गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५
भाग-१४
हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू...
===============
अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते. अहो पुढचे(अक्षतांनंतरचे) विधीही आधीच करायचे असले.(झाल/सुनमुख्/नामलक्ष्मीपूजन) तरीही आणि नसले तरिही मुहुर्ताच्या आधी (किमान)दोनतास वधुला आणि एक तास वराला द्यावाच लागतो. का म्हणता ??? अहो..हा विधिंचा मेक अप अवरला,की (वधुचा)मेकअप'चा एक मोठ्ठा विधी असतो ना!!! तो मेनटेन केला नाही.तर त्या गुर्जीनी लावलेल्या लग्नाची "साक्षात अत्युत्तम विवाह संस्कार" अशी ब्रम्हदेवानी येऊन पावती दिली,तरी "तुम्ही(च) मुहुर्त चुकवलात!" (मेकपला वेळ-न देऊन! :-/ ) अशी गुर्जीच्या नावानी साक्षात असंख्य बिलं नंतर फाडली जातात.
सातव्या पावलावरुन एकदा का ध्रुवदर्शनाच्या दर्शनी फोटोसाठी वधुवरास फोटोग्राफर हाती सोपवलं,की इकडे आमची तयारी सुरु होते,ती झाल/सुनमूख/लक्ष्मीपूजनाची. नाही म्हणायला हल्ली कार्यालयातले आमचे ब्याकश्टेजवाले म्हणजे मदतीला असलेले कार्यालयाचे नोकर ही जमात या कामांमधे अव्वल तयार जाहलेली आहे. त्यामुळे त्यांनी सेट अप लावला तर तो नीट करवून घेणे किंवा स्वतः लावणे.हे सर्व करता करता मुलिच्या माता/पित्यास बोलावून...''चला...चला..आता मुलाकडच्यांना झालीला बोलवा बरं" अशी सूचना करावी लागते. मग त्या अनुषंगानी मुलाच्या आईला/वडिलांना काय काय (अत्ता) द्यायचे याची माहित असेल तर हिंट् आणि नसेल तर सुचवणी करावी लागते. मुलिची आई खोलीकडे निघाली की तिला आयत्यावेळेस परत हाक मारून येताना एक खण आणा बरं का(जास्तीचा!) अशीही सूचना द्यावी लागते. या सगळ्यातून (धाप लागता लागता..) सावरताना,हळूच मुलाची आई जर कुठे दिसलीच तर तिलाही "चला...येताय ना झालीला..(आजच!!!) " असं शेवटचा शब्द मनात उच्चारून बोलवावे लागते. कारण जशी सप्तपदी होते,तशी मुलाच्या आईला येणार्या लोकांच्यात जायची अती..................व ओढ लागते. तिथुन बिचारा तो फरकॅप घातलेला, मुलाचा बाप तिला " अहो चला आता..." अश्या आशयाच्या अनेक हाका मारत असतो. परंतू मुलाच्या आईला मात्र ती वेळ (आपल्या) आलेल्या लोकांमधे रममाण होऊन गप्पा मारत दं.....ग होण्याची हक्काची वेळ आहे,असच वाटत असल्यानी,ती तिकडूनच "आले हो...!" "पाचच मिनिट!" थांबा........जरा!" अश्या परती'च्या शब्दांनी टोलवत असते. शेवटी इकडे स्टेजवर झालीची तयारी पूर्ण होऊन मुलीच्या वडिलांनी आचमन केलं की आमच्या माइकवरच्या आवाजानी जाग येऊन किंवा झोप होऊन , ती एकदाची श्टेजासन्न होते.
मग झालीची(उमामहेश्वराची) रितसर पूजा वगैरे होऊन,त्या वेळूपात्रातले कणकेचे १६ दिवे लाऊन ती झाल,मुलिच्या आईवडिलांकडून मुलाकडच्या ज्येष्ठांच्या डोक्यावर-धरण्याच्या प्रसंग येतो. हाही विधी फोटो-फेमस असल्यानी तिथे बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यावर ठेऊन सगळ्यांचे फोटो होईपर्यंत आंम्हा गुर्जींना मंत्रांची कॅसेट अ'खंड वाजवावी लागते. विशेषतः मंडळी जर का देशस्थ असतील तर.......!!!!! (आता पळा..... :D ) कारण कोकणास्थ/कर्हाडे/सुवर्णकार/कायस्थ इत्यादीं देशस्थेतरांमधे आजही झालिला जी ज्येष्ठ असतील तीच मंडळी उपस्थित असतात.(म्हणजे फारतर ५ किंवा १०) पण देशस्थात.........छ्छे!!! सांगायला नको...(आत्मू....मेल्या पळून पळून जाशील कुठ्ठे??? :D त्यामुळे आता सांगच! :D ) कमीतकमी १ मिनिबस किंवा वेळ आलीच(त्या गुर्जीची! ;) ) तर १ अखं.........ड एस.टी.बस-भरेल इतकी सुद्धा मंडळी झालीकरता देशस्थात असू शकतात. कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!! शिवाय विशेष करून,त्यात कोणी कमी किंवा जास्त-झालच तर,(संगीत) मानापमानाचाही!!!
