मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

अलविदा मिसळपाव!

सुधीर काळे ·

गवि 18/10/2011 - 14:26
मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच. जसे जायला कुठलेही ठाम (एकादी घटना वगैरे) कारण नाहीं तसेच कधी परत आलोच तर त्यालाही कांहीं 'ठाम' कारण लागेलच असे नाहीं. मूड आलाच तर काश्मीरवरील फरूक अब्दुल्ला यांच्या "बहु बायकात बडबडला"ची खबर घ्यायला एकदा येईन. ....................... उपरिनिर्दिष्ट वाक्यांमधून तुम्हाला जावंसं वाटत नाही असंच जास्त वाटतंय. तर मग थांबाच की.. नकाच जाऊ.. :)

रश्मि दाते 18/10/2011 - 14:27
आज खुप दिवसांनी मि पा वर आले,आपल्या धाग्यावर प्रतीसाद दिला आणि आता हा धागा दिसला,असे करु नका हो आपले लीखाण आवडते आम्हाला,

वपाडाव 18/10/2011 - 14:34
काळेकाका, यांना विणंती आहे की मिपावरुन रजा घेउ नये.... मागे अवलियांनी रजा घेतली, काही दिवसांपुर्वी पंगा ब्यान झाले.... हे काही बरे वाटत नाही..... मिपावरील जाणत्या मंडळींनी exit घेतल्यास नवीन सदस्यांना प्रोत्साहन कसे येणार? आपल्यासारखी मंडळी ही मिसळपावचा ठेवा आहेत..... तरीही, ही तात्पुरती रजा लौकरात लौकर संपावी.... अन आपण पुन्हा येथे सक्रिय व्हावे हीच इ. प्रा......

विजुभाऊ 18/10/2011 - 14:45
काळेकाका मिपावर काही अनुभव जरा वेगळेच येतात. ते तसे बर्‍याच जणाना येतात. वयाचे वगैरे म्हणाल तर तुम्ही सिनीयर आहात वगैरे असे आम्हाला कधी वाटलेच नाही. ( तुमच्याशी फोनवर बोलेपर्यन्त) एखाद्या गेटटुगेदर ला भेटला असतात तर तुम्हाला अजून वेगळेच लोक दिसले असते. तुम्ही इथे पाकिस्तान विषयक लिहीत होतात ती माहिती इथे नवीनच होती "जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा, तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो" या अनुभवातून प्रत्येकजण कधीना कधी गेलेला असतो. थोडा विचार केला तर हे शब्द फार वेगळे सांगून जातात. अर्थात हे श्रेय गीतकाराचे. जगजीत सिंगाच्या गाण्यातील महत्वाचा भाग म्हणजे त्यानी निवडलेल्या गजला सोप्या असायच्या. चाली गुणगुणता येतील अशा सोप्या असायच्या. त्या श्रोत्यांपर्यन्त पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मात्र कडक सॅल्युट.

In reply to by विजुभाऊ

पाषाणभेद 18/10/2011 - 14:52
विजूभौ, जगजीत सिंगांनी गायलेल्या गझला कुणी लिहीलेल्या होत्या? चारदोन नावे देता येतील का? माझा अभ्यास जरा कच्चा आहे, अन होमवर्क तर करतच नाही मी.

In reply to by पाषाणभेद

विजुभाऊ 18/10/2011 - 16:02
फिराख गोरखपुरी , कतील शिफाई ,मिर्झा गालीब ,निदा फाजली सुदर्शन फकीर ,.बहादूर शहा जफर ही काही नावे. काही गजला मिश्र होत्या.

मदनबाण 18/10/2011 - 14:51
ह्म्म्म... काळे काका, एक मिपा सदस्य म्हणुन मला तुम्हाला विनंती करायची आहे,की कॄपया असा निर्णय घेउ नका. फक्त तात्पुरती रजा घेण्यास हरकत नाही,पण परत याच... चांगले सदस्य असे जायला लागले तर आमचे कसे व्ह्यायचे ? तुमच्या अभ्यासाची,अनुभवाची गरज आम्हाला आहे... तुम्हाला इथे कोणता त्रास होत आहे का ? तसे असल्यास संपादकांना /नीलकांतला त्या बद्धल नक्की सांगा. संपादीत.

गणपा 18/10/2011 - 15:04
तात्पुरते जावे की कायमचे जावे आदी निर्णय हे ज्या त्या सदस्यांचे खाजगी निर्णय आहेत. त्यामगे त्यांची काही खाजगी कारणे असु शकतात. ती जाणुन घेण्याचा हक्क मला नाही. त्यामुळे मी एक सामान्य वाचक म्हणुन तुमचा जो काही निर्णय आहे त्याचा आदरच करतो. पण त्याच बरोबर वर आलेलेल्या बर्‍याच प्रतिसादावरुन इथे आपल्या लिखाणाचे बरेच चहाते आहेत याची ही नोंद घेतली जावी. आपल्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा. -गणपा

ऋषिकेश 18/10/2011 - 15:11
आपल्या राजकीय विचारांत मतभेद असले तरी त्यासंबंधी काथ्याकूट करताना वैयक्तिक टिपणी आपण कटाक्षाने टाळायचात ही आठवण - प्रतिमा- कायम स्मरणात राहिल :) असो. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!

दिगम्भा 18/10/2011 - 15:19
काळेजी, तुमचे लिखाण आवडते, असा निर्णय घेऊ नका, एवढे सांगण्यासाठीच लॉगिन केले आहे. लेखन करावे, आम्ही वाचनमात्र का होईना वाचणारे आहोत. - दिगम्भा

सुहास.. 19/10/2011 - 12:11
निर्णयाविषयी लेखनसीमा, मात्र दंगा-मस्तीच्या नादात माझ्याकडुन एखादा शब्द उणा-दुणा गेला असल्यास क्षमस्व ! सुहास.. ------------------ क्काय ! आज तुम्ही राम-नामाचा जप करणार्‍या भगिनीची छेड नाही काढलीत, छ्या! राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या घालणार्‍या माजोरड्या देशातुन, आंजावर विज्ञान-प्रचार कसा करणार मग तुम्ही !

अमोल केळकर 18/10/2011 - 15:51
आपले लिखाण नेहमीच आनंद देवून गेले :) मला माहित नाही तुम्हाला आठवते की नाही पण मी मुकंद कंपनीत काम करतो म्हणल्यावर तुम्ही एकदा आवर्जून फोन केला होतात आणि आपण बोललो होतो. त्यानंतर अनेक दिवस मी मुकंद मधे कॉलर टाईट करुन फिरत होतो की मी काळे साहेबांना ओळखतो. असो. बघू या प्रत्यक्षात आपणास भेटायच योग येतो की नाही अमोल केळकर

श्रावण मोडक 18/10/2011 - 16:04
सुधीर काळे यांच्याकडून अनपेक्षीत.
या संस्थळावर...आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं.
हे विधान कशासाठी? कंफर्टेबल वाटत नव्हतं तर तेव्हाच वावरणं बंद करायचं. ते न करता, तेव्हा धाग्यावर धागे काढले (जे इथले उद्दिष्ट्यच आहे), एक पुस्तकही इथं लिहिलंत. आणि आता, कम्फर्टेबल वाटत नाही, ही टिप्पणी?
कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील.
याला काहीही अर्थ नाही. सामंत का बाहेर पडले वगैरे बाजूला ठेवा. तुमच्यापुरते बोला. तुमचे लेखन मी वाचले आहे. त्यावर कधी साधक, सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. कधी त्यावर टीकाही केली आहे. पण तशा स्वरूपाचा संवाद अपेक्षीत नसेल तर अशा संस्थळांवर वावरू नये. आपल्यापुरती वेबसाईट काढावी स्वतःची आणि खुशाल नांदावे. अधिकाधिक लोकांनी वाचावे म्हणून सार्वजनिक संस्थळावर यायचे, सारे एन्जॉय करायचे, आणि मागाहून त्या संस्थळाची गुणवत्ता, श्रेणी, चारित्र्य याविषयी संदिग्ध टिप्पणी करायची हा कृतघ्नपणा आहे. काळे यांच्याकडून तो अपेक्षीत नाही. (हे लेखन त्यांनी भावनेच्या भरात केले असेल तर ते संपादित करून माझा हा प्रतिसाद उडवावा.) याच धाग्यावर 'काळे यांनी रजा घेऊ नये,' असे सांगणारे प्रतिसाद आहेत ते या संदर्भात बोलके आहेत. तेही काळे यांना कम्फर्टेबल वाटत नसेल तर आणि फक्त तेच त्यांच्या कम्फर्टला पूरक असतील तर मात्र नक्कीच त्यांनी इथून मोकळे व्हावे हे उत्तम. हे आणि अशी स्थळे त्यांच्यासाठी नाहीत. वेगळ्या वाटा आहेत, असं वाटतंय ना? वेगळ्या वाटेवर रहा.

प्रास 18/10/2011 - 16:30
सहभागी लेखक म्हणून मिपावर राहणे किंवा न राहणे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा आदर राखण्याचा प्रयत्न राहील. मात्र तुमचे लिखाण आणि खरडफळ्यावरच्या खरडी (ज्या बर्‍याचदा उत्तम कार्टून्सच्या स्वरूपातही असायच्या) दोन्ही आवडायचे आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायचे प्रयत्नही केले आहेत हे इथे नोंदवून ठेवतोय. भारताबाहेर राहून भारत-पाक संबंधाविषयीची आणि जागतिक घडामोडींसंदर्भात तुमची मतं मांडून एका नव्या दृष्टीकोनातून या समस्येकडे बघायची सवय तुम्ही आम्हाला लावलेली. आत्ताही तुमच्या 'ऑक्युपाय स्टॉक मार्केट', 'लिबीया घडामोडी' आणि 'चीनची आगळीक' यावर लेख येतील या अपेक्षेत असताना तुमचा एक्झिट सांगणारा हा लेख दिसला. असो. तुम्हाला उपरति होईल अशी आशा आहे. तोपर्यंत "शिवास्ते पन्थानः।" @ प्रस्तुत लेखासंदर्भात - जगजीतसिंहांच्या काही गजलांचे अर्थ समजल्याने आता त्या जास्तीच आवडू लागल्या आहेत. धन्यवाद काळेकाका!

आत्मशून्य 18/10/2011 - 16:52
बाकी निघण्याचा विषय सार्वजनीक कशासाठी ? व्यनीमधे ही चर्चा होऊ शकतेच की ? बाकी सध्या मिपा जरा जास्तच कडक झालयं हे मात्र खरयं पण म्हणून लगेच एग्जिट योग्य न्हवे.

नमस्कार काळे काका, आपण मिपावर विविध विषयांवर लिहिले आहे. बर्‍याचदा साधक-बाधक चर्चा झाल्या. कधी दर्जेदार प्रतिसाद आले तर कधी काही प्रतिसादातून टींगल-टवाळीही झाली. खरडफळ्यावरील व्यंगचित्रेही तितकीच झकास असायची. आपल्या काही लेखनाची उंची अधिक असल्यामुळे कदाचित आपल्या उंचीवरुन आम्हाला काही लेखनाचा आस्वादही कधी कधी घेता आला नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या वृती प्रवृतीची माणसं एकाच ठिकाणी आल्यावर त्यांच्या विविध विचारांसोबत त्यांच्या गुण-दोषांसह एकमेकांना स्वीकारतो कधी फटकारतोही तेव्हा असे अनुभव काही विशेष नसावेत. मात्र, सुखद क्षणांपेक्षा त्रासदायक प्रवृती-प्रतिसादांचा कधी कधी त्रासही होत असतो. आणि मग वाटायला लागतं की सालं बस झालं आता. आणि मग कोणत्या तरी क्षणी 'अलविदा' म्हणायला मन उतावीळ व्हायला लागते. असेच आपले झाले असावे किंवा आपल्या काही खासगी कारणांमुळे आपल्याला पुढे अधिक मोकळा वेळ मिळणार नसेल हेही कारण असेल परंतु दीडशेपेक्षा अधिक लेख लिहिल्यानंतर (सर्व प्रकारचे लेखन) आज मिपाला 'अलविदा' करण्याचे जे comfortable चे कारण सांगत आहात ते मला तरी अजिबात पटत नाही. असो, आपण मिपावर असेच विविध विषयांवर लिहित राहावं असं मला वाटतं. फार तर एक मोठा ब्रेक घ्या. एक महिनाभर, पंधरा दिवस, आणि नव्या उत्साहाने पुन्हा इथे लिहिण्यासाठी या. बाकी, मिपावर लिहावं की न लिहावं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. अवांतर : सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. :) तमाम रिश्तों को मै घर पे छोड आया था. फिर उस के बाद मुझे कोई अजनबी न मिला. -बशीर बद्र. -दिलीप बिरुटे (आपला पुतण्या)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 18/10/2011 - 17:21
सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. काय हो औरंगाबाद आणि राळेगणसिद्धी यात अंतर कमी झालं हाय काय ? नाय कारण अण्णा पण अमर्यादित काळा पर्यंत मौन घेउन बसले आहेत म्हणे ! ;) (बाबा मौनी मराठी) ;)

रेवती 18/10/2011 - 20:26
आज तुम्हाला व्य. नी तून विचारणारच होते की या वर्षी कोणत्या दिवाळी अंकात तुमचा लेख छापून येतोय म्हणून! तर तुम्ही ही बातमी दिलीत.:( तुम्ही मिपावर कंफर्टेबल नव्हता हे आधीपासूनच जाणवत होते. पुन्हा यावेसे वाटले तर स्वागतच आहे.

अर्धवटराव 18/10/2011 - 22:43
थोरामोठ्यांनी पानसुपारीचं आगोदरच लिहिलय... त्यात आणखी नवीन काय भर घालणार मी.... पण तुमच्या अन्कंफर्टेबल वाटण्याचं कारण काहि पल्ले नहि पडा... वय म्हणत असाल, तर तुमच्या वयाला साजेसे , अनुभवाने-ज्ञानाने मुरलेले अनेक रथी महारथी इथे मैफील जमवुन बसलेत... मग तुमचा बेरंग का व्हावा ? आता कुठे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नवे डाव मांडल्या जात आहेत, त्यावर अभ्यासपूर्ण लेखन हि तुमची खासियत आणि वाचकांना पर्वणी... मग इतका इंटरेस्टींग माहोल असताना तुम्हाला एक्झीट घ्याविशी वाटतेय... स्ट्रँज... वांजळे काकु हरल्याचं दु:ख म्हणावं काय? ;) असो... सी यू सून. (पुतण्या) अर्धवटराव

चतुरंग 18/10/2011 - 22:45
मला असं वाटतं की तुमचा बराच गोंधळ उडालाय. मिसळपाववर येण्याआधीच्या जालीय अनुभवातून काही एक विविक्षित हेतू ठेवून तुम्ही इथे आला असाल असे वाटते. तुमच्या आधीच्या अनुभवाशी मेळ बसणारे असे इथे काही आढळते का हे चाचपडणे बराच काळ चालले असेही वाटते. त्यादरम्यान तुम्ही अनेक धागे काढून इथल्या लोकांची प्रकृती आणि प्रवृत्ती आजमावत राहिलात. मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे हे इतर ठिकाणी जाऊन आल्याशिवाय उमगत नाही हे खरे. इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद लोकांकडून मिळत नाही असे तुम्हाला वाटत राहिले कारण तुम्ही एकाच चौकटीतून बघत राहिलात. तुम्हाला जे इश्यूज ज्वलंत वाटले ते इतरांनाही वाटावेत असा तुमचा आग्रह बर्‍याचदा दिसला. तसे होत नाही म्हटल्यावर मग तुमच्या मनातून संस्थळ उतरु लागले. पण म्हणून संस्थळाला आणि सभासदांनाच नावे ठेवून इथून तुम्ही जाणे हे पटत नाही. तुम्हाला जायचे असल्यास (मर्यादित काळासाठी किंवा कायमचे) तो तुमचा वैयक्तिक मामला आहे. त्यासाठी इतरांना दोष देणे पटत नाही. आत्ताही तुम्हाला मनातून जाऊ की नको, जाऊ की नको असे वाटतच आहे हे तुमच्या लेखनातून दिसते. जो काय निर्णय घ्याल त्यासाठी शुभेच्छा! :) -रंगा

In reply to by चतुरंग

यकु 18/10/2011 - 23:05
इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही.
१०००% सहमत आहे. सध्या हपिसातून फक्त मिपा वगळता मराठीतली सगळी संकेतस्थळे दिसत असल्याने गेल्या आठ-पंधरा दिवसांत जवळपास सगळ्या मसंवरील लिखाणाचे खोदकाम केले... त्यातून हे अगदी १०००% पटले. काही ठिकाणी अगदी शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) ठेवत, कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे, अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद पाहिले की मिपा काय चीज आहे ते कळते.

In reply to by यकु

मन१ 18/10/2011 - 23:38
व्वा. शब्द संग्रह व शब्द पखरण आवडली. शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) आणि अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद ही दोन्ही वाक्ये त्यातही "शून्य मूल्याची घोटीव" हा वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वाचून पाहिला. आपण पत्रकार नसावात. पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे.

In reply to by मन१

यकु 18/10/2011 - 23:56
>>>आपण पत्रकार नसावात. या वाक्यापूर्वी "व्यक्तिगत होत असेल तर क्षमा करा" हे लिहायचं राहिलं ;-) >>>पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे. आणि इथं "हे अवांतर संपादकांनी उडवले तरी माझी हरकत नाही" असं लिहायचं राहिलं ;-) दर प्रतिसादात वर ठळक शब्दात दिलेल्या वाक्यांचे सारण भरलेल्या प्रतिसादांची सवय झालेल्या लोकांना मिपाची ठसका लाऊन नाकातून पाणी काढणारी चव मानवत नाही. असे सदस्य सहसा 'ज्येष्ठ नागरिक' असतात असेही निरिक्षण आहे.

In reply to by यकु

धनंजय 19/10/2011 - 01:03
मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो. प्रत्येक संकेतस्थळाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वरील दोन्ही प्रतिसादांच्या प्रमुख आशयाशी असहमत आहे. (म्हणजे "मिसळपावात वैशिष्ट्य आहे" याच्याशी सहमत आहे. पण अन्य संकेतस्थळांची नालस्ती केल्याशी असहमत आहे.) तर्री मला आवडतेच. पण रबडी, कोरा चहा या दोन्ही गोष्टी मी तर्री न मिसळता चाखतो. घोटीव रबडी किंवा शष्प* कोरा चहा नावडणे ठीकच आहे. पण या गोष्टी आवडीने चाखणार्‍या लोकांची चर्या कशी असते? त्याची नक्कल रबडी/चहा नावडणार्‍याने केली, तर नकलेत कडू/मळमळणारे तोंडच दिसेल. प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते. त्याचे स्मरण मिसळपावावरील सुस्थापित सदस्यांना अंधुकच होत असेल. आणि व्यत्यासही खराच. तरी उदास वाटते. (त्यानंतरही "इथे मारे सांगतोस, तिथे का नाही सांगत?" छाप प्रतिसाद येऊ शकतील, त्याचे आधीच उत्तर देतो : मी अन्य संकेतस्थळांवरही "सर्व संकेतस्थळांचे आपले-आपले वैशिष्ट्य" असे समर्थन करतो.) - - - *"शष्प" शब्दाचे सामान्य अर्थ आहेत : (१) कोवळे गवत आणि (२) कमरेखालील इंद्रियांवरचे केस. वरील प्रतिसादात कुठला अर्थ अपेक्षित होता, ते मला ठाऊक नाही. पण जो काय अर्थ लाक्षणिक अर्थाने त्यांनी नावडत्या लेखनाला लावला, तोच लाक्षणिक अर्थ कोरा चहा नावडणारा व्यक्ती कोर्‍या चहाला लावेल, असे मी मानतो. "शष्प"सारख्या घोटीव शब्दांची प्रगल्भ परमावधी सर्वच संकेतस्थळांवर वाचकांना आवडते. "लव्हाळे" शब्दात नावड नाही. "शें*" शब्दात द्वर्थ नाही, शिवाय संपादित होण्याची शक्यताही फार आहे. या शर्करेला द्व्यर्थाची साल असल्यामुळे "शष्प" शब्दाची निवड ही अतिशय कुशल आहे.

In reply to by धनंजय

शिल्पा ब 19/10/2011 - 02:08
सगळ्यांना एक विनंती: असं वर लिहीलंय तसं करड्या रंगातलं वाचायला खुप त्रास होतो त्यापेक्षा जरा भडक रंगात लिहिलं तर वाचता येईल.

In reply to by धनंजय

यकु 19/10/2011 - 09:52
धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून कुठल्याही संकेतस्थळाची नालस्ती केलेली नाही. हां, माझे शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर विशिष्ट संकेतस्थळ उभं रहात असेल तर त्याला ती गोष्ट वेगळी. शष्पचा तुम्ही सांगितलेला क्रमांक २ चा शब्दकोशातला अर्थ मला पहिल्यांदा इथेच कळतो आहे, खरं माना अथवा मानू नका. शष्प म्हणजे काहीही दम नसणे या लाक्षणिक अर्थाने मी आजवर तो शब्द ऐकत आलो आहे.
प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते.
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.

In reply to by यकु

वपाडाव 19/10/2011 - 11:07
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.
हेच म्हणतोय.... आमच्यासाठी मराठी संस्थळ म्हणजेच मिसळपाव...... आता तुम्ही जर आम्हाला झापडा लावलेले घोडे म्हणाल तर तेही मान्य.... पण मिपा इस मिपा.....

In reply to by यकु

"शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद..." "कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे...." "वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद..." वा, वा, यशवंतराव! आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!! जियो!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नेत्रेश 19/10/2011 - 06:31
> आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे डोळ्यासमोर ऐश्वर्या राय 'त्या' कॉस्चुममध्ये' हातात तंबोरा (वीणा म्हणवत नाही) घेऊन नाचताना दीसली. तसेच आमच्या पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो.

In reply to by पिवळा डांबिस

श्रावण मोडक 19/10/2011 - 11:26
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. :)

In reply to by श्रावण मोडक

गणपा 19/10/2011 - 13:03
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. Smile
श्रामोंशी बाडिस.

In reply to by पिवळा डांबिस

लेखनाचे तात्पर्य येवढेच की अजुनही तुम्हाला तुमची कातडी गेंड्याची बनवण्यात यश आलेले नाही. असो... @ पिडांकाका
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

@नेत्रेशः पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो. जरूर! निषेध नोंदवणं हा तुमचा हक्क आहे! बाकी, पुज्य देवता नाही; पूज्य देवता असं लिहितात!!! तुम्ही चुकीचं लिहिल्याबद्दल आम्ही आपला एक ऑफिशियल निषेध नोंदवून ठेवतो!! :) @श्रामो आणि गंपा: का साल्यो माझ्या मागे हात धुवून लागलांय? च्यामारी, आता "लास वेगास: काही नोंदी तशातशाच!!" किंवा "ऑक्टोपसच्या कलामारीची रेसेपी" असंच काहीतरी लिहितो बघा!! :) @ परा: आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले खीक!! एम एफ डांबिस? पण आमचं तुमच्या खारी-बटरवाल्याशी काहीही नातं नाही हे निक्षून सांगतोय!!! :)

In reply to by चतुरंग

काळेकाका, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! बाकी चतुरंगाने वर लिहिलंय त्याच्याशी सहमत. विशेषतः, मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे.... इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. माझ्या मते हीच मिसळपावची निश् आहे. ज्या दिवशी मिसळपावमधून हे जे काही 'हटके' आहे ते काढून टाकून त्याला इतर संस्थळांसारखं (भलं होवो त्यांचं बिचार्‍यांचं!) बनवण्यात येईल त्या दिवसापासून मिपाचा र्‍हास सुरु होईल असं माझं मत आहे... असो. आपला सस्नेह, पीतठक

मन१ 18/10/2011 - 23:44
तुम्ही काही दिवसानी इथे पुन्हा लिहु लागलात तर तुमचे लेखन वाचता येते म्हणून बरे वाटेल. तुम्ही आलाच नाहित तर तुम्ही आहात तिथे अत्यंत comfortable असल्याचे पाहून बरे वाटेल. तुमच्या लिखाणाच्या निमित्तानं बर्‍याच गोष्टी नव्यानं माहिती होत होत्या. पण असो. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेउन इथे थांबणं तुमच्यासारखच मलाही आवडणार नाही. http://mr.upakram.org/node/3180#comment-54117 इथे एक ओळ सापडली.... 'राम-कृष्णही आले-गेले, जग का त्यांविण ओसची पडले' असे कायसे आहे बघा!

