पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.
मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत : १. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. २, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान. ३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया. ४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन). ५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन. ६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान. ७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. ८. TIME Person of the Year, २०१६. इत्यादी. महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत ! १९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अॅड्रेस) देणार्या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की. एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :) या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+1
"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च
ऑर्डर ऑफ झायेद हा नोबेलपेक्षा सरस पुरस्कार आहे.
"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते.criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे . परवेज मुशर्र्फ यांनी जागतिक शांततेसाठी जे योगदान दिलेले होते त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आजही ते इंग्लंडमध्ये राहुन जागतिक शांततेसाठी कार्यरत आहेत. ते लोकशाहीचे सत्याग्रहाचे कडवे समर्थक होते. त्यांना पुरस्कार दिला २००७ मध्ये त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा ज्या अहिंसक रीतीने मुशर्रफ यांनी पाकिस्तानात निवडणुक जिंकलेली होती त्याचा ही प्रभाव पुरस्कार देतांना पडलेला होता. चायनाचे पंतप्रधान यांनी चायनीज जनतेला जे व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा दिली त्यासाठी त्यांना जुलै २०१८ या एकाच महीन्यात जे तीन ऑर्डर ऑफ झायेद दिले होते त्यापैकी एक दिला होता. त्यातुनच प्रेरणा घेऊन आज ते हाँगकाँग च्या नागरीकांना चायनाहुन अधिक स्वातंत्र्य देण्याचा मनापासुन प्रयत्न करत आहेत. मोदी यांनी देखील जागतिक शांततेसाठी केलेली कामगिरी विचारात घेण्यात आली असावी. मागच्या वर्षी एकाच महीन्यात ३ दिले होते यावर्षी या महीन्यात बघु अजुन कोणाचा झायेद साठी नंबर लागतो ?काय हे मारवासाहेब,
आणि हो... त्या तीन
काय चुकीचे लिहिले त्यांनी?
छान वाटले.
१०० वेळा सहमत, अर्थात जे
Pakistan Senate chief cancels
पाकिस्तानला पुरते कळून चुकले
मोदींना बाहेर पुरस्कार मिळतात
=)) =)) =))
लक्षात ठेवा
=)) =)) =))
"काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही"या स्टेजच्या फार पुढे गेली आहे आणि आता ती, "आम्ही इतका गडद काळा चष्मा घालून बघतो तरी, (जगाला) शुभ्र कसे दिसते?" या स्टेजला पोहोचली आहे. ;) :)वाह वाह वाह वाह वाह वाह वाह
अभ्या,,
एक्का जी,
आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या
थोडे काही झाली कि मोदींची
थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ?हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! "आपल्याला न आवडणारा माणूस/नेता असला की त्याचे कधिही काही दिसले की ते सगळेच 'थोडे' असते" ही फॅशन हल्ली काही लोकांची आवडती आहे. तुमच्या वरच्या म्हणण्याला काही आधार देवू शकला नाहीत तर, नाही नाही म्हणत, तुम्ही त्यांच्या कळपात सामील झाला आहात असेच होईल. भारताच्या बाबतीत काही चांगले झाले तर त्याचे कौतूक करताना मला अजिबात वाईट वाटत नाही... केवळ अभिमानच वाटतो. जात, धर्म, पक्ष, आवडती/नावडती व्यक्ती, इत्यादी चौकशी करून मगच, ते कौतूक करावे की करू नये, हे मी ठरवत नाही. याशिवाय, तुमचे भाजप किंवा आरएसएसबद्दल काय मत आहे हे इथे अत्यंत गैरलागू आहे... किंबहुना, माझ्याबाबतीत ते मत पूर्वग्रहदृष्टीने आलेले आहे. कारण, माझा भाजप अथवा आरएसएस यांच्याशी दुरान्वयानेही पूर्वी कधीही संबंध नव्हता आणि आताही