एक किस्सा
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)
२०१० सालची गोष्ट आहे. मी जपान सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळून शिकायला आलो होतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असायचे. त्या वर्गांमध्ये, परदेशीच पण जे पूर्णवेळ शिकत असतील(डिग्री प्रोग्रॅम) अशा विद्यार्थ्यांना पण परवानगी असायची. तेव्हा एका वर्गामध्ये माझ्याबरोबर एक चिनी विद्यार्थी होता, जो
पूर्णवेळ शिकत होता. वर्गात जनरल हाय हॅलो व्हायचं पण मैत्री अशी नव्हती. त्याचं शिक्षण मार्चमध्ये संपलं होतं आणि त्याला दक्षिण जपानमध्ये नोकरी पण मिळाली होती असं सांगत होता. हा अचानक एके दिवशी माझ्या रूमवर आला आणि मला म्हणाला की मी परत येणार आहे जपानमध्ये जूनमध्ये तोवर माझ्या २ बॅग्स ठेवशील का तुझ्याकडे? एरवी सगळे परदेशी विद्यार्थी आपापल्या जूनियर्स साठी म्हणा असं काही ना काही सामान कोणाकडेतरी ठेवत असतात, त्यामुळे मी म्हटलं ठीके हरकत नाही. नंतर मध्ये साधारण ३ महिने गेले तरी हा माणूस मला काही संपर्क करेना! मी त्याला ई-मेल पण करून सांगितलं की मी सप्टेंबरमध्ये परत जाणार आहे भारतात त्याच्या आगोदर ते सामान घेऊन जा. पण एक ना दोन.
एके दिवशी सकाळी मला इमिग्रेशन ब्युरो मधून फोन आला की तुमचं नाव अमुक तमुक आहे का आणि तुम्ही चायनीज आहात का? मी म्हटलं नाही माझं नाव नचिकेत आहे आणि मी भारतीय आहे. तेव्हा त्यांनी माझ्या एलियन कार्डचा तपशील मागितला आणि लगेच त्यांना पण कळालं की मी कोण आहे ते. त्यांच्या बोलण्यावरून मला असं समजलं की, या चायनीज माणसानी व्हिसा स्टेटस बदलायच्या वेळेला नाव फक्त स्वतःचं दिलं होतं पण पत्ता आणि फोन नंबर माझा दिला होता. आणि त्या इमिग्रेशन मधल्या माणसानी मला सांगितलं की आता तो चायनीज माणूस बेपत्ता झाला आहे!!! मी म्हटलं मला खरंच काही माहित नाही त्याच्याबद्दल. ते म्हणाले की ठीके आम्ही तुझी माहिती व्हेरिफाय केली आहे पण काही आम्हाला लागलं तर आम्ही परत तुला कॉल करू. मी ताबडतोब विद्यापीठाच्या ऑफिस मध्ये ही गोष्ट कळवली. त्यांनी मला धीर दिला आणि सांगितलं की त्या बॅग्स तू आधी आमच्याकडे दे. वाईटात वाईट जर का पोलीस आले तर आम्ही पूर्ण जबाबदारी घेऊ. त्या चायनीज माणसानी शेवटच्या सेमिस्टर ची फी पण बुडवली होती. त्यामुळे तो तसाही विद्यापीठाच्या ब्लॅक लिस्ट वर होता.
नंतर विद्यापीठाने इमिग्रेशन ब्युरो ला पण कळवलं की नचिकेतचा याच्यात काही संबंध नाहीये तुम्ही त्याला फोन करू नका. नंतर कोणाचा काही त्या संदर्भात फोन आला नाही पण जून ते ऑगस्ट हा काळ अत्यंत तणावात गेला.
अशातच परत यायची तयारी चालली होती आणि एके दिवशी या चायनीज माणसाचा परत फोन आला. मी त्याला झाप झाप झापलं आणि म्हटलं की तुझ्यामुळे किती तणावात होतो मी काही तरी कल्पना आहे का तुला? तर म्हणायला लागला की मला ते माझं सामान परत हवं आहे तर तुझ्या घराचा पत्ता दे. मला पोलिसांनी अटक केली आहे आणि मी आत्तापण तुरुंगातून बोलतोय म्हणे. मी म्हटलं की तू आधी इकडे ये, आपण विदयापीठाच्या ऑफिस मध्ये जाऊन बोलू. तेव्हा लगेच फोन कट केला.
आमची स्वारी परत ऑफिस मध्ये. तेव्हा परत त्या शिक्षकांनी धीर दिला आणि सांगितलं की तू आता फक्त घरी जायची तयारी कर, आणि मला काही सूचना दिल्या की कोणीही आलं तरी नीट खात्री केल्याशिवाय दार उघडायचं नाही, तुला नसेल खात्री बाहेरच्या माणसाची तर सिक्युरिटीला आधी फोन कर आणि ते आल्याशिवाय दार उघडू नकोस वगैरे :) त्या चायनीज माणसाच्या नावानी एक नोटीस पण दारावर चिकटवली होती माझ्या खोलीच्या, की इथे यायचं नाही आणि काही काम असेल तर ऑफिसमध्येच यायचं अशा अर्थाची.
तीन महिने अशा पद्धतीनी खूप तणावात गेले. घरी पण सांगितलं नव्हतं, उगीचच त्यांच्या डोक्याला कशाला भुंगा लावा असा विचार करून. असंही वाटत होतं की सगळं सोडून परत जावं घरी पण नंतर विचार केला की आपण जर का मुद्दाम काही केलं नाहीये तर का पळून जा? यथावकाश सप्टेंबर मध्ये शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम पूर्ण करून परत गेलो पुण्याला. पण अजूनही ते दिवस आठवले की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरं आहे...
मी दक्षीण अफ्रिकेत असताना
थोडक्यात वाचलात...
वाचलात..
सावधानी हरी दुर्घटना घटी
लेख आवडला
छान किस्सा
आपण एखाद्याला मदत म्हणून काही
बापरे. फारच वाईट अनुभव.
एकूण विश्वास ठेवणे हे तीस
+१
असे किस्से अजून येऊद्या.
सावधगिरी ही सर्वत्र घेतलीच
नक्की कशाबाबत सावध राहायचे हेच माहिती नसते.
छान किस्सा!
वेगळाच अनुभव..
हे असले अनूभव मलाही आलेत.
ढुंगणघामफोडू थरारक अनुभव !
कुमार सर, ज्ञानोबाचे पैजार,
ह्या प्रसंगात
तुम्ही ताण घेण्याची खरंच गरज नव्हती सर, असे मला वाटते.
ताण शब्द बरोबर आहे.
तुम्ही
अरेच्या हे वाचलेच नव्हते.
छान किस्सा.
हा लेख वाचनातुन सुटला होता! 'एक किस्सा' अशा शिर्षकाचे अनेक
जेम्स वांड, धर्मराज मुटके,