मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

मानाचा मुजरा!

चतुरंग ·

शितल 24/04/2008 - 23:34
अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!

वरदा 25/04/2008 - 01:03
झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....

विसोबा खेचर 25/04/2008 - 11:04
जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.

सहज 25/04/2008 - 11:21
मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )

शितल 24/04/2008 - 23:34
अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!

वरदा 25/04/2008 - 01:03
झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....

विसोबा खेचर 25/04/2008 - 11:04
जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.

सहज 25/04/2008 - 11:21
मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )
अठरावर्षांपूर्वी घडले एक पहा नवल चेंडु-फळीचा खेळ खेळण्या पडे एक पाऊल वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे असा घडविती शिष्यच तेची गुरु 'रमाकांत' स्वर्गीय पित्याचा पुत्र असे हा खरा मातृभक्त 'अजित' राहुनी निभवी तोही धाकलीच पाती खेळामधला 'डॉन'ही त्याला देई यशोपावती जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुरंग

(गजल)

चतुरंग ·
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग

गझल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रमोद देव 21/04/2008 - 19:52
बिरुटे साहेब तुम्ही छुपे रुस्तम निघालात. एकदम गजल लिहीलीत! तब्येत वगैरे ठीक आहे ना? प्रयत्न चांगला आहे. फारच निराशावादी सुर लावलाय तुम्ही असे वाटतेय. पण मला त्यात जास्त काही कळत नाही तेव्हा मनावर घेऊ नका बरं का. आता इथले तज्ञ त्यावर साधक बाधक चर्चा करतीलच. झालंच तर सुचवण्या देतील. तेव्हा तयार राहा मरणाला.(जाल कुठे म्हणा!) :))))))))) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 21/04/2008 - 23:00
बिरुटे सर, तुम्ही पुन्हा काव्यस्फुरण आमच्यापर्यंत पोचवू लागलात, ही आनंदाची गोष्ट आहे. बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. (विडंबनाला तयार राहा !! :-)

देवसाहेब, धनंजय,
प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!
 'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!!
 पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे.
या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :)
प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच.  त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदय सप्रे 22/04/2008 - 11:47
प्रा.बिरुटे , गझल छान आहे , पण याला सुरेश भट यांच्या "एल्गार" या गझलेचा फारच दरवळ आहे ..... या २ शेवटच्या ओळी बघा : ही जात कोण माझी , जाताच जात नाही पण "जाती"वादींची , "लोकसभे" त धाव आहे ! पाळू नयेत कोणी जाती-जमाती येथे सगळ्या गल्लाभरूंचा आरक्षणाचा घाव आहे ! ----------------राम नगरकर यांच्या "रामनगरी" मधील वाक्य आठवले : जी जात नाही, ती जात !

विसोबा खेचर 22/04/2008 - 08:24
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे या ओळी फारच सुंदर! क्या बात है बिरुटेशेठ! च्यामारी, तुम्ही इतकं उत्तम काव्य करता हे माहितीच नव्हतं! अजूनही येऊ द्या! आपला, (बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.

अजय जोशी 22/04/2008 - 09:05
जमवा की राव ... अहो, काही कवी वृत्तबद्ध काव्याशिवाय कशालाच कविता म्हणत नाहीत. काही कवींच्या मते वृत्तापेक्षा वृत्तीला पहावे. मला आपल्या काव्यात सचोटी वाटली. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

शितल 22/04/2008 - 18:02
गझल म्हणत नाही पण तुम्ही केलेली रचना, तुम्हाला काय सा॑गायचे आहे ह्याचा उलघडा करते, कारण, आन॑द समजुन घेण्याच्या अनेक वाटा आहेत , पण दु:खाचे तसे नाही, म्हणुन दर्दी काव्याच्या वाटा फार विरळ. तुमच्या आणखी काव्य रचना वाचायला आवडतील.

