की काय चांगले काम करीत होते? आणि किती वर्षे असे काम ते करीत होते? ) बाकी डॉनराव म्हणतात ते योग्य, की तुमच्या परिघाबाहेर पडल्यावरच (मग ती गल्ली असो, की गाव किंवा राज्य किंवा देश) तुमच्यातील शक्तींची तुम्हाला जाणीव होते. त्या शक्ती असतातच, त्या परदेश जागृत करतो एवढेच. परदेशात आल्यानंतर जाणवलेल्या अतिशय एकाकीपणापासून ते गलबल्यापर्यंतचा प्रवास हा खूप ठेचकाळत झालेला असू शकतो. (त्यातही नंतर मजा वाटते, पण त्याबद्दल अमेरिका अशी काही वेगळी काढण्याचे कारण नाही, हे स्थलांतरितांचे कुठेही गेले तरी प्रश्न असावेत). मिसळभोक्ता म्हणतात "४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही." बरोबर आहे, त्यांची एकास एक नग म्हणून (क्वालिटेटिव्ह) तुलना करू नये. पण येथे स्थलांतरित झालेल्या समूहात त्यांचेही स्थान आहे हे विसरू नये. त्यांची अमेरिकेत येण्याची आकांक्षा ही एकाच उद्देशाने प्रेरित झालेली नसली तरी ती किमान एकाच धगीची आहे हे मान्य करायला हरकत नाही. समूहाचा विचार करताना सगळ्या प्रकारच्या नगांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे मला वाटते.

सुनील 04/11/2009 - 10:24
चांगले परीक्षण. मिभो आणि चित्रा यांचे प्रतिसादही उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 04/11/2009 - 10:27
विषय रोचक आहे.. परिक्षणही नेटके आणि उत्सुकता वाढवणारे आहे. पुस्तक हातात पडलं तर वाचेनच.. आभार शेवटी अश्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने स्वतःच्या प्रायोरिटीजनुसार शोधावीत हे उत्तम ऋषिकेश ------------------

विजुभाऊ 04/11/2009 - 10:28
परदेशी जाणारे बहुतेक जण तेथे सर्व्हाईव्ह होण्याच्या धडपडीत असतात. मिळेल ते काम करायची त्यांची तयारी असते. मला कौतूक वातते ते कॅनडा / न्यूझीलंड येथे स्थाईक होणारांचे. नोकरीची कसलीही व्यवस्था नसताना ते तेथे जातात धडपड करतात आणि सुस्थितीत येतात. भारतात इतरत्र रहाणे आणि यूरोप अमेरीकेत रहाणे यात मुख्य फरकाहे तो रंगभेदाचा. भारतात या समस्येला आपल्याला फारसे तोंड द्यावे लागत नाही. रंगभेद समस्या अमेरीकेत नाहीच मुळी असेही नाही. इथून गेलेले लोक त्याला तोंड देत असतील तेथे जम बसवतात. हे कौतुकास्पद नाही का? परदेशी गेलेले लोक तेथे पैसे कमवायलाच गेलेले असतात. बर्‍यापैकी उत्तम जीवन जगायला गेलेले असतात. त्यांची धडपड यशस्वी होते याची असूया एतद्देशियानी का बाळगावी. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

ज्ञानेश... 04/11/2009 - 10:35
मला वाटते, लोकसत्ता 'चतुरंग' मधेही या पुस्तकाचे परीक्षण आले होते. वाचले पाहिजे एकदा! "Great Power Comes With Great Responsibilities"

पक्या 04/11/2009 - 12:51
पुस्तक ठीकठाक आहे. एवढे काही खास नाहिये. मागच्या पिढीतील किंवा आपल्या आजोबांच्या पिढीतील लोकांविषयी जास्त लिहीले आहे ...असे लोक की ते आता अमेरिकामध्ये व्यवस्थीत स्थिरस्थावर झाले आहेत. 'फॉर हिअर ऑर टू गो ?' हा प्रश्न सध्या आपल्या सारख्या पिढीतील लोकांना नेहमी भेडसावत असतो त्यां लोकांबद्द्ल, त्यांच्या झगडण्याबद्द्ल , त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्द्ल लेखिकेने खूपच कमी (किंबहुना नाहिच) लिहिले आहे. तरी बरंय, लेखिका या दशकातच अमेरिका हिंडली आणि लोकांचे अनुभव गोळा केले. तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही. पण ४०-४५ वर्षापूर्वी जे लोक अमेरिका मध्ये स्थलांतरीत झाले त्यांच्या अनुभवाविषयी , झगडण्याविषयी वाचायचे असेल तर अवश्य वाचावे.

In reply to by पक्या

>> तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक जे लोक साठच्या दशकात किंवा त्याच्या आसपास प्रामुख्याने अमेरिकेत आले त्या पिढीबद्दल आहे.

प्राजु तै एकदम छान ओळख करुन दिली आहेस ग. तुझे लेखन आधीच सुंदर आहे त्यात अजुन एका सुंदर लेखनाची ओळख करुन दिली आहेस म्हणजे अगदी दुधात साखर वगैरे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

अमोल केळकर 04/11/2009 - 13:34
मस्त पुस्तक आहे. ओळख करुन दइल्याबद्दल धन्यवाद अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पुस्तक परिक्षण चांगलं लिहिलं आहेस प्राजु. एकूण पुस्तक लिहिण्यासाठी अपर्णा वेलणकरांनी बरेच कष्ट घेऊन माहिती गोळा केली आहे. काही अपवादाचे भाग वगळता मलाही पुस्तक आवडलं. >> त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. एकदम बरोब्बर बोलालास मिभो ! 'फॉर हिअर्....'मधे आदराने उल्लेख केल्या गेलेल्या आमच्या एका स्नेहींनी मला एग्झॅक्टली हेच वाक्य सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "अरे, आमचे झगडे वेगळे होते. तुमचे झगडे वेगळे आहेत." --------- योगायोगाने मी 'फॉर हिअर्...'नंतर काही दिवसांत लगेच जे पुस्तक वाचायला घेतलं ते म्हणजे 'सामन्स ऑफ नर्मदा' (Salmons of Narmada). डॉ. भूषण केळकर ह्याने NRI व्यक्तींकडून मागवलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. फक्त फरक इतकाच की इथे NRI म्हणजे Nest Returned Indians ! जे अनिवासी भारतीय काही वर्षे भारताबाहेर राहिले आणि मग काही ना काही कारणाने कायमचे भारतात परतले त्यांनी स्वत:च्या अनुभवांबद्दल लिहिलेले हे लेख आहेत. माझ्या माहितीप्रमाणे भारतात हे पुस्तक सहज उपलब्ध असावं.

चतुरंग 04/11/2009 - 21:40
स्थलांतर आणि झगडा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्थलांतर कुठून कुठे होते त्यावर त्या झगड्याचा प्रकार आणि तीव्रता ठरते. शिवाय ते कुठल्या काळात झाले आहे ह्यावरही त्याचे मूल्यमापन करावे लागेल. वरती मिभो म्हणतात तसे ४०-४५ वर्षांपूर्वी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. संधी, स्पर्धा ह्यांची गणितं आजच्या काळापेक्षा वेगळी होती. गेल्या १५-२० वर्षात इकडे आलेल्या लोकांना चढत्या क्रमाने स्पर्धा, संधींची उपलब्धता, वीसा वगैरे तांत्रिक बाबींचे सतत बदलणारे नियम इ. ना तोंड द्यावे लागले असणार. सगळ्यांना एकाच पारड्यात मोजणे अयोग्य ठरेल. मानसिक पातळीवरचा झगडा तर अनिवार्यच असतो. एकूणच स्थलांतर ह्या विषयाबाबत वेलणकरबाई किती खोल पाण्यात आहेत आणि पुस्तकाचा एकूण वकूब कसा असेल ह्याबद्दल मी साशंक आहे, तरीही चाळून बघायला हरकत नाही. चतुरंग

मस्तानी 04/11/2009 - 22:11
पुस्तक कदाचित परिपूर्ण नसेलही पण मुळात 'अमेरिका म्हणजे काय बॉ, मज्जाच आहे तुमची' इतकाच विचार करू शकणाऱ्या लोकांना हे वाचून इतका तरी कळेल ना कि इथे आलं म्हणजे सगळं छानच असतं असं नाही. अमेरिकेत काही म्हणता काहीही 'कमी' नाही काही अडचणीच नाही असं विचार करणारे लोक आहेत अजूनही. तेव्हा अशा पुस्तकाचं स्वागतच व्हावं. "तुमचे झगडे वेगळे ... आमचे वेगळे होते " हेच खरं ! या पुस्तकात काय नाही यावर जी चर्चा चालू आहे त्यातूनच कदाचित ते नसलेलं असेल असं एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळेल कुणालातरी :) प्राजू ताई, हे पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं खरं पण अजून हाती आलं नाहीये ... बर झालं लिहिलंत याबद्दल ते ...

