मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नोकरी

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित ·

विकास 08/04/2014 - 02:59
ज्या आप्तेष्टांना आणि पारंपारीक सत्ताधिशांना पाठींबा देणार्‍या वाचक/सदस्यांचे सध्याच्या काळातल्या लोकसत्तेमधील संपादकीय वाचून डोके भणभणते त्यांना एक सुसह्य फरक जाणवेल असा या विषयावरील आजचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे असे वाटते. जोशीबुवांचे चऱ्हाट अर्थात त्याचा अर्थ इतर पक्षिय शहाणे ठरतात असा नाही. त्या संदर्भात नुसत्या अग्रलेखाच्याच नाही तर वर्तणुकींच्या पण लिंक्स देता येतील. काळजी नसावी. ;)

In reply to by विकास

आयुर्हित 08/04/2014 - 16:16
दिलेल्या लिंक वरचा सुविचार: बुध्दीमान व्यक्ती शत्रुंचा देखिल उपयोग करून घेतात, पण मूर्ख व्यक्तींना मित्रांचा देखिल उपयोग करून घेता येत नाही. वाचला आणि संपादकीय लेख वाचल्याबरोबर त्याची १००% प्रचीती आली! असो. गिरीश कुबेर किंवा कुमार केतकर कोण आहे ह्या लेखाचा लेखक? कळले असते तर अजून बरे झाले असते. जो कोणी का असेना संपादक, अगदी सुमार बुद्धी असलेलाच आहे, हे लेख वाचल्यावर स्पष्ट होते. किती अज्ञानात जगतात लोकं ? आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्यांनाही ते मानायला तयार नसतात. या संपादकांना मी "आळसाधीपती अज्ञानपरायण" पदवी द्यावीशी वाटते. कारण लेखात आळसाधीपती अज्ञानपरायण संपादक म्हणतात:
अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभते
सोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत. फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे. आभार:Reocity

कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.
हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 08/04/2014 - 14:28
Forget jobless growth, India's job base is actually shrinking dramatically. Even as growth sags alarmingly and the third quarter for Financial Year 2012-13 saw GDP coming in at 4.5 per cent, news comes in that India has lost 5 million jobs in a five-year period ending 2010, according to the Planning Commission. Amid economic slowdown, India lost 5 million jobs during 2005-2010

In reply to by आयुर्हित

अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ ते २०१० मध्ये नोकऱ्या वाढल्या असं रिपोर्ट सांगतो. कमी झाले ते मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स. त्यातही २००० ते २००५ मध्ये तेच मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स दहा मिलियननी वाढले होते... शिवाय, तुम्ही त्या पाच वर्षांचं नाही, तर गेल्या दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्याचं लिहिलं आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचं जीडीपी दुप्पट झालं (इन्फ्लेशन वगळून). आणि जॉब्स तितकेच राहिले, म्हणजे दरडोई प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली असं तुम्ही म्हणताय? दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्या हे तुमच्या लेखातलं विधान आहे. ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली ते सांगा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 10/04/2014 - 13:36
फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास ज्यावेळी देशात NDA चे सरकार होते वार्षिक निर्यातवाढ ४०% होती.(१९९९-२००४) पण ज्यावेळी UPA चे सरकार आले, पहिल्या ५ वर्षात वार्षिक निर्यातवाढ 3०%वर आली आणि UPA२ च्या काळात पुढच्या ५ वर्षात ती फक्त ९% आहे.(२००४-२०१४). असे जर असेल तर नोकऱ्या वाढणार का कमी होणार? Nandan Nilekani's Aadhaar project a political gimmick with no vision

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 19/04/2014 - 12:24
सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार: वाहन उद्योगासाठी गेले आर्थिक वर्ष सर्वाधिक कठीण काळ होता. या काळात वाहन उद्योगातील उत्पादनाच्या प्रक्रियेतील कच्चा माल पुरवणाऱ्यांपासून ते वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांपर्यंतच्या मालिकेत सुमारे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. - विक्रम किर्लोस्कर, अध्यक्ष, सियाम साभार:घटती वाहनविक्री रोजगाराच्या मुळावर - - सकाळ न्यूज नेटवर्क शुक्रवार, 18 एप्रिल 2014 - 01:00 AM IST

विवेकपटाईत 08/04/2014 - 08:56
५० लाख लोक या घटकेला रस्त्यावर बेरोजगार झालेले आहे. चालू कामे बंद झालेली आहे नवीन स्वीकृत प्रोजेक्ट्स वर काम सुरु झालेली नाही. हीच दशा रेल्वेची आहे. infrastructure बंद करण्या मागचा हेतू काय? वोट देण्याआधी अवश्य वाचा: माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,

श्रीगुरुजी 08/04/2014 - 11:53
जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. मी कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा कधीच गांभिर्याने घेत नाही. कोणताही पक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा गांभिर्याने घेत आहे असे वाटत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

संपत 09/04/2014 - 12:28
हा जाहीरनामाच. शिवसेनेचा वचननामा, मनसेचा वचकनामा आणि सर्वेपि सुखिन: संतु म्हणजे common minimum programme :)

ऋषिकेश 08/04/2014 - 13:51
१.
देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास
छ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत. २.
विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच ३.
त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे
भाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे. बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.

नितिन पाठे 08/04/2014 - 14:30
आज एक लेख वाचला, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात....प्रचंड आवडला..... तो पूर्ण लेख इथे पेस्ट करतोय... *सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका * हिंदुस्थानात मुसलमान स्वत:च्या ताकदीवर ना राष्ट्रीय पक्ष उभारू शकतात ना लोकसभेत ते स्वत:ची बाजू प्रभावीपणे मांडू शकतात. असे का व्हावे याचा विचार निवडणुकीच्या विचारापेक्षा अधिक सखोलतेने करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षातील मुसलमान असो, तो स्वत:ला केवळ मुसलमान म्हणूनच अभिव्यक्त करतो, हिंदुस्थानी म्हणून नव्हे. ते स्वत:ला जोपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेणार नाहीत तोपर्यंत कोण त्यांना खरा देशवासी म्हणेल? प्रचंड जोर लावल्यानंतरही यंदा कॉंग्रेस आपले सरकार बनवू शकणार नाही हे निश्‍चित आहे. अर्थात तरीही कॉंग्रेसला मुस्लिमांची मते आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही कॉंग्रेसची गरज आहेच. ज्या राज्यात दंगे होतात त्या राज्य सरकारला मुस्लिम अतिशय आक्रस्ताळेपणाने बदनाम करतात. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोक समाजवादी पक्षाचा उदोउदो करीत. परंतु मुजफ्फरनगरच्या दंग्याने त्यांचे डोळे उघडले. आता उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा कल कोणत्या पक्षाकडे वळेल? असा विचार केला जात आहे. तात्पुरत्या निवडणुकीपुरता होणारा हा विचार राष्ट्रीयदृष्ट्या मात्र अतिशय उथळ आहे. इतिहास सांगतो की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या बहुतांश मागण्या कॉंग्रेसने जाणीवपूर्वक मान्य केल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अहमदियांबरोबरच स्वत: मुसलमानांची तरी काय स्थिती आहे? त्यांच्याच इस्लामी राष्ट्रांमध्ये त्यांची ओळख तालिबानी आणि दहशतवादी अशीच आहे. हिंदुस्थानात फाळणीच्या काळाप्रमाणे आज मुस्लिम आर्थिक आणि राजकीय पातळीवर अस्थिर नाहीत. त्यामुळे खरे तर आता त्यांनीच बदलायला हवे. मुसलमानांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील विरोधी पक्ष हे त्यांचे दुश्मनच असतील आणि कॉंग्रेसही त्यांच्यावर अन्यायच करीत असेल तर हिंदुस्थानी राजकीय व्यवस्थेत त्यांच्या समस्यांचे समाधान कसे होणार? काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने म्हटले होते की, कॉंग्रेसने मुसलमानांना वेठबिगार बनवले. असे असेल तर मग ते वारंवार कॉंग्रेसकडे आपले रक्षण करा, अशी मागणी का करतात? येथील सामान्य मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून केवळ आपले खिसे भरले आहेत. त्यांच्या याच प्रवृत्तीचा कॉंग्रेस ६२ वर्षांपासून फायदा घेत आहे. मुसलमानांची अवस्था त्या बकर्‍यासारखी होते ज्याचा बाजारात जाहीर लिलाव होतो. मुसलमानांच्या अदूरदर्शीपणामुळेच त्यांचा स्वाभिमान विकला जातो आणि ते निव्वळ कॉंग्रेसभोवतीच पिंगा घालत बसतात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील दलित आणि मुस्लिमांची परिस्थिती एकसमान होती. आज दलित बांधव वेगाने प्रगती करीत आहेत. त्यांनी स्वत:चे अस्तित्व सिध्द केले. पण मुसलमान मात्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दरवाजात भिकेचा कटोरा घेऊन उभाच आहे. खरे तर दलितांनी आरक्षणाचा फायदा मिळवून स्वत:ची प्रगती साधली त्याचप्रमाणे मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून कमी का फायदा घेतला आहे? पण ते केवळ धर्मातच गुरफटून राहिले. जरी ते गरीब असले तरी हज यात्रेला जाणार्‍या जगभरच्या मुस्लिमांत सर्वाधिक हिंदुस्थानी मुसलमानच का असतात. कारण हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यंदा तब्बल चार लाख मुसलमान मक्केला जाणार आहेत. हजसाठी तब्बल पाच लाखांचे तिकीट ते कसे घेऊ शकतात? हज कमिटीने प्रत्येक प्रांतात सरकारकडून हज हाऊस बनवून घेतले. हिंदुस्थानातील अन्य धर्मीय एवढा पैसा खर्च करू शकतात का? अल्पसंख्याक म्हणून देशातील प्रत्येक राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचीच शाखा त्यांना का हवी, देशात असंख्य विद्यापीठे असताना अलिगढ किंवा दिल्लीच्या जामीया मिल्लीयाच्याच शाखेचा आग्रह हे कशाचे द्योतक आहे? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शरीयतविषयक एखादा कायद्याचा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिमांची मागणी असते की, त्यांच्यासाठी पर्सनल लॉनुसार चालणारी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारून देण्यात यावी. स्वत:ला धर्माच्या नावावर ते विनाकारणच श्रेष्ठ समजत असतील तर देशातील बहुसंख्य समाजाने हे का खपवून घ्यावे? लोकशाहीच्या नावाखाली एका सरकारांतर्गत दुसरे सरकार आणि एका कायद्याऐवजी दुसराच कायदा कसा चालेल? एक स्वतंत्र देश मागितल्यासारख्याच या मागण्या नाहीत का? निवडणुकांच्या काळात मुसलमानांनी एक हिंदुस्थानी नागरिक या नात्याने मागण्या करायला हव्यात. अन्यथा देशाच्या अखंडतेसाठी हाच सर्वात मोठा धोका ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणत्या मुस्लिम राष्ट्रात शिया आणि सुन्नी मुसलमांनांसाठी वेगवेगळी कायदेव्यवस्था आहे? किंवा वर्ग किंवा पंथाच्या आधारावर त्यांची वेगवेगळी विद्यापीठे आहेत? मुस्लिम राष्ट्रांमध्येच जर अल्पसंख्य, बहुसंख्य असे लाड नसतील तर हिंदुस्थानात ते का असावेत? राज्यघटनेने मागासांसाठी दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एकतर त्यांनी अल्पसंख्य म्हणून सरकारी सोयी-सवलती घ्याव्यात किंवा मग आरक्षण मिळवून विकास साधावा, परंतु मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा आणि आरक्षण असे दोन्ही हवे. राज्य घटनेनुसार अशी दुहेरी सवलत मिळू शकत नाही. आरक्षित जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळाला काय? मुस्लिमांचे अवाजवी लाड केल्यामुळेच आज आझम खान किंवा ओवेसीसारख्या नेत्यांचे फावले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे बंद करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीत त्यांची भागीदारी व्हावी इतपत त्यांना सक्षम ठीक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांबरोबरच मुस्लिमांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

10 करोड नोकर्‍यांचे खोटे आमिष दाखवणारा पप्पू चा बोगस जाहीरनामा आणि जनतेला उल्लू बनवणार्‍या खोट्या टीव्ही जाहिराती करणार्‍या कोंग्रेस चा भुक्कड प्रचार पाहून आठवले.... 2010 मध्ये युपीए सरकारचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिदम्बरम ची मुलाखत सुरू होती, निवेदकाने प्रश्न विचारला की "आपने 2009 के चुनाव मे सबको सस्ते घर देने का और पेट्रोल की कीमत स्थिर रखने का वादा किया था . लेकीन वैसा हुआ नही. क्यो?" यावर चिदम्बरम काय म्हणाला माहीत आहे? " चुनावी वादे तो चुनावी वादे होते है . जनता तो भूल भी गयी, आप क्यो याद रखते है?" जनतेला उल्लू बनवणार्‍यानो अब् जनता माफ नही करेगी अबकी बार -मोदी सरकार

आबा 08/04/2014 - 23:46
निराशाजनक आहे, अर्थात दुसरी अपेक्षाच नव्हती म्हणा !

मदनबाण 09/04/2014 - 11:13
कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार केवळ अशक्य !हिंदुंच्या रामाची टिंगल उडवायचे हे दिवस तिथे मंदिराचे काय घेउन बसलात ? बरं अशी टिंगल करण्यात दीड-शहाणे हिंदुच पुढे.ज्यांना स्वतःच्या दैवतांची फिकीर नाही त्यांचे भविष्य काय ते असणार ? तेव्हा हा मुद्दा गुंडाळला गेलाच समजा. राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. हे कशाला ? दाढ्या कुरवाळण्याची खाज आता भाजपाला सुद्धा आली काय ? तो झाकिरडा तोंडाला येइल ते बरळतं असतो,असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी जे विष ओकत आहेत्,हिंदुंच्या रामाची जाहिर टिंगल करत आहेत तेव्हा यांच्या सारख्या अनेक सापड्यांना तुम्हाला पोसायचे आणि मोठे करायचे आहे का ? पण काय करणार आमचे हिंदुच जर त्यांच्या रामाची टंगल करतात, तिथे असले नाग फुक्त्कार टाकतात त्यात नवल ते काय ? उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ? असो... भाजपा एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन मला गेल्या १० वर्षात कधीच वाटला नाही, तसेच त्यांचे अस्तित्व आहे की नाही हीच मुळी शंका यावी अशी यांची विरोधी पक्ष म्हणुन कामगिरी वाटली.बरं एकट्या मोदींच्या जिवावर भाजपा आत्ता उड्या मारतो आहे यातच पक्षाची अवस्था लक्षात यावी ! बरं बिचारे मोदीच एकटेच खिंड लढवत आहेत असेच सध्या चित्र डोळ्यांना दिसत आहे, भाजपाच्या इतर नेत्यांच्या प्रचार सभा डोळ्यात भराव्या अश्या होतात ? आडवाणींचा उल्लेख तर प्रामुख्याने करायलाच हवा ! एके काळी भाजपाचे लोह-पुरुष म्हणवणारे त्यांच्या राजकिय महत्वकांक्षेने इतके अंधळे झाले की त्यांचे एकच काम सुरु झाले ते म्हणजे सातत्याने पक्षाचा तेजोभंग करणे आणि मनोधैर्यावर आघात करत बसणे.यांच्याच पंगतीला आता जसवंत सिंग गेले आहेत. म्हणायचं नाही पण ह्यांची आर्धी लाकडं मसणात गेली तरी सत्तेचा मोह टाळता येत नाही. अवांतर :- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कार्यक्षमता वाढवुन पगार दिला जातो,किंवा पगार वाढ दिली जाते असे म्हंटले जाते. पण आपल्या देशातील राजकारणी नक्की कशाचा पगार घेतात हेच मला कळत नाही ! आम्ही अमुक केल आणि तमुक केल किंवा करुन दाखवले असे सांगत फिरतात पण ही काम करण्यासाठी तुम्हाला जनता निवडुन देते ना ? मग कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा मुद्दाच कुठे येतो ? ज्या दिवशी या देशात सत्तेवर असलेल्या पक्षास त्यांच्या कार्याची- विकासाची संपूर्ण माहिती उघड करण्याचे बंधन येइल त्यावेळीच एक प्रगत राष्ट्र म्हणुन आपली वाटचाल सुरु होइल.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 14:55
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
उलट आहे. हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती. कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 15:33
कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. थोड्या फार प्रमाणत सहमत. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे! हे कसे ? कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:45
कट्टर हिंदु होणे म्हणजे काय? मुळात हिंदु हा एक पुस्तक, एक देव, एक सेट ऑफ आज्ञा वगैरे न मानणारा धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा हिंदु धर्मातील अधिकृत व धर्ममान्य 'वाद' वा जीवनपद्धती आहे. अशावेळी हे हे केले म्हणजेच कट्टर हिंदु अशी सर्वसमावेशक व्याख्या करता येणे कठीण आहे. उलट आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे हिंदु पद्धतीने जीवन आचरणार्‍यांचे सार सांङता येतील. अर्थात एका जीवनपद्धतीशी - नियमावलीशी बांधिलकी नाही. --> अर्थातच 'कट्टर हिंदु' ही संज्ञा शक्य नाही. इस्लाम वा ख्रिश्चन सारखा ठाम व अपरिवर्तनीय नियम असणार्‍या धर्माने प्रभावित होऊन त्यांच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे कट्टरता ही व्याख्या चुकीची वाटत नाही का?

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:51
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?

In reply to by ऋषिकेश

@सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली? >>> त्याचं काय आहे म्हयत्यै का??? आधी तुकडे-पाडून जगणं ही आमची अवड! त्यात बाहेर गेलेले-आत आणून वाढवा कशाला????? अहो...भाकरी वाढवण्यापेक्षा-खाणारे-कमी झाले..तर बरं वाटतं आंम्हाला! ;)

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:23
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. "With more than 71 million claiming Christianity, India is now the eighth largest Christian nation in the world," said Dick McClain, president and CEO of The Mission Society, publisher of Unfinished. "

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 16:35
वाटलेच होते, म्हणूनच टक्केवारी हा शब्द वापरला होता. ही नॅचरल ग्रोथ झाली, याने धर्मांतर झाले हे कसे समजावे? आता वेगळे आकडे पाहु भारतीय जनगणनेनुसार, १९९७१ ते २००१चे आकडे पाहुया: हिंदु: 82.73%, 82.30%, 81.53%, 80.46% मुस्लिम: 11.21% 11.75% 12.61% 13.43% ख्रिश्चनः 2.44% 2.60% 2.44% 2.32% 2.34% अर्थात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कोणताही मोठा शिफ्ट दिसत नाही. उलट मुस्लिमांच्या प्रमाणात हळु परंतू सतत वाढ दिसते, मात्र त्याची संभाव्य कारणे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. धर्मांतर हा भागही त्यात आहे, मात्र हिंदूंने आता चवताळून उठावे असा कोणता ट्रेंड दिसतो आणि मुळ विषय बाजुलाच राहिला, मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:50
सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने नक्की टक्केवारी {धर्मांतर झालेल्यांची} देता येत नाही. यातही धर्मांतरीत झालेल्या लोकांची नोंदणी कितपत होते या बद्धलच साशंकता आहे. असो... मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय? हिंदुंनी कट्टर असायलाच हवे असा माझा विचार आहे, आणि तो बदलेल असे वाटत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्त्रीयांचे आणि स्वतःचे रक्षण करण्यास तुमच्या धर्मामुळे असाहयाता वाटत असेल तर तो धर्म काय कामाचा ? त्यामुळे जर तुम्ही हिंदु असाल तर कट्टरता ही असायलाच हवी ! इथे धार्मीक कर्मकांड अभिप्रेत नसुन आत्मरक्षणा पुरता तरी कट्टरतावाद असावा ही भावना आहे.

In reply to by मदनबाण

बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!" हे विधान कैच्याकै हास्यास्पद आहे. हिंदू सहिष्णू वगैरे काही नाही. पळपुटा आणि बोटचेपेपणाच आहे. आणि जो काही हिंदू आता हिंदू म्हणून शिल्लक आहे तो सहिष्णूता वगैरेमुळे असे मला मुळीच वाटत नाही. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना इथे येऊन इथल्या संख्याबळावर मात करणे शक्य नव्हते. जरी इथून एकजूट होऊन विरोध होऊ शकत नसला तरी स्वतंत्रपणे संख्याबळावर विरोध करू शकणारे राजे इथे अस्तित्वात होते. जसे औरंगजेबाचे बाहूबळ मोठ्याप्रमाणात रजपूतांवर अवलंबून होते. त्यामुळे कट्टरपण स्वीकारणे म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन होणे हे विधान अत्यंत बालिश वाटते.

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 10/04/2014 - 05:49
ात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.
बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून

उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
आणि अजून शाबूत आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 16:08
बाप्रे! काय हा प्रतिसाद! ह्यात भयानक ते काय ? हिंदु स्त्रींयांची अवहेलना झाली नाही,त्यांच्यावर अत्याचार झाले नाही की त्यांच्यांवर यवनांनी बलात्कार केले नाहीत ? यवनांचे जनानखाने हिंदु स्त्रीयांनी भरलेले नव्हते का ? हैद्राबाद मधे रझाकारांनी हिंदु स्त्रीयांची आब्रु लुटली नाही काय ?तीच परिस्थीती भविष्यात होउ नये हीच भिती प्रतिसादात व्यक्त केली तर काय चुकले ? असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी हे दोघे ज्या प्रमाणे माथेफिरु भाषणे देत सुटले आहेत त्यांना कोण नीट ऐकत आहे का ? ते नीट ऐका बरं जरा... तू-नळीवर बरेच व्हिडीयो सापडतील. बरं... तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद लतिफाबाद (पाकिस्तान) मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही, परंतु पाकिस्तानच्या http://tribune.com.pk/ या वर्तमान संकेस्थळावर ही बातमी इथे :- Hindu temple in Hyderabad broken into, set on fire वाचता आली.

In reply to by मदनबाण

@ तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही>>> याबाबतीत सहमत आहे. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे बदमाश,अश्या गोष्टी कळल्यानंतर सुद्धा..पुन्हा त्या खोट्याच कश्या असतील..असे तर्कही लढवताना पाहिलं/ऐकलं आहे. त्यांना त्यांच्या घरांवर हात पडत नाही,तोपर्यंत काहिही खरं वाटत नाही. :)

In reply to by मदनबाण

आपण त्यांचे दाखले द्यायचे आणि त्यांनी आपली उदाहरणं द्यायची, परिणामी धर्माधिष्ठीत राजकारण चालू राहातं. पहिल्यांदा ते का पहिल्यांदा आपण हा वादच नको. Common Civil Code येईपर्यंत तरी धर्म घरात ठेवणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे प्रचार करणारे भाजप (राममंदिर) आणि काँग्रेस (इमामांची भेट) दोघांनाही फाटा दाखवा. त्याच प्रमाणे संविधानाची ढाल करुन आरक्षणाच्या मुद्यामागे लपणार्‍यांना सत्तेतून दूर करुन खुल्या दिलानं आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 20:14
धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे अगदी सहमत ! मग कुठल्याच पक्षांनी धर्म,जात इं चा वापर करु नये, देशाच्या आणि जनतेच्या विकासाचे काय ते बोला म्हणावे. मदरसे, देउळ आणि पुतळे उभारण्या पेक्षा देशाला उभारण्यात वेळ घालवा. भाजपाचे मदरशाचे उध्योग वाचले आणि तसा प्रतिसाद दिला. आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा. १००% सहमत ! खरं सांगु का ? सामान्य माणसाला रोज चे जीवन जगताना आणि दोन घास गिळताना मंदिर-मस्जिद काही आठवत नाही,त्याच सामान्य आयुष्य अधिक सुखकर व्हाव हीच माफक अपेक्षा तो बाळगुन असतो...पण पदरात काय पडत ? असो... तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 09/04/2014 - 21:16
मलाही आपले एकमत झालेले पाहून आनंद झाला. आता वेळ आली आहे कि धर्म, प्रांत, जात-पात असे मतभेद विसरून देशाच्या विकासासाठी एकजूट होऊ या व एक चांगला सक्षम पक्ष व दूरदृष्टी असलेला पक्षनेता पंतप्रधानपदी निवडून आणू. जय हिंद! जय भारत!!

हवालदार 09/04/2014 - 15:17
कुठल्याच पक्षाला रस नसल्याचे बघून खेद वाटला. तसेच सर्व जनतेला अजुन नळाचे पाणिही पुरवण्यास सर्व राजकीय पक्ष विसरलेले दिसत आहेत.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 19:42
"सार्वजनिक स्वच्छतागृह सुधारणा" हा खूप चांगला मुद्दा आहे आपला. त्यासाठी शहरात नगरपालिकेत नगरसेवकांच्या किंवा खेड्यात ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देतांना याचा विचार जरूर व्हावा. सध्या खासदारांच्या निवडणुकीत हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही. निवडणुकीत काय महत्त्वाचे

In reply to by आयुर्हित

हवालदार 09/04/2014 - 20:41
कारण समस्या भारतात सर्वत्र आहे. विशेषतः प्रष्ण पाण्याच्या कमतरतेशीही निगडीत आहे. आणि प्रत्येक खासदाराकडे खासदार नीधी उपलब्ध आहेच की. विशेषतः स्त्रियान्ची होणारी कुचम्बणा लक्शात घेता हा मुद्दा बाकीच्या मुद्यान्च्या बरोबरीने महत्वाचा आहे पण कदचीत आपल्या सर्वाना इतकी सवय झाली आहे की हा मुद्दा लक्शातच येत नाही. हेच नळाच्या पाण्याचेहि म्हणता येईल. मुल्य शिक्षण आणि शिक्षण पध्द्तीत बदल वगैरे मुद्दे तर पुढ्ची गोश्ट झाली.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 21:23
"जल स्वतंत्रता, सिंचनासाठी लागणारे आधुनिक मार्ग व प्रसंगी जरूर असल्यास नदीजोड प्रकल्प" हा महत्वाचा मुद्दा या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्या वाचण्यात आलेला दिसत नाही. आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांनाही "महाराजा सयाजीराव गायकवाडांचा" याबाबतचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे.

आदूबाळ 09/04/2014 - 17:16
हे वचननामे / जाहीरनामे वगैरे कायद्याच्या दृष्टीने "एन्फोर्सेबल" असतात का? उद्या यातली काही "वचनं" पाळता आली नाहीत, तर कोण जबाबदार असतं? म्यूचुअल फंडांना असतो तसा काही डिस्क्लेमर असतो का?

