मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जर्मनीतील एक अहिंसक आंदोलन ( सोशल नेटवर्क चे अपत्य )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी ·

पुष्करिणी 18/03/2011 - 00:58
अरे वा, बरेच समविचारी लोकं एकत्र आलेले दिसतायत. एकदम ४० % प्रकल्पांचं काम थांबवल्यावर आणि अपारंपारिक स्त्रोतांकडून ती भरपाइ होइपर्यंत ( अर्थात १०० % ही भरपाइ होइल अस वाटत नाहीच ) जनतेवरही थोडी बंधन येउ शकतात, त्याची जाणिव इथे उपस्थित असणार्‍यांना आहे का आणि त्या अनुशंगानं दैनंदिन जीवनात कराव्या लागणार्‍या त्यागाची तयारी आहे का ? म्हणजे मोसमी अन्न्/फळं/भाज्या खाणे, रेड मिटचं कमी सेवन, अन्नाची कमीत कमी नासाडी, गाड्यांचा कमी वापर ( इतकी नामांकित ऑटो इंडस्ट्री असताना ) इ. करण्याची तयारी आहे का? आणि अशी सवय / तयारी करण्याचा काही प्लॅन आहे का तुमच्या ग्रुपचा?

मी लेखात उल्लेख केला त्याप्रमाणे ११ % अणू उर्जा तर १६ % अपारंपरिक उर्जा व बाकी इतर तर टप्याटप्याने अणू उर्जा कमी करत २०२२ मध्ये पूर्ण पणे बंद करणे हा उपाय होता .
ह्यात अपारंपरिक उर्जा स्त्रोत हे टप्या टप्याने वाढवायचे होते . मुळात हा प्लान सरकारने विचार करून आखला होता .२०१० मध्ये व काही महिन्यांपूर्वी पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले . आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता . पवन उर्जेत २र्य क्रमांकावर असलेले आम्ही पहिल्या क्रमांकासाठी निकोप स्पर्धा नक्कीच करू शकतो . '' केल्याने होत आहे रे आधी........ आपल्या देशात अपारंपरिक उर्जा स्त्रोतास प्रचंड वाव आहे .अणू उर्जेसोबत ह्या उर्जेचा वापर सुरु झाल्यास आपण विजेची टंचाई संपूर्ण देशात निर्धारित लक्ष्या आधी पूर्ण करू .

In reply to by निनाद मुक्काम …

विंजिनेर 19/03/2011 - 15:30
पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले . आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता .
अंमळ गल्लत होतेये का? माझ्या माहिती प्रमाणे मूळ धोरण आधीच्या डाव्या सरकारने आखले होते. मर्केलबैंचे उजवे आल्यानंतर धोरण बदलले गेले. त्यामुळे मुदलातले सरकार बदलल्यावर धोरणं तरी कशी कायम र्‍हातील ओ?

In reply to by विंजिनेर

होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता . ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला . ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो . अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला . अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .
एक उदाहरण अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता . अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती . मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली . आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

In reply to by निनाद मुक्काम …

विंजिनेर 19/03/2011 - 19:55
ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला .
ह्मह्म... तुम्ही कोणत्या बाजूला झुकता ते कळाले :) एक कुतुहल (निव्वळ कुतूहल बर्का) - भारतात कोणत्या पक्षाला तुम्ही मत द्याल?

In reply to by विंजिनेर

आम्ही अनिवासी भारतीय आमचें जो पक्ष ( बर का ) जो पक्ष व्यवस्थित काळजी घेईन .म्हणजे भारत भूमीत गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ उभे करणे .आम्हाला भारतात अनेक धंदे करायला देणे . आदी . . भारतात आल्यावर जर कधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी किंवा इतर सदस्यांशी संबंध आला व आमचे आर्थिक /सांस्कृतिक / सामाजिक सूर जुळले( येथे वैचारिक सूर हा मुद्दा गौण आहे ) . त्या पक्षाला मते देऊ ( मनमोहन काका अनिवासी भारतीयांना मदतानाचा हक्क देणार आहेत अशी बातमी आहे .) थोडक्यात काय तर आमचा सध्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही , आम्हाला दिव्यत्वाची जेथे प्रचीती येईन तेथे आमचे कर जोडले जातील .

In reply to by विंजिनेर

होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता . ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला . ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो . अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला . अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .
एक उदाहरण अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता . अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती . मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली . आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही. प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही. फॉसिल फ्युएल्स आता जगभरातून हळूहळू नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. वारा,समुद्राच्या लाटा यांच्यावर उर्जा निर्मितीला मर्यादा आहेत. परंतू अणूउर्जा जरी प्रथम दर्शनी सोईस्कर वाटत असला तरी सर्वात धोकादायक पर्याय आहे तो. अणू विघटन आणि त्यातून तयार होणारे बाय प्रॉडकट्स यांचे हाफ लाइफ पाहिले तरी पुढील हजारो वर्षे हा अणूकचरा सांभाळून ठेवावा लागणार आहे. त्यांचा अन्यक्षेत्रातील (मेडिकल) वापर अत्यंत मर्यादित आहे. किरणोत्सार हा सर्वात मोठा धोका पर्यावरणाला मारक ठरणार आहे. एक विरोधाभास जाणवतो तो म्हणजे.... जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा कार्यक्रमांचा फेरविचार, स्थगिती , सुरक्षेबाबत चिंता करत असताना आपले अणूशास्त्रज्ञ मात्र टि.व्ही. चानेल्सला भेटी देवून ,सुरक्षेचा कसलाच धोका नाही ..... ऑल इज वेल .....हे पटविण्यात मश्गूल आहेत. जैतापुर पुढे रेटणे एव्ह्डाच अजेंडा आहे का काय असे वाटते. ज्या फ्रेंच अरेवाचा हा प्रोजेक्ट आहे त्या फ्रान्स ला अणू कचरयाची विल्हेवाट लावायला किती कष्ट पडले होते, न्यूझिलंड आणि ओशनिया देशांनी त्याचा किती विरोध केला होता हे त्यानिमित्ताने आठवते. फ्रान्स ने सुद्धा स्वतःच्या देशाजवळ अटलांटिक मध्ये नाही बुडवला अणूकचरा .... त्यासाठी लांब , अमेरिकेच्या पलिकडे, पाण्याचे , वारयाचे करंट सोडून थेट पैसिफिक मधे दूर नेउन बुडवायचे ठरविले . खरे तर अपारंपारिक उर्जेचे स्त्रोत शोधले पाहिजेत. शोधायला कशाला पाहिजेत ? सूर्य असा एकटाच स्त्रोत आहे जो उर्जेच्या सर्व गरजा पूर्ण करेल. पण त्यासाठी तंत्रज्ञान विकासाची, आणि मिळविलेली उर्जा अधिक चांगल्या तर्हेने (एफिशिअंटली) साठवण्याचे तंत्रद्यान विकसित व्हायला पाहिजे.

In reply to by विनायक बेलापुरे

@जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा त्यांच्याकडे समर्थ पर्याय आहेत .ते अपारंपरिक उर्जा स्त्रोत तर वापरू शकतात .पण कोळसा तेल व नैसर्गिक वायू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे . आपण इतके दिवस अणुउर्जा अल्प प्रमाणात वापरत होतो .पण सर्व पर्याय वापरून झाले आणी मगच .... विजेच्या बाबतीत आपण कुपोषित आहोत तर ते अती लठ्ठ १६ तासाचे भारनियमन दूर करण्यासाठी सध्या अणू उर्जेला पर्याय नाही . @प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही. सहमत

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद जी माझे पहिलेच वाक्य होते की सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही. (पण तो खुप धोकादायक पर्याय आहे. अन्य कोणत्याही उर्जेच्या साधनांपेक्षा धोकादायक. ) आज जपान घडले आहे म्हणून भुकंप आणि सुनामीची चर्चा रंगते आहे. कोणत्याही प्रकल्पात जसा कोंटीजन्सी प्लान असतो तसा अणूप्रकल्पात असणारच यात वाद नाही. परंतु असे सगळे प्लान्स असतानाही "अपघात" होतात, जसा आत्ता सुनामीचा झाला तसा. आणि असा अणूप्रकल्पातील अपघात इतर कोणत्याही प्रकल्पाहून मारक असेल. अनेक जण म्हणतात आज आपल्याकडचे भारनियमन बंद व्हायला पाहिजे तर अणू उर्जेशिवाय पर्याय नाही. हाफ लाइफ नुसार पुढची ५०००० वर्शे टिकणार्या अणू कचर्याची विल्हेवाट लावायचा गहन आणि गंभीर प्रश्न असूनही ? १६ तासाचे भारनियमन संपवायचे आहे ना मग अणूप्रकल्पच घ्या असे म्हणणे म्हणजे दूध अपुरे मिळते आहे ना ? मग जे मिळते आहे ते केमिकल दूध प्या असे म्हणन्या सारखे आहे. (तसेही जराशी कटकट करुन कळत नकळत अधून मधुन का होइना पण तेच केमिकल दूध पितो आहे म्हणा सध्या आपण) . त्यामुळे भारनियमन संपवायला अणूउर्जा हे पटायला जरा अवघड जाते आहे. जैतापुरचा सध्या प्रश्न गाजतो आहे म्हणून सांगावेसे वाटते की ... जरासे कीटकनाशक भाज्या, फळांवर जास्त आढळले तर माल न स्विकारणारे अमेरिकन-युरोपियन देश, चुकुन किरणोत्सार झाला तर असा किरणोत्सारित माल स्विकारेल का भविष्यात ? सगळेच भवितव्य आपण टांगणीला तर लावून ठेवत नाही आहोत ना ? त्यातून भारतीय मिडिया आणि एकूणच आपली बातम्या दाबण्याबद्दलची मानसिकता पाहता असा किरणोत्सार झाला तरी दडवून ठेवले जाइल. जपान इतकी पारदर्शिकता मला तरी अजून आढळली नाही. आणि याचा अनुभव आपण कोंबड्यांवरचे रोग, स्वाइण फ्लू , नांदेड भागात सध्या भूगर्भातऊन येत असलेले अगम्य आवाज इ इ या सर्वांबाबत घेतला आहे. इतर्ही भरपुर उदाहरणे आहे. नैसर्गिक पाणी, कोळसा, वायु , वारा यांचा वापर नेहमीच मर्यादित राहणार आहे. नैसर्गिक खनिजे तर जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आहेत. समुद्राच्या पाण्याचे विघटन करून वीज निर्मिती शक्य आहे पण त्याने पर्यावरणाचा तोल कमालीचा ढलेल. जोपर्यंत निर्माण केलेली वीज साठवून ठेवता येत नाही (कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर) तोपर्यंत सर्व पर्याय यथातथाच राहणारा आहेत. "तिकडे" समर्थ पर्याय आहेत आपल्याकडे नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे जे मुबलक आहे त्याच्यावर आधारित संशोधन करुन आपण प्रक्ल्प उभे करायला हवे होते. जसे की अन्य युरोपियन देशांहून भारतात सुर्यप्रकाश सर्वात मोठा उर्जा स्त्रोत आहे. पृथ्वीवर येणारी प्रति स्केअर मीटर सौरऊर्जा (फ्लक्स )१७४ पेटावैट (१७४ x १०^१५ watt = १७४ x १० ^ ९ MWatt ) इतकी प्रचंड आहे. भारताची उर्जेची सध्याची गरज १५ टेराWatt म्हणजे १५ x १० ^ १३ watt इतकीच आहे. त्यावरून किती प्रचंड ऊर्जा उपलब्ध आहे तीही विनासायास , प्रदुषण विरहित हे लक्षात येइल. त्यातील ७०% पृथ्वी शोषून घेते तर ३०% इतकी पुन्हा वातावरणात इन्फ्रारेड म्हणून परावर्तित होते. पण तीच ऊर्जा चिरकाल टिकणारी आणि सर्व गरजा भागवून उरणारी आहे . आज ना उद्या संशोधनानंतर त्रुटी घालवून तीच ऊर्जा जास्त वापरली जाईल. आपले संशोधन जर ही उर्जा वापराच्या दृश्टीने झाले तरच आपली उर्जेची गरज सुरक्षीत दृष्ट्या भागवली जाउ शकेल. भारताच्या दृष्टीने वर्षातील ९-११ महिने मिळणारी सौरशक्तिच सर्व दृष्टीने किफायतशीर पर्याय आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

जर्मनी व इतर युरोपियन देश हे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले .त्यात अणू उर्जेचा वाटा आहे .मात्र हे करतांना त्यानी जाणीव पूर्वक हरित उर्जेला पाठिंबा दिला .आज जेव्हा जर्मन डाव्या पक्षाने म्हणजे मागील सरकारने अणू उर्जा उर्जा ते हरित उर्जा असा आराखडा ठेवला तेव्हा जगातून त्यांचे कौतुक झाले . ओबामा ह्यांनी त्यांच्या भाषणात जगात अपारंपरिक उर्जेचा पाठपुरावा केला .
भारतात पावन उर्जा एकूण उर्जा उत्पादनाच्या २ % कमी आहे .हेच सौर ऊर्जेबाबत आहे . जेव्हा भारतात हरित उर्जा एक समर्थ पर्याय म्हणून उभा राहीन तेव्हाच अणू उर्जेला आपण खऱ्या अर्थाने विरोध करू . तो पर्यत आपले अमूल्य परीकींय चलन /तेल /नैसर्गिक वायू / कोळसा ह्यांची खरेदी करण्यात वाया घालवू . भारत व चीन ज्या वेगाने ह्या ३ गोष्टी वापरत आहे .त्याने जगात ह्या गोष्टींची मागणीमुळे किंमत वाढवली आहे . त्यामुळे जगभरातून हरित उर्जेसाठी पुढाकार घेतला जात आहे . कारण पवन व सूर्य ह्यांची उर्जा अक्षय्य आहे . म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांना देवतांचा दर्जा दिला .

वाहीदा 19/03/2011 - 17:15
सामान्य लोकांची याबध्द्लची जाणिव / क़ळकळ अन त्यासाठी उठविलेले पाऊल पाहून खुप आनंद झाला. आपल्याकडे असे जन-आंदोलन कधी होणार ?? तुझे , केट चे, अन तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे कौतुक :-)

माझ्या मिपावरील रशिया नेपाल अश्या लेखात जेव्हा काही महिन्यांपूर्वी मी पुतीन ह्यांच्या भारत दौर्यात त्यानी आपल्या देशात १६ अणुभट्ट्या बांधणार असे कौतुकाने लिहिले होते .त्यातील दोन तमिलनाडू येथे बांधायला सुरवात पण झाली आहे .त्याबद्दल अजून विरोध झाल्याचे माझ्या वाचनात नाही .मुळात तामिळनाडू मधील त्या दोन जागा अजून आपल्याला माहीत नाही आहेत . मुळात कोणतही राजकीय पक्षाचा अणू उर्जेला भारतात विरोध नाही आहे .रशियाने विविध दशकात आपल्याला अणू भट्या बांधून दिल्या .त्या सुरळीत पणे उर्जा पुरवत आहेत . आज जपान एखादी गोष्ट करू शकत नाही ती भारत यशस्वी पणे करू शकते असे आमचे १० फ चे कुलकर्णी सर म्हणाले ते अगदी योग्य आहे .
धन्यवाद आपा आज जर्मनी स्वताचे उपग्रह नासा किंवा इतर देशांकडून सोडते .पण मागच्या ५ वर्षात भारताच्या इस्त्रो ने जगात सर्वात स्वस्त नी मस्त लघु वजनाचे उपग्रह सोडायला सुरवात केली .अणू जर्मनीसह अनेक देशांनी नो नासा /गो ईस्त्रो चा नारा दिला . सध्या आपले एक अवकाश उड्डाण अपयशी ठरले पण ते जर यशस्वी झाले( येत्या वर्षात आपण परत जोमाने हीच चाचणी करू ) तर जगातील कोणत्याही प्रकारचे उपग्रह आपण सोडू शकू . तस्मात मला एक कविता ह्या प्रसंगी आठवते ''लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.''

पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे व्याख्यान पुणे मराठी मध्ये आयोजित केले होते. तिथे त्याना बराच विरोध झाला असे ऐकिवात आहे. काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला. मग विरोधीना ३ प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली. त्यालाही म्हणे त्याना नीट उत्तरे मिळाली नाहीत. पुण्याच्या लोकायत या संस्थेने १७ मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यांचे म्हणणे खालील दुव्यावर पहायला मिळेल. इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाशांमध्ये त्यांनी निवेदन तयार केले आहे. http://lokayatpune.wordpress.com/category/lokayat-statement/

In reply to by विनायक बेलापुरे

@काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला गंमत म्हणजे पुतीन जेव्हा २०१० मध्ये भारतात आले .तेव्हा ते येण्या आधी ते ह्या दशकातील सर्वात मोठा करार भारताबरोबर करणार होते .ह्या बाबत सविस्तर पणे मी त्यावेळी मिपावर रशिया नेपाल ह्या नावाने लेख लिहून सविस्तर माहिती दिली होती . त्या कराराचे सविस्तर वर्णन येथे आहे . थोडक्यात जेव्हा रशियाने २०१० साली भारताला १६ अणु भट्ट्या बांधून देणार असा करार केला .त्यात २ आधीच बांधायला सुरवात झाली होती . तेव्हा औचित्याचा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही .?
आज मात्र किती मेले /कोणामुळे मेले ह्यावरून काथ्याकुट आहे . बर त्या १६ अणु भट्ट्या का बांधत आहेत म्हणून त्या ३ ठिकाणी का बरे स्थानिक लोकांनी विरोध झाला नाही .? व जगात प्रगत सर्वात प्रगत तंत्रांद्यान असलेल्या फ्रेंच कंपनीविषयी रान का .....?

In reply to by निनाद मुक्काम …

रशिया बरोबरच्या कराराच्यावेळी काय परिस्थिती होती ते तपासावे लागेल. पण भारतीय राजकीय (आणि मिडिया) वातावरणात नेहमीच रशियाला फेवर्ड पप्पा सारखे वागवले गेले आहे. स्थानिकांनी विरोध केला नाही की तो यशस्वीपणे दाबला गेला ते पहावे लागेल. जैतापुर सारख्या ठिकाणी सुद्धा एकरी १० लाख घेउन लोक गप्प बसले असते, तर विरोध फारसा झालाच नाही असेच चित्र उभे राहिले असते कदाचित. डाऊ कंपनीलासुद्धा महाराष्ट्रातच का विरोध झाला आधी का नाही झाला याच्या सारखेच आहे ते उत्तर. शिवाय निनाद जी, तेंव्हा नसेल औचित्याचा मुद्दा उपस्थित झाला पण म्हणून जेंव्हा धोका लक्षात येतो तेंव्हाही विरोध होउ नये की काय ? निदान त्यामुळे तरी काही बदल होउन अणूभट्ट्यांच्या अधिकाधिक सुरक्षेचा विचार होउ शकतो आणि भविश्यातील होउ घातलेल्या दुर्घटना टळण्यास मदत होउ शकतो. नाहितर ऑल इज वेल दाखवण्याच्या नादात तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. अपघात होतात म्हणून वाहन चालवणे सोडून देत नाहीत तर वाहनात तांत्रिक दृष्ट्या बदल केले पाहिजेत. मुख्य म्हणजे वाहन चालकाच्या मानसिकतेत बदल केले पाहिजेत. सगळे काही सुरळीत आहे , ऑल इज वेल हे चित्र बदलले तरी खुप फरक पडू शकेल.

विनायकजी तुमचा मुद्दा पटला. व त्यामागची कळकळ सुद्धा जाणवली . खुद्द डॉ कलाम ह्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ज्यात काकोडकर सुद्धा होते ..संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.के.सारस्वत हे उपस्थित होते. या वेळी डॉ.कलाम यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.तेव्हा सांगितले '' जुन्या ,नव्या सर्व प्रकारच्या अणू भट्ट्यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी आवश्यक आहे . व आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनशास्त्रचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले पाहिजे .

सुधीर काळे 21/03/2011 - 20:55
निनाद, सुंदर लेख! माझ्या मते अणूशक्तीला आज तरी पर्याय दिसत नाहीं. सुरक्षिततेच्या बाबतीत, रेडिएशनच्या बाबतीत येत्या कांहीं वर्षात सुधारण नक्कीच होतील व त्यामुळे अणुशक्तीनिर्मिती जास्त-जास्त सुरक्षित होत जाईल यात शंका नाहीं! "अपघात होतात म्हणून वाहन चालवायचे नाहीं कां?" हा प्रतिसाद भावला!

आशु जोग 17/11/2015 - 09:00
कुठले अपारंपरिक मार्ग आहेत याबद्दलही सांगा ना !

पुष्करिणी 18/03/2011 - 00:58
अरे वा, बरेच समविचारी लोकं एकत्र आलेले दिसतायत. एकदम ४० % प्रकल्पांचं काम थांबवल्यावर आणि अपारंपारिक स्त्रोतांकडून ती भरपाइ होइपर्यंत ( अर्थात १०० % ही भरपाइ होइल अस वाटत नाहीच ) जनतेवरही थोडी बंधन येउ शकतात, त्याची जाणिव इथे उपस्थित असणार्‍यांना आहे का आणि त्या अनुशंगानं दैनंदिन जीवनात कराव्या लागणार्‍या त्यागाची तयारी आहे का ? म्हणजे मोसमी अन्न्/फळं/भाज्या खाणे, रेड मिटचं कमी सेवन, अन्नाची कमीत कमी नासाडी, गाड्यांचा कमी वापर ( इतकी नामांकित ऑटो इंडस्ट्री असताना ) इ. करण्याची तयारी आहे का? आणि अशी सवय / तयारी करण्याचा काही प्लॅन आहे का तुमच्या ग्रुपचा?

मी लेखात उल्लेख केला त्याप्रमाणे ११ % अणू उर्जा तर १६ % अपारंपरिक उर्जा व बाकी इतर तर टप्याटप्याने अणू उर्जा कमी करत २०२२ मध्ये पूर्ण पणे बंद करणे हा उपाय होता .
ह्यात अपारंपरिक उर्जा स्त्रोत हे टप्या टप्याने वाढवायचे होते . मुळात हा प्लान सरकारने विचार करून आखला होता .२०१० मध्ये व काही महिन्यांपूर्वी पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले . आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता . पवन उर्जेत २र्य क्रमांकावर असलेले आम्ही पहिल्या क्रमांकासाठी निकोप स्पर्धा नक्कीच करू शकतो . '' केल्याने होत आहे रे आधी........ आपल्या देशात अपारंपरिक उर्जा स्त्रोतास प्रचंड वाव आहे .अणू उर्जेसोबत ह्या उर्जेचा वापर सुरु झाल्यास आपण विजेची टंचाई संपूर्ण देशात निर्धारित लक्ष्या आधी पूर्ण करू .

In reply to by निनाद मुक्काम …

विंजिनेर 19/03/2011 - 15:30
पण अचानक त्यानी आपले धोरण बदलले . आपल्या वचनावर कायम राहत नाही ह्या बद्दल जनतेत रोष होता .
अंमळ गल्लत होतेये का? माझ्या माहिती प्रमाणे मूळ धोरण आधीच्या डाव्या सरकारने आखले होते. मर्केलबैंचे उजवे आल्यानंतर धोरण बदलले गेले. त्यामुळे मुदलातले सरकार बदलल्यावर धोरणं तरी कशी कायम र्‍हातील ओ?

In reply to by विंजिनेर

होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता . ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला . ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो . अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला . अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .
एक उदाहरण अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता . अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती . मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली . आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

In reply to by निनाद मुक्काम …

विंजिनेर 19/03/2011 - 19:55
ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला .
ह्मह्म... तुम्ही कोणत्या बाजूला झुकता ते कळाले :) एक कुतुहल (निव्वळ कुतूहल बर्का) - भारतात कोणत्या पक्षाला तुम्ही मत द्याल?

In reply to by विंजिनेर

आम्ही अनिवासी भारतीय आमचें जो पक्ष ( बर का ) जो पक्ष व्यवस्थित काळजी घेईन .म्हणजे भारत भूमीत गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ उभे करणे .आम्हाला भारतात अनेक धंदे करायला देणे . आदी . . भारतात आल्यावर जर कधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी किंवा इतर सदस्यांशी संबंध आला व आमचे आर्थिक /सांस्कृतिक / सामाजिक सूर जुळले( येथे वैचारिक सूर हा मुद्दा गौण आहे ) . त्या पक्षाला मते देऊ ( मनमोहन काका अनिवासी भारतीयांना मदतानाचा हक्क देणार आहेत अशी बातमी आहे .) थोडक्यात काय तर आमचा सध्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही , आम्हाला दिव्यत्वाची जेथे प्रचीती येईन तेथे आमचे कर जोडले जातील .

In reply to by विंजिनेर

होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा बनवले होते .तेव्हा ह्यावर योग्य विचारविनिमय करून २०२२ पर्यत सर्व अणु भट्ट्या बंद करणे अर्थात उर्जेचा तुटवडा भासू नये म्हणून पर्यायी हरित उर्जेचा आराखडा मांडला होता . ह्या उजव्या सरकारने मात्र तडाखा फडकी हा निर्णय घेतला . ह्याचा अर्थ हरित उर्जेला तिलांजली देणे असा होतो . अरेवा ही जर्मन कंपनी सिमेन्स चा अणु उर्जेचा स्टेक मोठ्या प्रमाणात विकत घेणार असल्याचे वृत्त आहे .थोडक्यात उजव्या सरकारच्या ह्या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे .म्हणूनच त्याला व्यापक विरोध झाला . अरेवा कंपनीचा ही बुडीत नसून तिच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत .
एक उदाहरण अमेरिकेने व एन एस जी ह्या अण्वस्त्र सज्ज गटांच्या राष्ट्रांनी भारताला उच्च तंत्रन्यान व युरेनियम विक्रीस प्रतिबंध केला होता . अमेरिकेत अनेक सरकार आलटून पालटून आली पण ३ दशकात ही बंधने उठवल्या गेली नव्हती . मात्र जेव्हा त्यांचा भारताविरुध्ध भूमिका बदलली तेव्हा पहिले बुश ह्यांनी अण्वस्त्र करारातर्फे पहिले बंधन उठवली .व ओबामा ह्यांनी भारतात आल्यावर अंतराळ व इतर शेत्रातील बंधने उठवली . आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.

सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही. प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही. फॉसिल फ्युएल्स आता जगभरातून हळूहळू नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. वारा,समुद्राच्या लाटा यांच्यावर उर्जा निर्मितीला मर्यादा आहेत. परंतू अणूउर्जा जरी प्रथम दर्शनी सोईस्कर वाटत असला तरी सर्वात धोकादायक पर्याय आहे तो. अणू विघटन आणि त्यातून तयार होणारे बाय प्रॉडकट्स यांचे हाफ लाइफ पाहिले तरी पुढील हजारो वर्षे हा अणूकचरा सांभाळून ठेवावा लागणार आहे. त्यांचा अन्यक्षेत्रातील (मेडिकल) वापर अत्यंत मर्यादित आहे. किरणोत्सार हा सर्वात मोठा धोका पर्यावरणाला मारक ठरणार आहे. एक विरोधाभास जाणवतो तो म्हणजे.... जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा कार्यक्रमांचा फेरविचार, स्थगिती , सुरक्षेबाबत चिंता करत असताना आपले अणूशास्त्रज्ञ मात्र टि.व्ही. चानेल्सला भेटी देवून ,सुरक्षेचा कसलाच धोका नाही ..... ऑल इज वेल .....हे पटविण्यात मश्गूल आहेत. जैतापुर पुढे रेटणे एव्ह्डाच अजेंडा आहे का काय असे वाटते. ज्या फ्रेंच अरेवाचा हा प्रोजेक्ट आहे त्या फ्रान्स ला अणू कचरयाची विल्हेवाट लावायला किती कष्ट पडले होते, न्यूझिलंड आणि ओशनिया देशांनी त्याचा किती विरोध केला होता हे त्यानिमित्ताने आठवते. फ्रान्स ने सुद्धा स्वतःच्या देशाजवळ अटलांटिक मध्ये नाही बुडवला अणूकचरा .... त्यासाठी लांब , अमेरिकेच्या पलिकडे, पाण्याचे , वारयाचे करंट सोडून थेट पैसिफिक मधे दूर नेउन बुडवायचे ठरविले . खरे तर अपारंपारिक उर्जेचे स्त्रोत शोधले पाहिजेत. शोधायला कशाला पाहिजेत ? सूर्य असा एकटाच स्त्रोत आहे जो उर्जेच्या सर्व गरजा पूर्ण करेल. पण त्यासाठी तंत्रज्ञान विकासाची, आणि मिळविलेली उर्जा अधिक चांगल्या तर्हेने (एफिशिअंटली) साठवण्याचे तंत्रद्यान विकसित व्हायला पाहिजे.

In reply to by विनायक बेलापुरे

@जपान मधील अणूभट्टी दुर्घटने नंतर जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रे आपापले अणूउर्जा त्यांच्याकडे समर्थ पर्याय आहेत .ते अपारंपरिक उर्जा स्त्रोत तर वापरू शकतात .पण कोळसा तेल व नैसर्गिक वायू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे . आपण इतके दिवस अणुउर्जा अल्प प्रमाणात वापरत होतो .पण सर्व पर्याय वापरून झाले आणी मगच .... विजेच्या बाबतीत आपण कुपोषित आहोत तर ते अती लठ्ठ १६ तासाचे भारनियमन दूर करण्यासाठी सध्या अणू उर्जेला पर्याय नाही . @प्यायला पाणी पुरणार नाही ते जलविद्युत केंद्रात वापरून समुद्राला सोडून देणे परवडणार नाही. सहमत

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद जी माझे पहिलेच वाक्य होते की सध्याच्या काळात अणूउर्जे इतका सोइस्कर पर्याय दिसत नाही. (पण तो खुप धोकादायक पर्याय आहे. अन्य कोणत्याही उर्जेच्या साधनांपेक्षा धोकादायक. ) आज जपान घडले आहे म्हणून भुकंप आणि सुनामीची चर्चा रंगते आहे. कोणत्याही प्रकल्पात जसा कोंटीजन्सी प्लान असतो तसा अणूप्रकल्पात असणारच यात वाद नाही. परंतु असे सगळे प्लान्स असतानाही "अपघात" होतात, जसा आत्ता सुनामीचा झाला तसा. आणि असा अणूप्रकल्पातील अपघात इतर कोणत्याही प्रकल्पाहून मारक असेल. अनेक जण म्हणतात आज आपल्याकडचे भारनियमन बंद व्हायला पाहिजे तर अणू उर्जेशिवाय पर्याय नाही. हाफ लाइफ नुसार पुढची ५०००० वर्शे टिकणार्या अणू कचर्याची विल्हेवाट लावायचा गहन आणि गंभीर प्रश्न असूनही ? १६ तासाचे भारनियमन संपवायचे आहे ना मग अणूप्रकल्पच घ्या असे म्हणणे म्हणजे दूध अपुरे मिळते आहे ना ? मग जे मिळते आहे ते केमिकल दूध प्या असे म्हणन्या सारखे आहे. (तसेही जराशी कटकट करुन कळत नकळत अधून मधुन का होइना पण तेच केमिकल दूध पितो आहे म्हणा सध्या आपण) . त्यामुळे भारनियमन संपवायला अणूउर्जा हे पटायला जरा अवघड जाते आहे. जैतापुरचा सध्या प्रश्न गाजतो आहे म्हणून सांगावेसे वाटते की ... जरासे कीटकनाशक भाज्या, फळांवर जास्त आढळले तर माल न स्विकारणारे अमेरिकन-युरोपियन देश, चुकुन किरणोत्सार झाला तर असा किरणोत्सारित माल स्विकारेल का भविष्यात ? सगळेच भवितव्य आपण टांगणीला तर लावून ठेवत नाही आहोत ना ? त्यातून भारतीय मिडिया आणि एकूणच आपली बातम्या दाबण्याबद्दलची मानसिकता पाहता असा किरणोत्सार झाला तरी दडवून ठेवले जाइल. जपान इतकी पारदर्शिकता मला तरी अजून आढळली नाही. आणि याचा अनुभव आपण कोंबड्यांवरचे रोग, स्वाइण फ्लू , नांदेड भागात सध्या भूगर्भातऊन येत असलेले अगम्य आवाज इ इ या सर्वांबाबत घेतला आहे. इतर्ही भरपुर उदाहरणे आहे. नैसर्गिक पाणी, कोळसा, वायु , वारा यांचा वापर नेहमीच मर्यादित राहणार आहे. नैसर्गिक खनिजे तर जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आहेत. समुद्राच्या पाण्याचे विघटन करून वीज निर्मिती शक्य आहे पण त्याने पर्यावरणाचा तोल कमालीचा ढलेल. जोपर्यंत निर्माण केलेली वीज साठवून ठेवता येत नाही (कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर) तोपर्यंत सर्व पर्याय यथातथाच राहणारा आहेत. "तिकडे" समर्थ पर्याय आहेत आपल्याकडे नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे जे मुबलक आहे त्याच्यावर आधारित संशोधन करुन आपण प्रक्ल्प उभे करायला हवे होते. जसे की अन्य युरोपियन देशांहून भारतात सुर्यप्रकाश सर्वात मोठा उर्जा स्त्रोत आहे. पृथ्वीवर येणारी प्रति स्केअर मीटर सौरऊर्जा (फ्लक्स )१७४ पेटावैट (१७४ x १०^१५ watt = १७४ x १० ^ ९ MWatt ) इतकी प्रचंड आहे. भारताची उर्जेची सध्याची गरज १५ टेराWatt म्हणजे १५ x १० ^ १३ watt इतकीच आहे. त्यावरून किती प्रचंड ऊर्जा उपलब्ध आहे तीही विनासायास , प्रदुषण विरहित हे लक्षात येइल. त्यातील ७०% पृथ्वी शोषून घेते तर ३०% इतकी पुन्हा वातावरणात इन्फ्रारेड म्हणून परावर्तित होते. पण तीच ऊर्जा चिरकाल टिकणारी आणि सर्व गरजा भागवून उरणारी आहे . आज ना उद्या संशोधनानंतर त्रुटी घालवून तीच ऊर्जा जास्त वापरली जाईल. आपले संशोधन जर ही उर्जा वापराच्या दृश्टीने झाले तरच आपली उर्जेची गरज सुरक्षीत दृष्ट्या भागवली जाउ शकेल. भारताच्या दृष्टीने वर्षातील ९-११ महिने मिळणारी सौरशक्तिच सर्व दृष्टीने किफायतशीर पर्याय आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

जर्मनी व इतर युरोपियन देश हे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले .त्यात अणू उर्जेचा वाटा आहे .मात्र हे करतांना त्यानी जाणीव पूर्वक हरित उर्जेला पाठिंबा दिला .आज जेव्हा जर्मन डाव्या पक्षाने म्हणजे मागील सरकारने अणू उर्जा उर्जा ते हरित उर्जा असा आराखडा ठेवला तेव्हा जगातून त्यांचे कौतुक झाले . ओबामा ह्यांनी त्यांच्या भाषणात जगात अपारंपरिक उर्जेचा पाठपुरावा केला .
भारतात पावन उर्जा एकूण उर्जा उत्पादनाच्या २ % कमी आहे .हेच सौर ऊर्जेबाबत आहे . जेव्हा भारतात हरित उर्जा एक समर्थ पर्याय म्हणून उभा राहीन तेव्हाच अणू उर्जेला आपण खऱ्या अर्थाने विरोध करू . तो पर्यत आपले अमूल्य परीकींय चलन /तेल /नैसर्गिक वायू / कोळसा ह्यांची खरेदी करण्यात वाया घालवू . भारत व चीन ज्या वेगाने ह्या ३ गोष्टी वापरत आहे .त्याने जगात ह्या गोष्टींची मागणीमुळे किंमत वाढवली आहे . त्यामुळे जगभरातून हरित उर्जेसाठी पुढाकार घेतला जात आहे . कारण पवन व सूर्य ह्यांची उर्जा अक्षय्य आहे . म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांना देवतांचा दर्जा दिला .

वाहीदा 19/03/2011 - 17:15
सामान्य लोकांची याबध्द्लची जाणिव / क़ळकळ अन त्यासाठी उठविलेले पाऊल पाहून खुप आनंद झाला. आपल्याकडे असे जन-आंदोलन कधी होणार ?? तुझे , केट चे, अन तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे कौतुक :-)

माझ्या मिपावरील रशिया नेपाल अश्या लेखात जेव्हा काही महिन्यांपूर्वी मी पुतीन ह्यांच्या भारत दौर्यात त्यानी आपल्या देशात १६ अणुभट्ट्या बांधणार असे कौतुकाने लिहिले होते .त्यातील दोन तमिलनाडू येथे बांधायला सुरवात पण झाली आहे .त्याबद्दल अजून विरोध झाल्याचे माझ्या वाचनात नाही .मुळात तामिळनाडू मधील त्या दोन जागा अजून आपल्याला माहीत नाही आहेत . मुळात कोणतही राजकीय पक्षाचा अणू उर्जेला भारतात विरोध नाही आहे .रशियाने विविध दशकात आपल्याला अणू भट्या बांधून दिल्या .त्या सुरळीत पणे उर्जा पुरवत आहेत . आज जपान एखादी गोष्ट करू शकत नाही ती भारत यशस्वी पणे करू शकते असे आमचे १० फ चे कुलकर्णी सर म्हणाले ते अगदी योग्य आहे .
धन्यवाद आपा आज जर्मनी स्वताचे उपग्रह नासा किंवा इतर देशांकडून सोडते .पण मागच्या ५ वर्षात भारताच्या इस्त्रो ने जगात सर्वात स्वस्त नी मस्त लघु वजनाचे उपग्रह सोडायला सुरवात केली .अणू जर्मनीसह अनेक देशांनी नो नासा /गो ईस्त्रो चा नारा दिला . सध्या आपले एक अवकाश उड्डाण अपयशी ठरले पण ते जर यशस्वी झाले( येत्या वर्षात आपण परत जोमाने हीच चाचणी करू ) तर जगातील कोणत्याही प्रकारचे उपग्रह आपण सोडू शकू . तस्मात मला एक कविता ह्या प्रसंगी आठवते ''लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.''

पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे व्याख्यान पुणे मराठी मध्ये आयोजित केले होते. तिथे त्याना बराच विरोध झाला असे ऐकिवात आहे. काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला. मग विरोधीना ३ प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली. त्यालाही म्हणे त्याना नीट उत्तरे मिळाली नाहीत. पुण्याच्या लोकायत या संस्थेने १७ मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यांचे म्हणणे खालील दुव्यावर पहायला मिळेल. इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाशांमध्ये त्यांनी निवेदन तयार केले आहे. http://lokayatpune.wordpress.com/category/lokayat-statement/

In reply to by विनायक बेलापुरे

@काकोडकरांनी चेर्नोबिल दुर्घटने मध्ये फक्त ३६ जण म्रुत्यूमुखी पडले असे वक्तव्य केल्यावर बराच गोंधळ झाला गंमत म्हणजे पुतीन जेव्हा २०१० मध्ये भारतात आले .तेव्हा ते येण्या आधी ते ह्या दशकातील सर्वात मोठा करार भारताबरोबर करणार होते .ह्या बाबत सविस्तर पणे मी त्यावेळी मिपावर रशिया नेपाल ह्या नावाने लेख लिहून सविस्तर माहिती दिली होती . त्या कराराचे सविस्तर वर्णन येथे आहे . थोडक्यात जेव्हा रशियाने २०१० साली भारताला १६ अणु भट्ट्या बांधून देणार असा करार केला .त्यात २ आधीच बांधायला सुरवात झाली होती . तेव्हा औचित्याचा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही .?
आज मात्र किती मेले /कोणामुळे मेले ह्यावरून काथ्याकुट आहे . बर त्या १६ अणु भट्ट्या का बांधत आहेत म्हणून त्या ३ ठिकाणी का बरे स्थानिक लोकांनी विरोध झाला नाही .? व जगात प्रगत सर्वात प्रगत तंत्रांद्यान असलेल्या फ्रेंच कंपनीविषयी रान का .....?

In reply to by निनाद मुक्काम …

रशिया बरोबरच्या कराराच्यावेळी काय परिस्थिती होती ते तपासावे लागेल. पण भारतीय राजकीय (आणि मिडिया) वातावरणात नेहमीच रशियाला फेवर्ड पप्पा सारखे वागवले गेले आहे. स्थानिकांनी विरोध केला नाही की तो यशस्वीपणे दाबला गेला ते पहावे लागेल. जैतापुर सारख्या ठिकाणी सुद्धा एकरी १० लाख घेउन लोक गप्प बसले असते, तर विरोध फारसा झालाच नाही असेच चित्र उभे राहिले असते कदाचित. डाऊ कंपनीलासुद्धा महाराष्ट्रातच का विरोध झाला आधी का नाही झाला याच्या सारखेच आहे ते उत्तर. शिवाय निनाद जी, तेंव्हा नसेल औचित्याचा मुद्दा उपस्थित झाला पण म्हणून जेंव्हा धोका लक्षात येतो तेंव्हाही विरोध होउ नये की काय ? निदान त्यामुळे तरी काही बदल होउन अणूभट्ट्यांच्या अधिकाधिक सुरक्षेचा विचार होउ शकतो आणि भविश्यातील होउ घातलेल्या दुर्घटना टळण्यास मदत होउ शकतो. नाहितर ऑल इज वेल दाखवण्याच्या नादात तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. अपघात होतात म्हणून वाहन चालवणे सोडून देत नाहीत तर वाहनात तांत्रिक दृष्ट्या बदल केले पाहिजेत. मुख्य म्हणजे वाहन चालकाच्या मानसिकतेत बदल केले पाहिजेत. सगळे काही सुरळीत आहे , ऑल इज वेल हे चित्र बदलले तरी खुप फरक पडू शकेल.

विनायकजी तुमचा मुद्दा पटला. व त्यामागची कळकळ सुद्धा जाणवली . खुद्द डॉ कलाम ह्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ज्यात काकोडकर सुद्धा होते ..संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.के.सारस्वत हे उपस्थित होते. या वेळी डॉ.कलाम यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.तेव्हा सांगितले '' जुन्या ,नव्या सर्व प्रकारच्या अणू भट्ट्यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी आवश्यक आहे . व आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनशास्त्रचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले पाहिजे .

सुधीर काळे 21/03/2011 - 20:55
निनाद, सुंदर लेख! माझ्या मते अणूशक्तीला आज तरी पर्याय दिसत नाहीं. सुरक्षिततेच्या बाबतीत, रेडिएशनच्या बाबतीत येत्या कांहीं वर्षात सुधारण नक्कीच होतील व त्यामुळे अणुशक्तीनिर्मिती जास्त-जास्त सुरक्षित होत जाईल यात शंका नाहीं! "अपघात होतात म्हणून वाहन चालवायचे नाहीं कां?" हा प्रतिसाद भावला!

आशु जोग 17/11/2015 - 09:00
कुठले अपारंपरिक मार्ग आहेत याबद्दलही सांगा ना !
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर्मनीत २०२२ मध्ये सर्व अणू भट्या बंद करून त्याजागी अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरायचे .असे जर्मन सरकारचे धोरण होते . त्याला मोडता घालत ह्या अणू उर्जेला जीवदान मिळावे असा निर्णय सरकारने घेतला . मुळात अपारंपरिक उर्जा स्त्रोत जर्मनीत समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत .ओबामा ह्यांनी स्वतःच्या देशात व जगात ह्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढण्यास उत्तेजन देत आहेत . परिणामी जर्मनीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक संताप निर्माण झाला .आभसी जगतात तो व्यक्तही करून झाला . आणी .... जर्मन सरकारच्या निर्णयाविरुद्ध १४ मार्चला १ लाख हून जास्त लोक जर्मनीत विविध शहरात रस्त्यावर आली .व अहिंसक मार्गाने निदर्शने केली .व

भुत़काळ वि. भविष्य - १

किरन वनारे ·

विकास 15/03/2011 - 19:23
मुक्तक आवडले. :-) यावरून एक विनोद आठवला: माझ्या एका मित्राने एकदा असेच (गमतीत पण तसे न दाखवता) जाहीर केले की तो हात बघून भविष्य बघायला शिकला म्हणून...त्याबरोबर आमच्या मित्रातीलच एक अपेक्षित उमेदवार लगेच पुढे आला. ह्या "ज्योतिषी" मित्राने त्याच्या हातावरील प्रत्येक रेषा न्याहाळली आणि म्हणाला, "तुझा सुरवातीचा काळ जरा खडतर आहे... " त्याबरोबर कुतुहलाने त्याने विचारले, "(सुरवातीचा काळ खडतर, तर) मग नंतर काय?" आमचे ज्योतिषी बुवा म्हणाले, "नंतर सवय होईल." :-)

नि३ 16/03/2011 - 01:25
अगदी अगदी ...आमच्या बाबतीत शेम टु शेम केस झाली बर का.. १० वित होतो तेव्हा आमचे तिर्थरुप म्हणायचे..हे महत्वाचे वर्ष आहे ..एकदा का चांगल्या मार्कांनी पास झाला आणी चांगल कॉलेज मिळाल की झाल्..मग बारावीत्..बस हे एकच वर्ष आहे..करीयर घडवणार ..मेक ऑर ब्रेक... ईंजीनीयरींगला आल्यावर्...बस ईजीनीयरींगची डीग्री चांगल्या परसेंटेज नी मिळाली की मग मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी..मग काय मोठा पगार नो टेंशन लक्झुरीयस लाईफ्....पण ..पण.. आता कळते मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी म्हणजे काय आहे ते.... असो.. पण त्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे म्हणा...सो ..नो कंम्पलेंट्स..

In reply to by नि३

बाप लोक फसवतात ना, गाजर पुढे पुढे धरुन ? :) त्या गाजराच्या नादात मुळे , भोपळे, आंबे, पपया, सगळे काहि मिळते जाता जाता ...............पण गाजर काही मिळत नाही ! बरोबर ? ;)

In reply to by विनायक बेलापुरे

टारझन 16/03/2011 - 11:44
त्या गाजराच्या नादात मुळे , भोपळे, आंबे, पपया, सगळे काहि मिळते जाता जाता
बायक्युरिअस आहात काय ? :)

In reply to by नि३

शिल्पा ब 18/03/2011 - 01:31
कळले हो!!! तुम्ही १२वीत चांगले मार्क मिळवुन इंजिनीरिंग केलेत अन मल्टी नॅशनल कंपनीत कामाला आहात...अर्थात चांगला पगार, घर, गाडी इ.इ. काही राहिले असेल तर कळवा. ;) पाणी बाटलीतले पिता कि नळाचे? फर्निचर कोणते वापरता? घरातून काय काय दिसते? आता तुम्हीच सांगताय म्हणुन विचारतेय... हो!!! नाहीतर पुन्हा आदळआपट नको.. ;)

विकास 15/03/2011 - 19:23
मुक्तक आवडले. :-) यावरून एक विनोद आठवला: माझ्या एका मित्राने एकदा असेच (गमतीत पण तसे न दाखवता) जाहीर केले की तो हात बघून भविष्य बघायला शिकला म्हणून...त्याबरोबर आमच्या मित्रातीलच एक अपेक्षित उमेदवार लगेच पुढे आला. ह्या "ज्योतिषी" मित्राने त्याच्या हातावरील प्रत्येक रेषा न्याहाळली आणि म्हणाला, "तुझा सुरवातीचा काळ जरा खडतर आहे... " त्याबरोबर कुतुहलाने त्याने विचारले, "(सुरवातीचा काळ खडतर, तर) मग नंतर काय?" आमचे ज्योतिषी बुवा म्हणाले, "नंतर सवय होईल." :-)

नि३ 16/03/2011 - 01:25
अगदी अगदी ...आमच्या बाबतीत शेम टु शेम केस झाली बर का.. १० वित होतो तेव्हा आमचे तिर्थरुप म्हणायचे..हे महत्वाचे वर्ष आहे ..एकदा का चांगल्या मार्कांनी पास झाला आणी चांगल कॉलेज मिळाल की झाल्..मग बारावीत्..बस हे एकच वर्ष आहे..करीयर घडवणार ..मेक ऑर ब्रेक... ईंजीनीयरींगला आल्यावर्...बस ईजीनीयरींगची डीग्री चांगल्या परसेंटेज नी मिळाली की मग मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी..मग काय मोठा पगार नो टेंशन लक्झुरीयस लाईफ्....पण ..पण.. आता कळते मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी म्हणजे काय आहे ते.... असो.. पण त्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे म्हणा...सो ..नो कंम्पलेंट्स..

In reply to by नि३

बाप लोक फसवतात ना, गाजर पुढे पुढे धरुन ? :) त्या गाजराच्या नादात मुळे , भोपळे, आंबे, पपया, सगळे काहि मिळते जाता जाता ...............पण गाजर काही मिळत नाही ! बरोबर ? ;)

In reply to by विनायक बेलापुरे

टारझन 16/03/2011 - 11:44
त्या गाजराच्या नादात मुळे , भोपळे, आंबे, पपया, सगळे काहि मिळते जाता जाता
बायक्युरिअस आहात काय ? :)

In reply to by नि३

शिल्पा ब 18/03/2011 - 01:31
कळले हो!!! तुम्ही १२वीत चांगले मार्क मिळवुन इंजिनीरिंग केलेत अन मल्टी नॅशनल कंपनीत कामाला आहात...अर्थात चांगला पगार, घर, गाडी इ.इ. काही राहिले असेल तर कळवा. ;) पाणी बाटलीतले पिता कि नळाचे? फर्निचर कोणते वापरता? घरातून काय काय दिसते? आता तुम्हीच सांगताय म्हणुन विचारतेय... हो!!! नाहीतर पुन्हा आदळआपट नको.. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
भुत़काळ वि. भविष्य - १ बरयाचदा आपण विचार करतो कि उद्ययाचा दिवस हा आजपे़क्षा चान्गला असेल, काहितरि नविन घेउन येइल, आज असलेले प्रश्न उद्या पड्णार नाहित किवा सोड्वले जातिल. मग मार्ग मोकळे होतिल, सर्वे सुरळित होइल. असे असते तर हे मग जीवणच काय, पण खरे सान्गु या गोष्टि फक्त ऐकायला किवा बोलायलाच सोप्या आहेत; पण जो आनुभवतो (म्हणजे आपण सर्वेच) त्यालाच काटे टोचतात. तरिहिपण काहि हुषार लोके खुशाल सल्ले (न विचारता/मागता) देत फिरतात.

महिला दिन ( आमचे मनोगत )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी ·

In reply to by मितान

तो उपहास आहे . कारण आपल्याकडे विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे )

In reply to by निनाद मुक्काम …

विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे ) उत्तर भारतीयांचे याबाबतीतले एक ऐकीव उदाहरण ऐकून मला सॉलिड शॉक बसला होता आणि हसून मुरकुंड्याही वळल्या होत्या. आमचा एक दोस्त एका उत्तर भारतीय रंगार्‍याशी ( त्याच्या घरी तेंव्हा रंगकाम चालू होते) गप्पा मारत होता. लांबी भरता भरता बाता चालू होत्या. रंगारी - बहुत परेशान हुए हैं. दो साल से घर नहीं गये | मित्र - इतने दिन. तो कब जाओगे घर ? रंगारी - जाएंगे अगले महिने. हमरा बच्चा एक साल का हो जाएगा अगले महिने. मित्र (आश्चर्याने) - अभी तो आपने कहा की दो साल से आप घर नहीं गये? बच्चा एक साल का कैसे होगा | रंगारी - नही. हमारे बडे भैय्याजी है ना गांव मे . मित्र (खल्लास) आणि किस्सा ऐकल्यावर आम्ही मित्रमंडळी हसून हसून खल्लास. मला तर हे ऐकून 'मातॄभूमी' सिनेमा आठवला. आणि महिला सबलीकरण, त्यांच्यावरील अन्याय असल्या गप्पा ऐकल्या की हा किस्साच आठवतो. महिलांना जिथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तिथे त्यांचे सबलीकरण व्हायला आणखीन १००० वर्षे जावी लागतील.

पूर्वी ''गोरी मुलगी हवी'' अशी जाहिरात असायची .आज गोरे होण्यासाठी क्रीम विकतात . आणी आम्ही कोणत्या नैतिक मुद्यावर वर्ण भेदा विरुध्ध गोर्यांशी लढलो .

रेवती 11/03/2011 - 03:32
तिला भविष्य निर्वाह निधी नाही आहे .व तिला दहा तोंड पोसायची आहेत हा विचार आपण का करत नाही . बरोबर आहे. तिचा नवरा एकतर दारू पिऊन पडलेला असतो किंवा आधीच पन्नास पोरं बाईच्या पदरात टाकून मेलेला असतो. तिच्या नवर्‍याने कोणताही विचार नाही केला तरी चालतय कि!;) या निमित्तानं एक खरी गोष्ट आठवली. माझ्या सासरी कामाला येणारी बाई नेहमी नवर्‍याच्या दारूकामाबद्दल तक्रारी करायची. त्यानं केलेली मारझोड पाहून एकदा माझ्या सासूबाई रागानं म्हणाल्या कि रडतेस कसली? नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला. दुसर्‍या दिवशी तिनं आणि तिच्या मुलीनं खरच त्याला केरसुणीचे फटके देवून पळवून लावले. तो परत काही आला नाही. पुढे तिचे काही अडले नाही. स्वत: कष्ट करून मुलीचे लग्न करून दिले आणि बर्‍या परिस्थितीत आहे. म्हणजे मीठ भाकरी तरी नियमीतपणे खाते आहे. तिने मुलीपुढे आपल्या वागणुकीतून उदाहरण ठेवले.

नगरीनिरंजन 11/03/2011 - 05:48
लेख आवडला. बर्‍याच विसंगतींवर नेमके बोट ठेवले आहे. ज्याना गरज आहे त्या महिलांना हा दिन 'साजरा' करायची उसंत नाही आणि ज्यांना उसंत आहे त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे ठोस काही होत नाही. रेवतीतैच्या प्रतिसादात कामवाल्या बाईला भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. त्या हिशोबाने सर्वच स्त्रियांना पगार देताना असा विचार केला जावा असेही कोणी म्हणेल.

In reply to by नगरीनिरंजन

वपाडाव 11/03/2011 - 10:56
ज्याना गरज आहे त्या महिलांना हा दिन 'साजरा' करायची उसंत नाही आणि ज्यांना उसंत आहे त्यांना काही फरक पडत नाही.
१००% सत्य. सहमत

In reply to by नगरीनिरंजन

रेवती 11/03/2011 - 19:19
भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. नवर्‍याने नको द्यायला निधी पण तिनं एकटीनच काय म्हणून दहा तोंडं पोसायची जबाबदारी घ्यावी? मुलं दोघांची आहेत तर तो पिऊन पडलेला, निष्काळजी कसा चालतो? असे माझे म्हणणे होते.

@नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला. माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही . असे समजू की काही बायकांचे नवरे काम करतात .(गवंडी /सुतार /रिक्षा ) त्यांना अचानक वाढलेले कांद्यांचे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे /नैसर्गिक वायू ह्यांचे वाढलेले भाव ( अचानक आलेली आजारपण किंवा शस्त्रक्रिया ) भेसळयुक्त रॉकेल विकत घेणे .ह्याचे आर्थिक गणित बसवतांना तारांबळ उडते .हा मुद्दा अचानक मला सुचला नाही .(महिला दिनाचे औचित्य साधून ) माझ्या आख्यानात सुद्धा मी लिहीले आहे ' जे 'श्रम करतात त्या मजूर वर्गाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे .कारण परदेशात स्वतःचे काम स्वतः करताना झालेली तारांबळ मी लिहिली होती .त्यांच्या मुलांना शिकायचे असते .( शिक्षणाचा खर्च .....) येथे त्यांना योग्य मोबदला द्या हे लिहितांना तिला पोस्टात पैसे शिल्लक टाक किंवा मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरित करणे असे अनेक पर्याय असतात .( सुंबरान मधील मुक्त बर्वे म्हणते ''भटक्या आयुष्यातून बाहेर पडून स्थिर व मानाचे आयुष्य जगण्यासाठी शिक्षण हाच मुख्य आधार . येथे आय टी वाल्यांना जास्त पगार म्हणून त्या उल्लेखाने चर्चा झाली .त्यांची मनोगते झाली .( जो कष्ट करतो .त्याला पैसा मिळाला .तर त्यात काहीच वाईट नाही .म्हणूनच मी त्या लेखात उगाच मी प्रतिसाद दिला नाही .) दूरदर्शन वर पूरब से .. हि जाहिरात पहिली होती . घरातील मोलकरीण जेव्हा स्वतःचे नाव लिहायला मालकीण बाई कडून शिकते .व एके ठिकाणी तिला जेव्हा शाई चा डब्बा दिला जातो .तेव्हा ज्या अभिमानाने ती पेन उचलते ते पाहून कौतुक वाटते . माझ्या बालपणी माझा मित्र हा शन्ना नवरे ह्यांच्या इमारतीला लागून एका पडवीत राहायचा ( ते शन्नाचे भाडेकरू आहेत .) त्याची आई धुणी भांडी करायची .पण त्याचा शिकण्यासाठी व इतर अनेक बाबतीत त्या भागातील लोकांनी तिला खूप मदत केली .सध्या माझा बालमित्र पदवीधर असून नोकरी करतो .( आईला काम करावे लागत नाही .) आम्ही सांभाळायला होतो त्या मावशींकडे त्याची आई काम करायची तिला घरची एक सदस्य असल्यासारखी त्यानी प्रचंड मदत केली .आम्ही सांभाळायला येणाऱ्या चाकरमानी मुलांच्या पालकांनी जमेल ते केले . कळत नकळत हा सिनेमा टिळक थेटरात पहिला आलो .तेव्हा बाल्कनीत त्याच्या आईने आम्हाला शन्ना नवऱ्या नी पास दिल्याचे अभिमानाने सांगितले .( त्याच्या वडिलांना ताई म्हणतात तसे वाईट वर्तनामुळे सोडून त्यांच्या आईने त्याला शिकवला .समाजात तिच्या आईला आमच्या पालकांसह त्या भागातील रहिवाशांचा पाठिंबा होता .( त्याने शन्ना ह्यांच्या घरी लहानपणी खेळायला नेले होते .त्यांची नात राधिका व इतर अनेक मुल त्याला बरोबरींच्या नात्याने वागवत होते .) आज ह्या'' बायकांची खूप नाटके असतात'' अशी विधान कानावर पडतात . काही बाबतीत खरे असेल .पण ''टाळी एका हाताने वाजत नाही '' ''प्यार दो प्यार लो '' ( ती दमली असेल व शक्य असेल तर एका चहाचा कप व काही गप्पा /सल्ला/ अल्पशी मदत त्या बाईचे तुमच्या प्रती मन बदलते.) माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे झेपत नव्हते . .मी त्याला . इंटर शिप करायला लावली.) बल्लवाचार्य म्हणून आज त्याला नोकरी आहे. '' पदवीचे शिक्षण घे'' .तुला दुबई किंवा आखतात मी नोकरी साठी प्रयत्न करेन असे सुध्धा सांगितले आहे .अर्थात कुशल /अनुभवी बल्ल्वाचार्यांना . जगभरातून .मागणी आहे .प्रगत देशात त्यांच्यासाठी वेगळे विसा असतात .व भारतीय उपहारगृह चालू करायचे असेल तर भारतातून शेफ आणू शकतो .( युरोपात तशी खास विसाची सोय आहे .)

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 11/03/2011 - 19:31
माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही . कितीतरी बायका नवर्‍याच्या व्यसनांसाठी त्यांच्या तुटपुंज्या मिळकतीतून पैसे देतात. प्रसंगी उधार उसनवारी करतात. मोलकरणींचे नवरे दारू पिउन येतात आणि मारझोड मात्र करतात. घरात चार मुलं आहेत त्यांची जबाबदारी, इतर घरखर्च याची काळजी फक्त त्या बाईनं करायची. मोलकरणींची अवस्था बघवत नाही. कधी डोळा सुजलेला तर कधी पाठीवर वळ, कधी पाय सुजलेला..... अश्या बायकांनी बिनकामाच्या आणि मारकुट्या नवर्‍याला काय म्हणून पोसायचे? या बायकांना मुलबाळ होत नाही किंवा फक्त मुलीच होतात या कारणानं नवरे सोडून देतात. हा तर सारखी मारझोड करणारा गडी होता, शिवाय दारू पिऊन तब्येतीचं मातेरं झालेलं ते वेगळच. म्हणूनच सासूबाईंनी तिला सांगितलं कि रोजरोज असलं सहन करण्यापेक्षा एकदाच काय ते घरातून घालवून दे. तिनं ते केलं हे महत्वाचं. 'कुंकवाचा धनी' म्हणत सहन करत राहिली नाही.

In reply to by रेवती

समजले . माझ्या वर्ग मित्राच्या आईने हाच पर्याय निवडला .( तुमच्या सासू बाईंचे विशेष कौतुक ) नाहीतर दिवाळीला साडी किंवा पैसे दिले की दौलतजादा करत आहोत असा आव आमच्या येथे काही शेठानी करतात .

प्रास 11/03/2011 - 11:32
छान मनोगत आणि प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया.... टंकलेखन हळू हळू सुधारतंय हे तर नक्कीच.... ;-) हार्दिक शुभेच्छा! :-)

विजुभाऊ 11/03/2011 - 11:52
निनाद लेख पटला. जर भविष्यात पुढे मला मुलगी झाली तिला चुकून ही परुष प्रधान मानसिकतेचा परीसस्पर्श होऊन देणार नाही ... हा प्रयत्न करणे काही प्रमाणात आपल्य हातात आहे. भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे. उत्तरभारतात पुरुषांची मनोवृत्ती फार विचित्र आहे. माझा एक दिल्लीकर कलीग पुण्यात आला होता त्याने प्रथमच एखाद्या मुलीला बाईक चालवताना पाहिले. त्याच्या तोम्डून अभवीतपणे एक वाक्य निघून गेले " अरे अगर दिल्ली मे या नॉर्थ मे कहीभी अगर कोई लडकी ऐसी बाई क्चलाती दिखगये तो शाम तक उसपर रेप हो जायेगा" मल ते वाक्य प्रचन्ड खटकले. मुलीनी बाईक चालवणे आणि रेप होणे यात काय नक्की सांगड आहे तेच कळत नव्हते. पण इकडे दिल्लीत आल्यानन्तर त्यामागची विचारसरणी जाणवली. स्त्री ही कायम अबलाच असावी. तीने बाईक चालवणे म्हणजे ती काहितरी विगळी आहे तीला तिची जागा दाखवून द्यायलाच हवी" असे काहिसे इथल्या समाजाची मानसीकता आहे. गुरगावसारख्या शहरात थोडीशी कमी असेल पण हरीयाणात स्त्रीयानी घराबाहेर येवून काही करण्याची त्याना मुभाच नाही. एक मित्र सांगत होता. तो कोणाच्यातरी लग्नाला गेला होता त्या गावात संध्याकाळी नावाला म्हणून स्त्री दृष्टीस पडायची नाही . एकूण हरीयाणात हीच परीस्थिती आहे. तेथे स्त्री गर्भहत्येचे प्रमाण प्रचंड आहे. मुलाना लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून केरळ ,नागालॅन्ड मधून मुली विकत आणल्या जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणारा समाजवादी पक्ष महीला आरक्षणाच्या विधेयकाला कडाडून विरोध करतो तो त्याच उत्तरभारतीय मानसीकतेतून बीहार मधून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या सुशिक्षीएत तरुणाला एकदा विचारले की तुला पुण्यात आल्यावर काय विषेश जाणवले.... त्यावर त्याचे उत्तर होते " इथे स्त्रीया फारच मोकळेपणे इन्डीपेन्डन्ट फिरतात. मला उत्तरेत हे कुठेच जाणवले नाही. समाजाची ही मानसीकता बदलायला किती वर्षे जातील कोण जाणे. आपण आपल्यापुरते निदान प्रयत्न करुयात. मात्र हे नक्की की अशी मानसीकता असलेल्या कुटुंबात आमच्या मुलीला आम्ही पाठवणार नाही . तिला आम्ही नेहमीच भक्कम मानसीक पाठबळ देऊ. तिच्या कौटुंबीक अडी अडचणीत भक्कपणे पाठीशी उभे राहु.

div style="text-align: left;">भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे.
अवघड आहे पण अशक्य नाही आहे . आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली . तुम्ही उत्तमरीत्या माझा मुद्दा मांडला आहे . ह्यांचा महिला आरक्षण आणण्यात विरोध ह्यासाठीच आहे की ह्यांच्या पक्षात महिला कार्यकर्त्यांची फळी नाही आहे .अर्थात आरक्षणाचा हेतूच हा आहे की ह्या निमित्ताने महिला राजकारणात येतील . घराची चूल सांभाळणाऱ्या देशाची चूल सुध्धा उत्तमरीत्या सांभाळू शकतील .

In reply to by निनाद मुक्काम …

आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की ठाम भूमिका आणि औद्धत्य यातली सीमारेषा बर्‍याचदा अतिशय पुसट असते असे आमचे मत आहे. :) (हे छद्मी हास्य आहे.) शिवाय इथे ठामपणे भूमिका मांडली म्हणजे महिला सबलीकरणाच्या दॄष्टीने काही विशेष घडले असे खरोखरंच वाटत नाही. आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली . हे मात्र खरोखरच महिला सबलीकरणाचे उदाहरण आहे.

In reply to by मितान

तो उपहास आहे . कारण आपल्याकडे विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे )

In reply to by निनाद मुक्काम …

विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे ) उत्तर भारतीयांचे याबाबतीतले एक ऐकीव उदाहरण ऐकून मला सॉलिड शॉक बसला होता आणि हसून मुरकुंड्याही वळल्या होत्या. आमचा एक दोस्त एका उत्तर भारतीय रंगार्‍याशी ( त्याच्या घरी तेंव्हा रंगकाम चालू होते) गप्पा मारत होता. लांबी भरता भरता बाता चालू होत्या. रंगारी - बहुत परेशान हुए हैं. दो साल से घर नहीं गये | मित्र - इतने दिन. तो कब जाओगे घर ? रंगारी - जाएंगे अगले महिने. हमरा बच्चा एक साल का हो जाएगा अगले महिने. मित्र (आश्चर्याने) - अभी तो आपने कहा की दो साल से आप घर नहीं गये? बच्चा एक साल का कैसे होगा | रंगारी - नही. हमारे बडे भैय्याजी है ना गांव मे . मित्र (खल्लास) आणि किस्सा ऐकल्यावर आम्ही मित्रमंडळी हसून हसून खल्लास. मला तर हे ऐकून 'मातॄभूमी' सिनेमा आठवला. आणि महिला सबलीकरण, त्यांच्यावरील अन्याय असल्या गप्पा ऐकल्या की हा किस्साच आठवतो. महिलांना जिथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तिथे त्यांचे सबलीकरण व्हायला आणखीन १००० वर्षे जावी लागतील.

पूर्वी ''गोरी मुलगी हवी'' अशी जाहिरात असायची .आज गोरे होण्यासाठी क्रीम विकतात . आणी आम्ही कोणत्या नैतिक मुद्यावर वर्ण भेदा विरुध्ध गोर्यांशी लढलो .

रेवती 11/03/2011 - 03:32
तिला भविष्य निर्वाह निधी नाही आहे .व तिला दहा तोंड पोसायची आहेत हा विचार आपण का करत नाही . बरोबर आहे. तिचा नवरा एकतर दारू पिऊन पडलेला असतो किंवा आधीच पन्नास पोरं बाईच्या पदरात टाकून मेलेला असतो. तिच्या नवर्‍याने कोणताही विचार नाही केला तरी चालतय कि!;) या निमित्तानं एक खरी गोष्ट आठवली. माझ्या सासरी कामाला येणारी बाई नेहमी नवर्‍याच्या दारूकामाबद्दल तक्रारी करायची. त्यानं केलेली मारझोड पाहून एकदा माझ्या सासूबाई रागानं म्हणाल्या कि रडतेस कसली? नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला. दुसर्‍या दिवशी तिनं आणि तिच्या मुलीनं खरच त्याला केरसुणीचे फटके देवून पळवून लावले. तो परत काही आला नाही. पुढे तिचे काही अडले नाही. स्वत: कष्ट करून मुलीचे लग्न करून दिले आणि बर्‍या परिस्थितीत आहे. म्हणजे मीठ भाकरी तरी नियमीतपणे खाते आहे. तिने मुलीपुढे आपल्या वागणुकीतून उदाहरण ठेवले.

नगरीनिरंजन 11/03/2011 - 05:48
लेख आवडला. बर्‍याच विसंगतींवर नेमके बोट ठेवले आहे. ज्याना गरज आहे त्या महिलांना हा दिन 'साजरा' करायची उसंत नाही आणि ज्यांना उसंत आहे त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे ठोस काही होत नाही. रेवतीतैच्या प्रतिसादात कामवाल्या बाईला भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. त्या हिशोबाने सर्वच स्त्रियांना पगार देताना असा विचार केला जावा असेही कोणी म्हणेल.

In reply to by नगरीनिरंजन

वपाडाव 11/03/2011 - 10:56
ज्याना गरज आहे त्या महिलांना हा दिन 'साजरा' करायची उसंत नाही आणि ज्यांना उसंत आहे त्यांना काही फरक पडत नाही.
१००% सत्य. सहमत

In reply to by नगरीनिरंजन

रेवती 11/03/2011 - 19:19
भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. नवर्‍याने नको द्यायला निधी पण तिनं एकटीनच काय म्हणून दहा तोंडं पोसायची जबाबदारी घ्यावी? मुलं दोघांची आहेत तर तो पिऊन पडलेला, निष्काळजी कसा चालतो? असे माझे म्हणणे होते.

@नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला. माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही . असे समजू की काही बायकांचे नवरे काम करतात .(गवंडी /सुतार /रिक्षा ) त्यांना अचानक वाढलेले कांद्यांचे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे /नैसर्गिक वायू ह्यांचे वाढलेले भाव ( अचानक आलेली आजारपण किंवा शस्त्रक्रिया ) भेसळयुक्त रॉकेल विकत घेणे .ह्याचे आर्थिक गणित बसवतांना तारांबळ उडते .हा मुद्दा अचानक मला सुचला नाही .(महिला दिनाचे औचित्य साधून ) माझ्या आख्यानात सुद्धा मी लिहीले आहे ' जे 'श्रम करतात त्या मजूर वर्गाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे .कारण परदेशात स्वतःचे काम स्वतः करताना झालेली तारांबळ मी लिहिली होती .त्यांच्या मुलांना शिकायचे असते .( शिक्षणाचा खर्च .....) येथे त्यांना योग्य मोबदला द्या हे लिहितांना तिला पोस्टात पैसे शिल्लक टाक किंवा मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरित करणे असे अनेक पर्याय असतात .( सुंबरान मधील मुक्त बर्वे म्हणते ''भटक्या आयुष्यातून बाहेर पडून स्थिर व मानाचे आयुष्य जगण्यासाठी शिक्षण हाच मुख्य आधार . येथे आय टी वाल्यांना जास्त पगार म्हणून त्या उल्लेखाने चर्चा झाली .त्यांची मनोगते झाली .( जो कष्ट करतो .त्याला पैसा मिळाला .तर त्यात काहीच वाईट नाही .म्हणूनच मी त्या लेखात उगाच मी प्रतिसाद दिला नाही .) दूरदर्शन वर पूरब से .. हि जाहिरात पहिली होती . घरातील मोलकरीण जेव्हा स्वतःचे नाव लिहायला मालकीण बाई कडून शिकते .व एके ठिकाणी तिला जेव्हा शाई चा डब्बा दिला जातो .तेव्हा ज्या अभिमानाने ती पेन उचलते ते पाहून कौतुक वाटते . माझ्या बालपणी माझा मित्र हा शन्ना नवरे ह्यांच्या इमारतीला लागून एका पडवीत राहायचा ( ते शन्नाचे भाडेकरू आहेत .) त्याची आई धुणी भांडी करायची .पण त्याचा शिकण्यासाठी व इतर अनेक बाबतीत त्या भागातील लोकांनी तिला खूप मदत केली .सध्या माझा बालमित्र पदवीधर असून नोकरी करतो .( आईला काम करावे लागत नाही .) आम्ही सांभाळायला होतो त्या मावशींकडे त्याची आई काम करायची तिला घरची एक सदस्य असल्यासारखी त्यानी प्रचंड मदत केली .आम्ही सांभाळायला येणाऱ्या चाकरमानी मुलांच्या पालकांनी जमेल ते केले . कळत नकळत हा सिनेमा टिळक थेटरात पहिला आलो .तेव्हा बाल्कनीत त्याच्या आईने आम्हाला शन्ना नवऱ्या नी पास दिल्याचे अभिमानाने सांगितले .( त्याच्या वडिलांना ताई म्हणतात तसे वाईट वर्तनामुळे सोडून त्यांच्या आईने त्याला शिकवला .समाजात तिच्या आईला आमच्या पालकांसह त्या भागातील रहिवाशांचा पाठिंबा होता .( त्याने शन्ना ह्यांच्या घरी लहानपणी खेळायला नेले होते .त्यांची नात राधिका व इतर अनेक मुल त्याला बरोबरींच्या नात्याने वागवत होते .) आज ह्या'' बायकांची खूप नाटके असतात'' अशी विधान कानावर पडतात . काही बाबतीत खरे असेल .पण ''टाळी एका हाताने वाजत नाही '' ''प्यार दो प्यार लो '' ( ती दमली असेल व शक्य असेल तर एका चहाचा कप व काही गप्पा /सल्ला/ अल्पशी मदत त्या बाईचे तुमच्या प्रती मन बदलते.) माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे झेपत नव्हते . .मी त्याला . इंटर शिप करायला लावली.) बल्लवाचार्य म्हणून आज त्याला नोकरी आहे. '' पदवीचे शिक्षण घे'' .तुला दुबई किंवा आखतात मी नोकरी साठी प्रयत्न करेन असे सुध्धा सांगितले आहे .अर्थात कुशल /अनुभवी बल्ल्वाचार्यांना . जगभरातून .मागणी आहे .प्रगत देशात त्यांच्यासाठी वेगळे विसा असतात .व भारतीय उपहारगृह चालू करायचे असेल तर भारतातून शेफ आणू शकतो .( युरोपात तशी खास विसाची सोय आहे .)

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 11/03/2011 - 19:31
माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही . कितीतरी बायका नवर्‍याच्या व्यसनांसाठी त्यांच्या तुटपुंज्या मिळकतीतून पैसे देतात. प्रसंगी उधार उसनवारी करतात. मोलकरणींचे नवरे दारू पिउन येतात आणि मारझोड मात्र करतात. घरात चार मुलं आहेत त्यांची जबाबदारी, इतर घरखर्च याची काळजी फक्त त्या बाईनं करायची. मोलकरणींची अवस्था बघवत नाही. कधी डोळा सुजलेला तर कधी पाठीवर वळ, कधी पाय सुजलेला..... अश्या बायकांनी बिनकामाच्या आणि मारकुट्या नवर्‍याला काय म्हणून पोसायचे? या बायकांना मुलबाळ होत नाही किंवा फक्त मुलीच होतात या कारणानं नवरे सोडून देतात. हा तर सारखी मारझोड करणारा गडी होता, शिवाय दारू पिऊन तब्येतीचं मातेरं झालेलं ते वेगळच. म्हणूनच सासूबाईंनी तिला सांगितलं कि रोजरोज असलं सहन करण्यापेक्षा एकदाच काय ते घरातून घालवून दे. तिनं ते केलं हे महत्वाचं. 'कुंकवाचा धनी' म्हणत सहन करत राहिली नाही.

In reply to by रेवती

समजले . माझ्या वर्ग मित्राच्या आईने हाच पर्याय निवडला .( तुमच्या सासू बाईंचे विशेष कौतुक ) नाहीतर दिवाळीला साडी किंवा पैसे दिले की दौलतजादा करत आहोत असा आव आमच्या येथे काही शेठानी करतात .

प्रास 11/03/2011 - 11:32
छान मनोगत आणि प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया.... टंकलेखन हळू हळू सुधारतंय हे तर नक्कीच.... ;-) हार्दिक शुभेच्छा! :-)

विजुभाऊ 11/03/2011 - 11:52
निनाद लेख पटला. जर भविष्यात पुढे मला मुलगी झाली तिला चुकून ही परुष प्रधान मानसिकतेचा परीसस्पर्श होऊन देणार नाही ... हा प्रयत्न करणे काही प्रमाणात आपल्य हातात आहे. भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे. उत्तरभारतात पुरुषांची मनोवृत्ती फार विचित्र आहे. माझा एक दिल्लीकर कलीग पुण्यात आला होता त्याने प्रथमच एखाद्या मुलीला बाईक चालवताना पाहिले. त्याच्या तोम्डून अभवीतपणे एक वाक्य निघून गेले " अरे अगर दिल्ली मे या नॉर्थ मे कहीभी अगर कोई लडकी ऐसी बाई क्चलाती दिखगये तो शाम तक उसपर रेप हो जायेगा" मल ते वाक्य प्रचन्ड खटकले. मुलीनी बाईक चालवणे आणि रेप होणे यात काय नक्की सांगड आहे तेच कळत नव्हते. पण इकडे दिल्लीत आल्यानन्तर त्यामागची विचारसरणी जाणवली. स्त्री ही कायम अबलाच असावी. तीने बाईक चालवणे म्हणजे ती काहितरी विगळी आहे तीला तिची जागा दाखवून द्यायलाच हवी" असे काहिसे इथल्या समाजाची मानसीकता आहे. गुरगावसारख्या शहरात थोडीशी कमी असेल पण हरीयाणात स्त्रीयानी घराबाहेर येवून काही करण्याची त्याना मुभाच नाही. एक मित्र सांगत होता. तो कोणाच्यातरी लग्नाला गेला होता त्या गावात संध्याकाळी नावाला म्हणून स्त्री दृष्टीस पडायची नाही . एकूण हरीयाणात हीच परीस्थिती आहे. तेथे स्त्री गर्भहत्येचे प्रमाण प्रचंड आहे. मुलाना लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून केरळ ,नागालॅन्ड मधून मुली विकत आणल्या जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणारा समाजवादी पक्ष महीला आरक्षणाच्या विधेयकाला कडाडून विरोध करतो तो त्याच उत्तरभारतीय मानसीकतेतून बीहार मधून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या सुशिक्षीएत तरुणाला एकदा विचारले की तुला पुण्यात आल्यावर काय विषेश जाणवले.... त्यावर त्याचे उत्तर होते " इथे स्त्रीया फारच मोकळेपणे इन्डीपेन्डन्ट फिरतात. मला उत्तरेत हे कुठेच जाणवले नाही. समाजाची ही मानसीकता बदलायला किती वर्षे जातील कोण जाणे. आपण आपल्यापुरते निदान प्रयत्न करुयात. मात्र हे नक्की की अशी मानसीकता असलेल्या कुटुंबात आमच्या मुलीला आम्ही पाठवणार नाही . तिला आम्ही नेहमीच भक्कम मानसीक पाठबळ देऊ. तिच्या कौटुंबीक अडी अडचणीत भक्कपणे पाठीशी उभे राहु.

div style="text-align: left;">भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे.
अवघड आहे पण अशक्य नाही आहे . आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली . तुम्ही उत्तमरीत्या माझा मुद्दा मांडला आहे . ह्यांचा महिला आरक्षण आणण्यात विरोध ह्यासाठीच आहे की ह्यांच्या पक्षात महिला कार्यकर्त्यांची फळी नाही आहे .अर्थात आरक्षणाचा हेतूच हा आहे की ह्या निमित्ताने महिला राजकारणात येतील . घराची चूल सांभाळणाऱ्या देशाची चूल सुध्धा उत्तमरीत्या सांभाळू शकतील .

In reply to by निनाद मुक्काम …

आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की ठाम भूमिका आणि औद्धत्य यातली सीमारेषा बर्‍याचदा अतिशय पुसट असते असे आमचे मत आहे. :) (हे छद्मी हास्य आहे.) शिवाय इथे ठामपणे भूमिका मांडली म्हणजे महिला सबलीकरणाच्या दॄष्टीने काही विशेष घडले असे खरोखरंच वाटत नाही. आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली . हे मात्र खरोखरच महिला सबलीकरणाचे उदाहरण आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
महिला दिन आम्हाला मक्याचे सातच्या आत घरात ह्या सिनेमातील वाक्य आवडते. ''दिवस कसले साजरे करतात आज अमका दिवस आपल्यात दिवस कधी घालतात ........'' एक दिवस महिला दिवस तोही आंतराष्ट्रीय म्हणून आपण पण साजरा करायच्या म्हणजे काय तर एकमेकांना अभिनंदन करायचे . सावित्री फुल्यांची जयंती कितीजणांना माहीत आहे (मला माहीत नाही .) ''एक स्त्री शिकली तर सारे घर साक्षर होईल .'' हा संदेश देशात पोहोचला का ? ''त्यांच्या राज्यापेक्षा केरळमध्ये महिला साक्षर आहेत असा विरोधाभास का ?'' हे आशा ताई ह्यांनी विचारले .तेव्हा त्यांनी महिला दिनाची

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·

नगरीनिरंजन 02/03/2011 - 08:21
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)

In reply to by नगरीनिरंजन

प्रीत-मोहर 02/03/2011 - 08:29
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)

पैसा 02/03/2011 - 08:22
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!

In reply to by पैसा

तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!

In reply to by पैसा

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:31
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)

टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)

आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)

पैसा 02/03/2011 - 10:07
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?

In reply to by अर्धवट

पंगा 02/03/2011 - 11:40
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?

टारझन 02/03/2011 - 11:39
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर

असुर 02/03/2011 - 15:15
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर

In reply to by नीधप

मस्त कलंदर 02/03/2011 - 18:13
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!

In reply to by टारझन

पंगा 03/03/2011 - 10:44
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)

In reply to by पैसा

पंगा 03/03/2011 - 11:47
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:33
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...

In reply to by अवलिया

सूड 05/03/2011 - 17:28
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!

नगरीनिरंजन 02/03/2011 - 08:21
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)

In reply to by नगरीनिरंजन

प्रीत-मोहर 02/03/2011 - 08:29
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)

पैसा 02/03/2011 - 08:22
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!

In reply to by पैसा

तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!

In reply to by पैसा

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:31
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)

टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)

आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)

पैसा 02/03/2011 - 10:07
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?

In reply to by अर्धवट

पंगा 02/03/2011 - 11:40
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?

टारझन 02/03/2011 - 11:39
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर

असुर 02/03/2011 - 15:15
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर

In reply to by नीधप

मस्त कलंदर 02/03/2011 - 18:13
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!

In reply to by टारझन

पंगा 03/03/2011 - 10:44
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)

In reply to by पैसा

पंगा 03/03/2011 - 11:47
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:33
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...

In reply to by अवलिया

सूड 05/03/2011 - 17:28
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!
3

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

कापूसकोन्ड्या ·

टारझन 01/03/2011 - 10:56
३) रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय
आहो माणुस कसा काय मनाला भिडला? उद्या म्हणाल समिर दिघे याची क्रिकेट कारकिर्द काहीही असो , माणुस मनाला भिडला .. (असो , असेलंही भिडणारा मनाला ) रामदास आठवले आठवले की मला हसु येतं. ते त्यांच्या जब्बरदस्त वकृत्वकौषल्यामुळे . हिंदी तर काय बोलतो हा माणुस ? यश चोप्रा फिका पडावा . मागे एकदा ण्युज ला आलं होतं , दिल्लीतली "फुका" ची मिळालेली रुम खाली करा म्हणुन भौसाहेबांना ५ महिन्यांचा अवधी दिला , तरी हे तिथुन हालायचं नाव घेत नव्हते, एवढे तर हे चिकट.. पण तरीही माणुस म्हणुन ते मनाला भिडतील यात शंका नाही :) सत्ता उपभोगायला मिळेल म्हणुन कॉंग्रेस शी हातमिळवणी केली होती , तिकडुन लाथ मारल्यावर आता सेनाभवनात चकरा मारतात , केवढी ही काँप्रोमाईज ? तरीही माणुस म्हणुन मनाला भिडणार ह्यात तिळमात्र शंका नाही :) बाकी लोकांविषयी जास्त कल्पना नाही , तेंव्हा तुमच्या लेखातुन मिळालेले ज्ञान जशे च्या तशे घेतो ;) आणि जाता जाता गांधीबाबा च्या नातवाला भेटलात पण आमच्या पुण्यातल्या कसब्यात रहाणार्‍या टिळकांच्या नातवाला भेटला नाहीत (अलिकडेच आमदारकीच्या निवडणुकीत ते आपटले असले तरी) ह्या बद्दल णिषेध व्यक्त करतो आणि एवढे बोलुन माझे आवरते घेतो :) जय हिंद जै महाराष्ट्र ! - हापुसआंब्या

वपाडाव 01/03/2011 - 14:35
५) नाना पाटेकर एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.
आणी नानाचे शेती प्रेम पाहुन भरुन आले. एखादा स्टार कलाकारसुद्धा शेती करु शकतो (नुसत्या जमिनी विकत घेउन ठेवत नाही) हे पाहुन/ऐकुन छान वाटले. माझे आजोबा पण ड्वळे फाडून फात होते. (जे कद्धी-कद्धी नटांबाबत चांगले बोलल्याचं मला स्मरत नाही.)
९) विश्वास पाटील :-महानायक
वाचुन लै भारावुन का काय म्हंतात तसं झालेलं. खरंच सुभाषबाबुंबद्दल एवढी माहीती गोळा करुन मराठी जनाला वाचण्यास उपलब्ध करुन दिली. वाचनात रस फकस्त या एका आणी एकाच माणसामुळे. बाकी मग नंतर वाचायला घेतले.

माफ करा लेखक पण स्पष्ट प्रतिक्रीया देत आहे :-
प्रख्यात पत्रकार आणि मराठी पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे.
हि ओळ वाचली आणि गहिवरुन आले.
कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.
हे वाचुन तर अक्षरशः भडभडून आले हो... पुढचे वाचवले नाही. अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल. अतिशय लाचार, हांजी हांजी करणारा हा माणूस आहे.

In reply to by अवलिया

प्रचेतस 01/03/2011 - 15:01
कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात एक नं. पटाईत माणूस. आयबीएन लोकमतचा संपादक काय उगाचच बनवत नाहीत कोणाला...! सुमार केतकर आणि वागळे महाशय एकाच माळेचे मणी.

In reply to by प्रचेतस

जोशी 01/03/2011 - 23:12
>>>>कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात ए...... इथे मनसे म्हणायचे आहे का ?

In reply to by अवलिया

टारझन 01/03/2011 - 15:09
हाण्ण हाण्ण काय? तु देखील तुझ्या लेट्येष्ट मालिकेत तिडिक्या मिपाकरांबद्दल आज्जिब्बात डायजेस्ट ण होणारं ग्गोग्गोड लिहीलेलंस :) काही काही मजकुर तर त्या लोकांनाही डायजेस्ट झाला नाही बे :) अवांतर : बाकी लेख तसाही वाचला नव्हता =)) पण वांजळ्या इतरांना बोलतं करुन स्वत: फार कमी बोलतो हे वाचुन बसुन हसावे की लोळुन हसावे तेच कळेना =)) - गोडबोलिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल मान्य पण ती बाजू सोडून या माणसाने इंटरव्ह्यू चांगला घेतला पक्षी माणसे तरी चांगली निवडली हे मान्य करा. इतकी असहिष्णुता बरी नव्हे .

