मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक ·

कुठे कोकण-मालवण जत्रा वा आग्री कोळी मेळावा ज्यात कोंबडीवडे आणि मत्स्याहार, सोबतीला सोलकढी वगैरेचे खाण्यापिण्याचे स्टॉल असतील तर नक्की कळवा. मला समजले तर मी कळवेनच.

इनिगोय 26/01/2014 - 22:51
दर रविवारी सकाळी प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्यमंदिरात मिनी थिएटरमध्ये सकाळी दहा ते एक या वेळात वेगवेगळ्या विषयांवरच्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जातात. डाॅक्युमेंटरीजचे दिग्दर्शकही बहुतेकवेळा उपस्थित असतात, त्यांच्याशी अनौपरिक गप्पा, प्रश्नोत्तरं करता येतात. कोणत्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जाणार हे एक ते दोन दिवस आधी जाहीर केलं जातं. हा उपक्रम एफएफएसआय, आयडीपीए आणि फिल्म्स डिव्हिजनचा असून गेल्या कित्येक महिन्यापांसून विनाशुल्क राबवला जातोय.

कंजूस 01/02/2014 - 09:57
काला घोडा काही खास आहे का ? मंगळवार ४ फेब्रु दुपारी १२ते २ काला घोडा , दुपारी ३ ते ५ शिवडी जेट्टी फ्लेमिंगो पक्षी पाहाणे असा विचार आहे .

काय: हिंदुत्व अध्ययन प्रमाणपत्र वर्ग कोठे: केशव सृष्टी भायंदर मुंबई केव्हा: फ़ेब्रुवारी २१-२३,२०१४ समन्वयक: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अधिक माहिती: अनिल श्रीराम पांचाल १७ चंचल स्मृती ग द आंबेकर मार्ग वडाळा मुंबई ०२२ २४१८५५०२; २४१३६९६६; भ्रमण ध्वनी ९९७५४१५९२२

आतिवास 08/02/2014 - 19:04
व्हिजन महाराष्‍ट्र फाऊंडेशन, वैद्य साने ट्रस्‍ट आणि ग्रंथाली माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला पर्व दुसरे – पुष्‍प तेरावे कमलाकर सोनटक्के वय झाले, पण आस्था सरली नाही; जिद्द संपली नाही! मुलाखत घेणार – चंद्रशेखर नेने सोमवार २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता चहापान – ५.३० ते ६.०० स्‍थळ - दादर माटुंगा कल्‍चर सेंटर, माटुंगा रोड. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्यशिक्षण घेतल्‍यानंतर सोनटक्के यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावून घेतले ते त्यांच्या नाट्यप्रशिक्षण वर्गाचे संचालक म्हणून. सोनटक्के यांनी त्यानंतर आयएनटी, मराठवाडा विद्यापीठ यांच्याकरता तीच जबाबदारी उत्साहाने निभावली व नाट्यप्रशिक्षण घेतलेले शेकडो नाट्यकलावंत ‘तयार’ केले. सोनटक्के यांनी कला संस्थेचे प्रशासक म्हणून नेहरू सेंटर आणि केंद्र व राज्य सरकारमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मुख्यत: नाट्यमाध्यमातून व्यक्त झालेले सोनटक्के यांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी आहे. त्यामुळेच त्यांची मुलाखत हा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा सांस्कृतिक ठेवाच ठरणार आहे. अवश्य यावे!

कंजूस 09/02/2014 - 07:26
जे पर्यटक स्वत: सहलीचे आयोजन करून जातात त्यांच्यासाठी उपयोगी आज दुपारी (प्रवेश१२ ते ४) १२ ते ६ ,गोरेगाव पूर्व ,बॉम्बे इक्सिबिशन सेंटर ,TTF -OTM चे ट्रावल प्रदर्शन .भरपूर माहितीपत्रके ,नकाशे देतात .राज्ये आणि परदेशांचे स्टॉलस . प्रवेश रु पन्नास

15 व 16 फेब्रुवारी ला सी के पी हॉल ठाणे येथे. 15 ला संध्याकाळी उद्‌घाटन. विविध पदार्थांचे स्टॉल्स. उदा- चिंबोरीचे कालवण, खिम्याचे कानवले,बोम्बिल फ्राय,निनावं, वालाचे बिर्डे इत्यादी. प्रवेश फी 20/-

आतिवास 11/02/2014 - 16:48
Bnhs Programmes‎The Bombay Natural History Society (BNHS) Bats and Trees walk at Ranibaug Date: 16th Feb, 2014, Sunday Spread over 53 acres, Ranibaug is Mumbai’s only heritage botanical garden, and has recently celebrated 150 years of its existence. Ranibaug is home to an astonishing 853 plant species including 286 trees. Many exotic species like Baobab and Tree of Heaven can be seen here. Fruiting and flowering trees such as Flame of the Forest, Indian Laburnum, Indian Coral Tree, and fig trees grow here. The garden is also host to a large colony of India’s largest bat, Indian Flying Fox. Get to know more about these mysterious creatures of the night from a bat expert. Reporting: Outside the main gate at 8.45 a.m. Charges: For members Rs. 100/- per head and for non-members Rs. 150/- per head. (Cost includes entry ticket and BNHS expertise) Registration*: Call at Hornbill House 22871202/22821811 or e-mail at bnhs.programmes@gmail.com. Please carry adequate water and hat/cap. Note: Carrying plastic bags, disposable water bottles or food is not allowed inside the zoo premises. Such items will be collected and kept outside at the gate. Participants can carry water in non-disposable water bottles.

मोक्षदा 11/02/2014 - 21:57
दर वर्षीप्रमाणे यंदाही व्ही.जे.टी.आय (V.J.T.I.) महाविद्यालयात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी फुलांचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वेगवेगळ्या नर्सरीज यात आपल्या फुलांची सजावट मांडतात. बागेतील झाडे, बोन्साई, landscaping, औषधी वनस्पती बघण्यास मिळतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी फुलांच्या सजावटीत भाग घेतात, हरबेरियम बघण्यास मिळते. गुलाबाच्या फुलांची स्पर्धाही घेतली जाते आणि विजेत्यांना राजा-राणीचा किताब दिला जातो. विविध प्रकारच्या भाज्या-फळेही येथे मांडलेली असतात. संपूर्ण प्रदर्शन बघण्यास २-३ तास लागतात. लहान मुले मात्र कंटाळतात. झाडे घेण्याचा मोह टाळता येतच नाही. त्यांच्यासाठी तर शेवटी मैदानावर खास स्टॉल असतात. झाडे, बिया, कुंड्या, गांडूळ खते, झाडांसाठी लागणारे अवजारे सर्व काही विकत मिळते. हौसेला मोल नाही. जरूर भेट द्या. सर्वसामान्यांना परवडेल इतकेच तिकीट आहे. (हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी वनस्पतिशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी पूर्ण वर्षभर मेहनत घेतात.)

In reply to by मोक्षदा

येस्स , वीजेटीआय. आमच्या कॉलेजमध्ये. एकेवर्षी फिरलोय मी, पण त्यामागे कारण वेगळेच होते. बाकी स्वताला फुलांची आवड नसली तरी आवड असलेल्यांनी नक्कीच बघण्यासारखे आहे एवढे खात्रीने सांगू शकतो. तसेच गेल्या रविवारी मी भायखळा राणीबागेत देखील मित्रांबरोबर म्हणून एका फूलप्रदर्शनाला फेरफटका मारून आलो, ते देखील चांगले होते, ते ही दरवर्षी भरते हे मला जवळ राहत असूनही या वर्षीच समजले. फूलप्रदर्शनाचे फूलप्रदर्शन आणि मुलांना बरोबर न्यायचे असल्यास राणीबागेतले प्राणीही दाखवू शकता जेणेकरून ते वैतागणार नाहीत. याबद्दल आधी इथे सांगू न शकल्याबद्दल क्षमस्व !

आयुर्हित 20/02/2014 - 14:09
निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली देणा-या डॉ. सरिता डावरे आणि शेफ संजीव कपूर यांच्या ‘द लिव्ह वेल डाएट’ या पुस्तकाची आता मराठी आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल आणि ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचं सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करणारं आहे. कारण या पुस्तकात योग्य आणि अयोग्य खाण्यातील फरक समजावून सांगण्यात आलेला आहे, शिवाय निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अभिनेत्री स्वरूप संपत या मान्यवरांशी गप्पा मारतील. दिनांक : २४ फेब्रुवारी २०१४ स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड वेळ : सायंकाळी ६ साभार: प्रहार

साळसकर 05/03/2014 - 21:22
नरेपार्क परेळ, मुंबई - खाद्यमेळावा बहुतेक या रविवार पर्यंत असेल, काही डिटेल्स मिळाले तर कळवतो, कानावर आले तसे इथे टाकलेय, इतर कोणाला माहीत असेल तर त्यांनीही महिती दिल्यास उत्तम :)

अर्थकारणा बद्दल व्याख्यानमाला संध्याकाळी ७ ते ९ ब्राम्हण सभा, डोंबिवली पुर्व. ३ वक्ते आहेत.पैकी एक चंद्रशेखर टिळक.

आयुर्हित 25/03/2014 - 13:20
पुराणशास्त्राला वाहिलेला आशियातील पहिलावहिला 'आख्यान २०१४' हा महोत्सव मुंबई विद्यापीठात रंगणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने या अनोख्या महोत्सवाची रचना केली आहे. भारतात जागतिक पुराणकथांवर आधारित एक परिपूर्ण अभ्यासक्रम चालवणारे मुंबई हे एकमेव विद्यापीठ आहे. संस्कृत विभागातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जातो. पुराणकथांबाबत आज चुकीची किंवा अर्धवट माहिती तसेच एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून माहिती दिली जाते. यामुळे अनेक गरसमजुती तयार होतात. हे टाळण्यासाठी योग्य, नेमकी आणि निष्पक्ष माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. हा महोत्सव ५ एप्रिल रोजी विद्यापीठातील संस्कृत भवनात पार पडणार आहे. साभार:पुराणांचे 'आख्यान'

शिद 09/04/2014 - 13:40
येवा, आंबे खावा! मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - कोकणातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखणार्‍यांसाठी कोकण प्रतिष्ठानने नेहमीप्रमाणेच आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली या ठिकाणी भरविण्यात येणार असल्याचे आज प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी या महोत्सवाची माहिती दिली. इथे भरणार महोत्सव १२ ते २० एप्रिल : डॉ. हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू) २१ ते ३० एप्रिल : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क. १ ते ९ मे : न्यू इंग्लिश स्कूल मैदान, राम मारुती रोड, ठाणे (प) १० ते १८ मे : संभाजी राजे मैदान, मुलुंड (पू) १९ ते २७ मे : एमएचबी कॉलनी मैदान, बोरिवली (प) कालावधी : १२ एप्रिल ते २७ मेपर्यंत ठिकाण : विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली विलेपार्ल्यातही आमंत्रण कोकणातील बागायतदारांना उद्योगात प्रोत्साहन मिळावे म्हणून श्रीकांत सरमळकर फाऊंडेशनच्या वतीने २७ एप्रिल ते ७ मेदरम्यान भव्य आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघात संपन्न होणार्‍या या महोत्सवात बागायतदारांनी २३ एप्रिलपर्यंत संपर्क व नाव नोंदणी करावी. महोत्सवातील स्टॉल्स विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रीकांत सरमळकर फाऊंडेशन, इमारत क्रमांक ३५ समोर, खेरनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१ येथे संपर्क साधावा.

In reply to by शिद

सोबतीला आणखीही कोकणी खाद्यपदार्थ असतीलच ना.. किमान आंब्याफणसाचे तरी.. २१-३० एप्रिल - शिवाजी पार्क , यातील एखादा विकांत जमवायला हवे.

वरील परिसंवादात (१८-२१ सप्टेंबर,ठाणे) वाचण्यात येणाऱ्या ४० एक शोध निबंधांचे सारांश विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या web site वर प्रसिद्ध झाले आहेत. जिज्ञासूनी ते खालील दुव्यावर अवश्य वाचावेत http://www.vpmthane.org/bhaskara900/ नमुना म्हणून एक सारांश खाली देत आहे जो माझ्या सारख्या गणितात अनभिज्ञ असलेल्या माणसालाही उद्बोधक वाटला IX PEDAGOGICAL IMPORTANCE OF BHĀSKARĀCĀRYA’S WORKS TODAY Pedagogical Analysis of Lilavati Sudhakar C. AGARKAR, VPM's Academy of International Education and Research, Thane Lilavati, a book written by Bhaskaracharya in 1150 is a master piece of mathematical treatises. Bhaskaracharya, literally means Bhaskar the teacher. One notices that various facets of a good teacher are interspersed within the text. The entire text is written in poetic form with profuse use of alliterations, pun, metaphors, etc. At several places he addresses the reader as sakhe (a female friend), bale (a young girl), mitra (a male friend), etc. Moreover, he frames the questions taking the help of animals and bird like elephants, monkey, serpent, peacock, swans, bees, etc. He also makes use of mythological stories from Hindu epics like Ramayana and Mahabharata to frame question. Lilavati has a huge collection of problems relating to arithmetical calculations, algebraic equations and properties of geometrical figures. The author attempts to develop essential pre-requisites through a series of examples and provides necessary hints required to solve a given problem. Openness is the hallmark of Lilavati as the author suggests different ways of dealing with the problem and leaves it to the reader to use the most appropriate one. As a part of a yearlong celebration of Bhaskaracharya's 900th birth anniversary the Vidya Prasarak Mandal, Thane has initiated workshops on Lilavati for school children. Since January 2014 a dozen workshops have been conducted both in rural as well as the urban parts of India. Apart from acquainting them with salient features of Lilavati these workshops were used to test the utility of Bhaskaracharya's pedagogy in teaching school mathematics. It has been noticed that the pedagogic techniques advocated in Lilavati are found effective in removing students' fear of mathematics, motivating them to handle an unknown situation and developing problem solving skills. Constructivism, as a philosophy of learning, has gained importance in recent days and is advocated as an effective method of teaching school subjects. The critical analysis of Lilavati shows that Bhaskaracharya has used this technique about 900 years ago. It is high time that we implement it for effective teacher pupil interactions. The paper will present the pedagogic analysis of Lilavati and discuss its relevance for the teaching of mathematics in 21st century

शिद 17/12/2014 - 21:21
1 कोळी नृत्य, आगरी कोळींचा पेहराव, त्यांची बोली भाषा, अस्सल कोळी लोकांचे झणझणीत तयार झालेले पारंपारिक मासळी खाद्य व त्यांचा परंपरागत चालत आलेला मच्छिमारी व्यवसाय याचबरोबर यातून परिस्थितीशी झटून उभा राहिलेला आधुनिक आगरी-कोळी माणूस याचे जिवंत चित्र या महोत्सवातून प्रदर्शित होणार आहे.

