काॅफी ही निमित्तमात्र..
मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..