ह्म्म्म.... किती गुंतागुंत! बारकावे टिपले आहेतच, पण ह्याहूनही अधिक बरेच असेल, नाही? व्यवस्थेचा भाग होऊन त्यात मुरल्यावर अजूनही बरेच अधिक समजत असावे, असा माझा आपला एक तर्क.
बारकावे, गुंतागुंत? यशोधरा, नंदन, हो आहेत, बरेच आहेत. सगळे एकदम कसे सांगू? अर्थात, म्हटलं तर ही गुंतागुंत नसतेदेखील. यशोधरेचा तर्क अगदी बरोबर. आमचे 'राजे'च बोलताहेत तिच्या तोंडून असं वाटलं.
भेटा म्हणजे सांगतो एकेक बारकावे... :)
कसं आहे की, आपली पंचज्ञानेंद्रिये जितक्या बारकाईनं काम करतील तितके बारकावे, गुंतागुंत दिसू लागते. ;)
पण त्यानी तशी काहीही व्यवस्थाच नसल्याचं सांगून त्यांना हुसकावून लावलं. इथं यायचं असेल तर मतदान करावंच लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. या मंडळींमध्ये तिथं युक्तिवाद करू शकणाऱ्यांपैकी कोणीही नसल्यानं ते बाहेर आले. दूरध्वनीवरूनच त्यांनी ही माहिती कळवली होती.
तशी व्यवस्थाच नाही. http://www.misalpav.com/node/6425#comment-107253 बाकी प्रतिसाद राखुन ठेवत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
नकारात्मक मतदान वेगळं आणि मतदान करायचं नाही याची नोंद करा म्हणणं वेगळं. नकारात्मक मतदानाची तरतूद नाही. ती करण्यासाठीच ती याचिका आहे. इथं या मतदारांपैकी कोणीही नकारात्मक मतदानाची मागणी करीत नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे मतदान केंद्रात जाऊन नोंद करायची, बोटावर शाई लावून घ्यायची आणि त्यानंतर म्हणायचं की मला मतदान करायचं नाही. अशावेळी माझी नोंद केली जाते एका रजिस्टरमध्ये. तेवढाच मुद्दा आहे हा. नकारात्मक मतदानाचा अधिकार नाही हे उघड आहे. तो असता तर तशी तरतूद मतपत्रिकेत (म्हणजे आता मतदान यंत्रावर) करावी लागली असती. तुम्ही दिलेल्या दुव्यावरची मूळ बातमी वाचली. गल्लत तीच तर आहे तेथे. युक्तिवाद होतोय स्टॅच्युटरी राईट ऑफ रिफ्रेनिंग फ्रॉम व्होटिंगविषयी. मग पूर्वी अशी रजिस्टर का ठेवली जात होती?
असो हे अवांतर झाले. निवडणूक सुधारणा हा माझा विषय नाही.
गावकर्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी वापरु इच्छिणारा हा बहिष्काराचा मार्ग योग्य वाटला. त्यांची नोंद शासनाने घ्यावी असा प्रयत्न दिसला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
नेहमीप्रमाणेच विचारप्रवर्तक नोंदी. आपल्या मर्यादित जगातून बाहेर निघायला मदत करणा-या.
कधी नव्या जाणिवा करून देणा-या, तर कधी अस्वस्थ करणा-या. म्हणूनच त्या वाचायला आवडतात.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
प्रश्न असतो वंगणाचा. ते पुरेसं असलं, की मग एरवीचा वेग पाहिला तर या यंत्रणेचा वेग त्यावेळी प्रकाशाच्या वेगाइतका असतो असं म्हणायला हरकत नाही. सापेक्ष वेग!
अचुक निरिक्षण. शासकीय यंत्रणेला नवनिर्मिती, कल्पकता, दुरदर्शी धोरण, कार्यक्षमता यांचे वावडे असते. जेव्हा शासकीय यंत्रणा ढिम्म हलत नाही, अजगरासारखी सुस्त पडली आहे असे म्हटले जाते त्यात उपहास असला तरी Inertia हा यंत्रणेचा स्थायी भाव आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
खूप हताश वाटतं तुमच्या नोंदी वाचून!
अर्थात असं काही लिहू नका म्हणायला प्रत्यक्षातलं 'आयुष्य' करण जोहरचा पिक्चर नसतो, ते 'जिणं' असतं याची कल्पना आहे; त्यामुळे जरूर लिहा. माझ्यासारख्या सुखात लोळणार्यांना इतरांच्या दु:खाची किमान जाणीवतरी होऊ देत.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
सहमत आहे. त्रास तर होतोच पण लिहा.
गोल्फची मैदाने, खासगी तळी आणि हजारो एकरची जागा.
इंग्रजी व इतर पद्धतीचे बंगले आणि ऐश्वर्य पाहून हॉलिवूड पटांची आठवण येते.
मध्यमवर्गीय सामान्य माणूस भारावून जातो. नटनट्यांचे, क्रिकेटपटूंचे बंगले आणि संपत्ती याची जशी चर्चा थोडेसे कौतुक होते तसेच या नगरींचेही होते.
यात हे मात्र विसरुन जातो की हजारो एकर जागा आली कुठून. त्याला लागणारा ऍप्रोच रोड, वीज, पाणी, नैसर्गिक साधने या सगळ्याचा स्त्रोत काय याचा विचार मात्र साध्या माणसाच्या ध्यानातही येत नाही. आपण फक्त त्या श्रीमंती थाटापुढे सौंदर्यापुढे अवाक होतो. आणि तिथेच त्याचा विचार संपतो.
जरूर लिहा श्रावण... तुम्ही म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक दृष्ट्या असंख्य लोकांना हळूहळू ही जाणिव होईल, एक वैयक्तिक संघर्ष होईल. तेव्हाच काही दशकांमध्ये जेव्हा या वृत्तीला विरोध होईल तेव्हा विरोध करणारे अनेक जण असतील ते या जाणीवेतूनच.
श्रावण, तुझ्याशी या बाबतीत प्रत्यक्ष बोलणे, चर्चा करणे हा एक अनुभवच आहे. मागे म्हणले तसे, असं काही ऐकलं, वाचलं की खूप विषण्णता येते. आणि सगळं सोडून देऊन काही करायची अजून तरी हिंमत नाही, त्यामुळे अजून त्रास होतो. तू तर हे सगळं प्रत्यक्ष बघतोस, कसं सहन करतोस? ताकद पाहिजे.
यशोताई, नंदनशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
मागच्या नोंदीसारखंच. हे आता नेहमीचंच. वाचून त्रास होणं आलंच. संताप आणि आगतिकता यामध्ये हेलकावे घेतोय.....
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
मागच्या नोंदीसारखंच. हे आता नेहमीचंच. वाचून त्रास होणं आलंच. संताप आणि आगतिकता यामध्ये हेलकावे घेतोय.....
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
मागच्या नोंदीसारखंच. हे आता नेहमीचंच. वाचून त्रास होणं आलंच. संताप आणि आगतिकता यामध्ये हेलकावे घेतोय.....
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
कामानिमित्त ऍम्बी व्हॅलीत जाणे झाले.
बेगडी सुखसोयी नैसर्गिक सौंदर्याचा कसा घास घेतात? त्याचे दुर्दैवी उदाहरण.
जिथे तिथे पंचतारांकित सुविधा, शंभर फूट रुंदीचे रस्ते, अनैसर्गिक स्थापत्यकलेचे नमुने, जनुकीय बदल केलेली झाडे, गुळगुळीत कापलेल्या हिरवळी. (ऍम्बी व्हॅलीने एक किल्लाही गिळंलाय.)
तिथे प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया डोळ्यासमोर आली.
आणि संरक्षक भिंतीच्या बाहेर चरणारी गुरे - चारणारी पोरे.
इथे किती शेतकरी हटवले? किती सरकारी जमिनी कवडीमोलाने विकल्या? किती आदिवासी देशोधडीला लागले? राम जाणे.
***
परवाच झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हातकणंगले-कोल्हापुरातील अपक्ष उमेदवार राजू शेट्टी - सदाशिव मंडलिक यांनी लावासा कॉर्पोरेशनवर केलेले आरोप वाचले. किती खरे? किती खोटे? राम जाणे.
इथे किती 'नोंदी' होणार आणि त्या कोण करणार? राम जाणे.
***
भारतात किती ऍम्बी व्हॅली - लावासा सिटी होणार? राम जाणे.
***
हताश विषण्णता.
या, याआधीच्या नोंदींवरच्या प्रतिक्रिया पाहून काल एक क्षण वाटलं, की आपण उगाच वाचकांच्या सद् सद् विवेकाला सारखंच टोचणी लावतो आहे की काय? मग मनाने कौल दिला की, आपलं काम आपण करत रहायचं.
हताश, विषण्ण वगैरे वाटणं स्वाभाविक आहे. माझीही काही वेळेस तशी स्थिती होते. त्यावर मात करता येते. संताप होतो, पण आता अगतीकता वाटत नाही. संघर्ष होतोय. ती मंडळी तो करतात. त्यात आपलं लेखन हेही योगदान असू शकतं. एका प्रकल्पग्रस्त वृद्धेनंच हा प्रकाश पाडला होता पूर्वी. त्या माऊलीशी थोडं जवळिकीचं नातं निर्माण झालं होतं. बोलता-बोलता ती म्हणाली, "आमची गाऱ्हाणी मांड चार लोकांमध्ये. पुरेसं आहे. त्यातून कधी कुठे काय मदत होईल हे सांगता येणार नाही." खरं आहे ते.
अशाच लेखनातून यातल्या रचनात्मक कामाशी काही मंडळी जोडली जात आहेत. एक व्यक्ती प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊ लागली आहे. ही एक व्यक्ती माझ्यालेखी अत्यंत महत्त्वाची, देणगीदार म्हणून नव्हे तर असा विचार करण्यास प्रवृत्त झाली म्हणून. तिची देणगी उद्या बंद झाली तरी हरकत नाही. तिचे विचार तसे घडणे हे महत्त्वाचे. आणखीही कोणी आर्थिक मदत देऊ केली आहे, कोणी इतर काही स्वरूपाचे काम करू शकतो का अशी विचारणा केली आहे. काहीही. अक्षरशः काहीही. लेखन, हिशेब ठेवणे, पत्रकं तयार करणे, या प्रकल्पांची माहिती चोखपणे लोकांपर्यंत पोचावीत यासाठीचे दस्तावेज बनवणे येथपासून ते जे जमेल ते काम उपयुक्त असतं आणि त्यात आपल्या लेखनातून कोणी जोडलं जात असेल तर तीच ताकद असते विषण्णता घालवण्यासाठी. हतबलता संपून जाते. एक आहे, काही केलं म्हणून लगेच यश येतंच असं नाही. अपयश असतं. काही लढाया हराव्या लागतातच एक युद्ध जिंकण्यासाठी. आणि ही युद्धं थांबत नसतात. युद्ध थांबत नाही म्हणून हतबल होऊन थोडंच चालेल? मी अनेकदा म्हणतो "या मंडळींची सुरू असते ती रोजची जगण्याशी लढाई". तशीच एक लढाई आपलीही सुरू असते. आपल्या लढाईतून त्यांच्या लढाईसाठी एक स्पेस निर्माण करता येऊ शकते. ती आपण केली तर या अगतीकतेतून, विषण्णतेतून बाहेरही निघण्याचा मार्ग दिसूही लागतोच.
(हा थोडा लहानतोंडी मोठा घास झाला वाटतं... :? )
तुम्ही म्हणता तसं या सर्व लढ्याला क्लास वॉरच म्हणावे लागेल. मूठभर लोकांच्या शानशौकीकरता ढिगभर लोकांना देशोधडीला लागावं लागतंय.
सामान्य माणूस फक्त झगमगाटच बघू शकतो, पण त्यामागचा काळोख कधी डोळ्यासमोर येतच नाही. या नोंदी वाचून किमान त्याची जाणीव तरी झाली. वाचून अगतिक वाटायला लागलं :(
प्रतिक्रिया
ह्म्म्म....
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहाहाहा
प्रश्न
होय
वेल...
निषेधात्मक मार्ग
नेहमीप्रमाणेच
नेहमीप्रम
हम्म
वंगण
खूप हताश
+१
+१
श्रावण,
संताप आणि आगतिकता
संताप आणि आगतिकता
संताप आणि आगतिकता
नावानिशी -
रोजची लढाई
आपले हे
टोचणी
क्लास वॉर