In reply to by शिद

सूड 18/12/2014 - 15:36
अंधेरी पच्छिम का? ह्म्म मला तर हल्ली अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पच्छिम ह्यात फार गोंधळायला होतं.

शिद 16/01/2015 - 22:21
सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्‍घाटन आज, शु‌क्रवारी संध्याकाळी सहा वाजता ख्यातनाम अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे होणार आहे. अधिक माहीती साठी म.टा. मधील सीकेपी फूड फेस्ट बातमी पहा.

कंजूस 19/01/2015 - 13:24
१)ठाणे नपा॰फुले प्रदर्शन गावदेवी मैदान 30 ,31 jan, 1feb २)Friends of Trees 7, 8- feb, VJTI MATUNGA. ३)मुंबई मनपा॰ फुले झाडे प्रदर्शन १३ १४ १५ फे राणीची बाग भायखळा -वेबसाइटस- A)आगामी फुले झाडे प्रदर्शने इथे पाहा B)आगामी इतर महत्त्वाची प्रदर्शने इथे १पाहा इथे २पाहा

वेल्लाभट 23/01/2015 - 11:06
ठाणे नौपाडा येथील उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या किंवा हितवर्धिनी सभेच्या पटांगणात माघी गणेशोत्सव असतो. या वर्षी अनेक चांगले कार्यक्रम आहेत. त्यात आज संध्याकाळी ७:३० वाजता निनाद बेडेकर यांचं संभाजी राजांवर व्याख्यान आहे. इच्छुकांनी हजेरी लावावी :)

कुठे कोकण-मालवण जत्रा वा आग्री कोळी मेळावा ज्यात कोंबडीवडे आणि मत्स्याहार, सोबतीला सोलकढी वगैरेचे खाण्यापिण्याचे स्टॉल असतील तर नक्की कळवा. मला समजले तर मी कळवेनच.

इनिगोय 26/01/2014 - 22:51
दर रविवारी सकाळी प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्यमंदिरात मिनी थिएटरमध्ये सकाळी दहा ते एक या वेळात वेगवेगळ्या विषयांवरच्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जातात. डाॅक्युमेंटरीजचे दिग्दर्शकही बहुतेकवेळा उपस्थित असतात, त्यांच्याशी अनौपरिक गप्पा, प्रश्नोत्तरं करता येतात. कोणत्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जाणार हे एक ते दोन दिवस आधी जाहीर केलं जातं. हा उपक्रम एफएफएसआय, आयडीपीए आणि फिल्म्स डिव्हिजनचा असून गेल्या कित्येक महिन्यापांसून विनाशुल्क राबवला जातोय.

कंजूस 01/02/2014 - 09:57
काला घोडा काही खास आहे का ? मंगळवार ४ फेब्रु दुपारी १२ते २ काला घोडा , दुपारी ३ ते ५ शिवडी जेट्टी फ्लेमिंगो पक्षी पाहाणे असा विचार आहे .

काय: हिंदुत्व अध्ययन प्रमाणपत्र वर्ग कोठे: केशव सृष्टी भायंदर मुंबई केव्हा: फ़ेब्रुवारी २१-२३,२०१४ समन्वयक: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अधिक माहिती: अनिल श्रीराम पांचाल १७ चंचल स्मृती ग द आंबेकर मार्ग वडाळा मुंबई ०२२ २४१८५५०२; २४१३६९६६; भ्रमण ध्वनी ९९७५४१५९२२

आतिवास 08/02/2014 - 19:04
व्हिजन महाराष्‍ट्र फाऊंडेशन, वैद्य साने ट्रस्‍ट आणि ग्रंथाली माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला पर्व दुसरे – पुष्‍प तेरावे कमलाकर सोनटक्के वय झाले, पण आस्था सरली नाही; जिद्द संपली नाही! मुलाखत घेणार – चंद्रशेखर नेने सोमवार २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता चहापान – ५.३० ते ६.०० स्‍थळ - दादर माटुंगा कल्‍चर सेंटर, माटुंगा रोड. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्यशिक्षण घेतल्‍यानंतर सोनटक्के यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावून घेतले ते त्यांच्या नाट्यप्रशिक्षण वर्गाचे संचालक म्हणून. सोनटक्के यांनी त्यानंतर आयएनटी, मराठवाडा विद्यापीठ यांच्याकरता तीच जबाबदारी उत्साहाने निभावली व नाट्यप्रशिक्षण घेतलेले शेकडो नाट्यकलावंत ‘तयार’ केले. सोनटक्के यांनी कला संस्थेचे प्रशासक म्हणून नेहरू सेंटर आणि केंद्र व राज्य सरकारमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मुख्यत: नाट्यमाध्यमातून व्यक्त झालेले सोनटक्के यांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी आहे. त्यामुळेच त्यांची मुलाखत हा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा सांस्कृतिक ठेवाच ठरणार आहे. अवश्य यावे!

कंजूस 09/02/2014 - 07:26
जे पर्यटक स्वत: सहलीचे आयोजन करून जातात त्यांच्यासाठी उपयोगी आज दुपारी (प्रवेश१२ ते ४) १२ ते ६ ,गोरेगाव पूर्व ,बॉम्बे इक्सिबिशन सेंटर ,TTF -OTM चे ट्रावल प्रदर्शन .भरपूर माहितीपत्रके ,नकाशे देतात .राज्ये आणि परदेशांचे स्टॉलस . प्रवेश रु पन्नास

15 व 16 फेब्रुवारी ला सी के पी हॉल ठाणे येथे. 15 ला संध्याकाळी उद्‌घाटन. विविध पदार्थांचे स्टॉल्स. उदा- चिंबोरीचे कालवण, खिम्याचे कानवले,बोम्बिल फ्राय,निनावं, वालाचे बिर्डे इत्यादी. प्रवेश फी 20/-

आतिवास 11/02/2014 - 16:48
Bnhs Programmes‎The Bombay Natural History Society (BNHS) Bats and Trees walk at Ranibaug Date: 16th Feb, 2014, Sunday Spread over 53 acres, Ranibaug is Mumbai’s only heritage botanical garden, and has recently celebrated 150 years of its existence. Ranibaug is home to an astonishing 853 plant species including 286 trees. Many exotic species like Baobab and Tree of Heaven can be seen here. Fruiting and flowering trees such as Flame of the Forest, Indian Laburnum, Indian Coral Tree, and fig trees grow here. The garden is also host to a large colony of India’s largest bat, Indian Flying Fox. Get to know more about these mysterious creatures of the night from a bat expert. Reporting: Outside the main gate at 8.45 a.m. Charges: For members Rs. 100/- per head and for non-members Rs. 150/- per head. (Cost includes entry ticket and BNHS expertise) Registration*: Call at Hornbill House 22871202/22821811 or e-mail at bnhs.programmes@gmail.com. Please carry adequate water and hat/cap. Note: Carrying plastic bags, disposable water bottles or food is not allowed inside the zoo premises. Such items will be collected and kept outside at the gate. Participants can carry water in non-disposable water bottles.

मोक्षदा 11/02/2014 - 21:57
दर वर्षीप्रमाणे यंदाही व्ही.जे.टी.आय (V.J.T.I.) महाविद्यालयात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी फुलांचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वेगवेगळ्या नर्सरीज यात आपल्या फुलांची सजावट मांडतात. बागेतील झाडे, बोन्साई, landscaping, औषधी वनस्पती बघण्यास मिळतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी फुलांच्या सजावटीत भाग घेतात, हरबेरियम बघण्यास मिळते. गुलाबाच्या फुलांची स्पर्धाही घेतली जाते आणि विजेत्यांना राजा-राणीचा किताब दिला जातो. विविध प्रकारच्या भाज्या-फळेही येथे मांडलेली असतात. संपूर्ण प्रदर्शन बघण्यास २-३ तास लागतात. लहान मुले मात्र कंटाळतात. झाडे घेण्याचा मोह टाळता येतच नाही. त्यांच्यासाठी तर शेवटी मैदानावर खास स्टॉल असतात. झाडे, बिया, कुंड्या, गांडूळ खते, झाडांसाठी लागणारे अवजारे सर्व काही विकत मिळते. हौसेला मोल नाही. जरूर भेट द्या. सर्वसामान्यांना परवडेल इतकेच तिकीट आहे. (हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी वनस्पतिशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी पूर्ण वर्षभर मेहनत घेतात.)

In reply to by मोक्षदा

येस्स , वीजेटीआय. आमच्या कॉलेजमध्ये. एकेवर्षी फिरलोय मी, पण त्यामागे कारण वेगळेच होते. बाकी स्वताला फुलांची आवड नसली तरी आवड असलेल्यांनी नक्कीच बघण्यासारखे आहे एवढे खात्रीने सांगू शकतो. तसेच गेल्या रविवारी मी भायखळा राणीबागेत देखील मित्रांबरोबर म्हणून एका फूलप्रदर्शनाला फेरफटका मारून आलो, ते देखील चांगले होते, ते ही दरवर्षी भरते हे मला जवळ राहत असूनही या वर्षीच समजले. फूलप्रदर्शनाचे फूलप्रदर्शन आणि मुलांना बरोबर न्यायचे असल्यास राणीबागेतले प्राणीही दाखवू शकता जेणेकरून ते वैतागणार नाहीत. याबद्दल आधी इथे सांगू न शकल्याबद्दल क्षमस्व !

आयुर्हित 20/02/2014 - 14:09
निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली देणा-या डॉ. सरिता डावरे आणि शेफ संजीव कपूर यांच्या ‘द लिव्ह वेल डाएट’ या पुस्तकाची आता मराठी आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल आणि ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचं सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करणारं आहे. कारण या पुस्तकात योग्य आणि अयोग्य खाण्यातील फरक समजावून सांगण्यात आलेला आहे, शिवाय निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अभिनेत्री स्वरूप संपत या मान्यवरांशी गप्पा मारतील. दिनांक : २४ फेब्रुवारी २०१४ स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड वेळ : सायंकाळी ६ साभार: प्रहार

साळसकर 05/03/2014 - 21:22
नरेपार्क परेळ, मुंबई - खाद्यमेळावा बहुतेक या रविवार पर्यंत असेल, काही डिटेल्स मिळाले तर कळवतो, कानावर आले तसे इथे टाकलेय, इतर कोणाला माहीत असेल तर त्यांनीही महिती दिल्यास उत्तम :)

अर्थकारणा बद्दल व्याख्यानमाला संध्याकाळी ७ ते ९ ब्राम्हण सभा, डोंबिवली पुर्व. ३ वक्ते आहेत.पैकी एक चंद्रशेखर टिळक.

आयुर्हित 25/03/2014 - 13:20
पुराणशास्त्राला वाहिलेला आशियातील पहिलावहिला 'आख्यान २०१४' हा महोत्सव मुंबई विद्यापीठात रंगणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने या अनोख्या महोत्सवाची रचना केली आहे. भारतात जागतिक पुराणकथांवर आधारित एक परिपूर्ण अभ्यासक्रम चालवणारे मुंबई हे एकमेव विद्यापीठ आहे. संस्कृत विभागातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जातो. पुराणकथांबाबत आज चुकीची किंवा अर्धवट माहिती तसेच एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून माहिती दिली जाते. यामुळे अनेक गरसमजुती तयार होतात. हे टाळण्यासाठी योग्य, नेमकी आणि निष्पक्ष माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. हा महोत्सव ५ एप्रिल रोजी विद्यापीठातील संस्कृत भवनात पार पडणार आहे. साभार:पुराणांचे 'आख्यान'

शिद 09/04/2014 - 13:40
येवा, आंबे खावा! मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - कोकणातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखणार्‍यांसाठी कोकण प्रतिष्ठानने नेहमीप्रमाणेच आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली या ठिकाणी भरविण्यात येणार असल्याचे आज प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी या महोत्सवाची माहिती दिली. इथे भरणार महोत्सव १२ ते २० एप्रिल : डॉ. हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू) २१ ते ३० एप्रिल : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क. १ ते ९ मे : न्यू इंग्लिश स्कूल मैदान, राम मारुती रोड, ठाणे (प) १० ते १८ मे : संभाजी राजे मैदान, मुलुंड (पू) १९ ते २७ मे : एमएचबी कॉलनी मैदान, बोरिवली (प) कालावधी : १२ एप्रिल ते २७ मेपर्यंत ठिकाण : विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली विलेपार्ल्यातही आमंत्रण कोकणातील बागायतदारांना उद्योगात प्रोत्साहन मिळावे म्हणून श्रीकांत सरमळकर फाऊंडेशनच्या वतीने २७ एप्रिल ते ७ मेदरम्यान भव्य आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघात संपन्न होणार्‍या या महोत्सवात बागायतदारांनी २३ एप्रिलपर्यंत संपर्क व नाव नोंदणी करावी. महोत्सवातील स्टॉल्स विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रीकांत सरमळकर फाऊंडेशन, इमारत क्रमांक ३५ समोर, खेरनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१ येथे संपर्क साधावा.

