मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

एक कविता हरवलेली ... सापडली :)

मस्तानी ·

खेडूत 16/04/2012 - 23:49
छान आहे, आमच्या पुस्तकात नव्हती. १९८४ नंतर बदललेल्या बालभारती मध्ये ही असावी. कविता समजण्यापेक्षा त्या पाठ असणे महत्वाचे होते, आणि ही तर पाठ होणे म्हणजे...:) त्या कुठल्याश्या चालीत बसवून सगळ्या वर्गाने मिळून म्हणायच्या. चाल लागत नसेल तेव्हा ठरलेल्या एक-दोन ढोबळ चालीत बसवून वेळ मारून न्यायाची. खरी कवितेची गोडी लागते ती शाळा संपल्यावरच ! बापट यांच्याच ''शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट'' आणि ''सदैव सैनिका पुढेच जायचे'' या दोन होत्या.

खेडूत 16/04/2012 - 23:49
छान आहे, आमच्या पुस्तकात नव्हती. १९८४ नंतर बदललेल्या बालभारती मध्ये ही असावी. कविता समजण्यापेक्षा त्या पाठ असणे महत्वाचे होते, आणि ही तर पाठ होणे म्हणजे...:) त्या कुठल्याश्या चालीत बसवून सगळ्या वर्गाने मिळून म्हणायच्या. चाल लागत नसेल तेव्हा ठरलेल्या एक-दोन ढोबळ चालीत बसवून वेळ मारून न्यायाची. खरी कवितेची गोडी लागते ती शाळा संपल्यावरच ! बापट यांच्याच ''शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट'' आणि ''सदैव सैनिका पुढेच जायचे'' या दोन होत्या.
शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना. शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित.

विव्हळून ..

तिमा ·
प्रेरणा: गविंना सलाम करुन (कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते) उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या. पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो .... नवीन पिढीची चव नासवून टाकतात भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........ नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!

बीटलमेनिया - ३ -> 'Yesterday'

प्रास ·

सलाम.....पहिला त्या बीटल्स ला आणि दुसरा....तुम्हाला.... हे असे काहीतरी आम्हाला ऐकवता आणि त्या हिमेश पासुन दूर ठेवता.... (कानाला कर्क-रोग झाला तरी चालेल पन कर्ण-रोग नको) कर्ण रोग= बेसुर गाणी ऐकणे

सलाम.....पहिला त्या बीटल्स ला आणि दुसरा....तुम्हाला.... हे असे काहीतरी आम्हाला ऐकवता आणि त्या हिमेश पासुन दूर ठेवता.... (कानाला कर्क-रोग झाला तरी चालेल पन कर्ण-रोग नको) कर्ण रोग= बेसुर गाणी ऐकणे
3

प्रकाशाची सावली

अमृत ·

रणजित चितळे 09/04/2012 - 11:05
'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है' मुकेश चा आवाज आणि परत एकदा त्या वेळची मुंबई आहाहा. हेच गाणे बंगाली मध्ये लताने म्हटले आहे फार सुंदर आहे ही घ्या लिंक http://www.salilda.com/playlists/songs/nonfilm/bengali/adhunik/lata/aami_cholte_cholte.m3u

In reply to by रणजित चितळे

तिमा 09/04/2012 - 20:09
या गाण्यात ये जो मनकी सीमारेखा है, मन 'डोलने' लगता है असं ऐकू येतं.

चौकटराजा 09/04/2012 - 14:21
ही आणि अशीच आणखी कितीतरी दर्जेदार गाणी आहेत जी मिळावी तितकी प्रसिद्धी नाही मिळवू शकलीत. बाकीची गाण्याबाबत काहीच बोलू शकत नाही. पण "कई बार युंही देखा है हे चांगलेच गाजलेले गीत आहे.

In reply to by चौकटराजा

अमृत 10/04/2012 - 10:25
लेखातील सगळेच शब्द प्रमाण मानू नयेत. ते ईंग्रजीत म्हणतात ना 'Take it with pinch of salt' तसंच काहितरी :-) अमृत

Madhavi_Bhave 09/04/2012 - 16:08
तीच गोष्ट 'मंझील' या चित्रपटातील अमिताभवर चित्रीत या गाण्याची. माझ्या बरोबर कंपनीत रूजू झालेला माझा सहकर्मी बरेचदा एक धुन गुणगुणायचा ए़कदा त्याला छेडल्यावर त्यानी हे गाण सांगितलं. याच चित्रपटातील 'रीमझीम गिरे सावन' हे किशोरच्या आवाजातील गाणं बरच गाजलं पण लताच्या आवाजातील 'रीमझीम गिरे सावन' आणि मी इथे बोलत असलेलं तुम्हि दिलेल्या लिन्क वर हे गाणं बघितले. गाणे बघताना डोळे कधी पाणावले तेच कळले नाही. आज का कोण जाणे अगदी उदास उदास होते. हे गाणे पहिले आणि सर्व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. किती निष्पाप मुंबई होती आपली. सर्वत्र एक आपुलकी होती. अमिताभला आणि मौशमीला पावसात भिजताना बघून आता आयुष्यात काय गमावले आहे हे प्रखरतेने जाणवले. पावसात चिंब भिजलेली आपली मुंबई जगातील कोणत्याही शहरापेक्षा सुंदर दिसते (आताची नव्हे). शुटींग करताना मौशमीला वाटले तरी असेल का हा अगदी निरुपद्रवी दिसणारा साधा माणूस, उद्याचा महानायक होणार आहे? जेव्हा जुनी गाणी बघायला मिळतात (म्हणजे रिमोट हातात येतो आणि कोण disturb करत नाही) तेव्हा गाण्यांपेक्षा मी जुन्या काळातली मुंबई कोठे दिसते का हेच बघत असते. आणि म्हणूनच रजनीगंधा किंवा छोटीसी बात असे सिनेमा मी अगदी अधाश्याप्रमाणे पाहत असते. बाकी ह्या सुरेख धाग्य बद्दल खूप धन्यवाद. जरी खूप काही गमावले आहे ह्याची जाणीव जरी झाली तरी मनाला खूप उभारी आली. आजच्या नवीन पिढीला कधीच कळणार नाही त्यांनी काय गमावले आहे ते आजच्या चकचकीत आणि दिखावू माल संस्कृतीच्या जमान्यात.

In reply to by Madhavi_Bhave

इनिगोय 11/04/2012 - 16:18
पावसात चिंब भिजलेली आपली मुंबई जगातील कोणत्याही शहरापेक्षा सुंदर दिसते (आताची नव्हे).
सरींच्या शिडकाव्याने या शहराला लाभणारी प्रसन्नता कधी कुठे हरवली काही कळलंच नाही. जुन्या काळातली देखणी मुंबई, तेव्हाची सुरेख नि प्रशस्त घरे, स्वच्छ मोकळे रस्ते कसे होते ते दाखवणारे रजनीगंधा, छोटीसी बात, घर हे सिनेमे गतरम्यतेची ओढ वाटणार्‍यांना अगदी जिव्हाळ्याचे!

In reply to by पैसा

स्मिता. 11/04/2012 - 16:41
लेख खूप छान झालाय. लेखांमधल्या गाण्यांच्या अनुशंगाने बरीचशी गाणी पुन्हा वर आली आहेत.
भूले बिसरे गीत आणखी आठवून द्या!
असेच म्हणते.

अशोक पतिल 09/04/2012 - 22:51
अगदी बरोबर ! लहानपणीचे दिवस ( ३०-३५ वर्षापुर्वीचे ) आठवल्यावर कसे गलबल्यासारखे होते . 'रीमझीम गिरे सावन' हे गाणे मी यु ट्यूबवर काही दिवसापुर्वी बघीतले...... तर त्या खाली ज्या comments होत्या त्याहि अश्याच भुतकाळ आठवण्यार्‍या, नास्टालजीक होत्या.

रणजित चितळे 09/04/2012 - 11:05
'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है' मुकेश चा आवाज आणि परत एकदा त्या वेळची मुंबई आहाहा. हेच गाणे बंगाली मध्ये लताने म्हटले आहे फार सुंदर आहे ही घ्या लिंक http://www.salilda.com/playlists/songs/nonfilm/bengali/adhunik/lata/aami_cholte_cholte.m3u

In reply to by रणजित चितळे

तिमा 09/04/2012 - 20:09
या गाण्यात ये जो मनकी सीमारेखा है, मन 'डोलने' लगता है असं ऐकू येतं.

चौकटराजा 09/04/2012 - 14:21
ही आणि अशीच आणखी कितीतरी दर्जेदार गाणी आहेत जी मिळावी तितकी प्रसिद्धी नाही मिळवू शकलीत. बाकीची गाण्याबाबत काहीच बोलू शकत नाही. पण "कई बार युंही देखा है हे चांगलेच गाजलेले गीत आहे.