इथे कुणाला अक्षत, हत्ती, घोडे,हेलीकॉप्टर वरुन आमंत्रण पाठवत नाहीत. आपल्या मर्जीने यायचे. आपल्या मर्जीने जायचे. उगाच ग्लोरीफिकेशन कशाला? राहता राहीले कंफर्ट लेवल चे. यू कम फॉर द टेबल ऑन युअर ओन बॉस. चतुरंग, श्रा.मो. पि.डां शी सहमत.

इरसाल 19/10/2011 - 11:19
काही मान्यवर, आदरणीय, जेष्ठ आणि सुटसुटीत सदस्यांनी आपापले ताट फिरवून बघावे असे राहून राहून वाटत आहे. कार्पोरेटाच्या भाषेत टर्न द टेबल असा कायसं हाये म्हणे.

योगप्रभू 19/10/2011 - 12:43
'तुम्हाला कुणी अक्षत घेऊन इथे बोलावलं नव्हतं', अशी भाषा चांगली नव्हे. सुधीर काळे, इथे तुमची आणि रागाने प्रतिक्रिया देणार्‍या दोघांचीही चूक होत आहे, असे मला वाटते. तुम्हाला सुरवातीपासून कम्फर्टेबल वाटत नव्हते तर तुम्ही मिपाच्या चालकांना/संपादक मंडळाला किंवा ज्यांच्या आग्रह/आमंत्रणावरुन येथे आलात त्यांना येथे खटकणार्‍या गोष्टींची कल्पना दिली होतीत का? अनेक वर्ष संसार केल्यावर एखाद्या गृहिणीने एकदम उठावे आणि म्हणावे, 'मला बाई खरं तर पहिल्यापासून हे स्थळच पसंत नव्हतं,' मग लोक चेष्टा करणारच हो. मला अजुनही वाटते, की तुम्हाला थांबायचे तर थांबा, पण खटकलेल्या गोष्टी जाहीर चिकित्सा न करता चालक/संपादक मंडळाला व्य. नि. तून कळवा. किमान त्यांना पुढील धोरणे ठरवताना विचार करता येईल. आता थोडेसे 'जायचंय तर जा' दृष्टीकोनाविषयी.. मला एक जुना प्रसंग आठवला. माझ्या कार्यस्थळी एकदा दुसर्‍या विभागात काम करणारा एक सहकारी आपली निराशा माझ्या वरिष्ठांपुढे मांडत होता. कम्फर्टेबल वाटत नसल्याने कामात रस नाही, वगैरे ऐकल्यावर आमचे वरिष्ठ म्हणाले, ' अहो पण इथे नोकरी करा म्हणून कुणी तुमच्या घरी अक्षत घेऊन आले नव्हते. तुमची लायकी इथल्यापेक्षा जास्त आहे, असे वाटत असेल तर जा दुसरीकडे.' त्यावर हिरमुसलेला तो सहकारी निघून गेला. मग साहेबांनी माझ्याकडे वळून विचारले, 'तुला काय वाटते? अशा लोकांना बाहेरचा रस्ताच दाखवायला हवा ना?' त्यावर मी म्हटलो, 'सर! मी खरं सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमचं १०० टक्के चुकलं. सहानुभूतीने विचारपूस करुन काही फुंकर घालण्यासारखे तुम्ही बोलला असतात तर काही बिघडलं नसतं. आता तो माणूस नोकरी तर सोडेलच, पण तुमची प्रतिमाही त्याच्या मनात फार उजळ नसेल.' जिथं तेलाचा थेंब टाकून पायातील काटा निघतो तिथे सुईने टोकरायची गरज नसते, हे माझे वैयक्तिक मत..

In reply to by मदनबाण

नगरीनिरंजन 19/10/2011 - 13:27
तुम्हाला तुमच्या पुढच्या उपक्रमांसाठी (श्लेष अभिप्रेत नाही) शुभेच्छा!

In reply to by योगप्रभू

प्रतिक्रिया रागात नाहीये. आमंत्रण मला पण मिळाले होते. त्याने काय होते? संकेतस्थळावर ३ वर्षे वावरुन स्वःता चा स्व कंडु शमवुन जाताना कंफर्ट लेवल च्या गोष्टी करणे योग्य नाही. म्हणजे भरपुर जेवुन उठताना पाटावर बसण्याच्या (किंवा तत्सम) व्यवस्थेबद्दल टीका करण्यासारखे आहे.

समीरसूर 19/10/2011 - 14:50
काळेकाका, असं होतं कधीतरी, राहिल्यानंतरही का राहिलो असं वाटतं... असं माझ्याही बाबतीत झालंय. एक विचित्र कोंडी झाल्यासारखी वाटते काही परिस्थितींमध्ये. फक्त ते सांगायचं कसं हा कळीचा मुद्दा असतो. इतरांना वाईट न वाटू देता आपली भावना व्यक्त करायची म्हणजे कठीण काम असतं...असो. आपलं लिखाण छान असतं. थांबवू नये असं वाटतं... प्रतिसाद, टीका, गंमती-जमती, खेचा-खेची, नाके मुरडणे, रुसवे-फुगवे हे सगळं चालायचचं...याशिवाय मजा नाही आयुष्यात. :-) ज्या सहजतेने आपण दोन दिवसापूर्वी जेवणात खाल्लेलं विसरून जातो त्याच सहजतेनं हे ही विसरणे चांगले. व्यक्ती म्हटल्या की मतभिन्नता आलीच. आणि मतभिन्नता असल्याशिवाय सांगोपांग चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे ही गंमत अनुभवयाला तरी तुम्ही मिपावर रहावे असे वाटते. बाकी आपली मर्जी. आपलीच माणसे आहेत ही सगळी मिपाकर मंडळी. त्यांच्याबाबतीत काय रुसवा? --समीर

विसोबा खेचर 19/10/2011 - 17:49
काळेसाहेब, वाटल्यास थोडा ब्रेक घ्या परंतु पुन्हा येथे अवश्य अवश्य या, असे आपल्याला आग्रहाचे सांगणे.. आपल्यासारखी ज्येष्ठ, वरीष्ठ, अनुभवी मंडळी मिपावर नक्कीच हवीत.. आपला नम्र, तात्या.

In reply to by अश्फाक

वाहीदा 19/10/2011 - 22:46
दिलसे एहतिराम हमेशा खुद्दारी का होता हैं ,चापलुसी, मग्रुरी और बत्त-तमीजी का नहीं एहतिराम - सन्मान

पक्या 19/10/2011 - 21:39
>>जिथं तेलाचा थेंब टाकून पायातील काटा निघतो तिथे सुईने टोकरायची गरज नसते, हे माझे वैयक्तिक मत.. एकदम पटलं . उगाच वर काहिंनी तिखट प्रतिक्रिया लिहिल्या आहेत त्या लिहिण्याची तशी गरज नव्हती असं जाणवलं काळे काका, आपण ब्रेक न घेता इथे अधूनमधून लिहिते रहावे असे वाटते.

वाहीदा 19/10/2011 - 22:47
काळेकाका, तुमचा हा लेख तुम्ही जेव्हा मला Review करायला दिला होता तेव्हा क्षणभर ही मला वाटले नाही की हा लेख योगायोगाने मिसळपाव साठी तुमचा 'अलविदा' ठरेल . Sad !! :-( पण बरेच दिवस आधी हे जाणवत होते के - कभी ना कभी यह होके रहेगा. खैर, है एहतिजाज का शोला , कि इन्कलाब का शोर, यह मेरे दिल में दहकता अलाव कैसा है ? (एहतिजाज - हुज्जत, वादविवाद ) इस ढलती उम्र में भी तुम मिसलपाव पर एक वोह आफ्रोज सितारा (One that Brightens) बनकर उभरे थे की नौजवांनोंकोभी अपनी सोचमें गौर फरमानेंकी जरुरत महेसुस हुई !! इससे ज्यादा और क्या कहें ? खुदा तुम्हें तंदुरुस्ती अता फर्मायें . आमीन ! हम हमेशा ही तुम्हारा एहतिराम करेंगे चाचा ! (एहतिराम - सन्मान ) "हाफिज खुदा तुम्हारा ! "

गवि 18/10/2011 - 14:26
मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच. जसे जायला कुठलेही ठाम (एकादी घटना वगैरे) कारण नाहीं तसेच कधी परत आलोच तर त्यालाही कांहीं 'ठाम' कारण लागेलच असे नाहीं. मूड आलाच तर काश्मीरवरील फरूक अब्दुल्ला यांच्या "बहु बायकात बडबडला"ची खबर घ्यायला एकदा येईन. ....................... उपरिनिर्दिष्ट वाक्यांमधून तुम्हाला जावंसं वाटत नाही असंच जास्त वाटतंय. तर मग थांबाच की.. नकाच जाऊ.. :)

रश्मि दाते 18/10/2011 - 14:27
आज खुप दिवसांनी मि पा वर आले,आपल्या धाग्यावर प्रतीसाद दिला आणि आता हा धागा दिसला,असे करु नका हो आपले लीखाण आवडते आम्हाला,

वपाडाव 18/10/2011 - 14:34
काळेकाका, यांना विणंती आहे की मिपावरुन रजा घेउ नये.... मागे अवलियांनी रजा घेतली, काही दिवसांपुर्वी पंगा ब्यान झाले.... हे काही बरे वाटत नाही..... मिपावरील जाणत्या मंडळींनी exit घेतल्यास नवीन सदस्यांना प्रोत्साहन कसे येणार? आपल्यासारखी मंडळी ही मिसळपावचा ठेवा आहेत..... तरीही, ही तात्पुरती रजा लौकरात लौकर संपावी.... अन आपण पुन्हा येथे सक्रिय व्हावे हीच इ. प्रा......

विजुभाऊ 18/10/2011 - 14:45
काळेकाका मिपावर काही अनुभव जरा वेगळेच येतात. ते तसे बर्‍याच जणाना येतात. वयाचे वगैरे म्हणाल तर तुम्ही सिनीयर आहात वगैरे असे आम्हाला कधी वाटलेच नाही. ( तुमच्याशी फोनवर बोलेपर्यन्त) एखाद्या गेटटुगेदर ला भेटला असतात तर तुम्हाला अजून वेगळेच लोक दिसले असते. तुम्ही इथे पाकिस्तान विषयक लिहीत होतात ती माहिती इथे नवीनच होती "जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा, तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो" या अनुभवातून प्रत्येकजण कधीना कधी गेलेला असतो. थोडा विचार केला तर हे शब्द फार वेगळे सांगून जातात. अर्थात हे श्रेय गीतकाराचे. जगजीत सिंगाच्या गाण्यातील महत्वाचा भाग म्हणजे त्यानी निवडलेल्या गजला सोप्या असायच्या. चाली गुणगुणता येतील अशा सोप्या असायच्या. त्या श्रोत्यांपर्यन्त पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मात्र कडक सॅल्युट.

In reply to by विजुभाऊ

पाषाणभेद 18/10/2011 - 14:52
विजूभौ, जगजीत सिंगांनी गायलेल्या गझला कुणी लिहीलेल्या होत्या? चारदोन नावे देता येतील का? माझा अभ्यास जरा कच्चा आहे, अन होमवर्क तर करतच नाही मी.

In reply to by पाषाणभेद

विजुभाऊ 18/10/2011 - 16:02
फिराख गोरखपुरी , कतील शिफाई ,मिर्झा गालीब ,निदा फाजली सुदर्शन फकीर ,.बहादूर शहा जफर ही काही नावे. काही गजला मिश्र होत्या.

मदनबाण 18/10/2011 - 14:51
ह्म्म्म... काळे काका, एक मिपा सदस्य म्हणुन मला तुम्हाला विनंती करायची आहे,की कॄपया असा निर्णय घेउ नका. फक्त तात्पुरती रजा घेण्यास हरकत नाही,पण परत याच... चांगले सदस्य असे जायला लागले तर आमचे कसे व्ह्यायचे ? तुमच्या अभ्यासाची,अनुभवाची गरज आम्हाला आहे... तुम्हाला इथे कोणता त्रास होत आहे का ? तसे असल्यास संपादकांना /नीलकांतला त्या बद्धल नक्की सांगा. संपादीत.

गणपा 18/10/2011 - 15:04
तात्पुरते जावे की कायमचे जावे आदी निर्णय हे ज्या त्या सदस्यांचे खाजगी निर्णय आहेत. त्यामगे त्यांची काही खाजगी कारणे असु शकतात. ती जाणुन घेण्याचा हक्क मला नाही. त्यामुळे मी एक सामान्य वाचक म्हणुन तुमचा जो काही निर्णय आहे त्याचा आदरच करतो. पण त्याच बरोबर वर आलेलेल्या बर्‍याच प्रतिसादावरुन इथे आपल्या लिखाणाचे बरेच चहाते आहेत याची ही नोंद घेतली जावी. आपल्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा. -गणपा

ऋषिकेश 18/10/2011 - 15:11
आपल्या राजकीय विचारांत मतभेद असले तरी त्यासंबंधी काथ्याकूट करताना वैयक्तिक टिपणी आपण कटाक्षाने टाळायचात ही आठवण - प्रतिमा- कायम स्मरणात राहिल :) असो. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!

दिगम्भा 18/10/2011 - 15:19
काळेजी, तुमचे लिखाण आवडते, असा निर्णय घेऊ नका, एवढे सांगण्यासाठीच लॉगिन केले आहे. लेखन करावे, आम्ही वाचनमात्र का होईना वाचणारे आहोत. - दिगम्भा

सुहास.. 19/10/2011 - 12:11
निर्णयाविषयी लेखनसीमा, मात्र दंगा-मस्तीच्या नादात माझ्याकडुन एखादा शब्द उणा-दुणा गेला असल्यास क्षमस्व ! सुहास.. ------------------ क्काय ! आज तुम्ही राम-नामाचा जप करणार्‍या भगिनीची छेड नाही काढलीत, छ्या! राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या घालणार्‍या माजोरड्या देशातुन, आंजावर विज्ञान-प्रचार कसा करणार मग तुम्ही !

अमोल केळकर 18/10/2011 - 15:51
आपले लिखाण नेहमीच आनंद देवून गेले :) मला माहित नाही तुम्हाला आठवते की नाही पण मी मुकंद कंपनीत काम करतो म्हणल्यावर तुम्ही एकदा आवर्जून फोन केला होतात आणि आपण बोललो होतो. त्यानंतर अनेक दिवस मी मुकंद मधे कॉलर टाईट करुन फिरत होतो की मी काळे साहेबांना ओळखतो. असो. बघू या प्रत्यक्षात आपणास भेटायच योग येतो की नाही अमोल केळकर

श्रावण मोडक 18/10/2011 - 16:04
सुधीर काळे यांच्याकडून अनपेक्षीत.
या संस्थळावर...आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं.
हे विधान कशासाठी? कंफर्टेबल वाटत नव्हतं तर तेव्हाच वावरणं बंद करायचं. ते न करता, तेव्हा धाग्यावर धागे काढले (जे इथले उद्दिष्ट्यच आहे), एक पुस्तकही इथं लिहिलंत. आणि आता, कम्फर्टेबल वाटत नाही, ही टिप्पणी?
कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील.
याला काहीही अर्थ नाही. सामंत का बाहेर पडले वगैरे बाजूला ठेवा. तुमच्यापुरते बोला. तुमचे लेखन मी वाचले आहे. त्यावर कधी साधक, सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. कधी त्यावर टीकाही केली आहे. पण तशा स्वरूपाचा संवाद अपेक्षीत नसेल तर अशा संस्थळांवर वावरू नये. आपल्यापुरती वेबसाईट काढावी स्वतःची आणि खुशाल नांदावे. अधिकाधिक लोकांनी वाचावे म्हणून सार्वजनिक संस्थळावर यायचे, सारे एन्जॉय करायचे, आणि मागाहून त्या संस्थळाची गुणवत्ता, श्रेणी, चारित्र्य याविषयी संदिग्ध टिप्पणी करायची हा कृतघ्नपणा आहे. काळे यांच्याकडून तो अपेक्षीत नाही. (हे लेखन त्यांनी भावनेच्या भरात केले असेल तर ते संपादित करून माझा हा प्रतिसाद उडवावा.) याच धाग्यावर 'काळे यांनी रजा घेऊ नये,' असे सांगणारे प्रतिसाद आहेत ते या संदर्भात बोलके आहेत. तेही काळे यांना कम्फर्टेबल वाटत नसेल तर आणि फक्त तेच त्यांच्या कम्फर्टला पूरक असतील तर मात्र नक्कीच त्यांनी इथून मोकळे व्हावे हे उत्तम. हे आणि अशी स्थळे त्यांच्यासाठी नाहीत. वेगळ्या वाटा आहेत, असं वाटतंय ना? वेगळ्या वाटेवर रहा.

प्रास 18/10/2011 - 16:30
सहभागी लेखक म्हणून मिपावर राहणे किंवा न राहणे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा आदर राखण्याचा प्रयत्न राहील. मात्र तुमचे लिखाण आणि खरडफळ्यावरच्या खरडी (ज्या बर्‍याचदा उत्तम कार्टून्सच्या स्वरूपातही असायच्या) दोन्ही आवडायचे आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायचे प्रयत्नही केले आहेत हे इथे नोंदवून ठेवतोय. भारताबाहेर राहून भारत-पाक संबंधाविषयीची आणि जागतिक घडामोडींसंदर्भात तुमची मतं मांडून एका नव्या दृष्टीकोनातून या समस्येकडे बघायची सवय तुम्ही आम्हाला लावलेली. आत्ताही तुमच्या 'ऑक्युपाय स्टॉक मार्केट', 'लिबीया घडामोडी' आणि 'चीनची आगळीक' यावर लेख येतील या अपेक्षेत असताना तुमचा एक्झिट सांगणारा हा लेख दिसला. असो. तुम्हाला उपरति होईल अशी आशा आहे. तोपर्यंत "शिवास्ते पन्थानः।" @ प्रस्तुत लेखासंदर्भात - जगजीतसिंहांच्या काही गजलांचे अर्थ समजल्याने आता त्या जास्तीच आवडू लागल्या आहेत. धन्यवाद काळेकाका!

आत्मशून्य 18/10/2011 - 16:52
बाकी निघण्याचा विषय सार्वजनीक कशासाठी ? व्यनीमधे ही चर्चा होऊ शकतेच की ? बाकी सध्या मिपा जरा जास्तच कडक झालयं हे मात्र खरयं पण म्हणून लगेच एग्जिट योग्य न्हवे.

नमस्कार काळे काका, आपण मिपावर विविध विषयांवर लिहिले आहे. बर्‍याचदा साधक-बाधक चर्चा झाल्या. कधी दर्जेदार प्रतिसाद आले तर कधी काही प्रतिसादातून टींगल-टवाळीही झाली. खरडफळ्यावरील व्यंगचित्रेही तितकीच झकास असायची. आपल्या काही लेखनाची उंची अधिक असल्यामुळे कदाचित आपल्या उंचीवरुन आम्हाला काही लेखनाचा आस्वादही कधी कधी घेता आला नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या वृती प्रवृतीची माणसं एकाच ठिकाणी आल्यावर त्यांच्या विविध विचारांसोबत त्यांच्या गुण-दोषांसह एकमेकांना स्वीकारतो कधी फटकारतोही तेव्हा असे अनुभव काही विशेष नसावेत. मात्र, सुखद क्षणांपेक्षा त्रासदायक प्रवृती-प्रतिसादांचा कधी कधी त्रासही होत असतो. आणि मग वाटायला लागतं की सालं बस झालं आता. आणि मग कोणत्या तरी क्षणी 'अलविदा' म्हणायला मन उतावीळ व्हायला लागते. असेच आपले झाले असावे किंवा आपल्या काही खासगी कारणांमुळे आपल्याला पुढे अधिक मोकळा वेळ मिळणार नसेल हेही कारण असेल परंतु दीडशेपेक्षा अधिक लेख लिहिल्यानंतर (सर्व प्रकारचे लेखन) आज मिपाला 'अलविदा' करण्याचे जे comfortable चे कारण सांगत आहात ते मला तरी अजिबात पटत नाही. असो, आपण मिपावर असेच विविध विषयांवर लिहित राहावं असं मला वाटतं. फार तर एक मोठा ब्रेक घ्या. एक महिनाभर, पंधरा दिवस, आणि नव्या उत्साहाने पुन्हा इथे लिहिण्यासाठी या. बाकी, मिपावर लिहावं की न लिहावं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. अवांतर : सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. :) तमाम रिश्तों को मै घर पे छोड आया था. फिर उस के बाद मुझे कोई अजनबी न मिला. -बशीर बद्र. -दिलीप बिरुटे (आपला पुतण्या)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 18/10/2011 - 17:21
सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. काय हो औरंगाबाद आणि राळेगणसिद्धी यात अंतर कमी झालं हाय काय ? नाय कारण अण्णा पण अमर्यादित काळा पर्यंत मौन घेउन बसले आहेत म्हणे ! ;) (बाबा मौनी मराठी) ;)

रेवती 18/10/2011 - 20:26
आज तुम्हाला व्य. नी तून विचारणारच होते की या वर्षी कोणत्या दिवाळी अंकात तुमचा लेख छापून येतोय म्हणून! तर तुम्ही ही बातमी दिलीत.:( तुम्ही मिपावर कंफर्टेबल नव्हता हे आधीपासूनच जाणवत होते. पुन्हा यावेसे वाटले तर स्वागतच आहे.