In reply to by शिद

सोबतीला आणखीही कोकणी खाद्यपदार्थ असतीलच ना.. किमान आंब्याफणसाचे तरी.. २१-३० एप्रिल - शिवाजी पार्क , यातील एखादा विकांत जमवायला हवे.

वरील परिसंवादात (१८-२१ सप्टेंबर,ठाणे) वाचण्यात येणाऱ्या ४० एक शोध निबंधांचे सारांश विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या web site वर प्रसिद्ध झाले आहेत. जिज्ञासूनी ते खालील दुव्यावर अवश्य वाचावेत http://www.vpmthane.org/bhaskara900/ नमुना म्हणून एक सारांश खाली देत आहे जो माझ्या सारख्या गणितात अनभिज्ञ असलेल्या माणसालाही उद्बोधक वाटला IX PEDAGOGICAL IMPORTANCE OF BHĀSKARĀCĀRYA’S WORKS TODAY Pedagogical Analysis of Lilavati Sudhakar C. AGARKAR, VPM's Academy of International Education and Research, Thane Lilavati, a book written by Bhaskaracharya in 1150 is a master piece of mathematical treatises. Bhaskaracharya, literally means Bhaskar the teacher. One notices that various facets of a good teacher are interspersed within the text. The entire text is written in poetic form with profuse use of alliterations, pun, metaphors, etc. At several places he addresses the reader as sakhe (a female friend), bale (a young girl), mitra (a male friend), etc. Moreover, he frames the questions taking the help of animals and bird like elephants, monkey, serpent, peacock, swans, bees, etc. He also makes use of mythological stories from Hindu epics like Ramayana and Mahabharata to frame question. Lilavati has a huge collection of problems relating to arithmetical calculations, algebraic equations and properties of geometrical figures. The author attempts to develop essential pre-requisites through a series of examples and provides necessary hints required to solve a given problem. Openness is the hallmark of Lilavati as the author suggests different ways of dealing with the problem and leaves it to the reader to use the most appropriate one. As a part of a yearlong celebration of Bhaskaracharya's 900th birth anniversary the Vidya Prasarak Mandal, Thane has initiated workshops on Lilavati for school children. Since January 2014 a dozen workshops have been conducted both in rural as well as the urban parts of India. Apart from acquainting them with salient features of Lilavati these workshops were used to test the utility of Bhaskaracharya's pedagogy in teaching school mathematics. It has been noticed that the pedagogic techniques advocated in Lilavati are found effective in removing students' fear of mathematics, motivating them to handle an unknown situation and developing problem solving skills. Constructivism, as a philosophy of learning, has gained importance in recent days and is advocated as an effective method of teaching school subjects. The critical analysis of Lilavati shows that Bhaskaracharya has used this technique about 900 years ago. It is high time that we implement it for effective teacher pupil interactions. The paper will present the pedagogic analysis of Lilavati and discuss its relevance for the teaching of mathematics in 21st century

शिद 17/12/2014 - 21:21
1 कोळी नृत्य, आगरी कोळींचा पेहराव, त्यांची बोली भाषा, अस्सल कोळी लोकांचे झणझणीत तयार झालेले पारंपारिक मासळी खाद्य व त्यांचा परंपरागत चालत आलेला मच्छिमारी व्यवसाय याचबरोबर यातून परिस्थितीशी झटून उभा राहिलेला आधुनिक आगरी-कोळी माणूस याचे जिवंत चित्र या महोत्सवातून प्रदर्शित होणार आहे.

In reply to by शिद

सूड 18/12/2014 - 15:36
अंधेरी पच्छिम का? ह्म्म मला तर हल्ली अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पच्छिम ह्यात फार गोंधळायला होतं.

शिद 16/01/2015 - 22:21
सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्‍घाटन आज, शु‌क्रवारी संध्याकाळी सहा वाजता ख्यातनाम अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे होणार आहे. अधिक माहीती साठी म.टा. मधील सीकेपी फूड फेस्ट बातमी पहा.

कंजूस 19/01/2015 - 13:24
१)ठाणे नपा॰फुले प्रदर्शन गावदेवी मैदान 30 ,31 jan, 1feb २)Friends of Trees 7, 8- feb, VJTI MATUNGA. ३)मुंबई मनपा॰ फुले झाडे प्रदर्शन १३ १४ १५ फे राणीची बाग भायखळा -वेबसाइटस- A)आगामी फुले झाडे प्रदर्शने इथे पाहा B)आगामी इतर महत्त्वाची प्रदर्शने इथे १पाहा इथे २पाहा

वेल्लाभट 23/01/2015 - 11:06
ठाणे नौपाडा येथील उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या किंवा हितवर्धिनी सभेच्या पटांगणात माघी गणेशोत्सव असतो. या वर्षी अनेक चांगले कार्यक्रम आहेत. त्यात आज संध्याकाळी ७:३० वाजता निनाद बेडेकर यांचं संभाजी राजांवर व्याख्यान आहे. इच्छुकांनी हजेरी लावावी :)
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक ·

नाखु 22/01/2014 - 17:07
किमान आधी माहीत झाल्याने नंतरची निराशा होणार नाही.

अन्याय, अन्याय आहे हा. मिपाला पुण्यापुरते मर्यादित करण्याच्या प्रयत्नाचा निषेध... ठीके सुरु केलाच आहे, आता तर जमेल तशी माहितीची देवाण घेवाण करू.

येथे ओरिसा,भुवनेश्वरहुन आलेल्या कलाकारांचे एक प्रदर्शन चालु आहे. तसे तर टि.स्मा. आणि सोनल हॉल,कर्वे रोड अश्या ठीकाणी नेहमीच काहीना काही प्रदर्शने असतात.मग ह्याचे वैशिष्ट्य काय? ईथे दगडी कोरीव काम केलेल्या काही मुर्ती मला फारच आवडल्या (पण त्या आणल्या तर मला घराबाहेर....) आणि किंमती ८००-९०० पासुन चालु होत आहेत ते अगदी २० ह. पर्यंत कपड्यावर नैसर्गिक रंगाने काढलेली दशावतार,रामायण,कृष्ण्-बलराम-सुभद्रा,गोकुळातले प्रसंग अशी अनेक पेंटींग आहेत.ती पण ४०० ते २ हजारपर्यंत. अतिशय ताजे रंग वाटले,शिवाय स्वतः कलाकार सांगणारा दर्दी वाटला. शिवाय हस्तकला, बटवे वगैरे स्त्रियांसाठी आहेतच. असो. वैयक्तिकरित्या मला त्या शिल्पकला आणि कापडावरील चित्रे फारच आवडली आणि मी काही चित्रे (मोहात पडुन) घेतलीसुद्धा.

बबु 24/01/2014 - 20:28
क्ळविण्यास आनन्द होतो की, नगर वाचन मन्दिराची शाखा बिबवेवाडी येथे सुरू झाली आहे.पत्ता: माणिक - मोती अपार्टमेन्ट, (पुर्वीचे सुबोध वाचनालय),अन्नभाउ साठे पुतल्यामागे, बिबवेवाडी

आतिवास 30/01/2014 - 11:35
ओजस सु. वि. यांचा ईरोम शर्मिला यांच्या लढ्यावर आधारित 'ले मशाले' चा प्रयोग- आज (दि. 30 जाने.) संध्याकाळी - वेळ ५ ते ७ स्थळ : राष्ट्रसेवदल, साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ , सिंहगड रोड, पुणे.

In reply to by मोदक

आतिवास 30/01/2014 - 13:50
मला दिसतोय फोटो! हं! मजकूर असा आहे: कै. प्रकाश गोळे यांच्या 'वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन. Talk by Mr. George Archibald, Ex-President, International Crane Foundation USA रविवार, ९ फेब्रुवारी, सकाळी १० वाजता स्थळः इंद्रधनुष्य सभागृह, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ आयोजकः इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे

आतिवास 05/02/2014 - 12:18
ईमेलवरुन आलेलं आमंत्रण कॉपी -पेस्ट केलंय त्यामुळे आंग्ल भाषेत आहे. Dear Friends The '2nd Girish Sant Memorial annual lecture' will be held on 8th of this month.This year Prof. Ashok Gadgil from Univerisity of California, Berkely, who was a close friend of Girish, is going to deliver the lecture.Improving peoples' lives by developing and deploying appropriate technology. I invite you for the program.Kindly circulate this invitation to your friends who might be interested in coming to the program Venue : S. M. Joshi Auditorium, Near Patrakar Bhavan.Date - 8th February(Saturday) 2014Timing - 6 to 8 pm

आयुर्हित 22/02/2014 - 01:16
पतियाळा घराण्याचा युवा गायक रमाकांत गायकवाड, युवा गायिका अंजली दाते आणि तरुण सतारवादक चिराग कट्टी यांचं सादरीकरण पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवातील 'युवा संगीत संमेलना'त अनुभवता येणार आहे. रविवारी (दि. २३) सकाळी ८.३० वाजता हे संमेलन होईल. आपला परिसर-तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित 'पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव' आजपासून (दि. २१) सुरू होत आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घरकुल लॉन्स इथं रोज संध्याकाळी ५.३० वाजता हा महोत्सव होणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं होणाऱ्या भटकंतीत चांगल्या युवा कलाकारांचा शोध लागतो. त्याशिवाय अभिषेकी महोत्सवाची पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यांची समितीही युवा कलाकारांची निवड करते. गेली तीन वर्ष आम्ही आवर्जून युवा कलाकारांना महोत्सवात संधी देत असल्याचं गायक पं. शौनक अभिषेकी यांनी सांगितलं. महोत्सवात शनिवारी (दि. २२) सुधाकर देवळे यांचं गायन होणार असून त्यांना अविनाश पाटील तबल्याची आणि सुधीर नायक संवादिनी साथ करणार आहेत. पूर्बायन चॅटर्जी यांच्या सतारवादनास अनुब्रत चॅटर्जी तबला साथ करतील, तर दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सांगता प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांच्या गायनानं होईल. त्यांना भरत कामत तबल्याची, तर डॉ. अरविंद थत्ते हार्मोनियमची साथ करतील. रविवारच्या (दि. २३) संध्याकाळच्या सत्राची सुरुवात संजीव आणि अश्विनी शंकर यांच्या शहनाई वादनानं होणार आहे. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद तबल्याची साथ करतील. कुमुद दिवाण यांच्या ठुमरी सादरीकरणास हर्षद कानेटकर तबल्याची, तर मिलिंद कुलकर्णी संवादिनीची साथ करतील. महोत्सवाची सांगता पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनानं होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. संपूर्ण महोत्सवाचं निवेदन गोव्याचे डॉ. अजय वैद्य करणार आहेत. साभार:पुणे टाइम्स टीम

प्रसाद प्रकाशन + प्रसाद ज्ञानपीठ च्या विद्यमाने पालवी मंच (प्राचीन ज्ञान विज्ञान वृक्षाला फुटलेली आधुनिक पुनरुज्जीवनाची पालवी) द्वितीय पुष्प :सरोज भाटे विषय--शोध संस्कृत साहित्य विश्वाचा कार्यक्रम स्थळ: उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३० दिनांक ५ एप्रिल २०१४ सायंकाळी ५:३० ते ८:३० दूरध्वनी: प्रसाद प्रकाशन २४४७१४३७

सुहास झेले 10/05/2014 - 10:38
शैक्षणिक सत्रे - भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे - मे २०१४. मुंबईतील इतिहासप्रेमी आणि मोडी लिपीच्या अभ्यासकांसाठी महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ,मुंबई यांचेतर्फे मे २०१४ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे शैक्षणिक सत्रे आयोजिण्यात येत आहेत. दिनांक : रविवार, २५ मे २०१४. स्थळ : भारत इतिहास संशोधक मंडळ, # १३२१, सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, पुणे - ४११०३०. वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ०४.३० पर्यंत. अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकांवर आमच्याशी संपर्क साधावा. ९८३३९०४७९६, ९८६९४०७१३१, ९८३३१८२०७७. ई-मेल - miham.mumbai@gmail.com महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ, मुंबई.

म्हैस 30/05/2014 - 15:08
@बबु पत्ता अजून देतील मध्ये द्या न. बिबवेवाडी गावठाणाच्या कमानीतून आत जायचं का?

आयुर्हित 26/07/2014 - 00:16
ऍडव्हेंचर, थ्रील अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव एकाच वेळी देणारी कात्रज टू सिंहगड एन्ड्युरो स्पर्धा अर्थात ‘के 2 एस नाईट ट्रेक’ येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय. या स्पर्धेसाठी सध्या टिम्सची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेचं यंदा 12 वं वर्ष आहे. K2S MONSOON DAY TREKKING RACE 2014 is open only for everyone and will be held on the on Saturday, 2nd August 2014 and is part of the K2S Monsoon Adventure Race 2014. Primarily a team trekking race, K2S tests the competitors' physical and mental endurance. A team of 3 members covers a distance of over 16 kms. in the monsoon rains with bracing wind all over, navigating over 15 hills and valleys from the Katraj Tunnel Top to the top of Sinhagad Fort, Pune. DATES: RACE DAY 2nd August 2014 REPORTING: 12:00pm.* on 2nd August 2014 at Katraj Tunnel Top. FLAG OFF: 2:30pm.* from Katraj Tunnel Top ROUTE: Katraj Tunnel Top to Sinhagad Fort K2S – Monsoon Trekking Race 2014

खगोलशास्त्राची आवड असणार्‍यांसाठी एक चांगली संधी... आयुक्कामध्ये ३१ जुलैला संध्याकाळी ६.३० वाजता, सर्वसामान्य नागरिकांना खुला प्रवेश असलेल्या कार्यक्रमाचे आमंत्रण... ======================================= Dear All Please mark your calendars... IUCAA is organising a Public Lecture on Thursday, July 31 at 6:30 pm (Next Week) in the IUCAA Chandrasekhar Auditorium within the Pune University Campus. You are all welcome to attend and please pass this on to others who may be interested. https://www.facebook.com/events/1450429711887865/ Please feel free to interact in the post lecture session with Dr. Gordon Squires, Communications & Education lead, Thirty Meter Telescope Exciting recent Astronomical discoveries enabled by the ground- and space-based telescopes will be shared in this talk along with some personal stories of how the speaker helped share them with the world. The progress towards astronomy’s next-generation observatory, the Thirty Meter Telescope (TMT) will also be described. TMT is an unprecedented collaboration among astronomy institutes in India, Japan, China, Canada and the United States of America. Dr. Squires is an astronomer at the California Institute of Technology, working with the TMT, as well as NASA’s Spitzer Space Telescope, the Herschel Space Observatory, the Galaxy Evolution Explorer, NuSTAR, Kepler, WISE, and other space telescopes with Caltech involvement. His research explores the old, cold and distant universe – understanding how galaxies formed billions of years ago and what is the nature of the dark matter and dark energy that fills space. Hope to see you there... Please arrive early as seats are limited. - Samir Dhurde.

In reply to by संदीप डांगे

मोदक 30/08/2016 - 18:28
सार्वजनीक उपक्रम आहे हा डांगेण्णा.. धागा काढला तेंव्हाच लोकार्पण केला आहे. ;) मी अशा धाग्यांकडे निराकार भावनेने (बिचारे सर आमचे!!) बघतो. चालला तर चालला.. ज्याला आवडला ते प्रतिसाद देतील... शिंपल. :)

In reply to by मोदक

संदीप डांगे 30/08/2016 - 20:24
हो, कळले हो, खोचकपणा करणे आमचं स्वभाव आहे म्हणतात, त्याला जागावं आणि धागाही जिवंत करावा म्हणून ..:)) बाकी, नवीन काय पुण्यात एवढ्यात??

In reply to by संदीप डांगे

महासंग्राम 31/08/2016 - 11:32
डांगेण्णा, पुण्याचा सोताचा उत्सव गणेशोत्सव येतोय ५ तारखेपासून अवश्य येणे करावे... पुणे हे १० दिवस अगदी जिवंत भासतं.

चित्रगुप्त 30/08/2016 - 23:43
पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा
हे वाचून डोळे पाणावले. कुठे गेला तो पुणेकरांचा जाज्वल्य अभिमान? पूर्वीचे पुणे आता राहिले नाही हेच खरे. यूपी बिहार वाल्यांनी वाट लावली, हे खुद्द बाजीरावांनीच नाचत नाचत सांगितले आहे ...

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 31/08/2016 - 00:04
बरोबर आहे काका. मी जे काय दोन चार दिवसात पुणे पाहिले त्यात नदिपल्याडचे शहर हे पुणे नाहीच असे स्पष्ट जाणवत होते. जसे रामकुंडापासूनच्या दोन किमीच्या वर्तुळाबाहेरचं नाशिक हे नाशिक नाही तसेच सदाशिवपेठेच्या दोन किमी वर्तुळाबाहेरचं पुणे हे पुणे नाहीच्च!!

In reply to by चित्रगुप्त

अमरप्रेम 31/08/2016 - 11:27
पिंपरी चिंचवड साठी वेगळा धागा सुरु करायचा का मग.... अगोदर पासूनच हा धागा थंड आहे... अजून दुसरा धागा काढून फक्त संख्या वाढवायची काय ? (असाच टाइमपास)

सानझरी 01/09/2016 - 11:27
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लवकरच पर्शियन/फारसी भाषेचा वर्ग सुरु होत आहे.फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी शिकवणार आहेत अधिक माहिती पुढीलप्रमाणे: सुरुवात: दि. २४ सप्टेंबर २०१६ पासुन कालावधी: ६ महिने वेळ: दर शनिवार सकाळी ९.३० ते ११.३० शुल्क: रु १०००/- इच्छुकांनी ०२०-२४४७२५८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुण्यात ७,८,९ ऑक्टोबरला सिंहगड पायथ्याशी मिसळ महोत्सव असल्याचं समजतं. पुणे, नाशिक, चिपळूण, वऱ्हाडी अशा वेगवेगळ्या चवींची मिसळ चाखता येणार आहे. त्याशिवाय इतर पदार्थही असतील. माझ्याकडे संपर्क क्रमांक किंवा इतर माहिती नाही. पुणेकर मिपाकरांना कदाचित आणखी माहिती देता येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोदक 06/10/2016 - 16:09
पहिला 'पुणे मिसळ महोत्सव' मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न! सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्‍याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्‍या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा. आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा... पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत. इथे मिळेल हरतर्‍हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत. तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्‍या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून. नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच. पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’. आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५. (मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती). दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६. वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. *** मायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. ***

नाखु 22/01/2014 - 17:07
किमान आधी माहीत झाल्याने नंतरची निराशा होणार नाही.

अन्याय, अन्याय आहे हा. मिपाला पुण्यापुरते मर्यादित करण्याच्या प्रयत्नाचा निषेध... ठीके सुरु केलाच आहे, आता तर जमेल तशी माहितीची देवाण घेवाण करू.

येथे ओरिसा,भुवनेश्वरहुन आलेल्या कलाकारांचे एक प्रदर्शन चालु आहे. तसे तर टि.स्मा. आणि सोनल हॉल,कर्वे रोड अश्या ठीकाणी नेहमीच काहीना काही प्रदर्शने असतात.मग ह्याचे वैशिष्ट्य काय? ईथे दगडी कोरीव काम केलेल्या काही मुर्ती मला फारच आवडल्या (पण त्या आणल्या तर मला घराबाहेर....) आणि किंमती ८००-९०० पासुन चालु होत आहेत ते अगदी २० ह. पर्यंत कपड्यावर नैसर्गिक रंगाने काढलेली दशावतार,रामायण,कृष्ण्-बलराम-सुभद्रा,गोकुळातले प्रसंग अशी अनेक पेंटींग आहेत.ती पण ४०० ते २ हजारपर्यंत. अतिशय ताजे रंग वाटले,शिवाय स्वतः कलाकार सांगणारा दर्दी वाटला. शिवाय हस्तकला, बटवे वगैरे स्त्रियांसाठी आहेतच. असो. वैयक्तिकरित्या मला त्या शिल्पकला आणि कापडावरील चित्रे फारच आवडली आणि मी काही चित्रे (मोहात पडुन) घेतलीसुद्धा.

बबु 24/01/2014 - 20:28
क्ळविण्यास आनन्द होतो की, नगर वाचन मन्दिराची शाखा बिबवेवाडी येथे सुरू झाली आहे.पत्ता: माणिक - मोती अपार्टमेन्ट, (पुर्वीचे सुबोध वाचनालय),अन्नभाउ साठे पुतल्यामागे, बिबवेवाडी

आतिवास 30/01/2014 - 11:35
ओजस सु. वि. यांचा ईरोम शर्मिला यांच्या लढ्यावर आधारित 'ले मशाले' चा प्रयोग- आज (दि. 30 जाने.) संध्याकाळी - वेळ ५ ते ७ स्थळ : राष्ट्रसेवदल, साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ , सिंहगड रोड, पुणे.

In reply to by मोदक

आतिवास 30/01/2014 - 13:50
मला दिसतोय फोटो! हं! मजकूर असा आहे: कै. प्रकाश गोळे यांच्या 'वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन. Talk by Mr. George Archibald, Ex-President, International Crane Foundation USA रविवार, ९ फेब्रुवारी, सकाळी १० वाजता स्थळः इंद्रधनुष्य सभागृह, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ आयोजकः इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे

आतिवास 05/02/2014 - 12:18
ईमेलवरुन आलेलं आमंत्रण कॉपी -पेस्ट केलंय त्यामुळे आंग्ल भाषेत आहे. Dear Friends The '2nd Girish Sant Memorial annual lecture' will be held on 8th of this month.This year Prof. Ashok Gadgil from Univerisity of California, Berkely, who was a close friend of Girish, is going to deliver the lecture.Improving peoples' lives by developing and deploying appropriate technology. I invite you for the program.Kindly circulate this invitation to your friends who might be interested in coming to the program Venue : S. M. Joshi Auditorium, Near Patrakar Bhavan.Date - 8th February(Saturday) 2014Timing - 6 to 8 pm

आयुर्हित 22/02/2014 - 01:16
पतियाळा घराण्याचा युवा गायक रमाकांत गायकवाड, युवा गायिका अंजली दाते आणि तरुण सतारवादक चिराग कट्टी यांचं सादरीकरण पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवातील 'युवा संगीत संमेलना'त अनुभवता येणार आहे. रविवारी (दि. २३) सकाळी ८.३० वाजता हे संमेलन होईल. आपला परिसर-तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित 'पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव' आजपासून (दि. २१) सुरू होत आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घरकुल लॉन्स इथं रोज संध्याकाळी ५.३० वाजता हा महोत्सव होणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं होणाऱ्या भटकंतीत चांगल्या युवा कलाकारांचा शोध लागतो. त्याशिवाय अभिषेकी महोत्सवाची पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यांची समितीही युवा कलाकारांची निवड करते. गेली तीन वर्ष आम्ही आवर्जून युवा कलाकारांना महोत्सवात संधी देत असल्याचं गायक पं. शौनक अभिषेकी यांनी सांगितलं. महोत्सवात शनिवारी (दि. २२) सुधाकर देवळे यांचं गायन होणार असून त्यांना अविनाश पाटील तबल्याची आणि सुधीर नायक संवादिनी साथ करणार आहेत. पूर्बायन चॅटर्जी यांच्या सतारवादनास अनुब्रत चॅटर्जी तबला साथ करतील, तर दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सांगता प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांच्या गायनानं होईल. त्यांना भरत कामत तबल्याची, तर डॉ. अरविंद थत्ते हार्मोनियमची साथ करतील. रविवारच्या (दि. २३) संध्याकाळच्या सत्राची सुरुवात संजीव आणि अश्विनी शंकर यांच्या शहनाई वादनानं होणार आहे. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद तबल्याची साथ करतील. कुमुद दिवाण यांच्या ठुमरी सादरीकरणास हर्षद कानेटकर तबल्याची, तर मिलिंद कुलकर्णी संवादिनीची साथ करतील. महोत्सवाची सांगता पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनानं होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. संपूर्ण महोत्सवाचं निवेदन गोव्याचे डॉ. अजय वैद्य करणार आहेत. साभार:पुणे टाइम्स टीम

प्रसाद प्रकाशन + प्रसाद ज्ञानपीठ च्या विद्यमाने पालवी मंच (प्राचीन ज्ञान विज्ञान वृक्षाला फुटलेली आधुनिक पुनरुज्जीवनाची पालवी) द्वितीय पुष्प :सरोज भाटे विषय--शोध संस्कृत साहित्य विश्वाचा कार्यक्रम स्थळ: उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३० दिनांक ५ एप्रिल २०१४ सायंकाळी ५:३० ते ८:३० दूरध्वनी: प्रसाद प्रकाशन २४४७१४३७

सुहास झेले 10/05/2014 - 10:38
शैक्षणिक सत्रे - भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे - मे २०१४. मुंबईतील इतिहासप्रेमी आणि मोडी लिपीच्या अभ्यासकांसाठी महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ,मुंबई यांचेतर्फे मे २०१४ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे शैक्षणिक सत्रे आयोजिण्यात येत आहेत. दिनांक : रविवार, २५ मे २०१४. स्थळ : भारत इतिहास संशोधक मंडळ, # १३२१, सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, पुणे - ४११०३०. वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ०४.३० पर्यंत. अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकांवर आमच्याशी संपर्क साधावा. ९८३३९०४७९६, ९८६९४०७१३१, ९८३३१८२०७७. ई-मेल - miham.mumbai@gmail.com महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ, मुंबई.

