मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस 26/06/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार 26/06/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"

प्रचेतस 26/06/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार 26/06/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही.

म्हातारा न इतूका....

कर्नलतपस्वी ·

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.
लेखनविषय:
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

उल्लेखित रंगमंदिर बनवण्यात माझे वर्गमित्र, लंगोटीयार म्हंजे खरोखरच लगोंटीतला मित्राची आठवण झाली. चित्तरंजन चांदेकर, वास्तुशास्त्रज्ञ. याचा सहभाग होता.समर्थ नगर मधे व्यवसाय होता. बाकी अशाच प्रकारच्या कथानकावर मकरंद अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे. नाटक सुदंर आहे यात शंकाच नाही. बादवे प्रसाद कांबळी मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र,भद्रकाली मुळे मच्छिंद्र कांबळी यांच्याशी काही काळ संपर्क आला होता.थेट कोकणी अगदी फणसा सारखाच कलाकार माणूस. लेख आवडला. नाटक बघीतले आहे.

प्रचेतस 19/06/2025 - 20:04
तुमचं हे लेखन वाचताना असं वाटलं की, आपण एखाद्या प्रयोगाला प्रत्यक्ष बसलोय, आणि समोर आवली आणि रखुमाई यांचा हृदयात झिरपणारा संवाद, गान आणि अभंगाचे सुर ऐकत आहोत. सांगीतिक नाटकाचे रसग्रहण एवढ्या नेणिवेने, सहानुभूतीने आणि सौंदर्यदृष्टीने करणं ही सहजसाध्य गोष्ट नाही. नाटकाचा केवळ सारांश न देता, तुम्ही त्यामागचा भाव, अध्यात्म, स्त्रीचे समाजातील स्थान, भक्ती आणि भक्ताच्या घरातील स्त्रीचे वास्तव यांचा उहापोह करत नाटकाच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक समर्पकतेला तुम्ही उजाळा दिला आहे.

आपण लिहिलेले एखादे पुस्तक परीक्षणही वाचायला आवडेल. कृपया मनावर घ्यावे. मिपावरील काही जडजंबाल व टायपोग्रस्त परीक्षणे व त्यावर दिलेले "चांगलं लिहलंय" असे प्रोत्साहनपर प्रतिसाद वाचून परीक्षणांच्या वाटेला जायचे बंद केले होते.

मारवा 20/06/2025 - 14:11
तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत आपल्या नवऱ्यावर संशय असणे ही भावना स्त्रीसुलभ आहे ? नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ? तुम्ही लेखात स्त्रीवादाची जाणीव वगैरे म्हटले म्हणून विचारतोय आजकाल polyamory किंवा Ethically non-monogamous (ENM) पर्यंत स्त्री पुरुष संबंधांनीं प्रवास केलेला आहे. आणि आज तुम्हाला प्रा डॉ दिलीप बिरुटे. ना स्त्रियांनी नवऱ्याचा संशय वगैरे घेणे स्त्रीसुलभ वाटते का ?

In reply to by मारवा

Bhakti 20/06/2025 - 15:25
एकदम बरोबर !
नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ?
पण एक निरीक्षण ज्या स्त्रीला आपल्या पार्टनरकडून प्रेम मिळत नाही तीच संशय घेते. उलटपक्षी प्रत्येक प्रामाणिक असो वा नसो पुरूष 'आपल्या स्त्री ' बाबत जरा संशयी(possesive)दिसतो...संशय हे पुरूषी अहंकाराची बाजू असते अनेकदा.

In reply to by Bhakti

मारवा 20/06/2025 - 16:17
स्त्रीसुलभ म्हणजे स्त्री च्या बाबतीत "अहो हे तर अगदी स्त्रियांच्या बाबतीत साहजिकच असतं ना " अशा अर्थाने taken for granted आहे. स्त्री सुलभ ची उदाहरणे स्त्री चे लाजणे ( सर्वात वरचा क्रमांक ) स्री ने वारंवार भावूक होऊन अश्रू गाळणे स्त्री ने सदा सर्वदा सौंदर्यकेंद्रित सौंदर्यचिंतीत असणे (कारण तीच एकमात्र ॲसेट हा एक norm) वगैरे वगैरे गंमत म्हणजे उच्चशिक्षित मंडळी सुद्धा......ते खर म्हणजे आपल्या सर्वांच्या मानसिकतेत इतक्या खोलवर रुजलेलं आहे की .... असो

In reply to by मारवा

चित्रगुप्त 08/07/2025 - 01:55
आणखी एक 'स्त्रीसुलभ' गोष्ट म्हणजे, नवरा घराबाहेरच्या जगात कितीही, विद्वान, हुषार, पराक्रमी वगैरे वगैरे मानला जात असला तरी तो अगदीच 'हे' आहे ('हे' म्हणजे काय, ते वाचकांवर सोपवतो) असे (त्याला-) वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करणे.

