मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

वेल्लाभट · · काथ्याकूट
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता. बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो. गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच. भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला? मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा! तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा! असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका) तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही. पिंगा नेमका कधी घालतात? या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही. या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे. मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो. पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला वेल्ला भट

वाचने 105518 वाचनखूण प्रतिक्रिया 344

In reply to by आबा

रेवती Sat, 11/21/2015 - 00:59
तुमच्या या प्रतिसादाच्या वर दोन प्रतिसाद सोडून वाचा की पिंग्यात चुकीचे काय आहे. थोडेसे वाचत वाचत खाली गेलात तर सांगोपांग चर्चा झालीये.

In reply to by आबा

मृत्युन्जय Wed, 12/02/2015 - 11:54
हे बघा उद्या शिवाजी महाराजांवर चित्रपट बनला तर जिजाऊ बाईसाहेबांना त्यात लावणी सादर करताना दाखवतील हे लोक. ते चालेल का तुम्हाला? वर तोंड करुन बोलायला तयार आहेतच हे लोक की लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून इतपत दाखवले तर काय वाईट म्हणुन.

In reply to by आबा

सूड Sat, 11/21/2015 - 00:30
तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, जेव्हा लोक परकी भाषा, संस्कृती शिकतात तेव्हा तुमचे शिक्षक त्या त्या भाषेतले, संस्कृती दाखवणारे सिनेमे बघायला सांगतात. आता उद्या जर कोणी हा सिनेमा बघितला आणि स्वप्नरंजन म्हणून का होईना हे दृष्य त्यात असलं, ती व्यक्ती काय समजेल? थोडा विचार करता आला तर बघा, नाहीतर तुमचं जे चाललंय ते उत्तम आहे.

In reply to by सूड

आबा Sat, 11/21/2015 - 00:41
मला माहीत नसेल असे गृहीतच धरलेय त्याबद्दल धन्यवाद. अहो भन्साळी चा पांचट सिनेमा आहे तो त्यावरून कोणी मराठी संस्कृती शिकायला जाणार नाही, चिंता नको अब्राहम लिंकनची बायोग्राफी शिकविण्यासाठी "अब्राहम लिंकन , द वँपायर हंटर " हा चित्रपट बघायला सांगतील का? किंवा दुसर्या महायुद्धाचा इतिहास शिकण्यासाठी कोणी "इन्ग्लोरियस बास्टर्ड्स" बघेल का? (इथे टॅरँटीनो आणि भन्साळीची तुलना करत नाहीय)

In reply to by आबा

स्रुजा Sat, 11/21/2015 - 00:46
तुम्हाला माहित नसेल असं वाटावं असेच प्रतिसाद देताय तुम्ही. एकिकडे पांचट म्हणताय त्या सिनेमाला एकिकडे त्याच सिनेमा ला डीफेंड करताना लोकांना रेसिस्ट म्हणताय, त्यांचा माज चालू आहे म्हणताय. एकदा काय ते ठरवुन घ्या.

In reply to by स्रुजा

आबा Sat, 11/21/2015 - 01:01
मी सिनेमाला नाही डीफेंड करत (कारण माझ्या डीफेन्स ने काही फरक पडणार नाही ) इतिहासा पासून फारकत घेतली आहे हे तर स्पष्टच आहे पहिल्याच कमेंट मध्ये तसं लिहिलय मी... मला त्या गाण्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण होतं असं मात्र वाटत नाही कारण त्यात व्हल्गर काहीच वाटत नाही चोप्रा , पदुकोण आणि रणवीरसिंग यांच्या दिसण्याबद्द्लच्या कमेंट्स मात्र रेसिस्ट्च आहेत वरती कोणीतरी बीसीसीआयला बीसीसीआयचे ड्बे जोडलेले असतील तरच महत्व कळेल असंही लिहीलेलं आहे (if you are a true Indian...) :)

In reply to by आबा

स्रुजा Sat, 11/21/2015 - 01:07
अहो त्यांच्या नाही पेशव्यांच्या दिसण्याबद्दल कॉमेंट चालल्यात इथे. पात्ररुपांतर कलाकाराचं झालंच पाहिजे. उद्या तुम्ही विक्रम गायकवाड वगैरे लोकांना गाशा गुंडाळुन घरी जायला सांगाल. सुबोध भावे ने "बालगंधर्व" दिसण्यासाठी किती मेहनत घेतलीये ते बघा.. निम्मी लढाई तिथेच जिंकली जाते.

In reply to by आबा

रेवती Sat, 11/21/2015 - 00:56
सिनेमा पाहून संस्कृती शिकायला नको हे अगदी सत्य आहे पण काळ इतका बदललाय की झटपट संस्कृती शिकण्याच्या नादात चित्रपटमाध्यम हेच शिक्षणाचे माध्यम बनू पहात आहे. त्याबद्दल जालावर असेल ते हाताशी लगेच उपलब्ध होऊ शकते ना, मग तेच सत्य असे मानण्याची विचित्र पद्धत येऊ पाहतिये म्हणून व एक जबाबदार दिग्दर्शक (जो तो नाहीच) या नात्याने काही गोष्ती करणे आवश्यक असते. ज्या माध्यमावर आपण कोट्यावधी रुपये कमावणार आहोत ते निदान योग्य गोष्टीचे तरी असावेत अशी त्या दिग्दर्शकाला निदान इच्छा तरी असावी.

In reply to by आबा

काळा पहाड Fri, 11/20/2015 - 16:48
आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.
थोडक्यात, १. उद्या भन्साळी ने महाराजांवर चित्रपट काढला आणि त्यात सईबाईसाहेब, सोयराबाईसाहेब यांना असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला? २. उद्या भन्साळी ने आंबेडकरांवर चित्रपट काढला आणि त्यात त्यांच्या पत्नीला असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला? ३. उद्या भन्साळी ने महात्मा फुलेंवर चित्रपट काढला आणि त्यात सावित्रीबाईंना असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला? की पंचरंगी माज फक्त काही जातींनीच करावा असा दंडक आहे?

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ Fri, 11/20/2015 - 17:01
का,पा. तुमचा क्रम चुकला. आणि एक नाव तर तुम्ही विसरुनच गेलात. फुले शाहू आंबेडकर असा पाहिजे ना क्रम.

In reply to by काळा पहाड

आबा Sat, 11/21/2015 - 00:18
मला या तिन्हींमुळे काही फरक पडणार नाही, तुम्हाला मात्र पिंगा गाण्याने पडलेला दिसतोय आणि माज सुद्धा जस्टीफाय्बल वाटतोय, तस्मात, समस्या माझी नाही तुमची आहे कोणी माज करावा आणि कोणी नाही याचे दंडक मी ठरवत नाही

ऋषिकेश गुरुवार, 11/19/2015 - 16:32
चित्रपटाच्या आधीच त्याच्या प्रसिद्धीत इतके सदस्य गुंतलेले पाहून गंमत वाटली. एक शक्यता म्हणून असं समजा की प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं काशीबाई (किंवा बाजीराव) स्वप्नात बघताहेत वगैरे असे काही असेल तर इतक्या सगळ्या गोंधळाची प्रसिद्धी टेक्नीक वगळता काय किंमत राहिल? तेव्हा चित्रपट प्रदर्शीत झाल्याशिवाय याविषयी मत देणे आततायी वाटते!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन गुरुवार, 11/19/2015 - 17:51
असे म्हणणारे लोकच पुढे काहीही दाखवलं तरी ते ज्याचे त्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे वगैरे वकिली करण्यात पुढे असतात असा अनुभव आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश गुरुवार, 11/19/2015 - 19:23
आता काय ज्याचा त्याचा परीघ आणि ज्याचा त्याचा अनुभव! कोणत्याही चित्रपटावर बंदि नसावी असे वाटते. ज्यांना बघायचे नाही त्यांनी बघु नये, अगदी एकत्र येऊन सामुदायिक बहिष्ष्कार घालावा. वाट्टेल तितकी टिका करावी, चित्रपट पाहून त्याचे अगदी वाभाडे काढावे. तो त्यांचा हक्कच आहे! मात्र सरकारने प्रदर्शन रोखु नये इतकेच! मला हा चित्रपट बघायचा नाहीच ए, मात्र तो इरतांनीही बघायचा नाही ही मानसिकता मला समजत नाही. बाकी इतिहासाचा विपर्यास केलाय की नाही हे मी एका भागावरून ठरवू शकत नाही पूर्ण कलाकृती बघावी लागेल.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन गुरुवार, 11/19/2015 - 19:33
ज्यांना बघायचे नाही त्यांनी बघु नये, अगदी एकत्र येऊन सामुदायिक बहिष्ष्कार घालावा. वाट्टेल तितकी टिका करावी, चित्रपट पाहून त्याचे अगदी वाभाडे काढावे. तो त्यांचा हक्कच आहे! मात्र सरकारने प्रदर्शन रोखु नये इतकेच!
अल्पसंख्याक धर्माबद्दल काही सेन्सिटिव्ह गोष्टी दाखवणार्‍या पिच्चरबद्दल हेच मत असेल का? उदा. दा विंची कोड या पिच्चरला भारतातील ख्रिश्चन संघटनांनी केलेला विरोध बाकी तुम्हांला मान्यच असेल, नै? आता यावर लगेच "त्यांना सांगा" छाप प्रतिसाद म्हणून झटकून स्वमतांध दांभिकतेत मग्न होण्याचे स्वातंत्र्यही आहेच म्हणा.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा गुरुवार, 11/19/2015 - 19:50
भारतातील ख्रिश्चन संघटनांनी केलेला विरोध >> अरे ते ख्रिश्चन संघटनांचे मतस्वातंत्र्य वा त्यांची अभिव्यक्ती का काय ते.