म्हैस 30/05/2014 - 15:08
@बबु पत्ता अजून देतील मध्ये द्या न. बिबवेवाडी गावठाणाच्या कमानीतून आत जायचं का?

आयुर्हित 26/07/2014 - 00:16
ऍडव्हेंचर, थ्रील अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव एकाच वेळी देणारी कात्रज टू सिंहगड एन्ड्युरो स्पर्धा अर्थात ‘के 2 एस नाईट ट्रेक’ येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय. या स्पर्धेसाठी सध्या टिम्सची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेचं यंदा 12 वं वर्ष आहे. K2S MONSOON DAY TREKKING RACE 2014 is open only for everyone and will be held on the on Saturday, 2nd August 2014 and is part of the K2S Monsoon Adventure Race 2014. Primarily a team trekking race, K2S tests the competitors' physical and mental endurance. A team of 3 members covers a distance of over 16 kms. in the monsoon rains with bracing wind all over, navigating over 15 hills and valleys from the Katraj Tunnel Top to the top of Sinhagad Fort, Pune. DATES: RACE DAY 2nd August 2014 REPORTING: 12:00pm.* on 2nd August 2014 at Katraj Tunnel Top. FLAG OFF: 2:30pm.* from Katraj Tunnel Top ROUTE: Katraj Tunnel Top to Sinhagad Fort K2S – Monsoon Trekking Race 2014

खगोलशास्त्राची आवड असणार्‍यांसाठी एक चांगली संधी... आयुक्कामध्ये ३१ जुलैला संध्याकाळी ६.३० वाजता, सर्वसामान्य नागरिकांना खुला प्रवेश असलेल्या कार्यक्रमाचे आमंत्रण... ======================================= Dear All Please mark your calendars... IUCAA is organising a Public Lecture on Thursday, July 31 at 6:30 pm (Next Week) in the IUCAA Chandrasekhar Auditorium within the Pune University Campus. You are all welcome to attend and please pass this on to others who may be interested. https://www.facebook.com/events/1450429711887865/ Please feel free to interact in the post lecture session with Dr. Gordon Squires, Communications & Education lead, Thirty Meter Telescope Exciting recent Astronomical discoveries enabled by the ground- and space-based telescopes will be shared in this talk along with some personal stories of how the speaker helped share them with the world. The progress towards astronomy’s next-generation observatory, the Thirty Meter Telescope (TMT) will also be described. TMT is an unprecedented collaboration among astronomy institutes in India, Japan, China, Canada and the United States of America. Dr. Squires is an astronomer at the California Institute of Technology, working with the TMT, as well as NASA’s Spitzer Space Telescope, the Herschel Space Observatory, the Galaxy Evolution Explorer, NuSTAR, Kepler, WISE, and other space telescopes with Caltech involvement. His research explores the old, cold and distant universe – understanding how galaxies formed billions of years ago and what is the nature of the dark matter and dark energy that fills space. Hope to see you there... Please arrive early as seats are limited. - Samir Dhurde.

In reply to by संदीप डांगे

मोदक 30/08/2016 - 18:28
सार्वजनीक उपक्रम आहे हा डांगेण्णा.. धागा काढला तेंव्हाच लोकार्पण केला आहे. ;) मी अशा धाग्यांकडे निराकार भावनेने (बिचारे सर आमचे!!) बघतो. चालला तर चालला.. ज्याला आवडला ते प्रतिसाद देतील... शिंपल. :)

In reply to by मोदक

संदीप डांगे 30/08/2016 - 20:24
हो, कळले हो, खोचकपणा करणे आमचं स्वभाव आहे म्हणतात, त्याला जागावं आणि धागाही जिवंत करावा म्हणून ..:)) बाकी, नवीन काय पुण्यात एवढ्यात??

In reply to by संदीप डांगे

महासंग्राम 31/08/2016 - 11:32
डांगेण्णा, पुण्याचा सोताचा उत्सव गणेशोत्सव येतोय ५ तारखेपासून अवश्य येणे करावे... पुणे हे १० दिवस अगदी जिवंत भासतं.

चित्रगुप्त 30/08/2016 - 23:43
पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा
हे वाचून डोळे पाणावले. कुठे गेला तो पुणेकरांचा जाज्वल्य अभिमान? पूर्वीचे पुणे आता राहिले नाही हेच खरे. यूपी बिहार वाल्यांनी वाट लावली, हे खुद्द बाजीरावांनीच नाचत नाचत सांगितले आहे ...

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 31/08/2016 - 00:04
बरोबर आहे काका. मी जे काय दोन चार दिवसात पुणे पाहिले त्यात नदिपल्याडचे शहर हे पुणे नाहीच असे स्पष्ट जाणवत होते. जसे रामकुंडापासूनच्या दोन किमीच्या वर्तुळाबाहेरचं नाशिक हे नाशिक नाही तसेच सदाशिवपेठेच्या दोन किमी वर्तुळाबाहेरचं पुणे हे पुणे नाहीच्च!!

In reply to by चित्रगुप्त

अमरप्रेम 31/08/2016 - 11:27
पिंपरी चिंचवड साठी वेगळा धागा सुरु करायचा का मग.... अगोदर पासूनच हा धागा थंड आहे... अजून दुसरा धागा काढून फक्त संख्या वाढवायची काय ? (असाच टाइमपास)

सानझरी 01/09/2016 - 11:27
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लवकरच पर्शियन/फारसी भाषेचा वर्ग सुरु होत आहे.फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी शिकवणार आहेत अधिक माहिती पुढीलप्रमाणे: सुरुवात: दि. २४ सप्टेंबर २०१६ पासुन कालावधी: ६ महिने वेळ: दर शनिवार सकाळी ९.३० ते ११.३० शुल्क: रु १०००/- इच्छुकांनी ०२०-२४४७२५८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुण्यात ७,८,९ ऑक्टोबरला सिंहगड पायथ्याशी मिसळ महोत्सव असल्याचं समजतं. पुणे, नाशिक, चिपळूण, वऱ्हाडी अशा वेगवेगळ्या चवींची मिसळ चाखता येणार आहे. त्याशिवाय इतर पदार्थही असतील. माझ्याकडे संपर्क क्रमांक किंवा इतर माहिती नाही. पुणेकर मिपाकरांना कदाचित आणखी माहिती देता येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोदक 06/10/2016 - 16:09
पहिला 'पुणे मिसळ महोत्सव' मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न! सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्‍याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्‍या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा. आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा... पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत. इथे मिळेल हरतर्‍हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत. तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्‍या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून. नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच. पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’. आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५. (मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती). दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६. वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. *** मायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. ***
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका.

विशाल चंदाले ·

यसवायजी 30/12/2013 - 19:29
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही उळ्ळागड्डी म्हणजे कांदा. यालाच कन्नडमधे इरुळी पण म्हणतात. सीमाभागातला शब्द आहे.

धन्यवाद यसवायजी, मला माहित आहे.(त्यांनी त्यात कांदा दाखवला होता, हो पण बघण्यापूर्वी माहित नव्हतं.) मला असं म्हणायचं होतं कि त्या शब्दातून एकांकिकेबद्दल काहीच अभिप्रेत होत नाही.

साती 30/12/2013 - 20:22
उळागड्डी खूप महाग झाला होता म्हणून ते नाव दिलंय का?

बेल सुद्धा जरूर पहा.. टेलिफोनच्या शोधाबद्दल आणी त्याच्या भोवताली ही एकांकिका फिरते.. कल्पना, त्यातील लिमिटेशन्स आणी त्यानंतर लागलेला अजरामर शोध नक्कीच प्रगल्भपणे साकारलाय.. पुरषोत्तम द्वितीय..

In reply to by यशोधन वाळिंबे

यशोधन, हो ती पण पहायचीय. त्याच दिवशी योग होता . पण काही कामानिमित्त जावं लागलं आणि ती राहिली . नक्की बघेन.

पैसा 05/01/2014 - 15:42
असे प्रयोग सर्वांपर्यंत कसे पोचतील याची काळजी सादरकर्त्यांनी घ्यायला हवी.

यसवायजी 30/12/2013 - 19:29
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही उळ्ळागड्डी म्हणजे कांदा. यालाच कन्नडमधे इरुळी पण म्हणतात. सीमाभागातला शब्द आहे.

धन्यवाद यसवायजी, मला माहित आहे.(त्यांनी त्यात कांदा दाखवला होता, हो पण बघण्यापूर्वी माहित नव्हतं.) मला असं म्हणायचं होतं कि त्या शब्दातून एकांकिकेबद्दल काहीच अभिप्रेत होत नाही.

साती 30/12/2013 - 20:22
उळागड्डी खूप महाग झाला होता म्हणून ते नाव दिलंय का?

बेल सुद्धा जरूर पहा.. टेलिफोनच्या शोधाबद्दल आणी त्याच्या भोवताली ही एकांकिका फिरते.. कल्पना, त्यातील लिमिटेशन्स आणी त्यानंतर लागलेला अजरामर शोध नक्कीच प्रगल्भपणे साकारलाय.. पुरषोत्तम द्वितीय..

In reply to by यशोधन वाळिंबे

यशोधन, हो ती पण पहायचीय. त्याच दिवशी योग होता . पण काही कामानिमित्त जावं लागलं आणि ती राहिली . नक्की बघेन.

पैसा 05/01/2014 - 15:42
असे प्रयोग सर्वांपर्यंत कसे पोचतील याची काळजी सादरकर्त्यांनी घ्यायला हवी.
नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं. एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे).

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

ज्ञानोबाचे पैजार ·

चित्रगुप्त 13/12/2013 - 17:31
व्वा. पूर्ण गाणे बघितले. अशी थोर कलाकृती निर्माण करणार्‍यांना आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या तुम्हाला साष्टांग दंडवत. इस्पाईडर्म्यानच्या बुरख्याआड बहुधा प्रभुदेवा असावा. गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

In reply to by चित्रगुप्त

शिद 13/12/2013 - 17:50
गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?
=)) =)) =))

सूड 13/12/2013 - 17:32
>>सांत कि असांत सांत की अनंत अस्तंय वो त्ये!! जरा करेक्शन करायचं बघा की वो !! सांत = स+ अंत (ज्या गोष्टीला अंत आहे) अनंत= अन्+ अंत (ज्या गोष्टीला अंत नाही)

In reply to by सूड

या अचाट गाण्याचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखेच कठीण कार्य होते. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. रावण जनकाच्या दरबारात शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. उचलताना त्याच्या हातून, शिवधनुष्य ज्या टेबलावर ठेवले होते, त्या टेबलावरचा टेबलक्लॉथ जरासा सरकला, म्हणुन शीतेने त्याच्या बरोबर लग्न करायला नकार दिला. तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या डोळ्या समोर उभा राहिला. त्या वेळी रावणाला हसणार्‍यांमधे आम्ही पण होतो. पण रावणाला त्या वेळी काय वाटले असेल ते आज आम्हाला समजले.

In reply to by चित्रगुप्त

फडातल्या कार्यक्रमासाठी पर्दाफाश करायची गरज नसते. ते न करताही फडातला कार्यक्रम उरकता येतो. त्या मुळे इस्पायडीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगळी युक्ती योजावी लागेल. (अनुभवी)

विजुभाऊ 13/12/2013 - 18:08
मागे उसाचे शेत दिसते आहे . हा समग्र नाग-विदर्भावर अन्याय आहे. आम्ही सीताबर्डीत निदर्शने करुन निर्मात्याला नागपुरात पाऊल टाकू देणार नाही. धनतोलीत मोर्चे काढून त्याम्च्यावर संत्र्याचा मारा करू. चित्रपट सृष्टीने सुद्धा नागपूर - विदर्भावला प्रतिनीधीत्व न देवून अनुशेशाने मारले आहे. हा अन्याय आम्ही का म्हणुन सहन करायचा. जिकडे तिकडे पश्चीम महाराष्ट्रच का?

In reply to by विजुभाऊ

तुमच्या दुखड्याची नोंद घेता, बुवानीं संत्री आणी द्राक्षाच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या मुखड्यांच्या गाण्यावर किर्तन केल्यास मराठवाडा, विदर्भ दोघांनाही न्याय मिळेल.

प्यारे१ 13/12/2013 - 19:38
अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं तर आम्हाला प्रतिभेबद्दल 'प्रश्ण' निर्माणच झाला नसता. काय हे पैजार बुवा? =)) बाकी आमचा देखील प्रयत्न : मुन्नी बदनाम हुई http://misalpav.com/node/17636

खटपट्या 13/12/2013 - 23:16
निव्वळ अप्रतिम !! हे गाणे बघून माझी मुलगी रडायचे थांबली. (चल तेवढा तरी फायदा झाला ) बाकी स्पायड्याचा नाच (?) छानच

==)) :) :D वाचूनच फुटलो!!!! आता व्हीडीओ पाहतो अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते. याच्या सारख्या काही वाक्यांना जोरात ठसका लागला.

In reply to by lakhu risbud

अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे आहे. स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात ते हेच असावे. काय ते गाणे आणि काय तो त्यावरचा ढॅन्स पैजारबुवा,

In reply to by lakhu risbud

akhu risbud आपण जर वेळात वेळ काढून हे गाणे इथे डकवले असेल तर आपण मिपाचे भूषण आहात असे मला वाटते नुसत्या रसग्रहणाचा आग्रह करणे आपली विनम्रता दर्शवितो हे पूर्ण गाणे पाहिल्याखेरीज ,ऐकल्याखेरीज मिपा उघडणार नाही अशी व्यवस्था व्हावी या सूचनेच्या अनुमोदनासाठी हा प्रतिसाद आहे

पैसा 14/12/2013 - 23:03
केवळ भयानक आहे!! परीक्षण तर एकदम चिरफाड करणारं!! जबरदस्त!

