मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.
लेखनप्रकार
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया Fri, 11/22/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

सुरिया Fri, 11/22/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.
लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दहीभात...

किल्लेदार ·

Bhakti Tue, 11/12/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर Tue, 11/12/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत Tue, 11/12/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti Tue, 11/12/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार Wed, 11/13/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 11/14/2024 - 11:43
मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.

सस्नेह गुरुवार, 11/21/2024 - 11:34
दहीभातासारखाच चुरचुरीत लेख ! दहीभाताची पंखी, स्नेहा

Bhakti Tue, 11/12/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर Tue, 11/12/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत Tue, 11/12/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti Tue, 11/12/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार Wed, 11/13/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 11/14/2024 - 11:43
मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.

सस्नेह गुरुवार, 11/21/2024 - 11:34
दहीभातासारखाच चुरचुरीत लेख ! दहीभाताची पंखी, स्नेहा
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

माचीवरला बुधा

श्रीगणेशा ·

प्रचेतस Wed, 08/14/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.

प्रचेतस Wed, 08/14/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.
लेखनप्रकार
माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

चहा!

श्रीगणेशा ·

कंजूस Sun, 06/30/2024 - 19:57
वाह! (मीपण एक चहाबाज...... होतो. आताशा पिववत नाही.)

कर्नलतपस्वी Sun, 06/30/2024 - 21:14
खडी चमच,गुळाचा,बिनसाखरेचा...... सकाळी,दुपारी,मध्यरात्री... घरात,तंबू मधे,गाडीत .... कुठेही कधीही चहाला नाही न म्हणणारा चहाबाज. पण साधे पान ,साधा चहा याची सर कशालाच नाही. लेख पुढे फुलवायचा होता. तरीपण आवडला.

श्रीगणेशा Sun, 06/30/2024 - 22:53
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे खरं. जेवढं उत्स्फूर्त सुचलं, त्यात फक्त अर्धा कप भरला :-) ---- अवांतर: मिपावर लेखातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?

चौथा कोनाडा Mon, 07/01/2024 - 17:30
मस्त कडक चहालेख ! आवडला !
गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही.
तंतोतंत सहमत !
हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही.
क्या बात .. शेम हियर ! मी पण चहाबाज ! काहीही न घातलेला (आलं, वेलदोडा, ग'चहा, दालचिनी वै वै) पातळ दुधाचा कडक चहा (आणि याच्या आसपासचा) म्हणजे माझं अमॄत ! कधी ही ना नाही आता कमी करायला लागणार आहे !

यश राज Mon, 07/01/2024 - 19:16
मी पण चहाबाज, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच ! छान लिहिलयं

रामचंद्र Wed, 07/03/2024 - 22:56
यात खास पूर्व पुण्याची खासियत असलेल्या आणि आता अस्तंगत होत चाललेल्या एकमेवाद्वितीय चवीच्या इराणी चहाचा उल्लेख नाही... नाझ, महानाझ, वोहुमन आणि इतर अनेक अगदी सिटी पोस्ट चौकातलं ए-वन.

श्रीगणेशा Fri, 07/05/2024 - 14:36
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप वर्षांपूर्वी, जेजुरीहून मोरगावला जाताना एका छोट्या त्रिफुलीवर (तीन रस्ते एकत्र येणारं ठिकाण), एका छोट्याशा टपरीवर घेतलेल्या चहाची चव अजूनही लक्षात राहिली आहे. ---- तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावाच्या सुरुवातीलाच, रस्त्यालगत असणाऱ्या विशाल हॉटेल मधील चहाही लक्षात राहण्यासारखा. सोबतीला वेल्ह्यातील निसर्गरम्य पावसाळी वातावरण असेल, तर "चहा"शर्करा योगच म्हणावा लागेल! ----

In reply to by श्रीगणेशा

रामचंद्र Fri, 07/05/2024 - 18:51
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक वर्षांपूर्वी वेल्ह्यात एसटी स्टँडजवळ पोस्ट ऑफिसकडून गडाच्या वाटेकडं जाताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला एका शेतातल्या विहिरीचं पाणी पिल्याचं आठवतंय. इतकं गोड आणि छान होतं की इतक्या वर्षांनी अजून लक्षात राहिलं आहे. बाकी पावसाळ्यात ट्रेक करून झाल्यावर परतीच्या वाटेवर मस्त चहा मिळाला तर स्वर्गसुखच!

कंजूस Sun, 06/30/2024 - 19:57
वाह! (मीपण एक चहाबाज...... होतो. आताशा पिववत नाही.)

कर्नलतपस्वी Sun, 06/30/2024 - 21:14
खडी चमच,गुळाचा,बिनसाखरेचा...... सकाळी,दुपारी,मध्यरात्री... घरात,तंबू मधे,गाडीत .... कुठेही कधीही चहाला नाही न म्हणणारा चहाबाज. पण साधे पान ,साधा चहा याची सर कशालाच नाही. लेख पुढे फुलवायचा होता. तरीपण आवडला.

श्रीगणेशा Sun, 06/30/2024 - 22:53
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे खरं. जेवढं उत्स्फूर्त सुचलं, त्यात फक्त अर्धा कप भरला :-) ---- अवांतर: मिपावर लेखातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?

चौथा कोनाडा Mon, 07/01/2024 - 17:30
मस्त कडक चहालेख ! आवडला !
गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही.
तंतोतंत सहमत !
हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही.
क्या बात .. शेम हियर ! मी पण चहाबाज ! काहीही न घातलेला (आलं, वेलदोडा, ग'चहा, दालचिनी वै वै) पातळ दुधाचा कडक चहा (आणि याच्या आसपासचा) म्हणजे माझं अमॄत ! कधी ही ना नाही आता कमी करायला लागणार आहे !

यश राज Mon, 07/01/2024 - 19:16
मी पण चहाबाज, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच ! छान लिहिलयं

रामचंद्र Wed, 07/03/2024 - 22:56
यात खास पूर्व पुण्याची खासियत असलेल्या आणि आता अस्तंगत होत चाललेल्या एकमेवाद्वितीय चवीच्या इराणी चहाचा उल्लेख नाही... नाझ, महानाझ, वोहुमन आणि इतर अनेक अगदी सिटी पोस्ट चौकातलं ए-वन.

श्रीगणेशा Fri, 07/05/2024 - 14:36
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप वर्षांपूर्वी, जेजुरीहून मोरगावला जाताना एका छोट्या त्रिफुलीवर (तीन रस्ते एकत्र येणारं ठिकाण), एका छोट्याशा टपरीवर घेतलेल्या चहाची चव अजूनही लक्षात राहिली आहे. ---- तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावाच्या सुरुवातीलाच, रस्त्यालगत असणाऱ्या विशाल हॉटेल मधील चहाही लक्षात राहण्यासारखा. सोबतीला वेल्ह्यातील निसर्गरम्य पावसाळी वातावरण असेल, तर "चहा"शर्करा योगच म्हणावा लागेल! ----

In reply to by श्रीगणेशा

रामचंद्र Fri, 07/05/2024 - 18:51
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक वर्षांपूर्वी वेल्ह्यात एसटी स्टँडजवळ पोस्ट ऑफिसकडून गडाच्या वाटेकडं जाताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला एका शेतातल्या विहिरीचं पाणी पिल्याचं आठवतंय. इतकं गोड आणि छान होतं की इतक्या वर्षांनी अजून लक्षात राहिलं आहे. बाकी पावसाळ्यात ट्रेक करून झाल्यावर परतीच्या वाटेवर मस्त चहा मिळाला तर स्वर्गसुखच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

पुस्तक परिचय: ययाति

श्रीगणेशा ·

कर्नलतपस्वी Wed, 06/26/2024 - 08:51
खुपच गाजलेली कादंबरी. फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण. लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.

भागो Fri, 06/28/2024 - 16:40
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये. शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो. तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक. पुन्हा एकदा माफ करावी.

In reply to by भागो

नठ्यारा Fri, 06/28/2024 - 18:49
भागो, फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते. -नाठाळ नठ्या

कंजूस Fri, 06/28/2024 - 20:08
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.

प्रचेतस Fri, 06/28/2024 - 20:13
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.

श्रीगणेशा Sun, 06/30/2024 - 00:39
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही. ---- पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये. ---- कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी. ----

कर्नलतपस्वी Wed, 06/26/2024 - 08:51
खुपच गाजलेली कादंबरी. फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण. लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.

भागो Fri, 06/28/2024 - 16:40
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये. शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो. तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक. पुन्हा एकदा माफ करावी.

In reply to by भागो

नठ्यारा Fri, 06/28/2024 - 18:49
भागो, फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते. -नाठाळ नठ्या

कंजूस Fri, 06/28/2024 - 20:08
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.

प्रचेतस Fri, 06/28/2024 - 20:13
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.

श्रीगणेशा Sun, 06/30/2024 - 00:39
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही. ---- पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये. ---- कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी. ----
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त ·

भागो Mon, 06/17/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस Tue, 06/18/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

कर्नलतपस्वी Tue, 06/18/2024 - 07:38
पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त Sun, 06/23/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो Tue, 06/18/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो Tue, 06/18/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया Tue, 06/18/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ Tue, 06/18/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Mon, 06/24/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक Tue, 06/18/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा Wed, 06/19/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब Mon, 06/24/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 06/24/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब Mon, 07/01/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त Mon, 07/01/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Mon, 07/01/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त Mon, 07/01/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 07/01/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Tue, 07/02/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.

भागो Mon, 06/17/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस Tue, 06/18/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

कर्नलतपस्वी Tue, 06/18/2024 - 07:38
पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त Sun, 06/23/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो Tue, 06/18/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो Tue, 06/18/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया Tue, 06/18/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ Tue, 06/18/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Mon, 06/24/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक Tue, 06/18/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा Wed, 06/19/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब Mon, 06/24/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 06/24/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब Mon, 07/01/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त Mon, 07/01/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Mon, 07/01/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त Mon, 07/01/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 07/01/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Tue, 07/02/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

Bhakti ·

प्रचेतस Sun, 06/09/2024 - 09:35
तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti Sun, 06/09/2024 - 10:07
Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक. एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.

प्रचेतस Sun, 06/09/2024 - 09:35
तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti Sun, 06/09/2024 - 10:07
Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक. एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.
लेखनप्रकार
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·

चौथा कोनाडा Fri, 05/03/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त Fri, 05/03/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस Fri, 05/03/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा Sat, 05/04/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त Sun, 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Sun, 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!

चौथा कोनाडा Fri, 05/03/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त Fri, 05/03/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस Fri, 05/03/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा Sat, 05/04/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त Sun, 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Sun, 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

वडगावकर ·

भागो गुरुवार, 05/02/2024 - 17:03
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा">>> First they came for the Communists And I did not speak out Because I was not a Communist Then they came for the Socialists And I did not speak out Because I was not a Socialist Then they came for the trade unionists And I did not speak out Because I was not a trade unionist Then they came for the Jews And I did not speak out Because I was not a Jew Then they came for me And there was no one left To speak out for me

In reply to by भागो

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/02/2024 - 17:34
देशद्रोही कारवाया करणार्‍यांना रॉ ने देशाबाहेर जाऊन गोळ्या घातल्यास त्याबद्दल ही कविता उधृत करणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखा प्रकार झाला. असो.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by भागो

कांदा लिंबू गुरुवार, 05/02/2024 - 17:44
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
भागो, अबा यांसारखे ID कोणत्या ही धाग्याचे काश्मीर करण्यात प्रवीण आहेत.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by भागो

अमर विश्वास गुरुवार, 05/02/2024 - 18:50
पतंजली आणि या धाग्याचा काय संबंध ? हे प्रतिसाद वाचून यांनाही चार जूनला बर्नोलची गरज पडेल असे वाटते

In reply to by अमर विश्वास

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by अमर विश्वास

पतंजली पतंजली हे थोर हिंदू आचार्य होते. सहा दर्शनांपैकी जे योग दर्शन त्याचे प्रणेते. ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत. चांगलं आहे , ह्या मुळे मवाळ पंथी हिंदूंना लक्षात येईल की केवळ मोदी, RSS, सावरकर वगैरे काँग्रेसचे टार्गेट आहेत असे नव्हे तर समस्त सनातन धर्म हा काँग्रेस चे टार्गेट आहे , अन् त्याला येनकेन प्रकारेण बदनाम करणे हाच ह्या लोकांचा उद्देश आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सनातन मनुवादी धर्म टार्गेट असावाच. विज्ञानवादी, पुरोगामी हिंदुधर्म टार्गेट असू नये. ह्या निमित्ताने भाजप आणी संघाला पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची असेल तर हिंदू आणी दलितानी सावध रहावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सर टोबी Sat, 05/04/2024 - 19:37
साचेबंद तर्क सोडून पटवून देऊ शकता का? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला आहे. आता साचेबंद तर्क म्हणजे काय ते समजावून सांगतो.
  • प्रदूषण काय फक्त हिंदू सणांमुळेच होतं का?
  • हिंदूंना आपल्याच देशात, आपल्याच चालीरीती पाळण्याची नामुष्की कशी असू शकते?
  • मान्य आहे “काही मूठभर" लोक समाज विघातक कृत्य करतात, पण संपूर्ण धर्मालाच नकोसं म्हणणे कितपत बरोबर आहे?
वरील प्रश्न केवळ प्रातिनिधिक आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंचं सामाजिक जीवन अतिशय कर्कश्य आणि आक्रस्ताळं बनलेलं आहे आणि कोणताही सनातनी याची जबाबदारी टाळून सनातन धर्माची भलामण करू शकणार नाही. तसेच यापूर्वी सनातन धर्मावरील चर्चेत आपण जातींची उतरंड आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबतीत काही बेधडक पण संविधानाला मान्य नसणारी मतं व्यक्त केली होती अशी माझी समजूत झालेली आहे. आपण आजही त्या मतांच्या बाबतीत ठाम असाल तर तसे सांगावे म्हणजे आम्ही देखील ”होय. लिब्राडूंच!” असे म्हणायला मोकळे.

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Sat, 05/04/2024 - 20:00
ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत.
दुर्दैवाने सहमत आहे. पतंजली सारख्या ऋषीमुल्य ऋषितुल्य व्यक्तींचा अकारण, अप्रस्तुत, हेटाळणीपूर्वक उल्लेख करणे, हे हिंदूविरोधी, डाव्या, सेक्युलर कुविचारसरणीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Patanjali

In reply to by सुबोध खरे

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:07
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

भागो गुरुवार, 05/02/2024 - 19:42
मंडळीहो रागावू नका. सगळ्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमुचा राम राम घ्यावा. सब कुछ सिखा हमने ना सिखी... हम किस गलीमे आ गये है आपण कोई ठिकाना नही. Long live, Prosper and Be Happy. Salutation!

नठ्यारा Fri, 05/03/2024 - 18:17
वडगावकर,
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
हे एका अर्थी बरोबर आहे. एका अर्थी यासाठी म्हंटलं की रॉ आधीपासून सक्षम होतीच. १९७१ साली तिने अत्यंत वेगवान हालचाली करून / करवून बांगलादेश निर्माण केला. ही गुप्तहेरांच्या जगातली एक दैदिप्यमान कामगिरी मानली जाते. हेनरी किसिंजर अत्युच्च पातळीचा हेर होता. त्याला चकवणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. तरीपण रॉने बरोब्बर प्यादी हलवली. म्हणून किसिंजर इंदिरा गांधींना दॅट बिच ( = ती कुत्री ) म्हणायचा. इंदिरा गांधींच्या नंतर कणखरपणाचं दुर्भिक्ष्य उत्पन्न झालं. ते आत्ता दूर होतंय. रॉ परत फॉर्मात येणार हे नक्की. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. ती भारताच्या सांप्रत नेतृत्वाकडे भरपूर आहे. बाकी, एमाय-६, मोसाद, सीआये, एफेसबी वगैरे गुप्तचर संस्था क्षमतेच्या दृष्टीने साधारणत: एकसारख्याच असतात. त्यांच्या डोक्यावर कोण नेता बसून आहे यावर त्यांचं यशापयश जगाला दिसतं. -नाठाळ नठ्या

सर टोबी Fri, 05/03/2024 - 21:02
च्या चाहत्यांचं हे नविन टुलकिट दिसतंय. बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय. आदरणीय प्रधानसेवक बाकी कुठल्या बाबतीत विश्वगुरु असोत वा नसोत, टुलकीटच्या बाबतीत त्यांची सर कुणाला येणं शक्य नाही. तर येऊ आपल्या मूळ मुद्याकडे. आज काल सगळं काही धडाकेबाज पद्धतीने घडतंय. मग तो विकास असो, सर्जिकल स्ट्राइक असो की भारत विरोधी शक्तींचा खात्मा असो. इथे वाहवा करणाऱ्या सदस्यांची अशी समजूत दिसतीय की इस्राईल किंवा अमेरिका दुसऱ्या देशात हत्त्या घडवतात आणि आपल्या दादागिरीच्या जोरावर सगळं काही मिटवतात. हे कदाचित पॅलेस्टाइन किंवा पाकिस्तानच्या बाबतीत होईल देखील. पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे असे निदान पूर्वीच्या “लेच्यापेच्या आणि लांगूलचालन” करणाऱ्या सरकारकडून झालेलं नाही अशी माझी समजूत आहे. थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. हेच जर वारंवार व्हायला लागलं तर काही सुचक घटना नजीकच्या भूतकाळात घडल्या आहेत (कतारने भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मुत्युदंडाची शिक्षा देणं, कॅनडाबरोबरचे परराष्ट्र संबंध बंद होणे) त्यांच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. यात तंत्रज्ञान अदान प्रदान, परकीय गुंतवणूक, पर्यटकांना धोक्याची सूचना देणं, आणि शेवटी काळ्या यादीत टाकणं. जाता जाता: काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल.

In reply to by सर टोबी

कांदा लिंबू Fri, 05/03/2024 - 21:43
बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय.
सहमत आहे. डाव्यांकडून आप पक्षानेही हे कौशल्य घेतलंय.

In reply to by सर टोबी

थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. तो गावठी जेम्स बाँड आल्या पासून सगळं उघड होऊ लागलंय. म्हणे हा गावठी जेम्स बॉंड अमुक वर्षे पाकिस्तानात राह आलाय कुठलाही गुप्तहेर हे उघड करत नाही तसेच देशही अश्या बातम्या उघड करत नाही. मग अंधभक्ताना कुठून कळतात ह्या?? गुप्तहेर संघटनेत “गुप्त” शब्द का असतो? हे कळण्याइतके भक्त प्रगल्भ नाहीत.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Mon, 05/06/2024 - 09:42
पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे हे सध्याच्या सरकारच्या काळात चालू आहे असा तुमचा दावा आहे काय? काही उदाहरणे ?

In reply to by चौकस२१२

सर टोबी Mon, 05/06/2024 - 10:24
प्रगती, देशाचा सन्मान, नागरिकांचं जीवनमान उंचावणं याबाबतीत मागची सरकारे आणि खास करून काँग्रेसची सरकारे सपशेल अपयशी असतांनादेखिल त्या लेच्यापेच्या सरकारांकडून असलं पातक घडलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या बाबतीत कसं असतं कि पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं मनमोहन सिंग वगैरेंचं कौतुक करायचं. असू द्या.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 05:03
"पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं" सर टोबी हि तुम्ची गैरसमजूत , मोदी आज आहेत उद्या नाहीत , प्रेम वैगरे काही नाही , त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस आणि दवयांपेक्षा सध्या तरी जास्त योग्य वाटतो ,,, आणि काय हो जगातील सर्वात मोठया लोकशाहीत जर निदान २ तरी सक्षम पक्ष नसावेत का? त्या दृष्टीतें पाहता काँग्रेस चा पण जरा जीर्णोद्धार व्हावा पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा, अर्थात तुम्हीं .म्हणणार उगाच दाखवयाचा म्हणून काँग्रेस बद्दल लिहितोय !