In reply to by कापूसकोन्ड्या

धमाल मुलगा 01/03/2011 - 20:02
टिआरपी बोलतो हो! कोणाची निवड केली की टिआरपी वाढेल ह्याची गणितं असतात राव.

५० फक्त 01/03/2011 - 15:11
त्या वागळेचा खरंतर बाजार उठवला असता कधीच शिवसेनेनं पण काय मांडवली झाल्या माहित नाही. असो, ह्या माणसानं स्वताची एवढी पातळी खालावुन घेतली आहे की त्याबद्दल बोलावसं वाटत नाही. बाकी, इतर माणसं चांगली आहेत, असतील , असु शकतात यावर माझा तरी अजुन विश्वास आहे. हर्षद.

jaydip.kulkarni 01/03/2011 - 21:53
वागळे हा माणूस जरा अति करतो हे मान्य पण तरी ग्रेट भेट पेक्षा " आजचा सवाल " मस्त रंगवतो ............... तिथे कोणताही पक्ष किंवा संघटना झाकत नाही ..............

छोटा डॉन 01/03/2011 - 22:24
लेख स्वतःहुनच उडवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वयंसंपादनाचा अधिकार ह्यांचा पुळका असणारे त्याचे खंदे समर्थक कुठे आहेत ? मी सदर प्रकाराचा निषेध करतो. 'स्वयंसंपादनाची सोय' ही बडी डेंजर चीज आहे, त्याचा वापर कसा होतो त्यावर बरेच अवलंबुन असते. - छोटा डॉन

लेख काढल्याबद्दल कापूसकोंड्यां यांचा जाहीर निषेध. -दिलीप बिरुटे एडिट करताना काही तरी गोची झाली आणि नंतर इंन्टरनेट गंडले. वर्ड मध्ये ब्याक अप होते म्हणून वाचलो. परत जागे वर आणले आहे. सर्वानाझालेल्या मनस्तापा बद्दल विनाशर्त सपशेल माफी. मिपा कर नाराज हॉणे समजू शकते. पण भविष्यात काळजी घेतली जाईल

In reply to by कापूसकोन्ड्या

मला सिंधुताईंच्या मुलाखती आवडतात. काय वक्तृत्व आहे. बहिणाबाई चौधरी म्हणायच्या. मी नाही माझ्या मुखातून सरस्वती बोलते. तसेच मला सिंधुताईच्या मुलाखतीमधून जाणवत असते. ग्रेट भेट बद्दल थँक्स.......! -दिलीप ब्रुटे

jaydip.kulkarni 02/03/2011 - 01:30
निखील वागळे यांच्या ग्रेट भेट मला देखील आवडतो ...... पण आजचा सवाल जास्त परिणामकारक वाटतो ............... IBN लोकमत च्या वेब साइट वर त्याचे फुटेज लगेच मिळते देखील .............. पण आज जैतापूर विषयीचा आजचा सवाल थोडासा फसवा वाटला ..........त्यात जाणून बुजून प्रकल्प विरोधी लोकांना टार्गेट केल्या सारखे वाटले .................. कोकणातला नासलेला नारळ ( प्रहार वाला ) देखील आला होता आणि श्रीयुत वागळे जरा त्याची हुजुरेगिरी केल्यासारखा वाटला .. श्रीयुत माधव भंडारी यांनी फक्त संपर्क मत मांडले ............ ह्या माणसाचे आणि शिवसेनेचे वाकडे आहे हे कबूल , पण म्हणून जाईल तिथे आपल्या सानुनासिक आवाजात हा शिवसेनेबद्दल आग ओकतो ........... मी काही सेना समर्थक नाही पण तरी हा प्रकार योग्य वाटत नाही ............ आजचा " आजचा सवाल " हा फक्त जैतापूर प्रकल्प विरोधकांना वाईट ठरवण्यासाठीच केला होता असे वाटले ..........

In reply to by कुंदन

आयला आमचा कुंद्या पण पूर्ण निर्व्यसनी आहे. अधून मधून स्कॉच पितो इतकेच. ;) चला कुंद्याला रामदास आठवले करा आता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टारझन 02/03/2011 - 11:49
=)) =)) =)) =)) =)) कुंद्याला रामदास आठवल्या सारखी गवत पेरलेली दाढी पण वाढवायला सांगु . .. पण एक अडचण आहे ( नाही नाही तसली अडचन नाही ) .. हा कुंद्या दुबैत राहुन खजुर खाऊन खजुरा सारखा कडक आणि सुरकुतेल झालाय .. त्याला आठवल्यासारखा टमटमीत उडीद वडा बनवायला पाहिजे -(कॉच्च्युम डिजायनर ) अंबुजा

धन्यवाद! खरं म्हणजे खूप परिश्रम करून मी ही माहीती गोळा केली होती.भारतापासून दूर असल्यामुळे मिसळपाव वर आल्यावर आपल्या माणसाना भेटल्याचा आनंद होतो. आपले सर्व सन्माननीय सभासदांना बहुधा हा लेख आवडला नाही. भेटलेल्या व्यक्तीपेक्षा निखील वागळे हे कसे आहेत यावर चर्चा झाली. कदाचित मी लिहीण्यात कुठे तरी कमी पडलो असेन. कदाचित मीच निखीलवर जास्त ग्गो~~ड लिहीले असेल असो पुढे लिहीताना अधिक काळजी घेइन.पण लिहायचे सोडणार नाही. (माझा 'मुक्काम' होउ नये म्हणून प्रतिक्रीया फारशा सिरीयसली घेतलेल्या नाहीत) सर्व लोकांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ~~~~कापूसकोन्ड्या

In reply to by कापूसकोन्ड्या

कलंत्री 06/03/2011 - 21:02
मी लेख आणि इतर प्रतिक्रिया वाचल्या. माणसाचे कर्तुत्व पाहावे, अकारणच पूर्वैतिहास जर विसरता आला तर उत्तमच. कदाचित म्हणूनच असे सांगत असतात की, नदीचे मूळ आणि ऋषी चे कूळ पाहू नये, कारण त्या योगे हातात फारसे काही लागत नाही. महाराष्ट्रातील कर्तुत्ववान माणसे हा जिव्हाळ्याचा विषय बनू शकतो आणि हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आपले आभार मानायला हवे. कोणतीही नाउमेद ना बाळगता आपण लिहित जा.

टारझन 01/03/2011 - 10:56
३) रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय
आहो माणुस कसा काय मनाला भिडला? उद्या म्हणाल समिर दिघे याची क्रिकेट कारकिर्द काहीही असो , माणुस मनाला भिडला .. (असो , असेलंही भिडणारा मनाला ) रामदास आठवले आठवले की मला हसु येतं. ते त्यांच्या जब्बरदस्त वकृत्वकौषल्यामुळे . हिंदी तर काय बोलतो हा माणुस ? यश चोप्रा फिका पडावा . मागे एकदा ण्युज ला आलं होतं , दिल्लीतली "फुका" ची मिळालेली रुम खाली करा म्हणुन भौसाहेबांना ५ महिन्यांचा अवधी दिला , तरी हे तिथुन हालायचं नाव घेत नव्हते, एवढे तर हे चिकट.. पण तरीही माणुस म्हणुन ते मनाला भिडतील यात शंका नाही :) सत्ता उपभोगायला मिळेल म्हणुन कॉंग्रेस शी हातमिळवणी केली होती , तिकडुन लाथ मारल्यावर आता सेनाभवनात चकरा मारतात , केवढी ही काँप्रोमाईज ? तरीही माणुस म्हणुन मनाला भिडणार ह्यात तिळमात्र शंका नाही :) बाकी लोकांविषयी जास्त कल्पना नाही , तेंव्हा तुमच्या लेखातुन मिळालेले ज्ञान जशे च्या तशे घेतो ;) आणि जाता जाता गांधीबाबा च्या नातवाला भेटलात पण आमच्या पुण्यातल्या कसब्यात रहाणार्‍या टिळकांच्या नातवाला भेटला नाहीत (अलिकडेच आमदारकीच्या निवडणुकीत ते आपटले असले तरी) ह्या बद्दल णिषेध व्यक्त करतो आणि एवढे बोलुन माझे आवरते घेतो :) जय हिंद जै महाराष्ट्र ! - हापुसआंब्या

वपाडाव 01/03/2011 - 14:35
५) नाना पाटेकर एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.
आणी नानाचे शेती प्रेम पाहुन भरुन आले. एखादा स्टार कलाकारसुद्धा शेती करु शकतो (नुसत्या जमिनी विकत घेउन ठेवत नाही) हे पाहुन/ऐकुन छान वाटले. माझे आजोबा पण ड्वळे फाडून फात होते. (जे कद्धी-कद्धी नटांबाबत चांगले बोलल्याचं मला स्मरत नाही.)
९) विश्वास पाटील :-महानायक
वाचुन लै भारावुन का काय म्हंतात तसं झालेलं. खरंच सुभाषबाबुंबद्दल एवढी माहीती गोळा करुन मराठी जनाला वाचण्यास उपलब्ध करुन दिली. वाचनात रस फकस्त या एका आणी एकाच माणसामुळे. बाकी मग नंतर वाचायला घेतले.

माफ करा लेखक पण स्पष्ट प्रतिक्रीया देत आहे :-
प्रख्यात पत्रकार आणि मराठी पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे.
हि ओळ वाचली आणि गहिवरुन आले.
कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.
हे वाचुन तर अक्षरशः भडभडून आले हो... पुढचे वाचवले नाही. अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल. अतिशय लाचार, हांजी हांजी करणारा हा माणूस आहे.

In reply to by अवलिया

प्रचेतस 01/03/2011 - 15:01
कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात एक नं. पटाईत माणूस. आयबीएन लोकमतचा संपादक काय उगाचच बनवत नाहीत कोणाला...! सुमार केतकर आणि वागळे महाशय एकाच माळेचे मणी.

In reply to by प्रचेतस

जोशी 01/03/2011 - 23:12
>>>>कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात ए...... इथे मनसे म्हणायचे आहे का ?

In reply to by अवलिया

टारझन 01/03/2011 - 15:09
हाण्ण हाण्ण काय? तु देखील तुझ्या लेट्येष्ट मालिकेत तिडिक्या मिपाकरांबद्दल आज्जिब्बात डायजेस्ट ण होणारं ग्गोग्गोड लिहीलेलंस :) काही काही मजकुर तर त्या लोकांनाही डायजेस्ट झाला नाही बे :) अवांतर : बाकी लेख तसाही वाचला नव्हता =)) पण वांजळ्या इतरांना बोलतं करुन स्वत: फार कमी बोलतो हे वाचुन बसुन हसावे की लोळुन हसावे तेच कळेना =)) - गोडबोलिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल मान्य पण ती बाजू सोडून या माणसाने इंटरव्ह्यू चांगला घेतला पक्षी माणसे तरी चांगली निवडली हे मान्य करा. इतकी असहिष्णुता बरी नव्हे .

In reply to by कापूसकोन्ड्या

धमाल मुलगा 01/03/2011 - 20:02
टिआरपी बोलतो हो! कोणाची निवड केली की टिआरपी वाढेल ह्याची गणितं असतात राव.

५० फक्त 01/03/2011 - 15:11
त्या वागळेचा खरंतर बाजार उठवला असता कधीच शिवसेनेनं पण काय मांडवली झाल्या माहित नाही. असो, ह्या माणसानं स्वताची एवढी पातळी खालावुन घेतली आहे की त्याबद्दल बोलावसं वाटत नाही. बाकी, इतर माणसं चांगली आहेत, असतील , असु शकतात यावर माझा तरी अजुन विश्वास आहे. हर्षद.

jaydip.kulkarni 01/03/2011 - 21:53
वागळे हा माणूस जरा अति करतो हे मान्य पण तरी ग्रेट भेट पेक्षा " आजचा सवाल " मस्त रंगवतो ............... तिथे कोणताही पक्ष किंवा संघटना झाकत नाही ..............

छोटा डॉन 01/03/2011 - 22:24
लेख स्वतःहुनच उडवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वयंसंपादनाचा अधिकार ह्यांचा पुळका असणारे त्याचे खंदे समर्थक कुठे आहेत ? मी सदर प्रकाराचा निषेध करतो. 'स्वयंसंपादनाची सोय' ही बडी डेंजर चीज आहे, त्याचा वापर कसा होतो त्यावर बरेच अवलंबुन असते. - छोटा डॉन

लेख काढल्याबद्दल कापूसकोंड्यां यांचा जाहीर निषेध. -दिलीप बिरुटे एडिट करताना काही तरी गोची झाली आणि नंतर इंन्टरनेट गंडले. वर्ड मध्ये ब्याक अप होते म्हणून वाचलो. परत जागे वर आणले आहे. सर्वानाझालेल्या मनस्तापा बद्दल विनाशर्त सपशेल माफी. मिपा कर नाराज हॉणे समजू शकते. पण भविष्यात काळजी घेतली जाईल

In reply to by कापूसकोन्ड्या

मला सिंधुताईंच्या मुलाखती आवडतात. काय वक्तृत्व आहे. बहिणाबाई चौधरी म्हणायच्या. मी नाही माझ्या मुखातून सरस्वती बोलते. तसेच मला सिंधुताईच्या मुलाखतीमधून जाणवत असते. ग्रेट भेट बद्दल थँक्स.......! -दिलीप ब्रुटे

jaydip.kulkarni 02/03/2011 - 01:30
निखील वागळे यांच्या ग्रेट भेट मला देखील आवडतो ...... पण आजचा सवाल जास्त परिणामकारक वाटतो ............... IBN लोकमत च्या वेब साइट वर त्याचे फुटेज लगेच मिळते देखील .............. पण आज जैतापूर विषयीचा आजचा सवाल थोडासा फसवा वाटला ..........त्यात जाणून बुजून प्रकल्प विरोधी लोकांना टार्गेट केल्या सारखे वाटले .................. कोकणातला नासलेला नारळ ( प्रहार वाला ) देखील आला होता आणि श्रीयुत वागळे जरा त्याची हुजुरेगिरी केल्यासारखा वाटला .. श्रीयुत माधव भंडारी यांनी फक्त संपर्क मत मांडले ............ ह्या माणसाचे आणि शिवसेनेचे वाकडे आहे हे कबूल , पण म्हणून जाईल तिथे आपल्या सानुनासिक आवाजात हा शिवसेनेबद्दल आग ओकतो ........... मी काही सेना समर्थक नाही पण तरी हा प्रकार योग्य वाटत नाही ............ आजचा " आजचा सवाल " हा फक्त जैतापूर प्रकल्प विरोधकांना वाईट ठरवण्यासाठीच केला होता असे वाटले ..........

In reply to by कुंदन

आयला आमचा कुंद्या पण पूर्ण निर्व्यसनी आहे. अधून मधून स्कॉच पितो इतकेच. ;) चला कुंद्याला रामदास आठवले करा आता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टारझन 02/03/2011 - 11:49
=)) =)) =)) =)) =)) कुंद्याला रामदास आठवल्या सारखी गवत पेरलेली दाढी पण वाढवायला सांगु . .. पण एक अडचण आहे ( नाही नाही तसली अडचन नाही ) .. हा कुंद्या दुबैत राहुन खजुर खाऊन खजुरा सारखा कडक आणि सुरकुतेल झालाय .. त्याला आठवल्यासारखा टमटमीत उडीद वडा बनवायला पाहिजे -(कॉच्च्युम डिजायनर ) अंबुजा

धन्यवाद! खरं म्हणजे खूप परिश्रम करून मी ही माहीती गोळा केली होती.भारतापासून दूर असल्यामुळे मिसळपाव वर आल्यावर आपल्या माणसाना भेटल्याचा आनंद होतो. आपले सर्व सन्माननीय सभासदांना बहुधा हा लेख आवडला नाही. भेटलेल्या व्यक्तीपेक्षा निखील वागळे हे कसे आहेत यावर चर्चा झाली. कदाचित मी लिहीण्यात कुठे तरी कमी पडलो असेन. कदाचित मीच निखीलवर जास्त ग्गो~~ड लिहीले असेल असो पुढे लिहीताना अधिक काळजी घेइन.पण लिहायचे सोडणार नाही. (माझा 'मुक्काम' होउ नये म्हणून प्रतिक्रीया फारशा सिरीयसली घेतलेल्या नाहीत) सर्व लोकांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ~~~~कापूसकोन्ड्या

In reply to by कापूसकोन्ड्या

कलंत्री 06/03/2011 - 21:02
मी लेख आणि इतर प्रतिक्रिया वाचल्या. माणसाचे कर्तुत्व पाहावे, अकारणच पूर्वैतिहास जर विसरता आला तर उत्तमच. कदाचित म्हणूनच असे सांगत असतात की, नदीचे मूळ आणि ऋषी चे कूळ पाहू नये, कारण त्या योगे हातात फारसे काही लागत नाही. महाराष्ट्रातील कर्तुत्ववान माणसे हा जिव्हाळ्याचा विषय बनू शकतो आणि हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आपले आभार मानायला हवे. कोणतीही नाउमेद ना बाळगता आपण लिहित जा.
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?

सुधीर काळे ·

आत्मशून्य 23/02/2011 - 23:23
परवा महाशय जे बोलले ते खरेच आहे "भारताचे मित्र कोण आहेत ? " (फेस्बूकवर वर पण कोणी नसावेत असे वाटते)

विकास 24/02/2011 - 02:08
या लेखातील विचार समजला पण त्यातील विश्लेषणाशी पुरेसा सहमत नाही. सर्वप्रथम एक जुनी आणि अशा विषयासंदर्भात कायम वापरात असलेला वाक्प्रयोग लक्षात ठेवावा असे वाटते: "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, कोणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. कायमस्वरूपी असतात, ते केवळ राजनैतिक संबंध. " आता अशा राजनैतिक संबंधांना जर कोणी "सलामत रहे दोस्ताना हमारा" असे समजू लागला तर कालांतराने, "मेरे दोस्त किस्सा ये क्या होगया, सुना है के तू बेवफा हो गया" असे म्हणत शेवटी, "दोस्त दोस्त ना रहा..." म्हणत बसावे लागेल. अमेरिकेचे आणि केवळ ब्रिटन आणि इस्रायलचेच नाही तर पश्चिम युरोपीय देश, कॅनडा, ऑस्ट्रेलीया, न्यूझीलंड, जपान, आदींचे मैत्रिचे संबंध आहेत असे म्हणता येईल. त्याला काही संदर्भात ऐतिहासीक कारणे आहेत. उ.दा. दुसर्‍या महायुद्धानंतरचा मार्शल प्लॅन, प. युरोपियन देशातून स्थायिक झालेल्यांची अधिक संख्या, संस्कृती आणि वर्णातील साधर्म्य वगैरे. पण त्यामुळे कधी ना कधी मैत्री सुरू होण्यास मदत झाली. ती दृढ होण्याचे कारण खर्‍या अर्थाने स्वतंत्र राष्ट्रे आणि विकसीत जनता हे होते. इस्त्रायलच्या बाबतीत येथील ज्यू जनतेची लॉबी ही खूप प्रभावी आहे. (किमान २-३ तरी)पिढ्यान पिढ्या अमेरिकन होऊनही, ज्यू समाजाला, स्वतःची संस्कृती आणि धर्माचे जन्मस्थान असलेला देश टिकला तरच टिकू शकू हे कडव्या अनुभवाने समजले असल्याने आणि स्वतःची तितकी पैशाने ताकद तयार केल्याने ते अमेरिका-इस्त्रायल हे मित्र राष्ट्र करू शकले. (याबद्दल अधिक बरेच बोलता येईल पण विषयांतराचा मोह टाळत आहे). कारण मैत्री ही तुल्यबळात होते. कशात तरी समान असणे गरजेचे असते... मात्र आपण दिलेली उदाहरणे पाकीस्तान, इजिप्त, बहारीन वगैरेंशी जरी दॄढ राजकीय संबंध असले तरी मैत्रीचे संबंध आहेत असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. पाकीस्तानला तर अमेरिकेने कधीतरी मित्र मानले असेल का ह्याबद्दल शंका आहे. त्यामुळे अमेरिकेचे टोप्या फिरवणे (जे कुठेही योग्य आहे असे मी म्हणत नाही), हे अमेरिकेच्या वेळोवेळीच्या सोयीच्या भुमिकांप्रमाणे घडत आले. कधी कम्युनिस्टांना रोखण्यासाठी तर बर्‍याचदा तेलासाठी त्यांनी या संबंधांना जपले आहे. त्यात झिया, मुशर्रफ, बिन लादेन अथवा सद्दाम सारखे सर्वच आले. सर्व हुकूमशहांची सत्तेला अमेरिकेने पाठींबा दिला आणि त्यांना (हुकूमशहांना) जम बसवता आला. तरी देखील तोंडदेखले का होईना अमेरिकेने तेथे देखील लोकशाही असण्याचेच समर्थन केले होते. आता पर्यायच नाही म्हणल्यावर हात झटकत आहेत. मात्र त्याचीच काळजी अमेरिकेतील विचारवंतांना देखील पडत आहे. कारण त्यामुळे इतर दोस्तराष्ट्रे दोस्त राहतील का नाही अशी काळजी त्यांना वाटत आहे. ते अमेरिकेचे मित्र झाले नाहीत, तर मिंधे झाले! आता आपण भारत-अमेरिकेच्या मैत्रीसंदर्भात विचार करूया. आपण कुठल्या वर्गवारीत स्वतःला बसवायचे? पाकीस्तान आदींच्या की प.युरोप आदींच्या? मी येथे प.युरोप आदींच्या हे उत्तर सर्वांचेच असेल असे गृहीत धरतो. या उत्तरात आपण अमेरिकेचे मिंधे होण्यापेक्षा आंतर्राष्ट्रीय राजकारणात जशी गरज आहे, तसे मित्र होऊ.

In reply to by विकास

विकास तुझ्या मुद्यांशी सहमत पण विचार कर ह्या वरील प्रगत देशांची अमेरिकेचे संबंध चांगले आहेत कारण त्या देशातील प्रशासन हे तुलनात्मक दृष्ट्या पारदर्शक व प्रगल्भ आहे .हेच त्यांच्या प्रसाकीय सेवाच्या बाबतीत म्हटले जाईन. आपल्याकडे व पाकिस्तामध्ये भ्रष्टाचार हा समान मुद्दा त्यात प्रादेशिक अस्मिता व वर्णव्यवस्था टिकून आहे .त्यामुळे हे झारीतील शुक्राचार्य आपल्या प्रशासनात प्रमाणाबाहेर . लुडबुड करतील .ह्याचा खरा इंटरेस्ट हे मध्यमवर्गीय बाजारपेठ . उद्या ह्यांचा व आपला राजनैतिक कारणावरून राडा झाला तर मागे देसाई ह्यांनी कोका कोला ला हद्दपार केले होते .तसे एकाकाकी जगतीकरांच्या काळात शक्य होणार नाहि चीन मध्ये एकच पार्टी एकच सरकार असल्याने ह्यांना अत्यंत कडवा विरोध करते . अमेरिकेला आपल्याला मित्र मानते .पण चीन जेवढ्या वेगाने प्रगती करेन त्याची भीती आपल्याला जेवढी आहे त्याहून अधिक अमेरिकेचे आशियातील बाजार उठेन ह्याची भीतीने जास्त आहे . भारतावर परकीय आक्रमण हा काही भारतीय जनतेला नवीन विषय नाहि , तेव्हा मित्र म्हणून येत असला तर भारत नोकर्या चोरतो वैअग्रे सवंग अप्रचार त्यांनी बंद करावेत .अफगाण प्रशि तालिबान शी चर्चा सो किंवा चीन विरुद्ध समुद्रात संयुक्त आघाडी असो .त्यांना आपली गरज आहे .(आपणच एका बापाचे आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाहि ) कारण आंतरराष्ट्रीय राजकारण शब्दाला जागणारे अशी आपली ख्याती आहे तेव्हा सत्तेसाठी आंधळ्या आपल्या नेत्यांनी सी आय ए चे हस्तक होऊ नये व झालात तर तेवढेच हस्तक रॉ चे अमेरिकन सिनेटर ने झाले पाहिजे . .

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 24/02/2011 - 02:42
एकंदरीत प्रतिसादाशी सहमतच. एक खुलासा: या उत्तरात आपण अमेरिकेचे मिंधे होण्यापेक्षा आंतर्राष्ट्रीय राजकारणात जशी गरज आहे, तसे मित्र होऊ. या माझ्या वाक्याचा अर्थ इतकाच आहे की सुरवातीस म्हणल्याप्रमाणे केवळ "राजनैतिक संबंध" या अर्थाने आपण मित्र होऊयात. कुठल्याही अर्थाने त्यांचे (अथवा कुणाचेच) मिंधेपण नको.

In reply to by विकास

सर्वप्रथम एक जुनी आणि अशा विषयासंदर्भात कायम वापरात असलेला वाक्प्रयोग लक्षात ठेवावा असे वाटते: "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, कोणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. कायमस्वरूपी असतात, ते केवळ राजनैतिक संबंध.
हेच बोलायला आलो होतो. विकासरवांनी जास्ती चांगल्या शब्दात लिहिले आहे. जर भारताचा फायदा होणार असेल (आणि तो नक्की होणारच आहे) अमेरिकेशी हात मिळवायला हरकत नाही. आणि हा जर कोणाला मिंधेपणा वाटत असेल तर तो मनुष्य धन्य आहे. सध्या आणि पुढे येणार्‍या परिस्थीतीत भारताला अमेरिकेसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ / बाजारपेठ या ठिकाणी शब्दाला प्रचंड किंमत असणार्‍या मित्राची फार बहुमोल मदत होणार आहे. आणि भ्रष्टाचारी वगैरे असले तरी आपले राजकारणी मुर्ख नक्कीच नाहीत. असो... बाकी चालु द्या...

आंसमा शख्स 24/02/2011 - 08:28
अमेरिका कधीच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. कोणत्या देशात त्यांनी काही चांगले काम केले आहे? सगळीकडे स्वार्थच पाहिला आहे. त्यांना लोकशाहीवर वगैरे काही घेणे नसून काय विकता येईल हे पाहण्यात रस आहे. आपला फायदा आपण पाहावा हे बरे.

In reply to by आंसमा शख्स

विकास 24/02/2011 - 09:32
अमेरिकन सरकारचे आंतर्राष्ट्रीय राजकारण, त्यांच्यातील कॉर्पोरेट हितसंबंध वगैरे विरुद्ध ढिगभर लिहीता येईल आणि त्याचे समर्थन करायचा प्रश्नच नाही. तसे आपल्याकडील राजकारणी आणि कॉर्पोरेट हितसंबंधांबद्दलही लिहीता येईल. मात्र, कोणत्या देशात त्यांनी काही चांगले काम केले आहे? सगळीकडे स्वार्थच पाहिला आहे. त्यांना लोकशाहीवर वगैरे काही घेणे नसून काय विकता येईल हे पाहण्यात रस आहे. असे म्हणणे टोकाचे ठरेल. आजच्या बाकी सुविधा आणि तंत्रज्ञाने जाउंदेत, पण इंटरनेट, सोशल मेडीया हे अमेरिकेतच तयार झाले. आज इंटरनेटच्या माध्यमामुळेच माहीती तंत्रज्ञानाची क्रांती झाली ज्यामुळे मध्यपुर्वेतील नवीन पिढीस आपण कशाला मुकलो हे कळले. ९/११ ला एका पद्धतीने अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरत अमेरिकेच्या द्वेषासाठी वापर केला गेला,तर आज १/११ (जाने/११) ला मात्र अमेरिकेचा द्वेष करत बसण्याऐवजी म्हणूनच त्यांनी स्वतःच्या देशात याच साधनांचा वापर करत लोकशाहीची मागणी केली. संपूर्ण जगाच्या ज्ञात इतिहासातील ही ऐतिहासीक घटना आहे. बाकी योग्यच कारणांसाठी नावे ठेवत असताना, या संदर्भात दुर्लक्षू नये इतकेच वाटते.

आंसमा शख्स 24/02/2011 - 08:30
लेख जरा कुठूनही कुठेही जातो आहे काय? मध्येच कंपनीने ठेवलेली बडदास्त आणि दिलेली जीप, झोप बहादूर वगैरे नसते तरी चालले असते. लेख मुद्देसूद झाला नाही असे वाचक म्हणून वाटले. तुमचे लिखाण सहसा असे नसते.

In reply to by आंसमा शख्स

सुधीर काळे 24/02/2011 - 20:21
आपल्या मुद्द्याची नोंद घेतली आहे. तो पटलाही. पण त्या युद्धामुळे त्यावेळेपासून मी राजकारणाबद्दलच्या वाचनात रस घेऊ लागलो एवढाच त्याचा संबंध होता आणि तिथे तेवढेच लिहायला पाहिजे होते. मनापासून धन्यवाद.

नगरीनिरंजन 24/02/2011 - 08:42
विकास आणि निनाद यांच्याशी सहमत. कोण स्वतःचा फायदा पाहत नाही? भारतानेही अमेरिकेशी मैत्री त्यांचा फायदा व्हावा म्हणून केलेली नाही तर आपला फायदा व्हावा म्हणून केलेली आहे. भारतात सध्या जो चमचमाट आणि लखलखाट दिसतोय त्यात अमेरिकेन बाजारपेठेत आपल्या सेवा आणि उत्पादने विकून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. जो पर्यंत असा आणि तंत्रज्ञान वगैरे इतर फायदा होत आहे तो पर्यंत अमेरिकेशी मैत्री करण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा. सध्यातरी असा फायदा मिळेल असा 'विश्वास' वाटण्यासारखे तेच एक राष्ट्र आहे.

अर्धवट 24/02/2011 - 09:51
>>हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी! हॅ हॅ हॅ.. क्या बोले काका.. एकदम बरोबर.. (भारतीय परराष्ट्रनिती जरा अजुन खंबीर होइल तर 'समोरच्याची दोन बोटेही घेउन यावीत हे उत्तम..) मला म्हैस मधली भाईकाकांची एक उपमा आठवुन गेली...

कुणी कितीही नाकारावे पण सध्याच्या सुशिक्षित भारतीय कुटुंबव्यवस्थेची मानसिक स्थिती अशी आहे की 'अंकल सॅम' च्या गावी "झुकझुक जाई आगीनगाडी...." च्या तालावर आपल्या बाळ्याला आणि ठकीला ते केव्हाही पाठविण्यास तयार असतात. त्या मागची भूमिका भारताने अमेरिकेबरोबर हस्तांदोलन करावे की नाही असे नसून ग्रीन डॉलर्सने निर्माण केलेली ती नशा आहे. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्या तरी ज्या त्या काळात त्यातल्या एखाद्या प्रक्रियेचा इतरांवर विशेष प्रभाव पडतो आणि त्यामुळे यातील एका घटकाला अनन्यसाधारण महत्व येते. आज ते महत्व आहे 'अर्थकारणा'ला. रशियाचे तुल्यबळ सामर्थ्य नष्ट झाल्यावर अमेरिका हाच एक सर्वसामर्थ्यवान (आर्थिक आणि लष्कर दोन्ही आघाड्यांवर) देश उरला आहे, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. तसे पाहिले तर अगदी लेनिन क्रांतीपासूनचा इतिहास चाळला तरी "लाल अस्वल" आर्थिकदृष्ट्या सॅम अंकलच्या इस्टेटीच्या तुलनेत कधीच सामर्थ्यवान नव्हते. पुढे तर रशियाची अनेक शकले झाल्याने जगात त्याचे जे प्रतिसाद उमटले वा परिणाम दिसून आले तीत आज अमेरिका हे एकमेव लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ राष्ट्र झाले आहे हे नि:संशय. या सर्व घडामोडीमुळे जगाचे अर्थकारणच बदलून गेले आहे. 'डॉलर' च्या खणखणाटाच्या आवाजावर अविकसित राष्ट्रांना आता कोणाचाच आधार राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर अमेरिका आणि युरोपमधील तिचेच सहायक प्रगत देश यांचा पगडा पूर्ण बसला आहे, हे अर्थतज्ज्ञांनीच सांगितले तरच समजते असे बिलकुल नाही. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार, मुक्त स्पर्धा, उदारीकरण, परवानाराज्य वगैरे आता परवलीचे बनलेले शब्द ही अमेरिकेची उपज असून जर ती भारताने स्वीकारली (स्वीकारली आहेच म्हणा...) तर मग अमेरिकेशी कुठल्या प्रकारची विश्वासार्हता मनी ठेवून हस्तांदोलन करायचे.....ते केलेच पाहिजे असे भारताने नक्कीच केले आहे. गेल्या दहा वर्षात इथे जो चकचकाट आला आहे, टोयोटो बेन्झच काय पण स्वप्नातदेखील पाहाण्याची भीती वाटाव्या अशा बीएमडब्ल्यू दिल्ली, मुंबईच्या रोडवर इकडूनतिकडून नखरेलपणाने सुळकन जाताना दिसतात त्याचे मूळ आम्ही अमेरिका हा 'गरजेतून निर्माण" झालेला विश्वासार्ह मित्र आहे हे मानल्या गेलेल्या मनोवृत्तीत आहे. आज अमेरिकेत असलेल्या भारतीयांची संख्या जवळजवळ २७ लाखाच्या पुढे गेली आहे; म्हणजेच एकून अमेरिकन लोकसंख्येतील एक टक्का भारतीयांचा आहे. शिवाय ज्या वेगाने इथले तरूण-तरूणी तिथल्या कार्पोरेट दुनियेत आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवित आहेत ते पाहता अमेरिकाही प्रसंगी राजकारणाचा मुद्दा गौण मानून अर्थकारणाला 'प्रायॉरीटी' देणार हे सांगण्यासाठी कुठले पंचांग धुंडाळण्याची गरज नाही. आशिया,आफ्रिका खंडात सातत्याने राजकारण बदलत (त्याची कारणमीमांसा शेवटी आर्थिक हालचालच आहे) असले तरी भारतासारखा सातत्याने 'लोकशाही' प्रणालीवर दृढ विश्वास ठेवणारा देश कधीही लष्करी राजवटीखाली येणार नाही हे अमेरिकाच काय पण चीनी ड्रॅगनही ओळखून असल्याने असला भक्कम पाया असलेला देशही आपल्या मैत्रीत असावा असे ओबामाच काय पणे जॉन केनेडीपासूनच्या सर्व राष्ट्रपतीनी मान्य केले होते. त्यामुळे हे हस्तांदोलन म्हणजे "तुझे माझे जमेना, परी तुझ्यावाचून करमेना..." या पठडीतील आहे...आणि तसेच राहील. इन्द्रा

सहज 24/02/2011 - 10:36
बर्‍याच जाणकारांनी आपले मत मांडले आहेच त्यामुळे इतकेच म्हणतो. खुदी को कर बुलन्द इतना कि खुदा बन्दे से पूछे 'मज्याशि मयत रि कर्न्र क?'

मदनबाण 24/02/2011 - 10:52
हिंदुस्थान ही महासत्ता आहे हा साक्षातकार अचानक अमेरिकेला कसा काय झाला ? अचानक आपली मैत्री त्यांना महत्वाची का वाटु लागली ? आपल्या बरोबर त्यांचे असलेले संबंध एकदम बदलावेसे का वाटु लागले आहेत ? या सर्व प्रश्नांचे एकमात्र उत्तर आहे, ते म्हणजे चीन !!! हो, चीन ने अमेरिकेचेचे धोरण सार्थपणे राबवले... ते म्हणजे समुद्रावरील महासत्ता होणे. अमेरिकेचे विविध देशात असलेले मिलेटरी आणि नाविक तळ हेच त्यांचे मोठे सामर्थ्य होते, हो होते कारण आता त्याला चीन ने सडोतोड उत्तर दिले आहे. आधी आर्थीक स्तरावर आणि नंतर मिलेटरी स्तरावर चीन ने यशस्वी बाजी मारली आहे, आणि त्याचीच मोठी चिंता अमेरिकेला लागली आहे, त्यांची झोप उडाली असुन त्यांना अनेक चिंता त्रस्त करु लागल्या आहेत. त्यातली सर्वात मोठी चिंता म्हणजे जपान मधे असलेले अमेरिकेचे नाविक तळ. हे नाविक तळ नक्की कुठे आहेत बरं ? तर त्यांची स्थाने आहेत :--- मिसावा,योकोसुका,मायझुरु,कुरे,सासेबो.( उच्चर चुकीचे लिहले असल्यास क्षमस्व) आता ही जवळ पास सर्व स्थाने चीनच्या घातक मिसाईल रेंज मधे आली असुन... अमेरिकेचे चीन वरचे इतके वर्ष असलेले सागरी दबाव तंत्र कमकुवत झाले आहे. अमेरिकेचे महत्वाचे युद्धपोत इथे असतात आणि त्यांची मारक क्षमता ही उत्तम दर्जाची आहे,पण चीनने आघाडी घेतल्यामुळे सागरी महासत्तेचे स्थान आता चीनकडे जात असुन अमेरिकेला याच गोष्टीची मोठी धडकी भरली आहे.थायलंड,श्रीलंका किंवा पाकिस्तानचे ग्वादार असो... चीन सगळीकडे मोठ्या महत्वाकांक्षेने हात पाय पसरवत आहे... आणि त्यामुळे अमेरिकेची चिंता पराकोटीला पोहचली आहे. चीनी युद्ध तज्ञांच्या निती नुसार युद्ध झाल्यास आधी शत्रु चे डोके नष्ट करावे म्हणजे शरीर अपोआप लुळे पडते !!! त्यामुळे चीनची युद्ध निती ही शत्रुच्या प्रदेशातच युद्ध करुन आपल्या भूमीपासुन लांबच ठेवुन शत्रुवर आक्रमण करावे असे असावे... तसेच पहिला हल्लाच इताका मोठा आणि घातक क्षमतेचा करावा की ज्याच्यावर हल्ला केला आहे त्याची वाताहत होइल. उदा. जर चीनने हिंदुस्थानवर हल्ला केला ( जी त्यांची ठरलेली निती आहे असे म्हणतात...या बद्दल जालावर वाचा.) तर आपल्या महत्वाच्या अणुकेंद्र, नेव्ही आणि एयरफोर्स बेस,तेल साठे तसेच महत्वाचे रेल्वे आणि वाहतुक मार्ग नष्ट करणे हे चीनचे प्रथम उद्दिष्ट राहिल. जपानच्या या सर्व महत्वांच्या अमेरिकी बेसचा चीनने अगदी सखोल अभ्यास केला असुन, त्यांनी त्याप्रमाणे आपली निती आखली असावी असा अंदाज आहे. माझ्या वाचना नुसार जपानमधला योकोसुका हा तळ मोठ्या आकाराच्या नौका / युद्ध नौका दुरुस्त करणारा आहे, अर्थातच त्यामुळे त्याचे फार महत्व आहे.सासेबो हा अमेरिकेचा दुसरा मोठा नाविक तळ चीनच्या सर्वात जवळ आहे हे (बिजींग) व्यवस्थित जाणुन आहे. अमेरिकीची सागरी निती आता बदलत असुन त्यांच्या नौकांना जास्त सुरक्षित तळाची गरज भासते आहे ज्याचे मुख्य कारण चीन आहे. थोडक्यात अमेरिकेला आपले स्थान बळकट करण्यासाठी हिंदुस्थानच्या मैत्री शिवाय दुसरा पर्याय उरला नाही. जाता जाता :--- आपली परिस्थीती काय तर :--- विंध्यगिरी बुडाली !!! :(

In reply to by मदनबाण

मदनबाण 14/08/2013 - 11:36
मागच्या वेळी विंध्यगिरी बुडाली होती, आज आपली INS सिंधुरक्षक या पाणबुडीला जलसमाधी मिळालीय ! काय चाललयं काय नक्की ? नौदलाची ही अशी स्थिती का झाली आहे ते कळत नाही, परंतु हे अत्यंत चिंतेचे कारण आहे ! अशा प्रकारे कुठल्याही युद्धात जलसमाधी न मिळता डॉकवर यांना जलसमाधी मिळत असेल तर हे परिस्थीती गंभीर असल्याचेच लक्षण दिसुन येते.

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/12/2016 - 06:37

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/12/2016 - 07:03
जपान मधे असलेले अमेरिकेचे नाविक तळ. हे नाविक तळ नक्की कुठे आहेत बरं ? तर त्यांची स्थाने आहेत :--- मिसावा,योकोसुका,मायझुरु,कुरे,सासेबो.( उच्चर चुकीचे लिहले असल्यास क्षमस्व) आता ही जवळ पास सर्व स्थाने चीनच्या घातक मिसाईल रेंज मधे आली असुन... अमेरिकेचे चीन वरचे इतके वर्ष असलेले सागरी दबाव तंत्र कमकुवत झाले आहे. अमेरिकेचे महत्वाचे युद्धपोत इथे असतात आणि त्यांची मारक क्षमता ही उत्तम दर्जाची आहे,पण चीनने आघाडी घेतल्यामुळे सागरी महासत्तेचे स्थान आता चीनकडे जात असुन अमेरिकेला याच गोष्टीची मोठी धडकी भरली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval community

विजुभाऊ 24/02/2011 - 10:58
अमेरीकेच्या या चतुरपणामागे एक सर्वात मोठी गोष्ट आहे की आत्तापर्यन्त एकही युद्ध अमेरीकेच्या भूमीवर लढले गेलेले नाही. भौगोलीक दूरत्वामुळे सामान्य अमेरीकन नागरीकाला युद्धाची प्रत्यक्ष झळ बसलेली नाही . ( अपवाद ९/११). एकही भांडखोर शेजारी नसलेल्या वेळेस अमेरीकेला हा फायदा प्रत्येकेवेळेस मिळत आलाय. पाकिस्तानबद्दल जितकी धरसोड अमेरीकेने केली तितकीच पाठीराखण सौदी राजवटीची केली आहे. कारण अमेरीकेचे तिथले आर्थीक हितसंबन्ध. मध्यपूर्वेत कितीही उठाव झाले तरी सौदीत ते होनार नाहीत. याची खात्री अमेरीकेचे कट्टर शत्रु देखील देतील. मुद्दा हा आहे की भारताने अमेरीकेचे वर्चस्व कशासाठी मानायचे? वाजपेयी सरकारने केलेल्या अणूस्फोटानन्तर अमेरीकेने भारतावर कितीतरी निर्बन्ध लादले ; पण सर्वसामान्य भरतीय नागरीकाला त्याची काहीच झळ पोचली नाही. उत्तरकोरीयाने थेट धमक्या दिल्या तरी अमेरीका तेथे काहीच कारवाई करणार नाही. कारण तेथे सैन्य गुंतवून घेण्यात अमेरीकेला काहीच स्वारस्य नाही. चिन अमेरीकेला जुमानत नाही .अमेरीका त्यांचा व्यापारही थांबवू शकत नाही. बंधने लादूनही चिन चे अमेरीक काहीही वाकडे करु शकलेले नाही. पिण्याचे पाणी सुद्धा आयत करणार्‍या अमेरीकेतील युद्धसामुग्रीचे कारखाने सुरळीत चालावे म्हणून अमेरीका इतरांवर वेळोवेळी युद्धे लादत आलेली आहे . अफगाण सीमेवरील वजिरीस्तान प्रांतात अमेरीकेला अद्याप काहेच करत आलेले नाही .ओसामा ला पकडण्यात आलेले अपयश हे मुद्दाम निर्माण केले गेलेले आहे . अमेरीका कोणाचाच मित्र देश असू शकत नाही

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 08/12/2016 - 21:57
अमेरिकेचे मेक्सिको विरुद्ध टेक्सास प्रांताच्या मालकीबाबत १८४६ ते १८४८ दरम्यान युद्ध झाले होते. तसेच अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभागाला सुरुवात त्याच्या ताब्यातील हवाई बेटावरील पर्ल हारबर नाविक तळावर जपान ने १९४१ साली अचानक हल्ला केल्या नन्तर झाला.

साधामाणूस 24/02/2011 - 21:28
श्री. काळे साहेबांनी दिलेल्या उदाहरणांवरून निश्चितच खात्री पटते की अमेरिका हा कुणाचा विश्वसनीय मित्र असू शकत नाही. तरीही शत्रूचा(चीन) शत्रू तो मित्र या न्यायाने कामापुरतीच मैत्री त्यांच्याशी ठेवावी. याचा अर्थ असा नव्हे की चीनविरुध्द्च्या युध्दात अमेरिका आपली मदत करील. ते कदापि होणे नाही. पण शांततेच्या काळात आपण (अणूकरार्,उच्च तन्त्रज्ञान, काही युध्द्सामग्री, नैतिक पाठिंबा(moral support)यासारखे) काही फायदे उपटू शकतो. अवांतरः "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, ......................केवळ राजनैतिक संबंध. "मला वाटते 'राजनैतिक संबंध' ऐवजी राष्ट्रीय हितसंबंध हा शब्द योग्य असावा. कारणAccording to wikipedia, Lord Palmerston (Henry John Temple) said: "Therefore I say that it is a narrow policy to suppose that this country or that is to be marked out as the eternal ally or the perpetual enemy of England. We have no eternal allies, and we have no perpetual enemies. Our interests are eternal and perpetual, and those interests it is our duty to follow." This is often paraphrased as: "Nations have no permanent friends and no permanent enemies. Only permanent interests." Source(s): wikipedia.org : http://en.wikipedia.org/wiki/Friendship#cite_note-19

मदन बाण ह्यांचे विशेष आभार मी ओझरता उल्लेख केला त्या मुद्यावर आपण सविस्तर मत मांडले. अमेरिकेला भारताची बाजारपेठ हवी आहे .हे सर्वश्रुत आहे .पण इतर उत्पादन जश्या गाड्या किंवा टेली कम्युनिकेशन किंवा तेल आणि उर्जा ह्यात अनुक्रमे सौथ कोरिया / ब्रिटन (वोडाफोन )/ आणि परत ब्रिटन नुकताच बिपी आणि रिलायंस चा महाकरार. ह्यात असे दिसून येते .कि भारतची ब्रिटन मध्ये २ र्या क्रमांकाची गुतंवणूक आहे .तर इस्त्रो नासाचे छोट्या उपग्रह प्रेक्षेपण करण्याचे मार्केट खाऊ पाहत आहे .तेव्हा भारत हा काही अमेरिकेच्या अमर्याद पाठीब्यांवर मोठा होत नाही आहे .त्याचे विकासाचे जे मॉडेल आहे .ते संथ आहे पण स्टेडी आहे त्यानुसार होत विकास होत आहे .
अमेरीकेच्या नादान पणामुळे अफगाण युद्ध सुरु झाले ..इराक युद्ध सुरु झाले .परवा लोकसत्ता मध्ये
छान लेख होता .येथे २००३ नंतर प्रचंड वेगाने जगात शस्त्रास्त्रांचा बाजार वाढला( भारत शस्त्र खरेदित सौदि नन्तर दुसर्या क्रमांकावर आहे .. जगातील पहिल्या १०० शस्त्र कारखान्यात ४० अमेरिकेचे व त्यात पहिला अमेरिका व दुसरा युके चा आहे (म्हणून तर दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरु झालीत .) आज अमेरिका मदन बाण ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जगभर पोलीस पाटीलकी करत आहे ,म्हणून हिंदी महासागरात चीनला उचाकावत आहे .परिणाम प्रचंड वेगाने चीनचे शस्त्रसज्ज होणे .(व प्रर्यायाने भारताचे......... ) अमेरिकेशी मैत्री बरोबरीच्या नात्याने व्हावी असे मला वाटते. कारण त्यांना आपली गरज जास्त आहे .युरोप आता युरोपियन संघातर्फे एकत्र आला आहे .त्यांची धोरण हि आता बर्याच प्रमाणात स्वयंपूर्ण असतात आशियात चीन हा एक समर्थ पर्याय आहे .रशिया आपले अस्तित्व राखून आहे .अश्या परीस्थित भारताने जगातील सर्व देशांची विशेतः युरोपियन युनियन व अरब जगतात स्वताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे . चीनने स्वतचे स्थान अमेरिकेशिवाय निर्माण केले .आज भारताला स्वताचे स्थान अमेरिकेच्या मदतीने करायचे आहे .पण त्याच बरोबर इतर प्रगत राष्ट्रांची सलोखा राखणे गरजेचे आहे . सध्यातरी आपले राजकरणी योग्य चाल खेळले आहे .अमेरिकेशी अण्वस्त्र करार केला .ह्या करारच्या संमतीसाठी अण्वस्त्र गटांची सहमती मिळवली .मात्र ज्या कारणासाठी करार झाला (अमेरिकन कंपन्यांना भारतीय अण्वस्त्र बाजारपेठ ) ते आपल्या हुशार राजकारण्यांनी बाजूला ठेवून रशिया /फ्रेंच /केनेडा शी अण्वस्त्र करार केले .ह्यात फ्रेंच कंपनी अरेवा सोबत महत्वाकांशी प्रकल्प घोषित केला .( म्हणजे फ्रेंच तुपाशी अनु अमेरिका उपाशी ) अर्थात ह्याचा अर्थ सगळेच आलबेल नव्हते .आपल्या हातून अमेरिका प्रेमात काही प्रमाद घडले . आंतरराष्ट्रीय राजकारणात इराण आपला २ र्या क्रमांकाचा तेलपुरवठा करणारा देश .त्यांच्या विरुध्ध सयुंक्त राष्ट्रसंघात नुकतेच तटस्थ राहणे. /तेल प्रश्नावर अमेरिकन दबावामुळे भारताला इराण बरोबर पेच प्रसंग निर्माण झाला तेव्हा .ह्यातून आपण कसेबसे निभावून नेले .बाकी खुदी को कर बुलंद इतना हि म्हण भारताच्या राजकारणी व जनतेने ओळखली पाहिजे . भारत अजूनही शस्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण नाही आहे ७० % शत्रे आपण आयात करतो .मात्र भारतच्या १ वर्षा नंतर जन्मलेले ज्यू राष्ट्र अत्यंत प्रतिकूल परीस्थित शत्रास्त्राच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्ण झाला नाही तर आता तो जगातील प्रमुख निर्यातदार आहे .(नुकतेच भारताला शस्त्र विक्रेता म्हणून फ्रेंचांना मागे टाकून त्यांनी २ क्रमांक पटकावला ) हि आपल्या साठी शरमेची गोष्ट आहे . आपले राजकारणी मुर्ख नाही तर दीड शहाणे आहेत . पूर्वी आपण रशियाशी जवळकीचे संबंध होते .म्हणजे नक्की कसे होते ? आपण खुलेआम त्यांच्या कळपात नव्हतो .मात्र उगाच त्यांच्या नादी लागून प्रगत राष्ट्रांशी दुरावा निर्माण केला. रशिया अफगाण मध्ये शिरली .तेव्हा आपली नक्की भूमिका काय होती .? आय एस आय व सी आय ए चे मधुर संबंध निर्माण होत होते .तेव्हा आपण काय करत होतो? .(राजकारणी झोप काढत होते .व नुकत्याच निर्माण झालेल्या पाकिस्तान प्रणीत व अमेरिकन पैशावर पोसलेला दहशतवाद पंजाब व काश्मीर मध्ये थैमान घालत होता .) आज देखील अमेरिका कोंडीत सापडली आहे .पाकिस्तान त्यांना देवीस प्रकरण असो व दहशतवादाविरुध्ध युद्ध त्यात सपशेल गंडवत आहे. अश्यावेळी अमेरिकेवर दबाव टाकून काश्मीर व अफगाण प्रसंगी ठोस पाऊले उचलायची सोडून राजकारणी मंडळी घोटाळा घोटाळा खेळत आहेत . आज रशियाची भूमिका अमेरिकेला साकारायला बघत आहे .. ते शस्त्र विकणार नि आम्ही मजबूत पैसा देऊन विकत घेणार संरक्षण मंत्री एन्थोनी ह्यांनी काही वर्षांपूर्वी'' भारताला जास्तीजास्त प्रमाणात शस्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण करणार'' असे म्हटले . म्हणजे नक्की काय केले? .अजूनही ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या होतच आहे .(फक्त नवीन गोष्टी जश्या सुपर सोनिक शेपानास्त्र किंवा ५ व्या पिढीचे लढाऊ विमान आपण संयुक्त रित्या बनवत आहोत व त्या जगात क्रमांक १ च्या असून दोन्ही देशांना स्वस्तात पडणारा सौदा आहे .अर्थात गेली गेली दशके असे संयुक्त प्रकल्प राबवायला आमचे राजकारणी झोपले होते का ? आताही ओबामा ह्यांनी उच्च तंत्रज्ञानाचे निर्बंध उठवले . का ? ह्यांना आपली बाजार पेठ हवी आहे .( पण भूमिका विक्रेत्याची असणार .संयुक्त प्रकल्प राबवायचे नाव नाही . .) रशिया व फ्रेंच अणुभट्टी निर्मितीत भारताशी जमवून घेतात ..भारताच्या अटी मानतात . अमेरिकन कंपन्या मात्र दुर्घटना झाली तर जबाबदारी घ्यायला टाळतात .(येथेच अजून त्यांचे घोडे अडले आहे .व अरेवा ने मागाहून बाजी मारली ) मग ह्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या . गंमत मात्र स्वताच्या देशात मात्र बिपी कडून दाम दुपट्टीने दुर्घटनेचा पैसा वसूल करत आहे स्वताचा हात दगडाखाली आहे .पाकिस्तान व्यवस्थित चुना लावत आहे . अमेरीकेचा आशियात सर्वात भरवश्याच्या मित्र हा भारत आहे (म्हणूच नैसर्गिक मित्र म्हणवतात. ) मात्र आपल्याशी वागतांना मात्र उपकार केल्यासारखे वागतात . आज अमेरिकेच्या मैत्रीमुळे आखतात आपल्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या .नाटो राष्ट्रात आपली प्रतिमा उंचावली .शेजारी भारताला जास्त मदत मिळते म्हणून अमेरिका विरोध वाढला .ह्या जमेच्या बाजु मात्र अश्या परीस्थित अमेरिकेशी मैत्री करताना रशिया व इराण शी संबन्ध दुरावू नये असे वाटते .

हुप्प्या 24/02/2011 - 22:21
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेच्या मागे जायचे का रशियाच्या असे दोन पर्याय होते. तेव्हा नेहरूंनी आपल्या बावळट समाजवादी विचारांनी भारून गेल्यामुळे रशियाचा पदर पकडला. अमेरिका भारताशी संबंध जु़ळवायला उत्सुक असतानाही नेहरूंनी दाद दिली नाही. आणि मग नवी समीकरणे बनली. एक तृतीयपंथी नॉन अलाईन्ड गट स्थापन करायचा भारताने एक प्रयत्न केला खरा पण स्वतः रशियाच्या ताटाखालचे मांजर बनून तटस्थतेच्या गप्पा करायचा प्रयोग फार चालला नाही. भांडवलशाही अमेरिकेच्या हातातले बाहुले बनायचे का कम्युनिस्ट रशियाच्या हातातले असे दोनच पर्याय होते. आपल्या नेत्यांनी त्यांना योग्य वाटेल ते केले. परिणाम दिसतातच आहेत. तेव्हा एका हाताने टाळी वाजत नसते. निव्वळ अमेरिकेला दोष देऊन चालणार नाही. अमेरिकेची धोरणे लोकांपेक्षा लॉब्या जास्त ठरवतात. विशेषतः परदेशी धोरणे. तेव्हा व्यावसायिक फायदा हे जास्त महत्त्वाचे असते. लोकशाहीचा प्रसार वगैरे बाजार गप्पा म्हणून ठीक आहेत. पण धोरणे म्हणून नाहीत. सोव्हियत रशियाने काय मोठे दिवे लावले आहेत? अकारण अफगाणिस्तानवर हल्ला करून तिथे कब्जा केला. इराक इराणच्या दीर्घकाळ चालणार्‍या युद्धात आपले हात धुऊन घेतलेच की. धुतल्या तांदूळासारखे स्वच्छ असे आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण आहेत? असले तर त्यांच्याकडे काही शक्ती नाही ह्याची खात्री बाळगा.

In reply to by हुप्प्या

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेच्या मागे जायचे का रशियाच्या असे दोन पर्याय होते. तेव्हा नेहरूंनी आपल्या बावळट समाजवादी विचारांनी भारून गेल्यामुळे रशियाचा पदर पकडला. अमेरिका भारताशी संबंध जु़ळवायला उत्सुक असतानाही नेहरूंनी दाद दिली नाही. आणि मग नवी समीकरणे बनली.
हा प्रतिसाद वर्षभरापूर्वीच देणार होतो पण त्यावेळी मला इतके चांगले मराठी लिहिता येत नव्हते आणि मी नुसते वाचायचे काम करत होतो.हा धागा वर आणल्याबद्दल मदनबाणांना धन्यवाद. वाटलेच होते नेहरूंवर विनाकारण आगपाखड कोणीच कशी केली नाही!!पाकिस्तानच्या निर्मितीत चर्चिलचा वाटा किती मोठा आहे हे कदाचित तुम्हाला सांगायची गरज नसेल.चर्चिल हा मनुष्य पक्का भारतद्वेष्टा होता.महंमद अली जीना लंडनमध्ये असताना त्यांना चिथावून पूर्वाश्रमीचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते जीना पूर्ण बदलले आणि हे काम केले चर्चिलने.तेव्हा पाकिस्तान हे एका अर्थाने इंग्रजांने निर्माण केलेला देश होता.तसेच फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नितीलाही मुस्लिम लीगचे नेते बळी पडले होते, काँग्रेसचे नाही.त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासूनच इंग्लंड आणि मित्रपक्ष म्हणून अमेरिकेचा कल भारतापेक्षा पाकिस्तानकडे राहणार हे नक्कीच होते.तसेच १९४७ मध्ये अमेरिकेला रशियातील कम्युनिझम दक्षिण आशियात पसरेल अशी भिती वाटत होती.तसेच त्याकाळी रशिया तर कम्युनिस्ट होताच आणि चीनमध्ये यादवी सुरू होती तेव्हा तो देशही कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल अशी भिती अमेरिकेला वाटणे साहजिक होते.तेव्हा याला तोंड द्यायला म्हणून अमेरिकेला दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व (लष्करी तळ वगैरे) असावे असे वाटणेही साहजिक होते.आणि असे करायला नेहरूंचा भारत आपल्याला अशी परवानगी कदापि देणार नाही पण तसे करायला पाकिस्तानच आपल्याला मदत करेल हे अमेरिकेला कळले नसेल असे म्हणणे अत्यंत बाळबोध आहे.तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून अमेरिकेने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचीच बाजू घेतली होती.आणि तसे होणार हे नेहरूंना कळले नसेल असे कोणत्या आधारावरून वाटते? तेव्हा सुरवातीपासून आपल्याला अमेरिकेपेक्षा रशियाबरोबर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जरा नेहरूद्वेष हा चष्मा काढलात तर या गोष्टी अगदी सहज दिसून येतील.

शेखर काळे 25/02/2011 - 03:38
सुधीर, तुम्ही जी ऊदाहरणे दिली आहेत, ती सारी हुकुमशहा आणि अशा नेत्यांची आहेत जे सगळे अमेरिकेच्या आर्थिक व सैनिकी मदतीवर अवलंबून होते. भारताची बाजारपेठ अमेरिकेला हवी आहे. इंग्रजही व्यापार करायलाच आले होते. आपला इतिहास लक्षात ठेऊन आणि डोके वापरून भारतीय नेत्यांना आपल्या पदरात अनेक सवलती पाडून घेता येतील. तसे ते करतात आहेतच असे गेल्या काही वर्षांतल्या घटनांवरून वाटते आहे. भारत अनेक बाबतीत स्वावलंबी आहे - हे सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीच्या अनुभवावरून दिसते. भारतिय आर्थिक व्यवस्था ही भारताच्या अर्थमंत्री व त्यांच्या सल्लगारांनी संयम वापरून हळू हळू खुली करत आणल्यामुळे तशी ती संरक्षीत राहिली आहे.

In reply to by शेखर काळे

सुधीर काळे 01/03/2011 - 13:48
मागे आणखी एका चर्चेत प्रतिसाद देतांना मी म्हटले होते कीं भारतीय अर्थव्यवस्था उत्पादनाच्या क्षेत्रावर (manufacturing sector) जास्त आधारित असून सेवेच्या क्षेत्रावर (service sector) कमी आधारित आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचा आपल्यावर तितका प्रभाव पडला नाहीं जितका इतर विकसित देशांवर पडला. त्याशिवाय पहिल्यापासून आयातीपेक्षा स्वतः उत्पादन करण्याकडे आपला कटाक्ष होताच. त्यामुळे पद्मिनी-अँबॅसडरसारख्या निकृष्ट प्रतीच्या गाड्या चालवायची आपली मानसिक तयारी झाली होती. मारुती-८०० ने ती बदलली. पण आजही मारुती चे जवळ-जवळ १०० टक्के भाग (components) आपण भारतातच बनवतो. 'परमिटराज'ची ही देणगी अप्रत्यक्षरूपाने आपल्याला उपयोगी पडली आणि आजही उपयोगी पडत आहे. (प्रत्येक कंपनीत Import Substitution Cell असायचीच.) रशियाने आपल्याला शस्त्रास्त्रें विकताना इथे त्यांचे उत्पादन करण्याबाबत तयारी दाखविली. कदाचित् म्हणूनच आपण बहुतेक सर्व सैनिकी कंत्राटें रशियाबरोबर केली मग ती 'मिग' विमानांबद्दल असो वा इतर अशीच शस्त्रास्त्रसंबंधी कंत्राटे असोत. आपले हे म्हणणे खरे आहे कीं आपले सरकार कधीच कुठल्याच 'सुपरपॉवर'च्या मेहेरबानीवर उभे नाहीं. आपले सरकार भरे-बुरे कसेही असो पण त्या सरकाराला आपणच निवडून देतो. अमेरिकेच्या ताटाखालची मांजरे असलेली सरकारे ज्यांची मी उदाहरणे दिली आहेत तसे आपले कुठलेच सरकार कधीच कुणाच्याही ताटाखालचे मांजर नव्हते. ही नक्कीच जमेची बाजू आहे. अमेरिकेने आपल्याशी जवळची मैत्री करू पाहिलीच तर ती आधी 'नाटो'मध्ये असलेल्या आणि नंतर 'नाटो'मधून बाहेर पडलेल्या फ्रान्सबरोबर केलेल्या मैत्रीसारखी असावी हाच माझ्या मूळ लेखाचा रोख आहे. भारताच्या रशियाबद्दलच्या जवळीकीचे/मैत्रीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले तर काय दिसते? पहिली गोष्ट ही कीं आधी म्हटल्याप्रमाणे आपण रशियाच्या ताटाखालचे मांजर कधीच नव्हतो. पण भारत-चीन युद्धात चीनला 'भाऊ' म्हणणार्‍या रशियाने आपल्याला 'मित्र' म्हटले होते हे पक्के आठवते. या निवेदनामुळे रशियाने जरी भाऊ-मित्र असा शब्दच्छल करून थोडेसे डावे-उजवे केले असले तरी रशिया भारताविरुद्ध चीनला संपूर्ण पाठिंबा देणार नाहीं हे चीनला नक्कीच कळले. या निवेदनाचा चीनच्या एकतर्फी माघारीत किती हिस्सा होता याचा अभ्यास मनोरंजक ठरेल. जाणत्यांनी याच्यावर जरूर अधीक प्रकाश टाकावा कारणा माझे याबाबतीतील वाचन पुरेसे नाहींय्. रशियाने आपल्याला शस्त्रास्त्रें रुपयात विकली, कधी-कधी 'बार्टर'च्या तत्वावर विकली हेही आठवते आहे. शिवाय आपल्याला शस्त्रास्त्रे निर्मितीचे तंत्रज्ञान व उत्पादनात सहाय्य करायलाही रशिया अनुकूल राहिला आहे. या बाबतीत अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे सुखासुखी आपले तंत्रज्ञान भारताला देतील असे वाटत नाहीं. आता रशियाकडे आपल्याला द्यायला वित्तीय सामर्थ्य किती होते हाही मुद्दा पहावा लागेल. माझे एक बॉस डिफेन्स सेक्रेटरी होते त्यांच्या म्हणण्यानुसार रशियाशी सौदा करणे फार सोपे होते तर अमेरिकेशी सौदा करणे महाकठीण! रशियाने पूर्व युरोपमधील अनेक राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले होते उदा. वॉर्सा करार. रशियाचे फिडेल कॅस्ट्रोसारख्यांशीही जवळचे संबंध होते. पण स्वतःच्याच देशात हुकुमशाही असल्यामुळे वाईट वेळ आल्यावर रशियाला अमेरिकेसारखे लोकशाहीचे पोवाडे गायला लागले नाहींत. हंगेरीत इम्रे नागींच्या नेतृत्वाखाली जनतेने केलेल्या उठावाला रशियाने सत्ताधार्‍यांच्याबाजूने पूर्ण पाठिंबा दिला आणि ती चळवल चिरडून टाकली. रशियाने तसाच पाठिंबा पूर्व जर्मनीचे होनेकर यानाही दिला व बर्लिनची भिंत पाडली जाऊन जर्मनीचे एकीकरण झाल्यावर त्यांचा देहांत होईपर्यंत होनेकत मॉस्कोला सन्मानाने राहिले. असा पाठिंबा रशियाने भूतपूर्व चेकोस्लाव्हिया या राष्ट्रांच्या सत्ताधार्‍याप्रमाणे त्यांच्या सर्वच सत्ताधार्‍यांना दिला. नंतर जेंव्हां "पैशाचे सोंग आणता न ये" अशी परिस्थिती रशियावर ओढवली तेंव्हांच त्याने या राष्ट्रांतील सत्ताधार्‍यांची मदत मागे घेतली. पण तेंव्हांही लोकशाही वगैरेची कारणे दिली नाहींत. अमेरिकेपुढे खरेच जी समस्या आहे ती स्वतः लोकशाही असल्यामुळे आहे. मांडलिक राष्ट्रांत उठाव झाल्यावर स्वतःच्या (अमेरिकन) जनतेला बरे वाटावे म्हणून अमेरिकन सरकारला लोकशाहीचे पोवाडे गावेच लागतात व त्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडते असे मला वाटते. याउलट जिथे लोकनिर्वाचित राष्ट्रे अमेरिकेच्या ताटाखालची राष्ट्रे बनत नाहींत म्हणून तिथे तख्तापालटात अमेरिका मागच्या दाराने घुसते. उदा. चिलीत घडवून आणलेली क्रांती. त्यात लोकांनी निवडून दिलेले अल्लेंदे (Allende) सरकार वाममार्गाने खाली आणले गेले व पिनोशे नावाचा हुकुमशहा सत्तेवर बसविला गेला. त्याने अनन्वित अत्याचार केले. अलीकडे तिथे पुन्हा लोकशाही प्रस्थापित झाली आहे. लॅटिन अमेरिकेत अशा अमेरिकेच्या हस्तक्षेपाची अनेक उदाहरणे आहेत. शेवटी एकच मुद्दा महत्वाचा. आपल्याला अमेरिकेच्या मैत्रीचे वावडे असायचे कांहींच कारण नाहीं. फक्त आपण लोकशाही राष्ट्र असल्यामुळे आपली धोरणे आपल्या लोकमतानुसारच रहातील. ते अमेरिकेने मान्य केलेच पाहिजे. आपली कांहीं धोरणे त्यांच्याशी १०० टक्के मिळती-जुळती नसली तरीही त्यांना ते मान्य असलेच पाहिजे. या चौकटीत राहून परस्पर सहाय्यासाठी मैत्री जरूर करावी पण सांभाळून, डोळे उघडे ठेवून आणि आपल्या हितसंबंधांना अग्रक्रम देऊन!

ज्या कोणाला भारतीय राजकारण्यांच्या मुर्खपणाचा येवढा मानसिक त्रास होत आहे त्या थोर विद्वानांनी स्वतःच्या परदेशातील ऐषो-आरामाचा त्याग करुन भारतात येऊन काहीतरी भारतोपयोगी करुन दाखवावे. दूरदेशात बसुन पिझा खात आणि कोक ढोसत आख्यान लिहिणे आणि शिमगा करणे वेगळे आणि एक देश चालवणे वेगळे असते येवढी त्यांच्या ज्ञानात भर पडली तरी पुरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/02/2011 - 13:25
=)) =)) =)) =)) बोलके विचार , वरच्या हिमखंडाची समरी देईल काय कोणी ? काय म्हणालात ? रिकामं आहे ते ? =)) बाकी लिहीले नाही , भाषांतर केली नाही , दुर्बोध कार्टुणांवरही पानभर लिहीले नाही .. तर वेळ कसा जाणार ? :) चालु द्या ! बाकी छाण लिहीले आहे - शंकर पाळे

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुधीर काळे 28/02/2011 - 20:16
परीकथेतील राजकुमार, हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले! आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. जास्त कांहीं लिहीत नाहीं.

In reply to by सुधीर काळे

परीकथेतील राजकुमार, हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले! आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. जास्त कांहीं लिहीत नाहीं.
काका गैरसमज नको :) गेले काही दिवस स्वतःला अक्कलवान समजणारे आणि स्वतःच्या भिकार लेखनाचे कौतुक न झाल्याने 'कंपुबाजीच्या नावानी गळे काढणार्‍या, वैयक्तीक शेरेबाजी करणार्‍या' लोकांना उद्देशुन तो प्रतिसाद आहे, आणि तो त्यांना चांगला झोंबल्याचे दिसत आहे ;) तुमच्या कळकळीविषयी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या विषयातील तुमच्या ज्ञानाविषयी मनात कसलाही किंतु नाही. तरी तुम्ही गैरसमज करुन घेऊ नये. फक्त आपण परदेशात आहोत म्हणजे लै अक्कलवाले आहोत आणि आपल्याला भारताच्या सगळ्याच गोष्टींवर ओकार्‍या काढण्याचा हक्क आहे असा काही जणांचा गोड गैरसमज आहे, त्यांना दणका देणे आवश्यक होते म्हणुन सदर प्रतिसाद दिला आहे. बाकी चालु द्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुधीर काळे 01/03/2011 - 13:46
पण वार मात्र माझ्यावरच केल्यासारखखे मलाच काय पण इतरांनाही वाटले असावे, कारण माझ्या एका परममित्र असलेल्या सभासदाने वाहत्या गंगेत हात धुवून 'साफ'ही करून घेतले! मीही परदेशवासी, पिझ्झा खाणारा आणि कोक ढोसणारा! (खरं तर मी दोन्ही करत नाहीं पण ते तुला कसे माहीत असणार?) पण माझ्या ९० वर्षाच्या वृद्ध आईला मात्र 'व्हेज्जी' पिझ्झा आणि कोक दोन्ही प्यारे आहेत! हा तुझा प्रतिसाद वाचेपर्यंत मात्र मला 'बटाट्याची चाळ'मधील "अण्णा पावशेंच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेली चाळीला आवडली नाहींत" हे वाक्य सारखं आठवत होतं!

निवांत पोपट 28/02/2011 - 21:11
ही चर्चा चालू राहीली पाहिजे असे वाटते.तुम्ही लेखातल्या मतांशी सहमत असू शकता अथवा असहमत.आणि ते वैयक्तिक पातळीवर न उतरता पण सांगता येते की.

@ते वैयक्तिक पातळीवर न उतरता पण सांगता येते की. ब्लेक वोटर मोहिमा मिपावर चालतात .त्यामुळे हे चालायचे . त्यात लेख व त्यातील प्रतिक्रिया अमेरिका विरोधी म्हणजे गहजब ? उद्या अमेरिकन सरकारने हे वाचून त्यांच्या शिणेमावर परीक्षण लिहायला मनाई केली तर ? आम्ही शाब्दिक फुलोरे भारतातून कसे बर फुलवायचे . ह्या भारतीय नेत्यांनी आमच्याकरिता एक वेगळे खाते केंद्रात ठेवले आहे . एक वेगळा प्रवासी दिवस पण असतो . बाकी आपल्याला आपल्या नेत्यांची काही मते पटली नाही तर ती लिहिण्याची प्रेरणा अमेरिकन नागरिक स्कॉट- क्लार्क कडून घेतली आहे . आणि अनिवासी नागरिकांमध्ये जगात अमेरिकन स्थित ज्यू समाजाला आदर्श मानतो .जो अमेरिकच्या नाकावर टिच्चून स्वताच्या देशाच्या हिताची धोरणे पांढऱ्या घरातून घडवून आणतो .

In reply to by निनाद मुक्काम …

मदनबाण 01/03/2011 - 11:24
मूळ विषया पासुन जरासे अवांतर :--- काही दुवे इथे द्यावेसे वाटत आहे :--- Kashmir: the China connection http://www.economist.com/blogs/banyan/2010/08/china_and_kashmir Pak, China two major irritants for India's security: Army chief http://news.rediff.com/report/2010/oct/15/pak-china-two-major-irritants-army-chief.htm China's Discreet Hold on Pakistan's Northern Borderlands http://www.nytimes.com/2010/08/27/opinion/27iht-edharrison.html?_r=1 Gilgit Baltistan, The Emergence Of China http://www.pkarticleshub.com/2011/02/15/gilgit-baltistan-the-emergence-of-china/ China building road to disaster in Gilgit-Baltistan http://www.pkarticleshub.com/2011/02/17/china-building-road-to-disaster-in-gilgit-baltistan/ China building road to disaster in Gilgit-Baltistan http://www.ibtimes.com/articles/113033/20110216/china-korakoram-dam-gilgistan-himalayas-environment-ecology-mountains-glacial-melting-diamer-bhasha.htm पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते...

In reply to by मदनबाण

मदनबाण 19/02/2013 - 13:01
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... जवळपास दोन वर्षापुर्वी वरती दिलेला हा प्रतिसाद हा आता सत्यात उतरलेला दिसतो आहे. आता चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते,ज्यात २ मोठे धोके मला वाटतात, ते म्हणजे १) देशाची आर्थीक राजधानी "मुंबई" लक्ष करण्याची क्षमता. २)हिंदुस्थान जे तेल आयात करतो त्या मार्गावर नियंत्रण. या बद्धल अधिक इथे वाचता येईलः--- China given contract to operate Gwadar port जाता जाता:--- ज्या प्रमाणे कोळी आपले भक्ष मिळवण्यासाठी जाळे विणतो,त्याच प्रमाणे चीनचे काम सुरु असताना आपण पाहत आहोत,ज्यात त्यांना पाकड्यांची मोलाची साथ मिळत आहे.

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 22/04/2015 - 13:35
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... जाता जाता:--- ज्या प्रमाणे कोळी आपले भक्ष मिळवण्यासाठी जाळे विणतो,त्याच प्रमाणे चीनचे काम सुरु असताना आपण पाहत आहोत,ज्यात त्यांना पाकड्यांची मोलाची साथ मिळत आहे. मित्राचा शत्रू तो.. ४६०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक ही चीनची आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. एवढी रक्कम म्हणून तर ती महत्त्वाची आहेच. परंतु त्याच बरोबरीने या पशातून पाकिस्तानात काय केले जाणार आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. या पशातून उभा राहणार आहे तब्बल ३ हजार किलोमीटरचा महामार्ग. पश्चिम चीनपासून थेट ग्वादर या बंदराला जोडणारा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/04/2015 - 13:52
चीनने नेपाळमध्ये फुटीरतावादी घातले आहेत, श्रीलंकेत आहेत, पाकडे तर आहेतच....बांग्लादेशला तर काही बोलायची सोयच राहीली नाही...उरले भूतान आणि म्यानमार...कोळी जाळे विणतो आहे...आणि आपण बसलो आहोत आपल्यातच हे ३.५% वाले....हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी असे करत

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 22/04/2015 - 14:20
हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी असे करत आपल्या देशातल्या पगारी राजकारण्यांना या जातीय राजकारण करण्या शिवाय दुसरा उध्योग सुचतो ? देशसेवा करण्याच्या नावावर जे टाळू वरचे लोणी देखील खाण्याचे उध्योग करतात ते सुद्धा तितकेच जवाबदार आहेत... ह्म नही सुधरेंगे असे एकदा सगळ्यांनी ठरवले की बाकी सगळे पालथ्या घड्यावर... पाणी ! असो... यावर अधिक वाचत असताना एक दुवा दिसला तो इथे देउन कलटी मारतो ! चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते,ज्यात २ मोठे धोके मला वाटतात, ते म्हणजे २)हिंदुस्थान जे तेल आयात करतो त्या मार्गावर नियंत्रण. ग्वादार बंदर - पाकिस्तानातील ग्वादार बंदर चीनने विकसित केले आहे. या बंदरात चीन नाविक तळ उभारत आहे. तसेच या बंदराच्या विकासामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून रोज लाखो बॅरल खनिज तेलाच्या वाहतुकीवर चीनचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहू शकेल. संदर्भ :- एमपीएससी - चालू घडामोडी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/04/2015 - 14:29
आपल्या देशातल्या पगारी राजकारण्यांना या जातीय राजकारण करण्या शिवाय दुसरा उध्योग सुचतो ?
चूक राजकरण्यांची नाहीये...इथल्या सामान्य लोकांची आहे...ज्यांच्या घरातून राजकारण्यांची nuisance power वाढण्यासाठी "कार्यकर्ते" मिळतात...असे कार्यकर्ते बनवण्याचे थांबवा...राजकारणसुध्धा जाग्यावर येईल

In reply to by मदनबाण

हाडक्या 22/04/2015 - 14:44
पण या सगळ्यत पाकिस्तानची भुमिका काय ?? कारण आजवर ते परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत भारतापेक्षा उजवे राहिले असले तरी त्यांनी यात स्वतःचे खूपच नुकसान करुन घेतले आहे असे वाटतेय. तेव्हा आता जरी असे वाटत असले की पाक हा अमेरिका, रशिया आणि चीन सर्वांना हवाहवासा वाटतोय तर त्याचे कारण तो स्वतःची कपडे काढायला तयार होतोय हेच आहे. जे की दीर्घ कालावधीत त्यांनाच ( आणि शेजारी म्हणून नाइलाजास्तव आपल्याला) त्रासदायक ठरेल असे वाटतेय.

In reply to by मदनबाण

मदनबाण 28/11/2016 - 22:54
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते Chinese naval ships in Pakistan's Gwadar port call for a rethink of India's regional policy Chinese naval ships to be deployed at Gwadar: Pak. official

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरादो... ;) :- Shaandaar

सुधीर काळे 01/03/2011 - 14:23
माझा "लोकशाहीच्या चौकटीत राहून परस्पर सहाय्यासाठी मैत्री जरूर करावी" या प्रतिसादाला खरी प्रेरणा मला विकास-जींच्या प्रतिसादावरून मिळाली हे लिहायचे राहूनच गेले. तसेच इंद्रा-जींचा प्रतिसादही एका योग्य मुद्द्यावर (अगदी 'बैलाच्या डोळ्या'वर) घाव घालणारा होता! दोघांचे आभार मानतो. आता एक लेख रशियाच्या मैत्रीबद्दल लिहावा असे वाटू लागले आहे.

काका तुमचा गैरसमज दूर झाला हे पाहून मलादेखील बरे वाटले . आमच्या शुध्द लेखनाविषयी बोंब पूर्वीपासून पण तरीही मूष चा लेख असो किंवा बिका शेख ह्यांचा विनायक सेन ह्यांचा आमच्या मित्राने हक्काने आम्हाला तेथे लिहिण्यास बोलावले व एकेकाळी चक्क छान छान प्रतिक्रिया दिल्या कधीकाळी आमचे प्रतिसाद वाचनीय होते म्हणे .अनेक लेखांवर .(आता आमचे लेखन अचानक भिकार झाले आहे ) काळाचा महिमा बाकी भारताच्या सगळ्याच गोष्टींवर गरळ वैगेरे वाचून अंमल मजा आली . कारण ह्यांनी आमंत्रित केलेल्या बिका ह्यांच्या विनायक सेन ह्या लेखात मी भारतीय न्याय व्यवस्थेची पाठराखण केल्याचे प्रत्येक प्रतिसादात नमूद केले आहे किंबहुना फार आधी मी ह्या निम्मिताने परकीय प्रसार माध्यम व मानवाधिकार भारताविषयी गरळ ओकणार व आपल्या देशातील अंतर्गत गोष्टी /नयन प्रक्रियेत ढवळाढवळ करणार असे भाकीत केले होते .दोन आठवड्यात दुर्दैवाने ते खरे ठरले
.. देवीस च्या लेखात शशी थरूर ह्यांच्या हुशारीची तारीफ तू नळीची लिंक देऊन सोदाहरण स्पष्ट केले आहे . पाकिस्तान व चीनच्या कारवाया किंवा अमेरिकन दुट्टपी पणा ह्या विषयी सुध्धा वेळो वेळी ह्याच भावनेतून लिहित असतो . अमेरिकेने मंदी जगभर लादली हा युरोप मध्ये समज आहे . अमेरिकेच्या नादी लागून टोनी ब्लेअर ची दैदिप्यमान कारकीर्द उध्वस्त झाली .(ह्या बद्दल सविस्तर परत कधी तरी ) त्यामुळे ह्यांच्या किती कच्छपी लागायचे ह्यावर चर्चा चालू होती . बाकी भाषांतर किंवा इतर नमूद केलेल्या प्रतिसाद पाहता ( तेही ह्यांच्या परम मित्राकडून ) नेम खरच चुकला ?का यु टर्न घेण्यात आला हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे . बाकी आता हि विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना अनुरूप त्या नुसार चर्चा व्हायला काहीच हरकत नसावी चीन व अमेरिका ह्यांचे अनेक मुद्यावरून वाजते .सगळ्यांना माहीत आहे कि अमेरिकेचा प्रमुख स्पर्धक चीन आहे . तरी अमेरिकन कंपन्या चीन मध्ये आपले युनिट हलवतात का बरे ? उत्तर सोपे आहे .नफा चीन हे जाणून आहे .म्हणूनच आपल्या राष्ट्रीय हितसंबंध जोपासत तो अमेरिका व तमाम जगाची वागतो . बाकी सविस्तर विकास ह्यांनी दिलेले मुद्दे वाचून . भारताने कुट नीती वापरत अमेरेकेला ठेंगा दाखवत अरेवा ह्या कंपनीशी संधान बांधले असा ओझरता उल्लेख मी माझ्या आधीच्या एका प्रतिसादावर केला होता .त्यावर सविस्तर पणे लवकरच लिहीन आमचे भिकार लेखन गोड मानून घ्या (वैचारिक मधुमेह झालेल्या प्रतिक्रियेचे व अंकांचा पाऊस पडणार्या प्रतीक्रीयेंचे स्वागत असेल .) अवांतर ( रशिया व फ्रेंच हे भारताच्या सर्व अटी मानून अणु भट्ट्या बांधतात असे एक वाक्य मी माझ्या एका प्रतिसादात लिहिले होते .ह्याचा अर्थ सरळ आहे कि भारताचा तो धोरणात्मक /राजकीय /आर्थिक /सामरिक विजय आहे .तरी सुद्धा भारतवार आम्ही गरळ ओकतो हे वाचून वाईट वाटले .) फक्त टिकोजीराव अमेरिकेच्या मनाप्रमाणे भारत अणुकराराच्या अटी ( नुकसान झाले तर भरपाई न देणे ) मान्य करत नाही आहे हे ह्यांना खुपते भोपाल सारखा पळ काढायला ह्यांच्या कंपन्यांना रान मोकळे हवे आहे . ह्या निम्मिताने भारताची विरोधी पक्षाने अणु कराराच्या वेळी जो विरोध केला त्याचा परिणाम म्हणूनच आज प्रत्यक्षात एकही अमेरिकन कंपनीशी अजून आपला करार झाला नाही आहे .त्यामुळे सरकावर करार करताना एक नैतिक दंड्पण होते .

सुधीर काळे 02/03/2011 - 07:59
निनाद आणि इतर 'मिपा'कर, काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यात 'मिपा'करांप्रमाणेच 'उपक्रम', 'मी मराठी' आणि 'मायबोली' येथील वाचकांनी मांडलेले मुद्दे वापरून (सहजरावांनी दिलेला शेराच्या तुकड्यावरून पूर्ण शेर शोधून) ई-सकाळवरचा लेख कांहींसा 'सजवला'ही आहे. आता सकाळच्या व्यापक वाचकवर्गाच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. (http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.htm) धन्यवाद.

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 13:58
आपण ( म्हणजे आपण सगळेच मिपाकर ) कोण? आपली लायकी काय? आपले मत काहीही असले तरी त्याने अमेरिकेला काय फरक पडतो. आणि आपले काही ही मत असले तरी भारतातले गूंड राजकारणी त्याला कवडीचे महत्व देणार नाहीत. असल्या वांझोट्या चर्चांना काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 19/02/2013 - 14:01
मिपावरचे गुंड संपादक अशा मताला कवडीचे महत्व देणार नाहीत. असल्या वांझोट्या प्रतिसादाला काय अर्थ आहे? किमानपक्षी चाललेल्या वांझोट्या चर्चेला, अशा भिकार प्रतिसादापेक्षा बराच जास्त अर्थ आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:06
उत्तम - आता माझे मत देतो. अमेरिकेसारखे मित्रराष्ट्र असावेच. खरे तर भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी तळ अमेरिकेला द्यावेत. त्यानी भारताचे बरेच प्रोब्लेम सुटतील.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 19/02/2013 - 14:24
भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी तळ अमेरिकेला द्यावेत. त्यानी भारताचे बरेच प्रोब्लेम सुटतील. उदाहरणार्थ? हे गंभीरपणे केलेले विधान आहे काय? की याही धाग्याचे काश्मीर करण्याचा विचार करुन प्रतिसाद दिला आहे?

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:04
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन चे माझे मत आहे. आणि हे आजचे नाही बर्‍याच वर्षापासुन चे मत आहे. आणि हे तळ फक्त अमेरिका असे नाही, अमेरिके बरोबर पश्च्चिम युरोप आणी ऑस्ट्रेलिया ला पण द्यावेत. फायदे - भारताचा संरक्षण खर्च कमी होईल. सीमे पलिकडच्या आक्रमणाची भीती रहाणार नाही, खास करुन चीन कडुन. - भारताला हजारो कोटी डॉलरची मदत मिळत राहिल दर वर्षी. - जवळ जवळ १-२ लाख असे सैनिक आणि त्यांची backend arrangement भारतात रहाणार असेल तर प्रचंड प्रमाणात tourism, foreign exchange भारतात येइल. - मध्यपुर्वेतला देश भारताचे क्रुड तेला वरुन black mailing करु शकणार नाही. - १-२ लाख actual personnel आणि ज्यांना शक्य आहे अश्यांची कूटुंबे आल्या मुळे, भारतात, त्यांना शाळा, हॉस्पिटल वगैरे उभारावी लागतील. त्यांचा पण फायदा होईल. - भारतातल्या विदारक गरिबी आणी दुष्काळ आदि परिस्थितिंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्या मुळे बर्‍याच अमेरिकन आणी युरोपियन स्वयंसेवी संस्था येतील. - एकूणच चांगली व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाझरेल. दर्जा बद्दल चा जो आपला "चलता है" हा दृष्टीकोण कमी होईल.

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:01
काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यात 'मिपा'करांप्रमाणेच 'उपक्रम', 'मी मराठी' आणि 'मायबोली' येथील वाचकांनी मांडलेले मुद्दे वापरून >>> मी उल्लेख करणारच होतो सकाळचा. सकाळचे पूर्वीचे अग्रलेख ( गेली कित्येक वर्ष मी सकाळ वाचत नाही, मुक्तपीठ मात्र वाचतो ) असेच असायचे, रोमानियाने काय करावे? नाटो बरोबर का चुक? अरे तुम्हाला विचारतो कोण?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 19/02/2013 - 14:07
आयला कोणी विचारत नाही म्हणुन एखाद्याने बोलुच नये काय? लोकशाही आहे राव. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. अमेरिकेकडे तारणहार म्हणुन बघण्याआधी अमेरिका प्रत्य्क्षात कशी आहे हे समजण्याचा लोकांना अधिकार आहे आणी ते समजावुन सांगण्याचा काळे काकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:11
अमेरिका हे अत्यंत चांगले आणि विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे असे मी वर लिहिलेच आहे. ह्या पुढे जाउन अमेरिकेला भारतात भरपुर लष्करी तळ द्यावेत असेही लिहिले आहे. बघुया आता दोन्ही सरकारे कीती लक्ष देतात माझ्या प्रामाणिक मता कडे

वेताळ 19/02/2013 - 17:24
खुपच छान विचार आहेत. आता अमेरिकेचे तळ ज्या ज्या देशात उभे आहेत त्याबद्दल आपण माहिती देली तर बरी होईल.अमेरिका आजवर पाकिस्तानला मदत देत आली,अफगाणिस्तानात तळ उभे केलेत पण काही सुधारणा दिसल्या नाहीत. उलट पाकिस्तानला आपल्या देशातील गावे परदेशाना विकायची पाळी आली आहे. त्याची भीक मागण्याची व्याप्ती मात्र खुप वाढली आहे.

In reply to by वेताळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:32
तो प्रोब्लेम पाकिस्तान आणि अफगणीस्तान चा आहे, त्याचा दोष अमेरिकेकडे देउन चालणार नाही. अमेरिकेचे तळ फिलीपिन्स मधे आहेत, जपान मधे होते/आहेत. तैवान मधे होते/आहेत. फायदा करुन घेणे त्या त्या देशावर अवलंबुन आहे. आपला benchmark जर पाकिस्तान आणि अफगणीस्तान असेल तर अल्ल्ला बचाये

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:34
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन चे माझे मत आहे. आणि हे आजचे नाही बर्‍याच वर्षापासुन चे मत आहे. आणि हे तळ फक्त अमेरिका असे नाही, अमेरिके बरोबर पश्च्चिम युरोप आणी ऑस्ट्रेलिया ला पण द्यावेत. फायदे - भारताचा संरक्षण खर्च कमी होईल. सीमे पलिकडच्या आक्रमणाची भीती रहाणार नाही, खास करुन चीन कडुन. - भारताला हजारो कोटी डॉलरची मदत मिळत राहिल दर वर्षी. - जवळ जवळ १-२ लाख असे सैनिक आणि त्यांची backend arrangement भारतात रहाणार असेल तर प्रचंड प्रमाणात tourism, foreign exchange भारतात येइल. - मध्यपुर्वेतला देश भारताचे क्रुड तेला वरुन black mailing करु शकणार नाही. - १-२ लाख actual personnel आणि ज्यांना शक्य आहे अश्यांची कूटुंबे आल्या मुळे, भारतात, त्यांना शाळा, हॉस्पिटल वगैरे उभारावी लागतील. त्यांचा पण फायदा होईल. - भारतातल्या विदारक गरिबी आणी दुष्काळ आदि परिस्थितिंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्या मुळे बर्‍याच अमेरिकन आणी युरोपियन स्वयंसेवी संस्था येतील. - एकूणच चांगली व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाझरेल. दर्जा बद्दल चा जो आपला "चलता है" हा दृष्टीकोण कमी होईल.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिका हे एक पक्के व्यापारी राष्ट्र आहे.असे तळ अमेरिकेला देणे म्हणजे आपल्या तंबूत आपण होऊन उंटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.अमेरिका जे काही करेल ते स्वतःच्या स्वार्थासाठी करेल. अमेरिका भारताच्या फायद्यासाठी काही करेल असे म्हणणे आणि वाटणेही मूर्खपणाचे आहे. समजा भविष्यात पाकिस्तान्/चीनने काही आगळीक केली तर आपण उत्तर द्यायचे की नाही/ दिल्यास कोणत्या स्वरूपाचे उत्तर द्यायचे यावरही अमेरिकेचेच नियंत्रण राहिल.आपल्याला पाकिस्तानला सणसणीत प्रत्युत्तर द्यायचे लाख वाटत असेल पण अमेरिकेचा त्याला विरोध असेल तर आपल्याला तसे करता येणार नाही.तेव्हा अशा प्रत्येक गोष्टीत आपण काय करावे यावर परकियांचे नियंत्रण राहणार असेल तर असंख्य लोकांनी स्वातंत्र्यासाठी उगीचच आपला जीव दिला असे म्हणावे लागेल. धन्य तुमची.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:04
अमेरिका भारताच्या स्वातंत्र्या नंतर भारताची चांगली मित्र होती. पाकिस्तान कडे बघत पण नव्हती. पण समाजवादाची आणि तिसर्‍या जगाचे नेतृत्व करण्याची जी हॉस आली भारताच्या पंतप्रधानाला. अश्या मुळे अमेरिका पाकिस्तान कडे ढकलली गेली. अजुनही भारतानी जर नीट प्रकारे अमेरिकेशी मैत्री केली तर ते पाकिस्तान ला वार्‍यावर सोडतील. कारण त्यांना जगाच्या ह्या भागात मित्र हवा आहे. भारतानी नाकारले म्हणुन पाकिस्तान झाला.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिका भारताच्या स्वातंत्र्या नंतर भारताची चांगली मित्र होती. पाकिस्तान कडे बघत पण नव्हती. पण समाजवादाची आणि तिसर्‍या जगाचे नेतृत्व करण्याची जी हॉस आली भारताच्या पंतप्रधानाला.
या संदर्भात वरच दिलेला प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/463035#comment-463035 आहेच. बाय द वे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर अमेरिका भारताचा मित्र होता हे नक्की कोणत्या आधारावर बोलता? एका आय.आय.टी ची स्थापना करण्यात अमेरिकेने मदत केला म्हणून?काश्मीरमधून पाकिस्तानने आपले घुसखोर मागे घ्यावेत यासाठी अमेरिकेने चकार शब्द काढल्याचे ज्ञात आहे तुम्हाला?
अजुनही भारतानी जर नीट प्रकारे अमेरिकेशी मैत्री केली तर ते पाकिस्तान ला वार्‍यावर सोडतील. कारण त्यांना जगाच्या ह्या भागात मित्र हवा आहे. भारतानी नाकारले म्हणुन पाकिस्तान झाला.
गेल्या विस वर्षात परिस्थितीत झपाट्याने फरक पडला आहे ही गोष्ट मान्य आहे.पण त्यात शीतयुध्दाची समाप्ती आणि रशियाचे विघटन, रशियाची अफगाणिस्तानातून माघार, पूर्व युरोपातून कम्युनिस्ट या कुजलेल्या विचारसरणीला लोकांनीच गाडले इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आणि बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेच्या दृष्टीने भारत हा अधिक उपयुक्त देश आहे म्हणून भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले आहेत आणि पाकिस्तान-अमेरिका संबंध बरेच बिघडले आहेत.यातूनच अमेरिका स्वतःच्या स्वार्थाचेच बघते हे स्पष्ट होतेच.आणि अशा स्वार्थी देशाचे सैन्य आणि सैन्यतळ आपल्या देशात कशाकरता?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:24
तळ कशाकरता हे मी दिलेच आहे वरती. आणि फक्त अमेरिका नाही, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया सुद्धा असे म्हणले आहे. अमेरिकेचे तळ पाहिजेत कारण जो आपल्या डोक्यावर चीन नावाचा बोका बसला आहे, त्याची ताकद भारता पेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे. त्याला थोडा जरी धाक दाखवायचा असेल तर दुसर्‍या बोक्याला आणुन बसवावे लागेल. तुम्ही देशप्रेमाचा गॉगल काढुन बघा की काय भीषण परिस्थीती आहे ते. सध्या चीन ला भारता बद्दल काही करायची घाई नाही. आत्ता जपान आणि तैवान त्यांच्या नजरेत आहेत. आणि भारताची लष्करी तयारी हळु हळु ढासळतच जाणार म्हणुन पण कदाचित वाट बघत असेल. पण काही वर्षात चीन अरुणाचल प्रदेश नक्की ताब्यात घेणार. फक्त कीती वर्षानी तेव्हडेच माहीती नाही.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकेचे तळ पाहिजेत कारण जो आपल्या डोक्यावर चीन नावाचा बोका बसला आहे, त्याची ताकद भारता पेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे. त्याला थोडा जरी धाक दाखवायचा असेल तर दुसर्‍या बोक्याला आणुन बसवावे लागेल.
पण हा दुसरा बोका कशावरून आपली बाजू घेईल हो?जर अमेरिकेच्या स्वार्थाच्या दृष्टीने त्यांना भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा असेल तर अमेरिका चीनचीच बाजू घेणार.आणि अशा अमेरिकेचे सैन्य आणि तळ भारतात आपणच बोलावायचे.जर चीनबरोबरचे युध्द जड जायला लागले तर सध्या निदान आपण त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकू शकू.यात आपलेही प्रचंड नुकसान होईलच पण शत्रूला जबरदस्त तडाखा द्यावा या उद्देशाने जे काही होईल ते होईल असे म्हणत असे काही करायचा पर्याय तरी आपल्याकडे आहे.आपली क्षेपणास्त्रे चीनी शहरांपर्यंत जाऊ शकतील असे वाचले आहे. (भारताविरूध्दचे युध्द जड जायला लागले तर पाकिस्तानही आपल्याविरूध्द अणुबॉम्बचा वापर करणार किंबहुना त्याच उद्देशाने पाकिस्तानने अणुबॉम्ब विकसित केले आहेत).जर अमेरिकेचे सैन्य भारतात असेल तर आपण काय करावे-- अणुबॉम्बचा वापर करावा की नाही हे अमेरिकन ठरवणार.आणि ते चीनच्या बाजूचे असले तर आपण मुकाट्याने काही न बोलता गप्प बसावे!! उत्तम.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:47
ज्याला पूर्ण युद्ध ( full scale War ) असे म्हणता येइल असे जर युद्ध झाले तर भारताकडे १० दिवस टिकुन रहाण्याइतकी पण सामुग्री नाही. युद्धाचा निकाल युद्धभुमी वर लागत नाही असे एक Art of War मधे वाक्य आहे. कारण युद्धाचा निकाल युद्धाआधी दोन्ही पक्षांची काय तयारी आहे ह्यावर लागतो. भारतानी त्याबाबतीतली ४० वर्षे वाया घालवली आहेत. १९७० पर्यंत भारत आणि चीन ची तयारी बर्‍यापैकी सारखी होती.

In reply to by प्रसाद१९७१

हो पण ही परिस्थिती अमेरिकेला भारतात सैन्यतळ स्थापन करायला देऊन कशी बदलेल्?माझे म्हणणे असे आहे की अमेरिकेला भारतात सैन्यतळ स्थापन करायला दिले तर आपली बाजू आणखी कमकुवत होईल.जे काही करायचे ते स्वतःच्या हिंमतीवर--आपला हात जगन्नाथ.आपले प्रश्न इतरांना बोलावून सुटणार नाहीत तर इतर लोक त्यात स्वतःचा स्वार्थ बघतील आणि आपल्या कटकटी अजून वाढतील त्याचे काय?

मदनबाण 19/02/2013 - 17:43
इतर देशांचे सैनिक अथवा नाविक तळ आपल्या देशात उभारुन स्वसंरक्षणात मांडलिकत्व पत्करण्यात काय हुशारी आहे ? त्या पेक्षा जसे अमेरिकेने केले आणि आत्ता चीन करतो आहे त्याच प्रमाणे आपणही इतर देशात स्वतःचे तळ उभारावेत असा विचार केलेला उत्तम. आपले नौदल सक्षम आहे, अगदी २०१२ ला जेव्हा व्हिएतनाम मधे आपले ओएनजीसी तेल उत्खनन करत होते तेव्हा आपण आपले नौदल तिथे पाठवण्याची तयारी राखुन होतो.(व्हिएतनाम गॅस फिल्ड मधे ओएनजीसीचा स्टेक आहे.) संदर्भ :- Indian navy ready to set sail to South China Sea Understanding India’s Interest in the South China Sea: Getting into the Seaweeds

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:54
आपले नौदल सक्षम आहे, अगदी २०१२ ला जेव्हा व्हिएतनाम मधे आपले ओएनजीसी तेल उत्खनन करत होते तेव्हा आपण आपले नौदल तिथे पाठवण्याची तयारी राखुन होतो.(व्हिएतनाम गॅस फिल्ड मधे ओएनजीसीचा स्टेक आहे.)>>> काय बोलणार? भारताच्या नेव्ही पेक्षा चीन ची नेव्ही १० पट मोठी आहे. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. हे वास्तव नाकारण्यात काही अर्थ नाही. आपण शहामृगासारखे वाळुत डोके घालुन बसलो म्हणजे वादळ येणारच नाही असे नाही. अहो भारता कडे तोफगोळा पण नाही १० दिवसांपे़क्षा जास्त दिवसाचा. तोफगोळे नाहीत म्हणुन रनगाडे आणि तोफांचा सराव पण करता येत नाही. ७०% विमाने ही अतिशय जुनी आहेत. आणि चीन चे विमानदल जगातले सर्वात मोठे आहे. चीन ची आर्मी भारताच्या ३ पट आहे. कीती gaps सांगाव्या तेव्हड्या थोड्या आहेत.

रमेश आठवले 19/02/2013 - 18:03
जगात सर्वात मोठे साम्राज्य स्थापन करणार्या इंग्लंड देशाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत असे म्हणतात -Her majesty’s government has no permanent friends or permanent enemies, it has only permanent interests.- हा राजनीतीचा सिद्धांत सर्व राष्ट्रांच्या बाबत लागू आहे. तरी अमेरिकेसाठी भारताचे वेगळे धोरण असण्याचे कारण नाही.

मदनबाण 19/02/2013 - 18:22
भारताच्या नेव्ही पेक्षा चीन ची नेव्ही १० पट मोठी आहे. हे तर सर्वांनाच ठावुक आहे. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. जरा विस्तारुन सांगाल तर ३-४ ज्ञानकण मी सुद्धा वाटुन घेइन म्हणतो. अहो भारता कडे तोफगोळा पण नाही १० दिवसांपे़क्षा जास्त दिवसाचा. तोफगोळे नाहीत म्हणुन रनगाडे आणि तोफांचा सराव पण करता येत नाही. ते तर कारगिल युद्धाच्यावेळी सुद्धा नव्हते,आयत्या वेळी साउथ आफ्रिकेतुन आयात केलेले शेल्स बोफोर्स तोफांसाठी वापरले गेले. चूक संरक्षण दलाची म्हणावी की ज्या मुठभर नेता मंडळींना आपण देशसेवा / संरक्षण करायला निवडुन दिले आहे त्यांची आहे ? जाता जाता :--- चीन फक्त ग्वादारमधेच नाही,तर तो कोकोआयलंडवर सुद्धा आहे. हो तेच कोको आयलंड जे कधी काळी हिंदुस्थानाचे होते,जे पंडित नेहरुंनी ब्रमदेश्(म्यानमार)ला दान देउन टाकले.तेच कोको आयलंड म्यानमारने चीनला भाड्यावर दिले जिथे आज चीन ने सिग्नल मॅनिटरिंग सिस्टीम बसवली आहे. जिचे काम अंदमान-निकोबार मधे होणारी भारतीय नौदलाची टेहाळणी करणे आहे.हे कोको आयलंड निकोबार आयलंड पासुन फक्त १८किमी अंतरावर आहे.

In reply to by मदनबाण

काळा पहाड 22/04/2015 - 14:24
तेच कोको आयलंड जे कधी काळी हिंदुस्थानाचे होते,जे पंडित नेहरुंनी ब्रमदेश्(म्यानमार)ला दान देउन टाकले.तेच कोको आयलंड म्यानमारने चीनला भाड्यावर दिले
हे नवीनच कळतंय. या विद्वान गृहस्थानं भारताचं आणखी किती नुकसान केलंय देव जाणे.

In reply to by काळा पहाड

मदनबाण 07/06/2021 - 16:16
हे नवीनच कळतंय. या विद्वान गृहस्थानं भारताचं आणखी किती नुकसान केलंय देव जाणे. त्याची बखर खाली मांडली आहे पहा :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:51
कारगिल युद्धाच्यावेळी
ह्याला युद्ध म्हणणे बरोबर होणार नाही. युद्ध खुप मोठी असतात. कार्गील लाच जर ही अवस्था झाली तर चीन बरोबर काय होणार. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. जरा विस्तारुन सांगाल तर ३-४ ज्ञानकण मी सुद्धा वाटुन घेइन म्हणतो. >> माझे म्हणणे इतकेच आहे की चीन ची तयारी आणि प्रचंड ताकद बघता ते सध्या काही घुसखोरी, युद्ध करत नाही ही भारतावर मेहरबानी च आहे.

मदनबाण 19/02/2013 - 23:05
ह्याला युद्ध म्हणणे बरोबर होणार नाही. विकिपिडीया चाळलात तर कारगिल युद्ध असाच उल्लेख सापडेल. चीन ची तयारी आणि प्रचंड ताकद बघता ते सध्या काही घुसखोरी, युद्ध करत नाही ही भारतावर मेहरबानी च आहे. २०१२ च्या रिपोर्ट नुसार नुसत्या उत्तराखंड मधेच चीनने ३७ वेळ खुसखोरी केली होती.तर २०१० पासुन ५०० वेळा चीनी सैन्य हिंदुस्थानची सिमा ओलांडुन आत आले आहे.

In reply to by नाना चेंगट

सुनील 21/02/2013 - 01:03
काय ठरलं मग?
निर्णय झाला की कळवतो! ठरल्यावर कळवू की मोडल्यावर? (म्हणजे, नो न्यूज इज गूड न्यूज की याऊलट?) ;)

विश्वासार्ह मित्रराष्ट्र ही संकल्पनाच आंतरराष्ट्रीय राजकारणात खुळेपणाची आहे. आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जपणे महत्वाचे... मग त्यासाठी वाट्टेल ते.

Rajesh188 05/06/2020 - 09:45
मित्र हा शब्द च इथे अयोग्य आहे. मित्र म्हणजे निस्वार्थी निखळ संबंध. अमेरिका काय कोणतेच राष्ट्र कोणाचे मित्र नसते. ही फक्त देवाणघेवाण असते. आणि सर्वात महत्वाचे दुबळ्या ना,कमजोर देशांना कोणीच मित्र नसतो. स्वतः चे हित जपण्यासाठी कोणता देश फायद्याचं आहे हे बघून संबंध जोडले जातात किंवा क्षत्रू चा शत्रू तो आपला मित्र असे पण बघितले जातात. भारताला जास्त मित्र हवे असतील तर पाहिले भारताला बलवान होणे गरजेच आहे.

शाम भागवत 05/06/2020 - 23:52
अमेरिका मैत्रीचा आव आणत असेल तर आपणही आव आणायला काय हरकत आहे? गिलगीट, बाल्टीस्तान परत मिळवताना अमेरिकेने मधे खो घातला नाही तर मैत्रीचा आव पुढे चालू ठेवायचा. एकदा का भारताच्या ताब्यात हा प्रदेश आला की, भारत अफगाणिस्तानशी जमिनीवरून जोडला जाईल. सैन्य पण या भागात म्हणजे गिलगीटमधे असल्याने केव्हाही अफगाणिस्तान मदत करता येईल. इराणमार्गे संबंध ठेवणे तसे जिकिरीचेच आहे. मुख्य म्हणजे चिनची गुंतवणूक अडकलेली असल्याने चीन खळखळाट करणारच. पण चिनचे या भागातून रस्त्यांमधील हितसंबंध जपण्याचे भारताने आश्वासन दिले तर, कदाचित चीन पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून देईलही. पण भारत व चिन वाटाघाटींमध्ये या प्रदेशामुळे भारत नेहमीच हुकमाचे पान राखून ठेवील. चीन आज जे महत्व पाकिस्तानला देतोय, ते महत्व भारताला यातून मिळू शकेल. आजतरी चीनची गुंतवणूक अडकून पडली आहे. ती मोकळी होणं किंवा मार्गी लागणं चीनच्या दृष्टीने प्राधान्यक्रमावर असेल. निदान आत्ताच्या आर्थिक संकटात तरी हा गुंता सुटण्याचा चीनला फायदा होऊ शकतो. भारत अफगाणिस्तानबाबत जबाबदारी उचलतोय म्हटल्यावर अमेरिकेला सगळे सैन्य काढून घेता येईल. याचा उपयोग ट्रंपसाहेबांना निवडणूक जिंकण्यासाठी होऊ शकतो. सैन्य माघारीचे आश्वासन ट्रंप यांनी मागच्या निवडणूकीच्या वेळी दिलं होतं. “करून दाखवलं” ची अमेरिकन आवृत्ती सादर होईल. शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करायला सगळे तयार असतातच अफगाणिस्तानमधे अमेरिकेपेक्षा भारताचे वर्चस्व असण्याला रशिया नक्कीच अनुकूल असेल. इतकेच नव्हे तर कझाग, उजबेक,ताजिक वगैरेंना अफगाणमार्गे थेट संबंध निर्माण करता येतील. तसं करणं त्यांनाही आवडेल. मला वाटते यांत फक्त पाकिस्तानचे नुकसान आहे. तशीही त्याची गरज संपलेली आहे. मग त्या अरब कंन्ट्रीज असो की अमेरिका. तुर्कस्तान सोडता सध्या त्यांच्याबाजूने कोणतेच मुस्लीम राष्ट्र उभे राहात नाहीये. आपली मोठी गुंतवणूक सुरक्षीत राहात असेल तर चीन फक्त गप्प बसला तरी भागण्यासारखे आहे. पाकव्याप्त काश्मीरमधे हवामानाचे अंदाज सुरू केल्यावर पाक बावचळलाच आहे. त्यासाठी चीनने सिमा प्रश्ण उकरून काढून पाकला जरा बरं वाटेल अशी हालचाल केली आहे. आता ही हालचाल मनापासून केलीय की, पाकिस्तानला गाफिल ठेवण्यासाठी ते माहीत नाही. कोरोना प्रकरण उद्भवलं नसतं तरच बरंच काही होणं शक्य होते. मुख्य म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताकडे आले तर आत्ताचे काश्मीर पुढारी संपून जातील. सगळाच डाव नव्याने मांडला जाईल. फास आवळत आणला गेला आहे. पण कोरोनामुळे आणखी आवळणे लांबवले गेलंय......................... असं सगळं माझं वैयक्तिक मत आहे.:) :)

आत्मशून्य 23/02/2011 - 23:23
परवा महाशय जे बोलले ते खरेच आहे "भारताचे मित्र कोण आहेत ? " (फेस्बूकवर वर पण कोणी नसावेत असे वाटते)

विकास 24/02/2011 - 02:08
या लेखातील विचार समजला पण त्यातील विश्लेषणाशी पुरेसा सहमत नाही. सर्वप्रथम एक जुनी आणि अशा विषयासंदर्भात कायम वापरात असलेला वाक्प्रयोग लक्षात ठेवावा असे वाटते: "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, कोणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. कायमस्वरूपी असतात, ते केवळ राजनैतिक संबंध. " आता अशा राजनैतिक संबंधांना जर कोणी "सलामत रहे दोस्ताना हमारा" असे समजू लागला तर कालांतराने, "मेरे दोस्त किस्सा ये क्या होगया, सुना है के तू बेवफा हो गया" असे म्हणत शेवटी, "दोस्त दोस्त ना रहा..." म्हणत बसावे लागेल. अमेरिकेचे आणि केवळ ब्रिटन आणि इस्रायलचेच नाही तर पश्चिम युरोपीय देश, कॅनडा, ऑस्ट्रेलीया, न्यूझीलंड, जपान, आदींचे मैत्रिचे संबंध आहेत असे म्हणता येईल. त्याला काही संदर्भात ऐतिहासीक कारणे आहेत. उ.दा. दुसर्‍या महायुद्धानंतरचा मार्शल प्लॅन, प. युरोपियन देशातून स्थायिक झालेल्यांची अधिक संख्या, संस्कृती आणि वर्णातील साधर्म्य वगैरे. पण त्यामुळे कधी ना कधी मैत्री सुरू होण्यास मदत झाली. ती दृढ होण्याचे कारण खर्‍या अर्थाने स्वतंत्र राष्ट्रे आणि विकसीत जनता हे होते. इस्त्रायलच्या बाबतीत येथील ज्यू जनतेची लॉबी ही खूप प्रभावी आहे. (किमान २-३ तरी)पिढ्यान पिढ्या अमेरिकन होऊनही, ज्यू समाजाला, स्वतःची संस्कृती आणि धर्माचे जन्मस्थान असलेला देश टिकला तरच टिकू शकू हे कडव्या अनुभवाने समजले असल्याने आणि स्वतःची तितकी पैशाने ताकद तयार केल्याने ते अमेरिका-इस्त्रायल हे मित्र राष्ट्र करू शकले. (याबद्दल अधिक बरेच बोलता येईल पण विषयांतराचा मोह टाळत आहे). कारण मैत्री ही तुल्यबळात होते. कशात तरी समान असणे गरजेचे असते... मात्र आपण दिलेली उदाहरणे पाकीस्तान, इजिप्त, बहारीन वगैरेंशी जरी दॄढ राजकीय संबंध असले तरी मैत्रीचे संबंध आहेत असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. पाकीस्तानला तर अमेरिकेने कधीतरी मित्र मानले असेल का ह्याबद्दल शंका आहे. त्यामुळे अमेरिकेचे टोप्या फिरवणे (जे कुठेही योग्य आहे असे मी म्हणत नाही), हे अमेरिकेच्या वेळोवेळीच्या सोयीच्या भुमिकांप्रमाणे घडत आले. कधी कम्युनिस्टांना रोखण्यासाठी तर बर्‍याचदा तेलासाठी त्यांनी या संबंधांना जपले आहे. त्यात झिया, मुशर्रफ, बिन लादेन अथवा सद्दाम सारखे सर्वच आले. सर्व हुकूमशहांची सत्तेला अमेरिकेने पाठींबा दिला आणि त्यांना (हुकूमशहांना) जम बसवता आला. तरी देखील तोंडदेखले का होईना अमेरिकेने तेथे देखील लोकशाही असण्याचेच समर्थन केले होते. आता पर्यायच नाही म्हणल्यावर हात झटकत आहेत. मात्र त्याचीच काळजी अमेरिकेतील विचारवंतांना देखील पडत आहे. कारण त्यामुळे इतर दोस्तराष्ट्रे दोस्त राहतील का नाही अशी काळजी त्यांना वाटत आहे. ते अमेरिकेचे मित्र झाले नाहीत, तर मिंधे झाले! आता आपण भारत-अमेरिकेच्या मैत्रीसंदर्भात विचार करूया. आपण कुठल्या वर्गवारीत स्वतःला बसवायचे? पाकीस्तान आदींच्या की प.युरोप आदींच्या? मी येथे प.युरोप आदींच्या हे उत्तर सर्वांचेच असेल असे गृहीत धरतो. या उत्तरात आपण अमेरिकेचे मिंधे होण्यापेक्षा आंतर्राष्ट्रीय राजकारणात जशी गरज आहे, तसे मित्र होऊ.

In reply to by विकास

विकास तुझ्या मुद्यांशी सहमत पण विचार कर ह्या वरील प्रगत देशांची अमेरिकेचे संबंध चांगले आहेत कारण त्या देशातील प्रशासन हे तुलनात्मक दृष्ट्या पारदर्शक व प्रगल्भ आहे .हेच त्यांच्या प्रसाकीय सेवाच्या बाबतीत म्हटले जाईन. आपल्याकडे व पाकिस्तामध्ये भ्रष्टाचार हा समान मुद्दा त्यात प्रादेशिक अस्मिता व वर्णव्यवस्था टिकून आहे .त्यामुळे हे झारीतील शुक्राचार्य आपल्या प्रशासनात प्रमाणाबाहेर . लुडबुड करतील .ह्याचा खरा इंटरेस्ट हे मध्यमवर्गीय बाजारपेठ . उद्या ह्यांचा व आपला राजनैतिक कारणावरून राडा झाला तर मागे देसाई ह्यांनी कोका कोला ला हद्दपार केले होते .तसे एकाकाकी जगतीकरांच्या काळात शक्य होणार नाहि चीन मध्ये एकच पार्टी एकच सरकार असल्याने ह्यांना अत्यंत कडवा विरोध करते . अमेरिकेला आपल्याला मित्र मानते .पण चीन जेवढ्या वेगाने प्रगती करेन त्याची भीती आपल्याला जेवढी आहे त्याहून अधिक अमेरिकेचे आशियातील बाजार उठेन ह्याची भीतीने जास्त आहे . भारतावर परकीय आक्रमण हा काही भारतीय जनतेला नवीन विषय नाहि , तेव्हा मित्र म्हणून येत असला तर भारत नोकर्या चोरतो वैअग्रे सवंग अप्रचार त्यांनी बंद करावेत .अफगाण प्रशि तालिबान शी चर्चा सो किंवा चीन विरुद्ध समुद्रात संयुक्त आघाडी असो .त्यांना आपली गरज आहे .(आपणच एका बापाचे आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाहि ) कारण आंतरराष्ट्रीय राजकारण शब्दाला जागणारे अशी आपली ख्याती आहे तेव्हा सत्तेसाठी आंधळ्या आपल्या नेत्यांनी सी आय ए चे हस्तक होऊ नये व झालात तर तेवढेच हस्तक रॉ चे अमेरिकन सिनेटर ने झाले पाहिजे . .

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 24/02/2011 - 02:42
एकंदरीत प्रतिसादाशी सहमतच. एक खुलासा: या उत्तरात आपण अमेरिकेचे मिंधे होण्यापेक्षा आंतर्राष्ट्रीय राजकारणात जशी गरज आहे, तसे मित्र होऊ. या माझ्या वाक्याचा अर्थ इतकाच आहे की सुरवातीस म्हणल्याप्रमाणे केवळ "राजनैतिक संबंध" या अर्थाने आपण मित्र होऊयात. कुठल्याही अर्थाने त्यांचे (अथवा कुणाचेच) मिंधेपण नको.

In reply to by विकास

सर्वप्रथम एक जुनी आणि अशा विषयासंदर्भात कायम वापरात असलेला वाक्प्रयोग लक्षात ठेवावा असे वाटते: "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, कोणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. कायमस्वरूपी असतात, ते केवळ राजनैतिक संबंध.
हेच बोलायला आलो होतो. विकासरवांनी जास्ती चांगल्या शब्दात लिहिले आहे. जर भारताचा फायदा होणार असेल (आणि तो नक्की होणारच आहे) अमेरिकेशी हात मिळवायला हरकत नाही. आणि हा जर कोणाला मिंधेपणा वाटत असेल तर तो मनुष्य धन्य आहे. सध्या आणि पुढे येणार्‍या परिस्थीतीत भारताला अमेरिकेसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ / बाजारपेठ या ठिकाणी शब्दाला प्रचंड किंमत असणार्‍या मित्राची फार बहुमोल मदत होणार आहे. आणि भ्रष्टाचारी वगैरे असले तरी आपले राजकारणी मुर्ख नक्कीच नाहीत. असो... बाकी चालु द्या...

आंसमा शख्स 24/02/2011 - 08:28
अमेरिका कधीच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. कोणत्या देशात त्यांनी काही चांगले काम केले आहे? सगळीकडे स्वार्थच पाहिला आहे. त्यांना लोकशाहीवर वगैरे काही घेणे नसून काय विकता येईल हे पाहण्यात रस आहे. आपला फायदा आपण पाहावा हे बरे.

In reply to by आंसमा शख्स

विकास 24/02/2011 - 09:32
अमेरिकन सरकारचे आंतर्राष्ट्रीय राजकारण, त्यांच्यातील कॉर्पोरेट हितसंबंध वगैरे विरुद्ध ढिगभर लिहीता येईल आणि त्याचे समर्थन करायचा प्रश्नच नाही. तसे आपल्याकडील राजकारणी आणि कॉर्पोरेट हितसंबंधांबद्दलही लिहीता येईल. मात्र, कोणत्या देशात त्यांनी काही चांगले काम केले आहे? सगळीकडे स्वार्थच पाहिला आहे. त्यांना लोकशाहीवर वगैरे काही घेणे नसून काय विकता येईल हे पाहण्यात रस आहे. असे म्हणणे टोकाचे ठरेल. आजच्या बाकी सुविधा आणि तंत्रज्ञाने जाउंदेत, पण इंटरनेट, सोशल मेडीया हे अमेरिकेतच तयार झाले. आज इंटरनेटच्या माध्यमामुळेच माहीती तंत्रज्ञानाची क्रांती झाली ज्यामुळे मध्यपुर्वेतील नवीन पिढीस आपण कशाला मुकलो हे कळले. ९/११ ला एका पद्धतीने अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरत अमेरिकेच्या द्वेषासाठी वापर केला गेला,तर आज १/११ (जाने/११) ला मात्र अमेरिकेचा द्वेष करत बसण्याऐवजी म्हणूनच त्यांनी स्वतःच्या देशात याच साधनांचा वापर करत लोकशाहीची मागणी केली. संपूर्ण जगाच्या ज्ञात इतिहासातील ही ऐतिहासीक घटना आहे. बाकी योग्यच कारणांसाठी नावे ठेवत असताना, या संदर्भात दुर्लक्षू नये इतकेच वाटते.

आंसमा शख्स 24/02/2011 - 08:30
लेख जरा कुठूनही कुठेही जातो आहे काय? मध्येच कंपनीने ठेवलेली बडदास्त आणि दिलेली जीप, झोप बहादूर वगैरे नसते तरी चालले असते. लेख मुद्देसूद झाला नाही असे वाचक म्हणून वाटले. तुमचे लिखाण सहसा असे नसते.

In reply to by आंसमा शख्स

सुधीर काळे 24/02/2011 - 20:21
आपल्या मुद्द्याची नोंद घेतली आहे. तो पटलाही. पण त्या युद्धामुळे त्यावेळेपासून मी राजकारणाबद्दलच्या वाचनात रस घेऊ लागलो एवढाच त्याचा संबंध होता आणि तिथे तेवढेच लिहायला पाहिजे होते. मनापासून धन्यवाद.

नगरीनिरंजन 24/02/2011 - 08:42
विकास आणि निनाद यांच्याशी सहमत. कोण स्वतःचा फायदा पाहत नाही? भारतानेही अमेरिकेशी मैत्री त्यांचा फायदा व्हावा म्हणून केलेली नाही तर आपला फायदा व्हावा म्हणून केलेली आहे. भारतात सध्या जो चमचमाट आणि लखलखाट दिसतोय त्यात अमेरिकेन बाजारपेठेत आपल्या सेवा आणि उत्पादने विकून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. जो पर्यंत असा आणि तंत्रज्ञान वगैरे इतर फायदा होत आहे तो पर्यंत अमेरिकेशी मैत्री करण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा. सध्यातरी असा फायदा मिळेल असा 'विश्वास' वाटण्यासारखे तेच एक राष्ट्र आहे.

अर्धवट 24/02/2011 - 09:51
>>हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी! हॅ हॅ हॅ.. क्या बोले काका.. एकदम बरोबर.. (भारतीय परराष्ट्रनिती जरा अजुन खंबीर होइल तर 'समोरच्याची दोन बोटेही घेउन यावीत हे उत्तम..) मला म्हैस मधली भाईकाकांची एक उपमा आठवुन गेली...

कुणी कितीही नाकारावे पण सध्याच्या सुशिक्षित भारतीय कुटुंबव्यवस्थेची मानसिक स्थिती अशी आहे की 'अंकल सॅम' च्या गावी "झुकझुक जाई आगीनगाडी...." च्या तालावर आपल्या बाळ्याला आणि ठकीला ते केव्हाही पाठविण्यास तयार असतात. त्या मागची भूमिका भारताने अमेरिकेबरोबर हस्तांदोलन करावे की नाही असे नसून ग्रीन डॉलर्सने निर्माण केलेली ती नशा आहे. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्या तरी ज्या त्या काळात त्यातल्या एखाद्या प्रक्रियेचा इतरांवर विशेष प्रभाव पडतो आणि त्यामुळे यातील एका घटकाला अनन्यसाधारण महत्व येते. आज ते महत्व आहे 'अर्थकारणा'ला. रशियाचे तुल्यबळ सामर्थ्य नष्ट झाल्यावर अमेरिका हाच एक सर्वसामर्थ्यवान (आर्थिक आणि लष्कर दोन्ही आघाड्यांवर) देश उरला आहे, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. तसे पाहिले तर अगदी लेनिन क्रांतीपासूनचा इतिहास चाळला तरी "लाल अस्वल" आर्थिकदृष्ट्या सॅम अंकलच्या इस्टेटीच्या तुलनेत कधीच सामर्थ्यवान नव्हते. पुढे तर रशियाची अनेक शकले झाल्याने जगात त्याचे जे प्रतिसाद उमटले वा परिणाम दिसून आले तीत आज अमेरिका हे एकमेव लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ राष्ट्र झाले आहे हे नि:संशय. या सर्व घडामोडीमुळे जगाचे अर्थकारणच बदलून गेले आहे. 'डॉलर' च्या खणखणाटाच्या आवाजावर अविकसित राष्ट्रांना आता कोणाचाच आधार राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर अमेरिका आणि युरोपमधील तिचेच सहायक प्रगत देश यांचा पगडा पूर्ण बसला आहे, हे अर्थतज्ज्ञांनीच सांगितले तरच समजते असे बिलकुल नाही. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार, मुक्त स्पर्धा, उदारीकरण, परवानाराज्य वगैरे आता परवलीचे बनलेले शब्द ही अमेरिकेची उपज असून जर ती भारताने स्वीकारली (स्वीकारली आहेच म्हणा...) तर मग अमेरिकेशी कुठल्या प्रकारची विश्वासार्हता मनी ठेवून हस्तांदोलन करायचे.....ते केलेच पाहिजे असे भारताने नक्कीच केले आहे. गेल्या दहा वर्षात इथे जो चकचकाट आला आहे, टोयोटो बेन्झच काय पण स्वप्नातदेखील पाहाण्याची भीती वाटाव्या अशा बीएमडब्ल्यू दिल्ली, मुंबईच्या रोडवर इकडूनतिकडून नखरेलपणाने सुळकन जाताना दिसतात त्याचे मूळ आम्ही अमेरिका हा 'गरजेतून निर्माण" झालेला विश्वासार्ह मित्र आहे हे मानल्या गेलेल्या मनोवृत्तीत आहे. आज अमेरिकेत असलेल्या भारतीयांची संख्या जवळजवळ २७ लाखाच्या पुढे गेली आहे; म्हणजेच एकून अमेरिकन लोकसंख्येतील एक टक्का भारतीयांचा आहे. शिवाय ज्या वेगाने इथले तरूण-तरूणी तिथल्या कार्पोरेट दुनियेत आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवित आहेत ते पाहता अमेरिकाही प्रसंगी राजकारणाचा मुद्दा गौण मानून अर्थकारणाला 'प्रायॉरीटी' देणार हे सांगण्यासाठी कुठले पंचांग धुंडाळण्याची गरज नाही. आशिया,आफ्रिका खंडात सातत्याने राजकारण बदलत (त्याची कारणमीमांसा शेवटी आर्थिक हालचालच आहे) असले तरी भारतासारखा सातत्याने 'लोकशाही' प्रणालीवर दृढ विश्वास ठेवणारा देश कधीही लष्करी राजवटीखाली येणार नाही हे अमेरिकाच काय पण चीनी ड्रॅगनही ओळखून असल्याने असला भक्कम पाया असलेला देशही आपल्या मैत्रीत असावा असे ओबामाच काय पणे जॉन केनेडीपासूनच्या सर्व राष्ट्रपतीनी मान्य केले होते. त्यामुळे हे हस्तांदोलन म्हणजे "तुझे माझे जमेना, परी तुझ्यावाचून करमेना..." या पठडीतील आहे...आणि तसेच राहील. इन्द्रा

सहज 24/02/2011 - 10:36
बर्‍याच जाणकारांनी आपले मत मांडले आहेच त्यामुळे इतकेच म्हणतो. खुदी को कर बुलन्द इतना कि खुदा बन्दे से पूछे 'मज्याशि मयत रि कर्न्र क?'

मदनबाण 24/02/2011 - 10:52
हिंदुस्थान ही महासत्ता आहे हा साक्षातकार अचानक अमेरिकेला कसा काय झाला ? अचानक आपली मैत्री त्यांना महत्वाची का वाटु लागली ? आपल्या बरोबर त्यांचे असलेले संबंध एकदम बदलावेसे का वाटु लागले आहेत ? या सर्व प्रश्नांचे एकमात्र उत्तर आहे, ते म्हणजे चीन !!! हो, चीन ने अमेरिकेचेचे धोरण सार्थपणे राबवले... ते म्हणजे समुद्रावरील महासत्ता होणे. अमेरिकेचे विविध देशात असलेले मिलेटरी आणि नाविक तळ हेच त्यांचे मोठे सामर्थ्य होते, हो होते कारण आता त्याला चीन ने सडोतोड उत्तर दिले आहे. आधी आर्थीक स्तरावर आणि नंतर मिलेटरी स्तरावर चीन ने यशस्वी बाजी मारली आहे, आणि त्याचीच मोठी चिंता अमेरिकेला लागली आहे, त्यांची झोप उडाली असुन त्यांना अनेक चिंता त्रस्त करु लागल्या आहेत. त्यातली सर्वात मोठी चिंता म्हणजे जपान मधे असलेले अमेरिकेचे नाविक तळ. हे नाविक तळ नक्की कुठे आहेत बरं ? तर त्यांची स्थाने आहेत :--- मिसावा,योकोसुका,मायझुरु,कुरे,सासेबो.( उच्चर चुकीचे लिहले असल्यास क्षमस्व) आता ही जवळ पास सर्व स्थाने चीनच्या घातक मिसाईल रेंज मधे आली असुन... अमेरिकेचे चीन वरचे इतके वर्ष असलेले सागरी दबाव तंत्र कमकुवत झाले आहे. अमेरिकेचे महत्वाचे युद्धपोत इथे असतात आणि त्यांची मारक क्षमता ही उत्तम दर्जाची आहे,पण चीनने आघाडी घेतल्यामुळे सागरी महासत्तेचे स्थान आता चीनकडे जात असुन अमेरिकेला याच गोष्टीची मोठी धडकी भरली आहे.थायलंड,श्रीलंका किंवा पाकिस्तानचे ग्वादार असो... चीन सगळीकडे मोठ्या महत्वाकांक्षेने हात पाय पसरवत आहे... आणि त्यामुळे अमेरिकेची चिंता पराकोटीला पोहचली आहे. चीनी युद्ध तज्ञांच्या निती नुसार युद्ध झाल्यास आधी शत्रु चे डोके नष्ट करावे म्हणजे शरीर अपोआप लुळे पडते !!! त्यामुळे चीनची युद्ध निती ही शत्रुच्या प्रदेशातच युद्ध करुन आपल्या भूमीपासुन लांबच ठेवुन शत्रुवर आक्रमण करावे असे असावे... तसेच पहिला हल्लाच इताका मोठा आणि घातक क्षमतेचा करावा की ज्याच्यावर हल्ला केला आहे त्याची वाताहत होइल. उदा. जर चीनने हिंदुस्थानवर हल्ला केला ( जी त्यांची ठरलेली निती आहे असे म्हणतात...या बद्दल जालावर वाचा.) तर आपल्या महत्वाच्या अणुकेंद्र, नेव्ही आणि एयरफोर्स बेस,तेल साठे तसेच महत्वाचे रेल्वे आणि वाहतुक मार्ग नष्ट करणे हे चीनचे प्रथम उद्दिष्ट राहिल. जपानच्या या सर्व महत्वांच्या अमेरिकी बेसचा चीनने अगदी सखोल अभ्यास केला असुन, त्यांनी त्याप्रमाणे आपली निती आखली असावी असा अंदाज आहे. माझ्या वाचना नुसार जपानमधला योकोसुका हा तळ मोठ्या आकाराच्या नौका / युद्ध नौका दुरुस्त करणारा आहे, अर्थातच त्यामुळे त्याचे फार महत्व आहे.सासेबो हा अमेरिकेचा दुसरा मोठा नाविक तळ चीनच्या सर्वात जवळ आहे हे (बिजींग) व्यवस्थित जाणुन आहे. अमेरिकीची सागरी निती आता बदलत असुन त्यांच्या नौकांना जास्त सुरक्षित तळाची गरज भासते आहे ज्याचे मुख्य कारण चीन आहे. थोडक्यात अमेरिकेला आपले स्थान बळकट करण्यासाठी हिंदुस्थानच्या मैत्री शिवाय दुसरा पर्याय उरला नाही. जाता जाता :--- आपली परिस्थीती काय तर :--- विंध्यगिरी बुडाली !!! :(

In reply to by मदनबाण

मदनबाण 14/08/2013 - 11:36
मागच्या वेळी विंध्यगिरी बुडाली होती, आज आपली INS सिंधुरक्षक या पाणबुडीला जलसमाधी मिळालीय ! काय चाललयं काय नक्की ? नौदलाची ही अशी स्थिती का झाली आहे ते कळत नाही, परंतु हे अत्यंत चिंतेचे कारण आहे ! अशा प्रकारे कुठल्याही युद्धात जलसमाधी न मिळता डॉकवर यांना जलसमाधी मिळत असेल तर हे परिस्थीती गंभीर असल्याचेच लक्षण दिसुन येते.

