मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544812 वाचनखूण प्रतिक्रिया 783

In reply to by महेश हतोळकर

महेश हतोळकर Wed, 02/20/2019 - 15:16
सुरुवातीलाच पंप्र "these plans" असं स्पष्ट म्हणाले नाही यातच सगळं आलं. खडा मारुन पाहिला, अंगलट येतय असं दिसल्या बरोबर स्पष्टीकरण पुढे केले.

In reply to by अर्वाच्य

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 18:48
"We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably the fruits of development. These must have the first claim on resources" WHICH MEANS "We will have to devise innovative plans to ensure that the Muslim minority gets the first claim on National resources which belong to all"

In reply to by अर्वाच्य

ट्रेड मार्क Wed, 02/20/2019 - 21:05
तुम्हीच जो व्हिडिओ शेअर केला तो बघितला नाही का? त्यात डॉ. साहेबांनी स्पष्ट म्हणलंय "They must have the first claim on resources". हे These तुम्ही तुमच्या मनाचं टाकताय कारण सारवासारव करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस वापरायला मनुष्य लागतो प्लॅन काही आपले आपले रिसोर्सेस वापरणार नाहीये. म्हणजेच तुम्ही म्हणता तसं These plans असं म्हणले असते तरी अर्थ असा निघतो की प्लॅन पण असे बनवायचे की त्यातून मुसलमानांना हे रिसोर्सेस पहिले वापरायला मिळतील, कारण त्यांचा या रिसोर्सेसवर पहिला अधिकार आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? किंवा जे करत आहेत त्यांच्या प्रगतीला कोणी अडथळा आणत आहे का? मुस्लिम मुलांना शाळेत घेणार नाही असे कुठली शाळा म्हणते का? पण त्या लोकांनाच मुलांना मदरशात पाठवायचं असतं त्याला कोण काय करणार? मदरसे आधुनिक करायचा तथाकथित "हिंदू" सरकारच्या प्लॅनला कोणी विरोध केलाय ते बघा. हिंदूंनी कधी मुसलमानांना प्रगती करण्यास विरोध केला आहे ते पुराव्यासहित सांगा. ज्या मुस्लिमांना प्रगती करायची होती ती त्यांनी केलीच आहे, त्यांना कोणी अगदी उच्च शिक्षण घ्यायला किंवा नोकरी करायलाही बंदी केलेली नाहीये किंवा अडथळेही आणला नाहीये. असे असताना का देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप द्यायचे?

In reply to by ट्रेड मार्क

अर्वाच्य गुरुवार, 02/21/2019 - 15:12
तुम्ही भारतात राहत नाही. भारतात परत यायचा काही तुमचा प्लान नाही. मग आमच्या देशात आम्ही काय करतो यावर बोलण्यचा तुम्हाला काय अधिकार मिळतो? भारतात राहत असाल तर बोला नाही तर आपली इथली टकळी बंद करा.

In reply to by अर्वाच्य

ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 18:29
मी कुठे राहतो, माझा कुठे जायचा/ यायचा प्लॅन आहे नाही याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मी पण भारतीय नागरिकच आहे त्यामुळे घटनेने मला अधिकार दिलेला आहे त्याचा मी वापर करणारच. मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसेल तर असे प्रतिसाद येतात. एकतर मुद्देसूद प्रतिवाद करा नाहीतर आपले अर्वाच्य तोंड बंद करा.

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण गुरुवार, 02/21/2019 - 18:04
पुन्हा एकदा तुमचा हास्यास्पद प्रतिसाद. हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता? एका ठिकाणी अरब देश अतिरेक्यांचा तोंडदेखला निषेध करतायत- तुमच्या मते प्रत्यक्ष काही करत नाहीत - याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. इथे मात्र तोंडदेखलं बोललेलं तुम्ही पुरावा म्हणून सांगताय. थोडं तरी तार्किकदृष्ट्या सुसंगत बोला. मुसलमानांची प्रगती का होत नाहिये याची बहुतेक कारणं सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये आधीच आली आहेत, आता तुम्हाला ते शिकवत बसायचं का, की समजून घ्यायचं नाही हा तुम्ही दृढनिश्चय केला आहे?

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 18:43
पहिली गोष्ट म्हणजे, ममो असं म्हणले होते याचा काही पुरावा आहे का याची विचारणा झाली होती, त्यासाठी हा व्हिडिओ देण्यात आला. दुसरी गोष्ट, जर अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणाऱ्या सरकारनेच मुसलमानांसाठी काही केले नाही हे तुम्ही चक्क मान्य केलंत. ममो सिंग तोंडदेखलं बोलले असे तुम्हीच म्हणताय. यालाच सेल्फ गोल म्हणतात. १५ लाखाची गोष्ट करताय तर पहिले आव्हान म्हणजे मोदी असे म्हणले याचा एक अधिकृत व्हिडीओ द्या. तसेच २००६ साली ममो सिंग कुठल्या निवडणुकीचा प्रचार करत होते? देशाचा पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीने असेच एक वाक्य कोणाला तरी झुकते माप देण्यासाठी का बोलावे याचे काही स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये पण खालील गोष्टी सांगितल्या आहेत. The Sachar Committee has compiled data from a number of sources. The report frames these issues as related to identity, security and equity. Barring some generic observations about the causes for the ‘development deficit’ among Muslims, there is no explicit or detailed discussion of the causes of such conditions. तसेच यातून बाहेर पाडण्यासाठी रेकमेंडेशन केलं की त्यांना सामान संधी असल्या पाहिजेत. कुठलाही रिपोर्ट असे म्हणलं नाहीये की मुसलमानांना झुकते माप द्या.

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण Fri, 02/22/2019 - 01:11
पुन्हा एकदा प्रयत्न करा. एक वाक्य म्हणजे संपूर्ण सच्चर आयोग रिपोर्ट नाही. तुम्हाला समजायला वेळ लागत असेल तर दोन वेळा प्रयत्न करा. प्रतिसाद द्यायची काहीही घाई करू नका . मी इथेच आहे. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. प्रतिसाद देताना किमान एकदा तरी वाचून पाहा. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. सुरुवातीला त्रास होईल पण जमेल.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क Fri, 02/22/2019 - 19:27
एक तर अर्वाच्य (हा आयडी आहे) यांनी या प्रतिसादात असे ममो म्हणाले याचा पुरावा द्या असे विचारल्यामुळे तो दिला. आणि त्यावर तुम्ही म्हणताय "हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?" तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये. बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या - १. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? २. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण ३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या. ४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले? ५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे? ६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत? तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रम्प गुरुवार, 02/21/2019 - 18:21
ट्रेड मार्क , पुन्हा एकदा सडेतोड़ प्रतिसाद !!! परदेशी राहून भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड तुम्ही ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करता ते सुद्धा एकाच आय डी ने ते वाखाणण्याजोगे आहे . लगे रहो !!!!! हम तुम्हारे साथ है !!!!

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 18:47
आपण प्रयत्न करत राहायचं तरी या लोकांच्या विचारात फार फरक पडेल असं वाटत नाही. काही लोकांची बुद्धी तर फारच कलुषित झाली आहे. तर काहींना मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसल्याने त्रास होतोय तर काहींना आव्हान दिल्याने होतोय. मजा आहे.

ट्रम्प Wed, 02/20/2019 - 15:32
अक्षय कुमार - 5 करोड़ सलमान खान - 22 लाख अमिताभ बच्चन - 2 करोड़ दिलजीत दोसांज - 3 लाख सिंगर बादशाह -3 लाख उरी टीम - 1 करोड़ टोटल धमाल टीम - 50 लाख . पुलवामा घटनेत मरण पावलेल्या जवानां साठी बॉलीवुड मधील या सेलेब्रिटीज़ ने मदत जाहिर केली आहे असहिष्णुता वरुन बोम्ब मारणारे आणि पाकिस्तानातील पुरग्रस्त जनते च्या मदतीला धावणाऱ्या शाहरुख आणि आमिरखान ने अजुन मात्र जवानां साठी पुढाकार घेतलेला नाही . मदत किती करावी की करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये कोणीजबरदस्ती। करु शकत नाही . पण दोन्ही देशातील जनतेत असा भेदभाव केल्या मुळेच खान गैंग सोशल मीडिया वर टार्गेट होते .

In reply to by ट्रम्प

विशुमित Fri, 02/22/2019 - 12:03
परदेशी राहून काही आय डी भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करत आहेत ते सुद्धा एकाच आय डी ने. असे हे वाखाणण्याजोगे काम करत असताना तुम्ही मात्र फेक बातम्या देऊन त्यावर सगळा पोतेरा फिरवत आहात. https://m.timesofindia.com/news/fake-alert-no-shah-rukh-khan-did-not-donate-rs-45-crore-to-pakistan/amp_articleshow/68062223.cms === कसा का असेना पण शाहरूख आपल्याला जाम आवडतो!!

