Skip to main content

आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 28/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/47970 ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे. माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात. काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो. मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन. 1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत. फोन नंबर देतो .... 9405767101 2. आंबा विक्री करणारे अजून काही जण आहेत .... A. विवेक केळकर, खेरशेत.... 9422437592 ... ह्यांच्याकडचे आंबे खाल्ले आहेत. उत्तम आहेत. डोळे झाकून खरेदी करा. B. सचिन खरे, गुहागर.... 9420716737.... दुर्दैवाने, ह्यांच्याकडचे आंबे खायचा योग आला नाही. C. पेंडसे, कल्याण इथे व्यवसाय करतात. स्वतःची बाग आहे... 9769978741 कळावे...लोभ आहेच, तो वाढावा ...
आर्थिक व्यवहार आपापल्या जबाबदारीवर करावेत, मिपा केवळ एक व्यासपीठ आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26503
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

माहितीबद्दल धन्यवाद. आपण फोन नं सार्वजनिक करत आहात. यास त्या लोकांची संमती आहे असं गृहित धरतो.

In reply to by राघव

ते व्यापारी तत्वावर लागवड करतात .... अजून काही जणं आहेत, त्यांची परवानगी घेत आहे. शिवाय, शेतमाल कुणीही विकू शकतो. केंद्र सरकारने, शेतकरी वर्गाला आणि गिर्हाइकांना, फायदा व्हावा, ह्यासाठीच, दलाल काढून टाकायचा प्रयत्न केला आहे. वरील पैकी, कुणालाही, माझे नाव सांगायची गरज नाही.

छान चांगले काम करत आहात. पण तुम्ही जर नंबर दिले आहेत त्यांचे कार्य क्षेत्र कोणते आहे. ते कुठपर्यंत माल पोचवू शकतात त्याची माहिती पण ध्या.

In reply to by Rajesh188

सामना मधला संवाद आठवला ... असो, जे शेतकरी आंब्याचा व्यापार करतात, त्यांची माहिती दिली आहे, फोन नंबर सकट, इतर माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता. मिपाकर, सर्वत्र पसरले आहेत, त्यामुळे, त्यांना कुठे शक्य होईल? ह्याची माहिती, शेतकरी स्वतःच देऊ शकतो.

1. वेलणकर, मोबाईल नंबर देत आहे, हे ठोक व्यापारी आहेत... 9371540042 2. सौ. स्वाती सोनार, नाशिक.... ह्या स्वतः नैसर्गिक पद्धतीने ऊस लागवड करतात आणि स्वतः गुर्हाळ लावून, गूळ आणि काकवी विकतात. मोबाईल नंबर देत आहे.... 9422415512 ....... गुळाचे अजून व्यापारी मिळाले तर सांगतो ...

प्रोफेसर हेमंत देवधर, हे आधी डोंबिवली येथे, पेंढारकर काॅलेज मध्ये शिकवायचे, आता पुर्ण वेळ शेती करतात, लोणच्याचे, FDA लायसेन्स आहे, फोन नंबर देतो 9422476325 खात्रीशीर मनुष्य आहे.

In reply to by मुक्त विहारि

हे आधी डोंबिवली येथे, पेंढारकर काॅलेज मध्ये शिकवायचे आता पुर्ण वेळ शेती करतात लोणच्याचे FDA लायसेन्स आहे फोन नंबर देतो 9422476325 खात्रीशीर मनुष्य आहे

वाकीकर agro products +91 77579 85467 केमिकल्स विरहित गूळ आणि काकवी पोहचवू शकतात.

पुर्णतः नैसर्गिक पद्धतीने केशर आंबा, वाटाणा, हरभरा, अंबाडी, पालक मेथी, मुळा ... नाव : मंदार वैद्य, मोबाईल नंबर: 8669897343 पत्ता: घोटी शिर्डी हायवे, हरसुले, सिन्नर

नाव: सुहास परडकर मोबाईल नंबर: 9604696693

In reply to by king_of_net

त्यांच्या विषयी पण माहिती दिलीत तर उत्तम ... सामान्य जनता जे काम करू शकते, ते सरकार पण करू शकत नाही ...

In reply to by VINOD J. BEDGE

मिपावर, मी तरी द्राक्ष लागवड कशी करतात? हे वाचलेले नाही ... ह्या लागवडी बद्दल माहिती दिलीत तर उत्तम ... मी तुम्हाला विनंती करू शकतो, आग्रह नाही...

In reply to by VINOD J. BEDGE

शेती, पुस्तके वाचून येत नाही.... द्राक्ष शेती करू शकत नाही. पण, ज्ञान मिळवायला नक्कीच येणार .

