नीलकांत मित्रा, नमस्कार
मी सुद्धा इथे लिहिता होण्यामागे एकच भावना होती, ती म्हणजे मित्र बनविणे. चांगले मित्र मिळावेत, त्यांच्यातून विचारांचे आदान प्रदान व्हावे, तिथून यशस्वी जीवनाचा मार्ग सापडावा, एवढीच काय ती इच्छा.
धोरण जाहीर केल्याबद्दल आभार.
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !
एकूनच या लेखाचे सार हेच आहे की मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू...
- नीलकांत
मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू...
आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. एकच अपेक्षा ही आहे की जे काही नियम असतील ते सगळ्यांसाठी सारखे असावेत.
उदा: शिव्या चालणार नसतील तर त्या कुणाच्याही चालू नयेत आणि चालणार असतील तर सगळ्यांच्या चालाव्या.
एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा असे नको. मग ती व्यक्ती कुणीही असो. अधिक सांगणे न लगे.
कशाला रद्द करायची बुवा? चांगले लिखाण मिपावर करत असता की. भागो हे हल्ली सर्वत्र लुप्त होत चाललेले ललित नामक दुर्मिळ लेखन करतात. प्रयोगशील कथा लिहितात.
तुमचे देखील प्रवाह विरोधी पण मुद्देसूद विचार उत्तम मांडणीयुक्त असतात.
राजकीय चर्चांच्या नादात आयडी रद्द वगैरे कशाला विनंती?
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते ते वाचून वाईट वाटलेले. आता ती खरड आणि लिहिणारा आयडी दोन्ही दिसत नाहीत.
तरी माझा इम्पलसिव प्रतिसाद मागे घेत संपादक व सर्व वाचकांची माफी मागतो.
काय झाले भागो आणी कॉमी?? थोडफार चालू असतं, नका मनाला लावून घेऊ. संपादक मंडळाने श्री भागो नी श्री कॉमी ह्यांचा आयडी रद्द अकरा नये अशी विनंती. कांदा लिंबू ह्यांचा आयडी उद्या उडवणार असाल तर आज आता लगेच उडवला तरी चालेल.
सूचना आवडल्या. वातावरण गढूळ झाले की मिपावर यावेसे वाटत नाही. नवे सदस्यही सुरुवातीलाच जर अनावश्यक टीका झाली तर बावचळतात. त्या दृष्टीने हा संदेश महत्त्वाचा. मिपाच्या पुढील सशक्त, खेळीमेळीच्या, सकस वाटचालीसाठी शुभेच्छा! :-)
छान लिहिता तुम्ही निलाकांत! मुद्देसुद अन आर्जवी.
आवडल. तुम्ही घेत असलेल्या कष्टाची पुरेपुर जाणिव इथल्या बर्याच सदस्यांना आहे अन तुम्ही ,अन संपादक म्हणुन काम पहाणार्या सर्वांचे, आम्ही अतिशय ऋणी आहोत.
__/\__
अपर्णा.
".....कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्या धाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये....."
~ याचा एक अपमानस्पद फटका नुकताच मला बसला. त्यातही भर अशी की, मी "त्या" संस्थळाचा सदस्य नसताना माझ्या परवानगीशिवाय माझ्या विचाराचा, मतांचा वा लेखनशैलीचा 'तिथे' उल्लेख करून मला बिलकुल अपरिचित असलेल्या व्यक्तींनी तीवर डावे (काही वेळा चेष्टेचा सूर लावून) मत नोंदवायचे आणि मी अधिकृतरित्या त्याला प्रतिवाद देऊ शकत नाही हे माहित असूनही ती चर्चा थांबवावी असे इथल्या सदस्याने म्हणू नये, ही घटना फार खिन्न करणारी वाटली मला. घटनेने विचार स्वातंत्र्य सर्वानाच दिले आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त "अ" ने "ब" विरूद्ध ते वापरायचे पण "ब" तांत्रिक कारणास्तव उत्तर देवू शकत नाही याची जाणीव असूनही तसे मत व्यक्त केले असल्यास, "अ" याने त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला अशीच व्याख्या होईल.
