मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

उद्दाम · · काथ्याकूट
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला. मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली. बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें) मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ... आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ... मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले. पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली. त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? मुघलांचे वाडे सरकारचे झाले. शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत. इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत. पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही. मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?

वाचने 42838 वाचनखूण प्रतिक्रिया 147

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 20:11
पेशवे घराणे खालसा झाले. त्यामुळे त्यांची जवळपास सगळी प्रॉपर्टी खालसाच झाली. शिवछत्रपतींचे तथाकथित वारस इंग्रजांनी खालसा न करता ठेवले इतकेच. पण त्यांच्याकडून किल्ले इ. घ्यायला मुळात ते त्यांचे राहिलेच नव्हते. राहता राहिले संस्थानिक. ते लोक स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजे तर होतेच, शिवाय प्रिव्ही पर्स नामक तनख्याचा प्रकार अगदी १९७२-७४ पर्यंत सुरू होता. शिवाय निगोशिएशन्स करताना वडिलोपार्जित संपत्ती विशेषतः जडजवाहीर सरकारजमा केले जाईल असे काही नव्हते. होते नव्हते तेवढे रेव्हेन्यू राईट्स तेवढे काढून घेतले अन काही प्रॉपर्टी. पण हाय ष्ट्यांडर्ड ऑफ लिव्हिंग मेण्टेन करता येईल इतकी चिकार प्रॉपर्टी त्यांच्या नावेच राहिलेली दिसते. इतर ठिकाणीही स्थिती फार वेगळी आहे असे नाही. थोड्याफार फरकाने हेच दिसते.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Sat, 11/09/2013 - 20:35
पेशवे घराणे खालसा झालेले नाही. त्यांचे वंशज आजही पुण्यात आहेत. प्रभात रोड भागात त्यांचे घर आहे. नाना पेशव्यांचे वंशज बिठुर कानपुर भागात आजही आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आजही सातार्‍यात आहेत. सातार्‍याचा राजवाडा , जलमंदीर , अदालत वाडा , तेथील बर्‍याच जमिनी त्यांच्याच नावावर आहेत. किल्ल्यांबद्दल बोलायचे झाले तर शिवाजीचे सगळेच किल्ले सरकारच्या मालकीचे नाहीत. प्रतापगड आणि तेथील तुळजाभवानीचे मंदीर याची मालकी अजूनही सातार्‍याच्या छत्रपतींकडे आहे. भवानीतलवार , इतर शस्त्रे , दागदागिने हे अजुनही त्यांच्याच ताब्यात आहेत. तीच गोष्ट कोल्हापुरच्या भवानी मंडप राजवाड्याची. तीच कथा साम्गलीच्या गणपती मंदीराची.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 20:40
खालसा होणे म्हणजे वंशविच्छेद नव्हे. राज्य गेले अशा अर्थी म्हटले आहे ते. शिवाजी महाराजांचे सातार्‍यातील सध्याचे वंशज हे त्या गादीचे वंशज म्हणता येतील फारतर, ती ब्लडलाइन शाहूनंतर तुटली आहे.

In reply to by मालोजीराव

चित्रगुप्त Mon, 11/11/2013 - 11:37
'भवानी तलवारीचे गूढ' नामक लेख इथे वाचा: http://khattamitha.blogspot.in/2008/02/blog-post_23.html या लेखातील काही भाग: रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता. 1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही. बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते. भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्‍य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.'' या शिवाय मिपावरील खालील लेखात भवानी तलवारीबद्दल लिहिले आहे: राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट ! http://www.misalpav.com/node/20743 या विषयावरील तज्ञ मंडळींनी याबद्दल खरे-खोटे काय आहे, याचा खुलासा करावा, ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

ग्रेटथिन्कर Mon, 11/11/2013 - 12:07
पुरंदरे इतिहास संशोधक आहेत काय! त्यांच्याकडे इतिहासाची कोणती पदवी आहे? आर्किओलॉजी वगैरेची पदवी... आजपर्यंत शास्त्रीय पद्धतीने असा कोणता इतिहासातील शोध त्यांनी लावला आहे काय?असल्यास विदा द्या. दादोजी शिवाजींचे गुरु असल्याचा एकही अस्सल ,समकालिन पुरावा पुरंदरेंनी शासनाला अथवा इतिहासप्रेमींना दिलेला नाही...तरीही त्यांच्या कथाकादंबर्यात दादोजी सेंट्रल कॅरॅक्टर असतात..... मोले घातले रडाया' चालू करु नका

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Mon, 11/11/2013 - 20:51
ग्रेटस्टिंकर, श्री शिवाजी महाराजांचे दोन गुरू होते. राजकीय गुरू दादोजी कोंडदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री समर्थ रामदास स्वामीं. श्री समर्थ रामदास स्वामींनी "दासबोध" या नावाचा एक महान ग्रंथ लिहिला आहे. तुमच्या अत्यंत अतार्किक, बेताल व असंबद्ध प्रतिसादावरून असं दिसतंय की त्यात लिहिलेली "महामूर्खांची लक्षणे" तुम्हाला तंतोतंत लागू पडत आहेत. असो. बहुत काय लिहिणे.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर Mon, 11/11/2013 - 21:11
दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले याचा एकही समकालीन पुरावा नाही... रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Tue, 11/12/2013 - 12:16
>>> दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले याचा एकही समकालीन पुरावा नाही... रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे. ग्रेटस्टिंकर, दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले नाही याचा एकतरी समकालीन पुरावा आहे का? दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हे प्रत्यक्ष काँग्रेसच्या राजवटीत छापलेल्या इतिहासाच्या पुस्तकातून लिहिले आहे. ते खोटे कसे असेल? >>> रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे. हे जर खरं असेल तर दादोजी हेच शिवरायांचे गुरू होते हेही पुरंदर्‍यांनीच लिहिले आहे. मग तेही खरे असले पाहिजे. ज्या माणसाकडे इतिहास संशोधनाची एकही पदवी नाही त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? आम्ही काँग्रेसच्या राजवटीत निघालेल्या इतिहासाच्या पुस्तकांवर विश्वास ठेवणार. त्यात समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे आध्यात्मिक गुरू होते असे स्पष्ट लिहिले होते. रायगड बांधताना एका खडकात बेडकी सापडते. त्याप्रसंगी श्री समर्थ रामदास व शिवाजी महाराज शेजारी उभे आहेत असे चित्रही इतिहासाच्या पुस्तकात होते. काँग्रेसने लिहिलेला इतिहास खोटा आणि ज्याच्याकडे इतिहासाची एकही पदवी नाही त्या पुरंदर्‍यांना इतिहास लिहिलेला खरा? कमाल आहे बुवा तुमची. काँग्रेसवाले भाजपवाल्यांसारखे इतिहास बदलणारे नाहीत. दादोजी कोंडदेव आणि श्री समर्थ रामदास हेच शिवरायांचे गुरू होते असे आम्ही काँग्रेसच्या राजवटीत लिहिलेल्या इतिहासांच्या पुस्तकावरून शिकलो आहोत. तेच आम्ही खरे मानणार. तुमच्यासारख्या भाजपवाल्यांनी स्वतःच्या सोयीकरता बदललेल्या इतिहासावर आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही. असो. बहुत काय लिहिणे. तुम्हांस सद्बुद्धी आणि योग्य ती आकलन शक्ती देण्यास श्री समर्थ आहेत. आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर Tue, 11/12/2013 - 14:13
असलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात, नसलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या नसतात त्या करताच येत नाहीत. दादोजी गुरु नव्हते हे सिद्ध करुन दाखवा असे विधानच मुळात अतार्कीक आहे ईतिहास संशोधन असे नाही करता येत असो आपण त्याऐवजी डफली घेऊन शाहीर बना...वाटल्यास दाढी वाढवा... हे पण ऐका आणि प्रतिवाद करता येतो का बघा.

