परिणती असो वा नियती
पानगळीत पाने गळती
पण, झाड उन्मळून पडता
हा दोष कुणाच्या माथी?
बहरून सळसळणारे
झाड आपुल्या ताली
जमिनीवर पडते तेव्हा
ना त्याला उरतो वाली
कोमेजून करपून जातील
कोवळी फुले त्यावरची
वेळीच छाटणी करवून
रूजवात करा फुटव्यांची
वादळ नवे येण्यापूर्वी
मोकळ्या करा पखाली
रूजणाऱ्या अंकुरांना
घ्या मायेच्या हाताखाली
- संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7454
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेविषयी काही...
खरंय.
++++++++++++1111111111111
In reply to खरंय. by राघव
+ १
In reply to खरंय. by राघव
आपल्या काळजाचे आपणच माळी ,छान
कविता आवडली
सुरेख एकदम
भावना पोचल्या
भारी...
कविता आवडली.
वा !
रूजणाऱ्या अंकुरांना
चांदणे ते चांदणे कविता
विशिष्ट पार्श्वभूमि असलेली कविता भावली.