अधिकृत संस्थळावरील विविध विषयांमधील चर्चेत "खेळीमेळीचे वातावरण" हवेच हवे, पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये.
पण असो. श्री.नीलकांत यानी आपुलकीच्या भावनेने हा धागा काढून काही गोष्टी (संस्थळ संचालक, संपादक या भूमिकेतून) वर स्पष्ट केल्या आहेत त्याचे निश्चितच इथे सौहार्द स्वागत होईलच पण त्यापेक्षाही त्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास 'मिसळपाव' चे जालावरील स्थान अधिक लक्षणीय होईल.
इन्द्रा
तिकडची धुणी 'तिकडेच' धुवा ना. इथे कशाला?
तसेच मुळात सुरुवात तुम्हीच तिकडच्या सदस्यांविषयी आणखी कुठेतरी लिहून केली होतीत आता खोटा कांगावा करु नका. स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!
"....स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!...."
~~ याची काही आवश्यकता नाही, श्री.आमोद जी. उलट मी अशा स्पष्टतेबद्दल तुमच्या मताचे स्वागतच करतो.
तुम्ही म्हणता तसा इकडच्या तिकडच्या धुण्याचा संबंध नाही, पण श्री.नीलकांत यानी स्वतः आपल्या धाग्यात तशी सूचना मांडली असल्याने मी त्या घटनेचा इथे उल्लेख केला इतकेच.
राहता राहिला प्रश्न मी एका सदस्याचा उल्लेख कुठेतरी लेखात केला याचा. तर तुम्ही जे इथे लिहिले आहे ते अपूर्ण वा गोंधळाचे आहे. त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको. [शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.]
धन्यवाद !
इन्द्रा
जाहीर वक्तव्यांवर किंवा जाहीर केलेल्या लेखन शैलीवर इथे टीका व्हावी तिथे होऊ नये वगैरे अपेक्षा करणे गैर आहे. आपणही अशाच प्रकारे एका वेगळ्या संकेतस्थळावर तिसर्या संकेतस्थळाबद्दल (जेथे आपण सदस्य नाही) टीका केल्याचे स्मरते. ती मलाही त्या संकेतस्थळासाठी अपमानास्पद वाटली होती.
त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको.
चर्चा हवी आहे की नको आहे? नक्की काय? विषय तुम्हीच काढता आणि चर्चा नको असेही तुम्हीच म्हणता..
[शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.
तुम्हीही तिथल्या सदस्यांविषयी टीका केल्यावर ते काय तुमची आरती ओवाळतील का? (तुमचे विधान सरसकट संकेतस्थळाला उद्देशुन होते)
ठीक आहे. मी तो विषय वाढवू इच्छित नाही, आमोद जी. मी केलेल्या 'त्या' चर्चेच्या अनुषंगाने तुमच्या किंवा तुमच्या परिचयाच्या एखाद्या सदस्याच्या कुठल्याही प्रकारे भावना दुखाविल्या असतील तर मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
पण इथे त्या विषयाला पूर्णविराम द्यावा ही आग्रहाची विनंती.
इन्द्रा
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे सदैव सहकार्य राहील.
मिसळपावबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञतेचीच भावना आहे.
इथे आम्ही अन्नछत्रात जेवतो त्यामुळे वरुन बडीशेप मागनार नाही.
फक्त ज्यांच्या हातात आपण कुर्हाड दिली आहे त्यामुळे 'कुर्हाडीचा दांडा गोतास काळ' होवु नये अशी अपेक्षा आहे.
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर नव्या लेखकांनी जरूर लिहावे...पण मध्ये प्रवीण भप्कर आणि अजून एक कोणीतरी यांचे जे प्रकरण झाले तसे असू नये म्हणजे इथले जुने लोक नव्यांची फें फें उडवणार नाहीत.
बाकी नीलकांत यांच्या मुद्द्यांशी सहमत.
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ नये, दर्जेदार लेखनास उत्तेजन द्यावे.