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Tue, 11/12/2013 - 20:04
>>> असलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात, नसलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या नसतात त्या करताच येत नाहीत. दादोजी गुरु नव्हते हे सिद्ध करुन दाखवा असे विधानच मुळात अतार्कीक आहे ईतिहास संशोधन असे नाही करता येत असो ग्रेटस्टिंकर, ज्या गोष्टी आहेत त्यात सिद्ध काय करावयाचे? त्यांचे अस्तित्व हीच त्यांची सिद्धता. उलट ज्या गोष्टी असतात पण त्या नाहीत असा ज्यांचा(गैर)समज झालेला (की हेतूपुरस्पर केलेला) असतो, त्या खरोखरच नाहीत/नव्हत्या हे त्यांनी सिद्ध करावयास हवे. यास्तव, दादोजी हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरू होते हे जगजाहीर असताना व हे निखळ सूर्यप्रकाशाइतके सत्य असताना, निव्वळ जातीद्वेषातून व हेतुपुरस्पर ते गुरू नाहीत असा जनतेचा गैरसमज करून देणार्‍यांना तसे सिद्ध करावयास हवे. गेल्या अनेक पिढ्या हे शिकत आल्या ही दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते. काँग्रेसच्या राजवटीत चुकीचा इतिहास कसा व का शिकविला जाईल? >>> आपण त्याऐवजी डफली घेऊन शाहीर बना...वाटल्यास दाढी वाढवा...हे पण ऐका आणि प्रतिवाद करता येतो का बघा. त्याऐवजी तुम्हीच काळी टोपी, श्वेत सदरा, कृष्णवर्णी पदवेश व खाकी अर्धी विजार परिधान करून व हातात दंड घेऊन संचलन करत बसा. असो. बहुत काय लिहिणे. तुम्हांस सन्मार्गावर नेण्यास, सद्बुद्धी देण्यास आणि योग्य ती आकलन शक्ती व विचारशक्ती देण्यास श्री समर्थ आहेत. आमच्या हातून या कार्यास अल्पसा हातभार लागत असला तरी आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर Tue, 11/12/2013 - 21:50
तसा मी बरेचदा भरकटतो , बरे झाले आठवण करुन दिलीत .माझी भजनाची वेळ झाली. चला रामनामाचा जप करु ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ||

In reply to by ग्रेटथिन्कर

कोणता इतिहासातील शोध त्यांनी लावला आहे काय? यावरून सकाळ मधली ग्रॅफिटी आठवली, 'ते भविष्यातले शोध लावतात आणि आम्ही इतिहासातले'. असो.

चेतनकुलकर्णी_85 Sat, 11/09/2013 - 20:11
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. मग तुमच्या मते कोणी लुटले? पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. ह्या विधाना मागे काही दुवा वगैरे ? त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. =)) १ ० ० रुपये चोरले आणि शंभर वर्षांनी एक पैसा परत केला तर !! मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? दुवा वगैरे ?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

उद्दाम Mon, 11/11/2013 - 13:33
भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन. भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का? :) याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का? :)

In reply to by उद्दाम

बॅटमॅन Mon, 11/11/2013 - 15:21
हहहहहहपुवा. त्या मुघलांच्लांअंगात औरंगजेब मेल्यावर, नादिरशहाने लुटल्यावर दम तरी राहिला होता का? 'दिल्लीचा पाटील' इतकीच लायकी उरली होती मुघल बादशहाची. संपूर्ण १८व्या शतकाचा उत्तरार्ध, उत्तर भारतावर मुख्यतः मराठ्यांचे वर्चस्व होते. इंग्रजांनी दिल्ली घेतली मराठ्यांकडून. १८५७ च्या उठावात लोकांनी वर चढवले आणि इंग्रजांनी पकडले इतक्या भांडवलावर जर गोडवे गाणार असाल तर चालूदे. तुमच्या जेएनयू मधल्या बच्च्यांना सुनवा असल्या गोष्टी , करमणूक होईल त्यांची. बाकी मुघलांमध्ये अकबराला मात्र आपण मानतो. सर्वच बाबींत तो ग्रेट होता.

In reply to by उद्दाम

ग्रेटथिन्कर Mon, 11/11/2013 - 17:30
बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक इंग्रजांना घाबरुन त्यांचे मांडलिक झाले होते, आज वंशज म्हणून मिशीला फूका पीळ मारणारे अश्या भेकडांच्याच रक्ताचे आहेत... मूघल असो वा टिपू सुलतान ..ते खरे लढवय्ये...बाकीचे संस्थानिक फक्त खवय्ये... पेन्शन खा, जमिनी खा, संपत्ति खा..

In reply to by उद्दाम

बॅटमॅन Wed, 11/13/2013 - 16:52
त्याच्या आधीही तसे दारूचे बाण वापरले जात. त्याला होके अशी संज्ञा होती. टिपूचे क्रेडिट हे की त्याने त्यात इनोव्हेशन केले. इन्व्हेन्शन त्याचे नाही हे लक्षात घ्यावे.

In reply to by उद्दाम

बॅटमॅन गुरुवार, 11/14/2013 - 11:56
हा हा हा. सगळे सारखेच नाही. टिपूने इनोव्हेशन केले तरी त्याला प्रीकर्सर होता इतकेच सांगायचे आहे. टिपूचे महत्त्व कमी आजिबात होत नै त्याने. त्याचा धर्मवेडेपणा असला तरी एक राजा म्हणून आवश्यक असलेले बहुतेक गुण त्याच्यात होते हे कबूलच आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन Wed, 11/13/2013 - 16:55
शिवाजीमहाराज लढलेच नाहीत बहुतेक कधी. बाकी शिवाजीमहाराज आणि रामदास स्वामी ऊर्फ समर्थ यांची १६७२ साली भेट झाल्याचे अस्सल पत्र उपलब्ध आहे ते नजरेआड केल्याशिवाय चैन पडत नाही वाटते. तुम्ही आणि उद्दाम दोघेही निव्वळ ट्रोलिंग करण्यासाठी मिपाचा वापर करताहात हे लक्षात घ्या. जनता चिडते, कायबाय उत्तरे देते आणि तुम्ही मात्र चुकीच्या समजुती खर्‍या म्हणून सांगताहात. जनाची नाही तर मनाची तरी आहे की कसे ते एकदा कळूदे मग तुमच्या मतांना किती महत्त्व द्यायचे ते ठरेल. तुमच्या विधानांपैकी कितीतरी विधाने निव्वळ अभिनिवेशयुक्त आणि बिनबुडाची आहेत. तुम्हा दोघांची खरेच मूळ पुरावे पहायची तयारी आहे की नुसता टाईमपास चालला आहे? तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देता येईल पण ते गटारीत दगड टाकल्यासारखे होईल. काही झाले तरी टाईमपास तुमचाच.

In reply to by अनुप ढेरे

लोटीया_पठाण Fri, 11/15/2013 - 13:34
ब्रीगेदिंची जुनी सवय आहे वाट्टेल तसली विधान करायची, कोणाचेही अन कुठचेही संदर्भ द्यायचे, अन हवे ते निष्कर्ष काढून मोकळे व्हायचे. (हे सर्व जाणून बुजून ) सो यांना प्रतिवाद करण्यात काहीच हशील नाही. तुम्ही तर्काचा आधार घ्याल तर हे पुरावे पुरावे करीत उर बडवणार…। अन पुरावा वगैरे मांडाल तर नको तसले तर्क लढवणार. असले प्रकार करून यांनी बरीच मनं कलुषित करून ठेवलेली आहेत.