विकास 05/11/2009 - 00:54
सर्वप्रथम प्राजूचा लेख आणि पुस्तक परीक्षण नेहमीप्रमाणेच आवडले. पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल. पुस्तक वाचले नसताना त्यावर टिका करणे हे मला पटत नाही म्हणुन खालील स्फूट विचार हे या विषयाशी संबंधीत आहेत इतकेच समजावे. :-) फॉर हीअर टू गो प्रमाणेच त्याच्या बरेच आधी शोभा चित्रे यांचे "गोठलेल्या वाटा" हे पुस्तक भारतातच असताना वाचनात आले होते. त्यातील सूर हा अनिवासी भारतीयाचा होता हा एक मुख्य फरक. पण "टू गो" चे "हीअर" कसे आणि कधी झाले हे समजले नाही असे त्या लेखिकेचे म्हणणे होते. अमेरिकेसंदर्भात अनेक मराठी लेखकांनी लिहीले आहे. त्यात पुल असतील तसेच वपू पण आहेत ज्यांना खड्डे विरहीत रस्ते पाहून अस्वस्थता आली (आणि बर्फानंतर असे वपूंनी कुठे पाहीले हे खड्ड्यातून गाडी चालवताना आम्हाला अस्वस्थता येते ;) ). अनिल अवचटांच्या अमेरिका पुस्तकातील अमेरिका वाचल्यास अमेरिका म्हणजे शिक्षाच वाटेल. वर संदीपने सांगितलेले सामन्स ऑफ नर्मदा वाचलेले नाही पण तसेच त्याचे मराठी पुस्तक वाचले आहे. पण तो वेगळा विषय होईल म्हणून "टेम्प्टेशन" टाळतो. :) तरी थोडक्यात भारताप्रमाणेच ह्यातील प्रत्येकच लेखन हे एका हत्तीचे सात आंधळ्यांनी केलेले वर्णन वाटते. असो. असे जेंव्हा विषय येतात तेंव्हा खेड्यातून शहरात रहायला आलेल्या माणसाच्या मनातील (कोरडी?) व्यथा दाखवणारी बा.सी. मर्ढेकरांची "किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो" ही कविता आठवते. या कवितेच्या नायकाला एकीकडे बालपणचे मोकळे रान, नदीमधे डुंबणे वगैरेने गावाची ओढ लागलेली असते. पण आता सवय गेल्याने "आज अंतरात भिती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी" असे म्हणत शेवटी तो, "बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पार्‍याचा, बरी तोतर्‍या नळाची शिरी धार मुखी ऋचा" असे म्हणत परत कामाला लागतो... थोडक्यात माणूस लहानपणी घडत असताना जे काही अनुभवतो ते जसजसे कामानिमित्ताने अथवा इतर कशाने दुरावते तेंव्हा ह्याच अवस्थेतून जातो. मग कोणी मुंबईत राहून "आमच्या कोकणातील देवगड मधे..." सांगतो तर कोणी बॉस्टनमधे येऊन, "आमच्या भारतात..." सांगतो :-) म्हणलं तर यात गैर काहीच नाही. उद्या आमच्या मुलांनी आमच्यामुळे अथवा स्वतःच्या इच्छेने भारतात आली तर त्यांना अमेरिका, बॉस्टन, ह्युस्टन, बे एरीया वगैरे जे काही "मिस" होईल ते त्यांच्या बालपणातील आठवणीमुळे असेल (तसे ही झालेले पाहीले आहे - पहीली पिढी अमेरिकेत आणि दुसरी पिढी कामाने आणि नंतर आवडल्याने भारतात!). मग अशा पुस्तकांची वर प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे गरज नाहीच आहे का? मला तसे वाटत नाही. कुणाचे उदात्तीकरण होऊ नये या बद्दल मी सहमत आहे पण म्हणून त्यांच्या कथाच येऊ नयेत याच्याशी नाही. किंबहूना मी आत्ताच्या ज्येष्ठ नागरीकांना (घरापासून) सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचे अनुभव लिहून काढा. अनुभव हे काही केवळ प्रसिद्ध व्यक्तीसच आलेले नसतात. ते प्रत्येकालाच येत असतात. मधे येथेच, चतुरंग ने सावरकरांबद्दल (त्याला भेटलेल्याआजोबांबद्दल) लिहीले अथवा स्वातीदिनेश ने तिच्या सासर्‍यांकडून लिहून घेतले तसेच काहीसे... ------------------ बाकी मिभोच्या तेव्हांचे आणि आत्ताचे संदर्भात: भारतीय लोंढे (आडनाव नाही!) येण्याच्या सुरवातीच्या काळात अमेरिका ही तसे मर्यादीत भारतीयांपुरतेच स्थलांतराचे स्थान होती. परीणामी अमेरिकेचे सामान्य भारतीयांना अप्रूपही होते आणि तसे अप्रूप वाढवत ठेवणार्‍यांची सगळेच नसले तरी संख्या देखील होती. कालांतराने, विशेष करून ऐंशीच्या शेवटाला आवक वाढत गेली आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीस तर काय भारतीयांचे माथेरान-महाबळेश्वरला जाण्याप्रमाणे अमेरिकेत अथवा इतर प्रगत, प्रगतशील देशात जाणे वाढले. सर्वच घरोघरी अमेरिकेत गेलेला नसला तरी जवळचा कोणीतरी (२, ३ डिग्री सेपरेशनमधेच) कोणीतरी नक्कीच दिसू लागला. थोडक्यात अमेरिकेचे अप्रूप राहीले नाही. शिवाय झगागाटाशिवाय बाकीच्या वास्तवाचे पण दर्शन होऊ लागले. जाता जात अजून एक ("बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स...," च्या संदर्भात) : दिडदोन वर्षांपूर्वी मॅनहॅटनच्या एका रेस्टॉरंटमधे एका विशेष कार्यक्रमात एक एकदम उमदा दिसणारा तरूण (२५+) मुलगा भेटला. आम्ही गप्पा मारत होतो. एकीकडे व्यवस्थित बोलत होता तर दुसरीकडे अंगभूत माज दिसत होता. स्वतःची भारतातील श्रीमंती सांगत होता. पण स्वतःच्या नावापेक्षा अधिक (आडनावपण) सांगायचे टाळत होता. नंतर टोकल्यावर कळले की मोठ्या राजकारण्यांच्या जवळचा होताच पण आजोबा हे नको त्या काळ्या अध्यायात देशामधे प्रसिद्ध झालेले असल्याने लपवालपवी चालली होती. पण सर्व माज दाखवत असताना देखील शेवटी तुमच्या-आमच्यासारखे व्हिसाच्या लाईनीतच उभे रहावे लागले आणि इथे न्यूयॉर्कमधे नेटवर्कींगने का होईना पण जॉब शोधत बसावे लागले होते...

परीक्षण वाचून "हे पुस्तक वाचलं पाहिजे!" अशी इच्छा निर्माण झाली.... मला वाटतं यातच या परीक्षणाचे यश आहे....

फारएन्ड 05/11/2009 - 06:40
चांगले लिहीले आहे हे परीक्षण, आवडले. मला पुस्तक ही वाचनीय वाटले.

विसोबा खेचर 07/11/2009 - 09:11
उलट आय एम प्राऊड अमेरिकन एण्ड आय रिस्पेक्ट माय इंडीयन रूट्स" असं स्वच्छ सांगणारी कॉन्फ़िडंट वाटली."
अरे वा, छानच! :) तात्या.
फ़ॉर हिअर ऑर टू गो!! जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?" मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं?

गार्गी अजून जिवंत आहे...

ऋषिकेश ·

सुनील 25/10/2009 - 06:39
एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत 25/10/2009 - 07:13
एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे अभिनंदन. आपल्या सुखवस्तू आयुष्यातल्या विवंचनांचे विचार हरघडी आपल्या डोक्यात असतात. या संदर्भात गुलाबबाईंसारख्यांच्या कहाण्या निव्वळ स्फूर्तिदायकच नव्हेत, तर आपल्या विवंचनासुद्धा किती चैनीच्या आहेत याची जाणीव करून देणार्‍या आहेत. आठलेकरानी टिपिकल "रॅग्स टू रिचेस" स्टोरीऐवजी या अशा , अशक्यप्राय लढाईची कहाणीची निवड करावी यात बरेच काही आले. स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे. सरतेशेवटी एक अवांतर : माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. माझ्या मिसळपावकर मित्रमैत्रिणीनो , थोडा विचार करायला हवाय आपण सार्‍यानी. मी हा मुद्दा मागेसुद्धा मांडलाय नि सगळ्यांचे ताशेरे ऐकले आहेत. तरीसुद्धा इथे तुमचे लक्ष वेधवतो. मौजमजा आहेच ; थोडी ऊर्जा इथेदेखील खर्च होऊ देत.

In reply to by मुक्तसुनीत

शाहरुख 25/10/2009 - 08:42
माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार.
उर्जा खर्च करायचे आवाहन केलंय म्हणून, प्रतिसाद नाही म्हणून धागा दुर्लक्षित असं थोडीच आहे ? पुस्तकाची नोंद घेण्यात आली आहे.

In reply to by शाहरुख

Nile 25/10/2009 - 11:46
खर तर वाद घालायचा नाही आहे पण, तुमचं वैयक्तीक दुर्लक्ष नसेल पण म्हणुन तुम्ही दुर्लक्ष नाही असं कसं म्हणु शकता? :) असो, भावनाओं को समझो इतकाच इशारा, पुर्णविराम. :)

In reply to by मुक्तसुनीत

मस्त कलंदर 25/10/2009 - 10:10
एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे आभार!!! स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे. पुस्तक नक्कीच वाचायला हवे!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 25/10/2009 - 21:46
धागा दुर्लक्षित आहे असे जरी नसले तरी प्रतिक्रिया देऊन त्यावर मत व्यक्त झाले नाही तर तो मागे पडून दुर्लक्षिला जाऊ शकतो कारण मागील पाने धुंडाळून वाचण्याइतका उत्साह राहीलच ह्याची खात्री नसते (निदान माझे हल्ली बर्‍याचदा असे होते.) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

मिसळभोक्ता 26/10/2009 - 22:18
माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. मुसुशेठ, सॉरी बरं का ! ऋष्या काहीतरी वैचारिक वगैरे लिहिणार आहे, असे कळले असते, तर आम्ही गप्पच बसलो असतो. ह्या ऋष्याची रेषेखालच्या अक्षरांच्या सिद्धहस्त लेखकांशी ओळख करून द्या ना ! तिसर्‍या अंकात तरी बिचार्‍याची वर्णी लागेल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 27/10/2009 - 01:41
तुम्ही किंवा इतर कुणीही "गप्प बसावे" असा माझ्या अवांतरातून एक अर्थ निघत असेल तर मला तसे म्हणायचे नव्हते. कुणी काय लिहावे नि लिहू नये याबद्दल मला काहीही म्हणायचे नव्हते. माझा (त्यावेळचा) प्रतिसाद लिहिताना , त्यावेळी काही तास जुने असलेल्या दोन धाग्यांची तुलना सहज केली आणि त्यातून जे वाटले ते लिहिले. जो जे वांच्छिल तो ते लिहो असे पुलस्वामीच म्हणून गेले आहेत.

विंजिनेर 25/10/2009 - 07:30
पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच.
आई गं... कल्पने बाहेरचं आहे. बाकी परि़क्षण चांगले झाले आहे.

विसोबा खेचर 25/10/2009 - 07:42
एका वेगळ्याच पुस्तकाचा सुंदर परिचय! ऋष्या, तुझं कौतूक वाटतं..
आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं.
हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मिसळभोक्ता 26/10/2009 - 22:19
हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं! ह्या मनूमुळे हिंदु लोकांचे खूप नुकसान झाले आहे, हे खरेच. मनु हा भिकारचोट ! आणि सनातनी मनुवादी शंभर भिकारचोट ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज 25/10/2009 - 08:02
वाह! काय प्रभावी परिक्षण आहे. गुलाबबाईंचे आयुष्य एक जबरदस्त आवेग दिसतो आहे. वाचले पाहीजे असे पुस्तक! धन्यु ऋषिकेश!

ऋषी, पुस्तकाची ओळख भारी करुन दिली. गुलाबबाईची कहाणी तर कुछ औरच. ''...आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं" हे खरं तत्त्वज्ञान...!!! -दिलीप बिरुटे

वेताळ 25/10/2009 - 08:51
अजुनही समाज बदलला नाही. स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यास सरकार जिथे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अपयशी ठरले आहे,तिथे उत्तरप्रदेशाची कल्पनाच करवत नाही.लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान प्रत्येकाने आसपास त्या बद्दल लोकांचे मतर्परिवर्तन गरजेचे आहे.शिक्षित जोडपी देखिल मुलगी आहे समजल्यावर दु:खी होतात त्याचा तर खुप राग येतो. पुस्तकाचा परिचय करुन दिल्याब द्दल आभार. वेताळ

In reply to by वेताळ

" तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो" : गुलाबबाई कोणीही कोणाचीही मानसीकता बदलू शकत नाही.... आणि मतपरिवर्तन काय करणार? स्त्रियांच सक्शमीकरण आणि सबलीकरण महत्वाचं... कोणी त्या साठी काही करत असेल तर बोला.....

प्रदीप 25/10/2009 - 10:43
एका वेगळ्याच विषयावरील पुस्तकाची ऋषिकेशने ओळ्ख जबरदस्त करून दिलेली आहे, त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद. मंगला आठलेकरांचे दळवींवरील सुंदर पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यांच्या लेखनाविषयी माझ्या मनात आदरच होता व तो सदर लेखाने द्विगुणितच झाला असे मी म्हणेन. परंतु आताही उत्तरेत वास्तव इतके भीषण आहे, की सुमारे ८० -९० वर्षांपूर्वी एका स्त्रीस समाजाची इतकी एकल टक्कर घेता आली, आणी तीही यशस्वी, ह्याबद्दल खरोखरीच माझ्या मनात संभ्रम आहे. अगदी आजही, स्त्रीच काय, पण पुरूषसुद्धा तेथील बुरसटलेल्या व जमिनदारांच्या झुंडशाहीने व्यापलेल्या समाजात काहीही आगळे वेगळे करण्याची हिंम्मत दाखवू शकत नाहीत. तेव्हा हे सगळे जसे इथे वर्णित केलेले आहे, तसेच प्रत्यक्षात घडले असेल, तर ते एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. कदाचित ह्याविषयी पुस्तकात सविस्तर वर्णने आलेली असावीत, व ऋषिकेशने विस्तारभयास्तव त्याविषयी त्याच्या लेखात काही फारसे लिहीले नसावे. स्वातंत्र्याविषयी गुलाबाबाईंची मते पूर्णपणे पटणारी आहेत. " मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं". हे जितके व्यक्तिसमूहाविषयी खरे आहे, तितकेच ते देशाविषयीही आहेच. बाग्लादेश व इ. तिमोर ही अलिकडची ह्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ दोन ठसठशीत उदाहरणे आहेत. जाता जाता: उत्तर प्रदेशातीलच एका दलिताने लिहीलेल्या 'मेरा बचपन, मेरे कंधोंपर' ह्या आत्मकथनातून मी वर वर्णिलेल्या विदारक समाजव्यवस्थेचे चित्रण झाले असावे, असे वाटते. ' असे वाटते' म्हणण्याचे कारण हे की ह्या पुस्तकाचा परिचय रेखा देशपांडेंनी फारच विस्कळीत स्वरूपात केला आहे. ह्या पाश्वभूमिवर ऋषिकेशचा नेमक्या शब्दांत लिहीलेला हा लेख उठून दिसतो.