In reply to by आदूबाळ

सुहासदवन 09/04/2014 - 18:33
काहीच काय कोणतीही "वचनं" पाळता आली नाहीत, तरी कोणी जबाबदार नसतं. अजुन तरी आपल्याकडे accountibility and responsibility ह्या टर्म्स नेते मंडळी सोडून बाकी सर्वांना लागू आहेत. आणि तसंही इथे प्रत्येकाला लहानपासून केवळ आपल्या मुलभूत हक्कांचीच जाणीव करुन दिली जाते. मग त्या स्त्रिया असोत, तरुण असोत किंवा वृद्ध असोत. कर्तव्यांचं काय? हक्क काय फुकटही मिळतात आणि कर्तव्य पार पाडायची तर त्यांना कष्ट पडतात. आपल्याकडे जसा मानवी हक्क आयोग आहे ना, तसा मानवी कर्तव्य आयोग असणं देखील गरजेचं आहे. नेत्यांनी काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी त्यांना फक्त निवडणुकीतच धडा शिकवता येतो(?) आपल्या लोकांची/ पगारदारांची जशी वार्षिक appraisal process होते ना तशी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी. मग कळेल त्यांना.

In reply to by नितिन थत्ते

सुहासदवन 09/04/2014 - 20:33
काय निकष असतात - १. निवडणूक लढविण्यासाठी केवळ भारताचा नागरिक असणं पुरेसं असतं का? काय background check होते उमेदवारांची? ह्या पायरीवर काही विदा मिळतो का ह्या check मध्ये किती पास झाले किंवा किती आणि का नापास झाले ते. २. वारंवार निवडणूक लढविण्यासाठी तरी - आतापर्यंत काय भरीव कार्य केले ह्याचे evaluation करता येते का? किंवा तशी काही यंत्रणा आहे काय? किंवा अशी यंत्रणा असल्यास तिचा योग्य वापर होतो का? ह्या वर्षीचा निवडणुकीसाठी फॉर्म भरताना उमेचदवाराच्या पक्षाचा गेल्या वेळचा manefesto किंवा संलग्न खात्याचा अहवाल मागविला जातो काय? असं काही होत असेल तर काही विदा आहे काय कि ह्या पायरीवर किती उमेदवार अपात्र ठरतात ते. ३. निवडणुक आयोग किंवा भारतीय सरकार, आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामकाजाचा काही अहवाल किंवा विदा बनविते काय? आणि जर बनवित असेल तर निवडक विदा जनतेपुढे ठेवते काय? ४. असा एखादा पक्ष जर वर्षानुवर्षे निवडणुकीआधी मांडलेला manefasto जर एका कमीतकमी टक्केवारी पर्यंत पाळत नसेल तर त्याचं काय होतं. इत्यादी इत्यादी .... बाकी नंतर....

In reply to by सुहासदवन

आयुर्हित 09/04/2014 - 21:29
या सर्व गोष्टी आपण जनता सहन करत आलो आहे.त्याचाच फायदा सर्व राजकीय पक्ष आजवर घेत आले आहेत.म्हुणुन तर हवालदारजींनी सांगितल्याप्रमाणे वीज, रस्ते व पाणी हे मुलभूत प्रश्न आजही तसेच असह्य आहेत. जमल्यास सर्व मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!

In reply to by आयुर्हित

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय ते आता उघड आहे. अशांना सत्तेत येऊ दिलं नाही की झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 10/04/2014 - 10:08
धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? याचे उत्तर आहे :कॉंग्रेसच! कॉंग्रेसच आजपर्यंत स्वत:ला "धर्मनिरपेक्ष" म्हणवते आणि बरोबर मतदानाच्या आधी जामा मस्जिदच्या शाही इमामांना भेटते व सर्व मुसलमानांना भावनिक आवाहन करते कि कॉंग्रेसला मतदान करा. पण ह्या वेळेला सर्व मुसलमान बंधूंना कळून चुकले आहे कि कॉंग्रेस मुसलमानांचा कसा (गैर)वापर करून घेते ते! हे वाचा: Voting for Congress is betrayal of Islam, says Shia cleric Maulana Kalbe Jawwad आज आपल्या बाजूने कोणता पक्ष आहे हे ही सर्वांना कळून चुकले आहे. हे ही वाचा: जाफर आता मोदींचा खंदा समर्थक BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

In reply to by आयुर्हित

कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हो का! मग सभेच्या वेळेला बांग लागल्यावर भाषण बंद करणारे कोणती अधार्मिकता पसरवत होते? खरेतर २न्ही कडे लाऊडस्पीकर होते ना मग ज्याने त्याने आपले काम चालू ठेवणे म्हणजे भाषण करणार्‍याने भाषण करणे आणि बांग देणार्‍याने बांग देणे चालू ठेवायला पाहीजे होते. परंतु तसे होताना दिसले नाही. बाकी आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राममंदिराची उभारणी कुठे आणि बांग सुरु असतांना काही मिनीटं थांबणं कुठे... पण बुद्धीची झेपच इतकी मोठीये की तिथे सगळं सारखंच!

In reply to by संजय क्षीरसागर

वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध झेपेबद्द्ल (बुद्धीमांद्याबद्द्ल) इतकी खात्री आहे पाहून... खरंतर काहीच नाही वाटलं. :)

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 15/04/2014 - 18:06
With All Due Respect... रोजच्या आयुष्यात संघर्ष टाळून आपण आपला विकास करून घ्यावा हे मला पटतं. पण संघर्ष टाळण्याची किंमत द्यावी लागते, आणि आपण सांगितलेली किंमत भलतीच जास्त आहे. आणि पाकिस्तान आपल्याशी काश्मिर साठी लढतंय असं आपल्याला मनापासून वाटतं का? अहो काश्मिर नसते तर ते पंजाबसाठी लढले असते. ही डोकेदुखी काय पड खाऊन संपणारी आहे का?

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:37
>>> कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. राममंदीराची समस्या इतकी दशके चिघळत ठेवल्यामुळेच ती डोकेदुखी होऊन बसली आहे. जोपर्यंत तो विषय कायदेशीरदृष्ट्या सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्रास देणार. जर कायदेशीररित्या तो प्रश्न सुटला तर एक डोकेदुखी कायमची जाईल. कोणताही प्रश्न चिघळत ठेवल्याने डोकेदुखी होते. एकदा त्या प्रश्नाचा कायदेशीर निकाल लागला की तो प्रश्न सुटतो. १९७८ पासून १९९४ पर्यंत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न डोकेदुखी होऊन बसला होता. १९९४ मध्ये तो एकदाचा अधिकृतरित्या समाप्त झाला व नंतर लगेचच तो प्रश्न जनता विसरली. नामांतरानंतर सुरवातीला काही काळ काही घटकांमध्ये कदाचित नाराजी असेल, परंतु आता त्याचे नामोनिशाणदेखील नाही. राम मंदीराचा प्रश्न सुटला की असेच होईल व उलट हिंदू-मुस्लिमांमधील या प्रश्नावरून निर्माण झालेली तेढ नष्ट होईल. >>> काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. काश्मिर हे केवळ एक निमित्त आहे. काश्मिर नसेल तर पाकिस्तान भारताशी शत्रुत्व सुरू ठेवायला कोणता तरी दुसरा मुद्दा वापरेल. ब्रह्मदेव आला तरी भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हे माहिती असेल तर सांगा; मग पुढे ती (सध्या) नक्की कुणासाठी डोकेदुखी आहे ते पाहता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय. राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.

In reply to by आयुर्हित

मूळ मुद्दा तोच आहे.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22] On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wished
यावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मंदिराच्या राजकारणातून भाजपा नेत्यांनी बाहेर यावे.कदाचित त्यांच्यावर दबाव संघ मंडळींकडूनच येत असावा. (मोदी पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा असलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी संघाच्या हातातलं बाहुलं आहेत. संघानं अडवानींना संधी देऊन पाहिली पण आता त्यांच्याच्यानं ते होणार नाही म्हटल्यावर हा नवा गडी आणलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 12:43
मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! एवढा वरचा मूळ लेख, pictorial presentation वाचलच नाही असेच दिसते. काय म्हणायचे याला? पालथ्या घड्यावर पाणी.......................!!!!

In reply to by आयुर्हित

तरी म्हटलं तुम्ही ते ग्राफिकल प्रेझंटेशन (तुमच्या विचाराविरुद्ध असतांना) टाकलं कसं! दादाश्री, आतापर्यंत असले छपन्न मॅनिफेस्टो पब्लिकवर फेकून बिजेपी आणि काँग्रेस सत्तेवर आलेत. निवडून आल्यावर काहीही होत नाही इतपत समज एव्हाना यायला हवी. खरा मुद्दा कुणाचा मॅनिफेस्टो किती सुरेख धूळफेक करतो हा नाही, धार्मिक मुद्दा कोण कसा रेटतो हा आहे. भाजपनं तो निर्लज्जपणा घोषणापत्रात खुलेआम केलायं आणि सोनियाजींनी इमामांचं समर्थन मिळवून केलायं इतकाच काय तो फरक!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 13:12
कोण किती सुरेख धूळफेक करतो, हे कळले आहे सर्वांना, म्हणून गालात पडत असते दर दोन दिवसांनी. आपणही राजघाटावर जाऊन,आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे हेच बरे होईल. एवढेच म्हणतो.

In reply to by आयुर्हित

संपत 11/04/2014 - 13:52
जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम मंदिराचा मुद्दा हाच खरा कळीचा मुद्दा आहे याची जाणीव विरोधकांना आहे आणि भाजपलादेखील. तुम्हाला ती जाणीव नाही हा तुमचा भोळेपणा आहे. त्या एका ओळीत भाजपने सांगितले आहे कि आम्ही तेच आहोत जे २० वर्षांपूर्वी होतो.

In reply to by संपत

विकास 11/04/2014 - 16:53
राम जन्मभूमी, समान नागरी कायदा आणि ३७० कलम हे मुद्दे भाजपाच्या १३ दिवस, १३ महीने आणि ४.५ वर्षांच्या राजवटीच्या काळात देखील जाहीरनाम्यात होते. त्यात नवीन काहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 01:54
धूळफेक का काय माहीत नाही... कारण अजून भाजपाचे म्हणून सरकार आलेले नाही. जे आले ते रालोआ चे आले होते. आत्ता देखील रालोआचेच आले तर येईल. भाजपाला २७२+ मिळतील असे कुणाला वाटत तरी नाही. त्यामुळे अशा सरकार मधे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवला जातो. तोच राबवला जाईल. चंद्राबाबूंनी तात्काळ रामजन्मभूमीवरून नाराजी व्यक्त केली आहेच... त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही. तरी देखील धूळफेक असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा की! का एकीकडे टिका पण करायची आणि दुसरीकडे मंदीर वही बनाएंगे म्हणायचे असा बेत आहे?

In reply to by विकास

राममंदिरासारख्या छपरी मुद्यात मला काहीएक रस नाही कारण त्यानं देशाचं काडीमात्र भलं होणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला शेवटचा भाग व्यर्थ आहे. तत्पूर्वी तुम्ही म्हटलंय :
त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.
तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 13:59
राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये. परत तेच... जे कायम जाहीर केले आहे ते सुप्त कसे काय?

In reply to by विकास

राममंदिर हा जर मॅनिफेस्टोचा जाहीर भाग आहे तर इतके दिवस मी एकच गोष्ट सांगतोयं ती आपसूक सिद्ध झाली!
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 20:00
सर्वप्रथम मॅनिफेस्टो नावाचे एक डॉक्यूमेंट असते हे तुम्हाला आता एकदाचे मान्य झाल्याचे पाहून आनंद झाला. :) केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत). केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे. भारतीय सामान्य जनता ही भारतातील तथाकथीत बुद्धीवाद्यांसारखी नसल्याने ती फार त्यांच्या मागे जाईल असे वाटत नाही. तसे देखील म्हणूनच आता केजरीवालांनी दिल्लीत (पडलो तरी नाक वर स्टाईलमधे, पण) मुख्यमंत्रीपद सोडून चूक केली असे मान्य केले आहे. मोदींचा हेतू अंतस्थ नाही कारण जे कायमच जाहीर केलेले आहे ते अंतस्थ कसे? बरं हिंदूत्व आणि विकास एकत्र नसते असे कोणी सांगितले? हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?

In reply to by विकास

राममंदिर बांधणे हा उघड हेतू आहे हे तुम्हाला मान्य आहे त्यामुळे तो विषय संपला. तुमचे सगळे दिग्गज पाडापाडी आणि बांधकाम यात गुंतलेले आहेत हे Liberhan Commission रिपोर्टमधे उघड झालंय
On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.
त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत. किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते. बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.

In reply to by विकास

अर्धवटराव 12/04/2014 - 21:04
केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.
आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 03:21
मुद्दा मांडता येत नसेल तर वैयक्तीक प्रतिसाद द्यायचं हि तुमची नेहमीची सवय. आलात आपल्या मुळपदावर. चालायचच.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 13/04/2014 - 00:28
संजय क्षीरसागरजी, राममंदिराच्या मुद्द्यावर अद्वातद्वा बोलायची गरज नाही. आपण अधिक न बोलाल तर बरे होईल! इंगजी कळत असेल तर Mind your language. आणि हो, देशाचं भलं कसे होईल यासाठी आमचे सुज्ञ राजकीय नेते नक्कीच काम करत आहेत, यापुढेही करत राहणारही आहेत, मध्यातून पळून न जाता!

In reply to by विकास

संपत 12/04/2014 - 12:37
त्यात नवीन काहीच नाही.
मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.

In reply to by संपत

विकास 12/04/2014 - 14:03
निधार्मिकतेच्या गप्पा मारत काँग्रेस मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना भेटते, केजरीवाल मधेच थांबतात, कुमार विश्वास ९/११ ने अमेरीकेची कशी जिरली हे मुसलमानांच्या सभेत बोलतो, सप बद्दल तर बोलायलाच नको. असे अजून बरेच सांगता येईल. त्यामुळे जे काही आहोते ते प्रामाणिकपणे सांगितलेले चांगले का नाटकीपणाने सेक्यूलॅरीझम म्हणणे चांगले?

In reply to by संपत

अर्धवटराव 12/04/2014 - 20:57
आपले राजकारणी सद्भावी नाहित तर शहाणे आहेत. अफाट पैसा, प्रगतीच्या अमाप संधी, 'आहे रे' आणि युवा वर्गाचं वाढत्या मागणीचं प्रेशर, पक्षांतर्गत सर्वोच्च पातळीवर आर्थीक आणि जागतीक जाणिवेचं भान, जागतीक सत्तास्पर्धेत नव्यानं वठवायच्या भुमीकेची जबरदस्ती...अशा असंख्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे राममंदीर वगैरे मुद्दे कुठल्याच पक्षाचं मुख्य धोरण बनुच शकत नाहि. सत्ताकारणात प्रत्येक मुद्याचं एक लाइफ असतं. राममंदीराचा रोल इज डॉर्मंट नाऊ. तो मुद्दा परत तसाच तापायला जी भट्टी लागेल तशी भट्टी परत तयार होण्याचे चान्सेस एक दशकभर तरी नाहित. जर ति तापलीच तर भाजपा, काँग्रेस त्याचा फायदा घेतीलच, पण ते लोणि खाण्याची सर्वात केवीलवाणि धडपड आआप करेल.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 01:22
राम मंदिर (आणि एकूणच हिंदुत्व) हा पक्षाचा मुख्य मुद्दा नसून संघाचा मुख्य मुद्दा आहे. पूर्ण बहुमत आलेच तर ह्या मुद्द्यांचे दडपण मोदींवर नक्कीच येणार. मोदींनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवावे ही अपेक्षा(म्हणजेच आदेश) नक्कीच असणार. म्हणजे सगळे मोदींच्या तारतम्यावर अवलंबून. बाकी ही भट्टी प्रमाणाबाहेर पेटली तर कोण लोणी खातोय यापेक्षा देश भस्मसात होईल का ही चिंता मला जास्त आहे. यादवीमुळे उध्वस्त झालेल्या अनेक देशांची उदाहरणे उपलब्ध आहेत.

In reply to by संपत

अर्धवटराव 13/04/2014 - 03:47
माझा अंदाज असा कि मोदि इतरांना सत्तेकडे घेऊन चालले आहेत, संघ नाहि. आणि जिथवर माझा संघाबद्दल अभ्यास आहे, त्यानुसार संघ कुणा पंडे वा बडव्यांची संघटना नाहि. राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत. पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad
विटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत." इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही! आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं." धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 17:53
अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.
वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.
हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.
आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीय
जळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.
धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.
पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 11:52
पण भाजपच्या नाड्या संघाच्याच हातात आहे. संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही. राम मंदिराचा प्रश्न संपला असे मला वाटत असतानाच ह्या जाहीरनाम्यात तो संघाने टाकायला लावला. दुर्दैवाने भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर नक्कीच मोदीना त्याबाबतीत पावले उचलावीच लागतील. देशाच्या सुदैवाने अडवाणी संधीसाधू असले तरी कचखोर होते. मोदी हे चांगल्या आणि वाईट अर्थाने कणखर आहेत. आणि राम मंदिर हे प्रतिक आहे, ते शांततेने झालेच (जे अशक्य वाटते)तर नंतर काशी, मथुरा,हिंदुराष्ट्र, आसिंधुसिंधू भारतवर्ष हे सगळ येईलच. ५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.

In reply to by संपत

करेक्ट! खरं तर हिंम्मतच नाही! मोदींना वाटायला लागलं होतं की ते आता `विकास पुरुष' झाले (आणि पुढे `पंतप्रधान' होणार!) म्हणून राममंदिराचा मुद्दा ते शेवटपर्यंत बाजूला सारायचा प्रयत्न करत होते (कारण साला आधीचा झेंगट काय कमीये!). पण मुरली मनोहर जोशींनी त्यांना त्यांची (खरी) जागा दाखवून दिली (...अबे बागडू तेरे को बिजेपीने इसलीये प्रायमिनिस्टरियल कँडिडेट बनाया के तू राममंदिर बनायेगा और तू पल्टी मार रहा है? अडवानीको इसलीये नीचे बिठाया की अब उनकी उम्र बीत गयी. लेकीन तुम अगर लाईन बदलोगे तो पार्टी तुम्हारा बाजा बजा देगी!)
There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.
Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".
आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :
Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."
आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!

विकास 08/04/2014 - 02:59
ज्या आप्तेष्टांना आणि पारंपारीक सत्ताधिशांना पाठींबा देणार्‍या वाचक/सदस्यांचे सध्याच्या काळातल्या लोकसत्तेमधील संपादकीय वाचून डोके भणभणते त्यांना एक सुसह्य फरक जाणवेल असा या विषयावरील आजचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे असे वाटते. जोशीबुवांचे चऱ्हाट अर्थात त्याचा अर्थ इतर पक्षिय शहाणे ठरतात असा नाही. त्या संदर्भात नुसत्या अग्रलेखाच्याच नाही तर वर्तणुकींच्या पण लिंक्स देता येतील. काळजी नसावी. ;)

In reply to by विकास

आयुर्हित 08/04/2014 - 16:16
दिलेल्या लिंक वरचा सुविचार: बुध्दीमान व्यक्ती शत्रुंचा देखिल उपयोग करून घेतात, पण मूर्ख व्यक्तींना मित्रांचा देखिल उपयोग करून घेता येत नाही. वाचला आणि संपादकीय लेख वाचल्याबरोबर त्याची १००% प्रचीती आली! असो. गिरीश कुबेर किंवा कुमार केतकर कोण आहे ह्या लेखाचा लेखक? कळले असते तर अजून बरे झाले असते. जो कोणी का असेना संपादक, अगदी सुमार बुद्धी असलेलाच आहे, हे लेख वाचल्यावर स्पष्ट होते. किती अज्ञानात जगतात लोकं ? आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्यांनाही ते मानायला तयार नसतात. या संपादकांना मी "आळसाधीपती अज्ञानपरायण" पदवी द्यावीशी वाटते. कारण लेखात आळसाधीपती अज्ञानपरायण संपादक म्हणतात:
अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभते
सोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत. फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे. आभार:Reocity

कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.
हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 08/04/2014 - 14:28
Forget jobless growth, India's job base is actually shrinking dramatically. Even as growth sags alarmingly and the third quarter for Financial Year 2012-13 saw GDP coming in at 4.5 per cent, news comes in that India has lost 5 million jobs in a five-year period ending 2010, according to the Planning Commission. Amid economic slowdown, India lost 5 million jobs during 2005-2010

In reply to by आयुर्हित

अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ ते २०१० मध्ये नोकऱ्या वाढल्या असं रिपोर्ट सांगतो. कमी झाले ते मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स. त्यातही २००० ते २००५ मध्ये तेच मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स दहा मिलियननी वाढले होते... शिवाय, तुम्ही त्या पाच वर्षांचं नाही, तर गेल्या दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्याचं लिहिलं आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचं जीडीपी दुप्पट झालं (इन्फ्लेशन वगळून). आणि जॉब्स तितकेच राहिले, म्हणजे दरडोई प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली असं तुम्ही म्हणताय? दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्या हे तुमच्या लेखातलं विधान आहे. ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली ते सांगा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 10/04/2014 - 13:36
फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास ज्यावेळी देशात NDA चे सरकार होते वार्षिक निर्यातवाढ ४०% होती.(१९९९-२००४) पण ज्यावेळी UPA चे सरकार आले, पहिल्या ५ वर्षात वार्षिक निर्यातवाढ 3०%वर आली आणि UPA२ च्या काळात पुढच्या ५ वर्षात ती फक्त ९% आहे.(२००४-२०१४). असे जर असेल तर नोकऱ्या वाढणार का कमी होणार? Nandan Nilekani's Aadhaar project a political gimmick with no vision

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 19/04/2014 - 12:24
सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार: वाहन उद्योगासाठी गेले आर्थिक वर्ष सर्वाधिक कठीण काळ होता. या काळात वाहन उद्योगातील उत्पादनाच्या प्रक्रियेतील कच्चा माल पुरवणाऱ्यांपासून ते वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांपर्यंतच्या मालिकेत सुमारे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. - विक्रम किर्लोस्कर, अध्यक्ष, सियाम साभार:घटती वाहनविक्री रोजगाराच्या मुळावर - - सकाळ न्यूज नेटवर्क शुक्रवार, 18 एप्रिल 2014 - 01:00 AM IST

विवेकपटाईत 08/04/2014 - 08:56
५० लाख लोक या घटकेला रस्त्यावर बेरोजगार झालेले आहे. चालू कामे बंद झालेली आहे नवीन स्वीकृत प्रोजेक्ट्स वर काम सुरु झालेली नाही. हीच दशा रेल्वेची आहे. infrastructure बंद करण्या मागचा हेतू काय? वोट देण्याआधी अवश्य वाचा: माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,

श्रीगुरुजी 08/04/2014 - 11:53
जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. मी कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा कधीच गांभिर्याने घेत नाही. कोणताही पक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा गांभिर्याने घेत आहे असे वाटत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

संपत 09/04/2014 - 12:28
हा जाहीरनामाच. शिवसेनेचा वचननामा, मनसेचा वचकनामा आणि सर्वेपि सुखिन: संतु म्हणजे common minimum programme :)

ऋषिकेश 08/04/2014 - 13:51
१.
देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास
छ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत. २.
विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच ३.
त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे
भाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे. बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.

नितिन पाठे 08/04/2014 - 14:30
आज एक लेख वाचला, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात....प्रचंड आवडला..... तो पूर्ण लेख इथे पेस्ट करतोय... *सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका * हिंदुस्थानात मुसलमान स्वत:च्या ताकदीवर ना राष्ट्रीय पक्ष उभारू शकतात ना लोकसभेत ते स्वत:ची बाजू प्रभावीपणे मांडू शकतात. असे का व्हावे याचा विचार निवडणुकीच्या विचारापेक्षा अधिक सखोलतेने करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षातील मुसलमान असो, तो स्वत:ला केवळ मुसलमान म्हणूनच अभिव्यक्त करतो, हिंदुस्थानी म्हणून नव्हे. ते स्वत:ला जोपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेणार नाहीत तोपर्यंत कोण त्यांना खरा देशवासी म्हणेल? प्रचंड जोर लावल्यानंतरही यंदा कॉंग्रेस आपले सरकार बनवू शकणार नाही हे निश्‍चित आहे. अर्थात तरीही कॉंग्रेसला मुस्लिमांची मते आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही कॉंग्रेसची गरज आहेच. ज्या राज्यात दंगे होतात त्या राज्य सरकारला मुस्लिम अतिशय आक्रस्ताळेपणाने बदनाम करतात. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोक समाजवादी पक्षाचा उदोउदो करीत. परंतु मुजफ्फरनगरच्या दंग्याने त्यांचे डोळे उघडले. आता उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा कल कोणत्या पक्षाकडे वळेल? असा विचार केला जात आहे. तात्पुरत्या निवडणुकीपुरता होणारा हा विचार राष्ट्रीयदृष्ट्या मात्र अतिशय उथळ आहे. इतिहास सांगतो की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या बहुतांश मागण्या कॉंग्रेसने जाणीवपूर्वक मान्य केल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अहमदियांबरोबरच स्वत: मुसलमानांची तरी काय स्थिती आहे? त्यांच्याच इस्लामी राष्ट्रांमध्ये त्यांची ओळख तालिबानी आणि दहशतवादी अशीच आहे. हिंदुस्थानात फाळणीच्या काळाप्रमाणे आज मुस्लिम आर्थिक आणि राजकीय पातळीवर अस्थिर नाहीत. त्यामुळे खरे तर आता त्यांनीच बदलायला हवे. मुसलमानांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील विरोधी पक्ष हे त्यांचे दुश्मनच असतील आणि कॉंग्रेसही त्यांच्यावर अन्यायच करीत असेल तर हिंदुस्थानी राजकीय व्यवस्थेत त्यांच्या समस्यांचे समाधान कसे होणार? काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने म्हटले होते की, कॉंग्रेसने मुसलमानांना वेठबिगार बनवले. असे असेल तर मग ते वारंवार कॉंग्रेसकडे आपले रक्षण करा, अशी मागणी का करतात? येथील सामान्य मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून केवळ आपले खिसे भरले आहेत. त्यांच्या याच प्रवृत्तीचा कॉंग्रेस ६२ वर्षांपासून फायदा घेत आहे. मुसलमानांची अवस्था त्या बकर्‍यासारखी होते ज्याचा बाजारात जाहीर लिलाव होतो. मुसलमानांच्या अदूरदर्शीपणामुळेच त्यांचा स्वाभिमान विकला जातो आणि ते निव्वळ कॉंग्रेसभोवतीच पिंगा घालत बसतात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील दलित आणि मुस्लिमांची परिस्थिती एकसमान होती. आज दलित बांधव वेगाने प्रगती करीत आहेत. त्यांनी स्वत:चे अस्तित्व सिध्द केले. पण मुसलमान मात्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दरवाजात भिकेचा कटोरा घेऊन उभाच आहे. खरे तर दलितांनी आरक्षणाचा फायदा मिळवून स्वत:ची प्रगती साधली त्याचप्रमाणे मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून कमी का फायदा घेतला आहे? पण ते केवळ धर्मातच गुरफटून राहिले. जरी ते गरीब असले तरी हज यात्रेला जाणार्‍या जगभरच्या मुस्लिमांत सर्वाधिक हिंदुस्थानी मुसलमानच का असतात. कारण हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यंदा तब्बल चार लाख मुसलमान मक्केला जाणार आहेत. हजसाठी तब्बल पाच लाखांचे तिकीट ते कसे घेऊ शकतात? हज कमिटीने प्रत्येक प्रांतात सरकारकडून हज हाऊस बनवून घेतले. हिंदुस्थानातील अन्य धर्मीय एवढा पैसा खर्च करू शकतात का? अल्पसंख्याक म्हणून देशातील प्रत्येक राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचीच शाखा त्यांना का हवी, देशात असंख्य विद्यापीठे असताना अलिगढ किंवा दिल्लीच्या जामीया मिल्लीयाच्याच शाखेचा आग्रह हे कशाचे द्योतक आहे? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शरीयतविषयक एखादा कायद्याचा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिमांची मागणी असते की, त्यांच्यासाठी पर्सनल लॉनुसार चालणारी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारून देण्यात यावी. स्वत:ला धर्माच्या नावावर ते विनाकारणच श्रेष्ठ समजत असतील तर देशातील बहुसंख्य समाजाने हे का खपवून घ्यावे? लोकशाहीच्या नावाखाली एका सरकारांतर्गत दुसरे सरकार आणि एका कायद्याऐवजी दुसराच कायदा कसा चालेल? एक स्वतंत्र देश मागितल्यासारख्याच या मागण्या नाहीत का? निवडणुकांच्या काळात मुसलमानांनी एक हिंदुस्थानी नागरिक या नात्याने मागण्या करायला हव्यात. अन्यथा देशाच्या अखंडतेसाठी हाच सर्वात मोठा धोका ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणत्या मुस्लिम राष्ट्रात शिया आणि सुन्नी मुसलमांनांसाठी वेगवेगळी कायदेव्यवस्था आहे? किंवा वर्ग किंवा पंथाच्या आधारावर त्यांची वेगवेगळी विद्यापीठे आहेत? मुस्लिम राष्ट्रांमध्येच जर अल्पसंख्य, बहुसंख्य असे लाड नसतील तर हिंदुस्थानात ते का असावेत? राज्यघटनेने मागासांसाठी दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एकतर त्यांनी अल्पसंख्य म्हणून सरकारी सोयी-सवलती घ्याव्यात किंवा मग आरक्षण मिळवून विकास साधावा, परंतु मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा आणि आरक्षण असे दोन्ही हवे. राज्य घटनेनुसार अशी दुहेरी सवलत मिळू शकत नाही. आरक्षित जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळाला काय? मुस्लिमांचे अवाजवी लाड केल्यामुळेच आज आझम खान किंवा ओवेसीसारख्या नेत्यांचे फावले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे बंद करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीत त्यांची भागीदारी व्हावी इतपत त्यांना सक्षम ठीक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांबरोबरच मुस्लिमांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

10 करोड नोकर्‍यांचे खोटे आमिष दाखवणारा पप्पू चा बोगस जाहीरनामा आणि जनतेला उल्लू बनवणार्‍या खोट्या टीव्ही जाहिराती करणार्‍या कोंग्रेस चा भुक्कड प्रचार पाहून आठवले.... 2010 मध्ये युपीए सरकारचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिदम्बरम ची मुलाखत सुरू होती, निवेदकाने प्रश्न विचारला की "आपने 2009 के चुनाव मे सबको सस्ते घर देने का और पेट्रोल की कीमत स्थिर रखने का वादा किया था . लेकीन वैसा हुआ नही. क्यो?" यावर चिदम्बरम काय म्हणाला माहीत आहे? " चुनावी वादे तो चुनावी वादे होते है . जनता तो भूल भी गयी, आप क्यो याद रखते है?" जनतेला उल्लू बनवणार्‍यानो अब् जनता माफ नही करेगी अबकी बार -मोदी सरकार

आबा 08/04/2014 - 23:46
निराशाजनक आहे, अर्थात दुसरी अपेक्षाच नव्हती म्हणा !

मदनबाण 09/04/2014 - 11:13
कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार केवळ अशक्य !हिंदुंच्या रामाची टिंगल उडवायचे हे दिवस तिथे मंदिराचे काय घेउन बसलात ? बरं अशी टिंगल करण्यात दीड-शहाणे हिंदुच पुढे.ज्यांना स्वतःच्या दैवतांची फिकीर नाही त्यांचे भविष्य काय ते असणार ? तेव्हा हा मुद्दा गुंडाळला गेलाच समजा. राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. हे कशाला ? दाढ्या कुरवाळण्याची खाज आता भाजपाला सुद्धा आली काय ? तो झाकिरडा तोंडाला येइल ते बरळतं असतो,असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी जे विष ओकत आहेत्,हिंदुंच्या रामाची जाहिर टिंगल करत आहेत तेव्हा यांच्या सारख्या अनेक सापड्यांना तुम्हाला पोसायचे आणि मोठे करायचे आहे का ? पण काय करणार आमचे हिंदुच जर त्यांच्या रामाची टंगल करतात, तिथे असले नाग फुक्त्कार टाकतात त्यात नवल ते काय ? उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ? असो... भाजपा एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन मला गेल्या १० वर्षात कधीच वाटला नाही, तसेच त्यांचे अस्तित्व आहे की नाही हीच मुळी शंका यावी अशी यांची विरोधी पक्ष म्हणुन कामगिरी वाटली.बरं एकट्या मोदींच्या जिवावर भाजपा आत्ता उड्या मारतो आहे यातच पक्षाची अवस्था लक्षात यावी ! बरं बिचारे मोदीच एकटेच खिंड लढवत आहेत असेच सध्या चित्र डोळ्यांना दिसत आहे, भाजपाच्या इतर नेत्यांच्या प्रचार सभा डोळ्यात भराव्या अश्या होतात ? आडवाणींचा उल्लेख तर प्रामुख्याने करायलाच हवा ! एके काळी भाजपाचे लोह-पुरुष म्हणवणारे त्यांच्या राजकिय महत्वकांक्षेने इतके अंधळे झाले की त्यांचे एकच काम सुरु झाले ते म्हणजे सातत्याने पक्षाचा तेजोभंग करणे आणि मनोधैर्यावर आघात करत बसणे.यांच्याच पंगतीला आता जसवंत सिंग गेले आहेत. म्हणायचं नाही पण ह्यांची आर्धी लाकडं मसणात गेली तरी सत्तेचा मोह टाळता येत नाही. अवांतर :- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कार्यक्षमता वाढवुन पगार दिला जातो,किंवा पगार वाढ दिली जाते असे म्हंटले जाते. पण आपल्या देशातील राजकारणी नक्की कशाचा पगार घेतात हेच मला कळत नाही ! आम्ही अमुक केल आणि तमुक केल किंवा करुन दाखवले असे सांगत फिरतात पण ही काम करण्यासाठी तुम्हाला जनता निवडुन देते ना ? मग कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा मुद्दाच कुठे येतो ? ज्या दिवशी या देशात सत्तेवर असलेल्या पक्षास त्यांच्या कार्याची- विकासाची संपूर्ण माहिती उघड करण्याचे बंधन येइल त्यावेळीच एक प्रगत राष्ट्र म्हणुन आपली वाटचाल सुरु होइल.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 14:55
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
उलट आहे. हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती. कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 15:33
कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. थोड्या फार प्रमाणत सहमत. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे! हे कसे ? कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:45
कट्टर हिंदु होणे म्हणजे काय? मुळात हिंदु हा एक पुस्तक, एक देव, एक सेट ऑफ आज्ञा वगैरे न मानणारा धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा हिंदु धर्मातील अधिकृत व धर्ममान्य 'वाद' वा जीवनपद्धती आहे. अशावेळी हे हे केले म्हणजेच कट्टर हिंदु अशी सर्वसमावेशक व्याख्या करता येणे कठीण आहे. उलट आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे हिंदु पद्धतीने जीवन आचरणार्‍यांचे सार सांङता येतील. अर्थात एका जीवनपद्धतीशी - नियमावलीशी बांधिलकी नाही. --> अर्थातच 'कट्टर हिंदु' ही संज्ञा शक्य नाही. इस्लाम वा ख्रिश्चन सारखा ठाम व अपरिवर्तनीय नियम असणार्‍या धर्माने प्रभावित होऊन त्यांच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे कट्टरता ही व्याख्या चुकीची वाटत नाही का?

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:51
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?

In reply to by ऋषिकेश

@सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली? >>> त्याचं काय आहे म्हयत्यै का??? आधी तुकडे-पाडून जगणं ही आमची अवड! त्यात बाहेर गेलेले-आत आणून वाढवा कशाला????? अहो...भाकरी वाढवण्यापेक्षा-खाणारे-कमी झाले..तर बरं वाटतं आंम्हाला! ;)

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:23
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. "With more than 71 million claiming Christianity, India is now the eighth largest Christian nation in the world," said Dick McClain, president and CEO of The Mission Society, publisher of Unfinished. "

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 16:35
वाटलेच होते, म्हणूनच टक्केवारी हा शब्द वापरला होता. ही नॅचरल ग्रोथ झाली, याने धर्मांतर झाले हे कसे समजावे? आता वेगळे आकडे पाहु भारतीय जनगणनेनुसार, १९९७१ ते २००१चे आकडे पाहुया: हिंदु: 82.73%, 82.30%, 81.53%, 80.46% मुस्लिम: 11.21% 11.75% 12.61% 13.43% ख्रिश्चनः 2.44% 2.60% 2.44% 2.32% 2.34% अर्थात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कोणताही मोठा शिफ्ट दिसत नाही. उलट मुस्लिमांच्या प्रमाणात हळु परंतू सतत वाढ दिसते, मात्र त्याची संभाव्य कारणे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. धर्मांतर हा भागही त्यात आहे, मात्र हिंदूंने आता चवताळून उठावे असा कोणता ट्रेंड दिसतो आणि मुळ विषय बाजुलाच राहिला, मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:50
सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने नक्की टक्केवारी {धर्मांतर झालेल्यांची} देता येत नाही. यातही धर्मांतरीत झालेल्या लोकांची नोंदणी कितपत होते या बद्धलच साशंकता आहे. असो... मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय? हिंदुंनी कट्टर असायलाच हवे असा माझा विचार आहे, आणि तो बदलेल असे वाटत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्त्रीयांचे आणि स्वतःचे रक्षण करण्यास तुमच्या धर्मामुळे असाहयाता वाटत असेल तर तो धर्म काय कामाचा ? त्यामुळे जर तुम्ही हिंदु असाल तर कट्टरता ही असायलाच हवी ! इथे धार्मीक कर्मकांड अभिप्रेत नसुन आत्मरक्षणा पुरता तरी कट्टरतावाद असावा ही भावना आहे.

In reply to by मदनबाण

बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!" हे विधान कैच्याकै हास्यास्पद आहे. हिंदू सहिष्णू वगैरे काही नाही. पळपुटा आणि बोटचेपेपणाच आहे. आणि जो काही हिंदू आता हिंदू म्हणून शिल्लक आहे तो सहिष्णूता वगैरेमुळे असे मला मुळीच वाटत नाही. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना इथे येऊन इथल्या संख्याबळावर मात करणे शक्य नव्हते. जरी इथून एकजूट होऊन विरोध होऊ शकत नसला तरी स्वतंत्रपणे संख्याबळावर विरोध करू शकणारे राजे इथे अस्तित्वात होते. जसे औरंगजेबाचे बाहूबळ मोठ्याप्रमाणात रजपूतांवर अवलंबून होते. त्यामुळे कट्टरपण स्वीकारणे म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन होणे हे विधान अत्यंत बालिश वाटते.

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 10/04/2014 - 05:49
ात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.
बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून

उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
आणि अजून शाबूत आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 16:08
बाप्रे! काय हा प्रतिसाद! ह्यात भयानक ते काय ? हिंदु स्त्रींयांची अवहेलना झाली नाही,त्यांच्यावर अत्याचार झाले नाही की त्यांच्यांवर यवनांनी बलात्कार केले नाहीत ? यवनांचे जनानखाने हिंदु स्त्रीयांनी भरलेले नव्हते का ? हैद्राबाद मधे रझाकारांनी हिंदु स्त्रीयांची आब्रु लुटली नाही काय ?तीच परिस्थीती भविष्यात होउ नये हीच भिती प्रतिसादात व्यक्त केली तर काय चुकले ? असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी हे दोघे ज्या प्रमाणे माथेफिरु भाषणे देत सुटले आहेत त्यांना कोण नीट ऐकत आहे का ? ते नीट ऐका बरं जरा... तू-नळीवर बरेच व्हिडीयो सापडतील. बरं... तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद लतिफाबाद (पाकिस्तान) मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही, परंतु पाकिस्तानच्या http://tribune.com.pk/ या वर्तमान संकेस्थळावर ही बातमी इथे :- Hindu temple in Hyderabad broken into, set on fire वाचता आली.

In reply to by मदनबाण

@ तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही>>> याबाबतीत सहमत आहे. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे बदमाश,अश्या गोष्टी कळल्यानंतर सुद्धा..पुन्हा त्या खोट्याच कश्या असतील..असे तर्कही लढवताना पाहिलं/ऐकलं आहे. त्यांना त्यांच्या घरांवर हात पडत नाही,तोपर्यंत काहिही खरं वाटत नाही. :)

In reply to by मदनबाण

आपण त्यांचे दाखले द्यायचे आणि त्यांनी आपली उदाहरणं द्यायची, परिणामी धर्माधिष्ठीत राजकारण चालू राहातं. पहिल्यांदा ते का पहिल्यांदा आपण हा वादच नको. Common Civil Code येईपर्यंत तरी धर्म घरात ठेवणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे प्रचार करणारे भाजप (राममंदिर) आणि काँग्रेस (इमामांची भेट) दोघांनाही फाटा दाखवा. त्याच प्रमाणे संविधानाची ढाल करुन आरक्षणाच्या मुद्यामागे लपणार्‍यांना सत्तेतून दूर करुन खुल्या दिलानं आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 20:14
धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे अगदी सहमत ! मग कुठल्याच पक्षांनी धर्म,जात इं चा वापर करु नये, देशाच्या आणि जनतेच्या विकासाचे काय ते बोला म्हणावे. मदरसे, देउळ आणि पुतळे उभारण्या पेक्षा देशाला उभारण्यात वेळ घालवा. भाजपाचे मदरशाचे उध्योग वाचले आणि तसा प्रतिसाद दिला. आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा. १००% सहमत ! खरं सांगु का ? सामान्य माणसाला रोज चे जीवन जगताना आणि दोन घास गिळताना मंदिर-मस्जिद काही आठवत नाही,त्याच सामान्य आयुष्य अधिक सुखकर व्हाव हीच माफक अपेक्षा तो बाळगुन असतो...पण पदरात काय पडत ? असो... तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 09/04/2014 - 21:16
मलाही आपले एकमत झालेले पाहून आनंद झाला. आता वेळ आली आहे कि धर्म, प्रांत, जात-पात असे मतभेद विसरून देशाच्या विकासासाठी एकजूट होऊ या व एक चांगला सक्षम पक्ष व दूरदृष्टी असलेला पक्षनेता पंतप्रधानपदी निवडून आणू. जय हिंद! जय भारत!!

हवालदार 09/04/2014 - 15:17
कुठल्याच पक्षाला रस नसल्याचे बघून खेद वाटला. तसेच सर्व जनतेला अजुन नळाचे पाणिही पुरवण्यास सर्व राजकीय पक्ष विसरलेले दिसत आहेत.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 19:42
"सार्वजनिक स्वच्छतागृह सुधारणा" हा खूप चांगला मुद्दा आहे आपला. त्यासाठी शहरात नगरपालिकेत नगरसेवकांच्या किंवा खेड्यात ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देतांना याचा विचार जरूर व्हावा. सध्या खासदारांच्या निवडणुकीत हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही. निवडणुकीत काय महत्त्वाचे

In reply to by आयुर्हित

हवालदार 09/04/2014 - 20:41
कारण समस्या भारतात सर्वत्र आहे. विशेषतः प्रष्ण पाण्याच्या कमतरतेशीही निगडीत आहे. आणि प्रत्येक खासदाराकडे खासदार नीधी उपलब्ध आहेच की. विशेषतः स्त्रियान्ची होणारी कुचम्बणा लक्शात घेता हा मुद्दा बाकीच्या मुद्यान्च्या बरोबरीने महत्वाचा आहे पण कदचीत आपल्या सर्वाना इतकी सवय झाली आहे की हा मुद्दा लक्शातच येत नाही. हेच नळाच्या पाण्याचेहि म्हणता येईल. मुल्य शिक्षण आणि शिक्षण पध्द्तीत बदल वगैरे मुद्दे तर पुढ्ची गोश्ट झाली.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 21:23
"जल स्वतंत्रता, सिंचनासाठी लागणारे आधुनिक मार्ग व प्रसंगी जरूर असल्यास नदीजोड प्रकल्प" हा महत्वाचा मुद्दा या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्या वाचण्यात आलेला दिसत नाही. आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांनाही "महाराजा सयाजीराव गायकवाडांचा" याबाबतचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे.

आदूबाळ 09/04/2014 - 17:16
हे वचननामे / जाहीरनामे वगैरे कायद्याच्या दृष्टीने "एन्फोर्सेबल" असतात का? उद्या यातली काही "वचनं" पाळता आली नाहीत, तर कोण जबाबदार असतं? म्यूचुअल फंडांना असतो तसा काही डिस्क्लेमर असतो का?

In reply to by आदूबाळ

सुहासदवन 09/04/2014 - 18:33
काहीच काय कोणतीही "वचनं" पाळता आली नाहीत, तरी कोणी जबाबदार नसतं. अजुन तरी आपल्याकडे accountibility and responsibility ह्या टर्म्स नेते मंडळी सोडून बाकी सर्वांना लागू आहेत. आणि तसंही इथे प्रत्येकाला लहानपासून केवळ आपल्या मुलभूत हक्कांचीच जाणीव करुन दिली जाते. मग त्या स्त्रिया असोत, तरुण असोत किंवा वृद्ध असोत. कर्तव्यांचं काय? हक्क काय फुकटही मिळतात आणि कर्तव्य पार पाडायची तर त्यांना कष्ट पडतात. आपल्याकडे जसा मानवी हक्क आयोग आहे ना, तसा मानवी कर्तव्य आयोग असणं देखील गरजेचं आहे. नेत्यांनी काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी त्यांना फक्त निवडणुकीतच धडा शिकवता येतो(?) आपल्या लोकांची/ पगारदारांची जशी वार्षिक appraisal process होते ना तशी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी. मग कळेल त्यांना.

In reply to by नितिन थत्ते

सुहासदवन 09/04/2014 - 20:33
काय निकष असतात - १. निवडणूक लढविण्यासाठी केवळ भारताचा नागरिक असणं पुरेसं असतं का? काय background check होते उमेदवारांची? ह्या पायरीवर काही विदा मिळतो का ह्या check मध्ये किती पास झाले किंवा किती आणि का नापास झाले ते. २. वारंवार निवडणूक लढविण्यासाठी तरी - आतापर्यंत काय भरीव कार्य केले ह्याचे evaluation करता येते का? किंवा तशी काही यंत्रणा आहे काय? किंवा अशी यंत्रणा असल्यास तिचा योग्य वापर होतो का? ह्या वर्षीचा निवडणुकीसाठी फॉर्म भरताना उमेचदवाराच्या पक्षाचा गेल्या वेळचा manefesto किंवा संलग्न खात्याचा अहवाल मागविला जातो काय? असं काही होत असेल तर काही विदा आहे काय कि ह्या पायरीवर किती उमेदवार अपात्र ठरतात ते. ३. निवडणुक आयोग किंवा भारतीय सरकार, आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामकाजाचा काही अहवाल किंवा विदा बनविते काय? आणि जर बनवित असेल तर निवडक विदा जनतेपुढे ठेवते काय? ४. असा एखादा पक्ष जर वर्षानुवर्षे निवडणुकीआधी मांडलेला manefasto जर एका कमीतकमी टक्केवारी पर्यंत पाळत नसेल तर त्याचं काय होतं. इत्यादी इत्यादी .... बाकी नंतर....

In reply to by सुहासदवन

आयुर्हित 09/04/2014 - 21:29
या सर्व गोष्टी आपण जनता सहन करत आलो आहे.त्याचाच फायदा सर्व राजकीय पक्ष आजवर घेत आले आहेत.म्हुणुन तर हवालदारजींनी सांगितल्याप्रमाणे वीज, रस्ते व पाणी हे मुलभूत प्रश्न आजही तसेच असह्य आहेत. जमल्यास सर्व मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!

In reply to by आयुर्हित

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय ते आता उघड आहे. अशांना सत्तेत येऊ दिलं नाही की झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 10/04/2014 - 10:08
धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? याचे उत्तर आहे :कॉंग्रेसच! कॉंग्रेसच आजपर्यंत स्वत:ला "धर्मनिरपेक्ष" म्हणवते आणि बरोबर मतदानाच्या आधी जामा मस्जिदच्या शाही इमामांना भेटते व सर्व मुसलमानांना भावनिक आवाहन करते कि कॉंग्रेसला मतदान करा. पण ह्या वेळेला सर्व मुसलमान बंधूंना कळून चुकले आहे कि कॉंग्रेस मुसलमानांचा कसा (गैर)वापर करून घेते ते! हे वाचा: Voting for Congress is betrayal of Islam, says Shia cleric Maulana Kalbe Jawwad आज आपल्या बाजूने कोणता पक्ष आहे हे ही सर्वांना कळून चुकले आहे. हे ही वाचा: जाफर आता मोदींचा खंदा समर्थक BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

In reply to by आयुर्हित

कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हो का! मग सभेच्या वेळेला बांग लागल्यावर भाषण बंद करणारे कोणती अधार्मिकता पसरवत होते? खरेतर २न्ही कडे लाऊडस्पीकर होते ना मग ज्याने त्याने आपले काम चालू ठेवणे म्हणजे भाषण करणार्‍याने भाषण करणे आणि बांग देणार्‍याने बांग देणे चालू ठेवायला पाहीजे होते. परंतु तसे होताना दिसले नाही. बाकी आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राममंदिराची उभारणी कुठे आणि बांग सुरु असतांना काही मिनीटं थांबणं कुठे... पण बुद्धीची झेपच इतकी मोठीये की तिथे सगळं सारखंच!

In reply to by संजय क्षीरसागर

वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध झेपेबद्द्ल (बुद्धीमांद्याबद्द्ल) इतकी खात्री आहे पाहून... खरंतर काहीच नाही वाटलं. :)

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 15/04/2014 - 18:06
With All Due Respect... रोजच्या आयुष्यात संघर्ष टाळून आपण आपला विकास करून घ्यावा हे मला पटतं. पण संघर्ष टाळण्याची किंमत द्यावी लागते, आणि आपण सांगितलेली किंमत भलतीच जास्त आहे. आणि पाकिस्तान आपल्याशी काश्मिर साठी लढतंय असं आपल्याला मनापासून वाटतं का? अहो काश्मिर नसते तर ते पंजाबसाठी लढले असते. ही डोकेदुखी काय पड खाऊन संपणारी आहे का?

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:37
>>> कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. राममंदीराची समस्या इतकी दशके चिघळत ठेवल्यामुळेच ती डोकेदुखी होऊन बसली आहे. जोपर्यंत तो विषय कायदेशीरदृष्ट्या सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्रास देणार. जर कायदेशीररित्या तो प्रश्न सुटला तर एक डोकेदुखी कायमची जाईल. कोणताही प्रश्न चिघळत ठेवल्याने डोकेदुखी होते. एकदा त्या प्रश्नाचा कायदेशीर निकाल लागला की तो प्रश्न सुटतो. १९७८ पासून १९९४ पर्यंत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न डोकेदुखी होऊन बसला होता. १९९४ मध्ये तो एकदाचा अधिकृतरित्या समाप्त झाला व नंतर लगेचच तो प्रश्न जनता विसरली. नामांतरानंतर सुरवातीला काही काळ काही घटकांमध्ये कदाचित नाराजी असेल, परंतु आता त्याचे नामोनिशाणदेखील नाही. राम मंदीराचा प्रश्न सुटला की असेच होईल व उलट हिंदू-मुस्लिमांमधील या प्रश्नावरून निर्माण झालेली तेढ नष्ट होईल. >>> काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. काश्मिर हे केवळ एक निमित्त आहे. काश्मिर नसेल तर पाकिस्तान भारताशी शत्रुत्व सुरू ठेवायला कोणता तरी दुसरा मुद्दा वापरेल. ब्रह्मदेव आला तरी भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हे माहिती असेल तर सांगा; मग पुढे ती (सध्या) नक्की कुणासाठी डोकेदुखी आहे ते पाहता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय. राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.

In reply to by आयुर्हित

मूळ मुद्दा तोच आहे.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22] On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wished
यावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मंदिराच्या राजकारणातून भाजपा नेत्यांनी बाहेर यावे.कदाचित त्यांच्यावर दबाव संघ मंडळींकडूनच येत असावा. (मोदी पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा असलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी संघाच्या हातातलं बाहुलं आहेत. संघानं अडवानींना संधी देऊन पाहिली पण आता त्यांच्याच्यानं ते होणार नाही म्हटल्यावर हा नवा गडी आणलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 12:43
मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! एवढा वरचा मूळ लेख, pictorial presentation वाचलच नाही असेच दिसते. काय म्हणायचे याला? पालथ्या घड्यावर पाणी.......................!!!!

In reply to by आयुर्हित

तरी म्हटलं तुम्ही ते ग्राफिकल प्रेझंटेशन (तुमच्या विचाराविरुद्ध असतांना) टाकलं कसं! दादाश्री, आतापर्यंत असले छपन्न मॅनिफेस्टो पब्लिकवर फेकून बिजेपी आणि काँग्रेस सत्तेवर आलेत. निवडून आल्यावर काहीही होत नाही इतपत समज एव्हाना यायला हवी. खरा मुद्दा कुणाचा मॅनिफेस्टो किती सुरेख धूळफेक करतो हा नाही, धार्मिक मुद्दा कोण कसा रेटतो हा आहे. भाजपनं तो निर्लज्जपणा घोषणापत्रात खुलेआम केलायं आणि सोनियाजींनी इमामांचं समर्थन मिळवून केलायं इतकाच काय तो फरक!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 13:12
कोण किती सुरेख धूळफेक करतो, हे कळले आहे सर्वांना, म्हणून गालात पडत असते दर दोन दिवसांनी. आपणही राजघाटावर जाऊन,आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे हेच बरे होईल. एवढेच म्हणतो.

In reply to by आयुर्हित

संपत 11/04/2014 - 13:52
जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम मंदिराचा मुद्दा हाच खरा कळीचा मुद्दा आहे याची जाणीव विरोधकांना आहे आणि भाजपलादेखील. तुम्हाला ती जाणीव नाही हा तुमचा भोळेपणा आहे. त्या एका ओळीत भाजपने सांगितले आहे कि आम्ही तेच आहोत जे २० वर्षांपूर्वी होतो.

