मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

लपून रहाण्याची जागा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज प्रो.देसाई विशेष खूष दिसले.त्यांना जुन्या आठवणी आल्याने मला काहीतरी सांगावंसं वाटत होतं.मला म्हणाले, " सामंत ईकडे बसा.मी तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगतो." मी म्हणालो, "भाऊसाहेब,मीच आज तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो" तरूण वयांत सैन्यात जाण्याचे खूप मनांत येत असतं.कदाचीत देशप्रेमाच्या आसक्ती पेक्षा युनीफॉर्मचा भप्केपणा, शिस्त आणि मान मिळतो त्याचच आकर्षण जास्त असावसं असं मला वाटतं.त्याचं असं झालं आमचा मोठा भाई,प्रभाकर त्यावेळी पंचवीस एक वर्षाचा होता.

म्हणे कोण मागे आले...

आगाऊ कार्टा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जोशी मास्तर हे गावातले एक बुजुर्ग आणि सदा हसतमुख व्यक्तीमत्व. आता मास्तर म्हणायाला ते काही शाळेवर शिक्षक नव्हते काही. ते होते गावातल्या पोस्टात पोस्टमास्तर. हजार बाराशे वस्तीचं ते छोटसं गाव त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाशी मास्तरांचा नित्यनेमाने संबंध येत असे. कोणालाही चटकन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे गावात त्यांना खूप मान होता. मास्तर नोकरीला लागले ते याच गावात. पत्नी आणि दोन मुले हा त्यांचा संसार. मुले गावातच लहानाची मोठी झाली आणि उत्तम पदवीधर होऊन बाहेर मोठ्या शहरात नोकरीला गेली. दोन चांगल्या सुस्वरुप आणि मुख्य म्हणजे सुस्वभावी मुली बघून मास्तरांनी दोघाही मुलांची लग्ने लावून दिली.

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याला जोडून ठेवीत असतं.

ती संध्याकाळ...

nishad ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळी ८. ३० ची वेळ होती. मी असाच ऑफिस मध्ये कामाच्या गडबडित होतो. तसा इतक्यात नेहमीच ऑफिस मढ़ना घरी जायला उशीर व्हयाचा. काम भरपूर होत. ती दिवसभर माझ्या सोबतच असायची. आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो. तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत पण तरीही एक अनामिक ओढ़ आमच्यात होती. ती नेहमी म्हणायची की " मी तिला जरा उशीरा भेटलो" मी कामात गुंग असतांना ती माझ्यासाठी काफी आणायची. आम्ही रात्री बर्याच वेळ पर्यंत गप्पा मारायाचो. नंतर मी तिला रात्री तिच्या घरी ड्राप करायचो. तीन चार महीने कसे गेलेत कळलच नाही. दिवस असेच धुंदीत चालले होते.

"कढी,सार,ताक असात तां!" (असेल ते)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आईला नेहमी काळजी वाटायची की पंगत बसल्यावर तिसर्‍या भातावर काय वाढायचं?ताक,कढी की सार?त्याचं असं झालं की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड, थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं.

संगीतातला माझा सहकारी.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं." "मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो." "असं का तू म्हणतोस?" असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला, "मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो. मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च

एका मनीमाऊचा किस्सा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले, "हे गंगाधर अधिकारी,गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे. आमच्या शेजार्‍यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो." त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं. पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्‍यावर किंचीतसं स्मित

"लळा जिव्हाळा शब्दच मोठे"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"रामभाऊ" असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला " रामा"म्हणायचे तर कुणी त्याला "रे,रामा "अशी साद घालायचे कुणी "रामा रे " असं पण म्हणायचे.सर्व साधारणपणे लोक त्याला "रामा" च म्हणायचे. तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना, त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले, "हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे,आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही." आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने त्याला विचारलं, "तू शाळेत जाणार का?" पण तो,शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं.

अळूची भाजी खाऊन वाचलो तर.......

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती.

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.