अर्धवटराव 18/10/2011 - 22:43
थोरामोठ्यांनी पानसुपारीचं आगोदरच लिहिलय... त्यात आणखी नवीन काय भर घालणार मी.... पण तुमच्या अन्कंफर्टेबल वाटण्याचं कारण काहि पल्ले नहि पडा... वय म्हणत असाल, तर तुमच्या वयाला साजेसे , अनुभवाने-ज्ञानाने मुरलेले अनेक रथी महारथी इथे मैफील जमवुन बसलेत... मग तुमचा बेरंग का व्हावा ? आता कुठे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नवे डाव मांडल्या जात आहेत, त्यावर अभ्यासपूर्ण लेखन हि तुमची खासियत आणि वाचकांना पर्वणी... मग इतका इंटरेस्टींग माहोल असताना तुम्हाला एक्झीट घ्याविशी वाटतेय... स्ट्रँज... वांजळे काकु हरल्याचं दु:ख म्हणावं काय? ;) असो... सी यू सून. (पुतण्या) अर्धवटराव

चतुरंग 18/10/2011 - 22:45
मला असं वाटतं की तुमचा बराच गोंधळ उडालाय. मिसळपाववर येण्याआधीच्या जालीय अनुभवातून काही एक विविक्षित हेतू ठेवून तुम्ही इथे आला असाल असे वाटते. तुमच्या आधीच्या अनुभवाशी मेळ बसणारे असे इथे काही आढळते का हे चाचपडणे बराच काळ चालले असेही वाटते. त्यादरम्यान तुम्ही अनेक धागे काढून इथल्या लोकांची प्रकृती आणि प्रवृत्ती आजमावत राहिलात. मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे हे इतर ठिकाणी जाऊन आल्याशिवाय उमगत नाही हे खरे. इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद लोकांकडून मिळत नाही असे तुम्हाला वाटत राहिले कारण तुम्ही एकाच चौकटीतून बघत राहिलात. तुम्हाला जे इश्यूज ज्वलंत वाटले ते इतरांनाही वाटावेत असा तुमचा आग्रह बर्‍याचदा दिसला. तसे होत नाही म्हटल्यावर मग तुमच्या मनातून संस्थळ उतरु लागले. पण म्हणून संस्थळाला आणि सभासदांनाच नावे ठेवून इथून तुम्ही जाणे हे पटत नाही. तुम्हाला जायचे असल्यास (मर्यादित काळासाठी किंवा कायमचे) तो तुमचा वैयक्तिक मामला आहे. त्यासाठी इतरांना दोष देणे पटत नाही. आत्ताही तुम्हाला मनातून जाऊ की नको, जाऊ की नको असे वाटतच आहे हे तुमच्या लेखनातून दिसते. जो काय निर्णय घ्याल त्यासाठी शुभेच्छा! :) -रंगा

In reply to by चतुरंग

यकु 18/10/2011 - 23:05
इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही.
१०००% सहमत आहे. सध्या हपिसातून फक्त मिपा वगळता मराठीतली सगळी संकेतस्थळे दिसत असल्याने गेल्या आठ-पंधरा दिवसांत जवळपास सगळ्या मसंवरील लिखाणाचे खोदकाम केले... त्यातून हे अगदी १०००% पटले. काही ठिकाणी अगदी शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) ठेवत, कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे, अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद पाहिले की मिपा काय चीज आहे ते कळते.

In reply to by यकु

मन१ 18/10/2011 - 23:38
व्वा. शब्द संग्रह व शब्द पखरण आवडली. शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) आणि अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद ही दोन्ही वाक्ये त्यातही "शून्य मूल्याची घोटीव" हा वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वाचून पाहिला. आपण पत्रकार नसावात. पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे.

In reply to by मन१

यकु 18/10/2011 - 23:56
>>>आपण पत्रकार नसावात. या वाक्यापूर्वी "व्यक्तिगत होत असेल तर क्षमा करा" हे लिहायचं राहिलं ;-) >>>पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे. आणि इथं "हे अवांतर संपादकांनी उडवले तरी माझी हरकत नाही" असं लिहायचं राहिलं ;-) दर प्रतिसादात वर ठळक शब्दात दिलेल्या वाक्यांचे सारण भरलेल्या प्रतिसादांची सवय झालेल्या लोकांना मिपाची ठसका लाऊन नाकातून पाणी काढणारी चव मानवत नाही. असे सदस्य सहसा 'ज्येष्ठ नागरिक' असतात असेही निरिक्षण आहे.

In reply to by यकु

धनंजय 19/10/2011 - 01:03
मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो. प्रत्येक संकेतस्थळाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वरील दोन्ही प्रतिसादांच्या प्रमुख आशयाशी असहमत आहे. (म्हणजे "मिसळपावात वैशिष्ट्य आहे" याच्याशी सहमत आहे. पण अन्य संकेतस्थळांची नालस्ती केल्याशी असहमत आहे.) तर्री मला आवडतेच. पण रबडी, कोरा चहा या दोन्ही गोष्टी मी तर्री न मिसळता चाखतो. घोटीव रबडी किंवा शष्प* कोरा चहा नावडणे ठीकच आहे. पण या गोष्टी आवडीने चाखणार्‍या लोकांची चर्या कशी असते? त्याची नक्कल रबडी/चहा नावडणार्‍याने केली, तर नकलेत कडू/मळमळणारे तोंडच दिसेल. प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते. त्याचे स्मरण मिसळपावावरील सुस्थापित सदस्यांना अंधुकच होत असेल. आणि व्यत्यासही खराच. तरी उदास वाटते. (त्यानंतरही "इथे मारे सांगतोस, तिथे का नाही सांगत?" छाप प्रतिसाद येऊ शकतील, त्याचे आधीच उत्तर देतो : मी अन्य संकेतस्थळांवरही "सर्व संकेतस्थळांचे आपले-आपले वैशिष्ट्य" असे समर्थन करतो.) - - - *"शष्प" शब्दाचे सामान्य अर्थ आहेत : (१) कोवळे गवत आणि (२) कमरेखालील इंद्रियांवरचे केस. वरील प्रतिसादात कुठला अर्थ अपेक्षित होता, ते मला ठाऊक नाही. पण जो काय अर्थ लाक्षणिक अर्थाने त्यांनी नावडत्या लेखनाला लावला, तोच लाक्षणिक अर्थ कोरा चहा नावडणारा व्यक्ती कोर्‍या चहाला लावेल, असे मी मानतो. "शष्प"सारख्या घोटीव शब्दांची प्रगल्भ परमावधी सर्वच संकेतस्थळांवर वाचकांना आवडते. "लव्हाळे" शब्दात नावड नाही. "शें*" शब्दात द्वर्थ नाही, शिवाय संपादित होण्याची शक्यताही फार आहे. या शर्करेला द्व्यर्थाची साल असल्यामुळे "शष्प" शब्दाची निवड ही अतिशय कुशल आहे.

In reply to by धनंजय

शिल्पा ब 19/10/2011 - 02:08
सगळ्यांना एक विनंती: असं वर लिहीलंय तसं करड्या रंगातलं वाचायला खुप त्रास होतो त्यापेक्षा जरा भडक रंगात लिहिलं तर वाचता येईल.

In reply to by धनंजय

यकु 19/10/2011 - 09:52
धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून कुठल्याही संकेतस्थळाची नालस्ती केलेली नाही. हां, माझे शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर विशिष्ट संकेतस्थळ उभं रहात असेल तर त्याला ती गोष्ट वेगळी. शष्पचा तुम्ही सांगितलेला क्रमांक २ चा शब्दकोशातला अर्थ मला पहिल्यांदा इथेच कळतो आहे, खरं माना अथवा मानू नका. शष्प म्हणजे काहीही दम नसणे या लाक्षणिक अर्थाने मी आजवर तो शब्द ऐकत आलो आहे.
प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते.
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.

In reply to by यकु

वपाडाव 19/10/2011 - 11:07
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.
हेच म्हणतोय.... आमच्यासाठी मराठी संस्थळ म्हणजेच मिसळपाव...... आता तुम्ही जर आम्हाला झापडा लावलेले घोडे म्हणाल तर तेही मान्य.... पण मिपा इस मिपा.....

In reply to by यकु

"शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद..." "कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे...." "वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद..." वा, वा, यशवंतराव! आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!! जियो!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नेत्रेश 19/10/2011 - 06:31
> आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे डोळ्यासमोर ऐश्वर्या राय 'त्या' कॉस्चुममध्ये' हातात तंबोरा (वीणा म्हणवत नाही) घेऊन नाचताना दीसली. तसेच आमच्या पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो.

In reply to by पिवळा डांबिस

श्रावण मोडक 19/10/2011 - 11:26
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. :)

In reply to by श्रावण मोडक

गणपा 19/10/2011 - 13:03
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. Smile
श्रामोंशी बाडिस.

In reply to by पिवळा डांबिस

लेखनाचे तात्पर्य येवढेच की अजुनही तुम्हाला तुमची कातडी गेंड्याची बनवण्यात यश आलेले नाही. असो... @ पिडांकाका
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

@नेत्रेशः पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो. जरूर! निषेध नोंदवणं हा तुमचा हक्क आहे! बाकी, पुज्य देवता नाही; पूज्य देवता असं लिहितात!!! तुम्ही चुकीचं लिहिल्याबद्दल आम्ही आपला एक ऑफिशियल निषेध नोंदवून ठेवतो!! :) @श्रामो आणि गंपा: का साल्यो माझ्या मागे हात धुवून लागलांय? च्यामारी, आता "लास वेगास: काही नोंदी तशातशाच!!" किंवा "ऑक्टोपसच्या कलामारीची रेसेपी" असंच काहीतरी लिहितो बघा!! :) @ परा: आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले खीक!! एम एफ डांबिस? पण आमचं तुमच्या खारी-बटरवाल्याशी काहीही नातं नाही हे निक्षून सांगतोय!!! :)

In reply to by चतुरंग

काळेकाका, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! बाकी चतुरंगाने वर लिहिलंय त्याच्याशी सहमत. विशेषतः, मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे.... इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. माझ्या मते हीच मिसळपावची निश् आहे. ज्या दिवशी मिसळपावमधून हे जे काही 'हटके' आहे ते काढून टाकून त्याला इतर संस्थळांसारखं (भलं होवो त्यांचं बिचार्‍यांचं!) बनवण्यात येईल त्या दिवसापासून मिपाचा र्‍हास सुरु होईल असं माझं मत आहे... असो. आपला सस्नेह, पीतठक

मन१ 18/10/2011 - 23:44
तुम्ही काही दिवसानी इथे पुन्हा लिहु लागलात तर तुमचे लेखन वाचता येते म्हणून बरे वाटेल. तुम्ही आलाच नाहित तर तुम्ही आहात तिथे अत्यंत comfortable असल्याचे पाहून बरे वाटेल. तुमच्या लिखाणाच्या निमित्तानं बर्‍याच गोष्टी नव्यानं माहिती होत होत्या. पण असो. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेउन इथे थांबणं तुमच्यासारखच मलाही आवडणार नाही. http://mr.upakram.org/node/3180#comment-54117 इथे एक ओळ सापडली.... 'राम-कृष्णही आले-गेले, जग का त्यांविण ओसची पडले' असे कायसे आहे बघा!

इथे कुणाला अक्षत, हत्ती, घोडे,हेलीकॉप्टर वरुन आमंत्रण पाठवत नाहीत. आपल्या मर्जीने यायचे. आपल्या मर्जीने जायचे. उगाच ग्लोरीफिकेशन कशाला? राहता राहीले कंफर्ट लेवल चे. यू कम फॉर द टेबल ऑन युअर ओन बॉस. चतुरंग, श्रा.मो. पि.डां शी सहमत.

इरसाल 19/10/2011 - 11:19
काही मान्यवर, आदरणीय, जेष्ठ आणि सुटसुटीत सदस्यांनी आपापले ताट फिरवून बघावे असे राहून राहून वाटत आहे. कार्पोरेटाच्या भाषेत टर्न द टेबल असा कायसं हाये म्हणे.

योगप्रभू 19/10/2011 - 12:43
'तुम्हाला कुणी अक्षत घेऊन इथे बोलावलं नव्हतं', अशी भाषा चांगली नव्हे. सुधीर काळे, इथे तुमची आणि रागाने प्रतिक्रिया देणार्‍या दोघांचीही चूक होत आहे, असे मला वाटते. तुम्हाला सुरवातीपासून कम्फर्टेबल वाटत नव्हते तर तुम्ही मिपाच्या चालकांना/संपादक मंडळाला किंवा ज्यांच्या आग्रह/आमंत्रणावरुन येथे आलात त्यांना येथे खटकणार्‍या गोष्टींची कल्पना दिली होतीत का? अनेक वर्ष संसार केल्यावर एखाद्या गृहिणीने एकदम उठावे आणि म्हणावे, 'मला बाई खरं तर पहिल्यापासून हे स्थळच पसंत नव्हतं,' मग लोक चेष्टा करणारच हो. मला अजुनही वाटते, की तुम्हाला थांबायचे तर थांबा, पण खटकलेल्या गोष्टी जाहीर चिकित्सा न करता चालक/संपादक मंडळाला व्य. नि. तून कळवा. किमान त्यांना पुढील धोरणे ठरवताना विचार करता येईल. आता थोडेसे 'जायचंय तर जा' दृष्टीकोनाविषयी.. मला एक जुना प्रसंग आठवला. माझ्या कार्यस्थळी एकदा दुसर्‍या विभागात काम करणारा एक सहकारी आपली निराशा माझ्या वरिष्ठांपुढे मांडत होता. कम्फर्टेबल वाटत नसल्याने कामात रस नाही, वगैरे ऐकल्यावर आमचे वरिष्ठ म्हणाले, ' अहो पण इथे नोकरी करा म्हणून कुणी तुमच्या घरी अक्षत घेऊन आले नव्हते. तुमची लायकी इथल्यापेक्षा जास्त आहे, असे वाटत असेल तर जा दुसरीकडे.' त्यावर हिरमुसलेला तो सहकारी निघून गेला. मग साहेबांनी माझ्याकडे वळून विचारले, 'तुला काय वाटते? अशा लोकांना बाहेरचा रस्ताच दाखवायला हवा ना?' त्यावर मी म्हटलो, 'सर! मी खरं सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमचं १०० टक्के चुकलं. सहानुभूतीने विचारपूस करुन काही फुंकर घालण्यासारखे तुम्ही बोलला असतात तर काही बिघडलं नसतं. आता तो माणूस नोकरी तर सोडेलच, पण तुमची प्रतिमाही त्याच्या मनात फार उजळ नसेल.' जिथं तेलाचा थेंब टाकून पायातील काटा निघतो तिथे सुईने टोकरायची गरज नसते, हे माझे वैयक्तिक मत..

In reply to by मदनबाण

नगरीनिरंजन 19/10/2011 - 13:27
तुम्हाला तुमच्या पुढच्या उपक्रमांसाठी (श्लेष अभिप्रेत नाही) शुभेच्छा!

In reply to by योगप्रभू

प्रतिक्रिया रागात नाहीये. आमंत्रण मला पण मिळाले होते. त्याने काय होते? संकेतस्थळावर ३ वर्षे वावरुन स्वःता चा स्व कंडु शमवुन जाताना कंफर्ट लेवल च्या गोष्टी करणे योग्य नाही. म्हणजे भरपुर जेवुन उठताना पाटावर बसण्याच्या (किंवा तत्सम) व्यवस्थेबद्दल टीका करण्यासारखे आहे.

समीरसूर 19/10/2011 - 14:50
काळेकाका, असं होतं कधीतरी, राहिल्यानंतरही का राहिलो असं वाटतं... असं माझ्याही बाबतीत झालंय. एक विचित्र कोंडी झाल्यासारखी वाटते काही परिस्थितींमध्ये. फक्त ते सांगायचं कसं हा कळीचा मुद्दा असतो. इतरांना वाईट न वाटू देता आपली भावना व्यक्त करायची म्हणजे कठीण काम असतं...असो. आपलं लिखाण छान असतं. थांबवू नये असं वाटतं... प्रतिसाद, टीका, गंमती-जमती, खेचा-खेची, नाके मुरडणे, रुसवे-फुगवे हे सगळं चालायचचं...याशिवाय मजा नाही आयुष्यात. :-) ज्या सहजतेने आपण दोन दिवसापूर्वी जेवणात खाल्लेलं विसरून जातो त्याच सहजतेनं हे ही विसरणे चांगले. व्यक्ती म्हटल्या की मतभिन्नता आलीच. आणि मतभिन्नता असल्याशिवाय सांगोपांग चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे ही गंमत अनुभवयाला तरी तुम्ही मिपावर रहावे असे वाटते. बाकी आपली मर्जी. आपलीच माणसे आहेत ही सगळी मिपाकर मंडळी. त्यांच्याबाबतीत काय रुसवा? --समीर

विसोबा खेचर 19/10/2011 - 17:49
काळेसाहेब, वाटल्यास थोडा ब्रेक घ्या परंतु पुन्हा येथे अवश्य अवश्य या, असे आपल्याला आग्रहाचे सांगणे.. आपल्यासारखी ज्येष्ठ, वरीष्ठ, अनुभवी मंडळी मिपावर नक्कीच हवीत.. आपला नम्र, तात्या.

In reply to by अश्फाक

वाहीदा 19/10/2011 - 22:46
दिलसे एहतिराम हमेशा खुद्दारी का होता हैं ,चापलुसी, मग्रुरी और बत्त-तमीजी का नहीं एहतिराम - सन्मान

पक्या 19/10/2011 - 21:39
>>जिथं तेलाचा थेंब टाकून पायातील काटा निघतो तिथे सुईने टोकरायची गरज नसते, हे माझे वैयक्तिक मत.. एकदम पटलं . उगाच वर काहिंनी तिखट प्रतिक्रिया लिहिल्या आहेत त्या लिहिण्याची तशी गरज नव्हती असं जाणवलं काळे काका, आपण ब्रेक न घेता इथे अधूनमधून लिहिते रहावे असे वाटते.

वाहीदा 19/10/2011 - 22:47
काळेकाका, तुमचा हा लेख तुम्ही जेव्हा मला Review करायला दिला होता तेव्हा क्षणभर ही मला वाटले नाही की हा लेख योगायोगाने मिसळपाव साठी तुमचा 'अलविदा' ठरेल . Sad !! :-( पण बरेच दिवस आधी हे जाणवत होते के - कभी ना कभी यह होके रहेगा. खैर, है एहतिजाज का शोला , कि इन्कलाब का शोर, यह मेरे दिल में दहकता अलाव कैसा है ? (एहतिजाज - हुज्जत, वादविवाद ) इस ढलती उम्र में भी तुम मिसलपाव पर एक वोह आफ्रोज सितारा (One that Brightens) बनकर उभरे थे की नौजवांनोंकोभी अपनी सोचमें गौर फरमानेंकी जरुरत महेसुस हुई !! इससे ज्यादा और क्या कहें ? खुदा तुम्हें तंदुरुस्ती अता फर्मायें . आमीन ! हम हमेशा ही तुम्हारा एहतिराम करेंगे चाचा ! (एहतिराम - सन्मान ) "हाफिज खुदा तुम्हारा ! "
अलविदा, मिसळपाव! या शेवटच्या लेखासह मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. या संस्थळावर मी आलो तो तात्यांच्या आग्रहावरून. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील. पण मला आता इथे बरे वाटत नाहीं म्हणून मी रजा घेत आहे. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच.

मिपाकरांना मदतीचे आवाहन!

अनामिका ·

रेवती 19/10/2011 - 06:48
सर्व सदस्यांसाठी विनंती. मिसळपाववर केल्या गेलेल्या आवाहनांना प्रतिसाद देण्याआधी कृपया नीलकांत यांनी केलेली घोषणा http://www.misalpav.com/node/16955 येथे पहावी. धन्यवाद!

अनामिका 19/10/2011 - 12:14
धन्यवाद रेवती! सदरचे मिपा धोरण लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.....मला या धोरणाची कल्पना नव्हती अन्यथा मी इथे अश्या प्रकारचे आवाहन खचितच केले नसते...'एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ 'या एकाच .सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मी इथे समिर पितळे या पिडित व्यक्तीच्या उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी आवाहन केले.....आमच्याकडून आंम्ही यथायोग्य प्रयत्न करतोच आहोत ....सदरचे आवाहन संपादकमंडळाने संपादित कारावे हि नम्र विनंती..... अनामिका

In reply to by अनामिका

नितिन थत्ते 19/10/2011 - 15:06
आवाहन करता येणार नाही असे धोरण नसावे. फारतर संपादकांनी मूळ लेखात बोल्ड लाल अक्षरात "मिपा व्यवस्थापनाचा या आवाहनाशी संबंध नाही" असा खुलासा अ‍ॅड करावा.

रेवती 19/10/2011 - 06:48
सर्व सदस्यांसाठी विनंती. मिसळपाववर केल्या गेलेल्या आवाहनांना प्रतिसाद देण्याआधी कृपया नीलकांत यांनी केलेली घोषणा http://www.misalpav.com/node/16955 येथे पहावी. धन्यवाद!

अनामिका 19/10/2011 - 12:14
धन्यवाद रेवती! सदरचे मिपा धोरण लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.....मला या धोरणाची कल्पना नव्हती अन्यथा मी इथे अश्या प्रकारचे आवाहन खचितच केले नसते...'एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ 'या एकाच .सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मी इथे समिर पितळे या पिडित व्यक्तीच्या उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी आवाहन केले.....आमच्याकडून आंम्ही यथायोग्य प्रयत्न करतोच आहोत ....सदरचे आवाहन संपादकमंडळाने संपादित कारावे हि नम्र विनंती..... अनामिका

In reply to by अनामिका

नितिन थत्ते 19/10/2011 - 15:06
आवाहन करता येणार नाही असे धोरण नसावे. फारतर संपादकांनी मूळ लेखात बोल्ड लाल अक्षरात "मिपा व्यवस्थापनाचा या आवाहनाशी संबंध नाही" असा खुलासा अ‍ॅड करावा.
समस्त मिपाकरांना सस्नेह जय महाराष्ट्र! तुंम्हास एक आवाहन करण्यासाठी हा पत्र प्रपंच्.ठाण्यातील शिवाईनगर भागात राहणारा आमच्या शाळेतील २००६-०७ ला दहावी पास झालेला, एक अत्यंत हुशार मुलगा समीर पितळे (जो विज्ञान विषयात होमीबाबापर्यंत जाउन आला होता) यास दि.५/१०/२०११ रोजी रेमंड, समतानगर येथे बाइकवरुन जात असताना मागुन वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात झाला, ज्यात बाजुने जाणारा ट्रक त्याच्या हातावरुन गेल्याने हात जबर जखमी झाला आहे (कदाचित हात गमवण्याची शक्यता आहे) ज्युपिटरमधे ऑपरेशनसाठी मोठा खर्च येत आहे. त्याची २लाखाची मेडीक्लेम पोलिसी आहे, परंतु आता पर्यंत रु.४.५० लाख इतका खर्च झाला असुन साधारण १०-१२ लाख रुपयांची अजुन आवश्यकता आहे...त्याच्या वर्गातील मुलांनी रु.२०,५०० जमवले आहेत, सध्या तो शिकत असलेल्या केळकर महाविद्यालयात देखील मदत निधी गोळा केला जात आहे..... माजी विद्यार्थ्यातर्फे समाजसेवी संस्था तसेच निरनिराळ्या पक्षांच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांकडुन मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, सिद्धीविनायक ट्रस्ट दादर आणि साईबाबा संस्थान वर्तकनगर येथुन सुद्धा मदतीचे प्रयत्न माजी विदयार्थी करत आहेत. सदर मुलास आपल्याकडून काहि आर्थिक मदत होऊ शकेल का?.मुलगा अत्यंत हुशार व अभ्यासू आहे आणि आईवडिलांच एकुलते एक अपत्य आहे......सध्या जुपिटर मधे उपचार सुरु आहेत पण वेळीच उपाय न झाल्यास हात गमावण्याचा धोका संभवतो..निधी अभावी त्याच्या उपचारात खंड पडल्यास त्याच्या भावी आयुष्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.......आपण सगळेच मिपा सदस्य कायम सकारात्मक उद्देश बाळगून येथे लिखाण करत असतोच्...समाजाप्रती असलेली आपल्या सगळ्यांची बांधिलकी वेळोवेळी लिखाणातून अधोरेखित होत असतेच्....सदरहू गरजू मुलास आर्थिक मदत मिळवून देण्यात आपले सर्व मिपासदस्य नक्कीच मदत करतीत या भावनेतून इथे लिहिण्याचे धाडस केले आहे....आपणा सर्वांस विनंती करण्याच्या हेतूने हे लिहिते आहे...शक्य झाल्यास नक्की मदत करावीत हि कळकळीची विनंती..... आपणास सदर व्यक्तीबद्दल खातरजमा करावयाची असल्यास जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करु शकता.. आपल्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे... जय हिंद जय महाराष्ट्र मदत निधीसाठी संपर्क क्रमांक सचिन ९८९२२५४४६६ (१९९५-९६) अमोल ९७६६६३००९० (२०००-०१) प्रतिक ९८७०९०३५६६ (२००६-०७) आदित्य ९००४०२७१११ (२००६-०७) आशिष ८६५२५०८५१५ (२००६-०७) आपणास येउन पैसे दयायला, वेळ नसल्यास पैसे आपल्या घरुन देखिल गोळा करता येतील

सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो - भाग १

अभिजीत राजवाडे ·

वाहव्वा अभिजीत..दा..अतिशय छान लेख लिहिलायत,,,मी पण जग्गुवेडाच आहे,आणी त्याच्या खुप मैफिलींना हजेरी लावलेला आहे...ते एक न संपणारं सुख असायचं,,,कागज की कश्ती असो नायतर त्यानी तोंडानी काढलेला घुंगरांचा पदन्यासाचा एखादा तोडा असो,,,ती अपल्यासाठी एक रम्य आठवणच आहे...जग्गु तसा खुप गमत्यापण होता,,त्याच्या लाइव्ह कॉमेंट्स अतीशय खळखळुन हसवायच्या,,,असाच एकदा बेवड्यांवरुन तो एक जोक सांगत होता जोक संपला आणी एका खोड्याळ श्रोत्यानी थम्सअपची बाटली मुद्दाम मधल्या उतरत्या जागेवरुन स्टेज कडे सोडली,,जग्गु जोक मधल्या पात्राला हताशी घेऊन लगेच बोल्ला-''अरे गुप्ताजी.....बोतल तो आ गई,,आप कब आओगे...!?'' आणी नंतर असा काही हशा उसळला की ज्याचं नाव ते... जगजीतनी गायलेल्या अश्या किति सहज गम्य रचना सांगाव्या ,,,माझ्यावर एकेकाळी खुप प्रभाव टाकुन गेलेली १ अशीच प्रतिभाशाली रचना या निमित्तानी शेअर करतो--- ''धुप मे निकलो घटांओंमे नहाकर दोखो,,,जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो''... http://youtu.be/wfbKyaxQQt4 http://www.youtube.com/watch?v=wfbKyaxQQt4

वाहीदा 11/10/2011 - 17:14
मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको ... डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे, ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब .. ना अंधेरा.. ना उजाला हो, ना अभी रात, ना दिन .. जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आएं... मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको मौत तू एक कविता है ! -गुलज़ार (चित्रपट- आनंद) वरिल गुलजार यांचे शब्द श्रध्दांजली म्हणून लिहीत आहे तुमच्या पुढील लेखमालेची वाट पहात...