दशानन 25/10/2009 - 11:01
>>पुस्तकाची अत्यंत प्रभावी आणि सुयोग्य ओळख करून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, ऋषिकेश! असेच म्हणतो, छान माहीती. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

प्रमोद देव 25/10/2009 - 11:51
पुस्तक खरंच वाचनीय आहे आणि ऋषिकेशने अतिशय समर्थपणे त्याचा परीचय करून दिलाय. ======= कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्याबद्दलची गुलाबबाईंची मतं खूपच पटली; 'डोर' या चित्रपटातील एक पात्र (नाव विसरले, आयेशा टाकियाने काम केलं आहे ते) याच अर्थाचं काहीसं वाक्य म्हणते तेव्हा तेही तेवढंच पटतं. पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार. अदिती

क्रान्ति 25/10/2009 - 21:28
परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. धन्यवाद ऋषिकेश. अगदी अवश्य वाचणार पुस्तक. क्रान्ति अग्निसखा

चतुरंग 25/10/2009 - 21:42
करुन दिल्याबद्दल ऋषिकेशचे आभार. गुलाबबाई एकूण क्रांतिकारी व्यक्तिमत्व दिसते आहे. जगावेगळी वाटचाल करताना रूढींच्या निवडुंगांचे फड तुडवत, वेळप्रसंगी कापून काढत, जावेच लागते आणि त्याच्या काट्यांनी रक्तबंबाळ झालेला जीव मग काही अलौकिक घडवतो! सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते ते अशा ठिकाणी पटतेच पटते. नक्कीच मिळवून वाचावे अशा पुस्तकांच्या यादीत समाविष्ट! चतुरंग

भाजीपाव 26/10/2009 - 02:46
सुंदर परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. .... धन्यवाद ऋषिकेश :)

सन्दीप 26/10/2009 - 17:16
परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे.पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार.धन्यवाद ऋषिकेश . सन्दीप

स्वाती२ 26/10/2009 - 17:21
सुरेख पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. मागे कधीतरी आईने सांगितले होते या गुलाबबाईंबद्दल. आता पुस्तक मिळवून नक्की वाचणार.

प्राजु 27/10/2009 - 08:10
सुरेख पुस्तक ओळख!! हे पुस्तक मागवून घेऊन वाचेन. मनुस्मृती मध्ये पिता रक्षती कौमार्ये, यौवने भर्ता रक्षती । स्थविरे रक्षन्ती पुत्रा: न स्त्री स्वातंत्रमर्हती खलु । । असं म्हंटलं आहे.. गुलाबबाईंची स्वातंत्र्याची व्याख्या खरोखर विचार करायला लागते. हात पसरून स्वातंत्र्य मिळत नसतंच, ते मिळवावं लागतं. ऋषि, धन्यवाद! - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/

धनंजय 28/10/2009 - 19:40
(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा देत आहे.) अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आहे. पुस्तक वाचावेसे वाटत आहे. नाकर्त्या पुरुषांच्या बायकांनी थक्क करणारे प्रयत्न करून कुटुंबांचा चरितार्थ चालवल्याची स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आजही दिसतात. आमच्या घरी कामाला येणार्‍या बायकांपैकी अनेक स्त्रिया अशा स्वतंत्र धमकीच्या होत्या, म्हणून ही बाब अगदीच क्वचित-दिसणारी नसावी. मला वाटते लेकरांचे प्रेम आणि जिवाचा आकांत असला तर आईच्या बाहूत समाजाशी झगडायची अगतिक ताकत येत असेल. पण जे गुलाब यांना जमले, ते त्यांच्या बहिणींना जमले नाही. गुलाब यांची स्फूर्ती आपण घ्यावी. पण पुढे आपला समाज असा असावा, की तो कित्ता गिरवण्यासाठी गुलाब यांच्यासारखा असामान्य चिवटपणा आवश्यक होऊ नये. सामान्य स्त्रीला (किंवा कोणालाही) जर कुशलपणे एखादा व्यवसाय करता येत असेल, तर तो व्यवसाय करता यावा. गार्गी जिवंत आहे! तिच्या तेजाने माझ्या-तुमच्याइतक्या सामान्य मुलामुलींनीही "जिवंत" व्हावे अशी शुभकामना (आणि प्रयत्न) करूया.

सुनील 25/10/2009 - 06:39
एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत 25/10/2009 - 07:13
एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे अभिनंदन. आपल्या सुखवस्तू आयुष्यातल्या विवंचनांचे विचार हरघडी आपल्या डोक्यात असतात. या संदर्भात गुलाबबाईंसारख्यांच्या कहाण्या निव्वळ स्फूर्तिदायकच नव्हेत, तर आपल्या विवंचनासुद्धा किती चैनीच्या आहेत याची जाणीव करून देणार्‍या आहेत. आठलेकरानी टिपिकल "रॅग्स टू रिचेस" स्टोरीऐवजी या अशा , अशक्यप्राय लढाईची कहाणीची निवड करावी यात बरेच काही आले. स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे. सरतेशेवटी एक अवांतर : माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. माझ्या मिसळपावकर मित्रमैत्रिणीनो , थोडा विचार करायला हवाय आपण सार्‍यानी. मी हा मुद्दा मागेसुद्धा मांडलाय नि सगळ्यांचे ताशेरे ऐकले आहेत. तरीसुद्धा इथे तुमचे लक्ष वेधवतो. मौजमजा आहेच ; थोडी ऊर्जा इथेदेखील खर्च होऊ देत.

In reply to by मुक्तसुनीत

शाहरुख 25/10/2009 - 08:42
माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार.
उर्जा खर्च करायचे आवाहन केलंय म्हणून, प्रतिसाद नाही म्हणून धागा दुर्लक्षित असं थोडीच आहे ? पुस्तकाची नोंद घेण्यात आली आहे.

In reply to by शाहरुख

Nile 25/10/2009 - 11:46
खर तर वाद घालायचा नाही आहे पण, तुमचं वैयक्तीक दुर्लक्ष नसेल पण म्हणुन तुम्ही दुर्लक्ष नाही असं कसं म्हणु शकता? :) असो, भावनाओं को समझो इतकाच इशारा, पुर्णविराम. :)

In reply to by मुक्तसुनीत

मस्त कलंदर 25/10/2009 - 10:10
एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे आभार!!! स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे. पुस्तक नक्कीच वाचायला हवे!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 25/10/2009 - 21:46
धागा दुर्लक्षित आहे असे जरी नसले तरी प्रतिक्रिया देऊन त्यावर मत व्यक्त झाले नाही तर तो मागे पडून दुर्लक्षिला जाऊ शकतो कारण मागील पाने धुंडाळून वाचण्याइतका उत्साह राहीलच ह्याची खात्री नसते (निदान माझे हल्ली बर्‍याचदा असे होते.) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

मिसळभोक्ता 26/10/2009 - 22:18
माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. मुसुशेठ, सॉरी बरं का ! ऋष्या काहीतरी वैचारिक वगैरे लिहिणार आहे, असे कळले असते, तर आम्ही गप्पच बसलो असतो. ह्या ऋष्याची रेषेखालच्या अक्षरांच्या सिद्धहस्त लेखकांशी ओळख करून द्या ना ! तिसर्‍या अंकात तरी बिचार्‍याची वर्णी लागेल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 27/10/2009 - 01:41
तुम्ही किंवा इतर कुणीही "गप्प बसावे" असा माझ्या अवांतरातून एक अर्थ निघत असेल तर मला तसे म्हणायचे नव्हते. कुणी काय लिहावे नि लिहू नये याबद्दल मला काहीही म्हणायचे नव्हते. माझा (त्यावेळचा) प्रतिसाद लिहिताना , त्यावेळी काही तास जुने असलेल्या दोन धाग्यांची तुलना सहज केली आणि त्यातून जे वाटले ते लिहिले. जो जे वांच्छिल तो ते लिहो असे पुलस्वामीच म्हणून गेले आहेत.

