मोदी २०१९ - निर्विवाद! बर्याच अंशी अपेक्षित!
जवळपास दीड महिन्यापासून मी मोदी लाट अजूनही आहे हे सांगत होतो. २९-एप्रिल-२०१९ रोजी मी या वेबसाईटच्या एका धाग्यावर सांगीतले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आणि एनडीएला बहुमत मिळणार. मी बर्याच लोकांशी बोललो होतो - रिक्शा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, निम्नमध्यमवर्गीय, आणि बरेच. स्वच्छपणे लोकांची पसंती मोदींना दिसत होती. मला आपल्या राजकीय निरीक्षकांचे आश्चर्य वाटते. बहुधा त्यांनी लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता. या मुद्द्यावरून कुठलेच सरकार यशस्वी किंवा अपयशी ठरत नाही. बेरोजगारी, गरीबी हे मुद्दे संपूर्णपणे सरकारच्या हातात नसतात. मला नोकरी मिळणे ही माझीदेखील जबाबदारी आहे. त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतील. यात सरकारची भूमिका मर्यादित असते. देशाचे संरक्षण, रस्ते, वीज, जागतिक पटलावर देशाची प्रतिमा, मोठ्या समस्यांशी मुकाबला वगैरे मोठ्या बाबी संपूर्णपणे सरकारच्या अखत्यारीत असतात. त्यामुळे आपल्या तथाकथित राजकीय निरीक्षकांनी बेरोजगारीवरून जी अनावश्यक राळ उडवली होती ती निरर्थक होती.
भाजप सरकारचा एक थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास तो असा दिसेलः कुठल्याच प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं नाहीत, कुठलेच मोठे दंगे-धोपे नाहीत, पाकिस्तानला ठोस उत्तर दिले, देशाची मान सगळ्या जगात उंचावली, डिजीटल इंडियामुळे सामान्य लोकांचे आयुष्य बरेच सुकर झाले, जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न वाढले, चीनला डोकलाममध्ये जशास तसे उत्तर दिले, युनोमध्ये चीनकडून दहशतवादावर सहमती मिळवली, महागाई नियंत्रणात ठेवली, स्वच्छ भारत मिशनद्वारे भारतीयांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, उघड्यावर शौच पूर्णपणे बंद केले, लाखो परिवारांना सुलभ गॅस कनेक्शन मिळवून दिले, रस्त्यांचे नवनवे प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेले, ज्या देशांमध्ये समस्या होत्या त्या देशांमधून भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले, काश्मिरमध्ये जमात-ए-इस्लामीचे नेटवर्क कमजोर पाडले, शेतकर्यांना विविध प्रकारचे लाभ दिले, डिजीटल ट्रान्स्फरद्वारे सामान्यांना मिळणार्या मदतीत होणारा भ्रष्टाचार रोखला, भ्रष्टाचारी नेत्यांचा आणि पद्धतींचा योग्य बंदोबस्त केला, मुद्रा योजनेद्वारे कित्येक तरुणांना सुलभ अर्थसहाय्य मिळाले, जनधन योजनेचा लाभ लाखो लोकांना मिळाला, मोदी सरकारने आदर, प्रामाणिकपणा, सन्मान यावर आधारित राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न केला, स्थिर, मजबूत सरकार देऊन विविध प्रकारच्या उद्योगांना भारतात येण्यास उत्तेजन दिले, आणि एकंदरीत एक सक्षम, निर्णयक्षम, दूरदृष्टी असणारे, मुत्सद्दी, जिगरबाज, देशाच्या भल्यासाठी कठोर निर्णय घेणारे सरकार भाजपाने दिले.