In reply to by संपत

विकास 11/04/2014 - 16:53
राम जन्मभूमी, समान नागरी कायदा आणि ३७० कलम हे मुद्दे भाजपाच्या १३ दिवस, १३ महीने आणि ४.५ वर्षांच्या राजवटीच्या काळात देखील जाहीरनाम्यात होते. त्यात नवीन काहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 01:54
धूळफेक का काय माहीत नाही... कारण अजून भाजपाचे म्हणून सरकार आलेले नाही. जे आले ते रालोआ चे आले होते. आत्ता देखील रालोआचेच आले तर येईल. भाजपाला २७२+ मिळतील असे कुणाला वाटत तरी नाही. त्यामुळे अशा सरकार मधे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवला जातो. तोच राबवला जाईल. चंद्राबाबूंनी तात्काळ रामजन्मभूमीवरून नाराजी व्यक्त केली आहेच... त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही. तरी देखील धूळफेक असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा की! का एकीकडे टिका पण करायची आणि दुसरीकडे मंदीर वही बनाएंगे म्हणायचे असा बेत आहे?

In reply to by विकास

राममंदिरासारख्या छपरी मुद्यात मला काहीएक रस नाही कारण त्यानं देशाचं काडीमात्र भलं होणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला शेवटचा भाग व्यर्थ आहे. तत्पूर्वी तुम्ही म्हटलंय :
त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.
तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 13:59
राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये. परत तेच... जे कायम जाहीर केले आहे ते सुप्त कसे काय?

In reply to by विकास

राममंदिर हा जर मॅनिफेस्टोचा जाहीर भाग आहे तर इतके दिवस मी एकच गोष्ट सांगतोयं ती आपसूक सिद्ध झाली!
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 20:00
सर्वप्रथम मॅनिफेस्टो नावाचे एक डॉक्यूमेंट असते हे तुम्हाला आता एकदाचे मान्य झाल्याचे पाहून आनंद झाला. :) केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत). केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे. भारतीय सामान्य जनता ही भारतातील तथाकथीत बुद्धीवाद्यांसारखी नसल्याने ती फार त्यांच्या मागे जाईल असे वाटत नाही. तसे देखील म्हणूनच आता केजरीवालांनी दिल्लीत (पडलो तरी नाक वर स्टाईलमधे, पण) मुख्यमंत्रीपद सोडून चूक केली असे मान्य केले आहे. मोदींचा हेतू अंतस्थ नाही कारण जे कायमच जाहीर केलेले आहे ते अंतस्थ कसे? बरं हिंदूत्व आणि विकास एकत्र नसते असे कोणी सांगितले? हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?

In reply to by विकास

राममंदिर बांधणे हा उघड हेतू आहे हे तुम्हाला मान्य आहे त्यामुळे तो विषय संपला. तुमचे सगळे दिग्गज पाडापाडी आणि बांधकाम यात गुंतलेले आहेत हे Liberhan Commission रिपोर्टमधे उघड झालंय
On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.
त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत. किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते. बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.

In reply to by विकास

अर्धवटराव 12/04/2014 - 21:04
केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.
आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 03:21
मुद्दा मांडता येत नसेल तर वैयक्तीक प्रतिसाद द्यायचं हि तुमची नेहमीची सवय. आलात आपल्या मुळपदावर. चालायचच.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 13/04/2014 - 00:28
संजय क्षीरसागरजी, राममंदिराच्या मुद्द्यावर अद्वातद्वा बोलायची गरज नाही. आपण अधिक न बोलाल तर बरे होईल! इंगजी कळत असेल तर Mind your language. आणि हो, देशाचं भलं कसे होईल यासाठी आमचे सुज्ञ राजकीय नेते नक्कीच काम करत आहेत, यापुढेही करत राहणारही आहेत, मध्यातून पळून न जाता!

In reply to by विकास

संपत 12/04/2014 - 12:37
त्यात नवीन काहीच नाही.
मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.

In reply to by संपत

विकास 12/04/2014 - 14:03
निधार्मिकतेच्या गप्पा मारत काँग्रेस मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना भेटते, केजरीवाल मधेच थांबतात, कुमार विश्वास ९/११ ने अमेरीकेची कशी जिरली हे मुसलमानांच्या सभेत बोलतो, सप बद्दल तर बोलायलाच नको. असे अजून बरेच सांगता येईल. त्यामुळे जे काही आहोते ते प्रामाणिकपणे सांगितलेले चांगले का नाटकीपणाने सेक्यूलॅरीझम म्हणणे चांगले?

In reply to by संपत

अर्धवटराव 12/04/2014 - 20:57
आपले राजकारणी सद्भावी नाहित तर शहाणे आहेत. अफाट पैसा, प्रगतीच्या अमाप संधी, 'आहे रे' आणि युवा वर्गाचं वाढत्या मागणीचं प्रेशर, पक्षांतर्गत सर्वोच्च पातळीवर आर्थीक आणि जागतीक जाणिवेचं भान, जागतीक सत्तास्पर्धेत नव्यानं वठवायच्या भुमीकेची जबरदस्ती...अशा असंख्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे राममंदीर वगैरे मुद्दे कुठल्याच पक्षाचं मुख्य धोरण बनुच शकत नाहि. सत्ताकारणात प्रत्येक मुद्याचं एक लाइफ असतं. राममंदीराचा रोल इज डॉर्मंट नाऊ. तो मुद्दा परत तसाच तापायला जी भट्टी लागेल तशी भट्टी परत तयार होण्याचे चान्सेस एक दशकभर तरी नाहित. जर ति तापलीच तर भाजपा, काँग्रेस त्याचा फायदा घेतीलच, पण ते लोणि खाण्याची सर्वात केवीलवाणि धडपड आआप करेल.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 01:22
राम मंदिर (आणि एकूणच हिंदुत्व) हा पक्षाचा मुख्य मुद्दा नसून संघाचा मुख्य मुद्दा आहे. पूर्ण बहुमत आलेच तर ह्या मुद्द्यांचे दडपण मोदींवर नक्कीच येणार. मोदींनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवावे ही अपेक्षा(म्हणजेच आदेश) नक्कीच असणार. म्हणजे सगळे मोदींच्या तारतम्यावर अवलंबून. बाकी ही भट्टी प्रमाणाबाहेर पेटली तर कोण लोणी खातोय यापेक्षा देश भस्मसात होईल का ही चिंता मला जास्त आहे. यादवीमुळे उध्वस्त झालेल्या अनेक देशांची उदाहरणे उपलब्ध आहेत.

In reply to by संपत

अर्धवटराव 13/04/2014 - 03:47
माझा अंदाज असा कि मोदि इतरांना सत्तेकडे घेऊन चालले आहेत, संघ नाहि. आणि जिथवर माझा संघाबद्दल अभ्यास आहे, त्यानुसार संघ कुणा पंडे वा बडव्यांची संघटना नाहि. राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत. पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad
विटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत." इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही! आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं." धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 17:53
अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.
वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.
हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.
आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीय
जळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.
धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.
पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 11:52
पण भाजपच्या नाड्या संघाच्याच हातात आहे. संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही. राम मंदिराचा प्रश्न संपला असे मला वाटत असतानाच ह्या जाहीरनाम्यात तो संघाने टाकायला लावला. दुर्दैवाने भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर नक्कीच मोदीना त्याबाबतीत पावले उचलावीच लागतील. देशाच्या सुदैवाने अडवाणी संधीसाधू असले तरी कचखोर होते. मोदी हे चांगल्या आणि वाईट अर्थाने कणखर आहेत. आणि राम मंदिर हे प्रतिक आहे, ते शांततेने झालेच (जे अशक्य वाटते)तर नंतर काशी, मथुरा,हिंदुराष्ट्र, आसिंधुसिंधू भारतवर्ष हे सगळ येईलच. ५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.

In reply to by संपत

करेक्ट! खरं तर हिंम्मतच नाही! मोदींना वाटायला लागलं होतं की ते आता `विकास पुरुष' झाले (आणि पुढे `पंतप्रधान' होणार!) म्हणून राममंदिराचा मुद्दा ते शेवटपर्यंत बाजूला सारायचा प्रयत्न करत होते (कारण साला आधीचा झेंगट काय कमीये!). पण मुरली मनोहर जोशींनी त्यांना त्यांची (खरी) जागा दाखवून दिली (...अबे बागडू तेरे को बिजेपीने इसलीये प्रायमिनिस्टरियल कँडिडेट बनाया के तू राममंदिर बनायेगा और तू पल्टी मार रहा है? अडवानीको इसलीये नीचे बिठाया की अब उनकी उम्र बीत गयी. लेकीन तुम अगर लाईन बदलोगे तो पार्टी तुम्हारा बाजा बजा देगी!)
There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.
Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".
आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :
Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."
आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

अंगलट आलेले प्रकरण

खटपट्या ·

पैसा 06/04/2014 - 13:16
भारी किस्सा. असले प्रकार गर्दीच्या वेळी नेहमीच होतात. अगदी जुन्या स्टाफकडूनही होतात! आणि आता नव्या आयटी ऑफिसरांना असे हरकाम्या म्हणून वापरणे हेही नेहमीचेच झाले आहे!

स्पंदना 06/04/2014 - 16:19
आई ग!! खरच आठ हजार मिळताच डोळेच काय पण डोकेही फिरले असावे त्या माणसाचे. (माझे सुद्धा प्रतिसाद हे एका साध्या सदस्याचे प्रतिसाद असतात. हव तर स्त्री सद्स्याचे म्हणा)

शशिकांत ओक 06/04/2014 - 21:47
छान लेख... पैसे परत मिळाले ... पोलिसखात्यातील व्यक्तीच्या धाकाचा परिणाम! असाच एक किस्सा येतोय पुढील कथनातून...

पैसा 06/04/2014 - 13:16
भारी किस्सा. असले प्रकार गर्दीच्या वेळी नेहमीच होतात. अगदी जुन्या स्टाफकडूनही होतात! आणि आता नव्या आयटी ऑफिसरांना असे हरकाम्या म्हणून वापरणे हेही नेहमीचेच झाले आहे!

स्पंदना 06/04/2014 - 16:19
आई ग!! खरच आठ हजार मिळताच डोळेच काय पण डोकेही फिरले असावे त्या माणसाचे. (माझे सुद्धा प्रतिसाद हे एका साध्या सदस्याचे प्रतिसाद असतात. हव तर स्त्री सद्स्याचे म्हणा)

शशिकांत ओक 06/04/2014 - 21:47
छान लेख... पैसे परत मिळाले ... पोलिसखात्यातील व्यक्तीच्या धाकाचा परिणाम! असाच एक किस्सा येतोय पुढील कथनातून...
श्री शशिकांत ओक यांच्या http://www.misalpav.com/node/27497#new या धाग्यावरून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा केलेला प्रयत्न १९९५/९६ ची गोष्ट असेल. मी एका सहकारी बँकेत आय टी विभागात होतो. त्यावेळेचे बँकिंग चे माहिती तंत्रज्ञान आगदीच बाळबोध होते म्हणायला हरकत नाही (नेट्वर्किंग च्या दृष्टीकोनातून) सर्व शाखा एकमेकांशी जोडलेल्या नव्हत्या. प्रत्येक बँकेचा आय टी सेट अप स्वतंत्र असे. त्यामुळे प्रत्येक शाखेत एक किंवा दोन शाखांमध्ये मिळून एक असा आय टी चा माणूस नेमलेला असे. मी ज्या शाखेत होतो त्या शाखेत तर आठवड्याला एखाद दुसरा प्रोब्लेम येत असे. बाकी वेळ मी नुसता बसून राहत असे. वाचणार तरी किती.

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

नोकरी विषयी माहिती पाहिजे

वासु ·

वेल्लाभट 31/12/2013 - 10:53
असं दालनच सुरू करावं हे मी आधी एकदा सुचवलेलं. म्हणजे काय, सगळ्यांना नोकरीच्या संधी आणि शोध दोन्हीसंबंधी आपापल्या गरजा पोस्ट करता येतील. नाही का. किंवा जस्ट धागे असले तरी बेस्ट. की बाबा, पुण्यातील नोकरी; मुंबईतील नोकरी... असं वर्गीकरण करून.

कलंत्री 31/12/2013 - 11:48
माझ्या पुतण्याने वरद टॅलेंट नावाची प्लेसमेंट चे काम सुरु केले आहे. सध्या तो इमारत बांधणीसाठी काम करत आहे. आपण varadtalent@gmail.com वर आपली व्यावसायिक माहिती ( रिसुमे) पाठवू शकता.

In reply to by वासु

यसवायजी 31/12/2013 - 17:03
मी माझा रिसुमे नक्की पाठवेल पाठवा. पण तुमच्या 'रिसुमे'त एवढ्या स्पेलिंग/ग्रामॅटीकल मिस्टेक करु नका. (हघ्या)

काळा पहाड 31/12/2013 - 12:40
हे थोडंसं विषयांतर होतंय, पण बाहेर नोकरी करायला हरकत काय आहे? मराठी माणसांचा हा सगळ्यात मोट्ठा प्रॉब्लेम आहे. त्यांना नोकरी शक्य तर महाराष्ट्रातच हवी, पुण्यातली बेष्ट, सेनापती बापट रोड वर ऑफिस असेल तर दुधात साखर आणि कंपनी अमेरिकेला पाठवायला तयार असेल तर आंबा रबडी. अरे जा ना जरा बाहेरच्या प्रदेशात, घ्या अनुभव वेगळ्या परिस्थीतीत रहाण्याचा. मी ज्यांचा इंटर्व्ह्यू घेतला आहे, त्यांना मी एक प्रश्ण मी विचारतोच. लोकेशन चा काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे कंपनी जर दुसर्‍या देशात, प्रदेशात पाठवत असेल तर काही ऑब्जेक्षन्स आहेत का. बरेच लोक सांगतात की हो, काही प्रॉब्लेम नाही ते लाँग टर्म ला यु एस, यु के कुठेही जायला तयार आहेत. मग मी त्यांना सांगतो की प्रदेश म्हणजे चेन्नई, गुरगाव, कोची सुद्धा असू शकेल, ज्याला मात्र ते नकार देतात. हे सांगायलाच नको की अशा लोकांना मी सिलेक्ट करत नाही.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 31/12/2013 - 13:01
+१११११११११११११११११११११११११११११. पूर्ण सहमत. मराठी माणूस इतका संकुचित गेल्या चाळीसेक वर्षांतच झालाय. शेवटी लाँगटर्मला महाराष्ट्रात रहा पण तीनचार वर्षे बाहेर काढली तर नुकसान काही नाही उलट फायदाच आहे.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 31/12/2013 - 14:07
+१११११११११. कुठेही जा. मजेत काम करा. आनंदात नि निरोगी रहा. -सुरुवातीला आजचा दिवस काढायचा असं 'वन डे अ‍ॅट अ टाईम' केलेला प्यारे

In reply to by काळा पहाड

अतिशय बरोबर ! अहो खुप सारे मराठी राह्तात बाहेर हि ! गुरगाव मदे किति दाख्वु ? मी स्वतहा ९ वर्शापासुन आहे इथे.

In reply to by काळा पहाड

पैसा बोलतो… बाहेरच्या देशात पाठवला तर भारतातल्या चार पट पैसा मिळतो म्हणून तिथे त्रास सहन करायला काही वाटत नाही. म्हणजे निदान त्रास सहन करण्याला कारण तरी आहे. फक्त अनुभव म्हणून भारतात तरी दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहणे काही फार आनंददायक नाही असे मला वाटते. मग पर्याय उपलब्ध असेल तर आपली सोय कशाला सोडावी. मी मैसूर व चेन्नईला राहून पहिले आहे, मजा नाही राव!! अवांतर : आणि तुम्ही फक्त लोकेशन प्रेफ़ेरन्स मुळे रिजेक्ट करून अन्याय नाही का करत एखाद्या उमेदवारावर! (अर्थात तशी एचआर ची पॉलिसी किंवा सूचना असेल तर गोष्ट निराळी).

वासु 31/12/2013 - 14:04
बाहेरील प्रदेशातील अनुभव आले आहेत म्हणुनच चेन्नई, गुरगाव सारख्या ठिकाणी नको वाटत. अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही. अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही. अनुभव ३. फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने). मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.

In reply to by वासु

प्रसाद१९७१ 31/12/2013 - 14:15
इतके काही अवघड नाहीये. अनेक मराठी तर रहातात च आहेत पण मराठीं पेक्षा गुजराथी, पंजाबी, बिहारी, दिल्ली वाले खुप रहातात. त्यांना कसे जमते?
अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.
हा तुमचा problem आहे. आधी लोक तुमचा बद्दल काहीतरी सिक्रेट बोलत असतील किंवा वाईट बोलत असतील हा तुमच्या मनाचा ग्रह आहे. त्याच्यावर तुम्ही काम केले पाहीजे.
अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.
तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).
वर उल्लेख केलेली लाखो माणसे रहात आहेत, तुम्हाला काय प्रोब्लेम. हल्ली वडगाव बुद्रुक ला सुद्धा सर्व मिळते. हैद्राबाद, चेन्नई चा तर प्रश्न च नाही. मला वाटते, तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे.

In reply to by प्रसाद१९७१

परिंदा 31/12/2013 - 15:13
हैद्राबादेत अनेक करी सेंटर आहेत तिथे चपात्या, फुलके मिळतात. जेवणाचा काही प्रोब्लेम नाही. हैद्राबाद्-पुणे १२ तास प्रवास आहे. मी तिथे २ वर्षे राहिलो आहे. मला तरी काहीच प्रोब्लेम नाही आला.

In reply to by वासु

बॅटमॅन 31/12/2013 - 14:17
१ व २. हैदराबादेस तरी भाषेचा प्रॉब्लेम नसतो. चेन्नैबद्दल सहमत. पण भाषा शिकणे काही अवघड नाही. आणि मी हे वैयक्तिक मत म्हणूनच सांगत नाहीये. माझे लै मित्र आहेत ज्यांना भाषा विषयात वट्ट इंट्रेस नसून अन मातृभाषा नसूनही तेलुगु, बंगाली, कन्नड, इ. शिकलेत अन तेसुद्धा मजेमजेत वर्षभरात. त्यामुळे हा मुद्दा होऊच शकत नाही. बाकी सोडा, तंजावुरसारख्या ठिकाणी तमिळचा त न शिकताही चार वर्षे राहिलेला माझा बिहारी मित्र आहे. काय जास्त अडत नाही म्हटला. ३. तेवढे अ‍ॅडजस्ट करता येत नसेल तर कसं हो चालायचं, मी स्वतः बंगालमध्ये होतो दोन वर्षे अन बंगळुरात चारेक म्हयने. तांदळाचे पदार्थ अ‍ॅडजस्ट करणे सोप्पे आहे. बंगाली जेवण मात्र हॉरिबल असायचे-किमान राहायचो तिथले. पण तरी मार्ग होतेच. इतकेही काही अडत नाही. अन शेवटी असं आहे, आपलं गाव सोडायचंच नसेल तर पुण्याच्या तुलनेत मुंबैमध्ये (किंवा उल्टं) कसं कायकाय नस्तं वगैरे सांगणारेही लै असतात. त्यामुळे असोच. :D

In reply to by वासु

आनंदराव 31/12/2013 - 14:25
आहो, या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पहा. ईतर ठीकाणी गेल्यावर निरनिराळ्या स्वभावाच्या लोकांशी भेती होतात. इतर. ठीकाणी , नवे खाद्यपदार्थ कुठे मिळतात ते शोधा. आणि लोक कय बोलतात तुमच्याबद्दल त्याचा विचार त्य्यांना करु दे कि. तुम्ही तो विचार करुन तुमच्या आयुष्यात येणार्‍या संधी का नाकारताय? बाहेरच्या प्रदेशात गेल्यामुळे नविन लोकंना भेतल्यामुळे तुमचे आयुष्य अनुभवसंपन्न होइल. चाकोरी सोडा हो.

In reply to by वासु

काळा पहाड 31/12/2013 - 15:57
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).
मी राहीलोय ना चेन्नई मध्ये काही वर्षे. बाकी तुम्हाला अमेरिकेत रहायला जमते ना? मग चेन्नई का नाही? तिथे पण अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते. इथे पण. अमेरिकेत किती वेळा बाहेर जाऊन पोळीभाजी खाऊ शकता? बाकी मी तुम्हाला चेन्नई मधली हॉटेल्स दाखवतो जिथे पोळी भाजी / रोटी सुद्धा मिळते. मी चेन्नइ मध्ये असताना एक मंत्र जपायचो. "भात हा जगातला सर्वात चविष्ट पदार्थ आहे". पहा वापरून फायदा होतो की नाही.
त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.
लोक तुमच्या बद्दल शिक्रेट बोलतात? आणि तुम्हाला ते काय बोलतात ते कळत नाही पण ते शिक्रेट आहे हे कळतं?
अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.
महाराष्ट्रात येतं का अर्ध्या लोकांना इंग्लिश? मग तामिळ लोक रहातात का तिथेच यांना येत नाही म्हणून? का नाही तुम्ही तामीळ शिकत? पोडा..
मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही?

In reply to by वासु

दाते प्रसाद 02/01/2014 - 09:49
मी २००६ पासून हैदराबाद , चेन्नई , अणि बंगलोर मध्ये कामाकरता राहत /फिरत आहे.हैदराबादेत भाषेचा मुळीच प्रश्न आला नाही , उलट हिंदी भाषेमुळे काम करणं सोपं झालं.ज्यांना इंग्लिश येत नाही , त्यांना हिंदी तर नक्कीच येतं. चेन्नैत सुध्दा भाषेचा फारसा प्रश्न आला नाही

>>>मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल.>> अत्यंत विनोदी विधान. कुठे असतात बरे सॉफ्टवेअर कंपनी? आजकाल क्लायंटकडुन पैसे मिळवुन देणारी x,y,z कामे करणार्‍या कंपनीच सर्वत्र सापडतील. त्या कामाला सॉफ्टवेअर म्हणायचे असल्यास म्हणा बुवा...असो. मी पण एका "सॉफ्ट्वेअर कम्पनी " मधे नोकरी करतो..तुम्हाला ईमेल व्यनि करतो ..cv पाठवा

दिव्यश्री 31/12/2013 - 15:19
तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?>>> +१ जर्मनी मध्ये भाषेचा भयंकर problem आहे.... हॉस्पिटल्स मध्येही बरेच वेळा English न समजणारे,बोलणारे असतात.खूप त्रास होतो सुरवातीला ... :(

vrushali n 01/01/2014 - 15:58
कुणाला मेनफ्रेम मधील ओपनींग माहीती असल्यास सांगावे,माझी बहीणील ३+ वर्ष मेनफ्रेम कॉग्नीझंट मधील अनुभव आहे.

व्यनि म्हव्यन्त्य सदस्याला व्यक्तिगत निरोप पाठवा... सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही? काळा पहाड जी शी सहमत!

वेल्लाभट 31/12/2013 - 10:53
असं दालनच सुरू करावं हे मी आधी एकदा सुचवलेलं. म्हणजे काय, सगळ्यांना नोकरीच्या संधी आणि शोध दोन्हीसंबंधी आपापल्या गरजा पोस्ट करता येतील. नाही का. किंवा जस्ट धागे असले तरी बेस्ट. की बाबा, पुण्यातील नोकरी; मुंबईतील नोकरी... असं वर्गीकरण करून.

कलंत्री 31/12/2013 - 11:48
माझ्या पुतण्याने वरद टॅलेंट नावाची प्लेसमेंट चे काम सुरु केले आहे. सध्या तो इमारत बांधणीसाठी काम करत आहे. आपण varadtalent@gmail.com वर आपली व्यावसायिक माहिती ( रिसुमे) पाठवू शकता.

In reply to by वासु

यसवायजी 31/12/2013 - 17:03
मी माझा रिसुमे नक्की पाठवेल पाठवा. पण तुमच्या 'रिसुमे'त एवढ्या स्पेलिंग/ग्रामॅटीकल मिस्टेक करु नका. (हघ्या)

काळा पहाड 31/12/2013 - 12:40
हे थोडंसं विषयांतर होतंय, पण बाहेर नोकरी करायला हरकत काय आहे? मराठी माणसांचा हा सगळ्यात मोट्ठा प्रॉब्लेम आहे. त्यांना नोकरी शक्य तर महाराष्ट्रातच हवी, पुण्यातली बेष्ट, सेनापती बापट रोड वर ऑफिस असेल तर दुधात साखर आणि कंपनी अमेरिकेला पाठवायला तयार असेल तर आंबा रबडी. अरे जा ना जरा बाहेरच्या प्रदेशात, घ्या अनुभव वेगळ्या परिस्थीतीत रहाण्याचा. मी ज्यांचा इंटर्व्ह्यू घेतला आहे, त्यांना मी एक प्रश्ण मी विचारतोच. लोकेशन चा काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे कंपनी जर दुसर्‍या देशात, प्रदेशात पाठवत असेल तर काही ऑब्जेक्षन्स आहेत का. बरेच लोक सांगतात की हो, काही प्रॉब्लेम नाही ते लाँग टर्म ला यु एस, यु के कुठेही जायला तयार आहेत. मग मी त्यांना सांगतो की प्रदेश म्हणजे चेन्नई, गुरगाव, कोची सुद्धा असू शकेल, ज्याला मात्र ते नकार देतात. हे सांगायलाच नको की अशा लोकांना मी सिलेक्ट करत नाही.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 31/12/2013 - 13:01
+१११११११११११११११११११११११११११११. पूर्ण सहमत. मराठी माणूस इतका संकुचित गेल्या चाळीसेक वर्षांतच झालाय. शेवटी लाँगटर्मला महाराष्ट्रात रहा पण तीनचार वर्षे बाहेर काढली तर नुकसान काही नाही उलट फायदाच आहे.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 31/12/2013 - 14:07
+१११११११११. कुठेही जा. मजेत काम करा. आनंदात नि निरोगी रहा. -सुरुवातीला आजचा दिवस काढायचा असं 'वन डे अ‍ॅट अ टाईम' केलेला प्यारे

In reply to by काळा पहाड

अतिशय बरोबर ! अहो खुप सारे मराठी राह्तात बाहेर हि ! गुरगाव मदे किति दाख्वु ? मी स्वतहा ९ वर्शापासुन आहे इथे.

In reply to by काळा पहाड

पैसा बोलतो… बाहेरच्या देशात पाठवला तर भारतातल्या चार पट पैसा मिळतो म्हणून तिथे त्रास सहन करायला काही वाटत नाही. म्हणजे निदान त्रास सहन करण्याला कारण तरी आहे. फक्त अनुभव म्हणून भारतात तरी दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहणे काही फार आनंददायक नाही असे मला वाटते. मग पर्याय उपलब्ध असेल तर आपली सोय कशाला सोडावी. मी मैसूर व चेन्नईला राहून पहिले आहे, मजा नाही राव!! अवांतर : आणि तुम्ही फक्त लोकेशन प्रेफ़ेरन्स मुळे रिजेक्ट करून अन्याय नाही का करत एखाद्या उमेदवारावर! (अर्थात तशी एचआर ची पॉलिसी किंवा सूचना असेल तर गोष्ट निराळी).

वासु 31/12/2013 - 14:04
बाहेरील प्रदेशातील अनुभव आले आहेत म्हणुनच चेन्नई, गुरगाव सारख्या ठिकाणी नको वाटत. अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही. अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही. अनुभव ३. फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने). मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.