या मानापमान नावाच्या देशस्थी प्रयोगात पहिला नारळ हा नेहमी गुर्जीच्या डोक्यावर फोडायचा ही अलिखित परंपरा आहे..सुरवात अशी होते बरं का... !
उखडलेली मंडळी:- ओ गुर्जी... झालं का..??? येव्हढेच का?
आंम्ही:- (काहिच अर्थसंगती न लागल्यामुळे..) मग अजुन किती पाहिजेत
उ.मंडळी:-कुठं शिकला तुम्ही लग्न लावायला?
आंम्ही:-(निर्मळपणे) वेदपाठशाळेत
उ.मंडळी:-हो का..मग थांबा जरा आज..नंतर- (इतरांना उद्देशून) - ए ती तुझ्या आत्याकडची कुठायत?
त्यांची बायको:- अजुन आल्या नाही का? (आपण चिंतेत..आणि काहि बोल्लो तर चितेतही! ;) )
उ.मंडळी:- सगळे यायला पाहिजे झालीत(फोटोत) त्याशिवाय पुढे जायचं नाय
आपणः-(समंजसपणे...गप्प!)
शेवट त्यांच्यापैकिच कुणितरी यावर "ती आली कि पुन्हा करु झाल!" अशी आंम्हाला डोळा मारत त्यांची मनधरणी आंम्हाला कंप येइपर्यंत करतो... आणि एकदाची झाल-होते.
त्यामुळे,झालीची ही अविभाज्य सांस्कृतीक विशेषता त्यावेळी जो गुर्जी हसून पचवू शकला तोच खरा या लग्नाच्या श्टेजचा राजा! नायतर त्याचा वाजलाच समजावा बाजा.
तर अशी ही झाल होते. आणि मग वधुपिता/माता हे उभयता वरमातेकडे आपल्या लाडक्या लेकिची जवाबदारी ती वेळुपात्ररुपी झाल* त्यांच्या हातात देऊन करतात. हे ऐरणीदान* करवून वधुपित्याकडनं करवून घ्यायची प्रार्थना जी असते. ती मात्र खरच सगळं वातावरण भावनिक करणारी असते. कित्येकवेळा ती प्रार्थना त्यांच्याकडून म्हणवली सुद्धा जात नाही. कसं शक्य आहे हो? भावार्थात असलेली ही वाक्यः- "आजपर्यंत आंम्ही शिकवून संस्कार करून वाढवलेली ही कन्या आपल्या कुळामधे सुपूर्त करतो आहोत,त्यामुळे हे वरमाते तू तिचा तुझी मुलगी समजून सांभाळ कर" अशी दिसायला साधी वाटत असली,तरी त्यावेळी, आपल्या मुलिला आता, आपण अंतरणार हीच भावना प्राधान्यानी मनात असते. ती पेलवून नेणं, हे सोपं काम खचितच नव्हे! हे होऊन काहि वेळ शांततेत जातो. मुलिचे आईवडील (त्यादरम्यानच) मुलाच्या आईला तिथे द्यायच्या गोष्टी(साडी/सैभाग्यवायन इत्यादी) देतात. आणि श्टेजवरून खर्या अर्थानी एक्झिट होतात...
===========================
क्रमशः
Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच जबरदस्त आणि
+१
भाग आवडला.
अगदी अगदी. झालीचे दिवे पार
@यातले किती नंतर खरोखरच वधूचं
कारण देशस्थेतरात ही मंडळी
हा पण भाग मस्त....
+1
गुर्जी...
@खरच मुविंची सुचना भारी आहे.
प्रयोगाच्या नावासाठी.
जबरदस्त!!!!
आवडला हाही भाग बुवा!! हल्ली
@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा
विलक्षण मजेशीर!
सहिच लिवतोय बुव्या.. आंदो ओर
मस्तच
मस्तच!! पुभाप्र
मस्तच!
मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन
@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि
कोणत्या गावचे देशस्थ आहेत
नंतर एकदा कोल्लापूरला
+१०नेहमीप्रमाणे खुसखुशित.
मस्तच!