भारतीय जनतेने याच सरकारला पुन्हा निवडून दिले यात नवल ते काहीच नाही. शिवाय, नरेंद्र मोदी नाही तर दुसरा कोणता सक्षम पर्याय भारतापुढे होता? राहुल गांधी? स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारून बघा, ही व्यक्ती पंतप्रधानपद सक्षमपणे सांभाळू शकते? ममता बॅनर्जी? आपल्या आक्रस्ताळ्या आणि हुकूमशाही प्रवृत्तीने बंगालचे अपरिमित नुकसान करणार्या ममता बॅनर्जी? 'कधीकाळी' सुसंस्कृत आणि समंजस अशी प्रतिमा असलेले शरद पवार? आपल्या नातवाला निवडून न आणू शकणारे, आयुष्यभर विश्वासघाताचे, जातीय विद्वेषाचे, गुंडगिरीला पोसणारे राजकारण करणारे शरद पवार? वीस वर्षात ३-४ फुटकळ खासदार ही त्यांची कमाई आणि ते पंतप्रधान? कोण आहेत हे महाराष्ट्रातले राजकीय निरीक्षक ज्यांनी ही नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणली? त्यांची राजकीय समज शून्य आहे असेच म्हणायला हवे. आपले सगळे राजकीय निरीक्षक अतिशय कुचकामी आहेत. कुणालाच काहीही कळत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. गेले ७-८ महिने मी आपल्या राजकीय निरीक्षकांची वक्तव्ये, लेख, मुलाखती, चर्चा, फेसबुक पोस्ट्स, वगैरे बघतोय आणि वाचतोय. सुनिल चावके, विश्वंभर चौधरी, विजय कुवळेकर, मुग्धा कर्णिक आणि टीव्हीवर मते मांडणारे आपले सगळे निरीक्षक सतत गुळमुळीत बोलत होते. काहींनी भाजपची मोठी हार वर्तवली होती. मुग्धा कर्णिक सारखे मोदीद्वेषी तर अगदी हास्यास्पद पातळीवर जाऊन निरर्थक बडबड करत होते. विश्वंभर चौधरींचे फेसबुक पोस्ट्स बघून फक्त हसू येत होते इतके बालिश त्यांचे मुद्दे होते. आश्चर्य आहे; ही मंडळी स्वतःला राजकारणातली एक्स्पर्ट समजतात. या सगळ्यांनी राजकारणावर किमान पाच वर्षे काहीही लिहू, बोलू नये अशी यांची समज आहे. टाईम्स ऑफ इंडियाचे अय्यर वगळता कुणीही छातीठोकपणे सांगत नव्हतं की भाजप पुन्हा सत्तेवर येईल. महाराष्ट्रातल्या राजकीय निरीक्षकांनी तर निवृत्तीच घ्यायला हवी इतकी त्यांची समज कुचकामी ठरली.
आता ऑक्टोबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येतील यात शंकाच नाही. त्यांची स्वच्छ, सुसंस्कृत, सभ्य प्रतिमा, महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक काम, सगळ्या विरोधकांना पुरून उरणारी त्यांची असामान्य राजकीय बुद्धिमत्ता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती, आणि राजकीय गुंडगिरीला अजिबात थारा न देण्याची त्यांची विलक्षण हातोटी हे त्यांचे प्लस पॉईंट्स आहेत. महाराष्ट्रातले लोकसभेचे घवघवीत यश त्यांच्या शिरपेचात अजून एक तुरा खोचून गेले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धडा शिकायची वेळ आलेली आहे. ती २०१४ मध्ये देखील आली होती पण या पक्षांना ठाम वैचारिक बैठकच नाही; त्यामुळे या पक्षांचे असेच हाल होत राहणार हे नक्की. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहकार क्षेत्राच्या नावाखाली बँका, साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षणसंस्था, स्टार्च फॅक्टर्या, पतसंस्था आणि ऊस जमीनदारी, तालुका-जिल्ह्यात दहशत वगैरे याद्वारे जे भयानक वातावरण तयार करून ठेवले होते ते मोडून काढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी या पक्षांना सतत पराभव चाखायला लावणे हाच एकमेव उपाय आहे. गेल्या वीस वर्षात राष्ट्रवादी पक्षाने तर महाराष्ट्रातले वातावरण पार गढूळ करून टाकले. सरळ सरळ जातींवर आधारित राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या पक्षाने केला. अतिशय घाणेरड्या पद्धतीने मराठा-ब्राह्मण वाद विकोपाला नेऊन ठेवला. त्यात अर्थात ब्राह्मण समाजाचा हिस्सा शून्य होता कारण त्यांना गुंडगिरी जमत नाही. कित्येक जात्यांध मराठा संघटनांनी हा जातीचा द्वेष मोठ्या प्रमाणावर पोसला.