पैसा 11/10/2011 - 23:28
जगजीतसिंगचा कुटुंबाबरोबरचा फोटो पाहताना कालवाकालव झाली काळजात.

वाहव्वा अभिजीत..दा..अतिशय छान लेख लिहिलायत,,,मी पण जग्गुवेडाच आहे,आणी त्याच्या खुप मैफिलींना हजेरी लावलेला आहे...ते एक न संपणारं सुख असायचं,,,कागज की कश्ती असो नायतर त्यानी तोंडानी काढलेला घुंगरांचा पदन्यासाचा एखादा तोडा असो,,,ती अपल्यासाठी एक रम्य आठवणच आहे...जग्गु तसा खुप गमत्यापण होता,,त्याच्या लाइव्ह कॉमेंट्स अतीशय खळखळुन हसवायच्या,,,असाच एकदा बेवड्यांवरुन तो एक जोक सांगत होता जोक संपला आणी एका खोड्याळ श्रोत्यानी थम्सअपची बाटली मुद्दाम मधल्या उतरत्या जागेवरुन स्टेज कडे सोडली,,जग्गु जोक मधल्या पात्राला हताशी घेऊन लगेच बोल्ला-''अरे गुप्ताजी.....बोतल तो आ गई,,आप कब आओगे...!?'' आणी नंतर असा काही हशा उसळला की ज्याचं नाव ते... जगजीतनी गायलेल्या अश्या किति सहज गम्य रचना सांगाव्या ,,,माझ्यावर एकेकाळी खुप प्रभाव टाकुन गेलेली १ अशीच प्रतिभाशाली रचना या निमित्तानी शेअर करतो--- ''धुप मे निकलो घटांओंमे नहाकर दोखो,,,जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो''... http://youtu.be/wfbKyaxQQt4 http://www.youtube.com/watch?v=wfbKyaxQQt4

वाहीदा 11/10/2011 - 17:14
मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको ... डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे, ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब .. ना अंधेरा.. ना उजाला हो, ना अभी रात, ना दिन .. जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आएं... मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको मौत तू एक कविता है ! -गुलज़ार (चित्रपट- आनंद) वरिल गुलजार यांचे शब्द श्रध्दांजली म्हणून लिहीत आहे तुमच्या पुढील लेखमालेची वाट पहात...

पैसा 11/10/2011 - 23:28
जगजीतसिंगचा कुटुंबाबरोबरचा फोटो पाहताना कालवाकालव झाली काळजात.
3

काही श्लोक

शुचि ·

धन्या 07/10/2011 - 06:00
मिपाकरांना अजून काही असे "युनिव्हर्सल अपील" असणारे श्लोक माहीत असल्यास भर घालावी.
ज्ञानदेवाचं पसायदान. अर्थात त्या मराठीतल्या ओव्या आहेत. श्लोकाच्या व्याखेत बसतील की नाही याबद्दल शंका आहे. तै, हे उपनिषदं, पोथ्या-पुराणं, स्मृती, वेद वगैरेंच्या जोडीने कधीतरी सावरकरांचे "विज्ञाननिष्ठ निबंध" ही वाचा. :)

शुचि, चांगलंच घडावं, दिसावं, कानावर पडावं अशी आशा असणं गैर नाही. फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 08/10/2011 - 00:16
प्रचंड हसु आले... या विनोदाला वैज्ञानीक बैठक आहे काय... विचार करतोय... (विनोदी) अर्धवटराव

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 08/10/2011 - 21:02
शहाणपण आणि विनोद हातात हात घालुन चालतात... असं कोण्या महान व्यक्तीने म्हटलय (याला सुद्धा विनोद म्हणावा काय?? ;) ) (महान) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 11/10/2011 - 22:15
कोण्या महान व्यक्तीने म्हटलेलं काही तूम्ही लक्षात ठेवू शकता, ही सूध्दा फार चांगली गोश्ट आहे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 12/10/2011 - 10:18
तूम्हाला तूमचा चांगुलपणा जाणवुन देण्याबद्दल आभार माननं फारस कठीण वाटत नाहि पण फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं, नाही का ?

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 12/10/2011 - 19:21
"ध" चा "मा" केलात. चांगुलपणा असणे फार कठीण नाहि... पण तो जाणवुन देण्याकरता तुम्ही नेहमी अव्हेलेबल राहाणार काय? (प्रश्नार्थी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पैसा 14/10/2011 - 20:14
प्रश्नोत्तरामधला वेळ पाहता तुमचा हा संवाद कधी पुरा होणार?

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 14/10/2011 - 21:39
. @पैसा अहो त्यांच मत अर्धवट आहे की फक्त डावीकडे झूकलेलं याचा सोक्ष व मोक्ष जोपर्यंत त्यांना लागत नाही तोपर्यंत मला वाटत नही ते संवाद पूरा होउ देतील... बाकी हे कारण सोडून इतर काही त्यांच्या मनात असेल तर ते वो ही जाणे.... काय ? माझं म्हणन पटत नाहीये ? बघाच आता त्यांचा यावर प्रतीसाद आज ना उद्या येतो की नाही ते.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 15/10/2011 - 20:27
मला कल्पनाच नव्हती कि माझी मते डावीकडे वगैरे झुकलेली असतील (डावीकडे मत झुकणे म्हणजे काय हे ही नेमके माहित नाहि :( ) हां... अर्धवट मत असण्यबद्दल काहि संशय नसावा... ते तर अगदी उघड आहे. पण तुम्ही संवाद पूरा व्हायची वाट बघताय तर मी फुल्लस्टॉप मारतो. (विसंवादी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 15/10/2011 - 22:35
आपण फुल्लस्टॉप मारला आहेच तर मग आता आपण उल्लेखित केलेल्या शंकांचा सोक्ष व मोक्ष न होताच विषय मिटला म्हणतो.

मनीषा 07/10/2011 - 14:22
माझ्या माहीतीमधले ... आणि जे सर्वांनाच माहीती असतील कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती | करमूले तु गोविंदम् प्रभाते कर दर्शनम् || आपल्या पुर्वजांनी सुद्धा कर्मवाद महत्वाचा मानला आहे ... दैववाद नाही विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे || आणि हे पृथ्वी (विष्णुपत्नी) तुला नमन करते/तो आणि माझ्या पायांचा तुला स्पर्श होतो म्हणून तु मला क्षमा कर . (आपल्याकडून दूसर्‍याला होणार्‍या त्रासाबद्दल सदैव जाणिव ठेवण्याची शिकवण दिलेली आहे ) बाकी आदिती म्हणते ते अगदी योग्य ... म्हणूनच " Hope for the Best , prepare for the Worst "

काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवि: सस्यशालिनी देशो यं क्षोभरहितो, ब्राम्हणा: सन्तु निर्भया: | अपुत्रा पुत्रिणा सन्तु, पुत्रिणा सन्तु पौत्रिणा अधना सधना सन्तु, जीवन्तु शरदः शतम् || पाऊस वेळेवर पडो, धरती पिकाने भरो... देश संतुष्ट होवो, बाम्हण (विद्वान)निर्भय होवोत... संतानरहितांना पुत्र होवोत, पुत्रधारकांना नातू होवोत निर्धनांना धनलाभ होवो, सर्वजण शंभरी गाठोत.... दोन वर्षापूर्वी एका भारतभेटीत एका निकटच्या स्नेह्याच्या पुत्राच्या लग्नाला जायचा प्रसंग आला... तोही पुण्यातल्या सदाशिवपेठेत!!! लग्नाची ट्रेडिशनल पंगत बसली असतांना अचानक मला एक श्लोक म्हणण्याचा आग्रह झाला... काही लोक हसले, बदसूर असा की हा अमेरिकेला जाऊन सगळं विसरलेला, हा काय श्लोक म्हणणार? मग मी वरील श्लोक उच्चारवात म्हटला.... :) माणसं श्लोकाच्या शेवटी जागर करायला विसरली... ज्यांना भान होतं त्यांनी गुळमुळीत 'जय जय रघुवीर समर्थ' केलं...... शेवटी मलाच त्यांना सांगावं लागलं की जर मराठी श्लोक म्हंटला तर 'जय जय रघुवीर समर्थ; म्हणतात (कारण मराठीत म्हटले जाणारे बहुतेक श्लोक रामदासस्वामींचे आहेत) , पण जर श्लोक संस्कृतात असेल तर "स्वामिन्, सर्वेजना: सुखिनौ भवन्तु" म्हणतात.... :) ... ... ... ...आणि मी पाताळविजयम सिनेमातल्या राक्षसासारखा खदखदून हसलो, भर पंगतीत!!!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा 09/10/2011 - 11:14
पिडां, तुमची आठवण लै भारी आणि श्लोक तर कय बोलावं? सगळ्यांचं कल्याण होऊ दे या अर्थाची ही पहिली प्रार्थना असावी.

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 11:33
अमेरिकेत रहात असून सुद्धा पुण्यासारख्या जगप्रसिद्ध शहरात आणि सदाशिव पेठे सारख्या महत्वाच्या ठिकाणी आपले मित्र आहेत हे दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न . जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही . अवांतर : पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे.

In reply to by मनीषा

जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही . आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा... ज्याची त्याची समज आणि आवड.... :) पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे. शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल. सापडला की परत इथे या, मग चर्चा सुरु करू..... :)

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 16:22
आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा... ज्याची त्याची समज आणि आवड.... हा झाला तुमचा अनिवासी, अपुणेरी दृष्टीकोन ... आमच्या पुण्यात काय चालतं .. म्हणजे काय महत्वाचं असतं ते सांगीतलं. शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही .

In reply to by मनीषा

आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही . मला मुळात माझं म्हणणं आहे त्यापेक्षा अजून स्पष्ट करायचंच नाही. तुम्हाला जर ते आकलन होत नसेल तर तो तुमचा प्रश्न...

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 18:45
पाताळविजयम वागैरे माहित आहे हो मला ... कृ. ह. घे. ... ( हे वरच्या प्रतिक्रियांबरोबर देखील वाचणे .)

मितभाषी 10/10/2011 - 14:51
प्रवचन देता देता बाई दणादण ड्वाले मारतेय हे पाहुन ड्वाले पाणावले

विकास 12/10/2011 - 00:47
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।। मृत्योर्मामृतं गमय । ॐ शान्ति शान्ति शान्ति ।। --------------------- जेवतानाचा: वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवं होते नानाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न है पूर्ण ब्रम्ह उदाराभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म अथवा मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझीया हातूनी देश सेवा म्हणोनी मिळूदे मला शक्ती देवा त्याचेच हिंदी आणि अधिक वैश्विक रुपांतरः अन्नग्रहण करनेसे पेहले विचार मनमे करना है किस हेतूसे इस शरीर का रक्षण पोषण करना है हे परमेश्वर एक प्रार्थना, नित्य तुम्हारे चरणोंमे लग जाये तन मन धन मेरा, विश्व धर्म की सेवा मे ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् । ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥ ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्‌विषावहै ॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:: ॥

ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् । ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥ हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर्रंन्नम प्रजापति:। हरिर्विप्रःशरीरस्थो भुंक्ते भोजयते हरि:॥ चतुर्भिश्च चतुर्भिश्च द्वाभ्यां पंचभिरेवच। हूयतेच पुनर्द्वाभ्यां समे विष्णु: प्रसीदतू॥ ................ अता पूर्ण झाला... :-)

मदनबाण 17/10/2011 - 17:54
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥ जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तूंचि शोधूनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ संदर्भ :--- http://goo.gl/DZy3M

धन्या 07/10/2011 - 06:00
मिपाकरांना अजून काही असे "युनिव्हर्सल अपील" असणारे श्लोक माहीत असल्यास भर घालावी.
ज्ञानदेवाचं पसायदान. अर्थात त्या मराठीतल्या ओव्या आहेत. श्लोकाच्या व्याखेत बसतील की नाही याबद्दल शंका आहे. तै, हे उपनिषदं, पोथ्या-पुराणं, स्मृती, वेद वगैरेंच्या जोडीने कधीतरी सावरकरांचे "विज्ञाननिष्ठ निबंध" ही वाचा. :)

शुचि, चांगलंच घडावं, दिसावं, कानावर पडावं अशी आशा असणं गैर नाही. फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 08/10/2011 - 00:16
प्रचंड हसु आले... या विनोदाला वैज्ञानीक बैठक आहे काय... विचार करतोय... (विनोदी) अर्धवटराव

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 08/10/2011 - 21:02
शहाणपण आणि विनोद हातात हात घालुन चालतात... असं कोण्या महान व्यक्तीने म्हटलय (याला सुद्धा विनोद म्हणावा काय?? ;) ) (महान) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 11/10/2011 - 22:15
कोण्या महान व्यक्तीने म्हटलेलं काही तूम्ही लक्षात ठेवू शकता, ही सूध्दा फार चांगली गोश्ट आहे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 12/10/2011 - 10:18
तूम्हाला तूमचा चांगुलपणा जाणवुन देण्याबद्दल आभार माननं फारस कठीण वाटत नाहि पण फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं, नाही का ?

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 12/10/2011 - 19:21
"ध" चा "मा" केलात. चांगुलपणा असणे फार कठीण नाहि... पण तो जाणवुन देण्याकरता तुम्ही नेहमी अव्हेलेबल राहाणार काय? (प्रश्नार्थी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पैसा 14/10/2011 - 20:14
प्रश्नोत्तरामधला वेळ पाहता तुमचा हा संवाद कधी पुरा होणार?

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 14/10/2011 - 21:39
. @पैसा अहो त्यांच मत अर्धवट आहे की फक्त डावीकडे झूकलेलं याचा सोक्ष व मोक्ष जोपर्यंत त्यांना लागत नाही तोपर्यंत मला वाटत नही ते संवाद पूरा होउ देतील... बाकी हे कारण सोडून इतर काही त्यांच्या मनात असेल तर ते वो ही जाणे.... काय ? माझं म्हणन पटत नाहीये ? बघाच आता त्यांचा यावर प्रतीसाद आज ना उद्या येतो की नाही ते.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 15/10/2011 - 20:27
मला कल्पनाच नव्हती कि माझी मते डावीकडे वगैरे झुकलेली असतील (डावीकडे मत झुकणे म्हणजे काय हे ही नेमके माहित नाहि :( ) हां... अर्धवट मत असण्यबद्दल काहि संशय नसावा... ते तर अगदी उघड आहे. पण तुम्ही संवाद पूरा व्हायची वाट बघताय तर मी फुल्लस्टॉप मारतो. (विसंवादी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 15/10/2011 - 22:35
आपण फुल्लस्टॉप मारला आहेच तर मग आता आपण उल्लेखित केलेल्या शंकांचा सोक्ष व मोक्ष न होताच विषय मिटला म्हणतो.

मनीषा 07/10/2011 - 14:22
माझ्या माहीतीमधले ... आणि जे सर्वांनाच माहीती असतील कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती | करमूले तु गोविंदम् प्रभाते कर दर्शनम् || आपल्या पुर्वजांनी सुद्धा कर्मवाद महत्वाचा मानला आहे ... दैववाद नाही विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे || आणि हे पृथ्वी (विष्णुपत्नी) तुला नमन करते/तो आणि माझ्या पायांचा तुला स्पर्श होतो म्हणून तु मला क्षमा कर . (आपल्याकडून दूसर्‍याला होणार्‍या त्रासाबद्दल सदैव जाणिव ठेवण्याची शिकवण दिलेली आहे ) बाकी आदिती म्हणते ते अगदी योग्य ... म्हणूनच " Hope for the Best , prepare for the Worst "

काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवि: सस्यशालिनी देशो यं क्षोभरहितो, ब्राम्हणा: सन्तु निर्भया: | अपुत्रा पुत्रिणा सन्तु, पुत्रिणा सन्तु पौत्रिणा अधना सधना सन्तु, जीवन्तु शरदः शतम् || पाऊस वेळेवर पडो, धरती पिकाने भरो... देश संतुष्ट होवो, बाम्हण (विद्वान)निर्भय होवोत... संतानरहितांना पुत्र होवोत, पुत्रधारकांना नातू होवोत निर्धनांना धनलाभ होवो, सर्वजण शंभरी गाठोत.... दोन वर्षापूर्वी एका भारतभेटीत एका निकटच्या स्नेह्याच्या पुत्राच्या लग्नाला जायचा प्रसंग आला... तोही पुण्यातल्या सदाशिवपेठेत!!! लग्नाची ट्रेडिशनल पंगत बसली असतांना अचानक मला एक श्लोक म्हणण्याचा आग्रह झाला... काही लोक हसले, बदसूर असा की हा अमेरिकेला जाऊन सगळं विसरलेला, हा काय श्लोक म्हणणार? मग मी वरील श्लोक उच्चारवात म्हटला.... :) माणसं श्लोकाच्या शेवटी जागर करायला विसरली... ज्यांना भान होतं त्यांनी गुळमुळीत 'जय जय रघुवीर समर्थ' केलं...... शेवटी मलाच त्यांना सांगावं लागलं की जर मराठी श्लोक म्हंटला तर 'जय जय रघुवीर समर्थ; म्हणतात (कारण मराठीत म्हटले जाणारे बहुतेक श्लोक रामदासस्वामींचे आहेत) , पण जर श्लोक संस्कृतात असेल तर "स्वामिन्, सर्वेजना: सुखिनौ भवन्तु" म्हणतात.... :) ... ... ... ...आणि मी पाताळविजयम सिनेमातल्या राक्षसासारखा खदखदून हसलो, भर पंगतीत!!!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा 09/10/2011 - 11:14
पिडां, तुमची आठवण लै भारी आणि श्लोक तर कय बोलावं? सगळ्यांचं कल्याण होऊ दे या अर्थाची ही पहिली प्रार्थना असावी.

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 11:33
अमेरिकेत रहात असून सुद्धा पुण्यासारख्या जगप्रसिद्ध शहरात आणि सदाशिव पेठे सारख्या महत्वाच्या ठिकाणी आपले मित्र आहेत हे दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न . जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही . अवांतर : पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे.

In reply to by मनीषा

जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही . आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा... ज्याची त्याची समज आणि आवड.... :) पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे. शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल. सापडला की परत इथे या, मग चर्चा सुरु करू..... :)

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 16:22
आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा... ज्याची त्याची समज आणि आवड.... हा झाला तुमचा अनिवासी, अपुणेरी दृष्टीकोन ... आमच्या पुण्यात काय चालतं .. म्हणजे काय महत्वाचं असतं ते सांगीतलं. शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही .

In reply to by मनीषा

आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही . मला मुळात माझं म्हणणं आहे त्यापेक्षा अजून स्पष्ट करायचंच नाही. तुम्हाला जर ते आकलन होत नसेल तर तो तुमचा प्रश्न...

In reply to by पिवळा डांबिस

मनीषा 09/10/2011 - 18:45
पाताळविजयम वागैरे माहित आहे हो मला ... कृ. ह. घे. ... ( हे वरच्या प्रतिक्रियांबरोबर देखील वाचणे .)

मितभाषी 10/10/2011 - 14:51
प्रवचन देता देता बाई दणादण ड्वाले मारतेय हे पाहुन ड्वाले पाणावले

विकास 12/10/2011 - 00:47
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।। मृत्योर्मामृतं गमय । ॐ शान्ति शान्ति शान्ति ।। --------------------- जेवतानाचा: वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवं होते नानाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न है पूर्ण ब्रम्ह उदाराभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म अथवा मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझीया हातूनी देश सेवा म्हणोनी मिळूदे मला शक्ती देवा त्याचेच हिंदी आणि अधिक वैश्विक रुपांतरः अन्नग्रहण करनेसे पेहले विचार मनमे करना है किस हेतूसे इस शरीर का रक्षण पोषण करना है हे परमेश्वर एक प्रार्थना, नित्य तुम्हारे चरणोंमे लग जाये तन मन धन मेरा, विश्व धर्म की सेवा मे ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् । ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥ ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्‌विषावहै ॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:: ॥

ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् । ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥ हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर्रंन्नम प्रजापति:। हरिर्विप्रःशरीरस्थो भुंक्ते भोजयते हरि:॥ चतुर्भिश्च चतुर्भिश्च द्वाभ्यां पंचभिरेवच। हूयतेच पुनर्द्वाभ्यां समे विष्णु: प्रसीदतू॥ ................ अता पूर्ण झाला... :-)

मदनबाण 17/10/2011 - 17:54
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥ जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तूंचि शोधूनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ संदर्भ :--- http://goo.gl/DZy3M
आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही. आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा.

अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

मृत्युन्जय ·

गणपा 07/10/2011 - 01:35
ज ब ह र्‍या.
भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी
+१

पैसा 07/10/2011 - 01:44
कुंबळेने खेळायला सुरुवात केली ती जलदगती गोलंदाज म्हणून आणि नंतर तो फिरकी टाकू लागला असं काहीतरी वाचलेलं आठवतंय. नक्की सांगू शकत नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या मॅचमधे कुंबळे बँडेज बांधून गोलंदाजीला आला तेव्हा लाराच्या चेहर्‍यावरचे भाव अजून आठवतायत!

धन्या 07/10/2011 - 02:03
क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत नाही. किबहूना काहीच कळत नाही. परंतू हा लेख आवडला. खुप रोचक आणि रंजक पद्धतीने जंबोची ओळख करुन दिली आहे. आणि मुख्य म्हणजे लिहिताना अभिनिवेश टाळला आहे. इतकं तटस्थ आणि तरीही छान असं कुणी सचिनवर लिहू शकेल काय? त्याचा चुकूनही देव असा उल्लेख न करता? ;)

मेघवेडा 07/10/2011 - 02:11
मस्त लेख रे मृत्युंजया! काही माणसं आपापल्या क्षेत्रातल्या कौशल्याबाबतच नव्हे तर एकूणच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल, एकूणच वागण्याबद्दल जगाला बरंच काही शिकवून जातात. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. जसं सचिनच्या सिडनीतल्या २४१* खेळीने 'प्रतिकार न करता हार पत्करता कामा नये, वेळेस संकटे अंगावर झेलावी' हे आम्हांला शिकवलं, राहुलनं अनेकदा खंबीरपणाची प्रात्यक्षिकं दिली तसंच अनिलनंही नेहमीच लढाऊ बाणा, खंबीर मनोवृत्ती आणि संतुलित वर्तनाचे वस्तुपाठ घालून दिलेले आहेत. बाकी सगळं तू लिहिलंच आहेस. अजून काही लिहत नाही पण एक गोष्ट इथं मनापासून नमूद करावीशी वाटते - ६१९ कसोटी बळी म्हणजे काही चेष्टा नाही. अलिकडे आपले गोलंदाज १००-१५० होईतो दुखापतींनी अर्धे मेलेले असतात. उद्या कुणी एखाद्या जय/वीरूने हा विक्रम मोडलाच तर त्याचा नक्कीच कारकीर्दीच्या अखेरीस इमामसाहब झालेला असेल! :D भविष्यात कुणा भारतीय गोलंदाजास अनिल कुंबळेला काही ट्रिब्युट द्यायचंच असेल तर 'भारतीय गोलंदाजीची मदार कुणा एकाच खांद्यावर मी राहू देणार नाही' हे वचन हेच कुंबळेला देता येईल असं सर्वोत्तम ट्रिब्युट असेल! :)

शेखर काळे 07/10/2011 - 04:26
नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? "गूगली" हा न वळणारा चेंडू आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - शेखर

In reply to by शेखर काळे

मृत्युन्जय 07/10/2011 - 09:42
तेवढ्या छोट्या मोठ्या चुका माफ करा हो. कुंबळे चेंडु फिरवत नाही हा आक्षेप अगदी लिटरली नसतो घ्यायचा. :) तरी नशीब तुम्ही मुख्य प्रश्न नाही विचारला की टॉप स्पिन आणि गुगली मध्ये मुख्य फरक काय? ;)

In reply to by मृत्युन्जय

शेखर काळे 08/10/2011 - 01:37
श्री. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कामगिरी आणि नैपुण्याचा मी चाहता असल्यामुळे ते चेंडू वळवत नाहीत हे जरा झोंबले. बाकी लेख चांगलाच झाला आहे. मला वाटते की कुंबळेंची आणखी एक बाजू तुम्ही समोर आणली नाहीत - ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला ओळखून त्याला बाद करण्यातली चतुराई. आपल्या चेंडूचा वेग, वळण आणि फिरक कमी-जास्त करून त्यांनी कितीतरी नामांकित फलंदाजांना बाद केलेले आहे. दोन-तीन साधे, हळूच वळणारे, फलंदाजाला गाफिल करणारे चेंडू कुंबळेंनी टाकले, की पुढचा चेंडू हा वेगवान जरा आखूड टप्प्याचा टॉप स्पिनर असणार हे नक्की. आणि मग मागे वळून आपल्या ऊध्वस्त यष्टींकडे पाहतानाचा फलंदाजाचा गोंधळलेला चेहरा. 'इतका वेळ तर नीट चेंडू पडत होते .. मग हा अग्निबाण कुठून आला' .. असा विचार करत तो बिचारा परत निघणार. कुंबळेंच्या चेहर्‍यावर नेहमीचे विजयी हास्य ! .. हे मी कितीतरी वेळा पाहिलेले आहे. आताच हा लेख वाचल्यावर त्यांचे पाकिस्तानविरुद्ध दहा बळींची चित्रफीत पाहिली. सलीम मलिक .. हा याच गमतीने बाद झाला होता ! राहता राहिले गूगली आणि टॉप स्पिन .. गूगली हा चेंडू करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाने धरून फिरवून सोडायचा .. टॉप स्पिन हा चेंडू मधले बोट व पहिले या बोटांनी धरून फिरवून सोडायचा .. लेग स्पिन मधले बोट व अनामिका .. (मुख्य अनामिका) या बोटांनी धरून फिरवायचा. कळले नसल्यास श्री. अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची चित्रफीत जरूर पहावी. - शेखर काळे

सोत्रि 07/10/2011 - 05:23
भारी रे मृत्युन्जय! जम्बोबद्दल अस आपलं वाटणारं कोणी आहे हे समजल्यावर एकदम भरून आले. हॅट्स ऑफ टु जम्बो ! विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडु. - (जम्बोचा जम्बो फॅन) सोकाजी

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:13
शीर्षक बदला. अनिल कुंबळे हे शीर्षक असते तरी लेख वाचला गेला असताच. ते उगाच '... तुंबले' असे केल्याने अधिक लोक लेख वाचतील असे नाही. अशा शीर्षकाखाली वाचनीय लेख असू शकतो, असेच येथे सिरियसली काही चांगले वाचण्यासाठी येणाऱ्यांना वाटण्याची शक्यता आहे. मीही धागा उघडला तो मृत्युन्जय काय पालथे धंदे करू लागला, असा विचार करतच. काळं मीठ अननसासारख्या फळांवरच रुचीला वेगळा खुमार देतं. कैरीवर किंवा आंब्यावर नाही.

In reply to by श्रावण मोडक

मृत्युन्जय 07/10/2011 - 12:24
प्रतिक्रिया पटली. त्यामुळे शीर्षक बदलले. पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते. ज्या फ्लॉ मध्ये लेख लिहिला त्यात हेच टायटल बरोबर वाटले होते. नविन शीर्षक फारच अनाकर्षक वाटते आहे. कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय?

In reply to by मृत्युन्जय

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:40
पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते.
मान्य. माझे शब्द मागे. :) सध्याचे शीर्षक अनाकर्षक आहे हे पटते. बदलता येईल. जंबो!

In reply to by मृत्युन्जय

कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय? >> हे पटतंय का पाहा :- अनिल : आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा तळटीप :- १. मला क्रिकेट मधलं फारसं कळत नाही, पण त्याला जेंटलमन्स गेम (सभ्य लोकांचा खेळ) म्हणतात एवढं ऐकून आहे. सचिन तेंडूलकर, स्टीव वॉ, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड हे विशेषण सार्थ करतात असं वाटतं. २. शीर्षक catchy जरूर असावं की ज्यामुळे mass मधील वाचक त्याकडे आकर्षित होतील पण cheap असू नये, की ज्यामुळे class मधले वाचक पळून जावेत. (मी ज्यावरून ह्या वाक्याची प्रेरणा घेतली आहे ते मूळ वाक्य असे आहे - वक्त्याचे भाषण स्त्रियांच्या वस्त्राप्रमाणे अंग झाकण्यापुरते लांब परंतू उत्सुकता निर्माण करण्याइतके आखूड असावे.)

In reply to by श्रावण मोडक

किसन शिंदे 07/10/2011 - 12:59
श्रामो यांच्याशी सहमत.. ............तुंबले हे शिर्षक पाहुन बराच वेळ धागा उघडायचा धीर होत नव्हता. शेवटी धीर करून धागा उघडला आणी एका झटक्यात वाचून संपवला. :)

किसन शिंदे 07/10/2011 - 12:50
आमच्या जंबोवर एवढा चांगला लेख (आणी तो ही जे.पी मॉर्गनच्या लेखांच्या तोडीचा) टाकल्याबद्दल मृत्यंजय यांचे विशेष आभार.

मैत्र 07/10/2011 - 13:27
आम्ही त्याला त्याचं पूर्ण नाव " अनिल सरळ कुंबळे" आहे असं म्हणायचो... :) जगाला गंडवण्यासाठी तो लेग स्पिनर ... खाजगीत मीडियम पेसर आहे हाही एक मुद्दा प्रचलित होता :) बरेच फलंदाज त्याचा बॉल आता वळेल मग वळेल अशी करत राहायचे किंवा ऑफला खेळायला जायचे आणि चेंडू बिचारा वेगात आणि सरळ निघून जायचा कधी पॅड्स तर कधी यष्ट्यांचा वेध घेऊन :) पण त्याची लढाऊ वृत्ती आणि विलक्षण झपकन आत येणारे टॉप स्पिनस आणि स्ट्रेट बॉल्स जबरदस्त होते... ज्या दिवशी तो फॉर्म मध्ये असेल त्या दिवशी तो अतिशय unplayable असायचा. त्या मानाने त्याला मानमरातब मिळाला नाही. पण एकंदरीत क्रिकेट जगतात बॅटस्मनला जास्त भाव मिळतो. अनेक महान गोलंदाज होऊन गेले पण थोडके. त्या मानाने फलंदाज लवकर नाव मिळवतात. कुंबळेचे करिअर रेकॉर्ड पुरेसे आहे त्याची गुणवत्ता आणि महानता सिद्ध करायला. कर्णधारपद, पद्मश्री वगैरे सन्मान त्यालाही मिळाले. पण एका डावातले दहा बळी मिळवणार्‍या या झुंजार खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड च्या काळात त्या कोणाएवढं नावाजलं गेलं नाही हेही खरं. नम्म बेंगळूरुतलं "अनिल कुंबळे सर्कल" नक्कीच त्याच्यावर कन्नडिगांचं प्रेम दाखवतं. गेल्याच वर्षी तो कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला.. एकूणात मस्त लेख.. धन्यवाद !

स्मिता. 07/10/2011 - 14:01
आमच्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढा छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. अनिल कुंबळेला त्याच्या कर्तृत्वाच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळाली आहे असं मलाही नेहमीच वाटत आलंय. नाही म्हणायला बंगलोरात महात्मा गांधी रस्त्यावरच्या एका चौकाला 'अनिल कुंबळे सर्कल' असे नाव दिलेले आहे.

जाई. 07/10/2011 - 14:19
लेख आवडला अनिल कुंबळेचे भारतीय क्रिकेटमधील योगदान वादातीत आहे

मिपाचा दर्जा घसरता घसरता पुन्हा एकदा सावरला गेला आहे असे दाखवून देणारा एक अतिशय सुंदर लेख. ......... We all know what a gentleman he is, how humble he is.....and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody.......I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person...... फार फार महत्त्वाचा संदेश. चला, अनिल कुंबळे सारखे बनण्याचा प्रयत्न करूया.

>> त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही. हे शंभर हिश्शे खरं ! कुंबळे चेहर्‍यावरून जेवढा मवाळ दिसायचा तितकाच क्रिकेटपटू म्हणून आक्रमक होता. ऑस्ट्रेलियात त्या प्रचंड खुनशीनी लढल्या गेलेल्या सीरीजमध्ये कुंबळेनी मैदानातली आणि मैदानाबाहेरची प्रकरणं ज्या पद्धतीनी हाताळली - त्यावरून असंच वाटलं की ह्याला जर कप्तानपद आधी मिळालं असतं तर हा नक्कीच "ऑल टाईम ग्रेट" कर्णधारांत गणला गेला असता. त्याचं खेळाचं अचाट "रीडिंग" समजायला आपल्या सिलेक्टर्सना इतका उशीर का लागला कोणास ठाऊक. द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होताच "He has a degree in engineering and a PhD in spin bowling." अश्या भन्नाट खेळाडूबद्दल एवढा भन्नाट लेख लिहिलास ! हॅट्स ऑफ टू यू सर ! जे.पी.

तिमा 07/10/2011 - 19:46
लेख अत्यंत 'आवडल्या गेलेल्या आहे' (असंच लिहायचं असतं ना ?)

प्रभो 07/10/2011 - 20:14
मस्त लेख रे... माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे अनिल. लहानपणी वाटायचं हा चष्मा घालून कसं काय खेळतो क्रिकेट? फुटत नाही का बॉल लागून चष्मा.. ?

फारएन्ड 07/10/2011 - 20:37
त्या पिढीतल्या भारताच्या बिग-५ (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे) पैकी हा सर्वात दुर्लक्षित असावा. गेल्या काही दिवसांत "भारतीय संघ (व्यवस्थापनाच्या दृष्टीने) कुंबळे च्या ताब्यात द्यावा" ही अत्यंत योग्य मागणी बर्‍याच लोकांनी केली होती. त्याच्या सुरूवातीच्या काळात तो भारताबाहेर कमी ईफेक्टिव्ह होता, पण उत्तरार्धात त्याने एकदम चांगली कामगिरी केली. त्याची बॉडी लॅन्ग्वेज, फलंदाजाकडे बघण्याची नजर हे सगळे फास्ट बोलर सारखेच होते. २००४ नंतर दादा-राईट चा फॉर्म ओसरला तेव्हा द्रविड ला कुंबळे हा पर्याय ठरू शकला असता. २००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे आपण ज्या कसोटीत खेळत नाही त्यात (आपण नसल्याने कॅप्टन असलेला) धोनी त्यांच्या विरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे लक्षात आल्यावर त्या दिल्ली कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा ही त्याची एकदम वेळेवर घेतलेली स्टेप. आयपीएल मधूनही असेच मानाने बाहेर पडला तो.

मी-सौरभ 07/10/2011 - 23:58
तो एक चतुर माणूस आहे हे त्याने क्रिकेटच्या नविन घेतलेल्या जबाबदार्‍या बघता लक्षात आले असेलच :) त्याला आपल्या टीमचा मॅनेजर करा !!!!

सन्जोप राव 08/10/2011 - 19:39
अनिल कुंबळेविषयीचा हा संयत शब्दांत लिहिलेला लेख आवडला. कुंबळेचे काही गुण इतरांनीही उचलण्याची वेळ आली आहे असे वाटते.

खटपट्या 20/03/2014 - 03:57
मला आठवतंय कि एका भारतीय कप्तानाने म्हटले होते कि "अनिल इतका सभ्य आहे कि मी माझ्या बहिणीचे लग्न त्याच्याशी सहज लावून देयीन" बहुतेक वेंगसरकर होते

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:05
अनिल कुंबळेचे अजून एक वैशिष्ट्य २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दिसले. दुसर्‍या कसोटीतले स्टीव्ह बकनर यांनी दिलेले व भारताविरूद्ध गेलेले अनेक वादग्रस्त निर्णय असो वा मंकीगेट प्रकरण असो, कुंबळेने सर्व प्रसंग अत्यंत संयमाने व कमालीची मॅच्युरिटी दाखवून हाताळले. भारत जरी ती मालिका १-२ असा हरला तरी कुंबळेचे नेतृत्व त्यात झळाळून उठले होते.

गणपा 07/10/2011 - 01:35
ज ब ह र्‍या.
भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी
+१

पैसा 07/10/2011 - 01:44
कुंबळेने खेळायला सुरुवात केली ती जलदगती गोलंदाज म्हणून आणि नंतर तो फिरकी टाकू लागला असं काहीतरी वाचलेलं आठवतंय. नक्की सांगू शकत नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या मॅचमधे कुंबळे बँडेज बांधून गोलंदाजीला आला तेव्हा लाराच्या चेहर्‍यावरचे भाव अजून आठवतायत!

धन्या 07/10/2011 - 02:03
क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत नाही. किबहूना काहीच कळत नाही. परंतू हा लेख आवडला. खुप रोचक आणि रंजक पद्धतीने जंबोची ओळख करुन दिली आहे. आणि मुख्य म्हणजे लिहिताना अभिनिवेश टाळला आहे. इतकं तटस्थ आणि तरीही छान असं कुणी सचिनवर लिहू शकेल काय? त्याचा चुकूनही देव असा उल्लेख न करता? ;)

मेघवेडा 07/10/2011 - 02:11
मस्त लेख रे मृत्युंजया! काही माणसं आपापल्या क्षेत्रातल्या कौशल्याबाबतच नव्हे तर एकूणच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल, एकूणच वागण्याबद्दल जगाला बरंच काही शिकवून जातात. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. जसं सचिनच्या सिडनीतल्या २४१* खेळीने 'प्रतिकार न करता हार पत्करता कामा नये, वेळेस संकटे अंगावर झेलावी' हे आम्हांला शिकवलं, राहुलनं अनेकदा खंबीरपणाची प्रात्यक्षिकं दिली तसंच अनिलनंही नेहमीच लढाऊ बाणा, खंबीर मनोवृत्ती आणि संतुलित वर्तनाचे वस्तुपाठ घालून दिलेले आहेत. बाकी सगळं तू लिहिलंच आहेस. अजून काही लिहत नाही पण एक गोष्ट इथं मनापासून नमूद करावीशी वाटते - ६१९ कसोटी बळी म्हणजे काही चेष्टा नाही. अलिकडे आपले गोलंदाज १००-१५० होईतो दुखापतींनी अर्धे मेलेले असतात. उद्या कुणी एखाद्या जय/वीरूने हा विक्रम मोडलाच तर त्याचा नक्कीच कारकीर्दीच्या अखेरीस इमामसाहब झालेला असेल! :D भविष्यात कुणा भारतीय गोलंदाजास अनिल कुंबळेला काही ट्रिब्युट द्यायचंच असेल तर 'भारतीय गोलंदाजीची मदार कुणा एकाच खांद्यावर मी राहू देणार नाही' हे वचन हेच कुंबळेला देता येईल असं सर्वोत्तम ट्रिब्युट असेल! :)

शेखर काळे 07/10/2011 - 04:26
नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? "गूगली" हा न वळणारा चेंडू आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - शेखर

In reply to by शेखर काळे

मृत्युन्जय 07/10/2011 - 09:42
तेवढ्या छोट्या मोठ्या चुका माफ करा हो. कुंबळे चेंडु फिरवत नाही हा आक्षेप अगदी लिटरली नसतो घ्यायचा. :) तरी नशीब तुम्ही मुख्य प्रश्न नाही विचारला की टॉप स्पिन आणि गुगली मध्ये मुख्य फरक काय? ;)

In reply to by मृत्युन्जय

शेखर काळे 08/10/2011 - 01:37
श्री. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कामगिरी आणि नैपुण्याचा मी चाहता असल्यामुळे ते चेंडू वळवत नाहीत हे जरा झोंबले. बाकी लेख चांगलाच झाला आहे. मला वाटते की कुंबळेंची आणखी एक बाजू तुम्ही समोर आणली नाहीत - ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला ओळखून त्याला बाद करण्यातली चतुराई. आपल्या चेंडूचा वेग, वळण आणि फिरक कमी-जास्त करून त्यांनी कितीतरी नामांकित फलंदाजांना बाद केलेले आहे. दोन-तीन साधे, हळूच वळणारे, फलंदाजाला गाफिल करणारे चेंडू कुंबळेंनी टाकले, की पुढचा चेंडू हा वेगवान जरा आखूड टप्प्याचा टॉप स्पिनर असणार हे नक्की. आणि मग मागे वळून आपल्या ऊध्वस्त यष्टींकडे पाहतानाचा फलंदाजाचा गोंधळलेला चेहरा. 'इतका वेळ तर नीट चेंडू पडत होते .. मग हा अग्निबाण कुठून आला' .. असा विचार करत तो बिचारा परत निघणार. कुंबळेंच्या चेहर्‍यावर नेहमीचे विजयी हास्य ! .. हे मी कितीतरी वेळा पाहिलेले आहे. आताच हा लेख वाचल्यावर त्यांचे पाकिस्तानविरुद्ध दहा बळींची चित्रफीत पाहिली. सलीम मलिक .. हा याच गमतीने बाद झाला होता ! राहता राहिले गूगली आणि टॉप स्पिन .. गूगली हा चेंडू करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाने धरून फिरवून सोडायचा .. टॉप स्पिन हा चेंडू मधले बोट व पहिले या बोटांनी धरून फिरवून सोडायचा .. लेग स्पिन मधले बोट व अनामिका .. (मुख्य अनामिका) या बोटांनी धरून फिरवायचा. कळले नसल्यास श्री. अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची चित्रफीत जरूर पहावी. - शेखर काळे

सोत्रि 07/10/2011 - 05:23
भारी रे मृत्युन्जय! जम्बोबद्दल अस आपलं वाटणारं कोणी आहे हे समजल्यावर एकदम भरून आले. हॅट्स ऑफ टु जम्बो ! विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडु. - (जम्बोचा जम्बो फॅन) सोकाजी

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:13
शीर्षक बदला. अनिल कुंबळे हे शीर्षक असते तरी लेख वाचला गेला असताच. ते उगाच '... तुंबले' असे केल्याने अधिक लोक लेख वाचतील असे नाही. अशा शीर्षकाखाली वाचनीय लेख असू शकतो, असेच येथे सिरियसली काही चांगले वाचण्यासाठी येणाऱ्यांना वाटण्याची शक्यता आहे. मीही धागा उघडला तो मृत्युन्जय काय पालथे धंदे करू लागला, असा विचार करतच. काळं मीठ अननसासारख्या फळांवरच रुचीला वेगळा खुमार देतं. कैरीवर किंवा आंब्यावर नाही.

In reply to by श्रावण मोडक

मृत्युन्जय 07/10/2011 - 12:24
प्रतिक्रिया पटली. त्यामुळे शीर्षक बदलले. पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते. ज्या फ्लॉ मध्ये लेख लिहिला त्यात हेच टायटल बरोबर वाटले होते. नविन शीर्षक फारच अनाकर्षक वाटते आहे. कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय?

In reply to by मृत्युन्जय

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:40
पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते.
मान्य. माझे शब्द मागे. :) सध्याचे शीर्षक अनाकर्षक आहे हे पटते. बदलता येईल. जंबो!

In reply to by मृत्युन्जय

कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय? >> हे पटतंय का पाहा :- अनिल : आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा तळटीप :- १. मला क्रिकेट मधलं फारसं कळत नाही, पण त्याला जेंटलमन्स गेम (सभ्य लोकांचा खेळ) म्हणतात एवढं ऐकून आहे. सचिन तेंडूलकर, स्टीव वॉ, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड हे विशेषण सार्थ करतात असं वाटतं. २. शीर्षक catchy जरूर असावं की ज्यामुळे mass मधील वाचक त्याकडे आकर्षित होतील पण cheap असू नये, की ज्यामुळे class मधले वाचक पळून जावेत. (मी ज्यावरून ह्या वाक्याची प्रेरणा घेतली आहे ते मूळ वाक्य असे आहे - वक्त्याचे भाषण स्त्रियांच्या वस्त्राप्रमाणे अंग झाकण्यापुरते लांब परंतू उत्सुकता निर्माण करण्याइतके आखूड असावे.)

In reply to by श्रावण मोडक

किसन शिंदे 07/10/2011 - 12:59
श्रामो यांच्याशी सहमत.. ............तुंबले हे शिर्षक पाहुन बराच वेळ धागा उघडायचा धीर होत नव्हता. शेवटी धीर करून धागा उघडला आणी एका झटक्यात वाचून संपवला. :)

किसन शिंदे 07/10/2011 - 12:50
आमच्या जंबोवर एवढा चांगला लेख (आणी तो ही जे.पी मॉर्गनच्या लेखांच्या तोडीचा) टाकल्याबद्दल मृत्यंजय यांचे विशेष आभार.