In reply to by विशुमित

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 17:09
प्रतिसाद देण्या अगोदर वाचत जा म्हणजे नंतर खजील होण्याची वेळ येणाऱ् नाही , असो !!! तर आता नीट समजून घ्या , कारण तुमच्या तालुक्यातील तुमचे चाळीस पन्नास मित्र सैन्यात आहेत असे तुम्ही एकदा सांगितले होते , त्यामुळे लोकांनी वेलफेयर सोसायटी ला केलेल्या मदतीचे महत्व तुम्हाला समजवण्याची वेळ येते यात आश्चर्य आहे . शिवाय हा विषय पक्षीय राजकारणाच्या पलीकडे आहे एवढी तरी समज तुम्हाला असेलच . हां !!! तर ज्या सैनिकांनीं देशासाठी वीरमरण स्वीकारले त्यांना सरकारी नियमानुसार मदत मिळतेच पण काही सेलिब्रिटीनी आपण या देशाचे काही देणे लागतो या भावनेतून वेल्फेयर सोसायटी ला आर्थिक मदत केली तर कोणी त्या सैनिकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली . सैनिकांच्या वेल्फेयर सोसायटी ला मदत करणाऱ्यामध्ये खान गैंग कधीच नसते अस का ? ते या देशाचे नागरिक नाहीत ? का त्यांचा बाप आय एस आय एजंट ( दावूद ) नाराज होईल म्हणून ? हि खान पिलावळ बाकीच्या सोशल एक्टिविटी करत असते यात शंका नाही पण नेमके इथेच पाणी का मूरत ?

In reply to by विशुमित

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 17:27
वैयक्तिक मानहानी , आय टी चा ढोस , उद्धट भाषेतील प्रतिसाद यावरुन तुमची शैक्षणिक पात्रता समजली !!!! असो !!! तेवढ जरा वेळात वेळ काढून वेल्फेयर सोसायटी च्या मदती बाबत तुमचे आणि बम्बळ चे विचार एकदम दक्षिण ध्रुवीय का होते तेव्हढ सांगाल का ?

In reply to by ट्रम्प

विशुमित Sat, 02/23/2019 - 23:56
पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने जरा बंद करा. मग लोकांची शैक्षणिक पात्रता शोधत बसा. बाकी तुमचा प्रतिसाद एकदम हास्यास्पद असल्या कारणाने तो मी फाट्यावर मारला होता. Chillax...!!

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/24/2019 - 07:40
असू द्या !!! काही हरकत नाही , फक्त तेवढे आर्मी बद्दल चे ढोंगीप्रेम बंद करा किंवा खुल्लमखुल्ला पाकिस्तान च समर्थन करा .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/24/2019 - 09:28
का उगाच हसं करून घेताय स्वतःचं?? फेक बातम्या टाकताय आणि म्हणताय काही हरकत नाही!! अजब आहे! === बाकी कोणाच्या सर्टिफिकेटसची आम्हाला गरज नाही. बाजारबुनग्याची तर नाहीच नाहीच...!! पुढे तुम्ही ठरवा!

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/24/2019 - 13:59
आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे ? दिसतेय ! दिसतेय !!! तुमच्या प्रत्येक प्रतिसाद मध्ये तीच छाप दिसतेय = ) बघा ! याला म्हणतात कंट्रोल करणे !! संयम ठेवणे !! नेमकी हीच गोष्ट तुम्ही साहेबांकडून शिकले नाही , शेम्बड्या पोरांची काम नाहीत राजकारणाच्या गप्पा मारायला .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/24/2019 - 16:52
फेकर लोकानी दुसर्याना शहाणपणा शिकवू नये. आधी पहिले नाक पुसा बघू , मग राजकारणावर गप्पा मारा.

In reply to by ट्रम्प

शब्दबम्बाळ Fri, 02/22/2019 - 15:20
नुसती जळजळ! तेवढंच करा... ते करोडोमध्ये कमावतात आणि करोडोमध्ये टॅक्स आपल्याच देशाला देतात, पलीकडच्या नाही! वरच्या प्रतिसादात तुमचे खोटे उघडे पडलेच आहे असेही. २०११ ला शाहरुख खानला युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक कार्यासाठी. "गौरतलब है कि 20वें यूनेस्को अवॉर्ड्स में शाहरुख खान को उनके चैरिटी वर्क के लिए सम्मानित किया गया है। खास बात यह है कि इस अवॉर्ड को पाने वाले शाहरुख पहले भारतीय हैं। " https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/-/championstrophy_articleshow/10814659.cms 1. Recently, Shah Rukh Khan’s Meer Foundation donated Rs. 12 lakhs to Government of Kerala's Chief Minister Distress Relief Fund in order to help the Kerala Flood victims. 2. In 2015, he reportedly donated a sum of Rs. 1 crore for the Chennai flood victims. 3. He also donated a sum of 25 lakhs to PM Manmohan Singh for Tsunami Relief camp. He was one of the celebrities who performed at Help Telethon Concert to raise money for tsunami victims. 4. Shah Rukh Khan’s team Kolkata Knight Riders (KKR) won the Indian Premium League (IPL) season 7. The King Khan donated the entire money (Rs. 15 crores) to cancer patients in Mumbai and Kolkata. अजून अनेक आहेत पण तुमच्यासारख्यासाठी एवढी पुरेशी आहेत. पूर्ण बातमी: https://www.indiatimes.com/entertainment/11-inspiring-acts-of-generosity-by-srk-which-prove-he-s-a-true-hero-in-every-sense-of-the-word-351619.html आणि महाराष्ट्रात राहून आमिर खान काय समाजकार्य करतो हे सांगावं लागत असेल तर धन्य आहात! त्यांनी मदत केली जरी असली तरी आपल्याला कळेलच असे काही आहे का? तरी बरं स्वतःच म्हणताय कि मदत करणे ज्याची त्याची इच्छा आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित Fri, 02/22/2019 - 16:11
हे मी सगळं लिहणारच होतो. पण या वृत्तीना थोड्या गुदगुल्या केल्या तरी पुरेशा असतात. === शाहरुखच महिलांप्रती आदर कसा असावा, हे खरेच आत्मसात करण्यासारखी गोष्ट आहे. शारूखला ओळखणाऱ्या भारतातील बहुतांशी महिला माझ्या म्हणण्याला दुजोरा देऊ शकतील. कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल!

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित Fri, 02/22/2019 - 17:44
इकडे समर्थक (? सोर्री बाबा, लोकांना लगेच राग येतो आणि आम्हाला गुलाम ठरवून मोकळे होतात) शांतीप्रिय लोकांना झोडतात आणि त्यांचे "हे" राजपुत्राला मिठ्या काय मारतात, मागे थेट बिर्याणी खायलाच गेले शत्रुदेशात. लोक विसरणार नाहीत या गोष्टींना.! ते बिर्याणी खाऊन आले तेव्हा खूप गाजावाजा झाला होता कि पाकिस्तानचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार म्हणून.! एक कडक अग्रलेख- https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-saudi-arabia-prince-mohammed-bin-salman-visit-in-india-1845666/

In reply to by विशुमित

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 11:08
कावळया च्या शापाने गाय मरते का ? त्याच प्रमाणे न खपणारे आणि एकांगी लिहाणाऱ्या पेपर चे लेख सामान्य मतदार वाचत नाहीच , त्यामुळे त्यांच्या पक्षपाती लेखामुळे भाजप ला काडिचा ही फरक पडणार नाही . मोदींची शरीफ भेट किंवा वाजपेयी नीं मसूद ला सोडण्या पाठिमागचे उद्देश आजच्या जनतेला चांगलेच समजतात त्यामुळे लोकसत्ता सारख्या प्लॉप पेपर ने बाहुल्या उगळत बसल्या दिवसेंदिवस लोकसत्ता चा खप कमी होणार हे निश्चित . TIO सुद्धा बऱ्यापैकी भाजप विरोध आवळत असतो , पण तरीसुद्धा गेल्या आठवड्यात त्यांनी '2019 मधील वाचकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे ' छापले होते . त्यामुळे लोकसत्ता ची तुम्ही टाकलेली लिंक सरळ कचऱ्यात गेली आहे . जनमत काँग्रेस च्या विरोधात असल्या मुळे लोकसत्ता वाल्यानी तर वाचकांच्या प्रतिक्रिया छापने बंद केले आहे . फक्त मिपावर पिंका मारत बसण्या ऐवजी ट्विटर , ब्लॉग्स , ऑनलाइन न्यूज़पेपर वरील प्रतिक्रिया डोळे उघडून वाचा . तरी पण जनमत नाही समजले तर बिनधास्त पूर्वी सारखे अडाण्या चे सोंग घेवून फिरा आमची काही हरकत नाही !!!!!!! पाच वर्षा पूर्वी सगळी मीडिया मोदी विरोधात होती , पण तरी सुद्धा जनतेने काँग्रेस च्या विरोधात जावून भाजपला मताधिक्याने निवडून आणले होते . आता सुद्धा तीच परिस्थिति आहे .

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ Sat, 02/23/2019 - 19:08
आयला पाकिस्तानी लोक सुद्धा आता मोदी साठी काम करायला लागलेत !! पाकिस्तानी टिव्हि वरुन साभार .... पुलवामाच्या अगोदर श्री मोदीजींची रेटींग ३५-४०% होती , पुलवामानंतर ती वाढुन आता ९३% झालेली आहे !! मोदींजींना पंप्र पदावरुन काढुन त्या जागी ईतर कोणालाही बॉॉसवाव म्हणजे भारताच्या तुफान प्रगतीला खीळ बसेल असा कयास करुन पाकिस्तानी बसले होते पण झाल ह्याच्या विरुद्ध !!

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/24/2019 - 00:29
त्याच प्रमाणे न खपणारे आणि एकांगी लिहाणाऱ्या पेपर चे लेख सामान्य मतदार वाचत नाहीच === मग सनातन प्रभात, संध्यानंद वगैरे पेपर , की आयटी सेल फेक whatsup मेसेजस?? ह्या भ्रमात राहू नका की लोक वाचत नाहीत. आजकाल समान्य लोक राजकारणा व्यतरिक्त काहीच वाचत नाहीत. --- लोकसत्ता सारख्या प्लॉप पेपर ने बाहुल्या उगळत बसल्या दिवसेंदिवस लोकसत्ता चा खप कमी होणार हे निश्चित . TIO सुद्धा बऱ्यापैकी भाजप विरोध आवळत असतो , पण तरीसुद्धा गेल्या आठवड्यात त्यांनी '2019 मधील वाचकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे ' छापले होते . त्यामुळे लोकसत्ता ची तुम्ही टाकलेली लिंक सरळ कचऱ्यात गेली आहे . ==)) जे जे वाह "गोदीजी वाह्ह" ते ते सर्व पौष्टिक.! === बाकी आमचे 2014 पुर्वी पण डोळे उघडेच होते अणि पुढे ही असणार. असो.. तुमच चालू ध्या.

In reply to by गब्रिएल

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 16:37
मला खात्री आहे राकॉ चे मिपावरील प्रवक्ते मढ़ा मधील नागरिकांनी पवार साहेबां चा एकेरित उल्लेख करून दिलेल्या प्रतिक्रिया वर एक शब्द ही बोलणार नाहीत . इथे आम्हाला मोदींच्या 5 वर्षाचा हिशोब घ्यायचाय, क़ाय तर म्हणे " माढा चा बारामती करु म्हणणारे निवडून गेल्या नंतर 2009 पासून एकदा ही फिरकले नाहीत ".

In reply to by गब्रिएल

विशुमित Sat, 02/23/2019 - 17:25
चंगलाय की !कामे नसतील झाली,फिरकले नसतील तर लोकानी बोललेच पाहिजे. जाब विचारलाच पाहिजे. नुसता (अंध) भक्ती काय कामाची?? === बाकी गोरे हा तड़ीपार आहे. त्याच एवढं मनावर कसे घेतले तुम्ही?? का सगळी तड़ीपार गँगच आवडती??

In reply to by विशुमित

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 21:49
मला वाटल तुम्ही गाब्रिएलनीं पोस्ट केलेल्या वीडियो मधील माढा मधील नागरिकांच्या तुमच्या साहेबांच्या विरोधातील जळजळीत प्रतिक्रिया बद्दल बोलताय , पण हा गोरे तर माण खटाव चा युवा अध्यक्ष निघाला. आणि त्याने व समर्थकानी साक्षात साहेबांच्या पुढे धिंगाणा घालून साहेबांचे भाषण बंद पाडले . अवघड आहे हो तुमच्या साहेबांचे !!! कार्यकर्ते ऐकत नाही , मान देत नाही !!!! त्यामुळे तुम्ही आमच्या साहेबांचे सोडा आणि तुमच्या साहेबांची काळजी करा .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/24/2019 - 00:07
"आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. आज कार्यकर्त्यांसोबत शेखर गोरे कार्यक्रमास्थळी आले होते. शरद पवारांच्या भाषणापूर्वी आमच्यापैकी एका कार्याकर्त्यांला भाषणाची संधी द्यावी असं आम्ही स्टेजवरील नेते मंडळींना लिहून दिलं होतं. आम्हाला आमच्यावर झालेला अन्याय पवार साहेंबांसमोर मांडायचा होता. परंतू आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून मला उभ केलं होतं. मात्र निवडणूकीत राष्ट्रवादीकडे 127 मतं जास्ता असताना जर माझा पराभव होतो. हा माझ्यावर होणारा अन्याय आहे. साहेबांना निवडणूकीत पूर्ण पाठिंबा आहे. पण जर मला माण तालुक्यातं नेतृत्व दिलं असताना मला व्यासपीठावर बोलू दिलं जातं नाही हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. मी माझं नेतृत्व वेळावेळी सिद्ध केलं असतानाही मला साहेबांना भेटू दिलं गेलं नाही. म्हणूनच मला माझ्यावरील अन्याय पवार साहेबांसमोर मांडायच्या होत्या. === यातून काही डोक्यात घुस्तय का ते बघा. नाहीतर एखदा फॉर्मेट मारून घ्या.

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/24/2019 - 07:42
हि अन्याय मांडण्याची छान पद्धत आहे !!! पक्षाची बाजू मांडण्या चा साहेबाप्रमाणेच केविलवाणा प्रयत्न करताय !! त्याच प्रमाणे पक्षावरिल साहेबांची पकड़ दिवसेंदिवस कमी होत चालाल्याचे ते द्योतक आहे . आता हे तुम्हाला मान्य होण शक्यच नाही कारण तुमच्या डोक्यात विचारांचा गुंता झाला आहे , आणि अशा अवस्थेतील माणूस आजुबाजुच्यानां धोकादायक ठरू शकतो .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/24/2019 - 09:41
आमचा धागा एकदम सरळ आहे. कुठला ही गुंता नाही. तरी देखील तुम्हाला धोकादायक वाटत असेल तर मग सावधच रहा. हा का ना का!! === घाबरु नका, तुम्हाला फक्त मिपावरच जोडे बसवणार आहोत. === Gentle reminder -व्याख्या सांगणार होतात. ती एकदा फिक्स झाली की आशा प्रकारच्या प्रतिसादांचा योग्य समाचार घेता येईल.

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/24/2019 - 13:48
" घाबरु नका, तुम्हाला फक्त मिपावरच जोडे बसवणार आहोत. " हे वाचून जाम टरकलो होतो , पण तुम्ही फक्त मिपावर जोड़े बसवन्यात पटाईत आहात हे वाचून जरा हायसे वाटले . कस आहे की कौटुम्बिक पार्श्वभूमी पण तुमच्या सारखी राजकीय पार्श्वभूमी नसलेला गरीब भोळा आहे मी !!!!!!! हळूहळू संयम सुटायला लागला बरका !! संभाळा , काळजी घ्या , निवडणूक जवळ आली आहे अजुन आपल्याला खुप कामे करायची आहेत . मी कस्पटा समान आहे हो ! मला घाबरीवीण्यात कशाला तुमची शक्ति वाया घालवता = ) ' जोडे मारीन , डोक फॉर्मेट करून घ्या ' हे दम देण्याचे नवीन प्रकार खतरनाक होते बर का !!!

In reply to by विशुमित

डँबिस००७ Sat, 02/23/2019 - 20:14
देउन, देउन काय दिला ? तर लोकसत्त्येतला अग्रलेख !!! श्रीमोदीजींच्या अथक प्रयत्नामुळे भारत पुर्वी सारखा फक्त सौदी अरेबियावर अवलंबुन नाहीय ! भारताला लागणार्या एकुण खनिज तेलातील फक्त १६-२०% क्रुड तेल हे सौदी मधुन येत ! अमेरिकेकडुन खनिज तेल विकत घेणारा भारत हा पहिला देश आहे ! त्याच बरोबर अमेरिकेच्या नाकावर टिच्चुन ईराण कडुनही तेल भारत विकत घेत आहे ! सौदीची आराम्को कंपनी भारतात ४४ बिलीयन डॉ चा निवेश करुन जगातली सर्वात मोठी रिफायनेरी उभारणार आहे !! ह्या प्रकल्पासाठी भुमि अधिग्रहण करण्यात आलेल आहे !!

In reply to by डँबिस००७

विशुमित Sun, 02/24/2019 - 00:16
अवलंबून नाही तर मिठ्या का मारत होते? === बाकी माझा विषय हा होता की declared भक्तांना मुसलमानांचे वावडे आहे , पण त्यांचे साहेब करकचून मिठ्या काय मारत आहेत, बिरयानी काय झोडत आहेत. === माझ्या मते पुरोगाम्याना इकडून तिकडे उड्या मारायला भरपूर मुभा आहे पण प्रतिगाम्यांच लय अवघड जागेचं दुखणं आहे. असो. आपले श्री श्री श्री उत्तम काम करत आहेत. 007 आप आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

In reply to by विशुमित

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 10:31
अवलंबून नाही तर मिठ्या का मारत होते? फायदा असे पर्यंत जी हुजुरी करायची फायदा संपला की लगेच डंप करायच ही कॉंग्रेसची नीती आहे !! ईजराईलला सोडुन पॅलेस्टाईन सारख्या अतिरेकी संघटनेला ईतकी वर्षे कॉंग्रेस गोंजारत होती पण ईजराईल सारखा खरा मित्र वाजपेयीनी मिळवुन दिला !! आज श्री मोदीजींमुळे ईजराईल व पॅलेस्टाईन दोघेही भारताचे मित्र आहेत तर अफघाणिस्तानचे प्रेसिडेंट श्री मोदीजींच्या स्वागताच्या ट्विट मध्ये म्हणतात "Welcome Home Mr Modi " आज पुलवामा घटनेनंतर अफघाणी लोक भारताच्या दुःखात मनापासुन सहभाग व्यक्त करत आहेत ! सौदी प्रिंस पाकीस्तानात गेलेले असताना १० बिलीयन डॉ चे MOU साईन केले त्यावेळेला पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सौदी मंत्र्यांना विचारल की हा पैसा कधी मिळेल !! त्यावर सौदी मंत्र्यांनी सांगीतल की आत फक्त MOU झालाय अजुन फिजीबिलीटी स्टडी सारखे सोपस्कार व्हायचे आहेत ! हे सर्व सुरळीत झाल्यास दोन वर्षांनी सौदी Invest करेल !! श्री मोदीजींमुळे पाकीस्तान हातात भिकेचा वाडगा घेउन दारोदारी फिरण्यास मजबुर झालेला आहे ! पाकिस्तानला आज कोणीही पैश्याची मदत करत नाही !! अमेरिकेसाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानशी अमेरिकेबरोबर युद्ध केल.पाकिस्तानच्या मते त्यांचा हक्कचा पैसा अमेरिकेने नाकारलेला आहे !!अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला पैसे द्यायला नकार दिलेला आहे. अमेरिकेच्या पैश्यावर पाकिस्तानत अतिरेकी पोसला गेलेला आहे. आज पाकिस्तानला जगात फक्त श्री मोदीजींनी खडसावलेल आहे !! एकीकडे सौदी पाकिस्तानात १० बिलियन डॉ चा MOU करते तर दुसरीकडे 44 बिलीयन डॉ खर्च करुन सौदी भारतात जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारत आहे !! त्या साठी क्रुड तेल सौदीच देणार आहे ! ईतकी मोठी रिफायनरी स्वतः सौदी मध्ये पण नाही !! श्रीमोदीजी जे देशासाठी करत आहेत त्यामध्ये आम्ही खुष आहोत !! तुम्हाला बिर्यानी खाण्यात प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम !!

In reply to by विशुमित

भंकस बाबा Mon, 02/25/2019 - 09:45
जगाच्या राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतात, सौदी असो, अमीरात असो वा ईरान असो वा ओमेन असो या सर्वाना आपले खनिज तेल विकण्याची गरज आहे. यांची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून आहे. येणारा काळ हळूहळू खनिज तेलाची गरज कमी करणारा आहे. इथे एक चूक ह्या तेलउत्पादक देशाना त्यांच्या ग्राहकापासुन दूर घेऊन जाईल. चीन व भारत हे जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारे देश आहेत. याच कारणामुळे सौदीसारखा इस्लामी प्रसार करणारा देश चीनसारख्या देशाबरोबर व्यापारिक संबध चांगले ठेउ इच्छितो, जो चीन उघर मुसलमानाना ठेचत आहे. उलट परिस्थिति आपल्याकडे पण आहे. पेट्रोलचे भाव वाढले की आंतरराष्ट्रीय समस्या वेगेरे बाजूला ठेऊन सरकारला शिव्या दिल्या जातात. अशा वेळी आपण जर दुरचा विचार करून या संधिचा फायदा उठवला तर गैर क़ाय?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

इरसाल गुरुवार, 02/28/2019 - 16:59
ते मनमोहन आणी अनुपम ना जावुन विचारा

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 23:31
आंतरराष्ट्रिय न्यायालयात भारताला भारतीय पत्रकारांमुळे जोरदार झटका ! पाकिस्तानात अपहरण करुन भारताचा गुत्पहेर असल्याच्या खोट्या आरोपावर जेल मध्ये खितपत पडलेल्या कुलभुषण जाधव ची केस भारत आंतरराष्ट्रिय न्यायालयात लढत आहे !! मुळचा भारतीय नौदलातुन सेवानिवृृृत्त होउन कुलभुषण जाधव ईराण मध्ये आपल्या बिझनेस साठी गेलेला असताना ISI द्वारे त्याचे अपहरण करण्यात आले होते. कुलभुषण जाधववर गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे व कुलभुषण जाधवला फाशीची सजा सुनावलेली आहे !! आंतरराष्ट्रिय न्यायालयात भारताची बाजु कमकुवत करण्याच महान काम करण थापर नावाच्या तद्दन हलकट पत्रकाराने केलेले आहे !! ह्या थापरने लिहीलेल्या लेखाचा तसेच द वायर, द स्क्रोल सारख्या मिडियातील लेखाचा आधार घेत पाकिस्तानचे वकिल, कुलभुषण जाधवला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत !! ह्या कामात त्यांना यश येईल न येईल पण एका निर्दोष व्यक्तीला फासावर लटवण्याच काम मात्र करण थापर व त्याच्या सारख्या अर्बन नक्षल पत्रकारांकडुन झालेल आहे !! अर्बन नक्षली करण थापरला श्री मोदीजींनी गेले १० वर्षे वाळीत टाकले होते !! त्याचा राग करण थापरला आहे ! सरकारला दोष देण्यासाठी करण थापर ह्याने ह्या कुलभुषण यादव वर २०१७ मध्ये पहिला लेख लिहीला !! आपल्या लेखात त्याने लिहिले कि कुलभुषण यादव कडे दोन पासपोर्ट पाकिस्तानी लोकांना मिळाले होते. त्यातला एक पासपोर्ट कुलभुषण यादवच्या स्वतःच्या नावाचा तर दुसरा कोणी मुस्लिम माणसाच्या नावावर !! करण थापरने भारतीय पासपोर्ट अधिकार्यांना ह्या दुसर्या पासपोर्ट बद्यल चौकशी करुन खरच तो पासपोर्ट जाधवला दिला होता का हे सांगायला सांगितले होते. पासपोर्ट Office ने करण थापरला माहिती दिली नाही !! हे उघड करत ह्या लेखात करण थापरने सरकारला दोष दिला ! ह्या लेखाचा आधार घेत स्क्रोल सारख्या मिडीयाने भारतीय सरकारलाच दोषी ठरवल !! अश्या लेखाचा फायदा भारत सरकारवर निशाणा साधण्यासाठी पाकीस्तानी लोक नेहेमीच घेत आलेले आहेत !! अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावमधी करत एका निर्दोष माणसाला फाशी वर लटकवण्याच काम हे अर्बन नक्षली करत आहेत !!

गामा पैलवान गुरुवार, 02/21/2019 - 18:43
अर्वाच्य,
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.
अतिरेक्यांना न सोडल्याने जर निरपराध प्रवासी मेले असते तर तुम्हीच गळे काढले असते वाजपेयींच्या नावे. मात्र हे कबूल करायला हरकत नाही की वाजपेयी खुळचट इसम होता. ब्रजेश मिश्र या तद्दन काँग्रेसी अधिकाऱ्यास हे प्रकरण वाजपेयींनी हाताळायला दिलं. आ.न., -गा.पै.

ट्रम्प गुरुवार, 02/21/2019 - 19:10
कसले आले अभिव्यक्ति स्वातंत्र !!! पंडित नेहरू च्या भाची च्या नात्या तून जवळ चे ते थापर भाऊसाहेब लागतात त्या मुळे काँग्रेस च्या चपला उचलण्याचे काम ईमानइतबारे थापर साहेबांनी आयुष्यभर केले . काँग्रेस च्या काळात दिल्ली दरबारी मुख्य वर्तमान पत्राचे आणि वृतवाहिन्याचे संपादक पडीक असायचे आणि सरकारच्या निर्णयात लुड़बुड सुद्धा करायचे ( उदा : नीरा वाडिया प्रकरण ). अशाप्रकारे बदनाम असलेल्या पत्रकारांच्या टोळ्यानां कवडी ची ही किंमत मोदींनी दिलेली नाही त्यामुळे हे मूर्ख मोदींची वाट बिकट करण्यासाठी देशाचा , जवानाचां बळी देत आहेत . कुलभूषण जाधव आणि पुलवामा प्रकरणी यांची उठवळ पत्रकारिता प्रखरपणे दिसून आली . पुलवामा हल्ल्या चे वार्ताकंन करताना ( TOI आणि एन डी टीवी ) तो हल्लेखोर कीती निरागस होता !!! , कश्मीर चा हल्लेखोर तर त्याला पाकिस्तान जबाबदार कसा क़ाय ? अशी मुक्ताफळे उधळून पाकिस्तान ला मुजोर बनवीले . पाकिस्तान मधील प्रसार माध्यमे एन डी टीवी आणि TOI च्या दाखल्या ने भारतावर प्रतिहल्ले करत होती . भाजप आणि मोदीच्या द्वेषापाई पाकिस्तान ला मदत करतोय एवढि सुद्धा यांना अक्कल नाही .

धर्मराजमुटके गुरुवार, 02/21/2019 - 19:27
धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले तरी संपादकांना विनंती आहे की आता राजकीय विषयावरचे धागे पुरे ! काही दिवस मिपावर राजकीय धाग्यांना बंदी करावी. मिपाच्या इतिहासात झाले नव्हते तेव्हढे वाचकांचे / प्रतिसादकांचे ध्रुविकरण ह्या धाग्यांमुळे होत आहे. आपण इथे ह्या छोट्याश्या प्लॅटफॉर्म वर खेळीमेळीने राहू शकत नाही तर एक देश म्हणून राहणे किती अवघड आहे ते लक्षात यावे ! आता मिपावर शाब्दिक मारामार्‍या करणारे रात्री एकत्र बसून श्रमपरिहार करत असतील तर भाग वेगळा !

In reply to by धर्मराजमुटके

थॉर माणूस Wed, 02/27/2019 - 23:58
अवास्तव अपेक्षा... उगाच असे काही होईल म्हणून आशा धरून बसू नका. दोन पैकी एक करा, मुक्काम हलवा किंवा फक्त निवडक धाग्यांवर वाचनमात्र यायचा प्रयत्न करा. अवघड आहे, पण इलाज नाही. निदान निवडणूका संपेपर्यंत तरी ही धूळवड संपणार नाही (असे मला २०१४ ला पण वाटलेले, दुर्दैवाने चुकीचे ठरले).

ट्रम्प गुरुवार, 02/21/2019 - 23:03
मिपावरील आपल्या जेष्ठपणाला मान देवून मी नम्रपणे सांगू इच्छितो की राजकीय धाग्या वर फेरफटका मारून आपला वेळ वाया घालवु नये !! राजकीय विषयावरील चर्चा होत असताना थोडीफर चिखलफेक होत असतेच , त्यात भाग घ्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . मिपावर कोणीही कितीही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी होवू शकणार नाही कारण प्रत्येकाच्या मनातील तसबीरी वेगळ्या आहेत . प्रतिसाद देणारे कमी असले तरी वाचनसंख्ये वरुन धाग्याची रेटिंग समजते , त्यामुळे संपादकानीं अचारसंहिता लावून राजकीय धागे चालू ठेवावे अस मला वाटते .

In reply to by ट्रम्प

विशुमित Fri, 02/22/2019 - 16:16
तुम्ही व्याख्या सांगणार होतात ?? म्हणजे आम्हाला कशी गरज आहे ते सांगितले असते. === अगाध फेक ज्ञानाने तुम्ही तुमच्या साहेबांच्या वाटचालीचा बट्याबोळ कराल. थोडे जपून.!

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 14:43
भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत आय सी आय सी आय बँकेची सी ई ओ पदी विराजमान असलेल्या चंदा कोचर ह्यानी बर्याच लोकांना / कंपनीना लोन देत स्वतःच्या नवर्याला त्या बदल्यात कमिशन देत होत्या , अस सी बी आय च्या तपासणीत दिसुन आलेल होत. त्या बद्दल चंदा कोचरसाठी सी बी आय ने लुक आऊट / शोध मोहीम सुरु केलेली आहे . भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत काँग्रेसच्या आशिर्वादाने बँका कर्ज वाटत होत्या, कंपन्या कर्ज घेत होत्या ! त्या कर्जावर भ्रष्ट काँग्रेसवाले कमिशन खात होते ! https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/cbi-issues-lookout-circular-against-chanda-kochhar/articleshow/68105068.cms

Blackcat Fri, 02/22/2019 - 15:21
सेउल शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 16:35
कारावान मॅगझीन नावाच्या कॉंग्रेसच्या पत्रीकाने पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या जाती विश्लेषण करण्याच घ्रृृृणित काम केलेल आहे ! पुर्ण ४४ शहीद लोकांत ८ सैनिक (२०%) जनरल कॅटेगरीचे होते, तर ईतर मागास वर्गाचे होते !! मागास वर्गिय लोक फक्त मरण्यासाठी !! असा दावा कारावानच्या ह्या लेखाचा लेखक एझाज अश्रफ याने केला आहे !! कॉंग्रेसने देशाला जाती जमातीमध्ये अडकवुन देशात दंगे करवण्याच्या प्रयत्नात असे केलेल आहे !! caravanmagazine.in/caste/urban-upper-castes-driving-hindutva-nationalism-little-representation-pulwama-jawans

In reply to by डँबिस००७

Blackcat Fri, 02/22/2019 - 17:38
पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला , म्हणून मेसेजेस फिरवतात ना ? मग सैन्यात जात कोणती , हे फिरवले तर बिघडले कुठे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 18:04
पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला , म्हणून मेसेजेस फिरवणारे आणी आता सैनिकांची जात काढणारे सुद्धा कॉंग्रेजीच देशाला जातीत वाटण्याच काम ह्या भ्रष्ट कॉंग्रेजीनेच केलेल आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

इरसाल गुरुवार, 02/28/2019 - 17:00
ते मनुला जावुन विचारा

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Mon, 02/25/2019 - 10:38
मोगा खान एकाने गाय मारली म्हणून मी वासरू मारले अशा तर्हेचा भंपक युक्तिवाद आहे हा. मुळात "पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला" हा वादच चुकीचा आहे आणि तसे पसरवणारे सुद्धा चुकीचे आहेत. आणि तुमचा युक्तिवाद तर अगदीच लंगडा आहे. कारण नागरी जीवनासारखे लष्करात जाती धर्म पंथ यासाठी कोणतेही आरक्षण नाही आणि सर्वाना नियम सारखेच आहेत. तेंव्हा हुतात्मा झालेल्या जवानांची जात काढणे हा अत्यंत नालायकपणाचा प्रकार पत्रकारांनी केला आहे. आणि त्याला तुम्ही समर्थन देत आहात हि अंतर अत्यंत क्षुद्र पातळी आहे.

In reply to by डँबिस००७

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 18:31
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला पाकिस्तानने दिलेला आहे !! कॉंग्रेसला देशद्रोही कारवाया करण्यात काय आनंद येतो देव जाणे ??

In reply to by डँबिस००७

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 18:33
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला पाकिस्तानने दिलेला आहे !! कॉंग्रेसला देशद्रोही कारवाया करण्यात काय आनंद येतो देव जाणे ??

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 21:05
पाकिस्तान विरुदध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचीन्ह लावणार्या कॉँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचे हिरो जनरल हुडा यांनाच नॅशनल टास्क फोर्स चा हेड म्हणुन नियुक्त करुन सर्जिकल स्ट्राईक झाल्याची खुले आम कबुलीच दिलेली आहे !! गेल्या ६५ वर्षांत पाकिस्तान कडुन झालेल्या हल्ल्याचा फक्त तिव्र शब्दात निषेध करुन थकलेल्या भारतीय जनतेला पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करुन भाजपाने पहिल्यांदा आपण जिवंत असल्याची जाणिव करुन दिली होती !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Sat, 02/23/2019 - 00:05
लढाया सैन्य लढायचे.आपण वाटाघाटीच्या टेबलावर कमी पडायचो.असे मला वाटते.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Sat, 02/23/2019 - 00:06
लढाया सैन्य लढायचे.आपण वाटाघाटीच्या टेबलावर कमी पडायचो.असे मला वाटते.

डँबिस००७ Sat, 02/23/2019 - 00:12
काठीवाल्याने काठी टेकत टेकत दोन तरुण खांद्याच्या आधाराने ब्रिटीशांना देशाबाहेर हकलल म्हणे मग स्वातंत्र्या नंतर ती काठी काय तळघरात नेउन टाकली ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 21:46
सर्जिकल स्ट्राईक २ स्वातंत्र्यानंतर सुद्धा 65 वर्षे कॉंग्रेसवाल्यांना पाकिस्तानच नाव घेउन डायरेक्टली ब्लेम करायचा दम नव्हता ! शेजारील देश , सिमापारसे आ रहा है आतंकवाद वैगेरे बोलुन वेळ मारुन नेत होते ! देशाला अहिंसेच्या कपाटात बंद करुन काठी तळघरात टाकुन हाती आता बंदुक आली आहे !!

In reply to by गब्रिएल

ट्रम्प Sat, 02/23/2019 - 16:08
रागाने स्पंदना ला मीडिया प्रमुख म्हणून अपॉइंट करताना तिची बुद्धि बघितली असती तर बरे झाले असते , कारण स्पंदना ने रागाच्या ट्विटर वरुन मोदींवर केलेले सगळे हल्ले रागावरच बूमरैंग सारखे उलटले आहेत . पुलवामा मधील हल्ल्यानंतर रागा गुजरात मध्ये डांस करत असल्याचा विडिवो रागाच्याच ट्विटर प्रसिद्ध करून चूक लक्षात आल्यावर डिलीट करण्यात आला पण तो पर्यंत नेटकऱ्यानीं भरपूर शेअर केला . बर त्या नंतर तरी गप्प बसावे ना !! पण नाही , मोदींना बदनाम करण्यासाठी मोदींची 1 वाजता झालेली जंगल सफारी 5 वाजता झाली असे रागाच्या ट्विटर वरुन प्रसिद्ध केल्यावर नेटकऱ्यानीं न्यूज़चैनेल वर दाखवलेल्या मोदींच्या जंगलसफारी चे फुटेज ट्वीटर उपलोड करून उत्तर देवून तोंडघशी पडले .