In reply to by चौकटराजा

अमृत 10/04/2012 - 10:25
लेखातील सगळेच शब्द प्रमाण मानू नयेत. ते ईंग्रजीत म्हणतात ना 'Take it with pinch of salt' तसंच काहितरी :-) अमृत

Madhavi_Bhave 09/04/2012 - 16:08
तीच गोष्ट 'मंझील' या चित्रपटातील अमिताभवर चित्रीत या गाण्याची. माझ्या बरोबर कंपनीत रूजू झालेला माझा सहकर्मी बरेचदा एक धुन गुणगुणायचा ए़कदा त्याला छेडल्यावर त्यानी हे गाण सांगितलं. याच चित्रपटातील 'रीमझीम गिरे सावन' हे किशोरच्या आवाजातील गाणं बरच गाजलं पण लताच्या आवाजातील 'रीमझीम गिरे सावन' आणि मी इथे बोलत असलेलं तुम्हि दिलेल्या लिन्क वर हे गाणं बघितले. गाणे बघताना डोळे कधी पाणावले तेच कळले नाही. आज का कोण जाणे अगदी उदास उदास होते. हे गाणे पहिले आणि सर्व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. किती निष्पाप मुंबई होती आपली. सर्वत्र एक आपुलकी होती. अमिताभला आणि मौशमीला पावसात भिजताना बघून आता आयुष्यात काय गमावले आहे हे प्रखरतेने जाणवले. पावसात चिंब भिजलेली आपली मुंबई जगातील कोणत्याही शहरापेक्षा सुंदर दिसते (आताची नव्हे). शुटींग करताना मौशमीला वाटले तरी असेल का हा अगदी निरुपद्रवी दिसणारा साधा माणूस, उद्याचा महानायक होणार आहे? जेव्हा जुनी गाणी बघायला मिळतात (म्हणजे रिमोट हातात येतो आणि कोण disturb करत नाही) तेव्हा गाण्यांपेक्षा मी जुन्या काळातली मुंबई कोठे दिसते का हेच बघत असते. आणि म्हणूनच रजनीगंधा किंवा छोटीसी बात असे सिनेमा मी अगदी अधाश्याप्रमाणे पाहत असते. बाकी ह्या सुरेख धाग्य बद्दल खूप धन्यवाद. जरी खूप काही गमावले आहे ह्याची जाणीव जरी झाली तरी मनाला खूप उभारी आली. आजच्या नवीन पिढीला कधीच कळणार नाही त्यांनी काय गमावले आहे ते आजच्या चकचकीत आणि दिखावू माल संस्कृतीच्या जमान्यात.

In reply to by Madhavi_Bhave

इनिगोय 11/04/2012 - 16:18
पावसात चिंब भिजलेली आपली मुंबई जगातील कोणत्याही शहरापेक्षा सुंदर दिसते (आताची नव्हे).
सरींच्या शिडकाव्याने या शहराला लाभणारी प्रसन्नता कधी कुठे हरवली काही कळलंच नाही. जुन्या काळातली देखणी मुंबई, तेव्हाची सुरेख नि प्रशस्त घरे, स्वच्छ मोकळे रस्ते कसे होते ते दाखवणारे रजनीगंधा, छोटीसी बात, घर हे सिनेमे गतरम्यतेची ओढ वाटणार्‍यांना अगदी जिव्हाळ्याचे!

In reply to by पैसा

स्मिता. 11/04/2012 - 16:41
लेख खूप छान झालाय. लेखांमधल्या गाण्यांच्या अनुशंगाने बरीचशी गाणी पुन्हा वर आली आहेत.
भूले बिसरे गीत आणखी आठवून द्या!
असेच म्हणते.

अशोक पतिल 09/04/2012 - 22:51
अगदी बरोबर ! लहानपणीचे दिवस ( ३०-३५ वर्षापुर्वीचे ) आठवल्यावर कसे गलबल्यासारखे होते . 'रीमझीम गिरे सावन' हे गाणे मी यु ट्यूबवर काही दिवसापुर्वी बघीतले...... तर त्या खाली ज्या comments होत्या त्याहि अश्याच भुतकाळ आठवण्यार्‍या, नास्टालजीक होत्या.
काही गाणी असतातच अशी एकदा ऐकली की कधी जिभेवर चढतात आणि ह्रदयात उतरतात कळतच नाही. एक सुंदर गाणं जमवून यायला जसे शब्द आणि संगीत मदत करतात तितकीच किंबहूना त्याहून जास्त मदत गाण्याचं चित्रिकरण आणि कलाकार ज्याच्यावर चित्रिकरण झालेलं आहे ते सुद्धा करतात. बर्‍याच चित्रपटात काही गाणी अतिशय सुमधूर असून देखील त्याच चित्रपटातील इतर काही अतिप्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या सावलीत झाकोळून जातात. आज काल युट्यूब आणि इतर संस्थळांमूळे ही सर्व परिचीत - अपरिचीत गाणी सहज उपलब्ध झाली आहेत. 'स्विकार किया मैने' या चित्रपटातील 'शबाना आझमीं'वर चित्रीत केलेलं हे गाणं असच एक अप्रतिम मास्टरपीस.

मारवा !

चैतन्य दीक्षित ·

तिमा 06/04/2012 - 16:54
प्रकटन आवडले. तुम्ही संगीताचा असा आनंद घेऊ शकताय म्हणजे तुम्ही फारच सुदैवी आहात. कल्पना करा, ज्यांना असे संगीत 'अपील' होत नाही ते किती दुर्दैवी असतील ? पु.ले.शु.

प्यारे१ 06/04/2012 - 17:07
>>>त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला! होतं हळवं मन कधी कधी. खूप तरल लिहीलंय! कवितेसारखं

चिंतामणी 06/04/2012 - 17:40
>>>मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते, थोडी दूरूस्ती करून म्हणेन "असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना, तसेच सुर्यास्ताचे वेळेस मारवा ऐकताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते"

सुधीर 06/04/2012 - 18:20
छान लिहिलयत, भावनांना सुंदररित्या शब्दात बद्ध केलंयत!

बहुगुणी 06/04/2012 - 18:31
चैतन्यराव, इतकं सुरेख शब्दचित्र उभं केलंयत की ते रेकॉर्डिंग शोधून काढायला आणि ऐकायला लावलंत! क्या बात है! पुनःप्रत्ययासाठी इथेच दुवा देतो आहे, ज्यांना हवं असेल त्यांनी उतरवून घ्यावं. (बाकी वरती तिरशिंगरावांनी म्हंटलंय तसं तुम्ही सुदैवी आहात असा संगीताचा आस्वाद घेऊ शकताय म्हणून, आम्हाला केवळ या महान गायकांनी काही तरी सुंदर 'जागा' घेतलीय इतकंच कळतं, त्यापलिकडे काही ज्ञान कधीतरी मिळेल अशी आशा ठेवून आहे....)

श्रावण मोडक 06/04/2012 - 20:27
तुझं नाव पाहून धागा उघडल्याचं सार्थक झालं असली घीसीपीटी कमेंट न करता म्हणतो, वा! इथं हा आटोपशीरपणा उत्तमच. मारव्यातलं एखादं गाणं ऐकल्यासारखा पुरेसा. पण... मारवा इतका छोटा निश्चित असू शकत नाही. तेव्हा, आणखी येऊ द्या... :)

शुचि 06/04/2012 - 22:53
>> असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते >> कोण म्हणतं असं? नाही कारण जे कोणी हे वाक्य बोलले आहे ते खरे आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. वसंतरावांची मुलाखत इथे ऐकता येईल. (इथे ते मारव्याबद्दल जे बोललेत, ते मारव्याचं यथार्थ वर्णन आहे)

तिमा 06/04/2012 - 16:54
प्रकटन आवडले. तुम्ही संगीताचा असा आनंद घेऊ शकताय म्हणजे तुम्ही फारच सुदैवी आहात. कल्पना करा, ज्यांना असे संगीत 'अपील' होत नाही ते किती दुर्दैवी असतील ? पु.ले.शु.

प्यारे१ 06/04/2012 - 17:07
>>>त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला! होतं हळवं मन कधी कधी. खूप तरल लिहीलंय! कवितेसारखं

चिंतामणी 06/04/2012 - 17:40
>>>मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते, थोडी दूरूस्ती करून म्हणेन "असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना, तसेच सुर्यास्ताचे वेळेस मारवा ऐकताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते"

सुधीर 06/04/2012 - 18:20
छान लिहिलयत, भावनांना सुंदररित्या शब्दात बद्ध केलंयत!

बहुगुणी 06/04/2012 - 18:31
चैतन्यराव, इतकं सुरेख शब्दचित्र उभं केलंयत की ते रेकॉर्डिंग शोधून काढायला आणि ऐकायला लावलंत! क्या बात है! पुनःप्रत्ययासाठी इथेच दुवा देतो आहे, ज्यांना हवं असेल त्यांनी उतरवून घ्यावं. (बाकी वरती तिरशिंगरावांनी म्हंटलंय तसं तुम्ही सुदैवी आहात असा संगीताचा आस्वाद घेऊ शकताय म्हणून, आम्हाला केवळ या महान गायकांनी काही तरी सुंदर 'जागा' घेतलीय इतकंच कळतं, त्यापलिकडे काही ज्ञान कधीतरी मिळेल अशी आशा ठेवून आहे....)

श्रावण मोडक 06/04/2012 - 20:27
तुझं नाव पाहून धागा उघडल्याचं सार्थक झालं असली घीसीपीटी कमेंट न करता म्हणतो, वा! इथं हा आटोपशीरपणा उत्तमच. मारव्यातलं एखादं गाणं ऐकल्यासारखा पुरेसा. पण... मारवा इतका छोटा निश्चित असू शकत नाही. तेव्हा, आणखी येऊ द्या... :)

शुचि 06/04/2012 - 22:53
>> असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते >> कोण म्हणतं असं? नाही कारण जे कोणी हे वाक्य बोलले आहे ते खरे आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. वसंतरावांची मुलाखत इथे ऐकता येईल. (इथे ते मारव्याबद्दल जे बोललेत, ते मारव्याचं यथार्थ वर्णन आहे)
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

गीतगुंजन १७ : Hole In My Soul

प्रास ·

आत्मशून्य 31/03/2012 - 15:20
वाह! टिनेज इव्हा मेंडीस चक्क लोभस (स्वीट नॉट हॉट) दिसली, हा व्हीडीओ प्रथमच पाहीला व सोबतीला एम-टीव्हीचा लोगो बघुन तर भुतकाळच जिवंत झाला :) बाकी कालीयामर्दनसद्रुश्य "अल्बम कव्हर" कशासाठी यावरही प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by आत्मशून्य