In reply to by बॅटमॅन

ग्रेटथिन्कर Wed, 11/13/2013 - 19:56
मी पुरावे द्यायला तयार आहे ,परंतु त्याआधी मला दाढी वाढवुन ती सफेद करायला पाहीजे मग ,भगवा टिळा लावुन ,उजव्या छावणीतल्या एखाद्या संघटनेच्या व्यासपीठावर कुणा ठाकरे ,मोदी, मंगेशकर यांची लुच्चेगिरी करायला शिकले पाहीजे. त्याशिवाय तूम्ही लोक माझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार??... गेला बाजार माझे आडनाव आपल्या कानाला 'सुसह्य' आणि लगेच 'ओळखु' येणारे करावे लागेल (ऐफेडेव्हीटचा खर्च आलाच) सफेद दाढ्या वाढवलेले इतिहासतज्ञ()? गेली अनेक दशके हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावुन बसतात ,याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी वटवाघळाचा मेंदूही पुरेसा आहे... (मेंदु नसलेला अनपेड थिन्कर)

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Wed, 11/13/2013 - 21:05
>>> मी पुरावे द्यायला तयार आहे तुमचे पुरावे म्हणजे हरी नरके, संजय सोनवणी सारख्यांची भाषणे आणि संभाजी ब्रिगेडवाल्यांची पुस्तके. म्हणजे पूर्वग्रहदूषित, पक्षपाती आणि निरूपयोगी रद्दीच! असो. बहुत काय लिहिणे. तुम्हाला सन्मार्गावर नेण्यास, सारासार विवेकबुद्धी देण्यास व सद्बुद्धी देण्यास श्री समर्थ आहेत. या कार्यात आमचा खारीचा वाटा असला तरी कर्ताकरविता फक्त तोच आणि आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर गुरुवार, 11/14/2013 - 15:18
नरके हे पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख आहेत आणि पुराभिलेखाचे अभ्यासक आहेत. ते नियोजन आयोगाचे सल्लागारही आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल इतपत संशोधन त्यांनी केले आहे व त्यासाठीच्या शासकीय समितीचे प्रमुखही आहेत...सफेद दाढीच्या पात्रतेपेक्षा ही पात्रता नक्कीच मोठी आहे. सोनवणी हे इतिहास व भाषेचे अभ्यासक आहेत आणि ८० च्यावर पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 11/14/2013 - 22:43
अय ब्याम्या, ते लई हुश्शार मानूस हाय बरका बराक ओबामामा! आनि शिरेस घेतंय सगळ. त्ये बार्क्या पोरीला सांगताना बगिटलास न्हवं, ह्यो तुजा बा न्हाय म्हनून... त्या थोबाडपुस्तकावर अस्तुया फोटु. उगा मिसळपाव वर डुप्लिकेट आयडी घिऊन काय त्ये स्पायिंग का काय करत असायचं आनि थो ड्या दिसांनी आमाला तुला खर्‍यानीच उलटं टांगल्यालं बगाय मिळायचं उगा. सांबाळून र्‍हावा. उगा लपडी नगो. कसं? ;)

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी गुरुवार, 11/14/2013 - 15:33
८० पुस्तकांचे काय कौतुक सांगता? साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना पुस्तकांच्या संख्येइतकीही मते मिळाली नव्हती. बाबूराव अर्ना़ळकरांनी तर तब्बल ५०० पुस्तके लिहिली होती. चंद्रकांत काकोडकरांनी देखील १०० कादंबर्‍या लिहिल्या होत्या. >>> त्यासाठीच्या शासकीय समितीचे प्रमुखही आहेत ते सुरूवातीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे लाडके आहेत. छगन भुजबळ यांच्याशी विशेष जवळीक आहे. "ब्राह्मणांना लोकसंख्येच्या प्रमाणात ६०० टक्के जागा राखीव आहेत" हे यांचेच संशोधन. अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर हे आणि आ. ह. साळुंखे असायचे. १-२ वर्षांपूर्वी ब्रिगेड अचानक यांच्या विरोधात गेल्यावर हे बाजूला झाले. हे इतिहास संशोधक कधीच नव्हते. एकंदरीत यांचे संशोधन म्हणजे काँग्रेस्-राष्ट्रवादी पुरस्कृत संशोधन.

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Wed, 11/13/2013 - 21:09
>>> सफेद दाढ्या वाढवलेले इतिहासतज्ञ()? गेली अनेक दशके हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावुन बसतात ,याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी वटवाघळाचा मेंदूही पुरेसा आहे... गुंडगिरी करणारे ब्रिगेडी, सेवासंघी आणि संशोधनाचा आव आणणारे सरकारी इतिहास संशोधक अनेक दशके काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतात, याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी तुमचा मेंदूही पुरेसा आहे...

In reply to by बॅटमॅन

श्रीगुरुजी Wed, 11/13/2013 - 20:57
असल्यांशी वाद घालणे म्हणजे वराहाशी कर्दमात मल्लयुद्ध केल्यासारखं आहे. आपली वस्त्रे मलीन होतात आणि हे वराह मात्र कर्दमात परमानंद उपभोगत असते. ब्रिगेड, सेवा संघासारख्या फॅसिस्ट आणि जातीयवादी गुंडांच्या टोळ्यांचा उगम ९० च्या दशकात झाला. श्री समर्थ रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव यांच्या गुरूपदावर शंका घेणे; स्वातंत्र्यवीर सावरकर, थोरले बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे इ. वर चिखलफेक याच काळात सुरू झाली हा योगायोग नाही. १९४७ नंतर वेगवेगळ्या मार्गांनी गळचेपी करूनसुद्धा (राखीव जागा, कूळकायदा, जाळपोळ इ.) या वर्गाला नेस्तनाबूत करता आले नाही, उलट त्यांची प्रगतीच होत आहे या वैफल्यातून व नैराश्येतून या वर्गांचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न या काळात सुरू झाला. थोरले बाजीराव पेशवे, दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी इ. केवळ एका विशिष्ट जातीचे असल्याने अत्यंत हीन पातळीला जाऊन बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता शिक्षण प्रसारक मंडळी (स.प. महाविद्यालय), ज्ञानप्रबोधिनी इ. शिक्षणसंस्थांना छळण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामागे हाच जातीयवाद आहे. ५० टक्के जागा आता राखीव आहेतच. आता उरलेल्या खुल्या ५० टक्क्यातही मुस्लिम, मराठा इ. ना आरक्षण देऊन याच वर्गाची अजून गळचेप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अगदी १०० टक्के जागा राखीव केल्यातरी हा वर्ग नेस्तनाबूत होणार नाही व त्यांची प्रगती थांबविता येणार नाही याची यांना अजून कल्पना नाही.

In reply to by मालोजीराव

प्यारे१ Wed, 11/13/2013 - 21:32
हाच हाच तो माज! ;) बघा बघा कसे धमकावत आहेत. तिकडे ते साखर कारखानदार भट्टीत घालतात नि इकडं हे तलवारबाजी करतात. मी देशच सोडून जातो कसा..... ;)

In reply to by बॅटमॅन

उद्दाम गुरुवार, 11/14/2013 - 09:19
तुम्हा दोघांची खरेच मूळ पुरावे पहायची तयारी आहे की नुसता टाईमपास चालला आहे? कोण दोघे? शिवाजी - रामदास या विषयावर मी एकही कमेंट केलेली नाही. ------ रामदासनवमीला जन्मलेला उद्दामदास

जयनीत Sat, 11/09/2013 - 20:32
सांस्थनिक गेले, ते स्वतःला राजे वैगैरे म्हणवून घ्यायचे, पण राजा सारखे लढणारे फारच कमी (तुम्हीही उदहरणे दिली आहेतच)शिवाजी राजे, महाराणा प्रताप राणी चेन्नम्मा अजुन अनेक पण एकुण संख्येच्या तुलनेत फार कमी. बाकी सगळे तथाकथीत महाराजे परकिय सत्तेचे मांडलीक होते ते कसले राजे? संपत्ती चा मुद्दा आहेच पण मुख्य मुद्दा हा की हेच तथाकथीत महाराजे १९५२ नंतर ही लोकशाही मार्गाने निवडुन आलेत, लोकांनी मते देउनच त्यांना निवडुन आणले , आणि आजही त्यांच्या वंशजांना तोच गर्व आहे. अन काही प्रमाणात (पूर्वी इतकी नसली तरीही)आजही लोक मान्यता आहेच आजही ब-याच प्रमाणात निवडुन येतातच. ह्या वरुन ह्याच विषया वरची प्रेमचंदांची शतरंज के खिलाडी ही कथा आठवली.

खटासि खट Sun, 11/10/2013 - 08:41
काहीच कळलं नाही. गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ? कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?

In reply to by खटासि खट

उद्दाम Mon, 11/11/2013 - 09:14
गढ्या आणि त्यातील सर्व चीजवस्तू असाच विषय आहे. टायटलात गढ्या लिहिले तरी सगळ्याबाबत चर्चा अपेक्षित आहे.

चित्रगुप्त Sun, 11/10/2013 - 10:26
गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ? कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?
शंभर टक्के सहमत. तसा हा विषय फार मोठा आहे, आणि कुणाचा यावर अभ्यास असेल, तर त्याने अवश्य विवेचन करावे, असा आहे. आजमितीला सुध्द्धा, तेही तरूण पीढीपैकी, या राजेलोकांबद्दल प्रचंड आदर असणारे अनेक लोक आहेत. आणि त्यात काहीही गैर आहे, असे वाटत नाही. गढ्या, राजवाडे इ. पैकी प्रत्येक हकिगत वेगळी असणार. याबद्दल सरसकट विधान करता येणार नाही. सर्वच देशातील प्रासाद वगैरे त्या त्या देशातील मौल्यवान प्रमुख सांस्कृतिक ठेवा असून देशासाठी मिळकतीचा स्त्रोत आहेत. जे प्रासाद सरकार जमा झाले, त्यांची वाताहात झाली, उलट वंशजांनीच नीट जपणूक केली, असेही दिसते.

ग्रेटथिन्कर Sun, 11/10/2013 - 10:30
या संस्थानिकांनी विविध संस्था,ट्रस्ट स्थापण करुन त्या नावे हजारो एकर जमिनी वर्ग केल्या आहेत. त्यावर ट्रस्टी यांचेच बगलबच्चे असतात, कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.

In reply to by ग्रेटथिन्कर

अन्या दातार Sun, 11/10/2013 - 11:49
कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.
कोणत्या कायद्याबद्दल बोलत आहात? का उगाच सामाजिक विषयावर लिहिण्याची खाज / कंड भागवून घेत आहात

अनुप ढेरे Sun, 11/10/2013 - 16:22
अवांतरः अवध चा तो नबाब सजिद अली नाही... वाजीद अली शाह. गाण्याचा एकदम शौकिन... अमजद खाननी त्याचं काम केलं होतं 'शतरंजके खिलाडी' नावाच्या पिच्चरमध्ये.

रमेश आठवले Sun, 11/10/2013 - 18:44
भारत निर्माण झाले त्यावेळी सर्व स्न्स्थानीकावर इंग्रजांची suzerainty होती. त्यांनी सर्व संस्थानिकांना स्वतंत्र होण्याची किंवा भारतात अथवा पाकिस्तानात विलीन होण्याची मुभा दिली होती. त्यांतर भारत सरकारच्या ( म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या ) हिकमती मुळे जवळ जवळ सर्व संस्थानिक भारतात विलीन झाली. त्यावेळी सर्व स्न्स्थानिकांच्या खालील अटी भारत सरकारने मान्य केल्या- १. त्यांचा राजमहाल अथवा गढी अथवा किल्ला (ल्ले ) त्यांच्याच ताब्यात रहावे. २. त्याना विजेचा उपयोग मोफत असावा. ३. त्यांच्या गाड्यांवर त्याना स्वत:च्या number प्लेट लावू द्याव्या. वगैरे वगैरे. या तहाच्या अटी प्रमाणे किल्ले अथवा महाल आज सुद्धा स्न्स्थानिकाञ्च्या मालकीचे आहेत. या शिवाय प्रत्येक संस्थानाच्या महसुलावर आधारित एक वार्षिक रक्कम ( privy purse ) देण्याचे करार झाले होते. नंतर इंदिरा गांधी यांनी one time settlement करण्याचे ठरवले आणि वार्षिक रक्कम देणे बंद केले.

In reply to by रमेश आठवले

उद्दाम Mon, 11/11/2013 - 15:42
अगागागा ! या सगळ्याची किंमत ५५ कोटींपेक्षा नक्कीच जास्त होईल .. म्हणजे पाकिस्तानपेक्षा हे संस्थानिकच देशाला डबर्‍यात घालणारे निघाले म्हणायचे. :)

In reply to by उद्दाम

होना! एकतर स्वतः काही पराक्रम केला नाही. नुसते आपले सातारकर भांडतायत कोल्हापूरकरांशी, कोल्हापूरकर भांडतायत सातारकर आणि नागपूरकरांशी, सगळे मिळून भांडतात शिंद्यांशी, शिंदे भांडतात होळकरांशी. बिनकामाचे लेकाचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृत्युन्जय Wed, 11/13/2013 - 10:55
हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना धोतरबडवी सल्ले देणार आणि देश धर्माला खड्ड्यात घालणार. गण्या (शिर्के फेम. फुटु देत डोळे, सोलु देत जीभा वाले) पेक्षा हे काय वेगळे? सगळॅ एकाच जातीचे.

वेताळ Mon, 11/11/2013 - 18:09
संजीव पिल्ले ला महाराष्ट्रातील गढ्यांची काळजी लागुन राहिली आहे.केरळात मग काय त्यावेळी सर्व मालमत्ता लोंकाच्या मालकीची होती काय?

In reply to by वेताळ

उद्दाम Tue, 11/12/2013 - 09:22
वर लेखात मी संपूर्ण भारतील प्रिन्सली स्टेटची यादी दिलेली आहे. हा लेख केवळ म्हाराष्ट्रातील नव्हे, भारतातील सर्व संस्थानिकांना लागू आहे.

परिंदा Mon, 11/11/2013 - 18:30
भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन. भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का? याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का?
ही अख्खी पोस्ट आजच्या महान राजकारण्यांना अगदी जशीच्या तशी लागू होते. :)

आसिफ Tue, 11/12/2013 - 03:15
तुम्ही उल्लेख केलेला कुरुंदवाड चा राजवाडा आज अस्तित्वात नाही. तीनशे, साडेतीनशे वर्षांपासुन दिमाखदार पणे उभा असलेला राजवाडा ह्या वर्षी एप्रिल मे मध्ये जमीनदोस्त करण्यात आला. अवांतरः राजवाडा पाडु नये म्हणुन मध्यंतरी एका पक्षाने आंदोलन केलेले, पण खाजगी मालमत्ता असले कारणाने काही होउ शकले नाही.आता त्या जागेवर घर संकुल बनवण्याचा पटवर्धन राजे साहेबांचा मनसुबा आहे असे कळाले. -आसिफ राजवाडयाच्या सर्व भागात मुक्त संचार केलेला आणि त्याला जमिनदोस्त होताना हळवा झालेला..

उद्दाम Wed, 11/13/2013 - 09:19
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात. सी एस टी पासून लाल किल्ल्याप्र्यंत ढीगभर वास्तू भारतीय जनता आनंदाने वापरत आहे. लोकोपयोगी कामांना जागा नाही आणि नॉस्टाल्गियाच्या नावानं असल्या रावबहाद्दुरांचे फोटो आणि त्यांच्या रखेल्यांची भांडी कुंडी ठेवायला जनतेच्या हक्काच्या जागा कशाला वापरायच्या? एखाददुसरा हॉल ठेवावा. पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी. इंदिरा गांधींनी या बांडगुळांची पेन्शन बंद करुन एक चांगला पायंडा पाडला. या जागा ताब्यात घेऊन याला लोकशाही राजवटीचा पुढचा अध्याय जोडला जायला हवा.

In reply to by उद्दाम

अनुप ढेरे Wed, 11/13/2013 - 09:35
पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी.
म्हणजे बिल्डर लोकांना घशात घालता येइल आरामात. आणि काचेच्या भिंती असलेले ठोकळे बनवता येतील.

In reply to by उद्दाम

मालोजीराव Wed, 11/13/2013 - 13:39
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात
पुणे,कोल्हापूर,सातारा,मुंबई,नागपूर इथे दिल्यात कि जागा-वाडे , प्रतिसाद आणि लेख दोन्हीही अभ्यास करून टाकत चला !

In reply to by मालोजीराव

उद्दाम Wed, 11/13/2013 - 13:44
ज्या जागा अद्यापही संस्थानिकांकडेच आहेत, त्यांच्याबद्दल हा लेख आहे. तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर कुरुंदवाडात येऊन बघून जा. अजुनही भारतात अनेक ठिकाणे असलीत, तिथे फिरुन या.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन गुरुवार, 11/14/2013 - 03:31
तुमच्याकडे कुणी भीक मागितली की तुझेच धन तुला देतो म्हणून परत देता का =)) मीपण लग्गेच येतो आहे नै ते घ्यायला.

In reply to by बॅटमॅन

ग्रेटथिन्कर गुरुवार, 11/14/2013 - 11:47
प्रश्न संस्थानिकांच्या मालमत्तेचा आहे, ती मालमत्ता जनतेचीच आहे. ती परत मागितली की भीक होते का.. बरं बरं असेल असेल.

In reply to by ग्रेटथिन्कर

अनुप ढेरे गुरुवार, 11/14/2013 - 12:31
जनतेनी मागितली म्हणजे नक्की कुणी मागितली? का हे अर्णव गोस्वामी च्या 'जनता आपसे जवाब मांग रही है' या प्रश्नाच्या छापाचं??

In reply to by ग्रेटथिन्कर

वेताळ गुरुवार, 11/14/2013 - 17:25
मला एक सांगा भारतातील किंवा जगातील जे काही राजे किंवा संस्थानिक झालेत्,त्या सर्वानी आपली मालमत्ता फक्त जनतेला ठकवुन मिळवली होती का? जी काही किल्ले किंवा गढ्या उभ्या आहेत त्या १०० % जनतेवर अत्याचार करणार्‍यानी ऊभ्या केल्या आहेत? अहो ज्याच्या मनगटात धमक होती किंवा ज्याना आपल्या जिवाची पर्वा नव्हती असे त्यात कित्येक योध्दे होते. त्यानी पराक्रम गाजवला त्यानी संपत्ती मिळवली. ज्यानी जनतेवर अत्याचार केले त्याची संपत्ती जनतेने उठाव करुन लुटली आहेच ना.जर तुमचे आमचे पुर्वज भ्याड किंवा भाडखावु असतील तर आपल्याला ह्यातले काहिच मिळणार नाही. उगाच ह्याचा वाडा का नाही मिळाला,किण्वा त्याची जमीन का सरकार जमा झाली नाही असे दाखले देण्यात काय हाशिल आहे?त्याच्या मनगटात आज जोर आहे ते लोक सोन्याचा धुर काढत आहेत,तुम्ही पण कष्ट करुन मिळवाना संपती आणि त्यावर बांधा ना महाल. मुकेश अंबानीने आज जगातील सर्वात दिमाखदार महाल उभा केलाच आहे ना?तुम्ही आम्ही फक्त आम्हाला राखिव कोटा द्या व ह्याचा वाडा व जमीन सरकार जमा करुन आम्हाला वापरायला द्या हेच तुणतुणे वाजवत राहणार आहे. मग ही भीक नाही तर काय आहे?

डॉ.प्रसाद दाढे Wed, 11/13/2013 - 11:17
तेंव्हाचे शिरपेच अन मोरचेल मिरविणारे, रयतेकडून जुलमाने खंडरुपी धन गोळाकरून अनेक बेगमा/ उपस्त्रिया ठेवणारे, स्वतंत्र गाडीतून फिरणारे, आपल्याच नातेवाईकाला मोठ्या अधिकराच्या जागा देणारे, अनेक नोकर-चाकर पदरी बाळगणारे, मन रिझवण्यासाठी शिकार करणारे, कधी नर्तकीच्या वा गाणारीच्या कलेचा मद्य धुंद होउन अस्वाद घेणारे अन इंग्रजांपुढे लाचार असणार्‍या पण स्वकियांपुढे मुजोर असणार्‍या संस्थानिकांमध्ये आणि आजच्या नगरसेवक-आमदार-राज्य मंत्री-खासदार-केंद्रिय मंत्री ह्यांच्यात काय फरक आहे. किरकोळ तपशिलात फरक असेल पण तीच मुजोरी, तीच भ्रष्ट सिस्टीम, आपल्या मुला-नातवंडांसाठी, वारसांसाठी अमाप जमिनी इस्टेटी, कंत्राटांमधून प्रचंड नफा/ लाच, बदल्या करण्यासाठी लाच, घोटाळे, निवडणूकांमध्ये अफरातफर, आलिशान सरकारी महाल, लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा, शिकारी, प्रोटोकॉलच्या नावाखाली झडणारे सॅल्यूट्स, स्वतःच्या मुलाला मंत्रीपद मिळण्यासाठी आटापिटा... यादी खूप मोठी आहे. मी तर म्हणेन तेव्हांच्या संस्थानिकांपेक्षा अन इंग्रजांपेक्षासुद्धा हे आत्ताचे नीच राजकारणी खरे भारतद्रोही आहेत. कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे. निवडणूकांच्या काळात मतदारांना पाच पाच हजार वाटण्याचे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. जाऊ देत, हा सगळा विषयच बीपी वाढविणारा आहे, त्यामुळे हतबल होण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरलेले नाही.

विजुभाऊ गुरुवार, 11/14/2013 - 12:59
१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात.

In reply to by विजुभाऊ

मालोजीराव गुरुवार, 11/14/2013 - 14:40
१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते.
झाशीची राणी आणि तात्या टोपे यांच्याविरुद्ध…याला झाशी संस्थान बळकवण्याची जयाजीरावाची इच्छा आणि पेशवा-शिंदे कटू संबंधाची पार्श्वभूमी होती. १८५७ स्वातंत्रलढ्याच्या मुख्य प्रवाहाशी याचा संबंध नाही. हा लढा मोडून काढण्यात राजपुतान्याचा सिंहाचा वाटा होता.

In reply to by मालोजीराव

ग्रेटथिन्कर गुरुवार, 11/14/2013 - 15:00
उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला शिंदे आणि होळकर या दोन सरदारांनी, परंतु त्याचे श्रेय पुण्यात बसणार्या पेशव्यांनी घ्यायचे असे चालू होते. एक तर पेशव्यानी सातारच्या गादीला नामधारी बनवले होते वर पळीपंचांगानुसार युद्धाचे मुहुर्त काढायचे ,असला पोरखेळ शिंदे व होळकरांना मानवणार कसा? त्यातच नर्तकीचे प्रकरण, दारुबाजपणा , ध चा मा करण्याची या पेशव्यांची अनैतीक वृत्ती . शिवभुपाचे स्वराज्य पेशव्यांनी कवडीमोलाने उधळायचा सपाटा लावला होता. त्यामुळेच पेशवे शिंदे यांच्या संबंधात कटुता आली.