In reply to by चौकस२१२

सर टोबी Wed, 05/08/2024 - 07:05
गेली दहा वर्ष आम्ही मोदी आणि भाजप यांची लक्तरे वेशीवर टांगतोय. एवढं करूनही तुम्हाला मोदी आणि भाजपच योग्य वाटत असेल तर हिम्मत करा ना ”होय आम्हाला मोदी प्रिय आहेच" हे सांगण्याचे. काही तरी भलामण करायची आणि मग असले तळ्यात मळ्यात करायचं. घराणेशाहीबद्दल म्हणायचं तर मी यापुर्वीदेखील म्हणालो आहे. त्या पक्षाच्या सहा पंतप्रधानांमध्ये निम्म्याहून जास्त एका घराण्याचे पंतप्रधान होते. भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? आणि कोणतीही शासन व्यवस्था मूलतः चांगली अथवा वाईट नसते. चांगली किंवा वाईट सत्ता राबवणाऱ्यांची नियत असते. आता बोला भाजप आणि मोदींची काय नियत आहे याबद्दल.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 07:50
निम्म्याहून जास्त एका घराण्याच्या बाहेरचे होते असे वाचावे. अरे पण निम्मे तर होते ना? आणि रिमोट कोणाकडे? ( शशी थरूरांनां विचारा ) हायला ह्याला म्हणतात "मिया गिरे तो भी टांग उपर ", जय नेहरू चाचा नमोस्तुते जय इंदिरा "इज इंडिया" नमोस्तुते जय राजपूत्र राजीव नमोस्तुते जय राणी सोनिया नमोस्तुते जय शहाजादे राहुल नमोस्तुते जय राजकन्या प्रियांका नमोस्तुते याउलट हे पहा भाजप अध्यक्ष https://en.wikipedia.org/wiki/List_of_presidents_of_the_Bharatiya_Janata_Party हे पहा जन संघ अध्यक्ष https://en.wikipedia.org/wiki/Bharatiya_Jana_Sangh

In reply to by चौकस२१२

सर टोबी Wed, 05/08/2024 - 08:41
जे होते त्यांचा पंतप्रधान असण्याचा ठसा आजही दिसतो. तसा तो मोदींचाही दिसेल. जळके अवशेष, भळभळनाऱ्या जखमांच्या स्वरूपात आणि ऊठसूठ हयात नसणाऱ्या पंतप्रधानाचे वाभाडे काढायला. बाकी रिमोटचं म्हणाल तर तथाकथित दुर्बळ पंतप्रधानांनी जेवढं करुन ठेवलंय ते देखील यांना भारी पडतंय. असू द्या. तोल ढळला आहे आणि संपादक डुलक्या घेत आहेत.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 07:41
तळ्यात मळ्यात कसले आहे स्पष्ट सांगतो कि भाजप + मोदी हे गणित नेहरू घराण्याची मालकी असलेला काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांचे कडबोळे यापेकशा अनेकांना मान्य आहे त्यातला मी पण म्हणून २०१४ आणि १९ वर्षी निवडून आले ... २४ वर्षी काय होईल ते होईल अनेकांना मान्य आहे हे तुम्हाला मान्य दिसत नाही .. नसो तुम्ची मर्जी भाजप ची भलावण केली कि लागेचच अंधालेपणा आणि एका घराण्याची काँग्रेस चालते ? भाजप चा समर्थक म्हणजे अंधभक्त नव्हे ते हि चुकतात ( आता असे म्हणले कि लगेच कुम्पणवर बसणारे ! अरे हे काय तुम्ही विचारता भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? सध्या कशाला सांगतील असे? हुकुमी एक्का आहे त्यांचा आणि मुळात ते सुद्धा काय "कोणत्या घराण्यात जन्मले " म्हणून नाही झाले पंतप्रधानांचे उमेदवार , त्यांनी घासली गुजरात मध्ये प्रथम आणि काय हो कांग्रेस मध्ये जी पक्श प्रमुखाची " लुटू पुटुची " निवडणूक झाली ती काय अंतर्गत लोकशाही चा नमुना होता? या उलट भाजप आणि त्यामागचा संघ यात नेते बदलत असतात .. त्यांची अंतर्गत व्यवस्ताह जी असेल ती असेल घराणेशाही तर नाही ४ पिढ्यांची

In reply to by चौकस२१२

पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा
आपल्या बाजूने घराणेशाहीचा मुद्दा नेहमी लाऊन धरला जातो. मात्र तो मुद्दा तितकासा योग्य नाही असे मला वाटते. आपला नेता म्हणून कोणाला नेमावे हा काँग्रेसचा प्रश्न झाला. तो आपला प्रश्न नाही. जर लोकांनी त्या नेत्याला निवडून दिले तर मग तो नेता कोणीही असू दे- घराणेशाहीतून आलेला किंवा न आलेला, त्याने फार फरक पडू नये. राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ दोन वेळा घेतली- ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? निवडणुकीच्या वेळेस लोकांसमोर वेगळा नेत्याचा चेहरा ठेवायचा आणि निवडणुक झाल्यावर मात्र इंदिरा पुत्र म्हणून राजीव गांधींना नेता निवडायचे असे तर झाले नव्हते ना? काँग्रेसला लक्ष्य करायला इतर कित्येक मुद्दे आहेत. त्यावर टीका जरूर करावी. नेहरूंनी आय.आय.टी ची स्थापना केली म्हणून नेहमी कौतुक केले जाते पण नेहरूंच्या काळात ५ आय.आय.टी- मुंबई, खरगपूर, मद्रास, दिल्ली आणि कानपूर यांची स्थापना झाली होती. त्यापूर्वी भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण दिले जात नव्हते का? तर तसे अजिबात नाही. पुण्याचे इंजिनिअरींग कॉलेज, मुंबईचे व्ही.जे.टी.आय अगदी १९ व्या शतकातच सुरू झाले होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत इंजिनिअरींगचे शिक्षण १९२० च्या दशकात सुरू झाले होते. धनबादच्या कॉलेजमध्ये मायनिंग इंजिनिअरींगचे शिक्षण सुरू झाले त्याला आता जवळपास १०० वर्षे झाली आहेत. रूरकीचे कॉलेज तर पुण्याच्या इंजिनिअरींग कॉलेजपेक्षा जुने आहे. आमचे सांगलीचे वालचंद कॉलेज सुध्दा १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस सुरू झाले होते. ते सुरू करण्यात नेहरूंचा काहीही हात नव्हता. अहमदाबादचे एल.डी.कॉलेज सुरू करण्यात पुढाकार होता कस्तुरभाई लालभाई या उद्योगपतींचा. बिट्स पिलानी कोणी सुरू केले? ते पण नेहरूंनी का? तेव्हा सांगायचा मुद्दा हा की भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण नेहरूंनी सुरू केले अशाप्रकारच्या आविर्भावात काँग्रेसचे गुलाम बोलत असतात त्यात कितपत तथ्य आहे? मी तर म्हणतो उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करून भारतीय उद्योगांचा गळा नेहरू-इंदिरा गांधींनी घोटला नसता तर भारतात इंजिनिअरींग आणि टेकॉनॉलॉजीचे शिक्षण बरेच जास्त वाढले असते. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने नाक न खुपसता उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर आपले उद्योग पुढे वाढवायचे असतील तर कुशल मनुष्यबळ आपल्याला लागेल हे उद्योगपतींना कळत नव्हते का? त्यांनीच पुढाकार घेऊन कॉलेज सुरू केली असती. बिर्लांनी बिट्स पिलानी सुरू केले, कस्तुरभाई लालभाईंनी अहमदाबादमध्ये एल.डी.कॉलेज, आय.आय.एम किंवा धोंडुमामा साठेंनी वालचंद कॉलेज अशा संस्थांची स्थापना केली ते जाळे न्हेरूंनी केले त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक वाढले असते. तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. बाकी नेहरूंनी काश्मीर प्रश्नात एक धड निती न ठेऊन अपरंपार घाण घालून ठेवली ती निस्तरायला इतकी दशके गेली. शेख अब्दुल्ला देशविरोधी कारवाया करत आहे हे सरळ सरळ समोर दिसत असूनही त्याच्याविरोधात ४-५ वर्षे काहीही कारवाई न करता मोकळे रान दिले. काश्मीरच्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये आणायला काहीही केले नाही उलट तुम्ही कोणीतरी वेगळे आहात ही भावना दृढमूल करणारे कलम ३७० माथी मारून ठेवले. चीन युध्द होईपर्यंत आपल्या सैनिकी सज्जतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. हिमालयात चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांकडे लढायला शस्त्रे पण नव्हती. आणि हे आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहतींच्या लोकांच्या ब्रिटिश-फ्रेंचांविरोधी लढ्याला नैतिक पाठबळ द्यायला फिरत होते. चीनने हल्ला केल्यावर हे खडबडून जागे झाले आणि ज्या इस्राएलकडे १९४८ पासून दुर्लक्ष करत होतो त्याच इस्राएलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिऑन यांना पत्र लिहून आम्हाला शस्त्र द्या अशी विनंती केली. नुसते तेवढेच नाही तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली. मदत मागणारे वर उलट्या अटी घालत आहेत हे बघून डेव्हिड बेन गुरिऑनना काय वाटले असेल? जसे काही इस्राएलने दिलेली शस्त्रे घेऊन आपण त्यांच्यावर मोठे उपकारच करणार होतो. इंदिरा परराष्ट्रधोरणाच्या बाबतीत नेहरूंपेक्षा लाखो पटींनी अधिक चांगल्या होत्या. पण देशांतर्गत धोरणात नेहरूंनीही न केलेले प्रकार त्यांनी केले होते. कोर्ट, आर.बी.आय वगैरे 'इन्स्टिट्यूशन्स' शी खेळ त्यांनी केला होता. भ्रष्टाचार, नेपोटेझिम या गोष्टींना राजाश्रय दिला. असो. तर काँग्रेसवर टीका करायला इतर अनेक मुद्दे असताना उजव्या बाजूचे लोक घराणेशाही या निरूपयोगी मुद्द्यावर टीका करत असतात. ते बंद करायला हवे असे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ अभ्यासू प्रतिसाद. आणी घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिकअधिकारही भाजप्यांना नाही. आमदारपुत्र, मंत्री काकूचे भाचे देवेंद्र फडणवीसही घराणेशाहीतूनच आलेत. आहेका हिंमत त्यांना बाजूला करायची?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 13:30
चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार यांनी केलेली काँग्रेस वरील मुद्देसूद टीका "अ बां णा मान्य आहे तर ! हाःहाःहाःअह्हा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वरुपसुमित Fri, 05/10/2024 - 19:02
तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली. राज नै तीक कारण असेल

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सर टोबी Wed, 05/08/2024 - 11:26
आयआयटीची स्थापना आणि तत्सम प्रतिवाद हा एक दृष्टिकोन आणि प्राथमिकता तसेच देशाचा सामाजिक पोत कसा असावा याचा एक विचार या अर्थाने केला जातो. मोदींनी भजे तळायचा सल्ला दिल्यावर “कुठे आहेत खाऊ गल्ल्या?” असा प्रश्न जितका बालिश तितकाच नेहरूंच्या अगोदर असलेल्या शैक्षणिक संस्थांची जंत्री देणं हे बालिश. सरकारने जिथे तिथे उद्योग स्थापन केले हे आजच्या काळात नक्कीच वावगं वाटू शकते. पण आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो. खेडोपाडी पोहोचलेली टपाल सेवा, बस आणि रेल्वे सेवा, बँकिंग, आरोग्य आणि शिक्षण अशा गोष्टी खाजगी गुंतवणूकदारांच्या भरवशावर ठेवता आल्या नसत्या. निळकंठ कल्याणी, बी जी शिर्के यांसारखे उद्योजक हे लहान शहरातून आलेले उद्योजक होते. म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा जेमतेम चार बूकं शिकलेली जनता तयार करीत नव्हत्या. बाकी काश्मिर प्रश्नावर इतर बऱ्याच तज्ज्ञांकडून मते ऐकली आहेत आणि त्यातल्या कोणीही काश्मिरींचे अतिरिक्त लाड किंवा तत्सम प्रकारे ३७० व्या कलमाची संभावना केली नाही.