मैत्र 07/10/2011 - 13:27
आम्ही त्याला त्याचं पूर्ण नाव " अनिल सरळ कुंबळे" आहे असं म्हणायचो... :) जगाला गंडवण्यासाठी तो लेग स्पिनर ... खाजगीत मीडियम पेसर आहे हाही एक मुद्दा प्रचलित होता :) बरेच फलंदाज त्याचा बॉल आता वळेल मग वळेल अशी करत राहायचे किंवा ऑफला खेळायला जायचे आणि चेंडू बिचारा वेगात आणि सरळ निघून जायचा कधी पॅड्स तर कधी यष्ट्यांचा वेध घेऊन :) पण त्याची लढाऊ वृत्ती आणि विलक्षण झपकन आत येणारे टॉप स्पिनस आणि स्ट्रेट बॉल्स जबरदस्त होते... ज्या दिवशी तो फॉर्म मध्ये असेल त्या दिवशी तो अतिशय unplayable असायचा. त्या मानाने त्याला मानमरातब मिळाला नाही. पण एकंदरीत क्रिकेट जगतात बॅटस्मनला जास्त भाव मिळतो. अनेक महान गोलंदाज होऊन गेले पण थोडके. त्या मानाने फलंदाज लवकर नाव मिळवतात. कुंबळेचे करिअर रेकॉर्ड पुरेसे आहे त्याची गुणवत्ता आणि महानता सिद्ध करायला. कर्णधारपद, पद्मश्री वगैरे सन्मान त्यालाही मिळाले. पण एका डावातले दहा बळी मिळवणार्‍या या झुंजार खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड च्या काळात त्या कोणाएवढं नावाजलं गेलं नाही हेही खरं. नम्म बेंगळूरुतलं "अनिल कुंबळे सर्कल" नक्कीच त्याच्यावर कन्नडिगांचं प्रेम दाखवतं. गेल्याच वर्षी तो कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला.. एकूणात मस्त लेख.. धन्यवाद !

स्मिता. 07/10/2011 - 14:01
आमच्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढा छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. अनिल कुंबळेला त्याच्या कर्तृत्वाच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळाली आहे असं मलाही नेहमीच वाटत आलंय. नाही म्हणायला बंगलोरात महात्मा गांधी रस्त्यावरच्या एका चौकाला 'अनिल कुंबळे सर्कल' असे नाव दिलेले आहे.

जाई. 07/10/2011 - 14:19
लेख आवडला अनिल कुंबळेचे भारतीय क्रिकेटमधील योगदान वादातीत आहे

मिपाचा दर्जा घसरता घसरता पुन्हा एकदा सावरला गेला आहे असे दाखवून देणारा एक अतिशय सुंदर लेख. ......... We all know what a gentleman he is, how humble he is.....and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody.......I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person...... फार फार महत्त्वाचा संदेश. चला, अनिल कुंबळे सारखे बनण्याचा प्रयत्न करूया.

>> त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही. हे शंभर हिश्शे खरं ! कुंबळे चेहर्‍यावरून जेवढा मवाळ दिसायचा तितकाच क्रिकेटपटू म्हणून आक्रमक होता. ऑस्ट्रेलियात त्या प्रचंड खुनशीनी लढल्या गेलेल्या सीरीजमध्ये कुंबळेनी मैदानातली आणि मैदानाबाहेरची प्रकरणं ज्या पद्धतीनी हाताळली - त्यावरून असंच वाटलं की ह्याला जर कप्तानपद आधी मिळालं असतं तर हा नक्कीच "ऑल टाईम ग्रेट" कर्णधारांत गणला गेला असता. त्याचं खेळाचं अचाट "रीडिंग" समजायला आपल्या सिलेक्टर्सना इतका उशीर का लागला कोणास ठाऊक. द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होताच "He has a degree in engineering and a PhD in spin bowling." अश्या भन्नाट खेळाडूबद्दल एवढा भन्नाट लेख लिहिलास ! हॅट्स ऑफ टू यू सर ! जे.पी.

तिमा 07/10/2011 - 19:46
लेख अत्यंत 'आवडल्या गेलेल्या आहे' (असंच लिहायचं असतं ना ?)

प्रभो 07/10/2011 - 20:14
मस्त लेख रे... माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे अनिल. लहानपणी वाटायचं हा चष्मा घालून कसं काय खेळतो क्रिकेट? फुटत नाही का बॉल लागून चष्मा.. ?

फारएन्ड 07/10/2011 - 20:37
त्या पिढीतल्या भारताच्या बिग-५ (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे) पैकी हा सर्वात दुर्लक्षित असावा. गेल्या काही दिवसांत "भारतीय संघ (व्यवस्थापनाच्या दृष्टीने) कुंबळे च्या ताब्यात द्यावा" ही अत्यंत योग्य मागणी बर्‍याच लोकांनी केली होती. त्याच्या सुरूवातीच्या काळात तो भारताबाहेर कमी ईफेक्टिव्ह होता, पण उत्तरार्धात त्याने एकदम चांगली कामगिरी केली. त्याची बॉडी लॅन्ग्वेज, फलंदाजाकडे बघण्याची नजर हे सगळे फास्ट बोलर सारखेच होते. २००४ नंतर दादा-राईट चा फॉर्म ओसरला तेव्हा द्रविड ला कुंबळे हा पर्याय ठरू शकला असता. २००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे आपण ज्या कसोटीत खेळत नाही त्यात (आपण नसल्याने कॅप्टन असलेला) धोनी त्यांच्या विरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे लक्षात आल्यावर त्या दिल्ली कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा ही त्याची एकदम वेळेवर घेतलेली स्टेप. आयपीएल मधूनही असेच मानाने बाहेर पडला तो.

मी-सौरभ 07/10/2011 - 23:58
तो एक चतुर माणूस आहे हे त्याने क्रिकेटच्या नविन घेतलेल्या जबाबदार्‍या बघता लक्षात आले असेलच :) त्याला आपल्या टीमचा मॅनेजर करा !!!!

सन्जोप राव 08/10/2011 - 19:39
अनिल कुंबळेविषयीचा हा संयत शब्दांत लिहिलेला लेख आवडला. कुंबळेचे काही गुण इतरांनीही उचलण्याची वेळ आली आहे असे वाटते.

खटपट्या 20/03/2014 - 03:57
मला आठवतंय कि एका भारतीय कप्तानाने म्हटले होते कि "अनिल इतका सभ्य आहे कि मी माझ्या बहिणीचे लग्न त्याच्याशी सहज लावून देयीन" बहुतेक वेंगसरकर होते

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:05
अनिल कुंबळेचे अजून एक वैशिष्ट्य २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दिसले. दुसर्‍या कसोटीतले स्टीव्ह बकनर यांनी दिलेले व भारताविरूद्ध गेलेले अनेक वादग्रस्त निर्णय असो वा मंकीगेट प्रकरण असो, कुंबळेने सर्व प्रसंग अत्यंत संयमाने व कमालीची मॅच्युरिटी दाखवून हाताळले. भारत जरी ती मालिका १-२ असा हरला तरी कुंबळेचे नेतृत्व त्यात झळाळून उठले होते.
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.

नव्या संपादकांचे अभिनंदन

क्रेमर ·

क्रेमर 05/10/2011 - 19:24
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.
'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.
'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...
'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.

अनामिक 05/10/2011 - 19:26
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का? खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

In reply to by अनामिक

क्रेमर 05/10/2011 - 19:41
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

In reply to by क्रेमर

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
+१ _________ || संपादकांची कृपा ||

चिरोटा 05/10/2011 - 19:28
नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

Nile 05/10/2011 - 20:03
सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो! तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-) आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-) क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)

गणेशा 05/10/2011 - 20:08
नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन... सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा .. जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार

यकु 05/10/2011 - 20:15
अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!! योग्य निवड. अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)

धनंजय 05/10/2011 - 23:19
दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? (म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल 06/10/2011 - 11:26
नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे) तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.

In reply to by धनंजय

विकास 05/10/2011 - 23:40
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)

In reply to by मुक्तसुनीत

विकास 06/10/2011 - 03:03
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ते इतर. ;) (आता पळ काढतो!)

नंदन 05/10/2011 - 23:43
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

पाषाणभेद 06/10/2011 - 09:14
हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

In reply to by पाषाणभेद

पैसा 06/10/2011 - 09:30
इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.

घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले

In reply to by श्री गावसेना प्रमुख

क्रेमर 06/10/2011 - 20:45
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)
येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.

श्यामल 06/10/2011 - 18:32
नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?

प्राजु 07/10/2011 - 06:45
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन. आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा! मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन. :)

व्यक्ती महत्वाचा नाही ,पद महत्वाचे पदाचा मान हा राखल्या गेला पाहिजे हे माझे पूर्वीपासून मत होते . नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन . एक मिपाकर म्हणून माझ्याकडून तुम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल. संपादक हा आपल्यासारखाच एक मिपाकर असून त्याच्या दैनंदिन जीवनातील ताणताणाव व नेहमीच्या रहाटगाड्यातून तो ही विनामूल्य सेवा मराठीच्या आणी मराठी माणसाच्या प्रेमाखातर करत आहे ह्याची मला पूर्ण पणे जाणीव आहे .म्हणूनच आजी व माजी संपादक मंडळाचे निर्णय पाळण्यात मी कोणतीही कसूर कधी ठेवली नाही व भविष्यात ठेवणार नाही .

क्रेमर 05/10/2011 - 19:24
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.
'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.
'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...
'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.

अनामिक 05/10/2011 - 19:26
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का? खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

In reply to by अनामिक

क्रेमर 05/10/2011 - 19:41
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

In reply to by क्रेमर

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
+१ _________ || संपादकांची कृपा ||

चिरोटा 05/10/2011 - 19:28
नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

Nile 05/10/2011 - 20:03
सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो! तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-) आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-) क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)

गणेशा 05/10/2011 - 20:08
नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन... सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा .. जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार

यकु 05/10/2011 - 20:15
अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!! योग्य निवड. अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)

धनंजय 05/10/2011 - 23:19
दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? (म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल 06/10/2011 - 11:26
नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे) तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.

In reply to by धनंजय

विकास 05/10/2011 - 23:40
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)

In reply to by मुक्तसुनीत

विकास 06/10/2011 - 03:03
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ते इतर. ;) (आता पळ काढतो!)

नंदन 05/10/2011 - 23:43
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

पाषाणभेद 06/10/2011 - 09:14
हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

In reply to by पाषाणभेद

पैसा 06/10/2011 - 09:30
इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.

घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले

In reply to by श्री गावसेना प्रमुख

क्रेमर 06/10/2011 - 20:45
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)
येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.

श्यामल 06/10/2011 - 18:32
नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?

प्राजु 07/10/2011 - 06:45
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन. आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा! मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन. :)

व्यक्ती महत्वाचा नाही ,पद महत्वाचे पदाचा मान हा राखल्या गेला पाहिजे हे माझे पूर्वीपासून मत होते . नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन . एक मिपाकर म्हणून माझ्याकडून तुम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल. संपादक हा आपल्यासारखाच एक मिपाकर असून त्याच्या दैनंदिन जीवनातील ताणताणाव व नेहमीच्या रहाटगाड्यातून तो ही विनामूल्य सेवा मराठीच्या आणी मराठी माणसाच्या प्रेमाखातर करत आहे ह्याची मला पूर्ण पणे जाणीव आहे .म्हणूनच आजी व माजी संपादक मंडळाचे निर्णय पाळण्यात मी कोणतीही कसूर कधी ठेवली नाही व भविष्यात ठेवणार नाही .
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

VINODBANKHELE ·

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

वाढदिवसाच्या शुभेच्छा

३_१४ विक्षिप्त अदिती ·

In reply to by मुक्तसुनीत

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:29
पंगाशेठना आमच्याही शुभेच्छा! हल्ली दिसत नाहीत ते मिपावर, कुठे असतात? अवखळकर बै तुम्ही किडन्याप तर नै केलं ना त्याना?

पंगांच्या प्रतिसादशैली मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न आवडला. त्यात 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा जालीय वाक्प्रयोग त्यांनीच प्रसिद्ध केला असं ऐकून आहे. तेव्हा त्यांना यावेळी अशा शुभेच्छा देणं हा काव्यात्म न्यायच ठरतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची, वारा वळेल तशी पाठ न फिरवता आपल्याला हव्या त्या दिशेला तोंड करण्याची (कधीकधी मुद्दामून वाऱ्याला सामोरं जाण्याची) त्यांची ख्याती आहे. पंगा ही खरं तर सविनय बंडखोरीची प्रवृत्तीच म्हणता येईल. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या प्रतिसादांची लांबी (कंस, सुपरस्क्रिप्टं, तळटिपा, राखाडी अक्षरं यांसकट) वाढत जावो ही शुभेच्छा.

सहज 14/09/2011 - 07:31
पंगा यांचे निलंबन अतिशय क्लेषदायक गोष्ट आहे. मिपाच्या स्थापनेपासुन मी मिपासदस्य आहे. इथे संपादन, व्यवस्थापन विषयावर बोलायला बंदी आहे किंवा ठरावीक लोकांनी बोललेले चालून जाते हेही पाहीले आहे. व्यवस्थापनाला आपले व्याप सांभाळून अनेक कटकटींना सामोरे जावे लागते याचाही पूर्ण अंदाज आहे. सहानुभूतीदेखील आहे. पण मिपा हे मी पाहीलेल्या काही मोजक्या मराठी संस्थळात वेगळे, पारदर्शक कारभार असलेले संस्थळ वाटले होते. दोन एक वर्षापुर्वी मिपाच्या माध्यमातून (हो हो गहजब नको पण मिपाच्या व्यनितून ऑफर, विनंत्या आल्या म्हणून माध्यम म्हणत आहे)काही चुकीचे प्रकार झाले त्यातुन मग पुढे काही व्यवस्थापन बदल होउन पुन्हा गाडे सुरळीत होताच अजुन एक इंटरनेट प्रायव्हसीचे प्रकरण ऐकू येउ लागले. यावर खाजगीत बरेच काही बोलले जाउ लागले पण जाहीर ना सवाल केला गेला की खुलासे दिले गेले जणू काही घडलेच नाही. ही पारदर्शकता!! मिपावर रोज उठून राजकारणी कसे भ्रष्ट आहेत, कसे दडवतात असे जो तो बोलतो पण जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची कबूली द्यायला, सामान्य लोकात किती धैर्य असते अथवा जबाबदारी वाटते? बर त्या त्रुटी अगदी समजवुन घेतल्या तरी मिपावर दिसुन आलेल्या एका गोष्टीचा मला अतिशय त्रास झाला. तो म्हणजे सदस्य निलंबनातील मनमानी. सर्व्हरवर कीडे अथवा कोणाचे वैयक्तिक नुकसान असे काही झाल्यास निलंबन होणे समजु शकतो. पण केवळ आपले विचार जुळत नाहीत म्हणून एखाद्या आयडीला परस्पर जालकंटक समजुन, कारणे न देता उडवणे हे जबाबदार व्यवस्थापना भूषणावह नाही. यातुन हाच संदेश जातो की तुम्ही विशिष्ट कंपूत हवा अथवा विरोध न करणारे सदस्य हवात अन्यथा तुमचे खाते कधीही उडवले जाउ शकते. रिकामटेकडा (मिपा आयडी आठवत नाही बहुदा टोपणनाव) , व आता पंगा हे दोन आयडी अतिशय ज्ञानी व उत्तम वादविवादपटू आयडी. भले त्यांची काही मते पटत नसतील पण प्रतिसादातुन आपल्या चातुर्याची, लोकांना दुसरी बाजु उत्तमपणे उलगडवून दाखवयाची हातोटी वाखाणण्याजोगी. या दोघांच्या प्रतिसादातुन अनेक लोकांचे प्रबोधन किमान मनोरंजन तर नक्कीच झाले असेल. माझ्या माहीतीनुसार हे दोन्ही आयडी आपल्या लेखनातुन भले आक्रमक वाटू शकतील पण अविवेकी आणि आक्रस्ताळे नव्हे. किमान सभ्यता पाळायचे. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य योग्य दुवे देणे, मुद्यांचा प्रतिवाद करणे प्रसंगी (श्री पंगा) वेगळा मुद्दा जाणवून दिल्याबद्दल विरोधकांना धन्यवाद दिल्याचेही पाहीले होते. एक तर अश्या लोकांना एकतर्फी कोणतीच सुचना न देता उडवणे मिपाकरांना योग्य वाटते का? इथे अनेक वेळा लोक निनावी आयडीने राजकीय नेते, पक्ष, धर्म याबाबत वाट्टेल ती अनुचित विधाने करतात ते चालून जाते पण केवळ आपल्याला गैरसोयीची वाटतात व ह्या आयडींचा कोणत्या कंपूत समावेश नसणे ह्या कारणाने फटकन निलंबन केले जाते हे अतिशय चुकीचे वाटते. मिपाच्या स्थापनेपासुन मी कायम व्यवस्थापनाला माझे मत सांगीतले आहे की वर उल्लेख केलेले प्रकार वगळता कोणाला निलंबीत करु नका फार तर काही दिवस वाचनमात्र करा. पण अजुनही मिपावरही मनमानी दिसुन येते आहे. मिपावर प्रसंगी कट्टर वाटेल असा विरोध चालवून घेतला जात नाही हा एकमेव संदेश व्यवस्थापन देत असेल तर ते मला चुकीचे वाटत आहे. मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा. मिपाकरांना ह्या दोघांच्या निलंबनाबद्दल काय वाटते हे विचारावेसे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

चिंतामणी 14/09/2011 - 10:26
सहजराव , बॅकप घेतला आहे ना ? सगळ्यांनीच या धाग्यावरचे पोस्टचे बॅकअप घ्यावे. कारण सर्वांनीच ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे असे दिसते. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

In reply to by सहज

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:48
खूप धक्का बसला होता खरं तर. आणि तेही कुठल्याही अधिकृत माध्यमातून कळले नव्हते. कारण तर आत्ता तुमच्य सविस्तर प्रतिक्रियेतून कळतंय आणि हे सगळं ज्या भावनेतून मिपा सुरू झालं होतं त्याच्याशी विसंगत आहे. पंगा यांचे लेखन म्हणजे नेहमीच (माझ्यासाठी तरी) एनलाईटनिंग ह्या प्रकारातले होते. आणि कुठलाही सूज्ञ वाचक जालकंटक आणि उत्तम वादविवादपटू ह्यातला फरक ओळखू शकेलच. पण लेखन हा क्रायटेरिआ न लावता केवळ वैयक्तीक आकसातून कार्यवाही झाली असेल तर हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन! >>ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.>>> ह्यासाठी सहजकाका, तुम्हाला अनुमोदन :)

In reply to by सहज

नितिन थत्ते 14/09/2011 - 08:13
सहज यांच्याशी सहमत आहे. मिपा इतके पारदर्शक* संस्थळ दुसरे नाही हे खरे असले तरी त्यामुळेच अपेक्षा जास्त आहेत. पंगा यांई सदस्यत्व घेतले तेव्हा त्यांच्या मराठेतर भाषेतील प्रतिसादांना आक्षेप घेऊन त्यांचे खाते गोठवावे का? असा कौल मीच स्वतः काढला होता. त्या आक्षेपावर आत्ता (१ वर्ष ४ महिन्यांनी) कारवाई झाली आहे की काय? *हे माझे परसेप्शन आहे कारण अडीच वर्षाहून अधिक काळ इथे वावरत आहे. काही सदस्य आणि संपादकांशी ओळख आहे/झाली आहे. कदाचित नव्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद आणि धागे उडवले जाताना पाहून तसे न वाटण्याची शक्यता आहे. खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज चक्र पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. १ वर्ष चार महिन्यांपूर्वी पंगाशेटने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्पानिशमधे दिल्या होत्या हे लक्षात आलं. (बंगालीचे होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट यांनी बंगालीची होतकरू विद्यार्थिनी अदिती हिच्याकडून शुभेच्छा स्वीकाराव्यात.

In reply to by सहज

सुनील 14/09/2011 - 10:11
मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. सहमत.

सुधीर काळे 14/09/2011 - 07:40
पंडित गागाभट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निलंबित केल्याचे माहीत नव्हते (आताच वाचले). तरी कृपया आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती अदितीला करत आहे!!

नगरीनिरंजन 14/09/2011 - 07:48
पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे आणि त्यांचे आमच्यावर आभाळाएवढे प्रेम होते आणि आहे. म्हणूनच मी अतिशय सद्गदित अंतःकरणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना परत येण्याची आणि व्यवस्थापनावरील प्रेम आमच्यावर काढण्याची बुद्धी देवो.

In reply to by नगरीनिरंजन

ननि यांच्या या प्रतिसादातून मला एक कल्पना सुचली आहे. पंगाशेट नेहेमीच आपल्याला वेगवेगळ्या लिंका, कंस देतात, सोरि, सोरि, द्यायचे. कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 14/09/2011 - 10:56
प्रेमाच्या ट्रान्झिटीव्हिटीवर पंगा यांनी लिहिलेला एक प्रतिसाद देण्याचा मोह टाळण्यात आलेला आहे असे नमूद करण्याचा मोह आवरत नाही.

कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.
मी सुरूवात करतो, कारण त्यांच्या पहिल्या काही प्रतिक्रियांपैकी एक माझ्या लेखावर होती. सगळेजण त्या लेखाला चान चान म्हणत असताना ट्रैश असं त्यांनी म्हटलं होतं. शशिकांत ओकांच्या नाडीविषयाची थोडीशी चेष्टा केल्यावर, 'एखाद्याला किती उगाच हाणायचं... ' असं मत पंगांनी मांडलेलं होतं. (त्यावेळी ते गंमत म्हणून प्रतिसाद हिंदीमध्ये लिहीत असत. ) प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मत मांडण्याची तयारी दाखवणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी ते एक.

In reply to by राजेश घासकडवी

सहज 14/09/2011 - 11:19
अश्लीलते कडे झुकत चाललेल्या थिल्लर धाग्यावर काय सणसणीत प्रहार केला होता की कोणत्याही संस्कृती रक्षकाला पंगा यांचा अभिमान वाटावा :-)

In reply to by सहज

Nile 14/09/2011 - 11:36
आज आधीच पंगाशेठच्या आठवणीने विव्हळलो होतो त्यात पुन्हा सैपाकाची आठवण कशाला करून दिलीत? वर्ष उलटून गेलं तरी आजून आम्ही सैपाक कलेत करंटेच ह्या आठवणीने अजून कळवळलो... असो..

नंदन 14/09/2011 - 08:10
शून्य खाजगीपणा आणि गैरसोयीच्या मंडळींचे 'लिक्विडेशन' ही ग्रेट पर्जची व्यवच्छेदक लक्षणं होती म्हणे. असो, पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Nile 14/09/2011 - 08:47
असं कसं झालं रेssss!!! कीत्ती कीत्ती गोष्टी शिकायच्या होत्या मला पंगाशेठकडूनssss! आता कोण शिकवणार मलाssss!!! असा कोणत्या नियतीनं घाला घातला आमच्या पंगाशेठवरssss!! आता कोणाकडे बघायचं आम्हीssss???

