मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस 03/06/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे 04/06/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड 08/06/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो 09/06/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस 11/06/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.

*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस 03/06/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे 04/06/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड 08/06/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो 09/06/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस 11/06/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही

😄

डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड 03/06/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.

गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड 03/06/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.
Deccan Queen

गंगा दशहरा

नूतन ·

विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक १९६० मधे लिहीले होते. भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यगीते सुदंर आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पंडितराज ओळखले जातात.

नूतन 28/05/2025 - 11:28
जय गंगे भागीरथी..फार सुंदर पद प्रतिसादाबद्दल आभार

विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक १९६० मधे लिहीले होते. भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यगीते सुदंर आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पंडितराज ओळखले जातात.

नूतन 28/05/2025 - 11:28
जय गंगे भागीरथी..फार सुंदर पद प्रतिसादाबद्दल आभार
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले. पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्‌मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा असा गजर सुरु होई. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.

खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

मार्गी ·

युयुत्सु 21/05/2025 - 18:19
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही.  Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385

सौंदाळा 21/05/2025 - 18:51
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

कंजूस 21/05/2025 - 21:17
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?

कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.

मार्गी 22/05/2025 - 16:39
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!

युयुत्सु 22/05/2025 - 17:44
बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.

युयुत्सु 21/05/2025 - 18:19
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही.  Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385

सौंदाळा 21/05/2025 - 18:51
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

कंजूस 21/05/2025 - 21:17
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?

कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.

मार्गी 22/05/2025 - 16:39
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!

युयुत्सु 22/05/2025 - 17:44
बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं.

भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल

कपिलमुनी ·

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी ·

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

मार्गी ·

मार्गी 06/05/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी 09/05/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी 17/05/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 24/05/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 01/06/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी 09/06/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 19/06/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!

मार्गी 06/05/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी 09/05/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी 17/05/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 24/05/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 01/06/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी 09/06/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी 19/06/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!
नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग. प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही? हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या.

फाईल बंद

रम्या ·

वामन देशमुख 02/05/2025 - 10:53
हॅहॅहॅ ! खुसखुशीत कथन! द मा मिरासदारांची आठवण आली. तारक मेहता का उल्टा चष्मा ची ही आठवण आली. अजून येऊ द्या.

सौंदाळा 06/05/2025 - 14:26
मस्तच मज्जा आली वाचताना. मुलीला आजच ही गोष्ट सांगतो

स्वधर्म 08/05/2025 - 16:02
>> काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! हे भारीच! >> "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" जत तालुका सोलापूर नसून सांगली जिल्ह्यात आहे.

वामन देशमुख 02/05/2025 - 10:53
हॅहॅहॅ ! खुसखुशीत कथन! द मा मिरासदारांची आठवण आली. तारक मेहता का उल्टा चष्मा ची ही आठवण आली. अजून येऊ द्या.

सौंदाळा 06/05/2025 - 14:26
मस्तच मज्जा आली वाचताना. मुलीला आजच ही गोष्ट सांगतो

स्वधर्म 08/05/2025 - 16:02
>> काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! हे भारीच! >> "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" जत तालुका सोलापूर नसून सांगली जिल्ह्यात आहे.
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते. फौजदार फार तयारीने आले होते.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.