सुहास.. 15/12/2013 - 09:55
खल्लास ....कल्ला शोध लावला आहे !! =)) =)) =)) अरे तो स्पायडरमॅन च्यामारी कमरेवर हात ठेवुन ठुमके मारतोय आणि बबडी घागर्‍याला उआगा त्रास देते =)) आयला त्या नव्य जुन्या सगळ्या स्पामॅ नी पाहिला हा विडो तर स्वता एखाद्या उंच बिल्डीग वरून खाली उडी टाकुन जीव देतील ... बुवा परिक्षण तर त्याहुनी हुच्च .. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. >> =)) =)) =)) ह ह पु वा .

चित्रपटातील स्पायडरमॅन हा स्वतः त्या चित्रपटाचा निर्माता असावा. स्वतःच्या खिशातून 'कांही हजार' रुपये खर्चून आणि शेजारच्या कुळकर्ण्यांच्या धाकट्या मुलीला हिरॉईन बनविण्याची स्वप्ने दाखवून चित्रपटाची निर्मिती केली असल्यासारखे जाणवते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जडभरत 04/07/2015 - 20:00
छे मला तर तिचा नाच एखाद्या बारबालेसारखा वाटतो. आणि ईस्पायडरमॅनच्या स्टेप्स सकाळी पोट साफ व्हायला काही योगासनं करतात तसा वाटतो.

चित्रगुप्त 16/12/2013 - 10:34
सांप्रत हा कोणता इस्पाईडरम्यानावतार? हा अलौकिक नरपुंगव कोण? काय नाव त्या पुरुषोत्तमाचे, आणि त्या चित्रपटाचे? तिलोत्तमा, रति, मेनका, रंभा आदिंच्या मनात हेवा निर्माण करणारी कोण ही अप्सरा? व्यास-वाल्मिकी, कालिदासादि महाकवीनाही खाली मान घालायला लावणारी काव्यप्रतिभा अंगी असणारा या गीताचा रचयिता कोण? डोळ्याचे पारणे फिटवणारे हे असे रोमांचक, अद्भुत नृत्य बसविणारा महागुरु कोण? आणि या दिव्य संगीताचा रचयिता कोण? या सर्वांना आमचा त्रिवार मुजरा, आणि विनाविलंब या सर्वांस 'भारतरत्न' द्यावे, ही विनंती. हे नृत्य बघून मनमोहनाच्या डोळ्यात अश्रू आले, एवढेच भारतरत्नत्वास पुरे ठरावे.

वळख करु दिली. अभारी आहे. अशा गाण्यान्चा खूप आधार असतो. जवा कवा वाटलन की जग लइ वाइट्ट हाय, आनन्द हरविला आहे, आपल्या नशीबी हेच, हापिसात साहेब आपल्यालाच कावतात वगैरे वगैरे..!! जास्त लोड नाही घ्यायचा.. अरामात [च्या/कापी/ इ. चा] मग हातात घ्यावा आणी इस्पाईडरम्यान, इस्कुल के टेम पे, जाते हो परदेस पिया आणी खुपच येळ असल तर "गुण्डा" पहावा.

चित्रगुप्त 19/05/2015 - 20:53
आज पुन्हा एकदा हे सहस्त्रकातुन एखादेच असे हे अद्वितीय गाणे बघून आणि त्यावरील बुवांचे भाष्य वाचून ब्रम्हानंदी टाळी लागली. सल्लूला हे गाणे ऐकूनच फूटपाथावर गाडी चालवण्याची प्रेरणा मिळाली, असेही ऐकिवात आहे. त्याने खुद्द आम्हाला या गाण्यासारखे गाणे आपल्या पिच्चर मधे हवेच असा आग्रह इथे केला होता.

जडभरत 04/07/2015 - 12:17
पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. रसग्रहण करावं तर तुम्हीच. आज सकाळीच मी हा लेख मिपावर पहिल्यांदाच वाचला. (मी एक आठवड्यापूर्वीच मिपा जॉईन केलंय. मी जेव्हा सगा साहेबांच्या 'पावसात जळाया लागलोय' या कवितेचं तुम्ही केलेलं रसग्रहण केलंय तेव्हापासून मी आपला पंखाच झालोय.) आईशप्पथ!!! हसता हसता फरशीवर लोळत होतो चक्क. माझी पत्नी सुद्धा किचनमधून बाहेर आली हा प्रकार बघायला. मी तेव्हां व्हीडीओ पण पाहिला नव्हता. केवळ तुमच्या शब्दांतच इतकी पॉवर होती!

आमच्या आवडत्या पानाचा उल्लेख गाण्यात केल्या मूळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची मागणी करतो. नृत्य दिरदर्शकास शाष्टांग ____/\____. आणि अजून एक पैजारबुआ नृत्य बघुन आमचे पॉट (हसून हसून) दुखल्याने आपणास वकिला तर्फे एक नोटिस पाठवलेली आहे.

टर्मीनेटर 14/12/2021 - 14:43
नतमस्तक! काय हे अलौकीक गाणे आणि काय ते त्यावरचे इस्पायडर मॅनचे अलौकीक नृत्य, आहाहा आहाहा, लाजवाब! लेखातला व्हीडीओ बघीतल्यावर पहीले हे रत्न युट्युबवर अपलोडवणाऱ्या kooldude1111 ह्या चॅनलला सबस्क्राइब केले, व्हीडीओ लाईक आणि डाऊनलोड केला, लुप मध्ये पाच वेळा ही अलौकिक कलाकृती पाहीली आणि मग हा प्रतिसाद लिहायला घेतला. आपण आजपर्यंत (८० च्या दशकापासुनची) जवळजवळ सगळी हिंदी गाणी ऐकली आहेत असा माझा समज होता. पण तो समज किती ‘गैर’ होता हे आज कळले! माऊली ह्या लेखाद्वारे माझ्या भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक झालो आहे. आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा सर्व वेळी हे गाणे शक्य तेवढे वेळा पहाण्यास / ऐकण्यास मी व्रतबद्ध झालो आहे. परीक्षण एकदम भन्नाट केले आहे. नायीकेच्या लीलांना झुकते माप दिल्याने मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटले, त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटत आहे 😀 असो, हे अद्वीतीय गाणे गाणारी गायीका, संगीतकार, शब्दरचनाकार, व्हीडीओतले ते दोन्ही असामान्य कलाकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि हे गाणे आपल्या पर्यंत पोचवण्याचं महान कार्य करणारे PAL Films, युट्युबर kooldude1111, धागा लेखक प. पु. पैजारबुवा आणि हा धागा आज वर आणणारे श्री. श्री. विजुभाऊ अशा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे 🙏 अवांतर: हा व्हीडीओ युट्युबवर अपलोड करणाऱ्या विनयशील स्वभावाच्या kooldude1111 ह्या महान व्यक्तीने Description मधे लिहिलेली खालची ओळ वाचुन डोळे पाणावले! “U will definitely commit suicide after watching this shit” पुन्हा एकदा नतमस्तक!

चित्रगुप्त 13/12/2013 - 17:31
व्वा. पूर्ण गाणे बघितले. अशी थोर कलाकृती निर्माण करणार्‍यांना आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या तुम्हाला साष्टांग दंडवत. इस्पाईडर्म्यानच्या बुरख्याआड बहुधा प्रभुदेवा असावा. गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

In reply to by चित्रगुप्त

शिद 13/12/2013 - 17:50
गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?
=)) =)) =))

सूड 13/12/2013 - 17:32
>>सांत कि असांत सांत की अनंत अस्तंय वो त्ये!! जरा करेक्शन करायचं बघा की वो !! सांत = स+ अंत (ज्या गोष्टीला अंत आहे) अनंत= अन्+ अंत (ज्या गोष्टीला अंत नाही)

In reply to by सूड

या अचाट गाण्याचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखेच कठीण कार्य होते. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. रावण जनकाच्या दरबारात शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. उचलताना त्याच्या हातून, शिवधनुष्य ज्या टेबलावर ठेवले होते, त्या टेबलावरचा टेबलक्लॉथ जरासा सरकला, म्हणुन शीतेने त्याच्या बरोबर लग्न करायला नकार दिला. तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या डोळ्या समोर उभा राहिला. त्या वेळी रावणाला हसणार्‍यांमधे आम्ही पण होतो. पण रावणाला त्या वेळी काय वाटले असेल ते आज आम्हाला समजले.

In reply to by चित्रगुप्त

फडातल्या कार्यक्रमासाठी पर्दाफाश करायची गरज नसते. ते न करताही फडातला कार्यक्रम उरकता येतो. त्या मुळे इस्पायडीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगळी युक्ती योजावी लागेल. (अनुभवी)

विजुभाऊ 13/12/2013 - 18:08
मागे उसाचे शेत दिसते आहे . हा समग्र नाग-विदर्भावर अन्याय आहे. आम्ही सीताबर्डीत निदर्शने करुन निर्मात्याला नागपुरात पाऊल टाकू देणार नाही. धनतोलीत मोर्चे काढून त्याम्च्यावर संत्र्याचा मारा करू. चित्रपट सृष्टीने सुद्धा नागपूर - विदर्भावला प्रतिनीधीत्व न देवून अनुशेशाने मारले आहे. हा अन्याय आम्ही का म्हणुन सहन करायचा. जिकडे तिकडे पश्चीम महाराष्ट्रच का?

In reply to by विजुभाऊ

तुमच्या दुखड्याची नोंद घेता, बुवानीं संत्री आणी द्राक्षाच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या मुखड्यांच्या गाण्यावर किर्तन केल्यास मराठवाडा, विदर्भ दोघांनाही न्याय मिळेल.

प्यारे१ 13/12/2013 - 19:38
अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं तर आम्हाला प्रतिभेबद्दल 'प्रश्ण' निर्माणच झाला नसता. काय हे पैजार बुवा? =)) बाकी आमचा देखील प्रयत्न : मुन्नी बदनाम हुई http://misalpav.com/node/17636

खटपट्या 13/12/2013 - 23:16
निव्वळ अप्रतिम !! हे गाणे बघून माझी मुलगी रडायचे थांबली. (चल तेवढा तरी फायदा झाला ) बाकी स्पायड्याचा नाच (?) छानच

==)) :) :D वाचूनच फुटलो!!!! आता व्हीडीओ पाहतो अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते. याच्या सारख्या काही वाक्यांना जोरात ठसका लागला.

In reply to by lakhu risbud

अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे आहे. स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात ते हेच असावे. काय ते गाणे आणि काय तो त्यावरचा ढॅन्स पैजारबुवा,

In reply to by lakhu risbud

akhu risbud आपण जर वेळात वेळ काढून हे गाणे इथे डकवले असेल तर आपण मिपाचे भूषण आहात असे मला वाटते नुसत्या रसग्रहणाचा आग्रह करणे आपली विनम्रता दर्शवितो हे पूर्ण गाणे पाहिल्याखेरीज ,ऐकल्याखेरीज मिपा उघडणार नाही अशी व्यवस्था व्हावी या सूचनेच्या अनुमोदनासाठी हा प्रतिसाद आहे

पैसा 14/12/2013 - 23:03
केवळ भयानक आहे!! परीक्षण तर एकदम चिरफाड करणारं!! जबरदस्त!

सुहास.. 15/12/2013 - 09:55
खल्लास ....कल्ला शोध लावला आहे !! =)) =)) =)) अरे तो स्पायडरमॅन च्यामारी कमरेवर हात ठेवुन ठुमके मारतोय आणि बबडी घागर्‍याला उआगा त्रास देते =)) आयला त्या नव्य जुन्या सगळ्या स्पामॅ नी पाहिला हा विडो तर स्वता एखाद्या उंच बिल्डीग वरून खाली उडी टाकुन जीव देतील ... बुवा परिक्षण तर त्याहुनी हुच्च .. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. >> =)) =)) =)) ह ह पु वा .

चित्रपटातील स्पायडरमॅन हा स्वतः त्या चित्रपटाचा निर्माता असावा. स्वतःच्या खिशातून 'कांही हजार' रुपये खर्चून आणि शेजारच्या कुळकर्ण्यांच्या धाकट्या मुलीला हिरॉईन बनविण्याची स्वप्ने दाखवून चित्रपटाची निर्मिती केली असल्यासारखे जाणवते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जडभरत 04/07/2015 - 20:00
छे मला तर तिचा नाच एखाद्या बारबालेसारखा वाटतो. आणि ईस्पायडरमॅनच्या स्टेप्स सकाळी पोट साफ व्हायला काही योगासनं करतात तसा वाटतो.