लेखनाचा रतीब घालण्यावर बंदी घालावी. भप्करछाप आयडी तसेच इतर काही जे अनेकांनी स्पष्ट, उपहास वगैरे मार्गांनी सांगून दाद देत नाहीत त्यांना आळा घालावा.
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट वाचनात आली. आवडली.
Pain यांच्या प्रतिसादाबद्दल आभार आणि त्या निमित्ताने थोडं माझं जनरल मत :
मराठीब्लॉग्ज डॉट नेट वगैरे स्थळांवर नवीन पोस्ट टॉपला येतात आणि यथावकाश खाली सरकून मागे पडत जातात अशीच कालाधारित रचना मिपा वर असेल असं समजून (आणि प्रत्यक्षात काय लॉजिक आहे ते नीट न पाहता) दणादण पोस्टे टाकत जाण्याची नकळत का होईना, पण चूक सुरुवातीला माझ्याकडून झाली होती.
मलाही आपण म्हटल्याप्रमाणे उपहास्/उपरोध्/चेष्टा या मार्गांनी सदस्यमित्र सांगायचा प्रयत्न करत होते पण ते त्यावेळी लक्षात आलं नाही कारण तेच ते लॉजिकचं गृहितक.
जेव्हा हे लक्षात आलं की प्रतिसादावर अवलंबून धागा परत परत वर येत राह्तो तेव्हा पोस्ट टाकण्याच्या योग्य फ्रीक्वेन्सीची जाणीव झाली. आता "दोन पोस्टांमधे अंतर राखत आहे". (जुनी फ्यामिली प्लॅनिंगची जाहिरात आठवली.!! :-) )
लांबच्या मार्गाने फिरवून फिरवून, अप्रत्यक्ष, आडवळणाने, छद्मीपणाने नवीन सदस्याच्या लिखाणाच्या क्वालिटीचीच मापं काढून एखादी गोष्ट न सांगता योग्य मित्रत्वाच्या शब्दांत नवीन सदस्याला इथली पद्धत सांगितली तर कटुता टळून मैत्री लवकर लवकर वाढेल.
शिवाय एक शंका आली. "दर्जेदार लेखन" आणि "रतीब" हे कोण ठरवणार ? प्रतिसादांवरून दर्जा ठरवायचा का? रतीब म्हणजे किती संख्येने पोस्टे?
पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?
मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?
म्हणजे वाईट रेटिंग सातत्याने मिळणार्या सदस्यांना "आळा" घालता येईल.
माझी अशी समजूत आहे की कोणत्याही ओपन फोरम मधे दर्जा हा वाचणार्यांनी ठरवावा.
"आळा" असलाच तर फक्त ऑब्सीन / रेशियल / ऑफेन्सिव्ह कंटेंटपुरता असावा. (सेन्सॉर बोर्डला "परिनिरिक्षण मंडळ" म्हणतात.."परीक्षण मंडळ" नव्हे..ते "श्वास" , "नटरंग" आणि "चल गंमत करु" या तिघांनाही सर्टिफिकेट देतात. दर्जा हा पाहणार्याच्या नजरेत आहे. प्रत्येकाचा वाचक /प्रेक्षक वेगळा.)
धन्यवाद.
".....मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?..."
~ श्री.गगनविहारी यांच्या एका चांगल्या प्रतिसादातील (जे बहुतांशी सर्वांचीच भावना व्यक्त करते) फक्त वरील सूचनेविषयी लिहितो.
हे स्थळ भाग घेणार्या सदस्याला त्याबद्दल कुठेलेही पारितोषिक वा प्रमाणपत्र देत नाही, ज्यासाठी 'रेटिंग' ची गरज असते. विविध विषयावर मनसोक्त लिहायला मिळते, चर्चा करता येते, खेळीमेळीच्या वातावरणात विचाराची देवाणघेवाण करता येते असे Admirable Aspects असल्याकारणाने पोल/रेटिंग असू नये असे वाटते. तसे झाले तर मूळ रोगापेक्षा औषधयोजनाच भयावह होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
काळाच्या ओघात जे लिखाण चांगले ते टिकणारच....प्रतिसादांचा पाऊस आला म्हणून (प्रविण भप्करने पदार्पणातच शतक झळकाविले होते....तर आपल्या नावासमोर पदव्यांची रास ओतणार्या एका सौंदर्यविशारदानेही इथे एकदा तीच किमया केला होती) ते लेखन दर्जेदार आणि ज्याला डझनभर प्रतिसाद असत नाहीत ते हीणकस अशी व्याख्या असत नाही, असूही नये.