सूर्य 23/04/2008 - 12:04
टेक्नीकली गझल म्हणुन कशी आहे हे सांगता येणार नाही. परंतु अतिशय संवेदनशील कविता आहे हे एक सामान्य वाचक म्हणुन म्हणू शकतो. आवडली सर. - सूर्य

बिरुटे सर, तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चा॑गला आहे कि असे वाटत नाही हा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुमच्या अजुन काच्यरचना वाचायला आवडतील. जर आशावादी असतील तर अजुन आवडतील. तुमचा एक विद्यार्थी, शेवटचा बाजीराव

गझल शिर्षक असलेल्या पण मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता ( शब्द माहित आहेत हो, उपयोग करता येत नाही ) यांचा कोणताच ताळेमळ नसतांना केलेल्या कौतुकाने प्रा.डॉ. मिसळनवाज खूष झाले आहेत. पुढे जेव्हा गझल लिहू तेव्हा गझलेचे सर्व धर्म पाळण्याचा प्रयत्न करु !!! प्रमोद देव, धनंजय, तात्या,सप्रेम साहेब,आनंदयात्री, अजय जोशी,मदनबाण,शितल, विदेश,सुर्य, विसुनाना,शेवटचा बाजीराव्,चतुरंग,चित्रा,आणि स्वाती....आमच्या अशा प्रकारच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल आम्ही आपले आणि वाचकांचेही शुक्रगुजार आहोत. विशेष आभार :- मिसळपाववर अक्षररंगाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निलकांतचे, तात्याचे, आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु 24/04/2008 - 13:34
बिरूटे सर.. यू टू???? :)) आवडली कविता. ..अतिशय सुरेख अर्थ.. गझल लिहिण्याचा मी ही कित्येक दिवस प्रयत्न करते आहे पण जमत नाहिये... पण नक्की जमेल एकेदिवशी... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिरुटे सर गझल करतात हे माहित नव्हते. गझल आवडली. (जुने धागे उचकटत असताना सहजच सापडली. नवीन लोकांच्या वाचनात आली नसेल म्हणुन सहजच वर आणली.)

प्रमोद देव 21/04/2008 - 19:52
बिरुटे साहेब तुम्ही छुपे रुस्तम निघालात. एकदम गजल लिहीलीत! तब्येत वगैरे ठीक आहे ना? प्रयत्न चांगला आहे. फारच निराशावादी सुर लावलाय तुम्ही असे वाटतेय. पण मला त्यात जास्त काही कळत नाही तेव्हा मनावर घेऊ नका बरं का. आता इथले तज्ञ त्यावर साधक बाधक चर्चा करतीलच. झालंच तर सुचवण्या देतील. तेव्हा तयार राहा मरणाला.(जाल कुठे म्हणा!) :))))))))) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 21/04/2008 - 23:00
बिरुटे सर, तुम्ही पुन्हा काव्यस्फुरण आमच्यापर्यंत पोचवू लागलात, ही आनंदाची गोष्ट आहे. बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. (विडंबनाला तयार राहा !! :-)

देवसाहेब, धनंजय,
प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!
 'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!!
 पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे.
या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :)
प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच.  त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदय सप्रे 22/04/2008 - 11:47
प्रा.बिरुटे , गझल छान आहे , पण याला सुरेश भट यांच्या "एल्गार" या गझलेचा फारच दरवळ आहे ..... या २ शेवटच्या ओळी बघा : ही जात कोण माझी , जाताच जात नाही पण "जाती"वादींची , "लोकसभे" त धाव आहे ! पाळू नयेत कोणी जाती-जमाती येथे सगळ्या गल्लाभरूंचा आरक्षणाचा घाव आहे ! ----------------राम नगरकर यांच्या "रामनगरी" मधील वाक्य आठवले : जी जात नाही, ती जात !

विसोबा खेचर 22/04/2008 - 08:24
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे या ओळी फारच सुंदर! क्या बात है बिरुटेशेठ! च्यामारी, तुम्ही इतकं उत्तम काव्य करता हे माहितीच नव्हतं! अजूनही येऊ द्या! आपला, (बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.

