कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास
इथे डकवले आहे.
या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे.
तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे.
सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे
देत आहे.
१). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत
२). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते).
६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष)
७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या
१०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone
(हसून हसून पुरी वाट :-))) )
११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष)
१२). लोकमान्य नव्हे भटमान्य
११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे.
माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा.
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली
कश्याला असल्या ब्लॉग वर जाता
या असल्या ब्रिगेडी ब्लॉग्स
काय काका तुम्ही, जसं अरबट
सहमत...
बरं त्यानं हे तिघे संत नैत
+११११ अगदी अगदी!
+११११
+१
जुनी बातमी आहे. अनिता पाटिल
कुरवाळणे
खरंय नीलाकांतजी
हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही.
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग,
विचारधारा
पुरोगामी वि मनुवादी
पुरोगामी आ
तुम्ही ज्या संदर्भात वापरलाय त्याबद्दल काहीच वाद नाही.
एक्सक्यूज मी
+१०००००००००००००
नेमकं उदाहरण
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग,
प्रमोद जी अशा ब्लॉग कडे
बाबरी मशीदीचं पतन हा
भाव...
आम्ही पसरवतो तो द्वेष नाही
:)
केवळ एक इमारत पडली इतकी साधी
साधं नाही!
पण बाबरी नंतर अशा घटनांमध्ये
चूक होतीच
अर्थातच. प्युअरलि राजकीय
असंबध्द...
>>>आता कुठे लिहीता होतोय.
येथे शेतकरी संघटना कुठून आली?
तुम्ही नक्कीच लिहा. मला
शिखांचा राग हिंदूंवर आहे, >>>
>>> मुंबईच्या दंगलींच्या आधी
कशाला अश्या वाय झेड पब्लिकचे लिखान वाचताय...
अनुल्लेखाने मारणे कधीही सोइस्कर्
अशाना अनुल्लेखाने मारणे हा
दर्दुकाका, असले ब्लोग सोडा.
असमानतेची वागणूक दिली गेली
यातील एक ...
नीलकांत यानी दिलेल्या यादीतील
सहमत आहे.
सर्व जणांस प्रतिसदाबद्दल धन्यवाद
ठीक आहे पम्या तर पम्या
लयी झॅक
.