प्रास 31/03/2012 - 15:31
सर्व प्रतिसादकांचे आभार! आत्मशून्यजी, रेकॉर्डिंग कंपनीच्या क्रियेटिव्हीटीचं हे रेकॉर्ड कव्हर उत्तम नमूना होईल. अल्बमचं नाव, 'नाईन लाईव्हज्' आणि या नावाचा मांजरीशी घनिष्ठ संबंध. तेव्हा कालिया - मर्दनाच्या कृष्णाच्या जागी मार्जारमुखी व्यक्ती येऊन अनेक फणा असलेल्या नागाशी लढूनही जिवंत राहणे उठून दिसते आणि अल्बमचे 'नाईन लाईव्हज्' हे नावही अधोरेखित होते. बाकी, हे कव्हर पहिलं होतं. पुढे या अल्बमचं आणखी एक कव्हरही बनवलं गेलं. ते हे -
मला तर ही दोन्ही कव्हर्स जाम आवडली. क्रियेटिव्ह वाटली, पाट्या टाकू नाही. :-)

चौकटराजा 31/03/2012 - 15:44
यातली बरीचशी ष्टोरी आमचीच दिसतीया . पर त्ये आता शेवटचं त्येच्या वर्गातली प्वोर त्येला लाइक करीती ते काय नाय झालं ब्वा आपल्या जीवणात ! माजी आवस्ता खालील परमान व्हती येव्हरी बडी इज लोनसम फार सम्बाडी येल्स नो बाडी लोनसम फार म्यी

आत्मशून्य 31/03/2012 - 15:20
वाह! टिनेज इव्हा मेंडीस चक्क लोभस (स्वीट नॉट हॉट) दिसली, हा व्हीडीओ प्रथमच पाहीला व सोबतीला एम-टीव्हीचा लोगो बघुन तर भुतकाळच जिवंत झाला :) बाकी कालीयामर्दनसद्रुश्य "अल्बम कव्हर" कशासाठी यावरही प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by आत्मशून्य

प्रास 31/03/2012 - 15:31
सर्व प्रतिसादकांचे आभार! आत्मशून्यजी, रेकॉर्डिंग कंपनीच्या क्रियेटिव्हीटीचं हे रेकॉर्ड कव्हर उत्तम नमूना होईल. अल्बमचं नाव, 'नाईन लाईव्हज्' आणि या नावाचा मांजरीशी घनिष्ठ संबंध. तेव्हा कालिया - मर्दनाच्या कृष्णाच्या जागी मार्जारमुखी व्यक्ती येऊन अनेक फणा असलेल्या नागाशी लढूनही जिवंत राहणे उठून दिसते आणि अल्बमचे 'नाईन लाईव्हज्' हे नावही अधोरेखित होते. बाकी, हे कव्हर पहिलं होतं. पुढे या अल्बमचं आणखी एक कव्हरही बनवलं गेलं. ते हे -
मला तर ही दोन्ही कव्हर्स जाम आवडली. क्रियेटिव्ह वाटली, पाट्या टाकू नाही. :-)

चौकटराजा 31/03/2012 - 15:44
यातली बरीचशी ष्टोरी आमचीच दिसतीया . पर त्ये आता शेवटचं त्येच्या वर्गातली प्वोर त्येला लाइक करीती ते काय नाय झालं ब्वा आपल्या जीवणात ! माजी आवस्ता खालील परमान व्हती येव्हरी बडी इज लोनसम फार सम्बाडी येल्स नो बाडी लोनसम फार म्यी
3

काहीतरी नवीन..

प्राजु ·

जयवी 24/03/2012 - 02:06
अहा.........क्या बात है....!! छान झालीयेत गं गाणी :) पुढच्या सांगितिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्राजुडी :)

सोत्रि 24/03/2012 - 11:44
'पाकळ्या रुसल्या जरी' ह्या गीताचे बोल खूप आवडले आणि 'जरा झोक्कात गीत' ह्या गाण्याचा ठेका खूप आवडला. बाकीची गाणी ठीक आहेत एवढी नाही खास रूचली. असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा ! - ('काहीतरी नवीन' करावेसे वटणारा) सोकाजी

जरा झोकात गीत मला गाऊ दे... चा ठेका लैच आवडला. बाकी गीतंही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आवडतीलच. शुभेच्छा आहेतच.....!!! आणि मनःपूर्वक अभिनंदन. -दिलीप बिरुटे

चित्रा 26/03/2012 - 03:17
अभिनंदन, प्राजु! अशीच तुझी प्रगती होऊ दे आणि आम्हाला तुझी नवनवीन गाणी ऐकायला मिळत राहू देत. चाली आणि संगीतयोजनाही सुरेख आहेत.

In reply to by धनंजय

बहुगुणी 01/04/2012 - 09:57
असंच म्हणतो...या पुढच्या पावलासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!

जयवी 24/03/2012 - 02:06
अहा.........क्या बात है....!! छान झालीयेत गं गाणी :) पुढच्या सांगितिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्राजुडी :)

सोत्रि 24/03/2012 - 11:44
'पाकळ्या रुसल्या जरी' ह्या गीताचे बोल खूप आवडले आणि 'जरा झोक्कात गीत' ह्या गाण्याचा ठेका खूप आवडला. बाकीची गाणी ठीक आहेत एवढी नाही खास रूचली. असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा ! - ('काहीतरी नवीन' करावेसे वटणारा) सोकाजी

जरा झोकात गीत मला गाऊ दे... चा ठेका लैच आवडला. बाकी गीतंही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आवडतीलच. शुभेच्छा आहेतच.....!!! आणि मनःपूर्वक अभिनंदन. -दिलीप बिरुटे

चित्रा 26/03/2012 - 03:17
अभिनंदन, प्राजु! अशीच तुझी प्रगती होऊ दे आणि आम्हाला तुझी नवनवीन गाणी ऐकायला मिळत राहू देत. चाली आणि संगीतयोजनाही सुरेख आहेत.

In reply to by धनंजय

बहुगुणी 01/04/2012 - 09:57
असंच म्हणतो...या पुढच्या पावलासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!
बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे! मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली.

लिलाव

योगेश पितळे ·

रामपुरी 20/03/2012 - 21:36
ग्रुरू हे नाव आहे? अर्थ काय त्याचा? पहिल्यांदाच असलं कैच्याकै नाव ऐकलं...

In reply to by रामपुरी

योगेश पितळे 20/03/2012 - 22:14
:)... तुमची कमेंट वाचून अंतू बर्व्याच्या , "कोकणातल्या सा-या म्हशी मेल्या का गो ?" या तिरकस कमेंटची आठवण झाली!

रामपुरी 20/03/2012 - 21:36
ग्रुरू हे नाव आहे? अर्थ काय त्याचा? पहिल्यांदाच असलं कैच्याकै नाव ऐकलं...

In reply to by रामपुरी

योगेश पितळे 20/03/2012 - 22:14
:)... तुमची कमेंट वाचून अंतू बर्व्याच्या , "कोकणातल्या सा-या म्हशी मेल्या का गो ?" या तिरकस कमेंटची आठवण झाली!
मिपाकरांना नमस्कार, संगीतकार श्रीधर फडके हे मराठी भावसंगीतातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व! ऋतु हिरवा, तेजोमय नादब्रम्ह, संगीत मनमोही रे अशा अनेक अल्बम्सनी मराठी मनाला गेली अनेक वर्षे घातलेली मोहीनी अजूनही तशीच आहे. यात भर म्हणून श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा "लिलाव"साठी काम करण्याचा मला योग आला.

वाह उस्ताद!

अक्षया ·

पैसा 17/03/2012 - 19:14
आठवणी छानच आहेत, पण खाण्याच्या टेबलावर बसलेल्या माणसाला उठवून फोटो काढायची हौस असणार्‍या मंडळींचा केवळ राग येतो.

एवढ्या मोठ्या कलावंताच्या सहवासात दोन दिवस राहायला मिळणं आणि त्यांना कला सादर करताना पाहणं हा आनंद अवर्णनियच म्हणावा लागेल. नशिबवान आहात.

In reply to by अक्षया

यकु 18/03/2012 - 10:58
तुम्ही खरंच नवीन दिसताय. तुमच्याशी लोकांनी मारलेल्या गप्पा 'माझी खरडवही '* मध्ये दिसतील. तुम्हाला लोकांशी गप्पा मारायच्या असतील तर प्रत्येकाच्या प्रोफाईलवर ' यांची खरडवही पहा' हा पर्याय आहे. तिथे तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारु शकता. हा मेन बोर्ड आहे सगळ्या जगाला दिसणारा. खरडवह्या सदस्य नसलेल्यांना दिसू शकत नाहीत. *माझी म्हणजे माझी नाही, तुमची. 'गप्पा मारण्या करिता कोणता ऑपशन आहे ' ही तुमची स्वाक्षरी तर नाहिये ना?

दादा कोंडके 17/03/2012 - 20:16
विथ ड्यु रिस्पेक्ट, मला कलाकरांचा बाबतीत लोकांचे आलेले हे असले अनुभव वाचून कायम गंमत वाटत आलेली आहे. ते कलाकार म्हणून ग्रेट आहेत. त्यामुळे ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं. बाकी एका संकुचित वलयात राहून हा विनय, नम्रता, साधेपणा वगैरे दाखवणं हा एक स्वार्थच असतो. स्वतःच्या फॅन्सना दुखवून त्यांना चालणारच नसतं. स्वतःला कुठल्या लोकांसमोर कसं प्रोजेक्ट करावं हे ते जाणून असतात. स्पिक मॅके मध्ये काम करणार्‍या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे. जेंव्हा लोकांना दुखावण्याची पाळी येते तेंव्हा शिताफीनं हे लोक आपल्या सेक्रेटरींना पुढे करतात.
उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली
ह्या कलाकारांकडून बाकी पिपल मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला छान शिकायला मिळेल. शुभेच्छा!

In reply to by दादा कोंडके

रेवती 17/03/2012 - 20:34
दोन्ही बाजू आहेत याला. कलावंतांनी कमी बिदागी स्विकारून काम का करावे? पुरेशी बिदागी मिळत असताना, कार्यक्रम ठरलेला असताना निघून जाणे मात्र बरोबर नाही. फ्यान कंपनीनेही समोरच्याचे खाणेपिणे चालू असताना बाजूला वाट बघत उभे का राहू नये?

In reply to by दादा कोंडके

विजुभाऊ 19/03/2012 - 18:29
स्पिक मॅके मध्ये काम करणार्‍या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे कार्यक्रम केल्यानंतर हातात बिदागी मिळाली नाही तर कलाकार अक्षरशः काहीच करू शकत नाही. कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतात. मराठीतले एक नामवंत कलाकार यासाठी नाटकाच्या दुसर्‍या अंकाच्या अगोदर मानधनाचे पाकिट स्टेजवर मागत असत

In reply to by विजुभाऊ

दादा कोंडके 20/03/2012 - 01:53
आता हे वाचा. ह्यात उस्ताद म्हणतात, "खेळणे बंद झाले तरी क्रिकेटचे वेड कणभरही कमी झाले नाही. 2011 च्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना चालू असताना माझे कॉन्सर्ट चालू होते. मी मैफिलीत तबला वाजवत होतो, तरी तबला आणि पायाच्या मध्ये मी मोबाईलवर क्रिकेटची वेबसाईट उघडून ठेवली होती आणि लाइव्ह स्कोअर पाहात होतो. मध्येच इंटरनेट कनेक्‍शन तुटले तर संयोजक मित्राला खूण करून स्कोअर काय झाल्याची विचारणा केली. दोन मिनिटांत त्याने चिठ्ठी पाठवून स्कोअर कळवला." आता मला सांगा, ज्याला क्रिकेटचं वेड वगैरे असून सुद्धा वर्ल्डकप फायनल मॅचच्या वेळी (जीचं टाइमटेबल कित्येक महिने आधिच माहित असतं) हे कॉन्सर्ट करत होते. आणि दिडक्या मोजून आलेल्या प्रेक्षकांसमोर चोरून स्कोर बघितल्याचं मलातरी अजिबात कौतुक नाही. उलट, एखादा प्रेक्षक असं करत असला तर भर मैफलित त्याचा अपमान करायला सुद्धा कमी केलं नसतं.
कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतात
मी तेच तर म्हणतोय, एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.

In reply to by दादा कोंडके

अन्या दातार 20/03/2012 - 07:57
ज्याची त्याची आवड! शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही. का? कामाच्या वेळी फक्त काम केलं पाहिजे हे जर कलाकाराच्या बाबतीत म्हणत असाल तर स्वतः त्यातून सूट का घेता? शेवटी मैफल कशी झाली हे महत्वाचं. अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही. कारण कितीही झालं तरी प्रेस्टीजचा प्रश्न असतो. एकदा जर का ही इज्जत धुळीस मिळाली तर त्याचा खूप मोठा फटका बसतो.
एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत. अश्या वेळेस ज्यांचे पाय जमिनीवरच घट्ट राहतात त्यांना तो मान का देऊ नये? उस्तादजींची विनयशीलता उठून दिसत नाही का?

In reply to by अन्या दातार

मूकवाचक 20/03/2012 - 09:13
उ. निजामुद्दीन खानसाहेबांच्या एका सत्कार सोहळ्यात त्यांना स्टेजवर चढताना पायातली चप्पल वारंवार निसटून त्रास होत असल्याचे पाहून उ. झाकिर हुसेन यांनी चक्क त्यांचे जोडे उचलत त्यांना आधार देत मदत केली होती, ती देखील अगदी सहजपणे. एखादा शागिर्द सुद्धा असे काही करताना बिचकेल. काही गोष्टी रक्तात मुरलेल्या असल्याशिवाय, खोलवर तसे संस्कार असल्याशिवाय करता येत नाहीत. अदबशीरपणाची 'अ‍ॅक्टिंग' कुणी जन्मभर सातत्याने करू शकत नाही. ढोंग असेल तर कधी ना कधी उघडकीस येतेच. नीतीमत्तेच्या गप्पा मारणे सोपे आहे. आयुष्यभर रियाझ, तपस्या केलेल्या कलाकारांची कला आज सगळीकडे बोकाळलेल्या पायरसीमुळे फुकटात ऐकता/ पाहता येते. त्यामुळे कलाकाराला त्याच्या दर्जाप्रमाणे रॉयल्टी मिळणे वगैरे तर सोडाच, त्याचे आल्बम बाजारात येणे कमी होउन शेवटी आल्बम प्रकाशित होणे या माध्यमातून अक्षरशः पाच पैसे देखील मिळू नयेत अशी वेळ आलेली आहे. 'ज्याने पाप केले नाही त्याने पहिला दगड मारावा' असे ख्रिस्तवचन आहे, त्याप्रमाणे ज्याच्या संग्रही एकही पायरेटेड एमपी३ नाही, अशानेच कलाकारांवर दांभिकतेचे आरोप करावेत असे विनम्रपणे सुचवतो. असो.

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 20/03/2012 - 17:36
शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही. माझी आणि उस्ताद साहेबांची तुलना केल्यामुळे ड्वाले पाणावले! :)
अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही.
तेच ना, एकदा मोठ्ठा कलाकार म्हटला की मग सगळ्या घटणा हव्यातशा चिकटवता येतात. आणि त्याच्या साध्या साध्या गोष्टी अजूबाजुची मंडळी रंगवून सांगतात. (त्यात त्या कलाकाराच्या मोठ्ठेपणापेक्षा खरंतर, मी तीथं होतो हेच सांगायचं असतं, आणि त्यात जर कलाकार निवर्तला असेल तर अशा उपटसुंभांची गद्रीच-गद्री होते (कारण त्या घटणांचा खरे-खोटेपणा तपासणारा दुवाच नसतो!) :))
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत.
पद वगैरे कुठलं आहे हो? (उस्ताद, पंडीत ई पदं कुठली युनिवर्सिटी देते ते मला माहीत नाही) कलाकार, खेळाडू वगैरे मंडळी फक्त लोकांमुळेच मोठ्ठी होतात. आता कुणी आवरा म्हणायच्या आत आवरतं घेतो! ;)

In reply to by दादा कोंडके

शिल्पा ब 21/03/2012 - 10:52
मोठ्ठ्या पदव्या घेतलेले फार मोठ्ठे असतात? वा!! तेंडुलकर किंवा उस्ताद हुसेन यांच्याकडे पदवी नसेल पण त्यांचे कसब जगाला वेड लावेल असेच आहे. असो. शेवटी ज्याची त्याची समज.

In reply to by दादा कोंडके

शेखर काळे 20/03/2012 - 03:40
त्यांच्या कलेवर अवलंबून असते. आणि ही कला शाश्वत असते याची काहीच शाश्वती नसते. तेव्हा वेळ असतांना त्यांनी दोन पैसे आपल्या गाठीशी बांधले तर त्यात काही वावगे वाटू नये. आपणही कुठे वस्तू दोन पैशांनी स्वस्त मिळत असेल तर तेथे धावतोच की. त्यांनीही कुठे त्यांना पैसे जास्त मिळत असतील तर तेथे का जाऊ नये ? ही गोष्ट खरी - ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं. पुढे कार्यक्रम संपला की ती ही आपल्याच सारखी तहान-भूक-झोप लागणारी माणसे असतात, - शेखर काळे

In reply to by दादा कोंडके

अक्षया 20/03/2012 - 09:48
अहो, ह्या कलाकाराचा दर्जा कीती महान आहे हे इथे सांगणे अवघड आहे, केवळ पैशासाठी कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांपैकी हे नाहीत, आणि त्यांना तसे करण्याची गरजही नाही. त्यांनी अनेक भारतीय गरीब पण महान कलाकारान चे पूर्ण कुटुंब पोसली आहेत ते सुद्धा कुठेही त्याचा साधा उल्लेखही न करता फक्त शब्दासाठी आणि कलेचा आदर करण्यासाठी. ते माणूस म्हणून किती महान आहेत ह्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काही कलाकारान बाबतीत असेल तसे पण... अशा दिग्गज कलाकारांबाब्तीत असे उद्गार काढताना आधी त्यांची पूर्ण माहिती घ्यावी... असे मला मनापासून वाटते.

अस्मी 20/03/2012 - 12:50
खरंच भाग्यवान आहात... छान आठवणी, आणि नेटकेपणे मांडल्यायत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा..लिहीत राहा.

अक्षया जी, तुमचा लेख आवडला, आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या कलाकार व्यक्तिमत्वा बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचेही अभिनंदन. आपल्या समाजात 'इतरांना नावे ठेवणे' हा जन्म सिद्ध अधिकार मानला जातो, त्याचाच प्रत्यय वरील काही प्रतिक्रिया वाचून येतो, आता मला सांगा उस्ताद झाकीर भाई किती बिदागी घेतात येथ पासून ते थेट people management वैगेरे पर्यंत बोलून काय मिळते ते मला तरी समजत नाही..., आणि हीच लोकं स्वतः कोणासाठी पदरचा १ रुपया तरी खर्च करत असतील का..? याची शंका येते..! ते नोकरी करताना फुकट करतात का? पगार घेतातच ना..? मग इतरांच्या बाबतीत बोलण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही! आणि झाकीर भाईन सारख्या कलाकारा बद्दल बोलायची तर 'लाय...' हि नाही. अतिशय नितळ आणि स्वच्छ असे हे व्यक्तीमत्व आहे, तुम्ही नमूद केल्या प्रमाणे ते आजही कित्येक गरीब कालाराकारांची कुटुंबे अक्षरशः पोसत आहेत, ते हि त्याचा कुठे हि गाजावाजा न करता. त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्या बद्दल हि खूप काही बोलले जाते, पण फार कमी लोकांना हे माहित आहे कि तिथे राहून तेथील इच्छुकांना नियमित मोफत तबल्याचे शिक्षण देतात. भारतात आल्यावर कार्यक्रम संपल्यावर कित्येक पडद्यामागच्या दुर्लक्षित कामगारांची पाठ थोपटायची ते विसरत नाहीत तसेच त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ कलाकारांच्या पायावर मस्तक टेकवायला कमीपणा मानत नाहीत. आज हा तबल्याच्या दुनियेचा शेहेन्शहा कित्येक जणांचा देव, गुरु तसेच पोशिंदा हि आहे, अश्या या महान कलाकाराला मनापासून 'सलाम'.