अजय जोशी 22/04/2008 - 09:05
जमवा की राव ... अहो, काही कवी वृत्तबद्ध काव्याशिवाय कशालाच कविता म्हणत नाहीत. काही कवींच्या मते वृत्तापेक्षा वृत्तीला पहावे. मला आपल्या काव्यात सचोटी वाटली. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

शितल 22/04/2008 - 18:02
गझल म्हणत नाही पण तुम्ही केलेली रचना, तुम्हाला काय सा॑गायचे आहे ह्याचा उलघडा करते, कारण, आन॑द समजुन घेण्याच्या अनेक वाटा आहेत , पण दु:खाचे तसे नाही, म्हणुन दर्दी काव्याच्या वाटा फार विरळ. तुमच्या आणखी काव्य रचना वाचायला आवडतील.

सूर्य 23/04/2008 - 12:04
टेक्नीकली गझल म्हणुन कशी आहे हे सांगता येणार नाही. परंतु अतिशय संवेदनशील कविता आहे हे एक सामान्य वाचक म्हणुन म्हणू शकतो. आवडली सर. - सूर्य

बिरुटे सर, तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चा॑गला आहे कि असे वाटत नाही हा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुमच्या अजुन काच्यरचना वाचायला आवडतील. जर आशावादी असतील तर अजुन आवडतील. तुमचा एक विद्यार्थी, शेवटचा बाजीराव

गझल शिर्षक असलेल्या पण मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता ( शब्द माहित आहेत हो, उपयोग करता येत नाही ) यांचा कोणताच ताळेमळ नसतांना केलेल्या कौतुकाने प्रा.डॉ. मिसळनवाज खूष झाले आहेत. पुढे जेव्हा गझल लिहू तेव्हा गझलेचे सर्व धर्म पाळण्याचा प्रयत्न करु !!! प्रमोद देव, धनंजय, तात्या,सप्रेम साहेब,आनंदयात्री, अजय जोशी,मदनबाण,शितल, विदेश,सुर्य, विसुनाना,शेवटचा बाजीराव्,चतुरंग,चित्रा,आणि स्वाती....आमच्या अशा प्रकारच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल आम्ही आपले आणि वाचकांचेही शुक्रगुजार आहोत. विशेष आभार :- मिसळपाववर अक्षररंगाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निलकांतचे, तात्याचे, आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु 24/04/2008 - 13:34
बिरूटे सर.. यू टू???? :)) आवडली कविता. ..अतिशय सुरेख अर्थ.. गझल लिहिण्याचा मी ही कित्येक दिवस प्रयत्न करते आहे पण जमत नाहिये... पण नक्की जमेल एकेदिवशी... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिरुटे सर गझल करतात हे माहित नव्हते. गझल आवडली. (जुने धागे उचकटत असताना सहजच सापडली. नवीन लोकांच्या वाचनात आली नसेल म्हणुन सहजच वर आणली.)
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे गावात आम्ही हरलोच बाजी सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे

घोडा आणि ओझे

विसुनाना ·

मदनबाण 21/04/2008 - 11:27
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती हे मात्र खर..... मी माझ्या बर्‍याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो..... (आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?) (सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा) मदनबाण

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

आणि

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...

या ओळी विशेष आवडल्या!!!

विसोबा खेचर 21/04/2008 - 11:41
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी! तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....! अजूनही येऊ द्या... तात्या.

कविता आवडली. जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती याओळी आवडल्या..

ॐकार 22/04/2008 - 12:02
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... छान आहे. कविता आवडली :)

विसुनाना 23/04/2008 - 12:55
कवितेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;) तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;) नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला. पुनः धन्यवाद!

लिखाळ 23/04/2008 - 15:23
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

नीलकांत 23/04/2008 - 16:02
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे. आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती - नीलकांत

मदनबाण 21/04/2008 - 11:27
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती हे मात्र खर..... मी माझ्या बर्‍याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो..... (आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?) (सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा) मदनबाण

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

आणि

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...

या ओळी विशेष आवडल्या!!!

विसोबा खेचर 21/04/2008 - 11:41
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी! तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....! अजूनही येऊ द्या... तात्या.

कविता आवडली. जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती याओळी आवडल्या..

ॐकार 22/04/2008 - 12:02
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... छान आहे. कविता आवडली :)

विसुनाना 23/04/2008 - 12:55
कवितेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;) तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;) नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला. पुनः धन्यवाद!