In reply to by सर टोबी

कांदा लिंबू Wed, 05/08/2024 - 12:49
आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो.
सणासुदीच्या काळात, केवळ खाजगीच नव्हे, सरकारी वाहन सेवादेखील किमती वाढवतात. बाकी बाबींवर चंसुकु यांनी याआधीही अनेकदा लिहिलंय, आत्ता, वरही थोडक्यात लिहिलंय. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 13:26
१९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले? तिथेच तर गेम आहे मूळच्या काँग्रेस मध्ये घराणे नवहते , नेहरूंच्या नंतर ते सुरु झाले ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम आता म्हणाल सध्याच्या भाजपात घराणेशाची डोकावत नाही का.. तर उत्तर दुर्दैवाने स्थानिक पातळीवर ते होते आहे, ते फार पुढे जाऊ नये असेही वाटते कारण त्या मागे असलेल्या संघात तरी हि घराणे शाही दिसत नाही पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता आज सुद्धा राहुल चाय पणतूला पण निवडून देऊ कारण तो त्या घराण्यातील आहे अशी खानची मानसिकता आहे सदृढ लोकशाहीत एवढी घराणेशाही इतर कुठे असावि असे वाटत नाही ( कृपया सिंगापुर चे उदाहरण देऊ नये ) तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. मी केला हा दावा? त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे आणि सहमत आह एकी फार नाक खुपसले गेले असो आता तरी बदल होत आहे नवीन विडिओ भारत डायनॅमिकस https://www.youtube.com/watch?v=I0WlWrKP97o

In reply to by चौकस२१२

आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले?
तेच म्हणत आहे. ३१ ऑक्टोबरला शपथ घेतली ती समजा "केवळ मुलगा" म्हणून घेतली. पण ३१ डिसेंबरला लोकांचा जनादेश मिळवूनच शपथ घेतली होती ना?
अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम
कोणत्याही कारणाने का असेना लोकशाहीत एकदा लोकांचा जनादेश मिळाला की तो अंतिम असतो. एन.टी.रामारावांचा, केजरीवालांचा तरी राजकारणाशी कुठे संबंध होता? पण त्यांना जनादेश मिळाला ना? एकदा जनादेश मिळाला की पाच वर्षांसाठी सत्तेत राहायचा अधिकार मिळतो. कारण कोणतेही असेना. इंदिरांचे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाला असे तुम्हाला वाटते. पण काही लोक म्हणतात की राजीव गांधी हा नवा चेहरा आश्वासक वाटला म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. या दोन मतप्रवाहांमध्ये कोणाचे खरे? कोणाचेही खरे आणि कोणाचेही खोटे असले तरी राजीव गांधींना जनादेश मिळाला होता म्हणून ते ३१ डिसेंबरला परत पंतप्रधान झाले हे कसे नाकारणार?
पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता
परत तेच लिहित आहे- आपला नेता म्हणून कोणला निवडावे हा काँग्रेसवाल्यांचा प्रश्न झाला. त्यात इतरांनी ढवळाढवळ का करावी? तुम्हाला लाख वाटत असेल की काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी इतर लोक पात्र आहेत पण काँग्रेसवाले राहुल गांधींनाच आपला नेता मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न झाला. ते आपल्याला काय करायचे आहे?
तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. मी केला हा दावा?
मी कधी म्हटले की तुम्ही हा दावा केला? माझा म्हणण्याचा अर्थ हा की काँग्रेसवर घराणेशाहीवरून टीका करण्यापेक्षा त्याहून कितीतरी जास्त महत्वाचे मुद्दे टीका करण्यायोग्य आहेत. त्यासाठी नेहरूंनी आय.आय.टीची स्थापना केली त्याचे कौतुक होते पण जी कॉलेज सुरू झाली असती ती नेहरूंच्या धोरणांमुळे सुरू झाली नाहीत त्याकडे दुर्लक्ष होते हा दावा केला. याविषयी खाली अधिक.
त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे
हे मी पण कधी म्हटलेले नाही. माझा मुद्दा हा की नेहरूंनी समजा ५ आय.आय.टी स्थापन केल्या असतील पण त्यांनी आणि इंदिरांनी समाजवादी आर्थिक धोरणे राबवून अनेक उद्योगांमधून खाजगी क्षेत्राला हाकलून दिले आणि तिथे केवळ सरकारी मक्तेदारी ठेवली. ते समजा केले नसते आणि खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर त्या ५ आय.आय.टी पेक्षा जास्त कॉलेज (त्या दर्जाची- कदाचित वेगळ्या नावाने) खाजगी क्षेत्राने काढली असती कारण भविष्यात कुशल मनुष्यबळाची गरज पडेल हे त्यांना कळत नव्हते असे नाही. बिट्स पिलानी नाही का बिर्लांनी काढले? समजा खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर बिट्स पिलानीसारखी इतर कॉलेज का आली नसती? त्यामुळे नेहरूंनी आय.आय.टी स्थापन केली याचे कौतुक करताना त्यांच्या इतर धोरणांमुळे असे नुकसान झाले त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. तेव्हा सांगायचा उद्देश हा की काँग्रेसवाल्यांनी जे असे इतर नुकसान केले आहे त्यावर त्यांच्यावर जरूर टीका करा. ते अधिक प्रभावी मुद्दे आहेत. पण उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 14:18
बहुतेक गोष्टींशी सहमत पण " उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही." हे पटत नाही कारण त्याचा अतिरेक, तुम्ही केजरीवाल यांचे उदाहरण दिलेत तसेच जणू राजीव .. तुलना बरोबर नाही दोन्ही जरी "नवे" चेहरे असले तरी राजीव केवळ नेहरू घराण्याचे पुत्र म्हणून तिथे आले! केजरीवालांचे तसे नाही आता एकदा आल्यावर काहीतरी लायक काम राजीवजींनी केलं , राजीव एक सिद्धहस्त पायलट होते म्हणजे काही बिनडोक नवहते पण मुळात त्यानं या पदावर " बसण्याचाच काय अधिकार? काँग्रेस मध्ये त्यांनी त्याआधी काय काम केलं होते , " कॉन्ग्रेस ला हरकत नसेल तर बाकीच्यांना काय त्याचे" हे तांत्रिक दृष्ट्या बरोबर असले तरी लोकशाहीत घराणेशाही असली तर मग त्याचे उत्तर कोरिया होउ शकते ,, असो तत्वाचा प्रश्न आहे , या बाबतीत सहमत होऊयात कि आपण असहमत आहोत !

In reply to by अहिरावण

हा वेगळा मुद्दा झाला. असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी व्हायला घराणेशाहीच असली पाहिजे असे नाही. उदाहरणार्थः १. २००८ ते २०१२ या काळात रशियात व्लादिमीर पुतीननी डिमीट्री मेडवेडेवना अध्यक्ष केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून पुतीनच हलवत होते. २. २००१-०२ मध्ये आणि २०१४-१५ मध्ये जयललितांनी ओ.पन्नीरसेल्वमना मुख्यमंत्री केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून जयललिताच हलवत होत्या.

In reply to by अहिरावण

तुम्ही घराणेशाहीचे वावडे नाही
बरोबर. मतदारांकडून जनादेश घेऊन कोणी सत्तेत येत असेल तर घराणेशाहीतून जरी कोणी पुढे आला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 15:04
हो हे असे "खुर्ची उबवणे" होत असते पण तरी त्यात आणि "केवळ कुटुंबातील म्हणून हक्क असल्यासारखे गादीवर बसवणे" यात फरक आहे हे तरी मान्य करा आणि ते सुद्धा विषतः लोकशाही असलेलया देशात ( हुक्मशाहीत ते चालते हे तर गृहीतच आहे ) !

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माहितगार Fri, 05/10/2024 - 21:45
घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे नसलेल्या कार्यकर्त्याने व्यक्तीने मतदाराने करणे स्वतःचे अवमुल्यन आहे हे लक्षात घेतले पाहीजे. घराणेशाही कोणत्याही पक्षातील असॉ, शुद्ध लोकशाहीतील कार्यकर्त्यांसाठी समान संधी तत्वांचे समा-दाम-दंड-भेदाने मोडण्या योग्य शुद्ध अस्विकारणीय उल्लंघन आहे. मला माहित नाही बाबा साहेब आंबेडकरांना घराणेशाही मंजूर होती का? पण भारतातील राजकीय जातीयवादासही घराणेशाहीने टिकवून ठेवले आहे. १४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली त्यांना दक्षिण आशियात घराणेशाहीला शरण जावे लागते असे विरोधाभासही विचीत्रच म्हणण्या लायक आहे.

In reply to by माहितगार

१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली नक्की? काही अभ्यास आहे की ठोकून दिले?

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 05/10/2024 - 22:33
प्रकाश आंबेडकर काही वेळा चुकतात नाही असे नाही तरी त्यांचा प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न बर्‍याचदा जाणवतो. स्वतः घराणेशाहीचे प्रतीक असतानाही प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या कोणतेही राजकीय घराणे मागे नसताना मुख्यमंत्री होण्याचे कौतुक केले तसे शिंदेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे केले तर टिका करेन असेही म्हटले असते तर बरे झाले असते पण त्यांनी शिंदेंवर अशी टिका का केली नसेल? शिंदेचा मुलगा राजकीय तिकीटासाठी सहज स्विकारला तर राजकीय वारसा नसलेला एक मेहनती सामान्य कार्यकर्ता नाकारला जात असतो. जे शिंदे बद्दल खरे असते तेच अमीत शहांबद्दल खरे असू शकते संगमा घराण्या बद्दलही खरे असू शकते काश्मिरच्या मुफ्ति आणि अब्दुला घराण्याबद्दलही खरे असू शकते गांधी घराण्याबद्दल खरे असू शकते राबडी देवी तेजस्वी यादवांबद्दल खरे असू शकते पटनाईकांबद्दल खरे असू शकते रेड्डींबद्दल खरे असू शकते करूणानिधी बद्दल खरे असू शकते देवगौडांबद्दल खरे असू शकते या सर्वांनी आणि मूर्ख मतदारांनी असंख्य मेहनती पण वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांचे नुकसान आणि भारतीय लोकशाहीचे अनन्यसाधारण नुकसान गेली ७५ वर्षे चालवले आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार Fri, 05/10/2024 - 22:59
त्यांच्या बॉसची घराणेशाही नाकारल्यावर त्यांची कोण स्विकारतो? आरंगजेबाच्या घराणेवादाने आणि घराणेशाहीला कुर्नीसात करण्याच्या भारतीय मनोवृत्तीने केवळ मोगलाई संपली पेशवाईची वस्त्रे वंश परंपरागत असावीत या आग्रहाने केवळ पेशवाई संपली असे नाही भारतीयांचे स्वातंत्र्यही लयाला गेले

In reply to by चौकस२१२

स्वरुपसुमित Fri, 05/10/2024 - 19:04
एकाच घरात अस्ल्याने काहि तरी माहिति असेल सम्भाळायला लोक होतेच बाकी त्या वेळी कोन कोन होते परि वारात?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे Tue, 05/07/2024 - 23:08
काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल. हायला वार वर्मी लागलेला दिसतोय जळजळ फार होते आहे का? नाही अगदी खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरलाय म्हणून? उगी उगी चान्गल्या वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घ्या एखादा युनानीवाला असेल तर अजून बरं

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Wed, 05/08/2024 - 08:44
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 12:15
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना? प्रतिसाद द्या कि कोण नको म्हणतोय? आणि सार्वजनिक न्यासावर प्रतिसाद दिला कि त्याला उत्तर येणार हे गृहीत धरलेले आहेच. त्याला खिडकीत बसल्याचा माझाच प्रतिसाद आठवायचे कारणही नाही. पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत हि वस्तुस्थिती बदलता येत नाही म्हणून जळजळ होते त्याला उपाय काहीच नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती झाली आहे तुमची म्हणून असे खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरला आहात हे लोकांना समजून येते. बाकी चालू द्या वैचारिक बद्धकोष्ठ

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 12:38
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. उगाच खांद्याखाली बळकट प्रतिसाद आठवले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 18:34
भुजबळ बुवा तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी पातळी खाली आणत नाही तेंव्हा स्वत: वर जितकं खुश व्हायचंय तितकं व्हा !

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 18:47
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. असं एक मिपावरील साधू महात्मा बोललाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 19:45
छे छे तुमच्या सारख्या महापुरुषांच्या वैयक्तिक पातळीवर उतरण्याची आमच्या सारख्या पामरांची काय बिशाद? तुम्ही डोकं उडवलेल्या बाजीप्रभुंसारखे चौफेर थैमान घालत असता. कोणताही धागा असो त्यात आपला भरभक्कम सहभाग असल्याशिवाय धागा पुढे सरकतच नाही. त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं. तेंव्हा तुमच्या पातळीवर येण्याची आम्ही हिंमतच करत नाही.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 19:50
भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे. भारतीय जनतेच्या अकलेची काळजी तुम्ही कशाला करताय? बाकी अकलेचा मक्ता फक्त आपल्याकडेच असतो आणि आपल्यालाच काय ती अक्कल आहे असे समजणारे लोक डाव्या पिलावळीत भरभरून आहेत. पण त्यांची स्थिती आजकाल केविलवाणी झाली आहे. भारतीय जनतेने त्यांना कालबाह्य केल्यामुळे केवळ जळफळाट सोडून दुसरं काहीच करता येत नाही. अवघड जागी दुखणं आहे ते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. चालायचंच

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 13:29
बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत दक्षिणेतील मतदार सुशिक्षित असल्याने तिथे मोदी आणी भाजपला कुत्र विचारत नाही. येडीअप्पाच्या जातीय राजकारणामुळे कर्नाटकात भाजप आहे. शेणपट्टयातील अशिक्षित मतदारात मोदी हीट आहेत म्हणजे मोदी भारतातील सुप्रसिद्ध नेते होत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ गुरुवार, 05/09/2024 - 13:53
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय? (तुमच्याच तर्काप्रमाणे ) बाप रे बाप स्वतःसाठी किती खोल खड्डा खणताय !

In reply to by चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 14:59
महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या मागे मोदींची प्रसिद्धी नव्हती तर ईडी लावुन, घोटाळे मॅनेज करुन, तोडीपाणी करुन, पक्षफोडी करुन स्थानिक प्रबळ नेते पक्षात घेतले हे कारण होते. असे नेते स्वतःच्या नावावर जिंकले होते ना की मोदींच्या. शिवाय १०५ मिळवायला शिवसेनेचीही साथ होती. नाहीतर कसबा झाला असता. त्यामुळे शेणपत्त्यामुळे १०५ मिळाल्या हे म्हणू शकत नाही.

In reply to by चौकस२१२

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 16:52
त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय?
फक्त महाराष्ट्रच नाही; भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे; म्हणून त्यांच्या तर्काने, अख्खा भारत देश म्हणजे शेण पट्टा!

In reply to by कांदा लिंबू

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 16:57
त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
आपल्या पक्षाच्या समर्थनाच्या प्रयत्नात कुठे थांबावे हे कळले नाही की माणूस किती रसातळाला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे!

In reply to by कांदा लिंबू

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 16:57
भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे भारताच्या एकूण एक मतदाराने?? भाजपचे मतदार म्हणजे संपूर्ण भारत नाही. मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा! >>>>>>> शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 17:25
शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.
I rest my case!

In reply to by गवि

अहिरावण गुरुवार, 05/09/2024 - 19:54
अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि. मिपावरील एक जण सोडल्यास सारे डु आयडी. मज्जाच मजा !!

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण Fri, 05/10/2024 - 12:52
१ नंबर. कंपाईल होईल पण एक्क्जीकुशनला रनटाईम एरर नको यायला... सेम इन्स्टन्स आलरेडी रनिंग...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण Fri, 05/10/2024 - 12:53
काय गडबड आहे रे मुलांनो !! किती छळाल एखाद्याला !! शोभतं का तुम्हाला हे? चला जा अभ्यास करा नीट क्लास आणि इनहेरीटन्सचा...

भागो गुरुवार, 05/02/2024 - 17:03
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा">>> First they came for the Communists And I did not speak out Because I was not a Communist Then they came for the Socialists And I did not speak out Because I was not a Socialist Then they came for the trade unionists And I did not speak out Because I was not a trade unionist Then they came for the Jews And I did not speak out Because I was not a Jew Then they came for me And there was no one left To speak out for me

In reply to by भागो

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/02/2024 - 17:34
देशद्रोही कारवाया करणार्‍यांना रॉ ने देशाबाहेर जाऊन गोळ्या घातल्यास त्याबद्दल ही कविता उधृत करणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखा प्रकार झाला. असो.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by भागो

कांदा लिंबू गुरुवार, 05/02/2024 - 17:44
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
भागो, अबा यांसारखे ID कोणत्या ही धाग्याचे काश्मीर करण्यात प्रवीण आहेत.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by भागो

अमर विश्वास गुरुवार, 05/02/2024 - 18:50
पतंजली आणि या धाग्याचा काय संबंध ? हे प्रतिसाद वाचून यांनाही चार जूनला बर्नोलची गरज पडेल असे वाटते

In reply to by अमर विश्वास

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:06
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by अमर विश्वास

पतंजली पतंजली हे थोर हिंदू आचार्य होते. सहा दर्शनांपैकी जे योग दर्शन त्याचे प्रणेते. ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत. चांगलं आहे , ह्या मुळे मवाळ पंथी हिंदूंना लक्षात येईल की केवळ मोदी, RSS, सावरकर वगैरे काँग्रेसचे टार्गेट आहेत असे नव्हे तर समस्त सनातन धर्म हा काँग्रेस चे टार्गेट आहे , अन् त्याला येनकेन प्रकारेण बदनाम करणे हाच ह्या लोकांचा उद्देश आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सनातन मनुवादी धर्म टार्गेट असावाच. विज्ञानवादी, पुरोगामी हिंदुधर्म टार्गेट असू नये. ह्या निमित्ताने भाजप आणी संघाला पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची असेल तर हिंदू आणी दलितानी सावध रहावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सर टोबी Sat, 05/04/2024 - 19:37
साचेबंद तर्क सोडून पटवून देऊ शकता का? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला आहे. आता साचेबंद तर्क म्हणजे काय ते समजावून सांगतो.
  • प्रदूषण काय फक्त हिंदू सणांमुळेच होतं का?
  • हिंदूंना आपल्याच देशात, आपल्याच चालीरीती पाळण्याची नामुष्की कशी असू शकते?
  • मान्य आहे “काही मूठभर" लोक समाज विघातक कृत्य करतात, पण संपूर्ण धर्मालाच नकोसं म्हणणे कितपत बरोबर आहे?
वरील प्रश्न केवळ प्रातिनिधिक आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंचं सामाजिक जीवन अतिशय कर्कश्य आणि आक्रस्ताळं बनलेलं आहे आणि कोणताही सनातनी याची जबाबदारी टाळून सनातन धर्माची भलामण करू शकणार नाही. तसेच यापूर्वी सनातन धर्मावरील चर्चेत आपण जातींची उतरंड आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबतीत काही बेधडक पण संविधानाला मान्य नसणारी मतं व्यक्त केली होती अशी माझी समजूत झालेली आहे. आपण आजही त्या मतांच्या बाबतीत ठाम असाल तर तसे सांगावे म्हणजे आम्ही देखील ”होय. लिब्राडूंच!” असे म्हणायला मोकळे.

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Sat, 05/04/2024 - 20:00
ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत.
दुर्दैवाने सहमत आहे. पतंजली सारख्या ऋषीमुल्य ऋषितुल्य व्यक्तींचा अकारण, अप्रस्तुत, हेटाळणीपूर्वक उल्लेख करणे, हे हिंदूविरोधी, डाव्या, सेक्युलर कुविचारसरणीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Patanjali

In reply to by सुबोध खरे

अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 19:07
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

भागो गुरुवार, 05/02/2024 - 19:42
मंडळीहो रागावू नका. सगळ्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमुचा राम राम घ्यावा. सब कुछ सिखा हमने ना सिखी... हम किस गलीमे आ गये है आपण कोई ठिकाना नही. Long live, Prosper and Be Happy. Salutation!

नठ्यारा Fri, 05/03/2024 - 18:17
वडगावकर,
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
हे एका अर्थी बरोबर आहे. एका अर्थी यासाठी म्हंटलं की रॉ आधीपासून सक्षम होतीच. १९७१ साली तिने अत्यंत वेगवान हालचाली करून / करवून बांगलादेश निर्माण केला. ही गुप्तहेरांच्या जगातली एक दैदिप्यमान कामगिरी मानली जाते. हेनरी किसिंजर अत्युच्च पातळीचा हेर होता. त्याला चकवणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. तरीपण रॉने बरोब्बर प्यादी हलवली. म्हणून किसिंजर इंदिरा गांधींना दॅट बिच ( = ती कुत्री ) म्हणायचा. इंदिरा गांधींच्या नंतर कणखरपणाचं दुर्भिक्ष्य उत्पन्न झालं. ते आत्ता दूर होतंय. रॉ परत फॉर्मात येणार हे नक्की. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. ती भारताच्या सांप्रत नेतृत्वाकडे भरपूर आहे. बाकी, एमाय-६, मोसाद, सीआये, एफेसबी वगैरे गुप्तचर संस्था क्षमतेच्या दृष्टीने साधारणत: एकसारख्याच असतात. त्यांच्या डोक्यावर कोण नेता बसून आहे यावर त्यांचं यशापयश जगाला दिसतं. -नाठाळ नठ्या

सर टोबी Fri, 05/03/2024 - 21:02
च्या चाहत्यांचं हे नविन टुलकिट दिसतंय. बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय. आदरणीय प्रधानसेवक बाकी कुठल्या बाबतीत विश्वगुरु असोत वा नसोत, टुलकीटच्या बाबतीत त्यांची सर कुणाला येणं शक्य नाही. तर येऊ आपल्या मूळ मुद्याकडे. आज काल सगळं काही धडाकेबाज पद्धतीने घडतंय. मग तो विकास असो, सर्जिकल स्ट्राइक असो की भारत विरोधी शक्तींचा खात्मा असो. इथे वाहवा करणाऱ्या सदस्यांची अशी समजूत दिसतीय की इस्राईल किंवा अमेरिका दुसऱ्या देशात हत्त्या घडवतात आणि आपल्या दादागिरीच्या जोरावर सगळं काही मिटवतात. हे कदाचित पॅलेस्टाइन किंवा पाकिस्तानच्या बाबतीत होईल देखील. पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे असे निदान पूर्वीच्या “लेच्यापेच्या आणि लांगूलचालन” करणाऱ्या सरकारकडून झालेलं नाही अशी माझी समजूत आहे. थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. हेच जर वारंवार व्हायला लागलं तर काही सुचक घटना नजीकच्या भूतकाळात घडल्या आहेत (कतारने भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मुत्युदंडाची शिक्षा देणं, कॅनडाबरोबरचे परराष्ट्र संबंध बंद होणे) त्यांच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. यात तंत्रज्ञान अदान प्रदान, परकीय गुंतवणूक, पर्यटकांना धोक्याची सूचना देणं, आणि शेवटी काळ्या यादीत टाकणं. जाता जाता: काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल.

In reply to by सर टोबी

कांदा लिंबू Fri, 05/03/2024 - 21:43
बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय.
सहमत आहे. डाव्यांकडून आप पक्षानेही हे कौशल्य घेतलंय.

In reply to by सर टोबी

थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. तो गावठी जेम्स बाँड आल्या पासून सगळं उघड होऊ लागलंय. म्हणे हा गावठी जेम्स बॉंड अमुक वर्षे पाकिस्तानात राह आलाय कुठलाही गुप्तहेर हे उघड करत नाही तसेच देशही अश्या बातम्या उघड करत नाही. मग अंधभक्ताना कुठून कळतात ह्या?? गुप्तहेर संघटनेत “गुप्त” शब्द का असतो? हे कळण्याइतके भक्त प्रगल्भ नाहीत.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Mon, 05/06/2024 - 09:42
पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे हे सध्याच्या सरकारच्या काळात चालू आहे असा तुमचा दावा आहे काय? काही उदाहरणे ?

In reply to by चौकस२१२

सर टोबी Mon, 05/06/2024 - 10:24
प्रगती, देशाचा सन्मान, नागरिकांचं जीवनमान उंचावणं याबाबतीत मागची सरकारे आणि खास करून काँग्रेसची सरकारे सपशेल अपयशी असतांनादेखिल त्या लेच्यापेच्या सरकारांकडून असलं पातक घडलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या बाबतीत कसं असतं कि पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं मनमोहन सिंग वगैरेंचं कौतुक करायचं. असू द्या.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 05:03
"पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं" सर टोबी हि तुम्ची गैरसमजूत , मोदी आज आहेत उद्या नाहीत , प्रेम वैगरे काही नाही , त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस आणि दवयांपेक्षा सध्या तरी जास्त योग्य वाटतो ,,, आणि काय हो जगातील सर्वात मोठया लोकशाहीत जर निदान २ तरी सक्षम पक्ष नसावेत का? त्या दृष्टीतें पाहता काँग्रेस चा पण जरा जीर्णोद्धार व्हावा पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा, अर्थात तुम्हीं .म्हणणार उगाच दाखवयाचा म्हणून काँग्रेस बद्दल लिहितोय !

In reply to by चौकस२१२

सर टोबी Wed, 05/08/2024 - 07:05
गेली दहा वर्ष आम्ही मोदी आणि भाजप यांची लक्तरे वेशीवर टांगतोय. एवढं करूनही तुम्हाला मोदी आणि भाजपच योग्य वाटत असेल तर हिम्मत करा ना ”होय आम्हाला मोदी प्रिय आहेच" हे सांगण्याचे. काही तरी भलामण करायची आणि मग असले तळ्यात मळ्यात करायचं. घराणेशाहीबद्दल म्हणायचं तर मी यापुर्वीदेखील म्हणालो आहे. त्या पक्षाच्या सहा पंतप्रधानांमध्ये निम्म्याहून जास्त एका घराण्याचे पंतप्रधान होते. भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? आणि कोणतीही शासन व्यवस्था मूलतः चांगली अथवा वाईट नसते. चांगली किंवा वाईट सत्ता राबवणाऱ्यांची नियत असते. आता बोला भाजप आणि मोदींची काय नियत आहे याबद्दल.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 07:50
निम्म्याहून जास्त एका घराण्याच्या बाहेरचे होते असे वाचावे. अरे पण निम्मे तर होते ना? आणि रिमोट कोणाकडे? ( शशी थरूरांनां विचारा ) हायला ह्याला म्हणतात "मिया गिरे तो भी टांग उपर ", जय नेहरू चाचा नमोस्तुते जय इंदिरा "इज इंडिया" नमोस्तुते जय राजपूत्र राजीव नमोस्तुते जय राणी सोनिया नमोस्तुते जय शहाजादे राहुल नमोस्तुते जय राजकन्या प्रियांका नमोस्तुते याउलट हे पहा भाजप अध्यक्ष https://en.wikipedia.org/wiki/List_of_presidents_of_the_Bharatiya_Janata_Party हे पहा जन संघ अध्यक्ष https://en.wikipedia.org/wiki/Bharatiya_Jana_Sangh

In reply to by चौकस२१२

सर टोबी Wed, 05/08/2024 - 08:41
जे होते त्यांचा पंतप्रधान असण्याचा ठसा आजही दिसतो. तसा तो मोदींचाही दिसेल. जळके अवशेष, भळभळनाऱ्या जखमांच्या स्वरूपात आणि ऊठसूठ हयात नसणाऱ्या पंतप्रधानाचे वाभाडे काढायला. बाकी रिमोटचं म्हणाल तर तथाकथित दुर्बळ पंतप्रधानांनी जेवढं करुन ठेवलंय ते देखील यांना भारी पडतंय. असू द्या. तोल ढळला आहे आणि संपादक डुलक्या घेत आहेत.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 07:41
तळ्यात मळ्यात कसले आहे स्पष्ट सांगतो कि भाजप + मोदी हे गणित नेहरू घराण्याची मालकी असलेला काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांचे कडबोळे यापेकशा अनेकांना मान्य आहे त्यातला मी पण म्हणून २०१४ आणि १९ वर्षी निवडून आले ... २४ वर्षी काय होईल ते होईल अनेकांना मान्य आहे हे तुम्हाला मान्य दिसत नाही .. नसो तुम्ची मर्जी भाजप ची भलावण केली कि लागेचच अंधालेपणा आणि एका घराण्याची काँग्रेस चालते ? भाजप चा समर्थक म्हणजे अंधभक्त नव्हे ते हि चुकतात ( आता असे म्हणले कि लगेच कुम्पणवर बसणारे ! अरे हे काय तुम्ही विचारता भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? सध्या कशाला सांगतील असे? हुकुमी एक्का आहे त्यांचा आणि मुळात ते सुद्धा काय "कोणत्या घराण्यात जन्मले " म्हणून नाही झाले पंतप्रधानांचे उमेदवार , त्यांनी घासली गुजरात मध्ये प्रथम आणि काय हो कांग्रेस मध्ये जी पक्श प्रमुखाची " लुटू पुटुची " निवडणूक झाली ती काय अंतर्गत लोकशाही चा नमुना होता? या उलट भाजप आणि त्यामागचा संघ यात नेते बदलत असतात .. त्यांची अंतर्गत व्यवस्ताह जी असेल ती असेल घराणेशाही तर नाही ४ पिढ्यांची