In reply to by वेल्लोकॅस्त

दादा कोंडके 23/03/2012 - 00:09
तुमच्या प्रतिक्रियेतलं एकेक वाक्य घेउन खौट उत्तर लिहिणार होतो. पण मध्येच कंटाळा आला आणि ही प्रतिक्रिया एका व्यक्तीपूजक माणसानं खूप उत्तेजित होउन लिहिली आहे त्यामुळे त्याच्यापर्यंत उत्तर पोहोचणारच नाही असं वाटलं. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेला प्रचंड विनोदी प्रतिसाद एव्हडं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो. बाकी एकेक वाक्य घेउन धोबीपछाड उत्तरं लिहिणार्‍या मिपाकरांचा खरंच हेवा वाटतो.

In reply to by दादा कोंडके

अक्षया 23/03/2012 - 12:23
हम्म छान!!! विनोदी नाही आहे ते लिहिलेल खर आहे... :) दोन शब्दात मान्य केल्या बद्दल धन्यवाद...

अक्षया 22/03/2012 - 18:06
धन्यवाद!! मिपावर स्वागत असेच लिहित रहा...

यकु 23/03/2012 - 01:01
झाकीर हुसैन यांच्याबद्दल एका गोष्‍टीचा हेवा करण्यासारखा आहे. युट्यूबवर रविशंकर आणि झाकीर यांचे वालिद अल्लारखां यांच्या त्या काळात अमेरिकेत चित्रांकन केलेल्या क्लिप आहेत. अल्लारखां फक्त वाजवणार आणि रविशंकर त्या इंग्लिश श्रोत्यांना काय वाजवलं आहे, कसं वाजवलं आहे हे उलगडून सांगणार. मग पुन्हा अल्लारखां फक्त वाजवणार आणि श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट. मला निश्चित माहित नाही, पण अल्लारखांना इंग्लिश बोलता येत नसावी. आज फक्त झाकीर यांच्याकडे नजर टाकली तरी पुरेसं आहे. जाताजाता: झाकीर (शागीर्द) आणि अल्लारखां (उस्ताद) या दोन घनपाठींच्या स्वाहाकारातून प्रकटणारं नादब्रह्म आणि ते प्रकटताच जाणकार श्रोत्यांनी तर्जन्यांच्या द्वारे केलेला निशब्द घोष पहाण्यासारखा आहे. त्यानंतर 8.47 वर अल्लारखांनी झाकीरकडे टाकलेला दृष्‍टीक्षेप 'बेटा, तु माझे पांग फेडलेस' हेच सांगणारा आहे.

दादा कोंडके 24/03/2012 - 14:46
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का? वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं. बाकी, मी झाकीर हुसेन, तेंडूलकर यांच्याबद्दल वैयक्तीक पातळीवर बोलतच नाहिये. कला-खेळ सोडली तर ही आपल्यासरखीच आहेत असं माझं म्हणणं आहे हे पुन्हा सांगतो. या मोठ्या लोकांना हे माहित असतं की, समाजात रहायचं म्हणजे नुसता पैसा आणि कला असून चालत नाहीत. लोकांमध्ये एक "फिलाँथ्रोपिस्ट" म्हणून एक प्रतिमा म्हणा, गुडवील म्हणा, लागतं. थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो. कलाकार-खेळाडू यांना थोडसं जास्तं करावं लागतं कारण तेच त्यांचं अ‍ॅसेट असतं. आपण थोडीशी व्यक्तीपुजा कमी केली आणि त्यांना "माणूस" म्हणून अ‍ॅक्सेप्ट केलं की मग त्यांच्या असल्या साधेपणाचं, विनयाचं किंवा दानशुरतेचं कौतुक राहणार नाही, आणि त्यांनी घरासमोरून उड्डाणपूल जाउ नये म्हणून राजकीय वजन वापरलं किंवा सत्यसाईबाबा गेल्यावर रडले तर दु:ख पण होणार नाही.

In reply to by दादा कोंडके

अक्षया 24/03/2012 - 15:57
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का?
सगळ्याच प्रतिक्रिया तितक्याच माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.
वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं.
मी तिथे होते हे सांगण्यात हि काही विशेष नव्हते.. कारण अशा बर्‍याच कार्यक्रमाला मी नेहमीच जात असते. आणि फक्त ते सांगण्यासाठी लेखप्रपंच करायची मला काही जरुर नव्हती. मिपावर आल्यावर पहिलाच लेख आपण झाकीरजींवर लिहावा असं मला वाटलं, इतकंच!
थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो.
तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे कि हे कलाकारही आपल्यासारखी माणसेच आहेत, काहीच शंका नाही त्यात. हे लहान प्रसंग तुमच्या आमच्या बाबतीत घडले तर काही विशेष नसते परंतु ते ज्या जागी आहेत तिथे गेल्यावरहि पाय जमिनीवर असणे हे मला विशेष वाटले..!! असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.... :)

In reply to by दादा कोंडके

अरे येड्या तुझ्या खोट्या नावाला तरी जाग !!! if you really do not belive in idol worship, then why have you kept your name dada kondke you should have publushed your real name... We worship there talent and not them... तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...

In reply to by स्वप्निल घायाळ

दादा कोंडके 23/06/2012 - 18:07
तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...
हे पहा साहेब, आम्हाला काय शोभतं अन काय नाही ते आमचं आम्ही पाहून घेउ. तुमच्या तोंडात शोभणार्‍या गोष्टी देउ का? :|

खरंच एवढ्या मोठ्या व गुणी कलाकारासोबत काम करायला मिळणे हि भाग्याची गोष्ट आहे. अन तो अनुभव या लेखाद्वारे इतरांबरोबर वाटून आपण भले काम केले आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 23/06/2012 - 12:00
उस्तादजींचे नाव ऐकले की आठवतो २००८ चा वसंतोत्सव.... राहूल देशपांडेंच्या गायनानंतर.. शिवमणी, शंकर महादेवन, E U श्रीनिवासन् आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना ऐकणे हा "अनुभव" होता. कवड्याच्या माळा आणि हलका तबल्याचा आवाज यांनी केलेली शिववंदना सुरू असताना शिवमणीने फुंकलेला शंख क्षणात वेगळ्या विश्वात घेवून गेला. पुढचे ३ तास भान हरपण्याचे होते. शिवमणीने त्याच्या असंख्य वाद्यांच्या सहाय्याने तबल्याला केलेली साथ, कधी गंमत म्हणून केलेली स्पर्धा.. आणि सगळ्या Sophisticated आणि अत्याधुनीक वाद्यांना केवळ तबल्याने दिलेले उत्तर.. अप्रतीम...!!! शंकर महादेवन आणि E U श्रीनिवासन् ना साथ करताना मुद्दामहून घेतलेला दुय्यमपणा, बाकीच्या कलाकारांना योग्य मान देणारे, दाद देणारे आणि त्यांची कला आणखीन खुलवणारे उस्तादजी. तबला वाजवताना एका क्षणी तबल्यातून काढलेला शंखाचा आवाज.. एक एक तान म्हणून दाखवून तबल्यातून तसेच काढलेले बोल.. गणपतीची वेगवेगळी नावे आणि ती नावे तबल्यातून बोलून दाखवून मिळवलेली दाद. __/\__ शेवटी "कार्यक्रम संपला आहे" असे संयोजकांना सांगावे लागले यातच सर्व आले. (यानंतर रमणबागेतून सिंहगड रोडवरील रूमवर एका वेगळ्याच धुंदीत चालत आलो होतो :-))

लीलाधर 11/09/2012 - 12:04
एवढ्या मोठ्या कलाकारासोबत दोन दिवस एकत्र अनुभवायला मिळाले हे खरेच कौतुकास्पद आहे. आणि त्यात तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला शेअर केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार :)

sagarpdy 11/09/2012 - 12:48
कार्यक्रम पुण्यात झाला नव्हता तर?! याच दरम्यान त्यांचा आणि पं. रविशंकर यांचा पुण्यात कार्यक्रम झाला होता. असो एव्हढ्या मोठ्या असामीला एव्हढ्या जवळून पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन !

डावखुरा 11/09/2012 - 15:35
मस्त अनुभव... मला आठवते..जळगांव मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव होता.. तेव्हा नुकतीच ती रात्री दहाच्या आतची कार्यक्रमबंदी लागु झालेली होती.. झाकीर हुसैन यांना तेव्हा प्रथमच ऐकायची संधी मिळाली होती.. आणि ती एक अविस्मरणीय स्मृती बनुन मनाच्या एका कोपर्यात कायमची कोरली गेली आहे.. अविस्मरणीय परफॉरमन्स.. सर्व देवतांचे नाव तबल्यावर वाजवुन दाखवले.. नंतर उजव्या एका हाताने एक ताल कंटीन्यु वाजवत राहुन दुसर्या हाताने ईतर सर्व ताल जवळपास अर्धा तास हे वादन...वाह उस्ताद..खरंच जवाब नहीं ईनका.. पुन्हा एकदा त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु..अक्षया ताई..

पैसा 17/03/2012 - 19:14
आठवणी छानच आहेत, पण खाण्याच्या टेबलावर बसलेल्या माणसाला उठवून फोटो काढायची हौस असणार्‍या मंडळींचा केवळ राग येतो.

एवढ्या मोठ्या कलावंताच्या सहवासात दोन दिवस राहायला मिळणं आणि त्यांना कला सादर करताना पाहणं हा आनंद अवर्णनियच म्हणावा लागेल. नशिबवान आहात.