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी गुरुवार, 11/14/2013 - 15:07
पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून भाऊसाहेब पेशवे व विश्वासराव पेशवे हुतात्मा झाले होते. त्याच युद्धात मल्हारराव होळकर युद्ध सोडून निघून आले होते.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर गुरुवार, 11/14/2013 - 17:54
शिंदे ,होळकरांची खडी फौज होती, तर पेशव्यांच्या ताफ्यात अर्धेअधिक बाजारबुणगेच होते. त्यात परत फुकट जेवणारे, तीर्थयात्रा करणारे भोळसट बायाबापुडे घेऊन सदाशिवभाऊ युद्धाला आले होते .या असल्या बाजारबुणग्यांमुळे लाख मराठा तिथे कापला गेला.या बाजारबुणग्यांनीच अर्धी रसद खाऊन संपवली होती. युद्ध कूटनीती करायचे सोडून ब्राह्मणभोजने आणि तिर्थक्षेत्री जिर्णोधार करण्यात पेशवाई मश्गुल होती .यामुळे मराठ्यांची चाल धीमी पडली .अशा मुर्खांसाठी होळकर कशाला जीव धोक्यात घालतील? आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन गुरुवार, 11/14/2013 - 18:15
आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.
पानिपतात प्रत्यक्ष हजर असलेला अवधचा नबाब सुजाउद्दौला याचा दिवाण काशीराज याने त्या एकूण प्रकरणावर काही वृत्तांत लिहिला आहे. त्याचे भाषांतर कोणा ब्राऊन नामक इंग्रजाने केलेय आणि शेजवलकरांनी ते आपल्या ग्रंथात वापरलेय. त्यात स्पष्ट दिलेय की लढाईच्या दुसर्‍या दिवशी काही मंडळी सुजाकडे आली आणि डेड बॉडी दहनाकरिता मागू लागली. विश्वासरावांची बॉडी पेंढा भरून काबूलला नेऊ म्हणून पठाण मागे लागले होते पण त्यांना मनवण्यात कसेबसे यश आले. सदाशिवरावभाऊंचे धड दुसर्‍या दिवशी मिळाले. शीर कापले होते. त्या धडावरचे भरजरी कपडे, अलंकार व काही जखमा, विशेषतः १७५९ साली पुण्यातल्या गारपिरावर एका गारद्याने केलेला वार, इ. ताडून पाहता ते भाऊचेच आहे याची खात्री पटली. पण शीर काही मिळाले नाही. पुढे काही वेळाने एका पठाण सैनिकाने ते कापून जमिनीत पुरून ठेवले होते असे कळाले. मग ते उकरून ताब्यात घेतले आणि दहन झालेय रणभूमीवरच. अस्सल पुरावे बघण्याचे कष्ट न घेऊन सोनवणी आणि नरके यांच्यासारख्या रेम्याडोक्यांच्या भजनी लागणारी तुमच्यासारख्यांची पिलावळ आजकाल वाढत लागली आहे. कधी हे ग्रहण सुटणार देव जाणे.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 01:08
नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू, तुम क्या जानो सच्चाई क्या होती है. अश्वत्थाम्याला खरे दूध काय ते माहितीच नव्हते म्हणतात, पाण्यात पीठ मिसळून तेच खात असे गरिबीमुळे. पुढे हस्तिनापुरात खरे दूध प्याला ते त्याला आधीच्या सवयीमुळे आवडेचना तशी गत झालीये तुमची =))

In reply to by बॅटमॅन

ग्रेटथिन्कर Fri, 11/15/2013 - 09:10
सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड लोक तुमचे गुरु, या दाढीवाल्याने अनेक ऐतीहासिक अस्सल कागदपत्र नष्ट केल्याचे सांगितले जाते. संस्थानिक ,वंशज यांच्याकडून कागदपत्र मिळवायची आणि नंतर गहाळ करायची .शिवाजीँचे धर्मनिरपेक्ष स्वरुप लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर खबरदारी ही आरेसी बांडगुळे घेत असतात. या दाढीवाल्याची लबाडी कळल्यानंतर एका संस्थानिकाने याला काठीने बदडून हाकलून दिले होते. काही संघटनांनी यांची लायकी मराठी जनांपुढे आणली हे एक बरेच झाले .लोक जाब विचारायला लागले ,लोकांची चर्चेची वादाची तयारी असूनही हे कणाहीन इतिहासतज्ञ कुठे गायब झालेत हे त्या पासोड्या विठोबाला आणि पत्र्या मारुतीलाच ठाऊक.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 11:48
नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे बाळकडू पिलेला ट्रोल असेच बोलणार हो. भांडारकरवर हल्ला करणार्‍यांची जात तुमची, तुम्ही काय ऐकणार हिंसेत कुणाला.

In reply to by बॅटमॅन

श्रीगुरुजी Fri, 11/15/2013 - 20:24
बॅटमन, तुम्ही ज्या तत्परतेने ग्रेटस्टिंकरसारख्या ब्राह्मणद्वेष्ट्या जातीयवाद्यांचे निराधार आरोप सप्रमाण खोडून काढत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन! खेडेकर, कोकाटे, नरके, सोनवणी इ. जातीयवाद्यांची पुस्तके हे वाचणार आणि इथे येऊन त्यातली गरळ ओकणार. पण तुम्ही त्यांचा प्रत्येक गलिच्छ आरोप सप्रमाण खोडून काढलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर Fri, 11/15/2013 - 20:34
तूम्हीही ज्या तत्परतेने पुरंदरे ,मेहंदळे, बेडेकर या आरेसी बांडगुळांचे, जातियवाद्यांचे,इतिहासाची मोडतोड करणार्यांचे समर्थन करण्यासाठी जो आटापीटा करत आहात त्यासाठी आपले अभिनंदन.

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी Fri, 11/15/2013 - 20:41
पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, मेहेंदळे, बेडेकर इ. स्वतंत्र प्रज्ञेचे व निष्पक्षपाती इतिहास संशोधक आहेत. ते काही इतरांसारखे सरकार स्पॉन्सर्ड जातीयवादी ब्राह्मणद्वेष्टे नाहीत. अर्थात तुम्हाला ते काय कळणार म्हणा? आणि तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा फारसा दोष नाही.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 20:48
=)) हहपुवा. मेहेंदळे हे आरेसी बांडगूळ? बरं बरं. त्यांच्या संशोधनातील एक चूक दाखवा, त्यांना फोन लावून निषेध करतो, हाकानाका. नै म्हणजे नरके, सोनवणी व खेडेकरांनी आपल्या अमूल्य बिनबुडाच्या संशोधनात काय गरळ ओकलीये त्यात काहीतरी मिळेलच की. आता होऊनच जाऊदे. मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे.

In reply to by बॅटमॅन

श्रीगुरुजी Fri, 11/15/2013 - 20:52
>>> मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे. त्यांचे संशोधन काय तपासायचे? त्यांचे आडनाव हीच सर्वात मोठी चूक आहे. बाकी त्यांचे संशोधन वगैरे लक्षात घेण्याची गरजच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 21:02
अगदी अगदी. या ब्रिगेडींना बाकी ब्राह्मणांची भीती का वाटते हे एक न उलगडलेले कोडे आहे. मुळातला फट्टूपणा असा उघडा पडतो की काय कोण जाणे.

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 20:46
धन्यवाद. पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.

In reply to by बॅटमॅन

लोटीया_पठाण Fri, 11/15/2013 - 21:28
पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.
+१ अहो त्यांना पण माहित आहे आपण असत्य पसरवतोय ते …. पण त्यांचा उद्देशच तो आहे. याचा फटका यापुढील इतिहास संशोधनाला बसणार आहे. खासकरून मराठा इतिहासाच्या बाबतीत . एकतर जास्त कोणी यावाटेला जाणार नाहीत अन गेलेच तरी एखादा वेगळा निष्कर्ष लोकांपुढे मांडणे त्यांना ब्रिगेडी गाढवांच्या दंडेली मुले शक्य होणार नाही.

In reply to by बॅटमॅन

चेतनकुलकर्णी_85 Fri, 11/15/2013 - 21:41
(फक्त आणि फक्त )फुले ,आंबेडकर आणि शाहूंच्या ह्या पवित्र पुरोगामी महाराष्ट्रात ,महाराष्ट्र घडवायला ब्राह्मणांनी पण हातभार लावला असे म्हणणे पण महापाप आहे ! कुठे फेडाल हि पापे तुम्ही बॅटमॅन राव ? ---- विकांतला मिपावर वावरून "उपरोधनिझम" ची लागण झालेला

In reply to by ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी गुरुवार, 11/14/2013 - 22:18
म्हणजे खडी फौज बाळगणारे युद्धातून धूम पळून गेले आणि बुणग्यांची फौज बाळगणारे अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडले! >>> आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते. असे कोणते इतिहासकार मान्य करतात? नरके का सोनवणी का ब्रिगेडचे महान संशोधक खेडेकर्/कोकाटे? ब्रिगेडींप्रमाणे तुमचा ब्राह्मणद्वेष आता अगदी किळसवाण्या पातळीला पोहोचला आहे. सर्व कायदेशीर, बेकायदेशीर मार्ग वापरून, इतिहासाची मोडतोड करून, यांच्या श्रद्धास्थानावर प्रहार करून आणि गुंडगिरी करूनसुद्धा ही जमात नेस्तनाबूत होत नाही आणि यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत आहे या वैफल्यातून आणि नैराश्यातून तुम्ही अत्यंत असत्य विधाने करत आहात. रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे हेर होते व स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक होते यांसारख्या अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाण्या आरोपांइतकाच भाउसाहेब पेशव्यांवरील हा आरोपही अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाणा आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन गुरुवार, 11/14/2013 - 15:07
शिंदे होळकर पुढे आणले पेशव्यांनीच. पुढे ते स्वतंत्र झाले, पण त्यांचा मुख्य पराक्रम पानिपतोत्तर काळात जास्त दिसतो. त्याआधी अहमदिया करार वैग्रे गोष्टी आहेतच, पण त्यांनी आपल्या बुद्धी अन सामर्थ्याचे विशेष दर्शन पानिपतोत्तर काळात जास्त घडवले. तोपर्यंत उत्तरेत पेशव्यांचेही वर्चस्व होतेच. बाकी पोरखेळच काढायचे झाले तर दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले, इ. चे पोरखेळही तितकेच जबरी आहेत. 'पेशवाईच्या सावलीत' नामक त्र्यंबक शंकर शेजवलकरांचा लेख वाचल्यास समजून येईल. पेशवे एकटे तेवढे गंडलेले अन बाकी सर्वच भारी हे समीकरण चूक आहे. तसे उदात्तीकरण करण्याची लाट सध्या असली म्हणून चुकीची गोष्ट बरोबर होत नाही.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव गुरुवार, 11/14/2013 - 15:11
बाकी पोरखेळच काढायचे झाले तर दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले
ब्याट्या सबुरीनं घे…धागा अडल्ट होईल :)) :P

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय गुरुवार, 11/14/2013 - 15:19
घ्या. त्र्यंबक शंकर शेजवलांकडे इतिहासाची कुठली डिग्री होती? केवळ ते शेजवलकर होते या अवगुणाच्या जोरावरच त्यांचे संशोधन बाद होते. पुढचे काय बोलता?

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन गुरुवार, 11/14/2013 - 15:24
ते बी.ए. होते :) एम.ए चा थेसिस त्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे युनिव्हर्सिटीने फेरफार करावयास सांगूनही त्यांनी न केल्याने एम.ए डिग्री मिळाली नाही. इतकेच कशाला, पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते इतिहासाचे. शिवाय काही पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे गाईड होते. डेक्कन कॉलेजात त्यांची खोली अजून दाखवतात. माझे स्मरण बरोबर असेल तर आरमारविषयक थेसिस एकाने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लिहिलेला आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय गुरुवार, 11/14/2013 - 15:17
धोतरबडवी सल्ले कोणी दिले, शत्रुच्या गळ्यात गळे घालुन मराठी साम्राज्याच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ऐन युद्धातुन कोण पळुन गेले याचीही माहिती असेलच ना तुमच्याकडे? शिवाय शिवाजी महाराजांनी स्वतःहुन फार थोड्या लढाया लढल्या त्या नात्याने त्यांना त्यांचे श्रेय मिळायलाच नको नाही का? उलटपक्षी असाही निष्कर्ष काढता येउ शकतो की " मुरारबाजी सुलतानढवा करुन स्वतःच्या जीवाची बाजी लावत होता तेव्हा शिवाजी महाराज मिर्झाराजे आणि दलेरसिंगाच्या शामियानात पुख्खे झोडत होते" किंवा " बाजीप्रभु स्वतःच्या रक्ताने पावनखिंडीत रक्त सांडत असताना 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे' या वक्तव्याचा आधार घेउन चक्क पळुन गेले". इतिहासाचा अर्थ चुकीचाच लावायचा म्हटल्यावर काय वाट्टेल ते थुंकता येते हो.

In reply to by विजुभाऊ

सुनील गुरुवार, 11/14/2013 - 14:43
ज्या संस्थानिकांनी इंग्रजांना साथ दिली (१८५७ वा अन्य वेळी) त्यांच्या गढ्या, वाडे आणि नामाधारी संस्थानिकपद इंग्रजांनी कायम ठेवले. याउलट ज्यांनी इंग्रजांशी पंगा घेतला त्यांची वाट लावली. एक राज्यकर्ते ह्या दृष्टीकोनातून पाहिल्यास इंग्रजांचे हे वर्तन ठीकच. परंत्, आजच्या स्वतंत्र भारतातदेखिल पहिल्या प्रकारचे संस्थानिक आजदेखिल आपल्या (तेव्हा संस्थान असलेल्या) प्रजेची आपुलकी बाळगून आहेत. उलट दुसर्‍या प्रकारचे संस्थानिक आजही दुर्लक्षितच आहेत. असे का झाले असावे?

श्रीगुरुजी गुरुवार, 11/14/2013 - 14:17
>>> १८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात. म्हणजे १८५७ पासून आजतगायत या वंशजांचे भारताचे अनहित करणार्‍यांना समर्थन दिसते.

खटपट्या गुरुवार, 11/14/2013 - 23:10
वाचायला मजा येतेय. प्रतिसाद पुराव्यानिशी असतील तर अजून मजा येईल. दुध का दुध पानी का पानी हो जायेगा. नरके चे भाषण तू नळीवर ऐकतोय…. कोण खरे कोण खोटे देव जाणे.

बाबा पाटील Fri, 11/15/2013 - 00:12
शिवछत्रपतींनी एक एक माणुस देउन आनी रक्ताच मोल देउन स्वराज्य उभे केले.पुढे शंभुराजांनी असामन्य विरतेने स्वधर्माचे रक्षण करण्याकरिता बलिदान दिले,त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा पेटुन उठला व राजरानी महाराणी ताराराणी आणी संताजी धनाजीच्या अतिव पराक्रमाने हे स्वराज्य राखले.शाहुमहाराजांच्या दुरदृष्टीने व गुणग्राहकतेने बाळाजी विश्वनाथ व महापराक्रमी थोरल्या बाजीरावांनी याचा विस्तार केला.हा सर्वगुणसंपन्न पेशवा घरातल्या मुर्खांमुळे अकाली मरण पावला.नंतर नानासाहेब पेशव्याने प्रचंड घोडचुका केल्या त्यात सर्वात महत्वाच इंग्रजांच्या मदतीने दौलतीचे हिंदुस्तानातले सर्वात प्रबळ असे आरमार बुडवले.दुसरी घोड्चुक म्हणजे मराठयांची खरी युद्धनिती म्हणजे गणिमी कावा तो सोडुन मुख्य सरदारांचा विरोध असताना बाजारबुनग्यांसह मैदानी युध्ध करावयास भाउला पाठवले.मल्हाररावांचा योग्य सल्ला भाउंनी मानला नाही हे पाणिपताच्या मानहानीचे फार मोथे कारण होते.त्यानंतर महादजीबाबा शिंदेनी अतुल पराक्रम धाडस व अव्वल दरबारी राजकारणाने नाना फडवणविस्,पटवर्धन्,होळकर ,गायकवाड, भोसले यांच्या मदतीने परत मराठा साम्राज्याची घडी बसवली. जो पर्यंत नाना आणी महादजीबाबा होते.तोपर्यंत मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करन्याची इंग्रजांची हिंमत नव्हती.पण ते गेल्यावर रघुनाथरावाने पेरलेल्या नादान बिजाने सगळ्या साम्राज्याचा सत्यानाश झाला,खर तर या उतरत्या काळातही यशवंतराव होळकरासारखा महापराक्रमी विर होउन गेला पण त्याला साथ द्यायला खंबीर पेशवा नव्हता. राज्य स्थापने पासुन ते नावरुपाला येउन परत अस्तंगत होई पर्यंत मराठा असो,ब्राम्हण असो ,धनगर असो वा इतर कोनीही प्रत्येकाचा प्रत्येक गोष्ठीत काहीना काही वाटा होता.शेकडो वर्ष मोगली अन्यायाने पिचलेल्या मनात स्पुलिंग पेटवुन स्वराज्य निर्माण करण्याचे महान कार्य शिवछत्रपतींनी केले. त्याकाळी प्रत्येकाने आपपल्या परीने त्याला हातभार लावला.त्याच्यापासुन काहीतरी शिकायच सोडुन उठसुठ जातीवर जाताना लाज नाही का वाटत. च्यायला पायाखाली साध झुरळ आल तर बेंबीच्या देठापासुन बोंब मारणार्‍याची आपली लायली.कोनी राज्य केले आणी कोनी बुडवल म्हणुन आता बोंबलत बसताय होय रे,थुत तुमच्या जिंदगाणीवर....