In reply to by चौकस२१२

पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा
आपल्या बाजूने घराणेशाहीचा मुद्दा नेहमी लाऊन धरला जातो. मात्र तो मुद्दा तितकासा योग्य नाही असे मला वाटते. आपला नेता म्हणून कोणाला नेमावे हा काँग्रेसचा प्रश्न झाला. तो आपला प्रश्न नाही. जर लोकांनी त्या नेत्याला निवडून दिले तर मग तो नेता कोणीही असू दे- घराणेशाहीतून आलेला किंवा न आलेला, त्याने फार फरक पडू नये. राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ दोन वेळा घेतली- ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? निवडणुकीच्या वेळेस लोकांसमोर वेगळा नेत्याचा चेहरा ठेवायचा आणि निवडणुक झाल्यावर मात्र इंदिरा पुत्र म्हणून राजीव गांधींना नेता निवडायचे असे तर झाले नव्हते ना? काँग्रेसला लक्ष्य करायला इतर कित्येक मुद्दे आहेत. त्यावर टीका जरूर करावी. नेहरूंनी आय.आय.टी ची स्थापना केली म्हणून नेहमी कौतुक केले जाते पण नेहरूंच्या काळात ५ आय.आय.टी- मुंबई, खरगपूर, मद्रास, दिल्ली आणि कानपूर यांची स्थापना झाली होती. त्यापूर्वी भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण दिले जात नव्हते का? तर तसे अजिबात नाही. पुण्याचे इंजिनिअरींग कॉलेज, मुंबईचे व्ही.जे.टी.आय अगदी १९ व्या शतकातच सुरू झाले होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत इंजिनिअरींगचे शिक्षण १९२० च्या दशकात सुरू झाले होते. धनबादच्या कॉलेजमध्ये मायनिंग इंजिनिअरींगचे शिक्षण सुरू झाले त्याला आता जवळपास १०० वर्षे झाली आहेत. रूरकीचे कॉलेज तर पुण्याच्या इंजिनिअरींग कॉलेजपेक्षा जुने आहे. आमचे सांगलीचे वालचंद कॉलेज सुध्दा १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस सुरू झाले होते. ते सुरू करण्यात नेहरूंचा काहीही हात नव्हता. अहमदाबादचे एल.डी.कॉलेज सुरू करण्यात पुढाकार होता कस्तुरभाई लालभाई या उद्योगपतींचा. बिट्स पिलानी कोणी सुरू केले? ते पण नेहरूंनी का? तेव्हा सांगायचा मुद्दा हा की भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण नेहरूंनी सुरू केले अशाप्रकारच्या आविर्भावात काँग्रेसचे गुलाम बोलत असतात त्यात कितपत तथ्य आहे? मी तर म्हणतो उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करून भारतीय उद्योगांचा गळा नेहरू-इंदिरा गांधींनी घोटला नसता तर भारतात इंजिनिअरींग आणि टेकॉनॉलॉजीचे शिक्षण बरेच जास्त वाढले असते. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने नाक न खुपसता उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर आपले उद्योग पुढे वाढवायचे असतील तर कुशल मनुष्यबळ आपल्याला लागेल हे उद्योगपतींना कळत नव्हते का? त्यांनीच पुढाकार घेऊन कॉलेज सुरू केली असती. बिर्लांनी बिट्स पिलानी सुरू केले, कस्तुरभाई लालभाईंनी अहमदाबादमध्ये एल.डी.कॉलेज, आय.आय.एम किंवा धोंडुमामा साठेंनी वालचंद कॉलेज अशा संस्थांची स्थापना केली ते जाळे न्हेरूंनी केले त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक वाढले असते. तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. बाकी नेहरूंनी काश्मीर प्रश्नात एक धड निती न ठेऊन अपरंपार घाण घालून ठेवली ती निस्तरायला इतकी दशके गेली. शेख अब्दुल्ला देशविरोधी कारवाया करत आहे हे सरळ सरळ समोर दिसत असूनही त्याच्याविरोधात ४-५ वर्षे काहीही कारवाई न करता मोकळे रान दिले. काश्मीरच्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये आणायला काहीही केले नाही उलट तुम्ही कोणीतरी वेगळे आहात ही भावना दृढमूल करणारे कलम ३७० माथी मारून ठेवले. चीन युध्द होईपर्यंत आपल्या सैनिकी सज्जतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. हिमालयात चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांकडे लढायला शस्त्रे पण नव्हती. आणि हे आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहतींच्या लोकांच्या ब्रिटिश-फ्रेंचांविरोधी लढ्याला नैतिक पाठबळ द्यायला फिरत होते. चीनने हल्ला केल्यावर हे खडबडून जागे झाले आणि ज्या इस्राएलकडे १९४८ पासून दुर्लक्ष करत होतो त्याच इस्राएलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिऑन यांना पत्र लिहून आम्हाला शस्त्र द्या अशी विनंती केली. नुसते तेवढेच नाही तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली. मदत मागणारे वर उलट्या अटी घालत आहेत हे बघून डेव्हिड बेन गुरिऑनना काय वाटले असेल? जसे काही इस्राएलने दिलेली शस्त्रे घेऊन आपण त्यांच्यावर मोठे उपकारच करणार होतो. इंदिरा परराष्ट्रधोरणाच्या बाबतीत नेहरूंपेक्षा लाखो पटींनी अधिक चांगल्या होत्या. पण देशांतर्गत धोरणात नेहरूंनीही न केलेले प्रकार त्यांनी केले होते. कोर्ट, आर.बी.आय वगैरे 'इन्स्टिट्यूशन्स' शी खेळ त्यांनी केला होता. भ्रष्टाचार, नेपोटेझिम या गोष्टींना राजाश्रय दिला. असो. तर काँग्रेसवर टीका करायला इतर अनेक मुद्दे असताना उजव्या बाजूचे लोक घराणेशाही या निरूपयोगी मुद्द्यावर टीका करत असतात. ते बंद करायला हवे असे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ अभ्यासू प्रतिसाद. आणी घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिकअधिकारही भाजप्यांना नाही. आमदारपुत्र, मंत्री काकूचे भाचे देवेंद्र फडणवीसही घराणेशाहीतूनच आलेत. आहेका हिंमत त्यांना बाजूला करायची?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 13:30
चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार यांनी केलेली काँग्रेस वरील मुद्देसूद टीका "अ बां णा मान्य आहे तर ! हाःहाःहाःअह्हा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वरुपसुमित Fri, 05/10/2024 - 19:02
तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली. राज नै तीक कारण असेल

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सर टोबी Wed, 05/08/2024 - 11:26
आयआयटीची स्थापना आणि तत्सम प्रतिवाद हा एक दृष्टिकोन आणि प्राथमिकता तसेच देशाचा सामाजिक पोत कसा असावा याचा एक विचार या अर्थाने केला जातो. मोदींनी भजे तळायचा सल्ला दिल्यावर “कुठे आहेत खाऊ गल्ल्या?” असा प्रश्न जितका बालिश तितकाच नेहरूंच्या अगोदर असलेल्या शैक्षणिक संस्थांची जंत्री देणं हे बालिश. सरकारने जिथे तिथे उद्योग स्थापन केले हे आजच्या काळात नक्कीच वावगं वाटू शकते. पण आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो. खेडोपाडी पोहोचलेली टपाल सेवा, बस आणि रेल्वे सेवा, बँकिंग, आरोग्य आणि शिक्षण अशा गोष्टी खाजगी गुंतवणूकदारांच्या भरवशावर ठेवता आल्या नसत्या. निळकंठ कल्याणी, बी जी शिर्के यांसारखे उद्योजक हे लहान शहरातून आलेले उद्योजक होते. म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा जेमतेम चार बूकं शिकलेली जनता तयार करीत नव्हत्या. बाकी काश्मिर प्रश्नावर इतर बऱ्याच तज्ज्ञांकडून मते ऐकली आहेत आणि त्यातल्या कोणीही काश्मिरींचे अतिरिक्त लाड किंवा तत्सम प्रकारे ३७० व्या कलमाची संभावना केली नाही.

In reply to by सर टोबी

कांदा लिंबू Wed, 05/08/2024 - 12:49
आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो.
सणासुदीच्या काळात, केवळ खाजगीच नव्हे, सरकारी वाहन सेवादेखील किमती वाढवतात. बाकी बाबींवर चंसुकु यांनी याआधीही अनेकदा लिहिलंय, आत्ता, वरही थोडक्यात लिहिलंय. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 13:26
१९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले? तिथेच तर गेम आहे मूळच्या काँग्रेस मध्ये घराणे नवहते , नेहरूंच्या नंतर ते सुरु झाले ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम आता म्हणाल सध्याच्या भाजपात घराणेशाची डोकावत नाही का.. तर उत्तर दुर्दैवाने स्थानिक पातळीवर ते होते आहे, ते फार पुढे जाऊ नये असेही वाटते कारण त्या मागे असलेल्या संघात तरी हि घराणे शाही दिसत नाही पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता आज सुद्धा राहुल चाय पणतूला पण निवडून देऊ कारण तो त्या घराण्यातील आहे अशी खानची मानसिकता आहे सदृढ लोकशाहीत एवढी घराणेशाही इतर कुठे असावि असे वाटत नाही ( कृपया सिंगापुर चे उदाहरण देऊ नये ) तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. मी केला हा दावा? त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे आणि सहमत आह एकी फार नाक खुपसले गेले असो आता तरी बदल होत आहे नवीन विडिओ भारत डायनॅमिकस https://www.youtube.com/watch?v=I0WlWrKP97o

In reply to by चौकस२१२

आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले?
तेच म्हणत आहे. ३१ ऑक्टोबरला शपथ घेतली ती समजा "केवळ मुलगा" म्हणून घेतली. पण ३१ डिसेंबरला लोकांचा जनादेश मिळवूनच शपथ घेतली होती ना?
अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम
कोणत्याही कारणाने का असेना लोकशाहीत एकदा लोकांचा जनादेश मिळाला की तो अंतिम असतो. एन.टी.रामारावांचा, केजरीवालांचा तरी राजकारणाशी कुठे संबंध होता? पण त्यांना जनादेश मिळाला ना? एकदा जनादेश मिळाला की पाच वर्षांसाठी सत्तेत राहायचा अधिकार मिळतो. कारण कोणतेही असेना. इंदिरांचे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाला असे तुम्हाला वाटते. पण काही लोक म्हणतात की राजीव गांधी हा नवा चेहरा आश्वासक वाटला म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. या दोन मतप्रवाहांमध्ये कोणाचे खरे? कोणाचेही खरे आणि कोणाचेही खोटे असले तरी राजीव गांधींना जनादेश मिळाला होता म्हणून ते ३१ डिसेंबरला परत पंतप्रधान झाले हे कसे नाकारणार?
पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता
परत तेच लिहित आहे- आपला नेता म्हणून कोणला निवडावे हा काँग्रेसवाल्यांचा प्रश्न झाला. त्यात इतरांनी ढवळाढवळ का करावी? तुम्हाला लाख वाटत असेल की काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी इतर लोक पात्र आहेत पण काँग्रेसवाले राहुल गांधींनाच आपला नेता मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न झाला. ते आपल्याला काय करायचे आहे?
तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते. मी केला हा दावा?
मी कधी म्हटले की तुम्ही हा दावा केला? माझा म्हणण्याचा अर्थ हा की काँग्रेसवर घराणेशाहीवरून टीका करण्यापेक्षा त्याहून कितीतरी जास्त महत्वाचे मुद्दे टीका करण्यायोग्य आहेत. त्यासाठी नेहरूंनी आय.आय.टीची स्थापना केली त्याचे कौतुक होते पण जी कॉलेज सुरू झाली असती ती नेहरूंच्या धोरणांमुळे सुरू झाली नाहीत त्याकडे दुर्लक्ष होते हा दावा केला. याविषयी खाली अधिक.
त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे
हे मी पण कधी म्हटलेले नाही. माझा मुद्दा हा की नेहरूंनी समजा ५ आय.आय.टी स्थापन केल्या असतील पण त्यांनी आणि इंदिरांनी समाजवादी आर्थिक धोरणे राबवून अनेक उद्योगांमधून खाजगी क्षेत्राला हाकलून दिले आणि तिथे केवळ सरकारी मक्तेदारी ठेवली. ते समजा केले नसते आणि खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर त्या ५ आय.आय.टी पेक्षा जास्त कॉलेज (त्या दर्जाची- कदाचित वेगळ्या नावाने) खाजगी क्षेत्राने काढली असती कारण भविष्यात कुशल मनुष्यबळाची गरज पडेल हे त्यांना कळत नव्हते असे नाही. बिट्स पिलानी नाही का बिर्लांनी काढले? समजा खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर बिट्स पिलानीसारखी इतर कॉलेज का आली नसती? त्यामुळे नेहरूंनी आय.आय.टी स्थापन केली याचे कौतुक करताना त्यांच्या इतर धोरणांमुळे असे नुकसान झाले त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. तेव्हा सांगायचा उद्देश हा की काँग्रेसवाल्यांनी जे असे इतर नुकसान केले आहे त्यावर त्यांच्यावर जरूर टीका करा. ते अधिक प्रभावी मुद्दे आहेत. पण उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 14:18
बहुतेक गोष्टींशी सहमत पण " उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही." हे पटत नाही कारण त्याचा अतिरेक, तुम्ही केजरीवाल यांचे उदाहरण दिलेत तसेच जणू राजीव .. तुलना बरोबर नाही दोन्ही जरी "नवे" चेहरे असले तरी राजीव केवळ नेहरू घराण्याचे पुत्र म्हणून तिथे आले! केजरीवालांचे तसे नाही आता एकदा आल्यावर काहीतरी लायक काम राजीवजींनी केलं , राजीव एक सिद्धहस्त पायलट होते म्हणजे काही बिनडोक नवहते पण मुळात त्यानं या पदावर " बसण्याचाच काय अधिकार? काँग्रेस मध्ये त्यांनी त्याआधी काय काम केलं होते , " कॉन्ग्रेस ला हरकत नसेल तर बाकीच्यांना काय त्याचे" हे तांत्रिक दृष्ट्या बरोबर असले तरी लोकशाहीत घराणेशाही असली तर मग त्याचे उत्तर कोरिया होउ शकते ,, असो तत्वाचा प्रश्न आहे , या बाबतीत सहमत होऊयात कि आपण असहमत आहोत !

