उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?
लेखनप्रकार
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?
उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.
कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.
उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.
युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.
(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.
(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.
(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.
(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.
(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.
(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.
(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.
(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.
(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.
(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.
(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.
पुन्हा घोडचुकीकडे
(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.
(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)
(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?
-जीएस
वाचने
54637
वाचनखूण
प्रतिक्रिया
186
झोपलेल्याला जागं करता येतं
अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण
In reply to अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण by खटपट्या
+१
In reply to +१ by शिद
लैच इंटेलिजन्ट..
In reply to लैच इंटेलिजन्ट.. by चिगो
:D =)) :D =)) :D =)) :D
In reply to लैच इंटेलिजन्ट.. by चिगो
हा हा हा...धन्यवाद.
छान लेख..! विश्लेषण आवडलं...
विश्लेषण आवडलं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernदिवाळीपर्यंत शिवसेनेने
In reply to दिवाळीपर्यंत शिवसेनेने by आनन्दा
दुश्यन्त यांनी येथे दिलेल्या
अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर
पवरांची खेळी
In reply to पवरांची खेळी by अमित मुंबईचा
चायला हे झाले तर हैट्ट असेल..
In reply to चायला हे झाले तर हैट्ट असेल.. by टवाळ कार्टा
गोलमाल
In reply to चायला हे झाले तर हैट्ट असेल.. by टवाळ कार्टा
तरीही भाजप दूरान्वयेदेखील
जर भाजप शिवसेना युती १३०:१४०
शरद पवार आणि सत्ता असे समिकरण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernIn reply to शरद पवार आणि सत्ता असे समिकरण by मदनबाण
शरद पवार नावचे ग्रहण
In reply to शरद पवार नावचे ग्रहण by समीरसूर
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernIn reply to शरद पवार नावचे ग्रहण by समीरसूर
ह्या गोष्टी मोठ्याने बोल्य नये ! खर्या असल्या तरी....
In reply to ह्या गोष्टी मोठ्याने बोल्य नये ! खर्या असल्या तरी.... by सामान्यनागरिक
खरे आहे
In reply to खरे आहे by समीरसूर
मधे कोकणात गेलो होतो तेव्हा
In reply to मधे कोकणात गेलो होतो तेव्हा by जयंत कुलकर्णी
"अरे बाबा सुईणीला पोटात
In reply to मधे कोकणात गेलो होतो तेव्हा by जयंत कुलकर्णी
नवीन म्हण माहित झाली !!
In reply to नवीन म्हण माहित झाली !! by सूड
प्रतिसाद नीट वाचा!
In reply to प्रतिसाद नीट वाचा! by बॅटमॅन
हे कोल्लापूर आमच्या कोकनाला
In reply to हे कोल्लापूर आमच्या कोकनाला by खटपट्या
आमचे गाव अस्सल कोकणात देवगड
In reply to आमचे गाव अस्सल कोकणात देवगड by llपुण्याचे पेशवेll
भौगोलिक दृष्ट्या जो भाग
In reply to आमचे गाव अस्सल कोकणात देवगड by llपुण्याचे पेशवेll
ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद
In reply to हे कोल्लापूर आमच्या कोकनाला by खटपट्या
अवश्य. कोल्लापूर कोकणाला
In reply to अवश्य. कोल्लापूर कोकणाला by बॅटमॅन
आय मीन कोल्लापुर शहर.
खराय
In reply to खराय by मनिमौ
तुमि मौतैच्य दुअयदि क?
ऐम आय ऐम चा प्रवेश
उत्तम विश्लेषण
उत्तम
आकड्यांच्या आधारे केलेले
माहितीपूर्ण विश्लेषण
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल
In reply to उठसुठ कोणताही पक्ष फुटेल by दुश्यन्त
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernIn reply to उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे by मदनबाण
अश्या उलट सुलट बातम्या येतातच
In reply to अश्या उलट सुलट बातम्या येतातच by दुश्यन्त
येस्स.. मी माझे शब्द मागे घेत
पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते
खरेतर दोन्ही शिवसेना भाजप
In reply to खरेतर दोन्ही शिवसेना भाजप by दुश्यन्त
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद
हुश्श!!!
In reply to हुश्श!!! by अन्नू
महागाई कमी झाली? नाही! उलट
In reply to हुश्श!!! by अन्नू
बर्र...
In reply to हुश्श!!! by अन्नू
मला वाटतं
In reply to हुश्श!!! by अन्नू
>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या
मात्र सरकार ज्याला बनवायचं
गमती जमती !!
In reply to गमती जमती !! by सुहास..
?
In reply to ? by क्लिंटन
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
समजले नाही
In reply to समजले नाही by क्लिंटन
आपल्या कडे येणार्या इतर
In reply to आपल्या कडे येणार्या इतर by सुहास..
आयला असे पण असते???
In reply to आयला असे पण असते??? by टवाळ कार्टा
आमदार फोडायचा एक मार्ग
In reply to आमदार फोडायचा एक मार्ग by क्लिंटन
सोडून द्या हो. मोदीद्वेशाचि
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
>>> भाजपाची साथ मग नितीश ने
In reply to >>> भाजपाची साथ मग नितीश ने by श्रीगुरुजी
लवकर बरे व्हा !!
In reply to लवकर बरे व्हा !! by सुहास..
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
+१
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
वाह! काय बोललात!! पण नक्की
In reply to वाह! काय बोललात!! पण नक्की by सूड
म्हणुनच लिहित नाही
In reply to म्हणुनच लिहित नाही by सुहास..
कळळं!!
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
>> फिरकी घेतोयस की खरच !
In reply to >> फिरकी घेतोयस की खरच ! by सतिश गावडे
धन्स यार !!
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
अवांतर जाऊ द्या..
In reply to अवांतर जाऊ द्या.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही ही ही !
In reply to ही ही ही ! by सुहास..
हायलाईट मधे काहीच नाही
In reply to हायलाईट मधे काहीच नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थट्टा वाटते का बिरुटे सर ? असो ..
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
वडगाव शेरी का?
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
+१
In reply to लवकर बरे व्हा !! by सुहास..
>>> लवकर बरे व्हा !!
In reply to >>> लवकर बरे व्हा !! by श्रीगुरुजी
मच्याकडे काहीच मुद्दा उरला
In reply to मच्याकडे काहीच मुद्दा उरला by सुहास..
प्रतिसादाबद्दल आभार!
In reply to प्रतिसादाबद्दल आभार! by श्रीगुरुजी
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by सुहास..
नमोरुग्ण
In reply to धन्यवाद ! by सुहास..
उन्माद म्हणा किंवा अजून
In reply to उन्माद म्हणा किंवा अजून by श्रीगुरुजी
कांदा आयात/निर्यात हा
In reply to कांदा आयात/निर्यात हा by सुहास..
>>> कांदा ग्राहकाच्या ,
In reply to >>> कांदा ग्राहकाच्या , by श्रीगुरुजी
कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्
In reply to कांदा आयात करणे म्हणजे शेतकर् by सुहास..
पण त्याचा उपाय म्हणजे
In reply to पण त्याचा उपाय म्हणजे by काळा पहाड
परफेक्ट. यासाठी तुम्ही चांगली
In reply to कांदा आयात करणे म्हणजे शेतकर् by सुहास..
हे पूर्वीही असेच सुरू होते व
In reply to उन्माद म्हणा किंवा अजून by श्रीगुरुजी
तसेच केले पाहिजे ....
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
@सुहास, तुम्हाला कळकळीची
In reply to @सुहास, तुम्हाला कळकळीची by प्रसाद१९७१
फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज