मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

जुळले अजून आहे

जयवी ·
लेखनविषय:
काव्यरस
सरले बरेच काही, उरले अजून आहे कोठेतरी जरासे, जुळले अजून आहे वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, इमले अजून आहे अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे जयश्री

जगणे सुरात आले

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना

मी निघालो हो कळफलक घेऊन..

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
काव्यरस
मी निघालो हो कळफलक घेऊन हो रस्त्यावर हो मार्गावर ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला.. त्या संस्थळावर मला ती भेटली तिला पाहून माझी सटकली तिच्या कवितेत लैला दिसली मी मजनू बनून आलो रसग्रहण करून आलो सगळ्या निंदा आणि नालस्त्या मी फाट्यावरती मारून आलो ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. मग एकदा संपादक आला धाग्यावरती काठ मारून गेला काय माहिती कोण होता मला मात्र कंपूबाज वाटला मी अन्यायाला वाचा फोडली अजून एक जिलबी पाडली जिलबीने पुन्हा युद्ध पेटली ओ काही संस्थळ आली..

मी वळूनी हासले - चुकले जरासे

सांजसंध्या ·
लेखनविषय:
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

रे मना ..

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
रे मना .. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले श्वास होते रोखलेले मी कधीचे भास होते खास आज कळून गेले जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना शोधते वैरी कुठे वितळून गेले - संध्या (२३.२०.२०१०) गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन

आकाश उजळले होते,,,

अन्नू ·
काव्यरस
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>

स्वप्नांस शाप आहे............!

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या झाला सराव आता, अंधार साहण्याचा या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा संध्या

आजची रात्र...

चाणक्य ·
लेखनविषय:
सुटुनी चांदण्या रातीतून, पहाट शिरतसे नभात या तरूण आहे मात्र अजूनी, रात्र आजच्या क्षणांत या मनातले वादळ तुझ्या-माझ्या, उतरे मद्याच्या प्याल्यांत या एक एक घोट फिरूनी, काहूरतो शरीरात या न आहे न होती कधी, तमा लोकांची मला नाही तरी काय मिळाले, त्यांच्यासवे जगण्यात या दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या चार भिंतीं पलिकडे, थोपविलेस तू 'त्या' वणव्याला सखया आज राख होऊदे, जगावेगळ्या जळण्यात या आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या

दुनिया तुझ्यामुळे....

चाणक्य ·
लेखनविषय:
दुनियादारी शिकण्या शिकविण्यात, जन्म सारा चालला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला ते न फसवे आता हास्य ओठी जे दावतो श्वास होउनी गेल्या आता रिती ज्या मी पाळतो न जाणो कधी कसा हा जीव, ऐहिकात रमाया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला सुजनाची धुंदी आता होय मला पारखी शब्दही लेखणीत यायला मागतात पालखी असा कसा फकीराचा पाय, वस्तीत रुताया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला दुनिया तूच सांगशी काय करू अन करू नको जरी सरणावर पडलो तरी सांगशील मरू नको अताशा न देताही मला तुझा, आदेश कळाया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला, दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चा