In reply to by अक्षया

यकु 18/03/2012 - 10:58
तुम्ही खरंच नवीन दिसताय. तुमच्याशी लोकांनी मारलेल्या गप्पा 'माझी खरडवही '* मध्ये दिसतील. तुम्हाला लोकांशी गप्पा मारायच्या असतील तर प्रत्येकाच्या प्रोफाईलवर ' यांची खरडवही पहा' हा पर्याय आहे. तिथे तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारु शकता. हा मेन बोर्ड आहे सगळ्या जगाला दिसणारा. खरडवह्या सदस्य नसलेल्यांना दिसू शकत नाहीत. *माझी म्हणजे माझी नाही, तुमची. 'गप्पा मारण्या करिता कोणता ऑपशन आहे ' ही तुमची स्वाक्षरी तर नाहिये ना?

दादा कोंडके 17/03/2012 - 20:16
विथ ड्यु रिस्पेक्ट, मला कलाकरांचा बाबतीत लोकांचे आलेले हे असले अनुभव वाचून कायम गंमत वाटत आलेली आहे. ते कलाकार म्हणून ग्रेट आहेत. त्यामुळे ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं. बाकी एका संकुचित वलयात राहून हा विनय, नम्रता, साधेपणा वगैरे दाखवणं हा एक स्वार्थच असतो. स्वतःच्या फॅन्सना दुखवून त्यांना चालणारच नसतं. स्वतःला कुठल्या लोकांसमोर कसं प्रोजेक्ट करावं हे ते जाणून असतात. स्पिक मॅके मध्ये काम करणार्‍या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे. जेंव्हा लोकांना दुखावण्याची पाळी येते तेंव्हा शिताफीनं हे लोक आपल्या सेक्रेटरींना पुढे करतात.
उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली
ह्या कलाकारांकडून बाकी पिपल मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला छान शिकायला मिळेल. शुभेच्छा!

In reply to by दादा कोंडके

रेवती 17/03/2012 - 20:34
दोन्ही बाजू आहेत याला. कलावंतांनी कमी बिदागी स्विकारून काम का करावे? पुरेशी बिदागी मिळत असताना, कार्यक्रम ठरलेला असताना निघून जाणे मात्र बरोबर नाही. फ्यान कंपनीनेही समोरच्याचे खाणेपिणे चालू असताना बाजूला वाट बघत उभे का राहू नये?

In reply to by दादा कोंडके

विजुभाऊ 19/03/2012 - 18:29
स्पिक मॅके मध्ये काम करणार्‍या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे कार्यक्रम केल्यानंतर हातात बिदागी मिळाली नाही तर कलाकार अक्षरशः काहीच करू शकत नाही. कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतात. मराठीतले एक नामवंत कलाकार यासाठी नाटकाच्या दुसर्‍या अंकाच्या अगोदर मानधनाचे पाकिट स्टेजवर मागत असत

In reply to by विजुभाऊ

दादा कोंडके 20/03/2012 - 01:53
आता हे वाचा. ह्यात उस्ताद म्हणतात, "खेळणे बंद झाले तरी क्रिकेटचे वेड कणभरही कमी झाले नाही. 2011 च्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना चालू असताना माझे कॉन्सर्ट चालू होते. मी मैफिलीत तबला वाजवत होतो, तरी तबला आणि पायाच्या मध्ये मी मोबाईलवर क्रिकेटची वेबसाईट उघडून ठेवली होती आणि लाइव्ह स्कोअर पाहात होतो. मध्येच इंटरनेट कनेक्‍शन तुटले तर संयोजक मित्राला खूण करून स्कोअर काय झाल्याची विचारणा केली. दोन मिनिटांत त्याने चिठ्ठी पाठवून स्कोअर कळवला." आता मला सांगा, ज्याला क्रिकेटचं वेड वगैरे असून सुद्धा वर्ल्डकप फायनल मॅचच्या वेळी (जीचं टाइमटेबल कित्येक महिने आधिच माहित असतं) हे कॉन्सर्ट करत होते. आणि दिडक्या मोजून आलेल्या प्रेक्षकांसमोर चोरून स्कोर बघितल्याचं मलातरी अजिबात कौतुक नाही. उलट, एखादा प्रेक्षक असं करत असला तर भर मैफलित त्याचा अपमान करायला सुद्धा कमी केलं नसतं.
कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतात
मी तेच तर म्हणतोय, एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.

In reply to by दादा कोंडके

अन्या दातार 20/03/2012 - 07:57
ज्याची त्याची आवड! शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही. का? कामाच्या वेळी फक्त काम केलं पाहिजे हे जर कलाकाराच्या बाबतीत म्हणत असाल तर स्वतः त्यातून सूट का घेता? शेवटी मैफल कशी झाली हे महत्वाचं. अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही. कारण कितीही झालं तरी प्रेस्टीजचा प्रश्न असतो. एकदा जर का ही इज्जत धुळीस मिळाली तर त्याचा खूप मोठा फटका बसतो.
एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत. अश्या वेळेस ज्यांचे पाय जमिनीवरच घट्ट राहतात त्यांना तो मान का देऊ नये? उस्तादजींची विनयशीलता उठून दिसत नाही का?

In reply to by अन्या दातार

मूकवाचक 20/03/2012 - 09:13
उ. निजामुद्दीन खानसाहेबांच्या एका सत्कार सोहळ्यात त्यांना स्टेजवर चढताना पायातली चप्पल वारंवार निसटून त्रास होत असल्याचे पाहून उ. झाकिर हुसेन यांनी चक्क त्यांचे जोडे उचलत त्यांना आधार देत मदत केली होती, ती देखील अगदी सहजपणे. एखादा शागिर्द सुद्धा असे काही करताना बिचकेल. काही गोष्टी रक्तात मुरलेल्या असल्याशिवाय, खोलवर तसे संस्कार असल्याशिवाय करता येत नाहीत. अदबशीरपणाची 'अ‍ॅक्टिंग' कुणी जन्मभर सातत्याने करू शकत नाही. ढोंग असेल तर कधी ना कधी उघडकीस येतेच. नीतीमत्तेच्या गप्पा मारणे सोपे आहे. आयुष्यभर रियाझ, तपस्या केलेल्या कलाकारांची कला आज सगळीकडे बोकाळलेल्या पायरसीमुळे फुकटात ऐकता/ पाहता येते. त्यामुळे कलाकाराला त्याच्या दर्जाप्रमाणे रॉयल्टी मिळणे वगैरे तर सोडाच, त्याचे आल्बम बाजारात येणे कमी होउन शेवटी आल्बम प्रकाशित होणे या माध्यमातून अक्षरशः पाच पैसे देखील मिळू नयेत अशी वेळ आलेली आहे. 'ज्याने पाप केले नाही त्याने पहिला दगड मारावा' असे ख्रिस्तवचन आहे, त्याप्रमाणे ज्याच्या संग्रही एकही पायरेटेड एमपी३ नाही, अशानेच कलाकारांवर दांभिकतेचे आरोप करावेत असे विनम्रपणे सुचवतो. असो.

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 20/03/2012 - 17:36
शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही. माझी आणि उस्ताद साहेबांची तुलना केल्यामुळे ड्वाले पाणावले! :)
अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही.
तेच ना, एकदा मोठ्ठा कलाकार म्हटला की मग सगळ्या घटणा हव्यातशा चिकटवता येतात. आणि त्याच्या साध्या साध्या गोष्टी अजूबाजुची मंडळी रंगवून सांगतात. (त्यात त्या कलाकाराच्या मोठ्ठेपणापेक्षा खरंतर, मी तीथं होतो हेच सांगायचं असतं, आणि त्यात जर कलाकार निवर्तला असेल तर अशा उपटसुंभांची गद्रीच-गद्री होते (कारण त्या घटणांचा खरे-खोटेपणा तपासणारा दुवाच नसतो!) :))
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत.
पद वगैरे कुठलं आहे हो? (उस्ताद, पंडीत ई पदं कुठली युनिवर्सिटी देते ते मला माहीत नाही) कलाकार, खेळाडू वगैरे मंडळी फक्त लोकांमुळेच मोठ्ठी होतात. आता कुणी आवरा म्हणायच्या आत आवरतं घेतो! ;)

In reply to by दादा कोंडके

शिल्पा ब 21/03/2012 - 10:52
मोठ्ठ्या पदव्या घेतलेले फार मोठ्ठे असतात? वा!! तेंडुलकर किंवा उस्ताद हुसेन यांच्याकडे पदवी नसेल पण त्यांचे कसब जगाला वेड लावेल असेच आहे. असो. शेवटी ज्याची त्याची समज.

In reply to by दादा कोंडके

शेखर काळे 20/03/2012 - 03:40
त्यांच्या कलेवर अवलंबून असते. आणि ही कला शाश्वत असते याची काहीच शाश्वती नसते. तेव्हा वेळ असतांना त्यांनी दोन पैसे आपल्या गाठीशी बांधले तर त्यात काही वावगे वाटू नये. आपणही कुठे वस्तू दोन पैशांनी स्वस्त मिळत असेल तर तेथे धावतोच की. त्यांनीही कुठे त्यांना पैसे जास्त मिळत असतील तर तेथे का जाऊ नये ? ही गोष्ट खरी - ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं. पुढे कार्यक्रम संपला की ती ही आपल्याच सारखी तहान-भूक-झोप लागणारी माणसे असतात, - शेखर काळे

In reply to by दादा कोंडके

अक्षया 20/03/2012 - 09:48
अहो, ह्या कलाकाराचा दर्जा कीती महान आहे हे इथे सांगणे अवघड आहे, केवळ पैशासाठी कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांपैकी हे नाहीत, आणि त्यांना तसे करण्याची गरजही नाही. त्यांनी अनेक भारतीय गरीब पण महान कलाकारान चे पूर्ण कुटुंब पोसली आहेत ते सुद्धा कुठेही त्याचा साधा उल्लेखही न करता फक्त शब्दासाठी आणि कलेचा आदर करण्यासाठी. ते माणूस म्हणून किती महान आहेत ह्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काही कलाकारान बाबतीत असेल तसे पण... अशा दिग्गज कलाकारांबाब्तीत असे उद्गार काढताना आधी त्यांची पूर्ण माहिती घ्यावी... असे मला मनापासून वाटते.