In reply to by वासु

प्रसाद१९७१ 31/12/2013 - 14:15
इतके काही अवघड नाहीये. अनेक मराठी तर रहातात च आहेत पण मराठीं पेक्षा गुजराथी, पंजाबी, बिहारी, दिल्ली वाले खुप रहातात. त्यांना कसे जमते?
अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.
हा तुमचा problem आहे. आधी लोक तुमचा बद्दल काहीतरी सिक्रेट बोलत असतील किंवा वाईट बोलत असतील हा तुमच्या मनाचा ग्रह आहे. त्याच्यावर तुम्ही काम केले पाहीजे.
अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.
तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).
वर उल्लेख केलेली लाखो माणसे रहात आहेत, तुम्हाला काय प्रोब्लेम. हल्ली वडगाव बुद्रुक ला सुद्धा सर्व मिळते. हैद्राबाद, चेन्नई चा तर प्रश्न च नाही. मला वाटते, तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे.

In reply to by प्रसाद१९७१

परिंदा 31/12/2013 - 15:13
हैद्राबादेत अनेक करी सेंटर आहेत तिथे चपात्या, फुलके मिळतात. जेवणाचा काही प्रोब्लेम नाही. हैद्राबाद्-पुणे १२ तास प्रवास आहे. मी तिथे २ वर्षे राहिलो आहे. मला तरी काहीच प्रोब्लेम नाही आला.

In reply to by वासु

बॅटमॅन 31/12/2013 - 14:17
१ व २. हैदराबादेस तरी भाषेचा प्रॉब्लेम नसतो. चेन्नैबद्दल सहमत. पण भाषा शिकणे काही अवघड नाही. आणि मी हे वैयक्तिक मत म्हणूनच सांगत नाहीये. माझे लै मित्र आहेत ज्यांना भाषा विषयात वट्ट इंट्रेस नसून अन मातृभाषा नसूनही तेलुगु, बंगाली, कन्नड, इ. शिकलेत अन तेसुद्धा मजेमजेत वर्षभरात. त्यामुळे हा मुद्दा होऊच शकत नाही. बाकी सोडा, तंजावुरसारख्या ठिकाणी तमिळचा त न शिकताही चार वर्षे राहिलेला माझा बिहारी मित्र आहे. काय जास्त अडत नाही म्हटला. ३. तेवढे अ‍ॅडजस्ट करता येत नसेल तर कसं हो चालायचं, मी स्वतः बंगालमध्ये होतो दोन वर्षे अन बंगळुरात चारेक म्हयने. तांदळाचे पदार्थ अ‍ॅडजस्ट करणे सोप्पे आहे. बंगाली जेवण मात्र हॉरिबल असायचे-किमान राहायचो तिथले. पण तरी मार्ग होतेच. इतकेही काही अडत नाही. अन शेवटी असं आहे, आपलं गाव सोडायचंच नसेल तर पुण्याच्या तुलनेत मुंबैमध्ये (किंवा उल्टं) कसं कायकाय नस्तं वगैरे सांगणारेही लै असतात. त्यामुळे असोच. :D

In reply to by वासु

आनंदराव 31/12/2013 - 14:25
आहो, या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पहा. ईतर ठीकाणी गेल्यावर निरनिराळ्या स्वभावाच्या लोकांशी भेती होतात. इतर. ठीकाणी , नवे खाद्यपदार्थ कुठे मिळतात ते शोधा. आणि लोक कय बोलतात तुमच्याबद्दल त्याचा विचार त्य्यांना करु दे कि. तुम्ही तो विचार करुन तुमच्या आयुष्यात येणार्‍या संधी का नाकारताय? बाहेरच्या प्रदेशात गेल्यामुळे नविन लोकंना भेतल्यामुळे तुमचे आयुष्य अनुभवसंपन्न होइल. चाकोरी सोडा हो.

In reply to by वासु

काळा पहाड 31/12/2013 - 15:57
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).
मी राहीलोय ना चेन्नई मध्ये काही वर्षे. बाकी तुम्हाला अमेरिकेत रहायला जमते ना? मग चेन्नई का नाही? तिथे पण अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते. इथे पण. अमेरिकेत किती वेळा बाहेर जाऊन पोळीभाजी खाऊ शकता? बाकी मी तुम्हाला चेन्नई मधली हॉटेल्स दाखवतो जिथे पोळी भाजी / रोटी सुद्धा मिळते. मी चेन्नइ मध्ये असताना एक मंत्र जपायचो. "भात हा जगातला सर्वात चविष्ट पदार्थ आहे". पहा वापरून फायदा होतो की नाही.
त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.
लोक तुमच्या बद्दल शिक्रेट बोलतात? आणि तुम्हाला ते काय बोलतात ते कळत नाही पण ते शिक्रेट आहे हे कळतं?
अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.
महाराष्ट्रात येतं का अर्ध्या लोकांना इंग्लिश? मग तामिळ लोक रहातात का तिथेच यांना येत नाही म्हणून? का नाही तुम्ही तामीळ शिकत? पोडा..
मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही?

In reply to by वासु

दाते प्रसाद 02/01/2014 - 09:49
मी २००६ पासून हैदराबाद , चेन्नई , अणि बंगलोर मध्ये कामाकरता राहत /फिरत आहे.हैदराबादेत भाषेचा मुळीच प्रश्न आला नाही , उलट हिंदी भाषेमुळे काम करणं सोपं झालं.ज्यांना इंग्लिश येत नाही , त्यांना हिंदी तर नक्कीच येतं. चेन्नैत सुध्दा भाषेचा फारसा प्रश्न आला नाही

>>>मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल.>> अत्यंत विनोदी विधान. कुठे असतात बरे सॉफ्टवेअर कंपनी? आजकाल क्लायंटकडुन पैसे मिळवुन देणारी x,y,z कामे करणार्‍या कंपनीच सर्वत्र सापडतील. त्या कामाला सॉफ्टवेअर म्हणायचे असल्यास म्हणा बुवा...असो. मी पण एका "सॉफ्ट्वेअर कम्पनी " मधे नोकरी करतो..तुम्हाला ईमेल व्यनि करतो ..cv पाठवा

दिव्यश्री 31/12/2013 - 15:19
तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?>>> +१ जर्मनी मध्ये भाषेचा भयंकर problem आहे.... हॉस्पिटल्स मध्येही बरेच वेळा English न समजणारे,बोलणारे असतात.खूप त्रास होतो सुरवातीला ... :(

vrushali n 01/01/2014 - 15:58
कुणाला मेनफ्रेम मधील ओपनींग माहीती असल्यास सांगावे,माझी बहीणील ३+ वर्ष मेनफ्रेम कॉग्नीझंट मधील अनुभव आहे.

व्यनि म्हव्यन्त्य सदस्याला व्यक्तिगत निरोप पाठवा... सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही? काळा पहाड जी शी सहमत!
मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल. मी Oracle Database(SQL)मधे नोकरी शोधत आहे. मी नोकरीच्या साईट वर माझा CV टाकला आहे, पण मला जे offer येतात ते सगळे हैदराबाद, चेन्नई नाहितर दिल्ली च्या. काय करावे काही कळत नाही राव. मग मला मिपाची आठवण झाली, मिपा वर खुप सारे मन्डळी आहेत मला नक्की मदत मिळेल हि आशा. मिपा वर जर कोणी सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे असेल आणि तिथे जर जागा शिल्लक असेल तर जरुर कळवावे हि विनन्ती. आपल्या प्रतिसादान्ची वाट पाहेन. :-) धन्यवाद.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

ऑफीस ऑफीस...

मोदक ·

गवि 26/06/2013 - 11:06
बॉसच्या म्हणण्यात काहीतरी इतरांना न समजलेला अर्थ किंवा भाग असावा असं वाटतंय.. कदाचित त्याची मांडणी चुकली असावी.. :) दोन्ही रिपोर्ट्समधे इन देमसेल्व्हज काहीतरी इंटेग्रिटी प्रॉब्लेम जाणवला असेल आणि त्याच्या वाक्यरचनेत थोडं कन्फ्युझन झालं असेल असं वाटतं. म्हणजे प्रत्येक रिपोर्टमधली अ‍ॅन्युअल अ‍ॅव्हरेजेस वेगवेगळी येताहेत पण निदान मंथली नंबर्स, जे थेट कोणत्यातरी सिस्टीममधून बेस म्हणून उचलले आहेत ते तरी एकसमान असावेत अशा अर्थाने बेसमधेच लोचा आहे हे त्याला सांगायचं असावं. अशी अनेक उदाहरणं टीममधे पाहिली असल्याने शंका आली इतकंच. - (बॉस) गवि ;)

ब़जरबट्टू 26/06/2013 - 11:58
चायला... आम्ही हापसात मजा करायला जात नाय हो.. कारण. ब्वासच लय माजलेला हाय... :(..

गवि 26/06/2013 - 11:06
बॉसच्या म्हणण्यात काहीतरी इतरांना न समजलेला अर्थ किंवा भाग असावा असं वाटतंय.. कदाचित त्याची मांडणी चुकली असावी.. :) दोन्ही रिपोर्ट्समधे इन देमसेल्व्हज काहीतरी इंटेग्रिटी प्रॉब्लेम जाणवला असेल आणि त्याच्या वाक्यरचनेत थोडं कन्फ्युझन झालं असेल असं वाटतं. म्हणजे प्रत्येक रिपोर्टमधली अ‍ॅन्युअल अ‍ॅव्हरेजेस वेगवेगळी येताहेत पण निदान मंथली नंबर्स, जे थेट कोणत्यातरी सिस्टीममधून बेस म्हणून उचलले आहेत ते तरी एकसमान असावेत अशा अर्थाने बेसमधेच लोचा आहे हे त्याला सांगायचं असावं. अशी अनेक उदाहरणं टीममधे पाहिली असल्याने शंका आली इतकंच. - (बॉस) गवि ;)

ब़जरबट्टू 26/06/2013 - 11:58
चायला... आम्ही हापसात मजा करायला जात नाय हो.. कारण. ब्वासच लय माजलेला हाय... :(..
हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा.. एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. मंथली प्रेझेंटेशन सुरू होते.. माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती... शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.." अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला... आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अ‍ॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..?

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

जॅक डनियल्स ·

प्रचेतस 24/05/2013 - 12:16
एकदम सुरेख. आपले अनुभव वाचताना आम्हालाही ओळखीचे असूनही अनोळखीच राहिलेल्या सर्पविश्वाची उत्तम ओळख होते आहे.

In reply to by प्रचेतस

जॅक डनियल्स 24/05/2013 - 21:39
धन्यवाद ! अनोळखीच असते कारण आपण असे जंगलात साप शोधायला गेलो तर मिळायचे प्रमाण खूप कमी असते. पण ह्याच्या उलटे कॉंक्रीट च्या जंगलात ते आपल्या आजूबाजूलाच असल्यामुळे खूप वेळा आमना-सामना होतो.

मनिष 24/05/2013 - 12:57
तू/तुम्ही राहुल अल्वारेस ह्याचे पुस्तक वाचलंय का? तोही डिस्कवरीसाठी काम करतो असे ऐकले आहे! :-)

In reply to by मनिष

जॅक डनियल्स 24/05/2013 - 21:43
मी त्यांचे पुस्तक वाचले नाही, पण मिळाले तर नक्की वाचीन. भारतामधले सर्प किंव्हा प्राणी -पक्षी संशोधक या वाहिनी साठी काम करत असतात, पण काहीच लोक पडद्यावर येतात.

In reply to by जॅक डनियल्स

मनिष 24/05/2013 - 22:31
मी जमेल त्याला त्याचे पुस्तक सुचवत असतो - इथे ते ई-बुक मिळेल. त्याने १० वी नंतर १ वर्ष हाच अनुभव घेण्यासाठी दिले होते. http://www.gutenberg.org/ebooks/10347

In reply to by बॅटमॅन

५० फक्त 25/05/2013 - 00:32
+१००, लई भारी. माझ्या लहानपंणी घरात आलेले दोन साप, माझ्या मांजरांनी फाडुन टाकलेले प्रत्यक्ष पाहिले, आणि त्यानंतर सापांबद्दल एक प्रकारची कणव भरुन राहिली मनात का कोण जाणे.

In reply to by ५० फक्त

जॅक डनियल्स 25/05/2013 - 08:07
हो, मांजर सापांना अगदी हाल हाल करून मारते, कारण त्यांना याची भीती असते की, तो साप त्यांच्या पिल्लांना खाऊन टाकेल. तसेच मांजराच्या अंगावरच्या केंसामुळे त्याचे सापाच्या चाव्या पासून खूप वेळा संरक्षण होते.

In reply to by जॅक डनियल्स

पैसा 25/05/2013 - 11:06
मी लहान असताना आमच्याकडे एक मांजरी होती. ती घराबाहेर गवतात जाऊन तिथून मण्यारी पकडून घरात आणून आमच्या पुढ्यात एखादे गिफ्ट द्यावे तशी टाकायची. तिने माझ्या आठवणीत ९ मण्यारी मारल्या. इतर साप आमच्या पाठीमागे किती मारले असतील माहित नाही. तरी ती कधीही विषबाधा न होता १५ एक वर्षे जगली.

In reply to by पैसा

पिशी अबोली 26/05/2013 - 21:51
हो ना... मांजरींची ही वाईट खोड आहे. प्रत्येक मारलेली गोष्ट घरी आणून, दाखवून मग खातात..

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जॅक डनियल्स 24/05/2013 - 22:02
मास्तर लोक जास्त काही बोलायचे नाही कारण कॉलेज चे काम असायचे. सिंहगड कॉलेज हे डोंगरावर असल्याने तिथे सगळ्या प्रकारचे साप मिळायचे, नाग, घोणस (विषारी साप) पण मी तिकडे पकडले आहेत. तसेच आमचे हेड सर हे कोकणातले असल्याने त्यांना सापाबद्दल माहिती होती, त्यामुळे त्यांची मला पूर्ण सहमती असायची. कधी कधी तर सिंहगड च्या दुसऱ्या कॅम्पस (कोंढवा, कात्रज) मध्ये पण साप पकडायला जायचो. एकदाच फक्त, रसायनच्या तासाकडे लक्ष न देता भिंती वरच्या पालीचे निरीक्षण करत होतो, तेंव्हा मात्र मास्तरीण बाईनी बेक्कार झाडले होते...ती पाल खरच खूप लोभस होती :)

कोमल 24/05/2013 - 15:33
झ्याक वाट्या वाचून भौ..
अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !
:)) :)) रूबाबच की ओ... ;)

खबो जाप 24/05/2013 - 17:14
मला साप हा प्रकार किव्हा प्राणी म्हणा खूप म्हणजे खूप आवडतो . सापाच्या समोरून त्याच्या डोळ्यात रोखून बघण्यात एक निराळीच मजा येते. आता नोकरी मुळे जमत नाही पण आधी गावी आणि शेतात खुपदा सापाशी फाल्तुक खेळ करून बघितले आहेत. एक मात्र आहे कधी पकडू शकलो नाही एक दोनदा प्रयत्न केला पण लोकांनी डोक्याला नुसता शॉट दिला होता. त्यमुळे प्रत्येक वेळी साप मारावाच लागायचा, ३ ४ नाग आणि ४ ५ इतर साप उगाचच मनात नसताना मारावे लागले साला आमच्या घरात जेव्हा ६ ७ फुटाची पिवळी धमक धमन मारावी लागली होती तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आले होते, अजून सुधा तो प्रसंग आठवतो आणि अपराधी असल्यासारखे वाटते

In reply to by खबो जाप

जॅक डनियल्स 24/05/2013 - 23:47
धन्यवाद् ! अपराधी वाटून घेऊ नका. कारण ज्यांना साप पकडता येत नाही, त्यांनी त्यांच्या घरात आलेला साप तो पकडण्या पेक्षा मारलेले बरे.(हे खूप विवादास्पत वाक्य आहे.) पण विषारी विषारी साप पकडताना चुकून दात जरी घासून गेला तरी जीवावर बेतू शकते. आणि विषारी सर्पदंशावर औषधे आहेत पण ती घेतल्यावर होणारे परिणाम जेवढे वाटतात तेवढे साधे नाहीत. सापांचे दुरून निरीक्षण करणार असाल तर जरूर करा पण खेळ म्हणून पण पकडायचा प्रयत्न करू नका.

In reply to by जॅक डनियल्स

सुबोध खरे 25/05/2013 - 09:49
एकदम सहमत. एक जरी घोणस चावलेला माणूस तुम्ही पाहिलात तर त्याच्या अंगावर आलेले रक्ताचे फोड किंवा सुजलेला पाय पाहिला तर आयुष्यात सापाशी खेळ करायला कोणी जाणार नाही. अगदी ६ इंच लांबीचे फुरसे चावले तरी होणारी विषबाधा आणि तडफड पहिली कि कोकणात लोक साप दिसला कि का मारतात ते पटेल. http://www.indiamike.com/india/health-and-well-being-in-india-f2/snakebite-first-aid-t34506/ साप म्हणू नये धाकला नवरा म्हणू नये आपला

इनिगोय 24/05/2013 - 17:59
वा! वाचायला आवडतंय. शैक्षणिक वर्षात आपटी खाऊन मग वन्यजीवनाच्या अभ्यासाकडे वळलेल्या कृष्णमेघ कुंटेंची सहजच आठवण झाली.

In reply to by इनिगोय

जॅक डनियल्स 25/05/2013 - 08:20
"एका रानवेड्याची शोधयात्रा " खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. भारतात परीक्षेत नापास झाले की तुम्हाला जे काही सहन करायला लागते, त्याला तोडच नाही. ती पण शाळा कॉलेज ची परीक्षा, तुम्ही स्वतः बरोबर जसे काय आजूबाजूच्या १० लोकांचे आयुष्य उध्वस्त केले असे समजून लोकं टोमणे मारतात किंवा लुक्स देतात.

मदनबाण 24/05/2013 - 18:18
सुरेख लेखन ! साप दिसला की आधी लोक मारायला धावतात ! :( असे सापांनी केले असते तर ? माणुस दिलाच की चाव ! ;) घोरपडीवरुन आठवले... मध्यंतरी गणपती मधे आपच्या इथे अचानक एक मोठ्ठाली घोरपड प्रकट झाली होती,तिचा एक फोटो मोठ्या मुश्किलीने काढला होता,घरच्या संगणकात सापडला तर इथे देइन म्हणतो.

In reply to by मदनबाण

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:33
झकास फोटो आहे. मी दरवेळी घोरपड पकडताना हाच विचार करायचो "की हि घोरपड येथे आली कशी ? " मित्रमंडळ रोड च्या बैठ्या घरांमध्ये एका बाथरूम मध्ये एक घोरपड होती, मला त्या माणसाने, फोन वर एक मोठी पाल आहे किंवा तसाच एक मोठा सरडा आहे असे सांगितले होते...;)

पैसा 24/05/2013 - 18:19
हा पण भाग मस्त! साप फार सुंदर दिसतो यात काही वादच नाही!

वाचतोय. बाकी, घोरपड चपळ असते ती इतकी सहज पकडता येते ? घोरपड शेपूट मारते वगैरे काय खास अनुभव ? -दिलीप बिरुटे

साती 24/05/2013 - 20:11
लेख तुमची शैली दोन्ही आवडले. बाकी वर्ष फुकट जाण्याविषयीच्या चिंतनाशी सहमत.

सुबोध खरे 24/05/2013 - 20:28
एकदम पटणारे विधान, जगाची सर्वात जास्त आणी खरी ओळख तुम्ही जेंव्हा खाली पडता तेंव्हाच होते. आणी जेंव्हा जगाने तुम्हाला मोडीत काढलेले असते तेंव्हा स्वतःची सुद्धा खरी ओळख आपल्याला होते. उभ्या आयुष्यात एक वर्ष या अनुभवासाठी काहीच नाही. खरं तर प्रत्येकाने आपले शिक्षण संपल्यावर नोकरीला लागण्यापूर्वी एक वर्ष आपल्याला काय करायचे आहे हे हुडकण्यासाठी किंवा आपल्या मनाला हवे तसे जगण्यासाठी वापरले तर त्याचे आयुष्य समृद्ध होईल. असो अतिशय छान आणी प्रामाणिक लिखाण. लिहिते रहा

उपास 24/05/2013 - 23:00
जेडी, तुमच्या कामाबद्दल आणि लेखणीतून इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल खास धन्यवाद आहेतच पण अजून एक महत्त्वाच.. अभ्यासात एक वर्ष पलटी खाल्याने निराश न होता नवीन, वेगळं काहीतरी शिकून धडाडीने उभ राहिलात, वेळ आणि उर्जा फुकट न घालवता आयुष्यभर (आणि इथे तर समाजाला) उपयोगी पडेल अशी कला शिकून वापरलीत ह्याच खूप कौतुक वाटतं. टिळकांसारखं (एक पूर्ण वर्ष त्यांनी व्यायामाला दिलं) किंवा वरती जसा कुंटेचा उल्लेख आलाय.. तसंच, तुमच्या सारख्यांची अशी वेगळी वाट (अपघाताने का होईना) पकडून वेळेचा सदुपयोग करण्याची जिद्द, तुमचं मार्गदर्शन परिक्षेत अयशस्वी होऊन् वर्ष जाण्यामुळे नैराश्याच्या आहारी जाऊ शकणार्‍या मुलांना व्हायला हवं असं कळकळून वाटतं. - (असं वर्ष/ वेळ हाताशी न मिळाल्याची खंत वाटणारा) उपास

In reply to by उपास

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:38
धन्यवाद् ! खरे आहे तुमचे म्हणणे, एकदा पडल्यावर पुन्हा ज्या उमेदीने आपण काम करायला लागतो याला तोड नसते.पण मला याचे वाईट वाटते की छोट्या परीक्षेतले पण अपयश आपल्या एकडे फुकटच जास्त मोठें केले जाते. आणि त्यामुळे काही मुले त्या अघोरी वेळे मधून बाहेर येऊ शकतात, पण काही पूर्ण पणे खचून जातात.

अर्धवटराव 25/05/2013 - 03:50
मला हा प्राणी भयंकर किळसवाणा वाटतो... भितीच वाटते म्हणा ना. आणि असे साप वगैरे पकडण्याची कामं करणार्‍यांचं फार कौतुक वाटतं. लगे रहो जेडी भाय. अवांतरः तुमच्या कामाप्रमाणेच तुमचं नाव देखील भारी आहे... जेडी... व्वाह. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:47
मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो आहे त्यातला ९५% लोकांना सरपटणारे प्राणी किळसवाणे वाटतात.( अगदी माझ्या घरी पण आधी हीच परिस्थिती होती ) त्यामुळे मी हे वाक्य खूप वेळा ऐकले आहे. पण ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by जॅक डनियल्स

बाळ सप्रे 27/05/2013 - 10:34
ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते
अगदी बरोबर.. सापांबद्दल खूप अज्ञान आहे.. घोणसाची सावली पडली तरी अंग कुसायला लागते.. हिरवी सर्पटोळ डोक्यावर नेम धरुन उडी मारते आणि माणूस तत्काळ मरतो असे बरेच प्रकार अजुनही ऐकायला मिळतात.. विशेषतः कोकणात.. मला व्यक्तिशः सापांबद्दल खूप आकर्षण आहे.. झू मध्ये अजगर, साप हातात घेउन फोटो काढायची एक संधी मिळाली होती.. अजिबात ओला कींवा बुळबुळीत स्पर्श नव्हता.. एकदम मऊ प्लास्टीक सारखा वाटत होता..

In reply to by आदूबाळ

जॅक डनियल्स 28/05/2013 - 04:21
आपल्या बॉलिवूडने आणि हॉलीवूडने जेवढी अंधश्रद्धा सापाविषयी पसरवली आहे की त्याला तोडच नाही. माझा स्वतः चा अश्या चित्रपटावर बेक्कार राग आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत बॉलीवूड-हॉलीवूड चे सिनेमे पोहचत असल्यामुळे खूप लोकं नागीण- अनाकोंडा सारख्या सिनेमा वरती डोळे झाकून विश्वास ठेवतात. "तुमची गर्ल फ्रेंड सर्पकन्या आहे का ?" हा प्रश्न मला सुशिक्षित लोकांनी विचारला आहे. ;) काही लोक असेच सिनेमे बघून गुप्तधनासाठी मोठ्या सापांची बिळे पण शोधतात आणि अपघात करून बसतात.

सन्जोप राव 25/05/2013 - 06:03
रेप्टाईल्स आणि एकूणच प्राणिविश्व हा आवडीचा विषय असल्याने हे प्रामाणिक लेखन फार आवडले. कॉलेजात एक वर्ष न जाता बरेच शिकणे, टॉरन्ट डाऊनलोड करता आले की कॉम्प्युटरचे शिक्षण झाले, साप पकडणार्‍यांविषयी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया हे सगळे मनापासून पटले आणि आवडले. पाप-पुण्य वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण तुम्ही जे काम केले आहे, त्याची कुठल्या तरी पुस्तकात 'चांगले काम' (मनुष्यजातीसाठी इतक्याच मर्यादित अर्थाने नव्हे) म्हणून नोंद झाली असणार अशी माझी खात्री आहे. शुभेच्छा!

In reply to by सन्जोप राव

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:50
धन्यवाद् ! आधीच्या पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे मला कॉल वरती भेदरलेल्या लोकांचे चेहरे दिसायचे म्हणून मी कधीच कॉल ला नाही म्हणू शकायचो नाही. रात्री- बेरात्री, अगदी परीक्षेच्या आधल्या दिवशी पण कॉल केले आहेत मी, फक्त परीक्षेच्या दिवशी फोन बंद ठेवायचो.

चिगो 25/05/2013 - 16:17
तुमच्यासारख्या लोकांचा खुप आदर वाटतो, जेडी.. लगे रहो. पहील्या भागाची लिंक देता का ? (माझ्या बायकोचा चुलतभाऊपण हे साप वगैरे पकडतो ब्वॉ.. तो ज्या प्रेमाने पालींबद्दल वगैरे बोलतो, त्यावरुन तुमचं ते "लोभस पाल" वालं वाक्य पटलं..)