विंजिनेर 25/10/2009 - 07:30
पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच.
आई गं... कल्पने बाहेरचं आहे. बाकी परि़क्षण चांगले झाले आहे.

विसोबा खेचर 25/10/2009 - 07:42
एका वेगळ्याच पुस्तकाचा सुंदर परिचय! ऋष्या, तुझं कौतूक वाटतं..
आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं.
हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मिसळभोक्ता 26/10/2009 - 22:19
हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं! ह्या मनूमुळे हिंदु लोकांचे खूप नुकसान झाले आहे, हे खरेच. मनु हा भिकारचोट ! आणि सनातनी मनुवादी शंभर भिकारचोट ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज 25/10/2009 - 08:02
वाह! काय प्रभावी परिक्षण आहे. गुलाबबाईंचे आयुष्य एक जबरदस्त आवेग दिसतो आहे. वाचले पाहीजे असे पुस्तक! धन्यु ऋषिकेश!

ऋषी, पुस्तकाची ओळख भारी करुन दिली. गुलाबबाईची कहाणी तर कुछ औरच. ''...आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं" हे खरं तत्त्वज्ञान...!!! -दिलीप बिरुटे

वेताळ 25/10/2009 - 08:51
अजुनही समाज बदलला नाही. स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यास सरकार जिथे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अपयशी ठरले आहे,तिथे उत्तरप्रदेशाची कल्पनाच करवत नाही.लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान प्रत्येकाने आसपास त्या बद्दल लोकांचे मतर्परिवर्तन गरजेचे आहे.शिक्षित जोडपी देखिल मुलगी आहे समजल्यावर दु:खी होतात त्याचा तर खुप राग येतो. पुस्तकाचा परिचय करुन दिल्याब द्दल आभार. वेताळ

In reply to by वेताळ

" तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो" : गुलाबबाई कोणीही कोणाचीही मानसीकता बदलू शकत नाही.... आणि मतपरिवर्तन काय करणार? स्त्रियांच सक्शमीकरण आणि सबलीकरण महत्वाचं... कोणी त्या साठी काही करत असेल तर बोला.....

प्रदीप 25/10/2009 - 10:43
एका वेगळ्याच विषयावरील पुस्तकाची ऋषिकेशने ओळ्ख जबरदस्त करून दिलेली आहे, त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद. मंगला आठलेकरांचे दळवींवरील सुंदर पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यांच्या लेखनाविषयी माझ्या मनात आदरच होता व तो सदर लेखाने द्विगुणितच झाला असे मी म्हणेन. परंतु आताही उत्तरेत वास्तव इतके भीषण आहे, की सुमारे ८० -९० वर्षांपूर्वी एका स्त्रीस समाजाची इतकी एकल टक्कर घेता आली, आणी तीही यशस्वी, ह्याबद्दल खरोखरीच माझ्या मनात संभ्रम आहे. अगदी आजही, स्त्रीच काय, पण पुरूषसुद्धा तेथील बुरसटलेल्या व जमिनदारांच्या झुंडशाहीने व्यापलेल्या समाजात काहीही आगळे वेगळे करण्याची हिंम्मत दाखवू शकत नाहीत. तेव्हा हे सगळे जसे इथे वर्णित केलेले आहे, तसेच प्रत्यक्षात घडले असेल, तर ते एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. कदाचित ह्याविषयी पुस्तकात सविस्तर वर्णने आलेली असावीत, व ऋषिकेशने विस्तारभयास्तव त्याविषयी त्याच्या लेखात काही फारसे लिहीले नसावे. स्वातंत्र्याविषयी गुलाबाबाईंची मते पूर्णपणे पटणारी आहेत. " मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं". हे जितके व्यक्तिसमूहाविषयी खरे आहे, तितकेच ते देशाविषयीही आहेच. बाग्लादेश व इ. तिमोर ही अलिकडची ह्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ दोन ठसठशीत उदाहरणे आहेत. जाता जाता: उत्तर प्रदेशातीलच एका दलिताने लिहीलेल्या 'मेरा बचपन, मेरे कंधोंपर' ह्या आत्मकथनातून मी वर वर्णिलेल्या विदारक समाजव्यवस्थेचे चित्रण झाले असावे, असे वाटते. ' असे वाटते' म्हणण्याचे कारण हे की ह्या पुस्तकाचा परिचय रेखा देशपांडेंनी फारच विस्कळीत स्वरूपात केला आहे. ह्या पाश्वभूमिवर ऋषिकेशचा नेमक्या शब्दांत लिहीलेला हा लेख उठून दिसतो.

दशानन 25/10/2009 - 11:01
>>पुस्तकाची अत्यंत प्रभावी आणि सुयोग्य ओळख करून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, ऋषिकेश! असेच म्हणतो, छान माहीती. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

प्रमोद देव 25/10/2009 - 11:51
पुस्तक खरंच वाचनीय आहे आणि ऋषिकेशने अतिशय समर्थपणे त्याचा परीचय करून दिलाय. ======= कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्याबद्दलची गुलाबबाईंची मतं खूपच पटली; 'डोर' या चित्रपटातील एक पात्र (नाव विसरले, आयेशा टाकियाने काम केलं आहे ते) याच अर्थाचं काहीसं वाक्य म्हणते तेव्हा तेही तेवढंच पटतं. पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार. अदिती

क्रान्ति 25/10/2009 - 21:28
परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. धन्यवाद ऋषिकेश. अगदी अवश्य वाचणार पुस्तक. क्रान्ति अग्निसखा

चतुरंग 25/10/2009 - 21:42
करुन दिल्याबद्दल ऋषिकेशचे आभार. गुलाबबाई एकूण क्रांतिकारी व्यक्तिमत्व दिसते आहे. जगावेगळी वाटचाल करताना रूढींच्या निवडुंगांचे फड तुडवत, वेळप्रसंगी कापून काढत, जावेच लागते आणि त्याच्या काट्यांनी रक्तबंबाळ झालेला जीव मग काही अलौकिक घडवतो! सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते ते अशा ठिकाणी पटतेच पटते. नक्कीच मिळवून वाचावे अशा पुस्तकांच्या यादीत समाविष्ट! चतुरंग

भाजीपाव 26/10/2009 - 02:46
सुंदर परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. .... धन्यवाद ऋषिकेश :)

सन्दीप 26/10/2009 - 17:16
परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे.पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार.धन्यवाद ऋषिकेश . सन्दीप

स्वाती२ 26/10/2009 - 17:21
सुरेख पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. मागे कधीतरी आईने सांगितले होते या गुलाबबाईंबद्दल. आता पुस्तक मिळवून नक्की वाचणार.

प्राजु 27/10/2009 - 08:10
सुरेख पुस्तक ओळख!! हे पुस्तक मागवून घेऊन वाचेन. मनुस्मृती मध्ये पिता रक्षती कौमार्ये, यौवने भर्ता रक्षती । स्थविरे रक्षन्ती पुत्रा: न स्त्री स्वातंत्रमर्हती खलु । । असं म्हंटलं आहे.. गुलाबबाईंची स्वातंत्र्याची व्याख्या खरोखर विचार करायला लागते. हात पसरून स्वातंत्र्य मिळत नसतंच, ते मिळवावं लागतं. ऋषि, धन्यवाद! - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/

धनंजय 28/10/2009 - 19:40
(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा देत आहे.) अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आहे. पुस्तक वाचावेसे वाटत आहे. नाकर्त्या पुरुषांच्या बायकांनी थक्क करणारे प्रयत्न करून कुटुंबांचा चरितार्थ चालवल्याची स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आजही दिसतात. आमच्या घरी कामाला येणार्‍या बायकांपैकी अनेक स्त्रिया अशा स्वतंत्र धमकीच्या होत्या, म्हणून ही बाब अगदीच क्वचित-दिसणारी नसावी. मला वाटते लेकरांचे प्रेम आणि जिवाचा आकांत असला तर आईच्या बाहूत समाजाशी झगडायची अगतिक ताकत येत असेल. पण जे गुलाब यांना जमले, ते त्यांच्या बहिणींना जमले नाही. गुलाब यांची स्फूर्ती आपण घ्यावी. पण पुढे आपला समाज असा असावा, की तो कित्ता गिरवण्यासाठी गुलाब यांच्यासारखा असामान्य चिवटपणा आवश्यक होऊ नये. सामान्य स्त्रीला (किंवा कोणालाही) जर कुशलपणे एखादा व्यवसाय करता येत असेल, तर तो व्यवसाय करता यावा. गार्गी जिवंत आहे! तिच्या तेजाने माझ्या-तुमच्याइतक्या सामान्य मुलामुलींनीही "जिवंत" व्हावे अशी शुभकामना (आणि प्रयत्न) करूया.
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

परिकथेतील राजकुमार ·

सहज 24/10/2009 - 13:21
चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

सहज 24/10/2009 - 13:21
चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

In reply to by सहज

दशानन 24/10/2009 - 13:23
असेच म्हणतो. पहावा लागेल एकदा तरी हे नक्कीच. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by वेदश्री

प्रभो 24/10/2009 - 14:15
भयानक वास्तववादी चित्रपट! बघितल्यावर एकदम सुन्न होऊन गेलो होतो . --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

अवलिया 24/10/2009 - 16:17
हेच म्हणतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा 24/10/2009 - 14:19
परा छान परिक्षण (बर्‍याच दिवसानी लिहिता झालास ) . पहायला हवा. पण एक्कदे कुठे मराठी सिनेमे लागणार त्यामुळे नेटावर येईपर्यंत वाट पहावी लागणार..

तिमा 24/10/2009 - 16:58
अप्रतिम सिनेमा व उत्कृष्ट परीक्षण. प्रत्येकाने जरुर पहावा असा चित्रपट! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

श्री राजकुमार, मराठीतील चित्रपटांचे परीक्षण मराठी संकेतस्थळांवर दुर्मीळ झाले होते. ती उणीव तुमच्या नेटक्या परीक्षणाने भरून निघाली. टॉरंट फाइल डाउनलोड (चोरीच ती) न करून थेटरात जाऊन चित्रपट पाहणे मसंवरचे चित्रपटपरीक्षक विसरले आहेत असेच वाटत होते. पण तो समजही तुमच्या परीक्षणाने दूर झाला.

बेसनलाडू 24/10/2009 - 23:26
नुकताच पाहिला, बराचसा चांगला आहे. जाणवलेली मुख्य त्रुटी म्हणजे खूप काही/सगळेच सांगायचे असल्याने जे काही सांगायचे आहे त्याला पूर्ण न्याय देता आलेला नाही. कथेचा शेवट, कॄषीमंत्र्यांचे अपहरण वगैरे थोडे अतिरंजक. जमेची बाजू म्हणजे सिनेमाटोग्राफी, ताकदवान अभिनय - विशेषतः माधवी जुवेकर (माली). ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. मकरंदचे (राजाराम पवार) काम वेगळे आणि नेहमीचे अंगविक्षेप आणि हेल टाळून केलेले (कदाचित भूमिकेची तशीच मागणी असल्याने). नागेश भोसले (नंदू)ही अतिशय गुणी अभिनेता;पण या चित्रपटात त्याच्यातल्या दिग्दर्शकाने त्याच्यातल्या अभिनेत्यावर बर्‍यापैकी अन्याय केला आहे, असे वाटले.सयाजी शिंदेचे काम फार सामान्य;किंबहुना ही व्यक्तिरेखा त्याच्यातल्या अभिनेत्यासाठी साजेशी नाही, असे वाटले. एकंदर शेतकर्‍यांच्या समस्यांना तोंड फोडण्यात चित्रपट बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय असे मात्र नक्कीच सांगता येईल. (प्रेक्षक)बेसनलाडू

परा, मस्त परिक्षण रे...! 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' माझ्या दृष्टीने मध्यंतरालाच संपतो. चित्रपटातील मंत्र्याचा प्रसंग आणि मूळ समस्यावरील उपचार... कै च्या कैच. मात्र चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहेच. -दिलीप बिरुटे

सहज 24/10/2009 - 13:21
चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

सहज 24/10/2009 - 13:21
चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

In reply to by सहज

दशानन 24/10/2009 - 13:23
असेच म्हणतो. पहावा लागेल एकदा तरी हे नक्कीच. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by वेदश्री

प्रभो 24/10/2009 - 14:15
भयानक वास्तववादी चित्रपट! बघितल्यावर एकदम सुन्न होऊन गेलो होतो . --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

अवलिया 24/10/2009 - 16:17
हेच म्हणतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा 24/10/2009 - 14:19
परा छान परिक्षण (बर्‍याच दिवसानी लिहिता झालास ) . पहायला हवा. पण एक्कदे कुठे मराठी सिनेमे लागणार त्यामुळे नेटावर येईपर्यंत वाट पहावी लागणार..

तिमा 24/10/2009 - 16:58
अप्रतिम सिनेमा व उत्कृष्ट परीक्षण. प्रत्येकाने जरुर पहावा असा चित्रपट! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

श्री राजकुमार, मराठीतील चित्रपटांचे परीक्षण मराठी संकेतस्थळांवर दुर्मीळ झाले होते. ती उणीव तुमच्या नेटक्या परीक्षणाने भरून निघाली. टॉरंट फाइल डाउनलोड (चोरीच ती) न करून थेटरात जाऊन चित्रपट पाहणे मसंवरचे चित्रपटपरीक्षक विसरले आहेत असेच वाटत होते. पण तो समजही तुमच्या परीक्षणाने दूर झाला.

बेसनलाडू 24/10/2009 - 23:26
नुकताच पाहिला, बराचसा चांगला आहे. जाणवलेली मुख्य त्रुटी म्हणजे खूप काही/सगळेच सांगायचे असल्याने जे काही सांगायचे आहे त्याला पूर्ण न्याय देता आलेला नाही. कथेचा शेवट, कॄषीमंत्र्यांचे अपहरण वगैरे थोडे अतिरंजक. जमेची बाजू म्हणजे सिनेमाटोग्राफी, ताकदवान अभिनय - विशेषतः माधवी जुवेकर (माली). ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. मकरंदचे (राजाराम पवार) काम वेगळे आणि नेहमीचे अंगविक्षेप आणि हेल टाळून केलेले (कदाचित भूमिकेची तशीच मागणी असल्याने). नागेश भोसले (नंदू)ही अतिशय गुणी अभिनेता;पण या चित्रपटात त्याच्यातल्या दिग्दर्शकाने त्याच्यातल्या अभिनेत्यावर बर्‍यापैकी अन्याय केला आहे, असे वाटले.सयाजी शिंदेचे काम फार सामान्य;किंबहुना ही व्यक्तिरेखा त्याच्यातल्या अभिनेत्यासाठी साजेशी नाही, असे वाटले. एकंदर शेतकर्‍यांच्या समस्यांना तोंड फोडण्यात चित्रपट बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय असे मात्र नक्कीच सांगता येईल. (प्रेक्षक)बेसनलाडू

परा, मस्त परिक्षण रे...! 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' माझ्या दृष्टीने मध्यंतरालाच संपतो. चित्रपटातील मंत्र्याचा प्रसंग आणि मूळ समस्यावरील उपचार... कै च्या कैच. मात्र चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहेच. -दिलीप बिरुटे
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

हमारा बिज अभियान

अजुन कच्चाच आहे ·

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.
3

दोन कोल्ह्यांची (इसापनीतीबाहेरील) सुरस कथा!

सुधीर काळे ·

अवलिया 19/10/2009 - 11:29
या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे. जरुर लिहा. अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

हेरंब 19/10/2009 - 13:43
अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं हे वाक्य मला तरी विनोदी नाही वाटत. स्वानुभवावरुन ते वास्तवाच्या जवळ आहे असे वाटते. तसा सामान्य पाकिस्तानी माणूसही चांगला आहे असे तिथे जाऊन आलेल्या(क्रिकेटच्या सीरीजवेळी) अनेकांनी त्यावेळेला लिहिले आहे.