बाबा पाटील Fri, 11/15/2013 - 02:03
माझ्यासाठी मराठा म्हणजे,जो या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठा,या मातीशी इनाम राखतो तो मराठा,आई वडीलांचा सांभाळ करतो तो मराठा,गोरगरिबांच्या मदतीला धाउन जातो तो मराठा.अन्यायाला सरळ रस्त्यावर उतरुन प्रतिकार करतो तो मराठा. एखादा कितीही बलिष्ठ असला पण अन्यायाने,बळजबरीने वागत असेल तर त्याचे थोबाड फोडायची हिंमत दाखवतो तो मराठा.जो आजच्या काळात नांगर आणी तलावरीबरोबरच लेखनी आणी तराजु सारख्याच हिमतीने पेलतो तो मराठा. मग तो ब्राम्हण,कुणबी,माळी,यनगर किंवा अगदी एखादा शेख,खान किंवा आपला पाटील-देशमुख असु द्या. या माय मराठीवर प्रेम करणारा हा प्रत्येकजण शिवछत्रपती प्रणित मराठाच होय.

In reply to by बाबा पाटील

मालोजीराव Fri, 11/15/2013 - 15:40
पुरंधरवर लढलेला मुरारबाजी मराठा , पावनखिंडीत पडलेला बाजीप्रभू मराठा, प्रतापगड रणसंग्रामात युद्धात मुत्सद्देगिरीची शिकस्त करणारे पंताजी गोपीनाथ बोकील मराठा, एका दिवसाचा शिवाजी होऊन धन्य पावलेला शिवा काशीद मराठा, औरंग्याच्या मगरमिठीतून राजांना सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा इमानी मदारी मेहतर मराठा, शिवराज्याभिषेक करणारे गागाभट्ट मराठा, शिवभारतकार कवीन्द्र परमानन्द मराठा, 'शेर शिवराज' म्हणणारा कवी भूषण मराठा, संभाजी राजांवर पुत्रवत प्रेम करणारे बाळाजी आवजी मराठा, 'मैत्री' शब्दाला खरा जगणारा कवी कलश मराठा , १८० किल्ल्यांचे प्रभू किल्लेदार हे हि मराठाच , मराठा आरमाराच्या सीमा बुलंद करणारा दौलतखान मराठा स्वराज्याचे शिवराय,संभाजीराजे,राजाराम,ताराराणी,शाहू असे ५ छत्रपति पाहिलेले हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य हि मराठाच

In reply to by बाबा पाटील

प्यारे१ Fri, 11/15/2013 - 15:54
इथं समोर नस्तंय ना कुणी....! सगळ्यांना लई फुरफुरतं. लिहीतात भसाभसा. डोळ्यात डोळे घालून समोर बसायची वेळ येते तेव्हा तंतरते. स्वत:चा लॅपटॉप, स्वतःचा मोबाईल, स्वतःचे हात असं असलं की स्वतःचीच लाल. उगा आवया नुस्त्या.

In reply to by मालोजीराव

ग्रेटथिन्कर Fri, 11/15/2013 - 15:56
अनुमोदन. महाराज प्रजाप्रतिपालक असेच होते.काही लोक त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक उपाधी लावुन एका विशिष्ट जातीपुरते मर्यादीत करत आले आहेत.

In reply to by ग्रेटथिन्कर

प्यारे१ Fri, 11/15/2013 - 16:03
आयला मग अभिमान पाहिजे की.... एका मराठ्याने बामनांना पोसलं म्हनून. हायेच बामन जात बांडगुळाची. फुडं? प्रॉब्लेम काय आहे? डबल ढोलक्या च्यायला. कुणी म्हणालं म्हणून राजा तसा झाला का? त्यांनी मराठ्यांना पण पोसलंच्च की. कुणब्यांना पण पोसलं. काशिदाला पण. मेहतराला पण. भिकारचोट साले. शिवाजी महाराज तिकडं डोक्याला हात लावून बसले असतील. :(

बाबा पाटील Fri, 11/15/2013 - 16:18
गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर राजा श्री शिवछत्रपतीं.येथे फक्त गोब्राम्हण प्रतिपालक नसुन्,क्षत्रियकिलवंतास आणी बहुजनोद्धारक हे दोन शब्दही आहेत.त्याचाही विचार करावा.इतिहास व वर्तमान कधीच बदलत नसते.जर बदलायचे असेल तर भविष्य बदलायची तयारी करा.मी पाटलाचा पोर्,स्वतःच्या आईसाठी मागच्या सातपिढ्यात कोनी न केलेला आयुर्वेदाचा व्यवसाय स्विकारला नव्हे तो अतिशय व्यवस्थित त्यात स्वतःला सिद्ध केले.त्या साठी मला स्वतःची पाटीलकी सोडुन ब्राम्हण बनायला लागल का ?अजिबात नाही.आजच जग तलावरीवर नाही चालत हो.शिक्षणावर चालतो.असही आपल्याला साल आरक्षण नाही.मग मागच्या गोष्टी उगाळत बसुन राहण्यांपेक्षा एक तर शिक्षणाने स्वतःला सिद्ध करत प्रगती करा अन्यथा बापजाद्यांनी सोडलेल्या पिढिजात जमिनींची वाढ करा.अन्यथा आपल्या रक्तातुन आलेला राजकरणाचा व्यवसाय म्हणुन स्विकार करा.हो कारण आजकाल राजकारण हा देखिल फुल्ल टाइम बिजनेस आहे.माझे कित्येक मित्र यातुन अफाट कमाई करत आहेत.आणी येथे तत्व सांगत बसणार्‍यांना नोकरीवर ठेवा.

वेताळ Fri, 11/15/2013 - 18:34
पडुन आपला धंदा करतोय्.अजुनही मैत्री करताना कुठे जात आडवी आली नाही. कि आमच्या घरी कोणता जातीभेद होतो.पण साले फुकाचे भिकारचोट इथे इतके बोंबलतात कि आपण खरेच इतके जातियवादी आहोत का वाटायला लागते.

In reply to by वेताळ

बॅटमॅन Fri, 11/15/2013 - 18:38
हा ह्हा ह्हा....अहो 'आम्ही जातपात मानत नाही' असे कानीकप्पाळी ओरडून आरडून सांगणारी जमातच कैकदा प्रत्यक्ष आचरणात जास्त जातीयवादी असते. अन जितका जास्त हुच्चभ्रूपणा तितका जातीयवाद 'क्लास'शी निगडित करून क्लासिझम करतात, म्हणजे तितके बोटही ठेवता येत नाही वर्तनावर.