निर्णय
मान्य आहे ते सत्तेत होते
मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली
मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते
त्यांच्यातले बरेच जण
खरे असतील
हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी
आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या
विरोधातही असतील
पण कदाचित
निर्णायक क्षणी समोर आलेली
त्यांची काही अपरिहार्यता असेल
किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना
घाईसुद्धा झाली असू शकते...
ईतकी वर्षं लढा दिल्यावर
समोर विजय दिसत असतानाची घाई
सगळं सगळं मान्य आहे
पण तरीही ,
ते मूठभरच होते
तुम्ही तर करोडोंच्या संख्येने होता ना
का नाही सांगितलंत मग
...की आम्हाला नकोय फाळणी
प्रभावी
या कवितेची पार्श्वभूमी
खूप छान कविता केली आहे. मला
छान आहे कविता !
+१