In reply to by बॅटमॅन

चैतन्य ईन्या गुरुवार, 11/19/2015 - 19:54
फुल टू सहमत. हे हल्लीचे स्वयंघोषित लिबरल वैताग आणतात. ह्यांचा सगळा विरोध फक्त एकाच विचारसरणीला. तिची भूमिका सगळीकडे ह्यांना ठेवता येत नाही आणि मग तद्दन फालतू कारण देतात. मग ह्यांच्यात आणि हे ज्या संघिष्ट लोकांना नावे ठेवतात त्यांच्या काही फरक दिसत नाही. एक ह्या टोकाला आणि एक दुसर्या टोकाला. एकाने मारले तर तो भयंकर गुन्हा आणि दुसर्याने केले तर मग त्यांच्यावर कित्ती कित्ती अन्याय होतो. बाप रे वगैरे उसासे टाकून समर्थन. अवांतर इथे. बाकी निवडणूक संपल्यापासून एकजात सगळे असहिष्णू वगैरे वातावरण संपलेले दिसते. एकदम न्याय गोष्टींचा विजय झाल्याने कसे मोकळे आकाश मिळाले आहे आणि सगळे पुरस्कार पुन्हा पुढील निवडणुकी साठी जपणे चालू आहे असे दिसते. शिवाय तिकडे प्यारीस मध्ये इतका हलकल्लोळ त्यावर गुळमुळीत प्रतिक्रिया (ती पण दिली कि नाही माहिती नाही बहुदा बातमीची दाखल बहुदा घेतली गेली पण तोंड उघडायची हिम्मत काही दाखवलेली दिसत नाही ) देवून मामला मितावालेला दिसतो. तसाच प्रकार आहे. डा विन्ची असो वा तस्लिमा नसरीन नाहीतर तारेक फताह असो. तिकडे एकदम कानाडोळा. वर ते काय लायकीचे वगैरे म्हणजे जसे संघाचे लोक बाकीच्यांना लेखतात तसलेच. काय फरक नाही दोघांच्यात.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश गुरुवार, 11/19/2015 - 20:09
अज्जिबात नाही. सोयीस्कर गैरसमज नकोत. कोणत्याही चित्रपट म्हणजे कोणत्याही चित्रपटावर बंदी नसावी. डा विंची कोडवरही नाही आणि नथुराम गोडसे बोलतोय नाटकावरही नाही की घाशीराम कोतवालही नाही.. बंदी नसावी इतकंहच!

In reply to by ऋषिकेश

बाळ सप्रे Fri, 11/20/2015 - 10:26
कोणत्याही चित्रपट म्हणजे कोणत्याही चित्रपटावर बंदी नसावी
नाही नाही असं सर्वसमावेशक विधान नको. एक एक स्पेसिफिक उदाहरण घेउन म्हणजे काय तो दा विंची, विश्वरूपम वगैरे इतर धर्मांमुळे वादात आलेल्या सगळ्या कलाकृतींविषयी बॅन नको असे डीटेलवार स्टेटमेंट द्या. एकजरी नाव राहीलं तर तर तुम्ही हिंदूविरोधी लिबटार्ड निधर्मांध वगैरे वगैरे !!

In reply to by ऋषिकेश

कपिलमुनी Fri, 11/20/2015 - 15:26
निळ्या चित्रफिती सुद्धा सार्वजनिकरीत्या दाखवायला आपली करकत नसावी >? ज्याला हव्या त्याने बघाव्या बाकीच्यानी बघु नये ! बरोबर ?

In reply to by ऋषिकेश

पद्माक्षी Fri, 11/20/2015 - 09:55
चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या प्रत्येक कलाकृतीवर बंदी घालायला हवी आणि प्रदर्शन पण रोखावे. या गाण्यात इतिहासाचा विपर्यास केलाय हे तरी तुम्हाला मान्य?? मग हे गाणे चित्रपटातून काढण्याबद्दल आपले मत काय?

In reply to by पद्माक्षी

ऋषिकेश Fri, 11/20/2015 - 12:17
या गाण्यात इतिहासाचा विपर्यास केलाय हे तरी तुम्हाला मान्य??
हे मी चित्रपट पाहिल्याशिवाय नाही ठरवु शकत. इतक्या ठामपणे काहीही म्हणायला विदा पुरेसा नाही.
मग हे गाणे चित्रपटातून काढण्याबद्दल आपले मत काय?
हेच गाणे असे नाही चित्रपटातील प्रत्येक गोष्टीवर दिग्दर्शक/निर्मात्यांचा अधिकार असतो. त्यात सरकारने लुडबुड करू नये. जर सेन्सॉर बोर्डाने संमती दिली असेल तर सरकारने यात लक्ष घालु नये ते सरकारचे काम नाही. माझे तर नाहीच नाही!

In reply to by ऋषिकेश

पद्माक्षी Fri, 11/20/2015 - 16:20
समजले नसेल तर परत एकदा विचारते. पिंगा या गाण्याचे चित्रीकरण इतिहासाला धरून आहे का? हो किंवा नाही ?

In reply to by पद्माक्षी

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 16:26
अनैतिहासिक चित्रीकरण असले तरी त्याबद्दल काही बोलायचा तुम्हांला हक्क नाही हो. ते काम शेणसार बोर्डाचे. एकदा त्यांनी हो म्हटले की काहीही असले तरी तुम्हांला बघावेच लागणार.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Fri, 11/20/2015 - 16:56
काहीही हं बॅ! बघावेच कशाला लागेल? नसेल बघायचे तर बघु नये असे आधीच म्हटले आहे. हवं तर सामुदायिक बहिष्कार घालावा. तो प्रेक्षकांचा हक्कच आहे असे आधीच म्हटलेय!

In reply to by पद्माक्षी

ऋषिकेश Fri, 11/20/2015 - 16:54
हेच सांगायला माझ्याकडे पुरेसा विदा नाही. हे गाणे कुठे घडते? प्रत्यक्षात घडते म्हटले आहे का बाजीराव नुसते स्वप्न बघतोय? का इतरच कारणासाठी वापरले आहे? (जसे चित्रपटात नावे जात असतान?, किंवा चित्रपट बाह्य गाणं नुसतं प्रमोशन पुरतं!) समजा चित्रपटात हे स्वप्न आहे तर बाजीरावाने असे स्पप्न बघणे इतिहासाला धरून नाही वगैरे म्हणणे गंमतीचे ठरेल तेव्हा, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच त्याबद्दल बोलता येईल. त्यावर टिका करता येईल (मला ते नाही आवडले तर मी टिका करेनही, इतरांनाही सांगेन की चित्रपट बघु नका, फार गैर काही वाटले तर जाहिर वाभाडे काढेन अगदी!) पण आधीच काय? -=== दुसरे असे की इतिहासात काय घडले असेल याविषयी इतकी दुमते आहेत की तुमच्या मते प्रत्येक ऐसिहासिक चित्रपटावर बंदी यायला हवी म्हणाल, कारण त्यात काहीतरी तृटी असतातच! हे चित्रपट ललित कलाकृती आहेत डॉक्युमेंटरी नाहीत!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 17:56
दुसरे असे की इतिहासात काय घडले असेल याविषयी इतकी दुमते आहेत की तुमच्या मते प्रत्येक ऐसिहासिक चित्रपटावर बंदी यायला हवी म्हणाल, कारण त्यात काहीतरी तृटी असतातच! हे चित्रपट ललित कलाकृती आहेत डॉक्युमेंटरी नाहीत!
असे जनरलाईझ्ड विधान ठोकून दिले की अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून मोठा तीर मारला अशा भ्रमात राहणार्‍यांना एक प्रश्न आहे: जो इतिहासाचा भाग या पिच्चरमध्ये आहे त्याबद्दल नक्की काय दुमत आहे हे पाहिले का? न पाहता अशी विधाने ठोकून देणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य का? ललित कृती वगैरे खूप ऐकतोय म्हणून प्रश्नः ते चार्ली हेब्दो बद्दल काय मत आहे? झालंच तर इस्लाम संस्थापक मुहंमद यांवरील पिक्चरमध्ये त्यांना प्रत्यक्ष दाखवले तर चालेल का?

In reply to by ऋषिकेश

sagarpdy Fri, 11/20/2015 - 18:32
काही दिवसांनी आमचे अमराठी शेजारी-पाजारी मराठी नृत्य म्हणून याला स्टेरिओटाईप करतील. काही दिवसांनी हे पण म्हणू लागतील कि मराठी चित्रपट आणि इतर कलाकृतींनाच महाराष्ट्राची संस्कृती योग्य पद्धतीने दाखवताच नाही येत म्हणून. (तुनळी वर या चर्चा सुरु झाल्यात). म्हातारी मेल्याचं दुखः नाही…

In reply to by sagarpdy

लई भारी Sat, 11/21/2015 - 09:00
तुनळी वरच्या प्रतिक्रिया:
"Now thats what you call a true marathi maharashtrian dance, song, dress and set...I doubt even marathi movies could this!! Awesome...mind blowing...its gonna be huge hit in Maharashtra...this song...fab!!" "amazing song... and superb set... if u see the background it seems to be Reformation of Shanivar wada.. this movie is gonna be a masterpiece.. waiting for 18th december to watch it.." "I think Deepika also danced well. But yes Priyanka's looks and expressions are great in this maharashtrian attire." "Bhansali sir you are magical ..deepika why you are so perfect you are dancing like a dream you nailed mastani character in every bit"
अवघड आहे! बरेच शोधलं तरी एकपण नकारात्मक(निगेटिव्ह) प्रतिक्रिया दिसत नाही.

भंकस बाबा गुरुवार, 11/19/2015 - 17:21
वर दिलेले प्रतिसाद वाचले . ज्यांची इतिहासाची मजल शिवाजी महाराजांच्या पुढे गेली नाही अशानि बाजीराव मस्तानी वर आक्षेप घेतलेले पाहून मज्जा आली. ह्या निमित्ताने बाजीराव तरी पड़द्यावर आला. आत्तापर्यंत कोणाला का नाही सुचले हो बाजीरावाला पड़द्यावर आणायचे? राघोबा म्हटले की नारायणराव आठवणार पण अटकपार झेंडे विसरून जाणार. भंसाली काहीही दाखवु देत, त्या निमित्ताने मराठ्यांचा एक उपेक्षित नायक लोकांसमोर येतो आहे. उत्तर भारतियाना कळू देत महापुरुष म्हणजे फ़क्त ओरंगजेब नव्हे ज्याच्या नावाने शहरे उभी राहिली. बाजीरावाचे कर्तुत्व ओरंग्याहुन मोठे होते. तुम्ही तेच बाहेर नाही येऊ दिले तर लोकांना कळणार कसे?

In reply to by भंकस बाबा

सूड गुरुवार, 11/19/2015 - 17:47
उपेक्षित नायक
हे कधी ठरलं? शेवटी समर्थन करायचंच झालं की कशाचंही करता येतं हे असल्या कमेंट्सवरनं पटतं आपल्याला!!
ज्यांची इतिहासाची मजल शिवाजी महाराजांच्या पुढे गेली नाही अशानि बाजीराव मस्तानी वर आक्षेप घेतलेले पाहून मज्जा आली.
तुमचा हा प्रतिसाद वाचून तुम्ही किती पाण्यात आहात याचाही अंदाज आला. या आता!! किंवा असं करतो आम्हीच येतो. तुमचं चालू द्या.