अस्मी 20/03/2012 - 12:50
खरंच भाग्यवान आहात... छान आठवणी, आणि नेटकेपणे मांडल्यायत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा..लिहीत राहा.

अक्षया जी, तुमचा लेख आवडला, आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या कलाकार व्यक्तिमत्वा बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचेही अभिनंदन. आपल्या समाजात 'इतरांना नावे ठेवणे' हा जन्म सिद्ध अधिकार मानला जातो, त्याचाच प्रत्यय वरील काही प्रतिक्रिया वाचून येतो, आता मला सांगा उस्ताद झाकीर भाई किती बिदागी घेतात येथ पासून ते थेट people management वैगेरे पर्यंत बोलून काय मिळते ते मला तरी समजत नाही..., आणि हीच लोकं स्वतः कोणासाठी पदरचा १ रुपया तरी खर्च करत असतील का..? याची शंका येते..! ते नोकरी करताना फुकट करतात का? पगार घेतातच ना..? मग इतरांच्या बाबतीत बोलण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही! आणि झाकीर भाईन सारख्या कलाकारा बद्दल बोलायची तर 'लाय...' हि नाही. अतिशय नितळ आणि स्वच्छ असे हे व्यक्तीमत्व आहे, तुम्ही नमूद केल्या प्रमाणे ते आजही कित्येक गरीब कालाराकारांची कुटुंबे अक्षरशः पोसत आहेत, ते हि त्याचा कुठे हि गाजावाजा न करता. त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्या बद्दल हि खूप काही बोलले जाते, पण फार कमी लोकांना हे माहित आहे कि तिथे राहून तेथील इच्छुकांना नियमित मोफत तबल्याचे शिक्षण देतात. भारतात आल्यावर कार्यक्रम संपल्यावर कित्येक पडद्यामागच्या दुर्लक्षित कामगारांची पाठ थोपटायची ते विसरत नाहीत तसेच त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ कलाकारांच्या पायावर मस्तक टेकवायला कमीपणा मानत नाहीत. आज हा तबल्याच्या दुनियेचा शेहेन्शहा कित्येक जणांचा देव, गुरु तसेच पोशिंदा हि आहे, अश्या या महान कलाकाराला मनापासून 'सलाम'.

In reply to by वेल्लोकॅस्त

दादा कोंडके 23/03/2012 - 00:09
तुमच्या प्रतिक्रियेतलं एकेक वाक्य घेउन खौट उत्तर लिहिणार होतो. पण मध्येच कंटाळा आला आणि ही प्रतिक्रिया एका व्यक्तीपूजक माणसानं खूप उत्तेजित होउन लिहिली आहे त्यामुळे त्याच्यापर्यंत उत्तर पोहोचणारच नाही असं वाटलं. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेला प्रचंड विनोदी प्रतिसाद एव्हडं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो. बाकी एकेक वाक्य घेउन धोबीपछाड उत्तरं लिहिणार्‍या मिपाकरांचा खरंच हेवा वाटतो.

In reply to by दादा कोंडके

अक्षया 23/03/2012 - 12:23
हम्म छान!!! विनोदी नाही आहे ते लिहिलेल खर आहे... :) दोन शब्दात मान्य केल्या बद्दल धन्यवाद...

अक्षया 22/03/2012 - 18:06
धन्यवाद!! मिपावर स्वागत असेच लिहित रहा...

यकु 23/03/2012 - 01:01
झाकीर हुसैन यांच्याबद्दल एका गोष्‍टीचा हेवा करण्यासारखा आहे. युट्यूबवर रविशंकर आणि झाकीर यांचे वालिद अल्लारखां यांच्या त्या काळात अमेरिकेत चित्रांकन केलेल्या क्लिप आहेत. अल्लारखां फक्त वाजवणार आणि रविशंकर त्या इंग्लिश श्रोत्यांना काय वाजवलं आहे, कसं वाजवलं आहे हे उलगडून सांगणार. मग पुन्हा अल्लारखां फक्त वाजवणार आणि श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट. मला निश्चित माहित नाही, पण अल्लारखांना इंग्लिश बोलता येत नसावी. आज फक्त झाकीर यांच्याकडे नजर टाकली तरी पुरेसं आहे. जाताजाता: झाकीर (शागीर्द) आणि अल्लारखां (उस्ताद) या दोन घनपाठींच्या स्वाहाकारातून प्रकटणारं नादब्रह्म आणि ते प्रकटताच जाणकार श्रोत्यांनी तर्जन्यांच्या द्वारे केलेला निशब्द घोष पहाण्यासारखा आहे. त्यानंतर 8.47 वर अल्लारखांनी झाकीरकडे टाकलेला दृष्‍टीक्षेप 'बेटा, तु माझे पांग फेडलेस' हेच सांगणारा आहे.

दादा कोंडके 24/03/2012 - 14:46
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का? वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं. बाकी, मी झाकीर हुसेन, तेंडूलकर यांच्याबद्दल वैयक्तीक पातळीवर बोलतच नाहिये. कला-खेळ सोडली तर ही आपल्यासरखीच आहेत असं माझं म्हणणं आहे हे पुन्हा सांगतो. या मोठ्या लोकांना हे माहित असतं की, समाजात रहायचं म्हणजे नुसता पैसा आणि कला असून चालत नाहीत. लोकांमध्ये एक "फिलाँथ्रोपिस्ट" म्हणून एक प्रतिमा म्हणा, गुडवील म्हणा, लागतं. थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो. कलाकार-खेळाडू यांना थोडसं जास्तं करावं लागतं कारण तेच त्यांचं अ‍ॅसेट असतं. आपण थोडीशी व्यक्तीपुजा कमी केली आणि त्यांना "माणूस" म्हणून अ‍ॅक्सेप्ट केलं की मग त्यांच्या असल्या साधेपणाचं, विनयाचं किंवा दानशुरतेचं कौतुक राहणार नाही, आणि त्यांनी घरासमोरून उड्डाणपूल जाउ नये म्हणून राजकीय वजन वापरलं किंवा सत्यसाईबाबा गेल्यावर रडले तर दु:ख पण होणार नाही.

In reply to by दादा कोंडके

अक्षया 24/03/2012 - 15:57
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का?
सगळ्याच प्रतिक्रिया तितक्याच माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.
वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं.
मी तिथे होते हे सांगण्यात हि काही विशेष नव्हते.. कारण अशा बर्‍याच कार्यक्रमाला मी नेहमीच जात असते. आणि फक्त ते सांगण्यासाठी लेखप्रपंच करायची मला काही जरुर नव्हती. मिपावर आल्यावर पहिलाच लेख आपण झाकीरजींवर लिहावा असं मला वाटलं, इतकंच!
थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो.
तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे कि हे कलाकारही आपल्यासारखी माणसेच आहेत, काहीच शंका नाही त्यात. हे लहान प्रसंग तुमच्या आमच्या बाबतीत घडले तर काही विशेष नसते परंतु ते ज्या जागी आहेत तिथे गेल्यावरहि पाय जमिनीवर असणे हे मला विशेष वाटले..!! असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.... :)

In reply to by दादा कोंडके

अरे येड्या तुझ्या खोट्या नावाला तरी जाग !!! if you really do not belive in idol worship, then why have you kept your name dada kondke you should have publushed your real name... We worship there talent and not them... तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...

In reply to by स्वप्निल घायाळ

दादा कोंडके 23/06/2012 - 18:07
तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...
हे पहा साहेब, आम्हाला काय शोभतं अन काय नाही ते आमचं आम्ही पाहून घेउ. तुमच्या तोंडात शोभणार्‍या गोष्टी देउ का? :|

खरंच एवढ्या मोठ्या व गुणी कलाकारासोबत काम करायला मिळणे हि भाग्याची गोष्ट आहे. अन तो अनुभव या लेखाद्वारे इतरांबरोबर वाटून आपण भले काम केले आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 23/06/2012 - 12:00
उस्तादजींचे नाव ऐकले की आठवतो २००८ चा वसंतोत्सव.... राहूल देशपांडेंच्या गायनानंतर.. शिवमणी, शंकर महादेवन, E U श्रीनिवासन् आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना ऐकणे हा "अनुभव" होता. कवड्याच्या माळा आणि हलका तबल्याचा आवाज यांनी केलेली शिववंदना सुरू असताना शिवमणीने फुंकलेला शंख क्षणात वेगळ्या विश्वात घेवून गेला. पुढचे ३ तास भान हरपण्याचे होते. शिवमणीने त्याच्या असंख्य वाद्यांच्या सहाय्याने तबल्याला केलेली साथ, कधी गंमत म्हणून केलेली स्पर्धा.. आणि सगळ्या Sophisticated आणि अत्याधुनीक वाद्यांना केवळ तबल्याने दिलेले उत्तर.. अप्रतीम...!!! शंकर महादेवन आणि E U श्रीनिवासन् ना साथ करताना मुद्दामहून घेतलेला दुय्यमपणा, बाकीच्या कलाकारांना योग्य मान देणारे, दाद देणारे आणि त्यांची कला आणखीन खुलवणारे उस्तादजी. तबला वाजवताना एका क्षणी तबल्यातून काढलेला शंखाचा आवाज.. एक एक तान म्हणून दाखवून तबल्यातून तसेच काढलेले बोल.. गणपतीची वेगवेगळी नावे आणि ती नावे तबल्यातून बोलून दाखवून मिळवलेली दाद. __/\__ शेवटी "कार्यक्रम संपला आहे" असे संयोजकांना सांगावे लागले यातच सर्व आले. (यानंतर रमणबागेतून सिंहगड रोडवरील रूमवर एका वेगळ्याच धुंदीत चालत आलो होतो :-))

लीलाधर 11/09/2012 - 12:04
एवढ्या मोठ्या कलाकारासोबत दोन दिवस एकत्र अनुभवायला मिळाले हे खरेच कौतुकास्पद आहे. आणि त्यात तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला शेअर केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार :)

sagarpdy 11/09/2012 - 12:48
कार्यक्रम पुण्यात झाला नव्हता तर?! याच दरम्यान त्यांचा आणि पं. रविशंकर यांचा पुण्यात कार्यक्रम झाला होता. असो एव्हढ्या मोठ्या असामीला एव्हढ्या जवळून पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन !

डावखुरा 11/09/2012 - 15:35
मस्त अनुभव... मला आठवते..जळगांव मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव होता.. तेव्हा नुकतीच ती रात्री दहाच्या आतची कार्यक्रमबंदी लागु झालेली होती.. झाकीर हुसैन यांना तेव्हा प्रथमच ऐकायची संधी मिळाली होती.. आणि ती एक अविस्मरणीय स्मृती बनुन मनाच्या एका कोपर्यात कायमची कोरली गेली आहे.. अविस्मरणीय परफॉरमन्स.. सर्व देवतांचे नाव तबल्यावर वाजवुन दाखवले.. नंतर उजव्या एका हाताने एक ताल कंटीन्यु वाजवत राहुन दुसर्या हाताने ईतर सर्व ताल जवळपास अर्धा तास हे वादन...वाह उस्ताद..खरंच जवाब नहीं ईनका.. पुन्हा एकदा त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु..अक्षया ताई..
नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार.

एकदाच यावे सखया...

विसोबा खेचर ·

RUPALI POYEKAR 12/03/2012 - 13:38
हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी', 'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

RUPALI POYEKAR 12/03/2012 - 13:39
हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी', 'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

अप्रतिम गाणं आहे हे. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं! शांत निवांत! अनुभूती वेगळीच. हे गाणं परत एकदा ऐकलं त्यासाठी धन्यवाद.

चिंतामणी 12/03/2012 - 15:43
>>>पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात.. १०० % सहमत. >>>मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..! येत रहा. आणि लिहीत रहा.

गणपा 12/03/2012 - 15:58
अवीट गोडवा आहे. संगीत + बोल + आवाज यांचा त्रिवेणी संमच.
पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं
किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात.

पैसा 12/03/2012 - 18:31
मस्त ओळख! सुमनताईंचा आवाज या गाण्याला मस्त फिट्ट बसतो!

तिमा 12/03/2012 - 21:03
तात्या, गाणं ऐकलं नव्हतं. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः त्याच पानावर कोणीतरी लतादिदींबद्दल गरळ ओकलं आहे. 'डार्क साईड ऑफ लता' म्हणून. त्याला मी योग्य ते उत्तर दिले आहे.

तर्री 12/03/2012 - 22:28
तात्यांचे रसग्रहणही नेहमी प्रमाणे छान. ह्या गाण्याची थोरवी गाताना "कोलावरी" चा कात्रज करण्याची काय गरज ? हा आपला माझा ऊठवळ सवाल. एके काळी शा.संगीत हेच अस्स्ल व ईतर ( नाटय संगीत सुध्दा !) हे कमअस्सल मानल जात होते. नंतर च्या काळात सुगम संगीतावर घाला घालून शा.संगीत व नाटय संगीत चे पवाडे गायले जात होते. आता सुगम संगीता कळवळा अन कोलावरीत कोलदांडा ! कश्याला हो हे असे !! "एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ

चिंतामणी 12/03/2012 - 22:46
गणपा >>>किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात. तर्री >>>"एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ तात्यांच्या वाक्याचा अर्थ लावताना तुम्हा दोघांचा गैरसमज झाला असावा. कोलवरी पॉप्युलर होण्याचे कारण देताना "कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात.." अशी त्या वाहीन्यांवर टिका केली आहे. त्यांचा रोख आजकाल विविध वाहिन्या अनेक गोष्टी "हॅमरींग" करतात त्या कडे जास्त आहे असे मला वाटते.

तर्री 12/03/2012 - 22:57
कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात> हे अगदी विनाविलंब मान्य ! बेछूट पॉईंट !! पण तरिही ह्या गाण्याच्या रसग्रहणाचे वेळी "कोलावरीचा" ऊल्लेख्च कशाला ? असे माझे मत आहे. जिलेबीचे कौतुक करताना चकल्या ( तात्यांचे आशिर्वाद ) ना वाकुल्या का दावा ?

चौकटराजा 13/03/2012 - 13:00
आदरणीय तात्या, ही लिंक टाकून फार मागल्या काळात नेलेत हो ! हे गाणे मी बर्‍याच वर्षात ऐकलेले नव्हते. अतः जरा शब्द विसरलो. मी सहसा कलाकारांच्या एकदम प्रेमात पडलेलो आहे. उदा. गोनीदांच्या घरी ओपी नय्यर यांच्या प्रेमात १९६५ साली पडलो. १९६२ साली वाई चित्रा टोकीज मधे सुधीर फडके १९७५ वाई येथे प्राज्ञ्पाठ शाळा - परवीन सुलताना १९६४ च्या सुमारास खळे काका ( शुक्रताराचे प्रथम प्रक्षेपण मी ऐकले आहे वय १२ ) ई. पण अशोक पत्की या गुणी माणसाच्या प्रेमात पडायला मला का बरे काळ जावा लागला ? कारण अमुक अमुक गाणे हे पत्कींचे आहे असे वाजत गाजत नसे. थोडा प्रसिद्धीचा परिणाम. आपण वाटवे ,कुरवाळीकर, वाळवेकर, जीएन याविषयी एखादा लेख लिहिला तर मज्जा येइल !

RUPALI POYEKAR 12/03/2012 - 13:38
हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी', 'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

RUPALI POYEKAR 12/03/2012 - 13:39
हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी', 'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

अप्रतिम गाणं आहे हे. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं! शांत निवांत! अनुभूती वेगळीच. हे गाणं परत एकदा ऐकलं त्यासाठी धन्यवाद.

चिंतामणी 12/03/2012 - 15:43
>>>पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात.. १०० % सहमत. >>>मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..! येत रहा. आणि लिहीत रहा.

गणपा 12/03/2012 - 15:58
अवीट गोडवा आहे. संगीत + बोल + आवाज यांचा त्रिवेणी संमच.
पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं
किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात.

पैसा 12/03/2012 - 18:31
मस्त ओळख! सुमनताईंचा आवाज या गाण्याला मस्त फिट्ट बसतो!

तिमा 12/03/2012 - 21:03
तात्या, गाणं ऐकलं नव्हतं. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः त्याच पानावर कोणीतरी लतादिदींबद्दल गरळ ओकलं आहे. 'डार्क साईड ऑफ लता' म्हणून. त्याला मी योग्य ते उत्तर दिले आहे.

तर्री 12/03/2012 - 22:28
तात्यांचे रसग्रहणही नेहमी प्रमाणे छान. ह्या गाण्याची थोरवी गाताना "कोलावरी" चा कात्रज करण्याची काय गरज ? हा आपला माझा ऊठवळ सवाल. एके काळी शा.संगीत हेच अस्स्ल व ईतर ( नाटय संगीत सुध्दा !) हे कमअस्सल मानल जात होते. नंतर च्या काळात सुगम संगीतावर घाला घालून शा.संगीत व नाटय संगीत चे पवाडे गायले जात होते. आता सुगम संगीता कळवळा अन कोलावरीत कोलदांडा ! कश्याला हो हे असे !! "एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ

चिंतामणी 12/03/2012 - 22:46
गणपा >>>किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात. तर्री >>>"एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ तात्यांच्या वाक्याचा अर्थ लावताना तुम्हा दोघांचा गैरसमज झाला असावा. कोलवरी पॉप्युलर होण्याचे कारण देताना "कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात.." अशी त्या वाहीन्यांवर टिका केली आहे. त्यांचा रोख आजकाल विविध वाहिन्या अनेक गोष्टी "हॅमरींग" करतात त्या कडे जास्त आहे असे मला वाटते.

तर्री 12/03/2012 - 22:57
कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात> हे अगदी विनाविलंब मान्य ! बेछूट पॉईंट !! पण तरिही ह्या गाण्याच्या रसग्रहणाचे वेळी "कोलावरीचा" ऊल्लेख्च कशाला ? असे माझे मत आहे. जिलेबीचे कौतुक करताना चकल्या ( तात्यांचे आशिर्वाद ) ना वाकुल्या का दावा ?

चौकटराजा 13/03/2012 - 13:00
आदरणीय तात्या, ही लिंक टाकून फार मागल्या काळात नेलेत हो ! हे गाणे मी बर्‍याच वर्षात ऐकलेले नव्हते. अतः जरा शब्द विसरलो. मी सहसा कलाकारांच्या एकदम प्रेमात पडलेलो आहे. उदा. गोनीदांच्या घरी ओपी नय्यर यांच्या प्रेमात १९६५ साली पडलो. १९६२ साली वाई चित्रा टोकीज मधे सुधीर फडके १९७५ वाई येथे प्राज्ञ्पाठ शाळा - परवीन सुलताना १९६४ च्या सुमारास खळे काका ( शुक्रताराचे प्रथम प्रक्षेपण मी ऐकले आहे वय १२ ) ई. पण अशोक पत्की या गुणी माणसाच्या प्रेमात पडायला मला का बरे काळ जावा लागला ? कारण अमुक अमुक गाणे हे पत्कींचे आहे असे वाजत गाजत नसे. थोडा प्रसिद्धीचा परिणाम. आपण वाटवे ,कुरवाळीकर, वाळवेकर, जीएन याविषयी एखादा लेख लिहिला तर मज्जा येइल !
एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)
अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा.