गोपिनाथ मुंडे

लेखक: विकास जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

सुमीत भातखंडे यांनी 03/06/2014 - 09:20 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

नाखु यांनी 03/06/2014 - 09:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

ज्ञानोबाचे पैजार यांनी 03/06/2014 - 09:25 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

जबरदस्त धक्कादायक बातमी. खर तर विश्र्वास बसत नाही. भावपुर्ण श्रध्दांजली

llपुण्याचे पेशवेll यांनी 03/06/2014 - 09:26 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी 03/06/2014 - 09:27 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

विटेकर यांनी 03/06/2014 - 09:28 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एका झुंजार नेत्याचा अकाली अंत ! ओम शांती शांती शांती !!!

मदनबाण यांनी 03/06/2014 - 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अगदी धक्कादायक आहे ! :( आत्ताच काही वेळा पूर्वी ही वाईट बातमी कळाली... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

किसन शिंदे यांनी 03/06/2014 - 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

अत्रुप्त आत्मा यांनी 03/06/2014 - 09:36 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

विकास यांनी 03/06/2014 - 09:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

सावत्या यांनी 03/06/2014 - 09:50 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

हुप्प्या यांनी 03/06/2014 - 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

प्रभाकर पेठकर यांनी 03/06/2014 - 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) यांनी 03/06/2014 - 10:10 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

मितान यांनी 03/06/2014 - 10:15 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

मितभाषी यांनी 03/06/2014 - 10:28 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....

शिद यांनी 03/06/2014 - 10:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

पैसा यांनी 03/06/2014 - 10:55 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

सर्वसाक्षी यांनी 03/06/2014 - 11:00 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

शुभां म. यांनी 03/06/2014 - 11:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

_मनश्री_ यांनी 03/06/2014 - 11:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

धर्मराजमुटके यांनी 03/06/2014 - 11:24 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

पेट थेरपी यांनी 03/06/2014 - 11:30 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अतिशय वाइट वाटले. उमदे व्यक्तिमत्व . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

psajid यांनी 03/06/2014 - 11:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

असेच....अतिशय दु:खद आणि धक्कादायक, त्यांच्या कुटुंबियांना या कठिण काळातुन जाण्याचे बळ येवो.

मित्रहो यांनी 03/06/2014 - 11:39 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

स्पार्टाकस यांनी 03/06/2014 - 11:49 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

गोपीनाथरावांना विनम्र श्रध्दांजली..!!! अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.

अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

psajid यांनी 03/06/2014 - 11:52 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

नि३सोलपुरकर यांनी 03/06/2014 - 12:09 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

चौकटराजा यांनी 03/06/2014 - 13:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

राही यांनी 03/06/2014 - 13:26 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

...*~*~*~* श्री. गोपीनाथ'जी मुंडे' यांना भावपूर्ण श्रद्धांजली *~*~*~*... अत्यंत दुर्दैवी घटना..... असं व्हायला नको होतं.... :|

बारक्या_पहीलवान यांनी 03/06/2014 - 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भाजपला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने वाढवणाऱ्या लोकनेत्याला श्रद्धांजली - सहमत...

निलरंजन यांनी 03/06/2014 - 13:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

केदार-मिसळपाव यांनी 03/06/2014 - 13:55 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

श्रद्धांजली. महाराष्ट्राने फार मोठा नेता गमावला आहे.

दत्ता काळे यांनी 03/06/2014 - 13:56 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फार वाईट झालं.. एक झुंजार राजकीय नेता गेला. मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

नंदन यांनी 03/06/2014 - 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.

तुमचा अभिषेक यांनी 03/06/2014 - 15:48 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

वेळ खरेच चुकली भावपुर्ण श्रद्धांजली !

निनाद मुक्काम … यांनी 03/06/2014 - 16:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

अनन्न्या यांनी 03/06/2014 - 16:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

खूप आशा होत्या, विधानसभेत....महाराष्ट्रात भाजप पोरके झाले. विनम्र श्रध्दांजली!

निलेश देसाई यांनी 03/06/2014 - 17:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आत्ता कुठे महाराष्ट्रात नवी पहाटं झाल्यासारखं वाटतं होत पण आज पुन्हा अंधारुन आल्यासारख वाटतय...

समिर१२३ यांनी 03/06/2014 - 22:48 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

शैलेन्द्र यांनी 04/06/2014 - 11:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

शैलेन्द्र यांनी 04/06/2014 - 16:54 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by संपत

Permalink

पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

बॅटमॅन यांनी 04/06/2014 - 19:15 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by विकास

Permalink

पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.