In reply to by सूड

भंकस बाबा गुरुवार, 11/19/2015 - 18:58
९०% मराठी माणसांना पहिला हो पहिला बाजीराव माहित असण्याची शक्यता कमीच. १०%त तुम्ही येत असाल. माहित असण्याचा चुकीचा अर्थ काढु नका. बाजीरावांने मस्तानी बरोबर लग्न केले बस, ह्यापुढे इतिहास काय विचारू नका. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चा होईल. जगाला कळेल बाजीराव विषयी. गुग्गलवर बाजीराव शोधले जाईल. हेही नसेल थोड़के राहता राहिला प्रश्न काशीबाईच्या नाचन्याचा. नक्की काय म्हणायचे आहे टीकाकाराना? काशीबाई नाचू शकत नव्हती का कुलवंत स्त्रियानी नाचू नए? मागे एका मराठी मालिकेत हो मराठी मालिकेत राघोबांची पत्नी आनंदीबाई एका वैद्याकडून मसाज करुन घ्यायची गोष्ट करते. खलनायिका असली म्हणून काय झाले ती काय कुलवंताच्या घरची सुन नव्हती? तेव्हा या संस्कृतिरक्षकाच्या शेंडीला झिनझिन्या आल्या नव्हत्या.

In reply to by भंकस बाबा

सूड गुरुवार, 11/19/2015 - 19:10
आधीच म्हटलं की राव तुमचं चालू द्या. आनंदीबाईने वैद्याकडून मसाज करुन घ्यायची गोष्ट करणं आणि एक पायाने अधू असलेली बाई रादर पेशव्यांची बायको, पिंग्याचं गाणं वाजवून, दिंड्याच्या एखाददोन स्टेप्स देऊन, 'पिंगा....सेन्सेशनल लावणी नंबर' अशी पब्लिसिटी करुन दणादणा नाचताना दाखवणं यात तुम्हाला फरक कळत नाही त्यातच सगळं आलं. 'पिंगा आणि लावणी दोन्हींचा संबंध काय' हा प्रश्न तुम्ही जर सिनेमॅटीक लिबर्टी मध्ये धरत असलात तर तिथेच बोलणं खुंटलेलं आहे. कशीबशी नऊवारी नेसली, नथ घातली, खोपा घातला आणि कपाळावर चंद्रकोर काढली की झालंच मराठी, नै का? स्वतः पेशव्यांच्या वंशजाने लिहीलेलं पत्र वाचा. त्यातूनही तुम्हाला काही वाटलं तर ठीक, नाहीतर भंसाळ्याने काशी केलीच आहे, तुम्ही भर घाला. धन्यवाद!!

याॅर्कर गुरुवार, 11/19/2015 - 18:38
एक सांगू काय? मसाला टाकल्यावरच पदार्थ चविष्ट बनतात. पण सिनेमात भन्साळींनी जो मसाला टाकलाय तो तुमच्यासारख्यांना रूचला नाहीये हे प्रतिक्रियांवरून दिसतयं. . . . . नै म्हणजे बाॅलीवूडवाल्यांकडून भलत्याच अपेक्षा तुमच्या? "बाजीराव मस्तानी" असं नाव आहे सिनेमाचं,"बाजीराव" नव्हे. आता विकिपिडिया काय म्हणतयं बघा. बाजीराव मस्तानी एक आने वाली भारतीय ऐतिहासिक रोमांस फ़िल्म है जिसका निर्देशन और निर्माण संजय लीला भंसालीने किया है। फ़िल्म मराठा साम्राज्य के पेशवा बाजीराव और उसकी दूसरी पत्नी मस्तानी के बारे में बताती है। . तर हे असं हाय सगळं,आणि तुम्ही सगळे उगाच त्रास करून घेताय.

In reply to by याॅर्कर

sagarpdy गुरुवार, 11/19/2015 - 19:03
राऊ वाचा. बाजीरावाची युद्ध सोडली तरी पिच्चर चालवायला असल्या मसाल्याची गरज नाही. हा प्रकार मेगीत गोडा मसाला घातल्यागत आहे.

In reply to by sagarpdy

भंकस बाबा गुरुवार, 11/19/2015 - 19:23
मागे शाहरुखने माय नेम इज खान च्या वेळेला असाच गदारोळ उडवून दिला होता. त्याने अमेरिकेत आपल्यावर झालेला कथित अत्याचार मिडियामार्फत पद्धतशीरपणे लोकांसमोर आणला. वर शिवसेनेने पण रान उठवले. परिणाम काय? तर हां टुक्कार चित्रपट हिट झाला. आत्ता तर मोजकि मराठी माणसे सोडल्यास कोणी विरोध करेल असे दिसत देखील नाही. घ्या दगडावर डोके फोडून! कोणी सांगितले गोडा मसाला घालून मैग्गी चांगली लागत नाही म्हणून? राव खाऊन बघा ना एकदा मग सांगा.

सतिश गावडे गुरुवार, 11/19/2015 - 19:35
कोकणात दही-हंडीच्या दिवशी पुरुषांचे खेळ असतात. त्यात पिंगाही असतो. पिंग्याची सुरुवात "माझा पिंगा घालतो डिंगा" अशा काहीशा गाण्याने होते. तो पिंगा भन्साळीच्या पिंग्यापेक्षा खुप वेगळा असतो.

भंकस बाबा गुरुवार, 11/19/2015 - 19:58
सतराव्या शतकातील महाराष्ट्रियन स्रीया! आड़दांड उंचीची प्रियंका कुठल्या एंगल ने महाराष्ट्रीय वाटते? आधी या नायिका भारतीय काय तर ऐतिहासिक देखील वाटत नाही. त्यावर कोणाचा आक्षेप नाही? पिक्चर हिट जाणार बाबानो १०० करोड़ कुठेच् गेले नाही

संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 20:19
जाउदे, लै मनाला लावून घेयाचं काम नय. ते भनसाळीचं हायवेवरचं हाटील हाये, तुम्ही चना-मसाला मागा का आलुमटर, सगळ्या डीश असो, ग्रेवी तीच, मेन इन्ग्रीडियंट बदलून दीतं. सालं कंचबी डिष मागा, शेमटूशेम ट्येष्ट लागती. आता त्येनी वेज कोल्हापुरीच्या नावाखाली मिक्सभाजी दिली तर काय करायचं? खावा मुकाट किंवा उठा सुसाट.

सागरकदम गुरुवार, 11/19/2015 - 21:02
मेल्या भंन्साळ्या, नतद्रष्टा... त्या सटवी बरोबर इकडची स्वारी नाचले असतील, मी नव्हे. थांब तुला आता दिवाळीचा ऊरलेला फराळच खायला घालते, थांबच तू... - काशीबाई

काकासाहेब केंजळे गुरुवार, 11/19/2015 - 21:36
http://m.firstpost.com/bollywood/why-the-outrage-around-bajirao-mastanis-pinga-is-casteist-and-hypocritical-2511398.html By Mrunmayi Ainapure Most of us netizens of urban India have become quite inured to our hourly routines of awakening to the cacophony of public outrage on social media that revolves – like clockwork – around seemingly trivial matters. One tends to dismiss most of these with a sigh and a bout of furious scrolling. Yesterday, however, was an exception. As someone who has lived in Pune all her life, the bone of contention, this time around, hit quite literally close to home. Shortly after a harmless dance number titled ' Pinga' from Sanjay Leela Bhansali's upcoming film Bajirao Mastani , featuring Deepika Padukone and Priyanka Chopra, was released online, Facebook was inundated with a slew of posts from a sizeable chunk of the Marathi Brahmin community (mostly residents of Pune, although Maharashtra-born NRIs aching to stay connected to their roots joined in soon enough) with responses to the song. These ranged from scathing to plain hysterical; the criticism touched upon various factors that seemed to have disappointed these viewers, such as the "ridiculousness" of showing the two wives of warrior king Bajirao Peshwa I – Kashibai (Chopra) and Mastani (Padukone) – dancing together, the direct lifting of the song's tune and lyrics from the popular Marathi lavani ' Latpat Latpat Tuzha Chalna ' and its arbitrary fusion with the traditional Mangla Gaur hymn ' Naach Ga Ghuma' in a mish-mash of wildly different genres. Notwithstanding the serious bafflement over why one would expect anything beyond ostentatious sets, larger-than-life song-and-dance sequences and a sensational re- interpretation of a historical story from Bhansali – going by his filmography so far or given that he has never claimed to be a Richard Attenborough – the annoyance over the distortion of history and anthropology is legitimate. If you're a Punekar, who has grown up hearing stories about a quaint era that has been etched in your city's collective consciousness, your displeasure with its unrealistic on-screen portrayal is understandable. History lessons told you that Kashibai Peshwa had a limp in her leg, and could not possibly have gyrated her hips to such a caper, much less with a woman she is known to have formally met just once in her life. So, this song makes no sense to you? Fair enough. But, despite being a 'Puneri mulgi' myself, and having grown up around several of the aforementioned Marathi Brahmins affronted by ' Pinga' , I found something particularly disconcerting about the onslaught of venom directed towards the song, which is how quickly and smoothly it escalated to acquire a distinctly jingoistic veneer. Sighted online were more than a few eye-wateringly long threads, shaming the "inappropriate" attire (read: low waist nine-yard or nauvari sarees) donned by the leading ladies in the song. Many of the objectors, who I couldn't help but notice clearly had 'upper caste' surnames, have sanctimoniously voiced objections on how "a decent Maharashtrian lady, especially one hailing from a royal family, would never reveal this much skin, as if she were an item girl” – a statement that could frankly serve to stereotype and offend both groups of women. Some of these self-proclaimed guardians of Marathi culture insisted, "Learn to drape the time-honored nauvari in a respectable, khandani manner,” making one wonder whether they were protesting the lack of authenticity perceived in the costumes or their supposed skimpiness. One person even went so far as to comment on how the dusky Chopra does not possess the "fair skin and delicate features” of a Chitpavan Brahmin woman. Others have lashed out about how showing a Peshwa queen dancing in a "vulgar” manner could "mar the essence of Marathi tradition”. A piece on a reputed online publication in its critique of the song declared that no Marathi woman "bobs her head like that”. This frenzy not only releases a whiff of blatant patriarchal sentiment, but also leaves you with a disturbing aftertaste of casteism, classism and a smuggish re-assertion of Brahminical superiority – which is (supposed to be) plain astounding in this day and age. What's more amazing is that few seem to be bothered about aspects of the song that actually warrant critical analysis, such as how it doesn't mirror the repressive attitude towards women in the Peshwa society and instead, paints a false, happy, shiny picture of ' soutans being sahelis'. Nah, all most people seem to want to tut-tut about is the "immodesty" of the costumes; all they seem to be disgusted about is the objectionable choreography, which "does not behoove the virtuous Peshwa ladies". As someone who likes to call herself a liberal in a city where I have observed a substantial section of the local populace to be fairly conservative, one of my biggest pet peeves continues to be the casual spectacle of purebred fanaticism we're still faced with everyday – especially when it comes to challenging Pune's erstwhile heritage, even in an instance as innocuous as this which involves the medium of cinema. For now, it appears that I'm going to simply have to wade through this wave of righteous, jingoistic outbursts that have taken over my social media feeds, until the furore over this great insult to the glorious times of Maharashtra – when demurely dressed Marathi girls didn't disgrace their families by prancing around in public – dies down. Mrunmayi Ainapure is a freelance writer based in Pune. पुणेरी लोकांना झोडपले आहे.मला काय नीट कळलेनाही,ा

In reply to by काकासाहेब केंजळे

स्रुजा गुरुवार, 11/19/2015 - 22:29
ऐनापुरे काकुंच्याच भाषेत बोलायचं तर हा लिबरल अ‍ॅटिट्युड आहे की सो कॉल्ड "अप्पर कास्ट" बद्दल पूर्वग्रह? कुणीही इथे ब्राह्मणी आणि चित्पावनी लोकांच्या संस्कृतींबद्दल बोलत नाहीये. पेशवे अख्ख्या मराठी राज्ज्याचे होते. पटवर्धन यायचे तसे होळकर शिंदे पण यायचे. साधी गोष्ट आहे, तुम्ही ओबामांवर सिनेमा काढताना ह्रितिक रोशन ला घ्याल का? घेतलं तर त्याला मेक ओव्हर करुन उभं कराल. त्याला काळे लेन्सेस द्याल, त्याचा गोरा रंग बदलाल. तो शोभला तर पाहिजे ओबामा, पब्लिक ला रीलेट तर करता आलं पाहिजे. त्या ओबामाला सुट देताना डकी टाय द्याल का? पायात स्पोर्ट शुज घालेल का ते पात्र सुट वर? मिशेल ओबामा ला आक्षेपार्ह पद्धतीने स्वतःला सादर करताना दाखवाल का? २ गोष्टींमध्ये बक्कळ माती खाल्ली आहे या गाण्याने: एक तर ऑथेंटिसिटी आणि दुसरं म्हणजे कल्चरल सेन्सिटिविटी !!! दुसरा प्रकार कशाशी खातात हे बहुसंख्य स्वयंघोषित लिबरल्स ना माहिती नसतं. आपले पंप्र बाहेरच्या देशात जातात तेंव्हा फर्स्ट लेडिज भारतीय पोषाखात येतात. ते लोकं इकडे येतात तेंव्हा नमस्ते करतात. अगदी क्लायंट्स ना देखील आमच्या इथुन सांगुन पाठवलं जातं की नो हग्ज, नो किसेस, भारतीय स्त्री एम्प्लॉयीज ना ते अवघडणारं वाटु शकतं. साधी गोष्ट : कल्चरल सेन्सिटीविटी. यातलं काय न समजण्याजोगं आहे? आडनावांचं डेमोग्राफिक्स काढलं की फार तीर मारला का?? तुम्हाला पेशवे दाखवायचेत. मग त्यांची संस्कृती दाखवा ना. वर कुणीतरी रुक्मिणीच्या गाण्याची तुलना केली आहे. पेशवे निरस जीवन जगत नव्हते आणि पेशविणी पण कुणी जनानखान्यात कोंबलेल्या गायी नव्हत्या. नाच गाणी चालत ही होती पण पिंगा पिंगा करायचं आणी लावणी चा दंगा घालायचा हा बिनडोक प्रकार कशासाठी? त्या स्टेप्स बघा, ती ९ वारी बघा. स्किन शो , बॉलिवुड मसाला यातलं काहीही न करता देखील तो इतिहास सुरसच आहे, रंजकच आहे. भन्साळी ला नसलेलं डोकं चालवुन तो अजुन मसालेदार करायची काहीही गरज नाही .

In reply to by स्रुजा

रेवती गुरुवार, 11/19/2015 - 22:40
तेच काल आपण बोललो ना! जातीय रंग द्यायलाही कमी करणार नाहीत. इथे विषय चाललाय काय, लेख कोणत्या विषयावर आहे याचे भानच नाही. ऑथेंटिसिटी! हे आणि एवढेच.....................जर वेळ असेल तर व असेल तर कॉमनसेन्स वापरावा. पण तसे होणे नाही. उद्या दुसर्‍या राज्यातील राजावर शिनेमा काढला तर तिथेही हेच लागू होईल. जाऊ दे अगं! त्या भन्साळीला डोके नाही म्हणावे तर असले छप्पन्न लेख येतील व अशा लोकांची कमतरता नसल्याचे सिद्ध करून जातील.

In reply to by काकासाहेब केंजळे

सूड गुरुवार, 11/19/2015 - 22:52
ही बाई डोक्यावर पडलीये का? असल्या स्वतःला 'पुणेरी मुलगी' म्हणवणार्‍या छप्पन पाह्यल्यात. त्याचा अभ्यास किती गंडलाय हे तुला कळतंय का बयो?

In reply to by सूड

स्रुजा गुरुवार, 11/19/2015 - 23:00
शूक !! असं नाही म्हणायचं सूड भौ !! लिबरल वागायचं ! पेशवाईतल्या बायका मंगळागौरीला लावणी वर खेळ करत होत्या ! अस्सल पेश्वयांना काय कळतंय बायकांचं मन? पेशवाईतल्या बायकांचं स्वातंत्र्य , सवतीला घेऊन लावणी करण्यात सामावलेलं होतं. ती काव्यात्मक लिबर्टी घेऊन भंसाळी ने एक प्रकारे पेशवीणींना मरणोत्तर न्याय दिलाय. त्या बाजीरावाशी एकनिष्ठ राहताना मस्तानी आजुबाजुच्या वातावरणात खुप होरपळली पण तिला पण वाड्यात आणुन नाचवलंय... कसली आलीये शोकांतिका.. सिनेमामध्ये तिघेजण एकत्र शनिवारवाड्यात नांदताना पण दाखवत असतील. काव्यात्मक न्याय , यु नो !! उरलं सुरलं काम ऐनापुरे बाई करणारेत सगळ्यांना लिबरल बनवुन.

भंकस बाबा गुरुवार, 11/19/2015 - 22:07
अनारकली हे कल्पित पात्र आहे तर मस्तानी हे खरे. .बाय द वे , आपल्याकडे बाकी पण्डित आहेत मस्तानी काय घालत असेल ते सांगायला. त्या फारिनच्या मडमा इथे सूना बनून येतात तवा चौपाटिवर काय ते बिकीनी का काय घालून फिरतात का वो?

In reply to by भंकस बाबा

कविता१९७८ गुरुवार, 11/19/2015 - 22:33
अहो बाबा , अनारकली ही ड्रेसची पॅटर्न आहे. आधीच्या काळातील मुस्लीम नर्तकीचा पेहेराव .

रमेश आठवले गुरुवार, 11/19/2015 - 23:31
काशीबाई यांनी लावणी पद्धतीचा नाच केल्याचे संजय लीला भन्साळी यांनी दाखवल्याचे वर काही प्रतिसादात आले आहे. उद्या या भन्साळी साहेबांनी शहाजहान आणि मुमताज महल यांच्या वर चित्रपट काढायचे ठरवले तर त्याना त्या चित्रपटात, आपल्या या सेक्युलर देशात, मुमताज महल यांचा मुजरा नाच दाखवण्याची हिम्मत होणार आहे का ?

In reply to by रमेश आठवले

वेल्लाभट Fri, 11/20/2015 - 11:17
इतकं लांब कशाला जाता? उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा झाला, आणि सईबाई किंवा अष्टराज्ञींपैकी कुणाचाही असा नाच दाखवला तर चालेल का? तशी हिंमत होईल का?

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 12:08
अहो पेशवे म्हणजे काय, कुणीही उठावे आणि काहीही बोलावे...कोण विचारतो, नै का? पण त्यासोबत "रणबीरसिंग बाजीराव शोभत नाही, त्याजागी कुणी पुणेकर घ्या" वगैरे कमेंटी होत्या, मी विचारले की बॉ पुणेकर सोडून बाकी कुणाला जमणार नाही का? तर म्हणे जमलं की कळवा... म्हणजे स्वतःच्या हातानेच अशी माती करून घ्यायची, पेशव्यांना पुण्यापर्यंतच मर्यादित ठेवायचे आणि वर गळे काढायचे की त्यांना कुणी भाव देत नाही म्हणून. आहे की नै मज्जा?

In reply to by वेल्लाभट

यांची गाडी आली शिवाजी महाराजांवर,पेश्व्यांचं चालू आहे तर् तेवढ्याचीच चर्चा करा कि,लगेच महाराश्ट्राच्या आराध्य दैवताला मधे आणायची गरज काय?

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट'जी
इतकं लांब कशाला जाता? उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा झाला, आणि सईबाई किंवा अष्टराज्ञींपैकी कुणाचाही असा नाच दाखवला तर चालेल का? तशी हिंमत होईल का?
म्हणजे कुणाला चालेल का? म्हणजे पेशवे तुमचे अन् महाराज आमचे? म्हणजे तुम्ही सोशीक अन् आम्ही डांबरट?

हेमन्त वाघे Fri, 11/20/2015 - 11:18
( आंतरजालीय लेखिका शेफाली वैद्य याकडून साभार) असाच चित्रपट जर नेहरूंवर काढूल त्यात असेच "विचारस्वातंत्र " घेतले तर ??? -------- माझे म्हणणे खरेच मजा येईल . काँग्रेसी लोकांची तर त्रेधा उईल . पण त्यात बहुदा देशी आणि विदेशी आयटम्स चा ग्रुप डान्स दाखवावा लागेल .. आणि लॉर्ड माउंट"बॉटम" बद्दाल की दाखवणार ?? विचारच करवत नाही .... हा चित्रपट बहुदा महेश भट किंवा कांती शाह लाच काढवा लागेल ...

कपिलमुनी Fri, 11/20/2015 - 15:33
https://www.change.org/p/the-honorable-chief-justice-of-bombay-high-court-stay-order-on-release-of-bajirao-mastani?recruiter=276045046&utm_source=share_petition&utm_medium=copylink इथे आक्षेप नोंदवू शकता

In reply to by कपिलमुनी

गामा पैलवान Sat, 11/21/2015 - 01:14
धन्यवाद कपिलमुनी. माझा आक्षेप नोंदविला आहे. त्याचा निर्देश : https://www.change.org/p/the-honorable-chief-justice-of-bombay-high-court-stay-order-on-release-of-bajirao-mastani/c/339393450 आ.न., -गा.पै.

बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय? असलं काहीही Cinematic liberty च्या नावाखाली खपवायचं! आश्चर्य वाटतं ते अशा महत्वाच्या गोष्टींना "चालतं" या सदरात टाकणारयांचं!

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 15:50
उद्या महाराजांवरच्या पिच्चरामध्ये असे दाखवलेले चालेल का? असा प्रश्न पाहिला , जरा खोदकाम केले आणि १९५३ सालच्याच भालजींच्या छत्रपती शिवाजी नामक सुपरहिट्ट पिच्चरात सईबाई-सोयराबाई यांचे गाणे दिसलेदेखील. =)) =)) तेव्हा सवती कशा एकत्र येतात वगैरे प्रश्न भालजींना पडले नसतील का? हां आता त्यांचा पेहराव वगैरे या गाण्यातल्यासारखा नाही तो भाग वेगळा.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट Fri, 11/20/2015 - 15:55
थँक्स फॉर द इनपुट ! :) बट तेंव्हा वेगळ्या साहेबांचा प्रभाव (नुकताच ओसरत) होता, आणि आताचे साहेब वेगळे(वेगळे) आहेत. सो... वेल.....यू नो....व्हॉट आय मीन.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ Fri, 11/20/2015 - 16:00
सई बाई आणि सोयराबाई एकत्र येत नसतील असे वाटत नाही. कदाचित त्या काही काळ एका किल्यावर पण राहिल्या असतील. तेंव्हा अनेक बायका ( त्या सुद्धा राजे लोकांना ) असणे ह्यात काही विषेश नव्हते. १०० वर्षापूर्वी पण असे असायचेच आणी त्या सवती एकाच घरात रहायच्या. भालजींनी गाणे एकत्र दिले होते, त्यात त्यांना नाचताना दाखवले होते का? म्हणुन हे उदाहरण आणि तुलना गंडलेली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 16:04
जरा वेळाने गाण्याची लिंक टाकतो. पिंगासारखे नाचणे नाहीये इतके मात्र आठवते. कुठेतरी खांबांचा आधार घेत दुसरीकडे नजर लावणे, इ. प्रकार आहेत त्याप्रमाणे.

To be.... or not to be.... that is the question !!! जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !! कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल.? एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे … मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धूंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हव.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?.. मिसळ सम्राट.. निवृत्त मामलेदार बापुसाहेब भन्साळी मिसळकर (नाट्य लिबर्टी)....

दुर्गविहारी Fri, 11/20/2015 - 18:53
हे पहा भन्साळिसाहेबाचे या विषयावरचे मत. http://www.loksatta.com/manoranjan-news/ranveer-singh-deepika-padukone-can-not-take-their-eyes-off-each-other-in-new-bajirao-mastani-poster-1161934/ आणि हे "http://www.loksatta.com/manoranjan-news/baji-rao-mastani-based-on-rau-1161826/"> वर या अभिव्यक्ति स्वात्नत्र्याच्या गप्पा. "http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/bajirao-mastani-pinga-sanjay-leela-bhansali/articleshow/49848186.cms"> म्ह्णजे कुणी विरोध केला तर हे साहेब अभिव्यक्ति स्वात्नत्र्याची गळचेपी म्ह्णायला रिकामे. देशात असहिष्णु वातावरण आहेच, त्यात याची भर. बाय द वे पुरस्कार परतीची फ्॔॓शन सम्पली वाटत.

जे खपतंय ते विकतंय. हिंदी सिनेमात निम्मा वेळ हेरोइन कमी कपड्यात दाखवावीच लागते. नाही तर १०० कोटी चा क्लब कसा मिळेल? राहता राहिला २ बायका एकदम नाचताना दाखवण्याचा विषय. अहो 'नो एन्ट्री' सारखे पिक्चर येउन १० वर्षे होऊन गेली. औफ़िशिअलि लफडी करायला प्रोत्साहन देणारे पिक्चर बरीच वर्षे येतायत. बाजीराव-मस्तानी फक्त पब्लिसिटी साठी. एकदा का 'भावना दुखावल्या' कि फुकटात प्रसिद्धी. असले पिक्चर्स अनुल्लेखाने मारायला हवेत. विरोध केल्याने यांची प्रसिद्धीच जास्त होते. तसे 'पेशवे-द्वेषी' आणि ब्रिगेडी टोळ्या खुश असतील, पण ते त्यांचे कुंपण आहे, त्यापलीकडे कधी कधी गेलेत का ते? कशाला मनावर घ्या?

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

रेवती Fri, 11/20/2015 - 20:45
सर्वज्ञजी, नो एन्ट्री आणि इतिहासामधील कथा घेऊन चित्रपट बनवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नो एन्ट्रीमध्ये सेन्सॉर बोर्डाने संमती दिली की वाट्टेल ते दाखवता येते. तसे चित्रपटही चालतात. पैसे मिळवून देतात पण ऐतिहासिक कथानक हाताळताना जबाबदारी असते. मूळ कथेला धक्का न लावता तशीही उपकथानके जोडलेली असतातच की! भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. ब्रिगेडी खूष असतील की नसतील याचा विचार डोक्यातही नाही. ते उद्या आणखी कश्यानेही खूष होतील! यात महत्व भन्साळी, ब्रिगेड, प्रसिद्धी, गल्ला याचा नाहीच. असलाच तर तो ऐतिहासिक संदर्भ बदलल्याचा आहे. जौदे म्हणणे हे तर आहेच. आता समजा त्या गाण्यावर काहीच कार्य्वाही झाली नाही तरी माझ्यासारखे अनेकजण पेशव्यांचा शिनेमा असल्याने पहायला जाणारच! ते तसेही जाणारच होते पण कोणत्या चुकीच्या गोष्टीला लोकांकडून किती जोरात विरोध होतोय यासाठी आज नाही दहा वर्षांनी भन्साळीसारखे लोक जरातरी बिचकून असतील. नैतर मोकाट सुटलेले वळू आणि म्हशी यांची कमतरता नाहीच! अनुल्लेखाने मारलेलं आजकाल कोण किती मनावर घेतं. बरेचजण निर्ढावलेले आहेत.

In reply to by रेवती

समजतंय. पण जर आपण सगळे अशी चिखलफेक करायला लागलो तर फरक काय राहिला? आजकाल गटारात जास्त आणि रस्त्यावर कमी आहेत. ते आपल्या अंगावर फेकतात म्हणून जर आपण गटारात उतरायला लागलो तर काम बाजूला राहिलं केव्हा आपली इज्जत गेली ते कळणार सुधा नाही. फार विचित्र गोष्ट आहे हि पण आता काय करणार. हा धागा निघाला म्हणून मला या सिनेमाचे नाव समजले. खरं तर हिंदी सिनेमा थेटर मध्ये जाऊन बघणं मी १५ - २० वर्षांपूर्वी सोडून दिलंय. सध्या भारतात नसल्यामुळे तो प्रश्न पडत नाही पण इकडे ३०-४० मैल तुडवत जाऊन थेटरात 'दबंगाई' करणारी जनता आहे, मला कधीही त्यांच्यात सामील व्हावेसे वाटले नाही. हे मी कुणी 'वेगळा' आहे म्हणून सांगण्यासाठी नाही. एकूणच आपली जनता फालतू माल आधी घेऊन त्याबद्दल आरडा ओरडा करून परत पुढच्या वेळी त्यांच्याच दारात जाऊन उभी राहते, या गोष्टीचे मला वाईट वाटते. आणि माझे हे विचार कोलेजात असतानापासून आहेत. ६.५ रुपयात एकदा मंगलाला 'प्यार तो होना हि था' चे टोर्चर सहन केले त्यानंतर जे डोळे उघडले ते कायमचे. आणि जे चित्रपटाच्या बाबतीत ते बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही. झोपतात न चितळे १ ते ३, झोपू द्या. बाकीची दुकाने आहेतच कि. दुर्वांकुर आणि लकी छान होते, त्या वेळी लाईन मध्ये उभे राहून 'बैठका' केल्या आहेत. क्वालिटी घसरली कि रेस्पोंस घसरायला हवा. तरच सेवा त्या दर्जाची मिळते. आपण आपली किंमत नाही ठेवली तर काय उपयोग? असो. विषय फार बदलू नये म्हणून.....माझे असे वैयक्तिक मत असे आहे कि असल्या फालतू पिक्चर च्या डायरेक्टर लोकांना आणि न्यायालयांना पत्र पाठवून फार फरक पडेल असे वाटत नाही. आपण आपली वाट चालणे योग्य. हाथि चले बजार, कुत्ते भोके हजार. आपण 'हाथी' कि 'कुत्ता' हे आपल्या हातात आहे.

sagarpdy Fri, 11/20/2015 - 21:08
(संदर्भ - भन्साळीचे पिंगा गाणे) पहिला मित्र: ही मंगळागौर काशिबाईंची होती की मस्तानीची? दुसरा मित्र: ही काशींची मंगळागौर नाही, तर मंगळागौरीची काशी होती. (WA वरुन साभार)

भृशुंडी Fri, 11/20/2015 - 23:46
ज्या मिपाकरांचा ह्या प्रकाराला विरोध नाही, त्यांनी पुढे वाचू नये. त्यांनी खुशाल वाट्टेल ते करावं. ज्या मिपकरांच्या भन्साळींच्या ह्या अश्लाघ्य प्रकाराला विरोध (कडाडून किंवा साधाच) असेल. त्यांना- सॉल्लिड चर्चा. असल्या ज्वलंत आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण चर्चा झालेली बघून बरं वाटलं. बरं, मग शेवटी काय ठरलं? भन्साळींना निषेधाचे खलिते पाठवायचे ? त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालायचा? कोर्टात याचिका दाखल करायची? की भन्साळींना कोपच्यात घ्यायचं, आणि काळं फासायचं इन शिवसेना स्टाईल? कारण ह्यापैकी काहीच होणार नसेल तर मग इतकी उद्बोधक चर्चा होऊनही दुर्दैवाने काहीच उपयोग होणार नाही. मग कट्टर विरोध असणार्‍या मिपाकरांपैकी कुणी काही अ‍ॅक्शन घेणार आहे का? प्लीज कळवा. भन्साळींसारख्या चित्रपट दिग्दर्शकाला कळायला हवं की मराठी लोक किती बारकाईने कुठे कुठे लक्ष ठेवून असतात आणि त्यांचं रक्तही खवळू शकतं.

In reply to by सूड

भृशुंडी Fri, 11/20/2015 - 23:59
तुम्ही बहुतेक भन्साळीचे आधीचे चित्रपट पाहिले नसावेत किंवा तरीही त्याच्याकडून तुमच्या फारच अपेक्षा असाव्यात. किमान गुझारिश तरी बघाच! ते जाऊ दे. चित्रपटात काहीही दाखवू शकतात- ती काही विषयाला धरून बनवलेली डॉक्युमेंटरी नाहीये, ऐतिहासिक सत्य वगैरे दाखवायला. 1942 a love storyच्या वेळीही लोकांनी असलाच शॉट दिला होता- की स्वातंत्र्यसंग्रामाच्या गौरवपूर्ण वर्षाचा संबंध इतक्या हलक्या दर्जाच्या प्रेमकथेशी कसा लावू शकतो वगैरे. common,१९४२ मधे काय लोक फक्त होलसेल देशभक्ती करून राहिले होते? इथेही तसलंच काहीतरी चालू आहे. एका " बॉलिवूडच्या १००% व्यावसायिक चित्रपटातल्या गाण्यातल्या नाचाचा" संबंध डायरेक्ट इतिहास वगैरे गोष्टींशी जोडला जातोय. तेव्हा खरंच जर विरोध वगैरे करणार असाल तर एक मेजर LOL. keep it up!

In reply to by भृशुंडी

संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 08:07
विरोध म्हणजे काय समजलेत...? उद्या कुणीही उठून मराठ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढेल ते चित्रपट-अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गप बसून बघत राहायचं. साहेब, इथे कोणी त्याचं शीर कलम करायचा फतवा काढलेला नाहीये. 'आम्हाला हे पटलेलं नाही' असा साधा, सभ्य, सुसंस्कृत विरोध करत आहेत तर त्यालाही आपण नाक मुरडताय? वर कुणीतरी आतली खबर दिल्याप्रमाणे हा एन्डींग टायटल मामला असेल. मला चित्रपटात काय दाखवले याचे आता सोयरसुतक तर नाहीच, पण जास्त राग आता 'लोकांनी विरोधसुद्धा करू नये' म्हणणार्‍यांचा येत आहे. पुढचे अजिबात व्यक्तिगत घेऊ नका: समजा उद्या तुमच्या/माझ्या घराण्यावर कुणी चित्रपट काढला आणि माझ्या/तुमच्या आजीला वेश्या दाखवून कोठ्यावर कुल्ले हलवणार्‍या बाईंच्या रुपात दाखवले तर ती सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सोडून द्याल? त्यामध्ये आजीची भूमिका सनी लिओनने केलीतर चालेल का? माझ्या/तुमच्या घराण्यावर कुणीतरी चित्रपट काढतेय ना, ह्या हर्षोल्हासात हे माफ कराल? एखाद्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून त्याने तुमच्या/माझ्या अब्रूचे धिंडवडे काढावे आणि आपण गप्प बसणार का? याच न्यायाने अखिल भारतात मराठी सत्तेचा डंका वाजवणार्‍या पेशवे कुटूंबाला आपलेच कुटूंब, त्यांची अब्रू ती मराठी अब्रू समजून इथे कोणी विरोध नोंदवत आहेत तर ते चुकीचे कसे? कि अब्रू वैगेरे झूट असते तुमच्यामते? भंसालीने काढलेला सिनेमा किमान अडीच हजार चित्रगृहांमधे किमान दोन आठवडे बघितला जाईल. त्यानंतर तो अगणित वेळा टीवीवर येईल. लाखो लोक हा सिनेमा बघतील. लक्षात घ्या हा काही एक रात पुरानी हवेलीमें टाइप डी ग्रेड चित्रपट नाही जो कुठे आला-गेला कळणारदेखील नाही. ९० नंतर जन्मलेली पिढी तसेही इतिहासासोबत फार सख्य ठेवून नाही आहे. त्यांना ह्या चित्रपटात दाखवले तेच सत्य वाटले तर त्याचा प्रभाव चुकीचा असणारच. भंसाली सुरुवातीस एक पाटी दाखवून मोकळा होईल की 'ये एक काल्पनिक कहानी है'. आधीच मराठी इतिहासाबद्दल इंग्रजांनी वाट लावून ठेवली आहे. त्यात भंसालीसारखे नतद्रष्ट स्वतःच्या धंद्यासाठी आणखी विकृती आणणार. अरे, चाललंय काय? तिकडे परदेशात बघा लोक कसे इतिहास जपतात म्हणून कोडकौतुक, इथे साध्या गोष्टींचा विरोध केला तरी बोंबाबोंब. माझ्यामते संपूर्ण चित्रपटाचा विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रातून कुणीच चित्रपट बघायला जाऊ नये. त्याच्या धंद्यावर परिणाम होवो न होवो, पण मराठी लोक फालतू धंदे सहन करणार नाहीत असा संदेश गेलाच पाहिजे. गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या कुप्रसिद्धिचाही फायदा त्यास मिळू नये असे झाले तरच एवढ्या सगळ्या काथ्याकूट, विरोधाचा काहीतरी परिणाम झाला असे मानावे. मध्यंतरी सोनिया गांधीवर चित्रपट निघणार होता, इटलीची सुप्रसिद्ध (इफ यु नो वाट आय मीन) अभिनेत्री मोनिका बेलुची हिला सोनिया गांधी च्या भूमिकेत घेणार होते. पण मोनिका बेलुची हीची पुर्वकारकिर्दीनुसार असलेली इमेज सोनिया गांधींच्या आताच्या राजकिय इमेजशी म्याच झाली नसती म्हणून चित्रपट बारगळला. त्यामागे सोनियांचा बारटेंडर म्हणून असलेला पुर्वेतिहासही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरला असता. कारण आपल्या कडे बार टेंडर, बारगर्ल, बार-डान्सर, कॉलगर्ल सगळे एकच समजले जाते. चित्रपट पाहून लोकांनी सोनियाला भलतेच समजले असते तर देशाच्या सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च महिला नेत्याबद्दल असा समज योग्य नसता म्हणूनही हा चित्रपट बंद करण्यात आला. आता बोला इथे सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल बोंबाबोंब का झाली नाही? मी स्वतः एक कलाकार आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपतांना कलाकारास सामाजिक भान असणे सर्वात जास्त आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हे स्वातंत्र्य त्याला त्याच समाजाकडून मिळत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. चित्रपट व्यावसायिक म्हणून भंसालीने पोर्नोग्राफीही करावी, कुणास न माहित असलेला खरा इतिहास खोदून खोदून तो मांडावा, कुणाचा विरोध नाही त्याला, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण समाजाच्या अस्मितांना वेशीवर टांगण्याचा हक्क कोणासही नाही. एका चित्रपटाने असे काय होईल असे विचाराल तर म्हणेन, काळ सोकावतो. त्याबद्दल चिंता आहे म्हणून विरोध.

In reply to by संदीप डांगे

भृशुंडी Sat, 11/21/2015 - 13:30
हा जर विरोध करणार्‍यांचा असा प्रातिनिधिक प्रतिसाद असेल तर तो मेगा LOL आहे. असो, प्लीज तुमचा "इतिहासाच्या विकृतीकरणाचा" आणि "पेशवे घराण्याच्या अब्रूच्या धिंडवड्यांचा" विरोध चालू ठेवा. Sometimes things become so ludicrous that they are not even funny anymore.

In reply to by भृशुंडी

संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 13:36
ओके. फाइन. विरोध करणारे करत आहेत. त्याविरूद्ध पोटदुखी होणार्‍यांना काय प्रॉब्लेम आहे? विरोधक करणारांना हास्यास्पद ठरवण्याची खुमखुमी तुम्हाला का होत आहे? विरोध करूच नये अशी तुमची भूमिका आहे का? मग तुम्ही तरी विरोध करणारांचा विरोध करायला इथे का कडमडला आहात?

In reply to by संदीप डांगे

भृशुंडी Sat, 11/21/2015 - 14:38
माझी भूमिका ? इतकीच आहे की हे जे विरोध वगैरे चालू आहे ते बालिश आणि १००% हास्यास्पद आहे, lolworthy if I may say so. आणि त्याला माझा मुळीच आक्षेप नाही. त्यांनी विरोध करावा, निषेध करावा, चित्रपटावर बंदी आणायलाही हरकत नाही. बाकी इथे कडमडणे - सांगवीकर म्हणतो तसं जर उदया प्रत्येक ओळ लिहिण्यासाठी दहा हजार रूपये लागत असतील, तर कोण कशाला काही लिहायला जाईल? तेव्हा ते एक असोच.

In reply to by संदीप डांगे

भृशुंडी Sun, 11/22/2015 - 01:05
अहो शिष्यवर्य, विरोध करणं हे बालिश आहे म्हटलं हो. विरोधाची पद्धत नाही. पण तुम्ही खरंच तुमचा (प्रखर!) विरोध आणि ह्या चर्चा चालू ठेवा. अतिशय मौलिक, महत्त्वपूर्ण अशी सगळी ही चर्चा आहे.

In reply to by भृशुंडी

संदीप डांगे Sun, 11/22/2015 - 14:38
विरोध करणं हे बालिश आहे म्हटलं हो
प्लीज एलाबोरेट इफ यु कॅन. आपल्याला जी गोष्ट चुकीची वाटते त्याला विरोध करणे बालीश आहे की एखादी गोष्ट चुकीचे वाटणे बालिश आहे की अजून काही. - विरोध करणार्‍यांना विरोध करून विरोध करणेच बालिश आहे असं म्ह्णणार्‍या श्रेष्ठ गुरुंचा नम्र शिष्य

In reply to by संदीप डांगे

भृशुंडी Mon, 11/23/2015 - 00:08
Sorry, I don't have to elaborate anything. माझा विरोध बिरोधाला अजिबात विरोध नाही, उलट सॉल्लिड पाठिंबाच आहे- हे तुम्ही वटवाघूळ नसाल तर तुम्हाला कळायलाच पाहिजे होतं. आता गुरूदक्षिणा म्हणून एक कराल का? जरा कमी टायपत जा इथे, आणि रिलॅक्स.

सायकलस्वार Sat, 11/21/2015 - 02:11
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मिपावरची चर्चा वाचून संजय लीला भन्साली यांना आपल्या हातून घडलेल्या ऐतिहासिक प्रमादाची जाणीव झाली असल्याचे कळते. त्यामुळे आता चित्रपटात 'पिंगा' हे गाणे चालू असताना खालीलप्रमाणे पाट्या दाखवण्यात येतील. १) पेशवाईमें बम्मन स्त्रियाए इस प्रकार की नउवारी नही पहना करती थी, बल्कि पेट पुरी तरह से कव्हर करनेवाली नउवारीयां पहनती थी २) पेशवा स्त्रियाए डान्स नही करती थी, बल्कि (बहुत आग्रह किया तो) ज्यादासेज्यादा फुगडी खेलती थी ३) बाजीराव पेशवा ने मस्तानी के साथ शादी करने के अलावा और भी कई बडे काम किये थे ४) मंगळागौर में पिंगा नही, 'दिंडा' खेला जाता था याखेरीज कुणाला इतर आक्षेप असल्यास कृपया धाग्यावर नोंदवावेत, म्हणजे भन्सालीसाहेबांना त्याची नोंद घेता येईल.

भंकस बाबा Sat, 11/21/2015 - 08:02
मोर्चे काढ़ा, दगडफेक करा, इथे मिपावर प्रतिसादाचा कीस पाडा, गेलाबाजार त्या असहिष्णुवाल्यासारखे डेलिगेशन घेऊन जा, मोदी सरकार हायहाय म्हणून घोषणा दया. अरे पण ते पिक्चर तर रिलीज़ होउ दया. पहिल्या बाजीरावावरचि पुस्तके तर वाचा आणि हो आदर्श ठेऊ नका. कारण युद्धावर पराक्रम वैगेरे राहिला दूर ते दोन बायकाचेच तेवढे लक्षात ठेवतील आपली लोकं. तसेपण दुसऱ्या बाजीरावाचे पुस्तक न वाचताच त्याचा आदर्श घेऊन कृति करणारे बरेच लोकस्स आहेत आपल्याकडे! कृपया ही वैयक्तिक टिका नाही☺ ते मस्तानीला काय विरोध वैगेरे होता तो तिला बायको करुन घेण्याबद्दल होता वो, लिव इन चाल्ल्ल अस्त लोकाइली.

In reply to by वेल्लाभट

अर्धवटराव Sun, 11/22/2015 - 12:53
पण त्या बाजीरावाच्या पात्राचा आवाज म्हणजे थोडा 'हे'च वाटतो ना. बाजीरावकी तलवार, प्रेम है ऐय्याशी नहि वगैरे डायलॉग 'ए चाय गरम चाय गरम' किंवा 'दसा का बीस दस का बीस" स्टाईलचे वाटले.

राही Sat, 11/21/2015 - 23:20
खूप चर्चा झाली आहे, आता जरा एक वेगळी बाजू म्हणून लिहीत आहे. चित्रपटाच्या गुणगौरवामध्ये अथवा टीकेमध्ये भाग घेण्याचा हेतू आणि इच्छा नाही. तर, तीनशे साडेतीनशे णेवर्षांपूर्वी, कोंकणातल्या एखाद्या सर्वसाधारण ब्राह्मण स्त्रीचा पेहेराव कसा होता असेल? मला वाटते की गाठीची चोळी आणि नऊवारी आखूड ओचे खोचलेले लुगडे असा असेल. कोंकणातल्या उष्ण-दमट हवामानात शालीची जरूर नव्हती, उलट अडथळाच होता. शिवाय चार महिने बदाबदा पाऊस. आणि कोंकणातले ते सुप्रसिद्ध अठरा विश्वे दारिद्र्य. घुंघट किंवा डोक्यावरून पदराची पद्धत नव्हतीच. मोठ्या माणसांसमोर यायचे झाले तर दोन्ही खांद्यांवरून पदर मात्र असावा. बाकी दारिद्र्यास अनुसरून प्रत्येकाला काम करावे लागतच असणार. त्यावेळी सोय म्हणून पदर खांद्यांवरून न घेता कंबरेला खोचतच असतील. (पदर खोचणे हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असेल काय?) पुढे पुण्यात थंडीमुळे शाल/शेला यांची भर पडली असावी. चोळीच्याऐवजी लांब पोलके (याला मराठीत झंपर म्हणत असत. मात्र, काही ठिकाणी परकरालाही झंपर म्हटलेले ऐकले आहे. पण नऊवारी काळात परकर नव्हता. इंग्रजी जंपर-पिनॅफर वेगळा) घालण्याची पद्धत महाराष्ट्रात नसावी. पोर्ट्रेट्साठी मुद्द्दाम केलेल्या पेहेरावावरून सरसकटीकरण करणे तितकेसे योग्य नाही. रोजच्या कामकाजाचा पेहेराव वेगळाच असणार. लांब पोलक्याची पद्धत एकोणिसाव्या शतकातल्या सुशिक्षित पारसी बायकांत प्रचलित होती. बंगाली बायकाही अशी दोन्ही बाजूंना अगदी छोटी स्लिट, छाट असलेली पोलकी घालीत असत. या स्लिट मुळे पदर वर खांद्यावर टाकणे सोपे होई. ही पोलकी म्हणजे राजस्तान वगैरे प्रांतातल्या कमीज किंवा कुडतीची मिनीमिनी आवृत्ती. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी कुलीन सुशिक्षित स्त्रिया नुकत्या नुकत्या सभासंमेलनांसाठी बाहेर पडू लागल्या होत्या तेव्हाच्या त्यांच्या फोटोत अशी लांब पोलकी दिसतात. मराठीतल्या अगदी जुन्या सामाजिक सिनेमातही दिसतात. बायका एरवी (अंगकामाच्या वेळा सोडून) दोन्ही खांद्यावरच्या पदराने वावरत असल्या तरी मंगळागौरीचे खेळ खेळताना तो पदर कंबरेला घट्ट खोचावाच लागत असणार. लुगडेही व्यवस्थित घट्ट आवरून घ्यावे लागत असणार. चोळीमुळे कंबरेचा एका बाजूचा भाग उघडा राहात असणार. पण बायकां-बायकांमध्ये हे चालून जात असावे. आता चोळीबद्दल. नऊ तुकड्यांची चोळी शिवणे हे कौशल्याचे काम असे. शिवाय ती खणाची असे. म्हणजे बाहीचे तुकडे ठरलेलेच असत. आणि खण हा ताग्यातून कापलेला नसणार. तो स्वतंत्र विणलेला (मध्ये धागे सोडून) असे.( या बद्दल कोणी अधिक खुलासा अथवा बिनचूक माहिती दिल्यास आभारी.) त्याचे आकारमान ठरलेले असणार. फार तर एक दोन आकारांचे वैविध्य होते असू शकेल. म्हणजे पन्हाही ठरीवच. यातून चोळी शिवायची. म्हणजे प्रौढ स्त्रियांना ती अंगभर होत नसेल. अर्थात हे सगळे सामान्य ब्राह्मणस्त्रियांबाबत झाले. पेशवेपत्नीचा पेहेराव वेगळाच असणार.

गाणं भारी आहे, दोघीही आवडल्या. तब्येत खुश झाली काल चित्रपटात ट्रेलर पाहतान्ना. डोला रे डोला गाण्याची आठवण मात्र सारखी होत होती. बाकी चालु द्या....! -दिलीप बिरुटे

ट्रेलर खालील प्रतिसाद वाचले. नकारात्मक एकही नाही. ह्या भन्साळी ला २०१६ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाच म्हणून समजा एका गाण्यातच त्याने बाजीराव मस्तानी ह्यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले तेही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी तेही पिंगा घालून. प्रतिसादात प्रियांकाच्या अभिनयाची दिसण्याची चर्चा जास्त झालेली दिसली. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मस्तानी पेक्ष्या काशीबाई भारतात जास्त लोकप्रिय झाल्या तर नवल ते काय मला स्वतःला ट्रेलर आवडला त्यात महेश चा आवाज ऐकला, बरे वाटले. वैभव तत्ववादी बहुदा चिमाजी ची भूमिका करत असावा. त्याला पहायचे आहे. तन्वी आझमी बाजीरावाच्या आईच्या भूमिकेत आहेत, शाहू महाराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर आहेत. विकी अंकल सांगतो मिलिंद सोमण व संजय मिश्रा सुद्धा आहेत त्याची भूमिका कोणती असेल हे जाणण्यास उत्सुक आहे. बिचार्या रुक रुक खान ला परत एखादे वादग्रस्त विधान करावे लागणार त्याच्या दिलवाले साठी सध्या हवा बाजीराव मस्तानी ची आहे देशभर . पिंगा वादात झालेला विरोध हा प्रामुख्याने सोशल मिडिया वरून झाला तेही संयत भाषेत तर ह्या आधी जो वाद पुरस्कारावरून झाला. त्यावेळी वापरलेली भाषा आणि विरोधाची पध्धत कमालीची घसरली होती. मतांच्या राजकारणासाठी राजकारणी त्यात उतरले. ह्यावेळी राजकारणी लोकांच्या शिवाय पिंगा विरोध हा सुसंस्कृत समाज अजूनही भारतात इदान महाराष्ट्रात जिवंत आहे ह्याची खात्री पटली. पिंगा विरोधाला विरोध करण्यासाठी काही लोकांनी जातीयता मध्ये काढली पण पिंगा विरोधकांनी त्याकडे लक्ष दिले नाही नाहीतर शिवशाही व पेशवाही असा वाद निर्माण झाला असता. ह्या पिंगा विरोधामुळे माझ्यामते संजय भन्साळी हे पिंगा गाणे जर डोला रे डोला सारखे सिनेमाच्या मधेच टाकणार असतील तर बहुदा सेफ गेम म्हणून प्रमोशन गाणे म्हणून सिनेमाच्या शेवटी दाखवतील, व त्या बदल्यास युद्धाचे किंवा एखाद्या भडक म्हणजे सुडो सेक्युलर लोकांना भडक वाटतील अशी भीती वाटून गाळलेला एखादा कडक प्रसंग सिनेमात आणेल असे वाटते. निदान ट्रेलर पाहून तरी असे वाटते बाकी कार्य सिद्धीस नेण्यास संस्कारी सेन्सॉर आहेतच. आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

बाहुली Mon, 11/23/2015 - 14:32
Every era has its culture, and if you are picking up and historical topic then you have to be very very careful. I could see following mistakes, 1) The casting 2) Intrepratation of history using north indian goggles. 3) None of the MARATHI cultural aspects are not being used 4) If you do not want to make realistic cinema then do not use name of real historical heroes. 5) Less study of the history or no study 6) This wrong culture will go out to world as a Marathi culture .. as cinema is very very powerful medium. Its better , we should not go to watch movie and ask our non marathi friends and some marathi frineds about the same.

