>>जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर विजय मिळवलेला आहे असा इतिहास >>आहे. तेव्हा हे भीषण संकट लवकरच टळेल आणि जगाची घडी सावरेल असा विश्वास वाटतो.
आमेन!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
देवा शपथ चहा पिताना हेच आकडे डोक्यात जमा झाले होते.. व प्रतिसाद लिहणारच होतो ;)
३००० तर नाही पण ८००० पर्यंत नक्कीच !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
पुनरपि जननम् पुनरपि मरणम्
सर्व संचयाचा अंत क्षयात, संयोगाचा वियोगात, उन्नतिचा पतनात, जन्माचा मृत्युत होत असतो.
हे लक्षात ठेवले की प्रत्येक दिवस नवीन असतो अन आयुष्य तटस्थपणे निवांत जगता येते.
गर्दित असुन एकांत अन गोंगाट असुन शांतता लाभते.
बदल बदल बदल
सुरक्षितता असणे हीच फार मोठी असुरक्षितता असते ... पण फारच थोडे हे जाणतात.
जे जाणतात ते पार होतात.
भवसागर फार खोल नाही .. फक्त कमरेएवढाच आहे... तो काळा २८ युगांपासुन सांगतोय .. पण कोणी ऐकत नाही.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...
असहमत ....५५००/६५०० सेन्सेक्स नक्की येणार.अमेरिका व युरोप मधील मंदी निदान ५ वर्षे तरी राहणार. आपण मंदीतुन २०१० नंतर बाहेर पडु.सर्वात मोठा फटका आयटी कंपन्याना बसणार.
वेताळ
भारतीय शेअरबाजारासंदर्भात नाही पण अमेरिकन शेअरबाजारासंदर्भात आजच्या न्यू यॉर्क टाइम्स मधील वॉरेन बफे चा "Buy American. I Am. "लेख वाचनीय आहे.
मला वाटते तो भारतीय अवस्थेस पण लागू आहे. विचार करा हर्षद मेहता आणि केतन पारेख (मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यावरचे) येऊन गेले, त्यांनी वादळे आणली पण नंतर मार्केट खालीच राहीले का वर गेले? कितीही गोंधळ झाला असला तरी माझा आपल्या अर्थव्यवस्थेवर पण विश्वास आहे! :-)
असो. वरील लेखातील आवडलेले वाक्य : Be fearful when others are greedy, and be greedy when others are fearful.
मी वाचला हा लेख.... एकदम भन्नाट आहे.
अर्थव्यवस्था ही वर खाली होतच राहते... सध्याची परिस्थिती बिकट आहे हे खरे. पण वॉरेन बफेट साहेबांनी यापूर्वीही अशा भयानक परिस्थितीतून आपण गेलो आहोत याची जाणीव करुन दिली आहे. आणि गंमतीने असेही या लेखात म्हटले आहे की फक्त त्यांनीच या परिस्थितीत बाजारातील गुंतवणुक चालू ठेवली तर १००% समभागांची मालकी त्यांच्याकडेच येईल....
असो.. मुद्दा इतकाच की या ही परिस्थितीतून आपण बाहेर येऊ हा आत्मविश्वास या धनाढ्य व्यावसायिकाला नक्कीच आहे.
तेव्हा आपल्यासारखे सामान्य आशावादी तर नक्कीच परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा करु शकतात. :)
तेव्हा चिंता नको. सेन्सेक्स ९५०० ला जाईन ... ३००० ला जाईन.... परत २०,००० ला जाईन. ५०,००० ला पण जाईन
जरा कळ काढा हो मित्रांनो.....
५ वर्षांनी तर नक्की फायद्याच्या पायर्या सापडायला सुरुवात होईल :)
(जय शेअर बाजार) - सागर
भारतातील खाजगी कंपन्यात नौकरी करणार्या लोकांची स्थिती काय असेल? २००१/२ मध्ये बर्याच लोकांना सेवानिवृती घ्यावी लागली होती. ह्याचीच पुनरावृती होईल का?
दुसरे म्हणजे या काळात कोणी नौकरी बदलावी का? समजा कोणी विदेशी निवेशावर चालणारी कंपनी सोडून थोडी स्थिर असणारी नौकरी स्विकारावी का?
कोठे इतरत्र वाचल्याप्रमाणे सुचीकांक ८५०० पर्यंत जाणार का?
कोणती कंपनी किती स्थिर आहे हे कोणीच सांगू शकत नाही....
आणि प्राप्त परिस्थितीत कंपनी बदलली आणि ती कंपनी आर्थिक संकटात सापडली तर बकरे होतात ते नव्याने कंपनीत रुजू झालेले कर्मचारी. तेव्हा असा विचार या परिस्थितीत करावा असे मी सुचविणार नाही.
उलट आत्त्ताच्या कंपनीत स्वतः चे काम व्यवस्थित असेन तर मॅनेजमेंट तुमच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा करतील. व त्याचे दूरगामी फायदे तुम्हाला नक्की मिळतील....
तेव्हा काळ बिकट आहे.... थोडी कळ काढा एवढेच सुचवतो....
(जगाची चिंता करणारा ) सागर
अजुन भारतातुन काहीच ऐकु येत नाही म्हणजे आपले सगळे ऑलबेल आहे असे समजु नका. ही तर वादळापुर्वीची शांतता आहे.आहे त्या नोकरया ठिकवुन ठेवणे गरजेचे आहे.
वेताळ
प्रतिक्रिया
>>जेव्हा
सेन्सेक्स ९,९७५.३५ वर बंद झाला
पुनःश्च हरीॐ
देवा शपथ
पुनरपि
असुरक्षित
ज्यादा नाही पण ८००० येणार
लाखाचे बारा हजार
विसुनाना
खरच
वॉरेन बफे
जरा कळ काढा
भारतातील नौकर्यांची स्थिती काय असेल?
काळ बिकट आहे..... संयम ठेवावा
Hong Kong HSI-HANG SENG
चार्ट बघीतला.
हे घ्या
अजुन खुप वाईट ऐकायची तयारी ठेवा.
अच्युत गोडबोलेंचा अतिशय सुंदर लेख..
वर आणण्यासाठी