In reply to by मारवा

'संशय' या शब्दाला आपण स्त्री 'सुलभ' भावना समजले आहात असे वाटते. नाटकातील ज्या विविध भावभावनांच्या छटा आहेत त्यासाठी ते लिहिले आहे. समस्त स्त्रियाच संशयीच असतात असे त्यातून अधोरेखीत झाले असेल तर तो माझा लेखन दोष समजावा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरूते

मिपाकर आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. आपल्या लेखन प्रोत्साहानामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरूटे

अभ्या.. 30/06/2025 - 13:22
वा मास्तर व्व्वा. चांगल्या विषयावर चांगलं लिहिलाय की तुम्ही. आवडले. अ‍ॅक्चुअली माझ्या आयुष्यात स्टेजवरची नाटके बघायचा योग दुर्मिळच. आईबाबासोबत बार्शीला सिल्व्हर जुबली ला एकदा 'तो मी नव्हेच'. आणि बायकोसोबत एकदा बालगंधर्व ला 'वाडा चिरेबंदी' इतकीच संपत्ती. पण कोण जाणे दोन म्हिन्यापूर्वी चिंचवडात रामकृष्ण मोरे ला दुपारचा प्रयोग होता. लेकराला सांभाळणार्‍या ताईकडे लेकराला तीन तास सोपवुन बायकोला हपिसातून उचलले आणि देवबाभळीचा प्रयोग पाहिलाच. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. कशाबद्दल बोलावे आणि लिहावे. सगळेच अगदी नजर लागण्याजोगे. . पुन्हा जमेल तसे, जमेल तेंव्हा देवबाभळी बघायचेच हा संकल्प करुन आलोय. बघू आता योग येतोय का.

शशिकांत ओक 07/07/2025 - 19:26
डॉ दिलीप बिरुटे सरांना धन्यवाद. भरतवाक्य: युगांतरानेही मानवी मनाचे नाट्य असेच! इतक्या वर्षांनी या संगीत नाटकाची आठवण करून दिल्याबद्दल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, ते गायब आहेत खरे, पण दोघींच्या व्यथा मात्र सारख्याच - "नवरे आमच्या मुठीत नाहीत!" असो. कितीही युगे लोटली, मानवी मन कितीही हळवे झाले तरी, हे जीवननाट्य असेच चालत राहणार...

उल्लेखित रंगमंदिर बनवण्यात माझे वर्गमित्र, लंगोटीयार म्हंजे खरोखरच लगोंटीतला मित्राची आठवण झाली. चित्तरंजन चांदेकर, वास्तुशास्त्रज्ञ. याचा सहभाग होता.समर्थ नगर मधे व्यवसाय होता. बाकी अशाच प्रकारच्या कथानकावर मकरंद अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे. नाटक सुदंर आहे यात शंकाच नाही. बादवे प्रसाद कांबळी मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र,भद्रकाली मुळे मच्छिंद्र कांबळी यांच्याशी काही काळ संपर्क आला होता.थेट कोकणी अगदी फणसा सारखाच कलाकार माणूस. लेख आवडला. नाटक बघीतले आहे.

प्रचेतस 19/06/2025 - 20:04
तुमचं हे लेखन वाचताना असं वाटलं की, आपण एखाद्या प्रयोगाला प्रत्यक्ष बसलोय, आणि समोर आवली आणि रखुमाई यांचा हृदयात झिरपणारा संवाद, गान आणि अभंगाचे सुर ऐकत आहोत. सांगीतिक नाटकाचे रसग्रहण एवढ्या नेणिवेने, सहानुभूतीने आणि सौंदर्यदृष्टीने करणं ही सहजसाध्य गोष्ट नाही. नाटकाचा केवळ सारांश न देता, तुम्ही त्यामागचा भाव, अध्यात्म, स्त्रीचे समाजातील स्थान, भक्ती आणि भक्ताच्या घरातील स्त्रीचे वास्तव यांचा उहापोह करत नाटकाच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक समर्पकतेला तुम्ही उजाळा दिला आहे.

आपण लिहिलेले एखादे पुस्तक परीक्षणही वाचायला आवडेल. कृपया मनावर घ्यावे. मिपावरील काही जडजंबाल व टायपोग्रस्त परीक्षणे व त्यावर दिलेले "चांगलं लिहलंय" असे प्रोत्साहनपर प्रतिसाद वाचून परीक्षणांच्या वाटेला जायचे बंद केले होते.

मारवा 20/06/2025 - 14:11
तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत आपल्या नवऱ्यावर संशय असणे ही भावना स्त्रीसुलभ आहे ? नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ? तुम्ही लेखात स्त्रीवादाची जाणीव वगैरे म्हटले म्हणून विचारतोय आजकाल polyamory किंवा Ethically non-monogamous (ENM) पर्यंत स्त्री पुरुष संबंधांनीं प्रवास केलेला आहे. आणि आज तुम्हाला प्रा डॉ दिलीप बिरुटे. ना स्त्रियांनी नवऱ्याचा संशय वगैरे घेणे स्त्रीसुलभ वाटते का ?

In reply to by मारवा

Bhakti 20/06/2025 - 15:25
एकदम बरोबर !
नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ?
पण एक निरीक्षण ज्या स्त्रीला आपल्या पार्टनरकडून प्रेम मिळत नाही तीच संशय घेते. उलटपक्षी प्रत्येक प्रामाणिक असो वा नसो पुरूष 'आपल्या स्त्री ' बाबत जरा संशयी(possesive)दिसतो...संशय हे पुरूषी अहंकाराची बाजू असते अनेकदा.

In reply to by Bhakti

मारवा 20/06/2025 - 16:17
स्त्रीसुलभ म्हणजे स्त्री च्या बाबतीत "अहो हे तर अगदी स्त्रियांच्या बाबतीत साहजिकच असतं ना " अशा अर्थाने taken for granted आहे. स्त्री सुलभ ची उदाहरणे स्त्री चे लाजणे ( सर्वात वरचा क्रमांक ) स्री ने वारंवार भावूक होऊन अश्रू गाळणे स्त्री ने सदा सर्वदा सौंदर्यकेंद्रित सौंदर्यचिंतीत असणे (कारण तीच एकमात्र ॲसेट हा एक norm) वगैरे वगैरे गंमत म्हणजे उच्चशिक्षित मंडळी सुद्धा......ते खर म्हणजे आपल्या सर्वांच्या मानसिकतेत इतक्या खोलवर रुजलेलं आहे की .... असो

In reply to by मारवा

चित्रगुप्त 08/07/2025 - 01:55
आणखी एक 'स्त्रीसुलभ' गोष्ट म्हणजे, नवरा घराबाहेरच्या जगात कितीही, विद्वान, हुषार, पराक्रमी वगैरे वगैरे मानला जात असला तरी तो अगदीच 'हे' आहे ('हे' म्हणजे काय, ते वाचकांवर सोपवतो) असे (त्याला-) वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करणे.

In reply to by मारवा

'संशय' या शब्दाला आपण स्त्री 'सुलभ' भावना समजले आहात असे वाटते. नाटकातील ज्या विविध भावभावनांच्या छटा आहेत त्यासाठी ते लिहिले आहे. समस्त स्त्रियाच संशयीच असतात असे त्यातून अधोरेखीत झाले असेल तर तो माझा लेखन दोष समजावा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरूते

मिपाकर आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. आपल्या लेखन प्रोत्साहानामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरूटे

अभ्या.. 30/06/2025 - 13:22
वा मास्तर व्व्वा. चांगल्या विषयावर चांगलं लिहिलाय की तुम्ही. आवडले. अ‍ॅक्चुअली माझ्या आयुष्यात स्टेजवरची नाटके बघायचा योग दुर्मिळच. आईबाबासोबत बार्शीला सिल्व्हर जुबली ला एकदा 'तो मी नव्हेच'. आणि बायकोसोबत एकदा बालगंधर्व ला 'वाडा चिरेबंदी' इतकीच संपत्ती. पण कोण जाणे दोन म्हिन्यापूर्वी चिंचवडात रामकृष्ण मोरे ला दुपारचा प्रयोग होता. लेकराला सांभाळणार्‍या ताईकडे लेकराला तीन तास सोपवुन बायकोला हपिसातून उचलले आणि देवबाभळीचा प्रयोग पाहिलाच. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. कशाबद्दल बोलावे आणि लिहावे. सगळेच अगदी नजर लागण्याजोगे. . पुन्हा जमेल तसे, जमेल तेंव्हा देवबाभळी बघायचेच हा संकल्प करुन आलोय. बघू आता योग येतोय का.