गेल्या पाच वर्षात काँग्रेस किंवा बाकी कुठल्याही विरोधी पक्षाने काय केले? काहीही नाही. त्यांच्याकडे काहीच कार्यक्रम नव्हता. कुठलाच ठोस प्लॅन नव्हता. त्यांनी फक्त नरेंद्र मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानली. निव्वळ चिखलफेक केली. कुठलेच मुद्दे मांडले नाहीत. कुठलाच सज्जड डेटा दिला नाही. आपसूकच त्यांच्यात काहीही दम नाही हे सुज्ञ जनतेच्या लक्षात आले.
जनतेचा कौल स्पष्ट होता; सगळ्यांनीच डोळ्यांवर झापडं ओढून घेतली होती. जनता स्मार्ट आहे. कोई माई का लाल जनता को बेवकूफ नही बना सकता...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
सुंदर विश्लेषण.
+1
अचूक लिहिलं आहे
अचूक लिहिलं आहे
लिबरल हिंदुत्व ?
पाकीस्तान-द्वेष या दुश्मनाला
पाकीस्तान-द्वेष या दुश्मनाला क्रमाक्रमाने ठळक करत गेला.हे वाक्य वस्तुस्थितीचा सरळ सरळ विपर्यास करणारे आहे. (अपेक्षा आहे की, ही वाक्यरचना हेतुपुर्र्सर केलेली नसावी.) सत्य आणि फक्त सत्य (ट्रुथ अँड नथिंग बट ट्रुथ) सांगायचे झाले तर असे म्हणावे लागेल... १. त्याच्या स्थापनेपासूनच, पाकिस्तानच्या कारवाया त्याच्याबद्दलचा द्वेष क्रमाक्रमाने ठळक होत जावा, अश्याच आहेत. त्यामध्ये इतर कोणाचा फारसा सहभाग नाही... किंबहुना, इतर सर्व त्या कारवायांचे बळी आहेत. २. "धर्मनिरपेक्षपणा म्हणजे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यांकाचे दमन", हा सोईस्कर अर्थ "तथाकथित भारतिय विचारवंत, राजकारणी आणि तद्दन संधीवादी" लावत असतात आणि ते करणे म्हणजेच न्याय असे उत्तम नाटकही वठवत असतात. ही पूर्ण जगतात केवळ भारत याच एका देशाची खासियत झाली आहे. मात्र, "वरील ढळढळीत सत्यांकडे सतत दुर्लक्ष करणे आणि सतत या ना त्या भूलथापांनी पाकिस्तानची तळी उचलून धरणे", हे तर आता खाडीदेशांसह बहुसंख्य मुस्लिम देशांनीही बंद केले आहे... कारण पाकिस्तानी कारवायांचा भस्मासूर, भावबंदकीतील मुस्लिम देशांसह, जगातल्या सर्व देशांना नाडू लागला आहे. पण, तरीही, वैयक्तिक स्वार्थाने आणि अहंमन्यतेने अंध झालेले "तथाकथित विचारवंत, राजकारणी आणि तद्दन संधीवादी" सुधारण्याचे नाव घेत नाहीत, हे पण तितकेच खरे आहे... आणि त्यांच्या कळपामध्ये अनेक भारतीय पुढे आहेत, हे केवळ दुर्दैवी नाही तर अनैतिक व लाजिरवाणेही आहे.मुख्य म्हणजे कोणत्याही खर्या
विधानसभा आणि लोकसभा
कायदे करणे किंवा घटना
कायदे करणे किंवा घटना
आर्थिक कायदा किंवा विधेयक पास
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत
ह्म्म्म!
+१
चांगले विवेचन.
बरोबर
ही एका
वरील प्रतिसादात
मराठी लेखक, संपादक, निरीक्षक
अहाहाहाहा
नही नही...आप गलत समझ रहें हैं.
वावा
धन्यवाद!
हो
अगदी अगदी
अभ्या व समीरसूर यांच्यातला
हाहाहा...
कशाला लोकसत्ताकडून अपेक्षा
हल्ली कुणीही उठून राजकीय
सल्ला
सल्ला पोहोचवल्याबद्दल
किटली तुमची गरम आहे...
एग्झिट पोलनंतर जरा थोड्याफार
तुमचा सल्ला
अरे हो अजून १ गोष्ट
पोहोचवतो
आज एक माणूस रुसलाय जणू
नाही हो...
रुसायला मी काय तुमची प्रेयसी
आयाराम नेत्यांचा भाजप प्रवेश?
बरोबर आहे, तसेच