चित्रगुप्त 16/12/2013 - 10:34
सांप्रत हा कोणता इस्पाईडरम्यानावतार? हा अलौकिक नरपुंगव कोण? काय नाव त्या पुरुषोत्तमाचे, आणि त्या चित्रपटाचे? तिलोत्तमा, रति, मेनका, रंभा आदिंच्या मनात हेवा निर्माण करणारी कोण ही अप्सरा? व्यास-वाल्मिकी, कालिदासादि महाकवीनाही खाली मान घालायला लावणारी काव्यप्रतिभा अंगी असणारा या गीताचा रचयिता कोण? डोळ्याचे पारणे फिटवणारे हे असे रोमांचक, अद्भुत नृत्य बसविणारा महागुरु कोण? आणि या दिव्य संगीताचा रचयिता कोण? या सर्वांना आमचा त्रिवार मुजरा, आणि विनाविलंब या सर्वांस 'भारतरत्न' द्यावे, ही विनंती. हे नृत्य बघून मनमोहनाच्या डोळ्यात अश्रू आले, एवढेच भारतरत्नत्वास पुरे ठरावे.

वळख करु दिली. अभारी आहे. अशा गाण्यान्चा खूप आधार असतो. जवा कवा वाटलन की जग लइ वाइट्ट हाय, आनन्द हरविला आहे, आपल्या नशीबी हेच, हापिसात साहेब आपल्यालाच कावतात वगैरे वगैरे..!! जास्त लोड नाही घ्यायचा.. अरामात [च्या/कापी/ इ. चा] मग हातात घ्यावा आणी इस्पाईडरम्यान, इस्कुल के टेम पे, जाते हो परदेस पिया आणी खुपच येळ असल तर "गुण्डा" पहावा.

चित्रगुप्त 19/05/2015 - 20:53
आज पुन्हा एकदा हे सहस्त्रकातुन एखादेच असे हे अद्वितीय गाणे बघून आणि त्यावरील बुवांचे भाष्य वाचून ब्रम्हानंदी टाळी लागली. सल्लूला हे गाणे ऐकूनच फूटपाथावर गाडी चालवण्याची प्रेरणा मिळाली, असेही ऐकिवात आहे. त्याने खुद्द आम्हाला या गाण्यासारखे गाणे आपल्या पिच्चर मधे हवेच असा आग्रह इथे केला होता.

जडभरत 04/07/2015 - 12:17
पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. रसग्रहण करावं तर तुम्हीच. आज सकाळीच मी हा लेख मिपावर पहिल्यांदाच वाचला. (मी एक आठवड्यापूर्वीच मिपा जॉईन केलंय. मी जेव्हा सगा साहेबांच्या 'पावसात जळाया लागलोय' या कवितेचं तुम्ही केलेलं रसग्रहण केलंय तेव्हापासून मी आपला पंखाच झालोय.) आईशप्पथ!!! हसता हसता फरशीवर लोळत होतो चक्क. माझी पत्नी सुद्धा किचनमधून बाहेर आली हा प्रकार बघायला. मी तेव्हां व्हीडीओ पण पाहिला नव्हता. केवळ तुमच्या शब्दांतच इतकी पॉवर होती!

आमच्या आवडत्या पानाचा उल्लेख गाण्यात केल्या मूळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची मागणी करतो. नृत्य दिरदर्शकास शाष्टांग ____/\____. आणि अजून एक पैजारबुआ नृत्य बघुन आमचे पॉट (हसून हसून) दुखल्याने आपणास वकिला तर्फे एक नोटिस पाठवलेली आहे.

टर्मीनेटर 14/12/2021 - 14:43
नतमस्तक! काय हे अलौकीक गाणे आणि काय ते त्यावरचे इस्पायडर मॅनचे अलौकीक नृत्य, आहाहा आहाहा, लाजवाब! लेखातला व्हीडीओ बघीतल्यावर पहीले हे रत्न युट्युबवर अपलोडवणाऱ्या kooldude1111 ह्या चॅनलला सबस्क्राइब केले, व्हीडीओ लाईक आणि डाऊनलोड केला, लुप मध्ये पाच वेळा ही अलौकिक कलाकृती पाहीली आणि मग हा प्रतिसाद लिहायला घेतला. आपण आजपर्यंत (८० च्या दशकापासुनची) जवळजवळ सगळी हिंदी गाणी ऐकली आहेत असा माझा समज होता. पण तो समज किती ‘गैर’ होता हे आज कळले! माऊली ह्या लेखाद्वारे माझ्या भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक झालो आहे. आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा सर्व वेळी हे गाणे शक्य तेवढे वेळा पहाण्यास / ऐकण्यास मी व्रतबद्ध झालो आहे. परीक्षण एकदम भन्नाट केले आहे. नायीकेच्या लीलांना झुकते माप दिल्याने मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटले, त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटत आहे 😀 असो, हे अद्वीतीय गाणे गाणारी गायीका, संगीतकार, शब्दरचनाकार, व्हीडीओतले ते दोन्ही असामान्य कलाकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि हे गाणे आपल्या पर्यंत पोचवण्याचं महान कार्य करणारे PAL Films, युट्युबर kooldude1111, धागा लेखक प. पु. पैजारबुवा आणि हा धागा आज वर आणणारे श्री. श्री. विजुभाऊ अशा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे 🙏 अवांतर: हा व्हीडीओ युट्युबवर अपलोड करणाऱ्या विनयशील स्वभावाच्या kooldude1111 ह्या महान व्यक्तीने Description मधे लिहिलेली खालची ओळ वाचुन डोळे पाणावले! “U will definitely commit suicide after watching this shit” पुन्हा एकदा नतमस्तक!
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

वैकुंठ-सहगमन!!

वडापाव ·

रामपुरी 16/11/2013 - 02:43
=)) =)) मस्त... फक्त ते चंद्रगुप्तचं चित्रगुप्त करा. उगीच मधेच "चाणक्य" मधे घुसल्यासारखं वाटतय...

अगोचर 16/11/2013 - 02:44
:) =)) एकदम जोरदार .. आणि त्यातुन क्रमशः ... म्हणजे सोन्याहुन पिवळं ... (की) सोन्याची अंडी देणारी कोंबडी .. लिहीत रहा .. हा दुवा अनेक अमिपाकरांना पाठवला आहे ..

म्हैस 16/11/2013 - 15:52
शीर्षका सकट सगळा लेख एकदम टुकार आणि थिल्लर ..... असल्या विनोदी लिखाणांसाठी तुम्हाला दुसरा काही मिळालं नाही का? कि हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?

In reply to by म्हैस

बॅटमॅन 16/11/2013 - 15:57
हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या दैवताला तुम्ही नावे ठेवलेली चालतात आणि वर इतरांच्या नावाने गळा काढायला लाज वाटत नाही का?

In reply to by म्हैस

वडापाव 16/11/2013 - 16:09
हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?
हिंदू देव धर्माला नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नव्ह्ता. केवळ एक विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न केला. तुमच्या किंवा कोणाच्याच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, नाही. तरीही क्षमा मागतो.

@नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू. तिथे भूलोकी मी एकदा असाच फुलांच्या माळा हातात घालून फिरत होतो, तेव्हा एका हवालदाराने माझ्या बसण्याच्या जागेवर त्याच्या छडीने विनाकारण आघात केले हो. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif ....................................................................................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif @फुलांच्या माळांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी छड्या खाऊन फुललेल्या माझ्या पार्श्वभागाची आठवण होते. >>> @याच पार्वती वहिनीच्या हट्टापायी बिचा-या शंक-याने आपली हेअर स्टाईल बदलून पार गझनीhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif केला होता. वल्कलांचा त्याग करून शर्ट पँट घालायला लागला होता, हातावर हिब्रूत ‘पार्वती’ असंही टॅटू करून घेतलं होतं.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif @शकुनीला तेवढ्यासाठी नरकातून जामीन मिळवून देऊन आणला होता.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif @(दोघेही बोलत बोलत विंगेबाहेर जातात. ब्लॅकआऊट होतो.) प्रवेश 1 ला समाप्त>>> पुढच्या(सर्व)भागांची वाट बघतो आहे... अतिशय मार्मिक आणी मनोरंजक! मस्त.. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif मस्त..एकदम! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

विटेकर 18/11/2013 - 11:45
पंचेस सॉलीड आहेत . मस्त च ! काही ठिकाणी ओढून ताणून वाटतेय पण एकूण दर्जा चांगला आहे.

म्हैस 20/11/2013 - 11:57
@ ते आधी हिंदू दैवत आहे हे पटवून द्या . नसलेली अक्कल पाजळू नका

रामपुरी 16/11/2013 - 02:43
=)) =)) मस्त... फक्त ते चंद्रगुप्तचं चित्रगुप्त करा. उगीच मधेच "चाणक्य" मधे घुसल्यासारखं वाटतय...

अगोचर 16/11/2013 - 02:44
:) =)) एकदम जोरदार .. आणि त्यातुन क्रमशः ... म्हणजे सोन्याहुन पिवळं ... (की) सोन्याची अंडी देणारी कोंबडी .. लिहीत रहा .. हा दुवा अनेक अमिपाकरांना पाठवला आहे ..

म्हैस 16/11/2013 - 15:52
शीर्षका सकट सगळा लेख एकदम टुकार आणि थिल्लर ..... असल्या विनोदी लिखाणांसाठी तुम्हाला दुसरा काही मिळालं नाही का? कि हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?

In reply to by म्हैस

बॅटमॅन 16/11/2013 - 15:57
हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या दैवताला तुम्ही नावे ठेवलेली चालतात आणि वर इतरांच्या नावाने गळा काढायला लाज वाटत नाही का?

In reply to by म्हैस

वडापाव 16/11/2013 - 16:09
हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?
हिंदू देव धर्माला नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नव्ह्ता. केवळ एक विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न केला. तुमच्या किंवा कोणाच्याच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, नाही. तरीही क्षमा मागतो.

@नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू. तिथे भूलोकी मी एकदा असाच फुलांच्या माळा हातात घालून फिरत होतो, तेव्हा एका हवालदाराने माझ्या बसण्याच्या जागेवर त्याच्या छडीने विनाकारण आघात केले हो. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif ....................................................................................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif @फुलांच्या माळांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी छड्या खाऊन फुललेल्या माझ्या पार्श्वभागाची आठवण होते. >>> @याच पार्वती वहिनीच्या हट्टापायी बिचा-या शंक-याने आपली हेअर स्टाईल बदलून पार गझनीhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif केला होता. वल्कलांचा त्याग करून शर्ट पँट घालायला लागला होता, हातावर हिब्रूत ‘पार्वती’ असंही टॅटू करून घेतलं होतं.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif @शकुनीला तेवढ्यासाठी नरकातून जामीन मिळवून देऊन आणला होता.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif @(दोघेही बोलत बोलत विंगेबाहेर जातात. ब्लॅकआऊट होतो.) प्रवेश 1 ला समाप्त>>> पुढच्या(सर्व)भागांची वाट बघतो आहे... अतिशय मार्मिक आणी मनोरंजक! मस्त.. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif मस्त..एकदम! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

विटेकर 18/11/2013 - 11:45
पंचेस सॉलीड आहेत . मस्त च ! काही ठिकाणी ओढून ताणून वाटतेय पण एकूण दर्जा चांगला आहे.

म्हैस 20/11/2013 - 11:57
@ ते आधी हिंदू दैवत आहे हे पटवून द्या . नसलेली अक्कल पाजळू नका
डिस्क्लेमर सुरु: (शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अ‍ॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही) (चू भू द्या घ्या. ह घ्या.) डिस्क्लेमर समाप्त प्रवेश 1 ला (स्टेजवर एक माणूस एका प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसला आहे. मध्येच तो खिशातून एक मोबाईल काढून त्यात बघतो, त्याच्यावर स्वत:ची बोटं आदळतो, मग वरती धरतो, खाली धरतो. पण एवढं करून त्याचं समाधान झालेलं दिसत नाही. मग तो मोबाईल गदागदा हलवून बघतो. त्या यंत्राकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. तेवढ्यात एक मोलकरीण स्टेजवर येते, आणि झाडू मारायला सुरुवात करते.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

एच्टूओ ·

मी_आहे_ना 30/09/2013 - 18:03
सावरखेड १ गाव, जोगवा सारखे मराठी चित्रपट देणारे प्रयोगशील दिग्दर्शक अशी अचानक एक्झिट घेऊन गेले, वाईट झाले. :(

कपिलमुनी 30/09/2013 - 18:37
फार लौकर गेले !! अजून बरेच काही अपेक्षित होते त्यांच्याकडून .. मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुप मोठा धक्का आणि हानी आहे !

कलंत्री 01/10/2013 - 11:36
चित्रपट आणि राजकारणातील लोकांचे आयुष्यात काम आणि याची विश्रांती याचा समतोल साधायला हवा. बर्‍याच वेळेस मनातील भव्यदिव्य कल्पना, अशरीरी ताणतणाव यातून बर्‍याच कलावंताचा अकाली मृत्यु होत असतो.

In reply to by कलंत्री

नानबा 01/10/2013 - 14:14
कलाक्षेत्रातल्या हरहुन्नरी माणसांनी विश्रांती घ्यावीच, पण राजकारणी? किती राजकारण्यांचे कामाच्या दबावामुळे नैसर्गिकरित्या अकाली मृत्यू झालेत? गेंड्याच्या कातडीला छर्याच्या गोळीने काहीही फरक पडत नाही...