शशिकांत ओक 07/07/2025 - 19:26
डॉ दिलीप बिरुटे सरांना धन्यवाद. भरतवाक्य: युगांतरानेही मानवी मनाचे नाट्य असेच! इतक्या वर्षांनी या संगीत नाटकाची आठवण करून दिल्याबद्दल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, ते गायब आहेत खरे, पण दोघींच्या व्यथा मात्र सारख्याच - "नवरे आमच्या मुठीत नाहीत!" असो. कितीही युगे लोटली, मानवी मन कितीही हळवे झाले तरी, हे जीवननाट्य असेच चालत राहणार...
लेखनविषय:
लेखनप्रकार

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

महिरावण ·

युयुत्सु 19/06/2025 - 12:55
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु

In reply to by युयुत्सु

महिरावण 19/06/2025 - 13:58
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।

In reply to by महिरावण

युयुत्सु 19/06/2025 - 14:32
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश 19/06/2025 - 15:49
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः

In reply to by अथांग आकाश

Bhakti 19/06/2025 - 16:11
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु 19/06/2025 - 16:22
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

युयुत्सु 19/06/2025 - 17:20
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

महिरावण 20/06/2025 - 11:57
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.

सुबोध खरे 20/06/2025 - 11:51
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.

सुबोध खरे 20/06/2025 - 18:44
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.

भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥

युयुत्सु 19/06/2025 - 12:55
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु

In reply to by युयुत्सु

महिरावण 19/06/2025 - 13:58
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।

In reply to by महिरावण

युयुत्सु 19/06/2025 - 14:32
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश 19/06/2025 - 15:49
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः

In reply to by अथांग आकाश

Bhakti 19/06/2025 - 16:11
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु 19/06/2025 - 16:22
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

युयुत्सु 19/06/2025 - 17:20
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

महिरावण 20/06/2025 - 11:57
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.

सुबोध खरे 20/06/2025 - 11:51
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.

सुबोध खरे 20/06/2025 - 18:44
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.

भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं).

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!

मारवा ·

गवि 04/06/2025 - 08:02
" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "
दवणे की गटणे ?? ;)
प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

In reply to by गवि

मारवा 04/06/2025 - 17:21
पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते. वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते. गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

अभिरुप 04/06/2025 - 18:54
प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त 09/06/2025 - 07:41
लई मंजे लईच भारी हो. 'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे. आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल. (इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून) आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!! बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!! ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र". शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले. आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची. लेख आवडला. धन्यवाद. आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.

गवि 04/06/2025 - 08:02
" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "
दवणे की गटणे ?? ;)
प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

In reply to by गवि

मारवा 04/06/2025 - 17:21
पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते. वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते. गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

अभिरुप 04/06/2025 - 18:54
प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त 09/06/2025 - 07:41
लई मंजे लईच भारी हो. 'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे. आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल. (इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून) आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!! बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!! ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र". शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले. आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची. लेख आवडला. धन्यवाद. आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.
लेखनप्रकार
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय. दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे " प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं " गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती ....... हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार .

वारी !!!

किल्लेदार ·

हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ 27/05/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti 28/05/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार 28/05/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ 28/05/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार 28/05/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त 30/05/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज 30/05/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.

हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ 27/05/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti 28/05/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार 28/05/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ 28/05/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार 28/05/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त 30/05/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज 30/05/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"

प्रचेतस ·

कपिलमुनी 21/05/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे

कपिलमुनी 21/05/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला. स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली.

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

मार्गी ·

मार्गी 06/05/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी 09/05/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी 17/05/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 24/05/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 01/06/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी 09/06/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 19/06/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!

मार्गी 06/05/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी 09/05/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी 17/05/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 24/05/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 01/06/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी 09/06/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 19/06/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग. प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही? हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या.