मोदक 25/05/2013 - 18:17
चांगले लिहीताय... कोकणात बालपण गेले असल्याने सापांना अनेकवेळा जवळून पाहता (आणि मारता :-() आले. साप आणि त्यांचे खवले / कल्ले त्याच्यावरचे डिझाईन आणि एकूणच गूढ वावर. साप कुठेही दिसतात या गोष्टीशी लै वेळा सहमत. सूड आणि बुवा निर्विवाद सहमत होतीलच ;-)

अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही. लाखात एक वाक्य आहे हे. माझ्या पहिल्या नोकरीला असताना तेथील एच आर सरांनी असेच काहीसे तत्वज्ञान आम्हाला दिले होते. बाकी आपले अनुभव भन्नाटच.. आणि तितकीच रंजक लिखाणशैली ... येऊद्या जमेल तितके पेटार्‍यातून.. :)

अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !
म्ह्न्जे कॉलेजात तुम्ही हिरो असणार नक्कीच ....लय फेमस :)
चारही जातीचे विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे), पुण्यात सापडणारे बिनविषारी साप (धामण, गवत्या, इरुळा, कवड्या, तस्कर, कुकरी, डुरक्या-घोणस) आणि घोरपडी पकडल्या.
फोटु शेयर करा की राव ( आमच्या कॉलेजातल्या आठवणी आठवल्या . आमचे एक सर , झू चे , ते सापांवर काम करायचे , अन आम्ही केवळ उत्सुकतेपायी सरांबरोबर असायचो ( स्वतःचा विषय दुसर्‍या टोकाचा असतानाही ) . एकदा सरांनी एक पोतं हातात दिलं अन म्हणाले " हे भेट तुम्हाला . गावाबाहेर जाऊन सोडा जिथे नेहमी सोडतो तिथे " जाम फाटली होती तेव्हा... कोणता तरी बिन विषारी नेहमी आठळणारा साप होता... असो . तुमच्या लेखामुळे जुन्या ठवणी जाग्या झाल्या लय भारी) पुढील लेखांच्या प्रतिक्षेत !!

मोदक 25/05/2013 - 23:40
एक सुचवणूक - सर्पोद्यानात येणारा प्रत्येक "कॉल" व त्या अनुषंगाने केल्या गेलेल्या हालचाली / प्रोसेसेस ची माहिती पुढील भागात द्याल का..? उदा. - बिबवेवाडीला एका घरात साप आहे असा कॉल आला तर "एखादा सर्पमित्र लगेच रवाना होतो" हे ठीक. परंतु त्यासोबत / त्याच्या मागोमाग एखादी बॅकप पार्टी, साप पकडायचे पिंजरे पाठवले जातात का..? एखादी "सपोर्ट सिस्टीम" स्विच ऑन होते का..?

स्पंदना 26/05/2013 - 12:22
मस्त आठ्वणी. आयुष्यात पुढे गेल्यावर मागे वळुन पहाताना तेंव्हाचे प्रसंग तेव्हढ्याच तिव्रतेने जाणवत रहातात. काही वर्षाने त्यांची धार कमी होइलच असे नाही. अन मग अश्यावेळी आपल्याबाजुने उभे रहाणारे लोक अजुनही मनात आदरभावना निर्माण करतात. एकच उपाय असतो परत फेडीचा तो म्हणजे पुढे आपल्या समोर अश्या परिस्थीत कोणी आल तर त्याला मदत करणे. तुमची "साप कसे काय पकडता?" या प्रश्नाची वेगवेगळाली उत्तरे ऐकुन मजा वाटली. अन अश्या रिकाम्यावेळी (एक वर्ष वाया जाणे) रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याऐवजी काही तरी भरीव केल्याबद्दल अभिनंदन.

कंजूस 26/05/2013 - 21:41
१)#जैक आताचा भाग वाचायला मजा येते आहे . ईँनफ्रारेड कैमेऱ्यातून अथवा दुर्बिणीतून साप( किंवा सरडा वगैरे थंड रक्ताचे प्राणी) कसा दिसतो ? २)मी आणि इतर सहकारी ठाण्याच्या फैक्टरीतून एकदा जून महिन्यात फिरत असता एक तीन चार ईंचाचे सापाचे पिलू वळवळतांना पाहून आमच्यातले एकाने त्याला अत्यंत त्वेषाने बुटाखाली चिरडले . नंतर समजले की त्याचे वडील तो लहान असतांना शेतात साप चावून गेले त्यामुळे त्याला सापांबद्दल इतका द्वेष निर्माण झाला .३)ठाणे जिल्ह्यात काही गावात सापांना एक /दोन/तीन कलाकी अशी नावे आहेत -चावल्यावर किती कलाकांत /तासांत मनुष्यावर विष चढते त्याप्रमाणे .

पिशी अबोली 26/05/2013 - 21:58
मस्त लिहिले आहे.. सापप्रेमी भारीच असतात बुआ.. :) मला सापांची भीती वाटत असली तरी सापांना माझ्याविषयी भारी प्रेम आहे. शेजारीच टपकणं, माझ्या रुमच्या छतावर लोंबकळणं, फुलं काढत असताना फुलांमागून डोकावणं असे रोमँटिक प्रकार (नशिबाने बिनविषारी) सापांनी केले आहेत.

In reply to by पिशी अबोली

जॅक डनियल्स 27/05/2013 - 09:36
सापांना प्रेम वाटणारच, तुम्ही त्यांच्या निवासस्थानवरच घर बांधल्यावर त्यांना आपुलकीच वाटणार तुमच्या बद्दल..आणि ते तुम्हाला इम्प्रेस करायला येणारच ...;)

In reply to by जॅक डनियल्स

पिशी अबोली 27/05/2013 - 11:36
मान्य... येवोत बापडे..त्यांना स्वतःच्या वाटेने, स्वतःच्या इच्छेने जाऊ देणे ही आमची पॉलिसी आहे. ते अजगर लोक मात्र त्रास देतात. आमची कित्येक मांजरं नाहीशी होण्याला तेच कारणीभूत असावेत. :(

गुलाम 27/05/2013 - 18:20
तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन करून आपल्या आजूबाजूचे साप वाचवू शकतात. सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७
अत्यंत उपयुक्त माहिती.. परवा चिंचवडमध्ये फिरत असताना एक भयानक दृश्य पाहिले. एक हिरवागार साप (मी फक्त रंगच सांगू शकतो) झाडावरून खाली पडला होता आणि त्याच्या तोंडात एक प़क्षी होता. अर्थातच भोवती प्रचंड गर्दी जमली होती. त्यातली एक बाई जोरजोरात त्याला मारा-मारा असे ओरडत होती आणि एक माणूस त्या सापाला दगडाने ठेचून मारत होता. त्या सापाच्या तोंडात पक्षी असल्यामुळे (कदाचीत) हलता येत नव्हते. त्याचे पुढे काय झाले हे बघायला मी तिथे थांबू शकलो नाही. :(

हुप्प्या 28/05/2013 - 08:22
कितीही किळसवाणे वाटोत. (मला वाटत नाहीत. मला प्रचंड कौतुक वाटते ह्या प्राण्यांचे (अर्थात योग्य अंतर राखूनच!) ) पण हे प्राणी निसर्गाचा भाग आहेत. कुठल्याशा अन्नसाखळीत त्यांचा सहभाग आहे. लाखो, कोट्यावधी वर्षे टिकून त्यांनी आपले स्थान पक्के केले आहेत. भारतात ह्या प्राण्यांविषयी इतके बिनडोक गैरसमज आहेत की त्यामुळे त्यांचा अविरत संहार चालू असतो. ़खरे तर ह्या प्राण्यांकडे असणारी निसर्गदत्त आयुधे इतकी थक्क करून सोडणारी आहेत की भरीला आणखी अंधश्रद्ध गैरसमजुतींची गरजच नाही. काही केले नसतानाही त्यांना मारले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे ह्या प्राण्यांना मोकळेपणाने राहता येईल अशा जागाही कमी होत आहेत. त्यामुळेच ह्या लेखकाचे आणि सर्पोद्यानासारख्या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. आभार मानले पाहिजेत.

इच्चक 27/06/2013 - 11:22
सापवाल्याचा बाबा .... :) खरच तुमच कौतुक वाटत असेल तुमच्या बाबांना की लोकं त्यांना तुमच्या कामाने ओळखतात.

अनन्न्या 27/07/2013 - 19:11
माझ्या बाबाना एक हात नसल्याने ते सापाची शेपटी पकडून गोल फिरवून जमिनीवर आपटायचे! हे बय्राचदा पाहिल्याने मीही लहानपणी हा प्रयोग करून पाहिला होता. नंतर कळले की तो साप विषारी होता. बाबांनी तंबीच दिली, यापुढे मी समोर नसताना हे उद्योग करायचे नाहीत! आता असले उद्योग नाही करत, कारण समोर उभे रहायला बाबा नाहीत.

जेडी, अतिशय अभ्यासपूर्ण लेखमाला! मस्त! अन्डर्स्कोअर अन्डर्स्कोअर फोर्वर्ड स्लॅश बॅक्वर्ड स्लॅश अन्डर्स्कोअर अन्डर्स्कोअर __/\____

प्रचेतस 24/05/2013 - 12:16
एकदम सुरेख. आपले अनुभव वाचताना आम्हालाही ओळखीचे असूनही अनोळखीच राहिलेल्या सर्पविश्वाची उत्तम ओळख होते आहे.

In reply to by प्रचेतस

जॅक डनियल्स 24/05/2013 - 21:39
धन्यवाद ! अनोळखीच असते कारण आपण असे जंगलात साप शोधायला गेलो तर मिळायचे प्रमाण खूप कमी असते. पण ह्याच्या उलटे कॉंक्रीट च्या जंगलात ते आपल्या आजूबाजूलाच असल्यामुळे खूप वेळा आमना-सामना होतो.

मनिष 24/05/2013 - 12:57
तू/तुम्ही राहुल अल्वारेस ह्याचे पुस्तक वाचलंय का? तोही डिस्कवरीसाठी काम करतो असे ऐकले आहे! :-)

In reply to by मनिष

जॅक डनियल्स 24/05/2013 - 21:43
मी त्यांचे पुस्तक वाचले नाही, पण मिळाले तर नक्की वाचीन. भारतामधले सर्प किंव्हा प्राणी -पक्षी संशोधक या वाहिनी साठी काम करत असतात, पण काहीच लोक पडद्यावर येतात.

In reply to by जॅक डनियल्स

मनिष 24/05/2013 - 22:31
मी जमेल त्याला त्याचे पुस्तक सुचवत असतो - इथे ते ई-बुक मिळेल. त्याने १० वी नंतर १ वर्ष हाच अनुभव घेण्यासाठी दिले होते. http://www.gutenberg.org/ebooks/10347

In reply to by बॅटमॅन

५० फक्त 25/05/2013 - 00:32
+१००, लई भारी. माझ्या लहानपंणी घरात आलेले दोन साप, माझ्या मांजरांनी फाडुन टाकलेले प्रत्यक्ष पाहिले, आणि त्यानंतर सापांबद्दल एक प्रकारची कणव भरुन राहिली मनात का कोण जाणे.

In reply to by ५० फक्त

जॅक डनियल्स 25/05/2013 - 08:07
हो, मांजर सापांना अगदी हाल हाल करून मारते, कारण त्यांना याची भीती असते की, तो साप त्यांच्या पिल्लांना खाऊन टाकेल. तसेच मांजराच्या अंगावरच्या केंसामुळे त्याचे सापाच्या चाव्या पासून खूप वेळा संरक्षण होते.

In reply to by जॅक डनियल्स

पैसा 25/05/2013 - 11:06
मी लहान असताना आमच्याकडे एक मांजरी होती. ती घराबाहेर गवतात जाऊन तिथून मण्यारी पकडून घरात आणून आमच्या पुढ्यात एखादे गिफ्ट द्यावे तशी टाकायची. तिने माझ्या आठवणीत ९ मण्यारी मारल्या. इतर साप आमच्या पाठीमागे किती मारले असतील माहित नाही. तरी ती कधीही विषबाधा न होता १५ एक वर्षे जगली.

In reply to by पैसा

पिशी अबोली 26/05/2013 - 21:51
हो ना... मांजरींची ही वाईट खोड आहे. प्रत्येक मारलेली गोष्ट घरी आणून, दाखवून मग खातात..

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जॅक डनियल्स 24/05/2013 - 22:02
मास्तर लोक जास्त काही बोलायचे नाही कारण कॉलेज चे काम असायचे. सिंहगड कॉलेज हे डोंगरावर असल्याने तिथे सगळ्या प्रकारचे साप मिळायचे, नाग, घोणस (विषारी साप) पण मी तिकडे पकडले आहेत. तसेच आमचे हेड सर हे कोकणातले असल्याने त्यांना सापाबद्दल माहिती होती, त्यामुळे त्यांची मला पूर्ण सहमती असायची. कधी कधी तर सिंहगड च्या दुसऱ्या कॅम्पस (कोंढवा, कात्रज) मध्ये पण साप पकडायला जायचो. एकदाच फक्त, रसायनच्या तासाकडे लक्ष न देता भिंती वरच्या पालीचे निरीक्षण करत होतो, तेंव्हा मात्र मास्तरीण बाईनी बेक्कार झाडले होते...ती पाल खरच खूप लोभस होती :)

कोमल 24/05/2013 - 15:33
झ्याक वाट्या वाचून भौ..
अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !
:)) :)) रूबाबच की ओ... ;)

खबो जाप 24/05/2013 - 17:14
मला साप हा प्रकार किव्हा प्राणी म्हणा खूप म्हणजे खूप आवडतो . सापाच्या समोरून त्याच्या डोळ्यात रोखून बघण्यात एक निराळीच मजा येते. आता नोकरी मुळे जमत नाही पण आधी गावी आणि शेतात खुपदा सापाशी फाल्तुक खेळ करून बघितले आहेत. एक मात्र आहे कधी पकडू शकलो नाही एक दोनदा प्रयत्न केला पण लोकांनी डोक्याला नुसता शॉट दिला होता. त्यमुळे प्रत्येक वेळी साप मारावाच लागायचा, ३ ४ नाग आणि ४ ५ इतर साप उगाचच मनात नसताना मारावे लागले साला आमच्या घरात जेव्हा ६ ७ फुटाची पिवळी धमक धमन मारावी लागली होती तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आले होते, अजून सुधा तो प्रसंग आठवतो आणि अपराधी असल्यासारखे वाटते

In reply to by खबो जाप

जॅक डनियल्स 24/05/2013 - 23:47
धन्यवाद् ! अपराधी वाटून घेऊ नका. कारण ज्यांना साप पकडता येत नाही, त्यांनी त्यांच्या घरात आलेला साप तो पकडण्या पेक्षा मारलेले बरे.(हे खूप विवादास्पत वाक्य आहे.) पण विषारी विषारी साप पकडताना चुकून दात जरी घासून गेला तरी जीवावर बेतू शकते. आणि विषारी सर्पदंशावर औषधे आहेत पण ती घेतल्यावर होणारे परिणाम जेवढे वाटतात तेवढे साधे नाहीत. सापांचे दुरून निरीक्षण करणार असाल तर जरूर करा पण खेळ म्हणून पण पकडायचा प्रयत्न करू नका.

In reply to by जॅक डनियल्स

सुबोध खरे 25/05/2013 - 09:49
एकदम सहमत. एक जरी घोणस चावलेला माणूस तुम्ही पाहिलात तर त्याच्या अंगावर आलेले रक्ताचे फोड किंवा सुजलेला पाय पाहिला तर आयुष्यात सापाशी खेळ करायला कोणी जाणार नाही. अगदी ६ इंच लांबीचे फुरसे चावले तरी होणारी विषबाधा आणि तडफड पहिली कि कोकणात लोक साप दिसला कि का मारतात ते पटेल. http://www.indiamike.com/india/health-and-well-being-in-india-f2/snakebite-first-aid-t34506/ साप म्हणू नये धाकला नवरा म्हणू नये आपला

इनिगोय 24/05/2013 - 17:59
वा! वाचायला आवडतंय. शैक्षणिक वर्षात आपटी खाऊन मग वन्यजीवनाच्या अभ्यासाकडे वळलेल्या कृष्णमेघ कुंटेंची सहजच आठवण झाली.

In reply to by इनिगोय

जॅक डनियल्स 25/05/2013 - 08:20
"एका रानवेड्याची शोधयात्रा " खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. भारतात परीक्षेत नापास झाले की तुम्हाला जे काही सहन करायला लागते, त्याला तोडच नाही. ती पण शाळा कॉलेज ची परीक्षा, तुम्ही स्वतः बरोबर जसे काय आजूबाजूच्या १० लोकांचे आयुष्य उध्वस्त केले असे समजून लोकं टोमणे मारतात किंवा लुक्स देतात.

मदनबाण 24/05/2013 - 18:18
सुरेख लेखन ! साप दिसला की आधी लोक मारायला धावतात ! :( असे सापांनी केले असते तर ? माणुस दिलाच की चाव ! ;) घोरपडीवरुन आठवले... मध्यंतरी गणपती मधे आपच्या इथे अचानक एक मोठ्ठाली घोरपड प्रकट झाली होती,तिचा एक फोटो मोठ्या मुश्किलीने काढला होता,घरच्या संगणकात सापडला तर इथे देइन म्हणतो.

In reply to by मदनबाण

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:33
झकास फोटो आहे. मी दरवेळी घोरपड पकडताना हाच विचार करायचो "की हि घोरपड येथे आली कशी ? " मित्रमंडळ रोड च्या बैठ्या घरांमध्ये एका बाथरूम मध्ये एक घोरपड होती, मला त्या माणसाने, फोन वर एक मोठी पाल आहे किंवा तसाच एक मोठा सरडा आहे असे सांगितले होते...;)

पैसा 24/05/2013 - 18:19
हा पण भाग मस्त! साप फार सुंदर दिसतो यात काही वादच नाही!

वाचतोय. बाकी, घोरपड चपळ असते ती इतकी सहज पकडता येते ? घोरपड शेपूट मारते वगैरे काय खास अनुभव ? -दिलीप बिरुटे

साती 24/05/2013 - 20:11
लेख तुमची शैली दोन्ही आवडले. बाकी वर्ष फुकट जाण्याविषयीच्या चिंतनाशी सहमत.

सुबोध खरे 24/05/2013 - 20:28
एकदम पटणारे विधान, जगाची सर्वात जास्त आणी खरी ओळख तुम्ही जेंव्हा खाली पडता तेंव्हाच होते. आणी जेंव्हा जगाने तुम्हाला मोडीत काढलेले असते तेंव्हा स्वतःची सुद्धा खरी ओळख आपल्याला होते. उभ्या आयुष्यात एक वर्ष या अनुभवासाठी काहीच नाही. खरं तर प्रत्येकाने आपले शिक्षण संपल्यावर नोकरीला लागण्यापूर्वी एक वर्ष आपल्याला काय करायचे आहे हे हुडकण्यासाठी किंवा आपल्या मनाला हवे तसे जगण्यासाठी वापरले तर त्याचे आयुष्य समृद्ध होईल. असो अतिशय छान आणी प्रामाणिक लिखाण. लिहिते रहा

उपास 24/05/2013 - 23:00
जेडी, तुमच्या कामाबद्दल आणि लेखणीतून इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल खास धन्यवाद आहेतच पण अजून एक महत्त्वाच.. अभ्यासात एक वर्ष पलटी खाल्याने निराश न होता नवीन, वेगळं काहीतरी शिकून धडाडीने उभ राहिलात, वेळ आणि उर्जा फुकट न घालवता आयुष्यभर (आणि इथे तर समाजाला) उपयोगी पडेल अशी कला शिकून वापरलीत ह्याच खूप कौतुक वाटतं. टिळकांसारखं (एक पूर्ण वर्ष त्यांनी व्यायामाला दिलं) किंवा वरती जसा कुंटेचा उल्लेख आलाय.. तसंच, तुमच्या सारख्यांची अशी वेगळी वाट (अपघाताने का होईना) पकडून वेळेचा सदुपयोग करण्याची जिद्द, तुमचं मार्गदर्शन परिक्षेत अयशस्वी होऊन् वर्ष जाण्यामुळे नैराश्याच्या आहारी जाऊ शकणार्‍या मुलांना व्हायला हवं असं कळकळून वाटतं. - (असं वर्ष/ वेळ हाताशी न मिळाल्याची खंत वाटणारा) उपास

In reply to by उपास

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:38
धन्यवाद् ! खरे आहे तुमचे म्हणणे, एकदा पडल्यावर पुन्हा ज्या उमेदीने आपण काम करायला लागतो याला तोड नसते.पण मला याचे वाईट वाटते की छोट्या परीक्षेतले पण अपयश आपल्या एकडे फुकटच जास्त मोठें केले जाते. आणि त्यामुळे काही मुले त्या अघोरी वेळे मधून बाहेर येऊ शकतात, पण काही पूर्ण पणे खचून जातात.

अर्धवटराव 25/05/2013 - 03:50
मला हा प्राणी भयंकर किळसवाणा वाटतो... भितीच वाटते म्हणा ना. आणि असे साप वगैरे पकडण्याची कामं करणार्‍यांचं फार कौतुक वाटतं. लगे रहो जेडी भाय. अवांतरः तुमच्या कामाप्रमाणेच तुमचं नाव देखील भारी आहे... जेडी... व्वाह. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:47
मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो आहे त्यातला ९५% लोकांना सरपटणारे प्राणी किळसवाणे वाटतात.( अगदी माझ्या घरी पण आधी हीच परिस्थिती होती ) त्यामुळे मी हे वाक्य खूप वेळा ऐकले आहे. पण ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by जॅक डनियल्स

बाळ सप्रे 27/05/2013 - 10:34
ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते
अगदी बरोबर.. सापांबद्दल खूप अज्ञान आहे.. घोणसाची सावली पडली तरी अंग कुसायला लागते.. हिरवी सर्पटोळ डोक्यावर नेम धरुन उडी मारते आणि माणूस तत्काळ मरतो असे बरेच प्रकार अजुनही ऐकायला मिळतात.. विशेषतः कोकणात.. मला व्यक्तिशः सापांबद्दल खूप आकर्षण आहे.. झू मध्ये अजगर, साप हातात घेउन फोटो काढायची एक संधी मिळाली होती.. अजिबात ओला कींवा बुळबुळीत स्पर्श नव्हता.. एकदम मऊ प्लास्टीक सारखा वाटत होता..

In reply to by आदूबाळ

जॅक डनियल्स 28/05/2013 - 04:21
आपल्या बॉलिवूडने आणि हॉलीवूडने जेवढी अंधश्रद्धा सापाविषयी पसरवली आहे की त्याला तोडच नाही. माझा स्वतः चा अश्या चित्रपटावर बेक्कार राग आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत बॉलीवूड-हॉलीवूड चे सिनेमे पोहचत असल्यामुळे खूप लोकं नागीण- अनाकोंडा सारख्या सिनेमा वरती डोळे झाकून विश्वास ठेवतात. "तुमची गर्ल फ्रेंड सर्पकन्या आहे का ?" हा प्रश्न मला सुशिक्षित लोकांनी विचारला आहे. ;) काही लोक असेच सिनेमे बघून गुप्तधनासाठी मोठ्या सापांची बिळे पण शोधतात आणि अपघात करून बसतात.

सन्जोप राव 25/05/2013 - 06:03
रेप्टाईल्स आणि एकूणच प्राणिविश्व हा आवडीचा विषय असल्याने हे प्रामाणिक लेखन फार आवडले. कॉलेजात एक वर्ष न जाता बरेच शिकणे, टॉरन्ट डाऊनलोड करता आले की कॉम्प्युटरचे शिक्षण झाले, साप पकडणार्‍यांविषयी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया हे सगळे मनापासून पटले आणि आवडले. पाप-पुण्य वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण तुम्ही जे काम केले आहे, त्याची कुठल्या तरी पुस्तकात 'चांगले काम' (मनुष्यजातीसाठी इतक्याच मर्यादित अर्थाने नव्हे) म्हणून नोंद झाली असणार अशी माझी खात्री आहे. शुभेच्छा!

In reply to by सन्जोप राव

जॅक डनियल्स 25/05/2013 - 10:50
धन्यवाद् ! आधीच्या पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे मला कॉल वरती भेदरलेल्या लोकांचे चेहरे दिसायचे म्हणून मी कधीच कॉल ला नाही म्हणू शकायचो नाही. रात्री- बेरात्री, अगदी परीक्षेच्या आधल्या दिवशी पण कॉल केले आहेत मी, फक्त परीक्षेच्या दिवशी फोन बंद ठेवायचो.

चिगो 25/05/2013 - 16:17
तुमच्यासारख्या लोकांचा खुप आदर वाटतो, जेडी.. लगे रहो. पहील्या भागाची लिंक देता का ? (माझ्या बायकोचा चुलतभाऊपण हे साप वगैरे पकडतो ब्वॉ.. तो ज्या प्रेमाने पालींबद्दल वगैरे बोलतो, त्यावरुन तुमचं ते "लोभस पाल" वालं वाक्य पटलं..)

मोदक 25/05/2013 - 18:17
चांगले लिहीताय... कोकणात बालपण गेले असल्याने सापांना अनेकवेळा जवळून पाहता (आणि मारता :-() आले. साप आणि त्यांचे खवले / कल्ले त्याच्यावरचे डिझाईन आणि एकूणच गूढ वावर. साप कुठेही दिसतात या गोष्टीशी लै वेळा सहमत. सूड आणि बुवा निर्विवाद सहमत होतीलच ;-)

अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही. लाखात एक वाक्य आहे हे. माझ्या पहिल्या नोकरीला असताना तेथील एच आर सरांनी असेच काहीसे तत्वज्ञान आम्हाला दिले होते. बाकी आपले अनुभव भन्नाटच.. आणि तितकीच रंजक लिखाणशैली ... येऊद्या जमेल तितके पेटार्‍यातून.. :)

अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !
म्ह्न्जे कॉलेजात तुम्ही हिरो असणार नक्कीच ....लय फेमस :)
चारही जातीचे विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे), पुण्यात सापडणारे बिनविषारी साप (धामण, गवत्या, इरुळा, कवड्या, तस्कर, कुकरी, डुरक्या-घोणस) आणि घोरपडी पकडल्या.
फोटु शेयर करा की राव ( आमच्या कॉलेजातल्या आठवणी आठवल्या . आमचे एक सर , झू चे , ते सापांवर काम करायचे , अन आम्ही केवळ उत्सुकतेपायी सरांबरोबर असायचो ( स्वतःचा विषय दुसर्‍या टोकाचा असतानाही ) . एकदा सरांनी एक पोतं हातात दिलं अन म्हणाले " हे भेट तुम्हाला . गावाबाहेर जाऊन सोडा जिथे नेहमी सोडतो तिथे " जाम फाटली होती तेव्हा... कोणता तरी बिन विषारी नेहमी आठळणारा साप होता... असो . तुमच्या लेखामुळे जुन्या ठवणी जाग्या झाल्या लय भारी) पुढील लेखांच्या प्रतिक्षेत !!

मोदक 25/05/2013 - 23:40
एक सुचवणूक - सर्पोद्यानात येणारा प्रत्येक "कॉल" व त्या अनुषंगाने केल्या गेलेल्या हालचाली / प्रोसेसेस ची माहिती पुढील भागात द्याल का..? उदा. - बिबवेवाडीला एका घरात साप आहे असा कॉल आला तर "एखादा सर्पमित्र लगेच रवाना होतो" हे ठीक. परंतु त्यासोबत / त्याच्या मागोमाग एखादी बॅकप पार्टी, साप पकडायचे पिंजरे पाठवले जातात का..? एखादी "सपोर्ट सिस्टीम" स्विच ऑन होते का..?

स्पंदना 26/05/2013 - 12:22
मस्त आठ्वणी. आयुष्यात पुढे गेल्यावर मागे वळुन पहाताना तेंव्हाचे प्रसंग तेव्हढ्याच तिव्रतेने जाणवत रहातात. काही वर्षाने त्यांची धार कमी होइलच असे नाही. अन मग अश्यावेळी आपल्याबाजुने उभे रहाणारे लोक अजुनही मनात आदरभावना निर्माण करतात. एकच उपाय असतो परत फेडीचा तो म्हणजे पुढे आपल्या समोर अश्या परिस्थीत कोणी आल तर त्याला मदत करणे. तुमची "साप कसे काय पकडता?" या प्रश्नाची वेगवेगळाली उत्तरे ऐकुन मजा वाटली. अन अश्या रिकाम्यावेळी (एक वर्ष वाया जाणे) रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याऐवजी काही तरी भरीव केल्याबद्दल अभिनंदन.

कंजूस 26/05/2013 - 21:41
१)#जैक आताचा भाग वाचायला मजा येते आहे . ईँनफ्रारेड कैमेऱ्यातून अथवा दुर्बिणीतून साप( किंवा सरडा वगैरे थंड रक्ताचे प्राणी) कसा दिसतो ? २)मी आणि इतर सहकारी ठाण्याच्या फैक्टरीतून एकदा जून महिन्यात फिरत असता एक तीन चार ईंचाचे सापाचे पिलू वळवळतांना पाहून आमच्यातले एकाने त्याला अत्यंत त्वेषाने बुटाखाली चिरडले . नंतर समजले की त्याचे वडील तो लहान असतांना शेतात साप चावून गेले त्यामुळे त्याला सापांबद्दल इतका द्वेष निर्माण झाला .३)ठाणे जिल्ह्यात काही गावात सापांना एक /दोन/तीन कलाकी अशी नावे आहेत -चावल्यावर किती कलाकांत /तासांत मनुष्यावर विष चढते त्याप्रमाणे .

पिशी अबोली 26/05/2013 - 21:58
मस्त लिहिले आहे.. सापप्रेमी भारीच असतात बुआ.. :) मला सापांची भीती वाटत असली तरी सापांना माझ्याविषयी भारी प्रेम आहे. शेजारीच टपकणं, माझ्या रुमच्या छतावर लोंबकळणं, फुलं काढत असताना फुलांमागून डोकावणं असे रोमँटिक प्रकार (नशिबाने बिनविषारी) सापांनी केले आहेत.

In reply to by पिशी अबोली

जॅक डनियल्स 27/05/2013 - 09:36
सापांना प्रेम वाटणारच, तुम्ही त्यांच्या निवासस्थानवरच घर बांधल्यावर त्यांना आपुलकीच वाटणार तुमच्या बद्दल..आणि ते तुम्हाला इम्प्रेस करायला येणारच ...;)

In reply to by जॅक डनियल्स

पिशी अबोली 27/05/2013 - 11:36
मान्य... येवोत बापडे..त्यांना स्वतःच्या वाटेने, स्वतःच्या इच्छेने जाऊ देणे ही आमची पॉलिसी आहे. ते अजगर लोक मात्र त्रास देतात. आमची कित्येक मांजरं नाहीशी होण्याला तेच कारणीभूत असावेत. :(

गुलाम 27/05/2013 - 18:20
तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन करून आपल्या आजूबाजूचे साप वाचवू शकतात. सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७
अत्यंत उपयुक्त माहिती.. परवा चिंचवडमध्ये फिरत असताना एक भयानक दृश्य पाहिले. एक हिरवागार साप (मी फक्त रंगच सांगू शकतो) झाडावरून खाली पडला होता आणि त्याच्या तोंडात एक प़क्षी होता. अर्थातच भोवती प्रचंड गर्दी जमली होती. त्यातली एक बाई जोरजोरात त्याला मारा-मारा असे ओरडत होती आणि एक माणूस त्या सापाला दगडाने ठेचून मारत होता. त्या सापाच्या तोंडात पक्षी असल्यामुळे (कदाचीत) हलता येत नव्हते. त्याचे पुढे काय झाले हे बघायला मी तिथे थांबू शकलो नाही. :(

हुप्प्या 28/05/2013 - 08:22
कितीही किळसवाणे वाटोत. (मला वाटत नाहीत. मला प्रचंड कौतुक वाटते ह्या प्राण्यांचे (अर्थात योग्य अंतर राखूनच!) ) पण हे प्राणी निसर्गाचा भाग आहेत. कुठल्याशा अन्नसाखळीत त्यांचा सहभाग आहे. लाखो, कोट्यावधी वर्षे टिकून त्यांनी आपले स्थान पक्के केले आहेत. भारतात ह्या प्राण्यांविषयी इतके बिनडोक गैरसमज आहेत की त्यामुळे त्यांचा अविरत संहार चालू असतो. ़खरे तर ह्या प्राण्यांकडे असणारी निसर्गदत्त आयुधे इतकी थक्क करून सोडणारी आहेत की भरीला आणखी अंधश्रद्ध गैरसमजुतींची गरजच नाही. काही केले नसतानाही त्यांना मारले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे ह्या प्राण्यांना मोकळेपणाने राहता येईल अशा जागाही कमी होत आहेत. त्यामुळेच ह्या लेखकाचे आणि सर्पोद्यानासारख्या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. आभार मानले पाहिजेत.

इच्चक 27/06/2013 - 11:22
सापवाल्याचा बाबा .... :) खरच तुमच कौतुक वाटत असेल तुमच्या बाबांना की लोकं त्यांना तुमच्या कामाने ओळखतात.

अनन्न्या 27/07/2013 - 19:11
माझ्या बाबाना एक हात नसल्याने ते सापाची शेपटी पकडून गोल फिरवून जमिनीवर आपटायचे! हे बय्राचदा पाहिल्याने मीही लहानपणी हा प्रयोग करून पाहिला होता. नंतर कळले की तो साप विषारी होता. बाबांनी तंबीच दिली, यापुढे मी समोर नसताना हे उद्योग करायचे नाहीत! आता असले उद्योग नाही करत, कारण समोर उभे रहायला बाबा नाहीत.

जेडी, अतिशय अभ्यासपूर्ण लेखमाला! मस्त! अन्डर्स्कोअर अन्डर्स्कोअर फोर्वर्ड स्लॅश बॅक्वर्ड स्लॅश अन्डर्स्कोअर अन्डर्स्कोअर __/\____
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

तुमचा अभिषेक ·

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

We are not here to make friends ... खरंच ?

छोटा डॉन ·

पैसा 15/04/2013 - 15:20
बरेच दिवसांनी लिहिलेले सुरेख प्रकटन. कधीतरी असे व्यक्त होणे चांगले असते. सगळ्याच भावना नेहमी लपवून ठेवू नयेत.

In reply to by पैसा

ऋषिकेश 15/04/2013 - 18:05
अगदी +१ फक्त हल्ली कम्युनिकेशची खूप साधने आहेत त्यामुळे ऑफिसेस बदलली तरी मैत्री साफ तुटते असे अनुभवास आलेले नाही हीच काय ती चंदेरी किनार, अर्थात संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!

In reply to by ऋषिकेश

मनराव 15/04/2013 - 18:12
संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!
तुटत राहते ते सुद्धा काही काळा पुरता..... नंतर मागे उरतात त्या कडु/गोड आठवणी.....

अद्द्या 15/04/2013 - 15:27
आवडेश डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढण कठीण त्यातल्या त्यात मित्रांच्या बाबतीत . तर महाकठीण . . असो . . "टच " मध्ये राहण्याचा प्रयत्न तर होईलच . . तो सुटू नये अशी अशा . .

एका विशिष्ट टप्प्यानांतर एकूणच मित्र बनवणे जमत नाही. आपण आपल्या प्रकाराने मानसिक दृष्ट्या सेट झालेले असतो. अड्जस्टमेंट करायला जमत नाहीत. लेख आवडला -२८ व्या वर्षी पोक्त पणा आलेला अमोल

In reply to by छोटा डॉन

शुचि 15/04/2013 - 18:22
मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" गुड-मॉर्निंगही करायच्या भानगडीत पडत नाही. दिसले .... केलं पण मुद्दाम शेजार्‍याला कधीच करत नाही. यामागे कारण आहे. समजा रोज विश केलं तर मग ती सवय अन ऑब्लिगेशन होऊन बसतं. कधी त्याच्याबरोबर थोडं (किंचीत) बिनसलं की मग आपण विश करत नाही आणि ते मग खुपतं. त्यापेक्षा "इनडिफरंट" फसाड बरा वाटतो. सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले. डॉन यांचा अनुभव सुदैवाने वेगळा आहे त्याबद्दल आनंदच आहे.

In reply to by शुचि

चावटमेला 17/04/2013 - 12:20
१००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात ते फक्त कलीग्ज, सहकर्मचारी, बास्स. मित्र वगैरे बनविण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं (अनुभवाने शहाणा झालेला) चावटमेला

In reply to by चावटमेला

शुचि 17/04/2013 - 20:13
पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात घुसमट होते हेही तितकेच खरे आहे. आपण उस्फूर्तपणे काही सांगू इच्छितो अन एक मन म्हणतं "हूम आर यु टेलींग? इझ ही/शी योर फ्रेंड? A BIG NOOOO!!!!" अन मग आपण गप्प बसतो. पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.

In reply to by शुचि

सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले.
ऑफिस बद्दल बोलताय की रोडीज बद्दल ??

In reply to by शुचि

भारततल्या पश्चिमी सभ्यतेवरचा एक रिअ‍ॅलिटी शो (एम टिव्ही). संवादात सतत बीप वाजत असते. मला तर एकदाच पाहून किळस वाटली होती. बरेच लोक चवीने बघतात. एकाने सांगितले होते की लिडरशीप क्वालिटी वगैरे डेवलप होते म्हणे ;-).

In reply to by बॅटमॅन

'पश्चिमी सभ्यता' चा उपयोग करण्यामागे एक कथा आहे. अमेरिकेत मी तसा नवा असतानाचा हा प्रसंग. काही सहकारी अमेरिकेत आलोच आहोत तर स्ट्रीपक्लबला जाऊन दौलतजादा करून पुण्य कमवावे म्हणून आसूसले होते. माझ्याही फारच मागे लागले होते. त्यापैकी एक जण हिंदी भाषक असल्याने त्यास रंग दे बसंती चित्रपटातील शब्दांचा वापर करून 'मै पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं रखता' असे ऐकवले होते. अन त्या संध्याकाळी तीन लोक मोठ्या उत्साहाने कामगिरीवर निघाले. तेव्हा कुणाचकडे चतुरभ्रमणध्वनी नव्हते. चांगले कपडे घालून, फवारे मारणे वगैरे सुरू असताना एकाने घाईघाईत स्ट्रीपबार चा पत्त्ता शोधला अन नोंदवून घेतला. जिपिएस वापरून त्या ठिकाणी पोचल्यावर एक हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली कसले तरी मेटॅलिक स्ट्रीप बार्स बनवणारी ;-). तेव्हापासून मी त्यांना 'कैसी रही पश्चिमी सभ्यता' व ते मला 'क्यो तुम्हे तो पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं हैं ना?' असे चिडवत असत. बाकी मागाहून कळले की मिसूरी राज्यात त्या प्रकारावर बंदी आहे व त्यासाठी नदीपलिकडे इस्ट सेंट लुईसला जावे लागते जे इलिनॉय राज्यात आहे.

मन१ 15/04/2013 - 15:48
डॉन लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला. लेखन/प्रकटन जे काही आहे ते आवडले/भावले.

In reply to by गुलाम

कोमल 21/04/2013 - 11:54
खरोखर... लेख आवडला.. पण असे कलिग्ज कम मित्र/मैत्रिणी मिळणे फारच अवघड असते बॉ...

७३ ते ८१ एवढ्या प्रदीर्घ कालात एकाच कंपनीत नोकरी करून कांही मित्र जमवले होते. ते सर्व चांगले होते. कदाचित त्या काळात आणि माझ्या व्यवसायात एवढी चढाओढ नव्हती. पण, मला तरी माझ्या सर्व मित्रांचा चांगलाच अनुभव आला. अगदी शिक्षणात मार्गदर्शन करण्यापासून ऑफिसमध्ये तात्पुरता होणारा फायदा सोडून देऊन दूरदृष्टीने 'अनुभव' मिळविण्याचा सल्ला मला ह्या मित्रांकडून मिळाला. त्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहे.

मैत्र 15/04/2013 - 16:54
फार दिवसांनी लिहिते झाले डानराव याबद्दल आनंद आहे. थोड्या धुसर गोष्टी झकास नेमक्या पद्धतीने मांडल्या आहेत. खूप आवडलं ते हे -- "ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही "

आनंद घारे 15/04/2013 - 17:20
माझी एक पेट थिअरी अशी आहे की माणसाचे मन जन्मतः मातीच्या गोळ्याप्रमाणे ओलसर असते आणि त्याला विशिष्ट आकार आलेला नसतो. दोन मुलांची गट्टी लगेच जमते. वय वाढत जाते तसतसे मन सुकत आणि कठीण होत जाते. दोन मने जुळण्यासाठी समान आवडी किंवा लाभ वगैरे गोंदाची गरज पडते. उतारवय येईपर्यंत ते शुष्क झालेले असते आणि त्याला अनेक कंगोरे आलेले असतात. त्यानंतर फेविकॉल सुद्धा लावता येत नाही. डॉनच्या वयामध्ये असतांना दिवसाचा बहुतेक सगळा वेळ ऑफिसमध्ये जात असल्यामुळे त्या वेळात ज्या व्यक्ती संपर्कात येतात, त्यांच्यातल्या कोणाकोणाशी आपण काही ना काही शेअर करत असतो, त्या निमित्याने जोडले जात असतो. पण जेंव्हा लाभ किंवा हानी याचा प्रश्न येतो तेंव्हा तो जोड निखळतो. ते होतांना थोडे कष्टही होतात. आपसानध्ये काही वितुष्ट नसतांना बाह्य कारणांमुळे दूर जावे लागले तर जास्त दु:ख होते. आज संपर्कसाधनांमुळे जग इतके जवळ आले आहे की शरीराने दूर गेले तरी एकमेकांना स्क्रीनवर पाहू शकतो, बोलू शकतो, वाटल्यास मैत्री राखू शकतो.

शिद 15/04/2013 - 17:36
म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये
+११११११११११ अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे असे वाटते...पहिल्या कंपनीमध्ये अख्खी प्रोजेक्ट टीम ३ वर्षांत एकमेकांची जिवलग बनली होती पण तो जॉब सोडताना डोळ्यातुन पाणी वहायला लागले होते :( ...म्हणुन आता वर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे ऑफिसात यारी-दोस्ती टाळतो.

वाह ...डॉन राव , मस्त लिहलय..आणी हेवा वाटतोय श्रीकांतचा (तुमच्या सारखा मित्र मिळाल्यामुळे). कुठेतरी वाचलेय " If friendship is your weakest point then you are the strongest person in the world".. जियो यार (असेच जिवाभावाचे मित्र लाभलेला)

सुबोध खरे 15/04/2013 - 18:36
ऑफिसात मैत्री असू नये किंवा ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो. मी सरकारी नोकरीत होतो २३ वर्षे किंवा कोर्पोर्रेट हॉस्पिटल मध्ये ४ वर्षे तेथे झालेली माझी मैत्री अजून टिकून आहे. कितीतरी मित्र जरी वर्षात एकदा किंवा दोनदा भेटलो तरी पूर्वीसारखाच जिव्हाळा कायम आहे. प्रत्येक माणूस हा तुमच्या बढती किंवा पगाराच्या स्पर्धेत असतो असे नाही. माझे मित्र हे वेगवेगळ्या शाखेत असल्यामुळे असा कधीही प्रकार घडला नाही. कोणी पैथोलोजीस्ट कोणी हृदयविकार तज्ञ कोणी प्रशासकीय अधिकारी असे असले तरी समान विचार सरणी मुळे झालेली मैत्री आजही कायम आहे. लष्करातील पायलट पाणबुडी अधिकारी असेही लोक आम्ही आवर्जून भेटतो. यात एक फरक आहे तो नुसते आम्ही नव्हे तर आमच्या बायकांची तर जुळली तर मैत्री पुढे चालू राहते नाहीतर ती हळूहळू कमी होते. even if you win the rat race you're still a rat हे तत्व ठेवून चालणारे आम्ही बरेचसे मित्र हे नंतरच्या काळात मैत्री झालेले आहोत. बालमित्र नव्हे समानशीले व्यसनेषु सख्यम यामुळे असेल

डान्या लिहिता झाला ते एक बरे झाले. मी स्मशानात काम करत असल्याने ओळखी फारशा टिकतच नाहीत, किंवा लोक टिकवायला बघत देखील नाहीत.

तिमा 15/04/2013 - 19:00
आत्तापर्यंत जास्तीतजास्त मित्र ऑफिसातच मिळाले आहेत. अगदी ज्यांच्याशी तात्विक कारणांवरुन कडाकडा भांडलो तेही शेवटी जवळचे मित्र झाले. तुलनेने मैत्री न करण्यासारखे लोक अगदी तुरळक भेटले. जे सोडून गेले ते अजूनही संपर्क ठेवतात. संपूर्ण नोकरीत कधीही स्पर्धा करणारे कोणी भेटले नाही. कदाचित माझेच स्टार उच्चीचे असावेत.

रमताराम 15/04/2013 - 19:55
डान्राव, लैच आतड्याने लिवलं राव. बर्‍याचशा मुद्द्यांशी सहमत. फक्त दोस्त बनवू नयेत हे चूक. आमचे जगण्याचे तत्त्वज्ञान साधे सोपे आहे. जिवाभावाचे मित्र करावेत पण जगण्यातील इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीबाबतही चिरंतनाची आस ठेवू नये. ती कधी ना कधी संपणारच आहे याची खूणगाठ बांधून ठेवावी. पण हरकत नाही, जे काही मैत्रीचे क्षण तुम्ही जगलात ते छोटे असतील, खोटे तर नसतील? मग जेवढे मिळाले ते पुरेपूर उपभोगावे नि हरवले की शक्य तितक्या लवकर त्यातून आतडे सोडवून घ्यावे नि खुल्या दिलाने त्या मैत्रीला टाटा करून पुढे चालते व्हावे. हीच गोष्ट डोक्यावर पाय देऊन जाऊ पाहणार्‍या तथाकथित मित्रांची. मित्रांना आपल्या कुवतीच्या मर्यादेत शक्य ती सारी मदत करावी पण एकदा दगा दिला (चूक वेगळी नि जाणीवपूर्वक दिलेला दगा वेगळा) की दोन द्यावे दोन घ्यावे याच न्यायाने वागावे. आजवर आमचे उत्तम चालले आहे.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 15/04/2013 - 22:07
हेच स्मिता.नं वेगळ्या शब्दांत इथं चौथ्या परिच्छेदात म्हटलं आहे. तिचेच शब्द:
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.
ऑफिसातला दोस्त असा काही प्रकार आपल्याला कधीच कळला नाही. दोस्त हा दोस्त. ऑफिसात तो झाला म्हणून ऑफिस त्याच्यात सामावत नाही, की तो ऑफिसातच रहात नाही.

प्यारे१ 15/04/2013 - 20:23
>>>>पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. >>>रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते? खूपच छान लिहीलंय.

मित्राचं नाव शेवटच्या शब्दात टाकण्याचा ड्रामॅटिक टच आवडला. पण त्यामुळे पहिले काही परिच्छेद वाचताना गोंधळ झाला. कारण मी 'ऑफिस'च्या जागी 'मराठी आंतरजाल' हा शब्द टाकून बघत होतो, आणि बऱ्याच गोष्टी जुळल्यासुद्धा. :)

अमोल खरे 15/04/2013 - 22:42
अप्रतिम लेख. परम्तु अनेकदा अतिपरिचयात अवज्ञा होतेच, माझ्या बाबतीतही झाली आहे. पण हा लेख फार फार आवडला.

उपास 15/04/2013 - 23:14
ऑफीसमध्ये मैत्री हा कळीचा मुद्दा बनू शकतो. मुळात तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड असला तरी तुम्ही त्याचे 'बेस्ट फ्रेंड' असालच असे नाही. हे एकदा डोक्यात घोळवले की सगळ्यांपासून सारख्या हातावर राहाणे सोप्पे जाते. In our life, few people come for season and few for reason असं म्हणतात. ह्यांच्यापलिकडे जे टिकतात ते आपले. 'काही नाही रे उगाच फोन केला..' असं म्हणून जो अगदी अनपेक्षितपणे फोन करतो/ इमेल टाकतो तो शरिराने दूर असला तरी मनाने जवळच :)

फार सुंदर लिहिलं आहेस भावा! क्या बात है! हेच श्रीकांतपंत आमचेही मित्र आहेत आणि खरंच, माणूस मस्त आहे... फक्त तुमच्यासारखाच वायदेआझम असल्यामुळे आम्ही त्याला प्रेमाने शिव्याही घालतो! ;)

क्या बात है! The more personal it gets the more universal it becomes - म्हणतात तसं प्रत्येकाच्याच मनातलं लिहिलं आहेस. अगदी मनापासून लिहिलेलं प्रकटन. हा श्रीकांत नशीबवान आहे तुझ्यासारखा दोस्त मिळायला :) जे.पी.

वात्रट 17/04/2013 - 15:14
काहि काहि वाक्य तर अगदी मनापसुन पटली. उदा " ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते "

स्मिता. 17/04/2013 - 16:03
अनेक वर्षांनंतर ;) डॉनरावांचा आणि तोही असा भावपूर्ण, सुरेख लेख वाचून छान वाटलं. मला वाटतं मैत्रीचं प्रेमासारखंच असतं. ती ठरवून होत नाही तर मनाच्या तारा जुळल्या तशी आपोआप होत असते, त्याकरता शाळा, कॉलेज, ऑफिस, इ. क्रायटेरियाची गरज नसते. त्यामुळे वर ररा, श्रामोंनी आणि इतर समविचारी लोकांनी लिहिलेलं अगदी पटलं!

वर अनेकांनी मांडलेल्या मुद्द्याशी सहमत की मैत्री ठरवून करता येत नाही. करियरच्या सुरूवातीला जे मित्र बनले ते आजही जवळचे मित्र आहे. करियरच्या सुरूवातीखेरीज भारतात काम न केल्याने अन परदेशात आल्यापासून फार मोठ्या आकाराच्या टिममध्ये काम न केल्याने मित्र की पदोन्नतीची संधी या धर्मसंकटात कधीच पडलो नाही.

आदिजोशी 18/04/2013 - 18:51
लै भारी रे डाण्या. आवडला लेख. मित्र बनायला आणि मैत्री टिकायला भेटणेच आवश्यक असतेच असे नाही. तू, धम्या, अभ्या, अबब, बिका आणि अजून कैक, ही सगळी भुतावळ भेटण्याआधीच माझ्या मित्रपरिवारात सामील होती. नंतर भेट फक्त उपचारापुरती राहिली.

वाचताना अगदी अगदी वाटले तरीही.... माझे मत मांडतो.. मैत्री असो प्रेम असो वा कोणतेही नाते असो, शाळा-कॉलेज-ऑफिस वा आपले हे आंतरजाळ हे फक्त एक नवीन नवीन माणसे भेटायचे अन नाते जुळायचे माध्यम असते असा साधासोपा आणि सकारात्मक विचार करणे केव्हाही चांगले.. मग जिथे सूर जुळेलसे वाटताहेत तिथे जुळवून टाकावेत.. एखाद्याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक असाल तर तुमच्या स्वताच्या मनातच मैत्रीची प्रामाणिक भावना कधी उपजणार नाही, अन जी भावना तुमच्या स्वत:च्या मनात उपजू शकत नसेल तिची तुम्ही समोरून अपेक्षा करणे म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे.. होते काय माहितेय, कॉलेजच्या पहिल्या वर्षाला पहिल्याच दिवशी आपल्यासाठी सारेच नवीन असतात, मग ज्यांचे आचार विचार अन कॉलेज लाईफ एंजॉय करायच्या पद्धती जुळतात त्यांचा एक ग्रूप बनतो.. प्रत्येक जण त्यामध्ये फिट असतो.. दुर्दैवाने ऑफिसमध्ये असे ग्रूप बनत नाहीत.. कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या मित्राच्या बरोबर बसायचे स्वातंत्र्य असते, ऑफिसमध्ये जो तुमच्या जवळ बसतो त्याला मित्र बनवावे लागते. :)

खालील ओळी वाचल्या आणि प्रतिक्रिया लिहिणे अपरिहार्य झाले शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये. पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. सन १ ९ ५ ९ ला SSC ला असलेले आम्ही वर्ग मित्र आणि मैत्रिणी महिन्यातून एकदा एकत्र येऊन भोजन करतो ज्या घरी भोजन असते त्या घरातील मुले ,सुना,नातवंडे यांचे चेहरे पाहणेही आनंददायी असते आजी आजोबा अरे तुरे कसे करत आहेत याचे नवल नातवंडाना वाटते मुले सुना हिरवट पणा डोळ्याआड करताना दिसतात आम्ही हे सगळे ENJOY करत असतो कारण त्या वेळी आमच्या तोंडी शाळा कॉलेज मधील भाषा असते महानगरपालिकेतील आणी कोर्टातील हेलपाटे अचानक दोस्त मिळण्याचे कारण झाले छान लेख लिहिलात . धन्यवाद !!

In reply to by देशपांडे विनायक

कपिलमुनी 20/04/2013 - 00:09
१९५९ च्या कॉलेजची भाषे मध्ये *कात जा.. येड** असे शब्द वापरायचा का तुम्ही ? भलतेच असंस्कृतपणा हो !! ते सुद्धा मित्र मैत्रीणीमध्ये..

In reply to by बॅटमॅन

शुचि 20/04/2013 - 05:38
बरोब्बर आई-बहीणींसमोरही शिव्या दिल्याने कोणी असंस्कृत होत नाही. आज मुली आहेत उद्या आई आहे बहीण आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही.

In reply to by शुचि

बॅटमॅन 21/04/2013 - 16:34
प्रतिसादातला अस्थानी उपरोध एक महत्वाचा फरक नजरेआड करत आहे. आई-बहीण यांसमोर शिव्या देणे आणि कसलेही नाते नसलेल्या मुलींसमोर शिव्या देणे यात लै मोठा फरक आहे. दोन्ही केसेस आजिबात सारख्या नाहीत याची नोंद घेणे. मित्रांत पाहिजे त्या शिव्या देणारे इन जण्रल वडिलांसमोर शिव्या देत नाही. तीच गोष्ट आई किंवा बहिणीसमोर शिव्या न देण्याची. तो नात्याचा मान आहे, लिंगाचा नाही. सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

शुचि 21/04/2013 - 18:30
सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.
बर्‍याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण. "जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.

In reply to by शुचि

"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.
अशा वाक्यांनी कानकोंडे होणारे पुरुष आणि अशी वाक्ये चार चौघात बोलणाऱ्या स्त्रिया हे दोन्ही स्वतः पाहिले आहेत.मूळ मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात हे भेद पाळावेत का? अदितीचे म्हणणे या मुद्द्यावर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एक टक्क्याचाही तिरकसपणा नाही या वाक्यात. खरेच इच्छा आहे.