In reply to by कुसुमावती

मृगनयनी 01/10/2013 - 19:29
Rajeev'ji... Very Early Exit.... Just Speechless..... --------------------------------------------------- आत्ता कुठे मराठी इन्डस्ट्री एका वेगळ्या पाऊलवाटेवर स्थिरावत होती..... तिला एकटं टाकून निघुन गेलात !!... Its really very shocking.......... Rest In Peace......... *~*~*~*

पेस्तन काका 01/10/2013 - 18:01
अतिशय दुखद घटना... राजिव दादाची भेट पहिल्यांदा "प्रयोग परिवार" मध्ये झालेली... बहुतेक २००३ मध्ये.. अतिशय साधा सरळ माणुस... आम्ही अगदी छोटी एकांकिका करत होतो त्या निमित्ताने भेट झालेली.. त्यानंतर सावरखेड एक गाव चा वेळेस जवळुन संबंध आले.. आजहि विश्वास बसत नाहिये .. राजिव दा आपल्यात नाहि... :( खूप वाईट वाटले :(

पैसा 01/10/2013 - 20:36
बर्‍याच कलाकारांबद्दल आजकाल असेच प्रकार ऐकू येतात. सतत धावत रहाण्यामागे अनेक कारणं असतील. कलावंताची कारकीर्द अगदी बेभरवशाची. प्रचंड ताणतणाव आणि सतत लोकांसमोर रअहाण्याचे कंपल्शन. कुठे थांबावं हे ज्याचं त्याने ठरवायचं. काही जणांना स्वतःच्या आरोग्याचीही फिकीर नसते. झाली ती घटना वाईटच त्यामुळे अनेकांचं अनेक प्रकारचं नुकसान झालं आहे. मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजलि.

मी_आहे_ना 30/09/2013 - 18:03
सावरखेड १ गाव, जोगवा सारखे मराठी चित्रपट देणारे प्रयोगशील दिग्दर्शक अशी अचानक एक्झिट घेऊन गेले, वाईट झाले. :(

कपिलमुनी 30/09/2013 - 18:37
फार लौकर गेले !! अजून बरेच काही अपेक्षित होते त्यांच्याकडून .. मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुप मोठा धक्का आणि हानी आहे !

कलंत्री 01/10/2013 - 11:36
चित्रपट आणि राजकारणातील लोकांचे आयुष्यात काम आणि याची विश्रांती याचा समतोल साधायला हवा. बर्‍याच वेळेस मनातील भव्यदिव्य कल्पना, अशरीरी ताणतणाव यातून बर्‍याच कलावंताचा अकाली मृत्यु होत असतो.

In reply to by कलंत्री

नानबा 01/10/2013 - 14:14
कलाक्षेत्रातल्या हरहुन्नरी माणसांनी विश्रांती घ्यावीच, पण राजकारणी? किती राजकारण्यांचे कामाच्या दबावामुळे नैसर्गिकरित्या अकाली मृत्यू झालेत? गेंड्याच्या कातडीला छर्याच्या गोळीने काहीही फरक पडत नाही...

In reply to by कुसुमावती

मृगनयनी 01/10/2013 - 19:29
Rajeev'ji... Very Early Exit.... Just Speechless..... --------------------------------------------------- आत्ता कुठे मराठी इन्डस्ट्री एका वेगळ्या पाऊलवाटेवर स्थिरावत होती..... तिला एकटं टाकून निघुन गेलात !!... Its really very shocking.......... Rest In Peace......... *~*~*~*

पेस्तन काका 01/10/2013 - 18:01
अतिशय दुखद घटना... राजिव दादाची भेट पहिल्यांदा "प्रयोग परिवार" मध्ये झालेली... बहुतेक २००३ मध्ये.. अतिशय साधा सरळ माणुस... आम्ही अगदी छोटी एकांकिका करत होतो त्या निमित्ताने भेट झालेली.. त्यानंतर सावरखेड एक गाव चा वेळेस जवळुन संबंध आले.. आजहि विश्वास बसत नाहिये .. राजिव दा आपल्यात नाहि... :( खूप वाईट वाटले :(

पैसा 01/10/2013 - 20:36
बर्‍याच कलाकारांबद्दल आजकाल असेच प्रकार ऐकू येतात. सतत धावत रहाण्यामागे अनेक कारणं असतील. कलावंताची कारकीर्द अगदी बेभरवशाची. प्रचंड ताणतणाव आणि सतत लोकांसमोर रअहाण्याचे कंपल्शन. कुठे थांबावं हे ज्याचं त्याने ठरवायचं. काही जणांना स्वतःच्या आरोग्याचीही फिकीर नसते. झाली ती घटना वाईटच त्यामुळे अनेकांचं अनेक प्रकारचं नुकसान झालं आहे. मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजलि.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

नवीन नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर

श्रीगुरुजी ·

पैसा 23/09/2013 - 16:49
नाटक बघण्यात येईल. चाळिशॆत काहॆसे स्थैर्य आलेले असते त्यामुळे असे काही करावेसे वाटत असेल. लग्नातली सुप्रसिद्ध 7 years itch साधारण याच वयात येण्याची शक्यता.

चाणक्य 23/09/2013 - 17:15
बेळेंच 'माकडा हाती शँपेन' खूपच आवडलं होतं. हे पण नक्की बघणार.

पैसा 23/09/2013 - 16:49
नाटक बघण्यात येईल. चाळिशॆत काहॆसे स्थैर्य आलेले असते त्यामुळे असे काही करावेसे वाटत असेल. लग्नातली सुप्रसिद्ध 7 years itch साधारण याच वयात येण्याची शक्यता.

चाणक्य 23/09/2013 - 17:15
बेळेंच 'माकडा हाती शँपेन' खूपच आवडलं होतं. हे पण नक्की बघणार.
एकदा वाजपेयी, मुशर्रफ, माधुरी दिक्षीत आणि मार्गारेट थॅचर रेल्वेच्या एकाच बोगीतून प्रवास करत असतात. सर्वजण प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यातले तिघेजण राजकारणी. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भपणे व राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेउन गप्पा मारत असतात. अचानक एक मोठा बोगदा येतो. रेल्वे बोगद्यात शिरल्यावर डब्यात अंधार येतो आणि अचानक डब्यातले दिवे जातात. आता पूर्ण अंधार झालेला असतो. अचानक कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. बोगदा संपतो आणि डब्यात उजेड येतो. सर्वांना मुशर्रफचा गाल लाल झालेला दिसतो.

'लोकायत' विचारचर्चा

प्रास ·

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

मदत हवी

उर्मिला०० ·

In reply to by आशु जोग

उर्मिला०० 12/08/2013 - 10:14
खरंच!नवीन लेखन कधीतरी वाचत होते,पण पासवर्ड समस्या होती.आता नो अडचण.धन्यवाद

बहुगुणी 11/08/2013 - 18:33
अ‍ॅडी जोशी यांची "चौकोनी त्रिकोण" ही ३-प्रवेशांची एकांकिका अफलातून आहे. रीतसर परवानगी वगैरे त्यांना विचारालच. [पूर्वी ही एकांकिका मिपावरच वाचली होती, पण आता ती शोधणं जरा अवघड गेलं, प्रवेश १, प्रवेश २ आणि प्रवेश ३.]

In reply to by उर्मिला००

बहुगुणी 11/08/2013 - 21:11
इथे मिसळपाव वर तुम्ही त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवू शकता [To मध्ये 'आदिजोशी' असं टाईप केलंत की त्यांचा पत्ता मिळेल.] त्यांना divinesatan@gmail.com इथे इमेलही पाठवा, दोन्हीपैकी कुठेतरी ते निरोप वाचतील. गविंचीही एकांकिका आहे असं खाली प्रास यांनी म्हंटलंय, तीही उत्तमच असणार, तेंव्हा तुम्हाला चांगला चॉईस आहे. प्रयोगासाठी शुभेच्छा! कुठे आणि कधी करताहात ते इथेच वाचकांना कळवा, प्रसिद्धी मिळेलच, पण आम्हालाही कलाकृती कशी जन्माला आली ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by आशु जोग

उर्मिला०० 12/08/2013 - 10:14
खरंच!नवीन लेखन कधीतरी वाचत होते,पण पासवर्ड समस्या होती.आता नो अडचण.धन्यवाद

बहुगुणी 11/08/2013 - 18:33
अ‍ॅडी जोशी यांची "चौकोनी त्रिकोण" ही ३-प्रवेशांची एकांकिका अफलातून आहे. रीतसर परवानगी वगैरे त्यांना विचारालच. [पूर्वी ही एकांकिका मिपावरच वाचली होती, पण आता ती शोधणं जरा अवघड गेलं, प्रवेश १, प्रवेश २ आणि प्रवेश ३.]

In reply to by उर्मिला००

बहुगुणी 11/08/2013 - 21:11
इथे मिसळपाव वर तुम्ही त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवू शकता [To मध्ये 'आदिजोशी' असं टाईप केलंत की त्यांचा पत्ता मिळेल.] त्यांना divinesatan@gmail.com इथे इमेलही पाठवा, दोन्हीपैकी कुठेतरी ते निरोप वाचतील. गविंचीही एकांकिका आहे असं खाली प्रास यांनी म्हंटलंय, तीही उत्तमच असणार, तेंव्हा तुम्हाला चांगला चॉईस आहे. प्रयोगासाठी शुभेच्छा! कुठे आणि कधी करताहात ते इथेच वाचकांना कळवा, प्रसिद्धी मिळेलच, पण आम्हालाही कलाकृती कशी जन्माला आली ते जाणून घ्यायला आवडेल.
नमस्कार मिपाकर! खूप दिवसांनी लिहीत आहे. मला कोणी मदत करू शकेल का? राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवीन, छान अशी नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे. कुणी लेखक असाल किंवा कुणाला चांगले पण फारसे प्रयोग न झालेले नाटक माहित असेल तर कृपया मदत करा. धन्यवाद!

झिम्मा – नाट्यचरित्र

प्रसाद प्रसाद ·

रेवती 22/07/2013 - 18:37
मलाही हे पुस्तक आवडले. फक्त काही गोष्टी (मला) माहित नव्हत्या त्याबद्दल खोलात जाऊन केलेली चर्चा कंटाळवाणी वाटली. ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांना नाही वाटणार.

विजयाबाईंचा सशक्त अभिनय 'अखेरचा सवाल' नाटकात पाहिला आणि मी त्यांचा पंखा झालो. दुर्दैवाने 'हमिदाबाईची कोठी' पाहायला मिळाली नाही. पुढे आखातात आल्यावर मराठी नाटकाचा संबंध तुटला तो आजतागायत. मध्यंतरी त्यांच्या नाट्यशिबिराची जाहिरात पाहून तिकिट घेतले आणि गेलो होतो. मी वगळता बाकी सर्व जण मराठी आणि हिन्दी नाट्यसृष्टीतील आणि सिरियल्स मधील कलाकार होते. शिबिरात कांहीही विशेष नव्हते. 'बेसिक्स' वर उथळ चर्चा होती. आणि पुढे अशीच अभिनय शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन होते. पुढे ते कधी पूर्ण झाल्याचे ऐकिवात नाही. सर्व कलाकारांच्या मनांत मात्र विजयाबाईंसाठी भरभरून आदर दिसून आला. तो योग्यच होता.

आदूबाळ 24/07/2013 - 15:26
झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
हा "आकृतीबंध" पाहून माझं डोकं उठलं आणि वाचणं बंद केलं. मला नानू सरंजाम्याच्या आत्मचरित्राची आठवण झाली. असाच एक प्रयोग श्री. ना. पेंडश्यांच्या आत्मचरित्रात आहे. पेंडशांच्या जिवलग मित्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून सगळं आत्म(?)चरित्र लिहिलं आहे. . "सोनाली शेरतुकडे*" कोण याचा आता उलगडा झाला! *बाई आडनावात गेली :)

रेवती 22/07/2013 - 18:37
मलाही हे पुस्तक आवडले. फक्त काही गोष्टी (मला) माहित नव्हत्या त्याबद्दल खोलात जाऊन केलेली चर्चा कंटाळवाणी वाटली. ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांना नाही वाटणार.

विजयाबाईंचा सशक्त अभिनय 'अखेरचा सवाल' नाटकात पाहिला आणि मी त्यांचा पंखा झालो. दुर्दैवाने 'हमिदाबाईची कोठी' पाहायला मिळाली नाही. पुढे आखातात आल्यावर मराठी नाटकाचा संबंध तुटला तो आजतागायत. मध्यंतरी त्यांच्या नाट्यशिबिराची जाहिरात पाहून तिकिट घेतले आणि गेलो होतो. मी वगळता बाकी सर्व जण मराठी आणि हिन्दी नाट्यसृष्टीतील आणि सिरियल्स मधील कलाकार होते. शिबिरात कांहीही विशेष नव्हते. 'बेसिक्स' वर उथळ चर्चा होती. आणि पुढे अशीच अभिनय शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन होते. पुढे ते कधी पूर्ण झाल्याचे ऐकिवात नाही. सर्व कलाकारांच्या मनांत मात्र विजयाबाईंसाठी भरभरून आदर दिसून आला. तो योग्यच होता.

आदूबाळ 24/07/2013 - 15:26
झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
हा "आकृतीबंध" पाहून माझं डोकं उठलं आणि वाचणं बंद केलं. मला नानू सरंजाम्याच्या आत्मचरित्राची आठवण झाली. असाच एक प्रयोग श्री. ना. पेंडश्यांच्या आत्मचरित्रात आहे. पेंडशांच्या जिवलग मित्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून सगळं आत्म(?)चरित्र लिहिलं आहे. . "सोनाली शेरतुकडे*" कोण याचा आता उलगडा झाला! *बाई आडनावात गेली :)
नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले. झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.