पेशवाईतल्या गमतीजमती
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :).
१) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे. त्यातले गमतीशीर उतारे -
काही नावांवर असा विचित्र संस्कार घडतो कि त्यावरून तो इंग्रजीतला शब्द आहे याचा संशयही येणार नाही. उदाहरणे
- अँडरसन चा इंद्रसेन
- नारंज चा नारद
- थॉमसन चा तामसेन (तानसेनाचा जुलै भाऊ शोभावा !)
- सार्टोरियस चा सरताऊस
- मॅडॉक चा मंडूक
- मेडोज चा मंडूस
- रॉड्रिक चा रुद्रक
- कारमायकेल चा कर्मखल
- रॉस लॅम्बर्ट चा रासलंपट
पूर्ण मूळ यादीच इथे खाली जोडली आहे.
कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका)
२) नारायण गोविंद चापेकर यांच्या 'पेशवाईच्या सावलींत' या पुस्तकाचा उल्लेख मागे केला आहे. त्यातले काही निवडक उतारे.
चिपळूणकर सावकारांविषयी (हुंडीच्या लेखात अरविंद कोल्हटकरांनी त्यांचा उल्लेख केला आहे तेच हे चिपळूणकर)
-------
चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे. तो
निराळा राहत असावा. कारण त्याचा अन्नखर्च निराळा पडला आहे (शर. १७४७). दाजी गंगाधराला बापूजी गंगाधर नांवाचा भाऊ होता असें वाटते. गंगाधरशास्त्रयास पंढरपूर येथे देवदर्शनास येण्याविषयी श्रिंबकजी डेगळ्याने बोलावणे पाठविले त्या वेळीं बापूजी गंगाघरशास्त्र्यांच्या घरीं त्यांच्याजबळ बोलत बसला होता.
...
...
कर्ज देण्याधैण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे, खुद्द सरकार व त्यांचे सरदार दरकदार ह्यांना नेहमी कर्ज सावकारी काढावें लागत असल्यामुळे सावकारी घंदा करणाऱ्या व्यवहार पेढ्यांचे जाळें राज्यांत निर्माण झालें. ब्राह्मण सावकारही पुष्कळ होते. लाखो रुपये एका रकमेने ते कर्ज देत, रकम फार मोठी अखल्यास तीन चार सावकार मिळून समायिक कर्ज देत, हातावर कर्जाऊ रकमा देत, परंतु बहुधा खतें लिहून घेऊनच कर्ज देण्याचा प्रघात होता. वचनचिठ्ठीचा प्रकार मात्र आढळत नाही. कर्जरोखे व गहाणखते हीच मुख्यतः असत. तारण गहाण असे तर्सेंच कबजे गहाण असे. “व्याजाच्या ऐवजी मोजे मजकूरचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून घ्यावा”
कर्ज फेडण्याची मुदत नमूद केलेली असे, रासमाथा ( सुगीवर ), आळदीची यात्रा अशासारखी मुदत असे. हातावरील कर्जाला थोड्या महिन्यांची मुदत ठेवण्यांत येई. मुदतीत कर्जफेड न झाल्यास सावकार खतांत नमूद केलेली मिळकत आपल्या कब्जात घेई. स्थावर मिळकत व कुळकरणासारखीं वतने कर्जाकरता गहाण टाकीत. जंगम मालात सोनं, पागा, तरवार, कापड ही गहाण टाकलेली आढळतात, कुळकरण गहाण टाकल्याचे उदाहरण: ४०० रु. जमा भगवंतगव देशपांडे. . . मल्हार ब्राब्राजी तट यार्थ कुळकरण मोजे डोबले गहाण होतें ते सोडवून सीवाजी नारायण यांजकडे ठेवून वगैरे... ....
सोनं गहाण ठेवल्यास आठ आणि व्याजाने पैसे मिळत. एरव्ही १, १।,१॥, १॥, २, २। स. दरमहा दर शेकडा अशा दराने व्याज द्यावें लागे.
सयाजीराव गायकवाडला लाख रुपयांच्या कर्जाला १। रु. दराचे व्याज होतें. किरकोळ रकमांना व्याजादाखल धान्य देत. “बाजार निरखापेक्षा १ शेर रुपयास जाजती'. हेच व्याज, तेल्यास कर्जाऊ रक्कम दिल्यास ठरलेल्या भावाने ठरीव मुदतीपर्यंत तेल घेत. भाव उतरल्यास उतरत्या भावाने पण चढल्यास कराराच्या भावाने अशी शत घालीत , ज्या नाण्यांत कर्जाची रक्कम दिली असेल त्याच नाण्यांत ती परत करण्याचा करार कधी कधी करीत. कर्ज देतांना मनोती कापून घेत. मनोतीचा दर शेकडा १ पासून २ रुपयापर्यंत असे.
कर्जफेडीच्या वेळीं सूट देण्यांत येई; तथापि बिनसुटीची शर्त असल्यास सूट देत नसत, कर्जफेडींत मामलत लावून घेण्याचाहि प्रघात होता. “दीड महिन्यांत एकोत्रा व्याजाने व्याज मुद्दलसुद्धा रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी."
प्रामाणिकपणा बर्याच प्रमाणांत होता. दंग्याच्या भीतीने दुसऱ्यापार्शी ठेव ठेवीत. अशा ठेवी तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्त्रीने कबूल करून परत दिल्याची उदाहरणे नमूद आहेत. पण कर्ज वसूल करण्यास हल्लीप्रमाणे कोर्टे नव्हर्ती, फार करून सावकारालाच वसुलीचा उपाय करावा लागे. हा उपाय म्हणजे धरणें बसणें हा होय. लोकांच्या त्या वेळच्या समजुतींवर ह्या उपायांची उभारणी केलेली दिसते.
सावकार कर्ज मागण्यास कुळाकडे आपला नोकर अथवा इतर कोणी पाठवी. हा मनुष्य कुळाच्या घरांत चोवीस तास उपाशी बसून राही. ओटीच्या पुढल्या दरवाजांत बसे, घरांत कोणी उपाशी राहिल्यास घरांतील माणसांनाहि उपवास पडे. आपणांस उपोषण घडते व दुसरा उपवासाने तळतळत आहे द्याचा परिणाम आपणांस भोगावा लागेल ह्या भीतीने कूळ हरप्रयत्न करून कांही तरी वसूल देई, कधी कधी स्वतः यजमान धरणें घरून बसे, कुळाने चटकन पैसे द्यावे म्हणून घरण्याकरता परजातीच्या माणसाचा उपयोग करीत (१३०). ऋणकोस उपोषण पाडणे याला क्षेत्र करणे म्हणत. चिपळूणकर आपल्या कैफियतींत लिहितात “नंतर आम्ही कासीकर याचे दुकानी जातीनिसी (घरांतील) थोर थोर मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास तीन दिवस उपाशी बसून .. ". एका माणसाकडे चिपळूणकरानी २० क्षेत्र केलीं. "कांही वेळां उपोषित मजबरोबर बसले होते व काही वेळां जेवले?” एका भिक्षुकानी आपले पैसे वसूल होत ना हें पाहून गणपर्तांच्या देवळांत उपोषणे करण्यास सुरवात केली. ही वार्ता श्रीमंतांच्या कातावर गेली, तेव्हा “आज्ञा जाली की भट्जीचे रुपये (कुळाकडून) देववावे''
३) प्रवासाची साधने
घोडीं व डोल्या ही मनुष्याच्या प्रवासाचीं साधनें होत. मालाची ने आण उंट व बैल यावरून होई. बैलगाड्या फारशा प्रचारांत नव्हत्या. नागपुरास जाण्यास डोलीला खंडित रुपये ८५ ठरले होते, परंतु कुंभकोणमचें भाडे २० रुपयेच दिसते. गुळसुंद्यादून पुण्यास जाण्यास डोली व घोंडी मिळून ११ रु. भाडे पडलें होते.
चालण्याच्या कामांत घोड्याशीं माणसें स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसांत करणारे लोक होते. नेवाशाहून दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १।। रुपया इनाम मिळाले आहे. परिस्थितीमुळे गुण उत्पन्न होतात आणि परिस्थितीमुळेच नष्ट होतात. घोडा दुसऱ्याला वाहून नेतो पण मनुष्य आपल्यालाच वाहून नेतो ही गोष्ट खरी. तथापि निरोप जलद पोचावा असा हेतू असल्यास थोडक्या पैशांत मनुष्य पाठवूनच तो हेतु साध्य होतो. म्हणून डाकेवर जासुदांची योजना होत असे.