सुधीर काळे 19/10/2009 - 14:10
लिहायचा विचार तर आहे! "भट्टी" जमली तर एकाद्या मराठी मासिकात प्रकाशनासाठी द्यायचाही विचारही आहे. पण त्या आधी "मिपा"वर चढवेन कारण इथले वेगवेगळे शेरे वाचल्यावर त्यातल्या सकारात्मक शेर्‍यांचा वापर करून लेखात जरूर त्या सुधारणा मी नेहमीच करत आलेलो आहे. सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मदनबाण 19/10/2009 - 21:58
हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे. वाचायला नक्कीच आवडेल... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

सुधीर काळे 20/10/2009 - 12:47
आजच्या टाइम्समधे आलेली ही बातमी वाचून मी सुन्न झालो! "Opium, organized crime & Pakistan intelligence feed Taliban's war chest" "म्हणजे आंधळं (अमेरिका/ओबामा) दळतंय आणि कुत्रं (तालीबान/मुल्ला ओमार) पीठ खातंय" अशातलीच गत! "आपलं काय जातंय?" असं म्हणायचीही सोय नाही! कारण आज जे पाकिस्तानात होतंय ते उद्या आपल्यालाच भोवणार आहे. हे जे ISI प्रकरण आहे त्याची व्याप्ती पहाता मला तर वाटतं कीं प्रत्येक लफड्याच्या दोन्ही बाजूस ही संघटना उभी असते! त्यांचं कर्तृत्व परमेश्वराच्याही पेक्षा जास्त असावे असं मला कधी-कधी वाटतं - अगदी omnipresent आणि omnipotent! पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI - असाही प्रश्नही वारंवार पडतो! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

सुधीरभाऊ, असे काही वाचले कीं असे वाटते की अमेरिकन सरकारला इतके साधे गणीत कसे समजत नाही. असे काही वाचले की वाटते की हे पाकडे तर दोन्ही बाजूनी लोणी ओरपत असतात पण ओबामासारख्या जरा समजूतदार वाटणार्‍यालाही हे कसे समजत नाही? का तोही CIA, STATE Deptt किंवा Pentagon सारख्या 'हम करेसो कायदा' छाप संघटनाना शरण जातो? सरकार या सघटनाच चालवतात कीं निवडून आलेले सरकारच चालविते? व या संघटना देशाचे हित वगैरे न पहाता त्यांच्या लॉबीमास्टर सांगेल तसे बोलतात! मग ते जुनं गाणं आठवतं: "कुणी सांगा या येड्याला" भापू

सुधीर काळे 25/10/2009 - 20:34
धन्यवाद सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुधीर काळे 26/10/2009 - 09:26
कधी-कधी मला आश्चर्य वाटतं कीं वॉटरगेट प्रकरणी (प्रत्यक्ष कांहींही गुन्हा केलेला नसूनही) केवळ आपल्या मदतनिसांना वाचविण्याच्या प्रयत्नात खोटे बोलण्याबद्दल महाभियोगाचा (impeachment) बळी होऊ घातलेला व शेवटी अख्ख्या अमेरिकन इतिहासात राजीनामा देण्याचा 'सन्मान' मिळवणारा एकुलता एक राष्ट्राध्यक्ष निक्सन व मोनिका लेविन्स्कीप्रकरणी खोटे बोलण्याच्या आरोपाबद्दल महाभियोगाला सामोरा जाता-जाता जेमतेम वाचलेला पण एरवी अशक्य वाटणारी आर्थिक तूट आपल्या आठ वर्षात भरून काढण्याचे उत्तुंग कर्तृत्व दाखविलेला क्लिंटन हे दोघे एका बाजूला व "पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत व ते अशी अण्वस्त्रे बनवू पहात आहेत असा कुठलाही पुरावा सरकारकडे नाहीं" असे वर्षानुवर्षें काँग्रेस व सिनेटपुढे धादांत खोटे बोलणाराच नव्हे तर लेखी प्रतिपादन करणारा रेगन दुसर्‍या बाजूला पाहिला कीं अमेरिकन लोकशाही प्रथांमध्ये किती तृटी आहेत याची व तिथले लोक "काय भुललासी वरलिया रंगा" या चोखामेळाच्या अभंगाची आठवण करून देणार्‍या दिखाऊपणाला कसे भुलणारे आहेत याची तीव्रतेने जाणीव होते. CIA कडे असे भरपूर पुरावे होते, पण रेगनकडून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. ज्या लोकांनी ते उघडपणे जाहीर करण्याचे पाप केले त्यांना वाळीत तरी टाकण्यात आले किंवा रिच बार्लोसारख्या तरुणाला नोकरी व बायको गमावून एकाद्या फकीरासारखे आयुष्य कंठायला लावले गेले. अशा खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचे चित्र असलेल्या डॉलर-नोटा काढायचा घाट अमेरिकन सरकार कसा काय घालू शकते व असा घाट अमेरिकन लोक कसा काय स्वीकारतात हे एक आश्चर्यच आहे. ज्या निक्सनने चीनबरोबरच्या दोस्तीचे धाडसाचे पाऊल टाकून सोव्हिएट रशियाचे "evil empire" नष्ट करण्याची श्रेष्ठ भूमिका बजावली त्याला लाजिरवण्या परिस्थितीत घालवायचे व "आयत्या बिळात नागोबा" या नात्याने सोव्हिएट रशियाला भूगोलाच्या नकाशावरून पुसून टाकल्याचे (चुकीचे) श्रेय बळकावणार्‍या खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचा उदो-उदो करायचा हे सगळे अमेरिकन सरकारच्या विक्षिप्तपणाचे बीभत्स प्रदर्शनच आहे! आपल्या मिपा सभासदांत अनेक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे वाचन माझ्याहून प्रगल्भ व जास्त विस्तृत असेल. त्यांना या गोष्टीबद्दल काय वाटते हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे. तरी त्यांनीही या दुव्यात भार घालावी ही विनंती. माझ्या लिखाणात कांही मूलभूत चुका असतील तर त्या जरूर माझ्या ध्यानात आणून देण्याची कृपा करावी व त्या दरम्यान "चूक-भूल द्यावी-घ्यावी"! सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुधीर काळे 28/10/2009 - 17:12
जसजसे मी Nuclear Deception हे पुस्तक वाचतोय तसतशी माझ्या मनातली पाकिस्तानची व अमेरिकेची प्रतिमा डागाळू लागली आहे. काल जो भाग वाचला त्यात बेनझीरबाईंच्या पहिल्या टर्ममध्ये गुलाम इशाक खान, ज. बेग व ज. हमीद गुल यांनी त्यांना कसं एकाद्या बाहुलीसारखं वागवलं याचं भायनक चित्रण आहे. त्यांना काहीही माहिती मिळू द्यायची नाही, खास करून अण्वस्त्रांच्या प्रगतीबद्दल, असा त्यांनी चंगच बांधला होता. त्या अमेरिकेत बुशना भेटायला गेल्या तर बुशनी त्याबद्दल सांगितलेली पाकिस्तानबद्दलची माहिती बेनझीरबाईंना नव्हती! शिवाय नवाझ शरीफ हा एके काळी तरी लष्कराच्या सहाय्याने वर आला होता व त्याचा अतिरेक्यांशीही संबंध होता अशी माहितीही त्यात वाचली. नंतर लष्कराशी दोन हात करायला गेला व परिणामी अनेक वर्षें त्याला सौदी अरेबियात अज्ञातवासात काढावे लागले हे आपण जाणतोच. जरदारी काय, नवाझ काय व बेनझीरबाईं काय, लष्करापुढे कुणाचंही काहींही चालत नाहीं असंच लक्षात येतं. अमेरिकेला रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या कारकीर्दीत केलेली पापे फेडावी लागतीलच असंच वाटतंय! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

अवलिया 19/10/2009 - 11:29
या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे. जरुर लिहा. अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

हेरंब 19/10/2009 - 13:43
अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं हे वाक्य मला तरी विनोदी नाही वाटत. स्वानुभवावरुन ते वास्तवाच्या जवळ आहे असे वाटते. तसा सामान्य पाकिस्तानी माणूसही चांगला आहे असे तिथे जाऊन आलेल्या(क्रिकेटच्या सीरीजवेळी) अनेकांनी त्यावेळेला लिहिले आहे.