In reply to by अहिरावण

हा वेगळा मुद्दा झाला. असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी व्हायला घराणेशाहीच असली पाहिजे असे नाही. उदाहरणार्थः १. २००८ ते २०१२ या काळात रशियात व्लादिमीर पुतीननी डिमीट्री मेडवेडेवना अध्यक्ष केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून पुतीनच हलवत होते. २. २००१-०२ मध्ये आणि २०१४-१५ मध्ये जयललितांनी ओ.पन्नीरसेल्वमना मुख्यमंत्री केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून जयललिताच हलवत होत्या.

In reply to by अहिरावण

तुम्ही घराणेशाहीचे वावडे नाही
बरोबर. मतदारांकडून जनादेश घेऊन कोणी सत्तेत येत असेल तर घराणेशाहीतून जरी कोणी पुढे आला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Wed, 05/08/2024 - 15:04
हो हे असे "खुर्ची उबवणे" होत असते पण तरी त्यात आणि "केवळ कुटुंबातील म्हणून हक्क असल्यासारखे गादीवर बसवणे" यात फरक आहे हे तरी मान्य करा आणि ते सुद्धा विषतः लोकशाही असलेलया देशात ( हुक्मशाहीत ते चालते हे तर गृहीतच आहे ) !

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माहितगार Fri, 05/10/2024 - 21:45
घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे नसलेल्या कार्यकर्त्याने व्यक्तीने मतदाराने करणे स्वतःचे अवमुल्यन आहे हे लक्षात घेतले पाहीजे. घराणेशाही कोणत्याही पक्षातील असॉ, शुद्ध लोकशाहीतील कार्यकर्त्यांसाठी समान संधी तत्वांचे समा-दाम-दंड-भेदाने मोडण्या योग्य शुद्ध अस्विकारणीय उल्लंघन आहे. मला माहित नाही बाबा साहेब आंबेडकरांना घराणेशाही मंजूर होती का? पण भारतातील राजकीय जातीयवादासही घराणेशाहीने टिकवून ठेवले आहे. १४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली त्यांना दक्षिण आशियात घराणेशाहीला शरण जावे लागते असे विरोधाभासही विचीत्रच म्हणण्या लायक आहे.

In reply to by माहितगार

१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली नक्की? काही अभ्यास आहे की ठोकून दिले?

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 05/10/2024 - 22:33
प्रकाश आंबेडकर काही वेळा चुकतात नाही असे नाही तरी त्यांचा प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न बर्‍याचदा जाणवतो. स्वतः घराणेशाहीचे प्रतीक असतानाही प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या कोणतेही राजकीय घराणे मागे नसताना मुख्यमंत्री होण्याचे कौतुक केले तसे शिंदेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे केले तर टिका करेन असेही म्हटले असते तर बरे झाले असते पण त्यांनी शिंदेंवर अशी टिका का केली नसेल? शिंदेचा मुलगा राजकीय तिकीटासाठी सहज स्विकारला तर राजकीय वारसा नसलेला एक मेहनती सामान्य कार्यकर्ता नाकारला जात असतो. जे शिंदे बद्दल खरे असते तेच अमीत शहांबद्दल खरे असू शकते संगमा घराण्या बद्दलही खरे असू शकते काश्मिरच्या मुफ्ति आणि अब्दुला घराण्याबद्दलही खरे असू शकते गांधी घराण्याबद्दल खरे असू शकते राबडी देवी तेजस्वी यादवांबद्दल खरे असू शकते पटनाईकांबद्दल खरे असू शकते रेड्डींबद्दल खरे असू शकते करूणानिधी बद्दल खरे असू शकते देवगौडांबद्दल खरे असू शकते या सर्वांनी आणि मूर्ख मतदारांनी असंख्य मेहनती पण वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांचे नुकसान आणि भारतीय लोकशाहीचे अनन्यसाधारण नुकसान गेली ७५ वर्षे चालवले आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार Fri, 05/10/2024 - 22:59
त्यांच्या बॉसची घराणेशाही नाकारल्यावर त्यांची कोण स्विकारतो? आरंगजेबाच्या घराणेवादाने आणि घराणेशाहीला कुर्नीसात करण्याच्या भारतीय मनोवृत्तीने केवळ मोगलाई संपली पेशवाईची वस्त्रे वंश परंपरागत असावीत या आग्रहाने केवळ पेशवाई संपली असे नाही भारतीयांचे स्वातंत्र्यही लयाला गेले

In reply to by चौकस२१२

स्वरुपसुमित Fri, 05/10/2024 - 19:04
एकाच घरात अस्ल्याने काहि तरी माहिति असेल सम्भाळायला लोक होतेच बाकी त्या वेळी कोन कोन होते परि वारात?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे Tue, 05/07/2024 - 23:08
काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल. हायला वार वर्मी लागलेला दिसतोय जळजळ फार होते आहे का? नाही अगदी खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरलाय म्हणून? उगी उगी चान्गल्या वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घ्या एखादा युनानीवाला असेल तर अजून बरं

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Wed, 05/08/2024 - 08:44
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 12:15
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना? प्रतिसाद द्या कि कोण नको म्हणतोय? आणि सार्वजनिक न्यासावर प्रतिसाद दिला कि त्याला उत्तर येणार हे गृहीत धरलेले आहेच. त्याला खिडकीत बसल्याचा माझाच प्रतिसाद आठवायचे कारणही नाही. पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत हि वस्तुस्थिती बदलता येत नाही म्हणून जळजळ होते त्याला उपाय काहीच नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती झाली आहे तुमची म्हणून असे खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरला आहात हे लोकांना समजून येते. बाकी चालू द्या वैचारिक बद्धकोष्ठ

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 12:38
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. उगाच खांद्याखाली बळकट प्रतिसाद आठवले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 18:34
भुजबळ बुवा तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी पातळी खाली आणत नाही तेंव्हा स्वत: वर जितकं खुश व्हायचंय तितकं व्हा !

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 18:47
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले. असं एक मिपावरील साधू महात्मा बोललाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 19:45
छे छे तुमच्या सारख्या महापुरुषांच्या वैयक्तिक पातळीवर उतरण्याची आमच्या सारख्या पामरांची काय बिशाद? तुम्ही डोकं उडवलेल्या बाजीप्रभुंसारखे चौफेर थैमान घालत असता. कोणताही धागा असो त्यात आपला भरभक्कम सहभाग असल्याशिवाय धागा पुढे सरकतच नाही. त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं. तेंव्हा तुमच्या पातळीवर येण्याची आम्ही हिंमतच करत नाही.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2024 - 19:50
भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे. भारतीय जनतेच्या अकलेची काळजी तुम्ही कशाला करताय? बाकी अकलेचा मक्ता फक्त आपल्याकडेच असतो आणि आपल्यालाच काय ती अक्कल आहे असे समजणारे लोक डाव्या पिलावळीत भरभरून आहेत. पण त्यांची स्थिती आजकाल केविलवाणी झाली आहे. भारतीय जनतेने त्यांना कालबाह्य केल्यामुळे केवळ जळफळाट सोडून दुसरं काहीच करता येत नाही. अवघड जागी दुखणं आहे ते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. चालायचंच

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 13:29
बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत दक्षिणेतील मतदार सुशिक्षित असल्याने तिथे मोदी आणी भाजपला कुत्र विचारत नाही. येडीअप्पाच्या जातीय राजकारणामुळे कर्नाटकात भाजप आहे. शेणपट्टयातील अशिक्षित मतदारात मोदी हीट आहेत म्हणजे मोदी भारतातील सुप्रसिद्ध नेते होत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ गुरुवार, 05/09/2024 - 13:53
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय? (तुमच्याच तर्काप्रमाणे ) बाप रे बाप स्वतःसाठी किती खोल खड्डा खणताय !

In reply to by चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 14:59
महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या मागे मोदींची प्रसिद्धी नव्हती तर ईडी लावुन, घोटाळे मॅनेज करुन, तोडीपाणी करुन, पक्षफोडी करुन स्थानिक प्रबळ नेते पक्षात घेतले हे कारण होते. असे नेते स्वतःच्या नावावर जिंकले होते ना की मोदींच्या. शिवाय १०५ मिळवायला शिवसेनेचीही साथ होती. नाहीतर कसबा झाला असता. त्यामुळे शेणपत्त्यामुळे १०५ मिळाल्या हे म्हणू शकत नाही.

In reply to by चौकस२१२

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 16:52
त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय?
फक्त महाराष्ट्रच नाही; भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे; म्हणून त्यांच्या तर्काने, अख्खा भारत देश म्हणजे शेण पट्टा!

In reply to by कांदा लिंबू

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 16:57
त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
आपल्या पक्षाच्या समर्थनाच्या प्रयत्नात कुठे थांबावे हे कळले नाही की माणूस किती रसातळाला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे!

In reply to by कांदा लिंबू

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/09/2024 - 16:57
भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे भारताच्या एकूण एक मतदाराने?? भाजपचे मतदार म्हणजे संपूर्ण भारत नाही. मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा! >>>>>>> शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू गुरुवार, 05/09/2024 - 17:25
शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.
I rest my case!

In reply to by गवि

अहिरावण गुरुवार, 05/09/2024 - 19:54
अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि. मिपावरील एक जण सोडल्यास सारे डु आयडी. मज्जाच मजा !!

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण Fri, 05/10/2024 - 12:52
१ नंबर. कंपाईल होईल पण एक्क्जीकुशनला रनटाईम एरर नको यायला... सेम इन्स्टन्स आलरेडी रनिंग...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण Fri, 05/10/2024 - 12:53
काय गडबड आहे रे मुलांनो !! किती छळाल एखाद्याला !! शोभतं का तुम्हाला हे? चला जा अभ्यास करा नीट क्लास आणि इनहेरीटन्सचा...
लेखनविषय:
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... ) वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की... भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये. त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...