ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर
लेखनप्रकार
लोकहो,
आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत. ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय. या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा, ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत.
आज, याच विषयावर, ज्योतिषांकडे जातांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल सांगतो.
साधारणपणे ज्योतिषांकडे माणूस जातो, तेव्हा त्याच्या काही समस्या असतात. जसे डॉक्टरांकडे जाणार्या माणसाला काही आजार सतावत असतो, तसेच ज्योतिषांकडे जाणार्या माणसाला जीवनाच्या विविध अंगात काही समस्या भेडसावत असतात. त्या समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्याचे निराकरण व्हावे, अशी त्याची इच्छा असते. काही वेळा माणूस पेचात सापडलेला असतो. हे करू की ते करू? असे त्याला वाटत असते. अशा द्विधा मनस्थितीत त्याच्यासाठी योग्य गोष्ट कुठली हे जाणून घेण्यात त्याला स्वारस्य असतं म्हणून तो ज्योतिषाची वाट धरतो.
पण अनेकदा असे होते की, त्याला त्याच्या समस्यांचे योग्य उत्तर मिळत नाही. काही वेळा काही गोष्टी विचारायच्या राहून जातात. काही वेळा काही संदर्भ त्याला उमजत नाहीत. काही वेळा ते ज्योतिर्विद अत्यंत उथळ वक्तव्य करतात असे त्याला समजते, त्यांच्या एकूणच ज्योतिषविषयक ज्ञानाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते, असे होऊ नये, यासाठी ज्योतिषांकडे जातांना कोणत्य़ा गोष्टी पाळल्या पाहिजेत ते येथे थोडक्यात क्रमवार सांगतो म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल.
सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जातांना आधी त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या माणसाला आपली पत्रिका दाखवतो आहोत, त्या माणसाकडे ज्ञान आहे का? त्याचे समाजातील स्थान काय आहे? लोकांचा त्यांच्याबद्दलचा अनुभव काय आहे? याचा विचार करूनच त्या ज्योतिषाकडे जावे.
केवळ पेपरात किंवा दूरदर्शनवर जाहिराती दिल्या, म्हणजे कोणीही ज्ञानी होत नसतो. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
"बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे. " असे दादा (सुरेश भट) म्हणायचे.
तुम्ही जेव्हा एखाद्या ज्योतिषांचा सल्ला घेता, तेव्हा आयुष्याच्या अनेक महत्वाच्या बाबी त्यांच्यासमोर उघड करीत असता. त्या उघड करण्याइतपत तो माणूस विश्वासार्ह आहे का? याची आधी चाचपणी करा.
एकदा ही प्राथमिक चौकशी झाल्यावर, ते ज्योतिर्विद आपली पत्रिका दाखवायला "लायक" आहेत याची खात्री झाली ( आम्ही "लायक"हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे) की त्यांची रितसर भेटीची वेळ ठरवून घ्या आणि मगच त्यांना त्या वेळेत जाऊन भेटा. "आलं मनात की गेलं दुकानात" अशी भूमिका ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत चालत नाही. रितसर appointment घेतांना तुम्ही आधी स्वत:पाशी वेळेचे पर्याय निश्चित करून घ्या. तुम्ही कोणत्या वेळेस त्यांच्याकडे जाणार आहात हे groundwork तुम्ही स्वत: केले पाहिजे. ते कसे करायचे ते सांगतो.
ज्योतिषांची appointment घेण्याआधी आपण स्वत: पंचांग पहावे. ज्यांना पंचांग पाहता येत नसेल त्यांनी खेद मानण्याचे कारण नाही. कारण आता मराठी कॅलेंडरवर तिथी आणि इतर माहिती तारखेच्या रकान्यात दिलेली असते. त्यासाठी स्वत:चा फार मोठा ज्योतिषविषयक अभ्यास असायला हवा, असे काही नाही.
तर पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये तुम्हांला ज्या दिवशी जायचे आहे त्या दिवशी कोणती तिथी आहे ते पहा. कृष्ण चतुर्दशी, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदा या दिवशी आयुष्यात कोणालाही पत्रिका दाखवू नका.
याचे कारण हे दिवस अत्यंत अशुभ समजले जातात. कृष्ण चतुर्दशीचा उत्तरार्ध, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदेचा पूर्वार्ध या दिवसात शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तुघ्न अशी अत्यंत वाईट करणे सुरू असतात. (करण म्हणजे काय- स्थिर आणि चर करण काय असतं, याची माहिती आम्ही इतरत्र दिलेली आहे ती वाचावी). शुद्ध प्रतिप्रदेला केवळ घटस्थापनेसारखी देवकार्येच करायची मुभा आहे. पण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्या भानगडीत सर्वसामान्य माणसाने न शिरता, सरळ या तीन तिथी वर्ज्य कराव्यात, म्हणजे प्रश्न मिटला.
त्याचप्रमाणे हे दिवस सोडून इतर दिवशी जेव्हा विष्टि हे करण असेल तो दिवसही वर्ज करावा. विष्टि करणही अशुभ आहे. पंचांगात "भद्रा निवृत्ती" असे लिहून त्या समोर वेळ दिलेली असते ती हे विष्टी करण संपण्याची वेळ असते. त्यावरून विष्टि कधी संपते ते समजते.
त्याचप्रमाणे पंचांगात जेथे करिदिन असे लिहिलेले असते तो दिवसही वर्ज करावा. ग्रहण दिवस, अयन दिवस ( म्हणजे उत्तरायन आणि दक्षिणायन सुरू होते तो दिवस) भावुका अमावास्या आणि होळी यांच्या पुढील दिवसाला करिदिन म्हणतात. तो सर्व शुभकार्यास वर्ज्य आहे. त्या दिवशी पत्रिका घेऊन कोणाकडे जावू नये.
वरिल दिवस वगळता शुभ दिवस पाहून ज्योतिषांच्या भेटीची वेळ मागून घ्यावी. भेटीची वेळ मागतांनाच ज्योतिषांची दक्षिणा किती हे विनासंकोच विचारून घ्यावे. म्हणजे ती आपल्याला योग्य वाटते का नाही, हे ठरवून त्यांच्याकडे जायचे की नाही हे ठरविता येते. काही ज्योतिषी दक्षिणा किंवा मानधन आधी सांगत नाहीत. तुमच्या इच्छेप्रमाणे द्या असे मोघम उत्तर देतात. अशा वेळेस, "मला योग्य वाटेल आणि परवडेल एवढी मी दिली तर चालेल का?" असे स्पष्टपणे विचारावे. हे विचारण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही.
एवढे झाले की त्यांचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, इमेल इत्यादी गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. जाण्याच्या दिवशी सकाळी एकदा फोन करून आपल्या भेटीची वेळ सांगून "अमुक अमुक वाजता मी येतो आहे, तुम्ही वेळ दिली आहे", हे सांगून खात्री करावी. काही वेळा ज्योतिषी आयत्या वेळेस दुसर्या कामास जातात आणि आपली appointment बोंबलते. आता नवीन पिढीतले ज्योतिषी वेळेच्या बाबतीत बरेच काटेकोर झाले आहेत पण काही जुन्या लोकांना time management जमत नाही. त्यांच्यामुळे आपली खेप फुकट जायला नको, म्हणून सकाळी फोन करून खात्री करावी.
भेटीची वेळ घेतल्यावर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे प्रश्न तुम्हाला भेडसावत आहेत, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवे आहे, त्या गोष्टी एका कागदावर नीट क्रमवार लिहून ठेवा. हे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे कुणीही करीत नाही. हे लिहून झाल्यावरही तुम्हाला काही विचारण्यायोग्य मुद्दे सुचण्याची शक्यता आहे. मुद्दा सुचला की तो नमूद करून ठेवा. नाहीतर होतं काय, की लोक जातात, जे तिथे सुचेल ते विचारतात आणि मग तिथून बाहेर आले की विचार करतात, "अरेच्च्या, हे विचारायला हवं होतं, ते विचारायचं राहूनच गेलं" वगैरे वगैरे.
मग त्या राहून गेलेल्या गोष्टींसाठी ते ज्योतिषांना फोन करतात. ज्योतिषी एका दिवसात अनेक कुंडल्या पहात असतात. त्यामुळे तुम्ही फोन केल्यावर तुमची कुंडली त्यांच्या नजरेसमोर येईलच याची खात्री नाही. अशा वेळेस काहीतरी मोघम उत्तरे ऐकून घ्यावी लागतात. हा झाला एक भाग.
दुसरा भाग म्हणजे, तुम्ही जेव्हा या गोष्टींसाठी फोन करता, तेव्हा दुसरा कोणीतरी त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या घेऊन त्या ज्योतिषांसमोर बसलेला असतो. तुमच्या अनाठायी फोनमुळे ज्योतिषांचं लक्ष त्याच्या कुंडलीवरून विचलीत होतं. आणि त्या बिचार्याला उगाचच अप्रत्यक्षपणे तुमच्या फोनचा त्रास होऊ शकतो. कल्पना करा, तुम्ही ज्योतिषांसमोर तुमची पत्रिका घेऊन बसला आहात आणि आधी येऊन गेलेला माणूस तुम्ही तेथे असतांना, फोनवरून त्याच्या राहिलेल्या प्रश्नांविषयी विचारतोय. काय अवस्था होईल तुमची?
असे होऊ नये म्हणून सर्व प्रश्न एका कागदावर लिहून ठेवा.
एवढे केलेत म्हणजे ज्योतिषांकडे जाण्याची पूर्वतयारी झाली. ज्योतिषांकडे गेल्यावर काय करावे हे आता सांगतो.
वर उल्लेख केलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर ठरलेल्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमची पत्रिका घेऊन
ज्योतिषांकडे जाता, तेव्हा तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांची सूची , बरोबर काही रिकामे कागद आणि पेन इत्यादी गोष्टी अवश्य सोबत घेऊन जा.
कागद आणि पेन एवढ्यासाठी की समाजातील काही जणांचे हस्ताक्षर अत्यंत खराब असते. त्यांनी लिहिलेले आपल्याला वाचताही येत नाही. ही समस्या आमच्या बाबतीत नेहमी निर्माण होते कारण, आमचे हस्ताक्षर (देवनागरी, रोमन आणि उर्दू या तीनही लिपीतील) अत्यंत सुंदर असल्यामुळे, इतरांचे हस्ताक्षर थोडे जरी खराब असले तरी त्यांचे लेखन वाचणे आम्हाला फार कंटाळवाणे वाटते. म्हणजे तो मजकूर वाचायला सुरूवात करताच आमचा मूड़च जातो. त्यामुळे आपण आपल्या सुवाच्य हस्ताक्षरात ते ज्योतिर्विद काय सांगतात हे लिहून घेणे हेच श्रेयस्कर ठरते.
एकदा ठरलेल्या वेळी त्यांच्या स्थळी पोहोचल्यावर, सुरूवातीस परिचय, नमस्कार वगैरे सोपस्कार दोन तीन मिनीटात पूर्ण होतात. त्यावेळेस तेथे गर्दी नाही याची खात्री करा. फार लोकांच्या कोलाहलात पत्रिका दाखवणे हे जातकाला जड जाते. नाहीतर असेही ज्योतिषी आहेत की, आठदहा जण एकाच वेळी तेथे बसलेले असतात आणि त्यासर्वांना ते एकाच वेळी attend करत असतात. असे जर कोणी तिथे असेल तर त्यांना सांगा की, माझे वैयक्तिक विषय मला इतरांसमोर उघड करायचे नाहीत. एक तर त्यांना नंतर बोलवा किंवा मी थोडा वेळ थांबतो. पण हा वेळ केवळ माझ्यासाठी तुम्ही दिलेला आहे. त्यामुळे इथे इतर लोक असणे प्रशस्त नाही"
हे प्रकार सर्वांकडे होतात असे नाही. उत्कृष्ट time management ज्याला जमतं तो माणूस कोणाला कधी बोलवायचे याची योग्य आखणी करू शकतो. आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा जर एखाद्या व्यक्तिला सायंकाळी ४ ते ५ ही वेळ दिलेली असेल तर त्यावेळेस अन्य कोणालाही बोलावत नाही. आगंतुकासारखे कोणी आल्यास त्यांना योग्य त्या शब्दात या गोष्टीची आम्ही जाणीव करून देतो. त्यांना भेटीची दुसरी वेळ देतो. पण ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त आम्ही कोणालाही बोलवत नाही आणि इतरांना त्याच्या वेळेवर अतिक्रमणही करून देत नाही.
परिचय झाल्यावर, तुम्ही तुमच्या समस्या नेमक्या शब्दांत ज्योतिषांना सांगणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण आपले symptoms त्यांना सांगतो. तसे निश्चित काय स्वरूपाच्या समस्या आहेत या कुंडली पाहण्याआगोदर ज्योतिषांना सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांची line of thinking ही अधिक अचूक ठरते. कोणत्या स्थानाशी, कोणत्या ग्रहाशी समस्या निगडित आहे हे समजल्यावर त्या स्थानाकडे पाहण्याची सूक्ष्मता वाढलेली असते. समजा एखाद्या व्यक्तिला व्यवसायात काही समस्या आहेत, हे एकदा ज्योतिषांना सांगितले की सहाजिकच त्यांचे बारिक लक्ष द्वितीय षष्ठ आणि दशम स्थानावर असते. डॉक्टरना आपण अमूक ठिकाणी वेदना आहे हे सांगितल्यावर तो भाग ते जास्त काळजीपूर्वक तपासतात. असं कोणी डॉक्टरांना म्हणत नाही की, मी तुमच्यासमोर उभा आहे. आता तुम्हीच शोधून काढा मला काय होताय ते आणि त्याचा इलाज करा. नेमकेपणाने आपली समस्या सांगितली की त्यांच्या विचारांना दिशा मिळते. त्यांच्या उर्जेचा प्रवाह त्यावर केंद्रित होतो. तसेच पत्रिका पाहण्यापूर्वी आपल्या समस्या ज्योतिषांना सांगितल्या की त्यांची सूक्ष्मदृष्टी संबंधीत बाबींवर केंद्रित होते.
हे झाल्यावर तुम्ही तुमची कुंडली ज्योतिषांना द्या. आम्ही स्वत: इतर कुंडल्यांवर विसंबून रहात नाही. तर त्या व्यक्तिच्या जन्मवेळेचा तपशील सॉफ्टवेअरवर टाकून त्याची कुंडली आमच्या संगणकावर बनवतो. कारण सॉफ्टवेअरवर बनविलेल्या कुंडल्या अधिक अचूक असतात. त्या अधिक सूक्ष्मही असतात. त्यामुळे भाकितातील अचूकता वाढते. त्याचप्रमाणे ज्योतिषांनी त्याच्या संगणकावर तुमची कुंडली ठेवल्यामुळे, पुढे कधीही काही समस्या असल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास फोनवरून सर्व सल्ला देता येतो. फोनवर कुंडलीतील घरे त्यांच्या राशी त्यांच्यातील ग्रह हे सांगत बसणे वेगळे आणि मी अमुक अमुक जरा माझी कुंडली पहा हे सांगणे वेगळे. दुसरी गोष्ट म्हणजे जो ज्योतिषी संगणकासारख्या साधनांचा उपयोग करतो तो जास्त organised असतो. त्याची या शास्त्रावरील श्रद्धा, बांधिलकी आणि उत्तरदायित्व अधिक असतं. म्हणूनच तो त्याच्या क्षेत्रात अधिकाधिक उत्तम गोष्टी आणण्याचा प्रयत्न करीत असतो.
अचूकतेची कास धरल्यामुळे भाकितात फरक येतो. हाताने बनविलेल्या अनेक कुंडल्या चुकीच्या असल्याचे आम्ही पाहिलेले आहे. विशेषत: चंद्र २७ अंशाच्या पुढे एखाद्या राशीत असतांना अनेकदा रास चुकलेल्या पत्रिका आमच्या समोर आलेल्या आहेत. एवढेच काय आमची स्वत:ची रास आमच्या एका विद्वान नातेवाईक ज्योतिषांनी बनविलेल्या कुंडलीत सिंह दिली आहे, जी खरेतर कर्क आहे. आम्ही त्यांनाही दोष देत नाही कारण टिळक आणि इतर पंचांगात अश्विन्यारंभ बिंदूवरूनच मतभेद आहेत. असो.ते जाऊ द्या.
सांगण्याचा मुद्दा हा की, शक्यतो संगणकावर बनविलेली कुंडली आपण घेऊन जावी किंवा त्या ज्योतिषांना जन्मवेळेचा तपशील देऊन त्यांच्या संगणकावर आपली कुंडली बनविण्यास सांगावे. पण कित्येकांच्याकडे संगणक असेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे जातांना आपण आपली संगणकावर तयार केलेली कुंडली सोबत घेऊन जाणे इष्ट.
हल्ली दोनशे रुपयात संगणकावर "सखोल" कुंडली बनवून मिळते. साधी कुंडली पन्नास/साठ रुपयात करून मिळते. पण त्यात फक्त लग्नकुंडली, राशीकुंडली आणि ग्रहदशा एवढीच माहिती असते. तशी न बनवता अधिक पैसे देऊन एकदाच सखोल कुंडली बनवून घ्यावी ज्यात वरील गोष्टींसोबत इतर विविध कुंडल्या म्हणजे नवमांश, त्रिशांश, होरा, द्रेष्काण, विदशा, ग्रहयोग, षडवर्गबल यांची इत्यंभूत माहिती असते.
ही कुंडली एकदा त्यांच्यासमोर ठेवली की आपण गप्प बसावे. त्यांना ती बारकाईने अभ्यासण्यासाठी संधी द्यावी. यावेळेस वायफळ बडबड करून त्यांचे लक्ष विचलित करू नये. कारण इथे तुमच्या कुंडलीचा खरा अभ्यास सुरू झालेला असतो. तुमचे लग्न आणि तुमची रास यावरून तुमच्याबद्दल काही गोष्टी ते ज्योतिषी ठरवत असतात. मधूनच ते तुमच्याकडे पाहतात. तुमच्या लग्नस्थानात असलेल्या ग्रहाची खूण तुमच्या चेहर्यावर आहे का याची खात्री करतात. कोणत्या लग्नाला कोणते ग्रह तारक आहेत कोणते ग्रह मारक आहेत त्याचे आडाखे ते मनात बांधतात. पत्रिकेत कोणता ग्रह कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात आहे हे ते पाहतात. त्यानंतर स्थाने पहायची असतात. प्रत्येक भाव तपासायचा असतो. तो भाव, त्याचा कारक ग्रह कोणता, तो कुठे आहे, त्याची कुंडलीतील स्थिती काय आहे, त्या भावात कोणती रास आहे, त्या भावाचा भावेश कुठे आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे, त्याच्या सोबत कोणते ग्रह आहेत, तो मित्रराशीत आहे की शत्रूराशीत, त्याच्यावर कोणते योग आहेत, त्याचा कोणाशी परिवर्तन योग आहे, कुंडलीतील प्रत्येक ग्रहाचे इतरांशी योग कोणते आहेत, युती कोणाची, लाभयोग कोणात आहे, केंद्रयोग कोणात आहे, प्रतियुती कोणाची आहे, षडाष्टक कोणाचे आहे, जन्मनक्षत्र कोणते, जन्मत: महादशा कोणाची होती, त्यातील भुक्त किती, भोग्य किती, एक ना अनेक गोष्टी बघायच्या असतात.
या सर्व गोष्टी नीट पाहण्यासाठी किमान वीस मिनीटे लागतात. त्याकाळात ते काही प्रश्न विचारतात. त्यांची नेमकी उत्तरे आपण द्यायची असतात. त्यावरून त्यांना विचारांची दिशा गवसत असते. कुंडलीचा दर्जा समजत असतो. अशा वेळेस फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यापलिकडे आपण काहीही करू नये. आपण अनावश्यक बाबी बोलून त्यांच्या विचारप्रक्रियेत अडथळे आणत असतो याची जाणीव अनेकांना नसते.
गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना ते आम्हाला श्री. नारायण राणे यांनी केलेल्या विधानांबद्दल सांगत होते. एकदा झालं दोनदा झालं, तिसर्यांदा जेव्हा ते म्हणाले की, "पंत, नारायण राणे मुख्यमंत्री होतील का?"
तेव्हा आम्ही त्यांना सांगितले " अहो, तुम्हाला आम्ही तुमच्या कुंडलीबाबत सल्ला द्यावा की श्री. राणे यांच्या कुंडलीबाबत? त्यांना जे काही करायचे आहे, ते करायला ते समर्थ आहेत. तुम्ही कशाला ते प्रश्न इथे उपस्थित करता आहात? तुम्ही तुमची कुंडली घेऊन आमच्याकडे आला आहात, तर तिचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आवश्यक तेवढी एकाग्रता साधू द्या की". तर असे होते.
एकदा ज्योतिषांनी कुंडलीचा संपूर्ण अभ्यास केला की ते तुम्हाला सांगतात की, "विचारा आता". तेव्हा तुमची प्रश्नांची यादी काढून एक एक प्रश्न त्यांना विचारावा. प्रश्न विचारल्यावर ते काय सांगत आहेत ते नीट समजून घ्यावे. न समजल्यास पुन्हा पुन्हा विचारावे. महत्वाचे मुद्दे आपल्या अक्षरात लिहून घ्यावेत. एका एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले की पुढील प्रश्नाकडे जावे. अशा रितीने आपले सर्व प्रश्न त्यांना विचारून आपले संपूर्ण शंकासमाधान करून घ्यावे. पुन्हा पुन्हा त्यांना फोन करावा लागणार नाही याची काळजी घ्यावी.
शेवटी आपण काय काय करायला हवे ते विचारावे. ते जे काही थोडक्यात सांगतील ते नमूद करून ठेवावे. त्यांनी अमुक अमुक तारखेपर्यंत अमुक अमुक गोष्ट करू नका असे सांगितले असेल तर त्या तारखा आपण नीट नमूद केल्या आहेत याची खात्री करून घ्यावी.
सर्व शंकांचे समाधान झाल्यावर त्यांची ठरलेली दक्षिणा म्हणा वा मानधन देऊन त्यांचा निरोप घ्यावा. सांगितलेल्या गोष्टींचा पडताळा येईल तेव्हा त्यांना अवश्य फोन करून कळवावे. त्यामुळे ज्योतिषी आणि जातक यांच्यातील स्नेह वाढीस लागतो.
वरील गोष्टींबरोबर, आपल्या कुलदैवताचे आणि कुलस्वामिनीचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे. त्यांच्या नावाने घरात पूजापाठ करावा. सदगुरूंकडून जर मंत्र घेतला असेल तर त्याची साधना करावी.
या सर्व शक्ति अडचणीच्या वेळेस आपल्याला मार्गदर्शन करीत असतात.
आपला,
(साधक) धोंडोपंत
वाचने
67342
वाचनखूण
प्रतिक्रिया
137
त्यापेक्षा हा लेख वाचा('उधा'साठी भविषाच्या पाठी )
संदर्भ
सहमत
कोणते अज्ञान
In reply to कोणते अज्ञान by विकि
आम्ही कोण...
In reply to आम्ही कोण... by इनोबा म्हणे
कसली चूक
In reply to कोणते अज्ञान by विकि
विकि महाशय
वा पंत...
रिटर्न ऑफ 'वा पंत"
In reply to रिटर्न ऑफ 'वा पंत" by डेंजर डॉन
हा कोण डेंजर डॉन???
In reply to हा कोण डेंजर डॉन??? by छोटा डॉन
छोटे डॉन महाशय
छा...न.!
धोंडोपंत
In reply to धोंडोपंत by प्रकाश घाटपांडे
दोन मित्रांचा प्रवास
In reply to दोन मित्रांचा प्रवास by विसुनाना
साम्य
In reply to साम्य by प्रकाश घाटपांडे
सहमत
वा ! पंत लेखन आवडले.
In reply to वा ! पंत लेखन आवडले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक साहेब
In reply to प्राध्यापक साहेब by धोंडोपंत
जानव्याची अडचन होते तर मग
In reply to जानव्याची अडचन होते तर मग by विजुभाऊ
हा हा हा
In reply to जानव्याची अडचन होते तर मग by विजुभाऊ
ते जानवे घालणारे बघून घेतील,
मॅग्नेट
पंत लेख
In reply to पंत लेख by विजय.पाटील
असहमत..
In reply to असहमत.. by विसोबा खेचर
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by विजय.पाटील
का बरं अनावश्यक आहे?
In reply to पंत लेख by विजय.पाटील
विजयराव
सर्वांना धन्यवाद
छान
माननीय
माननीय
In reply to माननीय by आप्पा
असं मलाही वाटतं. पण तो एक
गेल्या आठवड्यात आम्ही एका
In reply to गेल्या आठवड्यात आम्ही एका by विजुभाऊ
ईथे
In reply to ईथे by अनिरुद्ध प
आम्ही
'आम्ही'
In reply to 'आम्ही' by चित्रगुप्त
लेखन करताना स्वतःचा उल्लेख
लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते)असे आमचेही मत आहे ;)In reply to लेखन करताना स्वतःचा उल्लेख by डॉ सुहास म्हात्रे
असं आमचंही मत आहे.
In reply to असं आमचंही मत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द्या टाळी!
In reply to द्या टाळी! by स्पंदना
चला (मूक संमतिवाले जन धरून)
हा हा हा. ला उगाच .......
ला उगाच ....... म्हणजे काय ?
In reply to ला उगाच ....... म्हणजे काय ? by चित्रगुप्त
बर्रूब्बर . ला रीव्हे गाउचे
लहान मुलाची पत्रिका
.
In reply to . by दादा कोंडके
(ज्योतिष्या) ऐशा नरा, मोजुनि
यशस्वी राजकारणी आणि जोतिषी फक्त एकच गोष्ट करतात
ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर
In reply to ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर by सुहासदवन
मी पण
डॉक्टरची पायरी चढू नये??
धोंडोपंत! अहो आहात कुठे?
टिंगल करता काय ज्योतिषाची?
In reply to टिंगल करता काय ज्योतिषाची? by प्रकाश घाटपांडे
टिंगल कसली अहो गम्मतच केली मस्तपैकी
In reply to टिंगल करता काय ज्योतिषाची? by प्रकाश घाटपांडे
हे मात्र पटले नाही
In reply to हे मात्र पटले नाही by सुबोध खरे
खरंच खेद वाटतो
In reply to खरंच खेद वाटतो by सुहासदवन
+१
In reply to +१ by दादा कोंडके
उच्चशिक्षीत
In reply to खरंच खेद वाटतो by सुहासदवन
वाटल्यास तपासून पहा.
सर्वश्री सुबोध खरेजी,
खरे आहे घाटपांडे काका.
ऋषी निरुत्तर दमनस (
साहेब,
In reply to साहेब, by सुबोध खरे
गंमतीची गोष्ट म्हणजे माझी
In reply to गंमतीची गोष्ट म्हणजे माझी by प्रकाश घाटपांडे
अंतस्फुर्ती
In reply to गंमतीची गोष्ट म्हणजे माझी by प्रकाश घाटपांडे
फक्त जन्म तारीख नव्हे तर
आमची पिंक
In reply to आमची पिंक by प्रसाद गोडबोले
भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच
In reply to भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच by बॅटमॅन
सेम
In reply to सेम by प्रसाद गोडबोले
अगदी, अगदी!!!! बाकी
In reply to भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच by बॅटमॅन
हा हा...
In reply to हा हा... by दादा कोंडके
आम्ही पण अचूक भविष्य सांगतो
बॅटम्याना एक वेगळा स्वतन्त्र
In reply to बॅटम्याना एक वेगळा स्वतन्त्र by विजुभाऊ
खरेतर घाटपांडेकाकांनी हे काम
कोणताही ज्योतिषी हल्ली
In reply to कोणताही ज्योतिषी हल्ली by क्रेझी
कोणताही ज्योतिषी हल्ली
In reply to कोणताही ज्योतिषी हल्ली by क्रेझी
सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली
डॉक्टर श्री यांच्याशी पूर्ण सहमत..
In reply to डॉक्टर श्री यांच्याशी पूर्ण सहमत.. by विटेकर
बेशिकमध्येच लोच्या
In reply to बेशिकमध्येच लोच्या by बॅटमॅन
खरे भविष्य..
In reply to खरे भविष्य.. by विटेकर
सफरचंद-संत्रे तुलना.
In reply to सफरचंद-संत्रे तुलना. by बॅटमॅन
...
अतिशय हास्यास्पद तुलनाधन्यवाद !In reply to डॉक्टर श्री यांच्याशी पूर्ण सहमत.. by विटेकर
मुद्दा काही का असेना,
माझा ह्या विषयावर पुष्कळ
In reply to माझा ह्या विषयावर पुष्कळ by पिलीयन रायडर
सायकॉलॉजिकल
In reply to सायकॉलॉजिकल by प्रसाद गोडबोले
सँपल सिलेक्शन बायसदेखील असावा
In reply to माझा ह्या विषयावर पुष्कळ by पिलीयन रायडर
इतकं ठोस सांगितल्याच दिसत
In reply to इतकं ठोस सांगितल्याच दिसत by बाळ सप्रे
पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज आणि धोंडोपंत
In reply to पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज आणि धोंडोपंत by पिलीयन रायडर
ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन
In reply to ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन by बाळ सप्रे
बरोबर.. साधारण अंदाज बघुन..
In reply to बरोबर.. साधारण अंदाज बघुन.. by पिलीयन रायडर
एखादी हिंट