वरील प्रतिसाद देणारे खफवर फिरकले नाहीत म्हणून तेच इकडे चिट्कवतोय. ----------------------- कमाल आहेत ना ? सगळ्यांची देशभक्ती फक्त कश्मीरमध्ये जेव्हा जवान पाक दहशतवादी लोकांकडुन मारले जातात तेव्हाच उफाळून येते. मिपावर सुध्दा रणकंदन सुरू होते पण फक्त शत्रुराष्ट्राने किंवा काश्मिरी दहशतवाद्यांनी निंदनीय कृत्य केल्यावरच आपली राष्ट्रभावना खऱ्या अर्थाने एकवटते हे कसे? सगळीकडून मदतीचा ओघ सुरू होतो फक्त जवानांच्या कुटुंबीयांना . पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजवर ज्या संख्येने आपले जवान शहीद झाले आहेत त्याच्या कैक पट अधिक संख्येने नक्षलवाद्यांनी निमलष्करी वा अन्य जवानांना मारले आहे. आणि एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ?

गोंधळी Sun, 02/24/2019 - 12:07
एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ? सध्या आप्ल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे मोदीना डिफेंड केल जात आहे.

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 13:03
प्रमोद देर्देकर पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजवर ज्या संख्येने आपले जवान शहीद झाले आहेत त्याच्या कैक पट अधिक संख्येने नक्षलवाद्यांनी निमलष्करी वा अन्य जवानांना मारले आहे. आणि एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ? उगाच धार्मिक द्वेष वैगेरे ईथे आणु नका !! हल्लीच बस्तर मध्ये ७५ निमलष्करी वा अन्य जवानांना मारले होते तेंव्हा कम्युनिस्ट लोकांनी (ज्यात कन्हय्या कुमार सारखे अर्बन नक्षल लोक आहेत ) यांनी जल्लोश केलेला, मिठाया वाटलेल्या होत्या हे तुम्हाला दिसले नाही ? शत्रुराष्ट्राने किंवा काश्मिरी दहशतवाद्यांनी निंदनीय कृत्य केल्यावरच आपली राष्ट्रभावना खऱ्या अर्थाने एकवटते हे कसे? देशात अतिरेकी कारवाया करण्याचे मुख्य काम पाकिस्तानातील अतिरेकी संघटना, आय एस आय वैगेरे करतात, ईथले लोक त्या घटनेला सपोर्ट करणारे असतात. त्यामुळे देशातील जनतेला अश्या अतिरेकी घटनेत पाकिस्तानचा हात आहे हे स्पष्ट दिसत !! त्यामुळे जेंव्हा जेंव्हा भारताच्या सैनिकांचा जीव ह्या पाकिस्तानातील अतिरेक्यांनी घेतलेला आहे त्या त्या वेळेला जनतेच्या भावना उफाळुन येतात. शेवटी मरणारे सैनिक हे जनते मधुनच असतात. आक्रोश व्यक्त करणारे भारतातले मुसलमान सुद्धा असतात

In reply to by डँबिस००७

तुम्ही पुनः पुनः पाकी ना का मध्ये आणता ? आता नक्षल लोकांस पण पाक मदत करतो असं नाही म्हणत असाल तर आपला पास .

In reply to by प्रमोद देर्देकर

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 21:48
तुम्ही पुनः पुनः पाकी ना का मध्ये आणता ? पुन्हा पुन्हा पाकिस्तानला तर तुमच्या लाडक्या कॉंग्रेसनेच आता पर्यंत आणलेल आहे व ट्रेंड सुरु केलेला !! तुम्हाला काय म्हणायचय ? पाकिस्तान साधा सरळ देश आहे, ना कोणाच्या अध्यात ना मध्यात!! नक्षल लोकांना कोणाची मदत आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर खरच आमचा पासच !!

In reply to by डँबिस००७

झालं आता कॉंग्रस माझी हे ठरवून पण टाकलंत ? धन्य आहे . आणि माझे वाचन कमी आहे म्हणून कुतूहल म्हणून विचारलं तर ते बाजूलाच राहिलं . मी आयुष्यात कधीच कौन्रेसला मतदान केलेलं नाही हे समजून घ्या.

Blackcat Sun, 02/24/2019 - 17:32
पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे, भारताने सर्व पातळीवर पाकची कोंडी करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारत पाकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची ही चाल चांगलीच अंगलट आली आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार नाही असं म्हटलं आहे. याचसोबत विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढून घेतला आहे. जोपर्यंत भारत सरकार स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबद्दल आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. व्हिसा नाकारल्यानंतर पाकिस्तानी नेमबाजी संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तक्रार केली होती. यावर कारवाई करताना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या खेळाडूच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलं आहे. https://www.ndtv.com/india-news/olympic-body-punishes-india-for-declining-visas-to-pakistani-players-after-pulwama-1997470

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 17:50
पाकिस्तानचे परराष्ट्रिय मंत्री शाह महमुद कुरैशी यांना जपान च्या टोक्योमध्ये सरकारी काम होत. पण जपानच्या सरकारच्या आदेशावरुन त्यांना आपली जपान यात्रा कँसल करावी लागलेली आहे. जपान सरकार ने त्यांना पुलवामामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती निवळण्यासाठी काम करा अस सुनावलेल आहे !! https://youtu.be/kbZO9-X2t6Q अफघाणीस्तानने United Nations मध्ये पाकीस्तान विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे !! भारता प्रमाणे आम्हालाही पाकिस्तान कडुन त्रास होत आहे अस स विस्तर पत्र त्यांनी UN ला दिलेल आहे !! ये है श्री मोदीजीकी ताकद !!

In reply to by डँबिस००७

ट्रम्प Sun, 02/24/2019 - 20:29
कसले कौतुक करताय तुम्ही मोदींचे ? पाकिस्तान ला वठणी वर फक्त महाराष्ट्रातील सह्याद्रीच आणू शकतो . पाकिस्तान ला क़ाबूत आणने गरजे चे असल्या मुळे जगातील मुख्य देश प्रयत्न करत आहेत ही चांगली गोष्ठ आहे . खर म्हणजे पाकिस्तान च्या लष्कराला सरळ करणे गरजेचे आहे आणि हे काम पूर्वीच झाले असते ज्या वेळी निधड्या छातीचे महाराष्ट्राचे साहेब संरक्षण मंत्री होते !!! पण मैड़म नी केलेल्या पूर्वनियोजित कटामुळे साहेबांना महाराष्ट्रात परत यावे लागले , अन्यथा साहेबांनी त्याच वेळी पाकिस्तान ला सूता सारखे सरळ केले असते . आता त्या वेळी महाराष्ट्रात आल्यावर 1993 मधील त्यांच्या कालावधीत मुंबई मध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट झाले आणि ती कारक़िरद थोड़ी वादग्रस्त ठरली ही गोष्ठ वेगळी , पण आता ते नंतर कधी तरी .

Blackcat Sun, 02/24/2019 - 19:26
केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील ८ वरून एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gst-payable-for-under-construction-flat-will-be-now-5-affordable-housing-will-have-1-gst-rate-says-arun-jaitley-1846913/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 19:48
हि जिएसटी ची सवलत मोगा भाई रिजेक्ट करत आहे कारण ते मोदी भक्त नाहीत !! याचा निषेध म्हणुन घेतलेल्या घरावर मोगाभाई २४% GST भरतील !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Sun, 02/24/2019 - 20:09
मोघलांना शिव्या घातल्या तरी लाल किल्ल्याचा उपभोग घेताच ना ? ( लाल किल्ला , लाल देऊळ होते , असे पुस्तक कधी निघणार ? )

Blackcat Sun, 02/24/2019 - 20:15
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्यात आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेने दक्षिण तर भाजपने ईशान्य मुंबई जागेचा त्याग करावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी बोलताना केली. आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपची युती झाली आहे. ती समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. पण आगामी निवडणुकीत आरपीआयला सोडून जागा जिंकणे अशक्य आहे. कारण आजअखेर आरपीआयच्या मदतीमुळे सेना भाजपाच्या जागा निवडून आल्या आहेत, हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे. तसेच आमच्या विषयी कट करास्थान चालू आहे, असंही आठवले म्हणाले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अभ्या.. Sun, 02/24/2019 - 20:24
आमच्याविषयी चालुय कटकारस्थान आमच्याविषयी चालुय कट कारस्थान... . एकही जागा मिळाली नाही तर बंद पाडू पाकिस्तान . जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार. . कारण माझ्या मागे आहेत कार्यकर्ते फक्त चार.. . मा. रामदास आठवलेंना लढवायला जागा मिळालीच पाहिजे. शिवराय भीमराय शिवाय उपाय नाय.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 21:40
रामदास आठवले ह्यांच्या पक्षाबद्दल काळजी करण सोडा आणी उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जुनी म्हणुन भ्रम असलेल्या भ्रष्ट कॉंग्रेसला एकही सिट महागठबंधनने सोडलेली नाही ते बघा !! हळुहळु मोघलासारखीच नामशेष होउन जाईल कॉंग्रेस !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 23:18
मोघलाई संपल्याच दुःख तुम्ही उराशी बाळगुन आहात ना म्हणुन मोघलाई ! शेवटी कॉंग्रेसची जुलमी राजवटीच तुलना ही मोघलाई सारख्या धर्मद्वेष्ट्या जुलमी राजवटी बरोबरच करता येईल!!

ट्रेड मार्क Sun, 02/24/2019 - 23:58
कोलकातामधील गौरव दत्त या निवृत्त IPS अधिकाऱ्याने मनगटाची नास कापून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये सरळसरळ ममता बॅनर्जी यांचे नाव लिहून म्हणले आहे की त्यांच्या मृत्यूला ममता बॅनर्जीना जबाबदार धरले जावे. ममतांनी गौरव दत्त यांना १० वर्ष त्रास दिला, २ खोट्या केस मध्ये गुंतवले आणि नंतर ७२ लाखांचे निवृत्तीवेतन अडकवून ठेवले. यावर कुठल्या पुरोगाम्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये, ना कोणी प्लॅकार्ड घेऊन व्हिडीओ व्हायरल केला ना ध्रुव राठी, विनोद दुआ, सागरिका, राजदीप वगैरे पत्रकारांनी कुठला निषेध केला. फेब्रुवारी १९ ला आत्महत्या केली त्याची बातमी इंडिया टुडे मध्ये फेब्रुवारी २३ ला आली. तर टाइम्स ऑफ इंडियाने २० ला "IPS Officer passess away" अशी बातमी दिली. हेच रोहित वेमुलाची आत्महत्या आठवत असेल तर त्याने चिठ्ठीत "माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये" असं लिहूनही स्मृती इराणी आणि मोदींनी प्रत्यक्ष स्वतः रोहित वेमुलाला फाशी घ्यायला लावली असा आरडाओरडा किती महिने चालला.

डँबिस००७ Mon, 02/25/2019 - 19:28
Modi inagurated National War Memorial !! कित्येक दशकांची नॅशनल वॉर मेमोरियलची मागणी अखेर पुर्ण !! गेल्या ६५ वर्षांत नेहरु गांधी चे मेमोरिअल देशात सर्वत्र बनवले गेले ! विमानतळापासुन वाचनालया पर्यंत सर्व वास्तुना नाव फक्त गांधी परिवारातल्या सदस्यांच किंवा नेहरुच दिल गेल !! श्री मोदीजींच्या अटल निश्चया मुळे जागतीक स्तरावरच अत्याधुनिक नॅशनल वॉर मेमोरिअल आज दिल्लीत साकार झाल!! PM inaugurates National War Memorial, slams previous govts for putting family first

ट्रम्प Mon, 02/25/2019 - 19:56
गांधी परिवार होता म्हणून भारताचा विकास झाला , नाहीतर बसले असते अजुन जंगलातील कंदमुळे खात !!! त्यामुळे त्यांचा इतके वर्षे देशाची निरपेक्ष सेवा केल्यावर त्यांचा हक्कच बनतो !!! या देशसेवी , देशप्रेमी कुटुंबावर भ्रष्टाचार चे आरोप करून भाजप सत्तेवर आली पण आता पर्यंन्त एक तरी गुन्हा सिद्ध झाला आहे का ? मग कशाला उगीचच बदनामी केली त्यांची ? इथ महाराष्ट्रात पण तसेच सारख त्या दादा ला ढोस !!! काढू का फाइल ? काढू का फाइल ? अस करीत करित 5 वर्ष बिचाऱ्या दादाला तालुक्यात जेरबंद करून टाकल ! आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक शासकिय वस्तु , पुल , विमानतळ , अवार्ड्स ला महान परिवारचे नाव नाही द्यायचे मग क़ाय अंबेडकर , बोस , पटेल , पवार , आठवले , राणे यांची नावे द्यायची ?

In reply to by mayu4u

सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 10:39
हल्ल्यासाठी बारा विमाने गेली होती यातील चार विमाने जर प्रतिहल्ल्यापासून संरक्षण (escort/CLOSE SUPPORT) म्हणून गेलीअसे गृहीत धरले तर उरलेली ८ विमाने बॉम्ब घेऊन गेली असावी. या विमानांची एकंदर १०,००० किलो अतिरिक्त वजनाची शस्त्रे/ अस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता आहे. म्हणजे प्रत्येक विमानाने साधारण १००० किलो (खरं तर २००० पौंडाचा) एक बॉम्ब नव्हे तर कमीत कमी ७-८ बॉम्ब तरी टाकले असतील म्हणजे हे साधारण ५०-६० बॉम्ब तरी टाकले गेले असतील ( हा माझा अंदाज आहे) हा PGM २००० (PRECISION GUIDED MUNITION) म्हणजे अचूक मारा करणारा लेसर गाईडेड बॉम्ब आहे. अधिक माहितीसाठी https://defence.pk/pdf/threads/laser-guided-bombs.107870/

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 10:50
https://www.youtube.com/watch?v=z6u-4cL1Czs लेसर बॉम्बची अचूकता दाखवणारा व्हीडीओ आहे. यात मिराज २००० आणि सुखोई ३० दोन्ही विमाने मारा करताना दाखवली आहेत.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 10:55
चकोठी मुझफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहेत पण बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये नसून पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आहे. म्हणजे घरात घुसून मारल्याचा दावा खरा आहे.

अभ्या.. Tue, 02/26/2019 - 11:32
च्यायला ह्या पाकिस्तान मिडीयाच्या दलिंदरीचा नमुना. काय सांगायचं तेही सांगता येत नाही. अशीच कंडीशन करुन ठेवली पाहिजे त्या इम्रान आणि त्याच्या मिडीयाची. जन्मदरिद्री, कर्मदरिद्री, अष्टदरिद्री पाकिस्तानला असंच तोंड दाबून पिसाळल्या कुत्र्यागत हाणलं पाहिजे.

In reply to by यशोधरा

शाम भागवत Tue, 02/26/2019 - 12:14
आज नेहमीच्या पोस्टींना सुट्टी. आज सगळ्यांनाच सैन्यदलाचा अभिमान वाटत असणार. मिपाकरांच्या भारतावरच्या प्रेमाची मला बिलकूल शंका नाही. फक्त कोणत्या मार्गाने भारताचे भले करावे याबाबत मतभिन्नता आहे.

In reply to by mayu4u

विशुमित Tue, 02/26/2019 - 12:56
सैन्याच्या पराक्रमाचा राजकीय फायदा घेवून द्यायचा नाही, असा त्यांचा होरा असावा. पण इथे विरोधक म्हणजे नक्की कोण, हे क्लियर नाही झाले माझे??

In reply to by विशुमित

mayu4u Tue, 02/26/2019 - 21:15
साध्या-सोप्या गोष्टी पण काही जणांना नाही कळत. काँग्रेस चं अध्यक्षपद मिळू शकेल तुम्हाला.

प्रसाद_१९८२ Tue, 02/26/2019 - 12:51
गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सरकारकडून मागणार्‍या सर्व विरोधकांनी, आज सरकारचे अभिनंदन न करता फक्त वायुसेनेच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. --

In reply to by प्रसाद_१९८२

विशुमित Tue, 02/26/2019 - 13:01
भावकी उण्याची वाटेकरी, अन् दुसरं काय !! असेच असते. जाऊ ध्या, आपण सगळ्यांनी सगळ्यांच अभिनंदन करू. काय म्हणताय??

In reply to by प्रसाद_१९८२

ट्रम्प Tue, 02/26/2019 - 16:00
चालतय की !!! भाजप च्या टांगा ओढ़त बसण्याची ही वेळ नाही आणि वायुसेना चे अभिनंदन करण्या इतपत शाहणपण युवराज मध्ये आलय हे कमी नाही .

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क Wed, 02/27/2019 - 03:02
युवराज आणि इतर सगळेच विरोधक अजून धक्क्यातून सावरायचे आहेत. एकदा सावरले की मग विरोधकांच्या खऱ्या प्रतिक्रिया येऊ लागतील, उदा. - - पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे हा हल्ला अयशस्वी झाला आहे. - किती अतिरेकी मेले याचा काहीच पुरावा नाही. एकदा ० पासून ते ३०० पर्यंत काहीही सांगितला जातोय, यावर कसा विश्वास ठेवायचा? - यात मोदींनी काहीच केलं नाही. - हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला. - मोदी या हल्ल्याचा राजनैतिक फायद्यासाठी वापर करणार/ करत आहेत. - आमच्या काळातही आम्ही असे अनेक हल्ले घडवून आणले, पण आम्ही जाहिरात नाही केली. यातले काही हल्ले एवढे गुपचूप केले की सैन्याला सुद्धा कळले नाहीत. - LoC असे उल्लंघन करणे हे एखाद्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे, इम्रान खानने बोलून प्रश्न सोडवू अशी साद घालूनही लगेच हा हल्ला करण्याचे कारण काय? - हल्ला झाला तेव्हा मोदी आपल्या XX लाखांच्या किंग साईझ बेड वर एसी चे तापमान १८ करून काश्मिरी रजई घेऊन घोरत होते. - १३ दिवस थांबण्याचं काय कारण होतं? या दिवसात सगळ्या विरोधकांनी आणि जनतेने दबाव आणला म्हणून मोदींना काहीतरी कारवाई करायला लागली. पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे मुद्दामून फार नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. - हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो. - आणि शेवटची पण खतरनाक: निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मोदी, शहा, डोवाल, आरएसएस यांनी मुद्दामून पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आता जंगलात बॉम्ब टाकून अतिरेकी तळ उध्वस्त केले म्हणून खोटा प्रचार करत आहेत.

तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 15:17
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्व आणि मागच्या नेतृत्वाने करून ठेवलेल्या चांगल्या गोष्टींसाठी अभिनंदन !

डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 17:38
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्त्वाचे अभिनंदन ! उरीच्या , पुलवामाच्या वेळेला काही लोकांनी डायरेक्ट अजित डोव्हाल, पंत प्रधान यांच्या बद्दलच प्रश्न प्रस्थापित केलेले की ते असताना असे हल्ले कसे काय होतात ? त्या सर्वांना आता उत्तर मिळाले असेल !! पलिकडे मायबोलीवर सदा न कदा भाजपा, आर एस एस, मोदी विरुद्द दर दिवशी पान अन पान लिहीणारे हात आज फ्रोजन झालेले आहेत. अड्यावर आज आता पर्यंत एक ओळ सुद्धा उमटलेली नाही ! ;-)

In reply to by डँबिस००७

तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 17:54
थोडा धीर धरा. मायबोली काय किंवा मिपा काय, सगळीकडे आडवी जाणारी काळी मांजरे आहेतच.चार आठ दिवस जाऊ द्या, मग कळेल.

In reply to by तेजस आठवले

सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 18:57
पडद्यामागचे कलाकार -- आज भारतीय वायू सेनेच्या वैमानिकांच्या कौतुक होत असताना वैमानिकांच्या नेतृत्वाबद्दल कोणतीही शंका न बाळगता त्यांच्या बरोबर त्यांचे हात बळकट करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांबद्दल पण आपण कृतज्ञ राहीले पाहिजे. १) गुप्तचर यंत्रणा-- पुलवामाचा हल्ला झालाच कसा? गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या? हे उच्चरवाने विचारणाऱ्या आरामखुर्चीत विचारवंतांनि हे समजून घेतले पाहिजे कि आज झालेल्या हल्ल्यातील( तसेच उडी जवळ झालेल्या हल्ल्यातील) दहशतवाद्यांच्या तळाची अचूक माहिती हि लष्कराला पुरवण्याचे काम याच यंत्रणेने केलेले आहे. या माहितीवरच या हल्ल्याची तयारी आणि प्रत्यक्ष कार्यवाही करता आली. २) आकाशातील तिसरा नेत्र पुरवण्याचे काम करणारे इसरो चे आणि इतर अनेक सरकारी यंत्रणांचे शास्त्रज्ञ. यांनी निर्मिती केलेल्या उपग्रहातून मिळणाऱ्या माहिती नुसार आणि त्यांनी पुरवलेल्या संदेश वहनप्रणालीमुळे वायुदलाच्या काम सोपे झाले. https://en.wikipedia.org/wiki/RISAT-2 https://www.indiatoday.in/science/story/isro-launches-communication-satellite-gsat-7a-1412861-2018-12-19 वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा

In reply to by सुबोध खरे

ट्रेड मार्क Wed, 02/27/2019 - 02:40
निर्णय घेणाऱ्यांपासून ते प्रत्यक्ष कारवाई करणारे तसेच त्यांना पडद्याआडून साथ देणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा. आज असल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्यांना खरी श्रद्धांजली वाहिली गेली.

तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 20:17
चीनची काही प्रतिक्रिया ? चीनचीच जास्त भीती आहे खरं तर. राहून राहून असं वाटतंय की जर्जर झालेल्या पाकिस्तानला उचकावुन आणि मोक्याच्या क्षणाला त्यांची साथ सोडून देऊन चीन योग्य क्षणांची वाट पाहील आणि पाकिस्तानचा खऱ्या अर्थाने घास घेईल.आपल्या हातात फारसे काही पडणार नाही.

ट्रम्प Tue, 02/26/2019 - 22:01
माहित नाही भविष्यात पाकिस्तान क़ाय प्रत्युत्तर देईल , पण पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणाऱ्या सगळ्या रथी महारथी नां हादरा नक्की बसला आहे . कित्तेक जण अजूण त्या धकक्यातून सावरले नसल्या मुळे मीडिया ला चुकवत आहेत

डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 22:11
सर्जिकल स्ट्राईक २ च्या मागे २०० तासाची प्लॅनिंग होती !! वेगवेगळ्या विमानतळावरुन एकाच वेळेला अनेक फायटर प्लेन्सनी आकाशात झेप घेतली !! ही विमाने वेगवेगळ्या दिशेने गेली त्यामुळे पाकिस्तानात रडारवर नजर ठेउन असलेल्या डिफेंस टिमला लक्षात येण्याच्या आत १२ मिराज विमानांनी आपल फॉर्मेशन बनवल आणि LOC जवळ पोहोचले ! भारताच्या ह्या विमानांनी आपली जवाबदारी पुर्ण करुन परत असताना पाकिस्तानच्या F-16 नी वाट अडवायचा प्रयत्न केला पण १२ मिराज विमानांचा ताफा बघितल्यावर F-16 परत गेले !!

इरसाल Wed, 02/27/2019 - 03:42
इथे काहि नमुने आहेत चांगल केल त्याला चांगल तर म्हणत नाहित वर नाक कापुन अवलक्षण करत आहेत दळभद्रि लेकाचे

गामा पैलवान Fri, 03/01/2019 - 18:35
नगरीनिरंजन,
माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची
द्वेषाचं राजकारण खेळायचंहोतं तर मोदींनी दंगली अवघ्या ७२ तासांत कशा काय आटोक्यात आणल्या? गुजरात दंगलींचा पूर्वेतिहास पाहता दंगली किमान आठवडाभर तरी चालायला हव्या होत्या ना? १९६९ च्या दंगली सप्टेंबर-ऑक्टोबर अशा चालू होत्या. १९८५ च्या दंगली तर चक्क ८ महिने (फेब्रुवारी ते ऑक्टोबर) चालू होत्या. पण ३ दिवसांत आटोक्यात आणणारे मोदी मात्र मुस्लिमद्वेष्टे! तुम्हाला काय वाटतं खरं सांगा, मोदी जर खरोखर मुस्लिमद्वेष्टे असते तर गुजरातच्या २६ च्या २६ लोकसभा जागा भाजपला कशा मिळाल्या असत्या? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाप्पू Fri, 03/01/2019 - 20:02
गा मा जी.. एकदम बरोबर.. सुप्रीम कोर्ट, SIT, CBI इ सर्वांनी पूर्ण चौकशी करून.. जरी मोदीजींना निर्दोष ठरवले असले तरी यांच्या डोक्यातून 2002 जाणार नाही. ज्या पद्धतशीर पणे मोदिंना विनाकारण बदनाम केले गेले आणि अजूनही करतायेत ते निश्चितच चिंताजनक आहे.. पण याउलट खांग्रेस चे जे जे मान्यवर आज जामिनावर फिरतायेत ते कोणतीही चौकशी होण्याआधीच *निर्दोष * असतात. आणि बरेच मान्यवर चौकशी न होता निर्दोष म्हणून मेले.. नंतर त्यांना भारतरत्न दिले गेले आणि गल्ली ते दिल्ली स्मारके बांधली गेली..

In reply to by बाप्पू

नगरीनिरंजन Sat, 03/02/2019 - 05:55
निर्दोष व निरागस ते आहेतच हो, पण प्रेते इकडून तिकडे नेणे गुन्हा नाहीय ना; त्यामुळे त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे. प्रेते अहमदाबादला नेली गेली ह्यात दुमत नाही. त्यात मोदी दोषी किंवा निर्दोष असण्याचा प्रश्न कुठे येतो? शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे. थंड घ्या. द्वेषाचे राजकारण करायला स्वतः हिंसाचाराचे दोषी असावे लागत नाही.

In reply to by नगरीनिरंजन

डँबिस००७ Sat, 03/02/2019 - 13:19
शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे फरक ईथेच आहे, भारताचा पहीला भारत रत्न नेहरुंना मिळालेला होता , नव्हे तो त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेला होता. भारत रत्न पंत प्रधानांकडुन प्रस्तावित होत असतो. नेहरूंना भारत रत्न मिळताना ते स्वतःच भारताचे पहीले पंत प्रधान होते !! श्री मोदीजींना भारत रत्न मिळेलच, शंकाच नाही !! पण तो त्यांच्या पंत प्रधान पदी असताना नाही तर त्यांच्या नंतर येणार्या पंत प्रधानाला द्यावा लागेल.