सर्व हिंदुस्थानभर पेशव्यांच्या फौजा फिरत असल्यामुळे इकडून तिकडे बातमी पोचविण्याची व्यवस्था करणे भाग होतें. त्यामुळे टपाल ठिकठिकाणीं लोक ठेवून पत्रे पाठविण्याची योजना अमलात आली होती. बातम्या आणण्यापोचवण्यासाठी मुद्दाम माणसे
ठेवीत त्यास डाक ठेवणें म्हणत. कोकणांत बातम्या आणण्यासाठी मचवे ठेवलेले असत त्यास बातमीचे मचवे म्हणत ( पे. रो. पुस्तक ८, पान २२० ). अमुक दिवशी मचवे परत आलेच पाहिजेत किंवा अजूरदाराने अमुक मैल चाललेंच पाहिजे असा नियम असे. सरकारच्या जरुरीकरता डाकेची पद्धति प्रथम अस्तितवात आली; खासगी खुषालीची पत्रे पाठाविण्याची अडचण तेव्हा लोकांना भासत असे, यात्रेला निघाल्यावर मात्र घरची खुशाली आपल्याला व आपली खुशाली घरच्या माणसांना कळवावी अर्सें वाटणे स्वाभाविक होते. ही गरज 'भागाविण्यासाठी आठवले ह्यांची काशी ते पुणे डाक स्थापन झाली असावी. सरकारी व सावकारी अशा दोन डाका निर्माण झाल्या. ह्या पुस्तकांत डाकेचा पहिला उल्लेख हा, १७०१ मधील आहे. ह्या पुस्तकांत कल्याण ते काशी, कल्याण ते मुंबई, पुणे ते नाशिक, ग्वाल्हेर-सातारा इतक्या डाकांचा उल्लेख आलेला आहे, पत्रे तोलून वजनावर हाशील घेत. चार आणे तोळा असे 'हाशील' असे.
सावकारी डाकेत विमा उतरून जिन्नस पाठविण्याची रीत होती ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. मालाच्या किंमतीवर शेकडा दोन रुपये एक आणे हा विम्याचा दर होता. जिथे डाक नसेल अगर डाकेचें हाशील भरमसाट असेल तेथे जासूद पत्रे देऊन पाठवीत. एका जासुदाजवळ अनेक लोकांचीं पत्रें असत. ज्याला पत्रे पाठविलीं असतील तो पत्रे घेऊन येणाऱ्या जासुदाला पैसे देई. पत्रे पाठविणाराने कांही द्यावयाचे नाही. ही सवयच पुढे नाटपेड पत्रे पाठविण्यास कारणीभूत झाली असावी. पत्राचा मालक मिळाला नाही आणि त्यामुळे पत्र परत आलें तर निराळें
हाशील द्यावे लागे; उदाहरणार्थ 'हशील डाकेचे, पुण्याहून लखोटा मुंबईस पाठविला होता तो तेथे स्वारी नाही म्हणून पुन्हा पुण्यास आला, त्याबद्दल देणें आठवले यास'. पत्ते लिहिण्यांत पत्र पाठविणारांना बरीच सवलत असे. थत्त्यांना पाठविलेल्या पत्राच्या लखोट्यावर 'थत्ते न मिळाल्यास चिपळूणकरांनी त्यांस ते असतील तेथे पाठवावा' असा मजकूर आहे
४) गुन्हे
चोरी, मारामारी, खून, शिवीगाळी, व्यभिचार, बेअब्रू करणें, अतिक्रमण, आत्महत्या, मनुष्य पळवून नेणे, नोकरीचा करार मोडणे, मुक्या जनावरांस इजा करणें, बळत्याचीं कामे न करणें, गांव सोडून जाणे, सरकारी कायदे मोडणे (उ. परवानगीवांचून तंबाखू कापणे अगर खरीपाचा माल तयार करणें), गाय नांगराला धरणे, वजनमापांत फसवणे, दुसरे गांवची सोयरीक करणें अशा प्रकारचे गुन्हे तर होतेच परंतु खोटीं भुते घालणे अथवा भुत घातल्याचा खोटा आरोप करणें हेहि गुन्हे मानले जात.
मुलाने आपल्या आईजवळ गैरसनदी कटकट केली ह्या दोषामुळे त्याला आठ आणि दंड झाला आहे. कोणाला न कळत दुसऱ्याकडून इजा झाल्यास त्याची पैसे देऊन समजूत करण्यांत येत असे, खाजगीवाल्यांचा बारगीर घोड्यावर बसून हजेरीस जात असतां एका कुणबिणीस धक्का लागला आणि ती पडली सबब तिला एक रुपया देण्यांत आला.
५) धाग्याचे नाव जरी गमतीजमती असले तरी जुन्या काळचे सगळेच तपशील मनोरंजक नाहीत. एक अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह प्रकार म्हणजे गुलामगिरी.
मनुष्याची खरेदीविक्री पेशवाई अखेरपर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीहि विक्री कदाचित होत असे, परंतु हे पुरुष बहुधा मुसलमान असावे. 'सिद्दी सुंबरखा ह्याला कर्जीत घेतला होता तो ९० रुपयांना विकला.' बायकांची खरेदी-विक्री फारच मोठया प्रमाणाबर होई, अर्थात ह्या अविवाहित स्त्रिया असत, पोरी थोरी कोणत्याहि वयाच्या स्त्रिया विकत मिळत. ह्या दरिद्री स्त्रिया असत. स्त्रियात हिंदूंचा भरणा जरी विशेष असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि ह्या मुसलमानींनासुद्धा कुणबिणी म्हणत. ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई, घरकामाकरता तसेंच उत्तरकार्यात दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अमलदारांना कमाविसात कधी कधी कुणबिणी मिळत. म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत. ज्या पदार्थाची खरेदी करतां येते तो पदार्थ गहाणहि टाकत येतो, बाळाजीपंत नातूंचा नोकर गाडेकर नांवाचा होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु, कर्ज दिलें होतें आणि तेही इ. स. १८२२ साली म्हणजे ब्रिटिश अमदानींत. भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीही वांटून घेत, एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई, गुलामगिरीतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत. सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाहि देण्यांत येई. सरकारी कुणबिणी दुसर्यास पैसे घेऊन कामास देत.
६) इंग्रजी काळातले आर्थिक शोषण
राज्य घेण्यापूर्वी इंग्रजांनी मराठ्यांचा बाजार जिंकला, हातचा व्यापार जात चालला ह्याची मराठी राज्यांत एकानेहि फिकीर केली नाही. व्यापार हस्तगत केल्याने इंग्रजांना पैसा तर मिळालाच पण शिवाय मराठ्यांमध्ये देशाभिमान नाही व दृरदृष्टीहि नाही हेहि त्यांस कळून चुकले, ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला, इ. स. १७४५ पासून (हया पुस्तकांतील नोंदीप्रमाणे ) आमच्या बाजारांत सर्वत्र इंग्रजी माल खेळूं लागला. कापड, कागद, लोखंडी सामान ( चुका, कुलप, मेखा वगेरे ), काचेचे सामान (आरसे, फाणस, तावदाने वगेरे), तर्सेच घड्याळे, चहादाण्या इत्यादि पदार्थ ह्यांनी बाजार फुलून गेले, ज्योतिषी पंचाग इंग्रजी कागदावर लिहू लागले; इनामपत्रे लिहिण्यास विलायती कागदांवाचून अडू लागलें; घरांतील मोडलेली विळी दुरुस्त करण्यास “इंग्रज” येऊन बसला; इंग्रजी पोलादाशिवाय तोफांचे काने भरणें अशक्य झाले; बायका व पुरुष छिटी कापडाने आपलीं शरीरे विभूषित करू लागलीं. त्याबरोबर मांजरपाट, जगन्नाथी हे शब्दहि आमच्या तोंडांत ठाणे मांडून बसले, सोप बाजारांत आलाच पण भाषेतही घुसला. ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला.
मूळ पुस्तक इथे मिळेल.
'पेशवाईच्या सावलीत'
https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit
कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका)
२) नारायण गोविंद चापेकर यांच्या 'पेशवाईच्या सावलींत' या पुस्तकाचा उल्लेख मागे केला आहे. त्यातले काही निवडक उतारे.
चिपळूणकर सावकारांविषयी (हुंडीच्या लेखात अरविंद कोल्हटकरांनी त्यांचा उल्लेख केला आहे तेच हे चिपळूणकर)
-------
चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे. तो
निराळा राहत असावा. कारण त्याचा अन्नखर्च निराळा पडला आहे (शर. १७४७). दाजी गंगाधराला बापूजी गंगाधर नांवाचा भाऊ होता असें वाटते. गंगाधरशास्त्रयास पंढरपूर येथे देवदर्शनास येण्याविषयी श्रिंबकजी डेगळ्याने बोलावणे पाठविले त्या वेळीं बापूजी गंगाघरशास्त्र्यांच्या घरीं त्यांच्याजबळ बोलत बसला होता.
...
...
कर्ज देण्याधैण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे, खुद्द सरकार व त्यांचे सरदार दरकदार ह्यांना नेहमी कर्ज सावकारी काढावें लागत असल्यामुळे सावकारी घंदा करणाऱ्या व्यवहार पेढ्यांचे जाळें राज्यांत निर्माण झालें. ब्राह्मण सावकारही पुष्कळ होते. लाखो रुपये एका रकमेने ते कर्ज देत, रकम फार मोठी अखल्यास तीन चार सावकार मिळून समायिक कर्ज देत, हातावर कर्जाऊ रकमा देत, परंतु बहुधा खतें लिहून घेऊनच कर्ज देण्याचा प्रघात होता. वचनचिठ्ठीचा प्रकार मात्र आढळत नाही. कर्जरोखे व गहाणखते हीच मुख्यतः असत. तारण गहाण असे तर्सेंच कबजे गहाण असे. “व्याजाच्या ऐवजी मोजे मजकूरचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून घ्यावा”
कर्ज फेडण्याची मुदत नमूद केलेली असे, रासमाथा ( सुगीवर ), आळदीची यात्रा अशासारखी मुदत असे. हातावरील कर्जाला थोड्या महिन्यांची मुदत ठेवण्यांत येई. मुदतीत कर्जफेड न झाल्यास सावकार खतांत नमूद केलेली मिळकत आपल्या कब्जात घेई. स्थावर मिळकत व कुळकरणासारखीं वतने कर्जाकरता गहाण टाकीत. जंगम मालात सोनं, पागा, तरवार, कापड ही गहाण टाकलेली आढळतात, कुळकरण गहाण टाकल्याचे उदाहरण: ४०० रु. जमा भगवंतगव देशपांडे. . . मल्हार ब्राब्राजी तट यार्थ कुळकरण मोजे डोबले गहाण होतें ते सोडवून सीवाजी नारायण यांजकडे ठेवून वगैरे... ....
सोनं गहाण ठेवल्यास आठ आणि व्याजाने पैसे मिळत. एरव्ही १, १।,१॥, १॥, २, २। स. दरमहा दर शेकडा अशा दराने व्याज द्यावें लागे.
सयाजीराव गायकवाडला लाख रुपयांच्या कर्जाला १। रु. दराचे व्याज होतें. किरकोळ रकमांना व्याजादाखल धान्य देत. “बाजार निरखापेक्षा १ शेर रुपयास जाजती'. हेच व्याज, तेल्यास कर्जाऊ रक्कम दिल्यास ठरलेल्या भावाने ठरीव मुदतीपर्यंत तेल घेत. भाव उतरल्यास उतरत्या भावाने पण चढल्यास कराराच्या भावाने अशी शत घालीत , ज्या नाण्यांत कर्जाची रक्कम दिली असेल त्याच नाण्यांत ती परत करण्याचा करार कधी कधी करीत. कर्ज देतांना मनोती कापून घेत. मनोतीचा दर शेकडा १ पासून २ रुपयापर्यंत असे.
कर्जफेडीच्या वेळीं सूट देण्यांत येई; तथापि बिनसुटीची शर्त असल्यास सूट देत नसत, कर्जफेडींत मामलत लावून घेण्याचाहि प्रघात होता. “दीड महिन्यांत एकोत्रा व्याजाने व्याज मुद्दलसुद्धा रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी."
प्रामाणिकपणा बर्याच प्रमाणांत होता. दंग्याच्या भीतीने दुसऱ्यापार्शी ठेव ठेवीत. अशा ठेवी तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्त्रीने कबूल करून परत दिल्याची उदाहरणे नमूद आहेत. पण कर्ज वसूल करण्यास हल्लीप्रमाणे कोर्टे नव्हर्ती, फार करून सावकारालाच वसुलीचा उपाय करावा लागे. हा उपाय म्हणजे धरणें बसणें हा होय. लोकांच्या त्या वेळच्या समजुतींवर ह्या उपायांची उभारणी केलेली दिसते.
सावकार कर्ज मागण्यास कुळाकडे आपला नोकर अथवा इतर कोणी पाठवी. हा मनुष्य कुळाच्या घरांत चोवीस तास उपाशी बसून राही. ओटीच्या पुढल्या दरवाजांत बसे, घरांत कोणी उपाशी राहिल्यास घरांतील माणसांनाहि उपवास पडे. आपणांस उपोषण घडते व दुसरा उपवासाने तळतळत आहे द्याचा परिणाम आपणांस भोगावा लागेल ह्या भीतीने कूळ हरप्रयत्न करून कांही तरी वसूल देई, कधी कधी स्वतः यजमान धरणें घरून बसे, कुळाने चटकन पैसे द्यावे म्हणून घरण्याकरता परजातीच्या माणसाचा उपयोग करीत (१३०). ऋणकोस उपोषण पाडणे याला क्षेत्र करणे म्हणत. चिपळूणकर आपल्या कैफियतींत लिहितात “नंतर आम्ही कासीकर याचे दुकानी जातीनिसी (घरांतील) थोर थोर मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास तीन दिवस उपाशी बसून .. ". एका माणसाकडे चिपळूणकरानी २० क्षेत्र केलीं. "कांही वेळां उपोषित मजबरोबर बसले होते व काही वेळां जेवले?” एका भिक्षुकानी आपले पैसे वसूल होत ना हें पाहून गणपर्तांच्या देवळांत उपोषणे करण्यास सुरवात केली. ही वार्ता श्रीमंतांच्या कातावर गेली, तेव्हा “आज्ञा जाली की भट्जीचे रुपये (कुळाकडून) देववावे''
३) प्रवासाची साधने
घोडीं व डोल्या ही मनुष्याच्या प्रवासाचीं साधनें होत. मालाची ने आण उंट व बैल यावरून होई. बैलगाड्या फारशा प्रचारांत नव्हत्या. नागपुरास जाण्यास डोलीला खंडित रुपये ८५ ठरले होते, परंतु कुंभकोणमचें भाडे २० रुपयेच दिसते. गुळसुंद्यादून पुण्यास जाण्यास डोली व घोंडी मिळून ११ रु. भाडे पडलें होते.
चालण्याच्या कामांत घोड्याशीं माणसें स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसांत करणारे लोक होते. नेवाशाहून दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १।। रुपया इनाम मिळाले आहे. परिस्थितीमुळे गुण उत्पन्न होतात आणि परिस्थितीमुळेच नष्ट होतात. घोडा दुसऱ्याला वाहून नेतो पण मनुष्य आपल्यालाच वाहून नेतो ही गोष्ट खरी. तथापि निरोप जलद पोचावा असा हेतू असल्यास थोडक्या पैशांत मनुष्य पाठवूनच तो हेतु साध्य होतो. म्हणून डाकेवर जासुदांची योजना होत असे.
सर्व हिंदुस्थानभर पेशव्यांच्या फौजा फिरत असल्यामुळे इकडून तिकडे बातमी पोचविण्याची व्यवस्था करणे भाग होतें. त्यामुळे टपाल ठिकठिकाणीं लोक ठेवून पत्रे पाठविण्याची योजना अमलात आली होती. बातम्या आणण्यापोचवण्यासाठी मुद्दाम माणसे
ठेवीत त्यास डाक ठेवणें म्हणत. कोकणांत बातम्या आणण्यासाठी मचवे ठेवलेले असत त्यास बातमीचे मचवे म्हणत ( पे. रो. पुस्तक ८, पान २२० ). अमुक दिवशी मचवे परत आलेच पाहिजेत किंवा अजूरदाराने अमुक मैल चाललेंच पाहिजे असा नियम असे. सरकारच्या जरुरीकरता डाकेची पद्धति प्रथम अस्तितवात आली; खासगी खुषालीची पत्रे पाठाविण्याची अडचण तेव्हा लोकांना भासत असे, यात्रेला निघाल्यावर मात्र घरची खुशाली आपल्याला व आपली खुशाली घरच्या माणसांना कळवावी अर्सें वाटणे स्वाभाविक होते. ही गरज 'भागाविण्यासाठी आठवले ह्यांची काशी ते पुणे डाक स्थापन झाली असावी. सरकारी व सावकारी अशा दोन डाका निर्माण झाल्या. ह्या पुस्तकांत डाकेचा पहिला उल्लेख हा, १७०१ मधील आहे. ह्या पुस्तकांत कल्याण ते काशी, कल्याण ते मुंबई, पुणे ते नाशिक, ग्वाल्हेर-सातारा इतक्या डाकांचा उल्लेख आलेला आहे, पत्रे तोलून वजनावर हाशील घेत. चार आणे तोळा असे 'हाशील' असे.
सावकारी डाकेत विमा उतरून जिन्नस पाठविण्याची रीत होती ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. मालाच्या किंमतीवर शेकडा दोन रुपये एक आणे हा विम्याचा दर होता. जिथे डाक नसेल अगर डाकेचें हाशील भरमसाट असेल तेथे जासूद पत्रे देऊन पाठवीत. एका जासुदाजवळ अनेक लोकांचीं पत्रें असत. ज्याला पत्रे पाठविलीं असतील तो पत्रे घेऊन येणाऱ्या जासुदाला पैसे देई. पत्रे पाठविणाराने कांही द्यावयाचे नाही. ही सवयच पुढे नाटपेड पत्रे पाठविण्यास कारणीभूत झाली असावी. पत्राचा मालक मिळाला नाही आणि त्यामुळे पत्र परत आलें तर निराळें
हाशील द्यावे लागे; उदाहरणार्थ 'हशील डाकेचे, पुण्याहून लखोटा मुंबईस पाठविला होता तो तेथे स्वारी नाही म्हणून पुन्हा पुण्यास आला, त्याबद्दल देणें आठवले यास'. पत्ते लिहिण्यांत पत्र पाठविणारांना बरीच सवलत असे. थत्त्यांना पाठविलेल्या पत्राच्या लखोट्यावर 'थत्ते न मिळाल्यास चिपळूणकरांनी त्यांस ते असतील तेथे पाठवावा' असा मजकूर आहे
४) गुन्हे
चोरी, मारामारी, खून, शिवीगाळी, व्यभिचार, बेअब्रू करणें, अतिक्रमण, आत्महत्या, मनुष्य पळवून नेणे, नोकरीचा करार मोडणे, मुक्या जनावरांस इजा करणें, बळत्याचीं कामे न करणें, गांव सोडून जाणे, सरकारी कायदे मोडणे (उ. परवानगीवांचून तंबाखू कापणे अगर खरीपाचा माल तयार करणें), गाय नांगराला धरणे, वजनमापांत फसवणे, दुसरे गांवची सोयरीक करणें अशा प्रकारचे गुन्हे तर होतेच परंतु खोटीं भुते घालणे अथवा भुत घातल्याचा खोटा आरोप करणें हेहि गुन्हे मानले जात.
मुलाने आपल्या आईजवळ गैरसनदी कटकट केली ह्या दोषामुळे त्याला आठ आणि दंड झाला आहे. कोणाला न कळत दुसऱ्याकडून इजा झाल्यास त्याची पैसे देऊन समजूत करण्यांत येत असे, खाजगीवाल्यांचा बारगीर घोड्यावर बसून हजेरीस जात असतां एका कुणबिणीस धक्का लागला आणि ती पडली सबब तिला एक रुपया देण्यांत आला.