इन्द्रा
अरे देवा.
:-)
दर्जा कसा ठरवायचा हा प्रश्न कसा अवघड्/किचकट्/अप्रस्तुत आहे हे दाखवण्यासाठी काहीशी उपरोधाने तो सूचना कम प्रश्न केला आहे. पोल ठेवावा अशी सिरियसली केलेली सूचना नाही.
अच्छा ?? अहो, तुमच्या त्या प्रतिसादातील व्याकरण मांडणी काहीशी सदोष झाल्यामुळे मी चकलो. म्हणजे असे की, तुम्ही "पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?" या वाक्यानंतर 'पॉज' घेऊन पुढील वाक्य नव्या 'पॅरा' ते घेतले, त्यामुळे त्याला स्वतंत्र अस्तित्व येते (व्याकरणदृष्ट्या...)
मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?
त्यामुळे, वाचणार्याला (पक्षी मला, म्हणा हवे तर....याचा अर्थ असाही की मी तुमची प्रत्येक पोस्ट वाचतोच) असे वाटते की, गगनविहारी यांनी "असे केले तर चालेल का?" असा सवाल्/सूचना संपादक मंडळाला केला आहे.
असो....तरीही एक सूचना म्हणून जरी तिचे रूपडे असते तरी माझ्या प्रतिसादातील त्याविषयेची भूमिका तशी राहायला काही अटकाव नसावा.
इन्द्रा
श्री. पेन ह्यांच्याशी सहमत आहे. (काय दिवस आलेत च्यायला.... म्हणजे श्री. पेन ह्यांच्यावर. माझ्यासारखा माणुस सहमत होतोय)
काही नवलेखक हे मिपाचे नियम वगैरे काही न वाचता सरळ येउन धडाधड लेखन टाकायला सुरुवात करतात. बर हे लिखाण नविन असते का? तर नाही, आधी कुठेतरी जुनेपाने लिहिलेले पुन्हा आणुन मिपाचा शोध लागला म्हणुन मिपावर टाकलेले असते. बर काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. काही महाभाग तर लेखावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रीयेवर ह्या लांब लांब प्रतिक्रीया देत बसतात. त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ?
आता चांगले लिखाण कोणते आणि डोक्यावर आदळलेले कोणते ? हे कोण ठरवणार ? नक्कीच मिपाकर वाचक ठरवणार. जर वाचक लेखकानी काय लिहावे हे सुचवत नाही, तर वाचकाने लेखाचे मुल्यमापन कसे करावे हे लेखकानी ठरवु नये. मिळालेल्या पंचवीस प्रतिसादापैंकी चोवीस कौतुकाचे प्रतिसाद विसरुन जाउन एकाच खवट प्रतिसादामुळे जर लेखक खचत असेल तर हा दोष लेखकाचा आहे. पुन्हा ह्या लेखकांना अगदी जेष्ठ मिपाकरांनी जरी काही सांगितले तरी हे 'घोर अन्याय हुआ है मुझपे' च्या थाटात सरळ दुर्लक्ष करतात.
आम्ही देखील कधीतरी नविन मिपासदस्य होतोच की. आम्हीच कशाला आमच्या नंतर कितीतरी लोक नविन आले आणि आनंदाने रुळले. तुम्ही आखडूपणा दाखवलात की मिपाकर तुम्हाला फाट्यावर मारणारच मारणार. आज इंट्या,स्पा सगळे नविन आले तेंव्हा त्यांना छळले गेले नाही का ? शुचिला तर मी अजुन छळतो, पण ती बिचारी मी केलेल्या विडंबनाचे पण बिनधास्त खवत येउन कौतुक करते. मी मात्र तीला अजुन कधी 'सॉरी ग तुला हलकट प्रतिसाद दिला' असे मात्र म्हणत नाही. उगाच गळे काढणार्यांना कोण सहन करणार ?