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/12/2016 - 06:37

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/12/2016 - 07:03
जपान मधे असलेले अमेरिकेचे नाविक तळ. हे नाविक तळ नक्की कुठे आहेत बरं ? तर त्यांची स्थाने आहेत :--- मिसावा,योकोसुका,मायझुरु,कुरे,सासेबो.( उच्चर चुकीचे लिहले असल्यास क्षमस्व) आता ही जवळ पास सर्व स्थाने चीनच्या घातक मिसाईल रेंज मधे आली असुन... अमेरिकेचे चीन वरचे इतके वर्ष असलेले सागरी दबाव तंत्र कमकुवत झाले आहे. अमेरिकेचे महत्वाचे युद्धपोत इथे असतात आणि त्यांची मारक क्षमता ही उत्तम दर्जाची आहे,पण चीनने आघाडी घेतल्यामुळे सागरी महासत्तेचे स्थान आता चीनकडे जात असुन अमेरिकेला याच गोष्टीची मोठी धडकी भरली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval community

विजुभाऊ 24/02/2011 - 10:58
अमेरीकेच्या या चतुरपणामागे एक सर्वात मोठी गोष्ट आहे की आत्तापर्यन्त एकही युद्ध अमेरीकेच्या भूमीवर लढले गेलेले नाही. भौगोलीक दूरत्वामुळे सामान्य अमेरीकन नागरीकाला युद्धाची प्रत्यक्ष झळ बसलेली नाही . ( अपवाद ९/११). एकही भांडखोर शेजारी नसलेल्या वेळेस अमेरीकेला हा फायदा प्रत्येकेवेळेस मिळत आलाय. पाकिस्तानबद्दल जितकी धरसोड अमेरीकेने केली तितकीच पाठीराखण सौदी राजवटीची केली आहे. कारण अमेरीकेचे तिथले आर्थीक हितसंबन्ध. मध्यपूर्वेत कितीही उठाव झाले तरी सौदीत ते होनार नाहीत. याची खात्री अमेरीकेचे कट्टर शत्रु देखील देतील. मुद्दा हा आहे की भारताने अमेरीकेचे वर्चस्व कशासाठी मानायचे? वाजपेयी सरकारने केलेल्या अणूस्फोटानन्तर अमेरीकेने भारतावर कितीतरी निर्बन्ध लादले ; पण सर्वसामान्य भरतीय नागरीकाला त्याची काहीच झळ पोचली नाही. उत्तरकोरीयाने थेट धमक्या दिल्या तरी अमेरीका तेथे काहीच कारवाई करणार नाही. कारण तेथे सैन्य गुंतवून घेण्यात अमेरीकेला काहीच स्वारस्य नाही. चिन अमेरीकेला जुमानत नाही .अमेरीका त्यांचा व्यापारही थांबवू शकत नाही. बंधने लादूनही चिन चे अमेरीक काहीही वाकडे करु शकलेले नाही. पिण्याचे पाणी सुद्धा आयत करणार्‍या अमेरीकेतील युद्धसामुग्रीचे कारखाने सुरळीत चालावे म्हणून अमेरीका इतरांवर वेळोवेळी युद्धे लादत आलेली आहे . अफगाण सीमेवरील वजिरीस्तान प्रांतात अमेरीकेला अद्याप काहेच करत आलेले नाही .ओसामा ला पकडण्यात आलेले अपयश हे मुद्दाम निर्माण केले गेलेले आहे . अमेरीका कोणाचाच मित्र देश असू शकत नाही

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 08/12/2016 - 21:57
अमेरिकेचे मेक्सिको विरुद्ध टेक्सास प्रांताच्या मालकीबाबत १८४६ ते १८४८ दरम्यान युद्ध झाले होते. तसेच अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभागाला सुरुवात त्याच्या ताब्यातील हवाई बेटावरील पर्ल हारबर नाविक तळावर जपान ने १९४१ साली अचानक हल्ला केल्या नन्तर झाला.

साधामाणूस 24/02/2011 - 21:28
श्री. काळे साहेबांनी दिलेल्या उदाहरणांवरून निश्चितच खात्री पटते की अमेरिका हा कुणाचा विश्वसनीय मित्र असू शकत नाही. तरीही शत्रूचा(चीन) शत्रू तो मित्र या न्यायाने कामापुरतीच मैत्री त्यांच्याशी ठेवावी. याचा अर्थ असा नव्हे की चीनविरुध्द्च्या युध्दात अमेरिका आपली मदत करील. ते कदापि होणे नाही. पण शांततेच्या काळात आपण (अणूकरार्,उच्च तन्त्रज्ञान, काही युध्द्सामग्री, नैतिक पाठिंबा(moral support)यासारखे) काही फायदे उपटू शकतो. अवांतरः "आंतर्राष्ट्रीय राजकारणात, ......................केवळ राजनैतिक संबंध. "मला वाटते 'राजनैतिक संबंध' ऐवजी राष्ट्रीय हितसंबंध हा शब्द योग्य असावा. कारणAccording to wikipedia, Lord Palmerston (Henry John Temple) said: "Therefore I say that it is a narrow policy to suppose that this country or that is to be marked out as the eternal ally or the perpetual enemy of England. We have no eternal allies, and we have no perpetual enemies. Our interests are eternal and perpetual, and those interests it is our duty to follow." This is often paraphrased as: "Nations have no permanent friends and no permanent enemies. Only permanent interests." Source(s): wikipedia.org : http://en.wikipedia.org/wiki/Friendship#cite_note-19

मदन बाण ह्यांचे विशेष आभार मी ओझरता उल्लेख केला त्या मुद्यावर आपण सविस्तर मत मांडले. अमेरिकेला भारताची बाजारपेठ हवी आहे .हे सर्वश्रुत आहे .पण इतर उत्पादन जश्या गाड्या किंवा टेली कम्युनिकेशन किंवा तेल आणि उर्जा ह्यात अनुक्रमे सौथ कोरिया / ब्रिटन (वोडाफोन )/ आणि परत ब्रिटन नुकताच बिपी आणि रिलायंस चा महाकरार. ह्यात असे दिसून येते .कि भारतची ब्रिटन मध्ये २ र्या क्रमांकाची गुतंवणूक आहे .तर इस्त्रो नासाचे छोट्या उपग्रह प्रेक्षेपण करण्याचे मार्केट खाऊ पाहत आहे .तेव्हा भारत हा काही अमेरिकेच्या अमर्याद पाठीब्यांवर मोठा होत नाही आहे .त्याचे विकासाचे जे मॉडेल आहे .ते संथ आहे पण स्टेडी आहे त्यानुसार होत विकास होत आहे .
अमेरीकेच्या नादान पणामुळे अफगाण युद्ध सुरु झाले ..इराक युद्ध सुरु झाले .परवा लोकसत्ता मध्ये
छान लेख होता .येथे २००३ नंतर प्रचंड वेगाने जगात शस्त्रास्त्रांचा बाजार वाढला( भारत शस्त्र खरेदित सौदि नन्तर दुसर्या क्रमांकावर आहे .. जगातील पहिल्या १०० शस्त्र कारखान्यात ४० अमेरिकेचे व त्यात पहिला अमेरिका व दुसरा युके चा आहे (म्हणून तर दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरु झालीत .) आज अमेरिका मदन बाण ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जगभर पोलीस पाटीलकी करत आहे ,म्हणून हिंदी महासागरात चीनला उचाकावत आहे .परिणाम प्रचंड वेगाने चीनचे शस्त्रसज्ज होणे .(व प्रर्यायाने भारताचे......... ) अमेरिकेशी मैत्री बरोबरीच्या नात्याने व्हावी असे मला वाटते. कारण त्यांना आपली गरज जास्त आहे .युरोप आता युरोपियन संघातर्फे एकत्र आला आहे .त्यांची धोरण हि आता बर्याच प्रमाणात स्वयंपूर्ण असतात आशियात चीन हा एक समर्थ पर्याय आहे .रशिया आपले अस्तित्व राखून आहे .अश्या परीस्थित भारताने जगातील सर्व देशांची विशेतः युरोपियन युनियन व अरब जगतात स्वताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे . चीनने स्वतचे स्थान अमेरिकेशिवाय निर्माण केले .आज भारताला स्वताचे स्थान अमेरिकेच्या मदतीने करायचे आहे .पण त्याच बरोबर इतर प्रगत राष्ट्रांची सलोखा राखणे गरजेचे आहे . सध्यातरी आपले राजकरणी योग्य चाल खेळले आहे .अमेरिकेशी अण्वस्त्र करार केला .ह्या करारच्या संमतीसाठी अण्वस्त्र गटांची सहमती मिळवली .मात्र ज्या कारणासाठी करार झाला (अमेरिकन कंपन्यांना भारतीय अण्वस्त्र बाजारपेठ ) ते आपल्या हुशार राजकारण्यांनी बाजूला ठेवून रशिया /फ्रेंच /केनेडा शी अण्वस्त्र करार केले .ह्यात फ्रेंच कंपनी अरेवा सोबत महत्वाकांशी प्रकल्प घोषित केला .( म्हणजे फ्रेंच तुपाशी अनु अमेरिका उपाशी ) अर्थात ह्याचा अर्थ सगळेच आलबेल नव्हते .आपल्या हातून अमेरिका प्रेमात काही प्रमाद घडले . आंतरराष्ट्रीय राजकारणात इराण आपला २ र्या क्रमांकाचा तेलपुरवठा करणारा देश .त्यांच्या विरुध्ध सयुंक्त राष्ट्रसंघात नुकतेच तटस्थ राहणे. /तेल प्रश्नावर अमेरिकन दबावामुळे भारताला इराण बरोबर पेच प्रसंग निर्माण झाला तेव्हा .ह्यातून आपण कसेबसे निभावून नेले .बाकी खुदी को कर बुलंद इतना हि म्हण भारताच्या राजकारणी व जनतेने ओळखली पाहिजे . भारत अजूनही शस्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण नाही आहे ७० % शत्रे आपण आयात करतो .मात्र भारतच्या १ वर्षा नंतर जन्मलेले ज्यू राष्ट्र अत्यंत प्रतिकूल परीस्थित शत्रास्त्राच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्ण झाला नाही तर आता तो जगातील प्रमुख निर्यातदार आहे .(नुकतेच भारताला शस्त्र विक्रेता म्हणून फ्रेंचांना मागे टाकून त्यांनी २ क्रमांक पटकावला ) हि आपल्या साठी शरमेची गोष्ट आहे . आपले राजकारणी मुर्ख नाही तर दीड शहाणे आहेत . पूर्वी आपण रशियाशी जवळकीचे संबंध होते .म्हणजे नक्की कसे होते ? आपण खुलेआम त्यांच्या कळपात नव्हतो .मात्र उगाच त्यांच्या नादी लागून प्रगत राष्ट्रांशी दुरावा निर्माण केला. रशिया अफगाण मध्ये शिरली .तेव्हा आपली नक्की भूमिका काय होती .? आय एस आय व सी आय ए चे मधुर संबंध निर्माण होत होते .तेव्हा आपण काय करत होतो? .(राजकारणी झोप काढत होते .व नुकत्याच निर्माण झालेल्या पाकिस्तान प्रणीत व अमेरिकन पैशावर पोसलेला दहशतवाद पंजाब व काश्मीर मध्ये थैमान घालत होता .) आज देखील अमेरिका कोंडीत सापडली आहे .पाकिस्तान त्यांना देवीस प्रकरण असो व दहशतवादाविरुध्ध युद्ध त्यात सपशेल गंडवत आहे. अश्यावेळी अमेरिकेवर दबाव टाकून काश्मीर व अफगाण प्रसंगी ठोस पाऊले उचलायची सोडून राजकारणी मंडळी घोटाळा घोटाळा खेळत आहेत . आज रशियाची भूमिका अमेरिकेला साकारायला बघत आहे .. ते शस्त्र विकणार नि आम्ही मजबूत पैसा देऊन विकत घेणार संरक्षण मंत्री एन्थोनी ह्यांनी काही वर्षांपूर्वी'' भारताला जास्तीजास्त प्रमाणात शस्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण करणार'' असे म्हटले . म्हणजे नक्की काय केले? .अजूनही ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या होतच आहे .(फक्त नवीन गोष्टी जश्या सुपर सोनिक शेपानास्त्र किंवा ५ व्या पिढीचे लढाऊ विमान आपण संयुक्त रित्या बनवत आहोत व त्या जगात क्रमांक १ च्या असून दोन्ही देशांना स्वस्तात पडणारा सौदा आहे .अर्थात गेली गेली दशके असे संयुक्त प्रकल्प राबवायला आमचे राजकारणी झोपले होते का ? आताही ओबामा ह्यांनी उच्च तंत्रज्ञानाचे निर्बंध उठवले . का ? ह्यांना आपली बाजार पेठ हवी आहे .( पण भूमिका विक्रेत्याची असणार .संयुक्त प्रकल्प राबवायचे नाव नाही . .) रशिया व फ्रेंच अणुभट्टी निर्मितीत भारताशी जमवून घेतात ..भारताच्या अटी मानतात . अमेरिकन कंपन्या मात्र दुर्घटना झाली तर जबाबदारी घ्यायला टाळतात .(येथेच अजून त्यांचे घोडे अडले आहे .व अरेवा ने मागाहून बाजी मारली ) मग ह्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या . गंमत मात्र स्वताच्या देशात मात्र बिपी कडून दाम दुपट्टीने दुर्घटनेचा पैसा वसूल करत आहे स्वताचा हात दगडाखाली आहे .पाकिस्तान व्यवस्थित चुना लावत आहे . अमेरीकेचा आशियात सर्वात भरवश्याच्या मित्र हा भारत आहे (म्हणूच नैसर्गिक मित्र म्हणवतात. ) मात्र आपल्याशी वागतांना मात्र उपकार केल्यासारखे वागतात . आज अमेरिकेच्या मैत्रीमुळे आखतात आपल्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या .नाटो राष्ट्रात आपली प्रतिमा उंचावली .शेजारी भारताला जास्त मदत मिळते म्हणून अमेरिका विरोध वाढला .ह्या जमेच्या बाजु मात्र अश्या परीस्थित अमेरिकेशी मैत्री करताना रशिया व इराण शी संबन्ध दुरावू नये असे वाटते .

हुप्प्या 24/02/2011 - 22:21
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेच्या मागे जायचे का रशियाच्या असे दोन पर्याय होते. तेव्हा नेहरूंनी आपल्या बावळट समाजवादी विचारांनी भारून गेल्यामुळे रशियाचा पदर पकडला. अमेरिका भारताशी संबंध जु़ळवायला उत्सुक असतानाही नेहरूंनी दाद दिली नाही. आणि मग नवी समीकरणे बनली. एक तृतीयपंथी नॉन अलाईन्ड गट स्थापन करायचा भारताने एक प्रयत्न केला खरा पण स्वतः रशियाच्या ताटाखालचे मांजर बनून तटस्थतेच्या गप्पा करायचा प्रयोग फार चालला नाही. भांडवलशाही अमेरिकेच्या हातातले बाहुले बनायचे का कम्युनिस्ट रशियाच्या हातातले असे दोनच पर्याय होते. आपल्या नेत्यांनी त्यांना योग्य वाटेल ते केले. परिणाम दिसतातच आहेत. तेव्हा एका हाताने टाळी वाजत नसते. निव्वळ अमेरिकेला दोष देऊन चालणार नाही. अमेरिकेची धोरणे लोकांपेक्षा लॉब्या जास्त ठरवतात. विशेषतः परदेशी धोरणे. तेव्हा व्यावसायिक फायदा हे जास्त महत्त्वाचे असते. लोकशाहीचा प्रसार वगैरे बाजार गप्पा म्हणून ठीक आहेत. पण धोरणे म्हणून नाहीत. सोव्हियत रशियाने काय मोठे दिवे लावले आहेत? अकारण अफगाणिस्तानवर हल्ला करून तिथे कब्जा केला. इराक इराणच्या दीर्घकाळ चालणार्‍या युद्धात आपले हात धुऊन घेतलेच की. धुतल्या तांदूळासारखे स्वच्छ असे आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण आहेत? असले तर त्यांच्याकडे काही शक्ती नाही ह्याची खात्री बाळगा.

In reply to by हुप्प्या

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेच्या मागे जायचे का रशियाच्या असे दोन पर्याय होते. तेव्हा नेहरूंनी आपल्या बावळट समाजवादी विचारांनी भारून गेल्यामुळे रशियाचा पदर पकडला. अमेरिका भारताशी संबंध जु़ळवायला उत्सुक असतानाही नेहरूंनी दाद दिली नाही. आणि मग नवी समीकरणे बनली.
हा प्रतिसाद वर्षभरापूर्वीच देणार होतो पण त्यावेळी मला इतके चांगले मराठी लिहिता येत नव्हते आणि मी नुसते वाचायचे काम करत होतो.हा धागा वर आणल्याबद्दल मदनबाणांना धन्यवाद. वाटलेच होते नेहरूंवर विनाकारण आगपाखड कोणीच कशी केली नाही!!पाकिस्तानच्या निर्मितीत चर्चिलचा वाटा किती मोठा आहे हे कदाचित तुम्हाला सांगायची गरज नसेल.चर्चिल हा मनुष्य पक्का भारतद्वेष्टा होता.महंमद अली जीना लंडनमध्ये असताना त्यांना चिथावून पूर्वाश्रमीचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते जीना पूर्ण बदलले आणि हे काम केले चर्चिलने.तेव्हा पाकिस्तान हे एका अर्थाने इंग्रजांने निर्माण केलेला देश होता.तसेच फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नितीलाही मुस्लिम लीगचे नेते बळी पडले होते, काँग्रेसचे नाही.त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासूनच इंग्लंड आणि मित्रपक्ष म्हणून अमेरिकेचा कल भारतापेक्षा पाकिस्तानकडे राहणार हे नक्कीच होते.तसेच १९४७ मध्ये अमेरिकेला रशियातील कम्युनिझम दक्षिण आशियात पसरेल अशी भिती वाटत होती.तसेच त्याकाळी रशिया तर कम्युनिस्ट होताच आणि चीनमध्ये यादवी सुरू होती तेव्हा तो देशही कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल अशी भिती अमेरिकेला वाटणे साहजिक होते.तेव्हा याला तोंड द्यायला म्हणून अमेरिकेला दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व (लष्करी तळ वगैरे) असावे असे वाटणेही साहजिक होते.आणि असे करायला नेहरूंचा भारत आपल्याला अशी परवानगी कदापि देणार नाही पण तसे करायला पाकिस्तानच आपल्याला मदत करेल हे अमेरिकेला कळले नसेल असे म्हणणे अत्यंत बाळबोध आहे.तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून अमेरिकेने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचीच बाजू घेतली होती.आणि तसे होणार हे नेहरूंना कळले नसेल असे कोणत्या आधारावरून वाटते? तेव्हा सुरवातीपासून आपल्याला अमेरिकेपेक्षा रशियाबरोबर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जरा नेहरूद्वेष हा चष्मा काढलात तर या गोष्टी अगदी सहज दिसून येतील.

शेखर काळे 25/02/2011 - 03:38
सुधीर, तुम्ही जी ऊदाहरणे दिली आहेत, ती सारी हुकुमशहा आणि अशा नेत्यांची आहेत जे सगळे अमेरिकेच्या आर्थिक व सैनिकी मदतीवर अवलंबून होते. भारताची बाजारपेठ अमेरिकेला हवी आहे. इंग्रजही व्यापार करायलाच आले होते. आपला इतिहास लक्षात ठेऊन आणि डोके वापरून भारतीय नेत्यांना आपल्या पदरात अनेक सवलती पाडून घेता येतील. तसे ते करतात आहेतच असे गेल्या काही वर्षांतल्या घटनांवरून वाटते आहे. भारत अनेक बाबतीत स्वावलंबी आहे - हे सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीच्या अनुभवावरून दिसते. भारतिय आर्थिक व्यवस्था ही भारताच्या अर्थमंत्री व त्यांच्या सल्लगारांनी संयम वापरून हळू हळू खुली करत आणल्यामुळे तशी ती संरक्षीत राहिली आहे.

In reply to by शेखर काळे

सुधीर काळे 01/03/2011 - 13:48
मागे आणखी एका चर्चेत प्रतिसाद देतांना मी म्हटले होते कीं भारतीय अर्थव्यवस्था उत्पादनाच्या क्षेत्रावर (manufacturing sector) जास्त आधारित असून सेवेच्या क्षेत्रावर (service sector) कमी आधारित आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचा आपल्यावर तितका प्रभाव पडला नाहीं जितका इतर विकसित देशांवर पडला. त्याशिवाय पहिल्यापासून आयातीपेक्षा स्वतः उत्पादन करण्याकडे आपला कटाक्ष होताच. त्यामुळे पद्मिनी-अँबॅसडरसारख्या निकृष्ट प्रतीच्या गाड्या चालवायची आपली मानसिक तयारी झाली होती. मारुती-८०० ने ती बदलली. पण आजही मारुती चे जवळ-जवळ १०० टक्के भाग (components) आपण भारतातच बनवतो. 'परमिटराज'ची ही देणगी अप्रत्यक्षरूपाने आपल्याला उपयोगी पडली आणि आजही उपयोगी पडत आहे. (प्रत्येक कंपनीत Import Substitution Cell असायचीच.) रशियाने आपल्याला शस्त्रास्त्रें विकताना इथे त्यांचे उत्पादन करण्याबाबत तयारी दाखविली. कदाचित् म्हणूनच आपण बहुतेक सर्व सैनिकी कंत्राटें रशियाबरोबर केली मग ती 'मिग' विमानांबद्दल असो वा इतर अशीच शस्त्रास्त्रसंबंधी कंत्राटे असोत. आपले हे म्हणणे खरे आहे कीं आपले सरकार कधीच कुठल्याच 'सुपरपॉवर'च्या मेहेरबानीवर उभे नाहीं. आपले सरकार भरे-बुरे कसेही असो पण त्या सरकाराला आपणच निवडून देतो. अमेरिकेच्या ताटाखालची मांजरे असलेली सरकारे ज्यांची मी उदाहरणे दिली आहेत तसे आपले कुठलेच सरकार कधीच कुणाच्याही ताटाखालचे मांजर नव्हते. ही नक्कीच जमेची बाजू आहे. अमेरिकेने आपल्याशी जवळची मैत्री करू पाहिलीच तर ती आधी 'नाटो'मध्ये असलेल्या आणि नंतर 'नाटो'मधून बाहेर पडलेल्या फ्रान्सबरोबर केलेल्या मैत्रीसारखी असावी हाच माझ्या मूळ लेखाचा रोख आहे. भारताच्या रशियाबद्दलच्या जवळीकीचे/मैत्रीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले तर काय दिसते? पहिली गोष्ट ही कीं आधी म्हटल्याप्रमाणे आपण रशियाच्या ताटाखालचे मांजर कधीच नव्हतो. पण भारत-चीन युद्धात चीनला 'भाऊ' म्हणणार्‍या रशियाने आपल्याला 'मित्र' म्हटले होते हे पक्के आठवते. या निवेदनामुळे रशियाने जरी भाऊ-मित्र असा शब्दच्छल करून थोडेसे डावे-उजवे केले असले तरी रशिया भारताविरुद्ध चीनला संपूर्ण पाठिंबा देणार नाहीं हे चीनला नक्कीच कळले. या निवेदनाचा चीनच्या एकतर्फी माघारीत किती हिस्सा होता याचा अभ्यास मनोरंजक ठरेल. जाणत्यांनी याच्यावर जरूर अधीक प्रकाश टाकावा कारणा माझे याबाबतीतील वाचन पुरेसे नाहींय्. रशियाने आपल्याला शस्त्रास्त्रें रुपयात विकली, कधी-कधी 'बार्टर'च्या तत्वावर विकली हेही आठवते आहे. शिवाय आपल्याला शस्त्रास्त्रे निर्मितीचे तंत्रज्ञान व उत्पादनात सहाय्य करायलाही रशिया अनुकूल राहिला आहे. या बाबतीत अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे सुखासुखी आपले तंत्रज्ञान भारताला देतील असे वाटत नाहीं. आता रशियाकडे आपल्याला द्यायला वित्तीय सामर्थ्य किती होते हाही मुद्दा पहावा लागेल. माझे एक बॉस डिफेन्स सेक्रेटरी होते त्यांच्या म्हणण्यानुसार रशियाशी सौदा करणे फार सोपे होते तर अमेरिकेशी सौदा करणे महाकठीण! रशियाने पूर्व युरोपमधील अनेक राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले होते उदा. वॉर्सा करार. रशियाचे फिडेल कॅस्ट्रोसारख्यांशीही जवळचे संबंध होते. पण स्वतःच्याच देशात हुकुमशाही असल्यामुळे वाईट वेळ आल्यावर रशियाला अमेरिकेसारखे लोकशाहीचे पोवाडे गायला लागले नाहींत. हंगेरीत इम्रे नागींच्या नेतृत्वाखाली जनतेने केलेल्या उठावाला रशियाने सत्ताधार्‍यांच्याबाजूने पूर्ण पाठिंबा दिला आणि ती चळवल चिरडून टाकली. रशियाने तसाच पाठिंबा पूर्व जर्मनीचे होनेकर यानाही दिला व बर्लिनची भिंत पाडली जाऊन जर्मनीचे एकीकरण झाल्यावर त्यांचा देहांत होईपर्यंत होनेकत मॉस्कोला सन्मानाने राहिले. असा पाठिंबा रशियाने भूतपूर्व चेकोस्लाव्हिया या राष्ट्रांच्या सत्ताधार्‍याप्रमाणे त्यांच्या सर्वच सत्ताधार्‍यांना दिला. नंतर जेंव्हां "पैशाचे सोंग आणता न ये" अशी परिस्थिती रशियावर ओढवली तेंव्हांच त्याने या राष्ट्रांतील सत्ताधार्‍यांची मदत मागे घेतली. पण तेंव्हांही लोकशाही वगैरेची कारणे दिली नाहींत. अमेरिकेपुढे खरेच जी समस्या आहे ती स्वतः लोकशाही असल्यामुळे आहे. मांडलिक राष्ट्रांत उठाव झाल्यावर स्वतःच्या (अमेरिकन) जनतेला बरे वाटावे म्हणून अमेरिकन सरकारला लोकशाहीचे पोवाडे गावेच लागतात व त्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडते असे मला वाटते. याउलट जिथे लोकनिर्वाचित राष्ट्रे अमेरिकेच्या ताटाखालची राष्ट्रे बनत नाहींत म्हणून तिथे तख्तापालटात अमेरिका मागच्या दाराने घुसते. उदा. चिलीत घडवून आणलेली क्रांती. त्यात लोकांनी निवडून दिलेले अल्लेंदे (Allende) सरकार वाममार्गाने खाली आणले गेले व पिनोशे नावाचा हुकुमशहा सत्तेवर बसविला गेला. त्याने अनन्वित अत्याचार केले. अलीकडे तिथे पुन्हा लोकशाही प्रस्थापित झाली आहे. लॅटिन अमेरिकेत अशा अमेरिकेच्या हस्तक्षेपाची अनेक उदाहरणे आहेत. शेवटी एकच मुद्दा महत्वाचा. आपल्याला अमेरिकेच्या मैत्रीचे वावडे असायचे कांहींच कारण नाहीं. फक्त आपण लोकशाही राष्ट्र असल्यामुळे आपली धोरणे आपल्या लोकमतानुसारच रहातील. ते अमेरिकेने मान्य केलेच पाहिजे. आपली कांहीं धोरणे त्यांच्याशी १०० टक्के मिळती-जुळती नसली तरीही त्यांना ते मान्य असलेच पाहिजे. या चौकटीत राहून परस्पर सहाय्यासाठी मैत्री जरूर करावी पण सांभाळून, डोळे उघडे ठेवून आणि आपल्या हितसंबंधांना अग्रक्रम देऊन!

ज्या कोणाला भारतीय राजकारण्यांच्या मुर्खपणाचा येवढा मानसिक त्रास होत आहे त्या थोर विद्वानांनी स्वतःच्या परदेशातील ऐषो-आरामाचा त्याग करुन भारतात येऊन काहीतरी भारतोपयोगी करुन दाखवावे. दूरदेशात बसुन पिझा खात आणि कोक ढोसत आख्यान लिहिणे आणि शिमगा करणे वेगळे आणि एक देश चालवणे वेगळे असते येवढी त्यांच्या ज्ञानात भर पडली तरी पुरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/02/2011 - 13:25
=)) =)) =)) =)) बोलके विचार , वरच्या हिमखंडाची समरी देईल काय कोणी ? काय म्हणालात ? रिकामं आहे ते ? =)) बाकी लिहीले नाही , भाषांतर केली नाही , दुर्बोध कार्टुणांवरही पानभर लिहीले नाही .. तर वेळ कसा जाणार ? :) चालु द्या ! बाकी छाण लिहीले आहे - शंकर पाळे

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुधीर काळे 28/02/2011 - 20:16
परीकथेतील राजकुमार, हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले! आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. जास्त कांहीं लिहीत नाहीं.

In reply to by सुधीर काळे

परीकथेतील राजकुमार, हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले! आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. जास्त कांहीं लिहीत नाहीं.
काका गैरसमज नको :) गेले काही दिवस स्वतःला अक्कलवान समजणारे आणि स्वतःच्या भिकार लेखनाचे कौतुक न झाल्याने 'कंपुबाजीच्या नावानी गळे काढणार्‍या, वैयक्तीक शेरेबाजी करणार्‍या' लोकांना उद्देशुन तो प्रतिसाद आहे, आणि तो त्यांना चांगला झोंबल्याचे दिसत आहे ;) तुमच्या कळकळीविषयी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या विषयातील तुमच्या ज्ञानाविषयी मनात कसलाही किंतु नाही. तरी तुम्ही गैरसमज करुन घेऊ नये. फक्त आपण परदेशात आहोत म्हणजे लै अक्कलवाले आहोत आणि आपल्याला भारताच्या सगळ्याच गोष्टींवर ओकार्‍या काढण्याचा हक्क आहे असा काही जणांचा गोड गैरसमज आहे, त्यांना दणका देणे आवश्यक होते म्हणुन सदर प्रतिसाद दिला आहे. बाकी चालु द्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुधीर काळे 01/03/2011 - 13:46
पण वार मात्र माझ्यावरच केल्यासारखखे मलाच काय पण इतरांनाही वाटले असावे, कारण माझ्या एका परममित्र असलेल्या सभासदाने वाहत्या गंगेत हात धुवून 'साफ'ही करून घेतले! मीही परदेशवासी, पिझ्झा खाणारा आणि कोक ढोसणारा! (खरं तर मी दोन्ही करत नाहीं पण ते तुला कसे माहीत असणार?) पण माझ्या ९० वर्षाच्या वृद्ध आईला मात्र 'व्हेज्जी' पिझ्झा आणि कोक दोन्ही प्यारे आहेत! हा तुझा प्रतिसाद वाचेपर्यंत मात्र मला 'बटाट्याची चाळ'मधील "अण्णा पावशेंच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेली चाळीला आवडली नाहींत" हे वाक्य सारखं आठवत होतं!

निवांत पोपट 28/02/2011 - 21:11
ही चर्चा चालू राहीली पाहिजे असे वाटते.तुम्ही लेखातल्या मतांशी सहमत असू शकता अथवा असहमत.आणि ते वैयक्तिक पातळीवर न उतरता पण सांगता येते की.

@ते वैयक्तिक पातळीवर न उतरता पण सांगता येते की. ब्लेक वोटर मोहिमा मिपावर चालतात .त्यामुळे हे चालायचे . त्यात लेख व त्यातील प्रतिक्रिया अमेरिका विरोधी म्हणजे गहजब ? उद्या अमेरिकन सरकारने हे वाचून त्यांच्या शिणेमावर परीक्षण लिहायला मनाई केली तर ? आम्ही शाब्दिक फुलोरे भारतातून कसे बर फुलवायचे . ह्या भारतीय नेत्यांनी आमच्याकरिता एक वेगळे खाते केंद्रात ठेवले आहे . एक वेगळा प्रवासी दिवस पण असतो . बाकी आपल्याला आपल्या नेत्यांची काही मते पटली नाही तर ती लिहिण्याची प्रेरणा अमेरिकन नागरिक स्कॉट- क्लार्क कडून घेतली आहे . आणि अनिवासी नागरिकांमध्ये जगात अमेरिकन स्थित ज्यू समाजाला आदर्श मानतो .जो अमेरिकच्या नाकावर टिच्चून स्वताच्या देशाच्या हिताची धोरणे पांढऱ्या घरातून घडवून आणतो .

In reply to by निनाद मुक्काम …

मदनबाण 01/03/2011 - 11:24
मूळ विषया पासुन जरासे अवांतर :--- काही दुवे इथे द्यावेसे वाटत आहे :--- Kashmir: the China connection http://www.economist.com/blogs/banyan/2010/08/china_and_kashmir Pak, China two major irritants for India's security: Army chief http://news.rediff.com/report/2010/oct/15/pak-china-two-major-irritants-army-chief.htm China's Discreet Hold on Pakistan's Northern Borderlands http://www.nytimes.com/2010/08/27/opinion/27iht-edharrison.html?_r=1 Gilgit Baltistan, The Emergence Of China http://www.pkarticleshub.com/2011/02/15/gilgit-baltistan-the-emergence-of-china/ China building road to disaster in Gilgit-Baltistan http://www.pkarticleshub.com/2011/02/17/china-building-road-to-disaster-in-gilgit-baltistan/ China building road to disaster in Gilgit-Baltistan http://www.ibtimes.com/articles/113033/20110216/china-korakoram-dam-gilgistan-himalayas-environment-ecology-mountains-glacial-melting-diamer-bhasha.htm पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते...

In reply to by मदनबाण

मदनबाण 19/02/2013 - 13:01
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... जवळपास दोन वर्षापुर्वी वरती दिलेला हा प्रतिसाद हा आता सत्यात उतरलेला दिसतो आहे. आता चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते,ज्यात २ मोठे धोके मला वाटतात, ते म्हणजे १) देशाची आर्थीक राजधानी "मुंबई" लक्ष करण्याची क्षमता. २)हिंदुस्थान जे तेल आयात करतो त्या मार्गावर नियंत्रण. या बद्धल अधिक इथे वाचता येईलः--- China given contract to operate Gwadar port जाता जाता:--- ज्या प्रमाणे कोळी आपले भक्ष मिळवण्यासाठी जाळे विणतो,त्याच प्रमाणे चीनचे काम सुरु असताना आपण पाहत आहोत,ज्यात त्यांना पाकड्यांची मोलाची साथ मिळत आहे.

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 22/04/2015 - 13:35
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... जाता जाता:--- ज्या प्रमाणे कोळी आपले भक्ष मिळवण्यासाठी जाळे विणतो,त्याच प्रमाणे चीनचे काम सुरु असताना आपण पाहत आहोत,ज्यात त्यांना पाकड्यांची मोलाची साथ मिळत आहे. मित्राचा शत्रू तो.. ४६०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक ही चीनची आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. एवढी रक्कम म्हणून तर ती महत्त्वाची आहेच. परंतु त्याच बरोबरीने या पशातून पाकिस्तानात काय केले जाणार आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. या पशातून उभा राहणार आहे तब्बल ३ हजार किलोमीटरचा महामार्ग. पश्चिम चीनपासून थेट ग्वादर या बंदराला जोडणारा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/04/2015 - 13:52
चीनने नेपाळमध्ये फुटीरतावादी घातले आहेत, श्रीलंकेत आहेत, पाकडे तर आहेतच....बांग्लादेशला तर काही बोलायची सोयच राहीली नाही...उरले भूतान आणि म्यानमार...कोळी जाळे विणतो आहे...आणि आपण बसलो आहोत आपल्यातच हे ३.५% वाले....हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी असे करत

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 22/04/2015 - 14:20
हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी असे करत आपल्या देशातल्या पगारी राजकारण्यांना या जातीय राजकारण करण्या शिवाय दुसरा उध्योग सुचतो ? देशसेवा करण्याच्या नावावर जे टाळू वरचे लोणी देखील खाण्याचे उध्योग करतात ते सुद्धा तितकेच जवाबदार आहेत... ह्म नही सुधरेंगे असे एकदा सगळ्यांनी ठरवले की बाकी सगळे पालथ्या घड्यावर... पाणी ! असो... यावर अधिक वाचत असताना एक दुवा दिसला तो इथे देउन कलटी मारतो ! चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते,ज्यात २ मोठे धोके मला वाटतात, ते म्हणजे २)हिंदुस्थान जे तेल आयात करतो त्या मार्गावर नियंत्रण. ग्वादार बंदर - पाकिस्तानातील ग्वादार बंदर चीनने विकसित केले आहे. या बंदरात चीन नाविक तळ उभारत आहे. तसेच या बंदराच्या विकासामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून रोज लाखो बॅरल खनिज तेलाच्या वाहतुकीवर चीनचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहू शकेल. संदर्भ :- एमपीएससी - चालू घडामोडी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 22/04/2015 - 14:29
आपल्या देशातल्या पगारी राजकारण्यांना या जातीय राजकारण करण्या शिवाय दुसरा उध्योग सुचतो ?
चूक राजकरण्यांची नाहीये...इथल्या सामान्य लोकांची आहे...ज्यांच्या घरातून राजकारण्यांची nuisance power वाढण्यासाठी "कार्यकर्ते" मिळतात...असे कार्यकर्ते बनवण्याचे थांबवा...राजकारणसुध्धा जाग्यावर येईल

In reply to by मदनबाण

हाडक्या 22/04/2015 - 14:44
पण या सगळ्यत पाकिस्तानची भुमिका काय ?? कारण आजवर ते परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत भारतापेक्षा उजवे राहिले असले तरी त्यांनी यात स्वतःचे खूपच नुकसान करुन घेतले आहे असे वाटतेय. तेव्हा आता जरी असे वाटत असले की पाक हा अमेरिका, रशिया आणि चीन सर्वांना हवाहवासा वाटतोय तर त्याचे कारण तो स्वतःची कपडे काढायला तयार होतोय हेच आहे. जे की दीर्घ कालावधीत त्यांनाच ( आणि शेजारी म्हणून नाइलाजास्तव आपल्याला) त्रासदायक ठरेल असे वाटतेय.

In reply to by मदनबाण

मदनबाण 28/11/2016 - 22:54
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत ग्वादार बंदर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होणार आहेत असे दिसते... चीन हळुहळु त्यांचा नाविक तळ इथे (ग्वादार) आणण्याची शक्यता दिसुन येते Chinese naval ships in Pakistan's Gwadar port call for a rethink of India's regional policy Chinese naval ships to be deployed at Gwadar: Pak. official

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरादो... ;) :- Shaandaar

सुधीर काळे 01/03/2011 - 14:23
माझा "लोकशाहीच्या चौकटीत राहून परस्पर सहाय्यासाठी मैत्री जरूर करावी" या प्रतिसादाला खरी प्रेरणा मला विकास-जींच्या प्रतिसादावरून मिळाली हे लिहायचे राहूनच गेले. तसेच इंद्रा-जींचा प्रतिसादही एका योग्य मुद्द्यावर (अगदी 'बैलाच्या डोळ्या'वर) घाव घालणारा होता! दोघांचे आभार मानतो. आता एक लेख रशियाच्या मैत्रीबद्दल लिहावा असे वाटू लागले आहे.

काका तुमचा गैरसमज दूर झाला हे पाहून मलादेखील बरे वाटले . आमच्या शुध्द लेखनाविषयी बोंब पूर्वीपासून पण तरीही मूष चा लेख असो किंवा बिका शेख ह्यांचा विनायक सेन ह्यांचा आमच्या मित्राने हक्काने आम्हाला तेथे लिहिण्यास बोलावले व एकेकाळी चक्क छान छान प्रतिक्रिया दिल्या कधीकाळी आमचे प्रतिसाद वाचनीय होते म्हणे .अनेक लेखांवर .(आता आमचे लेखन अचानक भिकार झाले आहे ) काळाचा महिमा बाकी भारताच्या सगळ्याच गोष्टींवर गरळ वैगेरे वाचून अंमल मजा आली . कारण ह्यांनी आमंत्रित केलेल्या बिका ह्यांच्या विनायक सेन ह्या लेखात मी भारतीय न्याय व्यवस्थेची पाठराखण केल्याचे प्रत्येक प्रतिसादात नमूद केले आहे किंबहुना फार आधी मी ह्या निम्मिताने परकीय प्रसार माध्यम व मानवाधिकार भारताविषयी गरळ ओकणार व आपल्या देशातील अंतर्गत गोष्टी /नयन प्रक्रियेत ढवळाढवळ करणार असे भाकीत केले होते .दोन आठवड्यात दुर्दैवाने ते खरे ठरले
.. देवीस च्या लेखात शशी थरूर ह्यांच्या हुशारीची तारीफ तू नळीची लिंक देऊन सोदाहरण स्पष्ट केले आहे . पाकिस्तान व चीनच्या कारवाया किंवा अमेरिकन दुट्टपी पणा ह्या विषयी सुध्धा वेळो वेळी ह्याच भावनेतून लिहित असतो . अमेरिकेने मंदी जगभर लादली हा युरोप मध्ये समज आहे . अमेरिकेच्या नादी लागून टोनी ब्लेअर ची दैदिप्यमान कारकीर्द उध्वस्त झाली .(ह्या बद्दल सविस्तर परत कधी तरी ) त्यामुळे ह्यांच्या किती कच्छपी लागायचे ह्यावर चर्चा चालू होती . बाकी भाषांतर किंवा इतर नमूद केलेल्या प्रतिसाद पाहता ( तेही ह्यांच्या परम मित्राकडून ) नेम खरच चुकला ?का यु टर्न घेण्यात आला हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे . बाकी आता हि विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना अनुरूप त्या नुसार चर्चा व्हायला काहीच हरकत नसावी चीन व अमेरिका ह्यांचे अनेक मुद्यावरून वाजते .सगळ्यांना माहीत आहे कि अमेरिकेचा प्रमुख स्पर्धक चीन आहे . तरी अमेरिकन कंपन्या चीन मध्ये आपले युनिट हलवतात का बरे ? उत्तर सोपे आहे .नफा चीन हे जाणून आहे .म्हणूनच आपल्या राष्ट्रीय हितसंबंध जोपासत तो अमेरिका व तमाम जगाची वागतो . बाकी सविस्तर विकास ह्यांनी दिलेले मुद्दे वाचून . भारताने कुट नीती वापरत अमेरेकेला ठेंगा दाखवत अरेवा ह्या कंपनीशी संधान बांधले असा ओझरता उल्लेख मी माझ्या आधीच्या एका प्रतिसादावर केला होता .त्यावर सविस्तर पणे लवकरच लिहीन आमचे भिकार लेखन गोड मानून घ्या (वैचारिक मधुमेह झालेल्या प्रतिक्रियेचे व अंकांचा पाऊस पडणार्या प्रतीक्रीयेंचे स्वागत असेल .) अवांतर ( रशिया व फ्रेंच हे भारताच्या सर्व अटी मानून अणु भट्ट्या बांधतात असे एक वाक्य मी माझ्या एका प्रतिसादात लिहिले होते .ह्याचा अर्थ सरळ आहे कि भारताचा तो धोरणात्मक /राजकीय /आर्थिक /सामरिक विजय आहे .तरी सुद्धा भारतवार आम्ही गरळ ओकतो हे वाचून वाईट वाटले .) फक्त टिकोजीराव अमेरिकेच्या मनाप्रमाणे भारत अणुकराराच्या अटी ( नुकसान झाले तर भरपाई न देणे ) मान्य करत नाही आहे हे ह्यांना खुपते भोपाल सारखा पळ काढायला ह्यांच्या कंपन्यांना रान मोकळे हवे आहे . ह्या निम्मिताने भारताची विरोधी पक्षाने अणु कराराच्या वेळी जो विरोध केला त्याचा परिणाम म्हणूनच आज प्रत्यक्षात एकही अमेरिकन कंपनीशी अजून आपला करार झाला नाही आहे .त्यामुळे सरकावर करार करताना एक नैतिक दंड्पण होते .