लिखाळ 23/04/2008 - 15:23
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

नीलकांत 23/04/2008 - 16:02
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे. आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती - नीलकांत
दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती ' आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ? - मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती *** *** जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती आजमितीला गंजुन गेल

.....बळ दे !

उदय सप्रे ·
.....बळ दे ! दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच , एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत , अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी , सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे

(भूक ही खरी किती)

चतुरंग ·

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:43
मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो त्या तशा तनूवरी आत मेद तो किती? मस्त! :) फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? क्या बात है, ह्या ओळी भिडल्या! तात्या.

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:33
:-) अरे काय चाललंय काय हल्ली? चतुरंगकाका आमच्या केसुशेठला एकदम खत्तरनाक स्पर्धात्मक वातावरणात आणून टाकतात, एकदम फर्मास बतावणी काय लिहितात....मज्जाच मज्जा....तिकडं डांबिसकाका एकदम वैचारिक, संवेदनशील, भावनाप्रधान (आणि) प्रवासवर्णनं लिहायला लागले आहेत... मीपण कविता करु का? :-)))))))))))))
ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा तुला फिकीर बर्गरात चीझ रे तुझ्या किती?
हा हा हा !!! आणि
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
शेवट तर एकदम अप्रतिम. -(अचंबीत) ध मा ल.

मदनबाण 21/04/2008 - 11:38
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? मस्तच राव..... (चित्तची मूळ गजल सुद्धा सुंदर आहे हे सांगणे न लागे.) ( चतुरंगी विडंबनाचा चाह्ता ) मदनबाण

वरदा 21/04/2008 - 21:12
भेटती अजून गरगरीत भोवरे किती! सोबतीस आणतात श्वान चावरे किती! ही हि ही....अगदी खरय...

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:43
मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो त्या तशा तनूवरी आत मेद तो किती? मस्त! :) फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? क्या बात है, ह्या ओळी भिडल्या! तात्या.

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:33
:-) अरे काय चाललंय काय हल्ली? चतुरंगकाका आमच्या केसुशेठला एकदम खत्तरनाक स्पर्धात्मक वातावरणात आणून टाकतात, एकदम फर्मास बतावणी काय लिहितात....मज्जाच मज्जा....तिकडं डांबिसकाका एकदम वैचारिक, संवेदनशील, भावनाप्रधान (आणि) प्रवासवर्णनं लिहायला लागले आहेत... मीपण कविता करु का? :-)))))))))))))
ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा तुला फिकीर बर्गरात चीझ रे तुझ्या किती?
हा हा हा !!! आणि
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
शेवट तर एकदम अप्रतिम. -(अचंबीत) ध मा ल.

मदनबाण 21/04/2008 - 11:38
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? मस्तच राव..... (चित्तची मूळ गजल सुद्धा सुंदर आहे हे सांगणे न लागे.) ( चतुरंगी विडंबनाचा चाह्ता ) मदनबाण

वरदा 21/04/2008 - 21:12
भेटती अजून गरगरीत भोवरे किती! सोबतीस आणतात श्वान चावरे किती! ही हि ही....अगदी खरय...
केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान. (गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार.

हे क्रांतिकारकांनो!

अजय जोशी ·

विदेश 20/04/2008 - 17:29
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:36
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल.

विदेश 20/04/2008 - 17:29
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:36
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल.
हे क्रांतिकारकांनो, बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला देशासाठी आता वेळ आहे कुणाला? बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला चू.भू.दे.घे.

उरून राहता येतं !

उदय सप्रे ·

शितल 20/04/2008 - 02:47
तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !

कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...

शितल 20/04/2008 - 02:47
तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !

कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...
उरून राहता येतं ! हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं? चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद् मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं ! मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं? कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं ! कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की चुकून आलंच

प्लॅन्चेट

उदय सप्रे ·

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:59
हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;) तात्या.

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:16
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका ! काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..! असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये... आपला, तात्या.

उदय सप्रे 19/04/2008 - 08:48
तात्या, मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्‍या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:59
हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;) तात्या.

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:16
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका ! काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..! असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये... आपला, तात्या.