बाकी नविन कातडी पांघरुन येणार्या जुन्यांविषयी तर बोलायलाच नको.
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ?
मला तरी ते उशिरा का होईना, जाणवले आणि त्यानंतरच्या एकाही पोस्टवर माझ्या स्वतःच्या कॉमेंट टाकलेल्या नाहीत.
मुळात त्यामुळे धागा वर येतो हेच जाणवायला उशीर झाला.
असो.
बाकी आपण जनरल नवीन मिपाकरांबद्दल बोलत आहात असं मी समजतोय. कारण :
काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते.
हे किमान माझ्या बाबतीत कधीच मनातही आलं नव्हतं याची मला स्वत :शी मनःपूर्वक जाणीव आहे. इतर कोणाच्या मनात माझ्याविषयी अशी भावना आली असेल तर माझं दुर्दैव.
मिपाकर हे खूप व्हर्सटाईल साहित्य वाचत आलेले आणि म्हणून एक खूप दर्जेदार ऑडियन्स, याच दृष्टीने मी तरी पाहात आलेलो आहे. आणि मिपाकर मित्रांनी ते सार्थ ठरवलंय.
गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन न्हाय हो लिहिला :) गैरसमज नको.
मागच्यावेळी तुमचा 'डायरी' वरुन असाच गैरसमज झाला होता, पण तो सल्ला मी तुमच्या आधी शुचिमामीला दिला होता ;)
मुळात आमची "न्येमकी" गफलत कुठे होतेय हे लक्षात येताक्षणीच (उशिरा लक्षात आले हे मान्य) फ्रीक्वेन्सी आणि कॉमेंट, दोन्ही आवरलेच..
शिवाय "दर्जा कसा ठरवायचा ?" हे मी वरच्या कॉमेंटमधे लिहिलेलं वाक्य प्रश्नार्थकच होतं. मी "दर्जा कसा ठरवायचा" हे वाचकांना सांगत किंवा शिकवत नव्हतोच हा एक बारीक खुलासा, न मागताच करतो.
आणि जे काही डायरी वगैरे होते ते झाल्यावर मी पुन्हा पोस्ट टाकली आणि "आखडूपणा" हाच्च येग्जॅक्ट शब्द वापरून मला तो करायचा नाही हे दर्शवण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे असेही आवर्जून लिहिले.
असो. आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद.
इथेच मैत्रीचा हात पुढे करतो..
प्रतिक्रिया
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !
ह्या सर्वाचा हेतू हाच की...
.
अॅड्याला माझे अनुमोदन.
माझी मेंबरशिप कृपया रद्द करा.
१०८
माझी सुद्धा.
कशाला रद्द करायची बुवा?
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते
काय झाले भागो आणी कॉमी??
मनोरंजक प्रतिसाद....
अर्रर्र....
असे काही करू नका. जमेल तसे
ओके
धन्यवाद!
अधिकृत स्पष्टीकरणाबद्दल
एकमेकां साह्य करू अवघे धरू
छान लिहिता तुम्ही निलाकांत!
धाग्याचे संदर्भ...!
पुन्हा तेच...
चर्चेचे ठिकाण आणि औचित्याचा मुद्दा...!
जाहीर वक्तव्ये
त्याबद्दल खुलासा करतो की,
पूर्णविराम द्यावा.
ठीक आहे
उपमा
आख्यायिका
प्रत्यक्षात असे काही झाले
रोख
हॅहॅहॅ...म्हणजे संपादनाची
असे...
थोडक्यात तुमचा ईंद्रा झाला
नीलकांत, अतिशय समयोचित योग्य
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट
औषधच भयावह होईल...!
अरे देवा..
थोडासा गोंधळ...!!
एकदम मान्य..
पेनोबांशी सहमत
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर
गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन
मुळात आमची "न्येमकी" गफलत
आपण सर्वच काही मलाच उद्देशून
हेहेहे.. सर्वच म्हणजे
+१
+२
नीलकांत, उत्तम प्रकटन. तुझा