सुधीर काळे 02/03/2011 - 07:59
निनाद आणि इतर 'मिपा'कर, काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यात 'मिपा'करांप्रमाणेच 'उपक्रम', 'मी मराठी' आणि 'मायबोली' येथील वाचकांनी मांडलेले मुद्दे वापरून (सहजरावांनी दिलेला शेराच्या तुकड्यावरून पूर्ण शेर शोधून) ई-सकाळवरचा लेख कांहींसा 'सजवला'ही आहे. आता सकाळच्या व्यापक वाचकवर्गाच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. (http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.htm) धन्यवाद.

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 13:58
आपण ( म्हणजे आपण सगळेच मिपाकर ) कोण? आपली लायकी काय? आपले मत काहीही असले तरी त्याने अमेरिकेला काय फरक पडतो. आणि आपले काही ही मत असले तरी भारतातले गूंड राजकारणी त्याला कवडीचे महत्व देणार नाहीत. असल्या वांझोट्या चर्चांना काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 19/02/2013 - 14:01
मिपावरचे गुंड संपादक अशा मताला कवडीचे महत्व देणार नाहीत. असल्या वांझोट्या प्रतिसादाला काय अर्थ आहे? किमानपक्षी चाललेल्या वांझोट्या चर्चेला, अशा भिकार प्रतिसादापेक्षा बराच जास्त अर्थ आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:06
उत्तम - आता माझे मत देतो. अमेरिकेसारखे मित्रराष्ट्र असावेच. खरे तर भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी तळ अमेरिकेला द्यावेत. त्यानी भारताचे बरेच प्रोब्लेम सुटतील.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 19/02/2013 - 14:24
भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी तळ अमेरिकेला द्यावेत. त्यानी भारताचे बरेच प्रोब्लेम सुटतील. उदाहरणार्थ? हे गंभीरपणे केलेले विधान आहे काय? की याही धाग्याचे काश्मीर करण्याचा विचार करुन प्रतिसाद दिला आहे?

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:04
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन चे माझे मत आहे. आणि हे आजचे नाही बर्‍याच वर्षापासुन चे मत आहे. आणि हे तळ फक्त अमेरिका असे नाही, अमेरिके बरोबर पश्च्चिम युरोप आणी ऑस्ट्रेलिया ला पण द्यावेत. फायदे - भारताचा संरक्षण खर्च कमी होईल. सीमे पलिकडच्या आक्रमणाची भीती रहाणार नाही, खास करुन चीन कडुन. - भारताला हजारो कोटी डॉलरची मदत मिळत राहिल दर वर्षी. - जवळ जवळ १-२ लाख असे सैनिक आणि त्यांची backend arrangement भारतात रहाणार असेल तर प्रचंड प्रमाणात tourism, foreign exchange भारतात येइल. - मध्यपुर्वेतला देश भारताचे क्रुड तेला वरुन black mailing करु शकणार नाही. - १-२ लाख actual personnel आणि ज्यांना शक्य आहे अश्यांची कूटुंबे आल्या मुळे, भारतात, त्यांना शाळा, हॉस्पिटल वगैरे उभारावी लागतील. त्यांचा पण फायदा होईल. - भारतातल्या विदारक गरिबी आणी दुष्काळ आदि परिस्थितिंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्या मुळे बर्‍याच अमेरिकन आणी युरोपियन स्वयंसेवी संस्था येतील. - एकूणच चांगली व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाझरेल. दर्जा बद्दल चा जो आपला "चलता है" हा दृष्टीकोण कमी होईल.

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:01
काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यात 'मिपा'करांप्रमाणेच 'उपक्रम', 'मी मराठी' आणि 'मायबोली' येथील वाचकांनी मांडलेले मुद्दे वापरून >>> मी उल्लेख करणारच होतो सकाळचा. सकाळचे पूर्वीचे अग्रलेख ( गेली कित्येक वर्ष मी सकाळ वाचत नाही, मुक्तपीठ मात्र वाचतो ) असेच असायचे, रोमानियाने काय करावे? नाटो बरोबर का चुक? अरे तुम्हाला विचारतो कोण?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 19/02/2013 - 14:07
आयला कोणी विचारत नाही म्हणुन एखाद्याने बोलुच नये काय? लोकशाही आहे राव. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. अमेरिकेकडे तारणहार म्हणुन बघण्याआधी अमेरिका प्रत्य्क्षात कशी आहे हे समजण्याचा लोकांना अधिकार आहे आणी ते समजावुन सांगण्याचा काळे काकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 14:11
अमेरिका हे अत्यंत चांगले आणि विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे असे मी वर लिहिलेच आहे. ह्या पुढे जाउन अमेरिकेला भारतात भरपुर लष्करी तळ द्यावेत असेही लिहिले आहे. बघुया आता दोन्ही सरकारे कीती लक्ष देतात माझ्या प्रामाणिक मता कडे

वेताळ 19/02/2013 - 17:24
खुपच छान विचार आहेत. आता अमेरिकेचे तळ ज्या ज्या देशात उभे आहेत त्याबद्दल आपण माहिती देली तर बरी होईल.अमेरिका आजवर पाकिस्तानला मदत देत आली,अफगाणिस्तानात तळ उभे केलेत पण काही सुधारणा दिसल्या नाहीत. उलट पाकिस्तानला आपल्या देशातील गावे परदेशाना विकायची पाळी आली आहे. त्याची भीक मागण्याची व्याप्ती मात्र खुप वाढली आहे.

In reply to by वेताळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:32
तो प्रोब्लेम पाकिस्तान आणि अफगणीस्तान चा आहे, त्याचा दोष अमेरिकेकडे देउन चालणार नाही. अमेरिकेचे तळ फिलीपिन्स मधे आहेत, जपान मधे होते/आहेत. तैवान मधे होते/आहेत. फायदा करुन घेणे त्या त्या देशावर अवलंबुन आहे. आपला benchmark जर पाकिस्तान आणि अफगणीस्तान असेल तर अल्ल्ला बचाये

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:34
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन चे माझे मत आहे. आणि हे आजचे नाही बर्‍याच वर्षापासुन चे मत आहे. आणि हे तळ फक्त अमेरिका असे नाही, अमेरिके बरोबर पश्च्चिम युरोप आणी ऑस्ट्रेलिया ला पण द्यावेत. फायदे - भारताचा संरक्षण खर्च कमी होईल. सीमे पलिकडच्या आक्रमणाची भीती रहाणार नाही, खास करुन चीन कडुन. - भारताला हजारो कोटी डॉलरची मदत मिळत राहिल दर वर्षी. - जवळ जवळ १-२ लाख असे सैनिक आणि त्यांची backend arrangement भारतात रहाणार असेल तर प्रचंड प्रमाणात tourism, foreign exchange भारतात येइल. - मध्यपुर्वेतला देश भारताचे क्रुड तेला वरुन black mailing करु शकणार नाही. - १-२ लाख actual personnel आणि ज्यांना शक्य आहे अश्यांची कूटुंबे आल्या मुळे, भारतात, त्यांना शाळा, हॉस्पिटल वगैरे उभारावी लागतील. त्यांचा पण फायदा होईल. - भारतातल्या विदारक गरिबी आणी दुष्काळ आदि परिस्थितिंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्या मुळे बर्‍याच अमेरिकन आणी युरोपियन स्वयंसेवी संस्था येतील. - एकूणच चांगली व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाझरेल. दर्जा बद्दल चा जो आपला "चलता है" हा दृष्टीकोण कमी होईल.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिका हे एक पक्के व्यापारी राष्ट्र आहे.असे तळ अमेरिकेला देणे म्हणजे आपल्या तंबूत आपण होऊन उंटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.अमेरिका जे काही करेल ते स्वतःच्या स्वार्थासाठी करेल. अमेरिका भारताच्या फायद्यासाठी काही करेल असे म्हणणे आणि वाटणेही मूर्खपणाचे आहे. समजा भविष्यात पाकिस्तान्/चीनने काही आगळीक केली तर आपण उत्तर द्यायचे की नाही/ दिल्यास कोणत्या स्वरूपाचे उत्तर द्यायचे यावरही अमेरिकेचेच नियंत्रण राहिल.आपल्याला पाकिस्तानला सणसणीत प्रत्युत्तर द्यायचे लाख वाटत असेल पण अमेरिकेचा त्याला विरोध असेल तर आपल्याला तसे करता येणार नाही.तेव्हा अशा प्रत्येक गोष्टीत आपण काय करावे यावर परकियांचे नियंत्रण राहणार असेल तर असंख्य लोकांनी स्वातंत्र्यासाठी उगीचच आपला जीव दिला असे म्हणावे लागेल. धन्य तुमची.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:04
अमेरिका भारताच्या स्वातंत्र्या नंतर भारताची चांगली मित्र होती. पाकिस्तान कडे बघत पण नव्हती. पण समाजवादाची आणि तिसर्‍या जगाचे नेतृत्व करण्याची जी हॉस आली भारताच्या पंतप्रधानाला. अश्या मुळे अमेरिका पाकिस्तान कडे ढकलली गेली. अजुनही भारतानी जर नीट प्रकारे अमेरिकेशी मैत्री केली तर ते पाकिस्तान ला वार्‍यावर सोडतील. कारण त्यांना जगाच्या ह्या भागात मित्र हवा आहे. भारतानी नाकारले म्हणुन पाकिस्तान झाला.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिका भारताच्या स्वातंत्र्या नंतर भारताची चांगली मित्र होती. पाकिस्तान कडे बघत पण नव्हती. पण समाजवादाची आणि तिसर्‍या जगाचे नेतृत्व करण्याची जी हॉस आली भारताच्या पंतप्रधानाला.
या संदर्भात वरच दिलेला प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/463035#comment-463035 आहेच. बाय द वे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर अमेरिका भारताचा मित्र होता हे नक्की कोणत्या आधारावर बोलता? एका आय.आय.टी ची स्थापना करण्यात अमेरिकेने मदत केला म्हणून?काश्मीरमधून पाकिस्तानने आपले घुसखोर मागे घ्यावेत यासाठी अमेरिकेने चकार शब्द काढल्याचे ज्ञात आहे तुम्हाला?
अजुनही भारतानी जर नीट प्रकारे अमेरिकेशी मैत्री केली तर ते पाकिस्तान ला वार्‍यावर सोडतील. कारण त्यांना जगाच्या ह्या भागात मित्र हवा आहे. भारतानी नाकारले म्हणुन पाकिस्तान झाला.
गेल्या विस वर्षात परिस्थितीत झपाट्याने फरक पडला आहे ही गोष्ट मान्य आहे.पण त्यात शीतयुध्दाची समाप्ती आणि रशियाचे विघटन, रशियाची अफगाणिस्तानातून माघार, पूर्व युरोपातून कम्युनिस्ट या कुजलेल्या विचारसरणीला लोकांनीच गाडले इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आणि बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेच्या दृष्टीने भारत हा अधिक उपयुक्त देश आहे म्हणून भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले आहेत आणि पाकिस्तान-अमेरिका संबंध बरेच बिघडले आहेत.यातूनच अमेरिका स्वतःच्या स्वार्थाचेच बघते हे स्पष्ट होतेच.आणि अशा स्वार्थी देशाचे सैन्य आणि सैन्यतळ आपल्या देशात कशाकरता?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:24
तळ कशाकरता हे मी दिलेच आहे वरती. आणि फक्त अमेरिका नाही, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया सुद्धा असे म्हणले आहे. अमेरिकेचे तळ पाहिजेत कारण जो आपल्या डोक्यावर चीन नावाचा बोका बसला आहे, त्याची ताकद भारता पेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे. त्याला थोडा जरी धाक दाखवायचा असेल तर दुसर्‍या बोक्याला आणुन बसवावे लागेल. तुम्ही देशप्रेमाचा गॉगल काढुन बघा की काय भीषण परिस्थीती आहे ते. सध्या चीन ला भारता बद्दल काही करायची घाई नाही. आत्ता जपान आणि तैवान त्यांच्या नजरेत आहेत. आणि भारताची लष्करी तयारी हळु हळु ढासळतच जाणार म्हणुन पण कदाचित वाट बघत असेल. पण काही वर्षात चीन अरुणाचल प्रदेश नक्की ताब्यात घेणार. फक्त कीती वर्षानी तेव्हडेच माहीती नाही.

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकेचे तळ पाहिजेत कारण जो आपल्या डोक्यावर चीन नावाचा बोका बसला आहे, त्याची ताकद भारता पेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे. त्याला थोडा जरी धाक दाखवायचा असेल तर दुसर्‍या बोक्याला आणुन बसवावे लागेल.
पण हा दुसरा बोका कशावरून आपली बाजू घेईल हो?जर अमेरिकेच्या स्वार्थाच्या दृष्टीने त्यांना भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा असेल तर अमेरिका चीनचीच बाजू घेणार.आणि अशा अमेरिकेचे सैन्य आणि तळ भारतात आपणच बोलावायचे.जर चीनबरोबरचे युध्द जड जायला लागले तर सध्या निदान आपण त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकू शकू.यात आपलेही प्रचंड नुकसान होईलच पण शत्रूला जबरदस्त तडाखा द्यावा या उद्देशाने जे काही होईल ते होईल असे म्हणत असे काही करायचा पर्याय तरी आपल्याकडे आहे.आपली क्षेपणास्त्रे चीनी शहरांपर्यंत जाऊ शकतील असे वाचले आहे. (भारताविरूध्दचे युध्द जड जायला लागले तर पाकिस्तानही आपल्याविरूध्द अणुबॉम्बचा वापर करणार किंबहुना त्याच उद्देशाने पाकिस्तानने अणुबॉम्ब विकसित केले आहेत).जर अमेरिकेचे सैन्य भारतात असेल तर आपण काय करावे-- अणुबॉम्बचा वापर करावा की नाही हे अमेरिकन ठरवणार.आणि ते चीनच्या बाजूचे असले तर आपण मुकाट्याने काही न बोलता गप्प बसावे!! उत्तम.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:47
ज्याला पूर्ण युद्ध ( full scale War ) असे म्हणता येइल असे जर युद्ध झाले तर भारताकडे १० दिवस टिकुन रहाण्याइतकी पण सामुग्री नाही. युद्धाचा निकाल युद्धभुमी वर लागत नाही असे एक Art of War मधे वाक्य आहे. कारण युद्धाचा निकाल युद्धाआधी दोन्ही पक्षांची काय तयारी आहे ह्यावर लागतो. भारतानी त्याबाबतीतली ४० वर्षे वाया घालवली आहेत. १९७० पर्यंत भारत आणि चीन ची तयारी बर्‍यापैकी सारखी होती.

In reply to by प्रसाद१९७१

हो पण ही परिस्थिती अमेरिकेला भारतात सैन्यतळ स्थापन करायला देऊन कशी बदलेल्?माझे म्हणणे असे आहे की अमेरिकेला भारतात सैन्यतळ स्थापन करायला दिले तर आपली बाजू आणखी कमकुवत होईल.जे काही करायचे ते स्वतःच्या हिंमतीवर--आपला हात जगन्नाथ.आपले प्रश्न इतरांना बोलावून सुटणार नाहीत तर इतर लोक त्यात स्वतःचा स्वार्थ बघतील आणि आपल्या कटकटी अजून वाढतील त्याचे काय?

मदनबाण 19/02/2013 - 17:43
इतर देशांचे सैनिक अथवा नाविक तळ आपल्या देशात उभारुन स्वसंरक्षणात मांडलिकत्व पत्करण्यात काय हुशारी आहे ? त्या पेक्षा जसे अमेरिकेने केले आणि आत्ता चीन करतो आहे त्याच प्रमाणे आपणही इतर देशात स्वतःचे तळ उभारावेत असा विचार केलेला उत्तम. आपले नौदल सक्षम आहे, अगदी २०१२ ला जेव्हा व्हिएतनाम मधे आपले ओएनजीसी तेल उत्खनन करत होते तेव्हा आपण आपले नौदल तिथे पाठवण्याची तयारी राखुन होतो.(व्हिएतनाम गॅस फिल्ड मधे ओएनजीसीचा स्टेक आहे.) संदर्भ :- Indian navy ready to set sail to South China Sea Understanding India’s Interest in the South China Sea: Getting into the Seaweeds

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 17:54
आपले नौदल सक्षम आहे, अगदी २०१२ ला जेव्हा व्हिएतनाम मधे आपले ओएनजीसी तेल उत्खनन करत होते तेव्हा आपण आपले नौदल तिथे पाठवण्याची तयारी राखुन होतो.(व्हिएतनाम गॅस फिल्ड मधे ओएनजीसीचा स्टेक आहे.)>>> काय बोलणार? भारताच्या नेव्ही पेक्षा चीन ची नेव्ही १० पट मोठी आहे. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. हे वास्तव नाकारण्यात काही अर्थ नाही. आपण शहामृगासारखे वाळुत डोके घालुन बसलो म्हणजे वादळ येणारच नाही असे नाही. अहो भारता कडे तोफगोळा पण नाही १० दिवसांपे़क्षा जास्त दिवसाचा. तोफगोळे नाहीत म्हणुन रनगाडे आणि तोफांचा सराव पण करता येत नाही. ७०% विमाने ही अतिशय जुनी आहेत. आणि चीन चे विमानदल जगातले सर्वात मोठे आहे. चीन ची आर्मी भारताच्या ३ पट आहे. कीती gaps सांगाव्या तेव्हड्या थोड्या आहेत.

रमेश आठवले 19/02/2013 - 18:03
जगात सर्वात मोठे साम्राज्य स्थापन करणार्या इंग्लंड देशाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत असे म्हणतात -Her majesty’s government has no permanent friends or permanent enemies, it has only permanent interests.- हा राजनीतीचा सिद्धांत सर्व राष्ट्रांच्या बाबत लागू आहे. तरी अमेरिकेसाठी भारताचे वेगळे धोरण असण्याचे कारण नाही.

मदनबाण 19/02/2013 - 18:22
भारताच्या नेव्ही पेक्षा चीन ची नेव्ही १० पट मोठी आहे. हे तर सर्वांनाच ठावुक आहे. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. जरा विस्तारुन सांगाल तर ३-४ ज्ञानकण मी सुद्धा वाटुन घेइन म्हणतो. अहो भारता कडे तोफगोळा पण नाही १० दिवसांपे़क्षा जास्त दिवसाचा. तोफगोळे नाहीत म्हणुन रनगाडे आणि तोफांचा सराव पण करता येत नाही. ते तर कारगिल युद्धाच्यावेळी सुद्धा नव्हते,आयत्या वेळी साउथ आफ्रिकेतुन आयात केलेले शेल्स बोफोर्स तोफांसाठी वापरले गेले. चूक संरक्षण दलाची म्हणावी की ज्या मुठभर नेता मंडळींना आपण देशसेवा / संरक्षण करायला निवडुन दिले आहे त्यांची आहे ? जाता जाता :--- चीन फक्त ग्वादारमधेच नाही,तर तो कोकोआयलंडवर सुद्धा आहे. हो तेच कोको आयलंड जे कधी काळी हिंदुस्थानाचे होते,जे पंडित नेहरुंनी ब्रमदेश्(म्यानमार)ला दान देउन टाकले.तेच कोको आयलंड म्यानमारने चीनला भाड्यावर दिले जिथे आज चीन ने सिग्नल मॅनिटरिंग सिस्टीम बसवली आहे. जिचे काम अंदमान-निकोबार मधे होणारी भारतीय नौदलाची टेहाळणी करणे आहे.हे कोको आयलंड निकोबार आयलंड पासुन फक्त १८किमी अंतरावर आहे.

In reply to by मदनबाण

काळा पहाड 22/04/2015 - 14:24
तेच कोको आयलंड जे कधी काळी हिंदुस्थानाचे होते,जे पंडित नेहरुंनी ब्रमदेश्(म्यानमार)ला दान देउन टाकले.तेच कोको आयलंड म्यानमारने चीनला भाड्यावर दिले
हे नवीनच कळतंय. या विद्वान गृहस्थानं भारताचं आणखी किती नुकसान केलंय देव जाणे.

In reply to by काळा पहाड

मदनबाण 07/06/2021 - 16:16
हे नवीनच कळतंय. या विद्वान गृहस्थानं भारताचं आणखी किती नुकसान केलंय देव जाणे. त्याची बखर खाली मांडली आहे पहा :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

प्रसाद१९७१ 19/02/2013 - 18:51
कारगिल युद्धाच्यावेळी
ह्याला युद्ध म्हणणे बरोबर होणार नाही. युद्ध खुप मोठी असतात. कार्गील लाच जर ही अवस्था झाली तर चीन बरोबर काय होणार. सध्या भारत चीन च्या थोड्याफार मेहरबानी वर आहे, चीन आगळिक करत नाही म्हणुन ठीक आहे कारण त्यांच्या हे सध्या priority list मधे नाही. जरा विस्तारुन सांगाल तर ३-४ ज्ञानकण मी सुद्धा वाटुन घेइन म्हणतो. >> माझे म्हणणे इतकेच आहे की चीन ची तयारी आणि प्रचंड ताकद बघता ते सध्या काही घुसखोरी, युद्ध करत नाही ही भारतावर मेहरबानी च आहे.

मदनबाण 19/02/2013 - 23:05
ह्याला युद्ध म्हणणे बरोबर होणार नाही. विकिपिडीया चाळलात तर कारगिल युद्ध असाच उल्लेख सापडेल. चीन ची तयारी आणि प्रचंड ताकद बघता ते सध्या काही घुसखोरी, युद्ध करत नाही ही भारतावर मेहरबानी च आहे. २०१२ च्या रिपोर्ट नुसार नुसत्या उत्तराखंड मधेच चीनने ३७ वेळ खुसखोरी केली होती.तर २०१० पासुन ५०० वेळा चीनी सैन्य हिंदुस्थानची सिमा ओलांडुन आत आले आहे.

In reply to by नाना चेंगट

सुनील 21/02/2013 - 01:03
काय ठरलं मग?
निर्णय झाला की कळवतो! ठरल्यावर कळवू की मोडल्यावर? (म्हणजे, नो न्यूज इज गूड न्यूज की याऊलट?) ;)

विश्वासार्ह मित्रराष्ट्र ही संकल्पनाच आंतरराष्ट्रीय राजकारणात खुळेपणाची आहे. आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जपणे महत्वाचे... मग त्यासाठी वाट्टेल ते.

Rajesh188 05/06/2020 - 09:45
मित्र हा शब्द च इथे अयोग्य आहे. मित्र म्हणजे निस्वार्थी निखळ संबंध. अमेरिका काय कोणतेच राष्ट्र कोणाचे मित्र नसते. ही फक्त देवाणघेवाण असते. आणि सर्वात महत्वाचे दुबळ्या ना,कमजोर देशांना कोणीच मित्र नसतो. स्वतः चे हित जपण्यासाठी कोणता देश फायद्याचं आहे हे बघून संबंध जोडले जातात किंवा क्षत्रू चा शत्रू तो आपला मित्र असे पण बघितले जातात. भारताला जास्त मित्र हवे असतील तर पाहिले भारताला बलवान होणे गरजेच आहे.

शाम भागवत 05/06/2020 - 23:52
अमेरिका मैत्रीचा आव आणत असेल तर आपणही आव आणायला काय हरकत आहे? गिलगीट, बाल्टीस्तान परत मिळवताना अमेरिकेने मधे खो घातला नाही तर मैत्रीचा आव पुढे चालू ठेवायचा. एकदा का भारताच्या ताब्यात हा प्रदेश आला की, भारत अफगाणिस्तानशी जमिनीवरून जोडला जाईल. सैन्य पण या भागात म्हणजे गिलगीटमधे असल्याने केव्हाही अफगाणिस्तान मदत करता येईल. इराणमार्गे संबंध ठेवणे तसे जिकिरीचेच आहे. मुख्य म्हणजे चिनची गुंतवणूक अडकलेली असल्याने चीन खळखळाट करणारच. पण चिनचे या भागातून रस्त्यांमधील हितसंबंध जपण्याचे भारताने आश्वासन दिले तर, कदाचित चीन पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून देईलही. पण भारत व चिन वाटाघाटींमध्ये या प्रदेशामुळे भारत नेहमीच हुकमाचे पान राखून ठेवील. चीन आज जे महत्व पाकिस्तानला देतोय, ते महत्व भारताला यातून मिळू शकेल. आजतरी चीनची गुंतवणूक अडकून पडली आहे. ती मोकळी होणं किंवा मार्गी लागणं चीनच्या दृष्टीने प्राधान्यक्रमावर असेल. निदान आत्ताच्या आर्थिक संकटात तरी हा गुंता सुटण्याचा चीनला फायदा होऊ शकतो. भारत अफगाणिस्तानबाबत जबाबदारी उचलतोय म्हटल्यावर अमेरिकेला सगळे सैन्य काढून घेता येईल. याचा उपयोग ट्रंपसाहेबांना निवडणूक जिंकण्यासाठी होऊ शकतो. सैन्य माघारीचे आश्वासन ट्रंप यांनी मागच्या निवडणूकीच्या वेळी दिलं होतं. “करून दाखवलं” ची अमेरिकन आवृत्ती सादर होईल. शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करायला सगळे तयार असतातच अफगाणिस्तानमधे अमेरिकेपेक्षा भारताचे वर्चस्व असण्याला रशिया नक्कीच अनुकूल असेल. इतकेच नव्हे तर कझाग, उजबेक,ताजिक वगैरेंना अफगाणमार्गे थेट संबंध निर्माण करता येतील. तसं करणं त्यांनाही आवडेल. मला वाटते यांत फक्त पाकिस्तानचे नुकसान आहे. तशीही त्याची गरज संपलेली आहे. मग त्या अरब कंन्ट्रीज असो की अमेरिका. तुर्कस्तान सोडता सध्या त्यांच्याबाजूने कोणतेच मुस्लीम राष्ट्र उभे राहात नाहीये. आपली मोठी गुंतवणूक सुरक्षीत राहात असेल तर चीन फक्त गप्प बसला तरी भागण्यासारखे आहे. पाकव्याप्त काश्मीरमधे हवामानाचे अंदाज सुरू केल्यावर पाक बावचळलाच आहे. त्यासाठी चीनने सिमा प्रश्ण उकरून काढून पाकला जरा बरं वाटेल अशी हालचाल केली आहे. आता ही हालचाल मनापासून केलीय की, पाकिस्तानला गाफिल ठेवण्यासाठी ते माहीत नाही. कोरोना प्रकरण उद्भवलं नसतं तरच बरंच काही होणं शक्य होते. मुख्य म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताकडे आले तर आत्ताचे काश्मीर पुढारी संपून जातील. सगळाच डाव नव्याने मांडला जाईल. फास आवळत आणला गेला आहे. पण कोरोनामुळे आणखी आवळणे लांबवले गेलंय......................... असं सगळं माझं वैयक्तिक मत आहे.:) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय? अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.

प्रिय विनील,

श्रावण मोडक ·

In reply to by गणपा

गणपा 23/02/2011 - 13:35
आताच आंजा मित्र राजेशी विनीत बद्दल बोलताना त्याने ह्या (डीएम रास्ते में, रिहाई किसी भी क्षण) बातमीचा दुवा दिला. आणि आनंद झाला... लवकरच सुटाका होवो.

'अगदी आमच्या मनातील विचार....' असे जरे श्री.सचिन जाधव यांच्या पत्राचे मूल्यमापन केले तर ते अगदी अचूक ठरेल. ते स्वतः एक आयएएस अधिकारी शिवाय भाषेवरून असे दिसते की श्री.विनीलबरोबर त्यांचे अगदी 'अरे-तुरे' चे संबंध आहेत त्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता त्यानी आपल्या भावना खुल्या केल्या आहेत, ज्या आम्ही (कदाचित काही मर्यादेमुळे) करू शकलो नसतो. उदा. : "...तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची?..." जरी श्री.जाधव यानी 'अन्यांच्या मनातील' विचार म्हणून वरील वाक्य आपल्या पत्रात कोट केले असले तरी का कोण जाणे मला खात्री आहे की खुद्द त्यांच्यासारख्या अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांनी तसे वाटले असणार. कारण 'विनील विषय' ज्यावेळी शांत होईल, त्याचवेळी ओरिसाच काय पण खुद्द आता केन्द्र सरकारचे गृहखातेही देशातील समस्त जिल्हाधिकारी आणि तत्सम दर्जांच्या अधिकार्‍यांसाठी एक श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणार आणि त्याचे नाव Ideal Manual असे राहून या मॅन्युअलमध्ये विनीलसम अधिकार्‍यांनी कोणत्या गोष्टीचे 'पालन' केले (च) पाहिजे यावर भर दिला जाणार. एकप्रकारे अधिकार्‍यांच्या विस्तारीत पंखावर मर्यादा आणणार. २. ..."पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? ..." ~ नक्कीच. विशेषतः या नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना जिवंत पकडण्यासाठी किती पोलिस्/एसआरपी आणि मिलिटरीचे जवान (उदा.दंतेवाडा कांड...) धारातिर्थी पडले असतील याची आकडेवारी शासकीय यंत्रणाच काय पण मिडियाकडेही असतेच, तर या गतप्राण झालेल्यांच्या नातेवाईकाना ते समूहखुनी सुटल्याच्या बातम्या पाहून्/वाचून कोणत्या प्रकारचे दु:ख होत असेल याची कल्पना केली तर श्री.विनीलच्या 'हीरो' पणाबद्दल वरील प्रश्न उभा राहू शकतोच. (इथे आठवण होते ती मणिरत्नमच्या 'रोजा' चित्रपटाची. मिलिटरी कर्नल '...अखेर सरकारने तुझ्या नवर्‍याच्या सुटकेच्या बदल्यात कैदेतील त्या अतिरेक्याला सोडण्याचा निर्णय घेतला...' असे रोजाला सांगतो, ती आनंदित होते....पण खिन्न झालेला हाच कर्नल पुढे असेही म्हणतो, "असो, त्या अतिरेक्याला पकडण्यासाठी आमचे किती सैनिक मारले गेले, मिलीटरीला किती प्रयत्न करावे लागले, याची आता चर्चा कोण करणार? आणि काय गरजही म्हणा....तुझा नवरा तरी सुखरूप येईल." इथे रोजाही क्षणभर सुन्न झाल्याचे दाखविले आहे.) पण असो....शेवटी पत्रात श्री.जाधव म्हणतात तसे "विनीलसारखे अधिकारी आम्हाला हवेतच.." इन्द्रा

विजुभाऊ 23/02/2011 - 13:54
श्रामो धन्यवाद . एका चांगले काही वाचायला मिळाले. अन्यथा कलेक्टर ऑफीसच्या बाहेर उपोषण करणारांचे मंडप दिसतात. दाढी वाढलेले चिंतातूर चेहेरे दिसतात . कलेकटराना या लोकाम्ची साधी दखल घ्यायला देखील वेळ नसतो

रणजित चितळे 23/02/2011 - 14:23
खर आहे सगळे मी सहमत आहे. मागे छत्तिसगढला कामा निमीत्ताने गेलो होतो तेव्हा समजले की - आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)- बाकी समाजाच्या (स्वतःला डेव्हलप्ड समजणा-या) अपेक्षा व त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ह्या मध्ये त्यांची किती कोंडी होत आहे ती.

In reply to by रणजित चितळे

कर्नलसाहेब, तुमचा प्रतिसाद समजला नाही. उदाहरणार्थ ~ "....आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)..." ~ सर, ते अंडरडेव्हल्पडच आहेत, आणि हे 'जे काही लोक' आहेत त्यात केन्द्र सरकारदेखील आहे. या देशातील सर्वच आदिवासी [ज्यांचा शासनदरबारी Tribal Communities अशी नोंद असून आजमितीला एकूण ६४५ जमाती असून यात उपजातींचा अजून समावेश केला तर हा आकडा आणखीन् वाढेल. एकट्या आपल्या महाराष्ट्रातच शासनमान्य ४७ आदिवासी जाती आहेत.] हे 'अत्यंत मागासलेल्या प्रक्रिये' त येतात [मागासवर्गीय हा वेगळा विषय आहे]. त्यामुळे तुमच्या कंसातील वाक्यामुळे असा समज होतो की 'काहीच लोक' त्याना अंडरडेव्हलप्ड मानतात.... तर वस्तुस्थिती तशी नाही. "....त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ..." ~ याचा खुलासा कराल ज्यादाचा? आय मीन.... कसले नैसर्गिक प्रत्युत्तर? प्लीज. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

रणजित चितळे 02/01/2013 - 18:56
त्या वेळेला मी फार घाईत तो प्रतिसाद लिहिला होता. माझे म्हणणे हे आहे की आपण त्यांना अंडर डेव्हलप्ड म्हणतो ते आपल्या परस्पेक्टीव्ह मधून त्यांच्या नाही. मी नॉर्थ इस्ट मध्ये सो कॉल्ड खासी ट्राईब्स बघितल्या आहेत त्यांचे कल्चर खूप पूढारलेले असते. ....बाकी विस्ताराने मग लिहिन. नैसर्गिक प्रत्युत्तर म्हणजे मला असे म्हणायचे होते की अशा ट्राईब्स नी स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी केलेला लढा हे आहे.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे.
एक सामान्य भारतीय म्हणून मलाही हेच म्हणावंसं वाटतंय. आय सॅल्यूट यू, सर!

प्यारे१ 23/02/2011 - 14:45
>>>>> पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस. विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी. तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला. तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात. आय सॅल्यूट यू, सर! >>>>> आय सॅल्यूट यू, सर!

स्पंदना 23/02/2011 - 14:57
हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो! अन विनील बद्दल म्हणाल तर ' सल्युट ' शिवाय डोक्यात आणी काही येण शक्यच नाही.

हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो!
असेच म्हणतो. राजेश पाटील, आय ए एस, कलेक्टर कोरापुट (मलकनगिरीचा शेजारी जिल्हा) आणि विनीलचे बॅचमेट यांनी ही एक लिंक फेसबुकावर डकवली आहे - http://72.78.249.107/Sakal/23Feb2011/Normal/Jalgaon/page6.htm बाकी या खुल्या पत्रात, पर्सनल टच असला तरी, काही कळीचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात यापुढे कसे काम करील, आणि पोलीस/ सीआरपी यांची भूमीका काय असणार आहे हा उत्सुकतेचा विषय आहे.

राही 23/02/2011 - 17:17
श्रामो,आपल्या लिखाणातून दिसणारी सामाजिक बांधिलकी आणि कळकळ नेहमीच आवडते. विनील यांना सर्व थरांतून सहानुभूती मिळाली हे खरे;(आणि ती योग्यच होती,)पण वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काही कळीचे मुद्दे उपस्थित होतात. यावेळी मुंबई बाँब हल्ल्यात (हकनाक?) बळी गेलेले निधड्या छातीचे,शूर, कर्तव्यदक्ष अधिकारी कामटे, करकरे आणि साळसकर यांची आठवण होते. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता नये असे म्हणतात.ज्यांची समाजाला अत्यंत गरज आहे आणि जे समाजासाठी भरघोस योगदान देत आहेत, देण्याची क्षमता बाळगून आहेत, त्यांनी आपल्याला समाजसेवेकरता अधिकाधिक संधी आणि समय मिळेल अशा तर्‍हेने आपला आयुष्यक्रम आखला पाहिजे.त्यांच्या क्षमतेमुळे आणि सुजाणपणामुळेच हे उत्तरदायित्व त्यांच्यावर येते. सुमार वकूबाच्या माणसाकडून कोणीही अपेक्षा ठेवत नाही हे आपण पाहातोच. शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.

In reply to by राही

विकास 23/02/2011 - 20:10
सहमत श्रामोंना धन्यवाद! शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. असेच वाटते... मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला ही कुठली स्वयंसेवी संस्था आहे? त्यांना कोण मदत करते?

In reply to by विकास

नितिन थत्ते 23/02/2011 - 22:38
सहमत आहे. ती संस्था कोणती हे कळून तिच्यावर कारवाई होणे आवश्यक. (ता. क. : आत्ता येत असलेल्या बातम्यांवरून विनील यांची सुटका झालेली नाही. पबित्र माझी यांचीच सुटका झाली आहे).

In reply to by नितिन थत्ते

वपाडाव 24/02/2011 - 11:16
ता. क. माओवाद्यांनी काही नवीन अटी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यांना अजुन ५ नक्षलवाद्यांची सुटका करुन हवी आहे. सविस्तर माहीती http://in.news.yahoo.com/maoists-fresh-demand-collectors-release-20110223-112100-608.html

In reply to by विकास

सखी 24/02/2011 - 00:52
सहमत श्रामोंना धन्यवाद! शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. असेच वाटते...

In reply to by राही

चिगो 24/02/2011 - 11:32
शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. शतशः धन्यवाद ह्या वाक्यासाठी... श्रामोंच्या "विनिल आणि..." ह्या धाग्यावर मी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रीयांमागे हीच भावना होती...

श्रावण मोडक 23/02/2011 - 18:44
'मी तो केवळ भारवाही' !!! पत्राचे सारे श्रेय सचिनचे. हे त्याला लिहावेसे वाटले. इथे मी दिले ते त्याने सुचवल्यानेच.

हे पत्र विनिलना लिहिण्यासाठी सचिन जाधवना आणि सचिनचे पत्र येथे दिल्याबद्दल श्रामोंना धन्यवाद, विनिल , सॅल्यूट टू यू सर! स्वाती

सलाम
बातमी वाचून आनंद झाला कि त्यांचे साथीदार सुटले .वाईट ह्याच गोष्टीचे कि त्यांच्या सुटकेची बातमी अजून आली नाही आहे .(पण ती कधी हि होऊ शकते ) एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद मला फक्त सीमेपलीकडील हालचाली दिसतात .त्यांचे कुसळ दिसते पण आपले अंतर्गत लाल मुसळ दिसत नाही . ह्या प्रकरण मध्यस्थीची भूमिका करणारे प्रोफेसर हर गोपाल ह्यांचे विशेष आभार

In reply to by गणपा

गणपा 23/02/2011 - 13:35
आताच आंजा मित्र राजेशी विनीत बद्दल बोलताना त्याने ह्या (डीएम रास्ते में, रिहाई किसी भी क्षण) बातमीचा दुवा दिला. आणि आनंद झाला... लवकरच सुटाका होवो.

'अगदी आमच्या मनातील विचार....' असे जरे श्री.सचिन जाधव यांच्या पत्राचे मूल्यमापन केले तर ते अगदी अचूक ठरेल. ते स्वतः एक आयएएस अधिकारी शिवाय भाषेवरून असे दिसते की श्री.विनीलबरोबर त्यांचे अगदी 'अरे-तुरे' चे संबंध आहेत त्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता त्यानी आपल्या भावना खुल्या केल्या आहेत, ज्या आम्ही (कदाचित काही मर्यादेमुळे) करू शकलो नसतो. उदा. : "...तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची?..." जरी श्री.जाधव यानी 'अन्यांच्या मनातील' विचार म्हणून वरील वाक्य आपल्या पत्रात कोट केले असले तरी का कोण जाणे मला खात्री आहे की खुद्द त्यांच्यासारख्या अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांनी तसे वाटले असणार. कारण 'विनील विषय' ज्यावेळी शांत होईल, त्याचवेळी ओरिसाच काय पण खुद्द आता केन्द्र सरकारचे गृहखातेही देशातील समस्त जिल्हाधिकारी आणि तत्सम दर्जांच्या अधिकार्‍यांसाठी एक श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणार आणि त्याचे नाव Ideal Manual असे राहून या मॅन्युअलमध्ये विनीलसम अधिकार्‍यांनी कोणत्या गोष्टीचे 'पालन' केले (च) पाहिजे यावर भर दिला जाणार. एकप्रकारे अधिकार्‍यांच्या विस्तारीत पंखावर मर्यादा आणणार. २. ..."पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? ..." ~ नक्कीच. विशेषतः या नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना जिवंत पकडण्यासाठी किती पोलिस्/एसआरपी आणि मिलिटरीचे जवान (उदा.दंतेवाडा कांड...) धारातिर्थी पडले असतील याची आकडेवारी शासकीय यंत्रणाच काय पण मिडियाकडेही असतेच, तर या गतप्राण झालेल्यांच्या नातेवाईकाना ते समूहखुनी सुटल्याच्या बातम्या पाहून्/वाचून कोणत्या प्रकारचे दु:ख होत असेल याची कल्पना केली तर श्री.विनीलच्या 'हीरो' पणाबद्दल वरील प्रश्न उभा राहू शकतोच. (इथे आठवण होते ती मणिरत्नमच्या 'रोजा' चित्रपटाची. मिलिटरी कर्नल '...अखेर सरकारने तुझ्या नवर्‍याच्या सुटकेच्या बदल्यात कैदेतील त्या अतिरेक्याला सोडण्याचा निर्णय घेतला...' असे रोजाला सांगतो, ती आनंदित होते....पण खिन्न झालेला हाच कर्नल पुढे असेही म्हणतो, "असो, त्या अतिरेक्याला पकडण्यासाठी आमचे किती सैनिक मारले गेले, मिलीटरीला किती प्रयत्न करावे लागले, याची आता चर्चा कोण करणार? आणि काय गरजही म्हणा....तुझा नवरा तरी सुखरूप येईल." इथे रोजाही क्षणभर सुन्न झाल्याचे दाखविले आहे.) पण असो....शेवटी पत्रात श्री.जाधव म्हणतात तसे "विनीलसारखे अधिकारी आम्हाला हवेतच.." इन्द्रा

विजुभाऊ 23/02/2011 - 13:54
श्रामो धन्यवाद . एका चांगले काही वाचायला मिळाले. अन्यथा कलेक्टर ऑफीसच्या बाहेर उपोषण करणारांचे मंडप दिसतात. दाढी वाढलेले चिंतातूर चेहेरे दिसतात . कलेकटराना या लोकाम्ची साधी दखल घ्यायला देखील वेळ नसतो

रणजित चितळे 23/02/2011 - 14:23
खर आहे सगळे मी सहमत आहे. मागे छत्तिसगढला कामा निमीत्ताने गेलो होतो तेव्हा समजले की - आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)- बाकी समाजाच्या (स्वतःला डेव्हलप्ड समजणा-या) अपेक्षा व त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ह्या मध्ये त्यांची किती कोंडी होत आहे ती.