सुधीर काळे 19/10/2009 - 14:10
लिहायचा विचार तर आहे! "भट्टी" जमली तर एकाद्या मराठी मासिकात प्रकाशनासाठी द्यायचाही विचारही आहे. पण त्या आधी "मिपा"वर चढवेन कारण इथले वेगवेगळे शेरे वाचल्यावर त्यातल्या सकारात्मक शेर्‍यांचा वापर करून लेखात जरूर त्या सुधारणा मी नेहमीच करत आलेलो आहे. सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मदनबाण 19/10/2009 - 21:58
हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे. वाचायला नक्कीच आवडेल... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

सुधीर काळे 20/10/2009 - 12:47
आजच्या टाइम्समधे आलेली ही बातमी वाचून मी सुन्न झालो! "Opium, organized crime & Pakistan intelligence feed Taliban's war chest" "म्हणजे आंधळं (अमेरिका/ओबामा) दळतंय आणि कुत्रं (तालीबान/मुल्ला ओमार) पीठ खातंय" अशातलीच गत! "आपलं काय जातंय?" असं म्हणायचीही सोय नाही! कारण आज जे पाकिस्तानात होतंय ते उद्या आपल्यालाच भोवणार आहे. हे जे ISI प्रकरण आहे त्याची व्याप्ती पहाता मला तर वाटतं कीं प्रत्येक लफड्याच्या दोन्ही बाजूस ही संघटना उभी असते! त्यांचं कर्तृत्व परमेश्वराच्याही पेक्षा जास्त असावे असं मला कधी-कधी वाटतं - अगदी omnipresent आणि omnipotent! पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI - असाही प्रश्नही वारंवार पडतो! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

सुधीरभाऊ, असे काही वाचले कीं असे वाटते की अमेरिकन सरकारला इतके साधे गणीत कसे समजत नाही. असे काही वाचले की वाटते की हे पाकडे तर दोन्ही बाजूनी लोणी ओरपत असतात पण ओबामासारख्या जरा समजूतदार वाटणार्‍यालाही हे कसे समजत नाही? का तोही CIA, STATE Deptt किंवा Pentagon सारख्या 'हम करेसो कायदा' छाप संघटनाना शरण जातो? सरकार या सघटनाच चालवतात कीं निवडून आलेले सरकारच चालविते? व या संघटना देशाचे हित वगैरे न पहाता त्यांच्या लॉबीमास्टर सांगेल तसे बोलतात! मग ते जुनं गाणं आठवतं: "कुणी सांगा या येड्याला" भापू

सुधीर काळे 25/10/2009 - 20:34
धन्यवाद सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुधीर काळे 26/10/2009 - 09:26
कधी-कधी मला आश्चर्य वाटतं कीं वॉटरगेट प्रकरणी (प्रत्यक्ष कांहींही गुन्हा केलेला नसूनही) केवळ आपल्या मदतनिसांना वाचविण्याच्या प्रयत्नात खोटे बोलण्याबद्दल महाभियोगाचा (impeachment) बळी होऊ घातलेला व शेवटी अख्ख्या अमेरिकन इतिहासात राजीनामा देण्याचा 'सन्मान' मिळवणारा एकुलता एक राष्ट्राध्यक्ष निक्सन व मोनिका लेविन्स्कीप्रकरणी खोटे बोलण्याच्या आरोपाबद्दल महाभियोगाला सामोरा जाता-जाता जेमतेम वाचलेला पण एरवी अशक्य वाटणारी आर्थिक तूट आपल्या आठ वर्षात भरून काढण्याचे उत्तुंग कर्तृत्व दाखविलेला क्लिंटन हे दोघे एका बाजूला व "पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत व ते अशी अण्वस्त्रे बनवू पहात आहेत असा कुठलाही पुरावा सरकारकडे नाहीं" असे वर्षानुवर्षें काँग्रेस व सिनेटपुढे धादांत खोटे बोलणाराच नव्हे तर लेखी प्रतिपादन करणारा रेगन दुसर्‍या बाजूला पाहिला कीं अमेरिकन लोकशाही प्रथांमध्ये किती तृटी आहेत याची व तिथले लोक "काय भुललासी वरलिया रंगा" या चोखामेळाच्या अभंगाची आठवण करून देणार्‍या दिखाऊपणाला कसे भुलणारे आहेत याची तीव्रतेने जाणीव होते. CIA कडे असे भरपूर पुरावे होते, पण रेगनकडून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. ज्या लोकांनी ते उघडपणे जाहीर करण्याचे पाप केले त्यांना वाळीत तरी टाकण्यात आले किंवा रिच बार्लोसारख्या तरुणाला नोकरी व बायको गमावून एकाद्या फकीरासारखे आयुष्य कंठायला लावले गेले. अशा खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचे चित्र असलेल्या डॉलर-नोटा काढायचा घाट अमेरिकन सरकार कसा काय घालू शकते व असा घाट अमेरिकन लोक कसा काय स्वीकारतात हे एक आश्चर्यच आहे. ज्या निक्सनने चीनबरोबरच्या दोस्तीचे धाडसाचे पाऊल टाकून सोव्हिएट रशियाचे "evil empire" नष्ट करण्याची श्रेष्ठ भूमिका बजावली त्याला लाजिरवण्या परिस्थितीत घालवायचे व "आयत्या बिळात नागोबा" या नात्याने सोव्हिएट रशियाला भूगोलाच्या नकाशावरून पुसून टाकल्याचे (चुकीचे) श्रेय बळकावणार्‍या खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचा उदो-उदो करायचा हे सगळे अमेरिकन सरकारच्या विक्षिप्तपणाचे बीभत्स प्रदर्शनच आहे! आपल्या मिपा सभासदांत अनेक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे वाचन माझ्याहून प्रगल्भ व जास्त विस्तृत असेल. त्यांना या गोष्टीबद्दल काय वाटते हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे. तरी त्यांनीही या दुव्यात भार घालावी ही विनंती. माझ्या लिखाणात कांही मूलभूत चुका असतील तर त्या जरूर माझ्या ध्यानात आणून देण्याची कृपा करावी व त्या दरम्यान "चूक-भूल द्यावी-घ्यावी"! सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुधीर काळे 28/10/2009 - 17:12
जसजसे मी Nuclear Deception हे पुस्तक वाचतोय तसतशी माझ्या मनातली पाकिस्तानची व अमेरिकेची प्रतिमा डागाळू लागली आहे. काल जो भाग वाचला त्यात बेनझीरबाईंच्या पहिल्या टर्ममध्ये गुलाम इशाक खान, ज. बेग व ज. हमीद गुल यांनी त्यांना कसं एकाद्या बाहुलीसारखं वागवलं याचं भायनक चित्रण आहे. त्यांना काहीही माहिती मिळू द्यायची नाही, खास करून अण्वस्त्रांच्या प्रगतीबद्दल, असा त्यांनी चंगच बांधला होता. त्या अमेरिकेत बुशना भेटायला गेल्या तर बुशनी त्याबद्दल सांगितलेली पाकिस्तानबद्दलची माहिती बेनझीरबाईंना नव्हती! शिवाय नवाझ शरीफ हा एके काळी तरी लष्कराच्या सहाय्याने वर आला होता व त्याचा अतिरेक्यांशीही संबंध होता अशी माहितीही त्यात वाचली. नंतर लष्कराशी दोन हात करायला गेला व परिणामी अनेक वर्षें त्याला सौदी अरेबियात अज्ञातवासात काढावे लागले हे आपण जाणतोच. जरदारी काय, नवाझ काय व बेनझीरबाईं काय, लष्करापुढे कुणाचंही काहींही चालत नाहीं असंच लक्षात येतं. अमेरिकेला रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या कारकीर्दीत केलेली पापे फेडावी लागतीलच असंच वाटतंय! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय. (१) रोनाल्ड रेगन यांची हॉलीवूडमधील एक अभिनेता म्हणूनची कारकीर्द कितीही अयशस्वी झाली असो, पण राष्ट्रपती या भूमिकेत त्यांनी जे आपलं अभिनयकौशल्य दाखविलं ते असामान्यच होतं असे म्हणावं लागेल. चेहरा 'सरळ' ठेवून इतकं धादांत खोटं बोलण्याचं त्यांचं प्राविण्य फारच श्रेष्ठ दर्जाचं होतं यात शंका नाहीं (त्याचा वापर भारताच्या विरुद्ध केला गेला म्हणून "कौतुकास्पद" म्हणवत नाही हे मात्र खरं!).