In reply to by शुचि

बॅटमॅन 22/04/2013 - 00:35
बर्‍याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण.
स्त्रीशरीरावर बेतलेल्या प्रत्येक शिवीसाठी पुरुषशरीरावर बेतलेली एक शिवी मिळेल. आणि मी उगी तयार करून सांगत नाहीये. "मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार" या पुस्तकात सुमारे ८०० असभ्य म्हणी व वाक्प्रचार दिलेले आहेत. ते पाहिल्यास याचा पडताळा येईल. संभोगक्रियेवर आधारित बर्‍याच शिव्या असता, पण त्या दोहोंपैकी कुणालाही लागू शकतात अशा आहेत फॉर द मोस्ट पार्ट.
"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.
इथे त्या विशिष्ट शिवीचा अर्थ तुम्ही जो घेतला आहे तोच दरवेळेस घेतला जातो असे नाही. कानकोंडे होण्यासाठी गृहीत धरलेला अर्थच सर्व ठिकाणी घेतला जात नसल्याने हा मुद्दा गैरलागू आहे.
समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.
पण पुरुषांच्या भावनांचा काडीमात्र विचार न करता भसाभस समस्त पुरुषांवर मुक्ताफळे उधळली की स्त्रीवादी म्हणवून घेणे हे मॅनर्समध्ये मोडते ना!! शिवाय जाल-कूल पॉइंट्स मिळतात ते वेगळेच. पण पुरुषांनी मात्र बायकांच्या तथाकथित भावनांचा विचार करायचा आणि चुप्प रहायचे. भावनांची गळवे फुटतील ना !! पुरुषांच्या भावना काय भावना असतात? आहार-निद्रा-धन-मैथुन या पलीकडे पुरुषांना नाहीतरी कळतेच काय म्हणा.

In reply to by शुचि

बॅटमॅन 22/04/2013 - 01:53
शेवटची पुरवणी: जुन्या पिढीतल्या पुरुषांच्याच नव्हे, तर बायकांच्याही तोंडी शिव्या सर्रास असत. त्याचे कुणाला गैरही विशेष वाटत नसे. ते सर्व लोक म्यानरलेस आणि आत्ताचे लोक तेवढे म्यानरफुल असे तुमचे म्हण्णे आहे काय? व्हिक्टोरियन काळात बेगडी सभ्यतेचे दवणीय काढे भारताला पाजले गेले आणि आपण उग्गीच सोवळे झालो. हा इतिहास विसरून सद्यस्थितीचं जस्टिफिकेशन देण्यासारखा तर्कदुष्टपणा दुसरा नाही. असो. आता मात्र थांबतो.

In reply to by कपिलमुनी

मी माझ्या शाळेतील,माझ्या त्या दिवसातील भाषा वापरणार हे आपण समजून घ्याल असे वाटले पण मलाच का असे वाटते हे समजत नाही आणि हो संस्कृती दुसरी किव्हा निराळी असू शकते असंस्कृत संस्कृती असते?

आलसस्य कुतो विद्या| अविद्यस्य कुतः धनम| अधनस्य कुतः मित्रं| अमित्रस्य कुतः सुखं|| भाकित- भविष्यात ऑफिस मधले मित्रच डॉन्याच्या प्रसंगी उपयोगाला येतील

पैसा 15/04/2013 - 15:20
बरेच दिवसांनी लिहिलेले सुरेख प्रकटन. कधीतरी असे व्यक्त होणे चांगले असते. सगळ्याच भावना नेहमी लपवून ठेवू नयेत.

In reply to by पैसा

ऋषिकेश 15/04/2013 - 18:05
अगदी +१ फक्त हल्ली कम्युनिकेशची खूप साधने आहेत त्यामुळे ऑफिसेस बदलली तरी मैत्री साफ तुटते असे अनुभवास आलेले नाही हीच काय ती चंदेरी किनार, अर्थात संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!

In reply to by ऋषिकेश

मनराव 15/04/2013 - 18:12
संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!
तुटत राहते ते सुद्धा काही काळा पुरता..... नंतर मागे उरतात त्या कडु/गोड आठवणी.....

अद्द्या 15/04/2013 - 15:27
आवडेश डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढण कठीण त्यातल्या त्यात मित्रांच्या बाबतीत . तर महाकठीण . . असो . . "टच " मध्ये राहण्याचा प्रयत्न तर होईलच . . तो सुटू नये अशी अशा . .

एका विशिष्ट टप्प्यानांतर एकूणच मित्र बनवणे जमत नाही. आपण आपल्या प्रकाराने मानसिक दृष्ट्या सेट झालेले असतो. अड्जस्टमेंट करायला जमत नाहीत. लेख आवडला -२८ व्या वर्षी पोक्त पणा आलेला अमोल

In reply to by छोटा डॉन

शुचि 15/04/2013 - 18:22
मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" गुड-मॉर्निंगही करायच्या भानगडीत पडत नाही. दिसले .... केलं पण मुद्दाम शेजार्‍याला कधीच करत नाही. यामागे कारण आहे. समजा रोज विश केलं तर मग ती सवय अन ऑब्लिगेशन होऊन बसतं. कधी त्याच्याबरोबर थोडं (किंचीत) बिनसलं की मग आपण विश करत नाही आणि ते मग खुपतं. त्यापेक्षा "इनडिफरंट" फसाड बरा वाटतो. सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले. डॉन यांचा अनुभव सुदैवाने वेगळा आहे त्याबद्दल आनंदच आहे.

In reply to by शुचि

चावटमेला 17/04/2013 - 12:20
१००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात ते फक्त कलीग्ज, सहकर्मचारी, बास्स. मित्र वगैरे बनविण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं (अनुभवाने शहाणा झालेला) चावटमेला

In reply to by चावटमेला

शुचि 17/04/2013 - 20:13
पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात घुसमट होते हेही तितकेच खरे आहे. आपण उस्फूर्तपणे काही सांगू इच्छितो अन एक मन म्हणतं "हूम आर यु टेलींग? इझ ही/शी योर फ्रेंड? A BIG NOOOO!!!!" अन मग आपण गप्प बसतो. पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.

In reply to by शुचि

सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले.
ऑफिस बद्दल बोलताय की रोडीज बद्दल ??

In reply to by शुचि

भारततल्या पश्चिमी सभ्यतेवरचा एक रिअ‍ॅलिटी शो (एम टिव्ही). संवादात सतत बीप वाजत असते. मला तर एकदाच पाहून किळस वाटली होती. बरेच लोक चवीने बघतात. एकाने सांगितले होते की लिडरशीप क्वालिटी वगैरे डेवलप होते म्हणे ;-).

In reply to by बॅटमॅन

'पश्चिमी सभ्यता' चा उपयोग करण्यामागे एक कथा आहे. अमेरिकेत मी तसा नवा असतानाचा हा प्रसंग. काही सहकारी अमेरिकेत आलोच आहोत तर स्ट्रीपक्लबला जाऊन दौलतजादा करून पुण्य कमवावे म्हणून आसूसले होते. माझ्याही फारच मागे लागले होते. त्यापैकी एक जण हिंदी भाषक असल्याने त्यास रंग दे बसंती चित्रपटातील शब्दांचा वापर करून 'मै पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं रखता' असे ऐकवले होते. अन त्या संध्याकाळी तीन लोक मोठ्या उत्साहाने कामगिरीवर निघाले. तेव्हा कुणाचकडे चतुरभ्रमणध्वनी नव्हते. चांगले कपडे घालून, फवारे मारणे वगैरे सुरू असताना एकाने घाईघाईत स्ट्रीपबार चा पत्त्ता शोधला अन नोंदवून घेतला. जिपिएस वापरून त्या ठिकाणी पोचल्यावर एक हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली कसले तरी मेटॅलिक स्ट्रीप बार्स बनवणारी ;-). तेव्हापासून मी त्यांना 'कैसी रही पश्चिमी सभ्यता' व ते मला 'क्यो तुम्हे तो पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं हैं ना?' असे चिडवत असत. बाकी मागाहून कळले की मिसूरी राज्यात त्या प्रकारावर बंदी आहे व त्यासाठी नदीपलिकडे इस्ट सेंट लुईसला जावे लागते जे इलिनॉय राज्यात आहे.

मन१ 15/04/2013 - 15:48
डॉन लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला. लेखन/प्रकटन जे काही आहे ते आवडले/भावले.

In reply to by गुलाम

कोमल 21/04/2013 - 11:54
खरोखर... लेख आवडला.. पण असे कलिग्ज कम मित्र/मैत्रिणी मिळणे फारच अवघड असते बॉ...

७३ ते ८१ एवढ्या प्रदीर्घ कालात एकाच कंपनीत नोकरी करून कांही मित्र जमवले होते. ते सर्व चांगले होते. कदाचित त्या काळात आणि माझ्या व्यवसायात एवढी चढाओढ नव्हती. पण, मला तरी माझ्या सर्व मित्रांचा चांगलाच अनुभव आला. अगदी शिक्षणात मार्गदर्शन करण्यापासून ऑफिसमध्ये तात्पुरता होणारा फायदा सोडून देऊन दूरदृष्टीने 'अनुभव' मिळविण्याचा सल्ला मला ह्या मित्रांकडून मिळाला. त्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहे.

मैत्र 15/04/2013 - 16:54
फार दिवसांनी लिहिते झाले डानराव याबद्दल आनंद आहे. थोड्या धुसर गोष्टी झकास नेमक्या पद्धतीने मांडल्या आहेत. खूप आवडलं ते हे -- "ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही "

आनंद घारे 15/04/2013 - 17:20
माझी एक पेट थिअरी अशी आहे की माणसाचे मन जन्मतः मातीच्या गोळ्याप्रमाणे ओलसर असते आणि त्याला विशिष्ट आकार आलेला नसतो. दोन मुलांची गट्टी लगेच जमते. वय वाढत जाते तसतसे मन सुकत आणि कठीण होत जाते. दोन मने जुळण्यासाठी समान आवडी किंवा लाभ वगैरे गोंदाची गरज पडते. उतारवय येईपर्यंत ते शुष्क झालेले असते आणि त्याला अनेक कंगोरे आलेले असतात. त्यानंतर फेविकॉल सुद्धा लावता येत नाही. डॉनच्या वयामध्ये असतांना दिवसाचा बहुतेक सगळा वेळ ऑफिसमध्ये जात असल्यामुळे त्या वेळात ज्या व्यक्ती संपर्कात येतात, त्यांच्यातल्या कोणाकोणाशी आपण काही ना काही शेअर करत असतो, त्या निमित्याने जोडले जात असतो. पण जेंव्हा लाभ किंवा हानी याचा प्रश्न येतो तेंव्हा तो जोड निखळतो. ते होतांना थोडे कष्टही होतात. आपसानध्ये काही वितुष्ट नसतांना बाह्य कारणांमुळे दूर जावे लागले तर जास्त दु:ख होते. आज संपर्कसाधनांमुळे जग इतके जवळ आले आहे की शरीराने दूर गेले तरी एकमेकांना स्क्रीनवर पाहू शकतो, बोलू शकतो, वाटल्यास मैत्री राखू शकतो.

शिद 15/04/2013 - 17:36
म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये
+११११११११११ अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे असे वाटते...पहिल्या कंपनीमध्ये अख्खी प्रोजेक्ट टीम ३ वर्षांत एकमेकांची जिवलग बनली होती पण तो जॉब सोडताना डोळ्यातुन पाणी वहायला लागले होते :( ...म्हणुन आता वर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे ऑफिसात यारी-दोस्ती टाळतो.

वाह ...डॉन राव , मस्त लिहलय..आणी हेवा वाटतोय श्रीकांतचा (तुमच्या सारखा मित्र मिळाल्यामुळे). कुठेतरी वाचलेय " If friendship is your weakest point then you are the strongest person in the world".. जियो यार (असेच जिवाभावाचे मित्र लाभलेला)

सुबोध खरे 15/04/2013 - 18:36
ऑफिसात मैत्री असू नये किंवा ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो. मी सरकारी नोकरीत होतो २३ वर्षे किंवा कोर्पोर्रेट हॉस्पिटल मध्ये ४ वर्षे तेथे झालेली माझी मैत्री अजून टिकून आहे. कितीतरी मित्र जरी वर्षात एकदा किंवा दोनदा भेटलो तरी पूर्वीसारखाच जिव्हाळा कायम आहे. प्रत्येक माणूस हा तुमच्या बढती किंवा पगाराच्या स्पर्धेत असतो असे नाही. माझे मित्र हे वेगवेगळ्या शाखेत असल्यामुळे असा कधीही प्रकार घडला नाही. कोणी पैथोलोजीस्ट कोणी हृदयविकार तज्ञ कोणी प्रशासकीय अधिकारी असे असले तरी समान विचार सरणी मुळे झालेली मैत्री आजही कायम आहे. लष्करातील पायलट पाणबुडी अधिकारी असेही लोक आम्ही आवर्जून भेटतो. यात एक फरक आहे तो नुसते आम्ही नव्हे तर आमच्या बायकांची तर जुळली तर मैत्री पुढे चालू राहते नाहीतर ती हळूहळू कमी होते. even if you win the rat race you're still a rat हे तत्व ठेवून चालणारे आम्ही बरेचसे मित्र हे नंतरच्या काळात मैत्री झालेले आहोत. बालमित्र नव्हे समानशीले व्यसनेषु सख्यम यामुळे असेल

डान्या लिहिता झाला ते एक बरे झाले. मी स्मशानात काम करत असल्याने ओळखी फारशा टिकतच नाहीत, किंवा लोक टिकवायला बघत देखील नाहीत.

तिमा 15/04/2013 - 19:00
आत्तापर्यंत जास्तीतजास्त मित्र ऑफिसातच मिळाले आहेत. अगदी ज्यांच्याशी तात्विक कारणांवरुन कडाकडा भांडलो तेही शेवटी जवळचे मित्र झाले. तुलनेने मैत्री न करण्यासारखे लोक अगदी तुरळक भेटले. जे सोडून गेले ते अजूनही संपर्क ठेवतात. संपूर्ण नोकरीत कधीही स्पर्धा करणारे कोणी भेटले नाही. कदाचित माझेच स्टार उच्चीचे असावेत.

रमताराम 15/04/2013 - 19:55
डान्राव, लैच आतड्याने लिवलं राव. बर्‍याचशा मुद्द्यांशी सहमत. फक्त दोस्त बनवू नयेत हे चूक. आमचे जगण्याचे तत्त्वज्ञान साधे सोपे आहे. जिवाभावाचे मित्र करावेत पण जगण्यातील इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीबाबतही चिरंतनाची आस ठेवू नये. ती कधी ना कधी संपणारच आहे याची खूणगाठ बांधून ठेवावी. पण हरकत नाही, जे काही मैत्रीचे क्षण तुम्ही जगलात ते छोटे असतील, खोटे तर नसतील? मग जेवढे मिळाले ते पुरेपूर उपभोगावे नि हरवले की शक्य तितक्या लवकर त्यातून आतडे सोडवून घ्यावे नि खुल्या दिलाने त्या मैत्रीला टाटा करून पुढे चालते व्हावे. हीच गोष्ट डोक्यावर पाय देऊन जाऊ पाहणार्‍या तथाकथित मित्रांची. मित्रांना आपल्या कुवतीच्या मर्यादेत शक्य ती सारी मदत करावी पण एकदा दगा दिला (चूक वेगळी नि जाणीवपूर्वक दिलेला दगा वेगळा) की दोन द्यावे दोन घ्यावे याच न्यायाने वागावे. आजवर आमचे उत्तम चालले आहे.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 15/04/2013 - 22:07
हेच स्मिता.नं वेगळ्या शब्दांत इथं चौथ्या परिच्छेदात म्हटलं आहे. तिचेच शब्द:
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.
ऑफिसातला दोस्त असा काही प्रकार आपल्याला कधीच कळला नाही. दोस्त हा दोस्त. ऑफिसात तो झाला म्हणून ऑफिस त्याच्यात सामावत नाही, की तो ऑफिसातच रहात नाही.

प्यारे१ 15/04/2013 - 20:23
>>>>पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. >>>रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते? खूपच छान लिहीलंय.

मित्राचं नाव शेवटच्या शब्दात टाकण्याचा ड्रामॅटिक टच आवडला. पण त्यामुळे पहिले काही परिच्छेद वाचताना गोंधळ झाला. कारण मी 'ऑफिस'च्या जागी 'मराठी आंतरजाल' हा शब्द टाकून बघत होतो, आणि बऱ्याच गोष्टी जुळल्यासुद्धा. :)

अमोल खरे 15/04/2013 - 22:42
अप्रतिम लेख. परम्तु अनेकदा अतिपरिचयात अवज्ञा होतेच, माझ्या बाबतीतही झाली आहे. पण हा लेख फार फार आवडला.

उपास 15/04/2013 - 23:14
ऑफीसमध्ये मैत्री हा कळीचा मुद्दा बनू शकतो. मुळात तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड असला तरी तुम्ही त्याचे 'बेस्ट फ्रेंड' असालच असे नाही. हे एकदा डोक्यात घोळवले की सगळ्यांपासून सारख्या हातावर राहाणे सोप्पे जाते. In our life, few people come for season and few for reason असं म्हणतात. ह्यांच्यापलिकडे जे टिकतात ते आपले. 'काही नाही रे उगाच फोन केला..' असं म्हणून जो अगदी अनपेक्षितपणे फोन करतो/ इमेल टाकतो तो शरिराने दूर असला तरी मनाने जवळच :)

फार सुंदर लिहिलं आहेस भावा! क्या बात है! हेच श्रीकांतपंत आमचेही मित्र आहेत आणि खरंच, माणूस मस्त आहे... फक्त तुमच्यासारखाच वायदेआझम असल्यामुळे आम्ही त्याला प्रेमाने शिव्याही घालतो! ;)

क्या बात है! The more personal it gets the more universal it becomes - म्हणतात तसं प्रत्येकाच्याच मनातलं लिहिलं आहेस. अगदी मनापासून लिहिलेलं प्रकटन. हा श्रीकांत नशीबवान आहे तुझ्यासारखा दोस्त मिळायला :) जे.पी.

वात्रट 17/04/2013 - 15:14
काहि काहि वाक्य तर अगदी मनापसुन पटली. उदा " ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते "

स्मिता. 17/04/2013 - 16:03
अनेक वर्षांनंतर ;) डॉनरावांचा आणि तोही असा भावपूर्ण, सुरेख लेख वाचून छान वाटलं. मला वाटतं मैत्रीचं प्रेमासारखंच असतं. ती ठरवून होत नाही तर मनाच्या तारा जुळल्या तशी आपोआप होत असते, त्याकरता शाळा, कॉलेज, ऑफिस, इ. क्रायटेरियाची गरज नसते. त्यामुळे वर ररा, श्रामोंनी आणि इतर समविचारी लोकांनी लिहिलेलं अगदी पटलं!

वर अनेकांनी मांडलेल्या मुद्द्याशी सहमत की मैत्री ठरवून करता येत नाही. करियरच्या सुरूवातीला जे मित्र बनले ते आजही जवळचे मित्र आहे. करियरच्या सुरूवातीखेरीज भारतात काम न केल्याने अन परदेशात आल्यापासून फार मोठ्या आकाराच्या टिममध्ये काम न केल्याने मित्र की पदोन्नतीची संधी या धर्मसंकटात कधीच पडलो नाही.

आदिजोशी 18/04/2013 - 18:51
लै भारी रे डाण्या. आवडला लेख. मित्र बनायला आणि मैत्री टिकायला भेटणेच आवश्यक असतेच असे नाही. तू, धम्या, अभ्या, अबब, बिका आणि अजून कैक, ही सगळी भुतावळ भेटण्याआधीच माझ्या मित्रपरिवारात सामील होती. नंतर भेट फक्त उपचारापुरती राहिली.

वाचताना अगदी अगदी वाटले तरीही.... माझे मत मांडतो.. मैत्री असो प्रेम असो वा कोणतेही नाते असो, शाळा-कॉलेज-ऑफिस वा आपले हे आंतरजाळ हे फक्त एक नवीन नवीन माणसे भेटायचे अन नाते जुळायचे माध्यम असते असा साधासोपा आणि सकारात्मक विचार करणे केव्हाही चांगले.. मग जिथे सूर जुळेलसे वाटताहेत तिथे जुळवून टाकावेत.. एखाद्याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक असाल तर तुमच्या स्वताच्या मनातच मैत्रीची प्रामाणिक भावना कधी उपजणार नाही, अन जी भावना तुमच्या स्वत:च्या मनात उपजू शकत नसेल तिची तुम्ही समोरून अपेक्षा करणे म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे.. होते काय माहितेय, कॉलेजच्या पहिल्या वर्षाला पहिल्याच दिवशी आपल्यासाठी सारेच नवीन असतात, मग ज्यांचे आचार विचार अन कॉलेज लाईफ एंजॉय करायच्या पद्धती जुळतात त्यांचा एक ग्रूप बनतो.. प्रत्येक जण त्यामध्ये फिट असतो.. दुर्दैवाने ऑफिसमध्ये असे ग्रूप बनत नाहीत.. कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या मित्राच्या बरोबर बसायचे स्वातंत्र्य असते, ऑफिसमध्ये जो तुमच्या जवळ बसतो त्याला मित्र बनवावे लागते. :)

खालील ओळी वाचल्या आणि प्रतिक्रिया लिहिणे अपरिहार्य झाले शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये. पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. सन १ ९ ५ ९ ला SSC ला असलेले आम्ही वर्ग मित्र आणि मैत्रिणी महिन्यातून एकदा एकत्र येऊन भोजन करतो ज्या घरी भोजन असते त्या घरातील मुले ,सुना,नातवंडे यांचे चेहरे पाहणेही आनंददायी असते आजी आजोबा अरे तुरे कसे करत आहेत याचे नवल नातवंडाना वाटते मुले सुना हिरवट पणा डोळ्याआड करताना दिसतात आम्ही हे सगळे ENJOY करत असतो कारण त्या वेळी आमच्या तोंडी शाळा कॉलेज मधील भाषा असते महानगरपालिकेतील आणी कोर्टातील हेलपाटे अचानक दोस्त मिळण्याचे कारण झाले छान लेख लिहिलात . धन्यवाद !!

In reply to by देशपांडे विनायक

कपिलमुनी 20/04/2013 - 00:09
१९५९ च्या कॉलेजची भाषे मध्ये *कात जा.. येड** असे शब्द वापरायचा का तुम्ही ? भलतेच असंस्कृतपणा हो !! ते सुद्धा मित्र मैत्रीणीमध्ये..

In reply to by बॅटमॅन

शुचि 20/04/2013 - 05:38
बरोब्बर आई-बहीणींसमोरही शिव्या दिल्याने कोणी असंस्कृत होत नाही. आज मुली आहेत उद्या आई आहे बहीण आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही.

In reply to by शुचि

बॅटमॅन 21/04/2013 - 16:34
प्रतिसादातला अस्थानी उपरोध एक महत्वाचा फरक नजरेआड करत आहे. आई-बहीण यांसमोर शिव्या देणे आणि कसलेही नाते नसलेल्या मुलींसमोर शिव्या देणे यात लै मोठा फरक आहे. दोन्ही केसेस आजिबात सारख्या नाहीत याची नोंद घेणे. मित्रांत पाहिजे त्या शिव्या देणारे इन जण्रल वडिलांसमोर शिव्या देत नाही. तीच गोष्ट आई किंवा बहिणीसमोर शिव्या न देण्याची. तो नात्याचा मान आहे, लिंगाचा नाही. सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

शुचि 21/04/2013 - 18:30
सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.
बर्‍याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण. "जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.

In reply to by शुचि

"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.
अशा वाक्यांनी कानकोंडे होणारे पुरुष आणि अशी वाक्ये चार चौघात बोलणाऱ्या स्त्रिया हे दोन्ही स्वतः पाहिले आहेत.मूळ मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात हे भेद पाळावेत का? अदितीचे म्हणणे या मुद्द्यावर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एक टक्क्याचाही तिरकसपणा नाही या वाक्यात. खरेच इच्छा आहे.

In reply to by शुचि

बॅटमॅन 22/04/2013 - 00:35
बर्‍याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण.
स्त्रीशरीरावर बेतलेल्या प्रत्येक शिवीसाठी पुरुषशरीरावर बेतलेली एक शिवी मिळेल. आणि मी उगी तयार करून सांगत नाहीये. "मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार" या पुस्तकात सुमारे ८०० असभ्य म्हणी व वाक्प्रचार दिलेले आहेत. ते पाहिल्यास याचा पडताळा येईल. संभोगक्रियेवर आधारित बर्‍याच शिव्या असता, पण त्या दोहोंपैकी कुणालाही लागू शकतात अशा आहेत फॉर द मोस्ट पार्ट.
"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.
इथे त्या विशिष्ट शिवीचा अर्थ तुम्ही जो घेतला आहे तोच दरवेळेस घेतला जातो असे नाही. कानकोंडे होण्यासाठी गृहीत धरलेला अर्थच सर्व ठिकाणी घेतला जात नसल्याने हा मुद्दा गैरलागू आहे.
समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.
पण पुरुषांच्या भावनांचा काडीमात्र विचार न करता भसाभस समस्त पुरुषांवर मुक्ताफळे उधळली की स्त्रीवादी म्हणवून घेणे हे मॅनर्समध्ये मोडते ना!! शिवाय जाल-कूल पॉइंट्स मिळतात ते वेगळेच. पण पुरुषांनी मात्र बायकांच्या तथाकथित भावनांचा विचार करायचा आणि चुप्प रहायचे. भावनांची गळवे फुटतील ना !! पुरुषांच्या भावना काय भावना असतात? आहार-निद्रा-धन-मैथुन या पलीकडे पुरुषांना नाहीतरी कळतेच काय म्हणा.

In reply to by शुचि

बॅटमॅन 22/04/2013 - 01:53
शेवटची पुरवणी: जुन्या पिढीतल्या पुरुषांच्याच नव्हे, तर बायकांच्याही तोंडी शिव्या सर्रास असत. त्याचे कुणाला गैरही विशेष वाटत नसे. ते सर्व लोक म्यानरलेस आणि आत्ताचे लोक तेवढे म्यानरफुल असे तुमचे म्हण्णे आहे काय? व्हिक्टोरियन काळात बेगडी सभ्यतेचे दवणीय काढे भारताला पाजले गेले आणि आपण उग्गीच सोवळे झालो. हा इतिहास विसरून सद्यस्थितीचं जस्टिफिकेशन देण्यासारखा तर्कदुष्टपणा दुसरा नाही. असो. आता मात्र थांबतो.

In reply to by कपिलमुनी

मी माझ्या शाळेतील,माझ्या त्या दिवसातील भाषा वापरणार हे आपण समजून घ्याल असे वाटले पण मलाच का असे वाटते हे समजत नाही आणि हो संस्कृती दुसरी किव्हा निराळी असू शकते असंस्कृत संस्कृती असते?

आलसस्य कुतो विद्या| अविद्यस्य कुतः धनम| अधनस्य कुतः मित्रं| अमित्रस्य कुतः सुखं|| भाकित- भविष्यात ऑफिस मधले मित्रच डॉन्याच्या प्रसंगी उपयोगाला येतील
मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही.... तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही.... पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत. सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.