आंबा मे महिन्यातला आहे... नाव आणि पत्ता: मंदार कार्लेकर रा. वानिवडे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.... मोबाईल नंबर: 8888256887

अतिशय स्तुत्य उपक्रम. कुठे ती राजकीय लाथाळी? कुठे हा सहकार्याचा उत्तम नमुना _/\_

चिपळूण ते संगमेश्र्वर रोड वरती, धामणी नावाचे गांव आहे. तिथे, श्रद्धा हाॅटेल जवळ, शिर्के आडनावाचे कुटुंब, शेती व्यवसाय करतात. ताज्या भाज्या मिळतात. तुम्ही स्वतः शेतात जाऊन, भाज्या खुरडू शकता.शेत रस्त्याला लागूनच असल्याने, वेळ वाया जात नाही. वेळ मिळाला की, मी स्वतः त्यांच्या कडूनच भाजी खरेदी करतो. ह्या वर्षी, कुळीथाची ऑर्डर पण, त्यांच्याकडेच दिली आहे. त्यांचा मोबाईल नंबर देतो .... 9764219798

मुवि, अतिशयच उत्तम उपक्रम. भारी. इथे ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी माहिती इथे दिली तर खूप मिपाकरांना कितीतरी उपक्रम करता येतील

लवकर मागणी द्या, निश्चिन्त व्हा, अस्सल देवगड हापुस अगदी तुमच्या घरपोच मिळेल! मुंबई, नवी मुंबई सर्व ठीकाणी घरपोच सेवा उपलब्ध! संपर्क साधावा जोशी ७७७४०१०१३२

मुवि चांगला उपक्रम आहे. आमच्या सोसायटीत असे थेट माल घेतात. सभासद वॉटसप ग्रुपवर आपली मागणी नोंदवतात. थेट माल टेंपोने येतो. लोक आपापले बॉक्स घेउन जातात.काही सभासदांची स्वत:ची वा हितचिंतकांची उत्पादने आहेत.

एवढ्या लांबून माल घरपोच कसा करतात मग ते लोक आणि त्याचा खर्च कोण करतं ? जर आपण केला तर महाग पडेल काय? उदा इथे तेच जास्तीचे कुरिअर चे पॆसे वापरून आणखीन उच्च प्रतीचे काजू घेता येणार नाहीत का ? एक शंका आपली

In reply to by प्रमोद देर्देकर

आणि ते पण, 2-3 महिन्यांनी.... अनुभव वाचायचे असतील तर, नुतन सावंत, यांचे, काहीतरी करावे म्हणून, ही लेखमाला वाचा...

In reply to by प्रमोद देर्देकर

मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मूवी चा त्रास थोडा कमी करतो. समजा माझ्या कडे आंब्याची झाड आहेत आणि उत्तम प्रतीचा आंबा माझ्या कडे आहे. मी माझ्या घराजवळ च्या स्थानिक घावुक बाजारात विकायचे ठरवलं तर मला १०० रुपये प्रति डझन हा भाव मिळत आहे.आणि किरकोळ विकायचा झाला तर आंबा उत्पादक भाग असल्या मुळे ग्राहक मिळणे कठीण आहे. पण हाच अंबा मुंबई मध्ये हजार रुपये प्रति डझन आहे. तर ८०० रुपये प्रति डझन नी जरी मुंबई ला पाठवला तरी transport खर्च ४०० रुपये जरी लागला तरी मला ४०० रुपये हा भाव मिळत आहे. म्हणजे ३०० रुपये जास्त मिळत आहेत. जिथे पिकत तिथे विकल जात नाही. मला वाटतं तुमच्या शंकेचे निरसन झाले आहे. मुंबई बाजारात २०रुपये प्रति किलो कोबी असेल तर त्याची खरेदी किंमत पाच रुपये प्रति किलो च असते

In reply to by मुक्त विहारि

सातारा भागातील मुलगा खेकड्या विकताना किती तरी वेळा बघितला होता. गावच्या नदीत खेकडे पकडुन तो ठाण्यात येवून विकायचा. खेकडे फुकटचे . वाट खर्ची बाजूला काढली तरी त्याला जास्त भाव मिळायचा.. दुपारीच परत घरी जायला निघायचं.

तो करतोच मी. पण तुम्ही इथे उत्तर द्या म्हणजे बाकीच्या लोकांना पण शंका असल्यास त्त्यांचेही निरसन होईल

मु. वि. तुम्ही एकतर हे टोक गाठता किंवा ते टोक. आता मी प्रामाणिक पणे सगळ्यांच्या माहितीकरिता विचारलं तर त्यात एव्हढं रागावण्या सारखं काय आहे? शिवाय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावणार मी घरासाठी १ किंवा २ किलोच्या वस्तु २०० ते ३०० कि.मी. वरुन मागवताना त्याचा प्रवासाचा खर्च पकडून ती वस्तु जास्त महाग नाही का होणार माझ्यासाठी? कदाचीत या बाजुचा को णी विचार नसेल केला. यात फक्त आंबे पकडू नका. कारण ते पेटी प्रमाणे ४ ते ५ डझन किंवा जास्त आले तरी खाल्ले जातातच. अजुनही मला बंगल्याच् कामासाठी रोज कोलाड ते ठाणे ये जा करावी लागते त्या गडाबडीत आहे म्हणुन आणि कुंपणाभोवती काय काय कशी कशी लागवडा करायची आहे ते पण विचारयचं होते. सगळं एकदम सविस्तर बोलायचे होते. म्हणुन नंतर सावकाशीने फोन करणार होतो. तर तुमचं काहीतरी गैरसमज झाला. असो या उपर तुमची मर्जी.

In reply to by प्रमोद देर्देकर

1. मी फक्त, माहिती दिली आहे. 2. तुमच्या शंका कुशंका, तुम्ही ज्याच्या कडून, खरेदी करणार आहात? त्यांनाच विचारू शकता... 3. अनावश्यक प्रतिसाद, इथे देण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी तुम्हाला फोन नंबर दिला....