In reply to by रणजित चितळे

कर्नलसाहेब, तुमचा प्रतिसाद समजला नाही. उदाहरणार्थ ~ "....आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)..." ~ सर, ते अंडरडेव्हल्पडच आहेत, आणि हे 'जे काही लोक' आहेत त्यात केन्द्र सरकारदेखील आहे. या देशातील सर्वच आदिवासी [ज्यांचा शासनदरबारी Tribal Communities अशी नोंद असून आजमितीला एकूण ६४५ जमाती असून यात उपजातींचा अजून समावेश केला तर हा आकडा आणखीन् वाढेल. एकट्या आपल्या महाराष्ट्रातच शासनमान्य ४७ आदिवासी जाती आहेत.] हे 'अत्यंत मागासलेल्या प्रक्रिये' त येतात [मागासवर्गीय हा वेगळा विषय आहे]. त्यामुळे तुमच्या कंसातील वाक्यामुळे असा समज होतो की 'काहीच लोक' त्याना अंडरडेव्हलप्ड मानतात.... तर वस्तुस्थिती तशी नाही. "....त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ..." ~ याचा खुलासा कराल ज्यादाचा? आय मीन.... कसले नैसर्गिक प्रत्युत्तर? प्लीज. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

रणजित चितळे 02/01/2013 - 18:56
त्या वेळेला मी फार घाईत तो प्रतिसाद लिहिला होता. माझे म्हणणे हे आहे की आपण त्यांना अंडर डेव्हलप्ड म्हणतो ते आपल्या परस्पेक्टीव्ह मधून त्यांच्या नाही. मी नॉर्थ इस्ट मध्ये सो कॉल्ड खासी ट्राईब्स बघितल्या आहेत त्यांचे कल्चर खूप पूढारलेले असते. ....बाकी विस्ताराने मग लिहिन. नैसर्गिक प्रत्युत्तर म्हणजे मला असे म्हणायचे होते की अशा ट्राईब्स नी स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी केलेला लढा हे आहे.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे.
एक सामान्य भारतीय म्हणून मलाही हेच म्हणावंसं वाटतंय. आय सॅल्यूट यू, सर!

प्यारे१ 23/02/2011 - 14:45
>>>>> पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस. विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी. तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला. तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात. आय सॅल्यूट यू, सर! >>>>> आय सॅल्यूट यू, सर!

स्पंदना 23/02/2011 - 14:57
हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो! अन विनील बद्दल म्हणाल तर ' सल्युट ' शिवाय डोक्यात आणी काही येण शक्यच नाही.

हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो!
असेच म्हणतो. राजेश पाटील, आय ए एस, कलेक्टर कोरापुट (मलकनगिरीचा शेजारी जिल्हा) आणि विनीलचे बॅचमेट यांनी ही एक लिंक फेसबुकावर डकवली आहे - http://72.78.249.107/Sakal/23Feb2011/Normal/Jalgaon/page6.htm बाकी या खुल्या पत्रात, पर्सनल टच असला तरी, काही कळीचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात यापुढे कसे काम करील, आणि पोलीस/ सीआरपी यांची भूमीका काय असणार आहे हा उत्सुकतेचा विषय आहे.

राही 23/02/2011 - 17:17
श्रामो,आपल्या लिखाणातून दिसणारी सामाजिक बांधिलकी आणि कळकळ नेहमीच आवडते. विनील यांना सर्व थरांतून सहानुभूती मिळाली हे खरे;(आणि ती योग्यच होती,)पण वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काही कळीचे मुद्दे उपस्थित होतात. यावेळी मुंबई बाँब हल्ल्यात (हकनाक?) बळी गेलेले निधड्या छातीचे,शूर, कर्तव्यदक्ष अधिकारी कामटे, करकरे आणि साळसकर यांची आठवण होते. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता नये असे म्हणतात.ज्यांची समाजाला अत्यंत गरज आहे आणि जे समाजासाठी भरघोस योगदान देत आहेत, देण्याची क्षमता बाळगून आहेत, त्यांनी आपल्याला समाजसेवेकरता अधिकाधिक संधी आणि समय मिळेल अशा तर्‍हेने आपला आयुष्यक्रम आखला पाहिजे.त्यांच्या क्षमतेमुळे आणि सुजाणपणामुळेच हे उत्तरदायित्व त्यांच्यावर येते. सुमार वकूबाच्या माणसाकडून कोणीही अपेक्षा ठेवत नाही हे आपण पाहातोच. शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.

In reply to by राही

विकास 23/02/2011 - 20:10
सहमत श्रामोंना धन्यवाद! शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. असेच वाटते... मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला ही कुठली स्वयंसेवी संस्था आहे? त्यांना कोण मदत करते?

In reply to by विकास

नितिन थत्ते 23/02/2011 - 22:38
सहमत आहे. ती संस्था कोणती हे कळून तिच्यावर कारवाई होणे आवश्यक. (ता. क. : आत्ता येत असलेल्या बातम्यांवरून विनील यांची सुटका झालेली नाही. पबित्र माझी यांचीच सुटका झाली आहे).

In reply to by नितिन थत्ते

वपाडाव 24/02/2011 - 11:16
ता. क. माओवाद्यांनी काही नवीन अटी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यांना अजुन ५ नक्षलवाद्यांची सुटका करुन हवी आहे. सविस्तर माहीती http://in.news.yahoo.com/maoists-fresh-demand-collectors-release-20110223-112100-608.html

In reply to by विकास

सखी 24/02/2011 - 00:52
सहमत श्रामोंना धन्यवाद! शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. असेच वाटते...

In reply to by राही

चिगो 24/02/2011 - 11:32
शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच. शतशः धन्यवाद ह्या वाक्यासाठी... श्रामोंच्या "विनिल आणि..." ह्या धाग्यावर मी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रीयांमागे हीच भावना होती...

श्रावण मोडक 23/02/2011 - 18:44
'मी तो केवळ भारवाही' !!! पत्राचे सारे श्रेय सचिनचे. हे त्याला लिहावेसे वाटले. इथे मी दिले ते त्याने सुचवल्यानेच.

हे पत्र विनिलना लिहिण्यासाठी सचिन जाधवना आणि सचिनचे पत्र येथे दिल्याबद्दल श्रामोंना धन्यवाद, विनिल , सॅल्यूट टू यू सर! स्वाती

सलाम
बातमी वाचून आनंद झाला कि त्यांचे साथीदार सुटले .वाईट ह्याच गोष्टीचे कि त्यांच्या सुटकेची बातमी अजून आली नाही आहे .(पण ती कधी हि होऊ शकते ) एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद मला फक्त सीमेपलीकडील हालचाली दिसतात .त्यांचे कुसळ दिसते पण आपले अंतर्गत लाल मुसळ दिसत नाही . ह्या प्रकरण मध्यस्थीची भूमिका करणारे प्रोफेसर हर गोपाल ह्यांचे विशेष आभार
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.

जागतीक मराठी भाषा दिन -२७ फेब्रु. २०११

धमाल मुलगा ·

सूर्यपुत्र 18/02/2011 - 20:03
मला खूप लिहायचे आहे, पण विषयच सापडत नाहीये.... :( एखादा मस्त २००/३०० प्रतिसाद येइल असा विषय सांगू शकाल काय? ;) आणि मराठी भाषा दिन २९ आणि ३० तारखेला का नाही साजरा करत? मधे असा खंड का? -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

रेवती 18/02/2011 - 20:21
आधी माझा नंबर आहे रे! गेले कित्येक महिने सगळ्यांना प्रतिसाद देत, गूळ लावत फिरतिये ती उगीच नाही.;) कोणतातरी श्लील अश्लीतेच्या सीमारेषेवरून जाणारा विषय, नाहीतर स्त्रीमुक्ती वगैरे.......;)

In reply to by स्वाती दिनेश

विकास 21/02/2011 - 08:19
कल्पना आवडली, मला पण आवडली! वेगवेगळ्या लेखांच्या मेजवानीची वाट पाहत आहे. वेगवेगळ्या मेजवानीच्या लेखांची वाट पहात आहे. ;)

कल्पना झकास आहे. लिहिण्यास प्रोत्साहान देणारी आहे. प्रत्येकाने जमेल तसं लेखन केले तर खर्‍या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा केला असे होईल. जमलं तर यानिमित्ताने काहीबाही खरडण्याचा प्रयत्न करतो....! -दिलीप बिरुटे

अगदी स्वागतार्ह अशीच सूचना आहे....[आणि ती मांडलीही आहे एकदम फर्मास भाषेत, त्यामुळे मराठीचा अस्सल बाजच नजरेसमोर आला आहे...!] जरूर या संदर्भात सर्वांनी "लेझीम" च्या तालात.....दिवस सुगीचे सुरू जाहले....म्हणावे असे वाटते. या दिवटीवर आपापल्या मतीने तेल घालून भुत्याला खूष करून टाकू. इन्द्रा

असुर 18/02/2011 - 21:25
लिवायचं त हैच, अगदी नक्की, जरा सोचून सांगतो. पन खरा संगतो, इकडल्या देशी पन इतके सवंगडी भ्येटून र्‍हायले द्येवा, वाटाय लागलं की आपली मर्‍हाटी भाशा आता गल्ली मोहल्ल्यांचे, गाव शहरांचे बंध तोडून पार जगापत्तूर, आनि जगाच्या पार विस्तारली है!!! आता कै कालजी नै! आनि कधीही, कुटेही, मराठी मानुश भेटला नै असा होनार नै! जगाच्या पाठीवर असे मर्‍हाटीची दिंडी खांद्यावर घेऊन वाजतगाजत मिरवणार्‍या सगळ्या वारकर्‍यांना आपला मानाचा मुजरा!!! --(मर्‍हाटी) असुर

कलंत्री 19/02/2011 - 11:29
सोप्या आणि मनाला भिडणार्‍या भाषेत धमालयांची प्रस्तावना मनाला भावली. सध्याचा काळखंड हा वैश्विकीकरणाचा आहे. या सर्व उपक्रमामध्ये फक्त मिपाकर अथवा मराठी भाषकांचा सहभाग घेण्याऐवजी इतरही भाषकांचा ही सहभाग घ्यायला प्रयत्न करावयाला हवा. माझ्या मनात अशी कल्पना आलेली आहे की आपल्या सभोवतालच्या सर्व मंडलीना बोलवावे आणि कवितावाचनाचा कार्यक्रम करावा. यात मराठी कवितातर असाव्यात आणि इतरही कविता वाचाव्यात. माझ्यामनात मधूशाला याचे वाचन करावे असे धाटत आहे. त्याचबरोबर हा दिवस का साजरा करतो किंवा करावा यावर मनोगत व्यक्त करावे असे वाटत आहे. जय महाराष्ट्र....

गंगाधर मुटे 19/02/2011 - 22:50
मेहेरबान, कद्रदान धमालपंत क्षमा असावी. आपुन काय बी लिवणार नाय. गपचाप बसणार. म्हंजे आसं बघा की, सोताचाच जन्मदिवस नाचत-कुदत कसाकाय साजरा करायचा हो. :)

In reply to by भडकमकर मास्तर

ओ मग तुम्ही कोनी लिहावे आनि कोनी लिहु नये ह्याचा धागा काढा ना बाकि दिवटेनी ह्या दिवशी लिहावे कि नाही?

In reply to by मुलूखावेगळी

सहज 20/02/2011 - 14:05
मास्तरांशी सहमत आहे. जागतीक मराठी साहीत्य संमेलनाला, जो तो व्यासपीठावर जाउन कला सादर करतो का? खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे. इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की. भावना पोहोचल्या. आनंद आहे. पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही.

In reply to by सहज

धमाल मुलगा 20/02/2011 - 17:04
खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे.
अप्रतिम कल्पना. मिपाचे जुने जाणते सदस्य माननिय सहजराव ह्यांच्या सुचनेचे मनापासून स्वागत करीत आहे. ह्याचसोबत, सहजरावांना अशी जाहीर विनंती करत आहे की अशा उत्तमोत्तम लेख, काव्य इत्यादी जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल त्याचे संकलनाची गोड जबाबदारी घ्यावी आणि मंडळाला उपकृत करावे. :) सहजरावांच्या अनुभवी नजरेतून आणि नीरक्षीरविवेकबुध्दीतून चाळून आलेले साहित्य हे केवळ दर्जेदार मेजवानीच ठरेल. >>इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की. अलबत! लिहू द्या की ओ. इतर दिवशीही लिहू द्या, तेव्हाही लिहू द्या. त्यानं काय आपला सर्व्हर झोपत नाय बगा. :) जे जे उत्तम ते ते प्रशंसेस नक्कीच पात्र होईल, नसेल ते मागे जाईल. काय? :) >>भावना पोहोचल्या. आनंद आहे. :) धन्यवाद! आपल्या माणसाकडून आलेल्या कौतुकाच्या दोन शब्दांनी देखील हुरुप वाढतो तो असा. तर मग तुम्ही कधी सामिल होताय? कधीपासून संकलन देताय? वाट पाहतो शेठ. :) >>पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही. फ्री फॉर ऑल मधील 'डिसऑर्डर' ह्यात कुठे आहे ते थोडं समजाऊन सांगाल तर आपण शक्य ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करुया की. बाकी, सेवा हा शब्द तुमचा. आमचं म्हणणं फक्त इतकंच, की हा सण साजरा करुया. सणावारी घरोघरी गोडाधोडाचं करतात, नवे कपडे, घराचे सुशोभन करतात. ते संकेतस्थळावर कसं करावं? तर ह्या तीन दिवसात येणारे लेख/कविता/स्फुट/ललित हे मराठी भाषा विषयावर असावं असा केवळ प्रयत्न. ह्या व्यतिरिक्त आणखी काही सुंदर कल्पना असतील तर त्याबद्दल हक्कानं सांगा ना. तुमचा अधिकारच आहे की हो. काय म्हणता? :)

In reply to by धमाल मुलगा

सहज 20/02/2011 - 18:44
बाब्बौ!! जोरदार तयारी केलेली दिसतेय!! :-) झिंदाबाद झिंदाबाद!

धमाल मुलगा 20/02/2011 - 17:28
@ सुर्यपुत्र / रेवती: 'मराठी भाषेची कॉर्पोरेट जगतात गळचेपी' किंवा 'मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण' हे विषय कसे वाटतायत? ;) @ बिरुटे गुर्जी: तुम्ही आणि 'जमेल तसं'? तेही मराठीच्या बाबतीत? काय राव, ल्हान हौत म्हणून अशी चेष्टा करायची का? आँ? :) @ इंद्रा: खरंच, येऊदे काही झक्कास तुझ्या पेश्शल ष्टाईलीत. मजा येईल. @पिंगू: राईट्ट साऽर्र :) @असुरः खरंय! हे असेच वाढता वाढता वाढे, भेदिले सुर्यमंडळा घडावे ऐसि प्रार्थना :) @पाषाणभेदः नेकी और पुछ पुछ? :) @अमित देवधरः धन्यवाद मित्रवर्य. @कलंत्री: जागतीक मराठी भाषादिनाबद्दलचे मनोगत वाचायला आवडेल आम्हाला. जरुर येऊ द्या. @चिगो: नागपूर...नागपूर... काय हाय का न्हाई नागपूरी खाक्या? ;) @नानु: येस्सार! @मुलखावेगळी: बढिया..प्रोसेसर्स आकडेमोडीला लागले की नाही? :) @मुटे:आँ? तुमचापण 'ह्याप्पी बड्डे' का? वा वा! @भडकमकर मास्तरः लै वेळा सहमत. तुम्ही कधी घेताय मनावर? बरं का मंडळी, हे भडकमकर मास्तर म्हणजे बगा येक नंबर लिहिणार...पुन्ना ते नाटक फिटक क्षेत्रातलंसुद्दा.. आता आश्या मान्सानं आपल्याला काय चार चांगलं शबुद लिव्हून दाखवायला होवं का न्हाई? :) मास्तुरे....मराठी रंगभूमीबद्दल आम्हा आडाण्यांना जरा काहीतरी सांगा की ओ. :)

रमताराम 20/02/2011 - 19:01
पहिला 'जालावरील सुद्धलेखनाची सद्यस्थिती: एक आकलन' हा विषय चालेल का? आणि दुसरा 'यावर कोण लिहिणार आहे?'

In reply to by प्रीत-मोहर

पैसा 22/02/2011 - 22:55
चुचु मराठीत लिहिते काय ती? म्ला आप्ल वात्ल ती चुचुवाणी नावाची नवी भाशा आहे! (चुचु, ह.घे. मी पळते आता नायतर मी मार खातेय आज!)

स्पंदना 21/02/2011 - 20:59
व्वा धमाल राव!! आवाहन लिहाव (की कराव?) तर अस. शब्द शब्द मनात उतरला . मराठी भाषेवर मराठीतुनच कस काय लिहाय्च बाइ? नाही म्हणजे पेनावर पेनाने लिहिणे तस मराठीवर मराठीत लिहिणे. एकुण लिहिणे तर? बघु काही जमल तर नजरे खालुन घालाय्ला पाठ्वुन देइन, आवडल तर प्रकाशीत करा.

In reply to by jaydip.kulkarni

नरेशकुमार 25/02/2011 - 06:44
काय राव, राग नका मानू पन सगळा मुडंच घालवायच काम करताय तुमी. हा अस्सा कीबोर्ड हातात घेतला, आनी तुमची परतिकिरिया वाचली.....

नीलकांत 25/02/2011 - 00:50
मराठी दिनानिमीत्तं मिसळपाववर काहीतरी विशेष व्हावं अशी अपेक्षा होतीच. धमालरावांनी पुढाकार घेऊन महत्वाचं काम केलं. आता सहसा न लिहीणार्‍या लोकांनी लिहीतं व्हायला हवं. खूप दिवसात संपर्कात नसलेल्या मित्राशी संवाद सुरू करायला त्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त उत्तम असतो तसं म्हणा हवं तर ! मात्र या दिवशी मराठी विषयाच्या संदर्भात लेख येऊ दया. - नीलकांत

सूर्यपुत्र 18/02/2011 - 20:03
मला खूप लिहायचे आहे, पण विषयच सापडत नाहीये.... :( एखादा मस्त २००/३०० प्रतिसाद येइल असा विषय सांगू शकाल काय? ;) आणि मराठी भाषा दिन २९ आणि ३० तारखेला का नाही साजरा करत? मधे असा खंड का? -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

रेवती 18/02/2011 - 20:21
आधी माझा नंबर आहे रे! गेले कित्येक महिने सगळ्यांना प्रतिसाद देत, गूळ लावत फिरतिये ती उगीच नाही.;) कोणतातरी श्लील अश्लीतेच्या सीमारेषेवरून जाणारा विषय, नाहीतर स्त्रीमुक्ती वगैरे.......;)

In reply to by स्वाती दिनेश

विकास 21/02/2011 - 08:19
कल्पना आवडली, मला पण आवडली! वेगवेगळ्या लेखांच्या मेजवानीची वाट पाहत आहे. वेगवेगळ्या मेजवानीच्या लेखांची वाट पहात आहे. ;)

कल्पना झकास आहे. लिहिण्यास प्रोत्साहान देणारी आहे. प्रत्येकाने जमेल तसं लेखन केले तर खर्‍या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा केला असे होईल. जमलं तर यानिमित्ताने काहीबाही खरडण्याचा प्रयत्न करतो....! -दिलीप बिरुटे

अगदी स्वागतार्ह अशीच सूचना आहे....[आणि ती मांडलीही आहे एकदम फर्मास भाषेत, त्यामुळे मराठीचा अस्सल बाजच नजरेसमोर आला आहे...!] जरूर या संदर्भात सर्वांनी "लेझीम" च्या तालात.....दिवस सुगीचे सुरू जाहले....म्हणावे असे वाटते. या दिवटीवर आपापल्या मतीने तेल घालून भुत्याला खूष करून टाकू. इन्द्रा

असुर 18/02/2011 - 21:25
लिवायचं त हैच, अगदी नक्की, जरा सोचून सांगतो. पन खरा संगतो, इकडल्या देशी पन इतके सवंगडी भ्येटून र्‍हायले द्येवा, वाटाय लागलं की आपली मर्‍हाटी भाशा आता गल्ली मोहल्ल्यांचे, गाव शहरांचे बंध तोडून पार जगापत्तूर, आनि जगाच्या पार विस्तारली है!!! आता कै कालजी नै! आनि कधीही, कुटेही, मराठी मानुश भेटला नै असा होनार नै! जगाच्या पाठीवर असे मर्‍हाटीची दिंडी खांद्यावर घेऊन वाजतगाजत मिरवणार्‍या सगळ्या वारकर्‍यांना आपला मानाचा मुजरा!!! --(मर्‍हाटी) असुर

कलंत्री 19/02/2011 - 11:29
सोप्या आणि मनाला भिडणार्‍या भाषेत धमालयांची प्रस्तावना मनाला भावली. सध्याचा काळखंड हा वैश्विकीकरणाचा आहे. या सर्व उपक्रमामध्ये फक्त मिपाकर अथवा मराठी भाषकांचा सहभाग घेण्याऐवजी इतरही भाषकांचा ही सहभाग घ्यायला प्रयत्न करावयाला हवा. माझ्या मनात अशी कल्पना आलेली आहे की आपल्या सभोवतालच्या सर्व मंडलीना बोलवावे आणि कवितावाचनाचा कार्यक्रम करावा. यात मराठी कवितातर असाव्यात आणि इतरही कविता वाचाव्यात. माझ्यामनात मधूशाला याचे वाचन करावे असे धाटत आहे. त्याचबरोबर हा दिवस का साजरा करतो किंवा करावा यावर मनोगत व्यक्त करावे असे वाटत आहे. जय महाराष्ट्र....

गंगाधर मुटे 19/02/2011 - 22:50
मेहेरबान, कद्रदान धमालपंत क्षमा असावी. आपुन काय बी लिवणार नाय. गपचाप बसणार. म्हंजे आसं बघा की, सोताचाच जन्मदिवस नाचत-कुदत कसाकाय साजरा करायचा हो. :)

In reply to by भडकमकर मास्तर

ओ मग तुम्ही कोनी लिहावे आनि कोनी लिहु नये ह्याचा धागा काढा ना बाकि दिवटेनी ह्या दिवशी लिहावे कि नाही?

In reply to by मुलूखावेगळी

सहज 20/02/2011 - 14:05
मास्तरांशी सहमत आहे. जागतीक मराठी साहीत्य संमेलनाला, जो तो व्यासपीठावर जाउन कला सादर करतो का? खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे. इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की. भावना पोहोचल्या. आनंद आहे. पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही.

In reply to by सहज

धमाल मुलगा 20/02/2011 - 17:04
खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे.
अप्रतिम कल्पना. मिपाचे जुने जाणते सदस्य माननिय सहजराव ह्यांच्या सुचनेचे मनापासून स्वागत करीत आहे. ह्याचसोबत, सहजरावांना अशी जाहीर विनंती करत आहे की अशा उत्तमोत्तम लेख, काव्य इत्यादी जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल त्याचे संकलनाची गोड जबाबदारी घ्यावी आणि मंडळाला उपकृत करावे. :) सहजरावांच्या अनुभवी नजरेतून आणि नीरक्षीरविवेकबुध्दीतून चाळून आलेले साहित्य हे केवळ दर्जेदार मेजवानीच ठरेल. >>इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की. अलबत! लिहू द्या की ओ. इतर दिवशीही लिहू द्या, तेव्हाही लिहू द्या. त्यानं काय आपला सर्व्हर झोपत नाय बगा. :) जे जे उत्तम ते ते प्रशंसेस नक्कीच पात्र होईल, नसेल ते मागे जाईल. काय? :) >>भावना पोहोचल्या. आनंद आहे. :) धन्यवाद! आपल्या माणसाकडून आलेल्या कौतुकाच्या दोन शब्दांनी देखील हुरुप वाढतो तो असा. तर मग तुम्ही कधी सामिल होताय? कधीपासून संकलन देताय? वाट पाहतो शेठ. :) >>पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही. फ्री फॉर ऑल मधील 'डिसऑर्डर' ह्यात कुठे आहे ते थोडं समजाऊन सांगाल तर आपण शक्य ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करुया की. बाकी, सेवा हा शब्द तुमचा. आमचं म्हणणं फक्त इतकंच, की हा सण साजरा करुया. सणावारी घरोघरी गोडाधोडाचं करतात, नवे कपडे, घराचे सुशोभन करतात. ते संकेतस्थळावर कसं करावं? तर ह्या तीन दिवसात येणारे लेख/कविता/स्फुट/ललित हे मराठी भाषा विषयावर असावं असा केवळ प्रयत्न. ह्या व्यतिरिक्त आणखी काही सुंदर कल्पना असतील तर त्याबद्दल हक्कानं सांगा ना. तुमचा अधिकारच आहे की हो. काय म्हणता? :)

In reply to by धमाल मुलगा

सहज 20/02/2011 - 18:44
बाब्बौ!! जोरदार तयारी केलेली दिसतेय!! :-) झिंदाबाद झिंदाबाद!

धमाल मुलगा 20/02/2011 - 17:28
@ सुर्यपुत्र / रेवती: 'मराठी भाषेची कॉर्पोरेट जगतात गळचेपी' किंवा 'मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण' हे विषय कसे वाटतायत? ;) @ बिरुटे गुर्जी: तुम्ही आणि 'जमेल तसं'? तेही मराठीच्या बाबतीत? काय राव, ल्हान हौत म्हणून अशी चेष्टा करायची का? आँ? :) @ इंद्रा: खरंच, येऊदे काही झक्कास तुझ्या पेश्शल ष्टाईलीत. मजा येईल. @पिंगू: राईट्ट साऽर्र :) @असुरः खरंय! हे असेच वाढता वाढता वाढे, भेदिले सुर्यमंडळा घडावे ऐसि प्रार्थना :) @पाषाणभेदः नेकी और पुछ पुछ? :) @अमित देवधरः धन्यवाद मित्रवर्य. @कलंत्री: जागतीक मराठी भाषादिनाबद्दलचे मनोगत वाचायला आवडेल आम्हाला. जरुर येऊ द्या. @चिगो: नागपूर...नागपूर... काय हाय का न्हाई नागपूरी खाक्या? ;) @नानु: येस्सार! @मुलखावेगळी: बढिया..प्रोसेसर्स आकडेमोडीला लागले की नाही? :) @मुटे:आँ? तुमचापण 'ह्याप्पी बड्डे' का? वा वा! @भडकमकर मास्तरः लै वेळा सहमत. तुम्ही कधी घेताय मनावर? बरं का मंडळी, हे भडकमकर मास्तर म्हणजे बगा येक नंबर लिहिणार...पुन्ना ते नाटक फिटक क्षेत्रातलंसुद्दा.. आता आश्या मान्सानं आपल्याला काय चार चांगलं शबुद लिव्हून दाखवायला होवं का न्हाई? :) मास्तुरे....मराठी रंगभूमीबद्दल आम्हा आडाण्यांना जरा काहीतरी सांगा की ओ. :)

रमताराम 20/02/2011 - 19:01
पहिला 'जालावरील सुद्धलेखनाची सद्यस्थिती: एक आकलन' हा विषय चालेल का? आणि दुसरा 'यावर कोण लिहिणार आहे?'

In reply to by प्रीत-मोहर

पैसा 22/02/2011 - 22:55
चुचु मराठीत लिहिते काय ती? म्ला आप्ल वात्ल ती चुचुवाणी नावाची नवी भाशा आहे! (चुचु, ह.घे. मी पळते आता नायतर मी मार खातेय आज!)

स्पंदना 21/02/2011 - 20:59
व्वा धमाल राव!! आवाहन लिहाव (की कराव?) तर अस. शब्द शब्द मनात उतरला . मराठी भाषेवर मराठीतुनच कस काय लिहाय्च बाइ? नाही म्हणजे पेनावर पेनाने लिहिणे तस मराठीवर मराठीत लिहिणे. एकुण लिहिणे तर? बघु काही जमल तर नजरे खालुन घालाय्ला पाठ्वुन देइन, आवडल तर प्रकाशीत करा.

In reply to by jaydip.kulkarni

नरेशकुमार 25/02/2011 - 06:44
काय राव, राग नका मानू पन सगळा मुडंच घालवायच काम करताय तुमी. हा अस्सा कीबोर्ड हातात घेतला, आनी तुमची परतिकिरिया वाचली.....

नीलकांत 25/02/2011 - 00:50
मराठी दिनानिमीत्तं मिसळपाववर काहीतरी विशेष व्हावं अशी अपेक्षा होतीच. धमालरावांनी पुढाकार घेऊन महत्वाचं काम केलं. आता सहसा न लिहीणार्‍या लोकांनी लिहीतं व्हायला हवं. खूप दिवसात संपर्कात नसलेल्या मित्राशी संवाद सुरू करायला त्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त उत्तम असतो तसं म्हणा हवं तर ! मात्र या दिवशी मराठी विषयाच्या संदर्भात लेख येऊ दया. - नीलकांत
लेखनप्रकार
राम राम गावकरीहों! काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :) आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा! तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :) आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत. ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया.

वेले

विकि ·

शुचि 11/02/2011 - 23:00
लेखकाने मन्या हे पात्र खूपच "डायनॅमिक" आणि "डॅशिंग" रंगविले आहे. पराभूत नहोता ज्या रीतीने या पात्राने आपल्या पराभवास कलाटणी दिली आहे ते पहाता, राजकीय वर्तुळात त्याचा प्रवेश व्हावा यात काहीच नवल नाही. हा लेख मला तरी सकारात्मक जडणघडणीच्या दृष्टीकोनातून उत्तम मानसिक विश्लेषण करणारा वाटला.

विकास 11/02/2011 - 23:09
विकीच्या पुनरागमनाबद्दल सुस्वागतम! :-) लेख मजेदार आहे. "शुक शुक मन्या जातोस का नाही! " या गाण्याची आठवण झाली.

मस्त कलंदर 12/02/2011 - 00:01
मला यावरून ही जुनीच गोष्ट आठवली: एका झाडूवाल्याची नोकरी मागायला गेलेल्या माणसाकडे इमेल आयडी नसतो म्हणून त्याला नोकरी मिळत नाही पण कालांतराने तो मोठा बनतो, तेव्हा त्याला लोक म्हणतात,"इतक्या मोठ्या माणसाकडे एक साधा इमेल आयडीदेखील नाही? तो असता तर आज तो कुठल्या कुठे असता!!!!"

आजानुकर्ण 12/02/2011 - 00:03
मन्या अंमळ सैणिक दिसतो. अणेक सैणिक याच कारणासाठी वॅलेण्टाईण डेला विरोध करत असावेत.

५० फक्त 12/02/2011 - 00:26
मन्या सैनिक तर आहेच पण कालेजात न गेल्यानं त्याची राष्ट्रिय सेवा शिबिरं पण हुकली आहेत ना, तिथं गेलात तर व्हॅलेंटाईन डेची गरज च पडत नाही. बाकी विकी लेख आवडला. मजा आली. आजा नचले मधला साईड हिरो डोळयासमोर आला.

झंम्प्या 12/02/2011 - 10:09
"मनी भडकते तुझी हिंम्मतच कशी झाली , मला विचारायची. असे म्हणुन मन्याच्या श्रीमुखात भडकावते. चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन. असे म्हणुन ती निघून जाते." हे असं घड्तं म्हणुन आम्ही आमचे बरेच वेलेंटाईन डे वाया घालवले. जर आम्हीही मन्यागत डेरींग केली असती तर... कोनास ठाउक... आम्हीही निदान नगसेवत नाही तर... वार्डाचा उपाध्यक्श तरी झालो असतो. असो... लेखातुन प्रेरना मिळाली.

महेश-मया 12/02/2011 - 12:21
कॊलेजचे दिवस आठवले, तेव्हा आम्हि प्रथम वॅलेण्टाईण डे साजरा करायचो, आमचं झाल नंतर त्याला विरोध करायला जायचो, पन अजुन पर्यंत आम्हाला साध नगरसेवकाच टिकीट काहि नाहि मिळाले. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अशा भरपुर स्त्रिया आमच्या जिवनात आल्या आणि गेल्या पन यश काय ते म्हनतात ते काय अजुन नाय आले

शुचि 11/02/2011 - 23:00
लेखकाने मन्या हे पात्र खूपच "डायनॅमिक" आणि "डॅशिंग" रंगविले आहे. पराभूत नहोता ज्या रीतीने या पात्राने आपल्या पराभवास कलाटणी दिली आहे ते पहाता, राजकीय वर्तुळात त्याचा प्रवेश व्हावा यात काहीच नवल नाही. हा लेख मला तरी सकारात्मक जडणघडणीच्या दृष्टीकोनातून उत्तम मानसिक विश्लेषण करणारा वाटला.

विकास 11/02/2011 - 23:09
विकीच्या पुनरागमनाबद्दल सुस्वागतम! :-) लेख मजेदार आहे. "शुक शुक मन्या जातोस का नाही! " या गाण्याची आठवण झाली.

मस्त कलंदर 12/02/2011 - 00:01
मला यावरून ही जुनीच गोष्ट आठवली: एका झाडूवाल्याची नोकरी मागायला गेलेल्या माणसाकडे इमेल आयडी नसतो म्हणून त्याला नोकरी मिळत नाही पण कालांतराने तो मोठा बनतो, तेव्हा त्याला लोक म्हणतात,"इतक्या मोठ्या माणसाकडे एक साधा इमेल आयडीदेखील नाही? तो असता तर आज तो कुठल्या कुठे असता!!!!"

आजानुकर्ण 12/02/2011 - 00:03
मन्या अंमळ सैणिक दिसतो. अणेक सैणिक याच कारणासाठी वॅलेण्टाईण डेला विरोध करत असावेत.

५० फक्त 12/02/2011 - 00:26
मन्या सैनिक तर आहेच पण कालेजात न गेल्यानं त्याची राष्ट्रिय सेवा शिबिरं पण हुकली आहेत ना, तिथं गेलात तर व्हॅलेंटाईन डेची गरज च पडत नाही. बाकी विकी लेख आवडला. मजा आली. आजा नचले मधला साईड हिरो डोळयासमोर आला.

झंम्प्या 12/02/2011 - 10:09
"मनी भडकते तुझी हिंम्मतच कशी झाली , मला विचारायची. असे म्हणुन मन्याच्या श्रीमुखात भडकावते. चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन. असे म्हणुन ती निघून जाते." हे असं घड्तं म्हणुन आम्ही आमचे बरेच वेलेंटाईन डे वाया घालवले. जर आम्हीही मन्यागत डेरींग केली असती तर... कोनास ठाउक... आम्हीही निदान नगसेवत नाही तर... वार्डाचा उपाध्यक्श तरी झालो असतो. असो... लेखातुन प्रेरना मिळाली.

महेश-मया 12/02/2011 - 12:21
कॊलेजचे दिवस आठवले, तेव्हा आम्हि प्रथम वॅलेण्टाईण डे साजरा करायचो, आमचं झाल नंतर त्याला विरोध करायला जायचो, पन अजुन पर्यंत आम्हाला साध नगरसेवकाच टिकीट काहि नाहि मिळाले. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अशा भरपुर स्त्रिया आमच्या जिवनात आल्या आणि गेल्या पन यश काय ते म्हनतात ते काय अजुन नाय आले
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्प्प्प

कट्टी अलमट्टीशी

शरदिनी ·

अमोल केळकर 04/02/2011 - 15:16
वा वा छान कविता बनवलीत पण :( ४ एक वर्षापुर्वी अलमट्टी धरणामुळे सांगली परिसरात कृष्णेला आलेला महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसान - बापरे !! नकोतच त्या आठवणी परत !!! (सांगली कर ) अमोल

गणपा 04/02/2011 - 15:36
* उखाणे * नृत्य * संगीत * धोरण * व्याकरण * व्युत्पत्ती * शब्दक्रीडा * शृंगार * भयानक * कृष्णमुर्ती *बिभत्स * राजकारण * करुण * मौजमजा * वीररस * अद्भुतरस * रेखाटन * रौद्ररस ही ठळक कॅटेगरी. शब्दशः पटली. ;) बाकी नेहमी प्रमाणेच एक लयबद्ध काव्य.. जाणकारांकडुन याच निरुपण वाचण्यास उत्सुक..

मैत्र 04/02/2011 - 15:45
शरदिनी तै आपल्या नावाला आणि कवितेला जागल्या या वेळी.. कर्मदरिद्री दधीची,डिग्गी राजा, टेन नंबरी, रिक्की फिक्की, पूजा बात्रा, वाय एस एल - बरंच समजलं होतं... यावेळी मात्र अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म !

In reply to by मैत्र

केशवसुमार 06/02/2011 - 21:48
अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म ! केशवसुमार

मानस् 04/02/2011 - 17:10
मस्तच!!!काय भन्नाट शब्द वापरले आहेत्.एखादे संस्क्रुत काव्य वाचत असल्यासारखे वाटले.जरा अर्थ पण समजावून सांगा कोणी.माझा ४ वर्षाचा मुलगा पण असेच न समजणारे शब्द जोडून गाणी म्हणत असतो.

वाहीदा 04/02/2011 - 17:37
आपल्या मितानचे लेख कसे काय चोरीला जातात अन तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ग ?? (देव करो कोणाचेच लिखाण चोरीला न जावो पण एक शंका..) काय महाभन्नाट लिहतेस बाब्बो ! कधी तरी स्वत:च्या कवितेचे रसग्रहण तरी कर ग बाई , का छळतेस, असे चित्र विचित्र शब्दजंजाळ टाकून ?

५० फक्त 04/02/2011 - 17:43
शरदिनितैच्या कविता ह्या पुन्हा बहरात आलेल्या आहेत याची सर्व जालवाचकांनी नोंद घ्यावी व या वाटेला आपल्या आपल्या जबाबदारीवर यावे ही नम्र सुचना, हुकुमावरुन / ; / ] \ \ - = / ., ' ; / दाणादिणि.. तसेच या कवितेला संगीतबद्ध करुन त्यावर न्रुत्य करायला ''म्हागुरु'' सांगावे म्हणजे ते फुकटचे टिरी बडवुन नाही ते पालथे धंदे करायचे थांबवतील.

क्रान्ति 04/02/2011 - 20:26
खाता खाता चारा वैरण कुठून आली ठण्ठण ढण्ढण अलमट्टीची कट्टी वाचुन खड्ड्यात पडला रेडा तत्क्षण! आणि म्हणाला.............. सांगा सत्वर कुणी पाडली कशी गाडली खोली अलमट्टीची!!!!!!!!!!!!!!!!

विजुभाऊ 06/02/2011 - 09:51
बुद्धी नेव्हर वांछी वावा प्राचीन आणि अर्वाचीन शब्दांचा मिलाफ पाहून डोळे पाणावले ( कोण रे म्हणाला जडावले म्हणून ) शरदिनी काका ( आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते ) छान छान कविता आहे.

ज्ञानराम 07/02/2011 - 14:52
कविता छान आहे,, जिभेला व्यायाम.. पण बाउन्सर गेली.. अर्थ कळाला तर फार बर होईल. रचना छान आहे,, काही तरी नवीन वाचायला मिळालं... लहान पणीची कटट्टी-बट्टी आठवली...

अमोल केळकर 04/02/2011 - 15:16
वा वा छान कविता बनवलीत पण :( ४ एक वर्षापुर्वी अलमट्टी धरणामुळे सांगली परिसरात कृष्णेला आलेला महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसान - बापरे !! नकोतच त्या आठवणी परत !!! (सांगली कर ) अमोल

गणपा 04/02/2011 - 15:36
* उखाणे * नृत्य * संगीत * धोरण * व्याकरण * व्युत्पत्ती * शब्दक्रीडा * शृंगार * भयानक * कृष्णमुर्ती *बिभत्स * राजकारण * करुण * मौजमजा * वीररस * अद्भुतरस * रेखाटन * रौद्ररस ही ठळक कॅटेगरी. शब्दशः पटली. ;) बाकी नेहमी प्रमाणेच एक लयबद्ध काव्य.. जाणकारांकडुन याच निरुपण वाचण्यास उत्सुक..

मैत्र 04/02/2011 - 15:45
शरदिनी तै आपल्या नावाला आणि कवितेला जागल्या या वेळी.. कर्मदरिद्री दधीची,डिग्गी राजा, टेन नंबरी, रिक्की फिक्की, पूजा बात्रा, वाय एस एल - बरंच समजलं होतं... यावेळी मात्र अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म !

In reply to by मैत्र

केशवसुमार 06/02/2011 - 21:48
अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म ! केशवसुमार

मानस् 04/02/2011 - 17:10
मस्तच!!!काय भन्नाट शब्द वापरले आहेत्.एखादे संस्क्रुत काव्य वाचत असल्यासारखे वाटले.जरा अर्थ पण समजावून सांगा कोणी.माझा ४ वर्षाचा मुलगा पण असेच न समजणारे शब्द जोडून गाणी म्हणत असतो.

वाहीदा 04/02/2011 - 17:37
आपल्या मितानचे लेख कसे काय चोरीला जातात अन तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ग ?? (देव करो कोणाचेच लिखाण चोरीला न जावो पण एक शंका..) काय महाभन्नाट लिहतेस बाब्बो ! कधी तरी स्वत:च्या कवितेचे रसग्रहण तरी कर ग बाई , का छळतेस, असे चित्र विचित्र शब्दजंजाळ टाकून ?

५० फक्त 04/02/2011 - 17:43
शरदिनितैच्या कविता ह्या पुन्हा बहरात आलेल्या आहेत याची सर्व जालवाचकांनी नोंद घ्यावी व या वाटेला आपल्या आपल्या जबाबदारीवर यावे ही नम्र सुचना, हुकुमावरुन / ; / ] \ \ - = / ., ' ; / दाणादिणि.. तसेच या कवितेला संगीतबद्ध करुन त्यावर न्रुत्य करायला ''म्हागुरु'' सांगावे म्हणजे ते फुकटचे टिरी बडवुन नाही ते पालथे धंदे करायचे थांबवतील.

क्रान्ति 04/02/2011 - 20:26
खाता खाता चारा वैरण कुठून आली ठण्ठण ढण्ढण अलमट्टीची कट्टी वाचुन खड्ड्यात पडला रेडा तत्क्षण! आणि म्हणाला.............. सांगा सत्वर कुणी पाडली कशी गाडली खोली अलमट्टीची!!!!!!!!!!!!!!!!

विजुभाऊ 06/02/2011 - 09:51
बुद्धी नेव्हर वांछी वावा प्राचीन आणि अर्वाचीन शब्दांचा मिलाफ पाहून डोळे पाणावले ( कोण रे म्हणाला जडावले म्हणून ) शरदिनी काका ( आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते ) छान छान कविता आहे.

ज्ञानराम 07/02/2011 - 14:52
कविता छान आहे,, जिभेला व्यायाम.. पण बाउन्सर गेली.. अर्थ कळाला तर फार बर होईल. रचना छान आहे,, काही तरी नवीन वाचायला मिळालं... लहान पणीची कटट्टी-बट्टी आठवली...
चारा वैरण नेसून पैरण विकसित मार्गा ऊर्जा भक्षण नकोनको ते एकलजीवन बुद्धी नेव्हर वांछी अट्टल चोरा कत्तल साची डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची कशास मागे धावून पाहे उंची अलमट्टीची तवंग कट्टर भालाबरची प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची नोनचिचुंद्री कुरतडचीची गोचीड पंखी लोभस गोची सांगा सत्वर .... कुठे वाढली किती जाहली ................उंची अलमट्टीची ??? आर्द्रलाकडे बोलटभीरू भल्या पहाटे उठला मोरू दिव्या काव्या बेहतरनारू कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू तोडमोजड्या सलज्जचोच्या कलादुगाण्या गोरजमिथ्या पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या जळूवाकडे द्विदलकुपथ्या उजाडबागी तद्धितझोला हटयोग्याचा स्वतंत्र चेला अटकेपारी तुरुंग लोला तख्