उदय सप्रे 19/04/2008 - 08:48
तात्या, मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्‍या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....
कुछ निवेदन : यह कविता हिंदोस्ताँ के हर उस शख्स को मैं समर्पित करता हूं जिसके दिलमें इस देश के लिए बेतहाशा इज्जत है , की यह देश दुनिया का एक ही देश है , जिसने इस देशपर आक्रमण करनेवाले हर देश के नागरीक को यहाँ पनाह दी है ! यह कविता मैं हिंदोस्ताँ के मशहूर वैज्ञानिक श्री.ए.पी.जे.अब्दुल कलाम और भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी को समर्पित करता हूं ! और्.....यह कविता हर उस शख्स को समर्पित है जिस की रूह में अब तक शहीदों की कुर्बानी जिंदा है !

मौनखेळ

पल्लवी ·

प्राजु 18/04/2008 - 09:34
पल्लवी, राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !, कविता अतिशय सुंदर आहे. हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 18/04/2008 - 09:57
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! ओहोहो खल्लास..! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! क्या बात है.... चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! वा! सुरेख कविता.. पल्लवी, औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर


मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !

राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !

चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !


एकापेक्षा एक सुंदर ओळी आहेत !!! कविता आवडली.

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी 18/04/2008 - 10:21
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
सुंदर!

आनंदयात्री 18/04/2008 - 10:24
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! व्वा उस्ताद वा !

पल्लवी 18/04/2008 - 15:58
त्रिवार धन्यवाद !!! इरसाल मराठमोळ्या चकाट्या आणि त्या पिटणारे त्याहुनही इरसाल वल्ली प्रचंड भावल्या ! एक नंबर कट्टा !! तर कट्टेकरी लोकहो, कवितेसाठीच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ठेंक्यु !!! तात्या, प्रत्येक शेरास दाद दिलीत,खूप ध्न्यवाद ! :)

शितल 18/04/2008 - 17:27
मस्तच काव्य रचना झाली आहे, आता आणखी आम्ही काय बोलु कविते बद्दल, मौनच बाळ्गतो.

सुवर्णमयी 18/04/2008 - 18:27
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! सुरेख कविता आवडली.

जयवी 19/04/2008 - 12:41
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! क्या बात है....... पल्लवी , खूप आवडली कविता. अगदी हळुवार भिनत जाताहेत ओळी.

उत्खनक 28/03/2013 - 17:39
खूप नितळ कविता! खूप आवडली. मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी या ओळी अगदी खास..

प्राजु 18/04/2008 - 09:34
पल्लवी, राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !, कविता अतिशय सुंदर आहे. हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 18/04/2008 - 09:57
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! ओहोहो खल्लास..! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! क्या बात है.... चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! वा! सुरेख कविता.. पल्लवी, औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर


मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !

राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !

चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !


एकापेक्षा एक सुंदर ओळी आहेत !!! कविता आवडली.

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी 18/04/2008 - 10:21
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
सुंदर!

आनंदयात्री 18/04/2008 - 10:24
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! व्वा उस्ताद वा !

पल्लवी 18/04/2008 - 15:58
त्रिवार धन्यवाद !!! इरसाल मराठमोळ्या चकाट्या आणि त्या पिटणारे त्याहुनही इरसाल वल्ली प्रचंड भावल्या ! एक नंबर कट्टा !! तर कट्टेकरी लोकहो, कवितेसाठीच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ठेंक्यु !!! तात्या, प्रत्येक शेरास दाद दिलीत,खूप ध्न्यवाद ! :)

शितल 18/04/2008 - 17:27
मस्तच काव्य रचना झाली आहे, आता आणखी आम्ही काय बोलु कविते बद्दल, मौनच बाळ्गतो.

सुवर्णमयी 18/04/2008 - 18:27
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! सुरेख कविता आवडली.

जयवी 19/04/2008 - 12:41
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! क्या बात है....... पल्लवी , खूप आवडली कविता. अगदी हळुवार भिनत जाताहेत ओळी.

उत्खनक 28/03/2013 - 17:39
खूप नितळ कविता! खूप आवडली. मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी या ओळी अगदी खास..
ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता ! अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी ! मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद ! बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे ! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! ~ पल्लवी ~