मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

आज बुद्ध पौर्णिमा

मन ·

बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.

बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.
त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्‍या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्‍या, विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन. आपलाच मनोबा.

नाणेपुराण

देवदत्त ·

In reply to by स्वाती दिनेश

गणपा 12/05/2008 - 00:15
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.

रामदास 11/05/2008 - 17:20
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

In reply to by रामदास

देवदत्त 11/05/2008 - 17:58
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त 11/05/2008 - 18:01
धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)

रामदास 11/05/2008 - 19:00
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.

शितल 11/05/2008 - 19:19
लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.

राजे 11/05/2008 - 22:37
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रियाली 12/05/2008 - 00:46
भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.

In reply to by प्रियाली

देवदत्त 12/05/2008 - 19:20
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)

ईश्वरी 12/05/2008 - 01:16
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 13/05/2008 - 08:35
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 13/05/2008 - 20:17
धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.

चतुरंग 12/05/2008 - 05:14
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग

ऋचा 12/05/2008 - 10:02
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,

आर्य 12/05/2008 - 10:48
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य

मैत्र 12/05/2008 - 16:14
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...

मदनबाण 13/05/2008 - 01:41
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 13/05/2008 - 20:23
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 13/05/2008 - 20:46
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by देवदत्त

मदनबाण 14/05/2008 - 09:45
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.

मदनबाण 14/05/2008 - 10:56
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) मदनबाण.....

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..

प्राजु 14/05/2008 - 14:36
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 18/05/2008 - 22:04
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. 25 Paise 50 Paise २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.

रामदास 18/05/2008 - 22:17
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.

In reply to by रामदास

विद्याधर३१ 19/05/2008 - 07:26
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

संग्राम 10/01/2011 - 14:07
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)

In reply to by संग्राम

देवदत्त 10/01/2011 - 20:33
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.

In reply to by स्वाती दिनेश

गणपा 12/05/2008 - 00:15
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.

रामदास 11/05/2008 - 17:20
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

In reply to by रामदास

देवदत्त 11/05/2008 - 17:58
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त 11/05/2008 - 18:01
धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)

रामदास 11/05/2008 - 19:00
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.

शितल 11/05/2008 - 19:19
लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.

राजे 11/05/2008 - 22:37
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रियाली 12/05/2008 - 00:46
भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.

In reply to by प्रियाली

देवदत्त 12/05/2008 - 19:20
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)

ईश्वरी 12/05/2008 - 01:16
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 13/05/2008 - 08:35
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 13/05/2008 - 20:17
धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.

चतुरंग 12/05/2008 - 05:14
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग

ऋचा 12/05/2008 - 10:02
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,

आर्य 12/05/2008 - 10:48
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य

मैत्र 12/05/2008 - 16:14
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...

मदनबाण 13/05/2008 - 01:41
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 13/05/2008 - 20:23
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 13/05/2008 - 20:46
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by देवदत्त

मदनबाण 14/05/2008 - 09:45
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.

मदनबाण 14/05/2008 - 10:56
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) मदनबाण.....

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..

प्राजु 14/05/2008 - 14:36
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 18/05/2008 - 22:04
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. 25 Paise 50 Paise २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.

रामदास 18/05/2008 - 22:17
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.

In reply to by रामदास

विद्याधर३१ 19/05/2008 - 07:26
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

संग्राम 10/01/2011 - 14:07
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)

In reply to by संग्राम

देवदत्त 10/01/2011 - 20:33
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.
नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले. नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे.

घोडा आणि ओझे

विसुनाना ·

मदनबाण 21/04/2008 - 11:27
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती हे मात्र खर..... मी माझ्या बर्‍याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो..... (आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?) (सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा) मदनबाण

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

आणि

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...

या ओळी विशेष आवडल्या!!!

विसोबा खेचर 21/04/2008 - 11:41
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी! तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....! अजूनही येऊ द्या... तात्या.

कविता आवडली. जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती याओळी आवडल्या..

ॐकार 22/04/2008 - 12:02
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... छान आहे. कविता आवडली :)

विसुनाना 23/04/2008 - 12:55
कवितेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;) तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;) नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला. पुनः धन्यवाद!

लिखाळ 23/04/2008 - 15:23
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

नीलकांत 23/04/2008 - 16:02
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे. आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती - नीलकांत

मदनबाण 21/04/2008 - 11:27
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती हे मात्र खर..... मी माझ्या बर्‍याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो..... (आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?) (सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा) मदनबाण

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

आणि

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...

या ओळी विशेष आवडल्या!!!

विसोबा खेचर 21/04/2008 - 11:41
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी! तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....! अजूनही येऊ द्या... तात्या.

कविता आवडली. जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती याओळी आवडल्या..

ॐकार 22/04/2008 - 12:02
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... छान आहे. कविता आवडली :)

विसुनाना 23/04/2008 - 12:55
कवितेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;) तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;) नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला. पुनः धन्यवाद!

लिखाळ 23/04/2008 - 15:23
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

नीलकांत 23/04/2008 - 16:02
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे. आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती - नीलकांत
दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती ' आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ? - मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती *** *** जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती आजमितीला गंजुन गेल

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

जंगलकथा -२

हेरंब ·

सहज 20/04/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.

सहज 20/04/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.
3

जंगलकथा -१

हेरंब ·

प्राजु 20/04/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर

प्राजु 20/04/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर
3

मटाचं मराठी पर्व

नीलकांत ·

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत

मी शिवाजी बोलतोय !

उदय सप्रे ·
आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ - म्हणजे तुमच्या भाषेत हां ! आज तुमच्यापैकी काहींच्या मते माझी जयंती-बाकी काहींच्या मते ती ६-एप्रिल रोजी आहे !

आतले आणि बाहेरचे... (२)

नीलकांत ·

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे
3

आतले आणि बाहेरचे... (१)

नीलकांत ·

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.
3