ऋषिकेश 14/09/2011 - 14:14
अरेच्या! हे कधी झालं? 'पंगा' यांच्या खात्याला गोठवल्याचं माहित नव्हतं :( ते विविध दृष्टीकोनातून मुद्दी मांडण्यात निष्णात होते हे नक्की. त्यांना अयोग्य वाटेल / असहमती असेल तेथे वाद घालत पण वितंडवाद-अतार्किक वाद घातल्याचे आठवत नाही. (माझ्याबरोबरही कोणत्याशा धाग्यावर असहमती झाली होती मात्र मुद्दा सोडून वैयक्तीक वार केल्याचे आठवत नाही) सारी मराठी संस्थळे खाजगी मालकीची आहेत हे सारे जाणतातच, मात्र वर सहजराव म्हणाले तसं बर्‍यापैकी पारदर्शक असल्याने मिपा व्यवस्थापनाकडून कारण समजणे अपेक्षित आहे. अरे हो वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल्याच होत्या.. श्री. पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्धवट 14/09/2011 - 11:22
पंगासेठचे खाते गोठवण्याचा निर्णय आत्ताच समजला.. निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे आणि वेदनादायीही. त्यांच्या लेखनातील तर्कशुद्धता आणि एकएक शब्द तपासुन घेण्याची प्रवृत्ती या गोष्टी शिकता आल्या असत्या.. अत्यंत संयत भाषेत वाद घालणे यासाठी मी त्यांचा फॅन आहे. त्यांच्या निलंबनाला काही सबळ आणि तितकेच महत्वाचं कारण असावं अशी आशा बाळगून आहे. ते कारण तितकंसं खाजगीही नसावं अशीही अपेक्षा आहे. बघू.. पुढेमागे कधितरी ते एखाद्या खुल्या अथवा कमराबंद चर्चेतून कळेलच.. पंगा यांचे प्रतिसाद वाचुन तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेशी अशी शक्यता विसंगत वाटत आहे.. पण "सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही" आणि "समाज ही गुंतागुंतीची चीज आहे" या दोन आधारांवर विसंबून "गप्प बसायचे ठरवले आहे" पण या निलंबनाचे कारण म्हणजे केवळ त्यांचे टीका करणारे, जनप्रवाहाविरूद्ध जाणारे, न पटलेल्या गोष्टीला संयत आक्षेप नोंदवणारे प्रतिसाद इतकंच असेल तर.. व्यवस्थापनाचा निषेध नोंदवत आहे.. अवांतर - पंगा यांचा मेल आयडी घ्यायचा राहिला ही हुरहूर राहीलीच. कुणाकडे पंगा या आयडी मागचा चेहेरा अथवा त्यांचा मेल आयडी अथवा त्यांचा दुसर्‍या संस्थळावरचा आयडी अथवा याच संस्थळावरचा दुसरा आयडी असेल तर तो मला इथे (ardhawat@gmail.com) पाठवावा ही जाहीर विनंती करत आहे. उपकृत होइन.

या निमित्तानं व्होल्तेअरचं एक उद्धृत द्यायचा मोह टाळता येत नाही: As long as people believe in absurdities they will continue to commit atrocities. आणि पुन्हा पुन्हा असे धागे काढणारे आणि त्यांना हौतात्म्य देणारे या दोहोंसाठी व्होल्तेअरचं अजून एक उद्धृतः It is dangerous to be right in matters where established men are wrong.

गणपा 14/09/2011 - 13:46
सर्वप्रथम पंगाशेटना खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! पंगाशेटनी कुणाच्या/कुठल्या दुखर्‍या नशीवर बोट ठेवले माहीत नाही. पण त्यांच्या अचानक अदृश्य होण्याचा अचंबा वाटला होता. (निलंबन झाले की ते स्वत:हुन गेलेत याबद्दल संस्थळ चालकच सांगु शकतील.) पण सहजरावांनी व इतरांनी वर जे पंगाशेट बद्दल मतप्रदर्शन केलेय त्याचाशी सहमत आहे. पंगाशेट मिपावर परत यावेत ही माझीही इच्छा आहे.

श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 14/09/2011 - 14:46
>>श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. हेच म्हणतो. त्यांचा आज खरोखर वाढदिवस असेल तर त्यांना मनापासुन शुभेच्छा :) बाकी धाग्याचे ठिक आहे. ही चौकशी करण्याचे इतर मार्गही उपलब्ध आहेत, पण हरकत नाही, चालू द्यात एवढेच म्हणतो. वैयक्तिकरित्या हा धागा पटला नाही असे स्पष्टपणे सांगतो. - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत 14/09/2011 - 17:24
त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? पण हा धागा तर वाढदिवसाचा आहे की :-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 15/09/2011 - 15:49
>>त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? सहमत आहे. पण म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

प्रास 14/09/2011 - 14:08
बातमी नवीन आहे. म्हण्टलं तर पंगाशेठ यांच्या वाढदिवसाची बातमीही नवीनच आहे. गेल्या काही दिवसातीलच हे घटना असावी. तेव्हा योग्य क्रमानुसार प्रथम पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता मुख्य - पंगाशेठांच्या निलंबनाची बातमी नवी आहे. कारवाई योग्य का अयोग्य माहित नाही पण दु:खद जरूर आहे. पंगाशेठांनी नेहमीच स्वतःच्या विचारांशी असलेली बांधिलकी राखलेली दिसून आलेली आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची शैलीही त्यांच्या विचारांइतकीच असाधारण असल्याचे जाणवले होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नव्हता पण कधीतरी व्हावा अशी इच्छा जरूर होती. पंगाशेठांचे मिपावर पुन्हा दणक्यात आगमन व्हावे ही सदिच्छा!

प्रियाली 14/09/2011 - 14:42
वाढदिवसांच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मला कधीही आवडत नाही परंतु हा धागा पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. मिसळपाव हे एक खाजगी संकेतस्थळ असून ते एका व्यक्तीच्या मालकाचे आहे ही साधी गोष्ट धागाकर्ती आणि तिला पाठींबा देणार्‍या दोन-चार लोकांच्या लक्षात आली नसावी. दोन चार बड्या लोकांनी या संकेतस्थळाला लोकाभिमुख इ. म्हटले तरी इथे एकाधिकारच कामी येतो हे येथील ज्येष्ठ सदस्यांच्या वारंवार ध्यानात आलेले नाही काय? मालक आणि त्यांची मर्जी सांभाळून वागणारे संपादक मंडळ यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी करणारा हा धागा क्लेशदायक आहे. तेवढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. अदितीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जमल्यास स्वतःच्या गुर्जींनाही शिकवणी लावावी. असो. मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

In reply to by प्रियाली

१. पंगा यांचे खाते गोठवले असल्याचे मला या धाग्यातून समजले. धागा आणि माझे प्रतिसाद नीट वाचले असता तुमच्या हे लक्षात येईलच. २. पंगा हा माझ्या आवडत्या जालआयडींपैकी एक आहे. तर आपल्या आवडत्या लेखक-प्रतिसादकाला शुभेच्छा देण्यात काय गैर आहे? मागे देवकाकांनी सिद्धहस्त लेखकांची यादी काढली होती, पिडांकाकांनी लोणच्याची रेसिपी टाकत स्वातीताईची प्रशंसा केली होती, त्यातलाच हाही एक प्रकार. या लेखनप्रकारात काही आक्षेपार्ह आहे काय? तसे असल्यास संस्थळाच्या धोरणात मला ते सापडले नाही. तसं काही असल्यास ते शोधण्यात तुम्ही कृपया मदत करावी. ३. धाग्यात कोणाच्याही कार्यशैलीवर टीप्पणी नाही. असलीच तर ती पंगाशेटच्या तार्कीक असण्यावर आहे आणि त्यात निखळ प्रशंसाच आहे. ४. वाढदिवसाच्या धाग्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असालही पण हा धागा निव्वळ शुभेच्छांसाठी आहे. मिपावरील एक ज्येष्ठ आयडी या नात्याने तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" याचा अर्थही मी समजवण्याची गरज पडावी हे पटण्यासारखं नाही. ५. सर्व लेखकांचे चांगले धागे संकलित करण्याची कल्पना निघाली तशी चांगल्या प्रतिसादांचेही संकलन व्हावे असं माझ्या बालबुद्धीला वाटलं. पंगाशेटने फार धागे काढल्याचं माझ्या स्मरणात नाही, पण त्यांचे प्रतिसाद वाचनीय असायचे. त्यांचे संकलन या धाग्यात व्हावे अशी माझी इच्छा होती. ते धोरणाबाहेर किंवा व्यवस्थापनास क्लेषदायक असेल असं मला खरोखर वाटलं नाही. काही जुने धागे काढून मी स्वतः बराच वेळ हसत होते. ६. इतर मंडळी आगीत तेल ओततात यात माझा दोष काय? सबब, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. सरकारवर, मौलवींवर टीका करणारे धागे चालतात तर एखाद्या आयडीची प्रशंसा करणारा धागा का टोचावा?

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>ते वढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. नाहीतर काय, आगलावे कुठले!!! (मला दिले असते वढे तर काय बिघडलं असतं??) >>संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. आमच्या डान्याला पण आपले म्हणा हो काकू!! >>मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती. व्यवस्थानपनाला सुचना करू नये या धोरणाचे उल्लंघन केल्याने प्रियाली काकूंचेही खाते गोठवावे अशी 'विनंती' करतो.

राही 14/09/2011 - 15:04
मराठी जालस्थलांवर गेली कित्येक वर्षे (बहुतांशी फक्त वाचनमात्र) वावर आहे. वाढदिवसाच्या किंवा अश्या स्वरूपाची वैयक्तिक माहिती जाहीर मांडणार्‍या धाग्यावर प्रतिसाद देणे आतापर्यंत कटाक्षाने टाळले होते. पण या धाग्यामध्ये श्री. पंगा यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लिहावेसे वाटले. श्री पंगा यांचे प्रतिसाद बहुतेक वेळा नर्म विनोदी,वादपटुत्व, वादचातुर्य आणि वादरुची दर्शवणारे,संदर्भांच्या रेलचेलीमुळे व्यासंगाची कल्पना देणारे,हिरीरीने बाजू मांडतानासुद्धा कधीही कटुता येऊ न देणारे असत. अर्थात ते अत्यंत वाचनीय असत हे वेगळे सांगायला नको.निलंबनाविषयी याच धाग्यातून कळल्यामुळे आणि तपशील माहित नसल्यामुळे मतप्रदर्शन टाळीत आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. (श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?)

In reply to by राही

प्रियाली 14/09/2011 - 15:33
श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?
श्राद्धपक्ष सुरू झाला ना? मग विचारणा कशाला करायची? जो पर्यंत आपले श्राद्ध घातले जात नाही तोपर्यंत दुसर्‍याचे श्राद्ध घालायला आपण मोकळेच आहोत. या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. ;)

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. आमच्या श्राद्धाला तुम्ही सोईस्कररीत्या विसरला होतात हे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो!! अजूनही वेळ गेलेली नाही, कधी येऊ श्राद्धाचं जेवायला? श्राद्धाचे 'वढे' मला फार आवडतात! ;-)

आदिजोशी 14/09/2011 - 19:59
पंगा जर निलंबीत झाले असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मधून मधून अशी अनेक मंडळी निलंबीत होत राहतात. असे झटके येत राहतात. पण अमाप गोंधळ घालणारी अनेक मंडळी अजून मिपा वर असल्याचे मात्र नेहेमीच आश्चर्य वाटते आणि वाटत राहील.

In reply to by क्रेमर

अगदी ... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या धाग्या पासून वाचतोय पंगा शेठ ला. पंगा शेठ ला वाढविसाच्या शुभेच्छा !

बाळकराम 15/09/2011 - 02:24
(हा प्रतिसाद प्रकाशित होण्याची फारशी अपेक्षा नाही!) गेले कित्येक महिने मिपावर एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा वावर आहे. कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा लेखनात मुळातच फारशी गती नसल्यामुळे म्हणा हातून फारसे लेखन जरी घडले नाही तरी इथे नियमित येणार्‍या अनेक अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लेखांनी जसे प्रभावित केलं तसेच इथल्या अनेक खट्याळ धाग्यांवर येणार्‍या तितक्याच महा खट्याळ प्रतिसादांनी करमणूक देखील केली. अशा विद्वानांच्या आणि अभ्यासूंच्या मांदियाळीत जी काही थोडी नावं त्यांच्या उपजत लेखन कौशल्याने, प्रतिभेने आणि सर्वांगीण ज्ञानाने उठून दिसली त्यात श्री पंगा यांचा समावेश नक्कीच करावा लागेल. श्री पंगा यांनी नक्की कोणता अपराध केला होता हे समजण्यास मलातरी जागा नाही, पण अशा अपमानास्पद रीतिने त्यांना निलंबित करण्याइतका त्यांनी कुठला गंभीर गुन्हा केला असावा असं त्यांच्या आत्तापर्यंतच्या मिपावरील वावरावरुन तरी वाटत नाही. ( अर्थात आंतरजालावरील कुठलाच गुन्हा निलंबन करावा अशा पातळीचा सहसा असणार नाही- गुन्हेगारी वा तत्सम अपराध वगळता- असं मला तरी वाटतं.) मिपाची मालकी व व्यवस्थापन खाजगी आहे असं वरच्या काही प्रतिसादातून कळलंच. ते जर खरं असलं तर आपल्याला गैरसोयीचे ठरणारे विचार वा व्यक्ती यांना नारळ देण्याचा व्यवस्थापनाचा हक्क अबाधित आहेच. पण तरी सुद्धा श्री पंगा यांना अशातर्‍हेने निलंबन करण्याचं कारण मिपा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं पाहिजे. श्री पंगा यांच्यासारखे अनेक सिद्धहस्त लेखक लिहितात म्हणून आमच्या सारखे अनेक लोक मिपावर वारंवार यायला प्रवृत्त होतात हे दुर्लक्षू नये. एवढी मस्ती दाखवायला मिपा म्हणजे काही फेसबुक नव्हे! तेवढे मोठे व्हाल तेव्हा ही गुर्मी सुद्धा सहन करु! एवढंसं ते मिपा काय- आंतरजालावरच्या अगणित संस्थळांपैकी एक- त्यात कुणा एकाबरोबर पटत नसल्याने त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार काय! केवळ दुबळे आणि भ्याड लोकच असा अधिकार गाजवायला बघतात. असाच माज दाखवत राहिलात तर जी काही चार टाळकी आज मिपावर येताहेत ती सुद्धा बंद होतील आणि काटकुळ्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला कुणी उरणार नाही याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती!

In reply to by धनंजय

पाषाणभेद 15/09/2011 - 03:13
पण नामकरण समारंभ पुन्हा करून किंवा गॅझेटमध्ये 'नाव बदललेले आहे' असे करून पंगा पुन्हा मंगा असे नाव घेवू शकतात ना? एक आठवण सांगतो. सुरूवातीला हे पंगा फक्त हिंदी या मला न समजणार्‍या लिपीतच ल्याहायचे. त्यांना एकदोन वेळा समजही दिली होती. मग मात्र बोळा सुटला अन ते मराठी झाले. असो.

मराठमोळा 15/09/2011 - 17:33
अरे वा. छान. तसा मी अदितीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचं कटाक्षाने टाळतोच, पण हा धागा पाहून रहावलं नाही. उत्तम धागा आणि चर्चा. बाकी चालु द्या. ;)

वाहीदा 16/09/2011 - 13:33
अतिशय सुद्य्न अभ्यासू, वैचारिक , उत्तम वादविवाद पटू असलेले पंगा यांची कमालिची तर्कशुध्दता त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात जाणवायची, सहज यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-( मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

In reply to by वाहीदा

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....
अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.
गप्प बसण्याचे ठरवलेले नाही, पण लिंका शोधायचा कंटाळा आला आहे.

In reply to by मुक्तसुनीत

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:29
पंगाशेठना आमच्याही शुभेच्छा! हल्ली दिसत नाहीत ते मिपावर, कुठे असतात? अवखळकर बै तुम्ही किडन्याप तर नै केलं ना त्याना?

पंगांच्या प्रतिसादशैली मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न आवडला. त्यात 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा जालीय वाक्प्रयोग त्यांनीच प्रसिद्ध केला असं ऐकून आहे. तेव्हा त्यांना यावेळी अशा शुभेच्छा देणं हा काव्यात्म न्यायच ठरतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची, वारा वळेल तशी पाठ न फिरवता आपल्याला हव्या त्या दिशेला तोंड करण्याची (कधीकधी मुद्दामून वाऱ्याला सामोरं जाण्याची) त्यांची ख्याती आहे. पंगा ही खरं तर सविनय बंडखोरीची प्रवृत्तीच म्हणता येईल. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या प्रतिसादांची लांबी (कंस, सुपरस्क्रिप्टं, तळटिपा, राखाडी अक्षरं यांसकट) वाढत जावो ही शुभेच्छा.

सहज 14/09/2011 - 07:31
पंगा यांचे निलंबन अतिशय क्लेषदायक गोष्ट आहे. मिपाच्या स्थापनेपासुन मी मिपासदस्य आहे. इथे संपादन, व्यवस्थापन विषयावर बोलायला बंदी आहे किंवा ठरावीक लोकांनी बोललेले चालून जाते हेही पाहीले आहे. व्यवस्थापनाला आपले व्याप सांभाळून अनेक कटकटींना सामोरे जावे लागते याचाही पूर्ण अंदाज आहे. सहानुभूतीदेखील आहे. पण मिपा हे मी पाहीलेल्या काही मोजक्या मराठी संस्थळात वेगळे, पारदर्शक कारभार असलेले संस्थळ वाटले होते. दोन एक वर्षापुर्वी मिपाच्या माध्यमातून (हो हो गहजब नको पण मिपाच्या व्यनितून ऑफर, विनंत्या आल्या म्हणून माध्यम म्हणत आहे)काही चुकीचे प्रकार झाले त्यातुन मग पुढे काही व्यवस्थापन बदल होउन पुन्हा गाडे सुरळीत होताच अजुन एक इंटरनेट प्रायव्हसीचे प्रकरण ऐकू येउ लागले. यावर खाजगीत बरेच काही बोलले जाउ लागले पण जाहीर ना सवाल केला गेला की खुलासे दिले गेले जणू काही घडलेच नाही. ही पारदर्शकता!! मिपावर रोज उठून राजकारणी कसे भ्रष्ट आहेत, कसे दडवतात असे जो तो बोलतो पण जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची कबूली द्यायला, सामान्य लोकात किती धैर्य असते अथवा जबाबदारी वाटते? बर त्या त्रुटी अगदी समजवुन घेतल्या तरी मिपावर दिसुन आलेल्या एका गोष्टीचा मला अतिशय त्रास झाला. तो म्हणजे सदस्य निलंबनातील मनमानी. सर्व्हरवर कीडे अथवा कोणाचे वैयक्तिक नुकसान असे काही झाल्यास निलंबन होणे समजु शकतो. पण केवळ आपले विचार जुळत नाहीत म्हणून एखाद्या आयडीला परस्पर जालकंटक समजुन, कारणे न देता उडवणे हे जबाबदार व्यवस्थापना भूषणावह नाही. यातुन हाच संदेश जातो की तुम्ही विशिष्ट कंपूत हवा अथवा विरोध न करणारे सदस्य हवात अन्यथा तुमचे खाते कधीही उडवले जाउ शकते. रिकामटेकडा (मिपा आयडी आठवत नाही बहुदा टोपणनाव) , व आता पंगा हे दोन आयडी अतिशय ज्ञानी व उत्तम वादविवादपटू आयडी. भले त्यांची काही मते पटत नसतील पण प्रतिसादातुन आपल्या चातुर्याची, लोकांना दुसरी बाजु उत्तमपणे उलगडवून दाखवयाची हातोटी वाखाणण्याजोगी. या दोघांच्या प्रतिसादातुन अनेक लोकांचे प्रबोधन किमान मनोरंजन तर नक्कीच झाले असेल. माझ्या माहीतीनुसार हे दोन्ही आयडी आपल्या लेखनातुन भले आक्रमक वाटू शकतील पण अविवेकी आणि आक्रस्ताळे नव्हे. किमान सभ्यता पाळायचे. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य योग्य दुवे देणे, मुद्यांचा प्रतिवाद करणे प्रसंगी (श्री पंगा) वेगळा मुद्दा जाणवून दिल्याबद्दल विरोधकांना धन्यवाद दिल्याचेही पाहीले होते. एक तर अश्या लोकांना एकतर्फी कोणतीच सुचना न देता उडवणे मिपाकरांना योग्य वाटते का? इथे अनेक वेळा लोक निनावी आयडीने राजकीय नेते, पक्ष, धर्म याबाबत वाट्टेल ती अनुचित विधाने करतात ते चालून जाते पण केवळ आपल्याला गैरसोयीची वाटतात व ह्या आयडींचा कोणत्या कंपूत समावेश नसणे ह्या कारणाने फटकन निलंबन केले जाते हे अतिशय चुकीचे वाटते. मिपाच्या स्थापनेपासुन मी कायम व्यवस्थापनाला माझे मत सांगीतले आहे की वर उल्लेख केलेले प्रकार वगळता कोणाला निलंबीत करु नका फार तर काही दिवस वाचनमात्र करा. पण अजुनही मिपावरही मनमानी दिसुन येते आहे. मिपावर प्रसंगी कट्टर वाटेल असा विरोध चालवून घेतला जात नाही हा एकमेव संदेश व्यवस्थापन देत असेल तर ते मला चुकीचे वाटत आहे. मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा. मिपाकरांना ह्या दोघांच्या निलंबनाबद्दल काय वाटते हे विचारावेसे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

चिंतामणी 14/09/2011 - 10:26
सहजराव , बॅकप घेतला आहे ना ? सगळ्यांनीच या धाग्यावरचे पोस्टचे बॅकअप घ्यावे. कारण सर्वांनीच ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे असे दिसते. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

In reply to by सहज

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:48
खूप धक्का बसला होता खरं तर. आणि तेही कुठल्याही अधिकृत माध्यमातून कळले नव्हते. कारण तर आत्ता तुमच्य सविस्तर प्रतिक्रियेतून कळतंय आणि हे सगळं ज्या भावनेतून मिपा सुरू झालं होतं त्याच्याशी विसंगत आहे. पंगा यांचे लेखन म्हणजे नेहमीच (माझ्यासाठी तरी) एनलाईटनिंग ह्या प्रकारातले होते. आणि कुठलाही सूज्ञ वाचक जालकंटक आणि उत्तम वादविवादपटू ह्यातला फरक ओळखू शकेलच. पण लेखन हा क्रायटेरिआ न लावता केवळ वैयक्तीक आकसातून कार्यवाही झाली असेल तर हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन! >>ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.>>> ह्यासाठी सहजकाका, तुम्हाला अनुमोदन :)

In reply to by सहज

नितिन थत्ते 14/09/2011 - 08:13
सहज यांच्याशी सहमत आहे. मिपा इतके पारदर्शक* संस्थळ दुसरे नाही हे खरे असले तरी त्यामुळेच अपेक्षा जास्त आहेत. पंगा यांई सदस्यत्व घेतले तेव्हा त्यांच्या मराठेतर भाषेतील प्रतिसादांना आक्षेप घेऊन त्यांचे खाते गोठवावे का? असा कौल मीच स्वतः काढला होता. त्या आक्षेपावर आत्ता (१ वर्ष ४ महिन्यांनी) कारवाई झाली आहे की काय? *हे माझे परसेप्शन आहे कारण अडीच वर्षाहून अधिक काळ इथे वावरत आहे. काही सदस्य आणि संपादकांशी ओळख आहे/झाली आहे. कदाचित नव्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद आणि धागे उडवले जाताना पाहून तसे न वाटण्याची शक्यता आहे. खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज चक्र पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. १ वर्ष चार महिन्यांपूर्वी पंगाशेटने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्पानिशमधे दिल्या होत्या हे लक्षात आलं. (बंगालीचे होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट यांनी बंगालीची होतकरू विद्यार्थिनी अदिती हिच्याकडून शुभेच्छा स्वीकाराव्यात.

In reply to by सहज

सुनील 14/09/2011 - 10:11
मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. सहमत.

सुधीर काळे 14/09/2011 - 07:40
पंडित गागाभट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निलंबित केल्याचे माहीत नव्हते (आताच वाचले). तरी कृपया आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती अदितीला करत आहे!!

नगरीनिरंजन 14/09/2011 - 07:48
पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे आणि त्यांचे आमच्यावर आभाळाएवढे प्रेम होते आणि आहे. म्हणूनच मी अतिशय सद्गदित अंतःकरणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना परत येण्याची आणि व्यवस्थापनावरील प्रेम आमच्यावर काढण्याची बुद्धी देवो.