रमेश आठवले Mon, 11/30/2015 - 21:01
पिंगा बरोबर आता बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी भन्साळी साठी घातलेला धिंगा णा येथे पहा - http://erosnow.com/#!/music/watch/1038704/bajirao-mastani/6618119/exclusive---malhari?ap=1

In reply to by रमेश आठवले

रेवती Tue, 12/01/2015 - 00:11
हे गाणं पहिल्यांदा पाहिलं. अगदीच दळीद्रीपणा केलाय संजयानं. पिंग्याच्या गोंधळानंतरही शिनेमा थेट्रात पहावा यावर मी पक्की होते पण आता नाही. म्हणजे आता शिनेमा पाहणारच पण नेटावर.

In reply to by रमेश आठवले

सव्यसाची Tue, 12/01/2015 - 00:26
मराठी संस्कृतीचा अभ्यास करून चित्रपट केला आहे असे संजय लीला भन्साळी सांगत होते लोकसत्त्तामध्ये. नेमके कोणत्या मराठी संस्कृतीचा केलाय ते तरी सांगा. 'वाट लावली' म्हणे!!! काय ते गाणे आणि काय ते शब्द! थोरल्या बाजीरावांवर चित्रपट आहे कि बाजीराव सिंघम चा रीमेक???

सुज्ञ Tue, 12/01/2015 - 03:45
अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …

सुज्ञ Tue, 12/01/2015 - 04:55
अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …

In reply to by सुज्ञ

मालोजीराव Tue, 12/01/2015 - 12:06
अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे

राही Tue, 12/01/2015 - 10:58
'पिंगा' गाणे पाहिले. चित्रीकरण नेत्रसुखद आहे. उत्तानपणाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलू शकते. स्त्रीची बेंबी आणि कंबर दाखवल्यामुळे उत्तानपणा आला आहे असे अनेकांना वाटू शकते, तर पेशवापत्नीला तसे दाखवल्यामुळे हीन अभिरुची आणि उत्तानपणाचे प्रदर्शन झाले आहे असे काही जणांना वाटू शकते. काशीबाई पायाच्या दुर्बलतेमुळे नाचू शकत नव्हत्या तरी त्यांना नाचताना दाखवले आहे ही ढोबळ चूक आहे. पटकथालेखकाचा अभ्यास कमी पडला. पण हे विकृतीकरण वाटत नाही. एक उदाहरण पहा. समजा एका चित्रपटात बाजीराव पेशवे किंवा पेशवेपत्नी यांच्या उपासव्रत सोडण्याप्रसंगीच्या जेवणाच्या ताटात बटाट्याची भाजी दाखवली गेली, तर त्या काळात बटाटे नव्हतेच (बटाट्यांऐवजी दुसरा कोणताही असा पदार्थ जो तेव्हा प्रचलित नव्हता, बटाट्यांऐवजी समजता येईल) म्हणून हा इतिहासाचा विपर्यास आहे हे आर्ग्युमेंट वस्तुस्थितीनिदर्शक असले तरी पूर्ण कलाकृतीच्या आस्वादात कितपत महत्त्वाचे ठरेल? कमी प्रेक्षकसंख्येच्या भीतीने म्हणा किंवा आणखी कशामुळे, पेशवाईवर चित्रपट निघत नाहीत. भारतभर दाखवला गेलाय असा चित्रपट मला तरी आठवत नाही. एखादा चित्रपट निघालाय तर निघू दे की. जर तो लोकप्रिय झाला तर किमान थोरले बाजीराव हे नाव तरी कित्येकांना माहीत होईल. आपटायचा असेल तर आपटेल. त्याला त्याच्या नशीबाने जगू/मरू द्यावे. कुठलीच भारतीय 'पीरियड' मूवी ही तपशिलाने परिपूर्ण वा अचूक नसते हा नियमच आहे. अगदी जोधाअकबरही नव्हती.

पिलीयन रायडर Tue, 12/01/2015 - 11:32
आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. धडक...तडक.. भडक.. कडक... दुष्मन की देखो वाट लावली.." ह्या सुमधुर गीतावर चित्पावन ब्राह्मण श्रीमंत बाजीराव पेशव्यांना शेंडी उडवत गणपती ड्यान्स करताना पाहिले. डोळ्याचे पारणे फिटले...!! मी राग, लोभ, मद, मत्सराच्या पलीकडे जाऊन हे लिहीतेय... कारण आता मला सत्य लख्ख कळालेले आहे. आपला गैरसमज झालेला होता.. बाजीराव मस्तानी हा पिक्चर बाजीराव पेशव्यांवर आधारित नसुन.. बाजीराव "सिंघम" वर आधारित आहे.. लाडाने सिंघमला काव्या "पेशवा" म्हणायला लागते. मग सिंघम २ मध्ये ती मरते आणि मस्तानी म्हणुन पुनर्जन्म घेते. पण तोवर गोट्याने कर्तव्य म्हणुन बाजीरावाचे लग्न "काशीबाई" नावाच्या सालस आणि घरंदाज बाईसोबत लावुन दिलेले असते. हे कळल्यावर मस्तानी "दिवानी मस्तानी" म्हणत तुणतुणं वाजवत, केस मोकळे सोडुन पुण्याच्या पेठांमध्ये फिरायला लागते. एकदा शनिवारवाड्याच्या टॉप फ्लॉअर वरच्या पेंटहाऊस मधुन काशीबाइ तिला बघतात आणि त्यांच्या मनात माया दाटुन येते. म्हणुन त्या तिला घरी घेऊन येतात, न्हाऊ माखु घालतात. सेम आपल्यासारखेच कपडे देतात. मस्तानी त्यांना "हाऊ ओल्ड फॅशन्ड!" म्हणुन नव्या पद्धतीची नऊवार घालायला शिकवते. काशीबाई खुष होऊन नाचायला लागतात.. अर्थातच ते ऐतिहासिक गाणं म्हणजे "पिंगा ग पोरी पिंगा".. खरं तर तेव्हा पासुनच ही पद्धत सुरु झाली... पिंगा घालायची.. तिकडे बाजीरावांनी (सिंघमांचे... पेशव्यांचे फक्त लाडाने..) मोहीम फत्ते केलेली असते म्हणुन ते ही त्यांच्या स्टाईलचा पिंगा घालत असतात.. पण त्यांच्याकडे लेटेस्ट कलेक्शन नसल्याने ते लहानपणी शिकवलेल्या "अटक मटक चवळी चटक" आणि पुर्वाश्रमीचे "आता माझी सटकली... मला राग येतोय" ह्या गाण्याचे रिमिक्स करुन "अटक मटक झटक.... वाट लावली" गे गाणे बनवले.. बाजीराव मोठे हरहुन्नरी बरं का! आता पुढचं गाणं पाहिलं की मी तुम्हाला पुढची गोष्ट समजावुन सांगेन बरं का!

In reply to by पिलीयन रायडर

रेवती Tue, 12/01/2015 - 19:10
चालेल पिरातै. पुढील गाण्याची वाट पहात आहे. 'वाट लावली' हे पवित्र गाणेही आपण चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. धन्यवाद.

In reply to by पिलीयन रायडर

उगा काहितरीच Sat, 12/12/2015 - 01:25
लोल...रात्री दीड वाजता! जब्राट प्रतिसाद .
हे कळल्यावर मस्तानी "दिवानी मस्तानी" म्हणत तुणतुणं वाजवत, केस मोकळे सोडुन पुण्याच्या पेठांमध्ये फिरायला लागते.
हे तर सगळ्यात खतरनाक....

In reply to by पिलीयन रायडर

किसन शिंदे Mon, 12/21/2015 - 02:01
ओ तै, हे असं उपरोधात्मक लिहून बाजीराव पेशव्यांचा तुम्ही अपमान करता आहात असं नाही वाटत का तुम्हाला? भन्साळीने जे दाखवलंय त्यावर राग व्यक्त करताय हे मान्य, पण तो राग व्यक्त करताना तुम्ही बाजीराव पेशवे, काशीबाई, मस्तानी या मोठ्या नावांचा अनादर करताय याची जरा तरी जाणीव ठेवा.

In reply to by किसन शिंदे

पिलीयन रायडर Mon, 12/21/2015 - 09:59
उपरोधात्मक लिहून बाजीराव पेशव्यांचा तुम्ही अपमान करता आहात असं नाही वाटत का तुम्हाला?
अजिबात नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही. ( तुम्हाला मी "उपरोधिक" लिहीलय हे तर समजतय.. आणि तरी तुम्हाला तो पेशव्यांचा अपमान वाटतो.. इंटरेस्टींग!) बादवे.. तसंही आपण बाजीराव सिंघम बद्दल बोलतोय.. ;)

मालोजीराव Wed, 12/02/2015 - 00:20
सेनापती मावळ्यांच्या सोबत विजयोत्सव साजरा करतायेत, कुठेही अश्लीलता नाही, हिडीस पणा नाही,दारूबाजी नाही...संभाजी राजांच्या हातात दारूचा ग्लास देणाऱ्या भालजी पेंढारकर पेक्षा भन्साळी बराच म्हणायचा !

In reply to by स्रुजा

जिन्क्स Mon, 12/21/2015 - 12:12
तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.

In reply to by स्रुजा

जिन्क्स Mon, 12/21/2015 - 12:12
तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.

In reply to by मालोजीराव

किसन शिंदे Mon, 12/21/2015 - 02:05
सेनापती विजयोत्सव साजरा करतायेत हे ठीक, फक्त गाण्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स चुकीच्या आहेत.

बाजीप्रभू Wed, 12/02/2015 - 07:03
नव्या माहितीनुसार हे गाणं मस्तानीला पडलेलं स्वप्न आहे म्हणे... आता स्वप्नांत धारावीचा हिरो देखील स्विझर्लंडला जाऊन येतो मग अबला मस्तानी अपंग काशीबाई बरोबर गरबा खेळली काय अन हायब्रीड पिंगा केला काय... काय फरक पडतो.