नाही... माझी बांधिलकी माझ्या देशाशी आणि देशाच्या तिरंग्याशी आहे. अर्थातच, माझ्या मतांवर भाजप अथवा आरएसएस यांच्या विचारसरणीचा तडक काहीच प्रभाव नाही, तरीही तुमचे त्यांच्यासंबंधीचे काही बरे-वाईट अनुभव सामान्यज्ञान म्हणून ऐकायला माझी ना नाही. तसेच अनुभव इतर कोणी, इतर कोणत्या पक्षा/संस्थेबद्दल सांगितले तरीही मी ते ऐकू शकतो. कारण, माहिती/ज्ञानाचा विस्तार केव्हाही स्विकार्य असतो. माझी विचारसरणी फार साधी आणि सोपी आहे... भारतासंबंधी कोणतीही सकारात्मक कृती झाली तर मला त्याचा अभिमान वाटतो आणि तो व्यक्त करायला मला शरम वाटत नाही. "कोण्या एका नेत्याचा/पक्षाचा झेंडा सतत डोळे मिटून खांद्यावर घेण्याइतका, माझ्या बुद्धीचा अपमान, मी कधीही करणार नाही". त्यामुळे, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणताना ते कोणत्या राजकिय नेत्याशी/पक्षाशी निगडित आहे, याची खात्री करण्याची मला गरज अजिबात वाटत नाही. इतरांना आंधळेपणाने कोणा नेत्या-पक्षाची पाठराखण करायची असली तर, आणि ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पचत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा असतील. भारतातील सद्य वस्तूस्थिती अशी आहे... १. देशाबद्दल किंवा मोदींबद्दल जरा काही चांगले म्हटले की हल्ली काही लोकांना अत्यंत जळजळ होते आणि लगेच "मोदीभक्त किंवा भाजप/आरएसएस समर्थक" अशी लेबले लावून टीका सुरू होते. तुमचा प्रतिसाद हेच सिद्ध करत आहे की, त्या ट्रॅपमध्ये तुम्हीही अडकला आहात (हे विचारत नाही, सांगत आहे). अन्यथा, भाजप किंवा आरएसएसच्या बद्दल मी आतापर्यंत कधीच काहीच लिहिले नाही, हे तुमच्या ध्यानात आले असते... निदान वरचा प्रतिसाद लिहिण्याअगोदर, मी तसे काही लिहिले आहे का, हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न तरी केला असतात. २. अंध विरोधामुळे, लेबले लावणार्या लोकांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही कि, भारताच्या, त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या दुर्दैवाने, विरोधक नेते त्यांना नावाजावे असे स्वतः काही करण्याचा प्रयत्नही सद्या करत नाहीत... त्यांची सर्व शक्ती फक्त नकारात्मक बोलणे व नकारात्मक कृतीने सरकारची/मोदींची नालस्ती करण्यातच खर्च होते आहे... आणि तसे करताना त्यांचा इतका तोल जात आहे की, बर्याचदा आपण आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोचवत आहे, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही... किंबहुना, ध्यानात येते आहे पण त्यांना त्याची पर्वा कराविशी वाटत नाही. अश्या नेत्यांबद्दल त्यांच्या पाठिराख्यांनाही काही लिहिणे कठीण होत आहे तर इतरांनी कौतुकाने लिहायला आपली बुद्धी गहाण टाकावी लागेल, नाही का? ३. दुसर्याची मोठी रेषा खोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, स्वतःची कमीत कमी एखादी लहान रेषा तरी आखण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर, त्यांच्या त्या सकारात्मक कामाबद्दल अभिमानाने लिहायला मला आवडले असते. हल्लीची अशी एक-दोन सकारात्मक उदाहरणे सांगा, मी स्वतः त्यांच्याबद्दल कौतुकाचा लेख लिहेन. अन्यथा, वर सांगितलेल्या ट्रॅपमध्ये अडकायला तुम्ही मोकळे आहातच, दुर्दैवाने ! :(खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये.हे खरेच खरे असले तर, विनाकारण/गैरसमजाने लेबले लावण्याअगोदर माझ्या लेखनातला मजकूर जसा आहे तसाच वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या... त्यात नसलेले भलतेसलते काल्पनिक अनर्थ काढू नका. कारण, काही न लपवता स्पष्ट लेखन करण्याचा माझी शैली आहे, हे माझ्या इथल्या आणि खाजगीत लिहिलेल्या मजकूरावरून तुमच्या ध्यानात आले असते आणि मग तुम्हाला वरचा प्रतिसाद लिहिवासा वाटला नसता, हे सांगताना खरेच खेद होत आहे. :(आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. कारण, माझ्याबद्दल ममत्व असणार्याने, कोणत्याही बाबतीत, कोणाही व्यक्तीबद्दल, (अ) काल्पनिक अर्थ शोधून गैरसमज करून घेणे आणि (आ) त्या गैरसमजावर आधारित लेबले लावणे, अश्या प्रकारच्या मानसिक ट्रॅप्समध्ये अडकू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. याबाबत, मी नेहमी लिहीत नाही, याचा अर्थ असा नाही की लेबले मला मान्य आहेत. तर, त्याची कारणे अशी आहेत... (अ) जगातिल प्रत्येकाला सुधारण्यासाठी माझा जन्म झाला नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि (आ) विशेषतः, झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :) इतके लिहिल्यावरही तुमचे समाधान झाले नाही तर, माझ्या दृष्टीने तुम्ही वरच्यापैकी एक किंवा दोन्ही कारणात बसाल. बाकी, तुम्ही काय करावे किंवा करू नये, हा निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे, याबाबत संशय नाही.Modi 'praise': 'Respect my
(आ) विशेषतः, झोललेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च
हायला, आजकाल सर्वांनाच
अहो लोकांना इतकंच वाटतं की
काहीही हा जॉनविक्क ! तुम्ही
डॉक,
हे कोणत्या पुराव्यावर लिहिले
अनेकांना आपल्या देशाच्या
PM Modi conferred with top Bahraini award
युएईनंतर पंतप्रधान मोदींनी बहारेन या अजून एका खाडी देशाला भेट दिली. तेथिल राजे हामाद अल खलिफा यांनी मोदींना, भारत-बहारेन मैत्रीसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल, त्यांच्या देशाचा "King Hamad Order of the Renaissance" हा सर्वोच्च बहुमान प्रदान केला.अर्थातच, वरच्या सर्वांनाच आपापली भावना अधिक प्रबळ करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. :)
ज्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार
या बाबतीत मिपाप्रथेप्रमाणे,
परकिय सरकारांना भारताबद्दल
ज्या देशांचे सर्वोच्च नागरी
एखादे सत्य जितके चिरकाल
कोणत्याही देशाने दुसऱ्या
अलिप्त राहणे हे इतके भयंकर आहे का?
माझ्या अल्पमतीप्रमाणे काही
आपली अल्पमती कितीही योग्य बोलत असली तरी...
तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही
तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ.कुतुहल नक्कीच असू शकते. मात्र, ते शमवण्यासाठी त्याबद्दल जालावर पोत्याने माहिती आहे आणि मिपावर राजकारणावर टीप्पणी करणार्या कोणालाही ती सहजपणे उपलब्ध आहे. किंबहुना, उपरोधीक/तिरके प्रश्न करणार्यांना तर ती नीट माहित असतेही. किंबहुना, त्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय महत्व मी लेखातच लिहिलेले आहे. पण, ती माहिती सोईस्कर नसल्यास, तिच्याकडे डोळेझाक करून, सहाजिकपणे, तिरके आणि/अथवा उपरोधी प्रश्न विचारले जातात. मानवस्वभाव ! असो. :) अजून थोडे... वर एका प्रतिसादात तुम्ही,criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे, ही मारवा यांची टीप्पणी खरीखरी व सरळ आहे असे मानून प्रतिसाद लिहिला आहे, हा तुमचा चांगूलपणा आहे. पण, त्या टीप्पणीच्या खालचा मजकूर आणि मारवा या आयडीच्या आतापर्यंतच्या लिखाणाचा कल पाहता, ते उपहासात्मक वाक्य होते, हे सहज ध्यानात येईल. ती टीप्पणी लिहून, मारवांनी सुरू केलेला वितंडवाद वाढविण्यात मला रस नव्हता, म्हणून तेथे काही लिहायचे हेतुपुर्रसर टाळले होते. आता, केवळ तुम्ही नावानिशी विचारणा केली आहे म्हणून इथे काही लिहिणे भाग पडले आहे, इतकेच... तिथला वितंडवाद इथे आणण्यासाठी हे लिहिलेले नाही. तुमच्या सर्वच प्रतिसांदांतील निरागस प्रश्नांबद्दल काहीच असहमती/आक्षेप नाही, हे वेगळे सांगायला नकोच. :)बाप रे!
मग, (विशेषतः काही) मिपाकरांना
ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन.हे ठिक आहे, पण...शक्यतो देणारच नाही.असे मात्र अजिबात करू नका, मिपा आपलाच आसा, बेधडक लिवा ! :)रवीश कुमार ला मॅगसेसे
खरं बोलणार्याचं घर, दोन्ही
खो खो खो खो खो! जाम आवडला!
:)
मुस्लिम देशांना चांगल्या कार्याची पारख आहे
आंतरराष्ट्रिय राजकारणात मित्र
हितसंबंध हा शब्द महत्वाचं आहे
पुरस्कार घेणाऱ्याचा फायद्याचा असतो की देणाऱ्यांच्या
यावर मला काही व्यक्त करायची इच्छा होती
किडे म्हणजे जाणकार
मोदींजीवर तोंडसुख घेणार्यांना