In reply to by नगरीनिरंजन

ननि यांच्या या प्रतिसादातून मला एक कल्पना सुचली आहे. पंगाशेट नेहेमीच आपल्याला वेगवेगळ्या लिंका, कंस देतात, सोरि, सोरि, द्यायचे. कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 14/09/2011 - 10:56
प्रेमाच्या ट्रान्झिटीव्हिटीवर पंगा यांनी लिहिलेला एक प्रतिसाद देण्याचा मोह टाळण्यात आलेला आहे असे नमूद करण्याचा मोह आवरत नाही.

कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.
मी सुरूवात करतो, कारण त्यांच्या पहिल्या काही प्रतिक्रियांपैकी एक माझ्या लेखावर होती. सगळेजण त्या लेखाला चान चान म्हणत असताना ट्रैश असं त्यांनी म्हटलं होतं. शशिकांत ओकांच्या नाडीविषयाची थोडीशी चेष्टा केल्यावर, 'एखाद्याला किती उगाच हाणायचं... ' असं मत पंगांनी मांडलेलं होतं. (त्यावेळी ते गंमत म्हणून प्रतिसाद हिंदीमध्ये लिहीत असत. ) प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मत मांडण्याची तयारी दाखवणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी ते एक.

In reply to by राजेश घासकडवी

सहज 14/09/2011 - 11:19
अश्लीलते कडे झुकत चाललेल्या थिल्लर धाग्यावर काय सणसणीत प्रहार केला होता की कोणत्याही संस्कृती रक्षकाला पंगा यांचा अभिमान वाटावा :-)

In reply to by सहज

Nile 14/09/2011 - 11:36
आज आधीच पंगाशेठच्या आठवणीने विव्हळलो होतो त्यात पुन्हा सैपाकाची आठवण कशाला करून दिलीत? वर्ष उलटून गेलं तरी आजून आम्ही सैपाक कलेत करंटेच ह्या आठवणीने अजून कळवळलो... असो..

नंदन 14/09/2011 - 08:10
शून्य खाजगीपणा आणि गैरसोयीच्या मंडळींचे 'लिक्विडेशन' ही ग्रेट पर्जची व्यवच्छेदक लक्षणं होती म्हणे. असो, पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Nile 14/09/2011 - 08:47
असं कसं झालं रेssss!!! कीत्ती कीत्ती गोष्टी शिकायच्या होत्या मला पंगाशेठकडूनssss! आता कोण शिकवणार मलाssss!!! असा कोणत्या नियतीनं घाला घातला आमच्या पंगाशेठवरssss!! आता कोणाकडे बघायचं आम्हीssss???

ऋषिकेश 14/09/2011 - 14:14
अरेच्या! हे कधी झालं? 'पंगा' यांच्या खात्याला गोठवल्याचं माहित नव्हतं :( ते विविध दृष्टीकोनातून मुद्दी मांडण्यात निष्णात होते हे नक्की. त्यांना अयोग्य वाटेल / असहमती असेल तेथे वाद घालत पण वितंडवाद-अतार्किक वाद घातल्याचे आठवत नाही. (माझ्याबरोबरही कोणत्याशा धाग्यावर असहमती झाली होती मात्र मुद्दा सोडून वैयक्तीक वार केल्याचे आठवत नाही) सारी मराठी संस्थळे खाजगी मालकीची आहेत हे सारे जाणतातच, मात्र वर सहजराव म्हणाले तसं बर्‍यापैकी पारदर्शक असल्याने मिपा व्यवस्थापनाकडून कारण समजणे अपेक्षित आहे. अरे हो वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल्याच होत्या.. श्री. पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्धवट 14/09/2011 - 11:22
पंगासेठचे खाते गोठवण्याचा निर्णय आत्ताच समजला.. निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे आणि वेदनादायीही. त्यांच्या लेखनातील तर्कशुद्धता आणि एकएक शब्द तपासुन घेण्याची प्रवृत्ती या गोष्टी शिकता आल्या असत्या.. अत्यंत संयत भाषेत वाद घालणे यासाठी मी त्यांचा फॅन आहे. त्यांच्या निलंबनाला काही सबळ आणि तितकेच महत्वाचं कारण असावं अशी आशा बाळगून आहे. ते कारण तितकंसं खाजगीही नसावं अशीही अपेक्षा आहे. बघू.. पुढेमागे कधितरी ते एखाद्या खुल्या अथवा कमराबंद चर्चेतून कळेलच.. पंगा यांचे प्रतिसाद वाचुन तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेशी अशी शक्यता विसंगत वाटत आहे.. पण "सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही" आणि "समाज ही गुंतागुंतीची चीज आहे" या दोन आधारांवर विसंबून "गप्प बसायचे ठरवले आहे" पण या निलंबनाचे कारण म्हणजे केवळ त्यांचे टीका करणारे, जनप्रवाहाविरूद्ध जाणारे, न पटलेल्या गोष्टीला संयत आक्षेप नोंदवणारे प्रतिसाद इतकंच असेल तर.. व्यवस्थापनाचा निषेध नोंदवत आहे.. अवांतर - पंगा यांचा मेल आयडी घ्यायचा राहिला ही हुरहूर राहीलीच. कुणाकडे पंगा या आयडी मागचा चेहेरा अथवा त्यांचा मेल आयडी अथवा त्यांचा दुसर्‍या संस्थळावरचा आयडी अथवा याच संस्थळावरचा दुसरा आयडी असेल तर तो मला इथे (ardhawat@gmail.com) पाठवावा ही जाहीर विनंती करत आहे. उपकृत होइन.

या निमित्तानं व्होल्तेअरचं एक उद्धृत द्यायचा मोह टाळता येत नाही: As long as people believe in absurdities they will continue to commit atrocities. आणि पुन्हा पुन्हा असे धागे काढणारे आणि त्यांना हौतात्म्य देणारे या दोहोंसाठी व्होल्तेअरचं अजून एक उद्धृतः It is dangerous to be right in matters where established men are wrong.

गणपा 14/09/2011 - 13:46
सर्वप्रथम पंगाशेटना खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! पंगाशेटनी कुणाच्या/कुठल्या दुखर्‍या नशीवर बोट ठेवले माहीत नाही. पण त्यांच्या अचानक अदृश्य होण्याचा अचंबा वाटला होता. (निलंबन झाले की ते स्वत:हुन गेलेत याबद्दल संस्थळ चालकच सांगु शकतील.) पण सहजरावांनी व इतरांनी वर जे पंगाशेट बद्दल मतप्रदर्शन केलेय त्याचाशी सहमत आहे. पंगाशेट मिपावर परत यावेत ही माझीही इच्छा आहे.

श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 14/09/2011 - 14:46
>>श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. हेच म्हणतो. त्यांचा आज खरोखर वाढदिवस असेल तर त्यांना मनापासुन शुभेच्छा :) बाकी धाग्याचे ठिक आहे. ही चौकशी करण्याचे इतर मार्गही उपलब्ध आहेत, पण हरकत नाही, चालू द्यात एवढेच म्हणतो. वैयक्तिकरित्या हा धागा पटला नाही असे स्पष्टपणे सांगतो. - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत 14/09/2011 - 17:24
त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? पण हा धागा तर वाढदिवसाचा आहे की :-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 15/09/2011 - 15:49
>>त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? सहमत आहे. पण म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

प्रास 14/09/2011 - 14:08
बातमी नवीन आहे. म्हण्टलं तर पंगाशेठ यांच्या वाढदिवसाची बातमीही नवीनच आहे. गेल्या काही दिवसातीलच हे घटना असावी. तेव्हा योग्य क्रमानुसार प्रथम पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता मुख्य - पंगाशेठांच्या निलंबनाची बातमी नवी आहे. कारवाई योग्य का अयोग्य माहित नाही पण दु:खद जरूर आहे. पंगाशेठांनी नेहमीच स्वतःच्या विचारांशी असलेली बांधिलकी राखलेली दिसून आलेली आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची शैलीही त्यांच्या विचारांइतकीच असाधारण असल्याचे जाणवले होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नव्हता पण कधीतरी व्हावा अशी इच्छा जरूर होती. पंगाशेठांचे मिपावर पुन्हा दणक्यात आगमन व्हावे ही सदिच्छा!

प्रियाली 14/09/2011 - 14:42
वाढदिवसांच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मला कधीही आवडत नाही परंतु हा धागा पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. मिसळपाव हे एक खाजगी संकेतस्थळ असून ते एका व्यक्तीच्या मालकाचे आहे ही साधी गोष्ट धागाकर्ती आणि तिला पाठींबा देणार्‍या दोन-चार लोकांच्या लक्षात आली नसावी. दोन चार बड्या लोकांनी या संकेतस्थळाला लोकाभिमुख इ. म्हटले तरी इथे एकाधिकारच कामी येतो हे येथील ज्येष्ठ सदस्यांच्या वारंवार ध्यानात आलेले नाही काय? मालक आणि त्यांची मर्जी सांभाळून वागणारे संपादक मंडळ यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी करणारा हा धागा क्लेशदायक आहे. तेवढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. अदितीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जमल्यास स्वतःच्या गुर्जींनाही शिकवणी लावावी. असो. मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

In reply to by प्रियाली

१. पंगा यांचे खाते गोठवले असल्याचे मला या धाग्यातून समजले. धागा आणि माझे प्रतिसाद नीट वाचले असता तुमच्या हे लक्षात येईलच. २. पंगा हा माझ्या आवडत्या जालआयडींपैकी एक आहे. तर आपल्या आवडत्या लेखक-प्रतिसादकाला शुभेच्छा देण्यात काय गैर आहे? मागे देवकाकांनी सिद्धहस्त लेखकांची यादी काढली होती, पिडांकाकांनी लोणच्याची रेसिपी टाकत स्वातीताईची प्रशंसा केली होती, त्यातलाच हाही एक प्रकार. या लेखनप्रकारात काही आक्षेपार्ह आहे काय? तसे असल्यास संस्थळाच्या धोरणात मला ते सापडले नाही. तसं काही असल्यास ते शोधण्यात तुम्ही कृपया मदत करावी. ३. धाग्यात कोणाच्याही कार्यशैलीवर टीप्पणी नाही. असलीच तर ती पंगाशेटच्या तार्कीक असण्यावर आहे आणि त्यात निखळ प्रशंसाच आहे. ४. वाढदिवसाच्या धाग्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असालही पण हा धागा निव्वळ शुभेच्छांसाठी आहे. मिपावरील एक ज्येष्ठ आयडी या नात्याने तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" याचा अर्थही मी समजवण्याची गरज पडावी हे पटण्यासारखं नाही. ५. सर्व लेखकांचे चांगले धागे संकलित करण्याची कल्पना निघाली तशी चांगल्या प्रतिसादांचेही संकलन व्हावे असं माझ्या बालबुद्धीला वाटलं. पंगाशेटने फार धागे काढल्याचं माझ्या स्मरणात नाही, पण त्यांचे प्रतिसाद वाचनीय असायचे. त्यांचे संकलन या धाग्यात व्हावे अशी माझी इच्छा होती. ते धोरणाबाहेर किंवा व्यवस्थापनास क्लेषदायक असेल असं मला खरोखर वाटलं नाही. काही जुने धागे काढून मी स्वतः बराच वेळ हसत होते. ६. इतर मंडळी आगीत तेल ओततात यात माझा दोष काय? सबब, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. सरकारवर, मौलवींवर टीका करणारे धागे चालतात तर एखाद्या आयडीची प्रशंसा करणारा धागा का टोचावा?

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>ते वढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. नाहीतर काय, आगलावे कुठले!!! (मला दिले असते वढे तर काय बिघडलं असतं??) >>संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. आमच्या डान्याला पण आपले म्हणा हो काकू!! >>मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती. व्यवस्थानपनाला सुचना करू नये या धोरणाचे उल्लंघन केल्याने प्रियाली काकूंचेही खाते गोठवावे अशी 'विनंती' करतो.

राही 14/09/2011 - 15:04
मराठी जालस्थलांवर गेली कित्येक वर्षे (बहुतांशी फक्त वाचनमात्र) वावर आहे. वाढदिवसाच्या किंवा अश्या स्वरूपाची वैयक्तिक माहिती जाहीर मांडणार्‍या धाग्यावर प्रतिसाद देणे आतापर्यंत कटाक्षाने टाळले होते. पण या धाग्यामध्ये श्री. पंगा यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लिहावेसे वाटले. श्री पंगा यांचे प्रतिसाद बहुतेक वेळा नर्म विनोदी,वादपटुत्व, वादचातुर्य आणि वादरुची दर्शवणारे,संदर्भांच्या रेलचेलीमुळे व्यासंगाची कल्पना देणारे,हिरीरीने बाजू मांडतानासुद्धा कधीही कटुता येऊ न देणारे असत. अर्थात ते अत्यंत वाचनीय असत हे वेगळे सांगायला नको.निलंबनाविषयी याच धाग्यातून कळल्यामुळे आणि तपशील माहित नसल्यामुळे मतप्रदर्शन टाळीत आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. (श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?)

In reply to by राही

प्रियाली 14/09/2011 - 15:33
श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?
श्राद्धपक्ष सुरू झाला ना? मग विचारणा कशाला करायची? जो पर्यंत आपले श्राद्ध घातले जात नाही तोपर्यंत दुसर्‍याचे श्राद्ध घालायला आपण मोकळेच आहोत. या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. ;)

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. आमच्या श्राद्धाला तुम्ही सोईस्कररीत्या विसरला होतात हे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो!! अजूनही वेळ गेलेली नाही, कधी येऊ श्राद्धाचं जेवायला? श्राद्धाचे 'वढे' मला फार आवडतात! ;-)

आदिजोशी 14/09/2011 - 19:59
पंगा जर निलंबीत झाले असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मधून मधून अशी अनेक मंडळी निलंबीत होत राहतात. असे झटके येत राहतात. पण अमाप गोंधळ घालणारी अनेक मंडळी अजून मिपा वर असल्याचे मात्र नेहेमीच आश्चर्य वाटते आणि वाटत राहील.

In reply to by क्रेमर

अगदी ... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या धाग्या पासून वाचतोय पंगा शेठ ला. पंगा शेठ ला वाढविसाच्या शुभेच्छा !

बाळकराम 15/09/2011 - 02:24
(हा प्रतिसाद प्रकाशित होण्याची फारशी अपेक्षा नाही!) गेले कित्येक महिने मिपावर एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा वावर आहे. कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा लेखनात मुळातच फारशी गती नसल्यामुळे म्हणा हातून फारसे लेखन जरी घडले नाही तरी इथे नियमित येणार्‍या अनेक अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लेखांनी जसे प्रभावित केलं तसेच इथल्या अनेक खट्याळ धाग्यांवर येणार्‍या तितक्याच महा खट्याळ प्रतिसादांनी करमणूक देखील केली. अशा विद्वानांच्या आणि अभ्यासूंच्या मांदियाळीत जी काही थोडी नावं त्यांच्या उपजत लेखन कौशल्याने, प्रतिभेने आणि सर्वांगीण ज्ञानाने उठून दिसली त्यात श्री पंगा यांचा समावेश नक्कीच करावा लागेल. श्री पंगा यांनी नक्की कोणता अपराध केला होता हे समजण्यास मलातरी जागा नाही, पण अशा अपमानास्पद रीतिने त्यांना निलंबित करण्याइतका त्यांनी कुठला गंभीर गुन्हा केला असावा असं त्यांच्या आत्तापर्यंतच्या मिपावरील वावरावरुन तरी वाटत नाही. ( अर्थात आंतरजालावरील कुठलाच गुन्हा निलंबन करावा अशा पातळीचा सहसा असणार नाही- गुन्हेगारी वा तत्सम अपराध वगळता- असं मला तरी वाटतं.) मिपाची मालकी व व्यवस्थापन खाजगी आहे असं वरच्या काही प्रतिसादातून कळलंच. ते जर खरं असलं तर आपल्याला गैरसोयीचे ठरणारे विचार वा व्यक्ती यांना नारळ देण्याचा व्यवस्थापनाचा हक्क अबाधित आहेच. पण तरी सुद्धा श्री पंगा यांना अशातर्‍हेने निलंबन करण्याचं कारण मिपा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं पाहिजे. श्री पंगा यांच्यासारखे अनेक सिद्धहस्त लेखक लिहितात म्हणून आमच्या सारखे अनेक लोक मिपावर वारंवार यायला प्रवृत्त होतात हे दुर्लक्षू नये. एवढी मस्ती दाखवायला मिपा म्हणजे काही फेसबुक नव्हे! तेवढे मोठे व्हाल तेव्हा ही गुर्मी सुद्धा सहन करु! एवढंसं ते मिपा काय- आंतरजालावरच्या अगणित संस्थळांपैकी एक- त्यात कुणा एकाबरोबर पटत नसल्याने त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार काय! केवळ दुबळे आणि भ्याड लोकच असा अधिकार गाजवायला बघतात. असाच माज दाखवत राहिलात तर जी काही चार टाळकी आज मिपावर येताहेत ती सुद्धा बंद होतील आणि काटकुळ्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला कुणी उरणार नाही याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती!

In reply to by धनंजय

पाषाणभेद 15/09/2011 - 03:13
पण नामकरण समारंभ पुन्हा करून किंवा गॅझेटमध्ये 'नाव बदललेले आहे' असे करून पंगा पुन्हा मंगा असे नाव घेवू शकतात ना? एक आठवण सांगतो. सुरूवातीला हे पंगा फक्त हिंदी या मला न समजणार्‍या लिपीतच ल्याहायचे. त्यांना एकदोन वेळा समजही दिली होती. मग मात्र बोळा सुटला अन ते मराठी झाले. असो.

मराठमोळा 15/09/2011 - 17:33
अरे वा. छान. तसा मी अदितीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचं कटाक्षाने टाळतोच, पण हा धागा पाहून रहावलं नाही. उत्तम धागा आणि चर्चा. बाकी चालु द्या. ;)

वाहीदा 16/09/2011 - 13:33
अतिशय सुद्य्न अभ्यासू, वैचारिक , उत्तम वादविवाद पटू असलेले पंगा यांची कमालिची तर्कशुध्दता त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात जाणवायची, सहज यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-( मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

In reply to by वाहीदा

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....
अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.
गप्प बसण्याचे ठरवलेले नाही, पण लिंका शोधायचा कंटाळा आला आहे.
वेळोवेळी 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो वा प्रश्न विचारणं, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते.

मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

Nile ·

चित्रगुप्त 11/09/2011 - 15:02
सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत. तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी. हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

In reply to by चित्रगुप्त

Nile 12/09/2011 - 11:35
तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)

@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. .खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

In reply to by चित्रगुप्त

:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता--- शिक्षणः @-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का? अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled: २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय? ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-) इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-) याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:

In reply to by अत्रुप्त आत्मा

Nile 12/09/2011 - 11:39
तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)

In reply to by Nile

@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-) निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव । २/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry: @!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)

In reply to by नितिन थत्ते

रमताराम 12/09/2011 - 14:30
फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो. तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.

In reply to by नितिन थत्ते

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,
मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 12/09/2011 - 11:33
मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.

In reply to by राजेश घासकडवी

साती 12/09/2011 - 12:57
गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले. उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)

In reply to by साती

गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :) निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये. (समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.) डॉ. राजेश घासकडवी.

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 12/09/2011 - 23:30
"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 13/09/2011 - 02:47
डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-) बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील. बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा. http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_caneandable/index.html

In reply to by साती

Nile 13/09/2011 - 21:44
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-) मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड... आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा- ''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)

नितिन थत्ते 11/09/2011 - 18:27
आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?

नंदन 12/09/2011 - 12:16
चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)

In reply to by नंदन

सहज 13/09/2011 - 06:57
पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.

एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!! रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 12/09/2011 - 12:21
तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)

In reply to by पिवळा डांबिस

Nile 13/09/2011 - 02:09
एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!! पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)

In reply to by पाषाणभेद

Nile 13/09/2011 - 02:51
धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाषाणभेद 13/09/2011 - 05:40
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको. आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.

In reply to by पाषाणभेद

पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...

In reply to by Nile

ऋषिकेश 13/09/2011 - 11:17
आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!

मला विसरलास काय? माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन) बोल पार्टनर शिप देतोस काय?

In reply to by विनायक प्रभू

Nile 13/09/2011 - 02:11
मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)

एक 13/09/2011 - 22:48
ते मेट्रीक्स-२ मधे कसं transparent ghost लोकांच्या अंगावर जातं तसं काहीतरी करायचा विचार आहे. ३डी असेल तर लोकांची जास्त टरकावता येईल. ती सोय असेल तर आम्ही विचार करू. -एक इच्छूक.

चित्रगुप्त 11/09/2011 - 15:02
सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत. तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी. हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

In reply to by चित्रगुप्त

Nile 12/09/2011 - 11:35
तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)

@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. .खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

In reply to by चित्रगुप्त

:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता--- शिक्षणः @-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का? अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled: २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय? ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-) इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-) याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:

In reply to by अत्रुप्त आत्मा

Nile 12/09/2011 - 11:39
तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)

In reply to by Nile

@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-) निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव । २/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry: @!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)

In reply to by नितिन थत्ते

रमताराम 12/09/2011 - 14:30
फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो. तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.

In reply to by नितिन थत्ते

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,
मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 12/09/2011 - 11:33
मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.

In reply to by राजेश घासकडवी

साती 12/09/2011 - 12:57
गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले. उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)

In reply to by साती

गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :) निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये. (समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.) डॉ. राजेश घासकडवी.

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 12/09/2011 - 23:30
"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 13/09/2011 - 02:47
डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-) बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील. बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा. http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_caneandable/index.html

In reply to by साती

Nile 13/09/2011 - 21:44
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-) मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड... आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा- ''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)

नितिन थत्ते 11/09/2011 - 18:27
आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?

नंदन 12/09/2011 - 12:16
चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)

In reply to by नंदन

सहज 13/09/2011 - 06:57
पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.

एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!! रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 12/09/2011 - 12:21
तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)

In reply to by पिवळा डांबिस

Nile 13/09/2011 - 02:09
एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!! पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)

In reply to by पाषाणभेद

Nile 13/09/2011 - 02:51
धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाषाणभेद 13/09/2011 - 05:40
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको. आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.

In reply to by पाषाणभेद

पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...

In reply to by Nile

ऋषिकेश 13/09/2011 - 11:17
आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!

मला विसरलास काय? माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन) बोल पार्टनर शिप देतोस काय?

In reply to by विनायक प्रभू

Nile 13/09/2011 - 02:11
मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)

एक 13/09/2011 - 22:48
ते मेट्रीक्स-२ मधे कसं transparent ghost लोकांच्या अंगावर जातं तसं काहीतरी करायचा विचार आहे. ३डी असेल तर लोकांची जास्त टरकावता येईल. ती सोय असेल तर आम्ही विचार करू. -एक इच्छूक.
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत. मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे. ) वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू.

माझा श्रीगणेशा

jaypal ·

चतुरंग 02/09/2011 - 02:24
कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय! बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे. (बाप्पाप्रमी) रंगाप्पा

स्पंदना 02/09/2011 - 06:43
आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी. किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्‍या कलाकाराला माझा सलाम सांगा. अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्‍याला ही सलाम.

स्मिता. 02/09/2011 - 22:58
एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.

चतुरंग 02/09/2011 - 02:24
कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय! बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे. (बाप्पाप्रमी) रंगाप्पा

स्पंदना 02/09/2011 - 06:43
आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी. किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्‍या कलाकाराला माझा सलाम सांगा. अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्‍याला ही सलाम.

स्मिता. 02/09/2011 - 22:58
एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.
मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-) आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा १. g २. 2 ३. 3 ४.