५) धाग्याचे नाव जरी गमतीजमती असले तरी जुन्या काळचे सगळेच तपशील मनोरंजक नाहीत. एक अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह प्रकार म्हणजे गुलामगिरी.
मनुष्याची खरेदीविक्री पेशवाई अखेरपर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीहि विक्री कदाचित होत असे, परंतु हे पुरुष बहुधा मुसलमान असावे. 'सिद्दी सुंबरखा ह्याला कर्जीत घेतला होता तो ९० रुपयांना विकला.' बायकांची खरेदी-विक्री फारच मोठया प्रमाणाबर होई, अर्थात ह्या अविवाहित स्त्रिया असत, पोरी थोरी कोणत्याहि वयाच्या स्त्रिया विकत मिळत. ह्या दरिद्री स्त्रिया असत. स्त्रियात हिंदूंचा भरणा जरी विशेष असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि ह्या मुसलमानींनासुद्धा कुणबिणी म्हणत. ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई, घरकामाकरता तसेंच उत्तरकार्यात दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अमलदारांना कमाविसात कधी कधी कुणबिणी मिळत. म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत. ज्या पदार्थाची खरेदी करतां येते तो पदार्थ गहाणहि टाकत येतो, बाळाजीपंत नातूंचा नोकर गाडेकर नांवाचा होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु, कर्ज दिलें होतें आणि तेही इ. स. १८२२ साली म्हणजे ब्रिटिश अमदानींत. भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीही वांटून घेत, एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई, गुलामगिरीतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत. सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाहि देण्यांत येई. सरकारी कुणबिणी दुसर्यास पैसे घेऊन कामास देत.
६) इंग्रजी काळातले आर्थिक शोषण
राज्य घेण्यापूर्वी इंग्रजांनी मराठ्यांचा बाजार जिंकला, हातचा व्यापार जात चालला ह्याची मराठी राज्यांत एकानेहि फिकीर केली नाही. व्यापार हस्तगत केल्याने इंग्रजांना पैसा तर मिळालाच पण शिवाय मराठ्यांमध्ये देशाभिमान नाही व दृरदृष्टीहि नाही हेहि त्यांस कळून चुकले, ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला, इ. स. १७४५ पासून (हया पुस्तकांतील नोंदीप्रमाणे ) आमच्या बाजारांत सर्वत्र इंग्रजी माल खेळूं लागला. कापड, कागद, लोखंडी सामान ( चुका, कुलप, मेखा वगेरे ), काचेचे सामान (आरसे, फाणस, तावदाने वगेरे), तर्सेच घड्याळे, चहादाण्या इत्यादि पदार्थ ह्यांनी बाजार फुलून गेले, ज्योतिषी पंचाग इंग्रजी कागदावर लिहू लागले; इनामपत्रे लिहिण्यास विलायती कागदांवाचून अडू लागलें; घरांतील मोडलेली विळी दुरुस्त करण्यास “इंग्रज” येऊन बसला; इंग्रजी पोलादाशिवाय तोफांचे काने भरणें अशक्य झाले; बायका व पुरुष छिटी कापडाने आपलीं शरीरे विभूषित करू लागलीं. त्याबरोबर मांजरपाट, जगन्नाथी हे शब्दहि आमच्या तोंडांत ठाणे मांडून बसले, सोप बाजारांत आलाच पण भाषेतही घुसला. ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला.
मूळ पुस्तक इथे मिळेल.
'पेशवाईच्या सावलीत'
https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit वर्गीकरण
प्रतिक्रिया
बिनीवाले
ते तर बीनवाले
असेल
बीनकार
छान
बघणे
फारसी मराठी अनुबंध म्हणून एक
बिनीची लढाई हा पण एक शब्द
बिनीवाले यांच्या संदर्भात हा
खाजगीवाले
दीक्षित-पटवर्धन
फारच आवडला लेख!
लेख आवडला....
छान लिहिताय. शुभेच्छा
अजून एक
बिनीवाले
...